श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 80 – कहाणी माई बाबांची ☆

कळवळले बाबांचे मन।

माईनेही दिली  साथ

सोडून सारे मोह बंधन।

 

नाही किळस वाटली

भळभळत्या जखमांची।

फाटक्या तुटक्या कपड्यांची,

नि झडलेल्या बोटांची ।

 

सुसंस्कृतांनी बहिष्कृत

केलेल्या कुष्ठरोग्यांची ।

असाह्य  पिडीत जीवांची

जाणून  गाथा या जीवांची।

 

धुतल्या जखमा आणि

केली त्यांनी मलमपट्टी ।

घातली पाखरं मायेची

केली वेदनांशी गट्टी ।

 

अंधारी बुडलेल्या जीवांना

दिली उमेद  जगण्याची ।

पाहून अधम दुराचार

लाहीलाही झाली मनाची।

 

हजारोने जमली जणू

फौजच ही दुखीतांची।

रक्ताच्या नात्यांने नाकारले

तीच गत समाजाची ।

 

कुत्र्याची नसावी अशी 

तडफड पाहून जीवांची।

दुःखी झाली माई बाबा

ऐकून कहानी कर्माची ।

 

पोटच्या मुलांनाही लाजावे

अशी सेवा केली सर्वांची ।

जोडली मने सरकानेही

दिली साथ मदतीची ।

 

स्वप्नातीत भाग्य लाभले। 

नि उमेद आली जगण्याची।

आमच्यासाठी आनंदवन उभारले।

माणसं मिळाली हक्काची ।

 

अंधारच धुसर झाला नि

प्रभात झाली जीवनाची ।

देवही करी हेवा अशीच

करणी माई आणि बाबांची ।

 

आम्हालाच किळस येते

तुमच्या कुजट  विचारांची।

 तुमच्या कुजट विचारांची।

 तुमच्या कुजट  विचारांची ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments