मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

?  विविधा ?

☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

करंजी आवडणारे फार कमी लोक आहेत असं मला वाटतं. माझी आई खूप सुंदर पुडाच्या करंज्या करायची आणि तिची आईही आई आणि आजीच्या हातच्या त्या अलवार करंजा लहानपणापासून खाल्लेल्या दिवाळीत !

एका दिवाळीत बडोद्याहून आत्या सहपरिवार आल्या गावाकडे, माझी आई आणि काकी दोघींना मोठ्ठा पितळेचा डबा भरून पुडाच्या करंज्या केल्या रात्रभर जागून. आणि तो पितळी डबा मी उठायच्या आत पाठवला!

आत्या सहकुटुंब मळ्यातल्या घरी रहिल्या होत्या. तिकडे, ताजी करंजी खायला न मिळाल्याची खंत मला अजूनही आठवतेय मी तेव्हा नववी दहावीत असेन आम्ही तीन चार मुलं गावातल्या घरात असताना सगळ्याच्या सगळ्या करंज्या तिकडे का पाठवल्या होत्या ते आता आठवत नाही, घरात सुबत्ता होती आणि घरातल्या सगळ्या बायका सुगरणी होत्या … नंतर करंजी सह सगळे पदार्थ केले आणि भरपूर खाल्लेही असतील, पण तो भला मोठा करंज्यांनी भरलेला पितळी डबा आणि आम्हाला त्यातली एकही करंजी न देता सकाळी गड्याबरोबर पाठवलेला……अजूनही आठवतो आणि खूप हसू येतं त्या वेळी करंजी न मिळाल्याचं!

माझ्या लग्नानंतर मी ही दिवाळीला त्याच पद्धतीने पुडाच्या करंज्या करू लागले, एकदा दिवाळीत सरोज फडके नावाची केटरिंग व्यवसाय करणारी मैत्रीण आली तिला दिवाळीच्या पदार्थाची ताटली दिली,तर ती म्हणाली “ती करंजी काढ पहिल्यांदा “मी म्हटलं तू खाऊन तर बघ, मग तीने फक्त चार करंज्याच खाल्ल्या!
माझ्या हातची पुडाची करंजी खूप जणांना आवडलेली आहे हे माझं मलाच खूप छान वाटतं,

माझी मैत्रीण स्वाती सामक आणि मी आम्ही दोघींनी एका दिवाळीत काही पदार्थ एकत्र केले होते, तिला पण करंजी अजिबात आवडत नव्हती पण तिने माझ्या करंजीची खूप तारीफ केली होती, आणि ती आजही म्हणते, “प्रभा करंजी मला फक्त तुझीच आवडली होती. ” बरेच वर्ष केली नाही करंजी, यावर्षी कंटाळा न करता पुडाची करंजी करीन, मागच्या दिवाळीत एका सीकेपी मैत्रीणीने दुस-या एका मैत्रीणीकडे कानवले आणले होते तिथे मी एक कानवला खाल्ला खूप प्रशंसा केली, मी आणि इतरांनीही !पण माझी पुडाची करंजी काकणभर सरसच असायची ! फरक इतकाच ती सीकेपी मैत्रीण पंचाहत्तरी पार केली तरी अजून घरी दिवाळीत कानवला (करंजी )करते आणि मी साठीतच माझ्यातल्या सुगरण पणाला तजेला देणं सोडून दिलं . गेली अनेक वर्षे करंजी केली नाही.

माझ्या पुतणीचं लग्न झाल्यानंतर तिला करंज्या पाठवल्या दिवाळीत….तेव्हा ती गावाला गेली होती , एकत्र कुटुंबात रहाणारी माझी पुतणी- प्रीती गावाहून आल्यावर ,मला म्हणाली, “काकी मी तुझी करंजी ओळखली, मी मम्मींना म्हटलं, “ही काकीची करंजी आहे”.

खूपजणी माझ्या पेक्षा सुंदर पुडाच्या करंजा करत असतील, पण अशा पद्धतीची प्रशंसा माझ्या करंजीला मिळाली आहे!

समस्त भारतीय सुगरणींच्या कुळात माझ्या करंजीची ही खसखशी एवढी नोंद!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ?

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवा संदेश….भाग 2 ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ नवा संदेश….भाग 2 ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

अविनाश येताच दोन्ही गाड्या पाठोपाठ बाहेर पडल्या.नुकताच पावसाळा संपत आल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते वाऱ्याबरोबर डुलत होती, हिरवीगार सृष्टी मन लोभवीत होती.थंडगार हवेमुळे वातावरण प्रसन्न होते, निसर्ग सौंदर्य पाहता पाहता वसुला मागील दिवसाआठवले. गेल्या वर्ष दीड वर्षात कोरोना ने धुमाकूळ घातला होता अख्ख्या जगाची उलटापालट करून टाकली, लॉक डाऊन मुळे शाळा कॉलेज बंद, छोटे उद्योगधंदे बसले, बेरोजगारी वाढली काही लोकांवर उपासमारीची पाळी आली तर काही ना आपले नातेवाईक कायमचे गमवावे लागले.शेखर व वसुधा ने या काळात जमेल तेवढी मदत केली होती आर्थिक आणि शारीरिकही. शहरात या संकटाने हाहाकार माजवला तर छोट्या-छोट्या गावची काय कथा? असा विचार तिच्या मनात तरळून गेला. एवढ्यात विमलमावशींचं गांवआले. गावाच्या सुरुवातीला विमलमावशींनी सांगितल्याप्रमाणे सुविधा दिसत होत्या. जवळच त्यांचं घर होतं.

विमल मावशींचा मुलगा या  गावात वडिलोपार्जित मडकी बनविण्याचा धंदा करत होता शिवाय दीड एकर शेत होतं त्यामध्ये जमेल तेवढे पीक काढून घर चालवत होता. त्याला उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या वेळी बऱ्यापैकी काम असे ते सांभाळत सांभाळत आहे त्या परिस्थितीत समाधानात जगत होता.

घरी पोचल्यावर विमल मावशींनी व त्यांच्या सुनेने सर्वांचे आदरातिथ्य छान केले. दुपारी अंबाडीची भाजी व गरम गरम भाकरी असा बेत त्याबरोबर वसूने आणलेला शिरा होताच. दुपारी गावचे सरपंच गणेश भेटायला आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चहा पिता पिता गावच्या सुधारणे बद्दल शेखरने त्यांचे कौतुक केले पण त्यावर ते म्हणाले,” साहेब, पण या कोरोना काळात मात्र मी हतबल झालो . गावात एवढ्या सुखसोयी असून सुद्धा गावातले बरेच लोक दगावले,  आमच्या गावात ऑक्सिजन सिलिंडरे कमी पडली. काही मुलांनीआपल्या आईला गमावले तर काहींनी आपल्या बापाला. सविता तर उघड्यावर पडली, कोरोनाने तिच्या आई-वडिलांचा बळी घेतला, ती अगदी पोरकीझाली. हे ऐकून शेखर व अविने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.  शेखरने आपल्या गावात तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा मानस बोलून दाखवला सरपंच म्हणाले,”ठीक आहे, आपण तिला विचारू”विमल मावशी सविता ला घेऊन आल्या. गोरी, बोलक्या डोळ्यांची, साधेच पण नीटनेटके कपडे घातलेली सविता मावशी बरोबर आली. तिने सर्वांना”नमस्ते” म्हटले. वसुधाला तिचा चुणचुणीत पण आवडला. अशा या मुलीवर अशी आपत्ती यावी याचे तिला वाईट वाटले.  सरपंचांनी तिला शेखरचा मनोदय सांगितला. थोडा विचार करून ती म्हणाली,” काका, या तुमच्या मदतीसाठी मी खूप आभारी आहे तुमच्यासारखे खूप कमी लोक आहेत जबाबदारी स्वीकारणारे.,…. पण या ठिकाणी बरेच जण आहेत की ज्यांनी आई किंवा वडील गमावले आहेत. ते माझे सवंगडी आहेत त्यांनी मला माझ्या दुःखात साथ दिली त्यांना सोडून मी कशी येऊ ? मी तुमच्याबरोबर एकटीच आले तर परमेश्वर मला माफ करणार नाही. इथले गावकरी आणि गणेश काका नक्कीच माझी काळजी घेतील. या बिकट परिस्थितीत एकत्र लढण्याची हिम्मत व ताकद आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी दिली.  माझ्या एकटीची सोय करण्याऐवजी गावाच्या वैद्यकीय सोयी वृद्धिंगत करण्यास मदत करू शकाल का? त्यामुळे गावातील अनेक जणांना त्याचा फायदा होईल. तसेच महिन्या-दोन महिन्यातून आम्हाला मार्गदर्शन केले तर आम्हाला सर्वांनाच त्याचा फायदा होईल हीमाझी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल का? तिच्या या प्रगल्भ विचारांनी शेखर व अविनाश स्तंभित झाले. शेखर,वसु,अवि व अनु यांनी ”  आम्ही तुझी मागणी पूर्ण करू” असा तिला शब्द दिला

काही वेळाने ते परतीच्या प्रवासाला निघाले. सविताने विचारलेल्या वचनांची पूर्तता करायची ठरवूनच. त्यांनी हा वसा घेतला आणि पूर्ण करण्याचा निश्चय केला.’ मुलं वयानं लहान असलीतरी कधीकधी ती आपल्याला नवीन काहीतरी सुचवीत असतात, हा विचार मनात येऊन त्यांना सविताचे कौतुक वाटले.

सविताने त्यांना समाजसेवेची नवी दिशा दाखवली होती ,समाजसेवेचा नवासंदेश त्यांना सविता कडून मिळाला होता.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

? मनमंजुषेतून ?

 ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

लहानपणी सदाशिव पेठेत असताना धमाल असायची… जागा भाड्याची असली तरी त्या छोट्याश्या जागेत खरे जीवन सामावले होते असे वाटते.  आता कितीही मोठी जागा , प्रत्येकाला स्वतंत्र रुम असली तरी जागा अपुरीच वाटते.  छोट्या जागेत माणसे जवळ होती. आता मोठ्या रूम्समुळे माणसांमध्ये दुरावा व भिंती निर्माण झाल्या आहेत.  

त्याकाळी परिस्थिती बेताची असली तरी सण आला की उत्साहाचे वातावरण असायचे.  त्यात दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. आमची सहामाही परीक्षा संपतच आलेली असायची. घरात एव्हाना सणाची तयारी सुरू झालेली असायची.  रेडीमेड कपड्यांची तेव्हा फारशी चलती नव्हती. कापड घेवून आधीच कपडे शिवायला टाकायचे.  प्रत्येकाचे कापड घ्यायचे व कपडे शिवायला टाकायचे ठिकाण ठरलेलेच असायचे.  मी माझे कापड बाळाराम मार्केट मधून घेवून लक्ष्मी रोड वर असलेल्या चार्ली मध्ये शिवायला टाकायचो. वर्षाला ठराविक कपडे फक्त दिवाळीलाच मिळायचे. आत्ता सारखे कधीही जावून कपडे आणायची परवानगी व पर्वणीही नव्हती. आई मंडई मधून चुरमुरे व पुढे रविवार पेठेतून चिवडा तसेच इतर दिवाळी पदार्थ बनविण्यासाठी सामान आणायची. दिवाळी पदार्थ रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. आईच्या हातच्या पदार्थांचा एक वेगळाच स्वाद होता, मायेचा ओलावा होता. जेमतेम आर्थिक परिस्थिती आई सर्व खर्चाचे नियोजन कसे करायची तीच जाणे. दिवाळी पदार्थ बनवायला सुरुवात झाली की वाड्यातील प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा गंध यायला लागायचा. बायका घरात वासावरुन समजायच्या कोणाच्या कडे कोणता पदार्थ चालू आहे. बायका एकमेकींना मदतही करायच्या. दिवाळीच्या एखाद्या दुसर्‍या दिवस आधी नवीन कपडे आलेले असायचे. वाड्यात ते प्रत्येक घरात जावून दाखवायचा कार्यक्रम व्हायचा.  स्त्रियांची खरेदी व ती खरेदी एकमेकींना दाखविणे हा एक वेगळाच विषय, नव्हे वेगळे विश्व असायचे. वाड्यात विकायला आलेल्या विक्रेत्यापासून ते लक्ष्मी रोड वरील दुकानातील सेल् मधील खरेदी असा व्यापक विषय असायचा. फटाके  खरेदी हा पण स्वतंत्र विभाग असायचा. पुण्यात सारसबाग समोर फक्त फटाक्यांचे स्टॉल असायचे. फटाके सुद्धा ठराविक असायचे. लवंगी, पानपट्टी, मिरची,  नाग गोळी,  लक्ष्मी बॉम्ब,  सुतळी बॉम्ब,  चिमणी बॉम्ब, भुईनोळे , बाण यांचीच रेलचेल होती. टिकली रोल आणि पिस्तूल मिळाली तरी खूप भारी वाटायचे.  वाड्यात अभ्यंगस्नानासाठी पहाटेच नंबर लागायचे. पहाटे सर्वात पहिला फटाका कोण फोडतो यात शर्यत लागायची. थंडीने कुडकुडत असताना आई उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवाला व घरातील मोठ्यांना नमस्कार करून फटाके उडवायला पळायचे. किल्ला ही तोपर्यंत तयार असायचा. फटाके उडवून झाले की घरी फराळ व्हायचा. मग आम्ही दिवसभर किल्ला, क्रिकेट,  पत्ते असा धुडगूस घालायला मोकळे. दिवाळीचे सर्व दिवस त्या त्या दिवसाच्या महत्वाप्रमाणे उत्साहात साजरा केला जायचा. वाड्यात मग एकमेकांची फराळाची ताटे एकमेकांत फिरायची. त्यात बरीच टीकाटिप्पणी व्हायची. पण एक वेगळीच गंमत व आपुलकी त्यात असायची. वडीलधारी मंडळी देवाला जावून यायची. बायकांच्या उत्साहाला तर पारावार नसायचा. दिवाळीचा शेवट दिवसात मग उरलेल्या फटाक्यांचे भस्म बनवायचे प्रकार चालायचे. किल्ल्या मधील बुरुज बॉम्ब लावून उडवून दिले जायचे.  पुण्यातील सर्व पेठांमध्ये एकच लगबग व उत्साह असायचा. पाहुणे घरी असतील तर मग मुलांचा प्रचंड धुडगूस चालायचा. दिवाळीचे दिवस सरले की मग मन उदास व्हायचे. प्रत्येकजण हळूहळू आपापल्या कामाला लागायचा. पाहुणे त्यांच्यात्यांच्या गावाला रवाना व्हायचे. 

आता मोबाईल आले. आता कोणाकडे यायची जायची गरज नाही. सर्व फोन कॉल,  video कॉल नाहीतर whatsapp मेसेज वर होवून जाते. महागाचे फटाके उडवून सुद्धा आत्ता तशी मजा नाही,  नव्हे फटाक्यांना आता बंदीच आहे. फराळाची ताटे आता सोसायटी संस्कृतीत फिरत नाहीत. घरात वडिलधारे नाहीत,  नवरा बायको दोघे नोकरीला. आता सुट्टी मिळवायची हेच मोठे दिव्य. चितळे कडून अथवा ओळखीच्या बाईकडून पदार्थ विकत आणले म्हणजे झाले. कपड्यांचे नावीन्य नाही कारण आता येता जाता कधीही अथवा ऑनलाईन सुद्धा आपण कधीही खरेदी करत असतो. सर्वांकडे आता लक्ष्मी आहे पण लहानपणच्या जुन्या फोटोमधील लक्ष्मीची  प्रसन्नता आताच्या डिजिटल फोटो मध्ये जाणवत नाही. आठवणीतील पुण्याची  दिवाळी अजूनही मनांत घर करून आहे.

ले. – जितेंद्र भूस

संग्राहक – श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

“परमेश्वरही संकटाच्या वेळी कुणाला ना कुणाला आपल्यासाठी प्रसादच म्हणून पाठवत असतो, फक्त तो प्रसाद आपण व्यवस्थित ग्रहण करायला हवा. त्या प्रसादाची किंमत करता यायला हवी.”

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे. 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भूतान – सौंदर्याची सुरेल तान-भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ३ ✈️

एअरपोर्ट व्ह्यू पॉइंटवरून आमच्या गाड्या वळणावळणाच्या सुरेख गुळगुळीत रस्त्यावरून चेले-ला पास या १३ हजार फूट उंचीवरील खिंडीकडे निघाल्या. या ठिकाणाहून पूर्व हिमालयीन पर्वतरांगा व भूतानमधील झोमोलहरी हे नंबर दोनचे उंच शिखर यांचे दर्शन घ्यायचे होते.रस्त्यापलीकडील सफरचंदाच्या बागा पांढऱ्या स्वच्छ फुलांनी बहरलेल्या होत्या. देवदार, पाईन, स्प्रुस ,फर,ओक  अशी घनदाट वृक्षराजी होती.होडोडेंड्रान वृक्षांवर गडद लाल, पिवळी, पांढरी फुले फुलली होती. भूतानचे वैशिष्ट्य असलेल्या रंगीबेरंगी आणि पांढऱ्या पताका इतक्या उंचीवरही लहरत होत्या. रानटी गुलाबाची रक्तवर्णी फुले झुपक्यांनी होती. जमिनीसरशी व्हायोलेट, पिवळे, पांढरे जांभळे फुलांचे ताटवे माना उंचावून बघत होते. खालच्या दरीत पोपटी- हिरवी भातशेती डोलत होती. अकस्मात दोन्ही बाजूंना बर्फाचा सडा पडलेला दिसला. आम्ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तिथे गेलो होतो. ड्रायव्हर म्हणाला,’ हा कालच्या पावसाचा परिणाम! खरं म्हणजे इथे ऑगस्ट सप्टेंबर पासून डिसेंबर जानेवारीपर्यंत  बर्फ पडते. त्यावेळी हा रस्ता बंदच असतो.’

आम्ही जसजसे उंचावर जात होतो तसतसे बर्फाचे प्रमाण वाढत गेले. दुतर्फा झाडांच्या फांद्या, रस्त्याकडेचे उंची दर्शविणारे खुणेचे बांध सारे बर्फाने माखुन गेले. इतका ताजा, शुभ्र हलका बर्फ पहिल्यांदाच पाहिला. काश्मीर, स्वित्झर्लंड, अमेरिका सगळीकडला अनुभव जमेस होता. पण ही पांढऱ्या पिसांसारखी बर्फवृष्टी न्यारीच होती. दोन्ही बाजूच्या हिरव्या वृक्षांच्या फांद्यांचे हात गोऱ्या- गोऱ्या बर्फाने झाकले जात होते. जणू  पांढरे फ्रीलचे फ्रॉक घालून हिमपऱ्या  अवतरल्या होत्या. त्यांच्या टोप्यांवर लाल- गुलाबी, निळे- जांभळे फुलांचे तुरे होते. आणि पायात रंगीबेरंगी फुलांचे बूट होते. फांद्यांच्या हातांवरून ओघळणारी बर्फफुले आम्हाला दोन्ही हातांनी बोलावीत होती. त्यांचे आमंत्रण सहर्ष स्वीकारून बर्फात खेळायला उतरलो. इतके हलके, स्वच्छ पांढरे बर्फ होते की त्यावर रंगीत सरबत न घालताच बर्फाचा छोटा गोळा तोंडात सरकवला.१३००० फुटांवरील चेलेला पास पर्यंत पोहोचलो पण दरीतून वर येणारे धुक्याचे पांढरे ढग आणि बर्फवृष्टी यामुळे समोरील पर्वतरांगा अस्पष्ट झाल्या होत्या. एकमेकांवर बर्फ उडविण्यात, बर्फाशी खेळण्यात वेळेचे भान राहिले नव्हते पण ड्रायव्हर्सनी परतण्याची सूचना केली .त्यांची सूचना किती योग्य होती ते परतीच्या वाटेवर लक्षात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे बर्फ भराभर वाढत चालले होते. येताना  दिसलेले उतरत्या छपराचे घर  अर्धेअधिक बर्फात बुडाले होते. बर्फाच्या रांगोळीमुळे रस्ता झाकून गेला होता. थोड्यावेळाने बर्फ कडक होऊन गाडीचे टायर फसण्याची शक्यता होती. पण अगदी ‘जी भरके जीवनभरका बर्फीला माहोल लूट लिया.’

आनंदाने ओंजळी भरून गेल्या होत्या. सकाळी निसर्ग आणि मानव यांच्यातील चित्तथरारक जुगलबंदी अनुभवली. आता निसर्गाच्या हिमकांती सौंदर्याचा साक्षात्कार अनुभवला. आणि रात्री जेवणानंतर रसिल्या संगीताने मन तृप्त झाले. आमच्या ग्रुपमध्ये पुण्याच्या ‘छंद’ संस्थेचे कलाकार होते. त्यांनी जेवणानंतर शांताबाई शेळके आणि मंगेश पडगावकर यांच्या सकस काव्याची मैफल जमवली. गझला सादर केल्या. साथीला डायनिंग टेबलाच्या तबल्याचा ठेका होता. त्याला तोंडी पार्श्वसंगीताची, उत्कृष्ट निवेदनाची जोड होती. भू-तानमधील  रात्र सुरेल तानांनी नादमयी झाली.

टकसंग मॉनेस्ट्रीला ‘टायगर्स नेस्ट’ असे म्हटले जाते. पारो व्हॅलीतली ही मॉनेस्ट्री साधारण तीन हजार फूट उंचीवर एका अवघड कड्यावर बांधलेली आहे. भूतानमधील एका दैत्याचा नाश करण्यासाठी आठव्या शतकात गुरू रिंपोचे वाघाच्या पाठीवर बसून उड्डाण करून इथे आले. दैत्य विनाशानंतर त्यांनी इथल्या गुहेत तीन महिने ध्यानधारणा केली अशी दंतकथा आहे. इसवी सन १६९२ मध्ये इथे मॉनेस्ट्री बांधण्यात आली. बुद्धाची विविध भावदर्शी शिल्पे येथे आहेत. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाचे दर्शन घेण्याची प्रत्येक भूतानी व्यक्तीची आकांक्षा असते. अनेक परदेशी प्रवासीही काठीच्या सहाय्याने हा अवघड ट्रेक पूर्ण करतात. टायगर नेस्टच्या पायथ्याशी उभे राहून, जाऊन- येऊन  सहा तासांचा असलेला हा प्रवास आम्ही माना उंचावून पाहिला.

पारोच्या नॅशनल म्युझियममध्ये भूतानी संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज, समूहनृत्यासाठीचे विविध   वेश यांचे जतन केले आहे. रेशमी कापडावरील थांका चित्रकला, वेगळ्या प्रकारच्या कागदावरील पेंटिंग्जचे  स्क्रोल पहिले. धनुष्यबाण, शिरस्त्राण, पतंग याचबरोबर घोड्याचे शिंग व घोड्याचे अंडे अशा कधीही न ऐकलेल्या वस्तूही  तिथे आहेत.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मुख्यत्वे माझ्या पिढीचा विचार करता ज्या चार ‘सुरांवर’ आमचं पोषण झालं, जगणं तेजोमय झालं त्यांविषयी चार दिवस जमेल तशा शब्दज्योती उजळवून दिवाळी साजरी करण्याचा हा माझा प्रयत्न! खरंतर, ह्या सुरांचं देणं कसं मुठीत पकडावं, कसं आकार-उकार-वेलांट्यांत सजवावं आणि कसं त्याला शब्दांच्या हवाली करावं !?… ती फक्त अनुभवायची गोष्ट! ती अनुभूतीच शब्दांत सजवायचा प्रयत्न करतेय.

टिपूर चांदणभरल्या आकाशाचं छत, चंदेरी अंधारात सजलेलं निबिडवन, तिथं मंदपणं खळाळता एक निर्झर, त्याच्या काठाशी वडवाईच्या पारावर भान हरपून बसलेलं असावं…. चढत्या निशेच्या साक्षीनं निर्झराचा खळाळ जेमतेम ऐकू येण्याइतपत मंद व्हावा…. ती गाज ऐकताऐकता अवचित उरात लाटा उसळून याव्या, मनाच्या तळातून अल्लद वरती येत काळजावर तरंगू लागलेल्या एकेक संवेदना जाणवाव्या… साचू लागलेल्या नेत्रतळ्यांना आपसूक पापण्यांचा बांध पडावा, बंद डबीत मोती डुगडुगावा तसे पापण्यांच्या आत जाणवणारे आसवमोती आणि एका क्षणी पापण्यांच्या काठावर देणेकरी होऊन आलेल्या अनावरपणाची रिती ओंजळ लयदारपणे झरणाऱ्या थेंबांनी भरून जावी….

विरत जावेत सभोवतीचे बंध, मन रितं होताहोता भरून येणारा श्वास जाणवावा आणि स्वत:ला त्या क्षणाच्या हवाली करत झाडाच्या बुंध्याशी अलगद मान टेकवावी…. उसळून येणाऱ्या भावतराण्यांसोबत अश्रूंचा सळसळता झंकार, निमिषांच्या अंतरांपाठोपाठ जाणिवांच्या थकलेपणासोबत शांतावत चाललेला लयहुंकार… क्षण लोपतालोपता जीव मालवतामालवता आपण निर्गुणाच्या कुशीत विसावावं आणि तो क्षण कमलपाकळीवरच्या दंवभरल्या मोत्यासारखा अथांगात ओघळून लुप्त होत जावा…!  हे…….. असं काहीसं………. नव्हे, अगदी असंच किशोरीताईंच्या सुरांचं देणं!

खऱ्या अर्थानं महान उत्तुंग व्यक्तिमत्वं ही परमेश्वरानं वेळ देऊन घडवूनच पृथ्वीतलावर पाठवलेली असतात. असंच एक स्वरशिल्प त्यानं एका स्वरसाधिकेच्या पोटी जन्माला घातलं आणि त्या स्वरशिल्पाची साधना उच्चतम पातळीवर सातत्यानं सुरू राहावी इतक्या विशाल त्याच्या ज्ञानकक्षा व्हायला हव्यात ह्याची जाण त्या मातृहृदयातही घातली. त्यामुळंच पंडिता मोगूबाई कुर्डीकर ह्यांनी स्वत: आचरत असलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम आपली लेक किशोरीताईंना दिल्यानंतर इतरही सर्व संगीत घराण्यांतील बारकावे त्यांना उमजावे आणि प्रत्येकातील उत्तम ते त्यांच्या गायनात उमटून त्यांची स्वत:ची एक संपन्न गानशैली निर्माण व्हावी ही जागरुकता दाखवली.

केवळ संगीतसमृद्धीची आस धरून स्वत:चा अहंभाव मधे येऊ न देता लेकीला इतर गुरूंकडंही शिकायला पाठवलं. मोगुबाईंचे स्वत:चे गुरू जयपूर-अत्रौली घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खॉं साहेब, आग्रा घराण्याचे उस्ताद अनवर हुसेन खॉं साहेब, पं. बाळकृष्णबुवा पर्वतकर, पं. मोहन पालेकर, शरदचंद्र आरोळकर, पंडिता अंजनीबाई मालपेकर अशा गुरुजनांकडून किशोईताईंना गायकीतली जाण व सौंदर्यदृष्टी लाभावी ह्या मोगुबाईंच्या विचाराचा परिपाक म्हणून आपल्याला गानसरस्वती किशोरीताई आमोणकर लाभल्या.

प्रत्येक राग हे एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, त्याला स्वत:चा असा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाला सूक्ष्म कंगोरेही असतात. ते समजून उमजून घेऊन आपण राग उभा केला पाहिजे अशा असामान्य विचारानं ताईंनी रागसंगीताची साधना केली. म्हणूनच त्यांचा प्रत्येक राग आपल्याला वेगळी अनुभूती देतो. शास्त्रीय संगीतासोबतच अनेक उपशास्त्रीय संगीतप्रकार, भावगीत, अभंग, भजन इ. कित्येक प्रकारांतूनही त्यांनी आपल्याला आनंद दिला आहे. मात्र कोणत्याही प्रकारात स्वत:शी तादात्म्य पावलेल्या त्यांच्या सुराचं आपल्या काळजाला हात घालणं चुकत नाही. ‘अवघा रंग एक झाला’ ह्या त्यांनी अजरामर केलेल्या रचनेतील शब्दांनुसारच अवघा रंग एक असल्याची अनुभूती त्यांचं कोणत्याही प्रकारचं गायन ऐकताना आपल्याला प्रत्येकच वेळी येत असते.

एकवेळ संतप्रभृतींच्या परमेश्वराविषयी असलेल्या भक्ती-प्रीतीभावावर लिहिता येईल, परमेश्वराला कधी भगवंत म्हणवत लेखणीतून भक्तिफुलांची ओंजळ वाहाता येईल तर कधी सखा म्हणवत त्याच्याभोवती लडिवाळ शृंगारपखरणही करता येईल. परंतू ताईंच्या भावस्वराचं काळीजभेदी, गगनचुंबी निर्गुण निराकारत्व कोणत्या शब्दांत पेलणार, असं त्यांचे अभंग, भजनं ऐकताना होऊन जातं. त्यांच्या सुराचं विश्व आभाळाच्याही पल्याड जाणारं! हाती येणं लांबच, ते डोळ्यांना तरी कसं दिसावं… आणि… कुठल्या आधारावर त्याला शब्दांत विणायला घ्यावं!?

सुराला परमेश्वर मानणारी जितकी अलौकिक दृष्टी त्यांच्याकडे होती तितकीच अलौकिक विचारधारा त्यांच्या स्वरार्थरमणी ह्या पुस्तकात दिसून येते.  आपलं मोठं भाग्य कि, जाणिवेतून नेणिवेकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे, अशाश्वताकडून शाश्वताकडे घेऊन जाणारा ताईंचा सूर आपल्याला अनुभवायला मिळाला!! ज्ञानेश्वर माऊलींच्या, `हृदया हृदय येक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।‘ ह्या शब्दरत्नांचा अर्थ ताईंचा सूर ऐकताना प्रकर्षाने उमगतो. प्रत्येकच रचनेतून आपल्या मनात गडदगहिरे भावतरंग उमटवणारा, ऐकणाऱ्याशी अद्वैत साधणारा असा किशोरीताईंचा सूर!! अपार साधना, अनंत शोधवाटा, अथक ध्यास,, अफाट मेहनत ह्यातून गवसलेलं असीम सृजन असं भावरंगांशी अद्वैत न साधतं तरच नवल! ताईंच्या अनंत सृजनावकाशाला वंदन करताना माझ्या दोन तोकड्या शब्दांचं समर्पण….    

मिल के बिछडे वह सूर नही ।  जगत को भूले परमेश कही!?

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 6 – दीप पर्व विशेष – दीपावली का पर्व यह …☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  दीप पर्व पर विशेष कविता  “दीपावली का पर्व यह …”। अब आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 6 – दीप पर्व विशेष – दीपावली का पर्व यह … ☆ 

 

मातु लक्ष्मी कृपा कर, सरस्वती दे ज्ञान ।

गणपति से आशीष ले, सभी बने विद्वान ।।

 

फुलझड़ियां मुस्कान की, जगमग जलते दीप।

खुशियों के बम फूटते, पाकर मोती सीप।।

 

दीपक घर घर में जलें, दूर हटे अज्ञान ।

तमस सभी मन के मिटें, सबका हो कल्यान।।

 

रंग बिरंगी रोशनी, झूम उठेगी शाम।

राम अयोध्या आ गए, सँबरे सबके काम।।

 

दीपावली का पर्व यह, फिर आया इस बार ।

हंसी-खुशी सब साथ में, सुखमय हो संसार।।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

 

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – धनतेरस ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – लघुकथा – धनतेरस ?

इस बार भी धनतेरस पर चाँदी का सिक्का खरीदने से अधिक का बजट नहीं बचा था उसके पास। ट्रैफिक के चलते सिटी बस ने उसके घर से बाजार की 20 मिनट की दूरी 45 मिनट में पूरी की। बाजार में भीड़ ऐसी कि पैर रखने को जगह नहीं। भारतीय समाज की विशेषता यही है कि पैर रखने की जगह न बची होने पर भी हरेक को पैर टिकाना मयस्सर हो ही जाता है।

भीड़ की रेलमपेल ऐसी कि दुकान, सड़क और फुटपाथ में कोई अंतर नहीं बचा था। चौपहिया, दुपहिया, दोपाये, चौपाये सभी भीड़ का हिस्सा। साधक, अध्यात्म में वर्णित आरंभ और अंत का प्रत्यक्ष सम्मिलन यहाँ देख सकते थे।

….उसके विचार और व्यवहार का सम्मिलन कब होगा? हर वर्ष सोचता कुछ और…और खरीदता वही चाँदी का सिक्का। कब बदलेगा समय? विचारों में मग्न चला जा रहा था कि सामने फुटपाथ की रेलिंग को सटकर बैठी भिखारिन और उसके दो बच्चों की कातर आँखों ने रोक लिया। …खाना खिलाय दो बाबूजी। बच्चन भूखे हैं।..गौर से देखा तो उसका पति भी पास ही हाथ से खींचे जानेवाली एक पटरे को साथ लिए पड़ा था। पैर नहीं थे उसके। माज़रा समझ में आ गया। भिखारिन अपने आदमी को पटरे पर बैठाकर उसे खींचते हुए दर-दर रोटी जुटाती होगी। आज भीड़ में फँसी पड़ी है। अपना चलना ही मुश्किल है तो पटरे के लिए कहाँ जगह बनेगी?

…खाना खिलाय दो बाबूजी। बच्चन भूखे हैं।…स्वर की कातरता बढ़ गई थी।..पर उसके पास तो केवल सिक्का खरीदने भर का पैसा है। धनतेरस जैसा त्योहार सूना थोड़े ही छोड़ा जा सकता है।…वह चल पड़ा। दो-चार कदम ही उठा पाया क्योंकि भिखारिन की दुर्दशा, बच्चों की टकटकी लगी उम्मीद और स्वर में समाई याचना ने उसके पैरों में लोहे की मोटी सांकल बाँध दी थी। आदमी दुनिया से लोहा ले लेता है पर खुदका प्रतिरोध नहीं कर पाता।

पास के होटल से उसने चार लोगों के लिए भोजन पैक कराया और ले जाकर पैकेट भिखारिन के आगे धर दिया।

अब जेब खाली था। चाँदी का सिक्का लिए बिना घर लौटा। अगली सुबह पत्नी ने बताया कि बीती रात सपने में उसे चाँदी की लक्ष्मी जी दिखीं।

 

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 121 ☆ कान्हा राष्ट्रीय उद्यान – हार्ड ग्राउंड बारासिंघा और बाघों का बसेरा ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी  द्वारा रचित एक ज्ञानवर्धक आलेख  ‘कान्हा राष्ट्रीय उद्यान – हार्ड ग्राउंड बारासिंघा और बाघों का बसेरा। इस विचारणीय कविता के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 121 ☆

?  कान्हा राष्ट्रीय उद्यान – हार्ड ग्राउंड बारासिंघा और बाघों का बसेरा ?

घने ऊँचे वृक्षों के बीच से सूरज की रोशनी कुछ इस तरह से झर रहीं थीं मानो स्वर्ण किरणें सीधे स्वर्ग से आ रही हों. हम खुली जीप पर सवार थे. जंगल की नमी युक्त, महुये की खुशबू से सराबोर हवा हमें एक मादक स्पर्श से अभीभूत कर रही थी.गर्मी के मौसम में भी हल्की ठंड का अहसास हो रहा था,मानो प्रकृति ने एारकंदीशनर चला रखा हो. पत्तों की कड़खड़ाहट भी हमें चौंका देती थी, लगता था कि अगले ही पल कोई वन्य जीव हमारे सामने होगा. मेरे बच्चों की जिज्ञासा हर पल एक नया सवाल लेकर मेरे सम्मुख थी. मिलिट्री कलर की ड्रेस में ग्राम खटिया का रहने वाला मूलतः आदिवासी गौंड़, हमारा गाइड मुन्नालाल बार बार बच्चों को शांत रहने का इशारा  कर रहा था जिससे वह किसी आसन्न जानवर की आहट ले सके. बिटिया चीना ने खाते खाते चिप्स का पैकेट खाली कर दिया था, और उसने पालीथिन के उस खाली पैकेट को अपने बैग में रख लिया जंगल में घुसने से पहले ही हमें बताया गया था कि जंगल नो पालीथिन जोन है. जिससे कोई जानवर पालिथिन गलती से न खा  ले, जो उसकी जिंदगी की मुसीबत बन जाये. कान्हा का अभयारण्य क्षेत्र ईकोलाजिकल फारेस्ट के रूप में जाना जाता है. जंगल में यदि कोई पेड़ सूखकर गिर भी जाता है तो यहां की विशेषता है कि उसे उसी स्थिति में प्राकृतिक तरीके से ही समाप्त होने दिया जाता है. यही कारण है कि कान्हा में जगह जगह उँचे  बड़े दीमक के घर “बांमी” देखने को मिलते हैं.

पृथ्वी पर पाई जानें वाली बड़ी बिल्ली की प्रजातियों में से सबसे रोबीला, अपनी मर्जी का मालिक और खूबसूरत है,भारत का राष्ट्रीय पशु – बाघ. जहां एक बार भारत के जंगलों में 40,000 से अधिक बाघ थे, पिछले दशक में ऐसा लगा मानो यह प्रजाति विलुप्त  होने की कगार पर है.  शिकार के कारण तथा जंगलों की अंधा धुंध कटाई के चलते भारत के वन्य क्षेत्रों में बाघों की संख्या घट कर 2000 से भी कम हो गई थी. समय रहते सरकार और पर्यावरण विदो ने सक्रिय भूमिका निभाई. कान्हा जैसे वन अभयारण्यों में पुनः बाघों को अपना घर मिला और प्रसन्नता का विषय है कि अब बाघो की संख्या में उल्लेखनीय वृद्धि दर्ज हुई है.  बाघों को तो चिड़ियाघर में भी देखा जा  सकता है,  परंतु जंगल में मुक्त विचरण करते बाघ देखने का रोमांच और उत्साह अद्भुत होता है. वन पर्यटन हेतु प्रदेश टूरिज्म डिपार्टमेंट ने   कान्हा राष्ट्रीय उद्यान,  बांधवगढ़ राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आदि में बाघ सफारी हेतु इंतजाम किये हैं. इन वनो में हम भी शहरी आपाधापी छोड़कर जंगल के नियमों और प्रकृति से तादात्म्य स्थापित करते हुये, बिना वन्य प्राणियो को नुकसान पहुंचाये उन्हें निहार सकते हैं. इन पर्यटन स्थलो के वन संग्रहालयो में पहुंचकर वन्य प्राणियो के जीवन चक्र को समझ सकते हैं, और लाइफ टाइम मैमोरीज के साथ ही प्राकृतिक छटा में, अविस्मरणीय फोटोग्राफ लेकर एक रोचक, रोमांचक अनुभव कर सकते हैं.

कान्हा राष्ट्रीय उद्यान व बाघ अभयारण्य मध्य प्रदेश राज्य के मंडला एवम्‌ बालाघाट जिलों में स्थित है. कान्हा में हमें बाघों व अन्य वन्य जीवों के अलावा पृथ्वी पर सबसे दुर्लभ हिरण प्रजातियों में से एक -हार्ड ग्राउंड बारहसिंगा को भी देखने का मौका मिलता हैं. समर्पित स्टाफ व उत्कृष्ट बुनियादी पर्यटन ढांचे के साथ कान्हा भारत का सबसे अच्छा और अच्छी तरह से प्रबंधित अभयारण्य हैं. यहां का प्राकृतिक सौन्दर्य, हरे भरे साल और बांस के सघन जंगल, घास के मैदान तथा शुद्ध व शांत वातावरण पर्यटक को सम्मोहित कर लेता हैं. कान्हा पर्यटकों, प्राकृतिक इतिहास,वन्य जीव फोटोग्राफरों, बाघ और वन्यजीव प्रेमियों के साथ बच्चो और आम लोगों के बीच बड़े पैमाने पर प्रसिद्ध है. कहा जाता है कि लेखक श्री रुडयार्ड किपलिंग को ‘जंगल बुक’ नामक विश्व प्रसिद्ध उपन्यास लिखने के लिए इसी जंगल से प्रेरणा मिलीं थी.  किपलिंग रिसार्ट नामक एक परिसर उनकी स्मृतियां हर पर्यटक को दिलाता रहता है. बाघ व बारह सिंगे के सिवाय कान्हा में  तेंदुआ, गौर (भारतीय बाइसन), चीतल, हिरण, सांभर, बार्किंग डीयर, सोन कुत्तों के झुंड, सियार इत्यादि अनेक स्तन धारी जानवरों, तथा कुक्कू, रोलर्स, कोयल, कबूतर, तोता, ग्रीन कबूतर, रॉक कबूतरों, स्टॉर्क, बगुलों, मोर, जंगली मुर्गी, किंगफिशर, कठफोड़वा, फिन्चेस, उल्लू और फ्लाई कैचर जैसे पक्षियों की 250 से अधिक प्रजातियों, विभिन्न सरीसृपों और हजारों कीट पतंगे हम यहाँ  देख सकते हैं. प्रकृति की सैर व वन्य जीवों को देखने के अलावा बैगा और गोंड आदिवासीयो की संस्कृति व रहन सहन को समझने के लिए भी पर्यटक यहाँ देश विदेश से आते हैं.

भारत में सबसे पुराने अभयारण्य में से एक, कान्हा राष्ट्रीय उद्यान को 1879 में आरक्षित वन तथा 1933 में अभयारण्य घोषित किया गया, 1973 में इसे वर्तमान स्वरूप और आकार में अस्तित्व में लाया गया था, लेकिन इसका इतिहास महाकाव्य रामायण के समय से पहले का हैं. कहा जाता हैं कि अयोध्या के महाराज दशरथ ने कान्हा में स्थित श्रवण ताल में ही श्रवण कुमार को हिरण समझ के शब्द भेदी बाण से मार दिया था तथा श्रवण कुमार का अंतिम संस्कार श्रवण चित्ता में हुआ था. आज भी वर्ष में एक दिन जब श्रवण ताल में आदिवासियो का मेला भरता है, सभी को वन विभाग द्वारा कान्हा वन्य क्षेत्र में निशुल्क प्रवेश दिया जाता है. 

इस क्षेत्र में पायी जाने वाली रेतीली अभ्रक युक्त  मिट्टी जिसे स्थानीय भाषा में ‘कनहार’ के नाम से जाना जाता है, के कारण इस वन क्षेत्र में कान्हा नामक वन्य ग्राम था जिसके नाम पर ही इस जंगल का नाम कान्हा पड़ा. एक अन्य प्रचलित लोक गाथा के अनुसार कवि कालिदास जी द्वारा रचित ‘अभिज्ञान शाकुंतलम’ में वर्णित ऋषि कण्व यहां के निवासी थे तथा उनके नाम पर इस क्षेत्र का नाम कान्हा पड़ा.

कान्हा राष्ट्रीय पार्क के चारों ओर बफर क्षेत्र में आदिवासी संस्कृति और जीवन स्तर को देखने के लिए गांव का भ्रमण तथा जंगल को पास से देखने व समझने के लिए एवम्‌ पक्षियो को  निहारने के लिए सीमित क्षेत्र में पैदल जंगल भ्रमण किया जा सकता हैं. कान्हा के प्राकृतिक परिवेश और शांत वातावरण में स्वास्थ्यप्रद भोजन, योग और ध्यान के साथ स्वास्थ्य पर्यटन का आनंद भी लिया जा सकता है. कान्हा क्षेत्र बैगा और गोंड आदिवासियों का निवास रहा है. बैगा आदिवासियों को भारतीय उप महाद्वीप के सबसे पुराने निवासियों में से एक के रूप में जाना जाता है। वे घुमंतू खेती किया करते थे और जंगल से शहद, फूल, फल, गोंद, आदि लघु वनोपज एकत्र कर के अपना जीवन यापन करते थे. स्थानीय क्षेत्र और वन्य जीवन का उनको बहुत गहरा ज्ञान है. बांस के घने जंगल कान्हा की विशेषता हैं. यहां के स्थानीय ग्रामीण बांस से तरह तरह के फर्नीचर व अन्य सामग्री बनाने में बड़े निपुण हैं. मण्डला में कान्हा सिल्क के नाम से स्थानीय स्तर पर कुकून से रेशम बनाकर हथकरघा से रेशमी वस्त्रो का उत्पादन इन दिनों किया जा रहा है. आप कान्हा से लौटते वक्त सोवेनियर के रूप में बांस की कोई कलाकृति, वन्य उपज जैसे शहद, चिरौंजी, आंवले के उत्पाद या रेशम के वस्त्र अपने साथ ला सकते हैं, जो बार बार आपको प्रकृति के इस रमणीय सानिध्य की याद दिलाते रहें.

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 102 – लघुकथा – धनलक्ष्मी ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। । साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत है  पारिवारिक विमर्श पर आधारित एक संवेदनशील लघुकथा  “धनलक्ष्मी । इस विचारणीय लघुकथा के लिए श्रीमति सिद्धेश्वरी सराफ जी की लेखनी को सादर नमन। ) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 102 ☆

? लघुकथा – धनलक्ष्मी ?

लगातार व्यापार में मंदी और घर के तनाव से आकाश बहुत परेशान हो उठा था। घर का माहौल भी बिगड़ा हुआ था। कोई भी सही और सीधे मुंह बात नहीं कर रहा था। सभी को लग रहा था कि आकाश अपनी तरफ से बिजनेस पर ध्यान नहीं दे रहा है और घर का खर्च दिनों दिन बढ़ता चला जा रहा है।

आज सुबह उठा चाय और पेपर लेकर बैठा ही था कि अचानक आकाश के पिताजी की तबीयत खराब होने लगी घर में कोहराम मच गया। एक तो त्यौहार, उस पर कड़की और फिर ये हालात। किसी तरह हॉस्पिटल में भर्ती कराया। घर आकर पैसों को लेकर वह बहुत परेशान था कि पत्नी उमा आकर बोली… चिंता मत कीजिए सब ठीक हो जाएगा। मैं और तीनों बेटियों ने कुछ ना कुछ काम करके कुछ रुपये जमा कर रखा है, जो अब आपके काम आ सकता है। बेटियों ने ट्यूशन और सिलाई का काम किया है।

पिताजी का इलाज आराम से हो सकता है। आकाश अपनी तीनों बेटियों और पत्नी से नफरत करने लगा था। क्योंकि उसे तीन बेटियां हो गई थी। रुपयों से भरा बैग देकर उमा ने कहा… आपका ही है, आप पिताजी को स्वस्थ  कर घर ले कर आइए।

आकाश अपनी पत्नी और बेटियों का मुंह देखता ही रह गया। सदा एक दूसरे को कोसा करते थे परिवार में सभी लोग। परंतु आज वह रुपए लेकर अस्पताल गया, मां समझ ना सकी कि इतने रुपए कहां से लाया।

मां ने समझाया… आज धनतेरस है शाम को मैं तेरे बाबूजी के साथ रह लूंगी। घर जा कर पूजा कर लेना।

पूजा का सामान लेकर वह घर पहुंचा। पत्नी ने सारी तैयारी कर रखी थी और तीनों बेटियों को लेकर एक जगह बैठ गई थी। आकाश ने पूजा शुरू की और आज सबसे पहले अपनी धनलक्ष्मी और धनबेटियों को पुष्प हार पहना, तिलक लगाकर वह बहुत प्रसन्न था।

मन ही मन सोच रहा था सही मायने में आज तक मैं लक्ष्मी का अपमान करता रहा आज सही धनतेरस की पूजा हुई है। उमा और तीनों बेटियां बस अपने पिताजी को देखे जा रही थी। घर दीपों से जगमगा रहा था। बेटियों ने बरसों बाद अपने पिताजी को गले लगाया और माँ के नेत्र तो आंसुओं से भीगते चले जा रहे थे।

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares