चैत्रमहिना आला कि.. निसर्गाच्या रंगपंचमीला उधाण येतं.पळस, पांगारा, करंजा, सावरी, कुडा यांच्या जोडीला बहावा फुलतो.जसा गेले आठ-दहा महिने समाधिस्थ असलेला मुनी समाधी अवस्थेतून जागृत व्हावा तसा हा बहावा फुलतो.
सोनसळी लावण्याने हा सजतो.याची फुले म्हणजे स्वर्णफुलेच.अंगांगावर या कळ्याफुलांचे साज.लेवून हा राजवृक्षएखाद्या सम्राटा प्रमाणे आपल्या ऐश्वर्याने सर्वांचे मन मोहित करतो. हीस्वर्णलेणी इतकी झळाळत असतात कि सूर्याचे तेजच प्राशन करून उमलली आहेत असे वाटावे.यालाकर्णिकार म्हणतात. तसेच अमलतास असेही संस्कृत भाषेतम्हणतात.
बहावा हा वृक्ष आठ ते दहा मीटर पर्यंत वाढतो. पाने संयुक्त व समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.बहाव ही सदहरित असून वर्षावनात आढळणारी पानझडीची वनस्पती आहे.
बहावा पूर्णपणे भारतीय वनस्पती आहे.
बहाव्याच्या द्राक्षाच्या झुपक्यांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘Golden shower tree’ म्हणून ओळखला जातो.
बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.
फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात बिया असतात.हा वृक्ष बहुपयोगी आहे.
उपयोग पुढील प्रमाणे
१ कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.
२ बहाव्याची साल कातडे कमावण्यासाठी उपयुक्त आहे.
३ शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.
४ बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुर्च्या तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आदिवासी स्त्रिया याच्या फुलांची आणि कळ्यांची भाजी करतात.
..Cassia Fistulal (कॅसिया फिस्टुला) हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. पिवळाधम्म एक सारखा फुललेला, नाजूक पाकळी, डोळ्यांना सुखावणारा सोनसळी पिवळा रंग, पोपटी रंगाची पाने आणि मध्ये झुलणाऱ्या करड्या रंगाच्या शेंगा एवढा मिलाफ क्वचितच इतरत्र पाहायला मिळेल.नवरीला नटवावे आणि हळद ल्यालेल्या अंगाने तिने अकृत्रिम लाजावे तसा दिसतो बहावा. बहावा फुललेला असताना त्याला नववधूच्या हळदीच्या हातांना हिरव्याकंच चुड्याची शोभा किती मोहक असते ना तशी शोभा येते बहाव्याला दांडीवर वर थोडे जास्त आणि खाली कमी कमी होत निमुळते होत गेलेले घोसच्या घोस लटकलेले असतात. जणूस्वर्गलोकीची झळकती स्वर्णझुंबरेच. शेवटच्या टोकावर न उमललेल्या चार पाच कळ्या.नाजूक पाकळी आणि मिटून बसलेली कळीही. विशेष म्हणजे या देठावर एकही पान नाही आणि असंख्य घोस उलटे टांगल्यागत झुलत असतात वार्याच्या झुळकीने सोबत जातात इकडून तिकडे. डोळ्यांना अत्यंत सुखद अनुभव येतो बहाव्याच्या दर्शनाने.भारतातल्या काही क्षेत्रात महावृक्ष रूपात दिसतो. याचेखोड पांढरट असते.एरवी हेझाड ओळखूही येणार नाही. पण वसंतराजाच्या जादूई किमयेने याच्या अंतरीचे सौंदर्य खुलून येते एप्रिल ते मे महिन्यात. मला हा फुललेला बहावा “लेकुरवाळा” वाटतो.
अगदी विठू माझा लेकुरवाळा असाच.कारण याच्या फुलां मधील मध चाखण्यासाठी कीटक, मुंग्यां, मधमाशां याच्या़ अवती भवती, अंगाखांद्यावर खेळतात.बहावा मात्र यांचा दंगा, रुंजी घालणं असा कौतुक सोहळा स्वतः शांत बसून बघतो. बहावा फुलल्यानंतर साधारण४०-४५ दिवसात पाऊस येतो, असे म्हणतात. भारतात बहुतेक सर्वत्र बहावा आढळतो. पिवळाधम्मक बहावा फुलल्यानंतर झाड गोलाकार पिवळ्या उघडलेल्या छत्री सारखा दिसतं. बहावा जणू थंडीत ध्यानस्थ होतो. बहाव्या ची पाने साधारणपणे एकमेकांसमोर असतात देठाला चिकटून, रंग नाजूक पोपटी असतो. पोपटी पानांआडून खळखळून हास्य करीत पिवळे घोस येतात एकामागून एक.फुलोरा साधारणपणे अर्धा हात लांब असतो. मे च्या शेवटच्या आठवड्यात शेंगा तयार होतात. शेंगा हातभर लांबीच्या असतात.खुळखुळा वाजतो तशा वाळल्यावर वाजतात.दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना विशेष लोकप्रियता लाभली आहे. तिकडे या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. त्याला ‘कणिपू’ असे म्हणतात. ‘विशूच्या’ सणाला घरातील ज्येष्ठ व्यक्ती सर्व सौभाग्य व संपत्तीच्या गोष्टींची आरास करतात त्यात बहाव्याची फुलेदेखील असतात. घरातील प्रत्येकाने झोपेतून उठताना डोळे उडताना ही आरास पाहिली की त्याचे संपूर्ण वर्ष सोन्यासारखे भरभराटीचे जाते अशी त्यामागे श्रद्धा आहे. केरळ या राज्याचे राज्यफूल ‘बहावा’ असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटदेखील काढले आहे.
वसंत राजानंमोठ्या कौशल्यानं आणि रसिकतेनं आपल्या लाडक्या वसंतलक्ष्मीला साजशृंगार करून नटवले आहे असेच या फुललेल्या बहाव्या कडे बघून वाटते.
निसर्ग आपला गुरु असतो.तसेच बहाव्याकडे पाहून मला वाटते, बहावा सांगतोय संकटाच्या काळातही हसत रहावे सर्व मानवांनी अगदी आनंदाने सामोरे जावे.कारण तीव्र उन्हाच्या झळा सोसून अग्नीत जसे सुवर्ण झळकते तसे या बहाव्याचे अंगांग सुवर्ण लेणी लेवून सजते.आनंदोत्सव साजरा करते या तीव्र उन्हातही!
☆ मोहोरला बहावा ☆
सोनवर्खी साज लेऊनी
बहावा मोहोरला वनी
कुसुम कळ्यांची कनकवर्णी
अंगांगावर लेऊनी लेणी
ऋतु रंगांची उधळण करुनी
राज वृक्ष हा शोभे वनी वनी
याचे फुलणे बहरुनी येणे
तप्त धरेवर सडे शिंपणे
अगांगातून तेज झळकणे
फुले बहावा अंतरंगातूनी
डोलती झुंबरे पुष्प कळ्यांची
पखरण जणू ही चांदण्यांची
वर्दळ येथे शत भुंग्यांची
हसे वसंत शत नेत्रांतूनी
तप्त उन्हाचा ताप साहतो
शीतल कौमुदी जणू पांघरतो
समाधानाचा मंत्रची देतो
वार्यासंगे हा दंग नर्तनी
फुललेला बहावा पाहून या काव्यपंक्ती सुचल्याशिवाय रहात नाहीत.
अमृताचा चंद्र ह्या माझ्या व्यक्तिचित्रण पुस्तकास म.रा.सा.प.चे अनुदान प्राप्त. विविध मासिके आणि दैनिकात कथा प्रसिद्ध.
जीवनरंग
☆ गंधा… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
टे्रन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग दिल्लीला झालं. 6 महिने अजिबात रजा घेता आली नाही. आता, कधी एकदा गंधाला भेटू असं त्याला झालं होतं. तिला भेटण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला होता.
उद्या येतोय असं त्यानं कुणालाच कळवलं नव्हतं. 3-4 दिवसात कामाच्या व्यापात फोन झालाच नव्हता. तिचाही आला नव्हता.ं. आपल्याला समोर पाहून, गंधाला कसा सुखद धक्का बसेल, हे श्रेयसला डोळ्यासमोर दिसत होतं. तिचा चेहेरा कसा फुलून येईल, मोहोरून येईल, त्याच वेळेस कळवलं नाही, म्हणून रागवेल, डोळ्यात पाणी पण येईल, मग आपण तिची कशी समजूत काढू याच सुखस्वप्नात, तो रंगून गेला.
रागवल्यावर आपण तिची समजूत कशी काढू, ती मात्र तिच्या खास स्टाईलने कट्टी-फू करेल. जीभ काढून दाखवेल. अन् आपल्या काळजाचं पाणी-पाणी होईल. हाऽय!
गंधा-गंधा-गंधा! वेडं केलं होतं गंधाने त्याला. अगदी लहानपणापासूनच! दोघांची घरं शेजारी-शेजारीच होती. दोघांच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी, सख्य होतं. कुणीही त्यांच्याकडे पहातांना त्यांना शुभाशिर्वाद द्यायचे. जणू परमेश्वरानं ‘एकमेकांसाठी’ म्हणूनच जन्माला घातलं होतं. त्यांच्यात कधी ताई-दादा झालं नाही. नकळत्या वयापासून दोघं एकमेकांशी प्रेमाने वागत. धट्टा-कट्टा श्रेयस लहानग्या गंधाला उचलून फिरवायचा. तिला घेऊन झोक्यावर बसायचा. तिला उष्टं चॉकलेट भरवायचा. वय वाढत गेलं, तसतसं दोघांमधले प्रेमाचे बंध अधिकच घट्ट होत गेले. तारुण्यात हे प्रेम अधिकच गहिरं झालं. दोघांमध्ये आकर्षण वाढलं. एकमेकांशिवाय जग शून्य वाटू लागलं. दोन वर्षांपूर्वीच दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. श्रेयस रजा घेऊन आला की साखरपुडा करून घ्यायचा. नंतर लवकरच लग्न असं मोठ्यांनी ठरवलं होतं.
सार्या आयुष्यात पहिल्यांदाच दोघं एवढे दिवस एकमेकांना सोडून राहिले होते. आता श्रेयस 6 महिने भेटणार नाही, या विचाराने गंधाच्या डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं. श्रेयस वरवर तिला चिडवत होता, तोही फार दुःखी झाला होता. तिच्यापासून दूर जातांना…
आता 6 महिन्यांचा दुरावा संपला होता. उद्या…! उद्याच! गंधा आपल्या मिठीत असेल या विचाराने तो अधीर झाला होता. फक्त काही तास…! हो, पण गंधा ऑफिसमधून येईपर्यंत त्याचा जीव तळमळत रहाणार होता. घरी पोहोचला तरी!
सारं आवरून श्रेयस शांतपणे पेपर वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती.
वाचता-वाचता, त्याचा डोळा लागला. अचानक तो दरवळ जाणवला. खास! गंधाचा! तो टक्क जागा झाला. त्याचा विश्वासच बसेना! होय! निशिगंधा आली होती. चक्क! त्याच्या अगदी समीप! नाजूक निमुळत्या बोटांच्या ओंजळीतून त्याच्या चेहेर्यावर मोगर्याची फुलं ओतत होती. तिच्या दाट लांबसडक वेणीतही मोगर्याचा गजरा होताच नेहमीप्रमाणे. त्या-त्या ऋतुतल्या फुलांचा गजरा कायम तिच्या केसात असाचयाच! तिची आजी रोज म्हणजे रोज लाडक्या निशूसाठी गजरा करायची. बागेतल्या फुलांचा. त्यामुळेच निशिभोवती कुठला न् कुठला सुगंध कायम दरवळत असायचा. म्हणून तर श्रेयस तिला गंधा म्हणायचा! गंधाही त्याच्या मनात सारखी दरवळत असायची. तिचा दरवळ कायम त्याला वेढून असायचा. आताही ती त्याच्या मनातूनच जणू त्याच्या समोर येऊन उभी होती. अगदी समीप!
खरं तर तो तिला सरप्राईज देणार होता. पण प्रत्यक्षात तिनेच इथे येऊन त्याला धक्का दिला होता; तोही असा सुगंधी! सुंदर! त्याची आवडती आकाशी रंगाची, बारीक काठांची म्हैसूर सिल्कची साडी नेसून आली होती. सुंदर काळ्याभोर केसांमध्ये माळलेला मोगर्याचा गजरा, बदामी डोळे, रेखीव भुवया, केतकी वर्ण, लालचुटुक ओठांचं धनुष्य. नीतळ गळा, कमनीय बांधा… किती पाहू, पाहत राहू, असं त्याला झालं होतं. तेवढ्यात गंधाने तिचा केसांचा पुढे ओलेला शेपटा मागे टाकला. तिच्या केसांचा स्पर्श श्रेयसच्या चेहर्याला जाणवला. मोगर्यांच्या गंधाने तो रोमांचित झाला. त्याने चटकन् तिला पकडण्यासाठी हात पुढे केला. ती चटकन् एक गिरकी घेऊन मागे गेली. तिच्या पदलालित्याने श्रेयस वेडावून गेला. आसूसून तिच्याकडे पहात पहात तो पुढे पुढे गेला. ती मागे जात-जात भिंतीला टेकली. त्याने दोन्ही बाजूंनी हात भिंतीला टेकवले. तिला हलताच येईना. कैद झाली.
त्याची जवळीक… जीवघेणी! ती अस्वस्थ! स्तब्ध झाली! लाजेने पापण्या जडावल्या. दोघांचे श्वास एकमेकांत अडकले. ती चटकन् खाली बसली. सुळकन् बाहेर निसटली. तो निराश होऊन वळला. त्यानं टेबलावरची डबी घेतली. त्यातली अंगठी काढून तिच्या समोर धरली. खुणेनेच तिला जवळ बोलावलं. ती आली. तिच्या बोटात तो अंगठी घालणार, एवढ्यात बाहेर आईचा आवाज आला.
दोघांचीही भावसमाधी तुटली. तो चटकन् बाहेर आला. हे काय? आई-बाबा दोघेही इथे कसे? शाळा…ऑफिस सोडून? त्याला आश्चर्य वाटलं. आईलाही तो कसा काय आला, याचं आश्चर्य वाटलं. आई जवळ आली, तर आईचा नेहेमीचा प्रसन्न चेहरा खूप सुकलेला होता. डोळेही रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याला काही कळेना. त्याला पाहून तर आई त्याच्या कुशीतच कोसळली. हुंदक्यांनी तिचं सारं शरीर गदगदत होतं. तिच्या मागोमाग बाबाही आत आले. तेही गंभीर होते. श्रेयसच्या काळजात चर्रर् झालं. तो आईला घेऊन हॉलमध्ये आला. ते तिघंही सोफ्यावर बसले.
मघाशी त्याच्याजवळ बसलेली गंधा त्याला दिसली नाही. तो हाक मारू लागला. आई, गंधा कुठे गेली? गंधा, ए गंधा, अगं कुठं गेलीस? आई बघ का रडतेय. इकडे ये ना… तो जो-जो गंधाला हाका मारू लागला, तसतशी आई जोरजोरात रडू लागली.
श्रेयस बाहेर येऊन म्हणाला, ‘‘बापू गंधा गेली का? आत्ता आली होती ना?’’
बापूने डोळे विस्फारले अन् तोंडावर हात ठेवला. त्याला काही कळेना.
बाबा उठले, त्याच्याजवळ आले न् म्हणाले, ‘‘श्रेयस आत ये.’’
‘‘काय झालं बाबा? अहो गंधा आता आली होती. इथे माझ्याजवळ बसली होती. कितीतरी वेळ. खरंच. कुठं गेली अशी न सांगता?’’
बाबा म्हणाले, ‘‘अरे कशी येईल ती? शक्यच नाही.’’
‘‘का? का नाही येणार? अहो खरंच आली होती. इथेच माझ्याजवळ बसली होती.’’
आता तर आई खूपच रडायला लागली. रडत रडत म्हणाली, ‘‘अरे कशी येईल ती? आता कधीच नाही येणार.’’
‘‘का पण? असं का म्हणतेस आई? काही भांडण झालं का? सांग ना?’’
एव्हाना बापू, शांताबाई दोघंही खोलीत येऊन उभे होते. तेही रडत होते.
2-3 मिनिटं तशीच गेली. कुणी काहीच बोलेना. त्याला ती 2-3 मिनिटं 2-3 वर्षांसारखी वाटली. मग आई म्हणाली, ‘‘अहो सांगता का त्याला? कसं सांगायचं पण? तुम्हीच सांगा.’’ कसंबसं बोलून पुन्हा रडायला लागली. ‘काय सांगायचं’
‘बोल ना’ त्याची घालमेल क्षणाक्षणाला वाढत होती.
शेवटी त्याचे बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, ‘‘श्रेया गंधा गेली सोडून आपल्याला. आत्ताच सकाळी 8 वाजता. तिकडंच होतो आम्ही. 3-4 दिवस ताप आल्याचं निमित्त झालं अन् आज सकाळी…’’ असं म्हणून तेही डोळे पुसू लागले.
‘‘क्काऽय? क्काऽय सांगता बाबा? काहीही काय बोलता? अहो मी 8 वाजता घरात होतो. विचारा बापूला. माझं सगळं आवरून इथंच बसलो होतो पेपर वाचत. तर ती माझ्या शेजारी येऊन बसली होती. चांगला अर्धा तास इथेच बसली होती.’’ हे बोलतांना त्याचा आवाज फाटला होता.
‘‘अरे कसं शक्य आहे बाळा? ती गेली रे राजा गेली…’’ रडतच पुढे म्हणाले, ‘‘खूप तपासण्या झाल्या. मेंदूत काही इन्फेक्शन झालंय, कदाचित मुंबईला हलवावं लागेल असे डॉक्टर म्हणाले. पण… पण म्हणून असं होईल असं अजिबात वाटलं नव्हतं रे.’’
‘‘आता… आता सगळंच संपलंय. सगळंच!’’ असं म्हणून ते धाय मोकलून रडू लागले.
‘‘अहो काहीही बोलताय तुम्ही. हे बघा, हे बघा, तिने आणलेली मोगर्याची फुलं. ही बघा इथेच आहेत. ही बघा. इथे सोफ्यावरच आहेत. मी खोटं सांगतोय का?’’
खरंच तिथे मोगर्याची फुले पडलेली होती. शुभ्र, ताजी, सुगंधित!
आई-बाबा-बापू-शांताबाई सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना! फुलं खरंच होती तिथे.
काय बोलावं कुणालाच काही सुचेना. श्रेयसनं ती फुलं घेतली – गोळा करून. म्हणाला, ‘‘चला तुम्हाला दाखवतो. गंधा तिकडे असेल तिच्या घरी.’’ श्रांत, क्लांत, ढासळलेले बाबा त्याच्या बरोबर गेले. पाय ओढत.
घरात गेल्या-गेल्या निशिगंधाचं पार्थिव समोरच दिसलं.
तो ‘‘गंधाऽऽऽ’’ करून मोठ्ठ्यानं ओरडला. त्याबरोबर ती फुलं तिच्या पार्थिवावर पडली. अन् तोही कोसळला.
मोगर्याचा गंध दरवळतच राहिला… त्याने आणलेली… अंगठी… तिच्याजवळ पडलेली होती.
‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे! सूर्याच्या दाहक किरणांनी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीतील नव्या बदलाची जाणीव करून देते. संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात.जणू ती आपल्या आसनावरून- जागेवरून- पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात.कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो!
आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक ऋतुचे स्वागत आपण सणाने करतो. वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.
पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई.या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, झोका, कैरी… अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची
स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.
काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. कोणत्याही ऋतूत, सण साजरे
करून माणूस आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते!
पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या भागात या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.
आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा,खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो. निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे होत असते!
वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य दिसते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !
☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, “बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल.”
त्याची मुलगी सारा म्हणाली, “बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या.”
थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला.
तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..
मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, ” तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ…..?
यावर सारा म्हणाली, “मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत.”
मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, ” ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? “
— पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, ” हा स्मिथ नावाचा मनुष्य तोच आहे बरं का, ज्याने ‘ Institute of Administrators ‘ या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती, आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं…”
इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, ” मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा…”
— सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हरसहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं.
नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.
एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रूभरल्या नेत्रांनी ती उत्तरली, ” माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिकदृष्ट्या जरी ते गरीब होते, तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.
“आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?” — मुलाखतकाराच्या या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ” माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही.”
मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला.
“मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल का?”—- यावर त्या म्हणाल्या, ” मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दिवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते.”
आपणही टॉम स्मिथसारखेच आहोत का..? —-
कीर्ती रूपाने शिल्लक राहता येऊ शकते. कीर्ती पसरायला आणि कीर्तीरूपाने जिवंत रहाण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..
—आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काल ताई कडे गेले होते. सहजच आठवण आली आणि गेले. ताई व भाऊजी आरामात TV बघत बसले होते. ताई माझ्या पेक्षा चार वर्षं मोठी.आमच्या बागेतले देवगड हापूस घेऊन गेले.•••
छान गप्पा रंगल्या आमच्या. जुन्या गोष्टी निघाल्या व वेळ कसा गेला कळलेच नाही.••••
संध्याकाळ झाली.मी ताईला म्हणाले,•••• निघते ग मी आता, •••
अग !! आरती येण्यातच आहे, तिला भेटून जा.ताई म्हणाली.••••
भावजी म्हणाले,हो,मी तसा तिला मेसेज केला आहे,येईलच ती इतक्यात.•••
थोड्या वेळाने आरती आली.
कशा आहात मावशी ? तिने विचारले. छान झालं मावशी, तुम्ही आलात.••••
आई बाबांना पण छान वाटलं असेल. आमच्या दोघांच्या नोकरी मुळे त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही,अडकलेले असतात ते दोघे.••••
ताईने विचारलं,••••
कसा गेला ग दिवस आज ऑफिस मधे ?
खूप काम असतं ग दोघांना.आम्ही काय घरीच असतो. शनिवार, रविवारी आरती काही करू देत नाही आम्हाला. कधी कधी तर नाटक / सिनेमाची तिकीटं हातात आणून देते.••••
माझ्या लक्षात आलं,दोघी आपापली बाजू मांडत होत्या.व एकमेकांच्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत होत्या.••••
मावशी !! आई बाबा आहेत म्हणून मला घरची, आर्याची काळजी नसते हो. आर्या म्हणजे ताईची नात. ••••
ताई म्हणाली,••••
अग !! आर्या आज दूध प्यायला नाही म्हणाली बघ.मग मी तिला केळं आणि थोडे ड्राय फ्रूट दिले व खेळायला पाठविलं.
अग !! आज तिला औषध द्यायचे राहून गेलं बघ,विसरलेच ग मी. असं कर आरती,तू माझ्या मोबाईलवर अलार्म लावून दे. म्हणजे मग मी विसरणार नाही. •••••
ठीक आहे आई.काही हरकत नाही.होतं कधी कधी असं. मी देते.आरती म्हणाली.•••
ताई चहा करायला उठणारच होती, तर लगेच आरती म्हणाली, ••••
आई !! तुम्ही रोज करताच चहा. आज बसा मावशीबरोबर गप्पा मारत, मी करते सगळ्यांसाठी चहा. बाबांचा मेसेज मिळाला होता. म्हणून येताना मी समोसे आणले आहेत.•••••
मी शांतपणे दोघींचे बोलणे ऐकत होते.ताई म्हणाली,•••
अग आरती !! मावशीने आंबे आणले आहेत. उद्या न विसरता घेऊन जा हं तुझ्या आईसाठी. ••••
आई बाबा, औषध घेतले ना वेळेवर?..आरती ने विचारले.•••
हा हिचा रोजचाच प्रश्न असतो बघ आम्हाला. कौतुकाने ताई म्हणाली,•••
आरती आल्यापासून, त्यांच्या गप्पा ऐकून,एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की दोघी एकमेकींना सांभाळत आहेत. एकमेकींची काळजी घेत आहेत.•••
छान वाटलं बघून.•••••
‘Old Age Parenting’ म्हणजे आजी आजोबा नातवंडे सांभाळतात. हे आता बरेच ‘Common’ झाले आहे.पण ते सोप्पं नाही.••••
दोन पिढ्यांनी एकत्र रहायचे व तिसऱ्या पीढीला सांभाळायचे, म्हणजे तारेवरची कसरतच.••••
खरं तर यापेक्षा मोठे सुख तरुणांना काय असू शकतं की त्यांची मुलं सुरक्षित हातात आहेत. मुलांची मुलं तर ‘दुधावरची सायच ‘. त्यांना सांभाळणे तर आनंदाची गोष्ट आहे आजी आजोबासाठी, पण दडपणाखाली नाही. ••••
ताई आणि आरतीची रिलेशन्स बघून खूप छान वाटलं.••••
” दोन शब्द काळजीचे, प्रेमाचे पुरतात आजी आजोबांना.”••••
खूप नाजूक धागा आहे हा दोघांच्या मधला. एकमेकांच्या अडचणी समजल्या, चुका पदरात घातल्या,थोड्या सवयी बदलल्या, मदतीचा हात पुढे केला तर ,सर्वच आनंदात राहू शकतात.मोकळेपणा हवा नात्यात.•••••
आजी आजोबांची ही ‘second inning ‘आहे मुलांना मोठं करायची. वेळेनुसार सर्वच बदललंय. पद्धती पण. आजी आजोबांची पण वयाप्रमाणे शक्ती,गती कमी झाली आहे. विस्मरण होऊ लागलं आहे.••••
तडजोड,आदर सर्वांचा सर्वांसाठी हवाच. ही ‘Two Way प्रोसेस’ आहे. बोलणे स्पष्ट पण मधुर ठेवलं तर छानच. आमच्या वेळेस, तुमच्या वेळेस हे शब्द नकोच.••••
सोपं नाही,पण अशक्य नक्कीच नाही. तरुण व जेष्ठ -दोघेही आपलं जीवन आनंदाने जगू शकतील.दोघांचा अधिकार आहे तो व गरजही.••••
ताई निश्चिंत झाली आहे.कारण आता तिला अमरची काळजी नाही.त्याला तिने सुरक्षित हातात सोपवले आहे.•••••
ताईला सासू सूनेचे समीकरण चांगलं जमलंय. ती म्हणते,•••
आरती माझी ‘स्पर्धक’ नाही, माझी जबाबदारी उचलणारी माझी ‘सहयोगी ‘ आहे.ती आणि मी या घराचे ‘आधारस्तंभ’ आहोत.•••••
आनंदाचे दिवस केव्हा येतील ?याची वाट बघायची नसते. दोन्ही कडून प्रयत्न करुन ते आणायचे असतात.••••
म्हणतात ना,•••
” जहां चाह वहां राह “••••
“रिश्ते बरकरार रखने की सिर्फ एक ही शर्त है,किसी की कमियां नहीं अच्छाइयां देखें “•••
लेखिका: सुश्री संध्या बेडेकर
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं – सुमित्र के दोहे…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 136 – सुमित्र के दोहे…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “आँखों की कोरों से…”)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – अपार
केवल देह नहीं होता मनुष्य,
केवल शब्द नहीं होती कविता,
असार में निहित होता है सार,
शब्दों के पार होता है एक संसार,
सार को जानने का
साधन मात्र होती है देह,
उस संसार तक पहुँचने का
संसाधन भर होते हैं शब्द,
सार को, सहेजे रखना मित्रो!
अपार तक पहुँचते रहना मित्रो!
मुद्रित शब्दों का ब्रह्मांड होती हैं पुस्तकें। शब्दों से जुड़े रहें, पुस्तकें पढ़ते रहें।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “सीखने की उम्र”।)
अभी अभी ⇒ सीखने की उम्र… श्री प्रदीप शर्मा
सीखने की कोई उम्र नहीं होती,यह उक्ति उन्हीं पर लागू होती है,जो इस उम्र में भी कुछ. सीखना चाहते हैं । जो लोग यह मानते हैं,कि सीखने की भी एक उम्र होती है, और हम सब सीख चुके, तय मानिये,उनके सीखने की उम्र वाकई गई ।
बच्चों की उम्र सीखने की होती है ! ज़्यादातर सीख बच्चे ही झेलते हैं । उन्हें सीखने के लिए स्कूल भेजा जाता है । सीख को ही अभ्यास अथवा पाठ कहते हैं । पाठशाला में पाठ पढ़ाए जाते हैं,अंग्रेज़ी की किताब में उसे ही lesson कहा जाता है । पढ़ाई को अभ्यास कहते हैं । जो बड़े होने पर study कहलाती है और पढ़ने वाला student .
पढ़ने से विद्या आती है,इसलिए पढ़ाई करने वाला विद्यार्थी भी कहलाता है । जो कभी हमारे देश की गुरुकुल परंपरा थी,वह बिहार के नालंदा विश्वविद्यालय से होती हुई आज शासकीय विद्यालय तक पहुँच गई है । लेकिन यह भी कड़वा सच है कि पब्लिक स्कूल ही आज के गुरुकुल हैं,नालंदा विश्वविद्यालय हैं । आप चाहें तो उन्हें आज के भारत का ऑक्सफ़ोर्ड अथवा कैंब्रिज भी कह सकते हैं ।
सीखने की कला को अभ्यास कहते हैं । अक्षर ज्ञान और अंकों का ज्ञान ,किसी अबोध बालक को इतनी आसानी से नहीं आता । कितनी बार १ के अंक पर ,और ” अ ” अनार के अक्षर पर पेंसिल चलाई होगी,आज याद नहीं । मास्टरजी का दिया हुआ सबक रोज याद करना पड़ता था । गिनती,पहाड़े का सामूहिक पाठ हुआ करता था । कितनी कविता,पहाड़े, और रोज की प्रार्थना कंठस्थ हो जाती थी ! सबक याद न होने पर छड़ी, छमछम पड़ती थी,और विद्या झमझम आती थी । एक प्रार्थना को और अभ्यास को इतनी बार रटना पड़ता था,कि वह कविता,गणित का वह सूत्र आज भी याद है । कितनी भी याददाश्त कमजोर हो,पुराने लोगों को आज भी पहाड़े, गणित के सूत्र और संस्कृत के श्लोक सिर्फ इसलिए याद हैं,क्योंकि बचपन में उन्हें कंठस्थ किया गया था । यही अभ्यास है, सीख है, विद्या है, जो कभी विस्मृत नहीं होती ।।
जिसने जीवन में सीखना छोड़ दिया, उसके ज्ञान का, बुद्धि का,स्मरण शक्ति का ,मानकर चलिए, पूर्ण विराम हो गया । ज्ञान का भंडार अथाह है । केवल किताबों से ही नहीं,बड़ों-छोटों और परिस्थितियों से भी सीख ली जा सकती है । दुश्मन से सिर्फ घृणा ही नहीं की जाती । केवल एक मर्यादा पुरुषोत्तम ही अपने अनुज लक्ष्मण को आखरी साँस ले रहे राक्षसराज रावण से भी कुछ सीख लेने का निर्देश दे सकते हैं ।
दत्तात्रय भगवान के 24 गुरु थे अपने आपको ज्ञान में हमेशा लघु समझना लघुता की नहीं, विद्वत्ता की निशानी है । ज्ञान का स्रोत कभी सूखे नहीं । यह वह झरना है, जो जब बहता है, सृष्टि को तर-बतर कर देता है । इस झरने के पास कभी अज्ञान का मरुस्थल दिखाई नहीं दे सकता । सीखने की कोई भी उम्र हो सकती है ।।