मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 71 ☆किंमत अन्नाची…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 71 ? 

☆ किंमत अन्नाची…☆

कण कण अन्नाचा

किती आहे महत्वाचा

केव्हा कळेल याची किंमत

दिवस तो कधी उगावायचा…

 

श्रीमंती आहे म्हणून

पार्ट्या कुठे रंगतात

तिथे जेवणारे गर्विष्ठ

अन्न वाया घालवतात…

 

कधी कळेल मर्म अन्नाचे

समजेल कधी महत्व त्यांना

माज द्रव्याचा भिनला अंगी

घालतात ऐसा, हा धिंगाणा…

 

करावी किंमत अन्नाची

ती गरज, आहे नेहमीची

श्रीमंती नसतेच कायमची

सावली पहा, मध्यानाची…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३६ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३६– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

[१६१]

आपली स्वत:चीच फुलं

भेट म्हणून

स्वीकारण्यासाठी

माणसाकडून

किती वाट पाहतो

ईश्वर

आतुर: उत्सुक

 

[१६२]

सूत कातता कातता

कुणी साधी भोळी स्त्री

गुणगुणत असावी

एखादं  प्राचीन लोकगीत

हरवलेल्या आवाजात

तशी आज ही धरती

गुणगुणते काही बाही

माझ्या कानाशी

 

[१६३]

आपआपल्या मंदिरात

आपलेच दिवे

ओवाळतात ते

आळवतात अहोरात्र

आपल्याच आरत्या

पण हे पक्षी

तुझ्याच प्रात:कालीन प्रकाशात

तुझ्याच प्रसन्न प्रार्थना

किती खुशीनं गातात. 

 

[१६४]

सर्व चुकांसाठी

आपले दरवाजे

जर

बंद ठेवलेस तू

तर

सत्यालाच प्रत्यक्ष

कोंडून ठेवशील तू

बाहेर…

 

[१६५]

कीर्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या

शेवटच्या टोकापर्यंत

जाऊन आल्यावर

सभोवार पसरलेली

ही पोकळ उदासी

आणि गुदमरणारे प्राण…

किती वांझ असतं शिखर

आणि किती निमुळतं

क्रूरपणे आसरा झिडकारणारं…

तूच आता दाखव वाट

हे प्रभो,

अद्याप धुगधुगत आहे

हा प्रकाश

तोवरच घेऊन चल मला

त्या दरीपर्यंत

खोल … खोल…

शांत… निवांत

आयुष्याचं मृदू फळ

पिकून तयार असेल तिथं

आणि

त्यावर तकाकत असेल

जाणिवेचा सोनेरी रंग

-समाप्त-

(या कवितांबरोबरच हे सदर इथे संपत आहे.)

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

 

☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली  ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

मी आहे

शब्दलंपट-

शब्दांच्या  वारांगना

सज्ज्यावर उभ्या राहून

खुणावतात मला,

कोठल्यातरी दाहक रसायनात

वितळतात सारे प्रतिकार

आणि मी जातो ते बहिष्कृत दरवाजे लोटून

सरळ आत

अर्थाचा हिशेब न करता

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कुसुमाग्रज … ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

| कुसुमाग्रजा ज्ञानपीठ मानकरी तू

  वैविध्याचा असे चित्रकार तू

  तव प्रतिभेची गरुड भरारी

  साहित्य शारदेचा असे पुजारी |

 

| काव्याची फुलवुनी फुलबाग

  विशाखा, जीवनलहरी, वादळवेल

  अन्यायाचा दूर करूनी रोग

  फुलविशी समता बंधुत्वाची वेल |

 

| सामाजिक प्रेमाची ज्योत घेऊन

  जपे माणुसकीचा मंत्र महान

  दुर्दम्य आशेला देउनी अग्रस्थान

 कोलंबसचा गायीला अभिमान  |

| नटसम्राटाचा जणू तू विधाता

  शोकांतिकेचा जणू तू निर्माता

  यशो शिखरावर ही कलाकृती

  रसिक मने जिंकल्याची घेई पावती |

| तव कल्पकतेची किमया भारी

 पृथ्वीच्या प्रेम गीताची उंची न्यारी

 सूर्य पृथ्वीची जोडी गोजिरी

 अमर प्रणय गीताची मूर्ती साजिरी |

 | नाटक, काव्याला यशो मंदिरात बसविले

   कथा कादंबरीला  अंगाखांद्यावर खेळविले

   विविध पुरस्कारांनी तुजला भूषविले

   मातृभाषेचे निशाण उंचविले |

| वर्षा मागून वर्षे सरली

  परी तव कीर्ती ज्योत अमर जाहली

  अजरामर आहे तव साहित्य कलाकृती

  जोवरी आहे शशांक आदित्यची महती |

 

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(रोही पंचाक्षरी रचना)

रोमारोमांत

मनामनांत

माय मराठी

वसे श्वासांत..१

 

असे प्राचीन

भासे नवीन

मायबोलीशी

घट्ट ही वीण..२

 

फुले पालवी

रूप भुलवी

साहित्यातून

मने मोहवी..३

 

नाद घुमतो

नित्य गर्जतो

देश विदेशी

डंका वाजतो..४

 

लोभसवाणे

रूप देखणे

फिके पडते

शुभ्र चांदणे..५

 

भाषा थोरवी

किती वर्णावी

माय माऊली

मनी जपावी..६

 

माज मराठी

साज मराठी

गौरवास्पद

माझी मराठी..७

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

इंग्रज आले राहून गेले

कौतुक त्यांचे ठेवून गेले

त्याचे सण  साजरे करतो

डोक्यावर घेऊन नाचत बसतो

 

होळी झाली गावठी गड्या

डिसेंबर एंडला मारू उड्या

पाडवा गेला अंधारात

जानेवारीचा धरला हात

 

मराठी माऊली विसरून गेलो

इंग्रजी मावशीचे लाडके झालो

फॅशन  फॅशन खेळत बसतो

आपल्या संस्कृतीला आपण हसतो

 

इंग्रजी म्हणतो किती महान

तिच्याकडे ठेवतो डोके गहाण

असे करुन साधले काय

मराठी मायेची आहेना माय

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रविकिरणही मोहात पडले ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? रविकिरणही मोहात पडले  ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

चुलीवरच्या खमंग भाकरीचा

खमंग वास हवेत पसरता

रविकिरणही मोहात पडले

जाळीदार झरोक्यातुन येते झाले

उजळून टाकले तयांनी

कष्ट करणारे दोन्ही हात

सोन्यासम झळकु लागली

भाकरीपिठासह तीची परात

चुल आपल अग्निहोत्र

शांतपणे चालुच ठेवते

अन्नपूर्णा समोर बसुन

आयुष्य सरकवत  रहाते

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट देवाची ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट देवाची ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

उभी होते भर रस्त्यात

भेदरलेली घाबरलेली

कसा करू रस्ता पार

विचाराने भांबावलेली…..

 

अनपेक्षित कोणीतरी

धरला माझा हात

नको भिऊ उगा अशी

देतो तुला साथ…..

 

होता तो अनोळखी

कसनुसे झाले मला

पण सात्विकता नजरेतली

फारच भावली मला….

 

धोतर पैरण वेष त्याचा

भाळावरती टिळा

छेडत होता एकतारी

माला रुद्राक्षाची गळा….

 

ठसले रूप मनात

वाटले भगवंत भेटला

मदत करून मला

दिसेनासा झाला….

 

नाही उरली भीति

सत्य उमगले मला

नाही कोणी अनोळखी

माणसात देव भेटला….

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆

जीवन गाडीच्या प्रवास

संगे साथी नातीगोती।

सारे शोधात फिरती

थांबा सुखाचा जगती।।धृ।।

 

आले आले बालपण होई आनद उधळण ।

हौस मौजेला न तमा जीवनाचे हे कोंदण।

वाटे फिरूनिया यावी बालपणाची प्रचिती।।१।।

 

किशोर ,कुमार वयात मित्र मैत्रिणींची धुंदी ।

पंख आकांक्षाना फुटती जीवन घडण्याची संधी।

मोहापाशाचे हे फासे गळ रस्त्या रस्त्यावरती।।२।।

 

शहाणा तो धरीतसे योग्य वळणाची वाट

शिखर यशाचे मिळता जीवन नक्षत्राचा थाट।

काय वर्णावी माधुरी सहचारी तो सांगाती।।३।

रगं त प्रवासाला आली जीवन बागही फुलली।

चिमण्या पाखरांच्या संगे आज माऊली रंगली ।

काय आनंदाला ऊणे आली सागरा भरती।।४।।

 

पाहून पिलांची उड्डाण माता आनंदली ऊरी।

गरूडाची झेप जणू जाई यशाच्या शिखरी।

मनी सतावते पुन्हा चाहूल एकटेपणाची।।५।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सावरकरांची कविता…रसग्रहण

☆ वृषोक्ती ☆

गाडीला वृष जुंपिला धरित जो जू मानेवरी

आला ऊंच चढून घाट दमला गेला आवांका तरी

होता वाहून नेत वाहत तरी तो?! मंदचारी तया

कोणी हिंदु वदे सगर्व ह्रदये धिक्कारवाणीस या।।१।।

 

हा धिक् रे वृष,मान वाकवूनिया तू दाससा राबशी

मोठे जूं जड हे असह्य भार हा विश्रांतिही ना तशी

तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी हा तरी

वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वजन्म हा अंतरी ।।२।।

 

ऐके तू वृष शांतिने सकल हे उद्गार  त्याचे असे

दावोनि स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे.

बोले हिंदुसी त्या,अरे मज बहु निंदावचे ताडिले

दावि त्वस्थिति अल्पही न तुजला हे म्यां मनी ताडिले।।३।।

 

निंदाव्यंजक शब्द योजूनी बहु माझ्या धन्या निंदसी

कैसा वागवितो तुला तव धनी शोधूनी पाहे मनी।।४।।

 

ज्याते राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली

दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्ते ज्याला दिली

लोखंडी असताही कांचनमया केलीस यद् भू अरे

तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कधी सत्वरे।।५।।

 

किंवा तू म्हणशील की तव धनी आभार भारी वदे

राजे रावबहाद्दुरादिक तुला मोठ्या किताबांसी दे

ऐसे शुष्क किताब घेउनी तुवा स्वातंत्र्य संपत दिली।।६।।

 

दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती

तेव्हां येउनि मानवी तनुस बां तू साधिले काय ते

भूभारापरी गर्वभार अजुनु त्वचित्त का वाहते।।७।।

 

सोडी गर्व स्वदेशभार हरण्या यत्नांसी आधी करी

होई इशपदी सुलीन पुरवी सद्हेतुला श्रीहरी।।८।।…..

 

☆ रसग्रहण ☆

वृषोक्ती  ही  कविता सावरकरांनी १९०१ साली लिहीलेली आहे. एकदा जव्हार घाटातून बैलगाडीने प्रवास करत असताना त्यांना ती सुचली. या कवितेतली त्यांची कल्पकता आणि विचार दोन्हीही थक्क करणारे आहेत.

१९०१ सालचा काव्यकाळ हा वृत्तबद्ध ,

छंद काव्याचा होता.अलंकारिक भाषेचा होता.आजची मराठी आणि तेव्हांची मराठी यात खूप अंतर होते. त्यावेळची भाषा संस्कृतप्रचुर,नटलेली अवघड होती.पण अर्थातच रसाळ होती.वृषोक्ती या सावरकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना मला ते जाणवलं.शिवाय ,ने मजसी ने …किंवा जयोस्तुते ..या काव्यरचनांची संगीतबद्ध गाणी झाली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहचली पण सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत की त्यातून सावरकर एक संवेदनशील ,डोळस,कणखर व्यक्तीमत्व आपल्याला दिसतं..

वृष म्हणजे बैल आणि वृषोक्ती म्हणजे बैलाने ऊद्गारलेले…ही काव्यरचना शार्दुलविक्रीडित या वृत्तात बद्ध आहे.या वृत्तात चार चरण, १९वर्ण आणि प्रत्येक बारा वर्णानंतर यती असतो.या दृष्टीनेही ही कविता व्याकरण शुद्ध आहे.लयीत आहे म्हणून अर्थ उलगडता येतो.

या कवितेत एक काल्पनिक संवाद आहे.

बैलाचा आणि एका गर्विष्ठ माणसाचा..

तो पारतंत्र्याचा काळ होता.आणि स्वातंत्र्याचे वारे हळुहळु वाहत होते.

गाडीला जुंपलेल्या, हळुहळु घाट चढून पार दमलेल्या बैलाकडे पाहून एक स्वत:त रमलेला भारतीय माणूस त्याची  निर्भस्तना करतो.मानेवर  जू ठेवून धन्याची सेवा करणारा बैल म्हणून त्याचा धिक्कार करतो.

त्याचवेळी हा बैल मनोमन हसतो आणि त्याला एक चपखल, प्रखर उत्तर देतो.

“अरे! तू माझी आणि माझ्या धन्याची काय निंदा करतोस..तू कधी तुझा  विचार केला आहेस…आज तुझी काय स्थिती आहे हे कळलंय् का तुला..आर्यांची  तुझ्या कष्टाने उभारलेली ही  सुवर्णभूमी तू परकीयांच्या हवाली केलीस.स्वत:च्याच भूमीत तू त्यांची चाकरी करतोस. त्याचं वेतन तरी तुला कधी मिळतं का वेळेवर ? त्यांनी दिलेले राजे रावबहादुर या किताबातच तू खूष आहेस…त्यांच्या भाषेतला आभार हा बेगडी शब्द तुला भुलवतो…अरे त्या बदल्यात तुझं लाखमोलाचं स्वातंत्र्य हरण केलय् त्यांनी.. याची जाणीव आहे कां तुला..

त्यापेक्षा मी बैल बरा ..धन्याच्यात आणि माझ्यात परस्पर सांमजस्य आहे..प्रेम आहे.

तू माणसाच्या जन्माला येऊन काय मिळवलंस…? परकीयांची गुलामगिरी..

धिक्कार असो तुझा…माणूसपणाचा मला जो गर्व दाखवतोस ,तो सोड..स्वभूमीला पारतंत्र्यातून सोडव…

प्रयत्नांची पराकाष्ठा कर…या उदात्त कार्यात परमेश्वरही तुला मदत करेल…..

हा या कवितेचा सारांश! एक सुंदर रुपकात्मक संदेश देणारा…ही कविता वाचताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकर किती झपाटलेले होते हे जाणवतं.

लोकांमधे जागृती निर्माण करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.अरे परकीयांचं जोखड घेऊन जगण्यार्‍या तुझ्यापेक्षा तो बैल बरा…

अशा शब्दात ते त्याची कानउघाडणी करतात…

सावरकरांचा कणखरपणा ,विद्रोह  शब्दाशब्दात जाणवतो.ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी काव्य हे माध्यम प्रभावीपणे वापरलं.त्याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर नक्कीच झाला.

या काव्यात उद्विग्नतेबरोबर उपहासही जाणवतो…

शिवाय ही कविता, आता काळ ओलांडून गेली असेही वाटत नाही.ती कालातीत आहे.

जेव्हांजेव्हां माणसाच्या मनावर वैचारिक गंज चढतो तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलामच बनतो.आज देश स्वतंत्र असला तरीही एक बौद्धीक पांगळेपण समाजात जाणवतं. अशावेळी सावरकरांची ही वृषोक्ती नक्कीच परिणामकारक आहे..

२६फेब्रुवारी हा सावरकर   यांचा स्मृतीदिन!! त्या निमीत्ताने त्यांच्या कवितेतलं हे विचार मंथन…

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares