मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -३ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -३ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग व मेघालयाच्या कुशीतले लिव्हिंग रूट ब्रिज)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मॉलीन्नोन्गच्या निमित्याने आपणा सर्वांना ही सफर आनंददायी वाटत आहे, याचा मला कोण आनंद होत आहे!

तर मॉलीन्नोन्गबद्दल थोडके राहून गेले सांगायाचे, ते म्हणजे इथले जेवण अन नाश्ता. माझा सल्ला आहे की इथं निसर्गाचेच अधिक सेवन करावे. इथे बरीच घरे (६०-७०%) होम स्टे करता उपलब्ध आहेत, अग्रिम आरक्षण केले तर उत्तम! मात्र थोडकी घरे (मी पाहिली ती ४-५) जेवण व नाश्ता पुरवतात! जास्त अपेक्षा ठेऊ नयेत, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही! ब्रेड बटर, ब्रेड आम्लेट, मॅगी अन चहा-कॉफी, इथे नाश्त्याची यादी संपते! तर जेवणात थाळी, २ भाज्या (त्यातली एक पर्मनन्ट बटाट्याची), डाळ अन भात, पोळ्या एका ठिकाणी होत्या, दुसरीकडे ऑर्डर देऊन मिळतात. जेवणात नॉनवेज थाळीत अंडी, चिकन आणि मटन असतं. हे घरगुती सर्विंग टाइम बॉउंड बरं का. जेवणाचे अन नाश्त्याचे दर एकदम स्वस्त! कारभार कारभारणीच्या हातात! इथे भाज्या जवळच्या मोठ्या गावातून (pynursa) आणतात,  आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या बाजारातून! सामानाची ने-आण करण्यासठी बेसिक गाडी मारुती ८००!. मुलांची मोठ्या गावात शिक्षणाकरता ने-आण करण्यासाठी पण हीच, पावसाळी वातावरण नेहमीचेच अन दुचाकी मुळे अपघात होऊ शकतात, म्हणून गावकरी वापरत नाहीत, असं कळलं. इथे ATM  नाही, नेटवर्क नसल्यामुळे जी पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे उपयोगाचे नाहीत. म्हणून आपल्याजवळ रोख रक्कम हवीच!              

स्काय पॉईंट (Nohwet Viewpoint)

या भागात फिरतांना बांगला देशाची सीमा वारंवार दर्शन देते. मात्र बांगलादेशाचे दर्शन घडवणारा एक स्काय पॉईंट अतिशय सुंदर आहे. मॉलीन्नोन्गपासून केवळ दोनच किलोमीटर असलेला हा पॉईंट न चुकता बघावा. बांबूने बनलेल्या पुलावरचा प्रवास मस्त झुलत झुलत करावा, एका ट्री हाऊस वरील ह्या पॉईंटवर जावे अन समोरचा नजारा बघून थक्क व्हावे. हा पॉईंट ८५ फूट उंच आहे, संपूर्ण बांबूने बनवलेला अन झाडांना बांबू तसेच जूटच्या दोरांनी मजबूत बांधलेला हा इको फ्रेंडली पॉईंट, समोरील नयनरम्य नजाऱ्यांचे फोटो काढणे आलेच! मात्र सेल्फी पासून सावधान, मित्रांनो! येथून सुंदर मावलींनॉन्ग दिसतेच शिवाय बांगलादेशची सपाट जमीन व जलसंपदा यांचेही प्रेक्षणीय दृश्य दिसते!                   

सिंगल डेकर अन डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज मेघालय पर्यटनाचा अविभाज्य भाग आहेत जिवंत पूल! अन ते पाहिल्यावर कवतिकाचे आणि प्रशंसेचे पूल बांधायला पर्यटक मोकळे!  म्हणजे जुन्या झाडांची मुळे एकमेकात “गुंतता हृदय हे” सारखी हवेत, अर्थात अधांतरी (आणि एखाद-दुसरी चुकलेल्या पोरांसारखी जमिनीत) अशी गुंतत गुंतत जातात, अन हे सगळं घडतं नदीपात्राच्या साक्षीनं, “जलगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” असं गुणगुणत! जसजशी वर्षे जातात, जलाचा अन प्रेमाचा शिडकावा मिळतो, तसतशी ही मुळे जन्मोजमीच्या ऋणानुबंधासारखी एकमेकांना घट्ट कव घालतात अन दिवसागणिक घालताच राहतात, मित्रांनो, म्हणूनच तर हे “लिव्हिंग रूट ब्रिज”, अर्थात जिवंत ब्रिज आहेत, काँकिटचे हृदयशून्य ब्रिज नव्हे, अन यामुळेच आपल्याला दिसतो तो प्रेमाच्या घट्ट पाशासारखा मजबूत जीता जागता मूळ पूल!

आता या मुळांच्या पुलाची मूळ कथा सांगते! साधारण १८० वर्षांपूर्वी मेघालयच्या खासी जमातीतील जेष्ठ व श्रेष्ठ लोकांनी नदी पात्राच्या अर्ध्या अंतरापर्यंत अधांतरी आलेली रबराच्या (Ficus elastica tree) झाडांची मुळे, अरेका नट पाम (Areca nut palm) जातीच्या पोकळ छड्यांमध्ये घातली, नंतर त्यांची निगा राखून काळजी घेतली. मग ती मुळे, (अर्थातच अधांतरी) वाढत वाढत विरुद्ध किनाऱ्यापर्यंत पोचलीत. तीही एकेकटी नाहीत तर एकमेकांच्या गळ्यात अन हातात हात गुंफून. या रीतीने माणसांचे वजन वाहून नेणारा आगळावेगळा असा या जिवंत पूल माणसाच्या कल्पनाशक्तीतून तयार झाला! आम्ही पाहिलेल्या सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजला मजबूत बनवण्यासाठी भारतीय लष्कराने बांबूचे टेकू तयार केलेत. हे आश्चर्यकारक पूल पाहण्याकरता पर्यटकांची संख्या वाढतेच आहे! म्हणूनच असे आधार आवश्यक आहेत, असे कळले. नदीवर असा एक अधांतरी पूल असेल तर तो असेल सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज, मात्र एकावर एक (अर्थात अधांतरी) असे दोन पूल असतील तर तो असेल डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज!!! मी केवळ डबल-डेकर बस पाहिल्या होत्या, पण हे प्रकरण म्हणजे खासी लोकांची खासमखास मूळची डबल गुंतवणूक! खासी समाजाच्या त्या सनातन बायो इंजिनीयर्सला माझा साष्टांग कुमनो! असे कांही पूल १०० फूट लांब आहेत. ते सक्षमरित्या साकार व्हायला १५ ते २५ वर्षे लागू शकतात, एकदाची अशी तयारी झाली, की मग पुढची ५०० वर्षे बघायला नको! यातील कांही मुळे पाण्याच्या सतत संपर्कामुळे सडतात, मात्र काळजी नसावी, कारण इतर मुळे वाढत जातात अन त्यांची जागा घेऊन पुलाला आवश्यक अशी स्थिरता प्रदान करतात. हीच वंशावळ खासियत आहे जिवंत रूट ब्रिजची! अर्थात हा स्थानिक बायो इंजिनिअरींगचा उत्तम नमुनाच म्हणायला हवा. काही विशेषज्ञांच्या मते या परिसरात(बहुदा चेरापुंजी आणि शिलाँग) असे शेकडो ब्रिज आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत पोचणे हे खासी लोकांचच काम! फार थोडे पूल पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, कारण तिथं पोचायला जंगलातील वाट आपली सत्वपरीक्षा पाहणारी, कधी निसरड्या पायऱ्या तर कधी दगड धोंडे तर कधी ओल्या मातीची घसरण!

या सर्वात “नव नवल नयनोत्सव” घडवणारा, पण ट्रेकिंग करणाऱ्या भल्या भल्या पर्यटकांना जेरीस आणणारा पूल म्हणजे “चेरापुंजीचा डबल डेकर (दोन मजली) लिव्हींग रूट ब्रिज!” मंडळी आपण शक्य असल्यास हे (एकाखाली एक ऋणानुबंध असलेले) चमत्काराचे शिखर अन मेघालयची शान असलेले “डबल डेकर लिव्हींग रूट ब्रिज” नामक महदाश्चर्य जरूर बघावे!  मात्र तिथे पोचायला जबरदस्त ट्रेकिंग करावे लागते. मी मात्र त्याचे फोटो बघूनच त्याला मनोमन साष्टांग कुमनो घातला! ‘Jingkieng Nongriat’ हे नाव असलेला, सर्वात लांब (तीस मीटर) असा हा जिवंत पूल २४०० फूट उंचीवर आहे, चेरापुंजीहून ४५ किलोमीटर दूर Nongriat या गावात! हे पूल “जागतिक वारसा स्थळ” म्हणून घोषित केलेले आहेत. 

मित्रांनो असा कुठलाही जिवंत पूल नदीवर लटकत असतो, नदीजवळ पोचायला वरच्या पर्वतराजीतून (उपलब्ध) वाटेने खाली उतरा, पूल बघा, जमत असेल तर देवाचे अन गाईडचे नाव घेत घेत तो पूल पार करा, वनसृष्टीचा आनंद घ्या.  गाईडच्या किंवा स्थानिकांच्या आदेशाप्रमाणेच पाण्याजवळ जाणे, उतरणे वगैरे कार्यक्रम उरका अन पर्वताची चढण चढा! हे जास्त दमवणारे, कारण उत्साह कमी अन थकवा जास्त! सोबत पेयजल अन जंगलातलीच काठी असू द्यावी.  कॅमेरा अन आपला तोल सांभाळत, जमेल तसे फोटो काढा! (सेल्फीचे काम जपून करावे, तिथे जागोजागी सेल्फी करता डेंजर झोन निर्देशित केले आहेत, “पण लक्षात कोण घेतो!!!”)    

मॉलीन्नोन्गपासून रस्ता आहे सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज बघायचा! मेघालयातील हे अप्रूप पहिल्यांदा बघितल्यावर त्या पुलावर चालतांना आपण कुणाच्या हृदयावर घाला घालीत आहोत असा मला खराखुरा भास झाला! आम्ही सिंगल रूट ब्रिज बघितला, तिथे जायला दोन रस्ते आहेत, मॉलीन्नोन्गपासून जाणारा कठीण, बराच निसरडा, वेडावाकडा, पायऱ्या अन कठडे नसलेला, रस्त्यात लहान मोठे दगड. मी मुश्किलीने तो पार केला.  दुसऱ्याच दिवशी एक अजून ब्रिज बघायच्या तयारीने मालिनॉन्ग मधून बाहेर पडलो, Pynursa पार केलं, इथल्या हॉटेल मध्ये बरेच पदार्थ होते. या मोठ्या गावात ATM तर आहे, पण कधी बंद असते, कधी मशीन मध्ये पैसे नसतात, म्हणून आपल्याजवळ कॅश हवीच! Nohwet या ठिकाणून खाली चांगल्या कठड्यांसहित असलेल्या पायऱ्या उतरून पोचलो तर काय, कालचाच सिंगल रूट ब्रिज दिसला की! हे डबल दर्शन सुखावणारे होते, पण इथे येणारा हा (आपल्या माहितीसाठी) सोपा मार्ग गावला.

आम्ही Mawkyrnot या गावातून वाट काढत अजून एक सिंगल रूट ब्रिज बघितला. हे गाव पूर्व खासी पर्वतातील Pynursla सब डिव्हिजन येथे वसलेले आहे. नदीकाठी पोचायला चांगल्या बांधलेल्या अन कठडे असलेल्या १००० च्या वर पायऱ्या उतरून आम्ही खाली पोचलो. पुलाच्या नावाखाली (पण नदीच्या वर तरंगत असलेला) ४-५ बांबूचा बनलेला झुलता पूल पाहून, मी याच किनारी थांबले! माझ्या घरची मंडळी (मुलगी, जावई अन नात) स्थानिक गाईडची मदत घेऊन उस-पार पोचलेत अन तिथले निसर्ग दर्शन घेऊन तिथून (बहुदा २० मीटर अंतरावरच्या) दुसऱ्याच तत्सम पुलावरून इस-पार परत आलेत. तवरीक मी इकडे देवाचे नाव घेत, जमेल तसे त्यांचे अन पुलाचे फोटो काढले. या स्थानिक गाईडने मला पायऱ्या उतरणे अन चढणे यात खूप मदत तर केलीच पण माझे मनोबल कित्येक पटीने वाढवले. या अतिशय नम्र अन होतकरू मुलाचे नाव Walbis, अन वय अवघे २१! दुपारी जेवणानंतर माझ्या घरच्या मंडळींना या पेक्षाही जास्त काठिण्यपातळी असलेल्या शिलियांग जशार (Shilliang Jashar) या गावातील बांबू ब्रिजवर जायचे होते, मी मात्र गाईडच्या सल्ल्यानुसार व माझ्या आवाक्यानुसार त्या पुलाच्या वाटेकडे वळलेच नाही.   

प्रिय वाचकहो, पुढील प्रवासात आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. तयारीत ऱ्हावा

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखातील माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ पर्यटक की डायरी से – मनोवेधक मेघालय – भाग-४ ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

☆ पर्यटक की डायरी से – मनोवेधक मेघालय – भाग-४ ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

(पिछला मॉलीन्नोन्ग, चेरापुंजी और भी कुछ)

प्रिय पाठकगण,

कुमनो! (मेघालय की खास भाषामें नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कैसे हैं आप?)

मुझे यकीन है कि, मॉलीन्नोन्ग का यह सफर आपको आनंददायक लग रहा होगा| इस प्यारे गाँव के बारे में कुछ रह गया था बताना, वह है यहाँ का खाना और नाश्ता, मेरी सलाह है कि यहाँ प्रकृति का ही अधिक सेवन करें। यहाँ काफी घरों में (६०-७०%) ‘होम स्टे’ उपलब्ध है| अग्रिम आरक्षण उत्तम रहेगा! मात्र कुछ एक घरों में ही (मैनें ४-५ देखे) खाना और नाश्ता मिलता है! ज्यादा अपेक्षाऐं न रखें,  इससे अपेक्षाभंग नहीं होगा! ब्रेड बटर, ब्रेड आम्लेट, मॅगी और चाय-कॉफी, बस नाश्ते की लिस्ट ख़त्म! खाने में थाली मिलती है, २ सब्जियां (उसमें एक पर्मनन्ट आलू की), दाल और चावल, एक जगह रोटियां थीं, दूसरी जगह आर्डर देकर मिलती हैं| नॉन वेज थाली में अंडे, चिकन और मटन रहता है| यह घरेलु सर्विंग टाइम बॉउंड है, इसका ध्यान रखें। खाने के और नाश्ते की दरें एकदम सस्ती! कारोबार घर की महिला सदस्यों के हाथों में (मातृसत्ताक राज)! यहाँ सब्जियां निकट के बड़े गांव से (pynursa)लायी जाती हैं, हफ्ते में दो बार भरने वाले बाजार से! मालवाहक होती है बेसिक गाडी मारुती ८००! बड़े गांव में बच्चों को लाना, ले जाना भी इसमें ही होता है| यहाँ सदैव वर्षा होने के कारण दोपहिये वाली गाड़ी का इस्तेमाल नहीं होता, गांव वाले कहते हैं कि, इससे अपघात होने का अंदेशा हो सकता है. यहाँ ATM नही है, नेटवर्क न रहने की स्थिति में जी पे, क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड किसी काम के नहीं, इसलिए अपने पास हमेशा नकद राशि होनी चाहिए!

स्काय पॉईंट (Nohwet Viewpoint)

इस क्षेत्र का दौरा करते समय, बांग्लादेश की सीमा का बारम्बार दर्शन होता है। परन्तु बांग्लादेश का एक स्काई पॉइंट बेहद खूबसूरत है। यह पॉइंट मॉलीन्नोन्ग से केवल दो किलोमीटर की दूरी पर है। बांस के पुल पर बड़े मजे से झूलते झूलते यात्रा कीजिये, एक ट्री हाउस पर स्थित इस पॉइंट तक जाइये तथा सामने का नज़ारा विस्मय चकित नज़र से देखिये| यह पॉईंट ८५ फ़ीट ऊँचाई पर है| पूरी तरह बांस से बना और पेड़ों को बांस तथा जूट की रस्सियोंसे कसकर बंधा यह इको फ्रेंडली पॉईंट, सामने के नयनाभिराम नज़ारोंके फोटो तो बनते ही हैं! परन्तु सेल्फी से सावधान मित्रों! यहाँसे सुंदर मॉलीन्नोन्ग तो दिखता ही है, अलावा इसके बांग्लादेश का मैदानी इलाका और जलसम्पदा के भी रम्य दृश्य के दर्शन होते हैं!

सिंगल डेकर और डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज

मेघालय पर्यटनका अविभाज्य भाग है जीते जागते पुल! और वे देखने के उपरांत कौतुक के और प्रशंसा के पुल बाँधनेको पर्यटक हैं ही! जीते जागते पुल यानि पुराने पेड़ों की जड़ें एक दूजे में “दिल के तार तार से बंधकर” हवा में अर्थात तैरते हुए (और एकाध रास्ता भटके हुए बच्चे की भांति जमीन में) ऐसी उलझते जाते हैं, और इसका साक्षी होता है नदी का जलपात्र, “जलगंगा के किनारे तुमने मुझे वचन दिया है” यह गीत गुनगुनाते हुए! जैसे जैसे वर्ष बीतते हैं, जल और प्रेम की वर्षा मिलती रहती है, वैसे वैसे ये जड़ एक दूजे को आलिंगन में कस कर जकड लेते हैं, मान लो, जनम जनम का ऋणानुबंध हो! यह दिनों दिन चलता ही रहता है| मित्रों, इसीलिये तो यह “लिव्हिंग रूट ब्रिज” है, अर्थात जीता जागता ब्रिज, कॉन्क्रीट का हृदयशून्य ब्रिज नहीं और इसीलिये हमें यह नज़र आता है प्रेमबन्धन के अटूट पाश जैसा मजबूत जडों का पुल!

अब इन जडोंकी मूल कथा बताती हूँ! लगभग १८० वर्षों पूर्व मेघालय के खासी जमात के जेष्ठ व श्रेष्ठ लोगों ने नदीपात्र के आधे अंतर तक लटकते आए रबर के (Ficus elastica tree) पेड़ों के जड़ों को अरेका नट पाम(Areca nut palm) जाति के खोखली छड़ों में डाला, उसके पश्चात् उनकी जतन से देखभाल की| फिर वे जड़ें (अर्थात हवा में तैरते हुए) लम्बाई में वृद्धिंगत होते हुए दूसरे किनारे तक पहुंच गईं| और वह भी अकेले अकेले नहीं, बल्कि एक दूजे के गले में और हाथों में हाथ डालकर| इस प्रकार मानव का भार वहन करने वाला अलगथलग ऐसा जिंदादिल पुल आदमी की कल्पनाशक्ति से साकार हुआ! हमने देखे हुए सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज को मजबूती प्रदान करने हेतु भारतीय सेना ने बांस के सहारे टिकाव तैयार किये हैं| ये आश्चर्यजनक पुल देखने हेतु पर्यटकों की संख्या बढ़ती ही जा रही है! इसीलिये ऐसे सहारों की आवश्यकता है, ऐसा बताया गया| अगर नदी पर ऐसा एक हवा में तैरता पुल हो, तो वह सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज होगा, परन्तु एक के ऊपर एक (अर्थात हवा में तैरते हुए) ऐसे दो पुल हो तो वह होगा डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज!!! मैने केवल डबल-डेकर बस देखी थी, परन्तु यह अनोखी चीज़ यानि खासी लोगोंकी खासमखास जड़ों की डबल इन्वेस्टमेंट ही समझ लीजिए! खासी समाज के इन सनातन बायो-इंजीनियरोंको मेरा साष्टांग कुमनो! ऐसे कुछ पुल १०० फ़ीट लम्बे हैं| उन्हें सक्षमता से साकार होने को १५ से २५ वर्ष लग सकते हैं| एक बार ऐसी तैयारी हो गई, तो आगे के ५०० वर्षों की फुर्सत हो गई समझिये! यहाँ की कुछ एक जड़ें पानी से लगातार संपर्क होने के कारण सड़ जाती हैं, परन्तु चिंता की कोई बात नहीं, क्यों कि दूसरी जड़ें बढ़ती रहती हैं और पुराने जड़ों की जगह लेकर पुल को आवश्यक स्थिरता प्रदान करती हैं| यहीं वंशावली खासियत है जिंदा रूट ब्रिजकी! अर्थात यह स्थानिक बायो इंजिनिअरींग का उत्तम नमूना ही कहना होगा| कुछ विशेषज्ञों के मतानुसार इस क्षेत्र में (ज्यादातर चेरापुंजी और शिलाँग) ऐसे सैकड़ों ब्रिज हैं, पर उन तक पहुंचना खासी लोगों के ही बस की बात है! केवल थोडे ही पुल पर्यटकों के लिए उपलब्ध हैं क्योंकि, वहां तक पहुंचनेवाली जंगल की राह है हमारी सत्वपरीक्षा लेने वाली, कभी फिसलन भरी सीढ़ियाँ, कभी छोटी बड़ी चट्टानें, तो कभी गीली मिट्टी की गिरती हुए ढलान!

अगले भाग में सफर करेंगे चेरापुंजी के डबल डेकर (दो मंजिला) लिव्हींग रूट ब्रिज की और आप देखेंगे सिंगल लिव्हींग रूट ब्रिज साक्षात मेरी नजरों से! आइये, तब तक हम और आप सर्दियों की सुर्ख़ियों से आनन्द विभोर होते रहें!

फिर एक बार खुबलेई! (khublei) यानि खास खासी भाषा में धन्यवाद!

टिप्पणी

*लेख में दी जानकारी लेखिका के अनुभव और इंटरनेट पर उपलब्ध जानकारी पर आधारित है| यहाँ की तसवीरें और वीडियो (कुछ को छोड़) व्यक्तिगत हैं!

*गाने और विडिओ की लिंक साथ में जोड़ रही हूँ, उन्हें सुनकर और देखकर आपका आनंद द्विगुणित होगा ऐसी आशा करती हूँ!

मेघालय की छात्राओं द्वारा प्रस्तुत किया हुआ परंपरागत खासी नृत्य

“पिरपिर पिरपिर पावसाची, त्रेधा तिरपिट सगळ्यांची” बालगीत

गायिका-शमा खळे, गीत वंदना विटणकर, संगीत मीना खडीकर, नृत्य -अल्ट्रा किड्स झोन

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक  मेघालय…भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग, डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स (divine, digital detox)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मावलीन्नोन्ग (Mawlynnong) हे अगम्य नाव असलेले गाव पृथ्वीतलावर आहे, हे माझ्या गावीही नव्हते! तिथे गेल्यानंतर या गावाचे नाव शिकता-शिकता चार दिवस लागले (१७ ते २० मे २०२२), अन गावाला रामराम करायची वेळ येऊन ठेपली. शिलाँग पासून ९० किलोमीटर  दूर असलेले हे गाव. तिथवर पोचणारी ही वाट दूर होती, घाटा-घाटावर वळणे घेता घेता गावलेले हे अगम्य अन “स्वप्नामधील गाव” आता मनात बांबूचं घर करून बसलय! त्या गावाकडचे ते चार दिवस ना माझे होते ना माझ्या मोबाइलचे! ते होते फक्त निसर्गराजाचे अन त्याच्याबरोबर झिम्मा खेळणाऱ्या पावसाचे! आजवर मी बरेच पावसाळे पाहिलेत! मुंबईचा पाऊस मला सगळ्यात भारी वाटायचा! पन या गावाच्या पावसानं पुरती वाट लावली बगा म्हमईच्या पावसाची! अन तिथल्या लोकांना त्याचे अप्रूप वगैरे काही नाही! बहुदा त्यांच्यासाठी हा सार्वजनिक शॉवर नित्याची बाब असावी! आता मेघालय मेघांचे आलय (hometown म्हणा की) मग हे त्याचेच घर झाले की, अन आपण तिथे पाहुणे असा एकंदरीत प्रकार! तो तिथं एन्ट्री देतोय हेच त्याचे उपकार, शिवाय झिम्मा खेळून पोरी दमतात, अन घडीभर विसावा घेतात, असा तो मध्ये मध्ये कमी होत होता. आम्ही नशीबवान म्हणून त्याची विश्रांतीची वेळ अन आमची तिथली निसर्गरम्य ठिकाणे पाहायची वेळ कशी का कोण जाणे पण चारही दिवस मस्त मॅच झाली! रात्री मात्र त्याची अन विजेची इतकी मस्ती चालायची, त्याला धुडगूस, धिंगाणा, धम्माल, धरपकड, अन गावातल्या (आकाशातल्या नव्हे) विजेला धराशायी करणारीच नावें शोधावी लागतील!       

मॉलीन्नोन्ग सुंदरी: सॅली!

खासी समाजात मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. महिला सक्षमीकरण हा तर इथला बीजमंत्र. घर, दुकान, घरगुती हॉटेल अन जिथवर नजर जाईल तिथे स्त्रिया,  त्यांच्या साक्षरतेचे प्रमाण ९५-१००%. आर्थिक गणित याच सांभाळणार! बाहेर काम करणाऱ्या प्रत्येकीच्या गळ्यात स्लिंग बॅग(पैसे घेणे अन देणे यासाठी सुटसुटीत व्यवस्था). आम्ही देखील एक दिवस एका घरात अन तीन दिवस अन्य घरात वास्तव्य केले! तिथल्या मालकीणबाईंचे नाव Salinda Khongjee, (सॅली)! ही मॉलीन्नोन्ग सुंदरी म्हणजे इथल्या गोड गोजिऱ्या यौवनाची प्रतिनिधीच जणू! चटपटीत, द्रुत लयीत कामे उरकणारी, चेहेऱ्यावर कायम मधुर स्मित! इथल्या सगळ्या स्त्रिया मी अश्याच प्रकारे कामे उरकतांना बघितल्या! मी अन माझ्या मुलीने या सुंदर सॅलीची छोटी मुलाखत घेतली.(ही माहिती छापण्याकरता तिची परवानगी घेतली आहे) तिचं वय अवघे २९! पदरात, अर्थात जेन्सेम मध्ये (खासी पोशाखाचा सुंदर आविष्कार म्हणजे जेन्सेम, jainsem)  दोन मुली, ५ वर्षे अन ४ महिने वयाच्या, तिचा पती, Eveline Khongjee (एव्हलिन), वय अवघं २५ वर्षे! आम्ही ज्या घरात होम स्टे करून राहिलो ते घर सॅलीचं, अन ती राहत होती ते आमच्या घराच्या डाव्या बाजूचं घर परत तिचच! आमच्या घराच्या उजव्या बाजूचं घर तिच्या नवऱ्याच माहेर अर्थात तिच्या सासूचं अन नंतर वारसा हक्कानं तिच्या नणंदेचं! तिची आई हाकेच्या अंतरावर राहते. सॅलीचे शिक्षण स्थानिक अन थेट शिलाँगला जाऊन बी ए दुसऱ्या वर्षापर्यंत. (वडिलांचे निधन झाल्याने फायनल राहिले!) लग्न झालं चर्च मध्ये (धर्म ख्रिश्चन).  इथे नवरा लग्नानंतर आपल्या बायकोच्या घरी जातो! आता तिचा नवरा आमच्या घराच्या समोरून (त्याच्या अन तिच्या) माहेरी अन सासरी जातांना बघायला मजा यायची. सॅली पण काही हवं असेल तर पटकन आपल्या सासरी जाऊन  कधी चहाचे कप, तर कधी ट्रे अशा वस्तू जेन्सेमच्या आत लपवून घेऊन जातांना बघायची मजा औरच! सर्व आर्थिक व्यवहार अर्थातच सैलीकडे बरं का! नवरा बहुतेक मेहनतीची अन बाहेरची कामे करायचा असा मी निष्कर्ष काढला! घरची भरपूर कामे अन मुलींना सांभाळून देखील सॅलीनं आम्हाला मुलाखत देण्याकरता वेळ काढला, त्याबद्दल मी तिची ऋणी आहे! मुलाखतीत राहिलेला एक प्रश्न मी तिला शेवटी, शेवटच्या दिवशी हळूच विचारलाच, “तुझं लग्न ठरवून की प्रेमविवाह?” त्यावर ती लाजून चूर झाली अन “प्रेमविवाह” अस म्हणत स्वतःच्या घरात अक्षरशः पळून गेली!                          

सॅलीकडून मिळालेली माहिती अशी:

गावकरी गावचे स्वच्छतेचे नियम कसोशीने पाळतात. समजा स्वच्छता मोहिमेत भाग नाहीच घेतला तर? गावाचे नियम मोडल्याबद्दल गावप्रमुखाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाते! तिने सांगितले, “माझ्या आजीने अन आईने गावाचे नियम पाळण्याचे मला लहानपणापासून धडे दिलेत”. इथली घरे कशी चालतात त्याचे उत्तर तिने असे दिले: “होम स्टे” हे आता उत्पन्नाचे चांगले साधन आहे! याशिवाय शाली अन जेन्सेम बनवणे  किंवा बाहेरून आणून विकणे, बांबूच्या आकर्षक वस्तू बनवणे अन त्या पर्यटकांना विकणे. इथली प्रमुख पिके म्हणजे तांदूळ,  सुपारी  आणि अननस, संत्री, लीची अन केळी  ही फळं! प्रत्येक स्त्री समृद्ध, स्वतःचं घर, जमीन आणि बागा असलेली! कुटुंबानं धान अन फळे स्वतःच पिकवायची.  तिथे फळविक्रेतीने ताजे अननस कापून बुंध्याच्या सालीत सर्व्ह केले, ती अप्रतिम चव अजून रेंगाळतेय जिभेवर!  याचे कारण “सेंद्रिय शेती”! फळे निर्यात करून पैसे मिळतात, शिवाय पर्यटक “बारो मास” असतातच! (मात्र लॉकडाऊन मध्ये पर्यटन थंडावले होते.)

या गावात सर्वात प्रेक्षणीय काय, तर इथली हिरवाई, हा रंग इथला स्थायी भाव! पानाफुलांनी डवरलेल्या स्वच्छ रस्त्यांवर मनमुराद भटकंती करावी. प्रत्येक घरासमोर रम्य उपवनाचा भास व्हावा असे विविधरंगी पानांनी अन फुलांनी फुललेले ताटवे, घरात लहान मोठ्या वयाची गोबरी मुले! त्यांच्यासाठी पर्यटकांना टाटा करणे अन फोटोसाठी पोझ देणे हे नित्याचेच! मंडळी, हा अख्खा गावाच फोटोजेनिक, कॅमेरा असेल तर हे टिपू की ते टिपू ही भानगडच नाहीय! पण मी असा सल्ला देईन की आधी डोळ्यांच्या कॅमेऱ्याने डोळे भरून ही निसर्गाच्या रंगांची रंगपंचमी बघावी अन मग निर्जीव कॅमेऱ्याकडे प्रस्थान करावे! गावकुसाला एक ओढा आहे (नाला नाही हं!). त्याच्या किनारी फेरफटका मारावा! पाण्यात हुंदडावे पण काहीबाही खाऊन कचरा कुठेही फेकला तर? मला खात्री आहे की, नुकत्याच न्हायलेल्या सौंदर्यवतीसम प्रतीत होणारे हे रम्य स्थान अनुभवल्यावर तिळाइतका देखील कचरा तुम्ही कुठेही टाकणार नाही! इथे एक “balancing rock” हा निसर्गदत्त चमत्कार आहे, फोटो काढावा असा पाषाण! ट्री हाउस, अर्थात झाडावरील घर, स्थानिकांनी उपलब्ध साहित्यातून बांधलेले, तिकीट काढून बघायचं, बांबूनिर्मित वळणदार वळणाच्या वर वर जाणाऱ्या आवृत्त्या संपल्या की झाडावरील घरात जाऊन आपण किती वर आहोत याचा एहसास होतो! खालच्या अन घरातल्या परिसराचे फोटो हवेतच! शहरात घरांसाठी जागा नसेल तर हा उपाय विचारणीय, मात्र शहरात तशी झाडे आहेत का हो? इथे तीन चर्च आहेत. त्यापैकी एक “चर्च ऑफ द एपिफॅनी”, सुंदर रचना आणि बांधकाम, तसेच पानाफुलांनी बहरलेला संपूर्ण स्वच्छ परिसर. आतून बघायची संधी मिळाली नाही, कारण चर्च ठराविक दिवशी अन ठराविक वेळी उघडते!

मित्रांनो, जर तुम्हाला टीव्ही, इंटरनेट, व्हाट्सअँप अन चॅटची सवय असेल (मला आहे), तर इथे येऊन ती मोडावी लागणार! आम्ही या गावात होतो तेव्हा ९०% वेळा गावची वीज गावाला गेलेली होती! एकला सोलर-दिवा सोडून बाकी दिवे नाहीत, गिझर नाही, नेटवर्क नाही, सॅलीकडे टीव्ही नाही! आधी मला वाटले, आता जगायचे कसे? पण हा अनुभव अनोखाच होता! निसर्गाच्या कुशीतली एक अद्भुत अविस्मरणीय अन अनवट अनुभूती! माझ्या सुदैवाने घडलेला डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स!

प्रिय वाचकहो, मॉलीन्नोन्गची महती अजून गायची आहे, तर आतापुरते खुबलेई!  (Khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

डॉ. मीना श्रीवास्तव                                       

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (एखादा अपवाद वगळून)आणि वीडियो व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक  मेघालय…भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग, डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स(divine, digital detox) 

निसर्ग हे या जगातील सर्वांगसुंदर चित्रकलेचे दालन आहे, रोज नवनवीन चित्रं घेऊन येणारं!

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

भारताच्या उत्तरपूर्व सीमेवर नांदणाऱ्या सात बहिणी अर्थात “सेव्हन सिस्टर्स”  पैकी एक बहीण मेघालय! दीर्घ हिरव्यागार पर्वतश्रृंखला, खळखळ वाहणारे निर्झर, अन पर्वतातच कुठे कुठे वसलेली लहान मोठी गावे! अर्थात मेघालयची राजधानी शिलाँग हिला आधुनिकतेचा स्पर्श आहे! (मंडळी, मी पाहिलेल्या शिलाँग सहित मेघालयाच्या अन्य मोजक्या ठिकाणांची सफर पुढील भागात!). आजची सफर अविस्मरणीय अन अनुपमेय अशीच होणार मित्र हो, खात्री असू द्या! अगदी इवलसं एक गाव अन मॉलीन्नोन्ग हे नांव! या गावाचे हे नाव जरा विचित्रच वाटते नाही का? ७० किंवा अधिकच वर्षांपूर्वी हे गाव जळून खाक झाले, गावकरी दुसरीकडे गेलेत, पण लगेचच परत येऊन त्यांनी नव्या दमाने हे गाव वसवले. खासी भाषेत “maw” चा अर्थ दगड अन ‘lynnong’ चा अर्थ विखुरलेले! येथील घरांपर्यंत घेऊन जाणाऱ्या दगडी वाटा याची साक्ष देतात.

कुठल्याही महानगरातल्या एखाद्या गगनचुंबी बिल्डिंगच्या रहिवास्यांच्या संख्येपेक्षाही कमी (२०१९ च्या नोंदीप्रमाणे लोकसंख्या अवघी ९००) गावकऱ्यांची वस्ती असणारं हे गाव (पर्यटकांना विसरा, कारण ते येत अन {नाईलाजाने} जात असतात!) “पूर्व खासी पर्वतरांगा”हे खास नाव असलेल्या जिल्ह्यात येणारं (in Pynursla community development block)! पर्यावरणाशी सुंदर समन्वय साधत माणूस तितकेच सुंदर जीवन कसे जगू शकतो, याचे आजवर मी पाहिलेले हे गाव सर्वोत्तम उदाहरण! म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त्याने हा भाग फक्त  या मनमोहिनीच्या कदमोंपे निछावर! काय आहे या गावात इतकं की “तारीफ करूँ क्या उसकी, जिसने इसे बसाया!!!” असं(शर्मिला समोर नसतांनाही) गावंस वाटतंय! स्वच्छ अन शुचिर्भूत गाव कसं असावं, तर असं! डिस्कवरी इंडिया या मासिकाने आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव (२००३), भारतातील सर्वात स्वच्छ गाव (२००५), असे गौरविल्यानंतर अनेकदा स्वच्छतेसाठी हे गाव प्रसिद्धीच्या झोतात राहिलय! सध्या मेघालयातील सर्वात सुंदर स्वच्छ गाव म्हणून त्याचा लौकिक आहे! कुठेही आपल्याला परिचित अशी दंडुकेशाही नाही, कागदी घोडे नाहीत. इथले बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्मीय  आणि “खासी” जमातीचे आहेत (मेघालयात तीन मुख्य जमाती आहेत: Khasis, Garos व Jaintias). ग्राम पंचायत अस्तित्वात आहे, निवडणूकीत गावप्रमुख ठरतो. सध्या श्री थोम्बदिन (Thombdin) हे गावप्रमुख आहेत. (ते व्यस्त असल्याकारणाने त्यांची मुलाखत घेता आली नाही!) इथे आहे एक फलक, स्वच्छतेचं आवाहन करणारा!स्वयंशिस्त (आपल्याकडे फक्त स्वयं आहे), अर्थात, सेल्फ डिसिप्लिन काय असते (भारतात सुद्धा) हे इथं याची देही याची डोळी बघावे असे मी आवाहन करीन!सामाजिक पुढाकाराने गावातील प्रत्येकजण गाव स्वच्छता-मोहिमेत असतोच असतो. दर शनिवारी हे स्वच्छता अभियान स्वयंस्फूर्तीने राबवल्या जाते. प्रत्येक स्थानिकाची हजेरी अनिवार्य अन गावप्रमुखाचा शब्द प्रमाण! याचे मूळ गावकऱ्यांच्या नसानसात भिनलंय, कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याच्या आवाक्यातले हे काम नोहे! अन हीच प्रवृत्ती पर्यटकांनी ठेवावी, निदान या गावात असेपर्यंत, असा या गावकऱ्यांचा आग्रह असतो!

इथे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या बांबूच्या बनाचे किती अन कसे कवतिक करावे! मला बांबू म्हटले की शाळेत बहुतेक रोज खाल्लेले केनचे फटके (रोज किमान ५) आठवतात, त्यातील ९९. ९९% वेळा  फटके शाळेत उशिरा पोचण्याकरता असत. (मित्रांनो, तसं काही विशेष नाही, शाळेची घंटा घरी ऐकू यायची म्हणून, जाऊ की निवांत, बाजूलाच तर आहे शाळा, हे कारण!) इथे बांबूचा वावर सर्वव्यापी! कचरा टाकण्यास जागोजागी बांबूच्या बास्केट, म्हणजेच खोह(khoh) , त्याची वीण इतकी सुंदर, की त्यात कचरा टाकूच नये असे वाटते! तिथल्या बायामाणसांना ऊन अन पावसापासून रक्षण करण्यास परत याच बांबूच्या अतिशय बारकाईने सौंदर्यपूर्ण दृष्टीने विणलेले प्रोटेक्टिव्ह असे कव्हर! अन्न साठवायला, मासे पकडायला अन दागिने घडवायला बांबूच! बांबूची पुढील महिमा पुढील भागात!

इथे सकाळी उठोनि स्वच्छता-सेविका कचरा गोळा करायच्या कामाला लागतात, प्लास्टिकचा वापर बहुदा नाहीच, कारण पॅकिंग लहान-मोठ्या पानांचे! उपलब्ध अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घरे बांधलेली( परत बांबूच)! जैविक कचरा जमा करून खत निर्माण करतात. इथे आहे open drainage system, पण कहर हा की त्यातले सुद्धा पाणी प्रवाही अन स्वच्छ, गटारे तुंबलेली नाहीत (प्रत्यक्ष बघा अन मग विश्वास ठेवा!)  सौर-ऊर्जेचा वापर करून इथले पथदिवे स्वच्छ रस्त्यांना प्रकाशाचा उजाळा देत असतात. शिवाय प्रत्येक घरी सौर-दिवे अन सौर-विजेरी (टॉर्च) असतातच, पावसाने वीज गेली की या वस्तू येऊन काम भागवतात! प्रिय वाचकहो, लक्षात घ्या, हे मेघालयातील गाव आहे, इथे मेघांची दाटी नेहमीचीच, तरीही सूर्यनारायण दिसेल तेव्हा सौर ऊर्जा साठवल्या जाते! अन इथे आपण सूर्य किती आग ओततोय, हा उन्हाळा भारीच गरम बर का, असा उहापोह करतोय! इथे हॉटेल नाही,  तुम्ही म्हणाल मग राहायचे कुठे अन खायचे काय? कारण पर्यटक म्हणून ही सोय हवीच! इथे आहे होम् स्टे(home stay), आल्यासारखे चार दिवस राहा अन आपापल्या घरी गुमान जा बाबांनो, असा कार्यक्रम! तुम्ही इथे फक्त पाहुणे असता  किंवा भाडेकरू!  मालक इथले गावकरी! आपण आपल्या औकातीत रहायचं, बर का, कायदा thy name!  कुठलाही धूर नाही, प्लास्टिकचा वापर नाही आणिक पाण्याचे व्यवस्थापन आहेच (rain harvesting). आता तर “स्वच्छ गाव” हाच या गावाचा USP (Unique salient Point), मानबिंदू अन प्रमुख आकर्षण! गावचा प्रमुख म्हणतो की यामुळे २००३ पासून या गावाकडे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे! गावकऱ्यांचे उत्पन्न ६०%+++ वाढलेय आणि या कारणाने देखील इथल्या स्वच्छतेकडे गावकरी आणखीनच प्रेमाने बघतात, सगळे गाव जणू आपले घरच अशी गावकी अन भावकी! विचार करण्यासारखी गोष्ट! स्वच्छ रस्ते अन घरं इतकी दुर्मिळ झाली आहेत, हेच आपल्याला लाजेनं मान खाली घालायला लावणारे कारण! 

प्रिय वाचकहो, मॉलीन्नोन्गची महती अजून गायची आहे, अन माझा मेघालयातील उर्वरित प्रवास हायेच की, पुढल्या भागांसाठी!!!

तवरिक वाट बगा बरं का मेघालयचं पाव्हनं!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

  • लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (एखादा अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!    
  • एका गाण्याची लिंक सोबत जोडत आहे! 

https://youtu.be/obiMFcuEx6M “Manik Raitong”

अत्यंत सुमधुर असं मूळ खासी भाषेतील गाणं, गायिका “Kheinkor Mylliemngap”   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-3 – सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️

रात्री अकराच्या बसने टोकियोला जायचे होते. आमचा जपान रेल्वे पास या बससाठी चालत होता. तीस जणांची झोपायची सोय असलेली डबल डेकर मोठी बस होती. बसण्याच्या जागेचे आरामदायी झोपण्याच्या जागेत रूपांतर केले आणि छान झोपून गेलो. पहाटे साडेपाच-सहाला जाग आली. सहज बाहेर पाहिले. अरे व्वा! बसमधून दूरवर फुजियामा पर्वत दिसत होता. निळसर राखाडी रंगाच्या त्या भव्य पर्वताच्या माथ्यावर बर्फाचा मुकुट चकाकत होता. सारे खूश झाले. ट्रॅफिक जॅममुळे टोक्यो स्टेशनला पोहोचायला नऊ वाजले. स्टेशनवरच सारे आवरले. आज आम्ही फुजियामाला जाणार होतो व उद्याची टोक्यो दर्शनची तिकीटं काढली होती. आजची रात्र आम्ही टोक्योचे एक उपनगर असलेल्या कावासकी इथे सीमा आणि संदीप लेले यांच्याकडे राहणार होतो. त्यामुळे जवळ थोडे सामान होते.

फुजियामाला जाताना हे सामान नाचवायला नको म्हणून आम्ही ते टोक्यो स्टेशनवरील लॉकरमध्ये ठेवायचे ठरविले. जपानमध्ये सर्व रेल्वे स्टेशन्सवर लॉकर्सची व्यवस्था आहे. आपल्या सामानाच्या साइजप्रमाणे लॉकर निवडून त्यात सामान ठेवायचे. किती तासांचे किती भाडे हे त्यावर लिहिलेले असते. सामान ठेवून लॉकरला असलेली किल्ली लावून ती किल्ली आपल्याजवळच ठेवायची. मात्र सामान परत घेताना योग्य ते भाडे त्या लॉकरला असलेल्या होलमधून टाकल्याशिवाय लॉकर उघडत नाही. तिथल्या एका लॉकरमध्ये सामान ठेवून आम्ही फुजियामाला जाण्यासाठी निघालो. तीन-चार गाड्या बदलून, अनेकांना विचारत शेवटी माथेरानसारख्या छोट्या गाडीने कावागुचिकोला पोहोचलो.फुजियामा  इथे असलेल्या पाच लेक्सपैकी हा एक लेक आहे. तिथून फुजियामाचे सुंदर दर्शन होत होते. हळूहळू थंडी, बोचरे वारे वाढू लागले. तेव्हा परतीचा तसाच प्रवास करून टोक्यो स्टेशनवर आलो.

जगातले सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणून टोक्यो ओळखले जाते. जमिनीखाली आणि जमिनीवर  पाच-सहा मजले अवाढव्य रेल्वे स्टेशन्सचे जाळे पसरले आहे. दररोज लक्षावधी लोक या स्टेशन मधून जा- ये करत असतात. त्या प्रचंड वाहत्या गर्दीत आम्ही हरवल्यासारखे झालो. आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर उतरलो तिथून सकाळी आम्ही ज्या दिशेच्या गेटजवळ सामान ठेवले होते, तो लॉकर काही सापडेना. त्यात भाषेची मोठीच पंचाईत. सगळेजण त्या गर्दीत लॉकर शोधत बसायला नको म्हणून आम्ही तिघे- चौघे एका ठिकाणी बसून राहिलो. लॉकर शोधायला गेलेल्या दोघा जणांना लॉकर सापडून परत आम्ही सर्व एकमेकांना सापडण्यात चांगले दोन तास गेले.

ट्रीपचा शेवटचा दिवस टोक्योदर्शनचा होता. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडतच होता .आयफेलटॉवरसारख्या असणाऱ्या टोक्यो टॉवरवरून शहराचे दर्शन घडले. जपानचा पारंपारिक चहा समारंभ पाहिला. तो हिरव्या रंगाचा, भातुकलीच्या कपांमधून दिलेला कोमट चहा आपल्याला आवडत नाही पण सुंदर किमोनोमधल्या त्या बाहुल्यांसारख्या स्त्रिया, चहा बनविण्याचे हळुवार सोपस्कार वगैरे पाहायला गंमत वाटत होती. नंतर एम्परर गार्डनमध्ये थोडे फिरून जेवायला गेलो. एका मोठ्या हॉटेलात सर्वांसाठी बार्बेक्यू पद्धतीचे जेवण होते. टेबलावर प्रत्येकाजवळ छोटीशी शेगडी ठेवलेली होती. त्यावर कांदा, बटाटा, वांगी, रताळे, मशरूम, लाल भोपळा, लाल मिरची असे सारे गरम गरम भाजून दिलेले होते. जोडीला भात, हिरवा चहा, रताळ्याचा गोड पदार्थ असे आमचे शाकाहारी जेवण होते. परंतु काड्यांनी जेवायची कसरत काही जमली नाही. मग काटे- चमचेच वापरले. त्या दिवशी त्या हॉटेलात बरीच लग्नं होती. ती पाहायला मिळाली. लग्नाच्या वऱ्हाडात उंची किमोनो घालून जपानी गजगामिनी मिरवत होत्या.

आता पाऊस थांबला होता. सुमिडा नदीतून क्रूझने सहल करायची होती. बसमधून तिथे जाताना टोक्योचा आपल्या फोर्टसारखा विभाग दिसला. तेरा ब्रिजच्या खालून आमची क्रूज गेली. ब्रिजवरून कुठे रेल्वे तर कुठे रस्ते होते. इकडून तिकडे सतत वाहतूक चालू होती. बोटीतून उतरल्यावर दोन्ही बाजूंच्या खरेदीच्या दुकानांवर एक नजर टाकून नंतर पॅगोडा पाहिला. टोक्योदर्शनच्या बसमधून उतरण्यापूर्वी गाइडला “आरीगाटो गोसाईमास” म्हटले. म्हणजे जपानी भाषेत त्याचे आभार मानले.

जपानी लोक हे अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि शांत वृत्तीचे आहेत. आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा याचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. हा देश सतत भूकंपाच्या छायेत वावरत असला तरी कुठेही भीतीचा लवलेश नसतो. सर्व नवीन बांधकामे भूकंपाला तोंड देण्यास योग्य अशीच बांधलेली आहेत. नियमाप्रमाणे प्रत्येक घरामध्ये दरवाज्याजवळ पिण्याच्या पाण्याच्या दोन बाटल्या, बॅटरी, मेणबत्त्या, काड्यापेटी, एका वेळचे घरातील सर्वांचे कपडे व थोडी बिस्किट्स, चॉकलेट्स अशी जय्यत तयारी एका बॅगमध्ये करून ठेवलेली असते. जपानमधील राहणीमान खूपच खर्चिक आहे. इथे सगळीकडे झाडे, फुले आहेत पण सारी झाडे, फुले अगदी सैनिकी शिस्तीत वाढल्याप्रमाणे आहेत. नैसर्गिकरित्या वाढलेले, फळाफुलांनी डवरलेले असे एकही झाड आढळत नाही. जपानी लोक ठरवतील तसेच झाडांनी वाढायचे, फुलांनी फुलायचे, बोन्सायरुपाने  दिवाणखाने सजवायचे! तरुण पिढीवर अमेरिकन जीवनशैलीचा फार मोठा प्रभाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचं वेड व प्रचंड महागाई यामुळे लग्न, मुलंबाळं, एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कमी होत आहे. जपानमध्ये अतिवृद्धांची संख्या वाढते आहे तर लहान मुलांची संख्या कमी होत आहे. कोणी सांगावे, उद्या जपानी शास्त्रज्ञ यावरही काही उपाय शोधून काढतील.

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटेच्या थोड्याशा पावसाळी धुक्यातून उगवत्या सूर्यदेवाचे लांबलचक किरणांचे हात आम्हाला निरोप देत होते. डोळ्यांपुढे दिसत होते–

  प्रशांत महासागराच्या हिंदोळ्यावर झुलणारे,

  पाचूच्या कंठ्यामधल्या रत्नासारखे शोभणारे,

   आकाराने लहान, कर्तृत्वाने महान,

   फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभे राहिलेले,

   अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गरुडझेपेने,

   आकाशाला कवेत घेणारे,

    एक स्वच्छ, सुंदर ,शालीन राष्ट्र, जपान!

भाग ३ व जपान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-2 – सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️

क्योटो इथे  एक बौद्ध मंदिर पाहिले. जगातले सगळ्यात मोठे लाकडी बांधकाम असे त्याचे वर्णन केले जाते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सहाव्या शतकात तिथे भारतातून नागार्जुन आणि वसुबंधू नावाचे बौद्ध भिक्षू आले होते, असे तिथे लिहिले होते. नंतर बुद्धाचे १००० सोनेरी पुतळे असलेले व मधोमध भगवान बुद्धाची शांत भव्य मूर्ती असलेले देऊळ पाहिले. त्या मूर्तीपुढील पुतळ्यांची नावे इंद्र, गंधर्व, नारायण, विष्णू, लक्ष्मी अशी आहेत पण त्यांचे चेहरे विचित्र दिसतात. एका पॅगोडामध्ये छताला भव्य सोनेरी कमळांची नक्षी आहे. पाऊस सुरू झाल्याने उरलेले क्योटो  दुसऱ्या दिवशी बघण्याचे ठरले.

क्योटो रेल्वे स्टेशनवर जायला म्हणून एका बसमध्ये चढलो. पण सकाळी जिथे उतरलो होतो ते स्टेशन कुठे दिसेना. कसे दिसणार? कारण आम्ही अगदी विरुद्ध दिशेच्या बसमध्ये बसलो होतो. आमची काहीतरी गडबड झाली आहे हे आजूबाजूच्या जपानी लोकांच्या लक्षात आले पण भाषेची फार अडचण! अगदी थोड्या जणांनाच इंग्रजी समजते. पण तत्परतेने मदत करण्याची वृत्ती दिसली. एका जपानी माणसाला थोडेफार समजले की आम्हाला क्योटो स्टेशनवर जायचे आहे. बस, डेपोमध्ये गेल्यावर त्याने खाणाखुणा करून सांगितल्याप्रमाणे आम्ही धावत पळत त्याच्या मागे गेलो. त्याने आम्हाला योग्य बसमध्ये बसवून दिले.

दुसऱ्या दिवशी क्योटोला जाऊन  गोल्डन टेम्पलला गेलो. एका तळ्याच्या मध्यावर संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढविलेला पॅगोडा आहे. सभोवतालच्या तळ्यात त्याचे सोनेरी प्रतिबिंब चमकत होते. चारी बाजूंनी झाडीने वेढलेल्या पर्वतराजीत राजघराण्याचे हे देऊळ आहे .नंतर जवळच असलेल्या सिल्व्हर  टेम्पलला गेलो. असंख्य फुलझाडांच्या आणि शिस्तीने राखलेल्या झाडांमध्ये हे देऊळ आहे .डोंगरातून वरपर्यंत जाण्यासाठी वृक्षराजींनी वेढलेल्या पाऊलवाटा आहेत. स्वच्छ झऱ्यांमधून सोनेरी, पांढरे ,तांबूस रंगांचे मासे सुळकन इकडे तिकडे पळत होते.

जेवण आटोपून नारा इथे जाण्यासाठी छोट्या रेल्वे गाडीत बसलो. स्वच्छ काचांची छोटी, सुबक गाडी छोट्या छोट्या गावांमधून चालली होती. हिरवी, पोपटी डोलणारी शेती, आखीवरेखीव भाजीचे मळे, त्यात मन लावून कामं करणारी माणसं, टुमदार  घरं, घरापुढे छान छान मोटारगाड्या, रंगसंगती साधून जोपासलेला बगीचा असे चित्रातल्यासारखे दृश्य होते. नारा येथील हरीण पार्क विशेष आकर्षक नव्हते. जवळच असलेल्या लाकडी, भव्य तोडाजी टेम्पलमध्ये ७० फूट उंचीची भगवान बुद्धाची दगडी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला तशाच भव्य पंचधातूच्या, पण सोनेरी मुलामा दिलेल्या बुद्धमूर्ती आहेत.देवळाचे प्रचंड लाकडी खांब दोन कवेत न मावणारे आहेत . जुन्या पद्धतीची जपानी बाग पाहिली. झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या मध्यावर अगदी आपल्या कोकणातल्यासारखा लाकडी रहाट फिरत होता. पूर्वी ही रहाटाची शक्ती वापरून धान्य दळण्यासाठी त्याचा उपयोग करीत असत. बागेमध्ये अनंत व जास्वंदीची झाडे सुद्धा होती.

आज  मियाजिमा व हिरोशिमा इथे जायचे होते. शिनकानसेनने म्हणजेच बुलेट ट्रेनने हिरोशिमा इथे उतरून मियाजिमा  इथे गेलो. तिथून छोट्या बोटीने जाऊन पाण्यावर तरंगणारा पाच मजली शिंटो पॅलेस पाहिला.हे छोटेसे बेट पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यावरील घनदाट वृक्ष फॉल सीझनच्या रंगाने सजू लागले होते.

क्रूझने परत मिआजिमा स्टेशनला येऊन जपान रेल्वेने हिरोशिमाला आलो. जगातला पहिला अणुबॉम्ब जिथे टाकला गेला ते ठिकाण! मानवी क्रौर्याचे अस्वस्थ करणारे स्मारक! अगदी खरं सांगायचं तर तेथील म्युझियम, तिथे दाखवत असलेला माहितीपट  आम्ही फार वेळ बघू शकलो नाही. लोकांचे आक्रंदन, जळणारे देह, कोसळणाऱ्या इमारती यातील काहीही फार वेळ बघवत नाही. मानवतेवर कलंक लावणारे असे ते विदारक चित्र पाहून डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात. मनुष्य इतका क्रूर बनू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. तिथल्या लहान मुलांच्या स्मारकाजवळ काचेच्या मोठ्या चौकोनी पेट्या ठेवल्या होत्या. अणुबॉम्बला विरोध आणि जागतिक शांततेला पाठिंबा दर्शविण्यासाठी  आपण तिथे ठेवलेल्या पांढऱ्याशुभ्र कागदांचे पक्षांचे आकार करून त्या पेट्यांमध्ये टाकायचे. आम्हीही तिथे नाव पत्ता लिहून आमचा शांततेला पाठिंबा दर्शवीत कागदाचे काही क्रेन्स करून त्या काचेच्या पेटीत टाकले. तत्परता म्हणजे एवढी, की आम्ही जपानहून परत येण्याच्या आधीच आम्ही शांततेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल हिरोशिमाच्या मेयरचे आभारदर्शक पत्र घरी येऊन पडले होते.

आज हिमेजी कॅसल बघायला जायचे होते. कोबेच्या सान्योमिया स्टेशनवरून हिमेजीला जाताना अकाशी येथील सस्पेन्शन ब्रिज पहिला.अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसकोच्या गोल्डन ब्रीजपेक्षासुद्धा हा ब्रीज लांबीने जास्त आहे.  हिमेजी स्टेशनला उतरून तिथला भव्य, संपूर्ण लाकडी राजवाडा बघायला गेलो. त्याच्या बाहेरील प्रांगणात बोन्सायचे आणि सुंदर फुलांचे मोठे प्रदर्शन भरले होते. मोठ्या वृक्षांची हुबेहूब छोटी प्रतिकृती करण्याची ही जपानी कला!  अगदी छोट्या, सुंदर आकारांच्या कुंड्यांमधून वाढवलेले छोटे वृक्ष, त्यांना आलेली छोटी फळं, छोटी जंगलं, दगडातील डोंगरातून वाहणारे झरे सारे पाहात रहावे असे होते. डेलिया, जरबेरा, सूर्यफुलांचे विविधरंगी ताटवे होते.

आज  सकाळी कोबेमध्येच घराजवळील रोपवे स्टेशनला जायचे होते. आम्ही राहात होतो, तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर ओरिएंटल हॉटेल नावाची भव्य वास्तू होती. हॉटेलमधल्याच रस्त्याने बुलेट ट्रेनच्या शिनकोबे स्टेशनला जाण्याचा मार्ग होता. हॉटेलच्या लॉबीमध्ये दोन्ही बाजूला फर्निचर, कपडे, खेळण्यांची आकर्षक दुकाने होती. शिनकोबे क्लब होता. लहान मुलांना खेळायची जागा होती. छोटे पब, रेस्टॉरंट होते. जमिनीखालील दोन मजल्यांवर ग्रोसरी व फळे फुले यांची दुकाने होती. तिथून भुयारी रेल्वेच्या स्टेशनला जाता येत होते आणि आमचा रोपवेला जाण्याचा मार्ग हॉटेलच्या रस्त्यामधून एका बाजूला होता. एखाद्या जागेचा जास्तीत जास्त, अत्यंत सोयीस्कर व नेटका उपयोग कसा करून घ्यायचा याचे हे एक उत्तम उदाहरण वाटले.

रोपवेने डोंगरमाथ्यावर गेलो.फुजिसान म्हणजे फुजियामा पर्वत सोडला तर इथे कुठचाही डोंगर उघडा- बोडका नाहीच. वृक्षांची लागवड करून, ते जोपासून सारे हिरवे राखले आहे. डोंगर माथ्यावरील हर्ब पार्कमध्ये औषधी वनस्पती, भाज्या वाढविल्या आहेत. त्यात गवती चहा, पुदिना, तुळस, माका, ब्राह्मी, आले, मिरी वगैरे झाडे जोपासली होती. मोठ्या काचगृहातून केळीची लागवड केली होती. कारंजी ,झरे ,फुलांचे गालिचे होते. डोंगर माथ्यावरून साऱ्या कोबे शहराचा नजारा दिसत होता.

जपान भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-1 – सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️

सूर्यदेवांची उबदार किरणं पृथ्वीवर जिथे पहिली पावलं टाकतात तो देश जपान! किमोनो आणि हिरव्या रंगाच्या चहाचा देश जपान! हिरोशिमाच्या अग्नीदिव्यातून झळाळून उठलेला देश जपान! साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी या जपानला जायचा योग आला. आम्ही मुंबईहून हॉंगकॉंगला विमान बदलले आणि चार तासांनी ओसाका शहराच्या कंसाई विमानतळावर उतरलो. आधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा आविष्कार इथूनच पहायला मिळाला. जपानने कंसाई हे मानवनिर्मित कृत्रिम बेट भर समुद्रात बांधले आहे व त्यावर भलामोठा विमानतळ उभारला आहे. हे कृत्रिम बेट सतत थोडे थोडे पाण्याखाली जाते आणि दरवर्षी हजारो जॅक्सच्या सहाय्याने ते वर उचलले जाते. विमानातून उतरून कस्टम्स तपासणीसाठी दाखल झालो. शांत, हसऱ्या चेहऱ्यांच्या जपानी मदतीमुळे विनासायास त्या भल्यामोठ्या विमानतळाबाहेर आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आमचे मित्र श्री.अरुण रानडे यांच्याबरोबर टॅक्सीने त्यांच्या घरी कोबे इथे जायचे होते.

त्या मोठ्या टॅक्सीच्या चारही बाजूंच्या स्वच्छ काचांमधून बाहेरची नवी दुनिया न्याहाळत चाललो होतो. एकावर एक असलेले चार-पाच एक्सप्रेस हायवे झाडांच्या, फुलांच्या, दिव्यांच्या आराशीने नटले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या आकाराच्या दहा मजली इमारती होत्या. त्यांच्या पॅसेजमध्ये एकसारखे, एकाखाली एक सुंदर दिवे लागले होते. असं वाटत होतं की, एखाद्या जलपरीने लांबच लांब रस्त्यांची पाच पेडी वेणी घातली आहे. त्यावर नाना रंगांच्या पानाफुलांचा गजरा माळला आहे. दोन्ही बाजूंच्या दिव्यांच्या माळांचे मोत्याचे घोस केसांना बांधले आहेत. कंसाई ते कोबे हा शंभर मैलांचा, सव्वा तासाचा प्रवास रस्त्यात एकही खड्डा नसल्याने अलगद घरंगळल्यासारखा झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून निघालो. अनघा व अरुण रानडे यांचे कोबेमधले घर एका डोंगराच्या पायथ्याशी पण छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर होते. तिथून रेल्वे व बस स्टेशन जवळपासच होते. आम्ही आसपासची दुकाने, घरे,  बगीचे न्याहाळत बसस्टॅंडवर पोहोचलो. कोबे हिंडण्यासाठी बसचा दिवसभराचा पास काढला. बसने एका मध्यवर्ती ठिकाणी उतरून दाईमारू नावाचे चकाचक भव्य शॉपिंग मॉल तिथल्या वस्तूंच्या किमतींचे लेबल पाहून फक्त डोळ्यांनी पाहिले. नंतर दुसऱ्या बसने मेरीकॉन पार्कला गेलो. बरोबर आणलेले दुपारचे जेवण घेऊन पार्कमध्ये ठेवलेली चारशे वर्षांची जुनी भव्य बोट पाहिली. संध्याकाळी पाच वाजताच इथे काळोख पडायला लागतो. समुद्रावर गेलो. तिथून कोबे टॉवर व समुद्राच्या आत उभारलेले सप्ततारांकित ओरिएंटल हॉटेल चमचमतांना दिसत होते. नकाशावरून मार्ग काढत इकॉल या हॉटेलच्या अठराव्या मजल्यावर जाऊन तिथून रात्रीचे लखलखणारे कोबे शहर, कोबे पोर्ट ,कोबे टॉवर पाहिले. त्यामागील डोंगरांची रांग मुद्दामहून वृक्ष लागवड करून हिरवीगार केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे सारे दृश्य विलोभनीय वाटत होते.

आज रविवार.क्योटो इथे जायचे होते. मुंबईहून येतानाच आम्ही सात दिवसांचा जपानचा रेल्वे पास घेऊन आलो होतो. भारतीय रुपयात पैसे देऊन हा पास मुंबईत ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, चर्चगेट इथे मिळतो. ही सोय फार छान आहे. जेव्हा आपण जपान रेल्वेने पहिला प्रवास करू त्यादिवशी हा पास तिथल्या स्टेशनवर एंडॉर्स करून घ्यायचा. त्या दिवसापासून सात दिवस हा पास जपान रेल्वे, बुलेट ट्रेन व जपान रेल्वेच्या बस कंपनीच्या बसेसनासुद्धा चालतो. आज बुलेट ट्रेनचा पहिला प्रवास आम्हाला घडणार होता. घरापासून जवळच असलेल्या शिनकोबे या बुलेट ट्रेनच्या स्टेशनवर पोहोचलो. रेल्वे पास दाखवून क्योटोच्या प्रवासाची स्लीप घेतली. स्टेशनवर बुलेट ट्रेन सटासट येत जात होत्या. आपल्याला दिलेल्या कुपनवर गाडीची वेळ व डब्याचा क्रमांक दिलेला असतो.तो क्रमांक प्लॅटफॉर्मवर जिथे लिहिलेला असेल तिथे उभे राहण्याची खूण केलेली असते. तिथे आपण सिंगल क्यू करून उभे राहायचे. आपल्या डब्याचा दरवाजा बरोबर तिथेच येतो. दरवाजा उघडल्यावर प्रथम सारी उतरणारी माणसे शांतपणे एकेरी ओळीतच उतरतात. तसेच आपण नंतर चढायचे व आपल्या सीट नंबरप्रमाणे  बसायचे. नो हल्लागुल्ला! गार्ड प्रत्येक स्टेशनला खाली उतरून प्रवासी चढल्याची खात्री करून घेऊन मगच ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे एका बटनाने लावतो. नंतर शिट्टी देउन, ‘ सिग्नल पाहिला’ याची खूण करून गाडी सुरू करण्याची सूचना ड्रायव्हरला देतो. सारे इतक्या शिस्तीत, झटपट व शांतपणे होते की आपणही अवाक होऊन सारे पाहात त्यांच्यासारखेच वागायला शिकतो. या सर्व ट्रेन्समधील सीट्स आपण ज्या दिशेने प्रवास करणार त्या दिशेकडे वळविण्याची सहज सुंदर सोय आहे. ताशी २०० किलोमीटरहून अधिक वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनचा प्रवास म्हणजे एक चित्तथरारक अनुभव होता.( या गतीने मुंबईहून पुणे एका तासाहून कमी वेळात येईल.) तिकीट चेक करायला आलेला टी.सी. असो अथवा ट्रॉलीवरून पदार्थ विकणारी प्रौढा असो, डब्यात येताना व डब्याबाहेर जाताना दरवाजा बंद करायचा आधी कमरेत वाकून प्रवाशांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.

जपान भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग-4 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग-4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

केदारनाथहून जोशीमठ या ( त्या वेळेच्या )रम्य ठिकाणी मुक्काम केला. इथे श्री लक्ष्मी नृसिंहाचे सुंदर देऊळ आहे. आम्हाला नेमका नृसिंह जयंतीच्या दिवशी दर्शनाचा लाभ झाला या योगायोगाचे  आश्चर्य वाटले व आनंद झाला. जोशीमठहून एक रस्ता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातो. गढवाल हिमालयातील ही विविध फुलांची जादूई दुनिया ऑगस्ट महिन्यात बघायला मिळते. लक्ष्मणप्रयाग किंवा गोविंदघाट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावरून गेलं की घांगरिया इथे मुक्काम करावा लागतो. नंतर खड्या चढणीचा रस्ता आहे. वाटेत पोपटी कुरणं आहेत. हिमधवल शिखरांच्या पार्श्वभूमीवर निळी, पिवळी, गुलाबी, जांभळी, पांढरी अशा असंख्य रंगांची, नाना आकारांची अगणित फुलं मुक्तपणे फुलत असतात. घांगरीयाहून हेमकुंड इथे जाता येते. इथे गुरुद्वारा आहे. मोठा तलाव आहे. आणि अनेकानेक  रंगांची, आकारांची फुले आहेत. लक्षावधी शिख यात्रेकरू व इतर अनेक हौशी साहसी प्रवासी, फोटोग्राफर ,निसर्गप्रेमी ,वनस्पती शास्त्रज्ञ या दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट देतात.

जोशीमठ इथून रुद्रप्रयागवरून बद्रीनाथचा रस्ता आहे. रुद्रप्रयागला धवलशुभ्र खळाळती अलकनंदा आणि संथ निळसर प्रवाहाची मंदाकिनी यांचा सुंदर संगम आहे. बद्रीनाथचा रस्ता डोंगर कडेने वळणे घेत जाणारा, दऱ्याखोऱ्यांचा आणि हिमशिखरांचाच आहे. आत्तापर्यंत अशा प्रवासाची डोळ्यांना, मनाला सवय झाली असली तरी बद्रीनाथचा प्रवास अवघड, छाती दडपून टाकणारा आहे. अलकनंदा नदीच्या काठावरील बद्रीनाथाचे म्हणजे श्रीविष्णूचे मंदिर जवळ जवळ अकरा हजार फुटांवर आहे. आदि शंकराचार्यांनी नवव्या शतकात या मंदिराची स्थापना केली असे  सांगितले जाते. धो धो वाहणाऱ्या अलकनंदेच्या प्रवाहाजवळच अतिशय गरम वाफाळलेल्या पाण्याचा स्रोत एका कुंडात पडत असतो. मंदिरात काळ्या पाषाणाची श्रीविष्णूंची सुबक मूर्ती आहे. तसेच कुबेर, गणेश, लक्ष्मी, नरनारायण अशा मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर पॅगोडा पद्धतीचे आहे व ते सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेले आहे. मूर्तीच्या दोन हातात शंखचक्र आहे व दोन हात जोडलेल्या स्थितीत आहेत. मूर्तीला सुवर्णाचा मुखवटा आहे. डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर लाकडी असून दरवर्षी मे महिन्यात त्याला रंगरंगोटी करतात. नवव्या शतकात आदि शंकराचार्यांनी बांधलेल्या या मंदिराचे तेराव्या शतकात गढवालच्या महाराजांनी पुनर्निर्माण केले. या मंदिराच्या शिखरावरचे सोन्याचे पत्रे इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी चढविले असे सांगितले जाते.

आम्ही पहाटे उठून लॉजवर आणून दिलेल्या बदलीभर वाफाळत्या पाण्याने स्नान करून मंदिराकडे निघालो. बाहेर कडाक्याची थंडी होती. थोडे अंतर चाललो आणि अवाक् होऊन उभे राहिलो. निरभ्र आकाशाचा घुमट असंख्य चांदण्यांनी झळाळत होता. पर्वतांचे कडे तपश्चर्या करणाऱ्या सनातन ऋषींसारखे भासत होते. त्यांच्या हिमशिखरांवरून चांदणे ओघळत होते. अवकाशाच्या गाभाऱ्यात असीम शांतता होती. नकळत हात जोडले गेले. डोळ्यातून पाणी वाहू लागले. आत्तापर्यंतच्या प्रवासाची दगदग,श्रम साऱ्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मनात आलं की देव खरंच मंदिरात आहे की निसर्गाच्या या अनाघ्रात, अवर्णनीय, अद्भुत सौंदर्यामध्ये आहे?

मंदिरात गुरुजींनी हातावर लावलेल्या चंदनाचा गंध अंतर्यामी सुखावून गेला. शेषावर शयन करणाऱ्या, शांताकार आणि विश्वाचा आधार असणाऱ्या पद्मनाभ श्री विष्णूंना हात जोडताना असं वाटलं की,

           या अमूर्ताची संगत सोबत

          जीवनगाण्याला लाभू दे

          गंगाप्रवाहात उजळलेली श्रद्धेची ज्योत

          आमच्या मनात अखंड तेवू दे

हा आमचा प्रवास जवळजवळ वीस बावीस वर्षांपूर्वीचा! त्यानंतर दहा वर्षांनी हे व माझे एक मेहुणे पुन्हा चारधाम यात्रेला गेले. माझा योग नव्हता. परत आल्यावर यांचे पहिले वाक्य होते, ‘आपण जो चारधामचा पहिला प्रवास केला तोच तुझ्या डोळ्यापुढे ठेव. आता सारे फार बदलले आहे. बाजारू झाले आहे. प्लास्टिकचा भयानक कचरा, वाढती अस्वच्छता, कर्णकटू संगीत, व्हिडिओ फिल्म, वेड्यावाकड्या, कुठेही, कशाही उगवलेल्या इमारती यांनी हे सारे वैभव विद्रूप केले आहे’. त्यावेळी कल्पना आली नाही की ही तर साऱ्या विनाशाची नांदी आहे.

यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये केदारनाथला महाप्रलय झाला. झुळझुळणाऱ्या अवखळ मंदाकिनीने उग्ररूप धारण केले. हजारो माणसे मृत्युमुखी पडली. शेकडो माणसे, जनावरे वाहून गेली. नियमांना धुडकावून बांधलेल्या मोठमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, जमीनदोस्त झाल्या. मंदाकिनीच्या प्रकोपात सोनप्रयाग, गौरीकुंड, रामबाडा इत्यादी अनेक ठिकाणांचे नामोनिशाण उरले नाही. अनेकांनी, विशेषतः लष्करातील जवानांनी प्राणांची बाजी लावून अनेकांना या महाप्रलयातून सुखरूप बाहेर काढले.

मंदाकिनी अशी का कोपली? या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वतःकडेच बोट दाखवावे लागेल. मानवाचा हव्यास संपत नाही. निसर्गाला ओरबाडणे थांबत नाही. शेकडो वर्षे उभे असलेले, जमिनीची धूप थांबविणारे ताठ वृक्ष निर्दयपणे तोडताना हात कचरत नाहीत .निसर्गनियमांना धाब्यावर बसून नदीकाठांवर इमारतींचे आक्रमण झाले. त्यात प्लास्टिकचा कचरा, कर्णकर्कश आवाज, अस्वच्छता यांची भर पडली. किती सोसावे निसर्गाने?

उत्तराखंडाला उत्तरांचल असंही म्हणतात. निसर्गाने आपल्याला बहाल केलेले हे अनमोल दैवी उत्तरीय आहे. या पदराने भारताचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण केले आहे. तीव्र थंडीपासून बचाव केला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आपल्याला बहाल केला आहे. उत्तरांचलचे प्राणपणाने संरक्षण करणे हे आपले उत्तरदायित्व आहे.

जलप्रलयानंतर असे वाचले होते की, एक प्रचंड मोठी शिळा गडगडत येऊन केदारनाथ मंदिराच्या पाठीशी अशी टेकून उभी राहिली की केदारनाथ मंदिराचा चिरासुद्धा हलला नाही. मंदिर आहे तिथेच तसेच आहे. फक्त तिथे आपल्याला पोहोचवणारी वाट, तो मार्ग हरवला आहे. नव्हे, नव्हे. आपल्या करंटेपणाने आपणच तो मार्ग हरवून बसलो आहोत .सर्वसाक्षी ‘तो’ म्हणतो आहे,’ तुम्हा मानवांच्या कल्याणासाठी ‘मी’ इथे जागा आहे. तुम्ही कधी जागृत होणार?

 – भाग ४ व उत्तराखंड समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 41 – भाग-3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

हरिद्वारहून चारधाम यात्रेची सुरुवात झाली.  गढवाल निगमच्या बसने हरिद्वारपासून हनुमान चट्टीपर्यंत गेलो . तिथून जानकी चट्टीपर्यंत जंगलातील खूप चढावाचा रस्ता चढायचा होता.( आता बसेस जानकी चट्टीपर्यंत जातात .)दुपारी दोन अडीच वाजता आम्ही चढायला सुरुवात केली तेव्हा आकाश निरभ्र होतं. चार वाजता अकस्मात सारं बदलून गेलं .हां हां म्हणता चारी बाजूंनी काळे ढग चाल करून आले. गारांचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. थंडीने हृदय काकडू लागलं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा दाट काळोख, वारा आणि पाऊस होता. डावीकडील दरीतून अंधार चिरत येणारा रोरावणार्‍या यमुनेचा आवाज जिवाचा थरकाप करीत होता. बरोबरच्या ग्रुपमधील कोण कुठे होते त्याचा पत्ता नव्हता. सारंच विलक्षण अद्भुत वाटत होतं. एका पहाडी माणसाने आम्हाला खूप मदत केली. ‘आस्ते चलो, प्रेमसे चलो, विश्वाससे  चलो’ असे सांगत धीर दिला. रस्ता दाखविला. सोबत केली. वाटेत कुणी त्याचा गाववाला भेटला की दोघं एकमेकांना ‘जय जमुनामैया’ असं अभिवादन करीत. सर्वजण कसेबसे, थकूनभागून, संपूर्ण भिजून गढवाल निगमच्या जानकी चट्टीच्या निवासस्थानी आलो. कोणी कोणाशी  बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. तिथल्या माणसाने जी खिचडी वगैरे दिली ती खाऊन ओल्या कपड्यातच कशीबशी उरलेली रात्र काढली. पहाटे लवकर उजाडलं. सूर्याच्या सोनेरी किरणांनी पर्वतांच्या माथ्यावरचे बर्फ सोन्यासारखे चमकू लागले .इतकं सगळं शांत आणि स्वच्छ होतं की कालचं वादळ ‘तो मी नव्हेच’ म्हणंत होतं.फक्त आजूबाजूला कोसळलेल्या वृक्षांवरून कालचा वादळाची कल्पना येत होती.

जानकी चट्टीहून यमुनोत्रीपर्यंतचा सहा- सात किलोमीटरचा रस्ता उभ्या चढणीचा, दरीच्या काठाने जाणारा आहे. हिरवेगार डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आहेत.चालत किंवा घोड्यावरून अथवा दंडी म्हणजे पालखीतून किंवा कंडीतून जाता येते .कंडी म्हणजे आपण आसाममध्ये पाठीवर बास्केट घेऊन चहाची पाने खुडणाऱ्या बायका पाहतो तशाच प्रकारची निमुळती बास्केट असते. त्यात आपल्याला बसवतात आणि पाठीवर घेऊन ती शिडशिडीत ,काटक माणसे तो उभा चढ चढतात. या दुर्गम प्रदेशातील जीवन खडतर आहे. अज्ञान, गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांचे कष्टमय जीवन पर्यटकांवरच अवलंबून असतं.

यमुनोत्रीचे देऊळ बारा हजार फुटांवर आहे. निसर्गाचं आश्चर्य म्हणजे जिथे यमुनेचा उगम होतो, तिथेच गरम पाण्याचे कुंडसुद्धा आहे. त्यात तांदुळाची पुरचुंडी टाकली की थोड्यावेळाने भात शिजतो. अनेक भाविक हा प्रयोग करीत होते .अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत खूप यात्रेकरू इथे येतात. त्यानंतर बर्फवृष्टीमुळे मंदिर सहा महिने बंद असते.

यमुनोत्री ते गंगोत्री हा साधारण अडीचशे किलोमीटरचा रस्ता दऱ्यांच्या काठावरून नागमोडी वळणाने जातो. पहाडांना बिलगून चालणारी ही अरुंद वाट, पहाडातून खळाळत येणारे निर्मल, थंडगार पाण्याचे झरे ,लाल- जांभळ्या फुलांनी डवरलेले खोल दरीतले वृक्ष सारे हजारो वर्षांपूर्वी भगीरथाने गंगावतरणासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची आठवण करून देतात. यमुनोत्री व गंगोत्रीचा हा परिसर उत्तरकाशी जिल्ह्यात येतो. उत्तरकाशी हे एक नितांत रमणीय ठिकाण आहे. उत्तरकाशीमध्ये शिवाचे प्राचीन मंदिर आहे. इथले मॅग्नेलिया वृक्ष मंद मधूर सुवासाच्या, पांढऱ्या, तळहाताएवढ्या कमलांसारख्या फुलांनी डवरलेले होते.

गंगोत्री मंदिरापर्यंत बस जाते .बर्फाच्छादित शिखरे  व गंगेचा खळाळणारा थंडगार प्रवाह इथे आहे. गंगेचा खरा उगम हा गंगोत्रीच्या वर २५ किलोमीटरवर गोमुख इथे आहे. अतिशय खडतर चढणीच्या या रस्त्यावरून काहीजण गोमुखाकडे चालत जात होते. तिथे प्रचंड अशा हिमकड्यातून भागिरथीचा( इथे गंगेला भागिरथी म्हटले जाते)  हिमाच्छादित प्रवाह उगम पावतो.

गंगोत्रीहून गौरीकुंड इथे आलो. तिथे गरम पाण्याचे कुंड आहे. असंख्य भाविक त्यात स्नान करीत होते .तिथली अस्वच्छता पाहून आम्ही नुसते हात पाय धुवून केदारनाथकडे निघालो .गौरीकुंडापासूनचा १४ किलोमीटरचा चढ छोट्या घोड्यावरून ( पोनी ) पार करायचा होता. एका बाजूला पर्वतांचे उभे कातळकडे, निरुंद वाट आणि लगेच खोल दरी असा हा थोडा भीतीदायक पण परिकथेसारखा प्रवास आहे. खोल दरीतून मंदाकिनी नदीचा अवखळ हिमशुभ्र प्रवाह कधी वेडी- वाकडी वळणे घेत तर कधी उड्या मारत धावत होता. फार चढणीच्या वेळी घोड्यावरून उतरून थोडे पायी चालावे लागते. त्यावेळी पर्वतांच्या कपारीतून धावत येणारे धबधबे, झरे दिसतात. त्यांचे शुद्ध, मधुर, गार पाणी पिता येते. झऱ्याच्या पाण्याने निसरड्या झालेल्या अरुंद पाय वाटेवरून चालताना आजूबाजूचे उंच पर्वतकडे, हिरवी दाट वृक्षराजी ,अधूनमधून डोकावणारी हिमाच्छादित शिखरे, दरीच्या पलीकडच्या काठाला संथपणे चरणाऱ्या शेकडो गुबगुबीत मेंढ्यांचा कळप हे सारे नितळ गूढरम्य वातावरण आपल्याला या अनादी, अनंत, अविनाशी चैतन्याचा साक्षात्कार घडविते.

केदारनाथचे चिरेबंदी मंदिर साधारण ११००० फुटांवर आहे. इथे मंदाकिनी नदीचा उगम होतो. अशी कथा आहे की कुरुक्षेत्राची लढाई झाल्यानंतर पाचही पांडव पापक्षालन करण्यासाठी तीर्थयात्रा करीत होते. त्यांना पाहून भगवान शंकराने रेड्याचे रूप घेतले व आपले तोंड जमिनीत खुपसले. म्हणून इथले केदारनाथाचे लिंग नेहमीच्या शाळुंका स्वरूपात नसून फुगीर पाठीसारखे आहे. इथल्या महाद्वारापुढे नंदी आहे. नंदीच्या मागे मोठी घंटा आहे. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. गाभाऱ्यात तुपाचे नंदादीप अहोरात्र तेवत असतात. इथे अभिषेक करण्याची पद्धत नाही. त्या ऐवजी लिंगावर तुपाचे गोळे थापतात. सभामंडपाच्या भिंतीत पाच पांडव, द्रौपदी, कुंती, पार्वती, लक्ष्मी अशा पाषाणमूर्ती आहेत. इथून जवळच आदि शंकराचार्यांची समाधी आहे. इथे सतत बर्फ पडत असल्याने मंदिरात जाण्याची वाट ही बर्फ बाजूला करून बनविलेली असते.दोन्ही बाजूंचे बर्फाचे ढिगारे न्याहाळत अलगद वाटचाल करावी लागते. अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत हे मंदिर उघडे असते व नंतर सहा महिने बंद असते.

उत्तराखंड भाग तीन समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

जिम कार्बेट ते रानीखेत हे अंतर तसं कंटाळवाणं आहे. रानीखेत हे भारतीय लष्करातील नावाजलेल्या कुमाऊँ रेजिमेंटचं मुख्य ठिकाण आहे. रानीखेतमधील कुमाऊँ रेजिमेंटच्या म्युझियममध्ये भारतीय लष्करातील धाडसी, निधड्या छातीच्या वीरांची यशोगाथा बघायला मिळते. दोन परमवीर चक्र व तीन अशोक चक्राचे मानकरी यात आहेत. रानीखेतहून कौसानीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावर सारख्या उंचीचा काळपट हिरवा गालिचा पसरल्यासारखे चहाचे मळे आहेत. कौसानीला चहाची फॅक्टरी पाहिली. तिथे विकत घेतलेला चहा मात्र आपल्याला न आवडणारा गुळमुळीत चवीचा निघाला. रानीखेत- कौसानी रस्त्यावर जंगलामध्ये लाल बुरांस म्हणजे होडोडेंड्रॉन वृक्षाची लालबुंद फुलं सतत दिसतात. या फुलांच्या गोडसर सरबताचा उन्हाळ्यात औषधासारखा उपयोग होतो अशी माहिती मिळाली. कौसानीतल्या आमच्या हॉटेलच्या बगीच्यात किंबहुना  तिथल्या बहुतांश बगीच्यात , हॉटेलात शोभेच्या जाड पानांची अनेक झाडे, कॅक्टसचे वेगवेगळे शोभिवंत प्रकार होते. यातील एका प्रकारच्या कॅक्टसच्या खोडांचा पल्प काढून त्यापासून प्लायवुड बनविले जाते असे तिथल्या हॉटेल मॅनेजरने सांगितले.

‘पृथ्वीचा मानदंड’ असे ज्याचे सार्थ वर्णन कवी कुलगुरू कालिदासाने केले आहे तो ‘हिमालयो नाम नगाधिराज’ म्हणजे भारताला निसर्गाकडून मिळालेलं फार मोठं वरदान आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल या साऱ्यांना हिमालयाचा वरदहस्त लाभला आहे. अशा अफाट हिमालयाच्या उत्तुंग पहाड रांगांना वेगवेगळी नावे आहेत. धौलाधार, पीरपांजाल, कुमाऊँ ,गढवाल अशा विविध रांगांच्या अनंत हातांनी हिमालय आपल्याला बोलावत राहतो. एकदा हिमालयाच्या प्रेमात पडलं की अनेक वेळा तिथे जायचे योग येतात.

साधारण वीस- पंचवीस वर्षांपूर्वी चारधाम यात्रेचा बेत केला. हरिद्वारपासून हरिद्वारपर्यंत असं चारधाम प्रवासाचे बुकिंग गढवाल निगमतर्फे केलं होतं. यात्रा सुरू होण्याआधी चार दिवस डेहराडून एक्सप्रेसने डेहराडूनला पोहोचलो. डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात वसली आहे. भरपूर पाऊस, आकाशाला भिडणारे वृक्ष, डोंगरउतारावरची छोटी छोटी घरं, नाना रंगांची फुलझाडं असणाऱ्या डेहराडूनमध्ये अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी, पेट्रोलियम रिसर्च इन्स्टिट्यूट, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जीऑलॉजी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट अशा संस्था तसेच लष्कराला अनेक प्रकारचे साहित्य पुरविणारी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. आम्हाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघायला मिळाली. तिथे पुरातन मजबूत वृक्षांचे ओंडके गोल कापून ठेवले होते. त्या खोडांच्या अंतरेर्षांवरून त्या झाडाचं वय कितीशे वर्ष आहे, त्याचे उपयोग, सध्या या जातीचे किती वृक्ष आहेत अशी माहिती तिथे सांगितली.

तिथून मसुरीला गेलो. साधारण साडेसहा हजार फुटावरील मसुरीला हिल स्टेशन्सची राणी म्हणतात. स्क्रूसारख्या वळणावळणांचा मसुरीचा रस्ता केव्हा एकदा संपतो असं झालं होतं. डोंगरकपारीतली एकावर एक वसलेली चढती घरे पाहत मसुरीला पोहोचलो. मसूरी हेसुद्धा शैक्षणिक व औद्योगिक केंद्र आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) मधील यशस्वी उमेदवारांना इथे ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये ट्रेनिंग दिलं जातं. सुप्रसिद्ध डून स्कूल तसेच मोठी ॲग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी आहे. रोपवेने गनहिलला गेलो. इथून संपूर्ण मसुरी, डून व्हॅली व दूरवर हिमालयाच्या शिवालिक रेंजेस दिसतात. मसुरीला मोठे बगीचे व मासेमारीसाठी तलाव आहेत. इथून हिमालयातील लहान- मोठ्या ट्रेकिंगच्या मोहिमा सुरू होतात. त्यांचे बेस कॅम्पस् व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथे आहे. आमचे सीडार लॉज खूप उंचावर होते. सभोवती घनदाट देवदार वृक्षांचे कडे होते. मसुरीहून दुसऱ्या दिवशी केम्प्टी फॉल्स बघायला गेलो. गोल गोल वळणांच्या रस्त्याने दरीच्या तळाशी पोहोचलो. खूप उंचावरून धबधबा कोसळत होता. त्याच्या थंडगार तुषारांनी सचैल स्नान झाले. हौशी प्रवाशांची गर्दी मुक्त मनाने निसर्गाच्या शॉवरबाथचाआनंद घेत होती.

मसुरीहून हरिद्वारला मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला गेलो. तिथल्या झुलत्या पुलावरून पलीकडे गेल्यावर अनेक आश्रम होते. साधू, बैरागी, शेंडी ठेवलेले परदेशी साधक यांची तिथे गर्दी होती. इथे गंगेच्या खळाळत्या थंडगार पाण्याला खूप ओढ आहे. गंगाघाटाच्या कडेने बांधलेल्या लोखंडी साखळीला धरून गंगास्नानाचा आनंद घेतला. संध्याकाळी हरिद्वारला गंगेच्या घाटावर आरती करून दीप पूजा केली.

उत्तराखंड भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares