हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 91 – देश-परदेश – अंतरराष्ट्रीय विवाह ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है व्यंग्य की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ व्यंग्य # 91 ☆ देश-परदेश – अंतरराष्ट्रीय विवाह ☆ श्री राकेश कुमार ☆

आज प्रातः काल फोन की घंटी बजी प्रथम तो हमें भ्रम सा प्रतीत हुआ, क्योंकि हमारे फोन पर कॉल आवक शून्य है, हां, जावक ही जवाक हैं। सभी परिचित विभिन्न समूहों  में ही हमारे लेख पर प्रतिक्रिया देकर अपने जीवित रहने का प्रमाण दे देते हैं।

फोन करने वाले की आवाज कुछ पहचानी सी लगी, लेकिन उसने बताया वो फलां ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज से बोल रहा है। उसने शिकायत भरे अंदाज में बोला कि आपने, अपने लेख में हमारे परिवार के विवाह को उसके वैभव से बहुत कम आंका है, वो देश या राष्ट्रीय विवाह के स्तर से कहीं बढ़ कर अंतरराष्ट्रीय स्तर से भी ऊपर है।

पूरे विश्व से अनेक बड़ी बड़ी हस्तियां अपने अपने चार्टर्ड विमानों द्वारा कार्यक्रम में शिरकत करने के लिए आ रहे हैं। इतनी अधिक संख्या में विमानों की पार्किंग पड़ोस के कुछ हवाई अड्डों तक पर भी की जा रही हैं।

आप अपनी गलती को सुधार कर इसके वास्तविक स्वरूप को जनता के समक्ष प्रस्तुत करें।

हमने डरते हुए क्षमा याचना मांग कर, अपनी भूल को माफ करने का आग्रह किया। इसके साथ हमने विश्वास दिलाया कि हम आज ही इस विवाह को अंतरराष्ट्रीय स्तर का मान कर लेख लिख देंगे।

सामने वाले ने कहा वो तो ठीक, लेकिन जब आप मुंबई में रहे थे, तो हमारी सेवाएं क्यों नहीं ली ? हमारा मोबाइल कभी भी उनके रिकॉर्ड में दर्ज नहीं हैं। यदि आपने वहां कभी सेवाएँ ली होती तो, आप को भी सोन पापड़ी का आधा किलो का डिब्बा मिल जाता।

फिर हंसते हुए वो बोला, हम जॉकी नावेद खान बोल रहे है, और आप रेडियो मिर्ची मुर्गा पर लाइव हैं।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ डॉ कुँवर प्रेमिल सम्मानित  – अभिनंदन ☆ प्रस्तुति – श्री जयप्रकाश पाण्डेय ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ डॉ कुँवर प्रेमिल सम्मानित  – अभिनंदन ☆ प्रस्तुति – श्री जयप्रकाश पाण्डेय

संस्कारधानी जबलपुर के विजयनगर में अग्रसेन मंडपम में योगाचार्य रमाकांत पलहा जी ने डा कुंवर प्रेमिल जी का सम्मान किया। वहीं प्रेमिल जी ने अब तक प्रकाशित एक दर्जन पुस्तकों में से कुछेक योगा क्लास में वितरित कर यह संदेश दिया कि योगा से तन की शुद्धि होती है वहीं अच्छे साहित्य से मन की। किताबें पढ़ने की कम होती रुचि को बरकरार रखने के लिए साहित्य को अपना सच्चा मित्र बनाएं।

कार्यक्रम के उपरांत ‘जज्बा’ लघुकथा का पाठ कर, लघुकथाओं के प्रति सम्मोहन बनाए रखने के लिए लघुकथा की पुस्तकें भी वितरण की गई।

संदर्भवश डॉ प्रेमिल द्वारा पठित लघुकथा आपके लिए सादर प्रस्तुत है – 

☆ लघुकथा – जज्बा ☆

(16 दिसंबर से पहले)

शहर के पार्क में कुछ महिलाएं, कुछ युवतियां सुबह-सुबह इकट्ठे होकर योगाभ्यास किया करती।

सब कुछ ठीक-ठाक होता पर सिंह आसन में जीभ बाहर निकाल कर हुंकार भरने के प्रयत्न  में कमजोर पड़ जाती। मैं अक्सर सोचता कि सिंह आसन में यह सब शेरनी जैसा दमखम कहां से लाएंगी भला। मुंह से करारी आवाज़ निकलेगी तब ना। महिलाएं पुरुषों जैसा जज्बा कहां से लाएंगी आखिर।

(16 दिसंबर के बाद)

कुछ दिनों बाहर रहने के बाद पुनः शहर लौटा तब तक दिल्ली में निर्भया के साथ वह भीषण वहशी कांड हो चुका था। उस रूह कंपकंपाने  वाली दास्तान से पूरा देश उबल  रहा था। महिलाओं ने एकजुट होकर अपनी ताकत दिखा दी थी।

मैं फिर एक दिन इस पार्क में था। महिलाओं का सिंह आसन चल रहा था। अपनी लंबी जीभ निकाले यह वामा दल शेरनियों में तब्दील हो चुका था। अत्याचारियों को फ़ाड़कर खा जाने वाला जज्बा उन में आ चुका था। मानो, किसी ने इन्हें छेड़ने की हिमाकत की तो यह सब चीर फाड़ कर रख देंगीं। निर्भया के बलिदान ने इन्हें इतना निर्भय तो कर ही दिया था।

– और तब मेरा हाथ इन्हें सलाम करने की मुद्रा में अपने आप ऊपर उठ गया था।

– डा कुंवर प्रेमिल

प्रस्तुति – श्री जय प्रकाश पाण्डेय, जबलपुर

💐 ई- अभिव्यक्ति परिवार की ओर से डा कुंवर प्रेमिल  जी को इस विशिष्ट सम्मान के लिए हार्दिक बधाई 💐

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #245 ☆ विठूचा जागर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 245 ?

☆ विठूचा जागर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सौख्यसागरात भक्तिचा वावर

मनोभावे चालू विठूचा जागर

*

ज्ञाना तुका दोघे पंढरी निघाले

जनसमुदाय सोबत चालले

डोळ्यांनी टिपला भक्तिचा सागर

*

एकतारी संगे जोडलेली नाळ

बोलू लागलेत मृदंग नि टाळ

प्रसाद वाटते कोरडी भाकर

*

गरीब श्रीमंत नाही उपहास

विठूच्या भेटीची प्रत्येकाला आस

सारेच माऊली केवळ आदर

*

मन हे प्रसन्न वाटे येथे धन्य

मुखी विठू नाम नाही काही अन्य

देह कंटाळता पसरे चादर

*

तुला भेटण्याची लागलेली ओढ

कष्टाचा प्रवास तरी वाटे गोड

आलोय सोडून शेतात नांगर

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओली कविता… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ओली कविता... ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुटलेले तारे  डोळ्यातून ढळतात

डोळ्यात आभाळ पागोळ्याच गळतात.

*

फिरलेत वारे   धुंदरात्री छळतात

का कोण जाणे ते  मनावर जळतात.

*

हि नाती वेगळी  पावसात जुळतात

अनोळखी स्मृती भिजवीत पळतात

*

अजून धरतीच्या गालावर ओघळ

भावनेच्या पानावर घरंगळतात.

*

कातरवेळी निरवतेत टपटपत्या

ओल्या कवितेस शब्द अलगद मिळतात.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? विविधा ?

☆ सांगू कशी तुला मी…? – लेखक – डाॅ. शमा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

रविवारची सकाळ. उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खरं म्हणजे धाक कसला, धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.

अगदी बालपणापासून, नंतर सासरी आल्यावर देखील, घरात आई-बाबांचे छत्र होतेच. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता. सकाळी सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून  शिस्तीत जगण्याचा, एक संस्कार मनावर पक्का झाला होता.

त्यावेळी त्या शिस्तीचा खरंतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे, व्यवस्थित वस्तू आवरणे, वस्तू जागेवर ठेवणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. …आता असं वाटतं आमच्या आई-बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला, पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं.

हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.

हळूहळू आई-मुले, वडील-मुले, सासू-सून, सासरे-सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता असं अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला.

पूर्वी आई-वडील म्हणायचे, “वळण नसेल तर सासरी गेल्यावर जड जाईल. आत्ताच शिका सगळे”. आता आई वडील म्हणतात, “जाऊदे, लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर, तेंव्हा राहूदे थोडे मोकळे.”

पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे, “तुम्ही नीट तर पुढची पिढी नीट.” आणि आताचे सासू- सासरे म्हणतात “कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना”, आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला.

आता आपण, म्हणजे आमची पिढी नकळतपणे आपल्याच मुलांना, मुलींना व्यवस्थितपणा नाही, टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते असं नाही, आई देखील मुलीच्या या बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल नं?

आता असं वाटतं, घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध, आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना, मुलींना, सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगतांना, मुलांना काय वाटेल, सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.

आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली, मुले, सूना यांना वळण लावत नाही, संस्कार करत नाही असे नाही, पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार, शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी, ‘आपल्याला झेपतेय नं काम, मग सारखे मुलांना बोलून ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे आणि मोकळे व्हायचे’. सुनेला, मुलांना, मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे. गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचा. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने, असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.

मला असं वाटतं, म्हंटल तर प्रॉब्लेम, म्हंटल तर ‘सध्या सगळीकडे असेच चालते’ म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग! ‘बोलू का नको? सांगू का नको?’

मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा मुलगी) दोघेही जर व्यसने, स्वैराचार, याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे.

सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते. कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. नवी पिढी, नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष, नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.

घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे. चारित्र्य, व्यसने, पार्ट्या, कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल सांगू कशी तुला मी?’ या परकेपणातून, संकोचातुन, भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.

मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल, विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक  चुकीची गोष्ट थंडपणे पहाणे हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे.

ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता, त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची मुलगी समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे, न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून परकेपणाच आहे असं समजायला हरकत नाही.

संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो, दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे, पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा’

खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे, समंजस आहे, कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते.

केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, आजी-आजोबा या सगळ्यांनीच ‘सांगु कशी तुला मी ?’ या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी गरज आहे.

आजचा हा लेख श्री. उदय मोडक, धारवाड, कर्नाटक यांच्या सौजन्याने.

लेखक : डॉ. शमा देशपांडे

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

एखादा दिवस असा उगवतो की काहीच करायची इच्छा होत नाही. फक्त कंटाळा आणि कंटाळा. सुट्टी असूनही प्रचंड बोर झालेलो. काय करावं सुचत नव्हतं. एकदम कपाट आवरायची लहर आली. पसारा बाहेर काढताना जुनी लाल डायरी सापडली. उत्सुकतेनं पानं चाळताना ‘मन’ जुन्या दिवसात गेलं. तीसेक वर्षापूर्वीच्या नोंदी,सहा आकडी लँडलाईनचे नंबर पाहून गंमत वाटली. एका नंबर जवळ नजर थबकली. त्यावर कधीच फोन केला नाही की त्या नंबरवरून कधी फोन आला नाही तरीही. . . . . . आपल्या मोबाईलमध्ये नाही का काही नंबर उगीचच सेव्ह असतात अगदी तसंच. जुन्या आठवणीत हरवलो असताना मोबाईलच्या आवजानं वास्तवात आणलं.

“कुठं आहेस”ऑफिसमधल्या मित्राचा फोन.

“घरी”

“म्हणजे तुला कळलं नाही ”

“काय झालं. मी कायम ऑनलाइन नसतो. ”

“व्हॉटसप चेक कर. उद्या नवीन सीईओची व्हिजिट आहे. आत्ता सगळ्यांना कंपनीत बोलावलयं”

“अशी एकदम अचानक व्हिजिट”

“उद्या आल्यावर डायरेक्ट विचार”मित्र वैतागला.  

“माझ्यावर कशाला चिडतोस. ”

“मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. . सोड ना लवकर ये. बाय” 

कसं असतं ना आपलं आयुष्य!!

काहीवेळा पूर्वी काय करावं सुचत नव्हतं अन आता डोक्यात कामांचा विचार सुरू झाला. गडबडीत आवरून ऑफिसला पोचलो. सीईओ येणार म्हणून सगळेच टेंशनमध्ये आणि दडपणाखाली होते. जो तो रेकॉर्ड अपडेट करण्याच्या प्रयत्नात आणि आमचे साहेब तर प्रचंड अस्वस्थ. क्षुल्लक कारणावरून चिडत होते. दिसेल त्याला झापत होते. अशा तणावपूर्ण वातावरणात काम करून रात्री उशिरा घरी आलो अर्थातच शांत झोप लागली नाही.

सकाळी नेहमीपेक्षा लवकरच ऑफिसला पोचलो. वातावरण रोजच्या सारखं  नव्हतं.  सगळ्यांच्या चेहऱ्यावर अदृश्य तणाव होता आणि तो क्षण आला. पाचच मिनिटांत सीईओ पोचत आहेत असा निरोप आल्यावर सगळे एकदम दक्ष. काही वेळातच महागडी काळ्या रंगाची कार दारात थांबल्यावर साहेब दार उघडायला धावले आणि सगळे डोळे फाडून पाहू लागलो. गाडीतून उतरलेल्या सीईओंना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

 ऊंच,स्मार्ट,गोरा रंग,चाळीशी पार केलेली तरी देखणंपण लपत नव्हतं,काळा गॉगल लावलेल्या मॅडमना पाहून दबक्या आवजात चर्चा सुरू झाली. साहेबांनी बुके देऊन स्वागत केलं आणि टीमची ओळख करून द्यायला सुरवात केली तेव्हा मॅडमनी थांबवलं. “नो फॉर्मॅलिटीज, ओळख नंतर होईलच. लेट्स स्टार्ट द वर्क” मॅडमचा पवित्रा बघून दिवस कसा जाणार याचा अंदाज आला. अभिवादनाचा स्वीकार करत जात असताना मला पाहून अचानक मॅडम थांबल्या अन गॉगल काढून हसल्या तेव्हा भीतीची लहर सर्वांगातून गेली. विचारांच्या भुंग्याचं कुरतडणं सुरु झालं.  

“मॅडम तुझ्याकडं पाहून हसल्या का रे?”मित्रानं विचारलं. ) 

“मला काय माहिती. जा त्यांनाच विचार. . ”

“जुनी ओळख वाटतं?”

“डोंबल!!त्या कुठं मी कुठं,आज पहिल्यांदाच बघितलं. ”

“मग तुझ्याविषयी रिपोर्ट गेलेला दिसतोय. बेस्ट ऑफ लक”मित्रानं विनाकारण टेन्शन वाढवलं. मॅडम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन माहिती घेऊ लागल्या. माझ्या इथं आल्यावर साहेबांनी ओळख करून दिली तेव्हा मॅडम “येस आय नो अबाऊट हिम” एवढं बोलून कामासंदर्भातले प्रश्न विचारून पुढे गेल्या. दोनदा झालेल्या भेटीत मॅडमचं वागणं वेगवेगळं होतं. आपल्याकडून मोठी चूक झालीयं आणि त्याची दखल मॅनेजमेंटनं घेतलीय याची खात्रीच पटली. कोणत्याही क्षणी केबिनमधून बोलावणं येईल या धास्तीनं काम करत होतो पण तसं काहीच झालं नाही. दिवसभर मॅडम मिटिंग्स,प्रेझेंटेशन यामध्ये बिझी होत्या. दुपारी चार नंतर ‘ऑल द बेस्ट,किप अप द गुड वर्क’ म्हणत मॅडम कंपनीतून बाहेर पडल्या तेव्हा सगळ्यांनी मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास सोडला.

“या पठ्ठ्यानं मॅडमना जिंकलेलं दिसतंय”मित्रानं पुन्हा खोडी काढली.   

“ए बाबा,गप ना. कशाला उगीच?”

“अरे गंमत केली. उगीच चिडू नकोस. ”

“तसं नाही रे. कालपासून टेन्शन होतं पण बाईंनं जास्त छळलं नाही. ”साहजिकच मॅडमविषयी चाय पे चर्चा सुरू झाली. इतक्यात फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मिस्टर अनिल”

“येस”

“धीस ईज सीईओ हियर. . . . . . ” अनपेक्षितपणे मॅडमचा आवाज ऐकून जबरदस्त झटका बसला.  

“गुड मॉर्निंग,सॉरी!!गुड इव्हीनिंग माफ करा. ”माझी त्रेधा तिरपिट उडाली.  

“घरी जायच्या आधी मला भेटा. महत्वाचं बोलायचंयं. सी यू”

“कोणाचा फोन होता रे”मित्रानं विचारलं.

“काही सिरियस नाही ना. घाबरलेला दिसतोयेस. ” 

“ नाही रे . डोन्ट वरी” घरी निघताना मघाच्याच नंबरवरुन हॉटेलचा पत्ता असलेला मेसेज आला. म्हणजे मघाशी खरंच सीईओंचा फोन होता. पोटात भीतीचा गोळा आला.

हॉटेलवर पोचल्यावर तिथला हायफायपणा पाहून आत जायची हिंमत होईना. दारातच घुटमळत होतो. परत फिरावं असं वाटत होतं. तितक्यात मॅडमचा फोन “आलात का,मी रेस्टॉरेंटमध्ये आहे. तिथ या”आत शिरताना छातीची धडधड वाढली. बावरलेल्या नजरेनं पाहताना एका टेबलावर मॅडम दिसल्या. समोर जाऊन उभा राहिलो.  

“बसा”मॅडम सांगितलं.

“नको”

“मिस्टर अनिल,बसा” मॅडम चढया आवाजात म्हणल्यावर निमूटपणे खुर्चीवर बसलो. बेचैनीमुळं उजवा पाय जोरजोरात हलायला लागला.  मॅडम फक्त एकटक पाहत होत्या त्यामुळे जास्तच अवघडलो. दोन ग्लास पाणी पिलं तरी घशाला कोरड पडली.

“रिलक्स,मी तुम्हांला खाणार नाही” 

“मॅडम,नक्की झालंय काय?माझी काय चूक ये ?इथं का बोलावलंय”

“मि. अनिल सगळं कळेल. जरा धीर धरा. ”मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला. तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि मी मात्र… 

— क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं. एक मजली, खालच्या पायरीवर पाण्याचा नळ असलेलं,  वर जाण्यासाठी एक लाकडी जिना,  उजवीकडे दरवाजा,  मधल्या भागातलं छोटसं लँडिंग,  दरवाजा लाकडाचा आणि घरात जाताना ओलांडावा लागणारा लाकडी उंबरठा. दरवाजाच्या बाहेरच्या,वरच्या  भागावर लटकणारी एक लोखंडी साखळी.  बाहेर जाताना ती साखळी अडकवायची आणि त्यात लोखंडी कुलूप लावायचं.  जाताना दोन वेळा कुलूप ओढून बघायचं.  आता हे आठवलं की वाटतं त्यावेळी अशा कुलपातलं बंद घर कसं काय सुरक्षित राहायचं?  आता आपण घराला दोन दोन दरवाजे, एक जाळीचा,  एकाला पीप होल,  अत्याधुनिक कुलुपे, गुप्त नंबर असलेली,  शिवाय कॅमेरे, सीसीटीव्ही आणि असेच बरेच काय काय… तरीही आपलं घर सुरक्षित राहील का? याविषयी शंकाच असते.

तो काळच वेगळा होता का? स्वप्नात जेव्हा जेव्हा मला ते घर दिसतं तेव्हा तेव्हा मी मनोमन त्या वास्तुदेवतेस  मनापासून नमस्कार करते.  कारण याच वास्तुदेवतेने माझी जडणघडण केली. इथेच मी खरी मोठी झाले आणि आयुष्यातले असंख्य आनंदाचेच नव्हे तर अनेक संमिश्र भावनांचे क्षण वेचले.

४/५ शा.मा. रोड, धोबी गल्ली, टेंभी नाका ठाणे.

या पत्त्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण माझं बालपण याच गल्लीत गेलं.  बालपणीचा तो रम्य काळ आणि धोबी गल्ली याचं अतूट नातं आहे. या गल्लीचं आजही माझ्या मनात अस्तित्व आहे.  ती जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येते, हळूहळू आकारते आणि चैतन्यमय होते. अरुंद पण लांबलचक असलेली ती गल्ली,  एकमेकांना चिकटून समोरासमोर उभी असलेली काही बैठी,काही एक मजली घरं.. त्या सर्व घरांची दारं मनातल्या मनात फटाफट उघडली जातात आणि माझे ते बाल सवंगडी माझ्या भोवती नकळत गोळा होतात. चित्रा,चारू, बेबी, दिलीप, सुरेश, अशोक, लता, रेखा, अरुण, शरद, आनंद कितीतरी आणि मग आमचे खेळ रंगतात.

डबा ऐसपैस, लगोरी, सागरगोटे, कंचे, लंगडी, खो-खो, अगदी क्रिकेट सुद्धा! आरडाओरडा,  गोंगाट, धम्माल!

पद्धतशीर क्रीडा साहित्य म्हणजे काय याच्याशी आमची ओळख ही नव्हती.  खरं म्हणजे आम्हाला त्याची जरुरीच भासली नाही.  धुणं धुवायच्या धोपटण्याने आम्ही क्रिकेट खेळलो. असमान उंचीच्या मिळेल त्या  काठ्यांनी आम्ही यष्टी रचली. गद्र्यांचं घर ते सलाग्र्यांचं  घर ही आमची विकेट आणि त्यापलीकडे चौकाराच्या, षटकाराच्या रेषा. समोरासमोर असलेल्या पायऱ्यांवर उभे राहून फिल्डींग  व्हायचं आणि असं आमचं गल्ली  क्रिकेट जोरदार रंगायचं. रडी खडी सगळं असायचं पण मुल्हेरकरांचे नाना आमचे थर्ड अंपायर असायचे.  नाना तसे काही फारसे खिलाडू वृत्तीचे नव्हते. आम्हा खेळणाऱ्या मुलांचा खूप राग राग करायचे. चुकून त्यांच्या गॅलरीत आमचा बॉल गेला तर ते परतही द्यायचे नाहीत. 

“मस्तवाल कार्टी! रविवारी सुद्धा शाळेत पाठवा यांना.  नुसता गोंगाट करतात, दुपारची वामकुक्षीही  घेऊ देत नाहीत.” पण तरीही आम्ही खेळत असताना गॅलरीच्या धक्क्याला टेकून उभ्याने आमचा खेळही बघत असत आणि त्यांना अंपायरचा मान दिला की मात्र ते खूष व्हायचे. आम्ही पोरंही काही साधी नव्हतो बरं का! चांगले चतुर, लबाड, लुच्चेच होतो आणि प्रचंड मस्तीखोरही. आज जेव्हा मी पाठीवर पुस्तकांनी भरलेली बॅग पॅक घेऊन स्कूलबसच्या रांगेत आजी किंवा आजोबांचा हात धरून उभं असलेलं बाल्य बघते ना तेव्हा पोटात कळवळतं कुठेतरी.  हरवलेलं, बॅकपॅक मध्ये कोंबलेलं ते बालपण माझं काळीज चिरून जातं. 

धोबी गल्लीतली ती घरं म्हणजे नुसत्या चुना मातीच्या भिंती नव्हत्या. या भिंती बोलक्या होत्या. या भिंतींच्या आत आणि पलीकडे असलेल्या जगाचा एक सुंदर बंध होता. एक रक्ताचा आणि दुसरा सामाजिक. घरात असलेली नाती आणि भिंतीच्या पलिकडची नाती बांधणारा तिथे एक अदृश्य पूल होता आणि या पुलावरच मी घडले.  त्या वातावरणात मी वाढले, तिथे माझ्यावर असंख्य वेगवेगळे संस्कार झाले.

माझी संस्कारांची व्याख्या आणखी थोडी निराळी आहे.  सर्वसाधारणपणे संस्कार म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणे, रीती, परंपरा,  देवधर्म पाळणे,  नेहमी खरे बोलणे,  नम्रता, शालीनता, सुहास्य, सुभाष्य वगैरे वगैरे खूप काही. संस्कार म्हणजे एक आदर्श तत्वांचं भलं मोठं गाठोडच म्हणा ना!  ते तर आहेच. ते नाकारता येणारच नाही पण त्या पलिकडे जाऊन मी म्हणेन संस्कार म्हणजे स्वतः केलेलं निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली वाईट भलीबुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रितीने शोधणं,  ते शोधता येण्याची क्षमता असणं म्हणजे संस्कार.

धोबी गल्लीत माझं बालपण फुलत असताना कळत नकळत अनेक चांगल्या वाईट भावभावनांचं, प्रसंगांचं नकळत मेंदूत झालेलं रजिस्ट्रेशन आजही डिलीट झालेलं नाही.  बालपणी हसताना, खेळताना, भांडताना, बागडताना, बघताना फारसे प्रश्न पडले नसतील किंबहुना प्रश्न विचारण्याची क्षमता तेव्हा नसेल पण पुढच्या आयुष्यात जगताना आणि मागे वळून पाहताना अनुभवलेल्या या प्रसंगांनी आपल्याला किती शिकवण दिली याची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा संस्काराची व्याख्या व्यापक  होते.

धोबी गल्ली म्हणजे माझ्यासाठी बालभारती होती.

धोबी गल्लीतलं जग लहान होतं.  काही थोड्याच लोकसंख्यांचं होतं.  फार तर दहा-बारा  घरं असतील  पण आता विचार केला तर वाटतं जग लहान किंवा मोठं नसतं. जे जग तुम्हाला किती दूरवर नेऊ शकतं  किंवा किती दूरवरचे दाखवते,  किती विविधतेत तुम्हाला वावरायला लावते त्यावरून त्याचं क्षेत्रफळ ठरत असतं.

धोबी गल्ली तशी होती.

ते एक निराळं जग होतं.  लहान— थोर सर्वांचंच. या गल्लीत जितकी  एकजूट आणि एकोपा अनुभवला तितक्याच मारामाऱ्या आणि आणि भांडणही पाहिली.  जिथे देवांच्या आरत्या ऐकल्या, म्हटल्या तिथे प्रचंड शिवराळ भाषेचाही भेसूरपणा अनुभवला.

मुळातच या धोबी गल्लीचे दोन भाग होते. एक इकडची गल्ली आणि एक तिकडची गल्ली.  दोन्ही भागातलं जग निराळं होतं, दोन्ही भागातली संस्कृती वेगळी होती.  आम्ही मुलं इकडच्या गल्लीतली होतो.  कुटुंबात सुरक्षितपणे वाढत होतो. आम्ही शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो, गृहपाठ, परीक्षा.. सहामाही— वार्षिक यांचा तणाव बाळगत होतो, परवचा, शुभंकरोती प्रार्थना  म्हणत होतो.  मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत मुक्तपणे धांगडधिंगा घालत होतो. घरातल्या मोठ्या माणसांचा दमही खात होतो आणि प्रत्येक जण कधी ना कधी, लपून-छपून गुन्हेही करत होते. गुन्हा शब्द फार मोठा वाटेल पण त्यावेळी घंटीच्या गाडीवर जाऊन बर्फाचा गोळा खाणे, कुणाच्या परसदारात जाऊन झाडावरच्या कैऱ्या नाहीतर जांभळं तोडणे, बटुबाईच्या कोंबड्यांना पळवणे, नाहीतर तिकडच्या गल्लीत राहणाऱ्या एबी आणि रोशन या बहिणींशी गप्पा मारायला जाणं वगैरे अशा प्रकारचे  मोठ्यांचे अज्ञाभंग करणारे गुन्हे असायचे. 

इकडच्या गल्लीतलं पहिलं घर होतं मथुरे यांचं आणि शेवटचं दिघ्यांचं. त्यामुळे मथुरे ते दिघे हे आमचं जग होतं पण पलीकडच्या म्हणजेच तिकडच्या धोबी गल्लीतलं जीवन फार वेगळं होतं. तिथे राहणारी माणसं, त्यांचे व्यवसाय, त्यांचे आचार विचार वागणं अगदी त्यांचा आर्थिक स्तर, जात धर्म यांतही भेद होते. हे अंतर , हा भेद त्यावेळी का राखला गेला, का बाळगला  गेला किंवा तो का पार करता आला नाही हे सारे प्रश्न आता मनात येतात पण त्यावेळी मात्र माझं बालपण या दोन भिन्न विश्वात नकळतपणे विभागलं गेलं होतं.

बाकीचं फारसं आठवत नाही पण एबी आणि रोशन या ईस्रायली बहिणींबद्दल मात्र मला खूप कुतूहल होतं हे नक्कीच.  त्या दोघी अतिशय सुंदर होत्या.  त्या काळात त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या समूह नृत्यांगना होत्या. त्यांच्याकडे नृत्य शिकवायला कोणी कोणी येत.  खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती पण त्या दोघींना त्यावेळी मस्त फॅशनेबल कपडे घालून, आता आपण ज्याला मेकअप म्हणतो पण त्यावेळी रंगवलेल्या चेहऱ्याने त्यांना गल्ली ओलांडताना मी अनेकदा माझ्या घराच्या खिडकीतून  पहायची आणि खरं सांगू मला त्या दोघींबद्दल खूप आकर्षण वाटायचं.  त्याही वयात वाटायचं की यांच्याशी आपण का नाही बोलायचं? का नाही त्यांच्याशी मैत्री करायची?

त्या उदरनिर्वाहासाठी सिनेमात गेल्या. त्यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती. रोशन तर साधारण माझ्याच वयाची होती. एबी थोडी मोठी होती.

उदरनिर्वाह,घर चालविणे यातलं गांभीर्य तेव्हा मला कळतही नव्हतं. इतकंच कळत होतं आपल्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत.

काही वर्षांनी ते सारं कुटुंब पॅलेस्टाईनला स्थलांतरित झाले.

अशा या पार्श्वभूमीवर आजही ती धोबी गल्ली मला एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी भासते.  तिथल्या घराघरांमध्ये घडणाऱ्या घटनांची खरी साक्षीदार वाटते. सर्व धर्म आचार विचार समावेशक वाटते. 

तो एक अथांग जीवन प्रवाह होता आणि माझं बालपण त्याच प्रवाहात वल्ही मारत  घडत होतं.

 – क्रमशः भाग १. 

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गंधर्व स्मरण” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “गंधर्व स्मरण …” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

“नाना”, बालगंधर्व  ह्यांचं एक नाटक “संत कान्होपात्रा” – ह्या नाटकावर त्यांचा अतिशय लोभ होता. त्यातील कान्होपात्रा ह्या भूमिकेत ते अंतर्बाह्य रंगत असत. जेव्हा हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातील शेवटचा – पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या देवालयातील प्रवेश, म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ति आणि त्यालगतचे गर्भगृह, हे पडद्यावर दाखवत असत.

बालगंधर्व ह्यांनी त्यांच्या नाटकातील मंडळींना पंढरपूर येथे पाठवले. तिथली छायाचित्रे आणवली अन् रंगभूमीवर तसेच्या तसे सर्व उभे केले. ह्यासाठी सावंतवाडी येथील ‘भावजी’ ह्या नावाचा कसबी कलाकार नानांनी गाठला. सुतारांच्या सोबत हे कलाकार काम करू लागले. भावजी ह्यांनी विठ्ठलमूर्तिकरता शिरसाचे लाकूड मुद्दाम निवडून आणले, अन् त्या मूर्तीचे काम प्रचंड जीव ओतून केलं. मंदिराचा सेट आणि मूर्ति, सर्व घडवण्यासाठी २ वर्षं काळ गेला. अतिशय देखणी मूर्ति घडवली, ज्याने लोक तासंतास तिच्याकडे बघत बसत. दुर्दैवाने ती व्यक्ती पुढं मानसिक संतुलन बिघडून बसली, पण नानांनी त्यांच्या कलागुणांना जाणून त्यांची अखेरपर्यंत  काळजी घेतली. त्यांस अंतर दिले नाही. पुढं हा मंदिराचा देखावा अन् मूर्ति प्रथम मुंबईत ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मधे दाखवले गेले, जे पाहण्यास प्रचंड गर्दी लोटली.

त्यानंतर नाना कंपनीला घेऊन पंढरपूर येथे गेले. कान्होपात्रा प्रयोग लावला. मंदिराचा सेट अन् विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. प्रयोग रंगला. थिएटर प्रचंड गर्दीने भरून गेले होते. नाटक पाहताना सर्व थिएटर स्तब्ध होते, डोळे लावून तो थाट अन् अभिनय बघत होते. नाटकाच्या शेवटी पांडुरंगाच्या पायांवर डोके ठेवून कान्होपात्रा देह ठेवते, ह्या प्रसंगानंतर पडदा पडून प्रयोग संपला. रसिक त्या प्रयोगाने इतके प्रचंड भारावून गेले. त्यांना भान राहिले नाही. सर्व रसिकांनी स्टेजवर येऊन कल्लोळ केला. सर्वांचे म्हणणे, ‘आम्हाला कान्होपात्रा ह्यांचे दर्शन पाहिजे’!!

ही गर्दी स्टेज मॅनेजरला पांगवता आली नाही. काय करायचं  त्यास समजेना. एवढा कसला गलबला झाला म्हणून बालगंधर्व मेकअप न उतरवता स्टेजवर आले, तेव्हा काय विचारावे? लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी टेकवून नमस्कार केला. गर्दी कमी होता होईना. सर्वांना दर्शन घ्यायचेच होते आणि नाना मात्र, “अरे देवा! हे काय करता? माझ्या काय पाया पडता?” म्हणत लोकांना विनंती करत होते, “असे नका करू, असे नका करू!!!” सर्व प्रेक्षकांचे दर्शन घेऊन झाले. “झाले आमचे काम”, असे म्हणत सर्व प्रेक्षक निघून गेले.

त्याच वेळी योगायोगाने एकादशी आली. नानांच्या मनात पांडुरंगाला महापूजा, अभिषेक करण्याची प्रचंड इच्छा जागी झाली. पंचामृत स्नानासाठी त्यांनी तयारी केली. कोऱ्या दुधाच्या घागरी आणल्या, त्यातील अनेक घागरींमधील दुधाचे विरजण लावून पंचामृतस्नानासाठी श्री पांडुरंगाची महापूजा सिद्धता झाली.श्री विठ्ठलाला भरजरी पोशाखही तयार करून घेतला. एकादशी दिवशी भल्या पहाटे नानांनी चंद्रभागेत स्नान केले, सोवळे नेसून आत गाभाऱ्यात जाऊन पंचामृत स्नान आणि पूजन केले. हा सोहळा गाजला. ही बातमी समजली म्हणून हे सर्व बघायला पंढरपूरच जणु तिथं लोटले होते. पूजा झाल्यावर अतिशय आपुलकीने प्रेमाने सर्वांना पंचामृत तीर्थ, प्रसाद वाटला…  ही त्यांच्यामधील मुरलेल्या ‘कान्होपात्रा’ची खरी आणि ‘नाना’ ह्या व्यक्तीची खरी भक्ती!!!

बालगंधर्व हे निरपेक्ष स्नेहाचे, निःस्वार्थ प्रेमाचे लोभी होते. उत्कट प्रेमाचे तंतू जपून ठेवणारे अतिशय हळवे व्यक्तिमत्त्व!! जीवन हे सौंदर्य आस्वादासाठी अन् त्यातून प्राप्त होणारा दिव्य आनंद अनुभवण्यासाठीच आहे. नानांनी आयुष्यभर जणु हाच प्रसाद स्वतःच्या कलेतून, गायनातून भरभरून सर्वांना दिला. त्यास अनुभवून तर त्यांच्या काळास “गंधर्वयुग”  म्हणून मानले जाते!!

ह्या गंधर्वयुगाची सुरूवात २६ जून १८८८ ला नानांच्या जन्माने झाली, त्यास काल १३६ वर्षे झाली!! 

दोन दिवसांवर आषाढीवारीसाठी ज्ञानेश्वरमहाराज पालखी प्रस्थान आहे पंढरपूरकडे आणि कालच नानांचा जन्मदिवस झाला, म्हणून हा लेख ! हा एक योगायोगच! 

© श्री नंदन वांद्रे

पुणे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.

3. “The quick brown fox jumps over the lazy dog” ह्या इंग्रजी वाक्यात इंग्रजीतीलसर्व अक्षरे आलेले आहेत.

4. जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वाळूच्या कणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.

11. “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.

13. अमेरिकेत दर माणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाइट दोन्ही उणे चाळीसच असतात.

16. चाॅकलेट खाल्ल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टम वर विपरित परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पट वेळा पापण्या ब्लिंक करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड” — तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहे.

20.  डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील उच्चारण्यास सर्वात अवघड वाक्य मानले जाते. 

22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत.

     – इस्पिक – राजा डेव्हिड

     – किलवर – अलेक्झांडर

     – बदाम – चार्लमॅगने

     – चौकट – जुलियस सीझर

25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही  पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जॅकेट, अग्निरोधक, कारचे वायपर व लेझर प्रिंटर्स … ही सर्व स्त्रियांनी  शोधलेली साधने आहेत.

29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यंत झोपू शकतो.

32. सर्व विषुववृत्तीय अस्वलेडावरी असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.

37. मृत्यूपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. वीज-दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 

42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात. 

43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.

44. सिगरेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 6 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 6 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मागील भागात डार्कवेब चांगल्या कामासाठी कोण आणि का वापरते याबद्दल चर्चा केली. आज मात्र डार्कवेबच्या अनुचित वापराबद्दल बोलणार आहे. यातील सगळ्यात वाईट गोष्ट ही की डार्कवेबचा ७०% ते ८०% वापर अनुचित गोष्टींसाठीच केला जातो. 

डार्कवेबवर त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्याला सभ्य समाज मान्यता देत नाही. किंवा त्या त्या देशाचे कायदे अटकाव करतात. इथे तुम्हाला हत्यारांची खरेदीविक्री, माणसांची खरेदी विक्री, लहान मुलांच्या अश्लील फिल्म, आतंकवाद्यांचे परस्परातील व्यवहार या सगळ्याच गोष्टी येतात. कारण यावर कोणत्याही देशाच्या सरकारला किंवा सुरक्षा यंत्रणाना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकत नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट पूर्णतः बंद करणे शक्य नसते त्यावेळी त्या गोष्टीचा समाजासाठी चांगला वापर कसा करता येईल हेच बघणे जास्त फायदेशीर असते. आणि तेच अनेक देशांच्या सुरक्षा यंत्रणा करतात.

याचे एक उदाहरण देतो. अमीर खानचा एक चित्रपट आला होता. ‘सरफरोश’ नावाचा. त्यात दोन पात्र दाखवले आहेत. एक आहे इन्स्पेक्टर ‘सलीम’ आणि दुसरा आहे ‘फटका’ ( जो मुंबईच्या अशा भागात राहतो जिथे अपराधिक गोष्टी केल्या जातात. ) इन्स्पेक्टर सलीम कायम त्या ‘फटका’ला पैसे देऊन त्याच्याकडून वेगवेगळी माहिती मिळवत असतो. आता जर तो अधिकारी त्या भागात ये जा करत असेल तर त्याला ते बंद करता येणे शक्य नाहीये का? उत्तर मिळते, ‘नाही’. कारण त्याने एका ठिकाणी धाड टाकली तर तो व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी चालू होईल. दुकान बंद करता येईल पण पण मानसिकता कशी बदलणार? त्यापेक्षा त्या गोष्टी तशाच चालू द्यायच्या, फक्त त्यातून समाजाचा समतोल ढळणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी त्याच प्रमाणे अनेक सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी आपली ओळख लपवून डार्कवेबवर वावरत असतात. आणि त्या ठिकाणी जी माहिती मिळेल त्यातून समाजाचे कमीत कमी नुकसान होईल याचा प्रयत्न करतात. 

आता काहींना असाही प्रश्न पडेल की नुसते वावरल्याने माहिती कशी मिळते? डार्कवेबवर कायम वेगवेगळे समूह बनवले जातात. जे अगदी काही दिवसांपुरते किंवा अनेकदा तर काही तासांपुरते सक्रीय असतात. ज्या सदस्यांना अशा समुहात सामील व्हायचे असते त्यांना एक लिंक पाठवली जाते ज्याच्या आधारे ते त्या समूहात सभासद बनतात. ( whatsapp चा वापर करणाऱ्या माणसाला हे लगेच लक्षात येऊ शकेल. कारण त्याचे बरेचशे कार्य डार्कवेबसारखेच असते. ) त्या समूहाच्या माध्यमातून संदेश दिले घेतले जातात. किंवा मग एखादी खरेदी विक्री केली जाते. एकदा का त्याचा उद्देश पूर्ण झाला की तो समूह बंद केला जातो. आणि हेच कारण आहे की जोपर्यंत सुरक्षा यंत्रणा अशा समूहातील गोष्टी डिकोड करतात, समूह बंद केलेला असतो किंवा त्या सदस्यांनी आपले स्थान बदललेले असते. मग कसे कुणाला पकडता येईल?

तुम्हाला हे whatsapp चे उदाहरण यासाठी दिले कारण मध्यंतरी एका मित्राशी चर्चा करताना त्याने हा प्रश्न उपस्थित केला होता की, whasapp ला डार्कवेब म्हणता येईल का? इथेही सगळे संदेश एनकोड करून पाठवले जातात. इथे कधीही समूह तयार करता येतो, कधीही बंद करता येतो. इथे कोणकोणते समूह आहेत हे कुणालाही कुणी सांगितल्याशिवाय समजत नाही. तुम्हालाही हा प्रश्न पडला का? या प्रश्नांचे उत्तर आहे, ‘whatsapp ला डार्कवेब म्हणता येत नाही.’ याला दोन कारणे आहेत. पाहिले कारण म्हणजे इथे तुम्ही तुमच्या फोन नंबर किंवा इमेल आयडी वरून लॉगीन होतात. या दोन्ही गोष्टी तुमची ओळख असतात. म्हणजेच इथे तुम्ही आपली ओळख लपवू शकत नाहीत. आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही whasapp वर जे समूह बनवतात त्याचा डेटा जरी एनकोड केलेला असला तरी तो एका सर्व्हरवर साठवलेला असतो. आणि जर सुरक्षा यंत्रणानी सबळ कारण देऊन मागणी केली तर तो त्यांना मिळू शकतो.     

आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. नेटवर्क जर सर्व्हर आणि क्लाईंट मिळून तयार होते तर इथेही सर्व्हर असणार ना? हो असतोच. पण कोणत्याही सरकारचे त्यावर नियंत्रण नसते. सरकारला त्यावर का नियंत्रण ठेवता येत नाही हे मात्र पुढील भागात. 

– क्रमशः भाग सहावा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares