ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ३० ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

‘रणांगण’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक श्री.विश्वनाथ चिंतामणी उर्फ विश्राम बेडेकर आणि ‘वासूनाका’ कार श्री.प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये यांचा आज स्मृतीदिन.

विश्राम बेडेकर यांचा जन्म 1906 मध्ये अमरावती येथे झाला.त्यांचे शिक्षण अमरावती व पुणे येथे झाले.मराठी साहित्यात कादंबरी बरोबरच त्यांनी पटकथा लेखनही केले. शिवाय सुमारे 15 चित्रपटांचे दिग्दर्शन व सहदिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 1934 साली त्यांनी कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटाचे सर्वप्रथम दिग्दर्शन केले. एक झाड दोन पक्षी हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. टिळक आणि आगरकर, ब्रह्मकुमारी, वाजे पाऊल आपुले, नरो वा कुंजरोsवा इ. नाटके त्यांनी लिहिली. शेजारी, स्वा.सावरकर, काबुलीवाला(हिंदी),

The Immortal सांग (अमर भूपाळी) इ. चित्रपटांचे पटकथा लेखन केले. सिलीसबर्गची पत्रे हे त्यांचे आठवणींवर आधारीत पुस्तक.

एक झाड दोन पक्षी’ या त्यांच्या आत्मचरित्रास 1985 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच विष्णूदास भावे पुरस्कार सांगली येथे 1982 ला देण्यात आला. 1986 च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथील मराठी साहित्य  संमेलनाचेही ते 1988 ला अध्यक्ष होते.

दि.30/10/1998 ला त्यांचे पुणे येथे निधन झाले.

भाऊ पाध्ये हे अर्थशास्त्रातील पदवीधर! पण त्यांनी साहित्य,कामगार चळवळ, पत्रकारिता अशा  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.

अग्रेसर, करंटा, बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर, राडा, वणवा, वासूनाका या त्यांच्या काही कादंब-या. डोंबा-याचा खेळ, पिचकारी, मुरगी, थालीपीठ, थोडी सी जो पी ली हे त्यांचे कथासंग्रह. शिवाय गुरूदत्त चरित्रही व ऑपरेशन छक्का हे नाटक त्यानी लिहिले.

वैतागवाडी या त्यांच्या कादंबरीस 1965 सालचा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. बॅ. धोपेश्वरकर या कादंबरीला 1968 चा  ‘ललित’ पुरस्कार मिळाला. 1993 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती जाहिर केली.

त्यांच्या साहित्याविषयी जाणकारांनी अनेक मते व्यक्त केली आहेत. मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे  साहित्यिक असे त्यांचे वर्णन केले जाते. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. त्यांच्या लेखनातून मुंबईतील संक्रमणकाळात झालेले बदल चित्रित झालेले दिसतात. मराठी साहित्यात स्वतःचा ठसा निर्माण करणा-या भाऊ पाध्ये यांचे 30/10/1996 ला निधन झाले.

श्री.बेडेकर व पाध्ये यांना स्मृती वंदन!.

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- विकिपीडिआ साभार.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इतिहास…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ इतिहास…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

 

अलवार पावलाना

हळुवार टाकताना

झाला इतिहास नाही

अजुनी इथे शहाणा

 

आणून आव उसना

बडवून घेत छाती

लाऊन धार घेती

हाती जुनीच पाती

 

येथे सुधारणाच्या

फैरी झडून गेल्या

नाही आवाज कोठे

फुसकेच बार झाल्या

 

केल्या नव्या तरीही

बदलून सर्व नोटा

सवयी नुसार त्यानी

धरल्या जून्याच वाटा

 

वासे नव्या घराचे

फिरले कसे कळेना

सत्तांध भींत आडवी

सांधा कुठे जुळेना

 

अंधार जाळताना

जळतात फक्त बोटे

दिसतात काजवे पण

ते ही तसेच खोटे

 

आता भलेपणाची

उठलीत सर्व गावे

संस्कार वसवण्याला

कसुनी तयार व्हावे

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆

गंध मातीचा दाटला

स्वप्ना अंकूर फुटला।

खेळ दैवाचा जाणण्या

पुन्हा  जुगार हाटला।

 

पाणी रक्ताचं पाजून

रान खुशीत डोललं।

मशागती पाई आज

पैसं व्याजानं काढलं।

 

दगा दिला नशिबान

ओढ दिली पावसानं।

सारं आभाळ फाटलं

शेत बुडालं व्याजानं।

 

धास्तावली पिल्लं सारी

दोन पिकलेली पानं।

पाठीराखी बोले धनी

मोडा सार सोन नाण।

 

सावकारी चक्रात या

कसं धिरानं वागावं।

फाटलेल्या आभाळाला

किती ठीगळं लावावं।

 

कसं सांगाव साजणी

सारी सरली ग आस।

वाटे करावा का धीर

गळा लावण्याचा फास।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

(दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.भाग 2 पुढे चालू)

मग या नायिकेला लाडीगोडी लावण्यासाठी तिच्याच वजनाइतकी चिरलेल्या पिवळ्याधमक गुळाची साडी नेसवली जाई. त्यामुळे ती नायिका आपला पूर्वीचा रंग झटकून हा पिवळा रंग अंगभर लपेटून घेई. त्या पिवळ्या साडीला खोवून घेतलेल्या पांढऱ्याशुभ्र ओल्या नारळाच्या किसाची मध्ये मध्ये नक्षी काढली जात असे. ही कलाकुसर मात्र सढळ हाताने करत असत. असा हा मेकअप पूर्ण झाल्यावर आता या नायिकेला प्रत्यक्ष नाटकाचे वेध लागलेले असत. मग एका गोल, खिरीच्या साजेशा रंगाला मॅच होईल अशा रंगाच्या डिशच्या रंगमंचावर नायिका अवतरत असे.   आता नायकाच्या एंट्रीची वेळ जवळ आलेली असते.  इतका वेळ सर्व दिव्यातून बाहेर पडताना आपल्या या नायिकेला अग्नीसरांनी योग्य वेळी साथ  दिलेली असते. पण ते फक्त पाहुणे कलाकार असल्याने या प्रयोगातून वेळीच exit घेतात. त्यानंतरच नायकाचे रंगमंचावर आगमन अपेक्षित असते. अग्नीसरांच्या उपस्थितीतच जर चुकून या नायकाचे आगमन झालेच तर मोठा अनर्थ ओढवतो. कारण आपल्या तापट स्वभावाने अग्नीसर पाहुणे कलाकार न राहता खलनायकाच्या भूमिकेत शिरुन गुळाच्या मदतीने या दुग्धरुपी नायकाला बदसूरत करण्याची शक्यता असते आणि पूर्ण नाटकाचा प्रयोगसुद्धा फसू शकतो. म्हणून मग थोडा वेळ ही नायिका मंद वाऱ्याच्या सान्निध्यात आपले श्रम विसरुन थंड होत आतुरतेने नायकाची वाट पाहू लागते. हीच वेळ नायकाच्या आगमनाची असते. आपल्या शुभ्रधवल वर्णाने हा दूधनायक सळसळत रंगमंचावर प्रवेश करतो. आपल्या सहजसुंदर  अभिनयाने या नाटकात रंग भरु लागतो. जोडीला याने  नायिकेला भेट म्हणून तुपाची धार पण आणलेली असते. त्याच्या सानिध्याने खिरीचे नाटक अधिकच झळकू लागते. शिवाय साथीला त्याची नेहमीची, नेहमीच छोटीशी पण महत्वाची भूमिका निभावणारी वेलचीताई या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आता हा सर्व  कलाकारांचा एकजीव झालेला संच नाटकाच्या शेवटच्या अंकासाठी सिद्ध होतो. आतुरतेने क्लायमॅक्स ची वाट पाहणारे आम्ही प्रेक्षक ताबडतोब आमच्या रसनारुपी चक्षूनी त्या रंगमंचीय रंगतदार खिरीचा आस्वाद घेत असू. आणि आमच्या चेहऱ्यावरील तृप्तीने आपल्या कलाकृतीला योग्य दाद मिळाल्याचे त्या दोन दिग्दर्शिकाना समजत असे. मग आपल्या या स्त्रीपार्ट करणाऱ्या नायिकेकडे कौतुकाने पाहताना त्या  कृतकृत्य होऊन जात.

तळटीप:-

  • आवडत असल्यास या नाटकात काजूचे तुकडे, बदाम, बेदाणे याना छोट्या भूमिका द्यायला हरकत नाही.
  • खोबऱ्याच्या किस वापरण्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करुन त्याची नक्षी पिवळ्या साडीला काढली तरी चालेल.
  • महत्वाचे म्हणजे खपली गव्हाच्या अनुपस्थितीत घरातले रोजचे गहू किंवा त्याचा बाजारात मिळणारा  तयार दलिया कधीतरी नायिकेची भूमिका उत्तम पार पाडू शकतात.
  • सध्याच्या काळात उखळ सहज उपलब्ध नसल्यामुळे त्याचे काम मिक्सर करु शकतो. फक्त गव्हाला हलकेच पाण्याने ओलसर करुन, मिक्सरमध्ये हलके हलके फिरवावे लागते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

लहानपणापासून जोपासलेली डायरी लिहायची सवय म्हणजे नन्दनाचा विरंगुळा होता.आपण लग्नानंतरही नियमीतपणे डायरी लिहायची हे तिने मनोमन ठरवून ठेवलेलं होतं !

…’ माहेर सोडताना मळभ भरून आल्यासारखं आण्णांचं मन गच्च होतं.आतल्याआत गदगदत ते स्वतःला सावरत होते. शेवटच्या क्षणापर्यंत मला मात्र आतून असं भरून येतच नव्हतं. राहुल मला आवडला होता. मिळालाही. त्या आनंदाच्या उर्मीच एवढ्या तीव्र होत्या की आता माहेर अंतरणार असल्याचं दु:ख तेवढ्या तिव्रतेने मला जाणवलंच नव्हतं एवढं खरं. पण शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं कुणास ठाऊक..?..पण माझ्याही नकळत मी आईच्या मिठीत गेले..आणि  आतून उन्मळून पडले.पहिल्या श्वासापासून गृहीत धरलेल्या या वटवृक्षाचा आधार सोडताना माझ्यातली वेल जणू मुळापासून हलली होती.त्या वेलीला तसाच भक्कम आधार हवा होता.तो राहुलच्या रूपात मिळेल?…’

हे नन्दनाच्या डायरीतलं  लग्नानंतरचं पहिलं पान..! ते लिहून झालं आणि नन्दनालाच आश्चर्य वाटलं.’ राहुलच्या रूपात आपल्याला हवासा वाटणारा आधार मिळेल कां?’ हा प्रश्न आपल्याला पडलाच कसा? राहुलने हे वाचलं तर..?..या कल्पनेनेच ती शहारली.मग डायरी तिने मिटूनच टाकली. कायमची. लिहिण्यासाठीसुद्धा पुढे कितीतरी दिवस तिने ती उघडलीच नाही.

—————–

राहुलला तिने प्रथम पाहिलं तेव्हा ते ‘लग्न’ याच उद्देशाने ! पत्रिका देणं , त्या जमणं , एकमेकांना बघणं ,  पसंत पडणं , मग सविस्तर बोलणी आणि पुढचे सगळे सोपस्कार. सगळं कसं रीतसर , रूढीप्रमाणे झालेलं. आधीची दोन स्थळं मुलं चांगली असूनही नन्दनाने नाकारली होती. ‘कां’ ते तिला सांगता येत नव्हतं.

आई खनपटीलाच बसली तेव्हा नन्दना थोडी चिडली होती. तिच्या नकाराला आईचा आक्षेप नव्हता. पण तिला नन्दनाकडून समर्पक कारण हवं होतं.नन्दना ते नेमक्या शब्दात व्यक्त करू शकत नव्हती.मुलं देखणी होती. रुबाबदार होती.आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतली होती. पण कां कुणास ठाऊक त्यांच्याकडे पाहून हा आपला जन्माचा जोडीदार असावा असं तिला मनोमन वाटलेलं नव्हतं..!

राहुलकडे पहाताच मात्र..?  नंदनाला बघताना,तिला जुजबी प्रश्न विचारताना,राहुलचे  मिष्किल डोळे हसत होते. त्या डोळ्यांचं ते हसणं नन्दनाला सुखावून गेलं होतं. जाताना त्याची हसरी नजर चोरपावलानं नन्दनाच्या मनात सहवासाची ओढ पेरुन गेली होती..! राहुल बद्दलची प्रेमभावना त्यामुळेच नैसर्गिकपणे फुलणाऱ्या फुलासारखी नन्दनाच्या मनात उमलंत गेलेली होती..!

एरवी नन्दनाने दिलेल्या आधीच्या एक-दोन नकारांच्या वेळी चिडलेली नन्दनाची आई तिच्या या होकाराने मात्र दुखावली गेली होती. नन्दनाचा होकार तिच्यासाठी अनपेक्षितच होता.

” अजून हातात काही स्थळं आहेत नन्दना.ती पाहू या. उगाच होकाराची घाई कशाला?”

” पण या स्थळात वाईट काय आहे ?” आण्णा नंदनाच्या मदतीला धावले होते.

” ते तुम्हाला समजणार नाही. शेवटी तडजोडी बायकांनाच कराव्या लागतात.तिचं जेव्हा  जळेल ना,तेव्हा तिला कळेल,पण तोवर खूप उशीर झालेला असेल”

” तुला एवढी भिती कशाची वाटतेय?”

” चार माणसांचं कुटुंब आपलं.जे हवं ते फारसे हट्ट न करता मिळत आलंय तिला आजपर्यंत.तिथं एकत्र कुटुंबात रहावं लागणाराय.तिला जमणाराय कां सगळं?”

“मला जमेल” नंदना स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली.

अखेर आण्णांनीच आईची समजूत घातली.”अगं, घरचा धंदा व्यवसाय असणाऱ्यांची ‘एकत्र कुटुंब’ ही गरज असते.वेगळे संसार त्यांना सोईचे नसतात आणि परवडणारेही नसतात. नन्दना लाडात वाढलीय हे खरं, पण ती लाडावलेली नाहीय हे नक्की. ती जबाबदारीने सगळं नक्कीच निभावून नेईल.” आई निरुत्तर झाली होती. पण तिच्या कपाळावरच्या आठ्या मात्र लग्नाची तयारी सुरू झाली तरी विरलेल्या नव्हत्या.नन्दनाला राहुलची हसरी नजर खुणावत होती. राहुलची आठवण झाली की त्रासिक चेहऱ्याची आई तिला जास्तच कोरडी, व्यवहारी  वाटायला लागायची.एकदम कुणीतरी  अगदी परकीच..!

——————-

राहुलच्या घरातलं वातावरण नन्दनाला खूप मोकळं, प्रसन्न वाटलं. तिथे परकेपण नव्हतंच. सुगंधात भिजलेला मोकळा श्वास तिथं राहुलच्या रूपानं स्वागताला उत्सुक होता. राहुलच्या मिठीत तो सुगंध नन्दना भरभरून प्याली. तृप्त झाली. पण…? राहुलच्या सहवासातला आनंद, घरातली प्रसन्नता आणि मोकळेपण..ही सगळी तिच्या स्वतःच्या मनोवृत्तीची तिच्या मनात उमटलेली प्रतिबिंबंच होती हे तिच्या लगेच लक्षात आलंच नसलं तरी हळूहळू तिला ते उमगणार होतंच. म्हणूनच नव्या नवलाईचे सुरुवातीचे दिवस असे धुंदीत तरंगतच गेले.

त्या चार दिवसात माहेरची आठवण तिला आलीच नव्हती. त्या दिवशी आईचा फोन आला आणि नन्दनाला हे घरची आठवण न होणं प्रथमच तीव्रतेने जाणवलं. ‘ तिकडे आई अण्णा मात्र आपली आठवण काढत चार रात्री तळमळत राहिले असतील..’ नुसत्या कल्पनेनंच नन्दनाचे डोळे भरून आले. महत्प्रयासाने तिने दाबून धरलेला हुंदका तिच्याही नकळत फुटलाच.

“नन्दना, काय झालं गं..?”

“नाही..काही नाही..”

” कशी आहेस..?”

“मी..मी छान आहे.मजेत..”

” खरं सांगतेयस ना..?”   

“हो गं. तुझी शप्पथ.आई, तू..कशी..आहेस?”

“माझं काय गं..मी बरी आहे..” आईचा आवाजही थोडा      ओलावला होताच.”तू मजेत आहे म्हणालीस ना,आता बरं वाटलं बघ.जीवाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. माझ्याही आणि यांच्याही..”

” काहीतरीच काय गं?”

” बरं, ते राहू दे. हे बघ, राहुलच्या आई घरी आहेत कां? मी बोलते त्यांच्याशी. चार दिवस माहेरपणाला पाठवा म्हणून सांगते. चालेल ना?”

नन्दनाला काय बोलावं सुचेचना. जावंसं तर वाटत होतं. पाय मात्र निघणार नव्हता. तेवढ्यात राहुलच्या आईच आल्या.

“आईचा फोन आहे. तुमच्याशी बोलणाराय” तिने आपला मोबाईल त्यांच्या हातात दिला आणि त्याच क्षणी तिच्या मनातला ‘तो’ धागा तिला एकदम तटकन् तुटल्यासारखंच वाटलं. आपण जाऊ,मजेत राहूही.. पण राहुल?.. राहुलच्या आईंनी तिला मोबाईल परत दिला पण त्या दोघी काय बोलल्या हे या भांबावलेल्या अवस्थेत नन्दनाच्या लक्षातच आलं नव्हतं. जावं की जाऊ नये या दोलायमान अवस्थेत नन्दना दिवसभर अस्वस्थच राहिली..! पण… रात्री..?

“आईचा फोन आला होता ना ?” राहुलनं विचारलंच.

” हो आईंशीही बोलली ती. माहेरपणासाठी विचारत होती.”

“तू काय ठरवलंयस?तुला जायचंय?”

राहुलचा स्वर थोडा टोकदार झालेला होता.नन्दनालाही ते जाणवलं.तिने चमकून वर पाहिलं. त्याची नजर नेहमीसारखी हसत नव्हती.

“तू तुझ्या आईला काय बोललीयस? येते म्हणालीयस कां?”

राहुलचा चढलेला स्वर,त्याचं हे असं जाब विचारणं सगळंच नन्दनाला अनपेक्षित होतं. त्याच्या तीक्ष्ण नजरेला नजर देऊन ती फार वेळ पाहूच शकली नाही. तिने आपली नजर खाली वळवली. भरून येतायतसं वाटणाऱ्या डोळयांना तिने निर्धाराने गप्प बसवलं.

“मी येते म्हणालेली नाहीये.ती या विषयावर आईंशी बोललीय. त्या काय म्हणाल्या कुणास ठाऊक ” शक्यतो शांत राहायचा प्रयत्न करीत नन्दना म्हणाली. आणि मग राहूलचा स्वर आणि नजर दोन्ही क्षणात निवळली.

” तू विचारलं नाहीस आईला?” त्याने हसत विचारलं.

“अंहं”

“का ?”

“कां असं नाही..पण..”

” ती नको म्हणेल अशी भिती वाटली का?”

“अजिबात नाही”

“आता मी सांगतो ते शांतपणे ऐक.आईने त्यांना ‘मी राहुलशी बोलून घेते’असं सांगितलं होतं. रात्री त्यांना पुन्हा फोन करायलाही सुचवून ठेवलं होतं. हे बघ.रात्रीचे दहा वाजून गेलेत. कुठं आलाय त्यांचा फोन अजून? आला तर काय सांगायचं?”

… तिच्या मनातला तिचा हसरा राहुल तिची नजर चुकवून कुठेतरी दडून बसलाय असंच तिला वाटत राहिलं. लग्नानंतरचं या घरातलं मोकळं आणि प्रसन्न वातावरण तिला एकदम कोंदट वाटू लागलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलचा डायलटोन.

” बघ तुझ्या आईचाच असणार.”

नन्दनाने न बोलता मोबाईल उचलला.फोन आईचा नव्हता. आण्णांचा होता.

आण्णांचा आवाज ऐकला आणि नन्दनाला एकदम भरून आलं.

” कसे आहात? तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही ना?”आण्णांनी हसत विचारलं.

” नाही हो. काहीतरीच काय?”

” राहुल आहेत ना तिथे? मी बोलू त्यांच्याशी?”

“हो.. देते.”

” राहुल, अण्णा तुझ्याशी बोलतायत.”

” माझ्याशी? कशाला?” मनातली नाराजी लपवायचा प्रयत्न करीत छान प्रसन्न हसून तिने लटक्या रागाने राहुलकडे पाहिलं.

“असं काय करतोयस रे? घे ना..बोल पटकन्.”

“हां आण्णा. हो.आई बोलली मला. आम्हाला कांहीच हरकत नाहीये..पण.. पण एक मिनिट.” मोबाईल वर हात ठेवून राहुल क्षणभर थांबला.मग हलक्या आवाजात नन्दनाला म्हणाला,

” आई सत्यनारायणाची पूजा करायची म्हणतेय आणि मी त्यानंतरची आपली महाबळेश्वरची बुकिंग केलीयत. बघ काय ठरवतेस? माहेर हवंय की महाबळेश्वर?” नन्दनाकडे पहात तो मिष्किल हसत राहिला.

” तू म्हणशील तसं” ठरवून सुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाही. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही….!

क्रमश:….

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सर्वपित्री ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ सर्वपित्री ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

आज सर्वपित्री अमावस्या. तिच्या घरचा म्हाळ . रिकाम्या भिंतीवर नजर खिळवून ती नुसतीच बसून होती . नेमकं आपल्याला काय होतंय हे तिचं तिलाही कळेना . डोळ्यातील पाणी खाली सांडू नये म्हणून चाललेला कसोशीचा प्रयत्न . 

कधीही न पाहिलेल्या सासू – सासऱ्या बद्दल तिला वाटणाऱ्या आपुलकीची आणि एकटेपणाची कुणीतरी चेष्टा करेल किंवा तिच्या त्या भावनेबद्दल शंका व्यक्त करेल या भीतीनेच ….तिने ही  तगमग कोणाजवळही बोलून दाखवली नाही   

तसं पहायला गेलं तर एकदा …. हो फक्त एकदाच…तिच्या आईजवळ बोलली होती ती हे सगळ.  

“इतरांना सासू सासरे असतात म्हणून अडचण आणि मला नाहीत म्हणून ”  

यानंतर तिच्या आईने तिला जे काही समजावलं . त्यानंतर हा विषय तिने कधीही कोणाजवळ ही काढला नाही . आभाळभर रिकामेपणा साचलेल्या लेकीच्या छपराला तिने कोणत्या शब्दात आसरा दिला हे फक्त त्या माउलीलाच ठाऊक . याच शब्दांच्या शक्तीवर आणि आधारावर सासू सासऱ्याविनाच सासर तिच्या लेकीने आजवर पेललंय . 

खर पहायला गेल तर जीव ओवाळून टाकावा इतका चांगला दीर आणि कधीही कोणाही जवळ तक्रार करू नये इतका गुणी नवरा साथीला होते तिच्या . पण म्हणतात ना ‘ज्याची त्याची दुखणी ज्याची त्यालाच माहित असतात . आणि ती एकट्यानेच सहन करायची असतात…करावी लागतात  ‘

कुणाच्या घरी कधी हळदी कुंकवासाठी ती गेली की कोपऱ्यात नटून बसलेल्या त्या घराच्या सासूबाईकडे बघून तिला अगदी हेवा वाटायचा . हळद कुंकू कुठल्या बोटाने लावावं ? नारळ ओटीत घालताना कसा घालावा ? विड्याच्या पानाचे टोक कोणत्या बाजूस अन देठ कोणत्या बाजूस असावं ? अशा बारीकसारीक गोष्टी हक्काने सांगायला तिच्याही घरी कोणीतरी जेष्ठ व्यक्ती असायला हवी होती अस सारखं वाटायचं . अंगणात एकट्याच खेळणाऱ्या तिच्या बाळकृष्णाला गोष्टी सांगायला , गालावरून हात फिरवत कडकड बोटे मोडायला त्याच्या वाट्याला आजी आजोबा असायला हवे होते हे जाणवायचं  

पण हे वाटण , जाणवण सगळ मनातल्या मनात . ओठांच्या पाकळ्या उघडून आजपर्यंत एकही शब्द बाहेर पडला नाही . तिचा हा संवाद एकटीचाच असायचा . स्वतःपुरता मर्यादित . “ओरडणाऱ्या का असेनात पण मला सासूबाई हव्या होत्या , ज्यांच्या नजरेला चुकून जरी नजर मिळाली तरी भीती वाटावी इतके कडक का असेनात पण मला सासरे हवे होते ” 

कधीतरी तिच्या माहेरवाशिणी मैत्रिणी एकत्र जमायच्या . त्यांच्या रंगलेल्या गप्पा ‘ सासू ‘ या विषयावर येउन नेहमी थांबायच्या . मग त्या एकमेकीना सांगत राहायच्या घराच्या ‘ त्या ‘ दोन व्यक्तींमुळे होणारी अडचण , त्रास , अवघडलेपणा …… आणि बरच काही . हिच्याकडे पाहून कुणीतरी अगदी सहज बोलून जायचं  “बरंय बाई  तुझ. हे असले प्रकार तुझ्याकडे नाहीत ” या वाक्यावर तिच्याकडे खोट्या हसण्याव्यतिरिक्त काहीही उत्तर नसायचं . ज्या भावनांचा कल्लोळ तिच्या मनात उठायचं ते वादळ तिच्या मैत्रिणींना समजणार न्हवत.     

मी ही सहजच केला होता आज तिला फोन . तिच्या पहिल्याच वाक्यात आवाज खोल गेल्याचा जाणवला . गळ्यात दाटलेल्या हुंदक्यामुळे तिला धड बोलताही येईना . “काय झालंय ग ???” न राहवून शेवटी विचारलंच मी . “आज सर्वपित्री ” इतकच बोलली ती यावर . 

तिला काहीही न समजावता मी फोन बंद केला . बाप्पाजवळ हात जोडून उभी राहीले आणि एकचं मागण मागितलं 

“हवं तर सगळ वैभव लुटून ने पण कोणाची जिवाभावाची माणसं नको नेत जाऊ– अशी,  ज्यांची जागा उभ्या आयुष्यात दुसर कुणीही नाही घेऊ शकत . “

मुर्तीतला देव मुका का असतो ?? हे आज कळले मला 🙂 

— अमृता आशिष पेडणेकर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगातला सर्वात श्रीमंत माणूस…!!! ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ जगातला सर्वात श्रीमंत माणूस…!!! ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं,” ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का…? ”

बिल् गेट्स म्हणाले, ” हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.” 

समोरच्या व्यक्तीनं विचारलं,” कोण…!!! “ 

बिल् गेट्स म्हणाले, ” एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला.  तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं.  सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला…! व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं. –समोरच्या त्या पेपर विकणा-या  मुलानं माझ्याकडं बघून तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं…!!!

तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला.  परंतु त्याहीवेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला–

पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला…!

पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत…!!!

यावर त्या मुलानं सांगितलं की “ तुम्ही हा न्यूज पेपर  घ्या.  कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे. ” त्यानंतर मी तो घेतला…!!!

१९ वर्षानंतर, मी जगातला श्रीमंत माणूस झाल्यानंतर,  मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली—मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.  तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!

मी त्याला विचारले, ” तू  मला ओळखतोस का ?” 

तो म्हणाला, ” हो तुम्ही बिल् गेट्स आहात…! “ 

मी म्हटलं, “ तुला आठवतंय का, की कधीकाळी तू मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस…! “ 

तो म्हणाला, ” हो…दोनदा…!”

मी म्हणालो, ” मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग…! मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो…!!! “ 

यावर तो नम्रपणे म्हणाला, ” सर पण तुम्हाला असं वाटत नाही का की  तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही…!”

मी विचारले,” का…??? “ 

तो मुलगा म्हणाला, ” मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातून मदत करत होतो.  तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात…! म्हणून तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही…!!! “ 

बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहून श्रीमंत आहे,  कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली…!!!

श्रीमंती पैश्यांची नसते, तर मनाची असते. कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे…!!!

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गुलमोहोर” (कवितासंग्रह ) – कवी मेहबूब जमादार ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

 

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “गुलमोहोर” (कवितासंग्रह ) – कवी मेहबूब जमादार ☆ श्री मुबारक उमराणी  ☆ 

पुस्तक  …….     गुलमोहर ” (कवितासंग्रह )

लेखक   …….    कवी मेहबूब जमादार

प्रकाशक …..    अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर

मूल्य …..…..      ₹ १५०/-

 

” गुलमोहर ”  मेहबूब जमादार.*झाडांच्या आणि मानवी जीवनाच्या काळजाशी नाळ जोडणारा  कवी, मेहबूब जमादार. 

गुलमोहर या त्यांच्या कवितासंग्रहातील कवितांचा मागोवा घेतांना सहज अनुक्रमणिका पाहिली की या संग्रहातील विविध विषयांची कल्पना येते. या कवितासंग्रहात त्यांच्या त्रेपन्न कविता असून त्या कवितांची निसर्ग, कोरोना, दैनदिन जीवनातले प्रसंग, मानवी जीवनाविषयी भाष्य करणा-या कविता, काव्य विषयक कविता,आपली मते ठामपणे मांडणा-या कविता, निसर्ग, महापूर, भूतकाळातील मंगलमय स्वप्नजीवनात रमत वर्तमानाच्या बदललेल्या जीवनाविषयी खंत व्यक्त करणा-या कविता अशी विभागणी करता येईल. या संग्रहात विषयाची मांडणी करतांना कवितासंग्रहात विषय कप्पे न करता कवितांची मांडणी केली आहे.कवितांची भाषा सहज समजेल अशी आहे. गावबोलीतील, जीवनातील, परिसरातील, गाव, शेत, घर यांच्या कविता आहेत. परिसरातील निसर्गात त्यांचे मन रमते, तिळगंगेच्या अवतीभवती, झाडीवेलीत, हिरव्यागार खाचरात रमत कविता लेखन केल्याची स्पष्ट जाणीव कविता वाचतांना होतेच.

पिंपळाच्या फांदीचा खोपा झुलतो अप्रतिम कल्पना. सुगरणीच्या कलेपासून आपण काहीच शिकलो नसल्याची खंत मेहबूब जमादार मांडत, रानाशी संवाद साधत,  जुनेपण, लाकडी नांगर, कुळव ,कुरी, गोठ्यातील जनावरे, देशी पिक हे आठवत नाविन्याच्या हव्यासापोटी शेती कसण्यात केल्या जात असलेल्या बदलामुळे जमिनीत  मीठ फुटले अन्  त्राण गेल्याची खंत मांडत बालपणातील सुखद आठवणीत रमत, आजच्या मुलांच्या बालपणातील जीवन बालपण हरवलेले असल्याचे ते सांगत

“आज हे सारं आठवलं की

डोळे  नकळत दाटून येतात

निवांतपणी जगण्याचे ते

क्षण मनात साठून राहतात.”

  ज्या निसर्गानं मोकळी हवा, पाणी, माती, निसर्ग याची जपणूक करा असे सांगत  ‘गड्या डोळे उघडून बघ, जाळून टाक हा मोहोपाश’ असे ठणकावून सांगतो.आणि मित्रास म्हणतो,

“गड्या मिस करतो की नाही ” असं म्हणताना सारं जीवनचक्र त्यांना आठवते. शाळा, शेत, सुगी, चोरून  सायकलवरून पिक्चरला जातानाच्या रात्री, मित्रासोबत केलेले फाटक्या धडप्यातलं जेवण, गर्दीतून बस पकडत सुंदर पोरगी शेजारी येईल यांची वाट पहात असणारे क्षण, विहिरीवरची मोट, मोटेवरचं गाणं आठवत न कळत आपण काय अन् कसे “मिस “करतो, हे वाचतांना मन क्षणभर भूतकाळात रमते त्यामुळे डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्यावाचून राहत नाहीत. असे कितीतरी सहज अनुभव कवी मानवी ह्दयपटलावर लेण्यासारखे कोरून जातो. त्यांची कविता ओबडधोबड आहे पण त्यातून जीवन जगतानांचे सुखद धक्के मनाला आल्हाद देत जातात. वारंवार वाचण्याची आपोआप ओढ लागते.

मेहबूब जमादार यांच्या कविता रवंथ केल्यावरच त्यांच्या मनात असणारा जीवनानुभव कळतो. कवितांचे शब्द आपले होतात. मेहबूब जमादार  त्या कवितांचा आकार पहात नाहीत तर त्या आकारातून जीवनसत्य साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रत्येक कविता वाचतांना जाणवतो.

काळजात शब्दांची पेरणी करत उरातली दगदग कवी मांडतो. झेंड्याचे बदलणा-या रंगात रंगणारी माणसे मात्र तीच आहेत हे विदारक सत्य मांडून जातो. माणूसकीची पानगळ त्यांना सतावतांना दिसते.पानगळ झालेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटते मात्र माणूसकी गळून पडते त्याला पुन्हा माणूसकीची पालवी फुटत नाही. देवाच्या देवा-यात देवत्व नाही तर कष्ट करणाऱ्यांच्या हातात, नांगर-खूरप्यात तो “भाकर होऊन भेटतो ,भाकरीच्या जुन्या धडप्यात ” अशी सुंदर देवत्वाची कल्पना माडणांरा कवी गावच्या ओढ्यात निसर्गाचं लेणं शोधत फिरतो. तो माणसांपेक्षा निसर्गात रमताना दिसतो.

 “शब्दांना फुलवूनी मी लिहिता राहिलो “

असा शब्दांचा भुकेला कवी येथे आपणास भेटतो. वीज आल्यावरचे जीवन कसे झाले मांडताना ते लिहितात,

“गांवी वीज आली तेव्हा

उतरलं डोळ्यांत आभाळ चांदणं

विरून गेल्या अंधार – रात्री

सरुनिया गेलं काळोख जगणं “

असं मांडत

 ‘नाती मात्र विस्कटून गेली, मनातली माणूसकीची वीजचं गेली’

अशी खंत त्यांना सतावते.

“तुझ्याचसाठी ” या कवितेत जीवन सहचारणीस म्हणतात माझे जीवन तुझेच देणं आहे,संकटाच्या उन्हात तुझ्यामुळेच चांदणं फुलले,मी आता सर्वस्वी तुझाच झालो म्हणत,

” बहरता स्पर्श तुझा तो मजसाठी अनमोल होता ”  आणि

” काहीच मजकडे नसता,

  गेलो रमून तुझ्यात

तू दिसता फुले बहरली,

केवळ तुझ्याचसाठी.”

 ही जाणीवही तो विसरत नाही.

“कोरोना “महामारीच्या काळातील कविता या वास्तव समाजाचं चित्रण करतात.

या महामारीने सारे शिकविले,लॉक डाउन मधील जीवनानुभव मांडणा-या कविता लक्ष वेधून घेतात. गर्दीचा मोह आवरावा माणसाने, कायद्याचा वचक नसल्याची जाणीव करुन कवी देतो.निवडणूकीत तुकड्यासाठी मतदारांनी भुलू नये, त्याने नीतिमत्ता,सन्मान,प्रतिष्ठा ही गावच्या वेशीवरच जळू लागली. हे ही सांगायला ते विसरत नाहीत.

जीवनाचा अर्थ, प्राजक्त , कोकणची वाट, शब्द, पूर, माझी कविता, नांगरणी, रान,

पहाटे दवात, वारी, अंगण, आयुष्या, गुलमोहर या कविता पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह होतो.

कवितेतील यमक उच्च कोटीचे असून काही कविता सहज गाता येतात. यातील प्रतिमा अन् प्रतिभा, नवकल्पनांची योजना, विषयातील विविधता, त्यातील मानवी जीवनमूल्ये, अवतीभोवतीच्या निसर्गाचे वर्णन, मनातील खंत, शल्य, बोच,

हुरहुर, मानवी जीवन बदलांचे परिणाम, रोजच्या घटनांचा वेध घेत जीवन जगतांना त्यांना जे जे वाटले ते ते आपल्या  शब्दांत मांडण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

हा कवितासंग्रह संग्रही असावा असाच असून मुखपृष्ठावरील चित्र चित्रकार अवधुत लोहार,नेसरी यांनी अप्रतिम रेखाटले आहे. कदाचित त्यांच्या गावी हायस्कूलच्या मैदानावरील डेरेदार  झाडच असावे.  मुखपृष्ठ उत्कृष्ट झाले आहे .अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर यांनी कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.

कवी मेहबूब जमादार यांनी आपल्या कवितेचे सारे हक्क, श्रेय आपल्या पत्नी सौ.मुमताज यांना देऊन आपल्या जीवनातील पत्नीचे महत्व या निमित्ताने अधोरेखित केले आहे. हे ही कौतुकास्पदच आहे.

मा.प्राचार्य विश्वास सायनाकर सर यांची प्रस्तावना म्हणजे सायनाकर सरांची शाब्बासकीची थाप आहे ती मेहबूब जमादार यांच्या साहित्यवाटेवर दीपस्तंभ ठरेल अशीच आहे. सर म्हणतात,

“मेहबूब जमादार यांचा प्रतिभेचे मनोहर इंद्रधनुष्य

असेच निरंतर आल्हाद, दिलासा, आशेचा प्रकाश देत राहो”  मीही अशीच प्रार्थना करुन या कवितासंग्रहाचे स्वागत करतो आणि कवी मेहबूब जमादार यांना पुढच्या लेखनासाठी हृदयपूर्वक शुभेच्छा देतो.

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 105 ☆ युवा पीढ़ी संस्कारहीन क्यों? ☆ डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय आलेख युवा पीढ़ी संस्कारहीन क्यों ? यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 105 ☆

☆ युवा पीढ़ी संस्कारहीन क्यों ? ☆

भोर होते समाचार पत्र हाथ में लेते ही मस्तिष्क की नसें झनझना उठती हैं… अमुक ने नाबालिग़ से दुष्कर्म कर, उसका वीडियो वॉयरल करने की धमकी दी; कहीं मज़दूरिन की चार वर्ष की बेटी बेसमेंट में लहूलुहान दशा में पाई गई; कहीं विवाहिता से उसके पति के सम्मुख दुष्कर्म; तो कहीं मासूम बच्ची को स्कूल से लौटते हुए अग़वा कर हफ़्तों नहीं, महीनों तक बंदी बनाकर उससे बलात्कार; कहीं ज़मीन या मकान की रजिस्ट्री अपने नाम पर करवाने के लिए वृद्धा या विधवा को हवस का शिकार बनाने का प्रचलन सामान्य-सा हो गया है। यह आमजन को कटघरे में खड़ा करता है… आखिर क्यों मौन हैं हम सब…ऐसे असामाजिक तत्वों का विरोध-बहिष्कार क्यों नहीं…उन्हें सरे-आम फांसी की सज़ा क्यों नहीं … यह तो बहुत कम है, एक पल में मुक्ति…नहीं… नहीं; उन्हें तो नपुंसक बना आजीवन सश्रम, कठोर कारावास की सज़ा दी जानी चाहिए, ताकि उनके संबंधियों को उसे असहाय दशा में देखने का दुर्लभ अवसर प्राप्त हो…मिलने का नहीं, ताकि वे अपने लाड़-प्यार व स्वतंत्रता देने का अंजाम देख, प्रायश्चित हेतु केवल आंसू बहाते रहें और दूसरों को यह संदेश दें, कि ‘वे भविष्य में अपने बच्चों से सख्ती से पेश आएं…उन्हें सुसंस्कार दें, ताकि वे समाज में सिर उठा कर जी सकें।’

परन्तु यह सब होता कहां है? कहां दी जाती है उन्हें …कानून के अंतर्गत फांसी की कठोर व भीषणतम सज़ा…यह तो मात्र जुमला बनकर रह गया है। कानून की देवी की आंखों, कानों पर बंधी पट्टी इस बात का संकेत है कि वह अंधा व बहरा है…आज- कल वह पीड़ित पक्ष की सुनता ही कहां है…अक्सर तो वह रसूखदार लोगों के हाथों की कठपुतली बन कर कार्य करता है…और शक़ की बिनाह पर छूट जाते हैं वे दुष्कर्मी …वैसे भी फांसी की सज़ा मिलने पर भी उन्हें अधिकार है; राष्ट्रपति से दया की ग़ुहार लगाने का, जिसका फैसला होने में एक लंबा समय गुज़र जाता है।

ज़रा सोचिए! कितने मानसिक दबाव में जीना पड़ता होगा उस पीड़िता व उसके परिवारजनों को? हर दिन गाली-गलौज, केस वापस लेने का दबाव, अनुरोध व धमकी तथा नित्य नए हादसे… उनकी ज़िन्दगी को नरक बना कर रख देते हैं। ज़रा ग़ौर कीजिए, उन्नाव की पीड़िता …कितनी शारीरिक पीड़ा व मानसिक यंत्रणा से गुज़र रही होगी वह मासूम… किस बात की सज़ा मिली रही है, उसके माता-पिता व परिजनों को… सोचिए! अपराधिनी वह पीड़िता है या राजनेता, जो दो वर्ष से उस परिवार पर ज़ुल्म ढा रहा है। क्या यही है, सत्य की राह पर चलने का अंजाम…अपने अधिकारों की मांग करने का इनाम? शायद! आपबीती अर्थात् स्वयं पर हुए ज़ुल्मों की दास्तान बखान कर, केस दर्ज कराने का साहस जुटाना जुर्म है? ऐसा लगता है कि सज़ा प्रतिपक्षी ‘औ’ दुष्कर्मी को नहीं, पीड़िता को मिल रही है।

यदि तुरंत कार्यवाही कर निर्णय लेना अनिवार्य कर दिया जाता, तो उसे इतनी भीषण यातनाएं न सहन करनी पड़तीं और न ही उन लोगों के हौंसले इतने बुलंद होते…वे उस परिणाम से सीख लेकर, भविष्य में गलत राह पर न चलते और बेटियों के माता-पिता को दहशत के साये में अपना जीवन बसर नहीं करना पड़ता। हर दिन निर्भया व आसिफ़ा दरिंदगी का शिकार न होतीं और लोगों को न्याय प्राप्त करने हेतु केंडल मार्च निकाल व धरने देकर आक्रोश की अभिव्यक्ति न करनी पड़ती… और बेटी के जन्म पर घर में मातम-सा माहौल पसरा नहीं दिखाई पड़ता।

एक प्रश्न हर दिन मन में कुलबुलाता है कि आखिर हमारी कानून-व्यवस्था इतनी लचर क्यों? विदेशों में ऐसे हादसे क्यों नहीं होते… वहां के लोग सुसभ्य व सुसंस्कृत क्यों होते हैं? आइए! ज़रा दृष्टिपात करें, इस समस्या के विविध पहलुओं व उसके समाधान पर… हमें जन्म से बेटी-बेटे को समान समझ उनकी परवरिश करनी होगी, क्योंकि बेटे में व्याप्त जन्म- जात श्रेष्ठता व अहमियत का भाव, वास्तव में उसे ऐसे दुष्कर्म व कुकृत्य करने को प्रोत्साहित करता है। इसके निमित्त हमें दोनों के लिए शिक्षा व व्यवसाय के समान अवसर जुटाने होंगे। हां! इसके लिए सबसे अधिक आवश्यकता है… बुज़ुर्गों की सोच बदलने की; जिनके मन में आज भी यह भावना बलवती है कि मृत्यु के समय, पुत्र के हाथों गंगा-जल का आचमन करने से उन्हें मोक्ष की प्राप्ति अवश्य होगी। परन्तु ऐसा कोई भी प्रमाण उपलब्ध नहीं है। आज कल तो बेटियां भी मुखाग्नि तक देने लगी हैं। प्रश्न उठता है, क्या उनके माता-पिता आजीवन प्रेत-योनि में भटकते रहेंगे और परिवारजनों को आहत करते रहेंगे?

सो! हमें बच्चों के साथ-साथ उनके माता-पिता को भी इन अंधविश्वासों व दक़ियानूसी धारणाओं से मुक्त करना होगा तथा उन्हें इस तथ्य से अवगत कराना होगा कि ‘बेटियां दो-दो कुलों को आलोकित करती हैं…घर को स्वर्ग बनाती हैं।’ हां! यदि कोई बच्चा या युवा गलत राहों पर चल निकलता है, तो उसके लिए ऐसे गुरुकुल व सुधार-गृहों का निर्माण किया जाए; जहां उसे संस्कार व संस्कृति की महत्ता से अवगत कराया जाए तथा उस राह का अनुसरण न करने पर, उसके भीषणतम परिणामों से अवगत करा कर, यह चेतावनी दी जाए कि यदि भविष्य में उसने कोई गलत काम किया, तो कोई भी उसकी रक्षा नहीं कर पाएगा। इन परिस्थितियों में शायद, उसकी सोच में कुछ सुधार आ पाए और समाज में शांत व सुखद वातावरण स्थापित हो सके।

चलिए! हम विवेचना करते हैं– सरकार द्वारा निर्मित कानूनों की…आखिर वे इतने अप्रभावी क्यों हैं? लोग जुर्म करने से पहले उसके भयावह पक्षों पर ध्यान क्यों नहीं देते; उनके बारे में क्यों सोच-विचार अथवा गहन चिंतन-मनन नहीं करते? इसके लिए हमें त्वरित न्याय-प्रणाली को अपनाना होगा और ऐसे शोहदों को सरे-आम दंण्डित करना होगा, ताकि समाज के पथ-भ्रष्ट बाशिंदे उनके हृदय-विदारक अंजाम को देख कर शिक्षा ग्रहण कर सकें…अपने बच्चों पर पूर्ण रूप से अंकुश लगा पाएं…भले ही उन्हें किसी भी सीमा तक दण्डित क्यों न करना पड़े। इसके साथ-साथ आवश्यकता है– स्कूल व कॉलेजों में नैतिक शिक्षा को अनिवार्य विषय के रूप में मान्यता प्रदान करने की, ताकि उनकी दूषित मानसिकता परिवर्तित हो सके; उनकी विकृत मन: स्थिति में बदलाव आ सके और सोच सकारात्मक बन सके।

चंद दिन पहले यह जानकर आश्चर्य हुआ कि पब्लिक स्कूलों के बच्चे ‘फन सेक’ कंडोम तक का प्रयोग करते हैं और बाल्यावस्था के यह असामान्य संबंध, भविष्य में उनके लिए इतना बड़ा संकट उत्पन्न कर सकते हैं…यह गंभीर विषय है। हमें पब्लिक स्कूलों में बढ़ते ऐसे फन पर प्रतिबंध लगाना होगा, क्योंकि ऐसी कारस्तानियां मन को आहत करती हैं और हमारा मीडिया उन्हें भ्रमित कर, किस दिशा की ओर अग्रसर कर रहा है? आप अनुमान नहीं लगा सकते, यह स्थिति समाज व देश के लिए किस क़दर घातक है तथा विस्फोटक स्थिति उत्पन्न कर सकती है। कल्पना कीजिए, क्या होगा…इस देश के बच्चों का भविष्य… क्या वे अपने गंतव्य पर पहुंच देश को समुन्नत बनाने में योगदान दे पाएंगे? शायद नहीं… कभी नहीं।

मैं लौट जाना चाहती हूं, पचपन वर्ष पूर्व के समय में, जब मुझे महाविद्यालय की छात्रा के रूप में, वाद- विवाद प्रतियोगिता में प्रतिभागिता करने का अवसर प्राप्त हुआ; जहां प्राचार्या को अपने महाविद्यालय की छात्राओं को आदेश देते हुए सुना,’पुट योअर दुपट्टा एट योअर प्रो-पर प्लेस’ …सुनकर बहुत विचित्र-सी अनुभूति हुई। परन्तु आज से सोलह वर्ष पूर्व जब मैंने महिला महाविद्यालय का कार्यभार संभाला, तो छात्राओं को टॉइट जींस, शार्ट टॉप पहने व हाथों में मोबाइल थामे देख, मन यह सोचने पर विवश हो गया…’आखिर क्या होगा, हमारे देश का भविष्य? क्या यह लड़कियां भविष्य में दो कुलों को रोशन करने में समर्थ सिद्ध हो पायेंगी…जिनमें शालीनता लेशमात्र को भी नहीं है। क्या इनके ससुराल वाले ‘हैलो-हॉय’ कल्चर पसंद करेंगे? यह जानकर मैं अवाक् रह गयी, जब चंद दिन बाद सी•आई•डी• वालों ने मुझे इस तथ्य से अवगत कराया कि आजकल लड़कियां अक्सर होटलों में दुल्हन की वेशभूषा में सोलह-सिंगार किए अपने ब्वॉयफ़्रेंड के साथ पायी जाती हैं; जिसके प्रमाण देख मेरे पांव तले से ज़मीन खिसक गई और मन उन्हें गलत राह से लौटा लाने को कटिबद्ध हो गया।

तत्पश्चात् मैंने अपने महाविद्यालय में मोबाइल व जीन्स पर प्रतिबंध लगा दिया। मुझे यह बताते हुए अत्यंत दु:ख हो रहा है कि जिन प्राध्यापकों की बेटियां वहां शिक्षा ग्रहण कर रहीं थीं; उन्होंने इसे ग़लत ठहराया और महाविद्यालय में ऐसे नियम न लागू करने की सलाह भी दी। उनकी यह दलील कि साइकिल चलाते हुए, उनकी चुन्नियां उलझ कर रह जाती हैं। बताइए! क्या यह तर्क उचित है? इसी प्रकार मोबाइल की सार्थकता के बारे में कहा गया कि यह आज के समय की ज़रूरत है… वर्तमान की मांग है। इसके माध्यम से उनसे संवाद बना रहता है। परन्तु मैंने यह प्रतिबंध लागू कर दिया और इसकी अनुपालना न करने पर फ़ाइन की व्यवस्था का आदेश भी जारी कर दिया। परंतु उनके द्वारा विरोध करने की नौबत नहीं आई, क्योंकि चंद दिन बाद हरियाणा सरकार ने भी यह प्रतिबंध लागू कर दिया।

मेरा इस घटना को बताने का आशय यह है कि यदि माता-पिता व शिक्षक वर्ग चाहे, तो सब कुछ संभव है, क्योंकि बच्चे उन पर सर्वाधिक विश्वास करते हैं…उन्हें आदर्श मानकर उन जैसा ही बनने का प्रयास करते हैं। वे गीली मिट्टी के समान होते हैं और उन्हें मन-चाहा रूपा-कार प्रदान किया जा सकता है।

सो! सही दशा व दिशा जीवन का आधार है। आइए, हम सब इस यज्ञ में समिधा डाल कर अपने दायित्वों का निर्वहन करें, ताकि ऐसे भीषण हादसों से समाज को निज़ात मिल सके…चहुंओर शांति का साम्राज्य स्थापित हो सके। परिवार व समाज में समन्वय, सामंजस्यता व समरसता का वातावरण हो; संयुक्त परिवार-व्यवस्था में बच्चे स्वयं को सुरक्षित अनुभव करें और उनका सर्वांगीण विकास सम्भव हो सके… यह मेरी ही नहीं, समाज के हर बाशिंदे की इच्छा है, चाहना है। इस संदर्भ में इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया भी अपना भरपूर योगदान दे सकते हैं। इसके लिये सरकार को ऐसी वेबसाइटों पर प्रतिबंध लगाना सुनिश्चित करना होगा, ताकि बच्चों में अपने लक्ष्य के प्रति गंभीरता व एकाग्रता बनी रहे और वे उसे प्राप्त करने के लिए निरंतर प्रयासरत रहें।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – भाषा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – भाषा ?

(रविवार को ऑनलाइन लोकार्पित होनेवाले कविता-संग्रह क्रौंच से)

‘ब’ का ‘र’ से बैर है,

‘श’ की ‘त्र’ से शत्रुता,

‘द’ जाने क्या सोच

‘श’, ‘म’ और ‘न’ से

दुश्मनी पाले है,

‘अ’ अनमना-सा

‘ब’ और ‘न’ से

अनबन ठाने है,

स्वर खुद पर रीझे हैं,

व्यंजन अपने मद में डूबे हैं,

‘मैं’ की मय में

सारे मतवाले हैं,

है तो हरेक वर्ण पर

वर्णमाला का भ्रम पाले है,

येन केन प्रकारेण

इस विनाशी भ्रम से

बाहर निकाल पाता हूँ,

शब्द और वाक्य बन कर

मैं भाषा की भूमिका निभाता हूँ।

©  संजय भारद्वाज

(16.12.2018, रात्रि बजे 11:55 )

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares