मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली-1 ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्री सद्गुरुंनी माझ्याकडून लिहवून घेतलेल्या “चिंतामणी चारोळी व श्रीचामुण्डेश्वरी चरणावली या संग्रहाचे पूजन व प्रकाशन अष्टविनायक चिंचवड मंडळाचे प्रमुख विश्वस्त मा.श्रीआनंद महाराज तांबे यांचे हस्ते दिनांक ३०-१२-१९ सोमवार विनायकी चतुर्थी या दिवशी क्षेत्र थेऊर श्री चिंतामणी मंदीर प्रांगणात संपन्न झाले.

त्यातील चामुण्डेश्वरी चरणावली संग्रहातील चारोळी मी शारदीय नवरात्रात रोज सादर करण्याची माझी इच्छा आहे व हे सद्भाग्य मला सद्गुरु कृपेने लाभते आहे यासाठी मी आपल्या सर्व  बंधूभगिनींची कृतज्ञ आहे.

साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 1???

आलं आलं नवरात्र

ऋतू शरदाचा काल

देवपूजा आराधना

उपासना तिन्ही काल!!

 

आलं आलं नवरात्र

सजवूया घर छान

देवी येणार पाहुण्या

त्यांचा करु मानपान !!

 

आलं आलं नवरात्र

कुलाचार घरोघरी

यथाशक्ती यथामती

होई पूजा घरोघरी !!

 

नवरात्र परंपरा

व्हावे रक्षण कुलाचे

कृपाछत्र घरावरी

सदा रहावे देवीचे !!

 

नवरात्री फलप्राप्ती

वंशवृद्धी होत असे

व्हावे कल्याण विश्र्वाचे

प्रार्थनेत ध्येय वसे!!

 

नवरात्र पर्वकाळ

प्रतिपदा ते नवमी

दिन दहावा दसरा

देई मांगल्याची हमी !!

 

प्रतिपदा ते सप्तमी

सप्तरात्री व्रत असे

नवरात्री चार अंगे

घटस्थापना ती असे!!

 

शेतातील काळी माती

सफ्तधान्ये पेरावीत

हळदीने रंगवावी

सप्तधान्ये ती पाण्यात!!

 

मोठी समई धातूची

जोडवात ती तेलात

कापसाची वीतभर

नवरात्री लावतात!!

 

नवरात्री कुलाचार

हरदिनी कृपाछत्र

होम हवनाचा थाट

घरोघरी हो सर्वत्र !!

 

देवीपुढे तेलदिवा

नवरात्री तेवतसे

नंदादीप हा अखंड

देवी कृपा करीतसे !!

 

!! श्रीजगदंबार्पणमस्तु!!

 

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अधिक मास ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ अधिक मास ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

चांद्रवर्ष- सौरवर्ष मापन

करते मराठी रीत खास

तीन वर्षातून मेळ घाली

तेहेतिसावा अधिक मास !!

 

पुरुषोत्तम,धोंडा,अधिक,

मलमास अशी नावे यास

श्रीविष्णूंचे जप-जाप्य,पोथी

आराधना देई फल खास!!

 

पुरुषोत्तम मुरलीधर

स्वामी स्मरावा महिनाभर

करा मनापासुनी पूजन

ठेवी कृपा हस्त शिरावर !!

 

अन्नदान,प्रिय वस्तूदान

लोभ,मोहास जिंकून घेणे

मौनव्रत शिकवी मनाला

योग्य अचूक कैसे बोलणे !!

 

ज्ञानविज्ञान अध्यात्माची ही

सांगड घातली सुयोग्य छान

सत्कर्म, दान, परमार्थाने

देव कृपेचे जोडावे धन !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेळ झाली भर माध्यान्ह ☆ स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी  अनिल)  

स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) 

☆ कवितेचा उत्सव ☆ वेळ झाली भर माध्यान्ह ☆ स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी  अनिल)  ☆ 

(या कवितेचे काव्यानंद मध्ये रसग्रहण.. सौ ज्योती विलास जोशी)

वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन

नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला

 

तप्त दिशा झाल्या चारी भाजत असे सृष्टी सारी

कसा तरी जीव धरी माझ्या प्रीतीच्या फुला

 

वाहतात वारे जळते पोळतात फुलत्या तनु ते

चित्त इथे मम हळहळते माझ्या प्रीतीच्या फुला

 

माझी छाया माझ्याखाली तुजसाठी आसावली

कशी करू तुज सावली माझ्या प्रीतीच्या फुला

 

दाटे दोन्ही डोळा पाणी आटे नयना तच सुकुनी

कसे घालु तुज आणुनी माझ्या प्रीतीच्या फुला

 

मृगजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात

चल रंगू सारंगात माझ्या प्रीतीच्या फुला

 

गायिका: उषा मंगेशकर

कवी : स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) 

संगीतकार :यशवंत देव

(चित्र साभार विकिपीडिया)

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 10 – खरंतर जाऊच नये ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 10 ☆

☆ खरंतर जाऊच नये ☆

 

कोणत्याही कवितेच्या वाटेला

पडू नये तिच्या उगमाच्या फंदात

उसवून टाकेल ती तुम्हाला

तिच्या जन्मदात्यासकट

ते जे काही आहे ते रहावं गुपितच

जे असू शकतं अक्षरशः काहीही

अगदी एखादं जन्मानंदाचं

परम निधान किंवा

मरणजाणिवेचा अथांग खोल

असा डोह देखील…

होऊ नये पंचनामा त्याच्या भावनांचा-

भोगू द्यावं तिचं प्रवाहीपण

त्याचं त्याला एकट्यानं…

आपण व्हावं मूक साक्षीदार

किनाऱ्यावरूनच…

हो-उगाच बुडून जायची भीती नको-

अन जळत्या जिवाचा

चटका देखील नको…

सामाजिक विलगीकरण-

चांगली कल्पना आहे ही…

फक्त येऊ नये कोडगेपण सवयीनं-

दुरूनच का होईना ठेवावी

त्याच्या जाणिवांची जाणीव

एवढसंच केलं तरी

जगतील दोघेही आनंदानं

शेवटापर्यन्त–

त्यांच्या आणि आपल्याही.

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

09/06/20

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हुरहूर……… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ हुरहूर……… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

रोज पिकलेले पेरू ती कुरतडून टाकायची.

खाली पडलेले पेरू पाहून तिडीक मस्तकात जायची.

ती खारुडी दिसुदे,देईन दणका

अशी मनात होती धारणा.

विचार करत हलवायचो,जोराने पाळणा.

पण ती दिसायची नाही,

पेरू कुरतडणे सोडायची नाही.

तिला पकडायचे केले किती कारनामे.

पण जाळ्यात यायचीच नाही.

धावायची खोडाच्या मार्गाने.

आज मात्र सारे पेरू दिसले मस्त,

मी तोडून घेतले बिनधास्त,

घरी आलो,पाहीले सर्वच होते

धष्टपुष्ट.

मन झाले बेजार

कुठेही दिसेना खारुडीचा वारं.

मी तर दिला नाही मार,

मग काबरे तिने सोडला परिवार?

आज वाटते पुन्हा तिने यावे ,

पेरू पुन्हा कुरतडावे.

असावा का हा भुतदयेचा विचार

की असावा संस्काराचा भार?

मन सैरभै र झाले हो फार .

उघडावेसे वाटते तिच्यासाठी दार,

वाटते मनाला हुरहूर, अंन झालो बेजार………

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लाटा ☆ श्री अनंत गाडगीळ

☆  कवितेचा उत्सव ☆ लाटा ☆ श्री अनंत गाडगीळ  ☆ 

(- अनंता.)

 

ज्या हळुवारपणे

लाटा पायाला

स्पर्श करतात

त्यावरून..

 

वाटतं नाही की

त्या कधीकधी..

मोठाल्या जहाजांना

पण बुडवतात.

 

बोध घ्यावा सर्वांनी

सामर्थ्य प्रत्येकाचे..

वेळप्रसंगीच येते

लक्षात आपल्या.

 

नाजूक कितीही..

बायका दिसल्या

संकटात त्यांना..

आपणच टाकतो.

 

मात्र अशा वेळी..

त्यांच्या उग्र रूपाने

जीवन संपू शकते..

संसार बुडू शकतो.

 

नाजूकपणा त्यांचा

व सामर्थ्य लाटांचे

दोन्ही आपणास..

माहीत असले पाहिजे.

 

जगण्याचा हक्क..

प्रत्येकालाच आहे

बायकांना आणि

लाटांना पण आहे.

© श्री अनंत गाडगीळ

सांगली.

मो. 92712 96109.

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ नवलाख तळपती दीप विजेचे येथ….. ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

☆ कवितेचा उत्सव ☆ नवलाख तळपती दीप विजेचे येथ….. ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

(काव्यानंद मध्ये या कवितेचे रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित )

 

नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणू नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा

त्या माजघरातील  मंद दिव्याची वात !

 

वार्यावर येथील रातराणी ही धुंद

टाकता उसासे,चरणचाल हो मंद

परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा

त्या परसामधला एकच तो निशिगंध !

 

हेलावे भवती सागर येथ अफाट

तीरावर श्रीमान इमारतींचा थाट

परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा

तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

 

बेहोष चढे जलशांना येथील रंग

रूणझुणता नूपुर जीव बने निःसंग

परि स्मरतो आणि करतो व्याकुळ केव्हा

तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !

 

लावण्यवतींचा लालस येथ विलास

मदिरेत माणकापरि तरारे फेस

परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा

ते उदास डोळे, त्यातील करूण-विलास !

 

 – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 68 – जननी – जनक ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆

☆ जननी – जनक ☆

माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या  शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर  स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी  तिचा कामाचा झपाटा मोठा होता.

मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!

मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??

आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.

 

आई बाप असतात

फक्त जन्माचे धनी

आयुष्याचे गणित

सोडवायचे ज्याचे त्यानी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ? कुठे कुठे क्षितिजाशी ?  सुश्री प्रज्ञा मिरासदार 

 

दूर कुठे क्षितिजाशी टेकडीच्या माथ्यावर |

शांत रम्य जागी उभे एक शिवाचे मंदिर ||१||

 

चार वृक्ष भोवताली दिसे वनश्रीची शोभा |

गाभाऱ्यात तेज फाके शिवपिंडीची ती प्रभा ||२||

 

पलिकडे शांत नदी जळ संथ संथ वाहे |

उतरत्या सांजवेळी सूर्य डोकावून पाहे ||३||

 

एक भगवी पताका मंदिराच्या वर डुले |

शांत नदीपात्रामध्ये दूर दूर होडी चाले ||४||

 

भक्तिरंगी परिसर होई सांजेच्या वेळेला |

पक्षी येती झाडांवर भक्तगण आरतीला ||५||

 

भास्कराचा लाल गोळा बुडताना पाण्यावर |

येई क्षितिजाभोवती लाल केशरी किनार ||६||

 

मंद नंदादीप तेवे शंकराच्या गाभाऱ्याशी |

दिसतसे संध्याराणी कुठे कुठे क्षितिजाशी ||७||

 

नंदादीपाच्या तेजाने जाई भरून गाभारा |

झाला निशेच्या अधीन रम्य आसमंत सारा ||८||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं रसग्रहण☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares