श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वैष्णव” – लेखक : वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

वि.वा.शिरवाडकर यांनी लिहीलेली ही एक लहान कादंबरी…’वैष्णव’.कादंबरीचे लेखन केलंय १९४६ साली. कादंबरीत वर्णीलेला काळ आहे १९४२ चा.

एका छोट्या गावात शिक्षकाची नोकरी करणारा तरुण. बायको आणि मुलासोबत रहात असतो. तुटपुंजे वेतन..ओढग्रस्तीची अवस्था… पापभिरू.. सतत मान खाली घालून चालणारा..आणि कणाहिन देखील. घरात भिंतीवर दोन तसबिरी.. एक दत्ताची आणि दुसरी गांधीजींची.गांधींचे नाव फक्त ऐकलेले.शाळेत वरीष्ठांकडुन झालेला अन्याय.. अपमान सहन होत नाही.. आणि सरकारी नोकरीवर तो लाथ मारतो. एकामागून एक आपत्ती येत रहातात.

नोकरीच्या शोधात तो मुंबईत येतो. त्यावेळी मुंबईत इंग्रजांविरुद्ध सुरू असलेले आंदोलने निर्णायक टप्प्यात आलेले असते.९ऑगस्ट ला गवालिया टँक मैदानावर सुरू असलेल्या सभेला तो जातो. गांधीजींचे भाषण ऐकतो, आणि त्याच्यात आमुलाग्र बदल होतो. 

दुसऱ्या दिवशीच तो तरुण गावाकडे परततो.आणि त्याच्या नैत्रुत्वाखाली गावात सरकार विरुद्ध आंदोलन छेडले जाते. त्यात तो काही अंशी यशस्वी होतो देखील. पण बलाढ्य ब्रिटिश सत्तेपुढे अखेर ते आंदोलन दडपले जाते.

एका पापभिरू.. कणाहिन व्यक्ती गांधींजींच्या भाषणाने प्रेरित होऊन कशी लढा देते.. त्याच्यात कसे कसे बदल होत गेले हे शिरवाडकरांनी खुपच सुंदर शब्दात उभे केले आहे. त्याच्या लढ्याला यश मिळाले की नाही हे महत्त्वाचे नाही तर गांधीजींच्या विचाराने प्रेरणा घेऊन अगदी गाव पातळीवर असलेले सामान्य जन सुध्दा ब्रिटीशांविरुध्द निर्भयपणे कसे उभे राहिले हे च या कादंबरीत वर्णीलेले आहे.

९ ऑगस्ट च्या आंदोलनाच्या वेळी शिरवाडकर मुंबईत होते.. त्या ऐतिहासिक सभेला देखील उपस्थित होते. त्यामुळे त्या दिवसाचे त्यांनी जे वर्णन केले आहे त्यात एक जिवंतपणा आहे.

म. गांधींचे मोठेपण वि.वा.शिरवाडकरांच्या शब्दात वाचायचे असेल तर ‘वैष्णव’ अवश्य वाचा.

लेखक : वि.वा. शिरवाडकर 

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments