मराठी साहित्य – विविधा ☆ रागावलेले पक्षी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ रागावलेले पक्षी…  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

लहानपणी पासून म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आपले भावविश्व व परिचय होतो तो काऊ चिऊ यांच्याशी जोडलेले असते. अगदी एक घास काऊचा एक घास चिऊचा अशी सुरुवात होते. इथे इथे बस रे काऊ असे म्हणत काऊला हातावर बसण्यासाठी बोलावले जाते. आणि हे सगळे पशू पक्षी आपल्या आयुष्यात किती आवश्यक असतात हे मनावर ठसते. आणि मग या कावळ्याचा आपल्या आयुष्यात किती जवळचा व घनिष्ट वावर असतो ते लक्षात आले. या काऊचे बरेच प्रसंग अनुभवले आहेत. आणि त्यांच्या रागाचा तर चांगलाच प्रसाद मिळाला आहे.

आम्ही आमच्या नवीन घरात रहायला आल्यावर निसर्गरम्य परिसर, इकडे तिकडे फिरणारे विविध पक्षी यांचे फारच आकर्षण होते. आणि त्याचा किलबिलाट ऐकून खूप आनंद व्हायचा. मी हातावर धान्य घेऊन त्यांना भरवत असे. आणि त्याची चिमणी आणि इतर छोट्या पक्षांना चांगलीच सवय झाली होती. शनिवारी मात्र सकाळच्या शाळेमुळे हे शक्य व्हायचे नाही. आणि ते पक्षी सर्व प्रकारचा आरडा ओरडा करायचे. एका शनिवारी आमच्या ह्यांना वाटले आपण धान्य द्यावे. म्हणून ते हातावर धान्य घेऊन उभे राहिले, तर ते धान्य पक्ष्यांनी स्वीकारले नाही. उलट त्यांच्या हातावर चोची मारुन गेले.

एकदा आम्ही एका शेतातल्या घरी(फार्म हाऊस) वर गेलो होतो. आम्ही व्हरांड्यात बसलो होतो त्याच्या समोर एक झाड होते. त्यावर एक कावळा सतत येऊन ओरडायचा. आम्ही त्याच्याकडे इतके लक्ष दिले नाही. मग आम्ही फोटो काढण्यासाठी त्या झाडाजवळ गेलो. त्या वेळी तो कावळा जास्तच ओरडू लागला. पुन्हा आमच्या जागेवर जाऊन बसलो. नंतर तर तो इतक्या मोठ्या आवाजात चिडून आमच्या कडे बघून ओरडू लागला. थोड्या वेळाने तर तो स्वतःची पिसे उपटू लागला. थोडी चौकशी केल्यावर कळले, आम्ही बसलो होतो तेथे त्याच्यासाठी रोज धान्य व पाणी ठेवले जात होते. आम्ही तिथे बसल्यामुळे त्याच्यासाठी धान्य व पाणी दुसरीकडे ठेवले होते. ते त्याने अजिबात घेतले नव्हते.

आमच्या घरासमोर आम्ही अशोकाची झाडे लावली आहेत. त्यावर दरवर्षी अगदी शेंड्यावर कावळा घरटे बनवतो. त्यात कोकिळ पण आपले एखादे अंडे घालते. दोघांची अंडी उबवली जातात. कावळ्याची पिल्ले लवकर उडायला शिकतात. आणि त्या कोकिळेच्या पिल्लाला वाढवत असताना, उडायला शिकवत असताना, कावळा आमच्या डोक्यावर चोचीने मारतो आणि आम्हाला घरात जायची बंदी करुन टाकतो. आपण त्या पिल्लाकडे(कोकिळेच्या) पाहिले तरी अंगावर चाल करून येतो.

अशा विविध पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या रागाचे, खोडकर पणाचे व त्यांच्या आनंदाचे अनुभव घेतले आहेत. आणि या भावना त्यांच्यात पण असतात फक्त ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करत असतात. ते आपण ओळखू शकलो तर आपल्याला पण खूप छान वाटते. आणि ही विविधता आनंद देते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… परिवर्तन – भाग – ३९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ठाण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या गल्लीतल्या गांगल बिल्डिंग मधल्या वन रूम किचन ब्लॉक मध्ये ताईच्या संसाराची घडी हळूहळू बसत होती. अनेक नकारात्मक बाजूंना आकार देत स्थिरावत होती. ताईचे मोठे दीर प्रकाशदादा आणि नणंद छाया नोकरीच्या निमित्ताने ताई -अरुणच्या घरी रहात असत. काही दिवसांनी ताईची धाकटी नणंद अभ्यासाच्या दृष्टीने चांगले म्हणून त्यांच्या सोबत रहायला आली. ताई -अरुणने सर्वांना ममतेने, कर्तव्य बुद्धीने आणि आपुलकीने सामावून घेतले. ताईचे सासू-सासरे मात्र सासऱ्यांच्या निवृत्तीनंतर लोणावळ्यात राहायला गेले होते तिथे त्यांनी एक बंगला खरेदी केला होता. एकंदर सगळे ठीक होते.

विशेष श्रेणीत कला शाखेत एमए झालेली हुशार ताई “रांधा, वाढा, उष्टी काढा यात अडकलेली पाहून माझं मन मात्र अनेक वेळा कळवळायचं. चौकटीत बंदिस्त असलेल्या गुणवंत स्त्रियांच्या बाबतीत मी तेव्हापासूनच वेगळे विचार नेहमीच करायचे मात्र त्यावेळी माझे विचार, माझी मतं अधिकारवाणीने मांडण्याची कुवत माझ्याकडे नव्हती. मी आपली आतल्या आत धुमसायची पण ताईचं बरं चाललं होतं.

बाळ तुषारच्या बाललीला अनुभवण्यात आणि त्याचं संगोपन करण्यात ताई अरुण मनस्वी गुंतले होते पण जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ. तुषार अवघा दहा महिन्याचा होता.

एके रात्री ऑफिसच्या पार्टीला जाण्याची तयारी करत असताना अरुणच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. सुरुवातीला ताईने घरगुती उपचार केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा तिने दादाला (मोठे दीर) फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि ताबडतोब घरी यायला विनविले. दादांनी तात्काळ ऑफिसच्या गाडीतून अरुणला फॅमिली डॉक्टर अलमेडा यांच्याकडे नेले. त्यांनी तात्पुरते बॅराल्गनचे इंजेक्शन देऊन घरी पाठवले पण दुखणे थांबले नाही उलट ते वाढतच होते. अरुणचे मेव्हणे, ठाण्यातले प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मोकाशी यांनी “हे दुखणे साधे नसल्याचे” सुचित केले व त्वरित ठाण्यात नव्यानेच सुरू झालेल्या शल्यचिकित्सक डॉक्टर भानुशालींच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये अरुणला दाखल केले. अरुणला “पँक्रीयाटाइटिस”चा तीव्र झटका आलेला होता. अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. १९६८साल होते ते. आजच्या इतकं शल्यचिकित्सेचं विज्ञान प्रगत नव्हतं. डॉक्टरांनी ताईला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. ” पेशंटची स्थिती नाजूक आहे. डॉक्टरांच्या हाताबाहेरचे आहे कारण या व्याधीवर लागणारे Trysilol हे औषध भारतात उपलब्ध नाही. तेव्हा आता फक्त भरवसा ईश्वराचाच. काही चमत्कार झाला तरच…”

ताई इतकी कशी धीराची! ती पटकन म्हणाली, ” डाॅक्टर! तो मला असे सोडून जाऊ शकत नाही. चमत्कार होईल. माझी श्रद्धा आहे. मी तुम्हाला हे औषध २४ तासात मिळवून देईन. “

त्यावेळी अरुण लंडनच्या B O A C या एअरलाइन्समध्ये इंजिनीयर होता. (आताची ब्रिटिश एअरलाइन्स). ताईने ताबडतोब सर्व दुःख बाजूला ठेवून प्रचंड मन:शक्तीने पुढचे व्यवहार पार पाडले. अरुणच्या मुंबईतल्या ऑफिस स्टाफच्या मदतीने तिने सिंगापूरहून ट्रायसिलाॅल हे औषध इंजेक्शनच्या रूपात डॉक्टरांना २४ तासात उपलब्ध करून दिले आणि अरुणची हाताबाहेर गेलेली केस आटोक्यात येण्याचा विश्वास आणि आशा निर्माण झाली. डॉक्टर भानुशाली यांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू केली. अरुणने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता त्याने धोक्याची रेषा ओलांडली होती. अरुणचे आई-वडील, भाऊ, बहिणी, इतर नातेवाईक सारे धावत आले. ताई सोबत आम्ही होतोच. याही सर्वांचा ताईला मानसिक आधार मिळावा हीच अपेक्षा असणार ना? पण ताईच्या जीवनातल्या एका वेगळ्याच कृष्णकाळ्या अंकाला इथून सुरुवात झाली.

पुन्हा एकदा मनात खदखदणाऱ्या घटनांचा प्रवाह उसळला. जातीबाहेरचे, विरोधातले लग्न, आचार विचारांतली दरी, पुन्हा एकदा पट्टेकरी बुवा विचारधाराही उसळली. वास्तविक आमचं कुटुंब सोडलं तर आमच्या आजूबाजूचे सारेच या पट्टेकर बुवांच्या अधीन झालेले. तसे पट्टेकर बुवा पप्पांशी, माझ्या आजीशी भेटल्यावर आदराने बोलत पण कुणाच्या मनातलं कसं कळणार? पट्टेकरांना पप्पांच्या बुद्धिवादी विचारांवर कुरघोडी करण्याची जणू काही संधीच मिळाली असावी. सर्वप्रथम त्यांनी अरुणच्या परिवारास “ढग्यांची आजी ही करणी कवटाळ बाई आहे” असे पटवून दिले. परिणामी आमच्या कुटुंबास हॉस्पिटलमध्ये अरुणला भेटायला येण्यापासून रोखले गेले. हाच “बुवामेड” कायदा मुल्हेरकरांनी ताईलाही लावला.

अरुण त्याच्या आईला विचारायचा, “अरु कुठे आहे? ती का आली नाही. अरुणची आई उडवाउडवीची उत्तरे द्यायची.

पप्पा ऑफिसातून जाता येता हाॅस्पीटलमध्ये जात. अरुणच्या रूममध्ये बाहेरूनच डोकायचे. अरुण अत्यंत क्षीण, विविध नळ्यांनी वेढलेला, रंगहीन, चैतन्य हरपलेला असा होता. तो हातानेच पपांना आत येण्यासाठी खुणा करायचा. खरं म्हणजे पप्पा बलवान होते. ते या सगळ्यांचा अवरोध नक्कीच करू शकत होते पण प्राप्त परिस्थिती, हॉस्पिटलचे नियम, शांतता अधिक महत्त्वाची होती. ते फक्त डॉक्टर भानुशालींना भेटत व अरुणच्या प्रकृतीचा रोजचा अहवाल समजून घ्यायचे. डॉक्टरांनाही या मुल्हेरकरी वर्तणुकीचा राग यायचा पण पप्पा त्यांना म्हणत, ” ते सर्व जाऊद्या! तुम्ही तुमचे उपाय चालू ठेवा. पैशाचा विचार करू नका. ”

अत्यंत वाईट, दाहक मनस्थितीतून आमचं कुटुंब चालले होते. बाकी सगळे मनातले दूर करून आम्ही फक्त अरुण बरा व्हावा” म्हणूनच प्रार्थना करत होतो ज्या आजीनं आम्हाला कायम मायेचं पांघरूण पांघरलं तीच आजी नातीच्या बाबतीत कशी काय “करणी कवटाळ” असू शकते. काळजाच्या चिंध्या झाल्या होत्या. ओठात केवळ संस्कारांमुळे अपशब्द अडकून बसले होते.

आजारी अरुणला ताईने भेटायचेही नाही हा तिच्यावर होणारा अन्याय, एक प्रकारचा मानसिक अत्याचार ती कसा सहन करू शकेल? ती तिच्याच घरी याच साऱ्या माणसांसोबत त्यांची उष्टी खरकटी काढत लहानग्या तुषारला सांभाळत मनात काय विचार करत असेल? एक दिवस डोक्यात निश्चित विचार घेऊन मीच ताईच्या घरी गेले आणि उंबरठ्यातच ताईला म्हणाले, ” बस झालं आता! बॅग भर, तुषारला घे आणि चल आपल्या घरी. ”

ताईचे सासरे जेवत होते. ते जेवण टाकून उठले. त्यांनी माझ्या हातून तुषारला घेण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या मोठ्या डोळ्यांनी त्यावेळी मला साथ दिली. ते घराबाहेर गेले. ताईने मला घट्ट मिठी मारली आणि ती हमसाहमशी रडली. मी तिला रडू दिले. एक लोंढा वाहू दिला. शांत झाल्यावर तिला म्हटले, ” चल आता. सगळं ठीक होईल. बघूया.”

ताई आणि तुषारला घेऊन मी घरी आले. हा संपूर्ण निर्णय माझा होता आणि आमचं संपूर्ण कुटुंब त्यानंतर ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं!

दोन अडीच महिन्यांनी अरुणला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. तिथून त्याला त्याच्या ठाण्यातल्याच मावशीकडे नेलं. त्यानंतर एक दोनदा ताईने मावशीच्या घरी जाऊन अरुणची विरोधी वातावरणातही भेट घेतली होती. नंतर अरुणच्या परिवाराने अरुणला लोणावळ्याला घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावेळी अरुणने “तूही लोणावळ्याला यावेस” असे ताईला सुचवले पण ताईने स्पष्ट नकार दिला. म्हणाली, ” आपण आपल्याच घरी जाऊ. मी तुझी संपूर्ण काळजी घेईन याची खात्री बाळग” नाईलाजाने तिने तो हॉस्पिटलमध्ये असताना काय काय घडले याची हकीकत सांगितली आणि या कुटुंबीयांवरचा तिचा विश्वास ढळल्याचेही सांगितले. अरुणने ऐकून घेतले पण तरीही लोणावळ्याला जाण्याचा बेत कायम राहिला. समस्त कुटुंब लोणावळ्याला रवाना झाल्यावर ताईने एक दिवस गांगल बिल्डिंग मधल्या तिच्या घरी जाऊन घर आवरून त्यास कुलूप घातले आणि ती कायमची आमच्या घरी राहायला आली.

ताईच्या वैवाहिक जीवनातल्या कष्टप्रद अध्यायाने आणखी एक निराळे वळण घेतले.

एक दिवस अरुणचे पत्र आले. अरुणच्या पत्राने ताई अतिशय आनंदित झाली. तिने पत्र फोडले आणि क्षणात तिचा हर्ष मावळला. अरुणने पत्रात लिहिले होते, ” तुझे माझे नाते सरले असेच समज.. ”

पत्रात मायना नव्हता. खाली केलेल्या सहीत निर्जीवपणा, कोरडेपणा होता. “सखी सरले आपले नाते” या गीत रामायणातल्या ओळीच जणू काही हृदयात थरथरल्या पण या वेळेस ताई खंबीर होती. ती अजिबात कोलमडली नाही, ढासळली नाही, मोडली पण वाकली नाही. तिने डोळे पुसले, ढळणारे मन आवरले आणि जीवनातलं कठिणातलं कठीण पाऊल उचलण्याचा तिने निर्धार केला.

संकटं परवानगी घेऊन घरात शिरत नाहीत पण ती आली ना की त्यांच्या सोबतीनं राहून त्यांना टक्कर देण्यासाठी मानसिक बळ वाढवावं लागतं.

शिवाय यात ताईचा दोषच काय होता? खरं म्हणजे तिचा स्वाभिमान दुखावला होता. तिच्या अत्यंत मायेच्या माणसांना अपमानित केलेलं होतं. त्यांच्या भावनांना, वैचारिकतेला पायदळी तुडवलेलं होतं. NOW OR NEVER च्या रेषेवर ताई उभी होती आणि ती अजिबात डळमळलेली नव्हती. नातं खरं असेल तर तुटणार नाही आणि तुटलं तर ते नातच नव्हतं या विचारापाशी येऊन ती थांबली. आयुष्याच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जणू तिने शूर सैनिकाचं बळ गोळा केलं आणि या तिच्या लढाईत आमचं कुटुंब तिच्या मागे भक्कमपणे उभं होतं. पिळलेल्या मनातही सकारात्मक उर्जा होती.

काही काळ जावा लागला पण अखेर हा संग्राम संपण्याची चाहूल लागली. या साऱ्या घटनांच्या दरम्यान प्रकाश दादाने (ताईच्या दिराने) अनेकदा सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी अगदी मनापासून केले. त्याच्या कुटुंबीयांनी ताईच्या बाबतीत किती चुका केल्या आहेत याची जाणीव ठेवून केले पण तरीही ताईने माघार घेतली नाही. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा, अस्तित्वाचा, स्वयंप्रेरणेचा स्त्रोत तिला विझू द्यायचा नव्हता. प्रचंड मानसिक ताकदीने ती स्थिर राहिली.

एक दिवस अरुण स्वत: आमच्या घरी आला. त्याचे ते एकेकाळचे राजबिंडे, राजस रूप पार लयाला गेले होते. दुखण्याने त्याला पार पोखरून टाकलं होतं. त्याच्या या स्थितीला फक्त एक शारीरिक व्याधी इतकंच कारण नव्हतं तर विकृत वृत्तींच्या कड्यांमध्ये त्याचं जीवन अडकलं होतं त्यामुळे त्याची अशी स्थिती झाली होती. जीजीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुके घेतले. अरुणने जवळच उभ्या असलेल्या ताईला म्हटले, “अरु झालं गेलं विसरूया. आपण नव्याने पुन्हा सुरुवात करूया. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ”

ताईने त्याला घट्ट आलिंगन दिले. त्या एका मिठीत त्यांच्या आयुष्यातले सगळे कडु विरघळून गेले.

इतके दिवस ठाण मांडून बसलेली आमच्या घरातली अमावस्या अखेर संपली आणि प्रेमाची पौर्णिमा पुन्हा एकदा अवतरली.

त्यानंतर माझ्या मनात सहज आले, अरुण फक्त घरी आला होता. तो जुळवायला की भांडायला हे ठरायचं होतं. त्याआधीच जिजी कशी काय इतकी हळवी झाली? मी जेव्हा नंतर जिजीला हे विचारलं तेव्हा ती म्हणाली, “भांडायला येणारा माणूस तेव्हाच कळतो. अरुणच्या चेहऱ्यावर ते भावच नव्हते. ”

माणसं ओळखण्यात जिजी नेहमीच तरबेज होती.

“फरगेट अँड फरगिव्ह” हेच आमच्या कुटुंबाचं ब्रीदवाक्य होतं.

शिवाय जीजी नेहमी म्हणायची, ” सत्याचा वाली परमेश्वर असतो. एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो. ”

त्यानंतर ताई आणि अरुणचा संसार अत्यंत सुखाने सुरू झाला. वाटेत अनेक खाचखळगे, काळज्या होत्याच. अजून काट्यांचीच बिछायत होती पण आता ती दोघं आणि त्यांच्यातलं घट्ट प्रेम या सर्वांवर मात करण्यासाठी समर्थ होतं. बिघडलेली सगळी नाती कालांतराने आपोआपच सुधारत गेली इतकी की भूतकाळात असं काही घडलं होतं याची आठवणही मागे राहिली नाही. ढगे आणि मुल्हेरकर कुटुंबाचा स्नेह त्यानंतर कधीही तुटला नाही. सगळे गैरसमज दूर झाले आणि प्रेमाची नाती जुळली गेली कायमस्वरुपी. ही केवळ कृष्णकृपा.

आज जेव्हा मी या सर्व भूतकाळातल्या वेदनादायी घटना आठवते तेव्हा वाटतं युद्धे काय फक्त भौगोलिक असतात का? भौगोलिक युद्धात फक्त हार किंवा जीत असते पण मानसिक, कौटुंबिक अथवा सामाजिक युद्धात केवळ हार -जीत नसते तर एक परिवर्तन असते आणि परिवर्तन म्हणजे नव्या समाजाचा पाया असतो. यात साऱ्या नकारात्मक विरोधी रेषांचे विलनीकरण झालेले असते आणि जागेपणातली किंवा जागृत झालेली ही मने शुचिर्भूत असतात याचा सुंदर अनुभव आम्ही घेतला. तेव्हाही आणि त्यानंतरच्या काळातही. खरं म्हणजे आम्हाला कुणालाच ताईचं आणि अरुणचं नातं तुटावं असं वाटत नव्हतं पण ते रडतखडत, लाचारीने, कृतीशून्य असमर्थतेत, खोट्या समाधानात टिकावं असंही वाटत नव्हतं. कुठलाही अवास्तव अहंकार नसला तरी “स्वाभिमान हा महत्त्वाचा” हेच सूत्र त्यामागे होतं त्यामुळे त्यादिवशी समारंभात भेटलेल्या माझ्या बालमैत्रिणीने विचारलेल्या, ” इतक्या खोलवर झालेले घावही बुझू शकतात का?” या प्रश्नाला मी उत्तर दिले, “ हो! तुमची पायाभूत मनोधारणा चांगली असेल तर खड्डे बुझतात नव्हे ते बुझवावे लागतात.”

 – क्रमश: भाग ३९

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “English prayer…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “English prayer…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

रोज वेळ मिळेल तेव्हा नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीं आणि अनोळखी वाचक यांच्याशी फोनवर मस्त गप्पा मारण्यात एक वेगळीच मजा येते. आणि मी ती नेहमीच एन्जॉय करतो.

आज सकाळी कॉन्व्हेंट मधून शिकलेल्या आणि माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असलेल्या मैत्रिणीशी गप्पा मारताना, मैत्रीण (नाव छाया) म्हणाली – 

छाया : मी रोज सकाळी एक श्लोक म्हणून देवाची प्रार्थना करते. पण श्लोकाचा अर्थ काहीच समजत नसतो आणि बऱ्याच शब्दांचे उच्चार पण नीट करता येत नाहीत. त्यामुळे प्रार्थना म्हणण्यात मनापासून मजा येत नाही. इंग्रजीमध्ये देवाची काय प्रार्थना करता येईल ? 

तुझं चौफेर लिखाण असल्यामुळे तू नक्कीच इंग्रजी मधली सोपी प्रार्थना सांगू शकशील. मला रोज इंग्रजी मध्ये प्रार्थना म्हणायला नक्कीच आवडेल. आणि प्रार्थना सोपी असेल तर मी सकाळ, संध्याकाळ आणि वेळ मिळेल तेव्हा म्हणत जाईन. मला प्रार्थना म्हणायला खूप आवडतं.

इंग्रजीमध्ये प्रार्थना सूचवणं आणि ते पण मी, हे जरा अवघडच होतं. मी थोडा विचार केला, वर बघितलं, म्हणजे देवाकडे बघितलं, आणि मला एक छान आणि अगदी सोपी प्रार्थना क्लिक झाली. आणि गंमत म्हणजे मला स्वतःला पण ती मनानी तयार केलेली प्रार्थना खूप आवडली.

मी म्हटलं : एकदम सोपी प्रार्थना सांगतो. इंग्रजीमधे आहे. तुझ्यासारख्या इंग्लिश मीडियम वाल्यांना तर एकदमच सोपी. आणि देवाने जर तुझी ही प्रार्थना ऐकली तर जगामधले सगळेच जण आयुष्य एन्जॉय करतील.

प्रार्थना अशी आहे –

Hey God, let my mind and all parts of my body always remain and grow as per your original design for human body.

And let this logic apply to everyone on the earth.

छाया एकदम खुश झाली. म्हणाली, अरे एकदम सोपी आहे आणि अर्थपूर्ण तर आहेच आहे. पाठांतर पण करायला नको. आणि तिनी मला ही प्रार्थना लगेचच तिच्या इंग्लिश स्टाईल मध्ये म्हणून पण दाखवली. तिची बोलण्याची स्टाईल जरा इंग्लिश असल्यामुळे ऐकताना मजा आली.

असं म्हणतात देवाला प्रार्थना आपण कुठल्या भाषेत करतो ते महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं की प्रार्थना मनापासून आहे की नाही. आणि प्रार्थना नीट म्हणता आली आणि प्रार्थनेचा अर्थ जर समजला, तरच ती मनापासून होऊ शकते. आणि मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच एक वेगळाच आनंद देते आणि चेहऱ्यावर प्रसन्नता आणते.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जगावेगळी ‘संजीवन’ शाळा” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

(फोटो ओळ : ‘संजीवन’ शाळेत अनोखे उपक्रम राबवले जातात. सोबतच्या फोटोमध्ये मुली झाडाला राखी बांधत असल्याचा संग्रहित फोटो. फोटोत शशीताई ठकार, अनघादेवी, प्राचार्य धनंजय शिरूर आदी.)

☆ “जगावेगळी ‘संजीवन’ शाळा” ☆ श्री संदीप काळे ☆

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आय. पी. एस. अधिकारी मनोजकुमार शर्माजी यांची वाट बघत थांबलो होतो. गेटच्या समोर असणाऱ्या गाडीकडे माझी सहज नजर गेली. पाहतो तर काय ? माझ्या समोरच्या गाडीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले महाराज एकटेच कुणाची तरी वाट पाहत थांबले होते. महाराजांचे लक्ष मोबाईलमध्ये होते. मी जाऊन जोरात ‘नमस्कार महाराज’ म्हणेपर्यंत महाराज मोबाईलमध्येच पाहत होते. आमच्या गप्पा झाल्यावर मी महाराजांना नम्रपणे म्हणालो, ‘महाराज, तुम्हाला व्हॉटसॲप पाहायला वेळ मिळतो का ?’

त्यावर महाराज हसून म्हणाले, ‘नाही, अजिबात नाही. आता एक आमदार माझ्यासोबत येत आहेत. त्यांची वाट बघत थांबलो होतो. व्हॉटसॲपमध्ये काही ग्रूप आहेत, ते मी पाहतो. त्यात मी शिकलेल्या पाचगणीच्या संजीवन शाळेचाही एक ग्रूप आहे, त्या ग्रूपमध्ये गेलो की, शाळेची आठवण येते. नवीन माहिती, फोटो मी पाहत असतो. ‘

महाराज अधिक उत्साहाने मला संजीवन शाळेविषयी सांगत होते, ‘मी ज्या संजीवन शाळेत शिकलो, त्या शाळेच्या खूप आठवणी आहेत. ‘ महाराज एक-एक करून त्या शाळेच्या आठवणी सांगत होते आणि मी ऐकत होतो. महाराजांकडून पाचगणीच्या संजीवन शाळेचे कौतुक सुरू होते. महाराज ज्यांची वाट पाहत थांबले होते, ते आमदार आले आणि महाराज निघून गेले. शर्माजी आले, त्यांची भेट झाली, तेही निघून गेले.

त्या दिवशी विधान भवनामध्ये अनेकांच्या भेटी झाल्या. अनेकांशी बोलणे झाले, पण त्या सर्वांमध्ये बोलण्याची आठवण राहिली ती महाराजांच्या संजीवनी शाळेच्या प्रेमाविषयी.

मी माझ्या नरिमन पॉईंट येथील आंबेसी सेंटर मधील कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात गेल्यावर पहिल्यांदा पाचगणीची संजीवन शाळा नेमकी आहे तरी कशी, हे गुगलवर सर्च केले. शाळेची माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी मनोमन ठरवले की, शक्य तितक्या लवकर संजीवन शाळेला भेट देण्यासाठी जायचे.

पुढच्या आठवड्यात त्या शाळेला भेट देण्याचा दिवस उजाडला. पाचगणीमध्ये प्रवेश केल्यावर महाबळेश्वर रोडवर भीमनगरमध्ये संजीवन चौक आहे, तिथेच संजीवन विद्यालय ट्रस्टची संजीवन शाळा आहे. पाचगणी आणि संजीवन शाळेभोवती असणारे नैसर्गिक सौंदर्य जगाच्या पाठीवर फार कमी ठिकाणी असेल.

मी शाळेत पोहोचलो. ‘संजीवन’चे प्राचार्य धनंजय शिरूर सर यांच्याशी माझे आधीच फोनवर बोलणे झाले होते. त्यांना भेटण्यासाठी मी शाळेतल्या शिपायाला निरोप दिला. शिपाई मला म्हणाला, ‘सरांची बैठक सुरू आहे. आपण थोडा वेळ बसा. ‘ मी ‘हो’ म्हणून बाहेर बसलो.

माझ्या लक्षात आले, शिरूर सर यांना वेळ लागणार आहे, म्हणून मी फेरफटका मारावा या उद्देशाने बाहेर पडलो. शाळेच्या परिसरात जे सौंदर्य होते, ते फारच मोहक होते. मला माहित होते की, याच भागात ‘तारे जमींन पर’ हा चित्रपट तयार झाला होता.

एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, शाळेतल्या काही मुली एका ज्येष्ठ महिलेसोबत कसली तरी तयारी करत होत्या. एक मोठा केक आणला होता. टाळ्यांच्या गजरात तो केक कापला गेला. त्या मुली अगदी भावूक होऊन तो केक त्या महिलेला भरवत होत्या. त्या महिला तिथे असणाऱ्या मुलींना म्हणत होत्या, ‘काय गं, घरी गेल्यावर मला विसरणार तर नाही ना.. ?’ काही बोलण्याच्या आधी त्या मुली भावनिक होऊन त्या महिलेच्या गळ्यात पडल्या. ते सारे भावनिक चित्र मन हेलावून सोडणारे होते.

माझ्या बाजूला बसून संगणक गेम खेळणाऱ्या मुलाला मी विचारले, ‘या महिला कोण आहेत?’ 

त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘त्या आमच्या शशी मॅम आहेत. ‘ 

मी पुन्हा त्यांना विचारले, ‘तुमच्या शिक्षिका आहेत काय ?’

त्याने कपाळावर हात मारत मला सांगितले, ‘अहो, या शाळेच्या प्रमुख आहेत. ‘

मी म्हणालो, ‘अरे, मला नव्हते माहीत. ‘ 

मी त्यांच्या जवळ जाऊन माझा परिचय देत त्यांना वाकून नमस्कार केला. आमचे बोलणे सुरू झाले आणि गप्पांमधून त्या मॅमनी त्या शाळेविषयी मला जे काही सांगितले, त्यातून मी अवाक् तर झालोच, शिवाय शशी मॅमची शाळा अवघ्या ‘जगात’ वेगळी कशी आहे हेही मी पाहिले. जे मंत्री महोदयांनी मला विधान भवनाच्या गेटवर सांगितले होते, ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर होते.

मूळचे बडोदा येथील असणारे कृष्णराव पंडित आणि रावसाहेब पंडित या दोघांनी १९२२ ला भारतीय संस्कृती जपणारी शाळा उभी करायची, असे स्वप्न पाहिले होते. पाचगणी आणि परिसरात ख्रिश्चन धर्माशी निगडित अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. हिंदू संस्कृती प्रामुख्याने जपली जावी, खेळाला प्राधान्य देऊन प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडावेत, या हेतूने संजीवन संस्थेची निर्मिती झाली.

पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज शशी मॅम ज्या मुलींना निरोप देत होत्या, त्या मुली पन्नास हजारावा आकडा पार करीत होत्या. प्रगतीचे हे शिखर गाठत असताना या संस्थेने मागे वळून कधी पाहिलेच नाही.

प्राचार्य धनंजय शिरूर सर (7798881662) हे संजीवनचे ११ वे प्राचार्य आहेत. शिरूर सर आधीपासून याच संजीवन शाळेत शिक्षक होते. मग ते व्यवस्थापनाच्या भूमिकेत आले, आणि नंतर प्राचार्य झाले. २००३पासून आजपर्यंत शिरूर सर यांनी शाळेसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे.

मी शशीताई यांच्याकडून जे काही शाळेविषयी ऐकत होतो, ते सारे काही अद्भुत असेच होते. पण मी जेव्हा शशीताईकडून शाळेशी संबंधित असलेला विषय ऐकला, तेव्हा मी शशीताई यांच्यापुढे अधिकच नतमस्तक झालो.

शशीताई ठकार शिक्षणासाठी ८वीला असताना ग्वालियरमधून पाचगणीला आल्या. सर्व विषयांत त्या अतिशय हुशार. राज्य आणि देशपातळीवर त्यांनी खेळात शाळेचे नाव केले. एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडायच्या वयात शशीताई संजीवन शाळेच्या प्रेमात पडल्या. शशीताई संजीवनमध्ये शिक्षक झाल्या, प्राचार्य झाल्या, संचालक झाल्या आणि आता त्या शाळेच्या चेअरमन आहेत. वय वर्ष ९३च्या शशीताई आजही या वयात शाळेसाठी सर्व कामे अगदी नेटाने करतात. संजीवन शाळा, कॉलेजचे रूपांतर स्किल आणि स्पोर्ट विद्यापीठात करायचे खूप मोठे स्वप्न शशीताईंनी उराशी बाळगले आहे.

शशीताई यांनी ना लग्न केले, ना कुणासोबत संसार, ना कुण्या नातेवाईकांसोबत नाते ठेवले. शाळा हेच त्यांच्यासाठी ‘जग’ ठरले आणि त्या शाळेला जागतिक असा अमूल्य दागिना बनवण्याचे काम शशीताईनी केले. शाळेच्या भिंती आणि मोठे मस्टर लिहिण्यासाठी कमी पडतील इतके मोठे विद्यार्थी घडवण्याचे काम झाले आहे. फोर्स मोटर्सचे सीईओ प्रसन्न फिरोदिया, संगीतकार ललित पंडित, मृण्मयी लागू, अमित देशमुख, रीतेश देशमुख, विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज अशी कितीतरी नावे घेता येतील. किती आयपीएस झाले, किती आयएएस झाले, किती वैज्ञानिक झाले, कित्येकांनी मोठ्या पदांवर जात सामाजिक कीर्ती मिळवली, याचा आकडा फार मोठा होता. ही शाळा नाही तर उज्ज्वल इतिहास घडवणारे चालते बोलते विद्यापीठ आहे.

मी शशीताईंना विचारले, ‘जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते?’ 

शशीताई शांतपणे म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर पिढ्या घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजून पुढे करतच राहणार. ‘ थोड्या काळजीच्या स्वरात ताई म्हणाल्या, ‘कोविडमुळे आम्ही खूप अडचणीत सापडलो. आमच्या शाळेविषयी शासन स्तरावर सतत अनास्था असते. पूर्वी मदत करणारी माणसे खूप होती, पण आता फारसे लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ ओढायचा कसा, हा प्रश्न आहे. ‘

आमचे बोलणे चालू होते, तेव्हढ्यात मला शोधत प्राचार्य शिरूर सर तिथे आले. शशीताई म्हणाल्या, ‘तुम्ही संपूर्ण शाळा फिरून या. मी तुमची घरी वाट पहाते. ‘ ताई निघाल्या. रस्त्याने जाताना प्रत्येक मुलगा ताईला जणू त्या त्यांच्या आईच आहेत, असेच बोलत होत्या.

मी शिरूर सर यांना म्हणालो, ‘या वयात काय उत्साह! काय काम करण्याची ताकद! बापरे! किती कमाल आहे! ‘

शिरूर सर म्हणाले, ‘ताई म्हणजे अजब आणि अद्भुत रसायन आहेत. वय वर्ष ४० असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची त्यांना नावे तोंडपाठ आहेत. शिरूर सर जे जे बोलत होते, ते सारेच कमालीचे होते. शिरूर सरांनी मला त्या शाळेत जे जे दाखवले ते सारे शिक्षण आणि सामाजिकता दृढ करणारे होते. सर्व प्रकारचे खेळ, संगीत, चित्रकला, सर्व प्रकारच्या अकादमींची पूर्व तयारी, या सर्व क्षेत्रांत जागतिक पातळीपर्यंत सहभागी झालेली मुले तिथे होती. पहिली ते बारावीपर्यंत कुणालाच नव्वद टक्केच्या खाली मार्क्स वाले कुणी आहेत का ? नाही, असा प्रश्न मला त्या शाळेच्या यशाचा आलेख पाहून बघायला मिळत होता. स्कीलिंगवर संस्थेचा खूप भर होता. केवळ नोकरी नाही तर स्कीलिंगच्या माध्यमातून मुले उभी राहिली पाहिजे, स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरू केला पाहिजे, यासाठी वीसपेक्षा जास्त स्कीलिंगचे कोर्स येथे चालवले जातात.

शिरूर सर म्हणाले, ‘संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आसपासच्या सर्व गावांत मोबाईल वाचनालय सुरू केले आहेत. पाच हजारांहून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. अनेक भागांतून गरिबांची मुले शासनाच्या माध्यमातून येथे मोफत शिकण्यासाठी येतात. ही शाळा म्हणजे दुसरं घर आहे. शैक्षणिक जडणघडणी सोबत मानसिक आधार, जीवनाची पायाभरणी हे इथले वैशिष्ट्य आहे.

मुलांकडून इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळणे, सतत फास्ट फूड खाणे टाळणे, बेशिस्तपणा दूर करणे, आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन थांबवणे. आमच्या शाळेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणून भारत भरातून आमच्याकडे प्रवेश असतात. आमच्याकडच्या माजी विद्यार्थांनी अनेक गरीब विद्यार्थी येथे घडावेत यासाठी त्यांच्याकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून अनेक विद्यार्थी शिकतात. ‘

शिरूर सर जे जे सांगत होते त्याचा डेमोही दाखवत होते. एकीकडे आमचे बोलणे सुरू होते, तर दुसरीकडे वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला शिरूर सर काहीतरी सांगत होते. कुणी पोहत होते, कुणी क्रिकेट खेळत होते, तर कुणी अनेक वैज्ञानिक प्रयोग करीत होते. जसे ‘तारे जमींन पर’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांत लहान मुले जे जे प्रयोग करीत होते, ते ते सारे प्रयोग या ‘जगा’वेगळ्या संजीवन शाळेत मी माझ्या डोळ्याने पाहत होतो.

खेळाच्या एका शिक्षकाची ओळख करून देताना शिरूर सर म्हणाले, “हे सचिन कांबळे सर, सर्व देशी, विदेशी खेळात विशेषतः क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये यांनी संजीवन शाळेचे नाव सातासमुद्रापार नेले आहे”.

हसतमुख, अत्यंत उत्साही कांबळे सर यांच्याशी खेळाचे सारे यश समजून घेताना कधी वेळ गेला ते कळलेच नाही. आख्खा दिवस त्या शाळेत गेला.

मला निघायचे होते. आम्ही शशीताईंकडे गेलो. त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले जेवण वाढले होते. जेवल्यावर त्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग मला दिले. त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या कन्या, संस्थेच्या संचालक अनघा देवी (9049919912) यांची मला त्यांनी ओळख करून दिली. तेव्हढ्या मोठाल्या पायऱ्या उतरून ताई मला निरोप देण्यासाठी खाली आल्या. ताईंच्या पायावर डोके ठेवून मी गाडीत बसलो.

आपल्या राज्यात शाळा या विषयाला घेऊन असाही प्रयोग होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसत नव्हता. गाडी बरीच पुढे गेल्यावर मी मागे नजर टाकली. शशीताईंचा हात अनघादेवी ताईंच्या हातात होता. अनघादेवी ताईंच्या मागे प्राचार्य शिरूर सर जात होते, आणि शिरूर सरांच्या मागे सचिन कांबळे सर होते. शशी ताईने पुढे शाळेचा कारभार सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी कार्यक्षम माणसे तयार केली होती. शाळेच्या भविष्याला पुढे नेणारी दुसरी पिढी शशी ताईंनी तयार केली होती.

मला या शाळेला भेट देऊन आल्यावर अवघे ‘जग’ फिरून आलो असे वाटत होते. आज याच ‘जगात’ वेगळ्या असणाऱ्या ‘संजीवन’ आणि तुमच्या आसपास असणाऱ्या त्या प्रत्येक चांगल्या शाळेला तुमची गरज आहे, ती तुमच्या आमच्या मदतीची. या शाळा टिकल्या तर आमची संस्कृती, आमचा भारत देश टिकेल ? बरोबर ना. करणार मग अशा शाळेला मदत ? नक्कीकरा. 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअरबरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.

गाडी सुरू झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण ‘फर्स्ट गिअर’ टाकतो. हा ‘फर्स्ट गिअर’ म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई, बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता ‘पुढे’ जात राहिली पाहिजे हा पहिला ‘संस्कार’ फर्स्ट गिअर करतो.

इथे आपल्याला निर्व्याज्य प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी ‘बंद पडणार नाही’ याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी ‘पळण्यासाठी’ इतका कमी वेग पुरेसा नसतो.

आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला… बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.

गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडालत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला-मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअरमध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.

आपण आता ‘फोर्थ गिअर’ टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, आकर्षक लेटेस्ट मोबाईल, एक बि. एच. के. मधून दोन बि. एच. के., लॅपटाॅप, ह्याऊ नि त्याऊ. या वेगाची नशाच काही और.

गंमत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार… लाख… कोटी… खर्व… निखर्व… रुपये नाहीत, गरजा.. हा ‘वेग’खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कुणी येऊ नये, ‘लाल’सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि… आणि…. आणि…. ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.

पाच.. चार.. तीन.. दोन… एक…. खाट खाट

गिअर मागे टाकत आपण आता न्यूट्रलवर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअरमध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअरदेखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती.. आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?

सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा ‘फर्स्ट गिअर’ ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ ? कुणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? इ. एम. आय. भरत विकत घेतलेल्या क्लासिक बेडरूमने ? नव्या कोऱ्या गाडीने ? ‘ यू आर प्रमोटेड’ असं लिहिलेल्या कागदाने ? मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने.

आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, ‘होईल सगळं व्यवस्थित’ म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी ‘बायको’ नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, ‘त्या’ काळात आपल्या नैराश्यावरचा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे ‘जिवाभावाचे मित्र’ हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते कां ?

माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवू या. त्याचा आनंद ही उपभोगू या. फक्त त्यावेळी आपल्या ‘फर्स्ट गिअर्स’ चं स्मरण ठेवू या. आयुष्याचा वेग मधून मधून थोऽऽऽडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.

जिंदगी हसीन है.

☆ ☆ ☆ ☆

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे 

🌹 *वयानं तरुण व विचारांनी म्हातारा भारत हे चित्र आपण बदलू शकतो 🌹

🌷 गोष्ट अशी आहे, चीनमध्ये एक कृतिशील विचारवंत लाओत्से ऐंशी वर्षांचा म्हाताराच जन्माला आला. डोक्याचे केस चक्क पिकलेले आणि चेहऱ्यावर सुरकुत्या ! हा लाओत्से म्हणजे आपल्या कडील बुध्द म्हणू शकता ! पण लाओत्सेचे विचार आजही मार्गदर्शक आहेत !! तरूण आहेत !!! त्याच्या जन्माची गोष्ट अविश्वसनीय आहे, कोणीही विश्वास ठेवणार नाही, माझाही नाही……. पण आपण प्रतिकात्मक रित्या असा विचार करू शकतो……… कारण भारतीयांची मानसिकता तपासली तर या चीनी गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो.

🌷 बहुतांश भारतीय म्हातारेच जन्माला येतात, मी वयानं म्हणत नाही, तर दृष्टीनं विचारानं आचारानं ! माणसाचं शरीर जवान मर्द असू शकतं, पण मन भूतकाळात रमुन म्हातारं झालेलं असू शकतं !

🌷 आपल्याला सर्वत्र तरुण दृष्टिस पडतील, पण तरुणाईसाठी मुलभूत गोष्टींची वानवा तुम्हाला दिसेल. मी युवक त्यालाच म्हणेन ज्याची ओढ भविष्याकडे असेल. Young is that one, who is future oriented and old is that one who is past orinted ! कोणत्याही वयस्कर व्यक्तीला भेटा, तो भूतकाळातील आठवणीत रमलेला दिसेल. तो पुढे म्हणजे भविष्यात पाहणार नाही, कारण त्याला मृत्यू दिसत असतो. जवान मात्र भविष्यात पाहील, कारण त्याला मृत्युची भिती नसते, काही अदम्य करण्याची इच्छा असते ! आपण रशिया, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रांतील युवक पाहा. ते अंतरिक्षात यात्रा करण्याची इच्छा ठेवतात. आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून आहेत आणि भारतीय तरुण पहा भविष्याची कोणती कल्पना, योजना, Utopia नाही….. गेल्या दहा वर्षात चित्र बदलू लागलंय मात्र तरुणांची संख्या आणि त्यांची भविष्या बाबत वास्तव स्वप्नं यांचं प्रमाण अत्यंत व्यस्त आहे ! आपण भविष्यासाठी जगतो, भविष्यासाठी स्वप्नं रंगवतो….. पण जर भविष्यासाठी स्वप्न नसेल तर भविष्य अंधकारमय आहे, निश्चित समजा !

🌷 आपण भुतकाळात फार रमतो, भुतकाळ संपन्न होता हे सांगणारी पुस्तकं वाचतो, भुतकाळातील हिरो आपले आदर्श असतात. थोडक्यात आपला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा इतका सुंदर होता, या आठवणीतच रममाण आपण असतो. आणि यात अयोग्य काहीच नाही……… पण त्यातील समृद्ध वारशाची चर्चाच करायची, की तो अंगिकारून पुढं जायचं ? यावर आपण गप्प असतो !

🌷 लक्षात घ्या. आपण कार चालवत आहात, कारला तीन आरसे पाठी दिसायला असतात. आता जर कार पुढं न्यायची असेल, तर तुम्ही पूर्णवेळ आरशात पाहू शकत नाही, त्यानं अपघात होईल ! भुतकाळात झालेल्या चुका पाहायच्या व त्या पुन्हा होऊ नये म्हणून बोध घेऊन पुढंच जायचं, त्या चुकांचा कोळसा उगाळत बसलात तर हात काळे होतील !….. भारताचा दोन हजार वर्षांचा इतिहास असा पाठी पाहून पुढं चालण्याचा आहे, म्हणून अपघात जास्त झाले. गेल्या दोन हजार वर्षांत आपण अनेक खड्ड्यात पडलो. यशाची उत्तुंग शिखरं आपण पादाक्रांत केली नाहीत ! गुलामी, गरिबी, हीनता, कुरुपता, दिनता, अस्वस्थता पाहिली आहे !….. आजही आपल्यातील अत्यल्प तरुण भविष्यातील उत्तुंग शिखरं चढण्याची आकांक्षा बाळगतात….. मी भुतकाळ व भविष्या बद्दल फार लिहित नाही, पण एक धारणा आपण मनाशी पक्की केली आहे……… सत्ययुग होऊन गेलंय आता कलियुग आहे, कोणतीही चांगली गोष्ट घडू शकणार नाही !…. *ही महामुर्खांची मानसिकता आहे !!*

🌷 राम, कृष्ण, नानक, महावीर, बुध्द, कबिर, छ शिवाजी, म राणा जे चांगले होते ते होऊन गेले, आता होणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण भविष्यात चांगले महानुभाव तयार करत नाही, तोपर्यंत भुतकाळात असे महानुभाव होऊन गेले हे पटवून देणं कठीण जाईल. जोपर्यंत आपण भविष्यात नवनवीन श्रेष्ठता निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत भुतकाळातील श्रेष्ठता काल्पनिकच वाटणार कारण, आपली चांगल्याच्या निर्मितीची परंपरा आपण खंडित केली !

🌷 जोपर्यंत आपण भविष्यातील कृष्ण राम तयार करत नाही, तोपर्यंत राम कृष्ण हे काल्पनिकच वाटणार….. कारण चांगला मुलगाच साक्ष देऊ शकतो, की माझा बाप चांगला होता ! जर आपण भविष्यात लाचार, दरिद्री, कंगाल, भिक्षांदेही असू तर कोणीही मान्य करणार नाही, भारतात सोन्याचा धूर निघत होता !………… आपण फक्त गुंड, बदमाश, चोर, लुटारू निर्माण केले तर छ शिवाजी, छ संभाजी, महाराणा प्रताप वगैरे विभुती इथं निर्माण झाल्या यावर कोण विश्वास ठेवील ? सद्यस्थितीतील तरुणाईनं दररोज नवनवीन प्रगतीची शिखरं काबिज केली नाहीत, तर आपण या महान विभुतींचे वारसदार आहोत, यावर कोण विश्वास ठेवील ?……. आपल्यातूनच जर बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग, आंबेडकर, फुले, शाहू, धोंडो कर्वे, आगरकर, कर्मयोगी पाटील, विनोबा, स्वातंत्र्यवीर, विठ्ठल रामजी शिंदे, स्वामीनाथन, विलासराव साळुंखे वगैरे वगैरे कर्मयोगी तयार झाले, हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो ?

🌷 आज परिस्थिती बदलतेय, ध्येय धोरणं inclusive केली जात आहेत. विश्वगुरूची स्वप्नं आपल्याला दाखवली जाताहेत. प्रगतीचे मार्ग निष्कंटक केले जात आहेत, अशावेळी दूरदृष्टीनं भविष्याचा वेध घेऊन तरुणाईनं श्रेष्ठ ध्येयाप्रत पोचण्यासाठी सर्वस्व डावावर लावणं आवश्यक आहे ! टाचणी ते विमान निर्मितीसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो….. आज परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे, या बदललेल्या ecosystem चा फायदा जर तरुणांनी घेतला नाही, तर या तरुणांच्या ह्रासाला तरुणच जबाबदार आहेत, दुसरं कोणी नव्हे !

🌷 आज नाही तर उद्या संपूर्ण जग आपली खिल्ली उडवणार आहे, या जगद्गुरु विषयावरून….. जेव्हा कोणी म्हणेल मी श्रीमंत होतो, तेव्हा समजून जा तो गरीब आहे, जेव्हा कोणी म्हणेल मी ज्ञानी होतो, तेव्हा समजून जा, तो अज्ञानाच्या खाईत लोटला गेला आहे, जेव्हा कोणी म्हणेल आमची शान होती, तेव्हा समजून जायचं, ती शान आता मातीमोल झाली आहे !

🌷 भुतकाळात डोकावून पाहणं योग्य असलं, तरी भुतकाळ डोक्यात साठवणं धोकादायक आहे. कारण जगणं वर्तमानात असतं !

🌷 एका गोष्टीत आपण most productive आहोत आणि ती गोष्ट म्हणजे reproduction ! आपली लोकसंख्या आपण अमर्याद वाढवली. अमेरिकेला फक्त ४०० वर्षांचा इतिहास आहे आणि भारताला किमान १२–१५ हजार वर्षांचा इतिहास आहे. मग अमेरिका एवढी समृद्ध कशी झाली ? दुनियेतील अनेक देशांमध्ये भिकारी आहेत, पण एक पूर्ण देश भिकारी म्हणून १९७२ साली जगापुढे उभा कसा राहिला ?

🌷 मी युवा त्याला म्हणतो, जो भविष्याकडे उन्मुक्त आहे आणि वयस्कर म्हातारा म्हणजे ज्याला भुतकाळाप्रती प्रेम आहे, याला वयाचं बंधन नाही. आपण एक हजार वर्षे गुलाम होतो आणि केव्हाही परत गुलाम होऊ शकतो. म्हातारा मृत्यूला घाबरतो, तर जवान मृत्युला अंगावर घेतो. म्हातारा म्हणतो जे होतं ते माझ्या भाग्यात आहे, युवा किंवा जवान म्हणेल मी माझ्या मनगटाच्या जोरावर भाग्य लिहिन. म्हातारा म्हणतो जे होतंय ते देव करतोय, जवान म्हणेल मी जे करीन त्याला ईश्वरीय आशीर्वाद असेल. जवान संघर्ष तर म्हातारा अल्पसंतुष्ट……. ही अल्पसंतुष्टता आपण घालवली नाही, तर दुष्काळ, बेरोजगारी, महामारी, परावलंबित्व यांचीच पूजा आपण करत असतो ! यालाच म्हातारपण म्हणतात !!…… भविष्यासाठी योजना बनवा, अल्पसंतुष्टता सोडून द्या, एक निर्माणाची असंतोषकारी अभिप्सा आवश्यक आहे, एक सृजनाची आस पाहिजे…. *जेव्हा आपण दुःख, अज्ञान, रोगराई, दिनता, दरिद्रता, दास्यता संपवण्याची शपथ घेतो, तेव्हा भविष्य निर्मितीला सुरूवात होते !*
एक छोटीशी गोष्ट सांगून हे प्रबोधन थांबवतो.

🌷 एकदा जपान मध्ये एका छोट्या राज्यावर एका मोठ्या शत्रूनं आक्रमण केलं. ते सैन्य हद्दीवर येऊन उभं राहिलं… या छोट्या राजाचा सेनापती तरूण, साहसी, लढवय्या होता. तो जाऊन शत्रू सैन्य पाहून आला आणि राजाला म्हणाला महाराज, आपण या शत्रूशी लढून जिंकू शकत नाही, त्यांची खूप मोठी फौज आहे, आपले शिपाई कापले जातील व परत हरणं नशिबात येईल !… राजा सेनापतीला म्हणाला, तु तर जवान आहेस आणि असा म्हाताऱ्या सारखा वागतोस ?… आणि राजा नगरातील एका साधूकडे गेला आणि सर्व परिस्थिती सांगितली. अनेक वेळा राजा त्या साधूचा सल्ला घेत असे……. साधूनं राजाला सल्ला दिला, ताबडतोब त्या सेनापतीला तुरुंगात टाक. त्याची चुक झाल्येय. सेनापती मनानं हरलाय, त्यानं हार मानली आहे. आणि ज्यानं मनानं हार मानली, त्यानं प्रत्यक्षातील हार निश्चित केली !… मी युद्धासाठी निघत आहे!… राजानं सेनापतीला तुरुंगात टाकलं, पण विचार करत होता, या साधूला तर तलवार कशी धरायची हे सुध्दा माहीत नाही आणि हा युध्द कसं करणार ?

🌷 साधूनं तलवार घेतली व सर्व सैनिकांना आदेश देऊन युध्दावर निघाला. सैनिक साशंक होते. वाटेत एक देऊळ होतं. तिथं थांबून तो साधू सैनिकांना म्हणाला, मी देवाला विचारून येतो, युद्ध जिंकणार की नाही ?…. सैनिक म्हणतात, साधू महाराज, आपल्याला देवाची भाषा तर येत नाही….. साधू म्हणतो, मी हे नाणं देवाच्या पायावर ठेऊन वर उडवणार आहे. जर आपल्या राजाचा छाप वर आला, तर आपण युद्ध जिंकणार !…… आणि त्यानं तसं केलं. छाप वर आला…… साधूनं सांगितलं, आपण प्राणपणानं लढलो तर युद्ध जिंकणार आहोत, देवानं कौल दिला आहे !! आता आपण हरायचं असं ठरवलं तरी हरू शकत नाही, चला युद्ध सुरू करा, विजय आपलाच होणार आहे !!!

🌷 युध्द झालं. साधूची सेना प्राणपणानं लढली आणि जिंकली.

युध्दावरून परत येताना वाटेत ते देऊळ लागलं. साधू आपला नगराकडे निघालाय, सैनिक म्हणतात साधू महाराज, देवाचे आभार मानून पुढं जाऊया……..
साधू सांगतो, त्याची काहीच आवश्यकता नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपल्या राजाचाच शिक्का आहे !

🌷 ते सैनिक जिंकले होते, कारण विचार अंततः वस्तूत रुपांतरीत होतात. विचार घटना बनून जातात.

Sir Arthur Eddington – (Philosopher of science) says, “Things are thoughts and thoughts are things!

🌷 मी भारतीय मनाला युवा, तरूण, रसरशीत, उत्फुल्ल, कृतिशील पाहू इच्छितो. कारण आपण दोन हजार वर्षे म्हाताऱ्या सारखा विचार केला. हे भारतीय जनमानसातील म्हातारपण घालवलं पाहिजे ! विचार वय विसरायला लावतात, चांगला विचार करा, आचार सुधारेल, काम तयार आहे, आपल्या काम करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे !

 🙏🌹शुभेच्छा ! 🌹🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धक्के पे धक्का… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ धक्के पे धक्का… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(“थांबा डॉक्टर, शांता.. “ मी हाक मारली. शांता कॉफीचे मग घेऊन आली. कॉफी घेता घेता मी म्हणाले

“डॉक्टर, तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या आणि त्याला केंव्हा वेळ असतो? मी बोलेन त्याच्याशी. ”) इथून पुढे..

डॉ. कुमार गेले आणि तासानंतर लीना आली. मी तिला म्हटलं 

“काय एकदम यायचं नाही काय? कुमार एक तासापूर्वी गेले..

“हो ग. मला माहित आहे.. मीच त्याला चार वाजता तुझ्याकडे जायला सांगितलं होत.. मी मुद्दाम नाही आहे.. कारण म्हंटल त्याला स्पष्ट बोलूदे.. मी असताना त्याला अवघडायला नको. कसा वाटला तुला कुमार?

शांता मध्येच म्हणाली “एकदम क्यूट.. मस्त माणूस आहे लीना..

“हो ग.. किती मस्त.. कुठे दडून बसला होता.. मला आधी भेटला असता तर मी बिनलग्नाची राहिली नसते.

“पण मला भेटला ना..

“नशीबवान आहेस लीना.. आयुष्यात उशिरा का असेना पण अस्सल हिरा मिळाला.. मी बोलले त्याच्याशी.. त्याला लिव्ह इन मध्ये राहायचे आहे.. लग्न नाही करायचे.

“तोच तर प्रॉब्लेम आहे ग विजू.. मला असं लग्न केल्याशिवाय कुणाबरोबर राहणे अनैतिक वाटते.. मला एक वेळ चालेल पण माझी मुलगी महिमा.

. तिला अजिबात चालायचं नाही.

“तू बोललीस मुलीशी.. महिमाशी..

“हो.. ती कॅनडात रहात असली तरी आपल्या देशातील चालीरीती, धर्म याबद्दल तिला अभिमान आहे.. तिचे म्हणणे डॉ. ना म्हणावे.. करायचे तर लग्न करा.. हॆ असले लिव्ह इन नको.

“बापरे.. दोघांच्या मुलांच्या वेगळ्या तऱ्हा.. कुमारच्या मुलाचे म्हणणे.. लग्न नको लिव्ह इन चा विचार करा. तुझी मुलगी म्हणते.. लिव्ह इन नको लग्न करा..

“म्हणून तर तुझा सल्ला हवा ना विजू…. काय योग्य?

“लिव्ह इन म्हणजे तुम्ही एकत्र राहणार.. जे नवरा बायको करतात तेच सर्व.. एकमेकांची काळजी घेणार पण त्या दोघांनाही नवरा बायकोचे अधिकार नसणार.. म्हणजे नवरा मयत झाल्यानंतर पत्नीला त्याची पेन्शन मिळते.. किंवा त्याची संपत्ती, प्रॉपर्टी मिळते किंवा पत्नी मयत झाल्यानंतर नवऱ्याला तिची पेन्शन किंवा प्रॉपर्टी मिळते.. तसें इथे होत नाही. कारण त्याला किंवा तिला कायदेशीर पतीपत्नीचे अधिकार नसतात.

“मग ग… महिमा हॆ कधीच मान्य करणार नाही.. काही दिवसांनी त्याने आता आपण वेगळे राहू, असे म्हंटले तर?

“लिव्ह इनचे फायदे हेच आहेत.. बऱ्याच ठिकाणी आपण पहातो.. एखादा पुरुष किंवा स्त्री नाईलाजाने लग्न टिकवत असते.. भारतात विशेषतः स्त्रिया मरण येत नाही म्हणून नवऱ्या बरोबर नांदतात.. अनेकवेळा घटसफोटसाठी अर्ज करतात… तो मिळणे बऱ्याच वेळा कठीण असते.. अशा वेळी वाटते.. कायदेशीर लग्न नसतं तर सहज वेगळं व्हायला आलं असत. लिव्ह इन चे असे फायदे पण आहेत.

“मग काय करायचा ग विजू.. शांते तु सांग..

“मी असते ना तर तुझ्यासारखी विचार करत राहिले नसते.. असा पुरुष दिसतो का कुठे? शांता हसत हसत म्हणाली.

“तस करता येत नाही ना शांते… मुलीला दुखवून कस चालेल… उद्या कुमार बरोबर नाही जमलं तर आपली मुलगीच जवळ करणार ना.. ?

‘काही तरी मार्ग काढ विजू..

“तूझ्या मुलीचा फोन नंबर दे… मी तिला फोन करते.. मी कुमारच्या मुलाचा पण नंबर घेतलाय.. त्याच्याशी पण बोलणार आहे मी..

कॉफी घेउंन लीना गेली.

मी त्याच रात्री कुमारच्या मुलाशी फोनवर बोलले. पण तो आपल्या मताशी ठाम राहिला. दुसऱ्या दिवशी लीनाच्या मुलीशी बोलले.. ती पण आपल्या मताशी ठाम राहिली.

 पुढील रविवारी कुमार आणि लीना एकदम माझ्याकडे आली.. मग पाचजणांनी ग्रुप चर्चा केली. पण यातून काहीच सोल्युशन मिळेना.

 असेच काही दिवस गेले. एका सायंकाळी कुमार माझ्याकडे आला. मला खुप आनंद झाला.. माझ्या मनात आले बहुतेक काही मार्ग मिळाला असेल.

“या डॉक्टर.. खुप दिवसांनी आलात.. लीना पण आली नाही… फोन पण नाही केला तिने.

“लीना मला पण फोन करत नाही अलीकडे.. बहुतेक ती नोकरीं सोडून मुलीकडे जात्येय कॅनडाला..

“काय? आणि तुम्ही? तुमचा काही विचार केला नाही तिने?

“नाही ना.. पुन्हा मी एकटा..

डॉ. कुमार मान खाली घालून गप्प बसला. मी शांताकडे पाहिलं.. ती पटकन उठून कॉफी आणायला गेली.

“सांभाळा कुमार.. स्वतःला सांभाळा.

‘आता सांभाळत रहायचं.. दुसरं काय.. मनात काही असलं तरी आपण आपल्या मुलांना दुखवू शकत नाही.. आपला अंश असतो त्यांच्यात.. मुलं पण आईबाबाच्या मनाचा विचार करत नाहीत.. तीन वर्षांपूर्वी पत्नी गेली त्यानंतर लीना भेटली. ती मला योग्य वाटली.. सुस्वभावी.. सुसंस्कृत.. माझ्या मनातील पत्नीची जागा घेणारी होती ती… पण. पण.. पण त्यानिमित्ताने तुझी भेट झाली.. तिचीच मैत्रीण.. तशीच सुस्वभावी.. सुसंस्कृत पण प्रॅक्टिकल विचार करणारी.. फारश्या जबाबदाऱ्या नसणारी.. एकटी, लग्न न केलेली.. विजू.. आपण एकत्र राहू शकतो काय?

मला एकदम धक्का बसला.. अगदी अनपेक्षित प्रश्न.

“मी.. मी… मला समजले नाही. डॉक्टर.

त्याच वेळी कॉफी घेऊन आत येणारी शांता ओरडली..

“अग ते तुला विचारत आहेत विजू… हो म्हण.. हो म्हण..

मी रुमाल काढला आणि घाम पुसू लागले.

“मी तुला विचारतो विजू.. आपण… एकत्र राहू अखेरपर्यत.

“मला वेळ द्या डॉक्टर.. मला वेळ द्या.. मी भाबवून गेले आहे.

“ठीक आहे.. मी वाट पहातो..

डॉक्टर गेले. शांताने माझे अभिनंदन केले.

“ही संधी सोडू नकोस विजू.. तो भला माणूस आहे.. मला त्याने विचारलं असत तर मी आत्ताच त्याच्या गाडीतून गेले असते.

शांती हसत हसत माझी चेष्ठा करत होती.

पुढील गोष्टी जलद जलद झाल्या. मी लीनाला फोन करून डॉक्टरनी लिव्ह इन साठी आग्रह केल्याचे सांगितलं. ती कॅनडाला जायची होती.. तिने शुभेच्छा दिल्या. मी मग डॉक्टरच्या मुलाला. सुनेला फोन लावला आणि त्याना कल्पना दिली. त्याना सुद्धा त्यान्च्या ‘पपासाठी जोडीदारीण हवीच होती.

एका दिवशी मी डॉक्टरच्या घरी रहायला गेले. डॉक्टरने आठ दिवस सुट्टी घेतली आणि आम्ही सिमला मनाली फिरून आलो.

पुन्हा मी माझ्या ऑफिसमध्ये बसू लागले. शांता येत होतीच. मला पहाताच शांता म्हणाली..

“आयुष्यभर एकटी राहणार.. म्हातारपणी पेन्शन घेऊन वृद्धाश्रमात राहणार म्हणणाऱ्या विजू..

कसला धक्का दिलास सर्वाना..

“होय बाई, डॉक्टर भेटला म्हणूंन दिला धक्का..

“आता माझ्यासाठी शोध असा एखादा डॉक्टर नाहीतर प्रोफेसर..

मग देऊ” धक्के पे धक्का’… मिठी मारत शांती ओरडली.

“ होय होय.. देऊया – धक्के पे धक्का…”

– समाप्त –  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा असं वाटे.

हळूहळू पान मोठी होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. अगदी गॅलरीतल्या कठड्या जवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या…

एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..

“अरे म्हणजे आता चिंचा येणार “

मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले. कोवळी नाजूक चिंच दिसली….

हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेनी मी बघत होते.

होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले.

ते बघून शाळेच्या दारात चिंचा विकणाऱ्या मावशी आठवल्या… तेव्हा चिमणीच्या दाताने तोडलेला तुकडा आठवला. मैत्रिणी, शाळा, बाई आठवल्या……..

आणि नंतर या झाडाची गंमतच सुरू झाली.

घरी कोणी आलं की आधी त्यांना घेऊन गॅलरीत जायचं आणि हे झाड दाखवायचं..

एकदा मैत्रिण व तिची जाऊ आली. तिच्या जावेने तर फांदी हातात घेऊन अगदी गालाजवळ नेली… तिचे डोळे भरूनच आले होते. ती म्हणाली

“अग नीता आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या. पण दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला तिथेच मैत्रिणींशी गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. त्याच झाडाची आठवण आली. “

विलक्षण प्रेमाने ती बोलत होती.

झाडाला बघून तिचा हळवा कोपरा उघडला होता…. निघताना पण तिने हलकेच फांदीवरून हात फिरवला…

झाड मोठं व्हायला लागलं. चिंचा आता छान वाळल्या होत्या.

एक मध्यम वयाच जोडपं आलं. झाड झोडपून देतो म्हणाले.

“आम्हाला थोड्या चिंचा द्या बाकी तुम्ही घेऊन जा “म्हणून सांगितलं.

त्यांनी चिंचा पाडल्या. पोती भरली. आम्हाला दिल्या. खुश होऊन निघाले. निघताना त्या बाईं झाडाजवळ गेल्या झाडाला डोकं टेकवलं….. कवटाळलं नमस्कार केला… देवाला करावा तसा..

मी बघत होते 

“फार झोडपल बघा झाडाला… पण चिंचा पाडण्यासाठी असं करावंच लागतंय बघा… “

त्या म्हणाल्या.

झाडाबद्दल तेवढी कृतज्ञता..

पुढे सांगत होत्या..

“आम्ही शेतकरीच आहोत भाऊकी सुरू झाली…. छोटा तुकडा वाट्याला आला.. मग शेती विकली. पैसा घेतला आणि आता शहरात आलो जगायला… “

काय बोलावं मला पण काही सूचेना…. डोळे भरून आले..

” बरं ताई येतो आम्ही परत पुढच्या वर्षी” असं म्हणून दोघं निघाले.

निघताना दादांनीही झाडाला डोकं टेकवलं…

हाडाचे शेतकरीच होते ते…

काही दिवसांनी लक्षात आलं की झाडावर दोन पक्षी येऊन बसत होते. त्यांचे विभ्रम चालायचे..

मैत्रीण आली होती तिला सहज सांगितले.

“हेच दोघे येऊन वेगळे बसतात बघ. प्रेमात पडलेले असतील बहुतेक” 

ती बघायला लागली..

” चल ये आत कॉफी करते”

म्हटलं तर ती तिथेच उभी…

लक्ष त्या पक्षांकडेच म्हणाली “पक्षांमध्ये जात, धर्म, पंथ नसतात हे किती बरं आहे ना… सुखात राहू दे यांची जोडी… “

पक्षांना बघून तीच खूप जुनं दुःख नकळत वर आलं होतं…

अशावेळी काही बोलूच नये..

शांतपणे मी आत आले.

नंतर पण घरी आली की गॅलरीत जाऊन झाड बघून यायची…

का… अजून काही आठवायची…………

खारूताईच चिंच खाणं बघत राहावं असं असायचं. बाईसाहेब मजेत दोन पायांच्या मध्ये चिंच धरायच्या आणि खात बसायच्या…

ह्या झाडाच्या तर मी प्रेमातच पडले होते.

री डेव्हलपमेंट होणार म्हणून काही दिवस घर सोडायचे होते. झाडाला सोडायचे वाईट वाटत होते.

दोन्ही नातवंड साहिल शर्वरी आले. चिंचा काढल्या. त्यांनाही झाडाबद्दल विलक्षण प्रेम वाटत होतं. ममत्व होतं….

“आता खाली पार्किंग येणार मग आपला फ्लॅट अजूनच वर जाणार आपल्या गॅलरीत हे झाड नसणार रे” साहिलला मी म्हणाले.

तर तो म्हणाला 

“अग आजी तोपर्यंत झाड पण वाढणार नाही का? मग ते आपल्या गॅलरीत येणार… “

“अरे हो खरंच की”

त्याच्या बोलण्याने मन आनंदुन गेलं.

येताना झाडाचाही निरोप घेतला.

भेटू काही वर्षांनी…

आणि मधुन मधुन येत जाईन रे तुला बघायला… झाडाला सांगितलं.

वारा आला.. फांद्या हलल्या…

माझं मलाच छान वाटलं…

असा जीव जडला की लांब जाताना त्रासच होतो…

मग तो झाडावर जडलेला असला तरी…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट !

त्यावेळी मी रशियातील मॉस्को इथे होते. एका रविवारी मी बागेत गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते पण हलका रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हवेत सुखद गारवा आला होता. बाग अतिशय सुंदर होती. एका चबुतऱ्याखाली बसून मी त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते.

अचानक माझी नजर एका युवक युवतीच्या जोडीवर पडली. अगदी थोड्या वेळापूर्वीच लग्न झाले असावे त्यांचे !

ती नववधू अगदी सुंदर होती ! पंचवीस एक वर्षांची, सोनेरी केसांची आणि निळ्या चमकत्या डोळ्यांची ! जणू बाहुलीच ! नवरा मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटत होता ! तडफदार आणि आकर्षक ! त्याने सैन्याचा पोशाख घातला होता. नववधूच्या अंगावर सॅटिनचा पांढराशुभ्र, मोती आणि नाजूक लेसने सजवलेला पोशाख होता. तिच्या दोन मैत्रिणीही तिच्यामागे उभ्या होत्या. नववधूचा पोशाख मळू नये म्हणून त्यांनी तो हातांनी उचलून धरला होता. एका मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पाऊस पडत होता ना ! नववधूच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. दोघांची जोडी अगदी साजेशी आणि सुरेख दिसत होती.

मी विचार करु लागले, ‘ बाहेर पाऊस पडत असताना इतके छान कपडे घालून हे दोघं लगेच असे बागेत का बरं आले असावेत ? लग्न लागल्यावर त्यांच्याकडेही एखादा काही समारंभ वगैरे असेलच की !’ 

मी आता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होते. ते दोघेही बागेत असलेल्या युद्ध-स्मारकाकडे गेले. हातातला गुच्छ त्यांनी त्या स्मारकावर अर्पण केला. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली व ते हळूहळू परत फिरले.

आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना !

या जोडीबरोबर एक वृद्ध गृहस्थही आलेले होते. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझी साडी पाहून विचारलं 

“ आपण भारतीय आहात का ?”

“ हो, मी भारतीय आहे. “

मग नकळत आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं, “ आपल्याला इंग्रजी कसं येतं ?” 

“ मी काही दिवस परदेशात काम करत होतो.”

“ मला एक गोष्ट सांगता का ? हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर लगेचच या युध्दस्मारकाला भेट द्यायला का आलं आहे ? “ न राहवून मी लगेच माझी शंका एकदाची विचारून टाकली.

ते म्हणाले, “ ही रशियातली परंपरा आहे. इथे कोणाचाही विवाह नेहमी रविवारीच होतो, मग ऋतू कोणताही असू दे ! विवाह-नोंदणीच्या रजिस्टरवर सह्या केल्यानंतर त्या जोडप्याने तिथल्या जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन तिथे श्रध्दांजली अर्पण करणं बंधनकारकच आहे असं म्हणता येईल. काय आहे.. ह्या देशात प्रत्येक युवकाला कमीत कमी दोन वर्षे सैन्यात नोकरी करावीच लागते. लग्नाच्या दिवशी आपला सैनिकी पोशाख घालूनच लग्नाला उभं रहावं लागतं.. मग तो कोणत्याही पदावर वा कुठल्याही खात्यात असू दे.” 

“ आणि याचं कारण काय ? “ मी विचारलं.

ते जरासे सरसावून बसले आणि सांगू लागले……

– – “ हे कृतज्ञतेचं प्रतीक समजलं जातं. आपल्या कितीतरी पूर्वजांनी आपल्या देशासाठी कितीतरी युद्धांमध्ये भाग घेतला होता. किती जणांनी प्राणांची आहुती दिली होती.. काही युद्धं जिंकली, काही हरली ! पण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं ते फक्त आमच्या या देशासाठी… त्यांच्या त्यागाचं मोल फार मोठं आहे. आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ह्याची जाणीव असणं फार आवश्यक आहे. ज्या शांत स्वतंत्र राष्ट्रात ते दोघं आता आनंदाने राहणार आहेत ते राष्ट्र आज ह्या लोकांच्या बलिदानावर उभं आहे… ही जाणीव. आम्ही वयस्कर लोक ही परंपरा जपण्याचा आग्रह धरतो. विवाहाच्या दिवशी युद्ध-स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहणं ही गोष्ट प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी जणू अनिवार्यच आहे. मग लग्न कुठेही असो, मॉस्को, पिटर्सबर्ग अथवा रशियातल्या कोणत्याही शहरात !” 

मी विचारात पडले… ‘आता हे दोघं लग्न करताहेत’ म्हणून काय शिकवतो आपण आपल्या मुलांना ? महाग महाग साड्या आणि उंची कपडे, किंमती दागदागिने, महागडे जेवणाचे मेनू, अनावश्यक डेकोरेशन, आणि डिस्को पार्टी.. बस्.. फक्त एवढंच तर शिकवतो. एक भारतीय म्हणून आनंदाने आणि शांतपणे जगण्यास आतुर झालेल्या त्या जोडप्याला.. त्यांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या दिवशी आपल्या शहिदांची आठवण ठेवायला का शिकवत नाही आपण ? का त्यांचे महत्त्व आपण पटवून देऊ शकत नाही आपल्या पुढच्या पिढीला…. आणि खरं तर स्वत:लाही ?

माझे डोळे भरून आले ! मन दाटून आले !

खरंच !आपण भारतीयांनी रशियाकडून ही महान परंपरा आणि ही कृतज्ञतेची जाणीव शिकलीच पाहिजे. देशासाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपणही केलाच पाहिजे… आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण तर केलेच पाहिजे.

– – पण केव्हा शिकू आपण हे ????

 

मूळ हिन्दी लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.) – इथून पुढे —

Adolescence मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे समीकरण होते. पाच एक वर्षापूर्वी मुंबई उपनगरात एक घटना झाली होती, ज्यात अठरा मुले (बारा ते तेरा वयोगट) आणि दोन मुलगे असे समीकरण होतेब. दोन महिने या मुलांनी शाळा संपल्यावर दुपारी, एक मुलाच्या इमारतीच्या गच्चीत दोन मुलांना sodomise केले होते.

सुरुवातीला कुतूहल, नंतर व्हिडिओ करून ब्लॅकमेल.

एक मुलगा आत्महत्या करून सुटला.. दुसऱ्याने प्रयत्न केला तो वाचला आणि हे बाहेर आले.

सगळ्यांचे पालक उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय.

ते दोषी होते का? त्यांचे संस्कार या बाबतीत मला माहीत नाही पण नवल आहे, दोन महिने ही अठरा मुले अनैसर्गिक कृत्ये करत आहेत. त्यांच्या मनात काही तरी असेल, अपराधीपण, भीती, excitement, आपण पकडले जाऊ ह्याची धास्ती, अनैसर्गिक आनंद, ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या मनातली खळबळ, वेदना.. दोन महिन्यात ही लक्षात सुद्धा येऊ नये! एका ही कुटुंबात.. ही गोष्ट मला जास्त अस्वस्थ करून गेली. आपल्या मुलांचे मार्क्स, रूप रंग, भविष्यातही त्याची प्रगती, खेळ कला यातील यश अपयश हे सगळे आपण आवर्जून पाहतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, यशस्वी होण्यासाठी दबाव घालतो पण आपल्याला मुलांचे मन वाचता येत नाही, आणि मुलांना आपला आधार वाटत नाही! 

मग आपण आई वडील का होत आहोत असा विचार करायची वेळ आली आहे.

Adolescence मध्ये त्या मुलावर sexually तो attractive आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.. आताचे जग हे क्रूड आहे. त्यामुळे ते डायरेक्ट मुद्द्यावर येते.

आमच्यावेळी शाळेत पहिला दुसरा नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व, कला किंवा खेळ यात प्राधान्य असणाऱ्या मुलांकडे/ मुलींकडे, मुलींचे/ मुलांचे लक्ष असायचे. जोड्या तेव्हाही जमायच्या आणि ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशी मुलं मुली तेव्हाही असायची. नकार, दुर्लक्ष, स्वतःच्या आयुष्याची काळजी, आपण कुणालाही आवडत नाही म्हणून येणारा एकाकीपणा, न्यूनगंड यातून अनेक जण जात असतील.

अशा लोकांच्या मनातले नैराश्य आणि त्यातून स्वतःला सावरणे, यात कोण पूल बनत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर याचे उत्तर मिळाले तर कदाचित ह्या मुलांच्या समस्यांच्या गुंत्याचे टोक आपल्याला सापडू शकते.

ही सिरीज बघत असताना मला माझा भाऊ आठवला. अभ्यासात हुशार पण रंगाने सावळा. त्यात बाहेर उनाडायचा खूप. त्यामुळे काळा दिसायचा. आपल्याकडे अनेकांना बोलण्याची पद्धत नसते.. त्याच्यावर प्रेम असणारी अम्माच म्हणायची, अरे रामोशी कसा दिसतो.

पुढे जसजसा मोठा झाला तसा बाहेरच्या जगात सुद्धा वजनावरून वरून टर, रंगावरून चेष्टा सुरू झाल्या.. मुले खूप vicious असतात. बिल्डिंग च्या भिंतीवर त्याचे कार्टून काढणे, त्याला हसणे, काहीही नावे ठेवणे असायचे.

पुढे वयात आल्यावर सुद्धा नकोसे वाटणारे अनेक अनुभव आले असतील, असणार.

तेव्हाचा रागीट स्वभाव, उर्मट वर्तन. नको असलेल्या घटकांशी सामना करण्याचे ते मार्ग होते.

आयुष्य त्याचे सोपे नव्हते.

घरात उगाच बाजू घेणे नव्हतेच. चुकले असेल तर ओरडा खायचा तो पण अनेकदा तो down असेल तर त्याच्या केसातून हात फिरवत ” एका तळ्यात होती ” म्हणणारी आई मला अजून आठवते. राजहंस एक असे म्हणताना आमचे आवाज सुद्धा त्यात मिसळायचे आणि मग आम्ही हसायचो… तो ही हसायचा.

आता exactly आम्ही त्याला कसे समजून घेतले हे नाही सांगता येणार पण त्याच्या मागे आम्ही होतो. We all shared a very close bond he knew we would be there for him always.

त्यामुळे असेल, बाह्य जगात वावरताना सुद्धा आपल्यासाठी कुणी आहे ही जाणीव त्याला सावरत होती.

त्याच्याबद्दल लिहावे असे खूप आहे आणि ते अत्यंत प्रेरणादायक आहे. अनपेक्षित भोग त्यानेही अंगावर घेऊन जिरवले. FB वर तो नाही आणि स्वतःबद्दल लिहिलेले त्याला आवडत नाही पण 

पुढे शिक्षण, नोकरी… उत्तम भविष्य घडवले त्याने, खूप लहान वयात. मोठ्या कंपनीत डायरेक्टर, स्वतःचे मोठे फ्लॅट्स, मर्सिडीज.. आणि बरेच. त्याच्या कंपनीतून गेली अकरा वर्षे उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून अठ्ठावीस देशातून त्याची निवड केली जात आहे. या सारखी अनेक जण माहिती आहेत. घरातील तणाव, व्यसने, रूप रंग, व्यंग यामुळे झालेला मानसिक त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे झालेला अपमान आणि या साऱ्यातून तावून सुलाखून वर आलेले अनेकजण.

सूड घेण्याकडे अनेकांकडे कारणे असतील पण त्यांनी ते केलेले नाही.

या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. पाठीशी असलेला हात आणि विश्वासाची माणसे आणि त्याला समजून घेण्यासाठी दिलेला वेळ.

“मी राजहंस आहे” हे पटवून द्यायला त्यांच्याकडे त्यांची माणसे होती आणि ती आहेत ह्याचा त्यांना विश्वास होता.

हा सिरीजचा रिव्ह्यू नाही. असे काही घडण्याची शक्यता असू शकते म्हणून सिरीज पहायला हरकत नाही 

पण नव्वद टक्के गोष्टी या खरेतर हातात असतात आणि आईवडील, आजीआजोबा यांनी आपल्याला घडवले असल्याने अंगात सुद्धा मुरलेल्या असतात.

आपल्यासाठी भरपूर माणसे आहेत असा भास सोशल मिडिया मुळे होऊ शकतो. इथे खरच तुमच्यावर प्रेम करणारी माणसे असतात.. ती प्रेम करतात ते ही निखळ असू शकते कारण तुमची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर नसते. You don’t owe anything to them nor they owe to you.. त्यामुळे असेल, त्या मर्यादित वेळेत ते तुमचे कौतुक करतात. अनेकवेळा ते खरे असते. ह्यात आपली माणसे, ज्यांच्याशी आपली आर्थिक, सामाजिक, कायदेशीर बांधिलकी असू शकते ती रुक्ष वाटू शकतात. होते असे म्हणून तर सोशल मिडिया लोकप्रिय आहे. काहीही प्रत्यक्ष न करता केल्याचा आभास इथे निर्माण होतो. आपली माणसे नक्की कोण असतात? 

माझ्या सासूबाई आजारी होत्या. माझ्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते. कधीतरी लक्षात आले असावे त्यांच्या की हे आपले शेवटचे दिवस आहेत. माझा हात धरून त्या म्हणाल्या, जगू आणि बाबांना जप. खरेतर दोन्ही माझेही. नवरा, सासरे पण त्यांच्या प्रति आईंची जी जबाबदारी होती ती त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली.

गेल्या आठवड्यात अचानक हॉस्पिटल मध्ये मला जावे लागले. खरेतर सगळे पूर्ववत होत असताना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला आणि झाले ते काही तासांत, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये emergency मध्ये दाखल झाल्यावर ना मला नीट बसता येत होते, ना बोलता, जीभ जड आणि ऐकू येत असलेले नीट पोचत नाही अशा स्थितीत मी जवळ उभ्या असलेल्या नवऱ्याला म्हटले, take care of Amarjeet.. मुलगा लांब उभा होता म्हणून मनातल्या मनात त्याला पपाला पाहायला सांगितले. खरेतर काही तासापूर्वी किती काय काय करायचे होते, कुणाकुणाशी बोलायचे होते, pending कामे आठवत होती.. पण त्या क्षणाला लक्षात आले…let go असे करता येत नाही.

माझ्या जबाबदाऱ्या अशा टाकून कशी जाणार.. I have to handover..

आतापर्यंत माझा जो बांधिलकीचा वाटा होता तो दुसरे कोण घेणार! 

वारसा म्हणजे फक्त पैसे घर, मालमत्ता याहीपेक्षा असतो ते आपण स्वतः..

आपली ओळख ज्या व्यक्ती मार्फत उरणार ती आपला वारसदार असते. आपल्याला हवी असलेली आपली ओळख, आपल्या नंतर रहावी असे वाटत असेल तर आपल्या मुलाला तसे बनवणे हेच आपल्या हातात असते. तेवढा प्रयत्न जरी प्रत्येकाने स्वतःपुरता केला तर adolescence ही सिरीज प्रत्यक्षात न येता एक फिक्शन म्हणून उरेल.

— समाप्त —

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares