मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी विलोमपदे – palindromes ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मराठी विलोमपदे – palindromes ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

लहानपणी Palindrome हा प्रकार आवडायचा. 

Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना, जी शेवटाकडून सुरुवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.

इंग्रजीत Palindrome ची रेलचेल शेकड्याने आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच…. 

लहानपणी तर दोन तीनच माहित होते…. 

१) चिमा काय कामाची 

२) ती होडी जाडी होती. 

३) रामाला भाला मारा. 

आता अजून वेगळी विलोमपदे –

१) टेप आणा आपटे. 

२) तो कवी ईशाला शाई विकतो. 

३) भाऊ तळ्यात ऊभा. 

४) शिवाजी लढेल जीवाशी. 

५) सर जाताना प्या ना ताजा रस. 

६) हाच तो चहा 

वा वा ! हे ताजे मराठी पॉलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे.  वाचून मजा आली. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॉलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?

 Very Interesting

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ||१||

श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतं ||२||

या श्लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची स्तुती आहे आणि दुसऱ्या चरणात श्रीकृष्णाची .

या श्लोकाचे वैशिष्ट्य असे की, यातले दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे . वाचून बघा …… 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  पप्पाची मुलगी, मुलीचा पप्पा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पप्पाची मुलगी, मुलीचा पप्पा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी मोठी झाली.

एके दिवशी सहज म्हणाली,

‘पप्पा,मी तुम्हाला कधी रडवलंय का?’

मी म्हटलं,

‘का रे पिल्लू, असं का विचारतेस?’

ती : ‘काही नाही असंच.’

मी : ‘नीट आठवत नाही. पण एकदा…’

ती : ‘कधी?’ तिनं अधीरतेने विचारलं.

मी म्हणालो, ‘तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं.

कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस?

तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.

जसे

पैसे म्हणजे संपत्ती,

पेन म्हणजे बुद्धी

आणि

खेळणं म्हणजे आनंद.

मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.

मला बघायची होती तुझी निवड.

तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस

आणि

मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.

तू रांगत-रांगत पुढे आलीस.

मी श्वास रोखून पहात होतो

आणि

क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.

माझ्या लक्षातच नाही आलं की,

‘या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक निवड असू शकतो.’

ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.

 

खास मुलींच्या पप्पांसाठी:

खरंच मुलगी पाहिजेच.

 

लेखक :अज्ञात

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवार होता, पारावरच्या मारुतीला एक भक्त शेंदूर लावत होता. कडेने एका हातात तेलाची बुधली आणि एका हातात रुईच्या पानांची माळ घेऊन बरीच मंडळी उभी होती. अचानक त्या मारुतीच्या अंगावरचं शेंदराचं आवरण गळून पडलं आणि….

…… आणि आत दिसली गणपतीची सुबक मूर्ती. लोक आश्चर्यचकित. आता हे तेल ओतायचं कुठं आणि ही माळ घालायची कुणाच्या गळ्यात ?

आपलही असंच होत असतं. परमेश्वर सगळ्यांना पृथ्वीवर पाठवतांना पाठवतो फक्त माणूस म्हणून. स्वच्छ कोरी मनाची पाटी, निखळ हसू आणि अत्यंत भावस्पर्शी नजर घेऊन. आपण दहा बारा दिवसातच त्याचं नाव ठेऊन

पहिला जातीचा शेंदूर फासून मोकळे होतो. मग हळूहळू त्याची पंचेंद्रिये काम करू लागतात. त्याच्या मनाच्या पाटीवर कधी घरातले, कधी बाहेरचे काहीबाही खरडून ठेवतात. घर, कुटुंब, गाव, शाळा, कॉलेज, समाज, यामध्ये वावरत असताना एकावर एक विचारांचे, विकारांचे लेप नुसते थापले जातात. आणि मग जणू हीच आपली ओळख आहे अशा थाटात आपणही वावरायला सुरुवात करतो. वरचेवर थापले जाणारे हे लेप, हे मुखवटे, मग आपल्यालाही आवडायला लागतात. माणसं, समाज काय तेलाच्या बाटल्या, हार घेऊन उभे असतातच. नजरेतला विचार हरपतो.  त्याची जागा विखारानं घेतली जाते. आपल्यातल्या मूळ स्वरूपाची जाणीव हळूहळू नष्ट होते.

अचानक एक दिवस काहीतरी घडतं आणि ही शेंदराची पुटं आपोआप गळून पडतात. आतलं मूळ चैतन्य प्रकट होतं. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सहसा हे घडून येत नाही. हा क्षण खूप मोलाचा असतो. खूप प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. नाहीतर गडबडीत आपणच परत आपल्या हाताने आपल्याला शेंदूर फासून घेतो. कारण त्या शेंदऱ्या स्वरूपाची सवय झालेली असते. लोकांच्या तेलाची, माळेची, नमस्काराची भूल पडलेली असते.

आणखी एक क्षण असा मुखवटे उतरवणारा असतो तो म्हणजे शेवटचा क्षण. परमेश्वर सगळे चढलेले मुखवटे, आवरणं, दागिने, एवढंच काय, कपडेसुद्धा काढून ठेवायला लावतो. ज्या मूळ शुद्ध स्वरूपात आणून सोडलं होतं त्या मूळ स्वरूपात घेऊन जातो. बरोबर येतं फक्त आपल्या भल्याबुऱ्या कर्माचं गाठोडं, ज्याचा हिशोब वर होणार असतो. म्हणून या जीवनप्रवासात जर अधेमधे कुठे हे शेंदराचे मुखवटे गळून पडले, तर तो आत्मसाक्षात्काराचा क्षण ओळखा…. त्याला  जपा. 

नाहीतर आहेच…… 

“पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनं…. “

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ⭐

ऑस्ट्रेलियातील एका आजोबांची ही गोष्ट आहे.हे आजोबा रोज पहाटे समुद्रकिनारी फिरायला जात.जाताना हातात एक टोपली असे.किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे.

अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले, ” आजोबा, तुम्ही हे काय करता?”

आजोबा हसले आणि म्हणाले, “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो.अगं, भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात ; पण त्यांची चाल मंद असल्याने ते पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अशांना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.”

 ही गोष्ट वाचल्यावर वाटले, की असे अनेक आजी-आजोबा समाजातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलां-मुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडायला मदत करतात.

लेखक :अज्ञात

संग्राहिका :  सुश्री निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

आरती म्हणजे औक्षण. ‘ शब्द कल्पद्रुम ‘ नावाचा ग्रंथ आहे, त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे. मूर्तीच्या पायाशी चार वेळा, नाभी भोवती दोन वेळा, मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा.-बस संपली आरती. आरती म्हणण्याची प्रथा कधी सुरु झाली हा थोडा संशोधनाचा विषय. महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या काही आरतीसदृश रचना आहेत असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वरांनी काही अशा रचना केल्या होत्या, पण त्या भगवतगीतेचं कौतुक करणाऱ्या. माझ्या मते हा प्रकार श्री रामदासस्वामी या लोकोत्तर संताने चालू केला असावा.  जशी त्यांनी मारुतींची स्थापना केली, व्यायामशाळा चालू केल्या, त्याच पद्धतीने समाज एकत्र यावा, मोंगलांची त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी, म्हणून हा प्रपंच मांडला होता का ? राम जाणे. एवढी छान पूजा केली आहे तेव्हा देवाला ‘ येई हो विठ्ठले ‘ म्हणून संगीत आवतण आर्ततेने द्यायचं. यात खूप आरत्या त्या देवाच रूप, काम सांगणाऱ्या आहेत, आणि शेवटी ‘ देवा तू ये ‘ अशी आळवणी. आणि या आळवणीला देव प्रतिसाद देतो तो प्रसाद अशी समजूत .

अथर्ववेदाचे एक परिशिष्ट वाचायला मिळाले, त्यात एक गोष्ट वाचली. राक्षसांच्या पुरोहिताने काहीतरी मंत्रप्रयोग करून, इंद्राची झोप उडेल म्हणजे निद्रानाश होईल असे काहीतरी केले. इंद्र त्रस्त झाला व त्याने बृहस्पतीना यासाठी उपाय विचारला. तेव्हा बृहस्पती म्हणाले की “ मी तुला एक उपाय सांगतो त्याला अरार्त्रिक म्हणतात. एक तबक घेऊन त्यात वेगवेगळी फुले ठेव व एक त्यात दीप लावून सुवासिनीकडून औक्षण करून घे. व हे करताना एक मंत्र म्हण. यामुळे तुला या त्रासातून मुक्ती मिळेल.” या अरात्रिकामधून आरती या विषयाचा जन्म झाला. देवाला झोपविण्यासाठी पहिली आली ती शेजारती. मग त्याला परत उठविण्यासाठी आली ती काकडआरती. पूजेनंतर ५ वाती किवा दिव्याने ओवाळून करायची ती पंचारती. एकच दिवा असेल तर एकारती, धूप जाळला असेल तर धुपारती, कापूर असेल तर कापूरारती . 

समर्थांनी जवळ जवळ ८० ते ८२ आरत्या लिहिलेल्या आहेत. सर्व अत्यंत प्रासादिक. गेली ४०० वर्ष याची मोहिनी जनमानसावरून उतरलेली नाही. एखाद्या महान व्यक्तीच्या काव्याला, शब्दांना मंत्राचं पावित्र्य येत ते असं. याला म्हणतात चिरंजीविता .यात एक गम्मत अशी की रामदास हे काही आजच्यासारखे संधीसाधू ,दलबदलू नाहीत. गणपती बाप्पा असो की  मारुतीराया असो, की कुठलीही देवी असो, आरतीमध्ये तिचे गुणगान करतील, पण प्रत्येक आरतीमध्ये शेवटी त्या देवाला ‘ साहेब तुमचं मी कौतुक केलं असलं, तरी मी दास रामाचा ,’ ही आठवण ते करून देतातच. रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. सर्व सुंदर आहेत. त्यातील देवतांची वर्णनंही खूप सुंदर. 

पण या आरतीपेक्षा संत एकनाथांनी लिहिलेली दत्ताची आरती एक वेगळी आणि सुंदर आहे. या आरतीचे स्वरूप इतर आरत्यांच्यापेक्षा वेगळे अशाकरिता की कुठल्याही आरतीत त्या देवाचे रूपवर्णन, त्याचे पराक्रम आणि नंतरच्या कडव्यामधून साधारण फलश्रुती असा प्रकार असतो. पण दत्ताच्या आरतीत ‘ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ‘, ‘अभाग्यासी कैची कळेल हि मात ‘ अशा ओळी आहेत. म्हणजे थोडक्यात, मला तो कळलाच नाही असा पहिल्या दोन कडव्यात स्वानुभव आहे व उरलेली दोन कडवी फलश्रुती आहे. याचे कारण असे की एकनाथ महाराज त्यांच्या गुरूच्या म्हणजे जनार्दनस्वामी यांचेकडे हट्ट धरून बसले की मला दत्त महाराजांचे दर्शन घडवा. जनार्दनस्वामींनी त्यांना दौलताबाद येथे किल्ल्यावर बोलावले. एक दिवस एक योगी एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. एकनाथांनी त्यांना आपण कोण असे विचारले, तेव्हा तो योगी त्यांना आशीर्वाद देऊन न बोलता निघून गेला आणि नंतर जेव्हा जनार्दनस्वामी हसले तेव्हा एकनाथ महाराजांना समजले की दत्तमहाराज दर्शन देऊन गेले. तेव्हा ही आरती एकनाथ महाराजांनी तेथे लिहिली आणि ते लिहून गेले– ” सबाह्याभ्यंतरीं तू एक दत्त ,अभाग्यासी कैची कळेल ही मात “–फारच सुंदर चुटपूट .

मंडळी मी या विषयातील तज्ञ नाही. मी जे वाचतो, ऐकतो ते मित्रमंडळींना सांगावे, एवढीच इच्छा असते .

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हेमलकशाचे देव… लेखक – श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ हेमलकशाचे देव… श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

देवा, या हेमलकशाच्या देवाला, आदिवासींच्या आधारवडाला, उदंड आयुरारोग्य दे!

बाबांचे चिरंजीव,डॉक्टर प्रकाश आमटे दुर्धर आजारावर उपचार घेऊन परतलेत, हे ऐकून त्यांच्या कार्याविषयी केवळ जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या मराठी माणसाचा देवावरचा विश्वास दृढ झालाय.  हेमलकशाचा माडिया आदिवासी तर अत्यंत सुखावला असेल, यात शंकाच नाही.

डॉक्टर आणि मंदाताई यांचा पर्लकोटा नदीच्या पुलावर फिरायला गेल्याचा फोटो वायरल झालेला पाहिला आणि देवाचे आभार मानण्यासाठी हात आपोआप जोडले गेले.

मित्रांनो, माडिया आदिवासी,डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे या दाम्पत्याला देव मानतात आणि म्हणून देवाने या वंचित, गरीब आदिवासींच्या देवाचे आयुरारोग्य सांभाळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया.

बाबा आमटेंच्या या सुपुत्राने, अत्यंत हलाखीत जगणाऱ्या माडिया आदिवासींचे जीवन जगण्यायोग्य करण्यासाठी केलेली अतिशय खडतर आणि जीवन झोकून देणारी  धडपड ‘प्रकाशवाटा’  हे त्यांचं पुस्तक वाचून कळते.

धड कपडेही अंगावर न घालणाऱ्या या माडिया आदिवासींना कपडे घालायला, अन्न म्हणून फक्त आंबिलावर विसंबून जीवन कंठणाऱ्या वा केवळ जनावर मारून खाणाऱ्या आदिवासींना भाज्या कशा बनवतात, कशा खातात आणि कशासाठी खातात हे माहीत नसणाऱ्या माडियांना त्या    पिकवायला  व खायला त्यांनी शिकवलं.  माडिया भाषेशिवाय कोणत्याही भाषेचा गंध नसलेल्या या अतिमागास जमातीला शिक्षण, आरोग्य या सुविधा त्यांच्या हेमलकशात अहोरात्र उपलब्ध करून देणाऱ्या या सिद्धहस्त डॉक्टर, इंजिनियर, आणि इतर व्यावसायिक एकाच ठिकाणी एकवटलेल्या अवलियाला,देवा,उदंड आयुरारोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

समाजसेवेचे भांडवल करून, छोट्या- मोठया कार्याचा सोस पुरा करतांना, सोशल मीडियामध्ये फोटो टाकून आपला उदोउदो करून घेणाऱ्या आजच्या तथाकथित समाजधुरीणांच्या डोळ्यात अंजन घालणारे त्यांचे छोटेखानी ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे काम हे दीपस्तंभ बनून समाजाचे मार्गदर्शन करतेय याची त्यांना ना जाणीव असेल, ना खंत.

आपल्या जन्मदात्यांच्या पावलावर पाऊल टाकून, किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन, वंचित आदिवासींच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे आणि मंदाताईंचे हात असेच कार्यरत राहून, आपणा सर्वांना प्रेरणा देत राहोत ही श्रीचरणी प्रार्थना!

असंख्य पुरस्कारांनी गौरविलेले डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या या पुस्तकात एका ठिकाणी लिहितात, “शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे.  इथे आदिवासींची होत असलेली फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्कांबद्दल त्यांनी सजग व्हावं, हा शाळा सुरु करण्यामागचा आमचा हेतू होता.  आज जेव्हा तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कंडक्टरला माझी मुलं पकडतात आणि जाब विचारतात, तेव्हा माझ्या दृष्टीने इथे शाळा सुरु केल्याचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो.”  केवढा मोठा पुरस्कार!इतर कोणत्याही पुरस्कारांच्या पेक्षा मोठा!

असो.  बाबा आमटेंच्या या सुपुत्राला उदंड आयुरारोग्य मिळो ही पुन्हा एकदा विधात्या चरणी प्रार्थना.

लेखक :श्री.विजय लक्ष्मण गावडे

संग्राहिका : सौ. शशी नाडकर्णी- नाईक.

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगाव मध्ये स्वामीजींचा सहवास लाभलेले आणखी एक कुटुंब म्हणजे, हरिपद मित्र आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुमती मित्र. हरिपद मित्र वन खात्यात विभागीय अधिकारी होते. ते बंगाली असल्याने भाटे वकील ओळख करून द्यायला स्वामीजींना त्यांच्या घरी घेऊन गेले. दारात, शांत, सौम्य, तेजस्वी, दाढी केलेला तरुण संन्यासी, पायात मराठी वहाणा, अंगात भगवी कफनी, डोक्याला भगवा फेटा असं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून, हरिपद यांना क्षणभर भुरळच पडली. पण पुढच्याच क्षणी तो आपल्याकडे काही मागण्यासच आला असावा, कारण संन्यासी म्हणजे लुच्चा लफंगा असे त्यांचे मत झाले. भाटे वकिलांनी परिचय करून दिल्यावर एका महाराष्ट्रियन ब्राम्हणाकडे बंगाल्याचे जमणे कठीणच म्हणून ते आपल्याकडे रहाण्यासाठीच आले असावेत अशीही भावना झाली. म्हणून हरिपदांनी स्वामीजींना विचारले तुमचं सामान इथेच आणून घेऊ का?

स्वामीजी म्हणाले, “मी वकील साहेबांकडे अगदी आरामात आहे. ते सारे आपल्याला फार प्रेमाने वागवतात. कोणीतरी बंगाली भेटल्यामुळे मी त्यांच्या घरातून हललो तर ते बरं दिसणार नाही. योग्य होणार नाही. त्यांना वाईट वाटेल, सध्या नको, पुढे पाहता येईल.” इथे स्वामी विवेकानंदांचा विवेक दिसतो. यानंतर झालेल्या गप्पांमधून हरिपद यांना स्वामीजींचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. दुसर्‍या दिवशी स्वामींना त्यांनी फराळाला बोलावले, स्वामीजींनी होकार दिला. दुसर्‍या दिवशी हरिपद स्वामीजींची वाट पाहत होते. बराच वेळ झाला स्वामीजी आलेच नाहीत, म्हणून हरिपद त्यांना बघायला भाटे वकिलांकडे गेले. पाहतात तर काय, त्यांच्या भोवती गावातील अनेक वकील, पंडित आणि इतर प्रतिष्ठित यांचा मेळावा जमलेला. कोणी प्रश्न विचारात होते, कोणाचा मुक्त संवाद चालला होता. स्वामीजी चार भाषांतून सर्वांना कुशलतेने उत्तरे देत होते. या रंगलेल्या धर्मचर्चेत एकाने संस्कृतमध्ये विचारले, “धर्मासंबंधी म्लेंच्छ्  भाषेत चर्चा करणे निषिद्ध आहे. असे अमुक पुराणात संगितले आहे”. त्यावर स्वामीजी म्हणाले, “ भाषा कोणतीही असो, त्या भाषेतून चर्चा करायला काही हरकत नाही. हे सांगताना त्यांनी अनेक वेदादिकांमधील संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आणि शेवटी सांगितले, हायकोर्टाचा निकाल खालची कोर्टे झिडकारू शकत नाहीत, पुराणापेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ”.

एका ब्राह्मण वकिलाने विचारले, स्वामीजी संध्या व इतरही आन्हिकांचे सारे मंत्र संस्कृत भाषेत आहेत. ते सारे आम्हाला कळत नाहीत. अशा स्थितीत ते म्हटल्याने आम्हाला काही फळ मिळेल की नाही”? स्वामीजी उत्तरले, “अलबत, तुम्ही ब्राह्मणा पोटी जन्म घेतलेला, थोडासा प्रयत्न केला तर त्या मंत्राचा अर्थ सहज समजून घेऊ शकाल. पण असा प्रयत्नच मुली तुम्ही लोक करत नाहीत. हा दोष सांगा पाहू कुणाचा?आणि अर्थ जरी कळत नसला तरी, संध्या करावयास बसता, तेंव्हा काहीतरी शुभ धर्मकर्म करीत आहोत असे तुम्हाला वाटत असते. धर्मकर्माच्या शुभ भावनेने जर ते आन्हिकं करीत असाल तर तेव्हढ्यानेच त्याचे शुभ फळ तुम्हाला खात्रीने मिळेल”.   

सर्वजण गेल्यावर स्वामीजींना हरिपद दिसताच त्यांच्या निमंत्रणची आठवण झाली. स्वामीजींनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, “एव्हढ्या मंडळींचा हिरमोड करून येणं मला प्रशस्त नाही वाटलं. गैर मानू नका”. यावेळी हरिपद यांनी पुन्हा घरी राहायला येण्याचा आग्रह केला. तर स्वामीजींनी सांगितलं, आधी भाटे वकिलांची परवानगी घ्या. ते हो म्हणाले तर माझी काही हरकत नाही. हरिपद यांनी महाप्रयत्नाने ही परवानगी मिळवली आणि ते स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. हरिपद मित्र यांच्या आयुष्यातला स्वामीजींचा हा सहवास क्रांतिकारक ठरला होता.

हरिपद मित्र अगदी मॅट्रिक होईपर्यंत इंग्रजी शाळेत शिकत असल्याने त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास उडत चालला होता. कॉलेजच्या विषयांबरोबर हक्स्ले, डार्विन, मिल.टिंडॉल, स्पेन्सर प्रभृती या पाश्चात्य पंडितांचा त्यांच्या ग्रंथावरून परिचय झाला होता. अती इंग्रजी शिक्षणामुळे ते नास्तिक बनले, कशावरही श्रद्धा नाही, भक्ति नाही. सर्वच धर्मात त्यांना दोष दिसे. याच वेळी मिशनर्यांचे त्यांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. ख्रिस्ती धर्म स्वीकारावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. इतर धर्माची निंदा करून वेगवेगळे डावपेच रचून, आधी ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवा मग तो श्रेष्ठ वाटेल, मन लावून बायबल वाचा म्हणजे आपोआप श्रद्धा बसेल, असे त्यांच्या गळी ऊतरवू लागले होते मिशनरी. पण प्रमाणाखेरीज कशावरही विश्वास ठेऊ नये हे तत्व पाश्चात्य विद्येमुळेच त्यांना कळले होते आणि ते त्याच्यावर ठाम पण होते. परंतु मिशनरी आता नेमकं याच्या विरुद्धच सांगू लागले होते. शेवटी गोष्ट इतक्या ठरला गेली की, हरिपदांच्या शंका असलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग बाप्तिस्मा करून ते ख्रिस्ती धर्म स्वीकारतील. परंतु सुदैवाने हरिपद यांना तीन प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच कॉलेज सोडलं आणि संसार सुरू झाला त्यामुळे हे धर्मांतर वाचलं. पण यानंतर ही त्यांचा सर्व धर्माचा अभ्यास चालूच होता. चर्चमध्ये जाणं, देवळात जाणं, ब्राह्म समाजात जाणं हे चालू होतं. तरीही सत्य धर्म कोणता, असत्य कोणता, चांगला कोणता, वाईट कोणता हे हरिपद यांना ठरवता आले नव्हते. पण कोणत्यातरी धर्मावर दृढ श्रद्धा ठेवल्यास आयुष्य सुखासमाधानाने  घालवता येईल हे त्यांना पटलं होतं. तरीही चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम स्थिति असताना सुद्धा मन मात्र बेचैन होतं. शांत नव्हतं. सतत कसली तरी हुरहूर असे. स्वामीजींच्या संपर्कात आल्याने त्यांना धर्मासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळाले. धर्म वादावादीत नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षा अनुभूतीची बाब आहे. ही गोष्ट पटवून देण्यासाठी स्वामीजी म्हणत, ‘मिठाईची पारख होणार ती मिठाई खाऊनच, धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, एरव्ही काहीही कळणे कधी शक्य नाही’.  

धर्मजीवनाविषयी अशा प्रकारे त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. अनेक संशय होते  त्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींनी दिली होती. सत्य, धर्म आणि श्रद्धा या विषयावरच्या चर्चेतून आणखी गोष्टींचा खुलासा हरिपद यांना झाला होता. जेंव्हा जेंव्हा सवड मिळे संवाद होई तेंव्हा तेंव्हा हरिपद मित्र ही संधी घेत असत. याबरोबरच स्वामीजी त्यांना आलेले अनुभव पण सांगत.

हरिपद यांच्या पत्नी इंदुमती यांना बर्‍याच दिवसांपासून गुरुमंत्र घेण्याची इच्छा होती.पण हरिपद धर्माच्या बाबतीत साशंक होते आणि योग्य व्यक्ती भेटेपर्यंत वाट पाहूया असे त्यांनी पत्नीला सांगीतले होते.    स्वामीजींन कडून ती घेण्याचा योग आल्याने दोघं ही कृतकृत्य झाले. शिष्यत्व पत्करल्यावर स्वामीजी तीन वेळा फक्त भेटले . प्रथम बेळगावला. नंतर स्वामीजी अमेरिका प्रवासाला गेले त्या आधी आणि नंतर देहत्यागच्या सहा महीने आधी. स्वामीजींनी दीक्षा दिल्यानंतर दोघांचेही सतत स्मरण ठेवल्याचे दिसते.अमेरिकेत जाण्याआधी त्यांनी इंदुमतींच्या पत्रात लिहिले होते, “तुमचे उभयतांचे कल्याण असावे अशी प्रार्थना मी नित्या परमेश्वराला करत असतो. परमेश्वराची कृपा असेल तर मी अमेरिकेतून परत आल्यावर आपली भेट होईल. आपण परमेश्वराच्या हातातली केवळ बाहुली आहोत. याचे सदैव स्मरण ठेवा. मन सदैव शुद्ध असावे, विचार उच्चार वा आचार यापैकी कशातही अशुद्धतेचा स्पर्श होऊ देऊ नये. गीतेचे पठण करीत राहा”. अशा प्रकारे हरिपद यांना स्वामीजींचे वैयक्तिक सहवासातून दर्शन झाले होते. बोलता बोलताना स्वामीजींनी हरिपद बाबूंना आपला सर्वधर्म परिषदेला अमेरिकेला जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता.                                  

स्वामीजी आता इथला प्रवास संपवून निघाले. हरिपद यांनी त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला बेळगावमध्ये असताना शिरगावकर यांची ओळख झाल्याने जाताना त्यांनी मडगावच्या सुब्राय नायक यांच्या नावे  परिचय पत्र दिले होते. ते घेऊन स्वामीजी गोव्याकडे रेल्वेने रवाना झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

प्राणी मात्रांच्या सावधपणाची किती उदाहरणे द्यवी तितकी कमीच आहेत. त्सुनामी आली ,त्यावेळी प्राण्यांना त्सुनामीची आधी जाणीव  झाली होती. भूकंप होणार याची जाणीव  मानवाच्याही आधी जंगली प्राण्यांना, पशूपक्ष्यांना आगोदर होते. त्यांचे वर्तन बदलते. पाऊस येणार असल्याची जाणीव पतंग किड्यांना आगोदर होते. बर्याच संख्येने ते दिव्याजवळ येतात .निसर्गात प्राणी आणि पक्षी सावध असतातच.पण झाडांना देखील सावधपणा असतो. संवेदना असतात.हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

हे सगळं लिहीत असताना मला घरातलेच अनुभव आठवले. आमच घर शेतात एकाकी अस होत.टाँमी आणि बंड्या असे दोन कुत्रे, एक जयू गाय,टिट्या, गोट्या असे दोन  भाऊ भाऊ बोके,पोपट आणि आम्ही असे आमचे कुटुंब होते. बर्याच वेळा शेजारच्या पोल्ट्रीतील खाद्य खाण्यासाठी उंदीर यायचे.आणि उंदरांना धरण्यासाठी सापही यायचे. साप आला की, कोंबड्या सावध व्हायच्या.कोंबड्यांचा आरडाओरडा आणि फडफडाट  चालू व्हायचा. आणि आम्हाला सापाची जाणीव करून द्यायच्या.भोवती शेती असल्याने साप, विंचू, सरडे, मुंगूस ही असायचे. आमचे दोन्ही कुत्रे साप दिसला की वेगळा आवाज काढायचे. चोर दिसला की वेगळा आवाज काढायचे. त्यांच्या टोनिंग वरुन  आम्हाला सावध करायचे. दोन्ही बोके कुठेतरी दबा धरून बसलेले दिसले की, ओळखावे. इथे पाल, उंदीर काहीतरी नक्की आहे. कठून शिकले असतील हा सावधपणा?कित्येकदा घरात माझ बाळ रडत असलं तरी आमचा टाँमी मला कूं कूं करून सांगायचा .सावध करायचा.”लक्ष्य आहे की नाही, बाळ रडतय”.बाळाला तिर्हाइतानं कुणी घेतलेल  त्याला आजिबात आवडायचं नाही. परका कोणी घेतो की काय ,याबाबत तो फार सावध असायचा.त्याच्या सावधपणाचे किती कौतुक करावे, आणि किती अनुभव सांगावेत, तितके कमीच  आहेत. आयुष्यभर त्यांच्या उपकाराची फेड होणार नाही.

अनेक उपकरणे, अनुभव, प्रयोग यांच्या सहाय्याने प्राणी वर्तन, त्यांच्यातील सजगता, सावधानता यांचा अभ्यास करता येऊ लागला आहे. व प्राण्यांचे मानसशास्त्र ही एक नवीन शास्त्रशाखा उदयाला आली आहे. याचा प्रत्येकाने जरूर अभ्यास करावा,असे वाटते.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेर म्हणजे काय?…..अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ माहेर म्हणजे काय?…..अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

१) माहेर म्हणजे…  – महिना दोन महिने आधीच कॅलेंडरवर लक्ष ठेवून माहेरी जाण्यासाठी प्रवासाची तिकिटं काढून ठेवणं.

२) माहेर म्हणजे… – ‘ या वेळी मी आईकडे जास्त दिवस राहणार ‘ असं नव-याला ठणकावून सांगणं.

३) माहेर म्हणजे… – माहेरी जाण्याच्या कल्पनेने चेहऱ्यावर तेज यायला सुरुवात होणं.

४) माहेर म्हणजे… – उत्साहाच्या भरात कपड्यांची बॅग भरायला घेणं.

 ५) माहेर म्हणजे… – ” पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या ” असं आपल्या लेकरांना आनंदाने ओरडून सांगणं.

६) माहेर म्हणजे… – बसस्टाॅपवर सोडायला आलेल्या नवऱ्याला हसऱ्या चेहऱ्याने टाटा करणं.

७) माहेर म्हणजे… – बसस्टाॅपवर उतरल्यावर रिक्षावाला म्हणेल त्या किंमतीत माहेरच्या रस्त्याला लागणं.

८) माहेर म्हणजे… – त्या घराच्या पन्नास- पंचावन्न पायऱ्या दहा-बारा ढांगात संपवणं.

९) माहेर म्हणजे… – कोणीतरी दार उघडेपर्यंत दरवाजावरची बेल दाबून ठेवणं.

१०) माहेर म्हणजे… – उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणाऱ्या आईकडे प्रेमाने पाहाणं.

११) माहेर म्हणजे… – उंबरठ्याच्या आत पाय टाकायची घाई होणं.

१२) माहेर म्हणजे… – चपला काढण्याआधीच बाबांच्या गळ्यात पडणं. 

१३) माहेर म्हणजे… – वहिनीने प्रेमाने आपल्या बॅगा आत नेऊन ठेवणं.

१४) माहेर म्हणजे… – ” किती वाळली माझी लेक ” असं आईने केसांतुन हात फिरवत म्हणणं.

१५) माहेर म्हणजे.. – ” चला आजपासून काय धमाल करायची?” असं मामाने भाच्याला कौतुकाने विचारणं. 

१६) माहेर म्हणजे… – स्वयंपाकघरात डोकावून, “आज काय बेत?” असं नुसतं विचारणं.

१७) माहेर म्हणजे… – आवडीच्या पदार्थांची फर्माईश करणं.

१८) माहेर म्हणजे… – जेवणाची वेळ झाल्यावर पहिल्या पंगतीत बसून जेवायला सुरवात करणं.  

१९) माहेर म्हणजे… – सकाळी जाग येईल तेव्हा आरामात उठणं.

२०) माहेर म्हणजे… – सोफ्यावरून उठून खुर्चीवर बसणं. आणि हो खुर्चीवरून उठून बेडवर लोळत पडणं.

२१) माहेर म्हणजे… – गावातल्या मैत्रिणींना फोन करून सिनेमा-नाटकाचे प्लॅन आखणं.

२२) माहेर म्हणजे – बालपणीच्या जुन्या फोटोंचा पसारा काढून बसणं.  

२३) माहेर म्हणजे… – कोणत्याही पाचकळ विनोदावर खळखळून हसणं.

२४) माहेर म्हणजे… – अंगणातल्या झोपाळ्यावर बसून वेळी-अवेळी पुस्तक वाचणं.

२५) माहेर म्हणजे… – गच्च पोट भरल्यानंतर आईने दहीभात खाण्याचा आग्रह करणं.

२६) माहेर म्हणजे… – ८/१० दिवस पटकन् संपून गेल्यासारखे वाटणं.

२७) माहेर म्हणजे… – सासरी परत जातांना दोनाच्या चार बॅग झालेल्या असणं. 

२८) माहेर म्हणजे… – निघतेवेळी जड मनाने आईबाबांना वाकून नमस्कार करणं.

२९) माहेर म्हणजे… – YES!! ऐनवेळी सासरी जाणं २ दिवसाने पुढे ढकलणं.

३०) माहेर म्हणजे… – ” सासरच्यांना नीट जप हो ” असं आईने प्रेमाने पाठीवर हात फिरवत सांगणं. 

३१) माहेर म्हणजे… – बसमध्ये भावाने जड बॅगा ठेवायला मदत करणं.

३२) माहेर म्हणजे… – ” घरी पोहोचलीस की फोन कर ” असं माहेरच्यांनी चारवेळा ओरडून सांगणं.

३३) माहेर म्हणजे… – बस दिसेनाशी होईपर्यंत माहेरच्यांना हात हलवत निरोप देणं. 

३४) माहेर म्हणजे… – पुढच्या प्रवासासाठी प्राणवायू भरून घेणं.

३५) माहेर म्हणजे… – ” माझ्या माणसांना सुखात ठेव ” ही देवाकडे प्रार्थना करणं.

३६) माहेर म्हणजे… -“आम्ही खूप मजा केली मामाकडे” असं लेकरांनी खूप उत्साहाने त्यांच्या वडिलांना न थकता सांगणं. 

३७) माहेर म्हणजे… – फोन आला की खोलीचं दार लावत आईशी मनसोक्त गप्पा मारणं. ‘ काळजी करू नकोस गं आई ‘ असं दर चार वाक्यांनंतर तिला ठामपणे सांगत राहाणं.  

३८) माहेर म्हणजे… – वयाच्या सत्तराव्या वर्षीही माहेरच्या आठवणींनी व्याकूळ होणं.

  किती लिहावं माहेराविषयी?…

अहो शेवटी माहेर म्हणजे; ” माझ्या माहेरी असं, माझ्या माहेरी तसं ” हे नवऱ्याला सतत सांगून त्याला छळत राहाणं. हो किनई?…… 

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जमिनीवर रहाणार्या प्राण्यांचे कान हे ध्वनी ग्रहण करण्यास खूपच कार्यक्षम  असतात. हरणाच्या बाबतीत सांगायचे तरंतो प्रत्येक कान स्वतंत्रपणे हालवू  शकतो. स्थिर किंवा विश्रांतीत असताना देखील प्रत्येक कानाकडून मिळालेल्या ध्वनी लहरीची तुलना करून ते ध्वनीचा स्रोत निश्चित करु  शकतात. त्याच्या श्रवण शक्तीची तुलना उपग्रहाशी केली जाते. माकडे , जिराफ, झेब्रे, हे प्राणी समूहाने रहातात. त्यापैकी त्यांचा एक नेता किंवा प्रमुख असतो. तो शत्रूशी सामना करून इतरांचे रक्षण करतो.बाकी सारे त्यांच्या हुकमतीखाली रहातात. त्यांच्या तील सामाजिक वर्तनही उच्च दर्जाचे असते. जंगलात वाघ किंवा सिंह यांची चाहूल लागली की, झाडावरील माकडे विचित्र आवाज काढून त्याची पूर्वसूचना जमिनीवरील प्राण्यांना  देतात. बाकीचे  प्राणी सावध होऊन पळू लागतात. वाघ किंवा सिंह दुरुन एखादे सावज पक्के करतो. आणि त्याचाच पाठलाग करून ते सावज पकडतो.मग बाकीचे प्राणी पळायचे थांबतात. त्यांना समजत की,आपल्या वरच संकट टळल आहे. शिकार झाली की, तरस हा आयत्या  शिकारीवर जगणारा प्राणी सावधानपणे तयारच असतो. एकदा शिकार झाली की, पुन्हा भूक लागेपर्यंत समोरुन प्राणी गेला तरी मारला जात नाही. शिकार कशी करावी, कसे खावे,हे पिल्ले आईकडून शिकतात.

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व ताकदवान प्राणी. ते कळपाने रहातात. अन्नाच्या शोधात सतत स्थलांतर करीत असतात.आफ्रिकन हत्ती हे भडक डोक्याचे असतात. हत्तीना मुसळधार पावसाची चाहूल सर्वांच्या आधी लागते. दोनशे चाळीस  कि. मि.अंतरावरुनही हत्तीना  मुसळधार पावसाची चाहूल लागते. आणि ते अचानक आपली दिशा बदलतात.साधारणपणे हत्तीच्या दिशेने वादळी पाऊस येणार असल्याची माहिती वेधशाळेकडून संशोधकांना मिळाली., हे हत्तीचे एक आश्चर्यजनक सावधपणच नव्हे काय?

अस्वल हा प्राणी कधी एक एकटा किंवा दोघे असे रहातात. वेळोवळी ते एकमेकांची जागा व्यापतात. घाबरलेले अस्वल ओरडत नाही तर जमिनीवर आपटत राहून  फुत्कार टाकतात. जेव्हा ते रागावतात ,तेव्हा ते खालचा ओठ बाहेर काढून कान मागे सारतात.आणि रागाने एक प्रकारे धमकावतात. बर्याच वेळ मागील दोन पायावर उभे राहून सर्व दिशांना मान फिरवून हुंगत रहातात. संवेदनशील होऊन आपले भक्ष्य पकडतात. आणि संकटही ओळखतात.गेंडा हा प्राणीही जंगलात रहातो. त्याची द्रुष्टी तितकीशी ताकदवान नसते. गेंडा घुसखोरांना हाकलण्यासाठी त्यांच्यामागे पळत रहातो. कधीकधी झाडाझुडुपांवर आपटलाही जातो. ठराविक  ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करून आपले क्षेत्र तो पक्के करतो.दूर  कोठे गेला तरी पुन्हा तेथेच येऊन त्याच ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करतो. आपल्या स्थानाबाबत पक्का जागरुक असतो.कुत्रा हा प्राणी हजारो वर्षांपासून माणसाच्या संपर्कात आहे. तो इमानदार  राखणदार आणि शिकारी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पाळतात.त्याच्या घ्राणेंद्रियांची क्षमता माणसाच्या आठशेपट जास्त असते. त्यामुळे बाँब शोधक पथकातही तो काम करतो. रक्तदाब ,रूदयरोग , मानसिक ताणतणाव अशा व्याधींवर डाँग थेरपी म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.त्यासाठी आता अभ्यासक्रम तयार केले आहेत.वैदिक वांग्मयात देखील कुत्र्याचे उल्लेख आहेत. कित्येकदा नको म्हणून दूरवर नेऊन सोडलेले  कुत्रे दोन–तीन दिवसांनी परत आपल्या दारी आल्याचे आपण पहातो. अशावेळी  त्या सोडणार्या निर्दय माणसाचा राग येतो.केवळ वासाच्या आधारे ते आपले ठिकाण  शोधून काढतात. मांजर या प्राण्याबद्दल सांगायचे तर ते इमानदार नसते.पण वासाने त्याला आपली शिकार समजते. आणि जाणीव झाली की , तासनतास ते सावजाची वाट पहात बसते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares