मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी

😄 ०१-५० चढती कमान !

बालपण – शिक्षण – नोकरी – कारकून – प्रमोशन – साहेब – हाताखाली चार हुजऱ्ये –

बायको खुश – मुलं खुश –

इकडे तिकडे चोहिकडे –

आनंदी आनंद गडे…

🌸

🙂५०-६० समाधान !

वरची श्रेणी – पगार – निवृत्ती – निरोप समारंभ – पेन्शन – ग्रॅच्युइटी – मुलगा, मुलगी – दोघंही IT त – चांगली नोकरी – जावई भला – सगळे पाच, सहा आकडी पगार वाले – दोन नातवंडं – साठीशांतीला कधी नाही ते बायकोचे पण कौतुकाचे चार शब्द – स्वतःचा दुमजली बंगला -”समाधान निवास !”

🌸

😊 ६०-७० बोनस !

“साठी झाल्येय् असं वाटतंच नाही तुमच्याकडे बघून !” लोकांचं मत – माझी कॉलर ताठ – मलाही तसंच वाटतं – देवाच्या दयेने तब्बेत छान – काही म्हणता काहीही तक्रार नाही – आता कधी तरी सर्दी, पडसं, खोकला हे पाहुणे अधूनमधून यायचेच – काही वेळा खोकला मात्र हटता हटत नाही – आता सत्तरीही जवळ आल्येय्. मध्येच कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटतं! पण तरीही जगायचा कंटाळा आलेला नाही. देवानं मोठ्या उदारपणानं ही बोनस वर्षं दिल्येत, ती नाकारायची कशी ??

🌸

😔 ७०-८० नाईलाज !

सत्तरी झाली तेव्हाच वाटलं होतं, आता बस् झालं की! आता खरं म्हणजे पोथी गुंडाळून फळीवर किंवा कोनाड्यांत ठेवली जावी, हीच इच्छा. आज्ञा झाली की प्रस्थान कधीही हलवण्याची तयारी आहे. तरी पण आपल्या हातांत काय असतं? मुला-नातवंडांनी मोठ्या उत्साहाने पंच्याहत्तरी साजरी केली. पण, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून, मी केवळ नाईलाजाने सगळ्यांत भाग घेतला.

दाढी, अंघोळ, यांसारख्या रोजच्या कामांचा सुद्धा आताशा कंटाळा येऊ लागलाय्.

आता कोणतीही गोष्ट केवळ नाईलाज म्हणून करायची !

नाईलाज – नाईलाज – फक्त नाईलाज —

🌸

😖 ८०-९० आत्मनिर्भत्सना !

कशासाठी जगतोय तेच कळत नाही. आता कशातच राम वाटतं नाही. ओझं तरी किती दिवस टाकायचं दुसऱ्यांवर? एकदा आणि एकदाचं संपव रे बाबा !

🌸

😵‍💫 ९०-१०० शापित भूत !

घरातील बाकीचे :

गेले अडीच तीन महिने असेच निपचित पडलेलेच असतात. जवळजवळ वीस-बाविस दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर डॉक्टरच म्हणाले की आता घरीच घेऊन गेलात तरी चालेल. डॉक्टरी इलाज संपले. आता कळत पण काहीच नाही. काय करायचं आपण तरी? वाट बघणे एवढेच आपल्या हातात !!!

🌸

याला जीवन ऐसे नांव !!

🍁 🍁

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

खरंच आम्ही वांझ आहोत…

(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.) 

“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”

“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.

“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.

“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले

”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.

…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.

रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.

आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.

परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.

काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…

… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”

सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.

शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.

सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…

“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”

जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.

मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.

मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.

… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.

– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.

– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.

मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.

पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.

… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…

म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.

योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….

इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।

माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…☆ श्री जगदीश काबरे ☆

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.

राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की, अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा पहिला नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी मग तीच मुक्ररर झाली. तोच आज आपण साजरा करत असतो, तो हा राष्ट्रीय विज्ञान दिन.

विज्ञान म्हणजे काय? 

एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यांपुढे कसल्या प्रतिमा येतात? चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकडय़ांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे तारे, ग्रह, धुमाकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, फ्रिज, टीव्ही, मोबाईल फोनसारखी दररोजच्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या कोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ… आणि मनात कुठले शब्द येतात? न्यूटन, आइनस्टाइन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय. हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे; पण विज्ञान याच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर—

१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.

२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. अशाप्रकारे विज्ञान हे निरंतर सत्याचा शोध घेत असते.

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच शेकडो शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत, त्यात आपले योगदान देऊन विज्ञानाला आणि स्वत:लाही समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.

वैज्ञानिक पद्धत कशी असते?

काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू म्हणजे गृहीतक ठरविणे. त्यानंतर या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता… प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धत परत परत तपासून पहात पुन्हा नव्याने सुरुवात करणे. आपले गृहीतक चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे. जर अनेक प्रयोगांनी चुकीचे ठरले नाही तरच ते गृहीतक स्वीकारणे आणि वैज्ञानिक सिद्धांत तयार करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते. तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयाचा जर आपण अलिप्तपणे विचार केला नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यातून मग छद्मविज्ञानाची निर्मिती होईल. छद्मविज्ञानात आपण निष्कर्षाला पूरक असे प्रयोग करत जातो. त्यामुळे विज्ञानाची हानी तर होते पण लोकांमध्ये अंधश्रद्धाही बळावतात.

विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो. या वैज्ञानिक तत्वांची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते… असायला हवी. विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव वैज्ञानिक पद्धत.

खऱ्या वैज्ञानिक पद्धतीमुळेच आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले आहे. स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचे नाव आपण ऐकले असेलच. त्यांनी केलेल्या निरीक्षण प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले आहे की, हे विश्व भौतिक आणि रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे या विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या सगळ्या घटना आणि यापुढे भविष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनाही भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा परिपाक आहेत आणि असणार आहेत. म्हणूनच या विश्वाचा कोणी निर्माता नाही. हे विश्व भौतिक-रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे स्वयंभू आहे. या घटना विविध पातळीवर निरंतर घडत राहत असतात आणि म्हणूनच विज्ञानसुद्धा निरंतर असते.

थोडक्यात काय तर, विज्ञान ही एक सत्याचा शोध घेण्याची पध्दत वा प्रक्रिया आहे. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक ह्या धर्माचा, ह्या वर्णाचा, गटाचा, पंथाचा, म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य, तमुक एक त्या धर्माचा, वर्णाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य हे असे घडत नसते. म्हणून विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. विज्ञानाची सत्ये सर्वकालीक असून जगभर सर्वांना सारखीच लागू पडतात. तसेच ती सर्वमान्य असतात. कारण ते कोणालाही पडताळून पाहता येते. म्हणून आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या वैज्ञानिक सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?

कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल. किंवा असंही म्हणता येईल की, जेवढा पुरावा उपलब्ध आहे तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण”निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग.” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली दृष्टी कशी प्रगल्भ होते हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया…

वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात. चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते. जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते, आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते.

विज्ञानाचे मर्म काय —

– – तेव्हा विज्ञानाचे मर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवा…

 *

विज्ञान म्हणजे जग जाणण्याची कृती,

तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती.

 *

विज्ञान असते निसर्ग निर्मित

तंत्रज्ञान असते मानव निर्मित.

 *

विज्ञानाचा शेवट होतो तत्वज्ञानात 

तंत्रज्ञानाचा शेवट होतो मनवी मनात.

 *

म्हणूनच विज्ञान नाही शाप नाही वरदान 

तंत्रज्ञान मात्र शाप आणि वरदानही.

 *

विज्ञान दाखवते नेहमी प्रगतीची वाट 

तंत्रज्ञान कधीकधी धरते अधोगतीची वाट.

 *

विज्ञानाचे असे हे दुधारी शस्त्र 

तंत्रज्ञान मात्र कधीकधी होते अस्त्र.

 *

विज्ञानाने उजळतात निसर्गाच्या दशदिशा 

मानवी मन मात्र ठरवते तंत्रज्ञानाची दिशा.

 *

विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती 

तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्या हाती.

 *

विज्ञानाचा विघातक उपयोग मानवच करिती,

तरीही विज्ञानालाच शिक्षित मंडळी दोष देती…

 *

म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदीशा,

मानवाच्याच उद्धारा निवडावी विज्ञानाची दिशा.

*

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आरती खऱ्या खोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत होती… “समीरच्या सगळ्या आठवणी मनात रुतून बसल्यात हो माझ्याs. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी मिटल्या डोळ्यांसमोर हात पुढे पसरुन माझ्याकडे येण्यासाठी झेपावत असतो तोss! आपल्याला मुलगा झाला तर तो समीरच आहे कां हे फक्त मीच सांगू शकेन.. तुम्ही कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली आणि ऊठून आत निघून गेली.. !!

आता या सगळ्यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं! जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला? बोलावं तिच्याशी?.. हो.. जायला हवंच…!…

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो…!)

तिच्याकडे जायचं. तिला भेटायचं. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. समीरबाळाच्या जाण्यानंतरचं पुत्रवियोगाच्या दु:खानं झाकोळून गेलेलं माझं मन:स्वास्थ्य आणि नंतर तिच्या पत्रातील माझं सांत्वन करणाऱ्या आशेच्या किरणस्पर्शाने स्थिरावलेलं माझं मन.. हे सगळं कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकायचं… असं सगळं मनाशी ठरवूनच मी त्या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर पडलो. नृसिंहवाडीला जाऊन आधी दत्तदर्शन घेऊन थेट कुरुंदवाडची वाट धरली. तिच्या घराबाहेर उभा राहिलो आणि मनात चलबिचल सुरु झाली. तिचेही वडील नुकतेच तर गेलेत. तीसुध्दा त्या दु:खातच तर असणाराय. तिला आपलं दुःख सांगून त्रास कां द्यायचा असंच वाटू लागलं. मग तिला कांही सांगणं, विचारणं मनातच दडपून टाकलं. तेवढ्यांत दार उघडून दारात तीच उभी. आनंदाश्चर्याने पहातच राहिली क्षणभर….

“तू.. ! असा अचानक?.. ये.. बैस.. ”

ती मोकळेपणाने म्हणाली. आतून पाण्याचं तांब्याभांडं आणून माझ्यापुढे ठेवलंन्.

“लिलाताई, मी आज आधी न कळवता तुला भेटायला आलो ते दोन कारणांसाठी.. ” मी मुद्द्यालाच हात घातला.

“होय? म्हणजे रे.. ?”

“समीरचं आजारपण, त्याचं जाणं.. हे सगळं घडलं नसतं तरी मी तुमचे नाना गेल्याचं समजल्यावर तुला भेटायला आलो असतोच हे एक आणि समीर गेल्याचं तुला माझ्या आईकडून समजल्यानंतर तू सांत्वनाचं जे पत्र पाठवलं होतंस ते वाचताच क्षणी मला जो दिलासा मिळालाय त्याबद्दल तुझ्याशी समक्ष भेटून बोलल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं म्हणूनही आलोय. “

“नाना गेल्याचं समजलं तेव्हा तू न् आरती दोघेही माझ्या आईला भेटायलाही गेला होतात ना? आईनं सांगितलंय मला. “

“हो. त्यावेळी खूप कांही सांगत होत्या त्या मला. विशेषत: तुझ्याबद्दलच बरंचसं… “

“आईपण ना… ! माझ्याबद्दल काय सांगत होती?”

“माझ्या बाबांसारखी

तुलाही वाचासिद्धी प्राप्त झालीय असं त्या म्हणत होत्या. “

ती स्वत:शीच हसली. मग क्षणभर गंभीर झाली.

“माझी आई भोळीभाबडी आहे रे. तिला आपलं वाटतं तसं. बोलाफुलाला गाठ पडावी असेच योगायोग रे हे. बाकी कांही नाही… “

“माझे बाबाही असंच म्हणायचे. पण ते तेव्हढंच नव्हतं हे तू स्वत:ही अनुभवलंयस”

तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. काय बोलावं तिला समजेना. मग विचारपूर्वक स्वतःशी कांही एक ठरवल्यासारखं ती शांतपणे म्हणाली,

“आईनं तुला जे सांगितलं ते योगायोगाने घडावं तसंच तर होतं सगळं. ते ज्यांच्या बाबतीत घडलं ते आमचे नाना आणि माझा मोठा भाऊ आण्णा यांच्यासंबंधातलं. जायच्या आधी नाना आठ दिवस खूप आजारी होते. तब्येतीच्या बाबतीत चढउतार सुरूच असायचे. मुद्दाम सवड काढून असंच एकदा आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो. पण तेव्हा ते पूर्णतः ग्लानीतच होते. आम्ही येऊन भेटून गेलोय हे त्यांना समजलंही नाहीये ही रुखरुख तिथून परत येताना माझ्या मनात रुतूनच बसली होती जशीकांही. मला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अंथरुणाला पाठ टेकली की मनात विचार यायचे ते नानांचेच. ते कसे असतील? ते बरे होतील ना? हे असेच सगळे. त्यादिवशी रात्री डोळा लागला होता तोही याच मानसिक अस्वस्थतेत. आणि खूप वेळाने जाग आली ती डोअरबेल वाजल्याच्या आवाजाने. हे घरी नव्हते. कांही कामासाठी परगावी गेले होते. ते परत यायला अद्याप एक दोन दिवस अवकाश होता. तरीही तेच आले असतील कां असं मला वाटलं न् बेल दुसऱ्यांदा वाजली तशी मी पटकन् उठलेच. दार उघडून पाहिलं तर दारात नाना उभे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…

“नानाs, तुम्ही.. ? असे एकटेच.. ? बरे आहात ना?.. “

“हो अगं. काल वाडीला दर्शनाला आलो होतो. आज परत जायचंय. जाण्यापूर्वी तुला भेटून जावं असं वाटलं म्हणून आलोय. “

“बरं झालं आलात. बसा हं. मी पाणी देते न् चहा करते लगेच. “

“एs.. तू बस इथं. मी तुला भेटायला आलोय. चहा प्यायला नाही. मला जायचंय लगेच.. “

मी थोडावेळ बसले. बोलले त्यांच्याशी. मग चहा करायला म्हणून उठले. आत जाऊन पाण्याचं तांब्याभांडं घेऊन बाहेर आले तर नाना तिथं नव्हतेच. दार सताड उघडंच. मला भास झाला कीं स्वप्नच हे?.. असा विचार मनात आला तेवढ्यांत फोनची रिंग वाजली. फोन आण्णाचा.. मोठ्या भावाचा होता. नाना नुकतेच गेलेत हे सांगणारा.. !!

पहाटेचे पाच वाजले होते. ऐकलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.. ! सोफ्याचा आधार घेत कशीबशी खुर्चीवर टेकले.

ते स्वप्न नव्हतं. तो भासही नव्हता. नाना खरंच आले होते. त्यांची भेट न झाल्याची त्या दिवशीची माझ्या मनातली रूखरुख कमी करण्यासाठी ते जाण्यापूर्वी खरंच इथे येऊन मला भेटून गेले होते. हे एरवी कितीही अशक्य, असंभव, अविश्वसनीय वाटेल असं असलं तरी माझ्यापुरतं हेच सत्य होतं! नाना जाताना मला भेटून लाख मोलाचं समाधान देऊन गेले होते हेच माझ्यासाठी ते गेल्याच्या दु:खावर फु़ंकर घालणारं होतं.. !!”

मी भारावल्या सारखा ऐकत होतो.

“आणि.. तू आण्णाच्या दीर्घ आजारपणात त्याला दिलेल्या औषधाने तो झटक्यात बरा झाला असं तुझ्या आई सांगत होत्या त्याचं काय?तो चमत्कार नव्हता?”

“नाना गेले त्याआधीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीची ती गोष्ट. मी अशीच नानांनाच भेटायला माहेरी गेले होते. तेव्हाच्या गप्पांत आईनेच आण्णाच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. ते आजारपण वरवर साधं वाटलं तरी आण्णासाठी मात्र असह्य वेदनादायी होतं. दुखणं म्हणजे एक दिवस त्याच्या हातापायांची आग व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती अंगभर पसरली. डॉक्टरांची औषधं, इतर वेगवेगळे उपाय सगळं होऊनही गुण येत नव्हता. तो रात्रंदिवस असह्य वेदनांनी तळमळत रहायचा. आईकडून हे ऐकलं त्याक्षणी मी थक्कच झाले. कारण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. ते असंबध्दच वाटलं होतं तेव्हा पण ते तसं नव्हतं जाणवताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.

“आई, तुला खरं नाही वाटणार पण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नांत आण्णा माझ्या घरी आला होता. त्याला काय त्रास होतोय ते सगळं अगदी काकुळतीने मला सांगत होता. ‘कांहीही कर पण मला यातून बरं कर’ असं विनवीत होता. मी त्याला दिलासा दिला. ‘माझ्याकडे औषध आहे ते लावते. तुला लगेच बरं वाटेल’ असंही मी म्हटलं. परसदारी जाऊन कसला तरी झाडपाला घेऊन आले. तो पाट्यावर बारीक वाटून त्याचा लेप त्याच्या सगळ्या अंगाला लावून घ्यायला सांगितलं आणि तो लेप लावताच आण्णा लगेच बराही झाला… ” मी हे सगळं आईला सांगितलं खरं पण तो झाडपाला कसला हे मात्र मला आठवेना. त्यांना काटेही होते. ती पानं चिंचेच्या पानासारखी होती पण चिंचेची पानं नव्हती कारण चिंचेच्या झाडाला काटे नसतात. तिथून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि हे दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी नित्यदर्शनासाठी नृ. वाडीला जाऊन परतीच्या वाटेवर आम्ही नेहमी पाच मिनिटं एका पारावर बसायचो तसे बसलो. बोलता बोलता हाताला चाळा म्हणून त्या पारावर पडलेल्या वाळक्या काड्या उचलून मी मोडत रहायचे. त्यादिवशीही तसं करत असताना बोटाला एक काटा टोचला. पाहिलं तर त्या काडीवरचा वाळलेला पाला चिंचेच्या पानांसारखाच दिसला. मी नजर वर करून त्या झाडाकडे पाहिलं. ते शमीचं झाड होतं. शमी औषधी असते हे ऐकून माहित होतं म्हणून मी आण्णाच्या घरी फोन करून वहिनीशी बोलले. रोज शमीचा पाला वाटून त्याचा लेप लावायला सांगितलं. ती रोज तो लेप आण्णाला लावू लागली आणि तीन दिवसांत त्याचा दाह पूर्ण नाहीसा झाला. ” लिलाताई म्हणाली.

सगळं ऐकून मी पूर्णत: निश्चिंत झालो.

“लिलाताई, मला दिलासा देणारा असाच एक चमत्कार माझ्याही बाबतीत घडलाय. “

“कसला चमत्कार?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तू मला पाठवलेलं ते सांत्वनपर पत्र हा चमत्कारच आहे माझ्यासाठी. ” मी म्हंटलं. तो कसा ते तिला सविस्तर समजावून सांगितलं.

” समीरचा आजार असा बरा होण्याच्या पलिकडे गेला होता‌. ते आमच्या घरीही माझ्या खेरीज कुणालाच माहित नसताना तुला नेमकं कसं समजलं? याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होऊन परत येण्यासाठी देवाघरी गेलाय यावर विश्वास ठेव’ असं तू लिहिलं होतंस. आठवतंय? हे अशाच शब्दात लिहिण्याची बुद्धी तुला कशी झाली ही उत्सुकता आहे माझ्या मनात. “

हे सगळं ती भान हरपून ऐकत होती. मी बोलायचं थांबलो तशी ती भानावर आली. शांतपणे उठली आणि आत गेली. ती येईल म्हणून मी वाट पहात राहिलो. मग उठून उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर ती देवापुढे हात जोडून बसलेली आणि तिच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते न समजून मी खाल मानेनं बाहेर आलो. तिची वाट पहात बसून राहिलो. कांही क्षणात ती बाहेर आली. अंगाऱ्याचं बोट माझ्या कपाळावर टेकवलंन.

“तुझ्या डोळ्यांत पाणी का गं? माझं कांही चुकलं कां?”.

“नाही रे. तुझं कांहीही चुकलेलं नाहीय. मी रडत नाहीय अरे, हे समाधानाचे, कृतार्थतेचे अश्रू आहेत. “

“म्हणजे?”

“तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकुळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू आलास, मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्यानं समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरे होण्याच्या पलीकडे गेलेला असल्याचं शप्पथ सांगते मला नव्हतं माहित. ते सगळं ‘मी’ लिहिलेलं नव्हतंच तर. ते दत्तगुरुंनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं हे आज मला समजतंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. सगळं कसं झालं मला खरंच माहित नाही. पण हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा.. !”

सगळं ऐकलं आणि मी पूर्णत: निश्चिंत झालो.

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. मन शांत होतं पण… या सगळ्या अघटीतामागचं गूढ मात्र उकललं नव्हतंच. ते माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून अधिकच गहिरं होत चाललं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

Happy Birthday to – – – – 

आज २४ फेब्रुवारी. मी आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी सगळ्यांच्या खास मित्राला Happy Birthday अशा शुभेच्छा पाठवल्या.

आणि आश्चर्य म्हणजे मित्राकडून लगेच म्हणजे अगदी दुसऱ्या क्षणाला – Thanks a lot. We will always be in touch. Keep smiling all the time. असे उत्तर पण आले.

कोण असेल असा हा आपल्या सगळ्यांचा कॉमन मित्र ? Any guess!

One… two… & three… लक्षात येत नाही ना !

अहो, आपल्या सगळ्यांचा म्हणजे – तरुण स्त्री-पुरुष, लहान मुलं मुली, वयस्कर स्त्री-पुरुष, अगदी तान्ही बाळं, असे सगळे सगळे आणि अशा सगळ्यांना रोज दिवसातून अनेक वेळेला भेटणारा आपला जवळचा मित्र म्हणजे व्हॉट्सअप. त्याचा २४ फेब्रुवारी ला वाढदिवस असतो.

Brian Action आणि Jan Koum यांनी २००९ मधे WhatsApp या मित्राला जन्म दिला. आणि २४ फेब्रुवारीला कॅलिफोर्निया मध्ये त्याचे What’s up असे नामकरण करण्यात आले.

व्हॉट्सअप ला मी शुभेच्छा पाठवल्यानंतर उत्तरादाखल व्हॉट्सअप नी सगळ्यांना सांगण्याकरता एक छोटासा संदेश पण मला पाठवला आणि लिहिले, की – तुमचा संपर्क परिवार खूप मोठा आहे, त्या सगळ्यांना माझा हा संदेश अवश्य पाठवा, हा त्यांच्याच फायद्यासाठी आहे.

व्हॉट्सअप चा संदेश असा आहे – 

सुधीर आणि मित्रहो, माझ्या संपर्कात जरूर जरूर रहा. कुणाला काही महत्वाचे निरोप द्यायचे असतील, काही महत्वाची डॉक्युमेंट्स पाठवायची असतील, काही छान फोटो / व्हिडीओ शेअर करायचे असतील, शुभेच्छा द्यायच्या आहेत, मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत, आमने सामने बोलायचे आहे, किंवा कुणाकडून काही छान माहिती तुम्हाला आली असेल तर ज्यांना ती उपयोगी होईल अशांना ती शेअर करा, वगैरे, अशाकरिता मला अवश्य बोलवा. 24 * 7 तुम्ही क्लिक केलं कि यायला मी तयार आहे.

पण एक सच्चा मित्र म्हणून माझी एक विनंती आहे. तुमची तब्येत छान राहावी / घरच्यांशी घरामधे सगळ्यांशी छान संवाद असावेत, वगैरे, या करता काही पथ्य मात्र आपण अवश्य पाळावीत, अशी माझी विनंती आहे.

ती पथ्य अशी आहेत – कुठलीही गाडी चालवत असाल तर तेव्हा मला बोलवू नका. वॉकिंग करत असाल, ऑफिसचे काम करत असाल, अभ्यास करत असाल, टॉयलेट मध्ये असाल, पूजा करत असाल, जेवत असाल, तर अशा वेळेस मला बोलावू नका. गादीवर आडवे असाल तर मला बोलावू नका, तुमच्याकडे तुम्हाला कुणी भेटायाला आले असेल, तर मला बोलावू नका. कुणाकडून काही माहिती / व्हिडीओ / फोटो तुमच्याकडे आले तर ते धडाधड सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करू नका. कुणाला ते पाठवावेत यावर थोडा विचार करा आणि मगच ते आवश्यक त्या ठिकाणी फॉरवर्ड करा. आणि महत्वाचे म्हणजे मला बोलावण्याचा अतिरेक तर नक्कीच टाळा.

जेंव्हा असा अतिरेक होतो तेव्हा तुम्ही शरीराची काहीही हालचाल न करता एका ठिकाणी तासंतास बसून असता किंवा बेडवर आडवे असता. यामुळे आजार वाढतात, डोळ्यांवर ताण पडतो, आणि रेडिएशन चा त्रास तर वेगळा होतोच.

माझी फेसबुक, गुगल, युट्युब, इंस्टाग्राम या माझ्या मित्रांशी नेहेमीच भेट होत असते. मी वर जे माझे मनोगत मांडले आहेत, तेच त्यांचे पण विचार आहेत. यावर जरूर जरूर विचार करा.

तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळे आपला चक्क एकमेकांशी असा छान आणि वेगळा संपर्क झाला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. माझी “मन की बात” पण मला तुमच्याबरोबर शेअर करता आली. आणि तो एक वेगळाच आनंद पण मला मिळाला.

तुमच्या मित्र मैत्रिणींना / नातेवाईक मंडळींना माझे मनोगत जरूर सांगा. त्यांना नक्कीच त्याप्रमाणे बदलायला आवडेल, अशी आशा करतो. शेवटी – “पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना” हे तर आहेच !

चलो, बाय बाय सुधीर.

तुमचा मित्र – व्हॉट्सअप

मंडळी व्हॉट्सअप नी पाठवलेला संदेश आपल्याच फायद्याचा आहे. आपण सगळे जण यावर जरूर विचार करू आणि अंमलात आणूच आणू. आपल्या सगळ्या ग्रूप्स वर पण जरूर फॉरवर्ड करा.

लेखक : श्री सुधीर करंदीकर

मोबा 9225631100, ईमेल <srkarandikar@gmail. com>

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे

आमच्या आईच्या वयाची (आमची नातवंडं आता रोमँटिक सिनेमा पाहायच्या वयात आलीत) 

तरीही ती आमची लाडकी रोमँटिक हिरोईन.

तिचं नाक नाजुक आणि धारदार होतं?

छे हो नाजूक कसलं, थोडं जाडंच. धारदार तर अजिबात नाही.

तिचे ओठ नाजूक होते?

ते हो नाजूक कुठले आकाराने सुंदर परंतु थोडे जाडेच नाही का? 

जिवणी नाजूक? नाहीच.

डोळे माशा सारखे म्हणजे मीनाक्षी हो! छे ते तसेही नव्हते.

सिंहकटी ? न न् नाही.

मग होतं काय तिच्यात?

आधी तुम्ही ते मासे, त्या चाफेकळ्या त्या गुलाबाच्या पाकळ्या यांचे लोणचे घालून टाका.

सौंदर्याच्या सर्व पारंपरिक कल्पनांना झुगारून देऊन तिने जे आपलंसं केलं

तेच खरं चिरसौंदर्य ठरलं!

ते भावुक, अथांग, काळेभोर डोळे! त्यामध्ये एक खट्याळपणाची झाक!

डोळ्यांचे आणि भुवयांचे विभ्रम!

त्या सुंदर ओठांची मोहक हालचाल! 

त्या नाकाच्या शेंड्यावर बेफिकीरपणाची एक झाक!

त्या भव्य कपाळावरून केस सरकवण्यातील एक वेगळीच विलोभनीयता! 

त्या निरागस चेहऱ्यावरील खोडसाळ हास्य! 

ती अभिनेत्री कधी वाटलीच नाही. तिच्या चेहऱ्यावर जे दिसलं तो अभिनय कधी वाटलाच नाही!

सतत बदलणारे चेहऱ्यावरचे भाव! 

संवादातील आणि गाण्यातील शब्दांना न्याय देणारे ते विभ्रम! ती शब्दांची फेक, आणि त्या शब्दांमध्ये मिसळलेली भावगर्भता!

आमचे काही दोस्त त्या विभ्रमांना अदा असे म्हणत!

परंतु एकदा दाखवलेली अदा पुन्हा परत नाही. सतत नवीन नवीन विभ्रम! 

एकदा सादर केलेली अदा पुन्हा परत नाही, नो रिपीटिशन!

हाता पायांच्या सर्व शरीराच्या हालचालींमधील सहजता, मोहकता! 

 निरागसता, खोडसाळपणा, छद्मीपणा या साऱ्यांचं मिश्रण एका मोहक पद्धतीने सतत चेहऱ्यावर जाणवत राहतं आणि मग तेथून नजर हटत नाही.

मधाळ आणि बालिश या दोन्हीचे अफलातून मिश्रण म्हणजेच 

मधुबाला!!

तिचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्हीचे एकाच दिवशी असणे हा मधुनवनीतशर्करा योगच की! 

तिचा वृद्धापकाळ काळालाही सहन झाला नसावा म्हणून तरुण वयातच तो तिला घेऊन गेला! 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या एका ॲपवर मी एक इमॅजिनेशन टाकली 95 वर्षाची मधुबाला कशी दिसेल? 

पण त्याने उत्तर दिले,

I can’t imagine!

दुसऱ्या एका ॲपला हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला 

आज मधुबाला जिवंत असती तर कशी दिसली असती ? 

त्याने रेखाटलेले चित्र यासोबत मी जोडले आहे.

आज मधुबाला जिवंत असती तर ती 93 वर्षाची असती!

त्या चिरतरुण स्मृतीला वंदन! 

तिच्या आठवांचे सतत मनावर बंधन!

अशी मधुबाला पुन्हा न होणे!!!

म्हणूनच वसंत बापट त्यांच्या कवितेत म्हणाले होते 

मधुबाला ती मधुबाला!

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव.

– – गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते.

त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.

आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे..

 

महाराष्ट्रात होता एक भाग… “मुंबई” त्याचं नाव… 

मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले की इथलेच होऊन राहत होते.

“अतिथी देवो भव… !” या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू लागली.

“अतिथी” जास्त आणि “यजमान” कमी झाले.

मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.

सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. – – मराठी आपली वाटत नव्हती.

 

प्रश्न मोठा गहन होता, पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

त्यांना एक युक्ती सुचली… दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली.

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील.

सर्वांचाच, अगदी “महाराष्ट्राचा” ही विकास होईल,

म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.

आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली.

…. मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना.. मराठी कोणीच बोलेना.. बोलीभाषा ही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला… शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.

 

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर.. माफ करा हं… आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं…..

…. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.

त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

 

इतक्यात त्या मुलानं विचारलं,

“Which language is this? “

 

‘मम्मी’ खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,

“अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस “मराठी भाषा” प्रचलित होती;

आता कोणी नाही ती बोलत. ” 

 

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण – –

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं… कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!

 

महाराष्ट्राची शान “मराठी” भाषा!

मला एकाने विचारले “ तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतोस? “

आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं – – 

 

– – “ आमच्या घरात “तुळस”आहे, ‘Money plant’नाही.

आमच्या स्त्रिया “मंदिरात” जातात, ‘PUB’ मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.

आम्ही “मराठी” आहोत, आणि मराठीच राहणार !

तुम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही. ” 

 

अरे गर्व बाळगा तुम्ही – – मराठी असल्याचा.

“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेते

‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.

“भाऊ” ‘Bro’ झाला… !!

आणि “बहीण ” ‘Sis’… !!!

दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’ झाली.

घरची “भाकर” आता कशी आवडणार हो.. ५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली.

 

मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय…. आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा… 

*आजपासूनच शक्‍यतोवर मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया. *

 

आज २७ फेब्रुवारी.. आज मराठी भाषा दिवस आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.

जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे.

माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो !

जिभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं, कठीणातलं कठीण काम आहे

मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते.

कुणाला ती घायाळ करते,

तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.

तिच्यातून अमृत झरते,

तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.

जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात, तसेच काटेही उगवतात.

अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. कटू, पण त्रिकाल सत्य…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगणे व्हावे गाणे… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ जगणे व्हावे गाणे… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘जगणे व्हावे गाणे’! जगणे आणि गाणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. गाण्याशिवाय जगण्याला अर्थ नाही आणि जगण्याशिवाय गाण्याला! जगताना जो ताल, सूर आपण अनुभवतो तोच गाण्याची संबंधित केला की त्याला योग्य असे गाणे आपल्या ओठावर येते. आपल्या मूड प्रमाणे आपण गाणे गुणगुणतो, आवाज चांगला असेल तर गातो, किंवा नसेल तर फक्त ऐकतो! आपल्या मनात त्या गाण्याच्या सूरांचे प्रतिसाद उमटत असतात. आपण आनंदी मूडमध्ये असलो तर आपोआपच लतादीदींची ” ‘आनंदी आनंद गडे’ किंवा’ माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे.. ‘ अशा प्रकारची गाणी आठवतात.

पण तेच एखादी दुःखद घटना घडली की मनात “जन पळभर म्हणतील हाय हाय.. ” यासारखे अर्थपूर्ण गाणे आठवते किंवा मुकेशची दुःखी हिंदी गाणी आठवतात! गाणं आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाशी निगडित असते. ज्याला गाणं आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच! कोणी मराठी, कोणी हिंदी गाणी ऐकत असेल तर कोणी भक्ती गीते, भावगीतांचा प्रेमी असेल तर कोणाला उडत्या चालीची गाणी आवडत असतील! एखादा लताचा फॅन असेल तर दुसरा आशा भोसले किंवा सुमन कल्याणपुरचा! याशिवाय अनेक गायक गायिकांचे फॅन ही असतातच!

काहींना जुनी गाणी आवडतात तर काहींना नवी गाणी आवडतात. काहींच्या मते गाण्यात जुने-नवे असे नसतेच. गाण्याचा सूर महत्वाचा!चाल चांगली पाहिजे!

आपल्या गायनाच्या आवडी विविध प्रकारच्या असतात. एखाद्याला एखाद्या गायक-गायिकेचे इतके प्रेम असते की, तिचे/त्याचे नाव त्याच्या घरावर, गाडीवर कुठेही लिहिलेले आढळेल! असा एक आमचा परिचित आहे सुद्धा की, तो फक्त ” आशा ” प्रेमी आहे! तिच्या गाण्यातच त्याचे ‘जगणे’ चालू असते. विरह गीते ऐकणाऱ्यांचा वर्ग वेगळाच असतो! बरेचदा तो त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असा विषय हे असू शकतो. एखाद्याला हलकीफुलकी गाणी आवडतात तर एखाद्याला फक्त जुनी गाणी आवडतात. पूर्वीच्या काळी रेडिओ हेच हिंदी, मराठी गाणी ऐकणाऱ्यांसाठी साधन होते. त्यापूर्वी ग्रामोफोन वापरला जाई पण असे हे ग्रामोफोन बहुतेक सधन वर्गाकडेच असत!

एक काळ असा होता की घरात रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर प्रत्येकाकडे नसे. पण हॉटेलमध्ये असणाऱ्या टेप रेकॉर्डर वर विशिष्ट गाणे लावण्यासाठी काही पैसे देऊन ते गाणे लावायला सांगितले जात असे. बरेचदा इराण्याच्या हॉटेलवर हा व्यवसाय चालत असे.

 बालगंधर्वांच्या काळामध्ये त्यांची गाणी ऐकत जगणारा एक मोठा वर्ग होता! दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीत ऐकणे हेही गाण्याच्या चाहत्यांचे स्पेशल दालन असे. संगीत नाटके बघणे आणि त्यातील पदे ग्रामोफोनवर ऐकणे ही एक सुसंस्कृत समाजात असलेली एक आवड होती..

आणि ही गोष्ट अर्थातच मोठेपणा ची समजली जाई..

 पुढे रेडिओ आला आणि विविध प्रकारची गाणी वेगवेगळ्या वेळी रेडिओवर ऐकायला मिळू लागली. सकाळी भक्ती गीते, नंतर मराठी चित्रपट गीते यावर लोकांचे टाईम टेबल बनू लागले.

हिंदी गाण्यांमध्ये बिनाका गीतमाला, सांज गीते या सारखे कार्यक्रम फेमस झाले!

एक तारखेला ‘खुश आहे जमाना आज पहिली तारीख है ‘या गाण्याने सकाळच्या जुन्या हिंदी गाण्यांची सुरुवात झाली की मन खुश होत असे! टेप रेकॉर्डर आला आणि गाण्याच्या शौकिनांना एक नवीन विश्व सापडले! एकच गाणे अनेक वेळा आवडीप्रमाणे ऐकायला मिळू लागले. यासंबंधी माझी एक आठवण माझ्या मिस्टरांच्या गाण्याच्या आवडीशी निगडित आहे. त्यांना “उगवला चंद्र पुनवेचा” हे बकुळ पंडित यांनी गायलेले गाणे इतके आवडत असे की, पौर्णिमा जाऊन अमावस्या उगवली तरी त्यांच्या टेपवर हे गाणे वाजतच असे!

जगण्याशी गाण्यांचा इतका निकटचा संबंध असतो की त्या आपल्या आवडीवर प्रत्त्येकाचे जगणे चालू असते!

बालपणी ऐकलेली “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” किंवा “सांग सांग भोलानाथ ” यासारखी गाणी अजूनही लहान मुलांना आवडतात आणि ती आयुष्यभर लक्षात राहतात. तरुणपणात चंद्राची गाणी किंवा प्रेमाची गाणी ऐकणे तरुणांना आवडते तर प्रौढ लोकांना सुधीर फडके यांची गाणी मोहात पाडतात. असा हा ऐकिव गाण्यांचा काळ संपला आणि टीव्ही आला. तेव्हा जगणे आणि गाणे अधिकच जवळचे झाले. टीव्हीच्या वेळेनुसार आपल्या आवडत्या गायक गायिकांना टीव्हीवर बघत आपण गाण्याचा आस्वाद घेऊ लागलो. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत टिव्ही आला आणि गाण्यांची दुनिया अधिकच रंगीबेरंगी झाली. ‘ “बागो मे बहार है” म्हणत फिरणारी राजेश खन्ना आणि शर्मिला जोडी बघताना नजरेला जीवन अधिकच रंगीबेरंगी वाटू लागले. ‘जगणे व्हावे गाणे’ अशी रंगीत स्वप्नं डोळ्यासमोर येऊ लागली.

अशावेळी अमोल पालेकर चा “रजनी गंधा” आठवतो. मध्यमवर्गीय तरुण गाण्यातच आपल्या प्रेयसीला कसा शोधत असतो त्याचे मनमोहक चित्रण ‘रजनीगंधा ‘या सिनेमात आहे. जगण्याशी गाण्याचे नाते अतूट आहे आणि ते प्राचीन काळापासून आहे. गाण्याच्या मैफिलीतून गाणारे जुने गायक जीव ओतून गाणे गात की जे मनाला जाऊन भिडत असे.

या संबंधीची तानसेन यांची गोष्ट आपल्या ला माहिती आहे. त्यांच्या गाण्याने पशू, पक्षी जवळ येऊन गाणे ऐकत तर विशिष्ट राग -मल्हार गायल्या वर पाऊस ही पडत असे!

ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर, टीव्ही, मोबाईल अशी विविध साधने दुनियेत आली आणि जीवन गाणे अगदी घरात येऊन थांबले! गाणं नसेल तर जीवन नाही अशीच परिस्थिती आली!

आता तर कानामध्ये बड्स(buds) घालून मुले गाणी ऐकत गाड्या चालवतात, काम करतात आणि अभ्यासही करतात.. माझ्या नातीला ती जर गाणं ऐकत अभ्यास करत असेल तर मी जरा रागावते, “अगं, गाणं ऐकत तुझं अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित होणार?” तर ती म्हणते, “आजी, गाणं ऐकतच माझा अभ्यास चांगला होतो आणि गणित लवकर सुटतात!” तर अशीही गाण्याची जादू!

गाण्याचा उपयोग नाटकांतून ही चांगला केला गेला. बालगंधर्वा सारख्या गायकांनी गाण्याला नाटकात प्रतिष्ठा मिळवून दिली.

अलीकडे तर गायन हे काही आजारांवर एक थेरपी म्हणून वापरले जाते, तर प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारच्या गाण्यांची सुरावट ऐकली तर त्याचा गर्भावर परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच ‘गर्भसंस्कार’ करण्यासाठी गायन कलेचा उपयोग होतो!

काही लोकांना गाण्याचे हे महत्त्व कळत नाही. ती केवळ “रडगाणी”च गात राहतात. हाही गाण्याचा एक प्रकार! कितीही चांगली परिस्थिती असली तरी सतत तक्रार करायला, रडायला यांना आवडते त्यांच्या जीवनात रडण्याचीच संगत असते! अशी माणसे सोबतीला नको वाटतात.

गाणं जगण्याला अधिक सुसह्य करतो आणि जगणे आनंदमय करते! असा हा जगणं आणि गाणं याचा निकटचा संबंध असतो.. अशावेळी मला लतादीदींचे गाणे आठवते, ” माझे जीवन गाणे…, गाणे.., व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, गाती एकच गाणे, गाणे, माझे जीवन गाणे, गाणे!’ तर असं हे गाणं! गाण्याने जीवन समृद्ध बनते. आणि जगणं हे सुरमयी बनते! जगणं आणि गाणं या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत ज्यात आपल्याला मनापासून आनंद मिळतो!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माघ—महाशिवरात्र… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

☆ माघ—महाशिवरात्र☆ सौ शालिनी जोशी

विश्वच ज्याचे नृत्यालय

लिला करी उत्पत्तिलय

नटराज शोभे नाव

तोच शिव शंकर महादेव॥ 

भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र दिवस म्हणजे माघ वद्य चतुर्दशी. या दिवशी शिव म्हणजे महादेव यांची भक्ती भावाने पूजा व उपासना करतात. शिवलीलामृत, शिवमहिम्न, रुद्र अशा ग्रंथांचे पारायण करतात. मूर्तीला अभिषेक करतात. बेल व धोत्र्याचे फुल वाहतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी व इतर शिवमंदिरात जत्रा भरतात. या पूजेमागे काही कथा सांगितल्या जातात.

त्यातील एक पौराणिक कथा-

समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून विष बाहेर निघाले. पृथ्वीचा नाश करू पाहणारे ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह झाला. देह काळा पडला. वैद्यानी रात्रभर जागरणाचा उपाय सांगितला. तेव्हा सर्व देवानी रात्रभर जागरण व नृत्य केले. शंकराने तांडव नृत्य केले. म्हणून आजही महाशिवरात्रीच्या रात्री जागर केला जातो. म्हणून ही चतुर्दशीची रात्र महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते.

अशीच आणखी एक पौराणिक कथा-

एक पारधी सावज शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला तरी त्याला शिकार मिळाली नाही. एक हरीण पाणी पिण्यासाठी आले. पारधी बाण सोडणार इतक्यात ते हरीण म्हणाले,’ मी माझ्या कुटुंबीयांना भेटून त्यांचा निरोप घेऊन येतो’.पारधी ‘हो’ म्हणाला. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. व झाडाखाली शिवपिंड होती. पारध्याने सहज नकळत किंवा सावज स्पष्ट दिसावे म्हणून बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली. ती पाने शिवपिंडी वरती पडली. नकळत का होईना पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आले. त्याच्या बरोबर त्याचे कुटुंबही आले. प्रत्येक जण ‘मला मार, मला मार’ असे पारध्याला विनवू लागला. ते पाहून पारध्याच्या मनात त्यांच्या विषयी दया उत्पन्न झाली .प्राणी असूनही हरणे आपले कर्तव्य विसरत नाहीत. मी ही माझ्या मानवता धर्म, दया धर्म पाळला पाहिजे. त्यांने त्या सर्वांना जीवदान दिले. हे पाहून शिवशंकर सर्वांवर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना कृपा प्रसाद दिला. त्या हरणाला मृगनक्षत्र आणि पारध्याला व्याध म्हणून आकाशात नेहमी करता स्थान दिले.तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशीच शिवाची कृपा सर्वांवर व्हावी म्हणून ही शिवाची उपासना .

शिवपार्वतीच्या विवाहाचा हा दिवस असेही म्हणतात. भगवान शिव हे आदि गुरु त्यांच्या पासून योग परंपरा निर्माण झाली. योग विज्ञान उगंम पावले .हजार वर्षे ध्यान केल्यावर ते स्थिर बनले, तो हा महाशिवरात्रीचा दिवस. म्हणून योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून बघतात.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares