मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय माऊली मराठीस… लेखिका : सुश्री वैशाली ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ प्रिय माऊली मराठीस… लेखिका : सुश्री वैशाली ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

प्रिय माऊली मराठीस

माझा मनोमन दंडवत!

आज मराठी भाषा दिन आहे. खरं म्हणजे तू श्वासातच इतकी भिनलेली आहेस की तुला वेगळं काढून एखादा दिवस तुझी गाणी गावीत असं शक्यच नाही. पण असो. श्वास आजन्म घेतला तरी प्राणायामातून घेतलेल्या श्वासानं जसं निर्मळ वाटतं, श्वासाचं खरं मूल्य समजतं तसंच तुझ्याबाबतीत आहे.

आज असंच तुझ्याशी शिळोप्याचं काही बोलावंसं वाटलं. बघितलंस? शिळोप्याच्या गप्पा… किती दिवसांनी वापरला हा शब्द! अगं तो वापरावा इतका वेळच नसतो आणि आता ज्येष्ठ वयात शिळोप्याचं बोलावं तर आहेच कोण रिकामं? मग वाटलं तू आहेस की. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडंसं स्मरणरंजन करावं.

आई, आज ना मला जुन्या स्वयंपाकघरात जाऊन तुला शोधावंसं वाटतंय. आमच्या नव्या किचनमध्ये तू आगदीच मला गरीब वाटायला लागलीयस.

बघ ना, चूलपोतेरे, सांडशी, ओगराळं, उभे लावून रांधप करणं. (अगं, माझ्या नातवंडांनी उभे लावून म्हटल्यावर आ केला. तेव्हा समजावून सांगावं लागलं, बाबांनो, उभेलावणं हा सोवळ्यातल्या स्वयंपाकाचा गणवेश होता. आडजुनं (म्हणजे अगदी पार फाटलेलंही नाही आणि सरसकट नेसायच्याही अवस्थेतलं नाही असं लुगडं अंघोळीनंतर घट्टमुट्ट कासोटा घालून, दोन्ही खांद्यांवरचा पदर पोटाशी खोचून गृहीणी रांधप करायच्या. नंतर सावकाशीनं नेहमीचं लुगडं चोळी परिधान करायची,) बघ शब्द शोधताना त्याच्या संदर्भसंदुकीही उघडाव्या लागतात.

तर, आता कुटणे, वाटणे, निपटून घेणे, चिरणे, परतणे, फोडणीस टाकणे, आधण, वैरणे, लाटणे, थापणे, वळणे या सगळ्यासाठी एकच… ‘बनवणे. ‘ चहासुद्धा बनवतात. जेवण बनवतात.

शिजवलेल्या अन्नाला स्वयंपाक म्हणतात, ताटात वाढलेल्या अन्नाला जेवण म्हणतात. हे विसरलोय आम्ही.

शकुंतला भांडं, पेढेघाटी डबा, फिरकीचा तांब्या, ताकाचा कावळा (चोच असलेलं झाकणाचं भांडं) गडवा (म्हणजे छोटा उभट तांब्या) वेळणी (म्हणजे पसरट थाळी.. पातेल्यातला भात थेट पानात वाढण्याची पद्धत नव्हती. तो वेळणीत घेऊन उलथन्याच्या टोकाने अगदी शिस्तशीर पंगतीत वाढायचा. ) कर्म माझं… पंगत पण शोधावी लागेल.

मिसळणाचा डबा, मिठाची दगडी, थारोळ्यावर ठेवलेलं दूध, शिंकाळं, पळीवाढं, अंगासरशी रस्सा…

तुपाची खरवड, शि-याची, पिठल्याची किंवा भाताची खरपूस खरपुडी काय काय आठवू?

न्याहारी, माध्यान्ह भोजन, वैश्वदेव, आपोष्णी, आंचवणे यांनाही हल्ली गाठोड्यातच बांधलंय.

पदार्थात मीठ तिखट मिसळत होतो. आता अॕड करतो. भाज्या चिरत नाही. कट् करतो.

तुझ्यात घुसखोरी करणारे हे शब्द आमच्या पिढीला खटकतात गं. पण तू बाई, उदार आहेस हो. सामावून घेतेस सगळ्यांना.

समजावतात काहीजण की, मनातल्या भावना पोचवू शकते ती भाषा. भाषिक आग्रह सोडला तर तळागाळातून संवेदनशील माणसं मोकळेपणे व्यक्त होऊ शकतात. त्यांना काय सांगायचंय ते कळलां म्हणजे पुरे.

काळानुसार झालंय खरं तसं.

पण सांगू का?

तू मुळातच डौलदार, सौष्ठवपूर्ण आणि श्रीमंत आहेस. काही दागिने आता कालमानानुसार कालबाह्य झालेले असले तरी आपल्या संतांनी आपल्या अभंगात, साहित्यिकांनी त्यांच्या प्रातिभ आविष्कारात, आपल्या वेल्हाळ मालणींनी त्यांच्या लोकगीतांत तुला सजवून ठेवलेलं आहे. तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमचीच आहे. हेच तर आजच्या दिवशी स्वतःला बजावायचं आहे.

मन ओतलं तुझ्याजवळ. खूप हलकं वाटलं बघ.

येत राहीन अशीच तुझ्या उबदार कुशीत.

सारस्वत माये, तुझी कन्या..

वैशाली.

लेखिका : सुश्री वैशाली 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाय फाय बालपण… भाग – ३ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ वाय फाय बालपण… भाग – ३ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता. _ – इथून पुढे —- 

उशिरा येऊन झोपणार आणि लवकर उठून जाणार. तो एका कोपऱ्यात शेवटी झोपत असे. उठून गेला की त्याची चादर व त्याच बेडशीट तसाच टाकून जात असे. हे त्याच बरेच दिवस चालले होतं. एकेदिवशी राजाने मजा करायची ठरवली. सगळीजण लवकरच झोपेच सोंग घेतलं. ट्यूबलाईट विझवली. दरवाजा नुसतं पुढ केला. कल्याणी लाईट बंद आहे बघून आला. त्याने दरवाज्याला कडी लावलं. खालच्या पायाच्या अंगाने सरकत आला. व जोरात अंग अंथरुणात अंग टाकून दिलं. तसा जोरात किंकाळ्या मारत उठला. तस पक्याच्या पायाजवळ लाईट बटन होते, त्यांनी लाईट लावली. सगळी हसत हसतं उठले. कल्याणीला मात्र अंथरुणात लपवलेले खडे दगड जोरात टोचली होती. नंन्तर पक्क्याने त्याला ताकीद केली, तुझं अंथरून तुझं तू काढणे. चादर घडी घालून ठेवणे.

असेच एक दिवस सगळी रात्री झोपले होते. सागऱ्या रोज सकाळी उठल्यावर म्हैस चारायला मोती तळयावर जात होता. जाता जाता पाण्याचा लोटा घेउन जात असे. एके दिवशी रात्री तो सोप्यात येऊन लवकर झोपला. आम्ही सगळी मजा म्हणून.

चुना पातळ केला, कोळसा पण पाण्यात उगाळून त्याच्या चेहऱ्यावर राक्षसचे चित्र कोरले त्यावर सोनकांवाने लाल ठिपके पण दिले. झालं हे महाशय उठल्यावर नेहमी प्रमाणे म्हैस सोडली. आणि हातात लोटा. हे ध्यान चावडीवरुनं जाताना सगळेच लोक बघू लागले व फिदी फिदी हसू लागले. असं जवळ पास दोन तास चालले होते. त्यात आमची रात्रीची झोपणारी मुलं होती. मुद्दाम बाहेर काय चाललंय बघण्यासाठी मोती तल्यावर गेले व लांबून नजारा बघत फिदी फिदी हसतं परंतु लागले. झाले परत हे ध्यान घरी आल्यावर त्याचीच आई बघून हसू लागली. गल्लीत पण सगळे हसतं होते. शेवटी नं राहवून त्याने आरसा बघितला. गरम पाण्याने तोंड धुवून घेतले. ते तडक आमच्या घराकडे आला. पण घरात कोणीच दिसलें नाही. आम्ही परस दारी मुद्दाम बसलो. ते ध्यान परत घरी फिरले. मग आम्हाला पण हसू आवरले नाही.

दिवस उन्हाळ्याचे पाण्याचे हालं होतं होते. जो तो उठला की घागरी घेउन पाणी भरण्यासाठी जाऊ लागला. अडाचे खार पाणी खर्चाला. आणि प्यायचे पाणी दवाखान्याच्या विहिरीचे. हा सरकारी दवाखाना पार गावापासून दीड किलोमीटर लांब. पण नाईलाज होता. गावात चहुकडे हेच चित्र होते. पाणी भरले की अकरा वाजता न्याहरी. शिळ्या भाकरी दही चटणी काय असेल ते खाऊन, पोहायला विहीरवर. चांगले दोन तीन तास पाण्यात उड्या मारून, तिथे पण शिवाशिवीचा खेळ रंगत असे. गावातील सगळी मुलं विहिरीवर. कोण शिकणारा, कोण शिकवणारा असं चालेल असे. घरात अंघोळ केली की परत दोन बार्डी पाणी वाया जायला नको म्हणून घरात पण काही बोलत नसतं. पोहून आले की जेवण व दुपारी पत्ते कुटणे किंवा चिन्नी दांडू.

उन्ह वाढत चाललेल. उष्मा व घामाच्या धारा, घरातील उन्हाळी कामे चालूच होती.

पाणी भरणे, म्हसर चरयाला सोडणे. येताना शेतातून कडबा वैरण आणणे. दुपारी खेळ. संध्याकाळी फिरायला जाणे. चिकोडी रोडवर एक स्वामी आलेले. वय झालेलं. अंगाने कृष व सावळे, लहान मूर्ती होती. म्हूणन त्यांना मरी बाबा म्हणत असतं. मरी म्हणजेच कानडीत लहान बाबा. भाविक त्यांना येऊन रोज नमस्कार करीत. आणि आपले गाऱ्हाणं सांगत. त्याप्रमाणे त्यांना उपाय पण स्वामी सांगत असतं. लोक त्यांना मानत असतं.

आम्ही पण रोज संध्याकाळी फिरायला गेलो की नमस्कार करून. त्यांना सगळेच एकच प्रश्न विचारत होतो. बाबा आम्ही परीक्षेत पास होऊ का. त्यावर ते होणारच असं उत्तर देत. संध्याकाळी गार वारा सुटला की, आम्ही तो अंगावर मनसोक्त घेत असू. येताना वरच्या बस स्टॅन्ड जवळ, कोठारी यांची ऑइल मिल.

त्यात सरळ आत घुसून शेंगतेल कस काढल जात असे ते रोज बघत होतो. शेंगदाणे पण खाऊन, आवर्जून गरम पेंड पण खात होतो. ति खायला गोड आणि तेलकट लागतं होती.

तसेच मिरज रोडला एकमेव स्लॅब असलेली इमारत होती. त्याचा जिना बाहेरून असल्यामुळे, आम्ही त्या टेरेस वर जाऊन गार वार अंगावर घेत असूत. इमारतीत निलगिरी तेल, कांही औषधी तयार होतं असतं.

घरात आले की मग गाण्याच्या भेंड्या, गावाच्या नावच्या भेंड्या खेळत असू. उन्हाळ्यात रात्री आमच्या अंगणात चांदणी भोजन होतं असे. प्रत्येक जण घरातून ताट वाढून घेउन येत असे. नाही म्हणायला, घरातून आम्ही पाणी, लोणचे चटणी आंबील आणि ताक मधो मध आणून ठेवलेले असणार. ज्यांना जे पाहिजे ते ताटात वाढून घेत असे. अंगत पंगत चांदणी भोजन झाले की, अंगणातच सगळी झोपत होतो. त्यामुळे आम्हाला उन्हाळा जाणवत नसे.

उन्हाळ्यात शेंगाचे बी तयार करण्यासाठी शेंगा फोडायला सगळेच मित्र जमत. सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत हे काम चार दिवस चालत असे.

मापट्याला पाच पैसे, त्यावेळी मिळत असे. शिवाय दुपारी भडंग आणि चहा सुद्धा. पण कोणीच मित्र मंडळी कंटाळा करीत नसतं. घरचेच काम काम समजून ते नेटाने पार पडत असे. वर त्यांना पैसे ही मिळत असतं.

घरची शाखारणी करावी लागे. घरे ही कौलरू असल्यामुळे वर्षाला, पावसाळ्या आधीच हे काम होतं असे. बघता बघता रिझल्ट लागे. आणि सगळेच पास होतं असू. वर्षे भरभर निघून गेली. आम्ही सातवी पास झालो. आमच्या वेळी ही बोर्डाची परीक्षा असे, फायनल व्हरनाकुलर म्हणत.

1972 ला आम्ही सहावी पास झालों आणि पाण्याचे दुरभीक्ष. दुष्काळी दिवस चालू झालेले. पाऊस सतत दोन वर्षे पडला नाही. गावात दुष्काळी कामे चालू झालेली.

रोजगारसाठी लोक धडपड करीत रानो माळ भटकंती करत होते. सुखडी वाटली जाऊ लागली. शेति ओस पडलेली. बंडिंगचे काम चालू झाले. विहिरीनी तळ गाठलेला. प्यायला पाणी मिलने अवघड झालेले. पाच किलोमीटर वरुनं प्यायला पाणी आणावे लागे. घरे रिकामी पडू लागली. पीक पाणी नव्हतेच. लोक घरातील धान्य जपून वापरू लागले. दिवस रात्र लोक पाण्यासाठी भटकंती करत होती. काही विहिरीत रात्री दोन वाजता घागर भरत असे. लोक उठून रात्री दोन वाजता पाणी भरत. आमचं टोळक त्यात पुढे असे. रात्री दोन पर्यंत पत्ते कुटायचे. दोन नंन्तर विहिरीवर जाऊन पाणी भरायचे. घरी त्यासाठी सगळ्यांना मुभा दिली जायची.

कारण परिस्थिती बिकट होती.

— समाप्त —

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘कृतीला गतिमान करा…’’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कृतीला गतिमान करा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(आंतरराष्ट्रीय महिला दिवस- ८ मार्च २०२५ या निमित्ताने) 

नमस्कार प्रिय मैत्रांनो!

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।” 

(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात. ) या ओळी आपण सर्वजण प्राचीन काळापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत. हा श्लोक चिरंतन आहे, अर्थपूर्ण आहे अन म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच महत्वाचा आहे.

८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (या साठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).

मंडळी महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराने मांडलेला ठराव मंजूर झाला. नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून इंग्लंड येथे १९१८ साली आणि अमेरिकेत १९१९ साली या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

या निमित्याने मी एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, हा काळ जवळपास २२ वर्षे जुना) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या रांगा अन लगत समुद्राचे निळेशार पाणी (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज) बसमधून अतिशय रमणीय असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्या तरुणांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.

मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? तिथल्या साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के! (तेव्हां आणि आत्ताही) मी २०२२ साली मेघालयाचा प्रवास केला, त्यातील प्रामुख्याने जी गोष्ट मला जाणवली ती सर्वांगाने दृश्यमान होणारे स्त्री स्वातंत्र्य. तेथे देखील या स्त्री स्वातंत्र्यसूर्याच्या उदयाला कारणीभूत आहे स्त्रियांची संपूर्ण साक्षरता आणि मत्रीसत्ताक पद्धतीमुळे गावलेली आर्थिक सुबत्ता! याच्या परिणामस्वरूप तेथे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले.

मतदानाचा हक्क महत्त्वाचाच मंडळी, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का? बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?

यंदाच्या युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस ८ मार्च २०२५ साठी “Accelerate Action” अर्थात “कृतीला गती द्या” हा विषय निवडण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश महिलांना पुरुषांबरोबर समान दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गतिमान करणे होय. ही थीम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर देते. म्ह्नणजेच केवळ चर्चा करण्याएवजी आता महिलांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे परिणाम साधणारी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. याअंतर्गत महिलांसाठी विशिष्ट योजना लागू करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन महिलांना रोजगार आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. (यात लाडकी बहीण सारख्या योजनेचे प्रयोजन नसावे, अशी इच्छा! ) स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

मला या दिनाविषयी इतकेच वाटते की स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे सामाजिक स्थान अत्यंत महत्वाचे आहे आणि ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच नवसाचा दिवस नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार?

“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights.” – Hillary Clinton.

(“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. “-  हिलरी क्लिंटन)

(या निमित्ताने तुराज लिखित शंकरमहादेवन यांनी गायलेले Womens Anthem हे स्फूर्तिदायक गाणे आपल्याला नक्कीच आवडेल.

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवा तुझी किमया अगाध आहे…!” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवा तुझी किमया अगाध आहे…!” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

(नशीब कसं वळण घेते)

ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पध्दतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडले.

सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली. सराफाने बघून सांगितले की ते कानातले सोन्याचे आहे. ते घेऊन ती घरी आली.

घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले. सखू म्हणाली, “वहिनी, लेकीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं. थोडे पैसे उसने द्या.”

ती म्हणाली, “हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे. ते मी तुला देईन. ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस.”

सखू म्हणाली, “नको वहिनी. या महिन्याची फी द्या. पुढचं काहीतरी करून जमवेन मी. आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर. विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवले आहे का म्हणून. कुणी कष्टाने हे बनवलं असलं आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल. पै पै जमवून बायका दागिना बनवतात, तो मी कसा वापरणार?”

वहिनी म्हणाली, ”छान आहे ग आयडिया.” तिनं लगेचच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुक वर लिहली.

दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे. असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते.

.. ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली.

तिनं दुसरं कानातलं दाखवलं. वहिनीनं सखूला बोलावलं आणि कान्हेरे बाईंना सांगितलं, “तुम्हाला या सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरका.” व सारी हकीकत सांगितली.

कान्हेरे बाई खूष होऊन सखू ला म्हणाली, “थॅंक्यू सखू. तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते. हे माझ्या आजीचं कानातलं आहे. तिची आठवण आहे ही. कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला. सगळीकडे शोधून आले. आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला. कसे तुमचे आभार मानू? बक्षिस काय देऊ तुम्हाला?”

वहिनी म्हणाली, “ललिताताई तुम्हीच त्या नव्या १२ वी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना? तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे!”

“हो. मीच ती ललिता कान्हेरे. आजीची ईच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही. तिचं स्वप्न मी पूर्ण केलं. देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे.” कान्हेरे बाई म्हणाल्या.

“बक्षिस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फी मधे तुमच्या शाळेत घ्याल का? “ वहिनी म्हणाली.

“अहो अगदी आनंदाने! Actually, मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन. वह्या, पुस्तकं, युनिफॅार्म सर्व काही मी बघेन. चालेल का सखुबाई?” कान्हेरे बाई म्हणाल्या.

सखूचे डोळे भरून आले. “वहिनी, माझे नशीब म्हणून मी तुमच्यासारखीकडे काम करते.”

वहिनी म्हणाली, “सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस. मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून, तरी तुझा विवेक ढळला नाही. ”

कान्हेरे बाई कौतुकाने हसून म्हणाल्या, “निघू मी? सखू ये उद्या लेकीला घेऊन. आज शांतपणे झोपेन बघ. Thank_you_so_much. ”

सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती. “देवा तुझी किमया अगाध आहे…. क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा! ” असं म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पापी पेट का सवाल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पापी पेट का सवाल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

खाजगी क्षेत्रातील कर्मचारीची स्थिती जे चित्रात दिसतयं त्याहून वेगळी आहे का हो?.. केवळ भारवाहू… धडधाकट शरीर प्रकृती आणि  अधिकाधिक कामं करण्याची उर्जा, क्षमता या बळावर डोळ्यासमोर दिसणारे, भेडसावणारे  त्याचे अनेक प्रश्न, समस्यांवर जास्तीत जास्त पैसा मिळवून तो सोडविण्याचा प्रयत्न करणारे… आपला मान.. सन्मान, अभिमान, स्वत्व या वैयक्तिक पण आपण माणूस आहोत कुणाचे गुलाम नव्हेत या गोष्टीला सोयिस्कर रित्या विसरून जाणारे… आकर्षक पॅकेज, बढतीची सहजी वाढणारी कमान, रेटिंग नि इन्सेंटीव्ह या भुलभुलैय्यात आपल्या तेज दिमागी बुद्धीला ओलीस ठेवणारे… कायम वरिष्ठांची इंग्रजाळलेल्या परिभाषेत.. यस सर.. आय विल डू दॅट… इनफक्ट आय वुड लाईक टू से.. सारखी हांजी हांजी ची गुळ पोळी तोंडात चघळणारे… टारगेट च्या भुताच्या हाडांची मोळी मधे बेसुमार वाढत जाणारी मागण्यांच्या हाडाच्या वजनाने आपली पाठ, कंबर खचेल, मोडेल.. मन थकेल. किंवा  आपल्याला पुढं चालता येणारचं नाही अशी अवस्था केली तरी.. आपला आवाक्याकडे डोळेझाक करून.. ये बिल्कुल हो जायेगा सर.. असा अंधविश्वास देणारे… आणि तो प्रत्यक्षात सार्थ न ठरवता आला तर ताशीव घडीव कारणांची मालिका समोर मांडून वरिष्ठांचा रोष ओढवून घेऊन साॅरी सर म्हणून आपलं अपयश पदरात पाडून घेताना… कामाचा मोबदल्यात अवाजवी घट  अनसंग एम्पलाॅयी म्हणून शिक्कामोर्तब करून घेणारे… स्वताच्या तसेच आपल्या कुटुंबाची पोटाची भूक मारत मारत कंपनी नि वरिष्ठांचं कधीही न भागणारी  नि  समाधानानं  कधीही तृप्त न होणाऱ्या भुकेची काळजी करता करता आपली सारी जिंदगी दाव पर लगा देणारे… ते ते सगळे… यात आपण सारे कमी अधिक प्रमाणात येतो बरं का… दोष त्यांचा किंवा आपला नसतोच मुळी.. तर हे घडवून आणणारी सगळी व्यवस्था दुषित आहे… जे शिक्षण देते त्याला रोजगार मिळत नसतो आणि रोजगार उपलब्ध आहेत त्याप्रमाणे शिक्षित कर्मचारी मिळत नाही.. इंग्रजांनी केवळ कारकून घडविणारी शिक्षणपद्धती इथे आणली राबवली आणि आपण आजही तीच पुढे राबवत आहोत… स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी उलटूनही अजून शिक्षणव्यवस्थेची केवळ शकले करण्यात धन्यता मानून तरूण पिढीच्या स्वप्नाचे तिन तेरा वाजवले आहेत.. परिपूर्ण बुद्धिचातुर्य चा संस्कारी विध्यार्थी घडविण्याऐवजी एक बुध्दीभारवाहू परीक्षार्थीं मात्र घडवत गेलो… गाजराचे कवळ तोंडा समोर धरून  पळायला लावून भारवाही गर्दभासारखे   राबवले जाताना दिसते… लाखातून एखादाच तो या कळपातून बाहेर पडतो… स्वताची कुवत ओळखतो आणि बाजारात आजमवण्याचा प्रयत्न करतो… पण असे किती जण अगदी अगदी नगण्य… आणि बाकी सगळे पापी पेट का सवाल है भाई… म्हणत झुंडमें रहते है और चलते है…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…☆ श्री जगदीश काबरे ☆

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे… वाढले नाही ते “सुशिक्षित”तेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या अधीन राहिल्यामुळे आणि आधुनिक विचारांपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच, पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्ववादातून आणि अंधश्रद्धायुक्त घटनांचे छद्मविज्ञानाच्या साह्याने समर्थन करतांना पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे नागरिक “सुशिक्षित” होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होऊ शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. उलट असे कारणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देणे होय. कारण आधुनिकता ही विचारांत व आचारांत आणावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे.

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते, हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडणारा, ढोंगी बाबांबुवांच्या पायाशी लीन होणारा आपला समाज एकूणातच अंधारयुगाकडे जोमाने वाटचाल करत आहे, असे खेदाने म्हणावे लागतेय. कारण आम्ही क्रमश: इतिहासाची परखड चिकित्सा आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत. इतिहासाचे नको तसे उदात्तीकरण आणि ऐतिहासिक पुरुषांचे दैवतीकरण करत चाललो आहोत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे होय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकित्सा, टिकात्मक टिप्पणी म्हणजे द्वेष पसरवणे असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने आपला इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे विकृतीकरण करत चालली आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. कुंभमेळा दरम्यान कोट्यावधी लोकांनी आंघोळ केल्यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित झाले, त्यात मानवी विष्टेचे कण आढळले असा निष्कर्ष काढणाऱ्यांना आपण सहजपणे हा सनातन धर्माचा अपमान आहे म्हणून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेतल्यामुळे टीकाकारांवर झुंडीने हल्ले चढवणाऱ्या ट्रोलर महाभागांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे लोक पक्षीय, जातीय आणि धार्मिक बेड्यांत घट्ट अडकत आहेत. या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण, शालेय शिक्षण, उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनवले जात आहे. धर्म नेहमीच चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला “पाखंडी” ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. माध्ययुगात युरोपातही असे घडून गेले आहे…पण तिकडील विचारकांनी धर्मलंडांचा प्रसंगी छळ सोसुनही शेवटी त्यांना शरण आणले. वैज्ञानिक सत्य स्वीकारण्यास भाग पाडले. कारण ते चिकित्सक होते… प्रश्न विचारत होते… उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले. आपण केव्हा बनणार? की अजूनही आपली मानसिकता प्राचीन आणि मध्ययुगात अडकलेली रहाणार?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१९  ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा…

मानाच्या पहिल्या कसब्यातील गणपतीला, श्री गणेशाला कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याची प्रार्थना करून, मानाचे आमंत्रण देऊन, मंडळी श्री जोगेश्वरी कडे वळायची. तिथेही जगदंबेला साडीचोळी, ओटी, पत्रिका अक्षत, पान सुपारी देवून मानाच आमंत्रण दिलं जायच. अर्थात श्री गणेश, जोगेश्वरी कृपेने कार्य निर्विघ्नपणे पार पडायचचं आणि वाजंत्री सनईच्या सुरांत शुभमंगल शुभ कार्य साजरं व्हायच. व्हीनस बँड किंवा अप्पा बळवंत चौकातला’ प्रभात ब्रास बँड वरातीची रंगत वाढवायचा. त्याकाळी गाजलेली सुंदर गाणी बँड वर वाजवली जायची. मुलगी सासर घरी गृहप्रवेश करतांना हमखास ‘ जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा ‘ हे गाणं बँडच्या सुरातून अलगद बाहेर पडायचं तेव्हां डोळे भरून आलेल्या वधू मायचा पदर डोळ्याकडे जायचा आणि वधू पित्याचा कंठ दाटून यायचा. पाठवणीच्या त्या हळव्या क्षणी बँन्ड वाल्यांच्या सुरेल स्वरांनी सगळ्यांनाच गहिवरून यायच. इतकं ते गाणं बँड वाले अगदी सुरेख, तन्मयतेने वाजवायचे जोडीला कारंजा सारखे उंच उसळणारे भुईनळे लाल, पिवळ्या चांदण्याची बरसात करायचे. झगमग करणाऱ्या गॅस बत्त्या वरातीची शान वाढवायच्या. माझ्या नातवाची चि. यज्ञसेनची मुंज 2012 साली झाली. इतकी दणक्यात आणि अप्रतिम झाली होती की अशी मुंज उभ्या आयुष्यात प्रथमच आम्ही बघितली. डोळ्याचं पारणं फीटलं आणि आमच्या जन्माचं सार्थक झाल. पूर्वीपासून चालत आलेलं प्रसिद्ध ‘खाऊवाले पाटणकरांचे’ दुकान बाजीराव रोडला आहे त्यांनी मौजीबंधनासाठी उत्तम सहकार्य केले होत. गुरुगृही अध्ययनासाठी आश्रमात आलेल्या बटूचा प्रवेश देखावा, इतका सुंदर होता की आम्ही त्या काळात त्या सोज्वळ रम्य वातावरणात पोहचलो. चि. राजेश चि. प्रसाद या दोन्ही मामांसह बटू मांडवात आला माझा हा नातू चि. यज्ञसेन इतका गोड दिसत होता की नजर लागू नये म्हणून, बोट काजळडबी कडे वळलं. मांडवात बटू प्रवेश देखावा अतिशय सुंदर अप्रतिम होता ‘खाऊवाले पाटणकरांनी’ उत्तम योजना केली होती पालखी वजा शामियान्यातून आमचा यज्ञसेन बटू सगळ्यांचे आशिर्वाद घेत शुभ कार्य मंडपाच्या दिशेने कार्यालयात प्रवेश करीत होता मातृभोजनाला बसलेली माझी लेक सौ मीनल व चि. यज्ञसेंनच्या चेहऱ्यावरचे तेज बघून जिजामाता आणि शिवबा आठवला. आमचे जावई श्री सुजित सु. जोशी कमालीचे हौशी आहेत पेशवे काळात पुण्यामध्ये शुभ, आनंद प्रसंगी हत्तीवरून साखर वाटली जायची आमच्या जावयांनी चि. यज्ञसेनची भिक्षावळ त्याला हत्तीवर बसवून साजरी केली. पगडी घातलेला पेशवाई थाटातला मुंज मुलगा अंबारीत खुलून दिसत होता. ‘हौसेला मोल नाही आणि हौसेला तोड नाही’ म्हणतात ही म्हण जोशी कुटुंबांनी सार्थ करून दाखवली. हा नेत्र दीपक सोहळा अवर्णनीय होता. पुण्यातले प्रत्येकजण शुभ मौज्य बंधन, शुभविवाह सोहळा श्री गणेश श्री जोगेश्वरीचे आशिर्वाद घेऊनच साजरा करायचे आणि आजतागायतही करतात. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या श्रीगणेशाला आणि श्री जोगेश्वरीला माझा नमस्कार..

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाय फाय बालपण… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ वाय फाय बालपण… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(टॉस झाला राज्यावर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.) — इथून पुढे —

इकडे राजा आणि पक्क्याने डाव सुरु केला. हातात दांडू घेऊन चिंन्नी ठेवली व उंच हवेत उडवत दांडूने जोरात मारली. चिन्नी जोरात हवेतून भिरभिरून उडाली राज्या कॅच घ्यायच्या प्रयत्नात पळत पळत गेला खरा त्याचा लक्ष्य वर हवेत होतं. वर बघत बघत तो पळत होता, नेमक वाटेत शांता पाण्याची घागर घेऊन जात होती. ती आडवी आली अन राज्याची धडक शांतला लागली. शांताची पाण्याची घागर पडली आणि राज्या शांताच्या अंगावर पडला. पारावर बसलेली लोक आली अन राज्याला बडवायला  लागली. तस शांता पण लाजून चूर झालेली तिचा परकर पूर्ण भिजला होता. घोडे आणि घोडेसवार ह्यांना काही कळलंच नाही  काय झाले ते. पक्क्याने तर चावडीच्या मागच्या बोळातून पसार झाला. राज्या बसलेल्या लोकांच्या तावडीत सापडला.

घोडे अन घोडेसवार ह्यांच्या ढुंगणावर काठीने मार बसल्यावर ती उठली आणि मिळलं त्या रस्त्याने पळत सुटली. तेवढ्यात शांताची आई काठी घेऊन आली तस गाव गोळा झाले. सगळ्यांनी सुटका करून घेऊन मारुतीच्या देवळात लपून बसली. राज्या अन पक्क्या पण तिथे आले, काय झाले ते पक्क्याने सांगताच जोर जोरात हसत बसली.

शांता लग्नाला आलेली पोर दिसायला देखणी, सावळा रंग मॅट्रिक पास होऊन घरातील घरकाम करत होती. तिची आई गौरा तणतणत काठी घेऊन आली.

मेल्यानो तुम्हाला आया बहिणी आहेत की नाहीत. माजलेत नुसते. आता दावतेच माझा हिसका असं म्हणत इकडं तिकडं मुलांना हुडकायला लागली. तेव्हड्यात बायक्का आली म्हणाली. गौरा गावची पोर हैती, लहान हाईत. खेळता खेळता असं व्हतंय. जा गुमान तूझ्या घरला आता.

मी सांगते त्यांना असं म्हटल्यावर गौरा घरी गेली. अन पडदा पडला.

तस सगळी जण मारुतीच्या देवळातन निसटली आणि सरकार वाड्याच्या पटांगणात आली.

ती जागा पूर्ण पटवर्धन सरकाराची पडीक होती. तिथे कोण पण जात नसे.

तिथलाच चिरर घोडा डाव परत चालू झाला. पक्क्याने परत चिन्नी दांडू वर घेतला आणि हवेत उंच उडवत मारला.

मगाचीच घोडी त्यावरचे घोडे स्वार परत बसलेले. असच खेळ खेळता खेळता चिन्नी उंच उडाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडली. त्याला जोरात लागलं. तस सगळीच मुलानी घर जवळ केलं.

दुपारची जेवण झाली तस परत गल्लीत मुलं जमा झाली. सगळ्यांनी हातात हात घेत चकले. नंन्तर जो शेवट राहिला त्याला घोडा केला. आणि त्याच्यावर पळत येऊन पाठीवर दोन हात ठेवायचे आणि दोन तंगड्या फासून त्याला ओलांडून जायचे. एकलम खाजा दुब्बी राजा तिराण भोजा चार चौकडी असा खेळ सुरु झाला ओलांडून असं करता करता एकाला पाठीवरून ओलांडता आले नाही. दोघेही पडली त्यातला गजाच्या नाकाला मार लागला. नाकातून रक्त येऊ लागले तसा डाव सम्पवण्यात आला.

फाल्गुनी महिना तस उन्ह सुरु झालेलं. शिमग्याचे तसेच वार्षिक परीक्षेचे वेध लागलेले. त्यावेळी शौचालये नव्हती. निसर्ग विधि उघड्यावर ओढ्या काठी किंवा गावंधरीत शेतात होतं असे. आमची सगळीच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी विधिला जात. कारण कुठे कुठे शेणकुटाचा (गोवऱ्या ) हुडवा रचला आहे. ते पाहून ठेवत. जवळपास कोण आहे, नाही ह्याची पण दखल घेतला. कारण शिमग्याला तो हुडवाचं उचलायचा आमचा प्लॅन असे. प्रत्यके हुडव्यात जवळपास हजार बाराशे शेणकूट असतात.

एक दोन हुडवा उचलला तरी आमची होळी सात आठ फूट उंच जाणारी होती. झाले मग हे काम रात्रीच दहा नंन्तर करायच असेलतर घरी कळणार. म्हणून परीक्षा जवळ आली अभ्यासाला आमच्या घरी झोपायला जाणार असं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या घरात सांगे. त्यामुळे कुणालाही संशय येत नसे.

आमचा लांब लचक सोपा होता सहजपने दहा पंधरा मुलं मावत होतीच. एक पान पट्टी ( गुडार – झाडीपट्टी ) हंथरली की सगळेच जण झोपत. फक्त येताना ते त्यांची वाकळ, चादर काहीतरी घेऊन येत असतं. एवढा जामा निमा पुरेसा होता.

घरातले दहा पर्यंत झोपत. आम्ही बाहेरून कडी लावत असू जेणेकरून घरात त्रास नको म्हणून. दोन दिवस अभ्यास झाला. पुढे दहा नंन्तर दोन रिकामी पोती घेउन दोन टीम करून पसार.

वेशीबाहेरची, हाळ विहीर आजूबाजूला एक टीम दुसरी टीम पांनंदी कडे. त्यावेळी गावात लाईट पण नव्हती. आम्ही अंदाजे जाऊन शेण कूट गोळा करायचे. व कुणालाही संशय नं येता पागेतील जागेत ढीग रचायचा. असं सगळं चालू होतं. एक दिवशी गम्मत झाली. सगळेच जण चिंचोळ्याच्या विहिरी कडे गेलो. तिथे हुडवा होता. तो हुडवा खुरप्यानी फोडला तीन पोती भरली. चौथ्या पोते भरताना सागऱ्याने हात घातला अन काय ते बोंब मारत खाली निजला. काय झाले कळेना.

मग सगळी जण पोती उचलून पागेकडे आले. सागऱ्याला सायकल वरुनं आणला. आणि त्याला कट्ट्यावर बसवले तो तळमळत होता. कळा पार एकाच हाताला खांद्यापर्यंत गेल्या. मग कळले ह्याला हुडव्यात विंचू चावला होता. घरातून पाणी आणून पाजले. रात्री गावातील डॉक्टरला उठवला आणि इंजेकशन करून आणले. मग शेवटी त्याला आमच्या घरात एक औषध होते. ते चावलेल्या ठिकाणी लावले. मग सगळी झोपली. झोपायला रात्री एक वाजला.

पुढे गावात चर्चा चालू झाली. शेणकूट गायब होतायत. जेवण ते लोक सावध झाले. तोपर्यंत आमचे टार्गेट पूर्ण झाले होते.

शेवटी शिमग्याची पौर्णिमा उजाडली. संध्याकाळी आमची रसद बाहेर काढून गल्लीतील चौकात होळी रचली. ती जवळपास चार फूट रुंद आणि सात फूट उंच होळी रचली गेली. होळी पेटवायला चार मशाली तयार झाल्या. नेहमीप्रमाणे मारुती च्या देवळात नंदादीप वर मशाली पेटवून होळी प्रज्वळीत केली. गल्लीतील सगळ्या घरातील नैवेद्य नारळ त्यात घातले गेले. रात्री धापर्यंत होळी पेटलेली. त्यात कोणी हरभर भाजले कोणी कणसं, भाजून प्रसाद म्हणून वाटू लागले.

दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली. काही जणाकडून पैसे पण वसूल केले. व रात्री उठून मदत केली म्हणून डॉक्टरांचे बिल पण देऊन त्याची सांगता केली.

आता मात्र सगळी जण अभ्यास करण्यात गुंतले. परीक्षा जवळ आलेली. रात्री अभ्यास दिवसा शाळा. घरातील पण कोणीच काम पण सांगत नव्हतेच.

परीक्षा चालू झाल्या, सम्पल्या.

तस बारा बैलाचं बळ आला. घरची कामे. शेतातील कामे वेळ मिळाला की पत्ते कुटणे. जर बुधवार मात्र रात्री नऊ वाजता सोपा गच्च भरु लागला. आमीन सायांनी आणि बिनाका गीत मला ऐकण्यासाठी कान आतुर होऊ लागले. त्यावेळी गावात एकमेव HMV चा रेडिओ बाहेर आणून लावत असू. ते गीत ऐकण्यात धन्यता पण होती. परीक्षा झाल्या तरी मुलं मात्र आमच्या सोप्यातच झोपत होती. त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता.

– क्रमशः भाग दुसरा 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…”  मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात  ☆ भावानुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…”  मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात  ☆ भावानुवाद – श्री सुनील देशपांडे

श्री के पी रामास्वामी

एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा… 

२७, ५०० मुली असलेला माणूस ?

हो! त्याला असेच म्हणतात – अप्पा.

(दक्षिणेमध्ये वडिलांना आप्पा असे संबोधतात) 

 

त्याचे खरे नाव? के पी रामास्वामी. कोइम्बतूर येथील केपीआर मिल्सचे मालक. व्यवसायाने कापड उद्योगपती. कर्मचारी त्यांना अप्पा असे संबोधतात

 

कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते कर्मचारी टिकवून कसे ठेवावे? खर्च कसे कमी करावे आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे. असेच सर्व बोलत असताना, हा माणूस संपूर्ण जीवनक्रम बदलण्यात व्यस्त आहे.

कसे? 

गिरणी कामगारांना पदवीधर बनवून. शिक्षणाला चांगल्या जीवनाची पायरी बनवून.

 

हे सर्व एका साध्या विनंतीने सुरू झाले. त्याच्या गिरणीतील एका तरुण मुलीने एकदा त्याला सांगितले होते –

“अप्पा, मला शिक्षण घ्यायचे आहे. माझ्या पालकांनी गरिबीमुळे मला शाळेतून काढून टाकले, पण मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. “

 

त्या एका वाक्याने सर्व काही बदलले…

त्याच्या कामगारांना फक्त पगार देण्याऐवजी, त्याने त्यांना भविष्य देण्याचा निर्णय घेतला.

त्याने गिरणीतच एक पूर्ण शिक्षण व्यवस्था उभारली.

आठ तासांच्या शिफ्टनंतर चार तासांचे वर्ग.

वर्गखोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, अगदी योग अभ्यासक्रम देखील.

सर्व काही पूर्णपणे निधीयुक्त. कोणतीही फी नाही, अट नाही.

आणि निकाल?

 २४,५३६ महिलांनी त्यांच्या १०वी, १२वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्या आहेत.

 अनेक आता परिचारिका, शिक्षिका, पोलिस अधिकारी आहेत.

 या वर्षीच तामिळनाडू मुक्त विद्यापीठातून २० मुली सुवर्णपदक विजेत्या झाल्या ‌

 

आता, तुम्हाला अपेक्षा असेल की एखाद्या व्यावसायिकाला कामगार नोकरी सोडून जाण्याची चिंता असेल. जर या महिला निघून गेल्या तर काय? कामगार स्थिरतेचे काय?

 

के पी रामास्वामी काय म्हणतात ते येथे आहे – 

“मी त्यांना गिरणीत ठेवून त्यांची क्षमता वाया घालवू इच्छित नाही. त्या गरिबीमुळे येथे आहेत, स्वेच्छेने नाही. माझे काम त्यांना भविष्य देणे आहे, पिंजरा नाही. “

 

आणि तो नेमके तेच करतो….

 

त्या निघून जातात. स्वतःचे करिअर घडवतात.

आणि मग? त्या त्यांच्या गावातील अधिक मुलींना गिरणीत पाठवतात. हे चक्र सुरूच आहे.

हा केवळ सीएसआर उपक्रम नाही. हा खऱ्या अर्थाने मानव संसाधन विकास आहे.

 

अलिकडेच झालेल्या एका दीक्षांत समारंभात ३५० महिलांना त्यांच्या पदव्या मिळाल्या. आणि के पी रामास्वामी यांनी एक असामान्य विनंती केली –

“जर तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणी त्यांना कामावर ठेवू शकलात, तर त्यामुळे इतर मुलींना पुढे शिक्षण घेण्याची आशा मिळेल. “

विचार करा. कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य चालवणारा माणूस व्यवसाय मागत नाही. तो नोकऱ्या मागत आहे – त्याच्या कामगारांसाठी.

आपण हे कधी कुठे पाहिले आहे?

ही कथा फक्त केपीआर मिल्सबद्दल नाही. ही नेतृत्व, कॉर्पोरेट नीतिमत्ता, राष्ट्र उभारणीचा धडा आहे.

 

बी-स्कूलने हे शिकवले पाहिजे.

एचआर व्यावसायिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे.

आणि जगाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला समजेल अशी ही सगळीकडे पसरवण्यासारखी सत्यकथा. तुम्ही काय करणार. पोहोचवणार इतरांपर्यंत?

(एका इंग्लिश फॉरवर्डचा मराठी अनुवाद ).

भावानुवाद : सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

तसा मी खूप व्यावहारिक माणूस आहे. जाताना माझ्या आईने मला सांगितले होते.

“मिलिंद… तुला सुखी राहायचे असेल तर फक्त एकच गुण तुझ्या अंगी बाणवून घे, ‘जितक्या लवकर एखाद्याशी जोडला जाशील, तितक्याच लवकर त्याच्यापासून दूर होता आले पाहिजे’. थोडक्यात मोह धरला तर दुःखी होशील. “

ही गोष्ट मी इतकी मनाशी रुजवली आहे की जो पर्यंत कुणी माझ्या सोबत आहे, मी त्याचा असतो. ज्यावेळी तो दूर जातो, मी त्याला विसरून जातो. कुणाला हा दुर्गुण वाटू शकतो पण माझ्यासाठी तो गुण आहे. बरे ही गोष्ट माझ्या मनात इतकी घट्ट बसली आहे की अनेकदा लोकांना मी पाषाणहृदयी वाटतो. आई असताना मी कायम तिचा सारथी असायचो. तिला कुठेही जायचे तरी तिच्यासोबत मी असणारच. तिच्या आजारपणातही मी तिच्याजवळच बसलेला असायचो. त्यामुळे त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता, आई गेल्यावर याला किती त्रास होईल? पण ती ज्या दिवशी गेली त्याच दिवसापासून माझे हसणे, विनोद करणे चालू झाले. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. सकाळी आई जाते आणि संध्याकाळी हा हास्यविनोद करतोय? म्हणजे याचे वागणे खोटे होते की काय? हे मला त्या लोकांच्या चेहऱ्यावरही दिसून यायचे. पण माझ्यात काही फरक पडला नाही. आजही मी तसाच आहे.

हे सगळे आठवण्याचे कारण… काल खूप दिवसांनी भद्रकाली मंदिरात गेलो होतो. पायऱ्या चढताना मनात विचार आला, या पायऱ्या बोलू शकल्या असत्या तर किती छान झाले असते? माझी पणजी ( माझ्या आईची आजी ) आणि माझी आजी कायम दर्शन झाल्यावर या पायऱ्यांवर बसलेल्या असायच्या. माझ्या आईचे बालपण याच पायऱ्यांवर खेळण्यात गेले. मीही माझ्या आईला अनेकदा इथे दर्शनाला घेऊन आलेलो.

मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमीच्या ठिकाणी पादत्राणे काढली आणि देवीसमोर जाऊन उभा राहिलो. मागे कीर्तन चालू होते. ऐकायला ८/१० लोकच असतील. देवीची मूर्ती खूपच छान दिसत होती. दर्शन घेताना मला माझी आई आठवत होती त्यामुळे आपोआपच डोळे भरून आले. आई ज्याप्रमाणे देवीच्या पुढे बनवलेल्या पावलांवर डोके ठेवून दर्शन घ्यायची मीही अगदी त्याचप्रमाणे दर्शन घेतले आणि दरवाज्याजवळील आतल्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शांत बसून राहिलो. थोड्या वेळात काही स्त्रिया दर्शनाला आल्या. त्यांचे वय साठीच्या आसपास असेल. त्या प्रत्येकीत मला माझ्या आईच्या काही गोष्टी दिसू लागल्या. काहींची वेशभूषा माझ्या आईसारखी, काहीची केशभूषा आई सारखी. काहींचे चालणे, काहींचे बोलणे आईसारखे. आणि आपोआपच माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मनात म्हटले… आई काही आपल्याला सोडायला तयार नाही. हेहेहे…

काल रात्री खूप दिवसांनी आई स्वप्नात आली.

“बरे झाले… देवच पावला म्हणायचा. ” आईने म्हटले.

“कशाबद्दल?”

“वाकडी वाट करून देवीच्या दर्शनाला जाऊन आलास. एरवी कुणी सांगितले असते तर म्हणाला असतास, ‘देवीला मनातल्या मनात मनोभावे नमस्कार केला तरी पोहोचतो, त्यासाठी मंदिरातच का जायला हवे?” तिने हसत म्हटले आणि मलाही हसू आले. कारण अनेकदा तिने मला मंदिरात दर्शनाला चल म्हटल्यावर मी हेच वाक्य बोलायचो.

“हेहेहे… मी जरी मंदिरात जात नसलो तरी बाहेरून नमस्कार करतो. आणि कलियुगात हीच गोष्ट जास्त पुण्य देऊन जाते. “

“ठीक ठीक… पण मंदिरात जात जा असाच. मी तुला कायम तिथे भेटेल. कुणा ना कुणाच्या रुपात. ” तिने माझ्याकडे रोखून बघत म्हटले.

“आई… एक विचारू?”

“विचार… “

“मी, तू गेल्यावर रडलोही नाही, तू म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीचा मोह ही धरला नाही तरी मंदिरात गेल्यावर तुझ्या आठवणीने माझे डोळे का डबडबले?” मी विचारले तसे आईच्या चेहऱ्यावर नेहमीचे चिरपरिचित स्मित झळकले.

“कारण तू मोह धरला नसला तरी तुझ्या हृदयात प्रेम कायम आहे. त्यामुळेच तुला समोर येणाऱ्या स्त्रीमध्ये मी दिसते. तू कायम मला शोधत असतोस आणि मीही त्यांच्या रुपात तुझ्यासमोर येते. लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुला माझी गरज असेल, मी कायम तुझ्या जवळपास असेल. “

“अरे.. !!! मोह आणि प्रेम एकच ना?”

“नाही… मोह आणि प्रेम जरी वरकरणी एक वाटत असले तरी त्यात फरक आहे. मोहात स्वार्थ असतो, प्रेम निस्वार्थ असते. मोहात माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतो, प्रेमात दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो. मोह अल्पकालीन असतो, प्रेम कायमस्वरूपी असते. मोह बांधून ठेवतो, प्रेम कशातही अडकवत नाही. त्यामुळे याबद्दल फारसा विचार करू नकोस. जसा आहे तसाच रहा. ज्यावेळी तू मला कोणत्याही स्त्रीमध्ये बघशील, तिचा आदर करशील, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम टिकून राहील. ” आईने सांगितले आणि मला जाग आली. आई असताना भलेही मी स्वतःला तिचा सारथी म्हणवून घेत होतो पण माझी आईच खऱ्या अर्थाने माझी सारथी आहे. ज्यावेळी मी अर्जुनासारखा संभ्रमित होतो, ती श्रीकृष्णासारखी मला उपदेश करते. तुम्हीही ज्यावेळी संभ्रमित व्हाल, फक्त तुमच्या आईला आवाज द्या, ती कृष्ण बनून तुमच्या मदतीला हजर असेल यात शंका नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares