ही मिस् जोकर अग इतकी सोन्यासारखी पोर. हो मी पोरच म्हणते माझी तिला.स्वतःच्या कुटुंबासाठी झिजली. भावाला शिकवले. परदेशी पाठवले. तो गेला तो गेलाच. लग्न केले. तिकडेच स्थायिक झाला. बहिणीचे मोठ्या घरात सालंकृत कन्यादान केले. दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. पण आईबापांकडे बघणार कोण? आहे मिस जोकर. हक्काची सगळ्यांसाठी राबणारी तिचा विचार कोण करतो? आई आज दीड वर्ष अंथरुणात. तिचं सगळे करुन ही आपली ड्युटी हसतमुखाने करते. कधी उशीरा येणं नाही कि लवकर जाणं नाही. हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना हवीहवीशी वाटते. अर्धे अधिक पेशंट औषधापेक्षा हिच्या बोलण्यानेच सुधारतात. त्यांच्या नातेवाईकाना धीर मिळतो. मध्यंतरी दोन, तीन मानसिक रुग्ण केवळ आणि केवळ हिच्यामुळेच सुधारुन ठणठणीत होऊन घरी गेले. विनोद धमाले म्हणून एक मुलगा चांगला शिकलेला, चांगल्या हुद्यावर नोकरीला. तुमच्या भाषेत व्हेलसेटल. डिप्रेशन मध्ये होता. हिच्यामुळे सुधारुन खडखडीत बरा झाला. त्याचे आई वडील इतके खुश झाले. हिची वागणूक, चालचलन बघून हिला मागणी घातली. पण हिचे आपले ‘मला लग्न करायचं नाही. रुग्णाची सेवेतच मी आयुष्य घालवणार. हाच माझा संसार हेच माझं सुख.आता तु तरी तिला समजावून सांग.”
इतक्यात दुसरी एक नर्स धावत आली. “सिस्टर लवकर चला. चिल्डर्न वॉर्ड मधली तीन नंबर बेबी दूध, इंजेक्शन, काही घ्यायला, झोपायला तयारच नाही. तिला मिस जोकरच पाहिजे गाणे म्हणून झोपवायला. तिचा ताप पण चढतोय. चला लवकर”
“असंच आहे बघ इथे. त्या मिस जोकर शिवाय इकडे कोणाचं पान हलत नाही. अशाने तिला विश्रांती मिळत नाही. ह्याचा विचार ती स्वतः तर करत नाहीच पण हे लोक पण करत नाही.”
☆ विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
एकदा यूरोपच्या प्रवासात पॅरिस हून लंडनला जाताना इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करायचा होता. त्यावेळी पॅरिस स्टेशनवर आम्हाला आमच्या सामानासकट उभ करण्यात आलं. 5 सात तगडे, कडक युनिफॉर्म मधील पोलीस भल्यादाडग्या उग्र कुत्र्यांना घेऊन आले. त्यांचं बोलणं नीट कळायच्या आधीच त्यांनी हातातल्या कुत्र्यांच्या साखळ्या सोडल्या. गाईडने सांगितलं होतं की तुम्ही शांत उभे राहा. ते कुत्रे काही करणार नाहीत. तरीही ते कुत्रे,सामान आणि आम्ही यांचं आक्रमकपणे चेकिंग करायला लागल्यावर, माझं काळीज बाहेर येऊन यूरोप यात्रे ऐवजी माझी जीवन यात्रा पूर्ण होणार असं मला वाटलं होतं.
देवांच्या गाई राक्षसांनी पळवून नेल्यामुळे त्या सोडवून आणण्यासाठी इंद्र देवांना सरमा नावाच्या कुत्रीने मदत केल्याची गोष्ट लहानपणी वाचली होती. श्री दत्तगुरू भोवती चार कुत्रे दाखविलेले असतात. त्याना वेदांचे प्रतीक मानले जाते. छत्रपती शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची कथा सर्वांना माहित आहे. विशिष्ट ट्रेनिंग दिलेले कुत्रे गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांना मदत करतात. लष्कराकडे ही असे श्वानपथक असते. हे आणि आणखी असेच सन्माननीय अपवाद असतीलच. पण……
एका रविवारी सकाळी डोंबिवलीहून धाकट्या बहिणीचा फोन आला.तिच्याकडे मोठी बहीण रहायला आली होती आणि डोंबिवलीत राहणारी मधली बहीण सकाळपासून तिच्याकडे येणार होती. हे सांगून बहिण म्हणाली तू लगेच निघून इकडे ये. कोकणातून आलेला फणस पिकला आहे. तू आल्याशिवाय फणस फोडायचा नाही असं ठरवलंय. लवकर ये. मीही उत्साहाने डोंबिवलीला पोचले. बहिणींच्या भेटी आणि शिवाय फणसाचं मोठं आमिष होतं. आंब्या सारखाच मला फणस ही खूप प्रिय आहे हे सगळ्यांना माहीत होतं. खूप गप्पा, हसणं, जुन्या आठवणी आणि फणस.फणस खाऊन पोट भरलं पण गप्पा संपल्या नाहीत.’ मी आता निघतेच आहे’ असा घरी फोन करूनही अर्धा तास होऊन गेला होता. डोंबिवली लोकलने घाटकोपरला येऊन मेट्रोनेअंधेरीला उतरले आणी समस्या सुरू झाली. एकही रिक्षावाला जोगेश्वरी पूर्वेला यायला तयार नव्हता. जोगेश्वरी हे माझ्या तोंडून पूर्ण बाहेर पडायच्या आधीच रिक्षावाले भरकन निघून जात होते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि माझी अस्वस्थता वाढत होती इतक्यात 9 -10 वर्षांचा, चांगला दिसणारा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला ‘ऑंटी, तुम्हाला रिक्षामध्ये कुत्रा चालेल का? एका रिक्षेकडे बोट दाखवून तो म्हणाला,’ ते रिक्षावाले काका तुम्हाला घरी सोडायला तयार आहेत. रिक्षामध्ये मी आणि आमचा रॉबिन आहोत. अडला हरी..च्या धर्तीवर नाईलाजाने मी म्हटलं, ‘चालेल’ मनाचा हिय्या करून मी अंग चोरून त्या रिक्षात बसले. रिक्षावाले काका म्हणाले,’ 5..7 रिक्षावाले तुम्हाला नाही म्हणता ना पाहिलं. म्हणून थांबलो. राजेश ला म्हटलं त्या काकूंना विचारून ये. जवळच जायचं असेल त्यांना. ‘हो जोगेश्वरी ईस्ट ला. थँक्स.’
राजेश म्हणाला,’ आमच्या रॉबिनला रात्री रिक्षातून फिरायला आवडतं. मी रोज या काकांना घेऊन त्याला फिरवून आणतो. तुम्ही नीट बसा. रॉबिन तुम्हाला काही करणार नाही. राजेश च्या पलीकडे असलेला रॉबिन, सारखा रिक्षातून तोंड बाहेर काढत होता. माझं त्याच्यावर लक्ष होतंच.
अरे तो बघ,सारखा तोंड बाहेर काढतो आहे. किती गाड्या, रिक्षा जात आहेत. त्याला आत घे.
‘ऑंटी, तुम्ही काळजी करू नका. रॉबिन खूप हुशार आहे. बस गाड्या आल्या की तो बरोबर तोंड आत घेतो. आमचा रॉबिन पूर्ण शाकाहारी आहे. म्हणजे ‘मी सुटले.’ मी मनातच म्हटलं. उकडलेले बटाटे त्याला खूप आवडतात.
मला नणंदेच्या घरचा’ सनी’ आठवला. ‘सनिलाना, आइस्क्रीम आणि घारगे खूप आवडतात. आणि दर गुरुवारी तो आम्ही बाहेरून परत यायची अगदी वाट बघत असतो. दत्ताच्या देवळातून येताना आम्ही प्रसादाचे पेढे आणतो ना, त्याला आधी चार पेढे भरविल्या शिवाय तो आम्हाला सोडतच नाही. ‘ त्यावेळी मी त्या गुरुवार लक्षात ठेवणाऱ्या सनीला चेहऱ्यावर हसू आणून, कौतुकाने मान डोलावली होती. नणंदेच्या सासरचे म्हणजे समर्था घरचे श्वान होते ते.
अंधेरी जोगेश्वरी अंतर कमी असली तरी ट्रॅफिक खूप होता राजेश कौतुकाने सांगायला लागला की, ‘आंटी, मागच्या महिन्यात आम्ही भेळेची, शेवपुरी ची तयारी करून बाहेर गेलो. आल्यावर बघतो तर उकडलेल्या बटाट्यांपैकी एकही बटाटा शिल्लक नाही. आम्ही रॉबिन ला खूप रागावले तर तो रुसून बसला. रडायला लागला. शेवटी त्याला जवळ घेतल्यावर रडायचा थांबला. ‘पुढे तो म्हणाला,’ या सीझनमध्ये रॉबिन ला आंबा आणि फणस खायला खूप आवडतं.’
मी दचकून, आश्चर्याने रॉबिन कडे पहात राहिले. तेवढ्यात घर आलं. रिक्षातून उतरून मीटर पेक्षा जास्त पैसे देऊन रिक्षावाल्या काकांचे आभार मानले. राजेश म्हणाला, ‘बाय ऑंटी.’ ‘बाय बेटा. सुखी रहा.’ आणि माझ्यासारखी आंब्या फणसाची आवड असणाऱ्या, पाठमोऱ्या रॉबिन ला मनापासून अच्छा करून त्याला त्या सन्माननीय अपवादान्च्या यादीत स्थान दिले.
झोपेत आपला आवाज आपल्याला येत नाही, पण आपल्या आवाजाने दुसऱ्याला जाग येणे, झोप न लागणे, त्रास होणे ह्या गोष्टी होऊ शकतात….ह्यालाच घोरणे म्हणतात. ? हे सर्वांनाच ठाऊक आहे…हो न?
काही पाहिलेले अनुभव, तर काही ऐकलेल्या गोष्टीवरून लेखन प्रपंच….. कारण ह्यावर एकदा लिहायचंच होत!
घोरण्याचे प्रकार तरी किती पहा…..
काही लोक तोंड बंद ठेऊन नाकाने आवाज काढतात म्हणजे आवाज येतो. इतक्या जोरात ही प्रक्रिया सुरू असते की एखादा डास किंवा कोणताही कीटक सहज नाकात जाऊ शकतो.
काही लोक तोंडाने जोरजोरात आवाज काढतात आणि तेही वेगवेगळ्या सुरात!
काही जण तर चक्क फूसss फूसsss असा आवाज काढतात…. जणू आजूबाजूला खरच फणा काढलेला नाग आहे की काय अस वाटू शकतं.
काही लोकांचा तर नुसता घशातून आवाज येतो. जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल पण एक लिंक लागलेली असते ती बदलत नाहीत. एक सूर…एक ताल
काही लोक तर घोरतात आणि झोपेत मधूनच बोलतातही!
काही लोकांच्या घोरण्याचा आवाज अगदीच वेगळा असतो… कधीही न ऐकलेला!
उताणे झोपलं की जास्त घोरलं जातं असे लोक म्हणतात… मग अशा घोरणाऱ्या व्यक्तीला एका अंगावर झोपण्याची सूचना दिली जाते.मग त्यावेळी तर घोरण्याचे सगळे सूर बदलतात, काही वेळा स्वतःपुरतेच राहतात.
काही वेळा एक अंगावर करूनही घोरणे बंद नाही झाले तर एखादी चापट मारली जाते, मग नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला. काही वेळा तर चक्क गदागदा हलवलं जात!पण घोरणारी स्वारी स्वतःच्या ‘अंतरीच्या आनंदातच’ असते.
काही लोकांना तर घोरलेलं अजीबात सहन होत नाही. बायको घोरते म्हणून नवरोबा कानात कापसाचे बोळे घालतात, तरीही घोरणे ऐकू येत.. मग कानावर हात ठेवणे, त्यावर उशी ठेवणे… असे विविध प्रकार एका घोरण्यामुळे होत असतात.
कित्येक नवरा बायकोमध्ये घोरण्यावरून भांडणेही होतात. नवरा बायकोला म्हणतो मी घोरतच नाही कधी, तूच घोरतेस. पण नवऱ्याचा अनेकदा गोड गैरसमज असतो की आपण घोरतच नाही. किंवा काही वेळेस उलट परिस्थितीही असते. नवरा घोरतो, बायको नाही. घोरणे जास्त झाले की चिडून, चिमटा काढणे, हलकेच ढकलणे असेही होत….
अनेक वेळा आपण घोरतच नाही असे म्हणणाऱ्यांचे घोरण्याचा रेकॉर्डिंग ही केलेलं मी ऐकलंय! कमालच वाटली.
घरी जेष्ठ नागरिक असतील तर खूप वेळा ते ही घोरतात, पण त्यांना कस काय बोलायचं? म्हणून सहन करणंच भाग असत.
अनेक लहान मुलंही घोरतात…. अगदी मोठ्यांसारखं! मग खेळून दमला असेल म्हणून घोरतोय अस समर्थन केले जात.
काही वेळेस घरातील सगळेच घोरतात, पण कुणाला कुणाचाही त्रास वाटत नाही… कारण सगळेच शांतपणे पण घोरत झोपलेले असतात.
एकूण काय घोरणे ह्याच वैज्ञानिक कारण काहीही असो पण काही निरीक्षणांवरून त्याच्या गमती जमती लिहाव्या वाटल्या…
आणि ‘घोरणे’ हा ही लेखनाचा विषय होऊ शकतो असे वाटल नक्कीच?
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “माय नेम इश ताता” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ ☆
पुस्तकाचे नांव : कथा संग्रह – “माय नेम इश ताता”
मूळ लेखिका : डॉ सूर्यबाला
अनुवाद : श्रीमती उज्वला केळकर
प्रकाशक : सुकृत प्रकाशन
प्रथम आवृत्ती : ०३ डीसेंबर २०१७
किंमत : रु ३१०
सौ. उज्ज्वला केळकर
“माय नेम ईश ताता “या कथा संग्रहात २० कथा आहेत. सौ. ऊज्वला केळकर यांनी मूळ हिंदी कथा,अनुवादित केल्या आहेत.
उत्कृष्ट कथांचा ऊत्कृष्ट अनुवाद हीच या कथासंग्रहावरची पहिली छाप!!
या वीसही कथांमधून निरनिराळ्या प्रकारची माणसं, त्यांची संस्कृती, त्यांच्या भोवतालचं वातावरण, त्यांचं जगणं, त्यांचं भावविश्व, त्यांची सुख दु:खं,आशा निराशा यांचा अनुभव येतो. प्रत्येक कथा वाचत असताना,सतत असं वाटत राहतं,आपण यांना भेटलोय्!
आपल्या भवतालचीच ही माणसं आहेत.. त्यांच्या जीवन पद्धतीशी, त्यांच्या जगण्याशी आपलं नातं जमतं..
कथेतल्या व्यक्ती आपल्या मनात रेंगाळत राहतात. रूतून बसतात.
सौ. राधिका भांडारकर
सरकारी यंत्रणेतून, अरुण वर्मा सारखी, प्रामाणिक व्यक्ती, सस्पेंड झाल्यावर म्हणते, “मला काही क्रांती’ विद्रोह घडवून नव्हता आणायचा, पण आज लोकं खर्याला खरं म्हणण्यासाठीही घाबरतात याचा खेद वाटतो.” हे वाचताना मन चिरुन जातं..
“माय नेम ईश ताता “या शिर्षक कथेत आई वडीलांच्या स्पर्धात्मक इर्शेला विद्रोह करणारी एक छोटी बालिका केवीलवाणी होऊन भेटते. पण तिच्यात आणि तिच्या आजीत निर्माण होणारं विश्वासाचं, भरवशाचं नातं मन भारावून टाकतं.
“कागदी नावा चांदीचे कुंतल” आणि “काय माहीत” या दोन्ही कथांमधलं, बाळपणीचं अव्यक्त प्रेम वाचताना मन हळुवार बनतं….!!
“हे घे किन्नी..” या कथेत, किन्नी, किन्नीचे लाचार बाळपण, मावशीची वर्चस्व गाजवणारी, उपकाराची माया, तिचं ऊध्वस्त प्रेम आणि एकंदरच कुणीतरी ताब्यांत घेतलेली तिच्या सुखाची दोरी…. ही किन्नी वाचताना मन विदीर्ण होतं.. या कथांमधून स्रियांच्या मनातले,जगण्यातले बारकावे जाणीवपूर्वक टिपले आहेत. शब्दरचना इतकी भक्कम आहे की कथेतलं अवास्तव वास्तवही विचार करायला लावतं…. कथा कुठेही घसरत नाही. पसरत नाही.
ती घडत जाते. जशी आहे तशी. कथा कशी सजीव भासू शकते, याचाच अनुभव हा कथा संग्रह वाचताना मिळतो.
“….ना सौंदर्य,ना सुघडपणा, ना कोमलता, ना विभ्रम… बाईपण शोधायचंच झालं तर दिसतात काळ्या ढुस्स मनगटात दोन चार मळकट बांगड्या, आणि नाकात सुंकली… संपली बाईपणाची मर्यादा…” “ती” या कथेची सुरवातच मनाची पकड घेते. कथा वाचत असताना वाचकाच्याच मनाची पडझड होते…. आयुष्यभर संघर्ष… पण तरीही ती म्हणते, “डोंगरासारख्या ऊरावर पडलेल्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्यात कुवत आहे. माझं एक घर आहे. दोन हात आहेत. आई मुलाचं पोट भरायला ते समर्थ आहेत….”
“ती” या कथेतली ही ठिणगी अंधारातली दिवटीच वाटते.,,,!,
“आशिर्वादाचे व्यापारी…” ही कथा तर मानवी मनाचे सुंदर दर्शन घडवते. धर्म, जात पंथ या पलिकडचा माणूस बघणारा सय्यद, स्वत:ला “आशिर्वादाचे व्यापारी ” म्हणून
“गजाच्या आरपार..” या कथेत शेवटी एक सुंदर संदेश दिलाय्.
“…..मुक्त कोण आहे? कदाचित कुणीच नाही. न पुरुष.. न स्त्री.. पूर्ण मुक्ती एक स्वप्न आहे. आणि जगणं एका यथार्थात असतं. यथार्थ म्हणजे मुक्त होण्याचं एक रंगीत स्वप्नं… जीवनांत निम्म्यापेक्षा जास्त आनंद हे स्वप्नच देतं..”
या कथासंग्रहाबद्दल प्रामुख्याने म्हणावसं वाटतं की, या सर्वच लहान रुंदीच्या कथांमधून आभाळाला व्यापतील, इतकं मानवी जीवनावरचं भाष्य दडलेलं आहे.. ते वाचकापर्यंत परिणामकारक रीतिने पोहचतं, त्याचं श्रेय केवळ ऊज्वलाताईंच्या प्रभावी लेखनशैलीला आहे. अचूक शब्द, भाषेचा ओघ आणि लावण्य याचा अखंड झरा वाचकाला एका सुंदर कृतीचा महान आनंद देतो.. जाणीव आणि वैचारिक ऊंची त्यांच्या लेखनात नेहमीच जाणवते. अनुवादाचं एक सुंदर तंत्र त्यांच्याजवळ असल्यामुळे, तसेच हिंदी भाषेतलं सुंदर साहित्य, मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ प्रशंसनीय आहे…
ऊज्वलाताई खूप खूप धन्यवाद….!!!
(या लेखांत मी काही कथांवरच विचार मांडले. मात्र या कथा संग्रहातील प्रत्येक कथा सुंदर,अर्थपूर्ण आशयसंपन्न आणि विचार करायला लावणारी आहे…)
(सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी सुप्रसिद्ध हिन्दी एवं अङ्ग्रेज़ी की साहित्यकार हैं। आप अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय /प्रादेशिक स्तर के कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं । सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी का काव्य संसार शीर्षक से प्रत्येक मंगलवार को हम उनकी एक कविता आपसे साझा करने का प्रयास करेंगे। आप वर्तमान में एडिशनल डिविजनल रेलवे मैनेजर, पुणे हैं। आपका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है।आपकी प्रिय विधा कवितायें हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “एक कहानी”। )
आप निम्न लिंक पर क्लिक कर सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी के यूट्यूब चैनल पर उनकी रचनाओं के संसार से रूबरू हो सकते हैं –
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi Poem “अनुवादक ”. We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)
(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जिन्होने साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा”शीर्षक से यह स्तम्भ लिखने का आग्रह स्वीकारा। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, अतिरिक्त मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) में कार्यरत हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं । आप प्रत्येक मंगलवार को श्री विवेक जी के द्वारा लिखी गई पुस्तक समीक्षाएं पढ़ सकते हैं ।
आज प्रस्तुत है श्री संतोष तिवारी जी की पुस्तक “रिश्तें मन से मन के” – की समीक्षा।
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 91 – रिश्तें मन से मन के – श्री संतोष तिवारी ☆
पुस्तक चर्चा
रिश्तों को,
गलतियाँ उतना कमजोर नहीं करती….
जितना कि,
ग़लतफ़हमियाँ कमजोर कर देती है !
रिश्ते ऐसा विषय है जिस पर अलग अलग दृष्टिकोण से हर बार एक अलग ही चित्र बनता है, जैसे केलिडोस्कोप में टूटी चूडियां मनोहारी चित्र बनाती हैं, पर कभी भी चाह कर भी पुनः पिछले चित्र नही बनाये जा सकते।
अतः हर रिश्ते में प्रत्येक पल को पूरी जीवंतता से जीना ही जीवन है।
पति पत्नी का रिश्ता ही लीजिए प्रत्येक दम्पति जहां कभी प्रेम की पराकाष्ठा पार करते दिखते है, तो कभी न कभी एक दूसरे से क्रोध में दो ध्रुव लगते हैं।
इस पुस्तक से गुजरते हुए मानसिक प्रसन्नता हुई। सन्तोष जी का अनुभव कोष बहुत व्यापक है। उन्होंने स्वयं के या परिचितों के अनुभवों को बहुत संजीदा तरीके से, संयत भाषा मे अत्यंत रोचक तरीके से संस्मरण के रूप में लोकवाणी बनाकर लिखा है। उनकी लेखकीय क्षमताओं को देख कलम कागज से उनके रिश्ते बड़े परिपक्व लगते हैं। मुझ जैसे पाठकों से उन्होने पक्के रिश्ते बनाने में सफलता अर्जित की है। मैं पुस्तक को स्टार लगा कर सन्दर्भ हेतु सेव कर रहा हूँ।
पढ़ने व स्वयं को इन रिश्तो की कसौटियों पर मथने की अनुशंसा करता हूँ। पुनः बधाई।
इसकी हार्ड कॉपी अपनी लाइब्रेरी में रखना चाहूंगा।
समीक्षक .. विवेक रंजन श्रीवास्तव
ए १, शिला कुंज, नयागांव, जबलपुर ४८२००८
मो ७०००३७५७९८
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। । साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है एक अत्यंत सार्थक, भावुक एवं समसामयिक विषय पर रचित लघुकथा “हल्दी कुमकुम”। इस सामायिक एवं सार्थक रचना के लिए श्रीमति सिद्धेश्वरी सराफ जी की लेखनी को सादर नमन। )
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 80 ☆
??हल्दी कुमकुम ??
आज पड़ोसी चाची के यहां “हल्दी कुमकुम” का कार्यक्रम है, वर्षा ने जल्दी जल्दी तैयार होते अपने पतिदेव को बताया।
उन्होंने कहा.. तुम जानती हो मम्मी फिर तुम्हें खरी खोटी सुनाएंगी, क्योंकि मम्मी का वहां आना-जाना बहुत होता है। पर चाची ने मुझे भी बुलाया है वर्षा ने हंसकर कहा..।
बाहर पढ़ते-पढ़ते और एक साथ नौकरी करते हुए वर्षा और पवन दोनों ने समाज और घर परिवार की परवाह न करते हुए विवाह कर लिया था।
मम्मी-पापा ने बेटे का आना जाना तो घर पर रखा परंतु वह बहु को अंदर घुसने भी नहीं देते थे।
बहू को अपनी बहू नहीं स्वीकार कर पा रहे थे। हारकर दोनों शहर में ही ऑफिस के पास मकान लेकर रहने लगे थे।
वर्षा समझाती… कुछ दिनों में सब ठीक हो जाएगा। मम्मी पापा का गुस्सा होना जायज है क्योंकि मैं आपकी बिरादरी की नहीं हूं!!! पवन कहता आजकल जात-पात कौन देखता है? जिसके साथ जिंदगी संवरती है और जिससे तालमेल होता है उसी के साथ विवाह करना चाहिए।
जल्दी-जल्दी वर्षा तैयार होकर चाची के घर पहुंच गई। सासू मां पहले से ही आ गयी थीं। वर्षा ने सभी को प्रणाम करके एक ओर बैठना ही उचित समझा।
हल्दी कुमकुम का कार्यक्रम शुरू हुआ। सभी महिलाओं को तिलक लगा। नाश्ता और खाने का सामान दिया गया। सभी की हंसी ठिठोली आरंभ हो गई और सासू मां की वर्षा को लेकर छीटाकशी भी सभी देख रहे थे।
बातों ही बातों में वर्षा की सासू मां को सभी महिलाओं ने कहा… “तुम कब कर रही हो हल्दी कुमकुम का कार्यक्रम। पिछली बार भी तुमने नहीं किया था। इस बार तो कर लो। अब तो बहु भी आ गई है। सभी ने एक दूसरे को देखा??”
सासू मां को भी शायद इसी दिन का इंतजार था बस बोल पडी… “ठीक है तो कल ही रख लेते हैं। सभी आ जाना जितनी भी यहां महिलाएं आई हैं। सभी को निमंत्रण हैं। सभी को आना है।”
वे कनखियों से बहू की तरफ देख रही थी। बहू ने भी हाँ में सिर हिलाया।
पवन समय से पहले आ गया गाड़ी लेकर ताकि वर्षा को कहीं कोई बात न लग जाए। वह सड़क से ही गाड़ी का हार्न बजा रहा था।
वर्षा “अभी आई कह..” कर जाने लगी। सभी को प्रणाम कर सासू माँ के ज्यों ही चरण स्पर्श करने के लिए झुकी उन्होंने बाहों में भर कर कहा… “बहु, कल तुम्हारी पहली हल्दी कुमकुम होगी। दुल्हन के रूप में सज धजकर मेरी देहली पर आना साथ में उस नालायक को भी ले आना।”
वर्षा की आँखों से आँसुओं की धार बह निकली। खुशी से रोते हुए हंस रही थी या हंसते हुए रो पडी, पर आँसू थे खुशी के ही। फूली ना समाई वर्षा।
अपने घर आने के इंतजार में वह झटपट पवन की गाड़ी में जा बैठीं। आज इतनी खुशी से चहकते हुए वर्षा को पहली बार पवन ने देखा तो देखता रह गया। क्योंकि वह माँ और वर्षा की कुछ बातों से अनजान जो था।
मुझे कल घर आना है कह कर आंसुओं की धार लिए पवन से लिपट गई वर्षा!!!!!!!