सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असे म्हटले जाते.  

 मिलेटसचा इतिहास 5000 ते 6000 वर्षे पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की, लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती, त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे, तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले. वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये, तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबडग्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच ही भरडधान्ये म्हणजे डोंगर, कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्यासारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती, पोळीने, मैदा पाव, बिस्कुटाने, तांदळाच्या भाताने, अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती.

आता आपले डोळे उघडले आहेत. आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीप्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे.

मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन्  जैवसाखळी/Biodiversity पुनर्स्थापना, पर्यावरण, अर्थकारण यामध्ये मिलेटसची भूमिका काय, हे समजून घेऊया.

–  संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्ये पीक कुठेही येऊ शकते. अगदी एक-दोन पाण्यामध्ये, वा फक्त पावसाच्या पाण्यावरसुद्धा. खते, औषधे, कीटकनाशक रसायने लागत नाहीत, म्हणजे पर्यावरणप्रिय शेती असे समजूया. मिलेटस् /भरडधान्ये शेती म्हणजे जंगल फार्मिंग/naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीनचार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. म्हणजे अल्प भांडवल, उत्तम आरोग्यदायी अन्न, जनावरांना चारा, असा चौफेर फायदा.

1 किलो गहू तयार करण्यासाठी 10.00 लिटर पाणी लागते. 1 किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी 8000 ते 9000 लिटर पाणी लागते. परंतु 1 किलो मिलेटस् /भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त 200 लिटर पाणी लागते. म्हणजे मिलेटसच्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी लागते. तसेच 1 किलो गहू, तांदुळामध्ये चार लोक पोट भरू शकतात. परंतु 1 किलो भरडधान्ये/मिलेट मध्ये बारा लोक पोट भरू शकतात. म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी फूड सेक्युरीटी आपण निर्माण करू शकतो. 

आता या मागील अर्थकारण पाहूया. साधारणपणे 80 ते 150 रूपये किलो ह्या दराने बाजारात मिलेट/भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे.

वेगवेगळी मिलेटस्/भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी फायदे :-

गहू आणि तांदूळ (paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा, वा इतर आजार बळावले जातात. 

आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची? :- कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते. हे गहू, तांदुळामध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना, रोगांना आमंत्रण देते. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हे आहे. परिणामी डायबिटीस, लठ्ठपणा, रक्तदाब, कॅन्सर, सांधेदुखी, वा इतर विविध शारीरिक विकार!  हे आजार, विकार दूर करण्यासाठी मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.

 मिलेटस् ग्लुटेन फ्री फूड आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ना ते हेच! म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार, विकार, रोग आपण सहज टाळू शकतो. ‘Industrial food काय कामाचे?’ हे आपण स्वतःला विचारणार आहोत का नाही? 

— क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments