☆ कविता – सब सूखा सूखा ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆
(आज मानव की स्वार्थपरता के चलते पर्यावरण असंतुलन अपने घातक स्तर को पार कर चुका है, परिणाम सूखा, बाढ़ जैसी प्राकृतिक आपदा जिसका जनक मानव स्वयं है, धरती आग का गोला बन धधकती दीख रही है, जिसके चलते पर्यावरणीय विद्रूपता स्पष्ट रूप से दीख रही है जिसका संदेश रचना कार अपने रचना के माध्यम से देना चाहता है।)
धरती सूखी अंबर सूखा, सूख गये सब स्रोत सजल।
आते जाते रहते बादल, देते नहीं मेघ अब जल।
सावन सूखा सूखी हरियाली, बदला बदला मौसम निर्जल।
बंजर बांझ हुइ भूमी, सूखे पेड़ नहीं है फल ।
आग बरसती अंबर से, धधक रही बन दावानल।।
उड़ते गिरते पंख पखेरू, और तड़पती मछली।
पानी बिन सावन उदास है, रोती तीज़ अरू कजली।
हरियाली अब खत्म हुई है, मुरझाए सब फूल।
बगिया में भी उग आए, अब कीकड़ और बबूल।।
ताल तलैए सारे सूखे, निर्झरिणी का सूखा स्रोत।
मरते जीव जगत के प्राणी, बिनु पानी के प्यासे लोग।
पेड़ कटे सब दरवाजे के, उजड़ा है चिड़ियों का नीड़।
रिस्तों में ममता है सूखी, कौन सुने रिस्तों की पीड़।
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
गणेश प्रभाकर प्रधान – ( २६ ऑगस्ट १९२२ – २९ मे २०१० )
ग. प्र. प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकरणी, मराठी भाषेचे लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते. २ वर्षे विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधानसभेचे ते सभापतीही होते. त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे.
साधना साप्ताहिकाचे ते मानद संपादक होते. सानेगुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग आसे.
त्यांनी एकूण १४ पुस्तके लिहिली. त्यापैकी मराठीत खालील पुस्तके लिहिली आहेत.
१. आगरकर लेखसंग्रह, २. डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात, ३. महाराष्ट्राचे शिल्पकार – ना.ग. गोरे ४. माझी वाटचाल, ५. सत्याग्रही गांधीजी, ६. साता उत्तराची कहाणी ७ ओकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
याव्यतिरिक्त लेटर टू टॉलस्टॉय, लो. टिळक ए बायोग्राफी इ. इंग्रजीतूनही पुस्तके लिहिली.
‘साता उत्तराची कहाणी’ हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. ‘डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात’ या पुस्तकाचे स्वरूप वेगळे आहे. एक तरुण पत्रकार डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेतो, अशी कल्पना करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
पुरस्कार – राज्यशासनाचा वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
समीर शिपूरकर यांनी ग. प्र. प्रधानांच्या जीवनकार्याचा आणि आणि समाजसेवेचा परिचय करून देणार्याश लघुपटाची निर्मिती केली आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
संजय व्यंकटेश संगवई (२३ डिसेंबर १९५९ – २९ मे २००७ )
संजय संगवई हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यम तज्ज्ञ , माध्यम चिकित्सक होते. ’अभिव्यक्ती’ या नाशिक इथून प्रकाशित होणार्यार माध्यंविषयक त्रैमासिकाचे ते संपादक होते. ‘माणूस’ साप्ताहिकात त्यांनी विविध सामाजिक, राजकीय विषयांवर तसेच शास्त्रीय संगितावर विपुल लेखन केले आहे. पर्यायी पत्रकारिता ही विकासाभिमुख पत्रकारिता असते, ही संकल्पना, संगवई यांनी आपल्या लेखनातून रुजवली. त्यांच्या मृत्यूनंतर काढलेल्या ‘अभिव्यक्ती’च्या अंकात, ‘सान्यासी माध्यमकर्मी’ असा त्यांचा गौरवास्प्द उल्लेख करण्यात आला आहे.
’नर्मदा बचाव आंदोलनाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यावरील उपचारासाठी ते केरळयेथील कोचीला गेले असता तिथेच त्यांचा अंत झाला.
संजय संगवई यांची पुस्तके –
१. अस्मिता आणि अस्तित्व ( वैचारिक लेख ) २. उद्गार ( वैचारिक लेख ) ३. नद्या आणि जनजीवन – नर्मदा खोर्याैतील लोकांच्या संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज ४. माध्यमवेध ५. कलंदर सुरांच्या स्मृतीची मैफल ( संगीतविषयक )
संजय संगवई यांना मिळालेले पुरस्कार –
१. राम आपटे प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार
२. महाराष्ट्र फाऊंडेशनचा सामाजिक कार्यासाठी पुरस्कार
३. पर्यायी पत्रकारितेसाठी महानगर पुरस्कार
४. ४. श्री. ग. माजगावकर कृतीशीलता पुरस्कार
५. समाज विज्ञान शिक्षण मंडल न्यास – मुंबई तर्फे अस्मिता आणि अस्तित्व या पुस्तकासाठी पुरस्कार
बालवाडी तालुका खानापूर, जि. सांगली येथे त्यांच्या स्मरणार्थ ‘संजय संगवई मंच’
हे चर्चापीठ स्थापन करण्यात आले आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
चारुता सागर. – (२१ नोहेंबर १९३०)
मोजक्याच कथा लिहूनही, मराठी कथाविश्व समृद्ध करणारे ग्रामीण लेखक म्हणून ज्यांच्याविषयी आदराने म्हंटलं जातं, ते चारुता सागर म्हणजे दिनकर दत्तात्रय भोसले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील, कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव इथे झाला. त्यांनी चारुता सागर या नावाने कथा लेखन केले, तर धोंडूबुवा या नावाने कीर्तने केली.
बंगालमध्ये भ्रमंती करताना त्यांनी शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबर्या् वाचल्या, त्यातील एका कादंबरीतील एका पात्राचे नाव होते, चारुता सागर. त्यांना हे नाव खूपच आवडले म्हणून त्यांनी कथालेखनासाठी हे नाव घेतले.
१२व्या वर्षी आईच्या दु:खद निधनामुळे व्यथित होऊन त्यांनी घर सोडले. साधू, बैरागी, संन्यासी बनून, रामेश्वर, हरिद्वार, काशी असे फिरत राहिले. वयाच्या २६व्या वर्षी ते पुन्हा गावी परतले. लोणारवाडी या गावात कोंबड्या, बकर्यां च्या मागे फिरणार्याा मुलांसाठी त्यांनी शाळा काढली. पण ती शाळा बेकायदेशीर ठरवून सरकारने ताब्यात घेतली. पुढे त्यांनी लोणारवाडी हे गाव सोडले. नंतर त्यांनी मळणगावला प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली.
लोणारवाडी या गावात कृष्णा नावाचा मुलगा होता. धुतला तर शर्ट फाटेल म्हणून त्याने अंगातला शर्ट कधी धुतलाच नाही. त्याच्यावर ‘न लिहिलेले पत्र’ ही कथा चारुता सागर यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली ती पहिलीच कथा सत्यकथा मासिकात छापून आली. पुढे त्यांच्या बहुतेक सगळ्या कथा सत्यकथेने छापल्या. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, हातकणंगलेकर अशी दिग्गज मंडळी त्यांच्या कथांची चाहती होती.
चारुता सागर यांची पुस्तके –
१. नदीपार, २. नागीण – यात १६ कथा आहेत , ३. मामाचा वाडा – यात १४ कथा आहेत.
पुरस्कार –
१. चारुता सागर यांच्या ‘नागीण’ या कथेला कॅ. गो.गं लिमये पुरस्कार १९७१ साली मिळाला.
२. सर्वोत्कृष्ट लघुकथाकाराचा पुरस्कार त्यांना १९७७ साली मिळाला.
जोगवा या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटाची कथा चारुता सागर यांच्या ’दर्शन’ या कथेवर आधारलेली आहे.
चारुता सागर यांच्या ‘नागीन’, ‘म्हस’ , ‘न लिहिलेले पत्र’, ‘मामाचा वाडा’, ‘पुंगी’, ‘पूल’, ‘दर्शन’, ‘वाट’, ‘नदीपार इ. अनेक कथांचा, श्री. चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.
सध्या ‘चारुता सागर प्रतिष्ठानतर्फे’ दरवर्षी कथास्पर्धा घेतली जाते आणि एका उत्कृष्ट कथेला परितोषिक दिले जाते.
आज, ग. प्र. प्रधान, संजय सांगवई, चारुता सागर यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने या तीनही प्रतिभावंतांना विनम्र श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुनुमामी म्हणजे आमच्या सदामामाची बायको. सुनीता. तिला सुनीता या नावाने कुणीच, कधीच हाका मारल्या नाहीत. सदा मामा लग्न करून तिला घरी घेऊन आला, तेव्हा घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आमच्या गोर्या,पान राजस रुपाच्या सदामामाची ही असली बायको. हे म्हणजे रेशमी शेल्याची गाठ चिंध्यांच्या वाकळीशी मारल्यासारखं होतं. काळा रंग. किंचित पुढे आलेले दात. जाड ओठ, रुंद जबडा. फताडं नाक. खरोखर अगदी ध्यानच होतं ते! नाही म्हणायला तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. बघणार्या च्या डोळ्यात तिने थेट पाहिलं, की बघणार्यायने वरमून खाली बघितलंच पाहिजे.
‘सदामामा एक फुकट्या… आता हिलाही त्याच्याबोबर पोसलं पाहिजे. ‘ घरातल्या बायका बडबडत. कधी एकमेकींशी हळू आवाजात, कधी मोठ्याने हिला ऐकू जाईल असं. सुनुमामी काहीच बोलत नसे. मान खाली घालून ती फक्त घरातली कामे करी.
त्याच्या लग्नाबद्दल घरातल्या बायका-पोरांना कल्पना नव्हती, पण पुरुष माणसांना माहीत असावं. लग्न झाल्यावर तरी त्याला जबाबदारीची जाणीव होईल. काही तरी कामधंद्याला लागेल, असं वाटलं होतं त्यांना. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नव्हतं.
सदामामाचा उद्योग म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या लोकांबरोबर भटकणे. त्यांच्याबरोबर पत्ते कुटणे, घरात आल्यावर बाहेरच्या दिवाणावर पडून अरेबियन नाईटस, हतीमताई, विक्रम वेताळ यासारखी पुस्तकं वाचणे. घरातल्या पुरुषांनी त्याला कामालालावायचा अनेकदा प्रयत्न केला होता. घरातल्या पेढीवर ठेवला. पण दोनच दिवसात आपल्याला ते बैठं काम जमणार नाही म्हणाला आणि पेढीवर जाणं सोडून दिलं. एका ओळखीच्यांच्या किराणामालाच्या दुकानात समान देण्यासाठी ठेवला, तर तो मालात भेसळ करतो, मला असला माल देणं जमणार नाही म्हणाला. एका गॅरेजमध्ये ठेवला, तर असलं काम केल्याने तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, म्हणाला. थोडक्यात काय, तर या ‘जोरूका भाई’ला कामाला लावायचे सगळे प्रयत्न फसले. शेवटी पुरुषांनी ठरवलं, घरात दहा माणसं जेवतात, हा अकरावा जेवेल. लग्नं झालं, पण सदामामाच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही.
सुनुमामीचं गाव शिवारी, आमच्या गावापासून पंध्रा-वीस किलो मीटरवर. ती आणि तिचा म्हातारा बाप दोघेच होते एकमेकांना. तीन खोल्यांचं बैठं घर. थोडा जमीन तुकडा. दोघे राबत होते. पोटापुरतं मिळवत होते. म्हातार्या.ला एकच चिंता. मुलीच्या लग्नाची. मुलगी गुणाची, पण लग्नाच्या बाजारात गुणाला कुठली किंमत असायला? रूप हवं. ते तर आजिबात नाही.
गावातले लोक काहिशा कुचेष्टेनेच सदामामाला विचारायचे, ‘काय सदाभाऊ, लाडू, कधी देणार?’
‘देऊ की…त्यातकाय?’
‘पण कधी? लग्न करायचा विचार आहे नं? की जन्मभर ब्रह्मचारीच रहाणार?’
‘अं… करायचं की लग्न!’
‘कधी?’
‘मुलगा मिळाली की.’
आता नाकर्ता सदा आणि कुरूप सुनीता, लोकांनी जोडी लावून टाकली. ते सदाकडच्या पुरुषांना विचारायला आले. पुरुषांच्यात मसलत झाली. न जाणो, लग्न झाल्यावर सदामामाला जबाबदारीची जाणीव होईल,’ त्यांना वाटल़ं मग त्यांनी मध्यस्तांवरच जबाबदारी टाकली. मंदिरात लग्न लागलं. ना सनई. ना बँड. सुनीताला कुंकवाचा धनी मिळाला. गोरा-गोमटा जावई बघून म्हातारा खूश झाला. ‘आता मी मरायला मोकळा झालो.’ म्हणाला.
सदा बायकोला घेऊन घरी आला. ही माझी बायको. त्याने घरात सांगितले. माप ओलांडणं नाही. गृहप्रवेशाचा सोहळा नाही. थट्टा-मस्करी नाही. दहीभात ओवाळणं नाही. नाव घ्यायलासुद्धा कुणी तिला सांगितलं नाही. ती सरळ तशीच घरात आली.
☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज 7 मे.. विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा स्मृतिदिन! ..मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातील काही हृदयस्पर्शी आठवणी….
हिरवीकंच साडी, हिरवागार परीटघडीचा ब्लाऊज, मनाचा ठाव घेणारी नजर, ताठ बांधा, छोटासा गोंडस अंबाडा आणि त्यावर हौसेनं माळलेला घमघमीत मोगरीचा गजरा! अहाहा! काय तेजस्वी ते रूप आणि ओजस्वी ती वाणी! आणि तेही वयाच्या ८६व्या वर्षी! या रूपाला पाहण्यास आणि ही लख्ख वाणी ऐकण्यास पार्ल्यातील ‘दीनानाथ नाट्यगृह’ त्यादिवशी चोखंदळ साहित्यिक, संगीतज्ञ आणि रसिकांनी खचाखच ओसंडून वाहात होतं. प्रसंग होता – माझ्या पहिल्यावहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हा कॅसेटचा प्रकाशन सोहळा – या ज्ञानदेवीच्या शुभहस्ते! ही ज्ञानदेवी म्हणजे दुर्गादेवीचा आणि शांतादेवीचा सुरेख संगम! ती स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ होती! तिच्या येण्यानंच प्रत्येकाच्या मनात उत्साह, आनंद, कुतूहल आणि उत्सुकता भरून वाहात होती! गझल सम्राट जगजीत सिंह यांनाही तिच्या शेजारी बसण्याचं, मोठं अप्रूप वाटत होतं.
२६ मे, १९९६ हा तो दिवस! याच दिवशी सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘जागविला सुखांत एकांत’ हा ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटमधील प्रत्येक गाण्याचं, समर्पक रसग्रहण करणारा लेख लिहून, दुर्गाबाईंनी अनेकांना धक्काच दिला होता! प्रकाशनाच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या गुलाब पाकळ्यांच्या वर्षावानं, बाई आधीच मोहरून गेलेल्या! त्या बोलल्याही अप्रतिम! आणि पूर्व वयात विरघळून जाऊन चक्क ‘केदार’ रागातली बंदिशही लाजवाब गायल्या! कुठचाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता! दुर्गाबाई म्हणजे अर्वाचीन काळातली गार्गी – मैत्रेयीच! त्या केवळ साहित्य विदुषीच नव्हे तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्य सेनानीपासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! ज्या क्षेत्रात हात घातला, त्याचं सोनं केलं त्यांनी!
एकदा, बहीण कमला सोहोनींबरोबर त्या एक इंग्रजी चित्रपट पाहत होत्या. त्यातील नायिका, आपण नेहमी घालतो, त्यापेक्षा वेगळया पद्धतीने टाके घालून, स्वेटर विणत होती. हे बारकाईनं निरीक्षण करून, त्यांनी एका व्यक्तीचा एक स्वेटर एका दिवसात तयार होतो, हे स्वतः विणून सिद्ध केलं.. वयाच्या नव्वदीलाही त्यांची कुशाग्र बुद्धी तोंडात बोटंच घालायला लावी! या वयातही नवनवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा ध्यास पाहून आश्चर्य वाटे! त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला, त्यांनी मला भेट दिलेला, त्यांचा आवडता, निवृत्तीनाथांचा एक अभंग मी गायले. त्यावेळी बरीच जाणकार मंडळी तिथं होती. गाणं संपल्यावर, दुर्गा आज्जींनी या ‘नातीचा’ पापा घेतला आणि हातही हातात घेतला. माझे ‘थंडगार’ हात पाहून त्या गोड हसल्या आणि पट्कन म्हणाल्या, – “Cold from outside, Warm from inside… !”
बाईंनी अनेकांना घडवलं. प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. त्या अनेक भाग्यवंतांपैकी मीही एक आहे!
काही वर्षांपूर्वीची गोष्ट… मी इतरांच्या चालीत नवीन बसवलेल्या काही कविता, बाईंसमोर नेहमीप्रमाणं म्हणून दाखवायला गिरगांवात त्यांच्या घरी गेले त्यावेळी त्या म्हणाल्या, “अगं पद्मजा, फार बरं झालं तू आलीस. आज नवलच घडलं! आज शाकंभरी पौर्णिमा. पहाटे, चंद्रबिंब अस्त होताना, माझ्या वडिलांनी, त्यांच्या स्मृतिदिनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि ‘देहोपनिषद’ माझ्या पुढ्यात आले, ते असे…
|| देहोपनिषद ||
‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||
भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे ||२||
अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले ||३||
फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||
मरणा, तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||
पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||
सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले… ||७||
पुढे त्या म्हणाल्या, “आजवरच्या माझ्या कविता, मलाच न आवडल्यानं मी फाडून, जाळून फेकून दिल्या. ही माझी मला आवडलेली एकमेव कविता! याला तू चाल लाव, आणि उद्या माझी दूरदर्शनवर मुलाखत आहे, त्यात तू ते गा!”
मी प्रथम ते ‘देहोपनिषद’ वाचूनच भांबावले. परंतु दुर्गाआज्जीला नाही म्हणण्याची माझी प्राज्ञाच नसल्यामुळे मी आजवर, कधीही न केलेला संगीत दिग्दर्शनाचा प्रयत्न, परमेश्वरी कृपेनं सफल झाला. त्यांनीच संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी’ अंतर्ज्योत पेटवली!
दुसर्या दिवशी दुर्गाबाईंनी दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ माझी कविता सुंदर गाणार आहे,” असं म्हणून माझं मोठ्या मनानं कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मात्र मला आत्मविश्वास आला आणि मी जवळजवळ दीडशेहून अधिक कवितांना, अभंगांना धडाधड चाली लावत गेले. केवढी भव्य आणि सुंदर दृष्टी दिली मला दुर्गाबाईंनी!!
एकदा सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकरांना (त्यांच्या लहानपणी) ‘पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर’ यांच्या विषयी लेख लिहिण्यासाठी कुठेही माहिती मिळेना. तेव्हा दुर्गाबाईंना त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या भव्य ग्रंथालयात गाठलं आणि दुर्गाबाईंनी तात्काळ त्यांना अहल्याबाईंचे पन्नास एक संदर्भ पूर्ण माहितीसकट दिले. शिवाय, “ग्रंथालयाच्या एका कोपर्यात ‘होळकरांची बखर’ बांधून ठेवलीय, ती मुद्दाम वाच.” असंही सांगितलं. हे सर्व सांगण्यात कुठेही गर्वाचा, उपकाराचा लवलेशही नव्हता. उलट, कुणीही न निवडणारा, वेगळा आणि उत्तम विषय घेतल्याबद्दल छोट्या वंदनेचं अभिनंदन आणि कौतुकही केलं. शिवाय दुपारच्या उन्हातान्हातनं आलेल्या या मुलीला प्रेमानं, आपल्या डब्यातली रुचकर चटणी आणि थालीपीठ खाऊ घातलं! त्याची चव वंदनाबाईंच्या जिभेवर अखेरपर्यंत होती.
दुर्गाबाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्त्वचिंतनाचंही! तत्त्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळं बाईंचं त्यांच्यावर मनस्वी प्रेम! याच थोरोवर इंदिरा गांधींनी केलेली कविता वाचून बाईंनी इंदिरेच्या आतील ‘कलावंताला’ सलाम केला आणि इंदिरा गांधींमुळे आणीबाणीत भोगाव्या लागणार्या हालअपेष्टा विसरून, त्यांच्या अक्षम्य चुकाही माफ करून टाकल्या. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन दुर्गाबाईंचं! हाच प्रांजळपणा त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातही दिसतो, म्हणून त्यांचं लेखन हे बुद्धीला आणि अंतःकरणाला थेट भिडणारं वाटतं. ते वाचताना त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं.
त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी कधीच विसरणार नाही. एक म्हणजे – ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ आणि म्हणूनच मला वाटतं, इतक्या विविध विषयांवर त्या प्रभुत्व मिळवू शकल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ‘कुठलंही काम करताना, त्यात जीव ओतून केल्यास ते १०० टक्के यशस्वी होतं, त्यात उत्स्फूर्ता आणि उत्कटता मात्र हवी!’
७ मे, २००२… दुर्गाबाई निवर्तल्याची बातमी ऐकली आणि काळजात चर्र झालं. त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या सुनेनं – चारुताईनं मला ‘देहोपनिषद’ म्हणायला सुचवलं. शेवटी त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून, माझ्या या आज्जीच्या डोक्यावरून कुरवाळत कुरवाळत मी ‘देहोपनिषद’ गायले. त्याक्षणी ती नेहमीसारखीच प्रसन्न आणि तेजस्वी दिसली. जणू काही डोळे मिटून तिला आवडणारं देहोपनिषद, ती अत्यंत आनंदानं ऐकत होती..
‘देहोपनिषद सिद्ध झाले..’ हीच भावना तिच्या चेहर्यावर विलसत होती…
लेखिका – पद्मजा फेणाणी जोगळेकर
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ संस्मरण ☆ हर आदमी में होते हैं… ☆ श्री कमलेश भारतीय ☆
निदा फाजली का बहुत मशहूर शेर है :
हर आदमी में होते हैं दस बीस आदमी
जिसको भी देखना बड़े गौर से देखना…
आज मैंने सोचा कि किसी और को क्यों देखूं ? अपने ही गिरेबान में झांक कर देखूं कि मेरे अंदर कितने आदमी हैं ? कैसे एक कमलेश भारतीय इतने चेहरे लगा लेता है ?
मित्रो ! मेरे जन्म के बाद पालन पोषण नवांशहर के शारदा मुहल्ले में हुआ यानी ब्राह्मणों के बीच एक सरीन (खत्री ) परिवार का बेटा पला बढ़ा । पूरे सैंतीस साल उस मोहल्ले में रहा और ऐसे माहौल में जहां रसोई में नंगे पैर ही जा सकते थे और अंडे मीट मांस की चर्चा तक गुनाह थी । शुद्धता , पांडित्य और पोथी पत्री बांचने , भविष्य बताने वाले, ग्रहदोष टालने वाले भी थे । इसी के चलते हमें भी कुछ दोस्त पंडित जी पुकार लेते थे । कभी बुरा नहीं लगा ।
इसके बावजूद हमारा गांव था तीन चार किलोमीटर दूर सोना नाम से । वहां हमारी खेती थी , हवेली थी और रोज़ शाम वहीं गुजरती । पहले पिता जी के साथ । वे गांव के नम्बरदार भी थे । लगान वसूल करने जाते तब भी साथ रहता और कोर्ट कचहरी में गवाही देने जाते तब भी साथ देता । यानी गांव के लोगों से सीधे सीधे वास्ता रहता । वे अपने ढंग से बातचीत करते । अनाज मंडी और गन्ने की पर्ची लेकर गन्ना मिल भी जाते । इस तरह मेरी एक साथ अनेक अलग अलग दुनिया थीं । अलग अलग व्यवहार । अलग अलग चेहरे । पिता जी के अपने जीवन से जल्द विदा हो जाने पर पढ़ाई के साथ साथ न केवल खेती बल्कि मेरे नाम नम्बरदारी भी आई और आज तक मेरे नाम चल रही है । बेशक यह काम मैंने कभी नहीं किया । पहले अपने ही परिवार के एक सज्जन को दिये रखा और फिर उनके बाद अपनी खेती संभालने वाले दुम्मण को सौंप रखा है । सरकारी कागजों में नम्बरदार बनने का सुख है तो मेरा एक चेहरा यह भी है । कभी कभार दूसरों के कागज तस्दीक भी कर देता हूं जब कभी अपने शहर जाना होता है । हां , छोटी उम्र में ही नवांशहर से राजनीति करने वाले दिलबाग सिंह के करीब आया और पूरा साथ दिया हर चुनाव में । आखिरी समय जब वे पंजाब के कृषि मंत्री बने तो मुझे अपना ओएसडी बनाने के लिए बुलाया तब मना कर दिया क्योंकि राजनीति कभी मेरी मंजिल नहीं रही । ट्रिब्यून में ही इक्कीस साल बिता दिये । फिर एक और नेता मिले भूपेंद्र सिंह हुड्डा जो ले गये हरियाणा ग्रंथ अकादमी का उपाध्यक्ष बना कर । यह भी एक चेहरा हो सकता है मेरा जबकि मैं वही कलम का सिपाही बन कर खुश हूं ।
पढ़ाई लिखाई कर शहीद भगत सिंह के गांव में आदर्श स्कूल में पहले हिंदी प्राध्यापक बना और बाद में प्रिसिपल बना । इस तरह एक चेहरा मेरा शिक्षक और नसीहतें देने वाला भी हो सकता है । फिर चंडीगढ़ आया दैनिक ट्रिब्यून में उपसंपादक बन कर । सात साल रहा और एक महानगर जैसे शहर का बाशिंदा बना लेकिन वह गांव का आदमी ही रहा । शेखर जोशी की कहानी दाज्यू का नन्हा सा हीरो जो हर कदम पर छला जाता है । वह गांव वाला भोलापन नहीं गया । और न जाये, यही दुआ है मेरी रब्ब से। मेरे अंदर बच्चा जिंदा रहे ।
सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी
सच है दुनिया वालो कि हम हैं अनाड़ी…
गीत अक्सर गुनगुनाता हूं । लोग इस बात का फायदा उठा कर जब चलते बनते हैं तब सोचता हूं कि अगली बार सावधान रहूंगा पर सावधान कभी न हुआ और जिसका जोर चला वह छल कर चलता बना । यह चेहरा भी है मेरा ।
आर्य समाज से मेरे नाना जुड़े थे और मेरी दादी मंदिर लेकर जाती हर सुबह शाम । इस तरह दो अलग अलग चेहरे ये भी रहे । ननिहाल जाऊं तो हवन में बैठूं और नवांशहर रहूं तो दादी के साथ मंदिर जाकर आरती करूं ।
अब सोचता हूं कि मेरा कौन सा चेहरा असली है ? शारदा मुहल्ले वाला लड़का या गांव वाला या फिर बहुत नर्म , दयालु या एक ओशो की किताबें पढ़ने वाला थोड़ा सा संन्यासी जैसा ? थोड़ा सा ब्राह्मणों जैसा और थोड़ा सा गांव के अनाड़ी जैसा ? कैसा हूं मैं ? कितने चेहरे हैं मेरे ? प्यार करूं तो पूरा करूं और जब गुस्से हो जाऊं तो गांव वाले की तरह पूरा गुस्सा करूं । बिखर बिफर जाऊं गुस्से में । कोई छिपाव नहीं भावों का । कितने वर्ष वामपंथी विचारधारा से जुड़ा रहा और कहानियों में अपनी बात रखी । कौन हूं मैं ? कामरेड , ओशो के विचार या स्वामी दयानंद की सीख लेने वाला ? कौन हूं और क्या हो सकता था ? क्या हो गया ? प्रिंसिपल था , पत्रकार कैसे बनता चला गया ? क्या कर पाया ? क्या कुछ और बनना अभी बाकी है ? सोचता रहता हूं और अपने ही अनेक चेहरे देखता रहता हूं और निदा का शेर याद कर मुस्कुरा देता हूं ,,
जिसको भी देखना बड़े गौर से देखना…
लेकिन मैं तो अपने-आपको ही गौर से देख रहा हूँ और एक और शेर के साथ बात खत्म कर रहा हूं :