हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 52 ☆ फूटा ढोल ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

( ई-अभिव्यक्ति संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों / अलंकरणों से पुरस्कृत / अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक समसामयिक विषय पर विचारणीय रचना “फूटा ढोल”। इस सार्थक रचना के लिए  श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन ।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 52 – फूटा ढोल ☆

कालूराम का फट गया ढोल, बीच बजरिया खुल गयी पोल… खूब जोर शोर से यह गाना बज रहा था। सभी मदिरा के नशे में मदमस्त होकर अपनी ही धुन में झूमे जा रहे थे कि सहसा कुछ चिटकने की आवाज कानों में गूँज उठी। ये स्वर इतना विषैला था कि ढोल वाले के हाथ जहाँ के तहाँ ऐसे जमें मानो बर्फीले इलाके में अचानक बर्फबारी शुरू हो गयी हो।

ऐसा दृश्य दिन के तीसरे या चतुर्थ प्रहर में हो तो एक बार मन स्वीकार कर लेता है किंतु जब पहले और दूसरे प्रहर में ये सब घटित हो तो मन वितृष्णा से भर ही जाता है। बिना सोची समझी योजना के ऐसे कार्य हो ही नहीं सकते हैं। खैर जब व्यक्ति शब्दों की गलत व्याख्या पर उतर आए तब ऐसा होना लाजिमी ही होता है। गणतंत्र के नाम पर देशहितों को ताक पर रखकर हंगामा करना, जिससे मानवता शर्मशार होती हो, ये सब किसी भी रूप में जायज नहीं हो सकता है।

तमाशा मचाने हेतु बहुत से अवसर ढूंढे जा सकते थे, किंतु जब सारा विश्व भारत की ओर उम्मीद लगाए हो तब ऐसा परिदृश्य उकेरना किसी के हित में नहीं हो सकता है। शायद ऐसे ही समय के लिए लिखा गया था कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं , मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। सब कुछ बदलिए पर तरीका सही हो तभी परिणाम सुखद होते हैं। पर कहते हैं न कि, विनाश काले विपरीत बुद्धि …सो ऐसा ही यहाँ भी घटित हो गया।

कुरीतियों का परचम इतने जोर से फहराया कि इससे सारी हदें पार कर दीं। जहाँ – तहाँ , बदनीयती ही झलकने लगी। सारे रंग तिरंगे की ओर देखकर उससे पूछ रहे थे कि तुम्हें आसमान में स्थापित करने हेतु कितनों ने सीने पर हँसते – हँसते गोलियाँ खायीं हैं, और आज ये क्या हो गया ?

अपनी जायज नाजायज सभी माँगों को क्या तुम्हारे माध्यम से ही पूरा किया जावेगा। अभी भी समय है सभी रंग एकजुट होकर मातृभूमि के साथ खड़ें हो और तिरंगे को सलाम करते हुए गौरवान्वित हों।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३३॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३३॥ ☆

 

हारांस तारांस तरलगुटिकान कोटिशः शङ्कशुक्तीः

शष्पश्यामान मरकतमणीन उन्मयूखप्ररोहान

दृष्ट्वा यस्यां विपणिरचितान विद्रुमाणां च भङ्गान

संलक्ष्यन्ते सलिलनिधयस तोयमात्रावशेषाः॥१.३३॥

जहां विपणि में हार अगणित अनेकों

सुखद शंख , सीपी , हरित मणि विनिर्मित

प्रभा पूर्ण मूंगों , तरल मोतियों से

भरेलख , जलधि भास होते प्रवंचित

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लागला मिसळण्या अश्रुधूर ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

☆ कवितेचा उत्सव ☆ लागला मिसळण्या अश्रुधूर ☆ श्री शुभम अनंत पत्की 

प्रसन्न वातावरण होते किती,

दिवस हा होता पवित्र किती

लागले गालबोट या नेत्यांमुळे,

पोलिसांचे कोंडले श्वास किती

 

लोकशाहीचं आदर्श मॉडेल,

स्विकारले होते आज देशाने

प्रजासत्ताक चिरायु होण्याचे,

७२ सोहळे झाले शांततेने

 

पोलिसांनी तारलं होतं,

कोरोनामध्ये सर्वांना

तुम्ही का चिरडलं आज,

गवत समजून दुर्वांना

 

करा कितीही सारवासारव,

ऊरात राहिल खदखद सर्वदूर

दिल्लीचे हे असह्य प्रदूषण,

लागला मिसळण्या अश्रुधूर

 

© श्री शुभम अनंत पत्की

२६/०१/२०२१

(कवितात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रेखीन माझ्या मीच ललाटा ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ वज्रदेही ☆ श्री प्रकाश लावंड ☆

ना  हाकाटी  ना बोभाटा

बुजून गेल्या साऱ्या वाटा

रान  काटेरी  माजलेले

पाय थकलेले पल्ला मोठा।।

 

कडे कातीव दऱ्या ताशीव

निसरडे दगड घोटीव

भणाण वारा भेलकांडतो

भिती दाखवी खडा चढाव

किती परीक्षा पाहतोस

रौद्ररूपा सांग विराटा  ।। १।।

 

काळोखा कर आकांडतांडव

तोंड पसरून भिती दाखव

नजर माझी प्रकाशमान

आणिक तगडे माझे सौष्ठव

तेजोमय झाले बघ माझे

शिवार,घर,अंगण ओटा ।। २।।

 

माझा प्रवास नाही सस्ता

माझ्यासाठी ना हमरस्ता

जीव पणाला नित्य लावतो

काळी माय कसता कसता

घामानं भिजवून माती

रेखीन माझ्या मीच ललाटा  ।। ३।।

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.#e-abhivyakti

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

दुस-या दिवशी सकाळी माधुरीच्या प्रतिकचा फोन, “मावशी तुझी  कल्पना काय भारी आहे ग मला आणि हिला खूपच आवडली. एक्झॅक्टली वृध्दाश्रम नाही. पण तुमच्या मित्रमैत्रिणीचा वयस्कर  आनंदाश्रम म्हणू हवं तर आईबाबा पण खूष. आम्हाला पण त्यांची काळजी रहाणार नाही. बाबा नियमितपणे घरी व्यायाम करत नाहीत. पथ्य पाळत नाहीत. आम्ही सांगायला गेलो तर वाद होतात. दिवसभर घरात दोघंच असतात भांडत बसतात. तुमच्याकडे सगळ्या बरोबर नियमित व्यायाम, पथ्य पण होईल. आम्हाला पण काळजी नाही. आनंदात रहातील दोघं. बरं तसं अंधेरी सांताक्रुझ म्हणजे अंतर पण फार नाही. वाटलं तर कधीही भेटू शकतात.

लगेच प्रकाशच्या जान्हवीचा फोन आला “आत्या, दी ग्रेट! तुझी आयडिया भन्नाट आहे. मला आणि ह्यांना एकदम पसंद” “अग, पण प्रकाश म्हणत होता तुझ्या शुभ्राला आजी आजोबांचा लळा आहे. तू नाही म्हणशील.” “अग आत्या ते बरोबर आहे, पण शुभ्रासाठी का त्यांना अडवून ठेवायचे. त्यांना करू दे ना आता उतारवयात तरी आपल्या मनासारखं. आयुष्यभर कुटुंबासाठीं, नंतर आम्हा मुलांसाठीं नोकरी सांभाळून घर. खूप कष्ट केले. आता बस झालं let them enjoy with you people.”

सुनिताच्या मुलीचा तर us वरुन फोन “मावशी तुझी आयडिया 101% आवडली. असं तर आई बाबा इकडे माझ्याकडे कायमचे यायला तयार नाही की दादाकडे बॅगलोरला पण जात नाहीत. तुमच्या सगळ्या बरोबर मज्जेत रहातील इकडे मला पण काळजी नाही.

विद्याचा मुलगा नितीश तर संध्याकाळी माझ्या घरी हजर,”मावशी तू माझं सगळं tension च दूर केलेस. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही”. “अरे आभार मानण्यासारखं मी काय केले? ते तरी सांग”. “अग मावशी, माझ्या बायकोचं आणि आईचं पटत नाही. आईला समजवावं तर ‘बायकोचा नंदीबैल, आणि बायकोला सांगायला जावं तर मम्माज् बाॅय’ही विशेषणं बर॔ दोघीही वाईट नाहीत दोघींची मते त्यांच्या परीने बरोबरच आहेत. पण कुठे माशी शिंकते कळत नाही. आणि घरांतले मनःशांती बिघडते. एवढे मात्र खरं. तू मात्र ह्या संकटातून माझी सुटका केलीस. परत जवळच्या जवळ कधीही जा ये करु शकतो.”

विजू बायको गेल्यापासून एकटाच रहात होता म्हणून ऑस्ट्रेलियात असणा-या मुलांने मला  फोनवर सांगितले, ‘आत्या, तुम्ही बाबांना तुमच्या कडे घेऊन जा. मला चालेल काय विचारतात ते. त्याना म्हणावं धावेल त्यांनाच काय तुमच्या आनंदाश्रमाला लागेल ती मदत मी करेन. एक जोडपं care taker बरोबर अजून एखाद दोन मुली वरच्या छोट्या, मोठ्या कामाला पार्ट टाईम ठेवा. आता फक्त तुम्ही सर्वानी मज्जा, आराम करायचा. आणि आपापल्या  तब्येती सांभाळच्या. माझी खात्री आहे माझे बाबा तुमच्या सगळ्यांबरोबर जेवढे आनंदात रहातील तेवढे कुठेच राहू शकणार नाही. त्यानी आमच्यासाठीं खूप खस्ता काढल्या. आईच्या आजारपणात पण त्यांची खूप ओढाताण झाली. माझी पण नोकरी इकडे नवीन असल्यामुळे माझी पण मदत नव्हती. तुमच्या सगळ्यांची मदत होती म्हणून आईचे आजारपण ते निभावू शकले. आता तिचे आयुष्य तेवढेच होतं. शेवटी ईश्वरी इच्छा.आता बाबांचे तरी आयुष्य तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आनंदात जाऊ दे.

मला कल्पनाच नव्हती. सहज मनांत विचार येतो काय मी सगळ्यांना बोलावून, सांगते काय ते आपल्या मुलांच्या कानांवर घालतात काय आणि त्यांचा इतका छान आणि त्वरीत प्रतिसाद मिळतो काय?

आमचे पतिराज मला दोन दिवसापूर्वीच म्हणाले होते तुझी कल्पना चांगली आहे. पण त्याला प्रतिसाद फारसा मिळेल असं वाटतं नाही. तुला वाईट वाटेल. पण झालं उलटचं. पण छान. चला कामाला लागू या. मज्जा पुन्हा एकदा 40 वर्षा पूर्वीचे आयुष्य जगू या. कोणाचे बंधन नाही.

कोणाला नातंवंडाना शाळेच्या स्कूल बसचं tension नाही कि सुनेचे, मुलाचे डब्बे भरायला नको. कुणाच्या मुलांना आईबाबा इकडे उतारवयात कसे रहात असतील? ह्याचे साता समुद्रापार टेन्शन नको.

ते पण मजेत, आम्ही पण मजेत, आनंदात आणि याच आनंदात कधी तरी exit घेऊ या.

≡ समाप्त ≡

© सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १७ . विचारपूर्वक निर्णय

नासिकापुरात चार कापूस विक्रेते होते. त्यांनी एक घर भाड्याने घेऊन तिथे खरेदी केलेला कापूस ठेऊन कापसाचा व्यापार सुरु केला. परंतु त्या घरात उंदरांनी धुमाकूळ घातला व ते कापूस कुरतडू लागले. उंदरांचा त्रास कमी व्हावा म्हणून सर्वांनी मिळून एक मांजर खरेदी केली व त्या घरात ठेवली. हळूहळू त्या मांजरीचा त्यांना लळा लागला. मांजरीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या प्रत्येकाने मांजरीच्या पायांमध्ये आभूषणे चढवली.

काही काळानंतर त्या अलंकारांच्या घर्षणाने मांजरीच्या एका पायाला जखम झाली. म्हणून त्या पायात अलंकार घालणाऱ्या व्यापाऱ्याने  अलंकार काढून प्रेमाने जखमेवर कापडी पट्टी बांधली. एकदा रात्री मांजरीने दिव्याच्या मागे लपून समोर उड्या मारणाऱ्या एका उंदरावर एकदम झेप घेऊन त्याला खाल्ले. या झटापटीत मांजरीच्या पायाला बांधलेली कापडाची चिंधी दिव्याला लागून तिने पेट घेतला. मांजर ती चिंधी फाडू शकत नव्हती. जसजसा अग्निदाह वाढू लागला, मांजर सर्वत्र उड्या मारू लागली. उड्या मारता मारता ओरडत ओरडत ती कापूस ठेवलेल्या ठिकाणी आली. कापसाच्या ढिगाऱ्यावर येताच त्या ज्वालेमुळे कापसाने पेट घेऊन सगळा कापूस भस्मीभूत झाला.

दुसऱ्या दिवशी ते दृश्य बघून बाकीचे तिघेही व्यापारी त्या चिंधी बांधणाऱ्या व्यापाऱ्याला “आमचे नष्ट झालेले धन परत कर” असे म्हणू लागले. त्या व्यापाऱ्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला. तो स्तब्धच झाला. नंतर त्या तिघा व्यापाऱ्यांनी राजाकडे जाऊन तक्रार केली की, “या व्यापाऱ्याने नष्ट झालेले धन परत दिले पाहिजे. हेच व्यवहारायोग्य ठरेल.”

राजाने सर्व वृत्तांत सविस्तर ऐकला व विचार करून तिघांना म्हणाला, “या व्यापाऱ्याने पट्टी बांधलेला पाय जखमी होता. त्या जखमी पायाने मांजर कशी बरे उड्या मारू शकेल? म्हणून कापसाच्या ढिगावर उड्या मारण्याने निर्माण झालेला आगीचा डोंब मांजरीच्या इतर तीन पायांमुळे निर्माण झाला यात काही संशय नाही. त्यामुळे तुम्ही तिघांनीच ते घर पूर्वीप्रमाणे बांधून मालकाला द्यावे व तुम्हीच तिघांनी मिळून चौथ्या व्यापाऱ्याला त्याचे नष्ट झालेले धन परत करावे.”

तात्पर्य – विचारपूर्वक निर्णयामुळे निर्दोष व्यक्तीचे रक्षण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का!’  पुष्पा घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन.’

आण्णांनी `ठीक आहे.’ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय,  तो बाप-लेकीतला,किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो,  गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने,  इतकेच नव्हे,  तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या  उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले.  स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही,  अशा असहाय्य,  परित्यक्ता,  विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली,  तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम,  पाठ्यपुस्तके,  प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या  आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार,  उमेद,  उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

—- क्रमश:

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ८) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ८) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगतराग ललत किंवा ललित

********

मारवा थाटोत्पन्न ललत किंवा  ललित या रागाचा विचार करतांना पहिली गोष्ट मनांत येते ती म्हणजे रागांतील स्वरांचा व निसर्गाचा किती घनिष्ठ संबंध आहे. सूर्योदयाची वेळ, हळूहळू वर चढणारा दिवस, मध्यानीची प्रखरता, सांजवेळ, रात्र, उत्तर रात्र, चोवीस तासांतील हे सगळे प्रहर सा रे ग म प ध नि ह्या स्वर सप्तकांतून रसिकाच्या मनःचक्षूसमोर साकार होतात. बर्‍याचदां मध्यम(म) ह्या स्वरावरून रागाची वेळ ठरविली जाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा राग ललत! एका पाठोपाठ येणारे दोन मध्यम (तीव्र,शुद्ध) हे या रागाचे खास वैशिष्ठ्य! या स्वरांची गंमत अशी की दिवसा शुद्ध असणारा मध्यम जसजशी रात्र चढू लागते तसतसा तीव्र होत जातो. ललत रागांतील तीव्र म रात्र नुकतीच संपल्याचे जाहीर करतो तर शुद्ध म दिवस वर येत असल्याची सूचना देतो.

“नि (रे) ग म(ध), (म)(ध), (म)म ग, ग (रे) ग (म), ग (रे) सा” अशी सुरावट ऐकली की द्दृष्टीसमोर अरूणोदयाचे चित्र उभे रहातेच.

अभिषेकी बुवांनी तेजोनिधी लोहगोल या कट्यार काळजांत घुसली मधील नाट्यपदाला म्हणूनच ललत रागांतील स्वरांचा आधार घेतला असावा.

पियु पियु रटत पपीहरा ही याच रागातील पारंपारीक बंदीश भावमधूर पहाटेचे वातावरण निर्मीते.

“खिन्न आंधळा अंधार आता

ओसरेल पार

लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल

आता उजाडेल…..”

ह्या मंगेश पाडगांवकरांच्या ओळी म्हणजे ललतचे पहाट घेऊन येणारे सूर.

या रागांत रिषभ आणि धैवत कोमल व बाकी इतर स्वर शुद्ध.  काही संगीतकार मात्र या रागाचा जनक मारवा म्हणून शुद्ध धैवत घेऊन सादरीकरण करतात. पंचम वर्ज्य असल्यामुळे जाति षाडव~षाडव.

नि (रे) ग म,(म)म ग,(म) (ध) सां

(रें) नि (ध) (म) (ध)(म) म ग (रे) सा

असे याचे आरोह/अवरोह.

प्रातःकालच्या मंगलमय वातावरणाबरोबरच

पवित्र प्रेमाचा आविष्कारही ह्या स्वरांतून आपल्याला जाणवतो.

“नैना भरायोरी

नींद उध्यारो जब रातही

तब पिया पास ना देखायोरी

मै का करू अब

शोक पियाके बिछुरन सन मोहे

हाय हाय कछु ना देखायोरी”

प्रेमरसांत आकंठ बुडालेली प्रेमिका डोळ्यात भरून आलेल्या पाण्यामुळे जवळ असलेल्या तिच्या प्रियकराला पाहू शकत नाही. कुमारजींनी त्यांच्या या बंदिशीतून तिच्या मनाची अवस्था साकारली आहे.

मृच्छकटीक नाटकातील ‘हे सखी शशीवदने’ पद, जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर हे ग. दि. मा/बाबूजी या जोडीचे पोस्टांतील मुलगी या चित्रपटांतील गीत, लता मंगेशकर व मन्ना डे यांचे ‘प्रीतम दरस दिखाओ’ ही सर्व गाणी ललतची ओळख करून देतात.

“इक शहेनशाहने  बनवाके हंसी ताजमहल…!”

मुघल सम्राट शहाजहानने त्याच्या मुमताज बेगम साठी बांधलेला ताजमहाल ~प्रेमाचे प्रतीक~ म्हणजेच ललतचे सूर.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 80 – समय धागे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

वरिष्ठ साहित्यकार एवं अग्रज श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी स्वास्थ्य की जटिल समस्याओं से उबर रहे हैं। इस बीच आपकी अमूल्य रचनाएँ सकारात्मक शीतलता का आभास देती हैं। इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना समय धागे)

☆  तन्मय साहित्य  #  80 ☆ समय धागे ☆ 

उम्मीदों के सुनहरे

शुभ पंख होते हैं

दुर्दिनों में राहतों के

बीज बोते हैं

टूटते मन शिथिल तन में

शक्ति का संचार कर

‘समय धागे’

बिखरते ‘मनके’ संजोते हैं।।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश0

मो. 9893266014

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पैसा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि – पैसा ☆

पैसा कमाता है आदमी,

पैसे के पहियों पर

दौड़ने लगता है आदमी,

आदमी और पैसा कमाता है,

पैसे को लग जाते हैं पंख

उड़ने लगता है आदमी,

आदमी बहुत पैसा कमाता है,

आदमी ढेर पैसा कमाता है,

निगाहों में चढ़ने लगता है आदमी!

अब पैसा खाता है आदमी,

अब पैसा पीता है आदमी,

पर  पैसे की सवारी अब

नहीं कर नहीं पाता थुलथुला आदमी !

ज्यों-ज्यों ज़बान पर चढ़ता है पैसा

त्यों-त्यों निगाहों से उतरता है आदमी !

इससे उस तक,

आदि से इति तक,

न कहानी बदलती है,

न नादानी बदलती है,

पैसा, आदमी की

नादानी पर हँसता है,

कवि, पैसे और आदमी की

कहानी पर हँसता है!

 

©  संजय भारद्वाज

(प्रात: 9:06 बजे, 2.11.20)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares