2 डिसेंबर १९११ साली जन्मलेले अनंत वामन वर्टी व्यवसायाने डॉक्टर पण साहित्याची अतिशय आवड असलेले. विनोदी लेखक म्हणून साहित्य क्षेत्रात मान्यता पावले. नाशिक येथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यांना साहित्याप्रमाणेच बॅडमिंटन आणि ब्रीज खेळण्याचीही आवड होती.
१९५३ साली गावकरी प्रकाशनतर्फे ‘अमृत ‘ मासिक काढायचे ठरले, तेव्हा वर्टींनी संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ११९६० मध्ये ‘अमृत ‘ च्याच धरतीवर त्यांनी ‘श्रीयुत’ हे मासिक सुरू केले. चंद्रहासनावाची प्रकाशन संस्थाही त्यांनी सुरू केली. त्यांचे बरेच कथासंग्रह या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले आहेत. नाशिक सार्वजनिक वाचनालयाशी त्यांचा जवळचा संबंध होता. या वाचंनालयातर्फे ते जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करत.
त्यांच्या कथात विविधता आहे. मानवी स्वभावाचे मार्मिक चित्रण त्यांनी केले आहे. कथेचा चमत्कारपूर्ण शेवट ही त्यांच्या लेखनाची खासियत होती. वर्टींनी ५०० पेक्षा जास्त काथा लिहिल्या आहत. त्यांचे २१ पेक्षा जास्त कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी नाटके आणि कादंबर्याही लिहिल्या आहेत.
त्यांनी लिहिलेले ‘राणीचा बाग’ हे नाटक खूप गाजले. सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकाला मिळाला. १९५७ साली राज्य नाट्यस्पर्धेच्या वेळी मराठी , गुजराती आणि कन्नड आशा तीन भाषातून एकाच वेळी हे नाटक सादर करण्यात आले.
वर्टींचे काही कथासंग्रह – १. अकरावा गडी २.अखेरचा आघात ३.गुलबदन, ४. दांतकथा, ५. पोलिसी खाक्या, ६.मंत्र्यांचा मंत्री, ७. सायराबानू आणि इतर विनोदी कथा इ.
वर्टींच्या काही कादंबर्या – अभिनय, नवा धर्म, काठपुतळ्या, हेरंब, वाघीण, तिसरी इच्छा, सुलूचा रामा-इडली डोसा
पुरस्कार –वर्टींच्या ‘टॉमी’ या कथेस १९३७मधे किर्लोस्कर मासिकाच्या लघुकथा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले होते. ‘समीक्षक’ या मासिकाच्या कथास्पर्धेत ‘मुमताज या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले होते.
नाशिकमध्ये त्यांच्या सन्मानार्थ एका रस्त्याला डॉ. अ. वा. वर्टी हे नाव दिले आहे.
नाशिक सार्वजनिक वाचंनालयातर्फे दर वर्षी एका कथालेखकास अ. वा. वर्टी पुरस्कार दिला जातो.
२०१० साली डॉ. अ. वा. वर्टी व्यक्ति आणि वाङ्मय तसेच नाटककार वर्टी- एक शोध हे २ शोध निबंध प्रकाशित झाले.
☆☆☆☆☆
वा.गो.आपटे म्हंटलं की डोळ्यासमोर येतं आनंद मासिक. एके काळी या मासिकाने मुलांना खूप भुरळ घातली होती. वा.गो.आपटे त्याचे संस्थापक आणि संपादक. १९०६ साली त्यांनी ते सुरू केले. हे मासिक त्यांच्या हयातीनंतरही अनेक वर्षे चालू होते. ते मराठीतील लेखक, भाषांतरकार, पत्रकार होते, निबंधकार, कोशकारही होते. बंगाली कादंबर्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
वा.गो.आपटे यांचा जन्म खांदेशातील धरणगाव येथे झाला .’अशोक अथवा आर्यावर्तातील पहिला चक्रवर्ती राजा हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यांनी १९०५ साली लिहिले. बौद्धपर्व अथवा . बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. अलाहाबाद येथील ‘मॉडर्न रिव्ह्यू’मध्ये मराठी पुस्तकांचे परीक्षण ते करीत.
वा.गो.आपटे यांचे बरेचसे लेखन अनुवादीत वा रूपांतरित आहे. मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखन कला आणि लेखन व्यवसाय, मराठी शब्द रत्नाकर, मराठी शब्दार्थ चंद्रिका, मराठी-बंगाली शिक्षक, सौंदर्य आणि ललित कला,इ. त्यांची विविध विषयांवर २४-२५ पुस्तके आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी ३० -३२ पुस्तके लिहिली॰ त्यांचे बालवाङ्मय रंजक व उद्बोधक आहे. बांकीमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वङ्मय त्यांनी मराठीत ४ खंडात आणले.
मराठी शब्द रत्नाकर आणि मराठी शब्दकोश यांचे लेखन हे त्यांचे महत्वाचे वाङ्मईन कार्य.
इतर – वा.गो. आपटे : व्यक्ति आणि वाङ्मय या नावाचा त्यांच्यावरचा ग्रंथ राणे जाधवांनी लिहिला आहे.
मराठी साहित्य परिषद येथील ग्रंथालयाला वा.गो. आपटे हे नाव दिले आहे.
आज वा.गो. आपटे यांचा स्मृतिदिन (२ फेब्रुवारी १९३७). त्याचप्रमाणे डॉ. अ. वर्टींचाही आज स्मृतिदिन. मराठीतल्या या दोन्ही दिग्गजांना विनम्र श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
१५ ऑगस्ट १९४७ ‘स्वतंत्र भारता’ ची पहिली पहाट झाली. प्राचीवर केशरी रंगाची उधळण, सूर्यकिरणांची शुभ्र प्रभा आणि स्वतंत्र भूमातेची हिरवाई या सर्वांमध्ये असंख्य स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे पवित्र असे ‘नीलचक्र’ यांच्या संगमातून जणू सर्वत्र भारताचा तिरंगा ध्वज लहरत होता. सर्वत्र आनंदी आनंद भरून वाहत होता. स्वतंत्र भारतात सर्वजण मुक्त श्वास घेत होते. स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्यप्राप्तीची यशश्री लाभली होती.
हा लढा सोपा नव्हता. असंख्यांचे अतुलनीय शौर्य, असीम त्याग आणि परम बलिदान यामुळे हा दिवस उजाडला होता. म्हणूनच या सर्वांचे मंगल स्मरण आणि त्यांच्या कार्याचे पावित्र्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देशहीत जपणाऱ्या चांगल्या कृतीतून त्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे.
आज देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत आहे. देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मोठी प्रगती केली आहे. वेगवेगळ्या वाटा चोखाळत यशाची शिखरे गाठली आहेत.
या टप्प्यावर थोडे सिंहावलोकन केले, थोडे सद्य परिस्थितीचे अवलोकन केले तर काही गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा हे लक्षात येते.
आपल्या देशाचा प्राचीन इतिहास अतिशय वैभवशाली, समृद्ध असा आहे.नंतर देशाला दीर्घकालीन अशा पारतंत्र्याला तोंड द्यावे लागले. त्यासाठीच दीर्घकालीन स्वातंत्र्यलढा सुरू होता. असंख्य क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, निस्सीम देशभक्तांच्या परम बलिदानाने, धैर्याने, शौर्याने, त्यागाने देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली.
स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही प्रस्थापित झाली. देशाने या दीर्घ कालखंडात अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. मत-मतांतरे, विविध वैचारिक धारा यातून देशाला वाटचाल करावी लागली. तरीही देशाने अखंड प्रगतीची वाट सोडली नाही.
मुळामध्ये आपल्याला आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, बौद्धिक, वैचारिक बैठक भक्कम लाभलेली आहे. या पक्क्या पायावर प्रगतीचा आलेख चढत गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, संरक्षण शास्त्र, दळणवळण अशा कितीतरी क्षेत्रात देशाने प्रगतीची नवी नवी शिखरे गाठलेली आहेत. अणूचाचणी आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातली प्रगती तर अत्युच्च अशी आहे. संशोधन क्षेत्रातही खूप मोठे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानात तर जगातील अव्वल देशांत आपला समावेश आहे.
आत्ताच्या कोव्हिड -१९ च्या महामारीवर स्वतःची लस तयार करून यशस्वी मात करणे हे तर देशाचे अभूतपूर्व यश आहे. जगाच्या इतर देशांमधील, अगदी प्रगत देशांमधील परिस्थिती पाहिल्यावर आपली कामगिरी अगदी कौतुकास्पद आणि अभिमानाचीच आहे.जगण्याच्या प्रत्येक स्तरावर प्रचंड विभिन्नता असणाऱ्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशाने जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि धैर्याने सामूहिकरित्या संकटांचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे.
स्वातंत्र्याबरोबरच सदैव धगधगती सीमा सुरक्षा देशाच्या वाट्याला आलेली आहे. देशाने युद्ध, दहशतवादी कारवाया यांचा धैर्याने सामना करीत यशस्वी प्रतिकार केलेला आहे. आज लष्कराच्या तिन्ही दलांची अद्ययावत बांधणी, प्रभावी शस्त्रसज्जता यामुळे देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत मजबूत स्वयंपूर्णता आलेली आहे.
या देशात तरुणाईची संख्या खूप मोठी आहे ही आपली मोठी जमेची बाजू आहे. या हुशार, सक्षम तरुणवर्गाला योग्य ध्येय, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी जाणकारांनी, ज्येष्ठांनी प्राधान्याने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. अगदी लहान मुलांना चांगले संस्कार, देशप्रेमाचे धडे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. सोशल मीडिया, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातील गंभीर धोके समजावून सांगितले पाहिजेत.
आपल्या देशाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. तिन्ही ऋतू आपल्याकडे समानच असतात. भरपूर पाऊस, खळाळत्या नद्या, स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हिरवी गर्द वनराई ही आपली समृद्धी आहे. पण वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणाच्या नादात आपले तिकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जल, वायू प्रदूषण, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम दिसत आहे. परिणामतः निसर्गाचे चक्र बिघडते आहे. बदलत्या हवामानाने सतत शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होते आहे. यासाठी निसर्गाला जपले पाहिजे. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आणले पाहिजेत. शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधारून शेती व्यवसाय पुन्हा भरभराटीला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.
इतरही सर्व गोष्टींमधे देशात सर्व काही चांगलेच, सुरळीत सुरू आहे असे नाही. परकीय शक्तींचे आक्रमण, दहशतवादाचा वाढता धोका या पासून सावध राहायला हवे. मुकाबला करण्यासाठी सतत सज्ज असायला हवे.
इतरही अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत. वाढता भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता, अज्ञान, दारिद्र्य, कुपोषण, अस्वच्छता, रोगराई अशा कितीतरी गोष्टींवर खूप काम व्हायला हवे. म्हणजे मग समाजाच्या सर्व स्तरातील अंतर कमी होत एकसंध समाज निर्माण होण्यास मदत होईल. या सर्व अभियानांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभागी होत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे मग देश नक्कीच प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील यात शंका नाही.
देशाची एवढी प्रचंड लोकसंख्या, इतक्या विविध प्रांतातील नैसर्गिक, सामाजिक वेगळेपण, विभिन्न भाषा, विचारसरणी, राहणीमान यामुळे कोणतीही गोष्ट सहजासहजी साकार होत नाही. राजकीय हेतूने आरोप-प्रत्यारोप, विरोध अडचणी ठरलेल्या असतात. यातूनही मार्ग काढत कितीतरी चांगल्या गोष्टी देशाने केलेल्या आहेत. व्यापक देशहीताचा विचार करून लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे. जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे कुठलेही दुष्कृत्य घडू नये यासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपल्या घराप्रमाणेच देशाचीही काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या देशातील चांगल्या गोष्टींचे गोडवे गात न बसता त्याच गोष्टी आधी आपल्या देशात आपण पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.
आज आपला देश प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे, सुधारणा सुरू आहेत. मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे, तंत्रज्ञानाची मोठी झेप घेत देश जगातल्या प्रमुख देशातला महत्त्वाचा देश नक्कीच बनेल. त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. हे यश आपणा सर्वांचे असणार आहे. यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या छान समन्वयाची वज्रमूठ बांधली गेली तर प्रगतीचा हा गोवर्धन उचलणे शक्य होणार आहे. शेवटी ही श्रीकृष्णाची भूमी आहे.
स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करून’शतक महोत्सवी” वर्षात देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर असेल हे निश्चित.
☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात आपण पहिल – `मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून. आता इथून पुढे -)
आप्पा-मार्इंसाठी ते आता रहस्य राहिलं नव्हतं. मालती म्हणाली, `मी चार सहा जणींना ताखीली घेऊन स्वैपाक करते. पुरणपोळ्या करू.?’
`काहीतरीच काय आई! तू म्हणजे कमाल करतेस हं! म्हणजे तुला हवा तर पुरणपोळ्यांचा बेत करू, पण तू काहीही करायचं नाहीस. येणारे-जाणारे तुला भेटायला येणार! तू आणि आप्पांनी एकदम फ्री राहिलं पाहिजे.’
रोज काही तरी नवीन सुचत होतं. फोनवरून आमंत्रणं दिली जात होती. त्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय, जेवायला काय, मेन्यू ठरत होते. बदलत होते. सकाळपासून काय काय करायचं, कार्यक्रम ठरत होते. बदलत होते.
अखेर तो वीक एंड आला. सुहास कुटुंबीय आदल्या दिवशीच फार्म हाऊसवर रहायला गेले होते. सकाळचे साडे नऊ वाजले. नातेवाईक, निमंत्रित जमू लागले. इडली-वडा, सँडवीच असा नाश्त्याचा प्रबंध होता. नाश्ता झाल्यावर बागेतून, फुलांच्या ताटव्यातून, गप्पा मारत, हिंडत-फिरत मोठ्यांनी त्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेतला. मुले खेळत, उड्या मारत, उंडारत होती.
बरोबर साडे दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. हॉलमध्ये एका भिंतीवर रेशमी निळा पडदा लावला होता. त्यावर थर्मोकोलची `जीवेत्शरद: शतम्’ अशी मोठी अक्षरे त्याखाली, मनोहर (आप्पा), मालती (माई) अशी नावे. बाकीचा पडदा छोट्या छोट्या फुलांनी सजवलेला. उत्वमूर्तींसाठी मखमलीने वेढलेल्या बसायच्या खुर्च्या सगळा माहोल काहीसा भारदस्त आणि भारावलेलाही. नेपथ्य प्रकाशचे. त्याने फार्मचीही खूप काळजी घेतलेली दिसत होती. मीरा आणि तिची मामेबहीण शोभा यांनी भरतनाट्यातून गणेशवंदना सादर केली. गेली दोन वर्षे त्या नृत्य शिकताहेत. त्या इतक्या सुरेख नाचल्या, की बघणार्याना आपल्या डोळ्यांचं पारण फिटलं, असं वाटलं. त्या नंतर सुहासने स्वागत केलं. सगळी जमली, म्हणून आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, `आज मी जो काही आहे, तो केवळ माझ्या माई-आप्पांमुळे आहे. त्यांनी सोसलेल्या अपार कष्टातून माझं हे वैभव उभं राहीलं आहे.’ त्यानंतर त्याला इतकं भरून आलं, की त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. शेवटी त्याच्या महेश मामाने त्याला धरून खुर्चीवर बसवलं. नंतर अनेक जण आप्पा मार्इंबद्दल बोलले. विशेषत: मार्इंचा कष्टाळूणा, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा लोकसंग्रह, दुसर्याच्या उपयोगी पडण्याची वृत्ती, असं खूप काही…नंतर कुणी गाणी म्हंटली. कुणी विनोद संगितले.
सगळ्यात शेवटी मिहिर कीर्तन करायला उभा राहिला. कीर्तनाच्या पारंपारिक वेषभुषेतील या बालकीर्तनकाराने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तो म्हणाला, `प्रथम जगदीश्वर, नंतर माझे जनक-जननी आणि माझे पितामह व मातामह यांना वंदन करून मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. ‘ त्याने आपल्या आई-वडलांकडे अणि नंतर आप्पाआणिमार्इंकडे पाहून हातजोडला आणि नमनाच्या श्लोकाला सुरुवात केली.
`वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा’
एरवीच्या कीर्तन परंपरेतल्या श्लोकांपेक्षा हा श्लोक जरा हटकेच होता. तसंच त्याचं कर्तनदेखील नेहमीच्या कीर्तन परंपरेतल्या कीर्तनापेक्षा जरा हटकेच होतं. त्यानंतर त्याने श्रोत्यांची आळवणी केली. एकाग्रतेने, सावध चित्ताने आख्यान ऐकायची विनवणी केली. `तुम्ही लक्षपूर्वक, शांत चित्ताने कीर्तन ऐका, म्हणजे या कथेत तुम्हाला गोडी वाटेल…’ तो म्हणाला आणि त्याने भजनाला सुरुवात केली, `जय जय राम कृष्ण हारी…. जय जय राम कृष्ण हारी…. ‘ त्याने सर्वांनाच आपल्याबरोबर भजन म्हणायला सांगितले. सगळेच भजनात एकरूप झाले, तशी त्याने दोन्हीहात बाजूला नेऊन श्रोत्यांना थांबण्याची खूणकेलीआणि निरुपणाचा अभंग गायला सुरुवातकेली. आजचा निरुपणाचा अभंग चोखोबांचा होता, `ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। वरलिया रंगा।।’
मिहीरचा आवाज सुरेलआणिखडा होता. तो गायलालागला, की मालतीला आपले वडीलच गाताहेतसं वाटायचं. त्याचं वक्तृत्वही अस्खल्लि तहोतं. वक्तृत्व आणि गायनात गेली तीन-चार वर्षं तो शालेय आणि आंतरशालेय स्पर्धेत बक्षिसे मिळवत होता. यंदा तो सातवीत आहे. सुहास अधूनमधून म्हणतोदेखील, ‘आता गाणं-बोलणं पुरे. थोडा थोडा अभ्यासही करा.’ त्यावर मालती म्हणते, `पुरे झालं तुझं! तू एक पुस्तकातला किडा होतास. त्याला नको बनवूस तसं. सगळ्यातला आनंद घेऊ दे त्याला. मोठा झाल्यावर आहेच, अभ्यास… अभ्यास… आणि अभ्यास…’
आज मिहीरच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला, त्यालाही एक स्पर्धाच कारणीभूत झाली होती. शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. काय करावं? कोणती वेशभूषा करावी, यावर बोलता बोलता, माई एकदम म्हणाली, `तू र्कीतनकार हो! तिने नमनाच्या अभंगाच्या दोनओळी व चार-पाच वाक्याचं निरुपण त्याच्याकडून बसवून घेतलं. एका दिवसात कीर्तनकाराची वेशभूषा शिवून तयार केली. या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला.
सकाळची बगीच्यातील रपेट व मित्र मंडळीतील गप्पा आटोपून घरी आलो, घड्याळाकडे नजर टाकली साडेआठ वाजून गेले होते. घरात शांतता पसरली होती,म्हणजे तरुण मंडळींचा दिवस अजून सुरू झाला नव्हता तर,आमच्या सौ. ही दिसत नव्हत्या पण त्या जागृत झाल्याचे पुरावे दिसत होते.बाहेर पडलेले वर्तमानपत्र टीटेबलवर ठेवलेले होते. सोफ्यावर टाककेले कव्हर नीट नेटके केलेले होते,खोलीतील सटर फटर सामान योग्य जागी पोहोचले होते.देवघरासमोरील पदकात ताजी पारिजात व शेवंतीची फुले वातावरणात प्रसन्नता निर्माण करीत होती.बहुतेक सौभाग्यवती टेरेसवर गार्डन मध्ये झाडांना पाणी टाकत असाव्या,मी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उचलले, मुख्य बातम्या वर नजर टाकली व ठेऊन दिले कारण ते माझे दुपारचे बौद्धिक खाद्य होते. सहजच किचन कडे नजर टाकली गॅसवर काहीतरी होते. जवळ जाऊन पाहिले तो चहा होता. बऱ्याच वेळेपूर्वी बनविलेला असावा, पूर्ण थंड झाला होता. तीन चार कप तरी होताच. बऱ्यापैकी उकळल्या गेल्यामुळे चहाला मस्त रंग चढला होता,दुधात नाममात्र पाणी असावे,त्यात रेड लेबल चहा भरपूर टाकला होता.चार पाच वेलचीच्ये दोडे आणि अद्रकाचे तुकडे त्यात होते, ते माझ्याकडे पाहून हसत आहेत असे मला वाटले. तो चहा पाहून माझी चहाची तलफ जागृत झाली,मी हळूच गॅस सुरू केला समोरच्या कपाटातून घेतलेल्या कपात मी चहा ओतून घेतला, नी पिणार तोच आमच्या सौ.आल्याची चाहूल लागली. पायऱ्यांवर ती वरून येताना दिसली, अग तू पण घेतेस का चहा, मी सहज विचारले. अहो तो चहा बिलकुल पिऊ नका,किती वेळचा उघडा पडून आहे.सकाळी मुले उठतील आणि कामवाली येईल म्हणून मांडला होता पण कामवाली आली नाही, नी मुले तर अजूनही उठली नाही. मोरीत ओतून द्या तो चहा,दोन तास जुना आहे तो. सौ.ची आदेशवजा सूचना, कानावर पडली पण भरपूर दुधाचा महागडी चाहापत्ती आणि अद्रक विलायची चा तो श्रीमंत चहा मोरीत टाकून देण्याची इच्छा होत नव्हती,अग काही होत नाही चहाला! टपरी वाले नाही का दिवस भर चहा विकत राहतात.मी स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.तेव्हड्यात आमचे कन्या पुत्र दोघेही अवतरले,चहा प्रकरण दोघांनी ऐकले,दोघेही मला समर्थन देतील असे वाटले,पण दोघांनी मलाच समजावलं,अहो बाबा जहर असते जुना चहा असे म्हणत आमच्या कन्येने पुरा चहा मोरीत ओतला माझ्या हातातील कपासह.मी पाहतच राहिलो,
☆ अद्भुत मंदीरे… संकलन :- सतीश अलोणी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆
जाणून घेऊ या, या काही अदभुत मंदिरांची माहिती.
भारत हा एक असा देश आहे, जिथे लोक विविध रितीभातींना मानतात आणि आपल्या धर्म आणि आस्थानुसार ते मंदिरांत पूजा-पाठ करतात.
अशाच एका मंदिरा बद्दल सांगत आहोत, जिथे देवाची नाही तर प्राण्यांची पूजा करतात. या मंदिरात लोक प्राण्यांना श्रद्धाभाव ने पाहिले जाते. त्यामागे काही आख्यायिका देखील आहे. येथे असणारे प्राणी देखील लोकांना नुकसान पोहोचवत नाही. चला तर मग जाणून घेऊ या, या काही मंदिरांची माहिती.
१) डॉग टेम्पल, कर्नाटक-
हे डॉग टेम्पल कर्नाटकाच्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना मध्ये स्थित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष २०१० मध्ये एक व्यवसायिका द्वारे केली गेली. हा व्यवसायिकाने केम्पम्मा मंदिराची निर्मिती केली , हे मंदिर ग्रामदेवी केम्पम्मा यांना समर्पित आहे.एका आख्यायिकेनुसार, मंदिराची स्थापना होत असताना ग्राम देवी केम्पम्मा यांनी दोन कुत्र्यांना शोधण्याचा आदेश ग्रामस्थांना केला होता, जे पूर्वी गावातून गायब झाले होते, जेणे करून मंदिराला वाईटापासून वाचवता येईल.
ग्रामीणांना ते कुत्रे मिळाले नाही, म्हणून त्यांनी एक मंदिर बनवले आणि मंदिरात दोन कुत्र्यांच्या मुरत्या स्थापित केल्या. एका आख्यायिकेनुसार, ग्रामस्थांनी या डॉग टेंम्पल मंदिराचा निर्माण करून कुत्र्यांची माणसांच्याप्रति एकनिष्ठेच्या भावनेला समर्पित केले आहे.
२) भालू मंदिर –
छत्तीसगढ़- छत्तीसगढ़ मध्ये चंडी माता मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच गोष्टींसाठी विशेष आहे. छत्तीसगडच्या या महासमुंदाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात आरतीच्या वेळी काही भालू (अस्वल) येतात आणि इथल्या पुजाऱ्याकडून प्रसाद घेऊन खातात. आणि या मंदिराच्या नऊ प्रदक्षिणा लावून परत निघून जातात. विशेष म्हणजे की, या मंदिरात येणारे भालू कधीही कुणाला त्रास देत नाही. या मंदिरात येणाऱ्या भालूंच्या उपस्थितीमुळे या चंडी माता मंदिराला भालू मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.
३) मंकी मंदिर –
जयपुर- राजस्थानच्या जयपूरच्या टेकड्यांमध्ये गलताजी यांचे मंदिर आहे. इथे भाविक पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. या परिसरात रामगोपालजी नावाचे मंदिर आहे, या मंदिरात माकड मोठ्या संख्येने येतात. मंदिरात माकडांच्या उपस्थितीमुळे या मंदिराला माकडाचे मंदिर किंवा बंदर मंदिर म्हटले जाते. माकडाला मारुती(हनुमानाचे) रूप मानतात, म्हणून लोक या माकडांना सन्मान देतात.
४) मन्नरसला नागराज मंदिर –
हरिपद,केरळ -केरळच्या हरिपद येथे मन्नरसला नागराज मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि हे मंदिर नागदेवाला समर्पित आहे. हे मंदिर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारताच्या केरळ राज्यात आपले एकमेव मंदिर आहे. या मंदिरात सुंदर सापाच्या मुरत्या नक्काशी केलेल्या आहेत. मन्नरसाच्या मंदिराच्या वाटेवर आणि झाड्यांवर सापाच्या १००००० नक्काशी कोरलेल्या आहे.
या मंदिराच्या भेटीला दूरवरून भाविक येतात. पण अपत्य प्राप्तीची इच्छा करणारे दाम्पत्य येथे आवर्जून भेट देतात. आणि अपत्यप्राप्तीसाठी पूजा करतात. अपत्यप्राप्ती झाल्यावर ते बाळाला घेऊन येथे येतात आणि सापांच्या मुरत्या इथे प्रसाद स्वरूपात अर्पण करतात.
संकलन : सतीश अलोणी
संग्राहक : स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मी प्रवासिनी क्रमांक १७ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
मोरोक्को – रसरशीत फळांचा देश
मोरोक्कोला पश्चिमेला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. उत्तरेकडील ४०० किलोमीटर भूभागाला भूमध्य समुद्र व त्यापलीकडे स्पेन हा देश आहे. पूर्व दिशेला आणि दक्षिणेला सहा हजार किलोमीटरपर्यंत सहारा वाळवंट आहे. मोरोक्कोहून मोठ्या प्रमाणात संत्री, सफरचंद, ऑलिव्ह, द्राक्षे निर्यात होतात. कॉर्क वृक्षाच्या लाकडाचा हा देश प्रमुख निर्यातदार आहे. खतासाठी लागणारे फॉस्फेट येथे विपुल प्रमाणात मिळते. अमेरिका व रशिया यांच्यानंतर मोरॉक्कोचा फॉस्फेट उत्पादनात नंबर आहे. त्या शिवाय इथे आयर्नओर, मँगनीज, झिंक मिळते. इथे फळांचे कॅनिंग, मासेमारी, कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.
कासाब्लांका इथून अटलांटिकच्या समुद्रकिनाऱ्याने शंभर किलोमीटरचा प्रवास करून आम्ही राजधानी रबात इथे पोहोचलो. रबात म्हणजे तटबंदी असलेलं गाव.अल्मोहाद राजवटीतील खलिफा मन्सूर यांनी रबात हे राजधानीचे ठिकाण केले .शहराच्या मध्यभागी रॉयल पॅलेस आहे व शेजारी रॉयल मॉस्क आहे. मोरोक्कोचा शाही परिवार इथे नमाज पडतो. पांढऱ्या भिंती व हिरवे छत असलेल्या या मशिदीचे बांधकाम आधुनिक आहे. मशिदीच्या समोरच असलेल्या हसन टॉवरचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. लाल सॅंडस्टोनमधील या टॉवर समोर मोहम्मद मुसोलियमची ऐतिहासिक वास्तू आहे. आतमध्ये राजा हसन आणि राजपुत्र अब्दुल्ला यांच्या कबरी आहेत. हा शहराचा निवांत भाग आहे. स्वच्छ सुंदर रस्ते, झाडे, जास्वंदीची लालचुटुक फुले यांनी टुमदार बंगल्यांची आवारे सुशोभित दिसत होती. इथे उच्चपदस्थांची निवासस्थाने व परदेशी वकिलाती आहेत. अटलांटिकच्या किनाऱ्यावरील या शहरावर फ्रेंच वास्तुकलेचा प्रभाव आहे.
दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रबातहून निघालो कारण टॅ॑जेर बंदरात दहा वाजताची बोट पकडायची होती. सारे शहर धुक्यात गुरफटलेले होते. दूरवर टेकड्यांच्या रांगा दिसत होत्या. त्यावरील दिव्यांच्या चांदण्या आम्हाला हसून निरोप देत होत्या. ड्रायव्हरने बसमध्ये लावलेल्या सूफी संगीताच्या तालावर मोरोक्कोचा वेगळा प्रवास आठवत होता. धुक्याचे आवरण बाजूला सारून सोनेरी सूर्याची किरणे आसमंत उजळत होती.