ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १३ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दत्तात्रय कोंडो घाटे

दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त (27 जून 1875 – 13 मार्च 1899). हे मूळचे श्रीगोंद्याचे. त्यांचे शालेय शिक्षण नगरमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई, इंदूर, कलकत्ता येथे झाले. नंतर ते पुण्याच्या नू. म. वि.मध्ये शिक्षक होते.

रेव्ह. ना. वा. टिळक, कविवर्य चंद्रशेखर  वि कवी दत्त या तिघांचे सख्य होते.

‘बा नीज गडे ‘ ही कवी दत्तांची लोकप्रिय कविता. त्यांनी 1897-98 मध्ये बहुसंख्य कविता लिहिल्या. त्या वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी 48 कवितांचा ‘दत्तांची कविता ‘हा संग्रह त्यांचे पुत्र शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक वि. द. घाटे यांनी 1922 साली प्रसिद्ध केला. डॉ. मा. गो. देशमुखसंपादित संग्रहात त्यांच्या सर्व म्हणजे 51 कविता आहेत.

आकाशानंद

आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (1933-13 मार्च 2014). आकाशानंद हे पूर्वी नागपूर नभोवाणी केंद्रात कार्यक्रम निर्माते होते. नंतर 1972 पासून मुंबई दूरदर्शन केंद्रात आले.1992 साली ते तिथे उपसंचालक पदावरून  निवृत्त झाले.

त्यांनी सादर केलेले ‘ऐसी अक्षरे ‘, ‘शालेय चित्रवाणी’  व ‘ज्ञानदीप ‘हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले.

1988मध्ये ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमावर बीबीसीच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी 45 मिनिटांचा लघुपट केला. याच कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली.

‘ज्ञानदीप’वर आधारित असलेले ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिक त्यांनी 25 वर्षे चालवले.

1992मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पहिल्या ‘ज्ञानदीप’ मंडळाची स्थापना केली. त्यांचा विस्तार होऊन राज्यात 1500 मंडळे स्थापन झाली.

त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ वगैरे  पाच पुस्तके व बालसाहित्यात 300 गोष्टीची पुस्तके लिहिली.

त्यांच्या ‘माध्यम चित्रवाणी’ या दूरचित्रवाणी या विषयावरील पहिल्या मराठी पुस्तकाला राज्यसरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला.

याशिवाय त्यांना गोंदियाभूषण व सेवाश्री पुरस्कारही मिळाले.

मालतीबाई किर्लोस्कर

मालतीबाई किर्लोस्कर या विख्यात मराठी संपादक व लेखक शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या.

त्या सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्या अतिशय सुंदर शिकवत असत.

पक्की वाङ्‌मयीन व वैचारिक बैठक, भारदस्त व्यक्तिमत्त्व व विपुल व्यासंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये. त्या परखड व स्पष्टवक्त्या होत्या.

त्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ मध्ये अधूनमधून लिहीत असत.

‘भावफुले’ व ‘फुलांची ओंजळ’ हे त्यांचे व्यक्तीचित्रसंग्रह प्रसिद्ध आहेत.

13 मार्च 2017 ला त्यांचे निधन झाले.

रमेश मुधोळकर

बालसाहित्यकार व चित्रकार रमेश मुधोळकर (19.07.1935 – 13.03.2016) यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे झाले.पुढे ते मुंबईला आले. तिथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले.

1972मध्ये त्यांचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध झाले.1974 मध्ये त्यांनी ‘शालापत्रक’ हे मासिक सुरू केले. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे 300 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यात ‘इसाप’, ‘गलिव्हरच्या गोष्टी’, ‘बिरबल आणि बादशहाच्या 175 गोष्टी’ यांचा समावेश आहे.

जयको पॉकेट बुक्स व अमर चित्रकथा तसंच एको बुक्स या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा मोठाच वाटा आहे.

देशोदेशीच्या रसाळ कथा, तसंच खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीत असे बरेच लेखन त्यांनी मराठी व इंग्रजीतून केले. त्याचप्रमाणे शंकरमहाराज व दिगंबरदास महाराज यांच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.

‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या संस्थेचे ते संस्थापक -सदस्य होते.

2009मध्ये त्यांच्या लेखनाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली.

13 मार्च 2016 मध्ये पुणे येथे त्यांचा देहांत झाला.

कवी दत्त, आकाशानंद, मालतीबाई किर्लोस्कर व रमेश मुधोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.  ??

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया, इंटरनेट. मराठीसृष्टी. कॉम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रणी उतरतो सर्वांसाठी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ रणी उतरतो सर्वांसाठी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: वनहरिणी)

रणी उतरतो सर्वांसाठी,भोग भोगतो सर्वांचे मी……..

उपकाराचे ढोंग कशाला,रणांगणी ह्या माझ्यास्तव मी!

 

तरीहि येतो कोणी दारी,जखमांवर घालाया फुंकर

पराभूत मी परंतु ज्याच्या,दाटे कंठी माझा हंबर !

 

तेच कपातिल फुटकळ वादळ, तीच चहाची अळणी धार

तूफानांनो तुमच्यासाठी,सताड उघडे केले दार !………..

 

प्रभंजनाशी घेता पंगा,संहाराची व्यर्थ रे तमा

साती सागर ओलांडू वा निमूट होऊ इतिहासजमा!

 

पैल पोचता क्षणात कळते, हा न किनारा ध्यासामधला

क्षणभर वाटे उगीच केला, ऐल पारखा रक्तामधला!….

 

जागा होतो कैफ पुन्हा तो, शिडात भरतो उधाण वारा

पुन्हा सागरी नाव लोटणे, शोधाया तो स्वप्नकिनारा !…

 

झिजता झिजता वर्धमान मी,आटत आटत अथांग होतो….

तुझी नि माझी एक कहाणी, आत्मकथेतुन सांगत असतो !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सारंगपाणी ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सारंगपाणी… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

वारा शिवारी गार शिवारी

झुलतो शाळू भार शिवारी

मनात फुलते रान गाणी गं

पाणी पाजते आप्पाची राणी गं

 

नथ हसता,माळ बोलते

भाळी कुंकूम टिळा फुलतो

हाती कंकणाचा नाद खुलतो

पैंजण खेळे माती पाणी गं

 

वारा सळसळ झाड हलवी

मनात फुलते पान पालवी

वसंत कोकिळ मला बोलवी

मनात नाचता मीही गाते गाणी गं

 

मोहर अांबा मनात घुमतो

वेली फुलांचा गंध झुमतो

जाई जुई शेवंता रंग चुमतो

कळी हसता पायी खेळे पाणी गं

 

माळावरी ती झालर  फुलांची

हलत वा-यासवे खेळे धुलाशी

पक्षीपाखरु पंखी रंग फुलांचे

अप्पा हसे माझा सारंगपाणी गं

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ या बाई या ☆ कवी दत्त (विठ्ठल दत्तात्रेय घाटे)☆

? कवितेचा उत्सव ?

☆ या बाई या ☆ कवी दत्त (विठ्ठल दत्तात्रेय घाटे)☆

[विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ – ३ मे, १९७८) ]

या बाई या,

बघा बघा कशी माझी बसली बया

 

ऐकू न येते,

हळुहळू अशी माझी छबी बोलते

 

डोळे फिरविते,

टुलूटुलू कशी माझी सोनी बघते

 

बघा बघा ते,

गुलूगुलू गालातच कशी हसते

 

मला वाटते,

हिला बाई सारे काही सारे कळते

 

सदा खेळते,

कधी हट्ट धरून न मागे भलते

 

शहाणी कशी,

साडीचोळी नवी ठेवी जशीच्या तशी.

 

 – कवी दत्त (वि.द.घाटे)

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गंमत सांगू तुला …? ….अनामिक ☆ प्रस्तुती… श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

एक गंमत सांगू तुला …? ….अनामिक ☆ प्रस्तुती… श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

एक गंमत सांगू तुला …?

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला

पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला…

😗

 

एक गंमत सांगू तुला …?

लहानपणी वाटायचं,

नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..

म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला

पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला…

😍

 

एक गंमत सांगू तुला ….?

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला

पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..

म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला

पण जीना उतरेस्तवर

पाय लागतात लटपटायला…

😓

 

एक गंमत सांगू तुला …..?

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,

दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..

म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,

पण एकेक खोली आ वासून येते खायला…

😵

 

एक गंमत सांगू तुला ……?

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,

फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..

मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,

का

ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

😰😒😭

 

म्हणून म्हणतो मित्रांनो……आताच जगणं शिका.

👆आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा…💐

💎…ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

 

 त्या क्षणी तुमची ओळख एक बॉडी ” बनुन जाते

,”बॉडीला” 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑

 

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

 

म्हणूनआव्हाने स्वीकारा,😠

 

आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴

 

आवडत्या लोकांना वेळ दया,💑

 

पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश

😂

म्हणाले तरी चालेल. 

 

मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.

💃

अगदी लहान बाळासारख़ जगा.

कारण,👶

 

“मृत्यु” हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला “जिवंतपणा”मेलेला असतो.🙏

 

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोनाडा… भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ कोनाडा… भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही महिनाभर ग्रँटरोडला आजोबांकडे रहायला जायचो. जीजी आणि पपा फक्त घरी. पपा तर दिवसभर बाहेरच असायचे. म्हणजे जीजी एकटी घरात. कधीकधी पपाही आमच्याबरोबर असायचे. म्हणजे जीजी अगदी एकटीच. रात्री आमच्या नात्यातला एक काका तिच्या सोबत असायचा.

पण ती आम्ही परत घरी यायची वाट बघायची. ती आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या घालून ठेवायची.  त्यावेळी ठाण्याजवळ जंगलात रहाणार्‍या कातकरी आदीवासी बायका आमच्या घरी आंबे घेऊन यायच्या. प्रत्येक आंबेवालीशी हुज्जत घालून’ निवडून ती आंबे विकत घ्यायची. त्यांनाही सांगायची,

“आता माझ्या नाती येतील. त्यांना आंबे लागतील. त्या येईपर्यंत पिकलेल्या आंब्यांची अढी तयार होईल. . . “

तिचं सारं विश्वच आमच्यात सामावलेलं होतं. . .

आम्ही परत आलो की, माळ्यावर ढीगभर पसरलेले आंबे पाहून आनंदून  जायचो. .

तसे आजोबांकडेही आम्ही आंबे खात असू. पण आजोबांकडे सगळं शिस्तीत , नियमात, वेळेत. . . जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. . भरपूर , केव्हांही. . कधीही. . .

आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता. . .

आता वाटतं, आम्ही तिला एकटीला टाकून जायचो. . . कशी राहत असेल ती एकटी. .

आमच्याशिवाय किती सुनी सुनी झाली असेल ती. . . .

कधी सांगायची, “अग!त्या दिवशी वेणु आली होती. . . या एवढ्या मोठ्या करपाल्या कोलंब्या घेऊन. . पाठीसच पडली. “घेच गं म्हातारे!तुला द्यायच्या म्हणून कुणालाच दिल्या नाहीत. . . “

“पण कुणासाठी घेऊ बाई?माझी नात नाही खायला. ती आली की आण पुन्हा नक्की. . आता दे त्या चित्रेबाईला. . . “

पण बिंबाला किती आवडतात या तळलेल्या कोलंब्या. . म्हणून तिचा जीव हळहळायचा. .

रविवार असला की,  पाट्यावर नारळ वाटून ती त्याचं दूध काढायची. आणि नहाण्यापूर्वी ती केसांना छान लावून द्यायची. त्यावेळी मिक्सर नव्हते. केसांना शांपू लावणे अथवा बाजारात मिळणारे केसांचे साबण लावणे तिला अजिबात मान्य नसायचे. . .

सगळ्या नातींचे केस दाट आणि काळेभोर.

आता या सगळ्याची पावती जीजीलाच देते. पण त्यावेळी तिचा रागच यायचा. तिची ही साग्रसंगीत औषधं लावण्याचा आम्हाला कंटाळा यायचा. म्हणून आम्ही तिच्याशी वाद घालायचो. . भांडायचेही. . पण ती ऐकून घ्यायची आणि तिला जे करायचे तेच करायची. .

कधी चिडून दांतओठ खायचीही, .

म्हणायची,  “कार्टीला अक्कल नाही. . चांगलं कळत नाही. . दळभद्री कुठली. , . . “

तिची गंमत वाटायची.  एव्हढं आयुष्य तिनं उन्हात काढलं.  सोळाव्या वर्षी विधवा झाली . पदरात चार महिन्याचं मुल. त्यावेळचा सामाजिक काळही चांगला नव्हता. विधवा बाईला खूप पीडा. तिला तिच्या सासरच्या माणसांनीही खूप त्रास दिला. कधी ती सांगायची. . .

“मला जीवनाचा कंटाळा आला होता. मी जनाला घरीच पाळण्यात ठेवले आणि तळं गांठलं. आता जीवच द्यायचा . . . तळ्या जवळच्या शंकराच्या देवळात घंटा वाजत होत्या. पाण्यात खूप कमळं फुलली होती. का कोण जाणे!मला एकदम वाटलं, पाळण्याच्या दांड्यात माझ्या बाळाचा पाय अडकलाय. माझं बाळ रडतंय् . . त्याच्याजवळ कुणीच नाही. आणि मी झपाट्याने घरी धावत आले बाळ पाळण्यात शांत झोपला होता.

गुटगुटीत. गोरागोमटा. भव्य कपाळ. काळंभोर जावळ.  मी त्याला छातीशी कवटाळलं. आणि ठरवलं . . याला मी वाढवेन मोठा करेन. चणे दाणे खाईन. . खूप कष्ट करेन…”

कष्टच केले तिने आयुष्यभर. . . . तेव्हांही. . नंतरही. . या ना त्या कारणाने. . अथक. कंटाळा न करता.

पप्पा एव्हढाले कोहळे आणायचे ते किसायचे त्याचा रस काढायचा. पातेल्यात साखरेच्या पाकात शिजवून वड्या करायच्या. टोपलीभर कमळाचे देठ आणायचे. ते गोल  पायचे.

तिखट मीठ, जीरपूड लावून वाळवायचे. आणि तळून खायचे. त्याला कमळाची भिशी म्हणत. ही भिशी करणं अपार कटकटीचं होतं. गवारीच्या शेंगा ताकात भिजवून नंतर वाळवायच्या.

बरण्या भरुन लोणची मुरंबे करायचे. दिवाळीच्या दिवसात, सुगंधी उटणे ती घरी बनवायची. . . अनारशाचे ओले तांदुळ जात्यावर दळायची. आम्हाला म्हणायची, “येग! जात्याला हात लाव…माझे हात दुखतात..तुझ्या आईलाही भरपूर कामं असतात…”पण आम्ही तिला कधीतरीच मदत करायचो…खरं म्हणजे हे ती सर्व आमच्यासाठीच करत होती…

आता तिच्या हातचे जाळीदार कुरकुरीत सोनेरी अनारसे आठवले की वाटतं…ती गोडी अवीट होती…आणि आता कायमची दुरावली….

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कुसुमाग्रजांची एक कविता आहे,

‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,

उतरली जणु तारकादळे नगरात,

परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हां,

त्या माजघरातील मंद दिव्याची वात.’

आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणार्‍या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरात रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणार्‍या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो, “मन एव मनुष्यः”, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

(पुलंनी अमेरिकेत केलेल्या एका भाषणातून)

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मातेच्या प्रेमा उपमा नाही ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? मातेच्या प्रेमा उपमा नाही ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

जरी फिराल सारे ब्रह्मांड

अथवा शोधाल दिशा दाही,

असो मानव वा मुकाप्राणी

मातेच्या प्रेमा उपमा नाही !

उभी गोमाता तप्त उन्हात

बसे बछडा तिच्या छायेत,

मातृप्रेमाची अनोखी रीत

ना पाहिली दूजी या जगात !

छायाचित्र – श्री सुधीर बेल्हे,कॅलिफोर्निया

© श्री प्रमोद वामन वर्तक

१९-०२-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – फ्लाइंग किस ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय एवं संवेदनशील लघुकथा   ‘फ्लाइंग किस’।)

☆ लघुकथा – फ्लाइंग किस ☆ श्री हरभगवान चावला ☆

कवि खंडहर देखते-देखते थक गया तो एक पत्थर पर जा बैठा । पत्थर पर बैठते ही उसे एक कराह जैसी चीख सुनाई दी । उसने उठकर इधर-उधर देखा । कोई आसपास नहीं था । वह दूसरे एक पत्थर पर जा बैठा । ओह, फिर वैसी ही कराह! वह चौंक गया और उठकर एक तीसरे पत्थर पर आ गया । वहाँ बैठते ही फिर एक बार वही कराह! कवि डर गया और काँपती आवाज़ में चिल्ला उठा, “कौन है यहाँ?”

“डरो मत । तुम अवश्य ही कोई कलाकार हो । अब से पहले भी सैंकड़ों लोग इन पत्थरों पर बैठ चुके हैं, पर किसी को हमारी कराह नहीं सुनी । तुम कलाकार ही हो न!”

“मैं कवि हूँ । तुम कौन हो और दिखाई क्यों नहीं दे रहे हो?”

“हम दिखाई नहीं देते, सिर्फ़ सुनाई देते हैं । हम गीत हैं- स्वतंत्रता, समता और सद्भाव के गीत । हम कलाकारों के होठों पर रहा करते थे । एक ज़ालिम बादशाह ने कलाकारों को मार डाला । उनके होठों से बहते रक्त के साथ हम भी बहकर रेत में मिलकर लगभग निष्प्राण हो गये । हम साँस ले रहे हैं पर हममें प्राण नहीं हैं । हममें प्राण प्रतिष्ठा तब होगी जब कोई कलाकार हमें अपने होठों पर जगह देगा । क्या तुम हमें अपने होठों पर रहने दोगे कवि?”

“……….”

“अच्छी तरह सोच लो कवि । यदि फिर से कोई अत्याचारी बादशाह गद्दी पर बैठ गया तो तुम्हारे प्राण संकट में फँस सकते हैं । तुम तैयार नहीं हो तो कभी कोई और आएगा।”

“मैं हूँ या कोई और, कोई अंतर पड़ने वाला नहीं है । सत्ता का अपना चरित्र होता है । बादशाह प्रायः ज़ालिम होते हैं ।”

“प्रजा का भी एक चरित्र होता है कवि! तुम जिस खंडहर को देखकर आ रहे हो, वह कभी बादशाह का आलीशान महल था । वह प्रजा ही थी, जिसने महल को खंडहर बनाया और बादशाह को भिखारी । प्राणों की भीख माँग रहा बादशाह कितना दयनीय लग रहा था, काश तुम उसकी कल्पना कर सको ।”

कवि को गीत बहुत अपने से लगे, अपनी आत्मा का हिस्सा हों जैसे । उस दिन के बाद गीत कवि के होठों पर मचलने लगे । कुछ समय बाद कवि को शासन के विरुद्ध असंतोष भड़काने के आरोप में कारागार में डाल दिया गया । गीत अब उतने भोले नहीं रह गये थे । वे किसी और कवि के होठों पर जा बैठे । वह भी जब कारागार में डाल दिया गया तो वे किसी और कलाकार के होठों पर चले गए । इस तरह कलाकार कारागार में आते गये और गीत पूरी रियासत में गूँजने लगे । एक दिन कवि ने सुना- प्रजा बादशाह के महल तक पहुँच गई है और बादशाह को लोगों ने काँपते देखा है । कवि को गीतों पर बहुत प्यार आया । उसने मुस्कुराते हुए एक चुम्बन गीतों की तरफ़ उछाल दिया । गीतों ने तुरंत उस चुम्बन को लपक लिया ।

(लघुकथा संग्रह ‘बीसवां कोड़ा’ से)

© हरभगवान चावला

सम्पर्क –  406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ #132 – आतिश का तरकश – ग़ज़ल-20 – “होली पर बात करेंगे” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “होली पर बात करेंगे…”)

? ग़ज़ल # 20 – “होली पर बात करेंगे” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

दिल खुलने लगे कुछ बात करेंगे,

मोबाइल न लाना कुछ बात करेंगे।

 

दिन बुरे गुजरे कोरोना के संग,

अब बातों बातों में रात करेंगे।

 

निपटे मंदिर-मस्जिद के झगड़े,

प्यार मुहब्बत की बात करेंगे।

 

बहुत हुए फ़ासले लोगों के बीच,

आपस में मिला एक पाँत करेंगे।

 

छँटा आशंका का मनहूस साया,

रंग ओ गुलाल बरसात करेंगे।

 

दिमाग़ी धुँध भी छँटेगी ज़रूर,

दिल से दिल की बात करेंगे।

 

तुम बस चले भर आओ आज,

होली पर ढीले जज़्बात करेंगे।

 

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares