मराठी साहित्य – विविधा ☆ “टेक यूवर ओन डिसिजन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “टेक यूवर ओन डिसिजन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

टेक युवर ओन डिसिजन… 

या वाक्यात आता नवीन काही नाही. निर्णय काय घ्यावा? हो… कि नाही… किंवा समोर असलेल्या पर्यायांपैकी कोणता चांगला. आणि कोणता निवडावा. असा प्रश्न पडला की हे वाक्य ऐकायला मिळत.

बऱ्याचदा विचारशक्ती वाढण्यासाठी, निर्णयक्षमता येण्यासाठी, गरज असल्यास थोडी जोखीम पत्कर काही लागल, चुकल तर मी आहे असा धीर देण्यासाठी वडीलधारी या वाक्याचा आधार घेतात. पण…

सध्या घरात जेव्हा मला काही विचारल जात, आणि मी हे वाक्य म्हणतो, तेव्हा माझ्या निर्णयाची फक्त औपचारिकता असते. बाकी जवळपास त्यांचं सगळ ठरलेल असत. डिसिजन जवळपास झालेला असतो.

जसं… जेव्हा मला विचारल जात, मी काय म्हणते… मुलं विचारतात की संध्याकाळी खायला ऑनलाईन काय मागवायच?…

यात मागवायच का?  हो का नाही हा प्रश्न नसतो. मागवायच हे ठरलेल असत.

यात मुलांना घरातल काही नकोय. आणि बायकोला देखील आपणच काही करण्याची इच्छा नसते. म्हणजे यात घरातल नकोच हा निर्णय त्यांचा झालेला असतो.

यातही ऑनलाईन अस विचारल्यावर आपण कुठेही जायच नाही. आवडणाऱ्या ठिकाणाहून घरीच मागावयच आणि आरामात खायच. हे सुध्दा ठरलेल असत. माझ्या निर्णयाची गरज नसते. फक्त मला विचारल जात. मग मी म्हणतो… टेक युवर ओन डिसिजन. यात माझाही गाडी चालवायचा आणि पार्किंग साठी जागा शोधायचा त्रास वाचणार असतो.

तसं नाही… पिझ्झा मागवायचा कि बर्गर…?

म्हणजे पदार्थ सुध्दा त्यांचे ठरलेले असतात. त्या दोन व्यतिरिक्त तीसरा नसतोच. कदाचित त्याचा नंबर पुढे नजीकच्या काळात येणार असावा. किंवा आज या दोन पदार्थांवर त्यांच्या भाषेत जम्बो डिस्काउंट असावा. आता त्यांच्या  निर्णयात मी डिस क्वालीफाय सारखा डिस काउंट असतो. पण मला विचारतात. मी परत म्हणतो. टेक युवर ओन डिसिजन.

हे झालं खाण्याच. दुसऱ्या गोष्टी सुध्दा याच पद्धतीने विचारल्या जातात.

मला वाटतं… या दिवाळीत कपड्यांऐवजी एखादा दागिना घ्यावा. नाही छोटासा असला तरी चालेल. यात छोटासा म्हणताना हाताची चिमटी जेवढी लहान करता येईल तेवढी लहान करता करता आवाज वाढवता येईल तेवढा वाढवला जातो. पण आवाजात गोडवा आणि नाजूकपणा असेल याची काळजी घेतली जाते.

आता दागिना छोटासा म्हटला तरी कमीतकमी आठ ते दहा ग्रॅम पासून सुरुवात. परत यांच्या तब्येतीला तो शोभून दिसला पाहिजे. थोडक्यात ठसठशीत हवा. सांगा कपडे आणि दागिना यांच बजेट जवळपास कुठे जमत का?

परत पुढे वाक्य असतच. मागे आम्ही एक पाहून आलो आहे. छान आहे. आणि डिझाईन पण नवीन आहे. हां… थोडीफार भर मीपण घालीन की. यांच भर घालणं म्हणजे दागिना घ्यायला भरीस घालण असत. थोडक्यात वस्तू पाहून झालेली असते. निर्णय झालेला असतो. आपल्याला विचारण्याची औपचारिकता असते. मग म्हणावच लागत. टेक युवर ओन डिसिजन…

माझ्या कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होत. नेहमी नेहमी पॅन्ट शर्ट हेच असत. कामावर तेच बरे असतात. पण झब्बा लेंगा कमीवेळा घेतला जातो. तो सुटसुटीत सुध्दा असतो. यावेळी झब्बा लेंगा पहा… असं मला वाटत. तुम्हाला त्याची सवय नाही. पण  अगदीच काही वाइट दिसणार नाही. (हे वाक्य माझ्यासाठी असत का झब्बा लेंगा याच्यासाठी हा डिसिजन मात्र मी घ्यायचा असतो. ) पण पुढे तेच मला म्हणतात. टेक युवर ओन डिसिजन…

दिवाळीच्या फराळाचही आता तसच होणार… घरी काय करायच आणि बाहेरुन काय घ्यायच, किंवा करून घ्यायच हे जवळपास निश्चित नक्की झालेल असत. पण सुरुवात अशीच होईल.

ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी घरी करण शक्य होणार नाही. काही पदार्थ घरी करू आणि काही तयार आणू. लाडू घरचेच आवडतात मुलांना. ते घरीच करु. आणि बाहेरुन काय आणायच त्याची यादी मी देते. त्या प्रमाणे तुम्ही घेऊन या. तयार पदार्थांसाठी ऑर्डर मी देईन. चालेल ना? तुम्हाला काय वाटतं… म्हणजे कुठे ऑर्डर द्यायची ते सुद्धा त्यांच ठरलेलं असतं किंवा तेच ठरवणार असतात. मी म्हणतो.

टेक युवर ओन डिसिजन…

पण ऑफिस किंवा इतर गोष्टी सांभाळून घरच सगळ व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करण्याचा त्यांचा जो आटापिटा असतो त्या त्यांच्या डिसिजन ला मात्र सलाम… तेच करु जाणे… तिथे मी म्हणतो, तुझ्या निर्णयाला आणि कामाला सलाम…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – किती रे तुझे रंग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – किती रे तुझे रंग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

एक उत्तम संगीतकार, कवी, गायक, विडंबनकार, लेखक, गुरू, इत्यादी विविध पैलू, विविध रंग, व्यक्तिमत्वात असलेल्या देवकाकांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त आणि पाठोपाठच असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांत मी आदरांजली वाहतेय –

“किती रे तुझे रंग किती रे तुझ्या छाया

दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया (उतू जाणे)”

१९९५ च्या दरम्यान नाशिकच्या दातार परिवाराने निर्मिलेल्या माझ्या पहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ या  cd साठी जेव्हा शशी – उषा मेहता (ज्येष्ठ कवयित्री) या दाम्पत्याने काव्यनिवडीसाठी मदत केली. उत्तम दर्जेदार काव्य नि दर्जेदार संगीत असलेल्या कविता माझ्या आवडीने निवडल्या गेल्या. त्यावेळी विंदांची ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘मागू नको सख्या’, ‘अर्धीच रात्र वेडी’, सुरेश भटांची ‘एवढे तरी करून जा’, ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो, ‘ शांताबाई शेळकेंची ‘प्रीती जडली तुझ्यावरी’…. अशा एक से एक सुंदर रचना निवडल्या गेल्या. गंमत म्हणजे सगळ्यांचे संगीतकार – यशवंत देवच होते. या अलिबाबाच्या गुहेतल्या, रत्नांचा हार परिधान करायचे भाग्य मला मिळाले. वेस्टर्न आऊटडोअर सारख्या अप्रतिम स्टुडिओत ही रेकॉर्डिंग्जस व्हायची. ‘सर्वस्व तुजला वाहूनी… गाताना  सॅक्सोफोन वादक मनोरीदा, सरोद वादक झरीनबाई दारुवाला अशा दिग्गजांचे प्रत्यक्ष भावपूर्ण सूर कानावर पडल्याने लाइव्ह गाणे गाताना गाणे ही तसेच प्रकट होत असे… प्रत्येक टेक फर्स्ट टेक असे. टेक झाल्यावर मी गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले… देव साहेबांच्या अश्रुधारा वहात होत्या. त्यांनी मला पाठ थोपटून शाबासकी दिली आणि डोळे पुसत ते म्हणाले, “अत्यंत सुंदर आणि हृदयापासून गायलात पद्मजाबाई!” माझ्यासाठी हे मोठं बक्षीस होतं. शब्दप्रधान गायकीत कुठे काय कसे गावे याचे, त्यांनी पुस्तक लिहून अगदी नवोदितांसाठी सुद्धा वस्तुपाठ रचला. गाणे प्रथम मेंदूतून व नंतर गळ्यातून गायले जाते मगच ते सहज उमटते, ही गुरुकिल्ली त्यांनी मला दिली. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही उत्सुक असू. त्यांची देववाणी प्रासादिक होती. विनोदबुद्धी शेवटपर्यंत तल्लख होती. कायम ते हशा आणि टाळ्या घेत. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. शेवटी मात्र आजारपणात त्यांनी परमेश्वराला त्यांच्याच शब्दांत अशीच हाक घातली असेल…

“तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट,

माझी अधीरता मोठी, तुझे मौनही अफाट…”

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चांगल्या कर्मातच देव आहे…” – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “चांगल्या कर्मातच देव आहे…” – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

॥ चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो, चांगल्या कर्मातच देव आहे ॥ 

“देव बीव सगळं झूठ आहे. थोतांड आहे. ‘मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे. गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील, तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत. मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.” — डॉक्टर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला. डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते…  डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर. त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत.

कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले. वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता की ” मी आज पार्टीला जातेय. मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत. जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय. घरी गेलात की 

जेवा “. डॉक्टर घरी आले. हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर लक्षात आलं, की बरचस जेवण उरलय. आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं. म्हणून उरलं सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधल आणि कुणातरी भुकेलेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले.

लिफ्टमध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं. ” देव बीव सगळं झूठ आहे ” हे वाक्य त्यांच्या भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं. डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक, देव अशी कुठलीही गोष्ट, व्यक्ती, शक्ती जगात नाही ह्यावर ठाम. ‘ जगात एकच सत्य. ‘मेडिकल सायन्स’… बाकी सब झूठ है ‘

डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले. जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. ते त्या दिशेने चालू लागले. जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई, आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे. ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं. ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती. डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई तिच्या मुलाला म्हणाली “बघ बाळा. तुला सांगितलं होतं ना. आज आपल्याला जेवायला  मिळेल. देवावर विश्वास ठेव. हे बघ. देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलय”. हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप. देव वगैरे सगळं खोट आहे. हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय. देव नाही. हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो. पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय. काय देव देव लावलयस. नॉन – सेन्स. “

“साहेब. ! हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे. पण साहेब. देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो. माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस, हा देवच आहे. आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो एवढंच. माझ्यासाठी तुम्ही ‘देव’ च आहात साहेब. आज माझ्या लेकराच तुम्ही पोट भरलंत. तुमचं सगळं चांगलं होईल. हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला. “

डॉक्टर कामेरकर त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले. एक रोगट भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती आणि ते ह्याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो. चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे. चांगल्या माणसात देव आहे. प्रत्येक ‘सतकृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?  तर आपल्याला चांगली माणसं भेटतील, चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो. डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं. आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. एक कणखर, डॉक्टर त्या दोन अश्रूत त्याचा इगो  विरघळला होता. डोळे मिटून, ओघळत्या अश्रूंनी, डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

सुंदरता आणि कुरूपता…  ☆ श्री विश्वास देशपांडे

(रंगसोहळा या पुस्तकातून घेतलेला लेख)

बालकवी म्हणतात

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे

चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक  कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘

आपण सर्वसामान्य माणसे.  वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे  पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला

असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.

कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.

फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?

मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.

आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे.   इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth . ‘ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever .’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.

‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.

लेखक – श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेरणा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

परिचय

नांवः डॉ. शैलजा शंकर करोडे (साहित्य भूषण), दलितमित्र, कामगार भूषण, गुणवंत कामगार — महाराष्ट्र शासन

शिक्षणः एम.ए. (अर्थशास्र)

व्यवसायः  पंजाब नॅशनल बँकेतून Dy Manager पदी सेवानिवृत्त

प्रकाशित पुस्तकेः कथासंग्रहः आठ, कवितासंग्रहः तीन, चारोळी संग्रह :दोन, कृपाप्रसादः भक्तिगीत संग्रह, कादंबरीः चार, संदर्भग्रंथः खान्देशची लोकसंस्कृती व लोकधारा (उत्तर  महाराष्र्ट विद्यापीठ जळगांवने लोकसाहित्य एम.ए. भाग 1 साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे), काॅलम लेखनः  तरुण भारत, दै. गांवकरी

कामगार साहित्य संमेलन औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नाशिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  डोंबिवली, सत्य शोधकीय साहित्य संमेलन, जळगाव, परीवर्तन साहित्य संमेलन जळगाव, फुले आंबेडकर साहित्य संमेलन, भुसावळ, समरसता साहित्य संमेलन, जळगाव, बोली भाषा साहित्य संमेलन, भुसावळ, अस्मितादर्श साहित्य संमेलन, जळगाव, औरंगाबाद, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल, जळगाव, म. युवा साहित्य संमेलन, जालना, ओबीसी साहित्य संमेलन, जळगाव, साहित्य कला मंच कुडूस भिवंडी—साहित्य संमेलन, जळगाव जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, अशा अनेक ठिकाणी निमंत्रित कवी, कवी संमेलनाध्यक्ष, कथासत्र अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष. तसेच Online संमेलनांचे अध्यक्ष पद भूषविले आहे.

सन्मानप्राप्ती

1) महाराष्र्ट शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक

2) मराठी काव्यकोषातील महान ग्रंथ poetry mile stone या ग्रंथात “सामना” कवितेचा समावेश

3) महाराष्र्ट हिन्दी साहित्य अकादमीतर्फे “अभंग——महाराष्ट्र के हिन्दी कवी प्रातिनिधीक रचनाये” या ग्रंथात दोन कविता समाविष्ट

4) विश्व हिन्दी संमेलनसे संलग्न संस्था, महाराष्ट्र हिन्दी सेवी संस्थान द्वारा प्रकाशित “महाराष्ट्र के जिवंत हिंदी कवियोंकी रचनाये” या ग्रंथात ५ कवितांचा समावेश

5) ठाणे येथे आयोजित पोएट्री मॅरेथान या सलग 85 तास चाललेल्या व गिनीज रेकाॅर्ड तयार करणार्‍या कवी संमेलनात  कविता सादर

6) आम्ही लेखिका गृप (ठाणे, मुंबई, नवी मुंबई) यांचेद्वारे आयोजित संमेलनात जेष्ठ साहित्यिक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव सहभाग  इत्यादी.

पुरस्कार प्राप्ती

१) दलितमित्र, गुणवंत कामगार, कामगार भूषण हे महाराष्र्ट शासनाचे पुरस्कार प्राप्त

२) दै.लोकमतचा “सखी” पुरस्कार, दै.सकाळचा “तेजःस्विनी” पुरस्कार, अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेचा “जीवन गौरव” पुरस्कार

अन्य पुरस्कार – ग्लोबल एकाँनामिक्स कौंन्सिल नवी दिल्ली चा “राष्ट्रीय रतन” पुरस्कार, कथासंग्रह “अग्निपरीक्षा” यास पंजाब नॅशनल बँकेचे राष्ट्रिय स्तरावरील पुरस्कार, एल्गार साहित्य रत्न पुरस्कार, भारतीय साहित्य अकादमीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा बहीणाबाई काव्य पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा प्रा. राजा महाजन  स्मृती पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परीषद पर्यावरण संमेलन पुणे यांचा “जीवन गौरव पुरस्कार अकोला “साहित्यरत्न” पुरस्कार, “साहित्य भूषण” पुरस्कार, पंजाब नॅशनल बँकेचे कथा, कविता, निबंध लेखन “पीएनबी दर्पण व पीएनबी स्टाफ जर्नल मधील उत्कृष्ठ लेखन, तसेच हिन्दीचे सर्वश्रेष्ठ योगदान असे विविध 50 पुरस्कार प्राप्त, स्टेट बँक, महाराष्र्ट बँक, सेंट्रल बँक, विजया बँक, कॅनरा बँक यांचेही पुरस्कार प्राप्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष समाजसेवा पुरस्कार ——अनोखा विश्वास इंदौर म प्र., कामगार रत्न पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, नेरूल हिरकणी पुरस्कार, जलगाव  हिरकणी पुरस्कार,  “कर्तव्य योगिनी सन्मान” प्राप्त, आम्ही लेखिका, ठाणे जिल्हा द्वारा “नवदुर्गा सन्मान” प्राप्त, कोरोना योध्दा सन्मान, कवयित्री बहिणाबाई विशेष सन्मान, साहित्यभूषण पुरस्कार, नारी गौरव पुरस्कार

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेरणा… ☆ डॉ. शैलजा करोडे 

चला सायंकाळचा स्वयंपाक आटोपला एकदाचा म्हणत मी थोडंस हुश्श केलं. मसालेदार खिचडी व स्वादिष्ट कढीचा छोटासा मेनू होता पण तेवढ्यानंही दमछाक होते आजकाल. “अगं वयपरत्वे होतं असं” मैत्रिणींचं अनुमान. “घाबरुन जाऊ नकोस, पण काळजी घे स्वतःची”.

मला हे सगळं आठवलं आणि चेहर्‍यावर स्मित पसरलं. चला आता थोडासा टीं व्ही लावून सह्याद्री वाहिनीवरील बातम्या पाहू असं म्हणताच, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मी काॅल रिसिव्ह केला. “नमस्कार मॅडम, मी नितिन महाशब्दे बोलतोय.” 

“बोला सर, तुमचा नंबर सेव्ह आहे माझेकडे.” 

“मॅडम आपण जाणतातच, आपल्या अक्षर मंच प्रतिष्ठानद्वारे ‘अखंड वाचन यज्ञ’ उपक्रम आपण राबवित आहोत. उद्या, म्हणजे 13 ऑक्टोबरला गावदेवी विद्या मंदिर, डोंबिवली येथे या वाचन यज्ञाचा आपण प्रारंभ करीत आहोत. शाळेतील विद्यार्थी सलग दोन तास अखंड वाचन करतील आणि ते ही प्रत्येक वर्गात. त्यानंतर बक्षीस वितरण आपल्या हस्ते होईल. संस्थेने पन्नास प्रमाणपत्र व पुस्तकं पाठवली आहेत बक्षीस म्हणून. आपल्यासारख्या जेष्ठ लेखिकेकडून या अखंड वाचन यज्ञाचा प्रारभ व्हावा व बक्षीस वितरण व्हावं ही अक्षर मंचसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण जाणार ना मॅडम.” 

“होय नितिनजी, जाईन मी. मला तुम्ही शाळेचा पूर्ण पत्ता पाठवा‌.” 

“मॅडम, मी शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन नंबर पाठवतो, आपण त्यांना फोन करा. सर सविस्तर सगळं सांगतील. बरं मॅडम, रजा घेतो आपली. पुढचेही अनेक नियोजन आहेत. धावपळ होतेय खूप.” 

“ओ के सर, धावपळ करत असतांना स्वतःची ही काळजी घ्या.” 

“ओ. के. मॅडम, शुभरात्री.” नितिन महाशब्देंनी फोन ठेवला. 

चला अजून एक नवीन काम करायचंय. वाचन प्रेरणेवर उद्या बोलायचंय.. तयारी करावी लागेल थोडीफार.

मी शाळेत बरोबर 12.15 ला पोहोचले. शाळा 12.30 ला सुरू होते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा चिवचिवाट सुरू होता. सोबत पालक आलेले होते आपल्या पाल्याला सोडायला. अशा या ज्ञानमंदिरात बालकांच्या किलबिलाटात मन एकदम प्रसन्न झाले. संस्थेचे जेष्ठ शिक्षक पाटील सरांनी माझे स्वागत केले व मला एका वर्गात छानपैकी पंख्याखाली बसवले.

शाळेची घंटा झाली. राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रतिज्ञा संपन्न झाली. एव्हाना मुख्याध्यापक सरही आले व आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलो.

शाळा छोटीशी होती. पूर्व प्राथमिक व प्राथमिक इयत्ता 7 वी पर्यंत. पण विद्यार्थी संख्या चांगली होती 418. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी झाकोळून जात असतांना या शाळेने मराठी बाणा जपला होता. शिक्षकवृंद चांगला व मेहनती होता.

थोड्याच वेळात ‘अखंड वाचन यज्ञा’ला सुरूवात झाली. “मॅडम चला, जाऊया प्रत्येक वर्गावर, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.” 

मी वर्गावर जाताच सगळे विद्यार्थी उठून उभे राहिले व गुड माॅर्निंग टिचर, आपलं स्वागत आहे,” एका तालासुरात सगळ्यांनी म्हणत टाळ्यांचा कडकडाट केला. फळ्यावर आजचा उपक्रम व प्रमुख पाहुणे म्हणून माझे नाव लिहिलेले होते. मी सगळ्याच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे वाचन ऐकले, वीर सावरकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम… छान वाचन सुरू होते.

शाळेच्या प्रांगणातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या फोटोंचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे प्रास्ताविक व विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला जात होता आणि मी भूतकाळात शिरले होते, माझ्या शालेय जीवनात रमले होते.

“बरं का मीनाक्षी, उद्या जागतिक पुस्तक दिन आहे. आपल्या शाळेत कार्यक्रम आहे आणि प्रसिद्ध लेखक

उमाकांत नार्वेकर येणार आहेत. तुला उद्या भाषण करायचंय.;चांगली तयारी करुन ये. तशी तू प्रत्येकवेळी छानच भाषण करतेस. उद्याही करशील.”

सर्व शिक्षकवृंद व प्रमुख पाहुण्यांसमोर मी वाचन आणि पुस्तकाचे महत्व विषद करीत होते 

“पुस्तकानेच होतो माणूस ज्ञानी,

 ज्ञानानेच मिळतसे जीवनाला गती….”

” वाह, सुंदर, तू तर कविताही छान करतेस ” प्रमुख पाहुणे उस्फूर्तपणे बोलले. मला मिळालेली ही कौतुकाची पावती पुढे माझ्या लेखन यज्ञाला प्रेरक ठरली व कविता, कथा, कादंबरी, ललित, नाट्य, निबंध विविध अंगांनी फुलत गेली.

“आता आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीनाक्षी परांजपे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो”. 

मी तंद्रीतून बाहेर आले. माईक हाती घेतला.

“आदरणीय अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद आणि माझ्या देशाचे भविष्य घडविणारे आधारस्तंभ असणार्‍या विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही अखंड वाचन यज्ञात सहभागी झालात. विविध ज्ञानोपासकांच्या पुस्तकांचं अभिवाचन केलंत. फार सुंदर. पण विद्यार्थी मित्रांनो, वाचनासाठी शिक्षणाचा गंध लागतो. आणि पूर्वीच्या काळी जनसामान्य व स्त्री वर्गाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षण नसल्याने जनसामान्यांचे जीवन दुःखी होते. गुलामगिरीत खितपत पडल्यासारखे होते. ही बाब महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लक्षात आली.

विद्येविना मती गेली

मतीविना निती गेली

नीतीविना गती गेली

गतीविना वित्त गेले

इतके सारे अनर्थ

एका अविद्येने केले

…म्हणून ज्योतिबा व सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीमाई होत्या म्हणूनच आज मी तुमच्यासमोर भाषण करू शकतेय. त्यांनी दिलेला शिक्षणाचा वसा वसतेय.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेच आहे ‘वाचाल तर वाचाल’. स्वतः बाबासाहेब खूप वाचन करीत. परदेशातून भारतात येतांना त्यांनी 37400 पुस्तकांचं भांडारच जणू बोटीने भारतासाठी रवाना केले. पण बोट दुर्घटनेत ती सगळी पुस्तके गेली. यावरून लक्षात येईल की बाबासाहेबांना वाचनाचा केवढा व्यासंग होता. या व्यासंगातूनच जगातील सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करुन भारतासाठी समाजातील सर्व घटकांसाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वावर आधारित परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले. बाबासाहेब म्हणायचे एक मंदिर बांधून 100 भिकारी निर्माण करण्यापेक्षा एक ग्रंथालय बांधा व 1000 विचारवंत तयार करा.

होय मित्रांनो, वाचनामध्ये खूप शक्ती असते. कारण पुस्तक वाचतांना पुस्तक व आपल्यात एक नातं निर्माण होतं. आपण पुस्तकाशी तादात्म्य पावतो. ते वाचन, ते विचार आपल्या काळजात घर करतात आणि यातूनच प्रेरणा मिळून आपल्या विचाराला, भावनेला गती मिळते, लेखनास आपणही प्रवृत्त होतो.

माझ्या शालेय जीवनात चांगले गुरूजन मला लाभले. कविताही खूप समजावून सांगायचे, ‘बेलाग दुर्ग जंजिरा’, ‘वसईचा किल्ला असला’, ‘ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी ‘, ‘ पोर खाटेवर मत्यृच्याच दारा ‘, ‘ बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा ‘ या कविता वाचतांना, अभ्यासतांना तर माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वहात असत. कवितेशी जोडली गेलेली मनाची ही तार मलाही कविता करण्यास सहाय्यक ठरली.

विद्यार्थी मित्रांनो, परवा भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो.

डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.

जसे शरीराला अन्नाची गरज असते तसे आपल्या मेंदूला वाचनाची गरज असते. कारण त्यातूनच नव विचारांची ऊर्जा मिळते. विद्यार्थी मित्रांनो वाचनाचे पाच सहा फायदे आपणास सांगते.

  • वाचनामुळे मनाचा व्यायाम होतो.
  • वाचनामुळे विचार कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता सुधारते.
  • वाचन भाषेवर प्रभुत्व व प्रेरणेचा उत्तम स्रोत आहे.
  • वाचन मन आणि शरीरास ऊर्जा देते.
  • वाचनामुळे लक्ष आणि एकाग्रता सुधारते.
  • पण विद्यार्थी मित्रांनो आजच्या टी. व्ही. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या व संघर्षाच्या युगात वाचनासाठी कोणाजवळ वेळच नाही. आजची शिक्षण पद्धती व गळेकापू स्पर्धा यामुळे विद्यार्थी वर्गाजवळही अवांतर वाचनाला वेळ नाही. तो विद्यार्थ्यांनी काढावा व आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण व्हावे म्हणून हा आजचा ‘अखंड वाचन यज्ञ’ प्रपंच.

आपण यात सहभागी झालात, मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंत, आपल्याशी मला हितगूज करता आलं, भरुन पावले मी. आपल्या व आयोजकांच्या ऋणात राहून इथेच थांबते. 

धन्यवाद.”

एकेकाळी प्रेरणेतून घडत जाणारी मी आज एक प्रेरक ठरले होते. एक वर्तुळ पूर्ण झाले होते .

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉझिटिव्ह थॉट्स… मूळ इंग्रजी लेखक : श्री मायकल क्रॉसलँड — मराठी अनुवाद : अज्ञात ☆ प्रस्तुती:श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

पॉझिटिव्ह थॉट्समूळ इंग्रजी लेखक : श्री मायकल क्रॉसलँड — मराठी अनुवाद : अज्ञात ☆ प्रस्तुती:श्रीमती प्रफुल्ला शेणॉय 

मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले, “या मुलाला घरी घेऊन जा. स्पेन्ड टाइम विथ हिम. आम्ही आता काहीही करू शकत नाही.”

ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. पण जो आपलं, आपल्या माणसांचं अन् या जगाचं भवितव्य बदलू शकतो, असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात.

असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, “माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत?”

डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यूच होईल असे सांगितले.

माझ्या आईने त्या ९६% कडे न पाहता उरलेल्या ४% कडे पाहिले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली.

त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे, असे सांगितले. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न घालवता आईने डॉक्टरांना तत्काळ होकार दिला.

पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली. काही दिवसात अजून ४ गेली. मी एकटा उरलो होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांची बॅग उघडून औषध काढून देत असत.

इंग्लिश डिक्शनरीतल्या Love या शब्दापेक्षा Hope हा शब्द जास्त पॉवरफुल आहे, असे मला नेहमी वाटते.

लोकांना वाटते, मी वाचलो कारण मी लकी होतो. पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले.

ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाहीत, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती.

मग तो दिवस उजाडला आणि डॉक्टरांनी मला, मी बरा झालोय अशी बातमी दिली.

पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, “हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही. याने आपले टीन एज पाहिले तरी तो एक चमत्कार असेल.”

पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच.

मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकायचो. हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले.

मग एक दिवस मी आईला म्हणालो, “आई माझे एक स्वप्न आहे, मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार!”

मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही. पण तुम्ही काय करू शकणार नाही, हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा.मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्टअटॅक आला, तेव्हा मी फक्त १२ वर्षांचा होतो.

लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो.

वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो.

एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते. क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटतं .

ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत ‘अनफेअर’ वागते आहे, असे मला वाटायला लागले.

मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून घे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता आणि मला मृत्यू येत नव्हता.

पण परत एकदा मला माझा परमेश्वर इथेच भेटला आईच्या रुपात. तिने मला या नैराश्यातून बाहेर काढले.

नंतर मी बँकेची नोकरी जॉईन केली.

एक दिवस एक उंचापुरा माणूस, जो आमच्या बँकेचा सीइओ होता, त्याचे मला बोलावणे आले. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, “डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील?”

मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले. दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला, तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, “तुमच्या खुर्चीत!”

मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये, कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली. तो मला त्रास द्यायला लागला.

पण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रासच माझ्या महत्त्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो.

वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो.

वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० ब्रांचेस सांभाळत होतो.

माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सचे घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती.

पण हे यश मटेरियलास्टिक होते. आपण ज्या जगात राहतो त्या जगाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण त्या जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का?

हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल, याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे.

मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला.

जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अशा qमाझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी ७ वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते, ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अशा आविर्भावात मी आईला विचारले होते, ” आई डॉक्टर काय म्हणाले?” त्यावर आई म्हणाली होती, “काही नाही, सर्व ठीक होईल.”

मला पहिला हार्टअटॅक आला, तेव्हाही आई म्हणाली होती,” सर्व ठीक होईल”. “सर्व काही ठीक होईल” हे तिचं वाक्य माझ्यावर ऋण होते. पण दैव बघा, यावर्षी मला तिचे हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली.

आईच्या घश्यात ४ ट्युमर डिटेक्ट झाले. आईने विचारले, “डॉक्टर काय म्हणाले?” मी म्हणालो, “सर्व काही ठीक होईल.”

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगलात, याला महत्व नाही.इथे असताना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे.

तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्त्वाचे आहे.

आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे. आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे.

आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

Michael Crossland is an Author of the best seller book, everything will be Ok: A story of Hope, Love and Perspective.

मूळ इंग्रजी लेखक :श्री. मायकल क्रॉसलँड

संग्राहिका : श्रीमती प्रफुल्ला  शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. अंगे भिजली जलौघाने सुस्नात झाली वसुंधरा. वारीचे ओहळ धावती मुक्तांगणी सैरावैरा. खळखळ नाद घुमवित जल निघाले भेटाया सागरा. कडाड चा थरार झंकारला तडितेचा… दुहितेची शलाका चमकली भेदून गेली अभंग नभाला… बावरले सारे चराचर भयकंपित तनमन झाले… कुर्निसात करती तरु लता त्या होऊनी नतमस्तक वर्षा पुढे, सांगती फक्त तुझीच सत्ता आम्ही कोण ते बापुडे… आडदांड खटयाळ दगड गोटे  पथा पथावरी येती वाट ती आडविती… असमंजास त्या वळसा घालून प्रवाह दावितो  चातुर्यगती. आले नवे नवे पाणी गाती गाणी बाकिबाबा… तृषार्त झाली धरित्री तृणपातीचा कोंब लवलवे इवला इवलासाबा. शाखा पल्लव तरू लतांचे सचैल न्हाऊन निघाले, हरित लेणीचें दीप उजळले… आज दिवाळीचे साऱ्या सृष्टीला अभ्यंगस्नान घडले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🔆 विविधा 🔆

सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

(त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!)

क्रमशः…

जेम्स रँडीने वैद्यकीय क्षेत्रातल्या ‘हम्बग्ज’चाही चांगलाच समाचार घेतला. ब्राझील-फिलिपिन्समधील स्वयंघोषीत डाॅक्टर आरिगो मुळे प्रसिद्ध पावलेल्या ‘सायकिक सर्जरी’ या प्रकारात कोणतेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया केली जाते असा दावा होता… पण ती चलाखीची शस्त्रक्रिया ज्याला तो हस्तक्रिया असे म्हणायचा, ती कशी होती हे फिलिपिन्समध्ये जाऊन रँडी ने दाखविले. ऑपरेशनच्या वेळी अरिगो व त्याच्यासारख्या इतर अनेकांनी सायकिक सर्जरीचा दावा करणाऱ्या लोकांनी ऑपरेशन नंतर दाखविलेले रक्त व मांस हे बोकडाचे किंवा गाईचे असायचे हे रिपोर्ट सहित दाखविले.

व्हाईट हाऊस मध्ये बेटी फोर्ड या बाईं समोर अतींद्रिय शक्तीचे तथाकथित पण साधार प्रयोग दाखविणारा जेम्स रँडी हा एकमेव विज्ञानवादी होय.

कॉर्नेल, हॉर्वर्ड, एम.आय.टी, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, येल अशा अनेक विद्यापीठात जेम्सने व्याख्याने दिली. चलाखी व विज्ञान यांच्यावर चर्चासत्रे घडवीत एक्सॉन रिसर्च लॅब पासून नासा, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी पर्यंतच्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये व्याख्याता म्हणून जाऊनही सामान्यातल्या सामान्य भोंदूच्या चाचण्या घेण्यास जेम्स रँडी कचरला नाही. तो या चाचण्या अतिशय हुशारीने, गूढ अतिंद्रिय दाव्यासाठी, वेगवेगळ्या तयार करीत असे.

कॅलिफोर्निया हुन आलेल्या विन्स वायबर्ग या पाणाड्याने ‘डाऊझिंग’ म्हणजे काठी घेऊन विशिष्ट पद्धतीने जमिनीतील अचूक पाणी दाखवण्याचा दावा केला तेव्हा त्याने जमिनीखाली पाण्याच्या पाईप टाकून काही मधून पाणी जाणारे पाईप्स शोधून काढण्याच्या तयार केलेल्या चाचणीची तर खूपच प्रशंसा झाली. विन्स अर्थातच दावा हरला. स्यू वॅलेस नावाची पिरॅमिड व चुंबक विकणारी तरुणी मानवी रोगांचे निदान मॅग्नेट थेरपीने करीत असे. रँडीने तिच्या दाव्यांची डबल ब्लाइंड, कंट्रोल टेस्ट घेऊन तिचा चुंबकोपचाराचा दावा फोल कसा आहे हे दाखवून दिले.

1978 मध्ये ‘सायकिक न्यूज’ नावाच्या मासिकाने जाहीर केले की बिंगो स्वान हा सर्व ग्रहांवर सूक्ष्म देह आधारानं जाऊन आला आहे व मरिनर 10 आणि पायोनियर 10 या कृत्रिम उपग्रहांनी गुरु ग्रहाची माहिती जी नंतर दिली ती स्वानने पूर्वीच दिली आहे, हे दावे जसेच्या तसे एडगर मिशेल या अंतराळवीराने मान्य केले आहेत,.. याही दाव्यांची खोलवर छाननी करून रँडीने त्याच्या दाव्यांची व वैज्ञानिक दाव्यांची तुलना केल्यावर आलेल्या निष्कर्षांची जी माहिती दिली आहे ती वैज्ञानिक चाचण्या कशा कराव्यात याचा सुरेख नमुना आहे.

रँडी चा प्रोजेक्ट अल्फा नावाचा अतिंद्रिय बुवा-महाराज-परामानसशास्त्री यांची परीक्षा घेणारा आराखडा खूपच गाजला आहे.

विसाव्या शतकातील असामान्य नास्तिक म्हणून ‘दि कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल’ तर्फे वैज्ञानिक व नास्तिक विचारवंत यांची यादी करून निवड करण्यास सांगितली असता कार्ल सेगन, मार्टिन गार्डनर, पॉल कुर्टझ,  रे हॅमन, अल्बर्ट आईन्स्टाईन, बर्ट्रांड रसेल, फिलीप क्लास, कार्ल पॉपर, रिचर्ड डॉकिन्स अशा दिग्गजांनाही मागे सारून जेम्स रँडी सर्वाधिक मते घेऊन प्रथम क्रमांकावर राहिला होता ते केवळ तो कार्यकर्त्यांच्या अभिनिवेशाने सर्वत्र आव्हाने देत राहिल्याने. प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा रँडी हा अंधश्रद्धांच्या विरोधी लढाई करणारा खरातर योद्धाच!

रँडीने लिहिलेल्या तेरा पुस्तकांपैकी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक आर्थर क्लार्क म्हणतो, ” रँडीची ही पुस्तके म्हणजे पुस्तक दुकानातून हजारोंचे मेंदू सडविणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टींना योग्य मार्गावर घेऊन जाणारे दीपस्तंभ आहेत”

धर्माचा आधार घेऊन प्रचंड शोषण व फसवणूक चाललेल्या पीटर पॉपहॉफ सारख्या ख्रिस्तोपदेशकाचे बिंग  फोडताना व्यथित झालेला रँडी म्हणतो…

‘मानवाचे शहाणपण, पैसा आणि कधीकधी जीवसुद्धा हिरावून घेणाऱ्या अवैज्ञानिक अतिंद्रिय गुढ गोष्टींची हकालपट्टी केली पाहिजे.’

यावर वॉशिंग्टन स्टार या दैनिकाने टीका करून हे सारे अस्तित्वात कुठे आहे असे विचारले. तेव्हा रँडीने फटकारले…..

“लिहिणाऱ्याने त्या गरीब पालकांचे चेहरे पाहिले नाहीयेत ज्यांची मुले गूढ संप्रदायामध्ये सामील होऊन वहावत गेली आहेत…त्याने अशी माणसे पाहिली नाहीत ज्यांनी शापाचा धसका घेऊन जीव घालविला… अशी स्त्री पाहिली नाही की ज्या स्त्रीने धर्म बैठकातुन प्रियकराचा धावा केला पण ती तेथेच लुटली गेली… महाशय जा त्या गयानात जेथे 950 मुडदे केवळ रेव्हरंड जिम जोन्स मुळे हेवन गेट कडे गेलेत…!! उकरून काढाल ते मुडदे?”

20 ऑक्टोबर 2020 ला रँडी विश्वात विलीन झालाय.

आतड्याच्या कॅन्सरशी झुंज देत 92 वर्षांपर्यंतच्या प्रवास करणे सोपे नसते..10 वर्षापूर्वी तो म्हणाला होता..” मृत्यू कधीतरी येणार आहेच. या पृथ्वीने मला प्राणवायू एवढी वर्षे पुरवलाय हेच खूप नाही का?….!”

डाॅ.  प्रदीप पाटील

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधुरोत्सव… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

☆ मधुरोत्सव… ☆ श्री मनोज मेहता 

आपल्या हिंदू धर्मात व्रत-वैकल्य करायला वर्षभर वेगवेगळे सण येतात, त्यांच्या वेगळेपणाने सर्वांना मजाही येते.

सौ. मधुरा मनोज मेहता गेली २७ वर्षे अनेक आजारांशी झगडतेच आहे. प्रत्येकवेळी ती हसत – हसत त्यातून बाहेर पडते, हे तिचं कसबच म्हणावं लागेल. मधुराची नक्की मणक्याचीच शस्त्रक्रिया झाली की मेंदूची ? कारण २०१७ च्या मोठया शस्त्रक्रियेनंतर काही वेगळीच ऊर्जा तिला मिळाली की काय ? असा प्रश्न पडलाय मला !  

व्यक्तिगत पत्र-लेखनाने याची सुरुवात झाली. मग हळूहळू ती कविता व चारोळ्याही करू लागली. अनोख्या पाककलेची तर ती सॉल्लिड, खिलाडी होतीच, आता तर अष्टपैलूच झाली. लॉकडाऊन पासून तर तीची गाडी सुसाटच सुटली आहे, अन् वेगवेगळे पदार्थ करून त्याचे फोटो काढायची मला सरळ अहो ऑर्डरच द्यायची आणि माझ्या पोटोबालाही ती जणू खुराकच देत आलीय. असो…

श्रावण महिना हा अनेक सणांची नांदी घेऊन येतो. आमच्या अमेरिकेत असलेल्या मुलीचे १ मे २०२१ ला virtual लग्न अमेरिकेत झाले. कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही, तिचा पंचमीचा सणही करू शकत नाही. त्यासाठी काही हटके  करायचं, सौ. मधुरानं ठरवलं. 

ती श्रावण महिन्यात रोज एका सवाष्णीला फोन करून संवाद साधत होती. त्यात तिच्या बहिणी, आई, मैत्रिणी, आमच्या दोनही मुली व माझ्या मित्रांच्या सौ. ही आल्या.

यावर्षी नवरात्रीला तर मधुराने कमालच केली. घटस्थापनेच्या दिवशी घरच्या देवीची ओटी भरून झाल्यावर, सकाळी व्हाटस्अपवर रोज त्या त्या देवीची माहिती सौ. मधुरा स्वतःच्या आवाजात म्हणून तिच्या निरनिराळ्या ६०/७० मैत्रिणींना पाठवत होती. नंतर दिवसभरात रोज नऊ मैत्रिणींना, त्यात २७ वर्षांपासून ते ८७ वर्षांच्या आजींपर्यंत फोनवरून संवाद साधत होती. प्रत्येकीशी संवाद साधत असताना, तिला त्यांचा चेहरा दिसत नसला, तरी दोघींच्या संवादातून होणारा आनंद, मी कधी – कधी हळूच अनुभवत होतो.

या नऊ दिवसात आमच्या घरी येणाऱ्या सौभाग्यवतीची ओटी भरायची. या वर्षी, नवमीच्या दिवशी उद्यापन रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ज्या आपल्या संसाराला हातभार लावून तो टिकवण्यासाठी धडपडत असतात, त्यांना वाण देऊन, आनंदोत्सव साजरा करताना मधुराचा चेहरा काय फुलून गेला होता ना, त्याला तोड नाही ! मनांत म्हटलं देवानू, माझ्या मधुराला अशीच कायम आनंदी ठेवा रे !

“आजची तरूण पिढी ऑनलाईन कामात किंवा कामावर असूनही व्यग्र असलेल्या, तर ज्येष्ठ मंडळी घरात कोणी एकटे अथवा आपल्या कुटुंबासह असायचे, अशावेळी सर्वांच्या वेळा सांभाळून, घरातील ज्येष्ठ व तरुण सौभाग्यवतींना सौ. मधुराचा अवचित आलेला फोन हा नक्कीच त्यांना आनंदून गेला असेल. तिला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसल्याने स्वतः फोन करून सर्वच पिढ्यांशी तिने संवादाचा सेतू बांधला. नाहीतरी आपले ‘सण-उत्सव’ साजरे करण्यामागे हाच तर हेतू आहे ना !

सर्व सौभाग्यवती मैत्रिणींना फोन करणे शक्य नाही, पण पुढच्या वेळी नक्की हं, असं मला हळूच कानात सांगितलं हो… 

असा अनोखा व भन्नाट उपक्रम तिच्या कल्पनेतून आज साकार झाला, म्हणून तिच्यासाठी खास सप्रेम…

खरं तर देव माणसातच आहे, तो शोधण्याच्या तिच्या या अफलातून आयडियेच्या कल्पनेला मनापासून सलाम !

“…हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना…

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

असाही एक तुरुंग अधिकारी—  

मानवतेचा पुजारी असणारा, रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहाचा तुरूंग अधिकारी अमेय मिलिंद पोतदार…  

अमेयची बदली झाली तर आम्हीही त्यांच्यासोबत त्यांच्याच जेलमध्ये जाणार अशी मागणी कैदी करतात. असा हा महाराष्ट्रातील सर्वात Youngest जेलर.

लहानपणी दहावीत असताना आजीला मुंबईला  जाण्यासाठी रात्री सोडण्यास गेला असता कोंडाळ्यात वयोवृद्ध स्त्री अन्न शोधून खात होती हे विदारक दृष्य पाहून अस्वस्थ होतो. आईकडून पैसे घेतो व धावत पळत बिस्किटचे पुडे आणून त्या स्त्रीला देतो. ती ते पुडे अघाशासारखे खात असताना त्याला आजीने दिलेला मसाले भाताचा डबाही तो त्या वृद्ध स्त्रिला खायला देतो. लहान वयातील हा माणुसकीचा गहिवर तुरूंगाधिकारी झाल्यावरही ज्याच्याकडे कायम राहिला तो म्हणजे  अमेय होय.

विनोबा भावे, सानेगुरूजी, बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांच्याकडे समाजाप्रती असणारी करुणा अमेयकडे बालपणापासून चरित्र वाचनातून व शिक्षिका असणाऱ्या आईकडून अंगी बाणली. कोल्हापुरात जि.प.व म.न.पा.शाळेत मराठी माध्यमात शिकलेला अमेय MPSC मधून तुरूंग अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे रूजू झाला.

जन्मजात कोणी गुन्हेगार नसतो. सर्वांत मोठा अधिकार सेवेने व प्रेमाने प्राप्त होतो याची जाणीव अमेयला होती. गुन्हेगारामध्येसुद्धा माया, ममता, आपुलकी,आत्मियता, आपलेपणा असतो यावर विश्वास असणारा अमेय…. रत्नागिरी कारागृहात खतरनाक बंदीजनांसोबत राहून त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूसपण जपले की कैदी मनाने मोकळे होतात. जमिनीवर पाय ठेवून काम केले की लोकांना आपलेपणा वाटतो. हे लक्षात घेऊन काम केल्याने बंदीजनांना अमेय आपला सखा, मित्र,  सोबती वाटू लागला आहे. मन समजून घेता आले तर मनास जिंकता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेय. आकाशसारखे अनेक खतरनाक कैदी अमेयच्या इतके प्रेमात पडले आहेत की तुमच्या बदलीनंतर आम्ही काय वाटेल ते करून तुमच्याच जेलमध्ये येऊन उर्वरीत शिक्षा पूर्ण करणार असा आग्रह धरतात. याला काय म्हणावे? यापूर्वी हे शिक्षकांच्या वाट्याला यायचे पण तुरूंगाधिकारी यांच्यासाठी असे होते तेव्हा देशाचे भविष्य उज्ज्वल आहे असे दिसते. (पूर्वी ‘ दो आँखे बारह हाथ ’ या सिनेमासारखा जेलर व कैदी असतील तर किती बरे होईल असे वाटायचे. आता ते सत्यात येत आहे. महामहीम किरण बेदी यांनी तिहार जेल बदलवला होता.  अमेय तसाच प्रयत्न करत आहे.)

आपल्या वाट्याला आलेले काम समाजासाठी, राष्ट्रासाठी उपयुक्त  करून आवडीने, प्रामाणिकपणे व मनोभावे करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती हे अमेयला ठाऊक आहे. तारूण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ असतो. म्हणून अमेयने नवनवीन चॅलेंज स्वीकारली. अमेयला त्याचे दैवत असणाऱ्या वीर सावरकर यांचे वास्तव्य असणारी कोठडी व त्यांच्या वापरातील साहित्य व अभिलेख केवळ ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करून ठेवल्याचे दिसून आले . अमेयने उपलब्ध साधनसामुग्रीतून नूतनीकरण करून ही वास्तू ‘स्मृतिभवन‘ म्हणून विकसित केली. वीर सावरकर  यांचा जीवनपट सदर कक्षात पोस्टरच्या स्वरूपात, तसेच छानशा लघुपटाद्वारे भेटीस येणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला. ऐतिहासिक वारसा अभिनव पद्धतीने जतन करण्यासाठी वरिष्ठांनी अमेयच्या अथक प्रयत्नांचे खूप कौतुक केले. केवळ वास्तू न  बघता अमेय जेव्हा प्रचंड वाचन, अमोघ वक्तृत्व , ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास या जोरावर पर्यटकांना वा महनीय व्यक्तींना वीर सावरकरांचा इतिहास सांगतो, तेव्हा लोक भारावून जातात. त्यांच्या अश्रूंचा अभिषेक कोठडीस होतो.

अमेयकडे समाजभान  असल्यामुळे त्याने स्वत:च्या लग्नातील २५ किलो अक्षता पक्षीमित्रांसाठी दिल्या . लग्नात अंगावर टाकून त्या वाया घालविल्या नाहीत.  रत्नागिरी कारागृहाकडे १५ एकरपैकी १२ एकर पडून असणाऱ्या  जागेवर विविध फळझाडे (आंबा व नारळाची खूपच झाडे) लावली आहेत. बागायत शेती विकसित केली आहे. बंदीजनांना विश्वासात घेतले तर नरकाचे नंदनवन होते हे सिद्ध केले आहे. राज्यात काही कारागृहात घेतलेला मधमाशी पालन  प्रकल्प रत्नागिरी येथे सुरू केला आहेे. मधाचे ” मका” नावाने ब्रॅडिंग होणार आहे. मधमाशी पालन प्रकल्पामुळे मधाबरोबर परागीकरणाचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होईल हा अमेयला विश्वास आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वतीने त्याने ‘ पक्षी वाचवा मोहिम ‘  कारागृहात सुरू केली. पक्ष्यांसाठी कारागृह परिसरात घरटी व पाण्याची भांडी ठेवण्यात आली. स्वत:च्या लग्नातील अक्षता व दुकानात  पडलेले धान्य यांचा वापर केला. आज विविध पक्षांचे आनंदाचे व सुरक्षित आश्रयस्थान म्हणजे कारागृहाची शेती झाली आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्य अंध मुलांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते कारागृह परिसरात  वृक्षरोपण केले. मुलांसाठी हा अनोखा कार्यक्रम ही पर्वणीच होती.                       

बंदीजनांच्या कुटुंबांची सार्वत्रिक गळाभेट घडवून आणणे , एकत्रित भोजन करणे, एकमेकांना डोळ्यांत साठविणे आणि मुलांना ‘ खूप शिका, आईचे ऐका, खूप मोठे व्हा.आईची काळजी घ्या. माझी काळजी करू नका ‘ हे संवाद ऐकताना कारागृहात अश्रूंचे सिंचन होते हा अनोखा..  भावनेने ओथंबलेला, कारागृह गहिवरून टाकणारा अनुभव अमेयने घेतला.                     .        

 २००५ पासूनच्या बंदीजनांची माहिती PRISMS या प्रणालीमध्ये विहीत कालावधीत उत्कृष्टरित्या पूर्ण करण्याचे कठीण काम अमेयने करून दाखवून वरिष्ठांची वाहवा मिळविली . संगणकीकृत प्रणालीमध्ये, असणाऱ्या २४ मोड्यूलपैकी २१ मोड्यूल चालू करण्यात खूप मोठे योगदान अमेयचे होते.                        .      

बाबा आमटे नेहमी म्हणत, ” मी माणसांना माणसात आणण्याचे काम करतो “. अमेय हेच काम पुढे चालवत आहे. विनाशकारी शक्तीचे रूपांतर कल्याणकारी शक्तीत करण्याचे काम संस्काराद्वारे,आचरणाद्वारे अमेय करतो आहे.  बंदीजन जेव्हा शिक्षा संपून जातात तेव्हा अमेयची भेट सासरी जाणाऱ्या मुलींसारखी असते. आपला तुरूंगाधिकारी आपण जाताना गहिवरतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात…  हे पाहिल्यावर बंदीजन बाहेर माणुसकीने, चांगुलपणाने वागण्याची हमी देऊन जातात, तेव्हा या बापाचा जीव भांड्यात पडतो. कसलं नातं??? 

आई- बाप हेच त्याचे दैवत. तुरूंगाधिकारी झाल्यावरही ‘हॉटेलमधील प्लेटमध्ये राहिलेली भाताची शिते पुसून घे’ म्हणणारा बाप अमेयला भेटला. ‘मोठ्या माणसांच्या पायाला युनिफॉर्मवरही असताना हात लाव’ असे शिकविणारी आई. ‘भ्रष्टाचाराच्या वाऱ्यालासुद्धा उभा राहू नकोस. हरामाचा पैसा विषासारखा असतो.’ हे तत्वज्ञान रुजविणारे आई- बाप असतील तर अमेयसारखा मुलगा घडू शकतो. चांगुलपणावर विश्वास ठेवून चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे अमेयसारखे अधिकारी प्रत्येक क्षेत्रात थोडे का असेना आहेत. म्हणून तर देशाचा भविष्यकाळ उज्वल आहे.                      .         

“अमेय, तू हाताखालील कॉन्स्टेबल, हवालदार, लिपीक व परिचर यांच्यावरही जीव लावला आहेस. माझ्यासारखा केवळ वयाने खूप मोठा माणूस असूनही तुला वंदन करून सलाम करतो.    

…  बाळ, खूप खूप शुभेच्छा व अनेक शुभाशिर्वाद.” 

लेखक : श्री संपत गायकवाड.

माजी सहाय्यक शिक्षण संचालक

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares