सूचना/Information ☆ कविराज विजय यशवंत सातपुते – ऑनलाईन प्राप्त केलेले 1857 सन्मान- ऐतिहासिकआकडा – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

(कविराज विजय यशवंत सातपुते)

☆ कविराज विजय यशवंत सातपुते – ऑनलाईन प्राप्त केलेले 1857 सन्मान – ऐतिहासिकआकडा ☆ अभिनंदन

ऑनलाईन प्रमाणपत्र पदतालिका

कालावधी  5/5/2018  ते  11/12/2020

एकूण  =  1857

ऑनलाईन प्राप्त केलेले 1857 सन्मान त्यांचा ऐतिहासिकआकडा, मनाला आनंद देऊन गेला. आजवरचा प्रवास समाधान कारक ठरला.

सर्वोत्कृष्ट क्रमांक

प्रमाणपत्र (उत्कृष्ट  क्रमांक)                :-  95

प्रमाणपत्र (प्रथम  क्रमांक)                   :-  121

प्रमाणपत्र (द्वितीय क्रमांक)                  :-   111

प्रमाणपत्र (ततीय क्रमांक)                   :-   221

प्रमाणपत्र (उत्तेजनार्थ क्रमांक)             :-   314

प्रमाणपत्र (लक्षवेधीक्रमांक*)               :-   312

प्रमाणपत्र (सहभाग)                            :-   73

प्रमाणपत्र (सर्वोत्तम परिक्षक)               :-   514

प्रमाणपत्र                                             :-   96

                                                          1857

वाॅटस्अप वरील विविध समुहातील,  कार्यप्रवण, स्नेहशील, सर्व संयोजकांचे, आयोजकांचे,परिक्षकांचे,  ग्राफिक्स तंत्रज्ञांचे  मनापासून आभार. आपल्या परिश्रम पूर्वक राबवलेल्या  उपक्रमामुळे आमचा हात लिहिता राहतो  आहे.  काव्य कलेचा व्यासंग वाढतो आहे. ही बाब मला  अतिशय गौरवास्पद  आणि अभिमानास्पद वाटते. स्पर्धा घेताना त्यातही नाविन्य शोधण्याचा  आपला प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. विषयनिष्ठ  उपक्रमात त्या विषयाचे सर्वांगीण  आकलन होते. मान्यवरांचे मार्गदर्शन लाभते. प्रोत्साहन मिळते , ही बाब  अभिनंदनीय आहे. सर्वांना पुनश्च धन्यवाद. काही ठिकाणी,  समुह प्रशासक, परिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रशासक म्हणून काव्यस्पंदन समुहात जबाबदारी स्वीकारली.

वीस मे दोन हजार वीस पासुन शब्दसेतू वाॅटस अप समुहातून साहित्य सेवा सुरू केली आहे. दोनशे छपन्न सदस्य  सातत्याने या समुहात आपले योगदान देत आहेत. वाचक आणि लेखकांचा हा परीवार आहे. या परीवारात महास्पर्धा, झटपट चारोळी स्पर्धा, दैनंदिन लेखन योगदान, साप्ताहिक उपक्रम, रविवारीय साहित्य स्पर्धा, गणेशोत्सव महास्पर्धा, विशेष स्पर्धा असे स्पर्धात्मक आणि व्यासंग वाढविणारे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. शब्दसेतू साहित्य साधक, शब्दसेतू साहित्य सम्राट, सम्राज्ञी, शब्दसेतू साहित्य प्रणेता, प्रणेती, असे पुरस्कार  सातत्याने दिले गेलें आहेत. याशिवाय दैनंदिन लेखन योगदान करणा-या साधकांना रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी, हीरक महोत्सवी, शतक महोत्सवी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कविता, लेख, कथा आदी साहित्याचा व्यासंग शब्दसेतू परीवार जोपासत आहे.

5/5 2018 ते 7/12/2020 या   तीस  महिन्यांत मिळालेले  यश माझ्या साठी  अनमोल  आहे.  या ही अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्य स्तरीय, शासकीय, निमशासकीय सन्मान मिळाले आहेत.नियत कालिकातून लेखन चालू आहे . वाॅटस्अप माध्यमातून ऑनलाईन स्पर्धेतून मिळालेले यश, प्रसिद्धी,अवर्णनीय आहे. अविस्मरणीय आहे. पुनश्च एकदा सर्वांचे  मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. ??✒

स्वल्प परिचय.

  • कवी, लेखक, निवेदक, संपादक, वृत्तपत्र स्तंभलेखक, प्रवासी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक  म्हणून कार्यरत.
  • अक्षरलेणीकार,  प्रस्तावनाकार,  सन्मानपत्र लेखक म्हणून विशेष प्रसिद्धी.
  • अक्षरलेणी कविता संग्रहास साहित्य संस्कृती मंडळाचे  अनुदान प्राप्त.
  • द्वितीय  आवृत्तीस राज्यस्तरीय महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त.
  • 1992 मध्ये राज्य स्तरावरील काव्य स्पर्धेत ‘मोरपीस’
  • या कवितेला प्रथम पारितोषिक व कै. वसंत बापट यांच्या हस्ते ‘कविराज’ ही पदवी बहाल.
  • 1988 पासून  सातत्याने काव्य लेखन. सादरीकरण आणि काव्य परीक्षण
  • दैनिक सकाळ कडून ‘खरा पुणेकर ‘ किताब बहाल. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, देऊन शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार.
  • पुण्याच्या वैभवात भर घालणारी व्यक्ती, व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती म्हणून महापौर पुणे यांच्या हस्ते 2014, 2015, 2016, सलग तीन वर्षे सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार.
  • अनेक कविता संग्रह, कथा संग्रह यांत प्रस्तावना लेखन.
  • झरा खळाळे जीवंत, काव्यशिल्प ,  यासह अनेक प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे संपादन.
  • अनेक राज्यस्तरीय कविता स्पर्धांचे, कविसंमेलनाचे, आयोजन, नियोजन,  परिक्षण केले आहे.
  • शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर वैयक्तिक व सामुहिक. कवितांचे सादरीकरण.
  • दैनिक म. टा. ,लोकमत, सकाळ, प्रभात कडून विविध पुरस्कारांनी सन्मानित. अनेक दैनिकातून प्रासंगिक लेखन आणि स्तंभ लेखन केले आहे…!
  • अनेक राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय  पुरस्कारांनी सन्मानित.
  • विविध पारितोषिके प्राप्त.
  • अनेक  संस्थामधे विविध पदांवर कार्यरत.
  • कवितेविषयक,साहित्यविषयक, प्रत्येक उपक्रमात सहभागी. विविध मासिके, नियत कालिके दिवाळी अंकातून  लेख,कथा, कविता, गझल, लेखन प्रकाशित.
  • अखिल भारतीय साहित्य संमेलनात दरवर्षी सहभाग.
  • कलर टिव्ही वरील ‘काॅमेडीची बुलेट ट्रेन ‘या कार्यक्रमात प्रेक्षक परिक्षक म्हणून सहभाग.
  • दूरदर्शन वरील  अनेक चॅनेल वरून, आकाशवाणी वरून  काव्य सादरीकरण, काव्य वाचन झाले आहे.
  • वाचन, लेखन, प्रवास, हे विशेष छंद.
  • अनेक कथा संग्रह, कादंबरी,  चारोळी संग्रह, कविता संग्रहाला प्रस्तावना दिल्या आहेत.
  • साडेतीनशेहून अधिक मानपत्रांचे लेखन केले आहे.
  • केली दहा वर्षे सातत्याने  अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवीकट्टा कवीसंमेलनात निवड झाली आहे.
  • अनेक ठिकाणी कविता सादरीकरणाचे वैयक्तिक, सांघिक,  कार्यक्रम सादर केले आहेत.
  • अनेक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी  आयोजन सातत्याने गेली तीस वर्षे करीत आहे.  महाराष्टातील बावीस संस्थामधे विविध पदांवर कार्यरत आहे.
  • प्रकाश पर्व हा तिसरा कविता संग्रह प्रकाशित. प्रकाशक :-सूर्यगंध प्रकाशन,  तळेगाव.
  • अनेक प्रातिनिधिक कविता  संग्रहात कविता सहभाग.
  • महाराष्ट्र भूषण  अष्टपैलू कार्यगौरव पुरस्कार 2019 प्राप्त. हस्ते डाॅ. श्रीपाल सबनीस.
  • दिनांक.  2/2/2020 रोजी समर्थ प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र  आयकॉन  या राज्य स्तरीय पुरस्काराने पुरस्कृत.
  • पुण्यातील अनेक साहित्यिक, सामाजिक संस्था मध्ये विविध पदांवर कार्य रत.. अनेक कार्यक्रमांचे आयोजन, संयोजन आणि निवेदन करत आहे.
  • शब्दसेतू साहित्य मंच पुणेया वाॅटस अप समुहाचा  संस्थापक  अध्यक्ष.*
  • कोविड योद्धा  म्हणून समाजात सध्या कार्यरत आहे.
  • पोएट ऑफ दि इयर 2020 हा सन्मान प्राप्त. साहित्य गौरव संमेलनात  18/10/2020 रोजी ऑनलाईन प्रदान करण्यात आला
  • कादवा शिवार  प्रतिष्ठान नाशिक , गझल लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त.
  • साहित्य सेवा संघ भोर राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त.
  • माझी लेखणी  या समूहात सप्टेंबर  महिन्यात महाउपक्रम सोहळा संपन्न झाला. संपूर्ण एक आठवडाभर रोज नवनवीन विषयावर सुरेख काव्य रचना करून, महाउपक्रम सोहळ्यात सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त .???
  • ऑनलाइन दैनंदिन लेखन कला व्यासंगातून, अनेक विध वाॅटस अप समुहात  अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
  •  वाॅटस अप समुहात अनेक स्पर्धांमध्ये,परीक्षक म्हणून कार्यरत…!

व्यवसाय – अकौंट लेखन. . सध्या खाजगी शाॅप मध्ये अकौंटंट म्हणून कार्यरत

वीस वर्षे डिफेन्स अकौट क्लाॅथ शाॅप मध्ये सर्व्हिस..अकौंटंट ते मॅनेजर म्हणून कार्यरत ( 1993 ते 2013 पर्यत..

कविराज विजय यशवंत सातपुते

यशश्री 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2. दशभुजा गणपती रोड, पुणे  411 009 .

मोबाईल नंबर  9371319798 .

Satputevijay996@gmail.com.

? ई-अभिव्यक्तीच्या संपादक मंडळाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन ? 

आभार     

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेळ अशी का जुळून येते? ☆ श्री गौतम कांबळे

☆  कवितेचा उत्सव ☆ वेळ अशी का जुळून येते? ☆ श्री गौतम कांबळे ☆ 

म्हणत असता सुंदर जगणे वेळ अशी का जुळून  येते

मनी पाहिले स्वप्न देखणे क्षणात सारे पळून जाते

 

कुणाकुणाचे हट्ट सगळे पुरवत जाणे कसे जमावे

चुकून घडता चूक कशाने कष्ट वांझुटे  छळून जाते

 

दगडालाही म्हणे फुटतो पाझर  ओझे पेलत असता

छिन्नीचेही रूप देखणे घावासंगे  गळून जाते

 

ठिणगी पडता संघर्षाची अग्नी भिडतो आकाशाशी

शीतलतेचे रूप चांदणे पौर्णिमेला जळून जाते

 

होत राहते सुधारणाही असता पाळत सहनशीलता

वागताना न तारतम्याने वेळ अंतीम टळून जाते

 

©  श्री गौतम कांबळे

सांगली

९४२१२२२८३४

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर /श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रक्षक–भक्षक (मूळ कथा – रक्षक-भक्षक) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ रक्षक–भक्षक (मूळ कथा – रक्षक-भक्षक) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सरहद्दीवरच्या रात्री आपल्या सोबत दररोज एक नवी गोष्ट घेऊन यतात.  धडधड वाढवणार्‍या, श्वास रोखायला लावणार्‍या या रात्री अनेकदा आयुष्यापेक्षा लांबलचक वाटू लागतात. इतक्या लांबलचक की सकाळ होता होता वाटतं, एक शतक उलटलय. कसरती करणार्‍या या रात्रींमुळे वाढणारी धडधड मोजण्याचं काही यंत्र बनलेलं नाही. जगातील सर्वश्रेष्ठ ईसीजी मशीनदेखील या रात्रीतील धडधड मोजायला आलं, तर या रात्रींपुढे शरणागती पत्करेल.

त्या दिवशीची सरहद्दीजवळची ती रात्र, एक विलक्षण गोष्ट आपल्याबरोबर घेऊन आली होती. सरहद्दीजवळील, उत्तुंग पहाडावर असलेल्या सीमारक्षकांच्या बंकरचा, संध्येने एवढ्यातच निरोप घेतला होता. बंकर अपादमस्तक बर्फात बुडून गेला होता जसा काही. या असल्या बर्फाळ पहाडांवर लवकर येण्याची, या निर्लज्ज रात्रीला जरा घाईच असते. सतत बर्फवृष्टी होत असलेला हा तिसरा महिना होता. खालून येणारे सगळे रस्ते गेल्या पाच महिन्यांपासून बंद होते. डब्यातील फ्रोजन भाज्या खाऊन आणि पावडरच्या दुधाचा चहा पिऊन तिथल्या सगळ्या लोकांच्या स्वाद-ग्रंथी विटून गेल्या होत्या पण जोपर्यंत बर्फ पूर्णपणे वितळत नाही, तोपर्यंत आणखी दोन-अडीच महीने हे असंच चालू रहाणार होतं. त्या रात्री, बर्फाच्या शुभ्र चादरीवर उठलेल्या दाट धुळीने रात्रीचा थोडासा पडदा उचलला गेला आणि उड्या मारत मारत एक मध्यम बांध्याचा हरण- शावक भय आणि आतंकाची नवी परिभाषा लिहीत, एका बांकरमध्ये येऊन लपून बसला. रात्रीची बेलगाम धडधड त्या शावकाच्या मोठ्या मोठ्या घाबरलेल्या डोळ्यात विक्राळ नृत्य करत होती.

सरहद्दीच्या त्या बाजूला, दुश्मनांच्या बाजूला एक दाट जंगल आहे. त्यातून या बाजूला वन्य प्राण्यांची ये-जा नेहमी दृष्टीपथात येते. बंकरमधील तत्पर, तरतरीत रखवालदाराने जेव्हा भयग्रस्त झालेल्या त्या शावकाला आत येऊन बंकरच्या एका कोपर्‍यात आश्रय घेताना पाहिलं, तेव्हा या गोष्टीचा छ्डा लावणं योग्यच होतं. जेव्हा त्या रखवालदाराला नियंत्रण रेषेपालीकडे  २-३ चित्त्यांची एक टोळी भटकताना दिसली, तेव्हा सगळी वस्तुस्थिती स्पष्ट झाली. सरहद्दीवर लावलेल्या काटेरी कुंपणापलिकडेकडे ते हळू हळू गुरगुरत होते. पांढर्‍या शुभ्र बर्फावर त्यांच्या पावलांच्या उमटलेल्या खुणा त्यांना पडलेला पेच स्पष्ट करत होता. आपल्या आहारावरचा अधिकार मिळवण्यासाठी रायफल घेतलेल्या रखवालदाराशी भिडणं ठीक होईल की नाही, असा पेच त्यांना पडला असावा. चित्त्यांच्या टोळीच्या बाजूने थोडीशी गंभीर  गुरगुर आणि पहारेकर्‍यांच्या बाजूने हाट.. हाट .. हुश.. हुश… या बरोबरच बर्फाचे गोळे करून त्यांच्यावर फेकणं, यामुळे चित्त्यांच्या टोळीने आपल्या आहाराच्या मागे लागण्याचा विचार सोडून दिला आणि ते खालच्या, दुश्मनांच्या बाजूच्या जंगलात पळाले. इकडे बंकरच्या कोपर्‍यात आखडून बसलेलं शावक, आपल्या फुंकणीसारख्या वर-खाली होणार्‍या श्वासांवर नियंत्रण मिळवत जगभराची शांती आपल्या मोठमोठ्या डोळ्यात सामावून घेत होतं. त्याला हे कुठे माहीत होतं की त्याचे रक्षक असलेले रखवालदार, गेल्या ३-४ महिन्यांच्या बर्फवृष्टीमुळे बंद झालेल्या रस्त्यांमुळे, टीनच्या बंद डब्यातील फ्रोजन कोबी आणि मटार खाऊन वैतागले होते आणि आपल्या जीभेवर नवीन स्वादाचा लेप चढवायला आतुर झाले होते. वखवखलेल्या नजरेने ते त्याच्याकडे बघत होते.

जवळच असलेल्या दुसर्‍या बंकरमधील कमांडरला वायरलेसवरून, इकडच्या बाजूच्या घटनेची ‘ब्रेकिंग न्यूज’ देत,  रखवालदाराने शावकाचा बळी देण्याची परवानगी मागितली. सगळी घटना ऐकल्यावर कमांडरच्या बाजूच्या बंकरवर काही काळ मौन पसरले. अवखळ रात्रीच्या कोलांटया उड्यांमुळे, त्या निरागस शावकाच्या काळजाची धडधड अधीकच वेगाने होऊ लागली होती.

किती क्षण उलटले, कुणास ठाऊक? इकडे आश्वस्त होणार्‍या शावकाच्या श्वासाबरोबरच तिथे बर्फगार मौन पसरलेलं. ‘गो अहेड’ ऐकण्यासाठी उतावीळ झालेलं. अचानक त्या पसरलेल्या मौनावर, वायरलेस रेडिओ- सेटवरून कमांडरचा, सक्त ताकीद देणारा आवाज उमटला…. अगदी सपाट, गुळमुळीत असा त्याचा तर्क होता. …’जो आपल्या प्राणरक्षणासाठी तुम्हाला शरण आला आहे, त्याचं भक्षण कसं करू शकता तुम्ही?’  वैतागाने पुटपुटणार्‍या पहारेकर्‍यांना कमांडरचा आदेश पाळणं भागच होतं. त्यांच्या हिरव्या वर्दीने त्यांच्यापुढे दुसरा विकल्प ठेवलेलाच नव्हता मुळी.

आत्तापर्यंत शांत आणि निश्चिंत झालेल्या शावकाला प्रथम डब्यातून काढलेले फ्रोजन मटाराचे दाणे खायला दिले गेले आणि नंतर आपल्या आजूच्या जंगलात त्याला सोडून दिलं गेलं.

सरहद्दीवरची ती बर्फाळ रात्र, आता हसत हसत पहाटेला बोलावत होती.

मूळ कथा –   रक्षक- भक्षक मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आज सकाळी सकाळी शिल्पाचा फोन आला. “काकू, ई अभिव्यक्ति वरचे माझे लिखाण वाचून एका आजींचा फोन आला होता. त्यांच्या आवाजावरून, बोलण्याच्या स्टाईल वरून आजी वाटल्या मला त्या. माझ्या लिखाणाचे कौतुक केले त्यांनी. आवडले म्हणाल्या.”

“अरे वा! छानच आहे मग. अभिनंदन, तुझा लढा पटतोय ना खूप जणांना”. मी म्हणाले.

“पण फोन ठेवताना मला आशिर्वाद देत म्हणाल्या, ” असेच सांगत जा आम्हाला. खूप मोठी हो. सौभाग्यवती हो!”. शिल्पा म्हणाली.

“चांगले आहे ना. छान आशीर्वाद मिळाला. उत्साह वाढेल तुझा.”

“काकू,!लग्न झालेल्यांना भाग्यवती म्हणतात ना आपल्याकडे. मग मी कशी काय?” जरा पडेल आवाजात शिल्पा म्हणाली.

“अगं, तसंच काही नाही. ती एक प्रथा आहे. तुला त्या आजी तसं म्हणाल्या कारण ई  अभिव्यक्तिवर व्यक्त होण्याचे भाग्य तुला लाभलेआहेच. ते सौ पटीने वाढू दे, असा आशीर्वाद दिला त्यांनी तुला. शिल्पा, खरे सौभाग्य म्हणजे ज्याला जे येतं, आवडतं ते करायला मिळणं म्हणजे खरं भाग्य! आणखी एक सांगते, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी माता आहेत, ज्यांनी आपल्या एकटीच्या बळावर मुलांना मोठं केलं. सुसंस्कारित केलं. चांगले शिकून आपल्या पायावर उभं केलं.त्या सगळ्या माऊली सौभाग्यवती!सौभाग्यवती हे आदराने मान झुक विण्यासाठी म्हटलं जातं .तो एक मान आहे असं समज .त्या आजींनी एक प्रकारे तुझा गौरवच केलाय. तुझ्या साहित्याला केलेला मुजराच आहे. तुझ्या ज्ञानाचा,लिखाणाचा गौरवच आहे.”

खरोखर शिल्पा, अशा ग्रुपमध्ये तुझे विचार मांडायला मिळत आहेत हे खरंच तुझं भाग्य आहे. माझ्याही सदिच्छा सतत तुझ्या बरोबर आहेत. शिल्पा, तू सौभाग्यवती आहेसच. अशीच खूप खूप मोठी हो!तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांना दिपवून टाक.काव्य गंधाने सर्वांना मुग्ध कर. तुला तुझ्या मनातले विचार व्यक्त मिळोत. तुझे घुंगरा चे पदन्यास पहायला सर्वांना ते भाग्य लाभो. तुझ्या वक्तृत्वाची धार सर्वांना ऐकायला मिळो आणि तुझे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “जयोस्तुते” पहाण्याचे महद भाग्य सर्व वाचकांना, श्रोत्यांना आणि ईअभिव्यक्तीच्या संयोजकांना लाभो. खास या सर्वांसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित करू.कोरोना चे संकट, सावट दूर झाले  की खरंच आपण “शिल्पोत्सव” साजरा करू.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆ 

एखादा पुतळा रस्त्याच्या मधोमध उभारावा, तसा एक हत्ती एका रस्त्याच्या मधोमध उभा असतो. त्याच रस्त्याने चाललेले पाच आंधळे त्या हत्तीला धडकतात.  काय आहे हे ? प्रत्येक जण चाचपडून बघायला लागतो.. एकाच्या हाताला शेपटी लागते, त्याला वाटतं ती दोरी आहे. एकाच्या हाताला पाय लागतो, त्याला वाटतं ते झाड आहे.

एकाचा हात  दातावर आपटतो, त्याला वाटतं तो भाला असेल. एकाच्या हातात सोंड येते, आणि साप समजून तो झटकन सोडून देतो. एकाचा हात हत्तीच्या पोटावर पडतो. हात पोहोचेल तिथपर्यंत तो चाचपून पहातो, पण त्याला नक्की अंदाजच बांधता येत नाही. त्यांचे भांबावून चाचपडणे पाहून, तिथून चाललेला एक सद्गृहस्थ त्यांच्याजवळ जाऊन तो हत्ती असल्याचे त्यांना सांगतो आणि त्यांना प्रत्यक्ष हत्ती पाहिल्यासारखाच  आनंद होतो.

ही गोष्ट म्हणजे एक सुंदर रूपक-कथा असावी असे प्रकर्षाने वाटते. —— हत्ती म्हणजे अनाकलनीय असणारे परब्रह्म. आणि पाच आंधळे म्हणजे माणसाची पाच ज्ञानेंद्रिये —- डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा —-रूप, गंध,  नाद,  रस, स्पर्श —- यासारख्या सृष्टीतल्या महत्वाच्या अस्तित्व-गुणांची  जाणीव जाणवून देणारी पाच साधने. या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे, ज्ञानग्रहणक्षमतेमध्येही विविधता आणि स्वतःची अशी एक मर्यादाही —ज्यावरून माणसाच्या शरीरक्षमतेचीही एक मर्यादा ठरते. पण तरीही इतर सर्व योनींपेक्षा मनुष्य-योनी श्रेष्ठ का मानली जाते? चौऱ्याऐंशी लक्ष  योनी पार केल्यानंतर मानवजन्म मिळतो असे म्हणतात  आणि त्याचे वैशिष्ट्य हेच असते की,  या जन्मात,  या ज्ञानेंद्रियांमार्फत मानव या चराचर सृष्टीचे, इतर प्राण्यांपेक्षा खूपच जास्त ज्ञान मिळवू शकतो.  इतकेच नाही तर परब्रह्माचे,  म्हणजेच अंशरूपाने प्रत्येक सजीवात असणाऱ्या त्या सर्वोच्च प्राणशक्तीचेही ज्ञान मिळवू शकतो.  त्यात कायमचे विलीन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो.  त्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा एकत्रित उपयोग करण्याची क्षमता त्याला मिळालेली असते.  “ मानवी मन “ हे सहावे अतिशय प्रभावी पण अदृश्य असे माध्यम आहे,  त्याला या कामासाठी जुंपणे,  हे मात्र माणसाला प्रयत्नपूर्वकच साधावे लागते. अर्थात परब्रह्म हे हत्तीसारखे सहजपणे आकलन होण्यासारखे नसतेच— एका मानवजन्मात तर नाहीच नाही  पण या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने त्याच्या एका अंशाचा तरी अनुभव एका जन्मात घेता यावा, यासाठी मात्र माणूस सतर्कपणे प्रयत्न करु शकतो. उत्तम ऐकणे,  उत्तम बघणे-वाचणे, उत्तम आणि विचारपूर्वक योग्य बोलणे,  अस्पृश्य विचारांना चुकूनही स्पर्श न करणे,  दुष्ट- अनैतिक विचारांचा वासही नाकाला न लागू देणे —-अशासारख्या सदगोष्टी जाणीवपूर्वक करण्याचे ठरवले, तर माणसाचे मन त्याच्या बुद्धीच्या मदतीने, या इंद्रियांच्या वेगवेगळ्या कामांचा एकत्रित उपयोग करून त्या शाश्वत सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला लागू शकते. मग त्या एकमेव शाश्वत सत्याची — परब्रह्माची विशालता — सर्वव्यापकता समजण्यासाठी काय करावे याची दिशा तरी या जन्मात नक्की सापडू शकेल. शेपटी – पाय- दात – सोंड – पोट  हे  एकाच हत्तीचे अवयव आहेत,  हे जसे गोष्टीतल्या आंधळ्यांना समजते  आणि हत्ती नेमका कसा दिसतो  हे त्यांच्या बंद डोळ्यांआड असलेले वास्तव ते त्यांच्या परीने अनुभवतात,  तद्वतच,  या चराचर सृष्टीतली प्रत्येक सजीव,  चेतनामय गोष्ट त्या सर्वव्यापक परमचैतन्याचाच एक अंश आहे,  इतके तरी मानवजन्म मिळालेल्या प्रत्येकाने, या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करायलाच हवा आणि हो,  हत्तीची ओळख पटवून देण्यासाठी एक सद्गृहस्थ पुरेसा असला, तरी त्या परमचैतन्याची ओळख पटवून देण्यासाठी मात्र सद्गुरू -कृपा लाभणे अनिवार्यच असते.

ही गोष्ट सांगण्यामागे हाच हेतू असावा असे मला वाटते.

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (76) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता 

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18

( श्रीगीताजी का माहात्म्य )

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्‌।

केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ।।76।।

 

राजन करकर याद फिर, फिर सारा संवाद

केशव अर्जुन मध्य, मैं फिर फिर हर्षित गात ।।76।।

भावार्थ :  हे राजन! भगवान श्रीकृष्ण और अर्जुन के इस रहस्ययुक्त, कल्याणकारक और अद्‍भुत संवाद को पुनः-पुनः स्मरण करके मैं बार-बार हर्षित हो रहा हूँ॥76॥

O King, remembering this wonderful and holy dialogue between Krishna and Arjuna, I rejoice again and again!

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’  

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 54 ☆ लघुकथा – कम्फर्ट जोन ☆ डॉ. ऋचा शर्मा

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं।  आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी स्त्री विमर्श पर एक लघुकथा  ‘कम्फर्ट जोन’। लघुकथा पढ़ते पढ़ते अनायास ही लगा कि कभी माँ के स्थान पर संवेदनशील पिता को रख कर भी देखना चाहिए, पत्नी को घर लाने से बेटी को विदा करते और गृहस्थी बसाते देखते हुए।  डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को  इस  संवेदनशील लघुकथा रचने के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 54 ☆

☆  लघुकथा – कम्फर्ट जोन 

कितना अच्छा शब्द है ना कम्फर्ट जोन? सुनते ही आराम का एहसास, वह मुस्कुराई। हर लडकी के लिए  मायका ऐसा ही होता है। कितने साल बीत गए शादी को? उंगलियों पर गिनने लगी – बाईस साल? समय मानों पँख लगाकर उड गया? बेटी की शादी भी हो गई। कैसा होता है ना, बेटी को जान लगाकर प्यार- दुलार से पालो और विदा कर दो किन्हीं अनजान लोगों के साथ। हाँ जानती हूँ आजकल लव मैरिज हो रही है, लडका- लडकी पहले से ही एक – दूसरे को जानते हैं, प्री वेडिंग शूट भी होता है। सब पता है लेकिन यह सब काफी होता है क्या एक – दूसरे को जानने के लिए? असली जीवन तो तब शुरु होता है जब चौबीस घंटे साथ रहना पडता है, तब पता चलता है आटे-दाल का भाव। और शुरु हो जाता है यह कहना- शादी के पहले तो ऐसे नहीं थे तुम, बहुत बदल गए हो। मन ही मन वह मुस्कुराई, ऐसे ही आरोप – प्रत्यारोप लगाते धीरे- धीरे जीवन कट जाता है। समय तो पता नहीं कहाँ फुर्र हो जाता है। फ्लैशबैक की तरह जीवन का एक – एक पल उसकी खुली आँखों के सामने आ रहा था –

नई नवेली दुल्हन अपने घर से एक ऐसे परिवार में आ जाती है, जहाँ हर कोई अनजान है, सब कुछ नया। नई – नई बातें, परंपराओं का बदला रूप, नए- नए व्यंजन, तौर-तरीके और ना जाने क्या क्या सीखती है वह। वह सम्भालती है अपने आपको, अपनी आदतों को और अपनी यादों को भी, कभी आँसू भरी आँखों को ठंडे पानी के छींटे मारकर तो कभी बाथरूम में बिना मतलब पानी चलाकर। हर लडकी से यही उम्मीद की जाती है कि जितनी जल्दी हो सके सब कुछ अपना ले। अनकहा सा स्वर गूँजता है उस नए माहौल में – बदलो अपने आप को, खाना – पीना बदलो, बोलो भी उनकी तरह उनके तौर – तरीकों से, यहाँ तक कि सोचो भी वैसे ही। हर घर में यह अलग ढंग से होता है, कहीं उसे परंपराओं की फेहरिस्त पकडा दी जाती  है तो कहीं आदेश – यहाँ जैसे कहा जाए वैसे ही रहना है।

उसका मन कब अपने जीवन की यादों से हटकर बेटी से जुड गया उसे खुद पता ही ना चला। उसका अंश उससे अलग है ही कहाँ, वह बेटी को नए माहौल में, नए रूप में ढलते देख रही थी। सब के बीच घुल – मिलकर भी उसे सुरक्षित रखना है अपना अस्तित्व, अपनी पहचान।

कितना कठिन है ना? पर औरतों को अब सीखना ही होगा यह सब।

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर.

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ अपना-अपना दोष.. ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि  ☆ अपना-अपना दोष.. ☆

भूलने का दोष

दोनों के मत्थे चढ़ा,

वह भूल चुका

उसका पता,

वह भूल चुकी उसे!

 

©  संजय भारद्वाज 

30.11.20, 10.41 बजे

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry (भावानुवाद) ☆ यादें…/Memories… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present an English Version of Captain Pravin Raghuvanshi’s  Classical Poem यादें…  with title  “Memories…” .  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit,  English and Urdu languages) for this beautiful translation.)

यदि कैप्टन प्रवीण रघुवंशी जी इस कविता को नादानियाँ लेखनी की कहते हैं, तो हम उनके प्रवीण ‘आफताब’ उपनाम से रचित ऐसी नादानियाँ भविष्य में अपने पाठकों से अवश्य साझा करना चाहेंगे। आपसे अनुरोध है कि आप इस रचना को हिंदी और अंग्रेज़ी में आत्मसात करें। 

कुछ नादानियाँ लेखनी की… प्रस्तुत है एक क्षणिका… 

 – कैप्टन प्रवीण रघुवंशी

☆ यादें… ☆

 दरिया के किनारे

साहिल  के दरमियाँ

एक सूखा पेड़,

लिए सब्ज़ पत्ते,

इंतज़ार करता रहा

पथराई आँखों से…

सैलाब में बह गयी

तमाम ज़िंदगी

टूटते  गुम्बद,

ढहती  शाखें…

 

फिर भी,

उम्मीदों का ये पुख्ता दरख़्त

अब भी बरकरार है…

उम्र के दयार में

वक़्त के ग़ुबार  से

चढ़ी  धूल

यादों के अक्स पे

तुम्हारा अहसास

अक्सर साया बनकर

कुरेदता रहा

भरे हुए ज़ख्म!

 

मुरझाया हुआ नाउम्मीद गुल

खिल उठता है, खिंजा में भी,

जब भी तुम

बहार बन कर  आते हो

तनहा  यादों में…

 – प्रवीण  आफ़ताब”

☆ Memories…☆

 

Along the river

On the shore

That dry tree,

with few leaves,

Kept waiting

With the stony eyes…

Entire life

got swept away

in the deluge…

Scarred domes,

Crumbling branches…

 

Nevertheless,

This strong tree of

expectations is

still intact …

The courtyard of memories,

with the passage of time,

kept gathering the

dust  of age-storm…

 

Your everlasting presence

As a ceaseless shadow

Kept scratching

the wounds!

 

Hopelessly withered flower, too

Blooms, even in autumn,

Whenever you

You come as spring

In the lonely memories…!

*-Pravin “Aftab”*

© Captain (IN) Pravin Raghuanshi, NM (Retd),

Pune

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य #85 ☆ व्यंग्य – रामभरोसे का कोविड वैक्सीनेशन ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, अतिरिक्त मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) में कार्यरत हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है।  उनका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी की एक समसामयिक व्यंग्य  ‘रामभरोसे का कोविड वैक्सीनेशन’ इस सार्थक एवं अतिसुन्दर लघुकथा के लिए श्री विवेक रंजन जी का हार्दिकआभार। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 85 ☆

☆ व्यंग्य रामभरोसे का कोविड वैक्सीनेशन ☆

मियां अल्लारख्खा, रामभरोसे जी का उर्दू संस्करण हैं. दोनो ही गरीबी की रेखा से नीचे वाले  राशन कार्ड, बी पी एल कार्ड, आयुष्मान कार्ड जैसे बेशकीमती दस्तावेजों के महत्वपूर्ण धारक हैं. वे सब्सिडी वाली बिजली, उज्वला गैस, अंत्योदय योजना, बैंको के रोजगार लोन के सुपात्र हैं. उनके लोन की गारंटी सरकारें लेती हैं.वे मुफ्त शौचालय निर्माण, बिना ब्याज के गृह ॠण, डायरेक्ट फंड ट्रांस्फर वगैरह वगैरह जैसी एक नही अनेकों जन हितैषी योजनाओ के लाभार्थी हैं. तमाम सरकारी कोशिशों के बाद भी वे गरीबी रेखा पार नही कर पाते. दीन हीन रामभरोसे में राम बसते हैं. जनगणना में अल्लारख्खाओ और रामभरोसों के आंकड़े सब के लिये बड़े मायने के होते हैं. उनके आंकड़े सरकारो की सारी योजनाओ का मूल आधार बनते हैं. अल्लारख्खा और रामभरोसे की बस्तियां नेता जी की वोट की खदाने हैं. वे राजनैतिक दलो के घोषणा पत्रो के चुनिंदा विषय हैं.

लालकिले की प्राचीर से होने वाले भाषण हों या रेडियो पर दिल की बातें उनमें इनमें से किसी की चर्चा हो तो भाषण हिट हो जाते हैं. इनके मन को टटोलने में जो सफल हो जाता है वह जननेता बन जाता है. इनकी गिनती में थोड़ी बहुत हेरा फेरी कर्मचारियो की ऊपरी कमाई का स्त्रोत है. धर्म के कथित ठेकेदारो के लिये रामभरोसों और अल्लारख्काओ की आस्थायें बड़ा महत्व रखती हैं, ये और बात है कि इस सब से बेफिक्र उनकी पहली आस्था भूख के प्रति है. दोनो ही दिन भर की थकान मिटाने के लिये शाम को एक ही ठेके पर मिलते हैं, और जब कभी जेबें थोड़ी बहुत भरी होती हैं तो वे एक ही बाजार में देह की खुशी तलाशने निकल जाते हैं.

फटे, मैलेकुचैले कपड़ो में उनके बच्चो की मुस्कराती हुई तस्वीरें अंतर्राष्ट्रीय पुरस्कार जीतने की क्षमतायें रखती हैं. जब कभी अल्लारख्खा और रामभरोसे की बस्ती से कोई बच्चा अपने बस्ते और बुद्धि के कमाल से किसी प्रतियोगिता में कोई सफलता पा लेता है, तो खबरो में धमाल मच जाता है. रामभरोसे या अल्लारख्खा की जान बड़ी कीमती है. उन्होने देखा है कि जीते जी न सही किसी दुर्घटना में उनकी मौत तुरंत लाख रुपयो की सरकारी सहायता और परिवार में किसी के लिये सरकारी नौकरी का वादा लेकर आती है.

किसी भी राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रम की सफलता  रामभरोसों और अल्लारख्खाओ के वैक्सीनेशन हुये बिना संभव नही है. यह तथ्य डाक्टर्स से लेकर राजनेता तक खूब समझते हैं. ये और बात है कि स्वयं की प्रतिरोधक क्षमताओ पर इन बस्तियों को इतना भरोसा है कि उन्हें पकड़ पकड़ कर टीके लगाने होते हैं. उनकी इस आत्मनिर्भरता की भावना से मुकाबले के लिये ही स्वास्थ्य कर्मियो का बड़ा अमला घर घर जाकर उनके मना करने पर भी उन्हें मना मना कर उनका वैक्सिनेशन करता है.

दुनियां को फिर से पटरी पर लाने के लिये कोरोना की वैक्सीन जरूरी है. नेता जी ने चुनावी वादों में सबको मुफ्त कोविड वैक्सीनेशन का वादा किया हुआ है. तरह तरह की वैक्सीन बन रही हैं.किसी के दो डोज लगने हैं तो किसी के तीन. कोई माइनस ७० डिग्री में रखी जानी है तो कोई फ्रिज टेम्प्रेचर पर. माइनस ७० डिग्री स्टोरेज तापमान वाले उपकरण बनाने वाली कम्पनियां दुनियां भर से अपने उपकरणो के लिये आर्डर लेने की जुगत भिड़ाने में  लगी हैं. उनकी मार्केटिंग टीमें ईमेल करने और देश देश के संबंधित मंत्रालयो से हर तरह के संपर्क में  सक्रिय हैं. नकली चीनी वैक्सीन निर्माता इंतजार में हैं कि कब कोई वैक्सीन बाजार में आये और वे उंचे दामो पर अपना माल खपा दें. वैक्सीन, कोरोना की आपदा में अवसर बनकर आ रही है. किसी के लिये कमाई और रोजगार के तो किसी के लिये पुरस्कार के मौके कोविड वैक्सिनेशन में अंतर्निहित हैं.

इस सबसे बेखबर रामभरोसे और अल्लारख्खा अपनी खुद की इम्युनिटी के बल पर गमछा लपेटे कोविड आत्मनिर्भर दिखते हैं.संभ्रांत बुद्धिजीवी दानवीर लोग व संस्थायें इन्हें ही मास्क बांटतें हैं और अपने संवेदनशील होने की तस्वीरें खिंचवा पाते हैं.  वे स्वयं को सेल्फ वैक्सीनेटेड मानते हैं. कोरोना के प्रति रामभरोसे और अल्लारख्खा के दृष्टिकोण बड़े परिपक्व हैं, वे इसे अमीरों की बीमारी बताने में नही हिचकिचाते. वे बिना मास्क मजे में बाजारो में घूमते मिल सकते हैं. उन्हें चुनावो की रैलियों, धार्मिक जुलूसों, किसान आंदोलनो की भीड़ से डर नही लगता.  कभी कभार नाक,मुंह पर गमछे का कोना या साड़ी का पल्ला लपेटकर वे मास्क का शौक पूरा कर लेते हैं. जब कभी सरकारी चालान का डर हो तो यही गमछा उनका अस्त्र बन जाता है. जिसको वैक्सीनेशन के दस्तावेजों में उनका नाम चढ़ाना हो अभी से चढ़ा ले. रामभरोसे हों या अल्लारख्खा वे वैक्सीन के भरोसे नही. आत्मनिर्भरता ही उनकी ताकत है. उनका कोविड वैक्शीनेसन हो न हो उनकी बला से. वैक्सीनेशन की जल्दबाजी आप करें, रामभरोसे और अल्लारख्खा को पता है उन्हें तो मना मना कर, टीवी पर विज्ञापन दे देकर वैक्सीन लगायेगी सरकार.

© विवेक रंजन श्रीवास्तव, जबलपुर

ए १, शिला कुंज, नयागांव,जबलपुर ४८२००८

मो ७०००३७५७९८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares