मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मायबोली ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मायबोली ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठीचा आहे | मला अभिमान |

शारदेची शान | भाषा माझी ||

 

मायबोली गोड | जीवा वेड लावी |

अंगाईची ओवी | माऊलीची ||

 

मनातील गूज | जात्यावरी गाते |

आपसूक येते | ओठी माझ्या ||

 

कथा भागवत | ओवी ज्ञानेशाची |

ठेव अमृताची | अलौकिक ||

 

मनाच्या श्लोकात | गीतेच्या अर्थात |

कथा कवितात | सार आहे ||

 

मराठीत आहे | साहित्याचा ठेवा |

जपोनी ठेवावा | मनोभावे ||

 

भाषा माऊलीची | आहे ओघवती |

देवी सरस्वती | सार्थ बोले ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ किती झालो आम्ही आता कणा हीन ☆ श्री लक्ष्मण उपाध्ये

कवितेचा उत्सव ☆ किती झालो आम्ही आता कणा हीन ☆ श्री लक्ष्मण उपाध्ये ☆ 

किती झालो आम्ही आता कणा हीन !

माय मराठी भाषा झाली दीन !

नाही बोलू शकत आम्ही आता शुद्ध मराठी !

नसे परि आम्हां त्याची मुळी क्षीति !

व्याकरणाची सदा हत्या करतो !

ऱ्हस्व, दीर्घ उच्चार विसरून जातो !

“पूर्व“, “क्रीडा“,  “आशीर्वाद“ असले शब्दही अशुद्ध लिहितो !

“पाणी“ नी “पाणि“ मधला फरक न जाणतो !

“माझी मदत कर “, असे बिनदिक्कत बोलतो !

“गृह “ आणि “ ग्रह “ दोन्ही एकच मानतो !

नाही धड इंग्रजी भाषा लिहितो !

ना अस्सखलित इंग्रजीही बोलू शकतो !

नाही मराठी, नाही इंग्रजी !

ना खंत, ना खेद, ना लाज याचीही !

आज सत्तर वर्षे लोटूनही

मराठी भाषेची अवस्था शोचनीय ही !

 

©  श्री लक्ष्मण उपाध्ये

१९.०२.२०२१

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

“मराठी भाषा दिन” ?

मंडळी, नमस्कार ??

‘मराठी भाषा दिन’ अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर जन्मदिवसाचे  निमित्य साधून  एका शाळेत घडलेल्या  एका कार्यक्रमाबद्दल तुम्ही आता वाचणार आहात

२७ फेब्रुवारीला जरी हा दिवस असला  तरी शाळेने काही दिवस आधीच हा कार्यक्रम साजरा केला. शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवे ध्वज, पताका  यांनी शाळा सुशोभित करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेश द्वारावरच  ‘ सुस्वागतम  ‘ असे छान फुलांच्या नक्षीकामात  लिहिले होते.  अनेकांना हा शब्द  नवीन होता. लागलीच  गुगल भाषांतराद्वारे  अनेकांनी त्याचा अर्थ ‘ वेल कम ‘ असा आहे हे जाणून घेतले. शाळेत आज राष्ट्रगीत  झाल्यांनतर  ज्ञानेश्वर गुरुजींनी पहिला तास सुरु केला. आज आपण  मराठी भाषा रुजेल यासाठी  काय करावे ? यावर चर्चा करू असे म्हणाले. प्रत्येकाने आपले मत सांगा  ( कृपया  आज तरी  मराठीतच )  असे सांगताच  एकेक जण बोलू लागले. त्यातील काही विचार

१) सकल मराठी जनांनी कमीत कमी एकमेकांशी मराठीत बोलावे.

२)महाराष्ट्रात आम्हाला

‘मराठी भाषा दिन’ साजरा करावा लागतोय…..हे आमचेच दुर्दैव…अशा दिनाच्या शुभेच्छा द्यावं लागण म्हणजे तर अजूनच. वाईट…

तरीही मी आजच्या दिवशी अशी सदिच्छा व्यक्त करतो की…निदान ह्या निमित्ताने तरी समस्त मराठी लोक एकमेकांशी मराठी बोलतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतील. आणी हे करताना अजिबात लाज वाटणार नाही

जय मराठी ?

वर्गातील सर्वात हुशार  विद्यार्थ्यानेे अशी  ☝?प्रतिक्रिया देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला ????

यानंतर शाळेपासून शाळेच्या खेळाच्या मैदानापर्यत ‘मराठी अनुदिनी दिंडी’ निघाली, शाळेभोवतीच्या सहा गल्ल्यातून जाऊन  मैदानावर तिचा शेवट होणार होता. वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचा चित्र रथ  यावेळी मुलांनी सादर केला. यात प्रामुख्याने भाव खाऊन गेलेले संकेतस्थळ ठरले

माझे टुकार ई-चार   ?

(या अनुदिनीचा पत्ता तर सगळ्यांना अगदी तोंडपाठ होता)

शाळेच्या मैदानावर तंत्रशिक्षण खात्यातर्फे प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीवर  ‘ मराठी टंकलेखन ‘ बसवून देण्यात होते.  तेथेच स्वयंसेवक  मराठीत  ॐ, क्ष, ज्ञ, त्र. श्र, इ  व्यंजन कशी टाकायची याचे प्रात्यक्षिक देत  होते

आजच्या  दिवसाचे औचित्य साधून  शाळेत मुलांसाठी ‘ पंगती  जेवण ‘ हा विशेष कार्यक्रम ठरवला होता. काय अप्पा वरचा विनोद ‘ पूर्वी लोक एकाजागी  बसायचे आणि वाढपी सगळीकडे फिरत जेवण वाढायचे ‘  याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आणि पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला ?

जेवणानंतर वर्गातील आणखी एका हुशार मुलाने  खूप पूर्वीच्या  दूरदर्शन वर होऊन गेलेल्या ‘ प्रतिभा आणि प्रतिमा ‘  या कार्यक्रमाचे संकलन सादर केले. हाही कार्यक्रम विशेष भाव खाऊन गेला.

यानंतर एकत्रित  ‘ मराठी वृत्तपत्र ‘   वाचन हा कार्यक्रम पार पडला. तरुण भारत, नवसंदेश, केसरी,  पुण्य नगरी  यांच्या काही जुन्या आवृत्या  मुलांना वाचावयास दिल्या. चित्रपटाच्या जहिराती, क्रीडा विश्व, मनोरंजन, कोडी,  राजकारणाविषयी बातम्या  हे सगळे ‘ काय अप्पा ‘ पूर्वी ही अस्तित्वात  होते  हे पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सगळ्यात मजा मुलांना आली ती म्हणजे पहिल्या पानावरची बातमी संपताना खालील कंसात लिहिलेले  अधिक वृत्त पान  ५ वर. आणी मग पुढचा वृत्तांत परत ५ वर जाऊन वाचणे.. तसेच काहीही क्रमशः  लेख ही त्यांनी पाहिले, एकंदर हे सदर ही खूप छान  रंगले.

एवढ्यातच ‘wake up wake up, its brand new day’ असा मोबाईल मधे गजर झाला आणि सनी झोपेतून उठला. शाळेत वेळेवर जाण्यासाठी तो लगेच आवरु लागला.

पण आज पडलेले हे ‘ मराठीचे स्वप्न ‘ त्याला खूप आवडले होते

(संग्रहित)  अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कवीवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि. वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना नितांत सुंदर अशीच आहे.. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन २००० पासून २१ फेब्रुवारी हा ” आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ” साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. या दोन्ही सुदिनाचे औचित्य साधून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या मायबोलीच्या सन्मानाचे आहेत.

माझ्या मराठी मातीचा

लावा ललटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

द-याखो-यातील शिळा

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे… भारतभरात आपापल्या संस्कृतीप्रमाणे आणि जातीधर्मा प्रमाणे भाषा बोलल्या जात असल्या तरी देखील माझ्या मराठी भाषेत जो गोडवा सामावलेला आहे त्याची सर इतर कुठल्याही भाषेला नाही…काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार या सर्वांचा साज लेऊन मराठी पुढे येते त्यावेळी तिचे सौंदर्य काय वर्णावे ?

मराठी भाषा परिपूर्ण माधुर्याने शब्दविलासाने नटलेली, विविध बोलींचे लेणे घेऊन आलेली, साहित्यिकांच्या लेखणीने समृद्ध केलेली मराठी भाषा आपल्या सर्वांचाच मानबिंदू आहे. मराठी भाषेला जो लहेजा आहे तो अन्य कुठल्या भाषेला आहे?  मराठी भाषा वळवावी तशी वळते…एवढा लवचिकपणा कोणत्या भाषेत आहे. आपल्या मराठी भाषेला बोलीभाषांचे ऐश्वर्य लाभलेले आहे. एक ना अनेक अशी कितीतरी वैशिष्ट्ये आपल्या मराठी भाषेची आहेत…

मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मराठी भाषा एक अमूल्य अशी देणगी आहे. सौंदर्य, माधुर्य आणि विविधतेने/ विविधता यांनी नटलेली..

मराठी भाषा म्हणजे काय ? असा जर कुणी प्रश्न विचारला तर माझे उत्तर असेल… मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार…

मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड,, संताजी- धनाजींची स्फूर्ती, सावरकरांची किर्ती, मराठी महन्मंगलम मूर्ती शारदेची…साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून- थटवून सुंदर केलं. आचार विचारांच्या परंपरांनी संस्कृतीची जडणघडण ही केली.

स्वर्गे अमृताची गोडी

चाखून पहा थोडी

वाटे फुलांची परडी

माझी माय ही मराठी

मराठी राजभाषा दिन साजरा करताना मराठी भाषेचे संवर्धन आणि जोपासनेची धुरा अभिमानाने पुढे नेऊया..

सन्मान मराठीचा

अभिमान महाराष्ट्राचा

मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे. तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. ती संतांच्या किर्तने भजन भारूडांनी सजली आहे. आपली मराठी भाषेची सुंदरता आणि संपत्ती ही समजून घ्यावी लागेल आणि समजून द्यावीही लागेल…

मराठीचा ” म” या अक्षरात मी, माझी मराठी, मायबोली अश्या सर्व ” म” कारात मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व  ” म” सामावलेले आहेत. म्हणूनच आम्ही बोलतो मराठी असे आमुची मायबोली..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

भावनेत अडकलेला नात्यांचा गुंता सुसंवादानं सोडवणं सोपं जातं त्यासाठी सुसंवादाची सुगंधित कुपी नात्यांवर सांडली पाहिजे. नाही तर नातं धुसर आणि पुसट होत जातं अगदी वृद्धापकाळातल्या नजरे सारखं…..

आई वडील आणि मुलगा सून यांच्या नातेसंबंधावरचा विषय तसा चावून चोथा झालेला, पण पुन्हा पुन्हा उफाळून येतो आणि नव्याने विचार करायला लावतो याचं कारण दररोज घडणाऱ्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना अन् मनाला चटका लावून जाणारे प्रसंग !….नाईलाजावर इलाज नाही असं म्हणून हताश झालेली आईवडिलांची मनं विचारांच्या गर्तेत बुडन जातात……

‘आमच्या प्रेमाच्या ओलाव्याने ही बीजे अंकुरली बहरली ना? त्यांना पंखही आम्हीच दिलेत ना ?त्यात बळही आम्हीच भरले ना ? तशात अपेक्षांचं ओझं कधीही त्यांच्यावर लादलं नाही. अर्थात आई वडील म्हणून या नात्यामधून माफक अपेक्षा केली तर आमचं काय चुकलं? रक्ताची नाती मतलबी का झाली? ती इतकी संवेदनाशून्य का झाली? आम्ही कुठे कमी पडलो? आणखी काय करायला हवं होतं आम्ही? आपल्याच पोटचीच पोरं…..तीही इतकी भावनाशून्य?’ विचारांचं मोहोळ उठत, पण विचारांचा गुंता सुटत नाही.

पंख फुटलेली लेकरं उडून जातात. त्यांच्या प्रगतीत आई-वडिलांचं सुख असत.थोडे दिवस एकांत मिळतो. याच एकांताच एकटेपणात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.

मुलांसोबत राहणाऱ्या आई-वडिलांच्या जीवनातील एकटेपणाचा हाच अर्थ आहे. भावना आणि व्यवहारात फरक जाणवू लागतो आपलंच सगळं परकं वाटू लागतं

आणि…….

अचानक आठवते ती कावेरी ! नाट्यसम्राट वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ मधली कावेरी आणि तिने त्याकाळी म्हटलेलं एक शाश्वत वाक्य ‘जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये’

चूक नसतानाही, केवळ वाद टाळावा म्हणून सतत माघार घेऊन संयम राखणारं एका वृद्ध जोडप्याची करूणरस प्रधान अशी शोकांतिका म्हणजे ‘नटसम्राट’! ते एक क्षोभनाट्य आहे.

काळ लोटला आहे. या शोकांतिकेतली पात्रं बदलली आहेत,परंतु या नाटकातील विषयाचं गांभीर्य अधिक गडद होत चाललं आहे.

इथून पुढच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व वाढेल का? की ते एक स्मरणरंजन राहील? एकत्र कुटुंब पद्धतीची दुर्दशाच आपण नटसम्राटमध्ये पाहतो म्हणून याबद्दल आपण साशंक होत चाललो आहोत.

‘बी प्रॅक्टिकल’ चा गोषवारा सध्या फार आहे. या व्यवहारी जगात संवेदना भावना यांची किंमत कमी होत चालली आहे.अशा परिस्थितीत ‘परावलंबी वृद्धत्व’ हा एक यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. पर्यायाने वृद्धाश्रम हा व्यवसाय झाला आहे.

‘नटसम्राट’ मधलं हे जोडपं, कलावंत मन असलेलं जोडपं आहे. त्याच्यासारखंच आयुष्य व्यतीत करणारी समाजातली असंख्य वृद्ध जोडपी असंच मूक भाष्य करत आहेत. विदेशी संस्कृतीचा आणि तिच्या संस्कारांचा प्रसार आपल्या इथेही होतोय. ती वाळवी इकडे जोमात पसरते आहे.तिला आवर घालणं हे संवेदनशील मनाचं काम आहे.

गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही कलाकृती आणि त्यात वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीने पेरलेली स्वगतेही अनन्यसाधारण!…

आपल्या समाजात आपण अप्पासाहेब बेलवलकरां सारखी दुर्दैवी परिस्थिती ओढवलेल्या व्यक्तीला ‘त्याचा नटसम्राट झाला’ असे बोलीभाषेत म्हणून ‘नटसम्राट’ हे विशेषण देतो.ह्यातच कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या नाटकाचं श्रेष्ठत्व आहे.

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 84 ☆ आत्मविश्वास – अनमोल धरोहर ☆ डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय  आलेख आत्मविश्वास – अनमोल धरोहर।  यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 84 ☆

☆ आत्मविश्वास – अनमोल धरोहर ☆

‘यदि दूसरे आपकी सहायता करने को इनकार कर देते हैं, तो मैं उनका आभार व्यक्त करता हूं, क्योंकि उनके न कहने के कारण ही मैं उस कार्य को करने में समर्थ हो पाया। इसलिए आत्मविश्वास रखिए; यही आपको उत्साहित करेगा,’ आइंस्टीन के उपरोक्त कथन में विरोधाभास है। यदि कोई आपकी सहायता करने से इंकार कर देता है, तो अक्सर मानव उसे अपना शत्रु समझने लग जाता है। परंतु यदि हम उसके दूसरे पक्ष पर दृष्टिपात करें, तो यह इनकार हमें ऊर्जस्वित करता है; हमारे अंतर्मन में आत्मविश्वास जाग्रत कर उत्साहित करता है और हमें अपनी आंतरिक शक्तियों का अहसास दिलाता है, जिसके बल पर हम कठिन से कठिन अर्थात् असंभव कार्य को भी क्रियान्वित करने तथा अंजाम देने में सफल हो जाते हैं। सो! हमें उन लोगों के प्रति कृतज्ञता ज्ञापित करनी चाहिए, जो हमें बीच मंझधार छोड़ कर चल देते हैं। सत्य ही तो है कि जब तक इंसान गहरे जल में छलांग नहीं लगाता; वह तैरना कैसे सीख सकता है? उसकी स्थिति तो कबीरदास के नायक की भांति ‘मैं बपुरौ बूड़न डरा, रहा किनारे बैठ’ जैसी   होगी।

सो! यह मत कहो कि ‘मैं नहीं कर सकता,’ क्योंकि आप अनंत हैं। आप कुछ भी कर सकते हैं।’ स्वामी विवेकानंद जी की यह उक्ति मानव में अदम्य साहस के भाव संचरित करती है; उत्साहित करती है कि आप में अनंत शक्तियां संचित हैं और आप कुछ भी कर सकते हैं। हमारे गुरुजन, आध्यात्मिक वेद-शास्त्र के ज्ञाता व विद्वत्तजन– हमें अंतर्मन में निहित अलौकिक शक्तियों से रूबरू कराते हैं और हम उन कल्पनातीत असंभव कार्यों को भी सहजता- पूर्वक कर गुज़रते हैं। इसके लिए मौन का अभ्यास आवश्यक है, क्योंकि वह साधक को अंतर्मुखी बनाता है; जो उसे ध्यान की गहराइयों में ले जाने में सहायक सिद्ध होता है। महर्षि रमण, महात्मा बुद्ध, भगवान महावीर वर्द्धमान आदि ने भी मौन साधना द्वारा ईश्वर का साक्षात्कार किया।

मौन रूपी वृक्ष पर शांति के फल लगते हैं अर्थात् मौन से हमारे हृदय में सुप्त अलौकिक शक्तियां जाग्रत होती हैं, जिसके परिणाम-स्वरूप जीवन में सकारात्मकता दस्तक देती है। वास्तव में मौन जीवन का सर्वाधिक गहरा संवाद है। सो! मानव को शब्दों का चयन सावधानीपूर्वक करना चाहिए, क्योंकि यह महाभारत जैसे महायुद्ध के जनक भी हो सकते हैं।

स्वामी योगानंद जी के शब्दों में ‘यह हमारा छोटा-सा मुख एक तोप के समान और शब्द बारूद के समान हैं– जो पल-भर में सब कुछ नष्ट कर देते हैं। सो! व्यर्थ व अनावश्यक मत बोलें और तब तक मत बोलें; जब तक तुम्हें यह न लगे कि तुम्हारे शब्द कुछ अच्छा कहने जा रहे हैं।’ इसलिए मौन मानव की वह मन:स्थिति है, जहां पहुंच कर तमाम झंझावात शांत हो जाते हैं और मानव को विभिन्न मनोविकारों चिंता, तनाव, आतुरता व अवसाद से मुक्ति प्राप्त हो जाती है। इसलिए स्वामी योगानंद जी मानव-समाज को अपनी अमूल्य शक्ति व समय को व्यर्थ के वार्तालाप में बर्बाद न करने का संदेश देते हैं; वहीं वे भोजन व कार्य करते समय मौन रहने की महत्ता पर भी प्रकाश डालते हैं।

सो! जब आपके हृदय की भाव-लहरियां शांत होती हैं, उस स्थिति में आपको अच्छे विकल्प सूझते हैं; आप में आत्मविश्वास का भाव जाग्रत होता है और आप उन लोगों के प्रति कृतज्ञता ज्ञापित करते हैं; जिनके कारण आप उस असंभव कार्य को अंजाम देने में समर्थ हो सकते हैं। परंतु इस समस्त प्रक्रिया में तथाकथित अनुकूल परिस्थितियों व आपकी सकारात्मक सोच का भी अभूतपूर्व योगदान होता है। इसलिए ‘मैं कर सकता हूं’ को जीवन का मूल-मंत्र बनाइए और निराशा को आजीवन अपने हृदय में प्रवेश न पाने दीजिए। इस स्थिति में दोस्त, किताबें, रास्ता व सोच अहम् भूमिका निभाते हैं। यदि वे ठीक हैं, तो मानव के लिए सहायक सिद्ध होते हैं; यदि वे ग़लत हैं, तो गुमराह कर पथ-भ्रष्ट कर देते हैं और उस अंधकूप में धकेल देते हैं; जहां से वह कभी बाहर आने की कल्पना भी नहीं पाता। इसलिए सदैव अच्छे दोस्त बनाइए; अच्छी किताबें पढ़िए; सकारात्मक सोच रखिए और सही राह का चुनाव कीजिए… राग-द्वेष व स्व-पर का त्याग कर, ‘सर्वेभवंतु: सुखीनाम्’ की स्वस्ति कामना कीजिए, क्योंकि जैसा आप दूसरों के लिए करते हैं, वही लौट कर आपके पास आता है। सो! संसार में स्वयं पर विश्वास रखिए और सदैव अच्छे कर्म कीजिए, क्योंकि वे आपकी अनमोल धरोहर होते हैं; जो आपको जीते-जी मुक्ति की राह पर चलने को प्रेरित ही नहीं करते; अग्रसर कर आवागमन के चक्र से मुक्त कर देते हैं।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी,

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – हरित ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

निठल्ला चिंतन ??

☆ संजय दृष्टि – हरित  ☆

 

हरा रहने के लिए जड़ों से जुड़ा होना आवश्यक है। जड़ें धरती के भीतर पोषित होती हैं। नश्वर संसार की आभासी उपलब्धियों से लम्बाई बढ़ती है। बढ़ती लम्बाई, जड़ों से दूरी भी बढ़ाती है। समय साक्षी है कि धन, संपदा, अधिकार या मान-सम्मान मिलने के बाद भी जो धरती से जुड़ा रहा, वही ऊँचा हुआ, वही हरा रहा।

 

©  संजय भारद्वाज

(सोमवार 25 फरवरी 2019, प्रातः 7:11 बजे)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ किसलय की कलम से # 36 ☆ सोशल मीडिया जनित हत्यायें और जवाबदेही ☆ डॉ विजय तिवारी ‘किसलय’

डॉ विजय तिवारी ‘किसलय’

(डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं।  आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक सार्थक एवं विचारणीय आलेख  “सोशल मीडिया जनित हत्यायें और जवाबदेही”.)

☆ किसलय की कलम से # 36 ☆

☆ सोशल मीडिया जनित हत्यायें और जवाबदेही ☆

 वैसे तो हम सोशल मीडिया पर अवांछित खबरें या चित्र छपने पर अप्रिय वारदातों को पढ़ते सुनते आ रहे हैं लेकिन वर्तमान में सोशल मीडिया पर आपत्तिजनक चित्र, संदेश एवं पोस्ट किए गए वीडियोज के कारण हत्याओं के बढ़ते मामले बेहद चिंता जनक हैं।

आज जिस तरह से वाट्सएप, फेसबुक, ट्विटर, इंस्ट्राग्राम या अन्य सोशल मीडिया के साधन लोकप्रियता पा रहे हैं, उनका उपयोग समाज को लाभ कम और हानि ज्यादा पहुँचा रहे हैं। आपराधिक प्रवृत्ति के लोग अंतरजाल की नवीनतम सुविधाओं का जिस चालाकी  से दुरुपयोग करते हैं, वह सामान्य जनता की सोच के परे होता है। लोग अन्तरजालीय तकनीकि का तीस – चालीस प्रतिशत भी उपयोग नहीं कर पाते। बैंकिंग को लेकर होने वाले अपराधों और ऑनलाइन व्यापार आदि में सबको पता है आम आदमी कितना ठगा जा रहा है। अंतरजाल पर असामाजिक तत्त्वों द्वारा अश्लीलता का परोसा जाना भी किसी से छिपा नहीं है। आज इसी मीडिया पर बने संबंध और नजदीकियाँ युवक-युवतियों को अनैतिक गतिविधियों की ओर प्रेरित कर रहे हैं। इनके बीच पनपे अवैधानिक संबंध समाज और परिवार की बेइज्जती तथा आत्महत्या के कारण बनते जा रहे हैं। आज मीडिया पर एक पोस्ट भी पक्ष और विपक्ष का विवाद, पारिवारिक, सामाजिक, धार्मिक तथा राजनैतिक वबाल खड़ा करने में सक्षम हो चुका है। मीडिया से उपजी वैमनस्यता धर्म, संप्रदाय और पारिवारिक हिंसा को बढ़ावा दे रही है। पर्व, उत्सव मेले या चुनावी माहौल में एक समाचार, किसी की टिप्पणी या विज्ञापन पर सारा मीडिया गृह युद्ध का वातावरण निर्मित कर देता है। समझाइश और शांति की अपील के बजाए लोगों के अप्रिय और निरर्थक वक्तव्य आग में घी का काम करते हैं। हमारे बुजुर्ग कहा करते हैं, मतभेद रखो परंतु आपस में मन भेद नहीं रखना चाहिए। बुजुर्गों की ये सीख आज मानता ही कौन है। वर्तमान राजनीतिक क्षेत्र में क्या चल रहा है? नीति का कहीं अता-पता नहीं है। पहले युद्ध भी उसूलों और सिद्धांतों पर आधारित लड़े जाते थे।शायद यही कारण है कि आज की राजनीति किसी विशेष या परिपक्व नीति पर आधारित न होकर सामयिक बनती जा रही है। फिर भी हम कहेंगे कि राजनीतिक विचारधारा को समर्थन देना अलग बात है परंतु  यही विचारधारा यदि हत्या, आतंक अथवा देशद्रोह की ओर प्रेरित करे तो यह हमारे समाज, हमारे देश या समूचे विश्व के लिए खतरनाक है। विश्व में अंतरजालीय अपराधों के नियंत्रण संबंधी कानून और नियमावलियों की चर्चा आए दिन सुनते रहते हैं। अंतरजालीय अपराधियों एवं हैकर्स के किस्से सुनने के बाद भी ये मामले घटने के बजाय बढ़ते ही जा रहे हैं। विश्व में नियम बन रहे हैं। सावधानियाँ बरती जा रही हैं। इस की जवाबदेही किसकी है? शायद इस ओर ज्यादा ध्यान देने की आवश्यकता है। सोशल मीडिया पर नियंत्रण संबंधी कानूनों का न होना या कठोरता से पालन न किया जाना इसका प्रमुख कारण है।शिक्षित वर्ग में जागरूकता की कमी तीसरा कारक है और शायद दिग्भ्रमित युवाओं द्वारा अंतरजालीय सुविधाओं का दुरुपयोग कर असंवैधानिक गतिविधियों में लिप्त होना भी एक कारण है। निश्चित रूप से सरकारों द्वारा सकारात्मक रुख एवं कानूनी नियंत्रण सबसे कारगर साबित हो सकता है।

आज यह हालात हमारे पूरे देश क्या पूरे विश्व में बने हुए हैं। यद्यपि हमारा देश शांतिप्रिय देशों में गिना जाता है लेकिन अन्तरजालीय मीडिया के संदेशों के कारण शुरू हुई हिंसाएँ खतरे की घंटी कही जा सकती है। हमारे देश की केन्द्रीय तथा राज्य सरकारों के लिए यह चिंतन और सतर्कता का समय है। इन सरकारों को चाहिए कि वे ऐसे मामलों में चतुर्दिश चौकस रहें और भविष्य में ऐसी किसी भी सोशल मीडिया जनित हत्यायें एवं दुर्घटनाओं को रोकने में सक्षम हों।

© डॉ विजय तिवारी ‘किसलय’

पता : ‘विसुलोक‘ 2429, मधुवन कालोनी, उखरी रोड, विवेकानंद वार्ड, जबलपुर – 482002 मध्यप्रदेश, भारत
संपर्क : 9425325353
ईमेल : [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज # 83 ☆ चाँदनी ☆ डॉ. भावना शुक्ल

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण  कविता “चाँदनी। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 83 – साहित्य निकुंज ☆

☆ चाँदनी  ☆

आज

चाँदनी रात है

तुझसे मुलाकात है।

चाँद छुपा है

चाँदनी के आगोश में

चहूँ ओर फैली है चाँदनी

बिखर रही रूप की रागिनी

तेरा रूप देखकर

हूँ मैं खामोश

उड़ गये हैं होश

चाँदनी रात में

निखरा तेरा श्रृंगार

लगता है

तेरे रोम-रोम से

फूट रहा मेरा प्यार ।

तभी नजर पड़ी

चाँद पर

वह चाँदनी से कह रहा हो

तुम दूर न जाना

मेरे साथ ही रहना

तेरे साथ ही मेरा वजूद है।

तुझमें डूबना चाहता हूँ

तुझमें समाना चाहता हूँ।

तुझसे मेरा श्रृंगार है।

तू ही मेरा जन्मों का प्यार है।

तभी निहारा अपने चाँद को

उसने नजरे झुका ली

सार्थक हुई मुलाकात

प्रतीक बन गई

चाँदनी रात।

 

© डॉ.भावना शुक्ल

सहसंपादक…प्राची

प्रतीक लॉरेल , C 904, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब  9278720311 ईमेल : [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष # 73 ☆ संतोष के दोहे☆ श्री संतोष नेमा “संतोष”

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.    “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  “संतोष के दोहे। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार  आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 73 ☆

☆ संतोष के दोहे  ☆

बुरा वक्त ही कराता,  अपनों की पहचान

संकट में जो साथ दे, उसको अपना जान

 

वक्त बदलता है सदा, लें धीरज से काम

नई सुबह के साथ ही, मिलता है आराम

 

चलें वक्त के साथ हम, करें वक्त सम्मान

वक्त किसी का सगा नहिं, चलिए ऐसा मान

 

वक्त बदलते बदल गई, सबकी सारी सोच

नजर हटते ही हटा, नजरों का संकोच

 

वक्त बहुत बलवान है, क्या समझें नादान

पहिया रुके न वक्त का, होता है गतिमान

 

लगे वक्त भारी सदा, जब मुश्किल हालात

वक्त प्रबंधन कीजिये, करिये न सवालात

 

कभी हंसाता, रुलाता, अज़ब वक्त के खेल

जुदा कराता वक्त ही, वही कराता मेल

 

डर कर रहिये वक्त से, बुरी वक्त की मार

वक्त किसी का सगा नहिं, तेज वक्त की धार

 

वक्त की चक्की से पिसें, क्या राजा क्या रंक

बचे न कोई वक्त से, चलता है जब  डंक

 

वक्त की पहचान करें, समय का सदुपयोग

भोग तभी हम पाएंगे, दुनिया के सब भोग

 

साँचा संग सद्गुरु का, झूठा जग ब्यवहार

आवे काम वक्त पड़े, बुद्धि,विवेक,विचार

 

साझेदारी दर्द की, करे जो सच्चा यार

खुशियों में तो सब यहां, बनते हैं दिलदार

 

लक्ष्य तय कर बढ़े चलें, संयम नियम के संग

सफल हों”संतोष”तभी, होगी दुनिया दंग

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares