मराठी साहित्य – विविधा ☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी ऐकल्या नंतर ,वाचल्यानंतर मन जड झाले.एका ऐतिहासिक पर्वाचाच अस्त झाला.

संपूर्ण जीवनात त्यांचा एकच ध्यास होता, शिवचरीत्र घराघरात पोहचवायचे.शिवाजी राजाचे उत्तुंग व्यक्तीमत्व ,आणि त्याचे विवीध पैलु जाणीवपूर्वक अभ्यासून त्यांनी श्रोत्यांपुढे वाचकांपुढे मांडले…

वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत अखंड वाचन आणि अभ्यास त्यांनी उपासकाच्या भूमिकेतून केला.नवे अभ्यासक,,नवे इतिहासकार व्हावेत म्हणून ते तरुणांना प्रेरणा देत.मदत करत…

कथाकथन, व्याख्यान, नाटक, जाणता राजा हे महानाट्य, पुस्तकं, विवीध मालीकांसाठी संहीता लेखन, या माध्यमातून त्यांनी शिवचरित्र घराघरात नेलं.. सुलभ भाषाशैली, प्रभावी ओघवतं वक्तृत्व .. यामुळे सामान्य माणसाना शिवाजी राजा, त्यांचे कर्तुत्व, त्यांचे माणूसपण, त्यांचे राजेपण, नेतृत्व, देवत्व याचे आकलन झाले.

त्यांच्या मुखातून शिवचरीत्र ऐकताना श्रोते शिवमय होत.मंत्रमुग्ध होत.गेली सात दशके बाबासाहेबांनी हे अमृत प्रांतोप्रांती पाजले…

बळवंत मोरोपंत पुरंदरे हे त्यांचं मूळ नाव..

पण जनमानसात त्यांची ओळख बाबासाहेब पुरंदरे याच नावाने आहे..

वयाच्या आठव्या वर्षी वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी वडीलांकडे सिंहगड दाखवण्याचा हट्ट केलाहोता वडीलांनी तो पुराही केला होता..

शाळेत त्यांनी केलेलं भाषण ऐकून, शिक्षकांनी त्यांना छातीशी कवटाळलं.. म्हणाले.. “खूप मोठा होशील.. अभ्यास कर.. इतिहासाचे संस्कार जनात वाट…”

“शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे ..”असे ते सांगत.

भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब त्यांना बहाल केला. महाराष्ट्रभूषण म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले. मात्र या दोन्ही सन्मानाच्या वेळी उलटसुलट विचारप्रवाह वाह्यले. बाबासाहेब मात्र तटस्थच राहिले. त्यांनी स्वत:ला कधी इतिहासकार असे बिरुद लावले नाही. ते अभ्यासक, उपासकाच्या भूमिकेतच वावरले… लोकांनी मात्र त्यांना शिवशाहीरच मानले.

महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या दहा लाख रकमेतील फक्त दहा पैसे त्यांनी स्वत:जवळ ठेवले आणि पदरचे घालून पंधरा लाखाची देणगी त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलला  दिली.

गणगोतमधे पु.ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहीतात, “इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. भक्त आहे. पण त्या भक्तीमार्गावर ज्ञानदीपाचा प्नकाश आहे. निराधार विधान करायचे नाही.ही प्रतिज्ञा आहे.लिहीताना अखंड सावधपण आहे..”

त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. बारीकसारीक तपशील त्यांच्या लक्षात रहात. अभ्यासात सातत्य होते. ते हाडाचे संशोधक होते. तेम्हणत “शास्त्रीय पद्धतीने लिहीलेलं लेखन अभ्यासकांपुरतं मर्यादित रहातं. मात्र रंजक पद्धतीचं लेखन सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहचतं..”

सागर देशपांडे यांनी लिहीलेल्या बाबासाहेबांवरच्या बेलभंडार या पुस्तकात या संशोधकाची परिपूर्ण ओळख होते…

शंभराव्या वाढदिवसाच्या समारंभात ते म्हणाले होते, “मला जर १२५वर्षांचं आयुर्मान लाभलं तर मी शिवचरीत्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईन…”

त्यांच्याइतका लोकप्रिय संशोधक आजपर्यंत झाला नसेल.पानटपरीवरही आदराने त्यांचा फोटो कितीतरी जणांनी पाहिला असेल.तेही लोकांचा तितकाच आदर करत.लहान मुलांनाही ते अहो जाहो करत… असं हे थोर व्यक्तीमत्व..आज अनंतात लोपलं.

काळाच्या उदरांत विसावलं…

एक ध्यास पर्व संपलं…शिवभक्तीने तळपलेला हा महासूर्य अनंताच्या क्षितीजावर मावळला…

ऊरले आहेत ते चैतन्याचे, स्फुर्तीचे, प्रेरणेचे नारिंगी रंग…

अशा व्यक्तीमत्वापुढे  नतमस्तक होऊन आदरपूर्वक वाहिलेली ही श्रद्धांजली..!!??

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋण….भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ ऋण….भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या ‘आशा दीप’ नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले, तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधूनमधून पोस्टमन येऊन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा,  तेव्हा हे ठराविक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या 

आविर्भावात,  बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेऊन वाचत बसलेले असत.  किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत. 

त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली–” देशमुख काका… तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेऊन जा “  

–तेव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच. 

‘आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?’ असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात ‘बार’ भरला होता. मानेनेच ‘ जाउन या..बघा काय आलय..’ असे नानांनी आप्पांना सुचवले, तसे आप्पा  लगबगीने ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले. 

पाकीट दिल्लीवरून स्पीड पोस्टने पाठवलेले होते. 

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहिले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01

आप्पा देशमुखला दिल्लीवरून कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते. 

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येऊ लागल्या..

“ काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढे दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..”  आबा क्षीरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.

“ अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला—तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या—”  बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले. 

“ छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commission मधे घेताहेत की काय ? अभिनंदन आप्पा..!!”  पांडूकाका पवार बोलले. 

तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले—

“ अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच…ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..” 

आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकिटाची एक कड कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुनेबरोबर पटेनासे झाले,  तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येऊन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येऊन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही. 

पाकिटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..

‘माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक- दिना निमित्त सप्रेम नमन.’

खाली फक्त नाव होते..आरती.

नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..’अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’

—– ( क्रमशः भाग पहिला )

प्रस्तुती : संग्रहिका अंजली गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? मनमंजुषेतून ?

☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली  ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

ज्यांनी आपले उभे आयुष्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी अर्पण केले, अशा थोर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…….?

हिमालयातील ट्रेकसाठी दुरांतोमधून प्रवास सुरू होता. संध्याकाळ झाली होती. बाहेर अंधार पडला होता. आम्ही पत्ते खेळत होतो. तितक्यात आमच्यापैकी कुणीतरी धावत येऊन, ‘ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिसले आपल्या गाडीत — मागच्या बाजूने २ डबे ओलांडून गेल्यावर दिसले ‘  अशी बातमी दिली. ताबडतोब डाव सोडून आम्ही धावत गेलो. आणि त्यांचे दर्शन घडले. त्या तेजःपुंज व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक झालो. डोक्यावर हात ठेवून त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. तो आयुष्यातला खूप अविस्मरणीय क्षण होता. प्रत्यक्ष देव भेटल्याचा अनुभव आला. डोळ्यात आनंदाश्रू —मन भरून आले.

बोलता येईना. ते हसले. “बसा”  म्हणाले. वडिलांजवळ बसल्यासारखेच वाटले. आता ट्रेक यशस्वी होणारच हे निश्चित होते. आणि तसेच झाले. एक विलक्षण अनुभव जगता आला. त्याबद्दल देवाची  खूप खूप आभारी आहे.

भेटीनंतर जी उर्जा, चेतना मिळाली, ती आजतागायत टिकून आहे. अजूनही ट्रेकला जायचं ठरवलं की, ही आठवण मनात येते. आणि अंगात चार हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते.

अफाट स्मरणशक्ती, आपल्या भाषणातून, लेखनातून, अभिनयातून संपूर्ण इतिहास, त्यातील प्रसंग,  जिवंतपणे डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. अत्यंत निष्ठावंत शिवप्रेमी, अभ्यासू आदर्श व्यक्तिमत्व–ज्यांनी आपलं सर्व आयुष्य खर्च करून भावी पिढीसाठी इतिहास जागवला, आणि तो जिवंत ठेवण्यासाठी तळमळीने अखंड यज्ञ सुरू ठेवला, त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन—?

शरीराने आज ते आपल्याजवळ नसले तरी त्यांचे महान कार्य सतत प्रेरणा देणारे आहे. ते कार्य पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांसाठी ते नेहमीच त्यांच्या सोबत आहेत, हे नक्कीच–

भावपूर्ण श्रध्दांजली… ?

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिसिंग टाईल्स फिलाॅसाॅफी.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला —-

एका नव्याकोऱ्या, आलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता. 

आतून बाहेरुन ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. 

हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते.

पण मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग म्हणून ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे ठरवले.

–त्यांच्या सांगण्यावरून हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहून बाजूला काढून ठेवण्यात आली होती.  

आता एक वेगळीच गंमत सुरु झाली. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहून हरखून गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्यांचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले—-शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली—

‘ ही टाईल  बसवायची राहिली आहे का ? का ती बाजूला गळून पडली ?’  यावर तावातावाने वादविवाद झडू लागले—–‘ हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे,’  असेही शेकडो जणांनी बोलून दाखवले.

एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरून द्यायचा होता– त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लँडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तू ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहिले, आणि मिसिंग टाईलबद्दल अगदी भरभरून लिहिले. 

त्या हॉटेलमध्ये जागोजागी एकाहून एक देखणी, आकर्षक शिल्प ठेवण्यात आली होती. पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या. आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या.

मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणूनबुजून ठेवण्यात आले होते. खरेतर ते डाग इतके छोटे होते, की एकूण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा त्यांचा आकार नव्हता.—–पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले—– लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवू लागले— 

‘ सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहिले ‘ ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करू लागले. 

काही काही अतिउत्साही लोक तर बांधकामातल्या फक्त चुकाच शोधू लागले,

एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलिब्रेट करू लागले.

शेवटी हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला. 

——–   

“आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसिंग टाईल जाणून- बुजून काढून ठेवण्यात आली होती ”,

“मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते ”,—आणि माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणून घ्यायचे होते. 

—-आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता. 

हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडून ठेवण्यात आलेल्या असतांनाही,   बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता. 

मित्रांनो,

कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं, दोष काढून नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का ?—तर नाही.

पण जसजसे आपण मोठे होतो, तसतशी आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते. 

—मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो. 

—तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमूल्य उर्जा आणि बहुमूल्य वेळ खर्च करतो. 

—-“मला योग्य ते शिक्षणच मिळाले नाही.”

—“माझा जन्म गरीब घरात झाला.”

—“माझा जन्म अशा जातीत झाला, जिथे मला संधीच उपलब्ध नाही.”

—“माझे आई वडील शिकलेले नव्हते.”

—“माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही.”

—“माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कसलेच बॅकअप तयार केले नाही, मला भांडवल दिले नाही.”

—“आमच्या जवळ बुद्धी नाही.”

—“आमच्या जवळ डिग्री नाही.”

—“घरच्या परिस्थितीमुळे आम्ही मनासारखे शिक्षण घेऊ शकलो नाही.” 

—“मी दिसायला तितकी सुंदर नाही.”

—“माझा जोडीदार मला हवा तसा मिळाला नाही, म्हणुन माझी प्रगती शक्य नाही.”

ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं, आणि त्यावर चर्चा करणं, हा मूर्खपणा आहे, असं तुम्हाला वाटत नाही का?

—ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे, तो आजूबाजूला लपलेल्या संधीमध्ये सोने शोधतो. —आणि ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त मिसींग टाईल शोधतो…..!!!

Yogi

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग १ – देखणा दुर्ग ग्वाल्हेर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १५ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️

कार्तिकातल्या स्वच्छ निळ्या आकाशाच्या तळ्यात, अष्टमीच्या शुभ्र चंद्राची होडी विसावली होती. हवीहवीशी वाटणारी सुखद थंडी अंगावर शिरशिरी आणत होती. लांबरुंद, उतरत्या दगडी पायर्‍यांवर बसून आम्ही समोरचा, पाचशे वर्षांपूर्वीचा ग्वाल्हेरचा किल्ला निरखत होतो. तेवढ्यात दिवे मालवले गेले. त्या नीरव शांततेत सभोवतालच्या झाडीतून घोड्यांच्या टापा ऐकू येऊ लागल्या. धीर-गंभीर आवाजात, किल्ल्यावर आणि सभोवती टाकलेल्या प्रकाशझोतात इतिहासाची पाने आमच्यापुढे उलगडली जाऊ लागली.

राजा मानसिंह याने इसवीसन १४८६ ते १५१६ या काळात तांबूस घडीव दगडात या किल्ल्याचं बांधकाम केलं.( हा राजा मानसिंह, तोमर वंशातील आहे. रजपूत राजा मानसिंह, ज्याची बहीण अकबर बादशहाला दिली होती तो हा नव्हे). गुप्तकाळातील म्हणजे इसवी सन ५३० मधील शिलालेख येथे सापडला आहे. गुप्त, परमार, बुंदेले, तोमर, चौहान, लोधी, मोगल, मराठे, इंग्रज अशा अनेक राजवटी येथे होऊन गेल्या. तलवारींचे खणखणाट, सैन्याचे, हत्ती- घोड्यांचे  आवाज, राजांचे आदेश, जखमींचे विव्हळणे, शत्रूपासून शीलरक्षणासाठी राण्यांनी केलेला जोहार असा सारा इतिहास ध्वनीप्रकाशाच्या सहाय्याने जिवंत होऊन आमच्यापुढे उभा राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हा किल्ला पाहताना काल पाहिलेला इतिहास आठवत होता. रुंद, चढणीचा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जवळ- जवळ तीन किलोमीटर लांब पसरलेल्या या किल्ल्याला ३५ फूट उंचीची मजबूत तटबंदी आहे. त्यात सहा अर्धगोलाकार बुरुज बांधलेले आहेत. बुलंद प्रवेशद्वारावर केळीची झाडे, बदकांची रांग, सुसरींची तोंडे, घोडे ,हत्ती अशा शिल्पाकृती आहेत. काही ठिकाणी निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगातील मीनायुक्त रंगकाम अजून टिकून आहे. किल्ल्याच्या आतील ‘मान मंदिर’ हा राजवाडा हिंदू स्थापत्यशैलीचा अजोड नमुना आहे. राजा मानसिंह याच्या कारकिर्दीमध्ये राजाश्रयामुळे गायन, वादन, नर्तन अशा सार्‍या कलांची भरभराट झाली. अशी कथा सांगतात, की राजा एकदा शिकारीला गेलेला असताना त्याने, दोन दांडग्या म्हशींची झुंज, नुसत्या हाताने सोडविणाऱ्या देखण्या गुजरीला पाहिले.  राजा गुजरीच्या प्रेमात पडला. तिलाही राजा आवडला होता. गुजरीने विवाहासाठी तीन अटी  घातल्या. एक म्हणजे ती पडदा पाळणार नाही. सदैव म्हणजे रणांगणावरसुद्धा राजाबरोबरच राहील  आणि  तिच्या माहेरच्या राई गावातील नदीचे पाणी ग्वाल्हेरमध्ये आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. राजाने गुजरीच्या या तीनही अटी मान्य करून तिच्याशी विवाह केला व तिचे नाव मृगनयनी ठेवले. मृगनयनीला संगीतात उत्तम गती होती. राजाही संगीताचा मर्मज्ञ होता. शास्त्रीय संगीतात सुप्रसिद्ध असलेलं ‘ग्वाल्हेर घराणं’ या राजाच्या काळात उदयाला आलं. गानसम्राट तानसेनही इथलाच! मानसिंहाने त्याला अकबराकडे भेट म्हणून पाठविले. तानसेनचे गुरू, स्वामी हरिदास यांच्या स्मरणार्थ अजूनही इथे दरवर्षी संगीत महोत्सव साजरा होतो .

‘मान मंदिर’ या राजवाड्यात गतवैभवाची साक्ष मिरविणारे चाळीस लांबरुंद दिवाणखाने आहेत. गायन कक्षातील गाणे शिकण्यासाठी, ऐकण्यासाठी भोवतालच्या माडीमध्ये राणी वंशाची सोय केली आहे. दरबार हॉल, शयनकक्ष,मसलतखाना, पाहुण्यांची जागा अशा निरनिराळ्या कामांसाठी हे हॉल वापरले जात. भिंतीवर काही ठिकाणी हिरव्या, निळ्या रंगातील लाद्या अजून दिसतात.मीना रंगातील नाजूक कलाकुसरीची जाळी दगडातून कोरली आहे हे सांगितल्यावरच समजते. महालातील भुलभुलैया या ठिकाणच्या दगडी, अंधाऱ्या पायऱ्या गाईडच्या मदतीने उतरून तळघरात गेलो. इथे पूर्वी राण्यांच्या शाही स्नानासाठी, केशराने सुगंधित केलेल्या पाण्याचा लांबरुंद हौद होता. वरच्या दगडी छतात राण्यांच्या झुल्यांसाठी लोखंडी कड्या टांगलेल्या आहेत. झरोक्यातून वायूवीजनाची सोय तसेच ताज्या, वाहत्या पाण्याचा प्रवाह येण्याची व्यवस्था आहे. तिथे असलेले दोन पोकळ पाईप दाखवून हा पूर्वीचा टेलिफोन (संदेशवहनाचा मार्ग) आहे असे गाईडने सांगितले. आता त्या स्नानाच्या हौदाचा  बराचसा भाग लाद्यांनी आच्छादलेला आहे व फारच थोडा भाग जाळीच्या आवरणाखाली आहे.

कालचक्राची गती कशी फिरेल याचा नेम नाही. इसवीसन १५१६ मध्ये इब्राहीम लोदीने ग्वाल्हेरवर ताबा मिळविला. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि या स्नानगृहाचा म्हणजे तळघराचा वापर चक्क अंधारकोठडी म्हणून करण्यात आला. झोपाळ्यांसाठी बसविलेल्या लोखंडी कड्यात राजकैद्यांसाठी बेड्या अडकविण्यात आल्या. औरंगजेबाचा भाऊ मुराद व मुलगा मोहम्मद, दाराचा मुलगा शिको अशा अनेकांसाठी हे मृत्युस्थान बनले. जहांगीर बादशहाने शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांनाही इथे कैदेत ठेवले होते. नंतर दोन वर्षांनी त्यांची सुटका केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी स्वतःबरोबर कैदेत असलेल्या ५२ हिंदू राजांचीही सुटका करविली. गुरु हरगोविंद यांच्या स्मरणार्थ बांधलेला ‘दाता बंदी छोड’ या नावाचा एक भव्य गुरुद्वारा किल्ल्याजवळच आपल्याला बघायला मिळतो.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 8 – ….दिखे नहीं हैं ऐसे मित्र ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है सजल “… दिखे नहीं हैं ऐसे मित्र। अब आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 8 – … दिखे नहीं हैं ऐसे मित्र ☆ 

सजल

समांत- इत्र

पदांत- —

मात्राभार- 14

 

पढ़ा सुदामा-कृष्ण चरित्र।

दिखे नहीं हैं ऐसे मित्र।।

 

दीवारों में टांँग रहे,

फ्रेम जड़ा कर उनका चित्र।

 

बुरे लोग भी चाह रहे,

सदा मिले संबंध पवित्र।

 

ज्ञानी होकर मूर्ख बने,

यही बात है बड़ी विचित्र।

 

खुद छलिया का रूप धरें,

किंतु चाहते हैं सौमित्र।

 

धरती ने श्रृंगार किया,

उभरा है अनुपम सुचित्र।

 

ईश्वर का यह रूप दिखा,

बिखरे दिकदिगंत यह इत्र ।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ मन्नू भंडारी – अंतिम प्रणाम !! श्रद्धांजलि !! ☆ श्री सुधीर सिंह सुधाकर

श्री सुधीर सिंह सुधाकर

ई-अभिव्यक्ति में सुप्रसिद्ध साहित्यकार श्री सुधीर सिंह सुधाकर जी का हार्दिक स्वागत है। आपका परिचय आपके ही शब्दों में –

“45 वर्ष से लेखन के पश्चात लगता है अभी कुछ नहीं जाना, कुछ नहीं सीख पाया; लेकिन विद्यार्थी बनकर सीखने का जो आनंद है वह आनंद शब्द से परे है।

कोलकाता में जन्म कोलकाता से लेकर अलीगढ़ तक शिक्षा ग्रहण करने के पश्चात दिल्ली में नौकरी जीवन बीमा में 30 वर्ष गुजारने के पश्चात सेवानिवृत्ति के उपरांत 16 घंटे साहित्य सेवा यही बस काम शेष है और इसी में विद्यार्थी की तरह लगा रहता हूं।”  – सुधीर सिंह सुधाकर, दिल्ली

? मन्नू भंडारी –  अंतिम प्रणाम ?

?  श्र द्धां ज लि ?

मन्नू भंडारी जी का जन्म मध्य प्रदेश के मंदसौर जिले में 3 अप्रैल 1931 को हुआ था। बचपन में उनको प्यार से सभी मन्नू कहते थे। उनका नाम महेंद्र कुमारी थालेखन के लिए उन्होंने अपने तखल्लुस नाम की जगह मन्नू नाम का चुनाव किया और शादी के बाद भी मन्नू भंडारी के नाम से जानी जाने लगी।

उनके पिता हिंदी के जाने-माने लेखक सुख संपत राय के द्वारा मन्नू का व्यक्तिगत व्यक्तित्व निर्माण होता रहाशिक्षा प्रथम रसोई द्वितीय को वे प्रमुखता देते थेएक आदर्शवादी पिता एक क्रोधी स्वभाव के पिता से उन्हें बहुत कुछ सीखने को मिलाउनका अपना प्रथम कहानी संग्रह मैं हार गई अपने पिताजी को समर्पित करते उन्होंने लिखा था ,”जिन्होंने मेरी किसी भी इच्छा पर कभी अंकुश नहीं लगाया” पिताजी को मनु की अपने पिता की नितांत श्रद्धा इसे स्पष्ट होती है मनु भंडारी चार भाई बहन थेमनु भंडारी जी का कहना था  कोई व्यक्ति जन्म से बड़ा नहीं होताबड़ा बनने के लिए सबसे बड़ा योगदान संस्कारों का होता है उसके बाद परिवेश का 

अजमेर में रहकर उन्होंने हाई स्कूल तथा इंटरमीडिएट की परीक्षा पास की कॉलेज की प्राध्यापिका शीला अग्रवाल ने अंग्रेज सरकार के विरोध में जब उन्हें उकसाया तो वह स्वतंत्र स्वतंत्रता आंदोलन में कूद पड़ी।देश की स्वतंत्रता मिलने के बाद उन्होंने बीए की डिग्री ली कोलकाता के विद्यालय बैलीगंज शिक्षा सदन में उन्होंने 9 साल बच्चों को पढ़ायाकॉलेज में अध्यापन का भी कार्य किया। उनके पांच कहानी संग्रह दो उपन्यास दो नाटक तथा तीन बार रचनाएं प्रमुख है

मन्नू भंडारी कहती थीं लेखन ने मुझे अपने निहायत निजी समस्याओं के प्रति ऑब्जेक्टिव हो ना हो वह वरना सिखाया है उनके पति राजेंद्र यादव उनके संबंध में लिखते हैं व्यस्त के भाव छाछ में नारी के आंचल में दूध और आंखों में पानी दिखा कर उसने (मन्नू भंडारी) पाठकों की दया नहीं वसूली, वह यथार्थ के धरातल पर नारी का नारी की दृष्टि से अंकन करती है।

1957 में उनकी प्रथम कहानी संग्रह मैं हार गई के कहानी मैं हार गई कहानी पत्रिका में प्रकाशित हुई मैं हार गई कहानी संग्रह में उनकी कुल बारह कहानियां संकलित हुई। जबकि 3 निगाहों की एक तस्वीर जो कि 1959 में आई। उसमें 8 कहानियां संग्रह थी तीन निगाहों की एक तस्वीर कहानी संग्रह में नारी की गाथा हैजो दीर्घ अवधि तक बीमार पति की सेवा करती है। नायिका के व्यक्तित्व का सूक्ष्म मनोवैज्ञानिक अंकन उसके अंदर कहीं किया गया है यही सच है 1966 में उनकी तीसरी कहानी संग्रह प्रकाशित हुईइसमें 8 कहानी संग्रहित हैं। चौथा कहानी संग्रह एक प्लेट सैलाब 1968 में उनका प्रकाशित हुआ नारी जीवन की समस्याओं पर आधारित 9 कहानियों का संग्रह भी उनका प्रकाशित हुआपांचवा कहानी संग्रह 1978 में प्रकाशित हुआ। जिसमें 10 कहानियां थी। मन्नू भंडारी की श्रेष्ठ कहानियां 1969 में प्रकाशित हुई। जिसे राजेंद्र यादव जी ने संपादित कियानायक /खलनायक /विदूषक मन्नू भंडारी की 50 कहानियों का संग्रह मनु भंडारी द्वारा लिखित धारावाहिक___ रजनी की पटकथा इसमें संग्रहित हैजो दूरदर्शन पर एक समय धूम मचा कर रखी थी

एक इंच मुस्कान 1969 में प्रकाशित हुई जिसमें राजेंद्र यादव और मन्नू भंडारी दोनों ने एक साथ काम किया दोनों के द्वारा एक साथ लिखी गई एक मात्र रचना  ज्ञानोदय पत्रिका में धारावाहिक में प्रकाशित किया गया। जिसमें अमर (राजेंद्र यादव) महिला पात्र के रूप में रंजना और अमला को  (मनु भंडारी ) ने चित्रित किया है।

आपका बंटी 1971 में उपन्यास आया महाभोज उपन्यास 1979 में आया जो सामाजिक उपन्यास था। स्वामी नाम का एक उपन्यास रूपांतरित उपन्यास की कहानी के आधार पर वह भी प्रकाशित हुआ।  1966 में मनु भंडारी ने बिना दीवारों का घर एकांकी लिखा

उन्होंने अपने लेखन से महिला स्त्री पात्र के जरिए स्त्री को समझने का प्रयास कियास्त्री विमर्श की जगह स्त्री जगत की समस्या  को ही रख कर उन्हें उस पर चर्चा करना अच्छा लगता था।

2008 में उन्हें व्यास सम्मान प्राप्त हुआ।

कल  15/11/2021 को उनका निधन हो गया।

? स्व मन्नू भंडारी जी को  ई- अभिव्यक्ति परिवार की ओर से विनम्र श्रद्धांजलि ?

©  श्री सुधीर सिंह सुधाकर  

दिल्ली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समानांतर ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – समानांतर  ??

…….?

…..??

…???

पढ़ सके?

फिर पढ़ो!

नहीं…,

सुनो मित्र,

साथ न सही,

मेरे समानांतर चलो,

फिर मेरा लिखो पढ़ो..!

©  संजय भारद्वाज

(दोपहर 3:10 बजे, 15.6.2016)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 125 ☆ जल जंगल जमीन के अधिकार के आदि प्रवक्ता बिरसा मुण्डा ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी  द्वारा लिखित एक ऐतिहासिकआलेख  ‘जल जंगल जमीन के अधिकार के आदि प्रवक्ता बिरसा मुण्डा। इस विचारणीय  एवं ऐतिहासिक आलेख के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 125☆

?  जल जंगल जमीन के अधिकार के आदि प्रवक्ता बिरसा मुण्डा  ?

आज रांची झारखंड की राजधानी है. बिरसा मुंडा का जन्म 15 नवम्बर 1875 को रांची जिले के उलिहातु गांव में हुआ था .  यह तब की बात है जब  ईसाई मिशनरियां अंग्रेजी फौज के पहुंचने से पहले ही ईसाइयत के प्रचार के लिये गहन तम भीतरी क्षेत्रो में पहुंच जाया करती थीं . वे गरीबों, वनवासियों की चिकित्सकीय व शिक्षा में मदद करके उनका भरोसा जीत लेती थीं. और फिर धर्मान्तरण का दौर शुरू करती थीं. बिरसा मुंडा भी शिक्षा में तेज थे. उनके पिता सुगना मुंडा से लोगों ने कहा कि इसको जर्मन मिशनरी के स्कूल में पढ़ाओ, लेकिन मिशनरीज के स्कूल में पढ़ने की शर्त हुआ करती थी, पहले आपको ईसाई धर्म अपनाना पड़ेगा. बिरसा का भी नाम बदलकर बिरसा डेविड कर दिया गया.

1894 में छोटा नागपुर क्षेत्र में जहां बिरसा रहते थे ,अकाल पड़ा , लोग हताश और परेशान थे. बिरसा को अंग्रेजों के धर्म परिवर्तन के अनैतिक स्वार्थी व्यवहार से चिढ़ हो चली थी. अकाल के दौरान बिरसा ने पूरे जी जान से अकाल ग्रस्त लोगों की अपने तौर पर मदद की. जो लोग बीमार थे, उनका अंधविश्वास दूर करते हुये उनका इलाज करवाया. बिरसा का ये स्नेह और समर्पण देखकर लोग उनके अनुयायी बनते गए . सभी वनवासियों के लिए वो धरती आबा हो गए, यानी धरती के पिता.
अंग्रेजों ने 1882 में फॉरेस्ट एक्ट लागू किया था जिस से सारे जंगलवासी परेशान हो गए थे, उनकी सामूहिक खेती की जमीनों को दलालों, जमींदारों को बांट दिया गया था. बिरसा ने इसके खिलाफ ‘उलगूलान’ का नारा दिया . उलगूलान यानी जल, जंगल, जमीन के अपने अधिकारों के लिए लड़ाई. बिरसा ने अंग्रेजों के खिलाफ एक और नारा दिया, ‘अबुआ दिशुम अबुआ राज’, यानी अपना देश अपना राज. करीब 4 साल तक बिरसा मुंडा की अगुआई में जंगलवासियों ने कई बार अंग्रेजों को धूल चटाई. अंग्रेजी हुक्मराम परेशान हो गए, उस दुर्गम इलाके में बिरसा के गुरिल्ला युद्ध का वो तोड़ नहीं ढूंढ पा रहे थे. लेकिन भारत जब जब हारा है , भितरघात और अपने ही किसी की लालच से , बिरसा के सर पर अंग्रेजो ने बड़ा इनाम रख दिया . किसी गांव वाले ने बिरसा का सही पता अंग्रेजों तक पहुंचा दिया. जनवरी १८९० में गांव के पास ही डोमबाड़ी पहाड़ी पर बिरसा को घेर लिया गया, फिर भी 1 महीने तक जंग चलती रही, सैकड़ों लाशें बिरसा के सामने उनको बचाते हुए बिछ गईं, आखिरकार 3 मार्च वो भी गिरफ्तार कर लिए गए. ट्रायल के दौरान ही रांची जेल में उनकी मौत हो गई.

लेकिन बिरसा की मौत ने न जाने कितनों के अंदर क्रांति की ज्वाला जगा दी. और अनेक नये क्रांतिकारी बन गये . राष्ट्र ने उनके योगदान को पहचाना है . आज भी वनांचल में बिरसा मुंडा को लोग भगवान की तरह पूजते हैं. उनके नाम पर न जाने कितने संस्थानों और योजनाओं के नाम हैं, और न जाने कितनी ही भाषाओं में उनके ऊपर फिल्में बन चुकी हैं. पक्ष विपक्ष की कई सरकारों ने जल जंगल और जमीन के उनके मूल विचार पर कितनी ही योजनायें चला रखी हैं .उनकी जयंती पर इस आदिवासी गुदड़ी के लाल को शत शत नमन . 

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ माँ ☆ डॉ निशा अग्रवाल

डॉ निशा अग्रवाल

☆  कविता – माँ ☆ डॉ निशा अग्रवाल ☆  

अगर शब्द दुनियां में “माँ ” का ना होता।

सफर जिंदगी का शुरू कैसे होता।।

एक  माँ ही तो है जिसमें, कायनात समायी है।

कोख से जिसकी शुरू होता जीवन,  

होती उसी की गोद में अंतिम विदाई है।।

शुरू होती दुनियां माँ के ही दर्द से।

माँ ने ही हमारी हमसे पहचान कराई है।।

अंगुली पकड़कर सिखाया है चलना।

माँ की परछाई में दुनियां समायी है।।

ना भूख से कड़के माँ, ना प्यास से तरसे।

संतान के लिए ही वो हर पल तडफे।।

ममता के आंचल में दर्द भर लेती।

दुनियां से सामना करना सिखाई है।।

प्यार में सच्चाई की होती है मूरत।

दुनियां में माँ से बड़ी नही कोई मूरत।।

माँ की दुआओं का ही है असर हम पर।

जो मुसीबतों को भी सह लेते हम हँस कर।

माँ की नज़र से ही दुनियां है देखी।

माँ की दुआओं ने दुनियां है बदली।।

लबों पै जिसके कभी बद्दुआ ना होती।

बस एक माँ है जो कभी खफ़ा ना होती।।

मां की गोदी में जन्नत हमारी।

सारे जहां में माँ लगती है प्यारी।।

ईश्वर से भी बड़ा दर्ज़ा होता है माँ का।

जिसने जगत में हमको पहचान दिलाई।।

हर रिश्ते में मिलावट देखी है हमने।

कच्चे रंगों की सजावट देखी है हमने।।

लेकिन माँ के चेहरे की थकावट ना देखी।

 ममता में उसकी कभी मिलावट ना देखी।।

कभी भूलकर ना “माँ “का अपमान करना।

हमेशा अपनी माँ का सम्मान ही करना।।

हो जाये अगर लाचार कभी अपनी माँ तो।

कभी रूह से उसको जुदा तुम ना करना।।

एक माँ ही होती है,

जो बच्चे के गुनाहों को धो देती है।।

होती गर  गुस्से में माँ जब हमारी।

तो बस भावुकता से वो रो देती है।।

ऐ बन्दे दुआ मांग ले अपने रब से।

कि फिर से वही गोद मिल जाये।।

फिर से उसी माँ के कदमों में मुझको।

अपना सारा जहाँ मिल जाये।।

 

©  डॉ निशा अग्रवाल

जयपुर, राजस्थान

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares