मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

उमलावया कळ्यांची असतेच आस बाकी

मौनात आज त्यांच्या लपलाय ध्यास बाकी

 

योजून ठेवलेले घडले जरूर नाही

करण्यास साध्य सारे फुलतोय श्वास बाकी

 

खपलो जरी तरीही शेती दगाच देते

कर्जात अडकल्याचा बसतोय फास बाकी

 

संमृद्ध ज्ञानसाठा सरला कधीच नाही

उधळा कुणी कितीही दिसतेच रास बाकी

 

प्रेमात प्रेमिकांचा असतो रुबाब मोठा

संसार मांडताना होतोच दास बाकी

 

दडवून ठेवलेला गंधाळतोच चाफा

हळव्या मनास त्याचा कळतोच वास बाकी

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सईचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले . पळत लांब निघालेल्या त्या स्त्रीला तिने मनापासून आश्वासन दिलं, आणि त्या क्षणी त्या तान्हुलीची जणू खरीखुरी आई झाली ती.–

हॉर्न वाजला तशी सई भानावर आली. हळूच डोळे पुसत ती सलोनीला अलगद हातात धरून गाडीत बसली. अगदी शांत गाढ झोपलेली त्यांची छकुली—दोघेही एकटक तिच्याकडे पहात राहिले होते काही वेळ, आणि मग निघाले—सलोनीच्या घरी—त्यांचा हा निर्णय सासर -माहेरच्या सगळ्यांनीच मनापासून स्वीकारला होता. त्यामुळे घरी सलोनीचं जोरदार स्वागत झालं.

आणि मग एखादी कळी अलवार उमलावी, तशी सलोनी हळुवार उमलत गेली–आणि हे दोघं तृप्त होत राहिले. घरात कशाचीच वानवा नव्हती. ती अगदी लाडाकोडात वाढत होती. तिला हवं ते शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि आता शिक्षण उत्तमरित्त्या पूर्ण झालं होतं–बघताबघता ती लग्नाला आली होती .

तिला अठरा वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हाच मानसोपचार-तज्ञांच्या सल्ल्याने आणि मदतीने, सई आणि सचिन तिचे खरे आईवडील नसल्याचं तिला योग्यप्रकारे सांगितलं होतं. अशावेळी अशी बहुतेक मुलं, आपण ज्यांना आईवडील म्हणत आलोय, ते आपले खरे जन्मदाते नाहीत, आणि खरे आईवडील कोण हे कुणालाच माहिती नाही, हे पचायला अतिशय अवघड असं कटुसत्य कळल्यावर प्रचंड बिथरतात, विचित्र, बेताल वागायला लागतात हे  डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं–आणि दोघांनाही त्याचंच प्रचंड टेन्शन आलं होतं. सलोनी आपल्याला दुरावणार तर नाही ना, या भीतीने मने धास्तावली होती. पण तिला कधीतरी हे कळणं गरजेचं होतं. आजपर्यंत इतर कुणी भोचकपणाने  तिला हे सांगितलं नव्हतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू होती. सलोनीला सत्य कळताच तीही अपेक्षेप्रमाणेच वागायला लागली होती. ७-८ दिवस त्या दोघांशीही अजिबात बोलली नव्हती. पण डॉक्टरांचं कॉन्सेलिंग प्रभावी ठरलं आणि एक दिवस उठल्याउठल्याच रडत येऊन ती सईच्या गळ्यात पडली. हमसून-हमसून रडली. मग हळूहळू शांत झाली. तिच्या मनावरचं मळभ दूर झाल्याचं जाणवत होतं. — ”आई, मला पटलंय — मला जन्माला कुणीही घातलं असलं तरी माझे खरे आई-बाबा तुम्हीच आहात  आणि तुम्हीच रहाल . तुमचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे मला माहितीये . आणि माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही सोडून दुसरे कोणी माझे आई-बाबा असूच शकत नाहीत.” —आणि सगळ्यांच्याच मनाचा बांध फुटला. त्या क्षणी तिघांमध्येही एक समृद्ध घट्ट नातं नव्याने जन्माला आलं. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तिला आश्रमातून आणतांना झालेला आनंद मोठा, की हा या क्षणाचा आनंद मोठा ,हा प्रश्नच निरर्थक ठरला असता. —-आणि आता बघताबघता सलोनी लग्न करण्याइतकी मोठी झाली होती. तिचा तिनेच जोडीदार निवडला होता—अतिशय डोळसपणे. उत्तम स्थळ होतं . मुलगा अमेरिकेत जॉब करत होता. –आणि लग्न आता अवघ्या चार दिवसांवर आलं होतं .लग्नानंतर अर्थातच ती अमेरिकेला जाणार होती—यापुढे सलोनी दुसऱ्या कुणाचीतरी होणार या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं –आणि आज इतक्या वर्षांनी अचानक तिला ती बाई आठवली— झाडामागे लपून का होईना, स्वतःच्या मुलीला शेवटचं बघण्यासाठी आसुसलेली– इतक्या दुरून तिला आशिर्वाद देणारी–मनावर कायमचा दगड ठेवून तिथून लांब पळत गेलेली—– सईला प्रकर्षाने जाणवलं —–त्या बाईला समाजाने लाथाडलं होतं , आणि आपण अतिशय सन्मानाने जगत आहोत, हा जमीन-अस्मानाचा फरक दोघींमध्ये असला, तरी दोघींमधली आई अगदी एकसारखीच तर आहे—–दोघींच्या भावनाही त्याच–कासाविशी तीच– आणि मुलीच्या विरहाने मनाला होणाऱ्या वेदनाही त्याच——पण कदाचित तिच्या या सगळ्या भावना जरा जास्तच तीव्र होत्या-असतील, कारण ती तर आयुष्यात पुन्हा कधीही तिच्या मुलीला दुरूनही पाहूसुद्धा शकणार नाहीये. पण माझं तसं नाही——सईला प्रकर्षाने जाणवून गेलं ….

समाप्त 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर

श्री मानसिंगराव कुमठेकर

 ☆ विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆ 

२१५ वर्षांपूर्वी झाले मुद्रण,

एकमेव प्रत मिरजेत,

 अमूल्य राष्ट्रीय ठेवा

जगभरात ज्या भगवद्गीतेतील विचारांचा अभ्यास केला जातो, ती भगवद्गीता पहिल्यांदा मिरजेत 1805 साली मुद्रीत झाली. 215 वर्षांपूर्वी देशात मुद्रीत झालेल्या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे. भारतीय मुद्रण कलेचा तो एक अमूल्य ठेवा आहे.

शेकडो वर्षांपासून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने भगवद्गीता हा महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. कुरूक्षेत्रावर  कौरव-पांडवांमध्ये झालेल्या युध्दावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये आहे.  त्यामुळे शेकडो वर्षे भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग बनला आहे.

मुद्रणपूर्व काळात याच्या अनेक हस्तलिखीत प्रती तयार झाल्या.  मात्र, ही गीता सर्वसामान्यांना सहजप्राप्य नव्हती.

पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय राजकर्त्यांच्या आगमनानंतर देशात मुद्रणकलेला प्रारंभ झाला. सुरूवातीला हे मुद्रण मराठी भाषेत पण, रोमन लिपीत असे. 1805 च्या सुमारास बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देशातील पहिले देवनागरी मुद्रण करीत ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिध्द केले. त्यानंतर काही वर्षातच अनेक देवनागरी ग्रंथ मुद्रीत झाले. पण, त्यामध्ये भगवद्गीतेचा समावेश नव्हता.

याच काळात पूणे येथे सवाई माधवरावाच्या दरबारात असणाऱ्या इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने नाना फडणवीसाचे सहकार्य घेऊन देवनागरी छपाईचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, नाना फडणवीसाच्या मृत्यूनंतर तो प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, मॅलेट याने ज्या तांबट करागीराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले होते. त्याला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरून घेतली. आणि तिच्या काही प्रती मुद्रीत करून घेतल्या. त्या ब्राम्हणांना दान देण्यात आल्या. सन 1805 साली मिरजेत भगवद्गीतेचे हे पहिले मुद्रण झाले. तोपर्यंत जगात कुठेही भगवद्गीता छापील स्वरूपात उपलब्ध नव्हती.  त्यामुळे भगवद्गीतेच्या छपाईबरोबरच देवनागरी मुद्रणाचा हा प्रयोग देशाच्या मुद्रण क्षेत्रात क्रांती घडविणारा ठरला.

मिरजेत 215 वर्षांपूर्वी मुद्रीत झालेल्या देशातील या पहिल्या भगवद्गीता ग्रंथाची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंगराव कुमठेकर संग्रहात आहे.  एकूण 166 पृष्ठांच्या या गीतेच्या शेवटी मुद्रणाच्या स्थळ काळाला उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख ‘मार्कंडेय मुनीक्षेत्रे’ असा केला असून ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५  होते. देशातील पहिले देवनागरी मुद्रण असलेली ही प्रत पाहण्यासाठी देश-विदेशातून काही अभ्यासकांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाला भेट देऊन त्याची माहिती घेतली आहे.

215 वर्षांपूर्वी मिरजेत मुद्रीत झालेल्या देशातील पहिल्या भगवद्गीतेची माहिती रोचक आहे. देशात मुद्रीत झालेल्या या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात असून तो अमूल्य असा राष्ट्रीय ठेवा आहे.

 

© मानसिंगराव कुमठेकर, ( मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५)

© श्री मानसिंगराव कुमठेकर

मिरज

मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती..’ म्हणत दोन्ही हातांची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्..’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हातांनी आपण नमस्कार करतो!

‘ओंजळ’ म्हंटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण!

सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्ध्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रिती राहात नव्हती! गंगास्नाना नंतर तो हा दान यज्ञ करीत असे ओंजळीने! त्याची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते  देण्यात व्यस्त असे. त्यामुळे कर्णा कडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवचकुंडले ही अशाच वेळी मिळवली!  ओंजळ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू!

दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्याले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते! तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखे वाटते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दाना साठी हाताचे महत्व आपण सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हातांनी काही देण्यासाठी असते!

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते! सकाळच्या वेळी कोणी जर सुवासिक जाई ,जुई, प्राजक्त ,मोगरा,बकुळी या सारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभार्‍यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हार्‍यात सजलेली पहाताना ते फुलांनी सजलेले रूप पाहून मन भरून येते!

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते! ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते!

भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेलं ओंजळभर पाणी याचे महत्व माणसाला खूपच असते! अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय राहात नाही! जे मिळते ते समाधानाने घ्यावे त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते!

ओंजळ भरुन लाहया जेव्हा पती-पत्नी लाजाहोमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात. जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकांसाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी  घेतात, जणूं आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते!

‘ओंजळभर धान्य’ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे  रूपांतर एका खूप मोठ्या धान्य साठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही पण अशा  असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते.

गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेलेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये, त्यांना फारतर पैसे  देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी! त्या काळी अन्नदानाचे पुण्य  मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण  लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत आहे आणि तिची ओंजळ सतत भरभरून वहात आहे असे असते! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येतं!यावरून सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते! त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की ते चित्र नक्कीच सर्वांच्या स्मरणात असेल!

आपल्या दोन हातांवरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो! जेव्हा हे दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते!

अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडतेय असं मला वाटतंय! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळी ला सतत ओतत रहाण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळी साठी मला वाटतंय!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मी काम करते त्या कॉलेजमधले माझे एक वयस्कर कलीग त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात. बेंगलोरजवळच्या एका खेडेगावी एक प्रसिद्धीपरान्मुख गायक होते. गुरूंवर नितांत श्रद्धा आणि त्यांनी सांगितल्याबरहुकूम सूरसाधना इतकंच त्यांनी आयुष्यभर केलं. ते अविवाहित असल्यानं कधी गावातलेच कुणीतरी त्यांना पोटाला दोन घास घालायचं. त्यांच्याकडं शिकणाऱ्या शिष्यांकडून मिळालेल्या तुटपुंज्या दक्षिणेतून बाहेर काहीतरी किरकोळ खाऊन ते पोट भरायचे. एकूण परिस्थिती अगदी हालाखीचीच होती.

एके ठिकाणी त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. तिथं गेल्यावर कुणीतरी त्यांना काही अनवट राग गायला सांगितले, जे त्या वेळेनुसार गाण्यायोग्य नव्हते. मात्र काहीजणांना ते राग ऐकून शिकायचे होते कारण बाकी कुणाला ते येते नव्हते. मात्र ‘मी रागसमयाचा भंग करून गाणार नाही. तो माझ्या गुरूंचा अवमान होईल’ असं निक्षून सांगत ते बुजूर्ग गायक स्टेजवरून उठू लागले. तेव्हां काही लोकांनी त्यांना ‘जास्त पैसे देऊ, जेवण देऊ’ असं आमीष दाखवलं तर ते गायक म्हणाले कि, ‘टपरीवर दहा पैशात मिळणाऱ्या चहा-सामोशामधे मी खुश आहे. पैशाची हाव धरून मी असलं पापकृत्य कधीच करणार नाही.’

आजच्या काळानुसार ह्या गोष्टीचा विचार करताना असंख्य प्रश्नचिन्हं मनात उभी राहातात. अलीकडे खूपदा ‘प्रत्येक राग हा निश्चित समयीच गायला जावा’ ह्या परंपरागत प्रघाताविषयी  दुमत असणारे विचार ऐकू येतात आणि ‘थोडीफार लिबर्टी/ कॉन्सेप्च्युअल कॉन्सर्ट्स’ वगैरे लेबलखाली बरीच ‘लिबर्टी’ घेतलीही जाते. आजच्या प्रचंड गतिमान जीवनशैलीत फक्त सुट्टीच्या दिवशी लोकांना मैफिलीला जायला थोडासा वेळ असतो. पूर्वीसारखी चार, सहा तासांच्या मैफिलीची आणि मध्यरात्र, पहाट, सकाळ, दुपार अशी कोणत्याही वेळेची चैन आता परवडण्यासारखी नाही. त्यामुळं क्वचित काही अपवाद वगळता ठराविक वेळांमधेच बहुतांशी मैफिलींचं आयोजन होतं. मग साधारणत: फक्त संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळेतलेच राग कलाकाराला गायला/वाजवायला आणि श्रोत्यांना ऐकायला मिळणार का? बाकीचे राग मग कधी गायला/ऐकायला मिळणार? असे प्रश्न निर्माण होतात.

शिवाय दिवसांच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वातावरणात आणि माणसाच्या मनोवस्थेत खरंच काही बदल होतात का? त्यानुसार भावणारे राग वेगळे असण्यात खरंच काही तथ्य आहे का? असे सगळेच प्रश्न आजच्या काळाशी सुसंगत जरूर वाटतात, मात्र त्यामागचं कारण आज निसर्गावर अत्याचार केल्याने त्याच्यासोबतच्या जगण्याला वंचित झालेलं आणि बहुतांशी कालावधीसाठी ‘एअर कंडिशन्ड’ असणारं माणसाचं जगणं आहे हे निश्चित… ‘कंडिशन्ड’ मोडमधे निसर्गचक्रानुसार आपसूक बदलत जाणारे वातावरणातील सांगावे आणि त्यानुसार बदलत जाणाऱ्या जिवंत जाणिवा उमजणार कशा!? असं मनात आल्याशिवाय राहात नाही.

ज्या काळी मानवाचं जगणं हे निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाशीच जोडलं गेलेलं, निसर्गाशी अत्यंत जवळीक साधणारं, निसर्गाचा आदर राखणारं होतं त्या काळात एखादी वट, स्वरधून ही एका विशिष्ट वेळेला जास्त प्रभावी वाटते, काळजात जास्त खोलवर रुतते ह्या मानवाच्याच जाणिवेच्या आधारावर प्रत्येक राग गाण्याची वेळ (रागाचा गानसमय) निश्चित केली गेली. सोप्या भाषेत आपण असं म्हणू कि, ‘निसर्गातील बदलाचा मानवी मनावर होणारा परिणाम आणि नेमका तसाच परिणाम साधणारे/गडद करणारे स्वरसमूह’ ह्या परस्परसंबंधातील सूक्ष्म अभ्यासकांच्या मतानुसार ‘काही ठराविक सुरांचं कॉम्बिनेशन हे अमुक एखाद्या वेळी जास्त परिणामकारक ठरतं’ असा विचार पुढं आला आणि त्यावरून रागसंगीतात ‘समयचक्राचा विचार’ (टाईम थिअरी) हे शास्त्र होऊन गेलं.

आपल्या सर्वांच्याच परिचयाची ‘अष्टौप्रहर’ ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जोडली गेली आहे. ह्याच आठ प्रहरांचा विचार रागसंगीताबाबतही केला गेला आणि त्यातूनच ‘रागसमय’ संकल्पना मांडली गेली. दिवसाचे एकूण चोवीस तास आणि तीन तासांचा एक प्रहर, त्यामुळे अर्थातच एकूण प्रहर आठ झाले. सकाळी ७ ते १०, सकाळी १० ते दुपारी १, दुपारी एक ते दुपारी चार, दुपारी ४ ते संध्याकाळी ७ याप्रकारे दिवसाचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला आणि ह्याच पद्धतीने संध्याकाळी ७ ते रात्री १०, रात्री १० ते मध्यरात्री १, मध्यरात्री १ ते पहाटे ४ आणि पहाटे ४ ते सकाळी ७ याप्रकारे रात्रीचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला.

थोडक्यात दिवसाचे, दिवस आणि रात्र असे दोन भाग केले गेले (जे नैसर्गिकरीत्याच होतात) आणि त्या प्रत्येक भागाचे चार-चार प्रहर! आता ह्या प्रत्येक भागातील चार प्रहरांपैकी चवथा प्रहर हा ‘संधिप्रकाश’ म्हणून ओळखला जातो. संपूर्ण चोवीस तासांत संधिप्रकाश आपण दोनदा अनुभवतो. दिवस संपून रात्र सुरू होताना आणि रात्र संपून दिवस सुरू होताना… पहाट आणि संध्याकाळ! ही वेळा म्हणजे धड दिवसही नाही आणि रात्रही नाही… हा कालावधीत दिवस व रात्रीचा संधी(व्याकरणीय) होतो. त्यामुळे काहीजण ह्यावेळेत गायल्या जाणऱ्या रागांच्या वेळेचा उल्लेख करताना ‘दिवसाचा/रात्रीचा चवथा प्रहर’ असा करतात. मात्र बहुतांशी लोक एखाद्या रागगायनाची वेळ ‘सकाळचा/संध्याकाळचा संधिप्रकाश’ असे सांगतात व ह्या कालावधीत गायल्या जाणाऱ्या रागांचा ‘संधिप्रकाशी राग’ असाही उल्लेख केला जातो.

दुसरं एक मत असं आहे कि, प्रत्येक राग हा विशिष्ट वेळेतच गायला/वाजवला जावा ह्या नियमाला काहीही अर्थ नाही. उत्तमप्रकारे लावलेले सूर हे कोणत्याही वेळी परिणामकारकच असणार. एका जुन्या ग्रंथात असाही उल्लेख आहे कि, पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राजांच्या प्रासादांत प्रत्येक प्रहरी गायनाचा/वाद्ये वाजवण्याचा प्रघात होता. मग ‘आता पुढच्या प्रहरी काय गावे/वाजवावे?’ ह्या सततच्या प्रश्नाचे सोपे उत्तर शोधण्यासाठी चतुर संगीत व्यावसायिकांनी एकेका वेळेला एकेक राग/थाट ठरवला आणि पुढे त्यानुसार ‘रागसमय’ निश्चित करण्याची प्रथा पडत गेली असावी.

ही मी माझ्या वाचनात आलेली गोष्ट सांगितली. मात्र संगीतातील ‘टाईम थिअरी’चा नीट अभ्यास केला तर त्यात एक सुसूत्रता, प्रहरानुसार स्वरसमूहांत कसे बदल होत जातात त्याचे काही विशिष्ट नियम स्पष्टपणे जाणवतात. त्यामुळे ते अभ्यांसांती मांडले गेले आहेत म्हणण्यालाच जास्त वाव आहे. फक्त वरती म्हटल्याप्रमाणे आत्ताच्या काळातलं जीवनमान पाहाता समय-मनोवस्था-सूर ह्यातला सूक्ष्म संबंध जाणवण्याइतके भाग्यवान आपण नाही. निसर्गावर कुरघोडी करताकरता आपण आपल्याच जाणिवा हरवून बसल्याचं हे मोठं उदाहरण आहे.

पंडिता किशोरीताई अमोणकरांसारख्या खऱ्या अर्थाने ‘जिनिअस’ व्यक्तीने एका मुलाखतीत म्हटल्याचं आठवतं कि, ‘भरतमुनींनी जे काही लिहिलं असेल ते सहज मनाला आलं म्हणून नक्कीच लिहिलं नसेल. त्यामागं कित्येक प्रयोग, केवढा अभ्यास केला गेला असेल. त्यामुळं मी ते मत मानते. सगळ्यांनीच ते मानावं असंही नाही. मात्र मानायचं नसेल तर ते मत चूक आहे हे कोणत्यातरी ‘कॉंक्रिट’ गोष्टीच्या आधारे अभ्यासांती आधी सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. तरच मग ते डावलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.’ किशोरीताईंचा असल्याने हा विचार निश्चितच महत्वाचा, अनमोल आणि आपल्या विचारांना चालना देणारा आहे.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ सब पर भारी – अटलबिहारी… ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि  ☆ सब पर भारी-अटलबिहारी… ☆

कल भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी की जयंती थी। उनके स्मरण में मैंने अटल जी को सम्बोधित अपनी एक रचना की कुछ पंक्तियाँ साझा की थीं। इसके बाद अनेक मित्रों ने पूरी रचना पढ़ने की इच्छा ज़ाहिर की। मित्रों के अनुरोध को मान देते हुए यह रचना प्रस्तुत है।

संदर्भ के लिए पाठकों को स्मरण होगा कि 21 फरवरी 1999 को भारत के प्रधानमंत्री के रूप में वाजपेयी जी ने बस से लाहौर की यात्रा कर इतिहास रच दिया था। इस दौरान येन केन प्रकारेण चर्चा में आने की ओछी मानसिकता के चलते अतिया शमशाद नामक पाकिस्तानी लेखिका ने कश्मीर की एवज में अटलजी से विवाह का प्रस्ताव किया था। उक्त प्रस्ताव के संदर्भ में उन दिनों उपजी और चर्चित रही रचना साझा कर रहा हूँ।

लगभग 22 वर्ष पूर्व लिखी यह रचना ‘चेहरे’ कविता संग्रह में संग्रहित है।

सब पर भारी-अटलबिहारी… ✍️

बरसों का तप

दर्शकों के सिद्धांत भी टल गये,

पाकिस्तानी बाला के

विवाह प्रस्ताव से

अटलजी भी हिल गए।

 

जीवन की संध्या में

ऐसा प्रस्ताव मिलना

नहीं किसी अलौकिक प्रकार से कम है,

लेकिन अटल जी का व्यक्तित्व

क्या किसी चमत्कार से कम है ?

 

सोचा, प्रस्ताव पर

ग़ौर कर लेने में क्या हर्ज है?

साझा संस्कृति में

बड़प्पन दिखाना ही तो फर्ज़ है।

 

कवि मन की संवेदनशील आतुरता,

राजनेता की टोह लेती सतर्कता

प्रस्ताव को पढ़ने लगी-

 

आप कुँवारे-मैं कुँवारी

आप कवि, मैं कलमनवीस

आप हिन्दुस्तानी,

मैं पाकिस्तानी

क्यों न हम एक दिल हो जाएँ

बशर्त सूबा-ए-कश्मीर हमें मिल जाए!

उत्साह ठंडा हो गया

भावनाएँ छिटक कर दूर गिरीं

सारी उमंग चकनाचूर हुई अनुभव को षड्यंत्र की बू हुई।

 

माना कि ज़माना बदल गया है

दहेज का चलन दोनों ओर चल गया है,

पहले केवल लड़के वाले मांगा करते थे

अब लड़की वाले भी मांग रख पाते हैं,

पर यह क्या; रिश्ते की आड़ में

आप तो मोहब्बत को ही छलना चाहते हैं!

 

और मांगा भी तो क्या

कश्मीर…..?

वह भी अटल जी से…..?

 

शरीर से आत्मा मांगते हो

पुरोधा से आत्मबल मांगते हो,

बदन से जान चाहते हो

अटल के हिंदुस्तान की आन चाहते हो?

 

मोहतरमा!

इस शख्सियत को समझी नहीं

चकरा गई हैं आप,

कौवों की राजनीति में

राजहंस से टकरा गयी हैं आप।

 

दिल कितना बड़ा है

जज़्बात कितने गहरे हैं

इसे समझो,

सीमाओं को तोड़ते

दिलों को जोड़ते

ज्यों सरहद की बस चलती है,

नफरत की हर आंधी

जिसके आवेग से टलती है,

मोहब्बत की हवाएँ

जिसका दम भरती हैं,

पूछो अपने आप से

क्या तुम्हारे दिलों पर

अटल की हुकूमत नहीं चलती है?

 

युग को शांति का

शक्तिशाली योद्धा मिला है,

इस योद्धा के सम्मान में गीत गाओ,

नफरत और जंग की सड़क पर

हिन्दुस्तानी मोहब्बत और

अमन की बस आती है,

इस बस में चढ़ जाओ।

 

बहुत हुआ

अब तो मन की कालिख धो लो,

शांति और खुशहाली के सफर में

इस मसीहा के संग हो लो।

 

काश! शादी करके यहाँ बसने का

आपका खयाल चल पाता,

हमें तो डर था

कहीं घरजवाई होने का

प्रस्ताव न मिल जाता।

 

प्रस्ताव मिल जाता तो

हमारा तो सब कुछ चला जाता

पर चलो तुम्हारा

तो कल सुधर जाता

यहाँ का अटल

वहाँ भी बड़ी शान से चल जाता।

 

सारी दुनिया आज दुखियारी है

हर नगरी अंधियारी है,

अंधेरे मे चिंगारी है

सब पर जो भारी है

हमें दुख है, हमारे पास

केवल एक अटलबिहारी है।

 

वैसे भी तुम्हारे हाल तो खस्ता हैं

ऐसे में अटलजी से

रिश्ता जोड़ने का खयाल अच्छा है।

 

वाजपेयी जी!

सौगंध है आपको,

हमें छोड़ मत जाना

क्योंकि अगर आप चले जाएँगे,

तो-

वेश्या-सी राजनीति

गिद्धों-से राजनेताओं

और अमावस-सी अंधेरी व्यवस्था में

दीप जलाने, राह दिखाने

दूसरा अटल कहाँ से लायेंगे ?

 

©  संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

मोबाइल– 9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ प्याला बदल यार….. ☆ श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन

श्री अजीत सिंह

 

(हमारे आग्रह पर श्री अजीत सिंह जी (पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन) हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए विचारणीय आलेख, वार्ताएं, संस्मरण साझा करते हैं।  इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। आज प्रस्तुत है 90 के दशक में श्रीनगर आल इण्डिया रेडिओ / दूरदर्शन केंद्र में आपके द्वारा दी गई सेवाओं के दौरान एक अविस्मरणीय संस्मरण  ‘प्याला बदल यार…..’। हम आपसे उनकी अनुभवी कलम से ऐसे ही आलेख समय समय पर साझा करते रहेंगे।)

☆ संस्मरण  ☆ प्याला बदल यार….. ☆ 

वे बड़े सीनियर अफसर रहे आकाशवाणी में 90 के दशक में और बिगड़ते हालात को संभालने के लिए अक्सर श्रीनगर आते थे जहां दशक के शुरू में ही आतंकवादी घटनाएं शुरू हो गईं थीं। आकाशवाणी व दूरदर्शन भी इनसे बच न सके। दूरदर्शन के डायरेक्टर स्व लासा कौल जी की आतंकवादियों द्वारा हत्या के बाद श्रीनगर से रेडियो के बुलेटिन दिल्ली शिफ्ट कर दिए गए और दूरदर्शन के बुलेटिन जम्मू से चालू किए गए।

श्री बी जी वर्गीज की अध्यक्षता में मीडिया की कारवाही का जायज़ा लेने के बाद प्रेस काउंसिल की टीम ने सिफारिश की थी कि रेडियो व दूरदर्शन के बुलेटिन वापिस श्रीनगर से शुरू किए जाएं। मई जून 1993 में पहले रेडियो और बाद में दूरदर्शन के बुलेटिन श्रीनगर से शुरू हो गए। काम मुश्किल हालात में चल रहा था। उसी साल दो अक्टूबर को रेडियो के एक कैजुअल न्यूजरीडर की हत्या कर दी गई। इससे पहले तब रेडियो के असिस्टेंट डायरेक्टर ग़ुलाम हसन ज़िया का अपहरण हुआ जिन्हें तीन महीने बाद आतंकवादियों ने छोड़ा। एक और असिस्टेंट डायरेक्टर सलामुद्दीन बजाड़ को टांग में गोली मारकर बुरी तरह घायल कर दिया और वे आज भी लंगड़ाकर चलते हैं। एक कैजुअल अनाउंसर क्रॉस फायरिंग में मारे गए। दूरदर्शन के स्टेशन इंजिनियर एस पी सिंह उस समय मारे गए जब जेहलम पार से फायर किया गया एक रॉकेट उनके कमरे की टिन की छत को चीरता हुआ उन पर आन गिरा।

यह मुसीबतों की लंबी लिस्ट है। ऐसी घटना जब भी होती तो स्टाफ का हौसला गिर जाता। वे आतंकित हो उठते। कोई वहां रहना नहीं चाहता था। सब बाहर ट्रांसफर चाहते थे। सुरक्षा के घेरे में रहना यूं तो सभी के लिए, पर न्यूज स्टाफ के लिए खासकर, एक अजीब ही तनाव पैदा कर देता था। श्रीनगर पोस्टिंग के कारण जम्मू में रह रहे परिवार को हमेशा हमारी सुरक्षा की चिंता लगी रहती थी। जब भी कोई बड़ी घटना होती तो मैं दिल्ली न्यूजरूम को खबर फाइल करने के तुरंत बाद घर फोन करके अपनी सुरक्षा के प्रति उन्हे तसल्ली देता था।

श्रीनगर में स्टाफ का मनोबल बढ़ाने डायरेक्टरेट और मिनिस्ट्री से सीनियर अधिकारी आते रहते थे। अक्सर अधिकारी मुझसे स्थिति की ब्रीफिंग सी लेते थे।

यह ब्रीफिंग प्राय: सरकारी गेस्ट हाउस में शाम के वक्त ड्रिंक्स व डिनर पर होती।

ऐसे ही एक दौरे में एक बड़े सीनियर अधिकारी मुझसे अनौपचारिक बात कर रहे थे। मैं अपनी मुसीबतों की बात कहना चाहता था कि मुझे कई साल श्रीनगर में हो गए हैं, अब मेरा दिल्ली ट्रांसफर कर दिया जाए। वे मुझे कहते कोई श्रीनगर आने को तैयार नहीं है, आप कुछ और समय निकालो। मेरे काम की तारीफ करके भी वे मुझे फुसलाते से लगे कि यहीं ठहरो।

बातों और ड्रिंक्स का यह सिलसिला चल ही रहा था कि इन अधिकारी महोदय ने ड्रिंक्स का अपना गिलास मुझे पीने के लिए दे दिया और मेरा गिलास आप ले लेकर कहा चीयर्स। गिलास टकरा कर हम भी पी गए और वो भी। थोड़ी देर बाद अधिकारी बोले, “मैं हमेशा आपके साथ रहूंगा, तुम भी हमेशा मेरे साथ रहना। हमने एक गिलास से ड्रिंक ली है। इसलिए एक बात रखेंगे। दोनों मिलकर श्रीनगर रेडियो स्टेशन चलाएंगे”। मैंने भी कह दिया ज़रूर सर, हालांकि यह सब मुझे कुछ अटपटा सा भी लग रहा था।

कहीं यह भी ख्याल आ रहा था कि साहिब ज़्यादा पी गया है।

मैं टूरिस्ट रिसेप्शन सेंटर के अपने कमरे में आकर सो गया। सुबह उठा तो रात की बात फिर याद आ गई। अधिकारी महोदय ने यह गिलास बदलने वाली बात क्यों की? अचानक खयाल आया कि यह पुराने ज़माने का पगड़ी बदल यार बनाने वाला किस्सा तो नहीं है? क्या हम प्याला बदल यार बन गए थे?

पता नहीं, पर उसके बाद मैंने अपने ट्रांसफर की बात कई साल तक नहीं उठाई। उन अधिकारी से बाद में कभी कोई बात भी नहीं हुई पर अक्सर ख्याल आता था कि श्रीनगर में आखिर किसी को तो आकाशवाणी के संवाददाता का काम करना था। फिर मैं क्यों नहीं?

शुक्रिया मेरे प्याला बदल यार, शशिकांत कपूर। आपने मुझे कठिन समय सम्बल दिया।

©  श्री अजीत सिंह

पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन

संपर्क: 9466647037

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 21 ☆ आदमी आदमी को करे प्यार जो ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  की  संस्कारधानी जबलपुर शहर पर आधारित एक भावप्रवण कविता  “आदमी आदमी को करे प्यार जो“।  हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।  ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 21 ☆

☆  आदमी आदमी को करे प्यार जो 

 

आदमी आदमी को करे प्यार जो, तो धरा स्वर्ग हो मनुज भगवान हो

घुल रहा पर हवा में जहर इस तरह , भूल बैठा मनुज धर्म ईमान को

राह पर चल सके विश्व यह इसलिये , दृष्टि को दीौप्ति दो प्रीति को प्राण दो

 

रोज दुनियां बदलती चली जा रही,  और बदलता चला जा रहा आदमी

आदमी तो बढ़े जा रहे सब तरफ , किन्तु होती चली आदमियत कीकमी

आदमी आदमी बन सके इसलिये , ज्ञान के दीप को नेह का दान दो

 

हर जगह भर रही गंध बारूद की , नाच हिंसा का चलता खुला हर गली

देती बढ़ती सुनाई बमो की धमक , सीधी दुनियां बिगड़ हो रही मनचली

द्वार विश्वास के खुल सकें इसलिये , मन को सद्भाव दो सच की पहचान दो

 

फैलती दिख रही नई चमक और दमक , फूटती सी दिखती सुनहरी किरण

बढ़ रहा साथ ही किंतु भटकाव भी ,  प्रदूषण घुटन से भरा सारा वातावरण

जिन्दगी जिन्दगी जी सके इसलिये स्वार्थ को त्याग दो नीति को मान दो

 

प्यास इतनी बढ़ी है अचानक कि सब चाहते सारी गंगा पे अधिकार हो

भूख ऐसी कि मन चाहता है यही हिमालय से बड़ा खुद का भण्डार हो

जी सकें साथ हिल मिल सभी इसलिये मन को संतोष दो त्रस्त हो त्राण दो

 

देश है ये महावीर का बुद्ध का,  त्याग तप का जहां पै रहा मान है

बाह्य भौतिक सुखो से अधिक आंतरिक शांति आनंद का नित रहा ध्यान है

रह सकें चैन से सब सदा इसलिये त्याग अभिमान दो त्याग अज्ञान दो

 

आदमी के ही हाथों में दुनियां है ये आदमी के ही हाथो में है उसका कल

जैसा चाहे बने औ बनाये इसे स्वर्ग सा सुख सदन या नरक सा विकल

आने वालो और कल की खुशी के लिये युग को मुस्कान का मधुर वरदान दो

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी , रामपुर , जबलपुर

vivek1959@yahoo.co.in

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -2 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।

ई-अभिव्यक्ति (मराठी) में आपकी कविता स्पंदन शीर्षक से प्रकाशित की गई थी जिसे पाठकों का भरपूर प्रतिसाद मिला। आपके जीवन पर आधारित साप्ताहिक स्तम्भ “माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे” (“मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”) का ई-अभिव्यक्ति (मराठी) में सतत प्रकाशन हो रहा है। इस अविस्मरणीय एवं प्रेरणास्पद कार्य हेतु आदरणीया सौ. अंजली दिलीप गोखले जी का साधुवाद जो सुश्री शिल्पा जी की वाणी को मराठी में लिपिबद्ध कर रहीं हैं और उसका  हिंदी भावानुवाद “मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ”, सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी जी कर रहीं हैं। इस श्रंखला को आप प्रत्येक शनिवार पढ़ सकेंगे। )  

☆ जीवन यात्रा ☆ मेरी यात्रा…. मैं अब भी लड़ रही हूँ – भाग -2 – सुश्री शिल्पा मैंदर्गी  ☆ प्रस्तुति – सौ. विद्या श्रीनिवास बेल्लारी☆ 

माँ और पिताजी को तूफानी संकटों का सामना करना पडेगा। इसका मुझे पूरा पता चल गया था। उन्होने संकटों को पूरी तरह से समझ लिया था। मेंरे सामने उन तूफानी संकटों के बारे में कुछ भी, कोई भी चर्चा नहीं  करते थे। मेंरे भाई बहन के समान ही मुझे समझते थे।

पाठशाला में भी रहन सहन बातें करने में बहुत ही मर्यादा का पालन करना पडता था। पाठशाला में जब मैं जाती थी बहुत छोटी थी। ऐसा आज मैं बता सकती हूँ। इतनी समझ उस वक्त मुझे नहीं  आई थी। यह सब कमियाँ लिख नहीं सकती। सहेलियों को मैं नहीं  देख सकती थी। उनका मुँह देख नहीं  सकती थी, टीचर को भी नहीं  देख सकती थी। ग्राउंड पर भी नहीं  जा सकती थी। मालूम नहीं होता था सुंदर कलाकृति का डिझाईन उसका रंग भी कभी नहीं  देख सकती थी। बहुत सी मर्यादाओं का सामना करना पडता था। इतना सब होते हुए भी मेंरे पिताजी ने पाठशाला में भाषण करने के लिए वक्तृत्व स्पर्धा में भाग लेने की मुझे सलाह दी। बहुत सी स्पर्धाओं में मैंने बक्षीस लिया| मेंरे गाल खिल जाते थे | चेहरे पर बहुत बडी मुस्कान आती थी। यह खुशियाँ मुझे बहुत दूर तक ले गई थी। पापा के चेहरे पर चांद की मुस्कान आती है, हम खुशी मनाते थे , फिर भी पापा ने बताया था की कौन सी भी स्पर्धा में हार जीत तो होगी ही, बक्षीस के लिए अगर तुम पात्र नहीं होती तो भी रोना धोना नहीं करना, नाराज नहीं  होना| मेंरे व्यक्तित्व की खाली जगह वक्तृत्व ने भर दी। आज भी मुझे नया सुनने का, ध्यान में रखने का, लोगों के सामने सादर करने का बहुत शौक है।

साधारण तौर पर मैं तीसरी चौथी कक्षा में थी पापा के प्रोजेक्ट और स्लाईडस बक्षीस के तौर पर मिले थे| उस वक्त मुझे थोडा धुंधला सा दिखाई देता था। पर्दे के उपर की आकृती, थोडे थोडे रंग, मेंरे मन पर अच्छी तरह से उमड़ते थे। भारत में अनेकानेक नृत्य प्रकार की पहचान थी| वहीं नृत्यांगना अच्छे-अच्छे पहनावे, सुंदर सुंदर अलंकार, लाल लाल रंग के हाथ, सभी मेंरे आखो के सामने और मन के सामने अच्छी तरह से दिखाई देते थे। यह सभी नृत्य देख देख कर गानों की धुन सुनकर अपने आप ही नृत्य करने लगी| खुद ही गुलमोहर के फूल जैसी सुंदर मुझे ही मैं देखती थी। मिरज शहर की सुप्रसिद्ध विद्या गद्रे की कन्या प्रतिमा मुझे मिली| उसने मुझे गाने की धुन सुनकर नृत्य सिखाया| कठपुतली का नृत्य प्रतिमा ने मुझसे करवा लिया। सौभाग्य से ये नृत्य मुझे पाठशाला के स्टेज पर करने को मिला और सबको बहुत अच्छा लगा। लोगों ने तालियाँ बजा बजा कर मुझे प्रोत्साहन दिया| फिर भी उस वक्त मेंरे पापा ने बहुत गुस्सा किया क्योंकि नाचने से पहले उन्होने मेंरी पहचान नृत्यांगना शिल्पा कहकर कर दी थी। मुझे बिल्कुल अच्छा नहीं लगा| मैंने दो तीन दिन तक पापा के साथ बोलना छोड दिया था। उनको सब बातों को पता चला। पापा के साथ बाते भी नहीं  की,  उनको इन  बातों का बाद में पता चला|

कहने की बात यह है कि, मुझे किस बात का डर नहीं लगता था| यह सब पापा को बाद में समझ आया| घर में भाई बहन जैसे करते थे, वैसा करना|  यह मैंने तय किया था| मुझे जो करना है वह मैं करके ही रहती थी| मेंरा हठ था,  मैंने भगवान के सामने में दिया जलाया था| सब हाथ से समझकर| मेंरे चाचा मेंरा ये दिया जलाना कैसा किया देख रहे थे| घर में मॅगी बनाकर करने का मैंने तो तय किया था| मुझे खुशी भी लगती थी| एक बार माँ घर में नहीं  थी| तब मैंने एक बर्तन में पानी लेकर के गॅस पर उबालने के लिए रख दिया| मॅगी का पॅकेट फोडा| तुरंत माँ आ गई| मुझे बहुत पीटा और खुद रोने लगी, प्यार के ही कारण|

मेरी किताबे, मेरा कंपास, सब जगह पर रखने की मेरी आदत थी| मेंरे भाई और बहन को ये सब मालूम था| उनका कुछ भी सामान नहीं मिला तो चुपके से मेरे कंपास से लेकर जाते थे| मेरे ध्यान में आने के बाद मैं गुस्सा करूंगी, ये समझकर मैं डटूँगी, ये सब मस्ती में ही चलता था|

सांगली शहर के गांधी लायब्ररी की वक्तृत्व स्पर्धा मुझे अभी भी याद है| पाँचवी दसवी कक्षा तक प्रतिवर्ष मैं स्पर्धा की सदस्य रहती थी| लगभग पचास-सत्तर लडके लड़कियां स्पर्धा में भाग लेते थे| दसवी कक्षा तक मुझे नंबर नहीं मिला| फिर भी मेंरा भाषण इतना सुंदर हुआ कि परीक्षकों को मुझे नंबर देना पडा, ऐसा तो नहीं, उन्हे मेंरी आवाज, मेंरे शब्द बहुत अच्छे लगे|

पाठशाला से ही मुझे राईटर लेकर परीक्षा देने की आदत लग गई| दसवी कक्षा में वनिता वडेर, मेंरी प्यारी सहेली बन गई| पढाई में तो मुझे बहुत बहुत मदद करती थी| मुझे सब पढा कर दिखाती थी मैं सभी को ध्यान में रखती थी| अस्सी पर्सेंट मार्क्स मिल गये| वनिता को गणित में मुझसे सात मार्क्स जादा थे|

ग्यारवी कक्षा में मैंने कन्या महाविद्यालय में प्रवेश लिया| सच तो मेंरे लिये आर्ट साइड ही ठीक थी| मैंने बहुत स्पर्धाओं में भाग लिया था| सभी अध्यापकों की भी लाडली थी| सभी सहेलिया मुझे बहुत बहुत मदद करती थी| एक दिन कॉलेज को जाते वक्त मुस्लिम सहेली ने अपने ड्रेस की ओढणी मेंरे माथे पर डालने के लिए दे दी| कितना प्यारा लगा था,  उसमें मुझे यही मानवता दिखाई दी|

उस दिन से मुझे पता चला, मीठी मीठी बातें करने से समाज के सब लोग आप की मदद करते हैं| मुझे भी माँ के काम में मदद करने की खूब इच्छा थी| जैसे सब्जी काटना, रोटी बनाना, मेंरा ऐसा काम देख कर पड़ोसियों का दृष्टिकोण बदल गया| मुझे काम करते हुए देखकर आश्चर्य से देखने लगे| हमें खुद को चुंबकीय शक्ति निर्माण करनी चाहिये| ऐसा ही मैंने तय कर लिया, कॉलेज में मैंने जो अच्छी बातें और विचार हैं, मन में लिख कर रखे थे| सब पीरियड्स का मैं लाभ उठाती थी| अध्यापक मुझ पर ध्यान रखते थे| लोगों, अध्यापकों, सहेलियों और माता पिता जी के अच्छे विचार सुनकर मेंरा हर दिन, हर पल, बहुत अच्छा चल रहा है| आगे भी मैं चलूंगी अच्छी तरह| यही मेरी उम्मीद है| मयूरी जैसी नाचूंगी, गाऊंगी, हसूंगी| बड़ी बनकर अच्छा काम करूंगी| अपना नाम जग में फैलाऊंगी|

प्रस्तुति – सौ विद्या श्रीनिवास बेल्लारी, पुणे 

मो ७०२८०२००३१

संपर्क – सुश्री शिल्पा मैंदर्गी,  दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य ☆ कविता ☆ पापा… ☆ डॉ श्रीमती मिली भाटिया

डॉ मिली भाटिया 

डॉक्टर मिली के प्रेरणास्रोत उनके पापा श्री दिलीप भाटिया  हैं ! डॉक्टर मिली कहती हैं, उनकी मम्मी  श्यामा भाटिया ईश्वर के घर से उनको आशीर्वाद देकर उनकी उपलब्धि से ख़ुश होंगी। आज प्रस्तुत है श्री दिलीप भाटिया जी, सेवानिवृत्त परमाणु वैज्ञानिक के 73 वे  जन्मदिवस पर उनकी पुत्री डॉ मिली भाटिया जी द्वारा रचित भावप्रवण कविता। कृपया शब्दशिल्प नहीं भावनाओं को आत्मसात करें।

☆ कविता ☆ पापा… ☆ डॉ श्रीमती मिली भाटिया ☆ 

पापा…

पापा शब्द में दुनिया बसती है मेरी

पापा से ही पीहर मेरा,

पापा से ही मायका

पापा ही भाई का रूप

पापा ही मेरे बचपन से दोस्त

पापा मेरे गुरु

पापा मेरे सरल

पापा मेरे अटल

पापा मेरी छाँव

पापा मेरी शान

पापा मेरे ईश्वर “राम” जैसे

पापा हैं  श्रवणकुमार

पापा को हमेशा चुप रहते देखा

आँसू छुपाकर जीते देखा

बच्चों में ख़ुशियाँ तलाशते देखा

दादी की जी-जान से सेवा करते देखा

मम्मी का हमेशा साथ देते देखा

सरल सादा जीवन जीते देखा

सबकी सेवा तन-मन-धन से करते देखा

उनकी मुस्कुराहट के पीछे दर्द को

शायद किसी ने नहीं देखा

मेरे लिए “माँ” बनकर जीते

मेरी ज़िद्द पूरी करते

मेरी बेटी को बेस्टफ़्रेंड कहते

अब्दुल कलाम जी से सम्मानित

रक्तदान का रिकार्ड बनाते

सबसे अच्छे मेरे पापा

जन्मदिन मुबारक पापा!!

 

डॉक्टर मिली भाटिया

रावतभाटा – राजस्थान

मोबाइल न०-9414940513

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares