मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

माणसाचे कपडे फाटले तर, ते शिवता येतात. 

पण विचारच फाटके असतील, तर आयुष्याच्या चिंध्या होतात. 

 

काय बोलावे हे ज्ञान ठरवते, 

कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, 

किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, 

…. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही,

हे आपला संयम आणि, संस्कारावर अवलंबून असते. 

 

चुकीला चूक, आणि बरोबरला बरोबर .. म्हणायला शिकलं पाहिजे. 

नुसतं स्वार्थासाठी जगणं, सोडून दिलं पाहिजे. 

जिथे चूक नाही तिथे झुकु नका. आणि जिथे सन्मान नाही, तिथे थांबू नका. 

 

उशिरा मिळालेले सत्य हे, कुलूप तोडल्यानंतर, चावी मिळाल्यासारखे असते. 

यशस्वी होण्यासाठी, चुकणं आणि शिकणं, दोन्ही महत्वाचं असतं. 

कुठे व्यक्त व्हायचं, आणि कधी समजून घ्यायचं, 

हे कळलं तर, आयुष्य भावगीत आहे.!! 

 

किती ताणायचं, आणि कधी नमतं घ्यायचं, 

हे उमजलं तर, आयुष्य ‘निसर्ग’ आहे. !! 

किती आठवायचं, आणि काय विसरायचं, 

हे जाणलं तर, आयुष्य ‘इंद्रधनुष्य’ आहे. !! 

किती रुसायचं, आणि केव्हा हसायचं, 

हे ओळखलं तर, आयुष्य ‘तारांगण’ आहे.!! 

कसं सतर्क रहायचं, आणि कुठे समर्पित व्हायचं, 

हे जाणवलं तर, आयुष्य नंदनवन’ आहे.! ! 

 

कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,? 

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे… 

 

काही माणसं लाखात एक असतात, 

आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात नसतात. 

 

दु:खांच्या दिवसांमध्ये, आनंदाची आशा ठेवणारी माणसं, 

कुठल्याही प्रसंगी, ठामपणे उभी राहतात. 

 

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता, याचे ‘भान’, 

आणि भान म्हणजे कधी काय करू नये, याचं ‘ज्ञान’, 

 

दुःख गिळून आनंद व्यक्त करणे, म्हणजे जीवन… 

कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजे व्यवहार… 

स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे, म्हणजे सहानुभूती… 

आणि माणूसकी शिकून, माणसासारखे वागणे, म्हणजे अनुभूती… 

 

प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. 

ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर, 

काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. 

 

सुख‌ म्हणजे नक्की काय,? ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे …. 

भरलेलं घर, आणि एकमेकांची साथ…!!

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर्षा की शरद, काय हवं अंबरा ? ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

वर्षा की शरद, काय हवं अंबरा ? ☆ सौ.मंजिरी येडूरकर

कैवल्यदानीच्या दोन पोरट्या धरा, अंबरा

समंजस हि धरा,अंबरा परि खळखळणारी॥

 

म्हणे अंबरा, ” नेसू माझे कधी काळे तर कधी राखाडी

क्वचितच असते रेष त्यावरी लखलखणारी”॥

 

नच खळेना डोळ्यामधले पाणी हळवे

कधी करी आकांत तर कधी मुसमुसणारी॥

 

रंगबिरंगी फुलवेलींची नक्षी रेखली

धरेस मिळते हिरवी साडी झगमगणारी॥

 

अखेर थोडी हसली गाली आज अंबरा,

नेसून दावी पिवळी साडी सळसळणारी॥

 

चैतन्याने रात भारली प्रणयरंगी

काळी साडी, खडी त्यावरी चमचमणारी॥

 

मनोमनी तो आज लाजला, चकोर भोळा

लख्ख प्रकाशी, बघून अंबरा थरथरणारी॥

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆

आताशा का कोणास ठाऊक..?

राखी पौर्णिमा म्हटलं की

डोळे भरून येतात कारण ..

मला अजूनही आठवतात

ते लहान पणी चे दिवस..

राखी पौर्णिमा असली की

मी सकाळी लवकर उठून ताईने

माझ्या हातावरती राखी बांधण्याची

वाट पहात बसायचो…

आणि माझ्यासारखीच ताई सुध्दा

ताईने हातावर राखी बांधली ना

की मला खूप

श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं आणि

आई नंतर कुणीतरी आहे

आपली काळजी घेणारं…

असं सहज मनात यायचं…!

लग्न करून जेव्हा ताई

सासरी गेली ना..

त्या नंतर सुध्दा

रात्रीचा प्रवास करून मी

राखी पौर्णिमेला सकाळीच

ताईला भेटायला जायचो …

तेव्हा ताई मला म्हणायची

एवढी दगदग कशाला करायचीस?

त्यावर मी तिला म्हणायचो

तू एकच बहीण आहेस माझी

तुझ्यासाठी मी कूठूनही येऊ शकतो

त्या वेळी राखी पौर्णिमेला ताईने

प्रेमाने मनगटावर बांधलेली राखी

पुढचं वर्ष भर मी मनगटावर

तशीच ठेवून द्यायचो

ताईची आठवण म्हणून…!

पण आता मात्र

राखी पौर्णिमा म्हटलं की

डोळे भरून येतात

आणि मोकळ्या मनगटावर

फक्त आसवांचे थेंब ओघळतात..!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

अनेक कुटुंबे गुंफणारा

वाडा म्हणजे हाराचा धागा असतो,

समूहगानातला मल्हार असतो

तो भूप असतो आणि भैरवीही असतो.

 

वाड्याचे अंगण म्हणजे नंदनवन असते

छोट्यांचे क्रिडांगण असते,

महिलांचे वृंदावन असते,

पाणवठा असते, शिळोपा असते,

मोठ्यांचे कधी कुरुक्षेत्रही बनते

अंगण सगळ्यांनाच बोलावत असते.

 

वाड्यात अनेक बिऱ्हाडे असतात

कुटुंब मात्र एक असतं,

एका घरातल्या फोडणीची चर चर

सगळीकडे पोहोचत असते

वाड्यात कुणाचेच काही खाजगी नसते.

 

जोशाचं बाळ कुलकर्ण्यांकडे झोपते

बंडुला घरच्यापेक्षा शेजारच्यांची भाजी आवडते,

मिनी लोखंडयांकडे अभ्यासाला बसते

देसाईआजी पावशांची भाजी निवडत असते.

 

भावाकडे मुंज आहे ना, मग अशी कशी जाते

माझ्या पाटल्या घेऊन जा,

नव्या साडीची घडी मोडायचिये घेऊन जा

कुणाचे दागिने, कुणाची पैठणी

कुणाची वेळ कशी साजरी करायची ते वाड्यालाच माहित.

 

जा रे , शेजारून वाटीभर डाळीचे पीठ आण

देसाई वहिनी थोडं दूध द्या,

तुमचा गॅस संपलाय, आमचा घेऊन जा,

पाहुणे आलेत तुमची मोठी सतरंजी द्या

हे संगीत केवळ वाड्यातच गायलं जातं.

 

जोशी वहिनींचे वडील वारले कोकणात

तार मिळताच वातावरण बदललं,

जोशी वाहिनिंचे घर माणसांनी भरलं

वाड्यासह अंगणही गहीवरलं,

सुख दुः खाचं वाटप केवळ वाड्यातच असतं.

 

वाडा प्रेमळ होता, त्याचा धाक होता

कुणालाच एकाकी ठेवत नव्हता,

वाडे गेले, फ्लॅट आले, घरे मोठी पण मने छोटी झाली,

सोयी वाढल्या , रुबाब वाढला

कुटुंबाची संख्या वाढली,

एकाकी कुटुंबाच्या गर्दीची आता सोसायटी झाली.

 

वाडा गेला, नुसताच गेला नाही

माणसामाणसांना बांधणाऱ्या रेशीम धाग्याच्या गाठी उकलून गेला,

वाडा गेला, वाडा गेला

उरला फक्त आठवणींचा पाला.

 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गुरू…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गुरू… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

ज्याला अभ्यास आवडी,

त्यास कौतुकाची गोडी !

जो काढेल  खोडी,

त्याला हातावर छडी !

चुकलात तर हक्काने,

करकचून कान पकडी !

चांगले शिक्षक म्हणजे,

जीवनाची खरी  शिडी !

विद्यार्थ्यांच्या यशात गुरुचे,

असते  मोठे योगदान !

विद्यार्थ्यांचे यश बघून,

गुरुची उंचवते मान !

शिक्षक आदराचे  स्थान,

भागावी  ज्ञानाची  तहान !

भावी पिढीचा शिल्पकारच तो,

ज्ञानदानाचे कार्य करी महान !

कृतज्ञतेचे भाव शिष्य,

गाती गुरुचे  गुणगान !

धन्य गुरु धन्य शिष्य,

या परंपरेचा अभिमान !

© श्री आशिष  बिवलकर

05 सप्टेंबर 2023

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कौशल्य… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कौशल्य… – ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

पुष्पकृती घडवली

पहा किती कौशल्याने

नथ आणखी कोयरी

दावते मोठ्या खुबीने॥

गजमुखही सुंदर

त्यात दिसे साकारले

का आहे हे मला सांग

विठोबाचे कानातले?

दिसतील यातूनच

अजूनही काही चित्रे

सुमनावलीची स्तुती

योजूनिया शब्द पत्रे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्राजक्त… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ प्राजक्त… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

सत्यभामेसाठी

प्राजक्ताचा वृक्ष

भूवरती आला

सुगंधाने त्याच्या

सृष्टीचा कलश

भरून गेला!

त्या सुगंधात होता

सत्यभामेचा गर्व

त्या सुगंधात होते

रुक्मिणी प्रेम अपूर्व !

तराजू समभावाचा

होती लपली त्यात

कृष्ण प्रेमाची शिष्टाई

वृक्ष सत्यभामादारी

फुले रुक्मिणी अंगणी !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृष्ण कृष्ण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कृष्ण कृष्ण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्ण नाम जप l

ध्यास लागे मनी ll

सावळा तो ध्यानी l

निरंतर ll…….१

 

मोरपीस शिरी l

दिसे वेणू हाती ll

गळ्यामध्ये शोभती l

पुष्प माला ll……२

 

कृष्ण की विठ्ठल l

मनी मी साशंक ll

सावळे कौतुक l

एकरूप ll……३

 

उत्पत्ती ती ब्रह्मा l

विष्णू तो पालक ll

शिव तो नाशक l

त्रिगुण हे ll….४

 

देवगण सारे l

जगाते उध्दारी ll

किमया ही सारी l

ब्रम्हांडात ll….. ५

 

ईश्वराचे रूप l

आसमंती असे ll

परमात्मा वसे l

दिगंतात ll……६

 

देव निराकार l

मानतो साकार ll

आहे तोच खरा l

परमात्मा ll…..७

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 198 ☆ चित्रकार… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 198 ?

☆ चित्रकार… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

एक चित्रकार अवचित भेटतो,

एका हळव्या वळणावर….

चित्र तुमचं  रेखित राहतो….

आयुष्याच्या कॅन्व्हासवर….

चित्र तेच कॅन्व्हास तोच…

काळ बदलतो आपोआप…

चेह-यावरची एक सुरकुती….

प्रगल्भते  वयानुसार……

चित्राचे त्या शिल्प बनते

त्याच जुन्या वळणावर…

नाही उडत रंग त्याचे….

नसते त्याला जरामरण….

चित्रकार तो शिल्पकार तो

तोच नियंता विश्वाचा..

प्रत्येकाच्या मनीमानसी….

भाग्यविधाता जगण्याचा….

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रत्येकाचा कृष्ण… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रत्येकाचा कृष्ण ☆ श्री सुनील देशपांडे

कृष्णचरित्राचा अभ्यास केल्यास, अभ्यास म्हणण्यापेक्षा चिंतन केल्यास, काही गोष्टी विशेषत्वाने जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट कृष्णजन्माची…

कृष्णजन्म तुरुंगात झाला. माणसाला जन्मापासून अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मग तो कितीही संपन्न  किंवा राजघराण्यातील का असेना. जन्माआधीपासूनच मृत्यू  मागे लागलेला.  वातावरण भयभीत. अशा परिस्थितीमध्ये प्रासादातले सुख सोडून एका गुराख्याच्या घरी बालपण.  या ठिकाणी संपूर्ण उच्चनीचतेच्या आणि जातीयवादाच्या कल्पना मुळातच उखडून काढूनच श्रीकृष्णाचे बालपण पार पडत असतं. 

श्रीकृष्ण हा त्या त्या वयातील आणि विशेषतः बालवयातील घटनांमधून जास्त वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रकट झालेला जाणवतो. बालवयात संस्कार किती गरजेचे असतात आणि सुसंस्कारामुळे माणूस कसा घडत जातो याचा परिपाठच श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये आणि त्याच्या कुमारवयापर्यंतच्या चरित्रामध्ये आढळतो. श्रीकृष्ण चरित्र हे इतकं अद्भुत रसायन आहे की कळत्या न कळत्या वयातील बालकांपासून ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटणारे, मनाला भावणारे आणि सर्वस्पर्शी असे हे चरित्र आढळून येते. म्हणूनच तर श्रीकृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुषोत्तम म्हणून केला जात असावा.  श्रीकृष्ण चरित्र ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, त्यामध्ये महर्षी व्यासांची प्रतिभा त्या व्यक्तिमत्त्वाच्या घडवणुकीत  प्रतिभेच्या सर्वोच्च पातळीवर संचार करत असलेली आढळून येते. बाललीला, खोडकरपणा, खेळकरपणा  या सर्व बालपणीच्या नैसर्गिक भावनांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळेच हे व्यक्तिमत्व बालपणापासूनच आपले लाडके व्यक्तिमत्व होऊन जाते. 

एकदा एका निम्न प्राथमिक शाळेमध्ये साधारण पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या एक दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.  त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होतं.  आता या मुलांना कृष्णाबद्दल काय सांगणार ? परंतु त्यांच्या दहीहंडीचा खेळ चालू असतानाच मला काही ओळी सुचल्या. त्या ओळींच्यावर त्या मुलांनी खूपच सुंदर नाच केला. त्या ओळी त्या मुलांना खूप आवडल्या त्या ओळी अशा होत्या,

खांद्यावरती  उभे राहूया उड्या मारुया कोणी.

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

पुढे पुढारी, 

कृष्ण मुरारी,

मागे सारी,

सेना न्यारी,

नाचू कोणी, गाऊ कोणी, 

उड्या मारूया कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

सुदाम आला, 

गोपी आला, 

गोटु आला, 

मोटू आला, 

उंच कुणी वा बुट्या कोणी, 

सारे खाऊ लोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी……  

उंच मनोरे, 

करती पोरे, 

वारे वारे, 

म्हणती सारे,

दमते कोणी, 

घसरे कोणी, 

मटकी फोड़े कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

करूया कल्ला,

हल्ला गुल्ला, 

चविष्ट काला, 

मट मट खाल्ला, 

यम्मी यम्मी म्हणते कोणी 

भरे तोबरा कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

हे गाणे त्या मुलांना इतके आवडले की त्याच गाण्यावर नाचत नाचत मुले घरी गेली. 

कसलं भाषण ? कसले प्रमुख पाहुणे ? 

लहान मुलांचा कृष्ण हा सगळ्यात आवडता देव (खरं म्हणजे देव हे आई वडील म्हणतात म्हणून त्याला देव म्हणतात) परंतु मुलांना तो देव न वाटता स्वतःचा सवंगडीच वाटतो.  म्हणूनच लहानपणापासून कृष्णचरित्राचे झालेले संस्कार हे लहान वयात व्यक्तिमत्त्व घडवण्याचे संस्कार आहेत. 

कुमार वयातील खोडकर पणा, तारुण्यातील शृंगारिकता. त्याचबरोबर गुरुगृही जाऊन घेतलेले शिक्षण, त्या शिक्षणामध्ये सुद्धा गरीब श्रीमंतीचा भेद न करता जुळलेले मैत्रीबंध. गुरूंच्या घरी सगळ्या प्रकारची कामे करणे, गुरुप्रती आदर बाळगणे या सगळ्या घटनांवरून श्रीकृष्णाला खरे म्हणजे व्यासांनी कुठेही देवत्व बहाल केलेले नाही. श्रीकृष्णाचे देवत्व हे चरित्र ऐकणार्‍यांनी वाचणाऱ्यांनी त्याच्या विविध गुण प्रभावामुळे त्याला बहाल केलेलं आहे. 

लहानपणी त्याच्या चरित्रात त्याच्या बालपणातील चमत्कारांचे प्रसंग हे, कीर्तनकार कथेकरी आणि त्याच्या चरित्राचे गुणगान करणाऱ्या त्याच्या भक्तांनी नंतर श्रीकृष्णाच्या चरित्राला जोडलेले आहेत, असे मला वाटते. श्रीकृष्ण राजघराण्यात जन्मला, गुराख्याच्या घरात वाढला, गुरुगृही शिकला, सर्व प्रकारच्या सामाजिक स्तरातील व्यक्तींशी मैत्री केली. तो योद्धा होता पण अजिंक्य नव्हता. त्याचाही पराभव करणारा होताच. त्यालाही त्याच्या राज्यातून पळवून लावणारा भेटला. प्रजेसकट पळत पळत द्वारकेपर्यंत जाऊन तेथे आपल्या राज्याचे पुनर्वसन करावे लागले. ही खरं म्हणजे नामुष्कीची गोष्ट. परंतु या सर्वाचं जे काही विवेचन व्यासांनी केलेलं आहे ते अप्रतिम आहे. अर्थात या पराभवाचा बदला योग्य त्या व्यक्तीकडून त्याने घेतला हे अर्थातच ओघाने आलेच. अन्यायाच्या विरोधात लढणारा न्यायनिष्ठ पण न्यायनिष्ठूर नव्हे, तर समन्वयाने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारा. शांती प्रेमी पण वेळप्रसंगी शांतीचं तत्त्वज्ञान बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात कोणत्याही थरापर्यंत जाण्याचा सल्ला देणारा.  उत्कृष्ट राजकारणी आणि तत्त्ववेत्ता.

माझ्यासारख्या सामान्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास ही दूरचीच गोष्ट आहे.  पण किमान त्याच्या चरित्राचं चिंतन ही सुद्धा एका जन्मामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकणारी गोष्ट नव्हे.  त्यामुळे कृष्णचरित्राचा अभ्यास नव्हे पण कृष्ण चिंतन हा माझ्या विरंगुळ्याचा विषय आहे. मी कृष्णभक्त नव्हे, देव म्हणून मी त्याची पूजा करणार नाही. पण जगाच्या पाठीवरचं एक अद्भुत व्यक्ती चरित्र म्हणून ते व्यक्तिमत्व मनावर प्रभाव पाडून जातं.   त्या चरित्राचे चिंतन हा प्रसन्नतेचा आणि मानसिक ऊर्जा वर्धनाचा भाग म्हणून मी त्या चिंतनात रमतो. 

वरील सर्व विवेचनात एक गोष्ट माझ्याही खूप उशिरा लक्षात आली. तुमच्याही लक्षात आली की नाही माहित नाही. परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा, मी  संपूर्ण लेखामध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे आणि ते कुठेही खटकत नाही…..  यालाच तर अद्वैत म्हणत नसतील ?

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares