सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

वेदनेचा आनंद घेणं थांबवा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

शीर्षक वाचून आश्चर्य वाटत असेल ना? पण याआधी एक विचार करा. कधी अशा व्यक्ती पाहिल्या आहेत का की ज्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक फक्त अडचणी येत राहतात? शारीरिक दुखणीसुद्धा एकामागोमाग एक सुरू राहतात? म्हणजे एकातून बाहेर पडलं की दुसरं काहीतरी… आपल्याला पाहताना वाईट वाटतं. असा प्रश्न पडतो की या व्यक्तीला सतत इतक्या अडचणी का येतात? दुखणी पाठ का सोडत नाहीत?

मला खात्री आहे प्रत्येकाने अशी एक तरी व्यक्ती नक्कीच पाहिली असेल. अशा व्यक्तींचा स्वभावसुद्धा आठवून पाहा. यांना कधीही विचारा, “कसे आहात?” उत्तर येतं, “काय सांगू! काही न काही सुरूच असतं. मागच्या आठवड्यात पाय घसरून पडले. आता दोन दिवस झाले, खोकल्याने हैराण केले आहे.”

कधीच यांच्या तोंडून ऐकू येणार नाही की मी मजेत आहे.

आता तुम्ही म्हणाल, “यात त्यांचं काय चुकतं? ते तर खरं बोलत असतात. बिचाऱ्यांना खरोखरच काही न काही प्रॉब्लेम्स सुरू असतात. मग मजेत आहे कसं म्हणतील?”

तुम्ही जर मला नवीनच ओळखत असाल तर तुमच्यासाठी माझी ओळख फक्त एक Nutritionist म्हणून मर्यादित आहे. पण जर तुम्ही मला अनेक वर्षे ओळखत असाल, तर माझी सायंटिस्ट ही ओळख तुमच्या मनातून पुसली गेलेली नसणार, हे मला माहीत आहे. त्याच जुन्या ओळखीतून आज काही तरी वेगळं समजावण्याचा प्रयत्न करते आहे. आपला मेंदू आणि शरीर भावनांना कसे हाताळते, ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे.

अचानक आलेलं शारीरिक दुखणं असो किंवा एखादा दुःखद प्रसंग असो, कोणत्याही संकटाच्या काळात शरीरात cortisol नावाचे स्ट्रेस हार्मोन तयार होते. परंतु शरीराला हे हार्मोन दीर्घकाळ शरीरात राहू देणे अजिबात परवडणारे नसते. त्यामुळे शरीर स्वतः त्याचा नाश करण्यासाठी प्रयत्न करू लागते. हळूहळू मनाची स्थिती पूर्ववत होऊ लागते. कारण दीर्घकाळ हे हार्मोन जर शरीरात राहिले तर ते शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करू लागते आणि प्रत्येक अवयवाला इजा पोहोचवू लागते. म्हणूनच शरीर स्वतः या हार्मोनला विरोध करते.

एखाद्याची आई वारली की तो मुलगा हळवेपणाने दोन चार दिवस टाहो फोडून रडतो. पुढचे पंधरा दिवस त्याचे खाण्यावरून लक्ष उडते, तो उदास राहतो. एका महिन्याने तो सावरतो. पुन्हा कामाला लागतो. आईची आठवण झाली की क्षणभर डोळ्यात पाणी येतं, पण तितकंच. पाचव्या महिन्यात तो बायको- मुलांसह एखाद्या मूव्ही थिएटर मध्ये हसताना दिसतो. आपण याला जगरहाटी म्हणतो. पण ही खरंतर शरीराची स्वतःची डिफेन्स mechanism आहे, ज्याद्वारे शरीर स्वतः स्वतः ला recover करते.

परंतु काही माणसे या defence mechanism मध्ये स्वतः अडथळा आणत राहतात. Past मनात सतत उगाळत राहतात. जो भेटेल त्याच्याशी त्याच विषयावर बोलत राहतात. घटना कितीही जुनी झाली तरी त्यातून मनाने बाहेर पडतच नाहीत. शरीर खूप प्रयत्न करते. पण त्यांना त्यात guilt वाटते. आपण इतक्या लवकर या दुःखातून बाहेर पडूच शकत नाही, अशा सूचनाच जणू काही त्यांनी आपल्या मनाला दिलेल्या असतात.  शरीर झुंज करून थकते आणि एका टप्प्यावर हार मानून परिस्थिती स्वीकारते. हाच टप्पा असतो, दुःखाची मालिका सुरू होण्याचा.

ज्या cortisol ला शरीर नष्ट करू पाहत असते, त्या cortisol ला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या विचारांमधून, भावनांमधून सतत शरीरात तयार करत राहते, त्या दुःखी भावनांमध्ये सतत राहते तेव्हा शरीर cortisol ला विरोध करणे बंद करते. अन् दुःखी राहणं त्या व्यक्तीचा स्थायीभाव बनतो. शरीरासाठी त्या भावना “comfort zone” बनतात. माणूस आनंदात अस्वस्थ होतो आणि सवयीचं दुःख पुन्हा मिळालं की तो रिलॅक्स होतो.  ब्रेकअप झाल्यावर काही लोक काही महिन्यात सावरतात. तर काही असे असतात जे वर्ष उलटूनसुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत. रोज रात्री झोपताना ते दुःख आठवून झोपणं हे त्यांचं रूटीन बनतं. जर कधी थोडं आनंदी वाटू लागलं तर मुद्दाम sad song ऐकून पुन्हा त्या दुःखात जातात आणि रिलॅक्स होतात. कारण ते  दुःख हा त्यांचा comfort zone बनतो…

Psychology नुसार या परिस्थितीला आपण depression म्हणतो. परंतु physiology नुसार याला आपण cortisol चा long term प्रभाव म्हणू शकतो.

कोणत्याही depression ची सुरुवात दुःख comfort zone बनल्याने सुरू होते. इतकेच नव्हे तर शारीरिक दुखण्याची मालिकासुद्धा दुखणे comfort zone बनल्याने होते. कारण तुम्हाला subconscious level वर ते दुखणं हवंहवंसं वाटत असतं. याची कारणं? लोकांकडून मिळणारी सहानुभूती, कुटुंबात घेतली जाणारी काळजी, एखाद्याकडून मिळणारे प्रेम, attention, काहीही असू शकते. पण भावनिक कारण काहीही असले तरीही cortisol चा शरीरात मुक्काम वाढला की ते सर्व अवयवांना इजा पोहोचवू लागते.

दुःख comfort zone बनण्याच्या आधी जेव्हा शरीर naturally त्याला विरोध करत असते, तेव्हा त्याच पायरीवर शरीराची साथ देऊन त्याला हद्दपार केलं नाही, तर ते शरीराचा ताबा घेऊन कायम त्रास देत राहते. म्हणूनच natural healing ला मनाने कधीही अडवायचे नाही. आनंदी वाटत असताना मुद्दाम दुःखाच्या आठवणी काढून दुःखी व्हायचे नाही. एखाद्याला आपल्या शारीरिक दुखण्याबद्दल सांगताना आपण neutral राहून सांगतो आहोत की एक्साईट होतो आहोत हे observe करा. सतत दुखणी आणि प्रॉब्लेम याबद्दल बोलत रहायला आपल्याला आवडते आहे का, हे नोटीस करा. आणि तसं जाणवलं तर त्यातून बाहेर पडा. Movie पहा, गाणी ऐका, हसा… पण cortisol ला तुमचा स्थायीभाव बनू देऊ नका.

आईच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी थिएटरमध्ये दिसणारा मुलगा नालायक नसतो. तर त्याने फक्त स्वतः च्या शरीराच्या defence mechanism ला support केलेला असतो. So don’t judge happy people based on your nature to remain sad.

लेखिका : सुश्री दीप्ती काबाडे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments