सूचना/Information ☆ श्री संजय भारद्वाज जी का कवितासंग्रह ‘क्रौंच’ लोकार्पित ☆ श्रीमती ऋता सिंह

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? श्री संजय भारद्वाज जी का कवितासंग्रह ‘क्रौंच’ लोकार्पित ?

कहन के साथ/ मेरा मौन भी बाँचा जाय

प्रसिद्ध साहित्यकार एवं हिन्दी आंदोलन परिवार के संस्थापक-अध्यक्ष संजय भारद्वाज जी के कवितासंग्रह क्रौंच का लोकार्पण 31 अक्टूबर को ऑनलाइन हुआ। यह उनका पाँचवाँ कवितासंग्रह है। क्षितिज प्रकाशन ने इसे प्रकाशित किया है।

कार्यक्रम की अध्यक्षता महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी के पूर्व कार्याध्यक्ष प्रो. नंदलाल पाठक जी ने की। उन्होंने कहा कि “संजय भारद्वाज कवितावादी हैं। उन्होंने अपनी कविता में छंद, लय, ताल, संगीत का कोई सहारा नहीं लिया है। यह दर्शाता है कि सच्ची कविता को बैसाखी की आवश्यकता नहीं होती।”

मुख्य अतिथि और ‘नवनीत’ के सम्पादक श्री विश्वनाथ सचदेव जी ने अपने भाषण से श्रोताओं को मंत्रमुग्ध कर दिया। उन्होंने कहा कि “संजय भारद्वाज का अनुभव जगत व्यापक है। उनकी कविताएँ अपने शब्दों के बीच की खाली जगह को पढ़ने के लिए पाठक को आमंत्रित करती हैं। यह इन कविताओं की सबसे बड़ी शक्ति है। ये कविताएँ पाठक के दिल को प्रभावित करती हैं।”

विश्व हिन्दी सचिवालय के समन्वयक श्री अनूप भार्गव जी ने कहा कि “आज के समय में साहित्यिक पुस्तक का लोकार्पण बड़ी हिम्मत का काम है। लोकार्पित संग्रह में प्रकाशित संजय जी का साहित्य ही उनके व्यक्तित्व का परिचायक है। साहित्यकार होने के साथ हिन्दी के लिए एक जुनून भी उनमें है।”

श्री संजय भारद्वाज जी ने कविता की अपनी यात्रा पर प्रकाश डालते हुए बताया कि वे नाटकों से कविता के प्रदेश में आए। उन्होंने कहा कि कविता स्वत: संभूता है। ज्वालामुखी-सी बाहर आनेवाली कविता साहित्य का शुद्धतम रूप है। कवि ने अपनी प्रतिनिधि रचना़ओं का पाठ भी किया। उनकी कविता ‘जब कभी / मेरा कहा आँका जाय / कहन के साथ / मेरा मौन भी बाँचा जाय’ का उल्लेख प्रत्येक वक्ता ने किया।

‘क्रौंच’ का मुखपृष्ठ प्रस्तर कला की मर्मज्ञ सुश्री अनिता दुबे ने बनाया है। उन्होंने इसकी पृष्ठभूमि बनी क्रौंच शृंखला की एक कविता का उल्लेख किया।

कार्यक्रम का सटीक संचालन कवयित्री चित्रा देसाई ने किया।

स्वागत वक्तव्य क्षितिज समूह की प्रमुख श्रीमती सुधा भारद्वाज ने किया। आभार प्रदर्शन सुश्री कृतिका भारद्वाज ने किया।

कार्यक्रम में बड़ी संख्या में साहित्यकार एवं साहित्यप्रेमी उपस्थित थे।

साभार श्रीमती ऋता सिंह

?  ई- अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री संजय भारद्वाज जी को उनकी इस विशेष उपलब्धि के लिए हार्दिक बधाई   ?

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 6 (61-65)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #6 (61-65) ॥ ☆

 

विन्ध्याद्रि की उच्चता जिनने रोकी औं जिसने महोदधि को फिर से छोड़ा

उन महामुनि अगस्तय से पाण्ड्य नृप ने कर अश्वमेध स्नेह संबंध जोड़ा ॥ 61॥

 

पुराकाल में तृप्त लंकाधिपति ने, जन स्थान सीमा सुरक्षित बनाने

शिव से विशेषास्त्र पाये इसी पाण्ड्य से संधि की इन्द्र को भी हराने ॥ 62॥

 

पाणिग्रहण कर इसी योग्य नृप का पृथ्वी सा सागर की करधन जो धारे

दक्षिण दिशा को सपत्नी बना जो सुखद रत्नाकर की है रसना सँवारे ॥ 63॥

 

ताम्बूल वल्ली घिरे सुपारी वृक्ष, ऐला विचुम्बित अगरू तरू जहाँ हैं

वहाँ केलि हित बिछाये आस्तरण हैं तमालों की मंजुल मलय वीथिकायें ॥ 64॥

 

ये नील नीरज से श्याम नृप, तुम हो रोचना गौर शरीर वाली

बढ़ाने आपस की रूप श्शोभा, है योग धन – दामिनी का सा आली ॥ 65॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

चित्र – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

प्रकाश, पाणी, पक्षी झाडे
कष्टकरी अन शेती वाडे
धनतेरसला या धनासह
आदर ठेऊन पुजू चला रे

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

राधाधर मधुमिलिंद, वद जाऊ कुणाला शरण, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, प्रिये पहा, नभ मेघांनी आक्रमिले…

सगळी पद ओळखीची.अगदी कालपरवाची वाटावीत अशी. पण या नाट्यगीताना शंभर वर्षे होऊन गेलीत असं सांगितलं तर? या गीतांचे जनक बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचे निधन झाले 1885 मध्ये. त्यापूर्वीच्या या रचना. पण पदांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे. 

अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म कर्नाटकातील. त्यामुळे त्यांना कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषा लहानपणापासून अवगत होत्या. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. तरूण वयातच त्यानी पदरचनेला सुरूवात केली. ते पौराणिक नाटकांसाठी पदे, किर्तनकारांसाठी आख्याने लिहीत असत. श्रीशंकर दिग्विजय हे  पहिले नाटक त्यांनी 1873 मध्ये लिहिले. नंतर काही वर्षांनी म्हणजे 1880 मध्ये कालिदासाच्या अभिज्ञान  शाकुंतलाचे त्यांनी मराठीत भाषांतर करून शाकुंतल हे नाटक लिहिले. ते लोकप्रिय व व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले. त्यामुळे काही मित्रमंडळींच्या सहकार्याने त्यांनी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ ची स्थापना केली.संगीत सौभद्र हे त्यांचे प्रचंड लोकप्रियता लाभलेले नाटक. पौराणिक कथानकातून उलगडत जाणारी प्रेमकथा आजही सर्वांना भुरळ घालते. राम राज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक.

अण्णासाहेब हे उत्तम नाटककार व गीतकार तर होतेच ,पण ते उत्तम नट, दिग्दर्शक व संगीत तज्ञही होते. छ. शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे दीर्घकाव्यही त्यांनी लिहिले आहे. समाजातील विविध समुदायांशी त्यानी संपर्क ठेवल्याने नाट्य क्षेत्राकडे पाहण्याची समाजाची दृष्टीही बदलली व या क्षेत्रात काम करणा-यांना  प्रतिष्ठा प्राप्त झाली.

या श्रेष्ठ मराठी संगीत नाट्य लेखक निर्मात्याला मानाचा मुजरा !!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विश्वकोश मराठी, विकीपीडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ?।दीपावली।? ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

आनंदाच्या सौंदर्य लेण्यांनी

नटली सजली दीपावली

प्रतिकूलतेवर मात करूनी

विजयी झाली दीपावली ।१।

 

भ्रष्टाचारांच्या दुर्गुणांचा

नरकासूर मारून 

करुया अभ्यंग स्नान

मांगल्याने सजवू बघा दीपावली|२|

 

सद्गुणांचे दीप लावून

करु या लक्ष्मीपूजन

असमानतेचा अंधकार दूर सारून

समानतेच्या सुरेखा रंगांनी सजवू दीपावली।३।

 

बलीराजाच्या औदार्यांने

बलीप्रदा बघ आनंदली

भाऊ बहिणीच्या अतूट नात्याने                                                                

हासरी भाऊबीज , नाचली‌ दीपावली |४|

 

 स्वागताची रा॑गोळी

 पहा किती हर्षली

 र॑गीत दिव्यांनी घरे कशी शोभली

 मयूर‌ पंख लेवून आली‌ सखी

दीपावली |५|

 

 गोड ‌तिखटाचा संगम ‌झाल

जणू श्रीमंत गरीबांचा मेळ झाला 

करंजी ची चंद्रकोर सर्वांना भावली

समानतेची जणू आली दीपावली |६|

 

प्रकाशाचा सण हा भारी

अंधकार सारा‌ दूर करी

सत्यम् शिवम् ने कशी फुलली

तेजोमय ही आली दीपावली|७|

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आली धन त्रयोदशी.. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ आली धन त्रयोदशी.. . !  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

दीपावली सणवार

अश्विनाची  त्रयोदशी

निरामय  आरोग्याची

आली धन त्रयोदशी.. . !

 

आरोग्याची धनवर्षा

वैद्य धन्वंतरी स्मरू

दान मागू आरोग्याचे

प्रकाशाची वाट धरू. . . . !

 

लावू कणकेचा दिवा

करू यम दीपदान

लाभो मनी समाधान

मागू आयुष्याचे दान . .. . . !

 

तन, मन, आणि धन

यांचे वरदान नवे .

धन त्रयोदशी दिनी

स्नान अभ्यंगाचे हवे.. . . !

 

धन, धान्य, आरोग्याने

घरदार सजलेले .

सुखी,  समृद्ध जीवन

अंतरात नटलेले.. . . !

 

धन त्रयोदशी दिनी

माय माउलीचे न्हाणे

अन्नपूर्णा तिच्या ठाई

गाई आनंदाचे गाणे. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 110 ☆ ‘तू’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 110 ☆

☆ ‘तू’ ☆

हासते आहेस तू

लाजते आहेस तू

 

मख्ख माझा चेहरा

वाचते आहेस तू

 

तळ मनाचा खोल पण

गाठते आहेस तू

 

लाज पदराखालती

झाकते आहेस तू

 

सूर्य नाही काजवा

मागते आहेस तू

 

सृजनतेची वेदना

जाणते आहेस तू

 

जीवनाचा अर्थही

सांगते आहेस तू

 

एक भक्तीचा दिवा

लावते आहेस तू

 

सोबतीने आजही

चालते आहेस तू

 

देह आणिक भाकरी

भाजते आहेस तू

 

नाहताना चांदणे

सांडते आहेस तू

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती दिवाळी….. ही दिवाळी ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? विविधा ?

☆ ती दिवाळी….. ही दिवाळी ☆ श्री विजय गावडे ☆  

दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी

गाय म्हशी कुणाच्या, लक्ष्मीमणाच्या,

लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा……

या ओळी आठवतात ना?  ती दिवाळी आठवतेय का? गावची. बालपणीची. आपल्या बालपणीची. सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वीची.

निसर्गाशी एकरूप असा प्रत्येक सण साजरा व्हायचा. सजीव ते ते सर्व सामावून घ्यायचा.  गायी, म्हशी, बैल यांना तर हक्काचं स्थान असायचं.

लहान दिवाळी, मोठी दिवाळी. आठवतात ना.  मोठ्या दिवाळीत गुराखी आपापले गोठे  सारवून सुरवून लक्ख करायचा. गुरांच्या शेणाचा एक गोठ्यात गोठा तयार केला जायचा.  त्या गोठ्यात कारटांची (कडू काकडीची) गुरं ढोर भरली जायची. त्या इवल्याश्या प्रतिकात्मक गोठ्यात लहान लहान कारट वासरं असायची. गोठेकर पती पत्नी गोठ्याची मनोभावे पूजा करायची. आम्हा मुलांना आग्रहाने गोडा धोडाच खाऊ घालायची.  चंगळ असायची.

नरक चतुर्थी ला आमच्या तळ कोकणात ‘चाव दिस’ म्हणतात.  थंडीत कुडकूडत, उटणं लावून आंघोळ झाली कि चावायला मिळायचे गूळ पोहे. नव्या भाताचे नव्याने कुठलेले, चवदार. झालंच तर ढाक चिनी, करांदे या सारखी रताळी सदृश्य कंद किंवा मूळ हि असायची चावदिसाला.  क्वचित कोणी त्यातल्या त्यात धनवान सर्वांना आमंत्रित हि करी फराळाला ज्यात  रताळ्यांचा रतीब मुख्यत्वे करून असायचा.  ती एखाद दुसरीच मेजवानी असायची.

तर अशी हि ‘ती दिवाळी’.  मनात घर करून राहिलेली.  आजच्या प्रत्येक वस्तूच्या मुबलक उपलब्धतेला वाकुल्या दाखविणारी.  कमी साधनातून अमर्याद आनंद देणारी आणि म्हणूनच आठवणींचा कोपरा अजूनही व्यापून उरलेली.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवा संदेश….भाग 1 ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ नवा संदेश….भाग 1 ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

कोरोना काळामध्ये संचारबंदी असल्यामुळे सर्वजण अगदी कंटाळून गेले होते. ऑफिसचे काम घरून असलेतरी कामाला वेळेचे बंधन नसायचे.कधी सकाळी लवकर मिटींग तर कधी रात्री उशिरापर्यंत, दिवस कसा संपला हे कळत नव्हतं.शरीर आणि मनाला बिलकुल उसंत नव्हती.

जवळ- जवळ दीड वर्षांनी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.एक दिवस रात्री जेवताना तनय म्हणाला,” बाबा , इतके दिवसात आपण कुठे ही बाहेर पडलो नाही,माझी शाळा आँनलाईन,माझे मित्र मला भेटत नाहीत मी अगदी कंटाळून गेलो आहे.” यावर वसुधा म्हणाली,” आपण जवळपास कुठे तरी जाऊन येऊ या का? मलाही सतत संगणकापुढे बसून व मिटिंग अटेंड करून उबग आला आहे.” शेखरला ही कल्पना आवडली . त्याने रविवारी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ या गोष्टीला हिरवा कंदील दाखवला.लगेच मित्राला अविनाश ला फोन केला.अवि व अनुने येण्याची तयारी दर्शवली.

रविवारी विमल मावशीच्या गावी जायचे ठरले .त्यांचे गाव शहरापासून वीस मैल दूर होते.

रविवारी सकाळी वसु लवकर उठली. तिने अंघोळ उरकून भरपूर तूप घालून सत्यनारायण प्रसादाला बनवतात तसाच शिरा करून घेतला. पाठोपाठ तनय व शेखर ही तयार झाले.

शेखर व वसुधा संगणक कंपनी उच्च पदावर कार्यरत होते. दोघांनाही पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती. भूकंपामध्ये बेघर झालेल्या लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये त्यांची ओळख झाली त्यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने ते परत भेटले. आणि भेटीतून एकामेकांच्या कार्यावर फिदा होऊन एकामेकांच्या प्रेमात पडले.. आणि लवकरच लग्नबंधनात बांधले गेले. दोन वर्षांनी त्यांच्या संसार वेलीवर फूल फुलले. तनयचा जन्म झाला. बाळंतपणाची रजा संपल्यावर ओळखीतून तनयला सांभाळण्यासाठी विमल मावशी आल्या आणि बाळाचा सांभाळ करता करता त्यांच्या घरातील केव्हा एक घटक होऊन गेल्या हे कळलेच नाही. त्या आपल्या गावाबद्दल कायम सांगत तिथल्या सुखसोयी, सुधारणा, तिथे राबवले जाणारे उपक्रम याबद्दल त्यांना अभिमान होता आणि या गावचा उमदा सरपंच, याचे तर त्यात सतत कौतुक करत. तो अतिशय प्रामाणिक आहे, त्याने गावात दिवाबत्ती रस्ते यांची सोय केली आहे, ग्रामपंचायतीचा दवाखाना सुरू केला आहे, गावात एक छोटसं उद्यान असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके, मुलांसाठी घसरगुंड्या झोपाळे यांची सोय केली आहे आणि या सुविधांची देखरेख स्वतः गणेश करतो. गाव म्हणजे त्याचे जीवन आहे. गावकऱ्यांच्या अडीअडचणीला तो कायम धावून जातो एवढेच नव्हे तर गावातील मुलांना दूर पायपीट करावी लागू नये म्हणून दहावीपर्यंत शाळाही सुरू केली आहे. त्या शाळेत नियुक्त केलेले शिक्षकही अगदी मनापासून ज्ञानदानाचे कार्य करतात अशा अनेक गोष्टी विमल मावशी सांगत. असा हा गाव पहावा आणि आपल्या लेकाला भेटायला गेलेल्या विमल मावशींना घेऊन यावे या विचाराने त्यांनी विमल मावशीच्या गावी जाण्याचे निश्चित केले.

क्रमशः…..

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बदलती दिवाळी…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ बदलती दिवाळी…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिराती टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते.आणि तर्‍हेतर्‍हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणी यांचे वास नाकाला येऊ लागतात!

दिवाळीची चाहूल तर लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या  तेल, वात घालून प्रज्वलित होऊ लागल्या! या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले! त्याचा प्रकाश मनभर पसरला! पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या!

आमच्या लहानपणी आता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पावित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी विठोबाच्या, दत्ताच्या देवळात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळायचं.. कोजागिरी पौर्णिमा आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे.बोचरी थंडी पहाटे अंगात शिरशिरी आणायची पण तो गारवा सुखद वाटायचा! घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की, बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या!

डबे घासणे, अनारसा पीठ करणे, चकली, कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे लवकर सुरू होत असत. दिवाळीची खरेदी फार मोठी नसे, तरीही खिशाचा परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडेसे फटाके आणले जात! कधीतरी घरासाठी म्हणून काही खरेदी असे. दिवाळीची वाट पाहिली जायची ती फराळासाठी! लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी या सगळ्याची सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे! आता फराळाचे पदार्थ बारा महिने मिळत असल्याने त्याचीं अपूर्वाई कमी झाली. दिवाळी अगदी उद्यावर आली की, दिवाळीचा पहिला फटाका कोण आणि किती वाजता लावणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत, कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा मी घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्‍यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे. त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे याची जोरदार चर्चा सुरू असे. मुली अंगणात रांगोळ्या काढून वेगवेगळ्या रंगाने सुशोभित करत असत. सगळे वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेली सुगंधी तेलं, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली!

आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठणे, तेल लावणे, गरम गरम पाण्याच्या आंघोळी करणे आणि सर्वांना ओवाळणे हा कार्यक्रम असे.त्यानंतर नवीन कपडे घालून देवदर्शन व नंतर फराळ असे. एकदा का दिवाळी सुरू झाली की दिवाळीचे चार दिवस फारच भरभर जात असत!

लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या काळात पाहुणे मंडळींची जा- ये असे. एकमेकांना फराळाची ताटे दिली जात. भेटवस्तूंची देवाण घेवाण होई. त्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण असे.

पण गेल्या पंधरा-वीस वर्षात दिवाळीने थोडे वेगळे स्वरूप घेतले असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले, त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. दिवाळीमध्ये काही बदलही झाले. यानिमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ, मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करीत असतात. दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकाची मेजवानी तर सुट्टीत मिळत आहेच. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले असले तरी दिवाळी आनंदमय आहे. रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग मुळे पणत्यांची शोभा कमी झाली.पण अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे,ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते. खरेदी बारा महिने होत असल्यामुळे दिवाळी खरेदी चे महत्व कमी झाले असले तरी सतत खरेदी करण्याचा उत्साह असलेला वर्ग आणि जे खरोखरच सणासाठी खरेदी करतात असा वर्ग बाजारात गर्दी करत आहे.

गेले एक-दीड वर्ष आपण सर्वजण करोनाच्या राक्षसाला तोंड देत होतो, त्यामुळे एकत्र येणे, सण साजरे करणे अवघड झाले होते.आता करोना चा प्रभाव जरी कमी झाला असला तरी अजूनही सर्वांनी काळजी घेणे आवश्यकच आहे. तरीही बाजारातली  गर्दी लोकांचा उत्साह वाढल्याचे दाखवून देत आहे.

रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. आनंदाचा कोणताही क्षण मनाची दिवाळी साजरी करत असतो! दिवाळी आता उंबरठ्यावर आली असताना माझ्या मनात ती उजळू लागली आहे. अशीच आपल्या सर्वांची दिवाळी आनंदमय जावो हीच सदिच्छा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारतातली पहिली महिला सिव्हिल इंजिनियर – शकुंतला भगत ……… सुश्री स्मिता जोगळेकर  ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

(देशातले ६९ पूल आज तिच्यामुळे उभे राहिलेत!) 

देशाची सर्वांगीण प्रगती अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे त्या देशातल्या सोयीसुविधा किती दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत! आजसुद्धा आपल्याकडे अनेक गावे अत्यंत दुर्गम आहेत. तेथे पोहोचायला वाहतुकीची साधने नाहीत, दळणवळणाच्या सुविधा नाहीत. देशात असूनही अशी ‘बेटे’ त्यांच्या दुर्गम स्थानामुळे प्रगतीपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर पूलांचे मोठे योगदान आहे. या पुलांनी गावे एकमेकांना ‘जोडण्याचे’ महत्त्वाचे काम केले आहे; अनेक गावांवरचा दुर्गमपणाचा शिक्का पुसायला मदत केली आहे.                      

शकुंतला भगत यांचे नाव आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल. त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर. भारतातल्या ६९ आणि जगभरातल्या २०० पुलांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी पूल बांधणीच्या क्षेत्रात केलेले काम आजही भल्याभल्यांना चकित करते. निवडलेल्या कामाची तीव्र आवड असेल तर कुठल्या कुठे पोहोचता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला भगत.                        

शकुंतला यांचा जन्म १९३३ मधला. त्या काळाचा विचार करता मुलीने इंजीनियर होणे ही खूपच मोठी गोष्ट होती. वडिलांनी शिकायला प्रोत्साहन दिले. शकुंतला जोशी म्हणून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलेल्या या मुलीने इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये त्वरित गती पकडली. तिचे वडील स्वतः एक उत्तम अभियंता होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले होते. ते विचारांनी इतके पुढारलेले होते की मुलीने आपले इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्न केले नसते तरी त्यांना चालणार होते. 

१९५३ मध्ये शकुंतला जोशी यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच व्हीजेटीआय या विख्यात संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर बनल्या. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी एका ठिकाणी फॅक्टरी ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. पण एकदा काम करत असताना छोटासा अपघात होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यावेळी त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुन्हा एकदा वडिलांनी त्यांना कणखर आधार दिला. त्यांनी त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी जर्मनीला पाठवले. जर्मनीहून त्या १९५७ मध्ये भारतात परतल्या.                    

त्यानंतर त्यांनी अजून एक धाडस केले ते म्हणजे प्रेमविवाह. काळाच्या कितीतरी पुढे जात त्यांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला. तोही इंजिनीअर नसलेला! अनिरुद्ध भगत यांचे स्वतःचे ऑटोमोबाईल गॅरेज होते. एवढी शिकलेली मुलगी एका गॅरेजमालकावर प्रेम करते हे कळल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. शकुंतला यांनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहात लग्न केले आणि संसारही निभावून नेला. अर्थात त्यासाठी अनिरुद्ध भगत यांची साथ मोलाची ठरली. भगत यांचे उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे शकुंतला यांनी आर्थिक जबाबदारीही स्वीकारली. त्यांनी १९५९ ते १९७० या काळात आयआयटी, मुंबई येथे सिव्हिल इंजीनियरिंगच्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली.                                      

या काळात त्यांनी मध्ये दोन वर्षांसाठी सब्बटिकल (प्राध्यापकांना शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाकडून मिळणारी भरपगारी रजा) घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया इथून मास्टर्स पूर्ण केले. पुढे १९७० मध्ये शकुंतला भगत यांनी आपले यजमान अनिरुद्ध भगत यांच्यासह क्वाड्रीकॉन नावाची पूल बांधणी करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीने वेगवेगळी रुंदी आणि विस्तार असलेले पूल अल्प खर्चात तयार केले. त्यासाठी त्यांनी प्री-फॅब्रिकेटेड(आधीच तयार करुन ठेवलेल्या) सुट्ट्या भागांचा वापर केला. तसेच हे भाग एकमेकांना जोडण्यासाठी बिजागऱ्यांसारख्या जोडणीचा वापर केल्यामुळे त्यासाठी कमी स्टील वापरावे लागे. अस्तित्वात असलेला एखादा पूल मोडकळीस आला असेल तर त्याला आधार देण्यासाठी त्यांनी टोएबल ब्रिज या नव्या प्रकारच्या पुलांचे डिझाईन तयार केले. हे पूल नादुरुस्त पुलांखाली वापरून मोडकळीस आलेल्या पुलावरूनदेखील अवजड वाहनांची वाहतूक करणे शक्य होऊ लागले.                            

हा काळ एकंदरच देशाच्या विकासाचा आणि भरभराटीचा होता. हिमालयालगतच्या प्रदेशात बांधल्या गेलेल्या पुलांमुळे त्या प्रदेशाचे चित्र पालटू लागले होते. इतके दिवस भौगोलिक दृष्टीने दुर्गम असलेले भाग क्वाड्रीकॉनने उत्तर आणि ईशान्य भारतात बांधलेल्या ६९ पुलांमुळे आज उर्वरित भारताशी जोडले गेले आहेत. याशिवाय युके, युएस, जर्मनी या देशांमध्येही त्यांनी पूल बांधले आहेत.                          

त्यांच्या मुलांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई नि वडील दोघांमध्येही प्रचंड इच्छाशक्ती होती. अगदी जेवायला बसल्यावरही त्यांच्यातल्या चर्चा कामाभोवतीच फिरत. कधी त्या चर्चांमधून वादही रंगायचे. पण एकदा का एक निर्णय झाला आणि तो कंपनीच्या हिताचा आहे यावर शिक्कामोर्तब झाले की वाद थांबे. मग जणू काही झालेच नाही अशा थाटात हे नवराबायको खेळीमेळीने संभाषण सुरू करत. आपण उभारलेली संस्था बहरावी म्हणून त्यांनी त्या काळात सर्व प्रकारचे धोके स्वीकारले, पण कंपनीची घोडदौड कायम ठेवली. जेव्हा त्यांच्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करायला सरकार किंवा खाजगी कंपन्या राजी नव्हत्या तेव्हा त्यांनी पैसा उभा करण्यासाठी स्वतःचे घर गहाण टाकले, दागदागिने विकले, पण स्वप्ने सत्यात उतरवून दाखवली. कधी एखाद्या साइटवर छोटासा जरी अपघात झाला तरी घरात सुतकी वातावरण असे. त्यांच्यासाठी त्यांची कंपनी घराइतकीच जवळची होती. पण म्हणून त्यांचे घराकडे दुर्लक्ष झाले नाही. उलट करिअरची एकेक शिखरे सर करत असताना शकुंतला यांनी कौटुंबिक आघाडीही तितक्याच ताकदीने सांभाळली. एवढे सगळे करूनही जर्मनीत असताना परिचित झालेल्या वेस्टर्न क्लासिकल सिंफनीज ऐकण्यासाठी त्या खास वेळ काढत.                             

त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना अतिशय पद्धतशीरपणे काम करताना पाहिलेले आहे. त्या काळात संगणक नसल्यामुळे वह्यांमध्ये आकडेमोड करणारी, एखादे डिझाईन मनासारखे उतरेपर्यंत वहीत रेखाटने करण्यात गढून गेलेली आई आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इतरांपेक्षा आपल्या आई नक्कीच वेगळी आहे, जिथे एकही स्त्री नाही अशा क्षेत्रात ती समर्थपणे पाय रोवून उभी आहे याचा अभिमान त्या मुलांना वाटला नाही तर नवलच! त्यांच्या फॅमिली पिकनिक्ससुद्धा बहुतेक वेळा कंस्ट्रक्शन साइटवरच असायच्या. त्यामुळे नकळतच मुलांवर कामाचे संस्कार झाले. मोठमोठ्या स्ट्रक्चर्समधील बारकावे, त्यांची तपशीलवार तपासणी याबद्दल मुलांना आई-वडिलांकडूनच शिकायला मिळाले.

सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पुलांची बांधणी सगळ्यात अवघड मानली जाते. पण याच विषयाला हात घालत, त्याला आपलेसे करत शकुंतला भगत यांनी जी उभारणी केली आहे त्याला तोड नाही.                               

 

– स्मिता जोगळेकर

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares