मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिंतन… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ चिंतन… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे मी पहिल्यांदा 1960 मध्ये टीव्ही मध्ये दिसले….

वरील विधान वाचून तुम्हाला नक्की वाटेल की पतकी बाई धादांत खोटं बोलत आहेत 1960 साली सोलापुरात टीव्हीचे प्रसारण नव्हतं महाराष्ट्रात कुठेही नव्हतं मग मी 60 साली टीव्हीवर आली कशी ही बाई… त्याचीच गोष्ट ऐकूयात म्हणजे वाचूया

साधारणपणे जानेवारी महिन्याच दिवस असावे. सकाळी थंडी असायची पण दुपारी रणरण ऊन. शाळेला हुरडयाची सुट्टी होती. त्या काळात सिद्धेश्वर जत्रेला धरून ती सुट्टी असायची… सिद्धेश्वर तळं पूर्णपणे आटलेलं होतं म्हणजे तिथे संपूर्ण तळ्याला भेगा भेगा पडलेल्या मला अजूनही आठवतात आणि मंदिरातून मार्केटमध्ये.. लक्ष्मी मार्केटमध्ये येण्यासाठी माणूस सहज चालत त्या मातीवरून येतो.. शेतात चालावं असं वाटत होतं. चिखल वगैरे काय असेल पूर्वी तो वाळून वाळून गेलेला, पूर्ण भेगा पडलेल्या आणि माणूस आरामात त्याच्यावरून चालत येत होता. आणि मला ते स्पष्टपणे आठवते!

मी माझ्या आजीबरोबर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. माझं वय तेव्हा 10 ते 11 या दरम्यानच होतं आणि आजी आम्हाला देवळामध्ये, मार्केटमध्ये, भजनाला, कीर्तनाला, रथ बघायला, चित्रपट बघायला घेऊन जायची. तिला सिनेमाची खूप आवड होती त्यामुळे ती चित्रपट बघायला आम्हाला घेऊन जायची. तिला चौफेर ज्ञान होतं.

19 व्या शतकाच्या शेवटाची बाई म्हणजे 1899 /98 चा जन्म असेल. शिक्षण अजिबात नाही पण हुशार इतकी अफाट.. बघून बघून वाचायला शिकली आणि खूप पुस्तकं वाचत होती. गोष्टी सांगायचा तिला छंद होता आणि सांगण्याची शैली पण होती. आता आजीबद्दल जास्त सांगत नाही, प्रसंगाबद्दल आपण बोलूयात. तर ती मला सिद्धेश्वरच्या मंदिरात घेऊन गेली.. दर्शन वगैरे झालं. आजी बरोबर जायचं त्यावेळेला कारण असं होतं की तिथून आम्ही लक्ष्मी मार्केटला जाणार होतो आणि त्या बाजूला गड्ड्याची दुकानं इथपर्यंत लागलेली होती, तिथं आपल्याला आजी काहीतरी घेऊन देईल या विचाराने मी तिच्याबरोबर गेले होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तळ्यातून वाट काढीत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर ओबडधोबड पायऱ्या होत्या.. त्याच्यावरून वर आलो होतो आणि थेट लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटच्या दोन्ही बाजूला आज जे लोक बसतात तिथेच लोक बसायचे, तिथेच काहीतरी थोडेसे पाली वगैरे टाकलेले होत्या आणि त्याच भागांमध्ये काही चार दुकान भरलेली होती किंवा लागत होती. आजी म्हणाली ‘ रस पिऊ यात का’ ‘ बारा वाजले आहेत उन्हात रस पिऊ नये ‘ इती मी..

तिथेच बाजूला एक स्टॉल होता. एक पांढरं कापड.. त्या समोर खुर्ची टाकून एक माणूस बसलेला आणि तो ओरडत होता ‘ अपने खुद को टीव्ही पे देखो.. अपने को टीव्ही पे देखो ‘.. तर आजीला ते जरा कुतूहल वाटलं. काहीतरी नवीन होतं तर आजी म्हणाली ‘काय आहे? ‘ तर तो माणूस म्हणाला तुम्हाला टीव्ही वरती पाहता येईल. म्हणून ‘आम्ही आम्हाला दोघींना पाहता येईल का? ‘ ‘तुम्हाला नाही, अकेला जायेगा और उसको दुसरा देखेगा ‘. ‘ पैसा कितना लगेगा? ‘ तो म्हणाला ‘ चाराने.. कितना टाइम देखेगा ‘ तो. ‘ मला दोन मिनिट ‘.. आजी मला म्हणाली ” तू त्या टीव्हीच्या खोक्याच्या मागच्या बाजूला जा, मशीन समोर उभे रहा, मी तुला टीव्हीवर पाहीन “. मी म्हणलं ” काहीतरी काय मला तर मी दिसणार नाही तुला दिसून काय फायदा आहे? ” तिचं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली ” हे टीव्ही आपल्याकडे येईल पण तू मोठे झाल्यावर… तू हुशार आहेस त्यामुळे टीव्हीवर कुठेतरी दिसशील आहे त्यावेळेला मी कुठे असणार आहे? तेव्हा मी तुला आता डोळे भरून टीव्हीवर पाहते ” या इमोशनल ड्रामावर मला काहीच बोलता आलं नाही आणि मी खूप लहान होते. दहा अकरा वर्षाच्या मुलीला काय कळतंय? फक्त एवढं कळत होतं की चार आणे रक्कम खूप मोठी आहे, त्यात आपल्या घरची सगळ्यांची एक वेळची भाजी येते. पण तिचे हिशोब वेगळे होते तिने त्याला चार आणे दिले. मी तो पडदा टाकला होता त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि समोर एक टीव्हीसारखं खोकं होतं तिथे आजी खुर्चीवर बसली आणि ती मला बघत होती. मग त्या माणसाने मला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला सांगितल्या.. आपण फोटो काढताना घेत होतो तशा.. नाच म्हणाला, उड्या मार म्हणाला. मी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आजीने मला डोळे भरून बघितलं आणि चार आणे त्याला दिले. मग रस कॅन्सल केला, भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि आजीनं सगळ्यांना सांगितलं की तिने मला टीव्हीवर बघितलं.. टीव्हीवर बघितलं. तर सगळी कथा दिवसभर वाड्यामध्ये सांगत होतो आम्ही… सर्वात महत्त्वाचं काय तर तिने आल्यावर माझी दृष्ट काढली. तिला माझ्याबद्दल फार प्रेम होत… मी खूप धीट, हुशार, भाषण करणारी, स्टेजवर उभी राहणारी.. वडिलांबरोबर काम करत होते ना…! अगदी गणपती उत्सवात आमचे दहा दिवस कार्यक्रम असायचे.. तर ती आमच्या दारापाशी झोपलेली असायची आणि आम्ही आलो आहोत की पहिल्यांदा माझी दृष्ट काढून ती तिच्या घरात जाऊन झोपायची. मामा आणि आम्ही सगळे शेजारीच राहत होतो अशा तऱ्हेने माझ्या टीव्हीवरचा पहिला शो त्याचा एकमेव प्रेक्षक माझी आजी होती आणि त्याची किंमत मला चार आणे द्यावी लागली.

नंतर आपल्याकडे वृत्तदर्शन सुरू झालं. अनेकांच्या मुलाखती सुरू झाल्या. स्थानिक चॅनेलवरती येण्याचा योग अनेकदा आला. मला आठवते एक मुलाखत सुनेत्रा पंडित यांनी घेतली होती. एकदा एक मुलाखत रामतीर्थकर मॅडमनी घेतली होती. एकदा माझ्या शाळेमध्ये म्हणजे तडवळकर ट्रस्टच्या नापास शाळेमध्ये माझी मुलाखत माझ्या एका विद्यार्थिनीने घेतली होती. असं अनेकदा मग टीव्ही वरती स्थानिक प्रक्षेपणात दिसायचं… पण चार आणे खर्च करून मी टीव्हीवर दिसण्याचा किंवा मला टीव्हीवर बघण्याचं सुख माझ्या आजीने त्यावेळेला गड्ड्याच्या जत्रेत घेतलं होतं आणि तिचं ते वाक्य नेहमी मला आठवतं.. ” अग तू मोठी झाल्यानंतर खूप ठिकाणी टीव्ही असतील, कदाचित तू त्यात दिसशील, पण मी त्यावेळेला असणार नाही ना? ” म्हणून परिस्थिती नसताना त्या माऊलीने माझ्यासाठी चार आणे खर्च केले. ती चरख्यावर सूत काढून ते पैसे कमवत असे आणि एक पूर्ण सुताचा बिंडा तयार झाला की त्याचे दोन आणे मिळत. खादी भंडारमध्ये आम्हीच नेऊन घालत असू.. इतक्या कष्टाने मिळवलेले चार आणे तिने माझ्यासाठी खर्च केले.

आज लाखो रुपये खर्च होतात.. कोणी करतो.. मी कोणावर तरी करते. पण हे प्रेमच वेगळं होतं आणि त्याच्या मागचा विचारही खूप मोठा. माणसं गरीब होती, पैसा नव्हता, पण माया पोटात खूप होती. आज अगदी सहजच आठवण झाली आजीची आणि त्या निमित्ताने मला तो अगदी विस्मृतीत गेलेला प्रसंग आठवला. अशी प्रेमळ आजी मला मिळाली. परमेश्वरा तू ते भाग्य आम्हाला दिलंस.. खूप प्रेम करणारी माणसं म्हणजे आपण खूप श्रीमंत हे लक्षात ठेवा….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग- ३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

धन्य ते गुरु शिष्याचे नाते..

जोगेश्वरी ते भावे स्कूल माझा आणि ति. नानांचा प्रवास खूप आनंदात चालला होता. माझे वडील भावेस्कूलला खूप मानत होते तन, मन, श्रद्धेनी त्यांनी विद्यादान केलं.

माझे परमपूज्य वडिल ति. स्व. दत्तोपंतस. माजगांवकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर, पद्मभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांच्या भावेस्कूलमधले आदरणीय शिक्षक होते. पुण्यभूषण मासिकांत त्यांनी आवर्जून आपल्या सरांचा म्हणजे माझ्या वडिलांचा मानाने उल्लेख केला आहे.

बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरुंना इतक्या वर्षांनंतर मानवंदना देतो. केवढी ही गुरुनिष्ठा आणि गुरुंवरील श्रद्धा. सारं जग, श्री. बाबासाहेबांपूढे मान देऊन झुकत. जगाची मानवंदना घेणारे हे शिवशाहिर. श्री. माजगावकर सरांचं नुसत नांव ऐकल तरी नम्रतेने त्यांना मानवंदना देतात. प्रत्येक मुलाखतीत आवर्जून सरांचा उल्लेख करायचे. ते म्हणाले, “शिवरायांनी इतिहास घडवला तर माजगावकर सरांनी माझ्या मनात इतिहास जागवला” केवढी ही शालीनता. आज माझे वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते. बाबासाहेबांनी पण, कुठल्याही कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सरांनाच केला असता

शिवाजी राजांची अढळ श्रद्धा आपल्या गुरुंवर श्रीसमर्थ रामदास स्वामींवर होती. तितकीच श्रध्दा या शिष्याची आपल्या गुरुंवर होती. जगापुढे शिवरायांचा आदर्श मांडणारे इतिहासकार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे आपले श्रेय माननीय सरांनाच देतात. त्यांच्या नम्रतेची, श्रध्देची, गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगानें प्रत्ययास आली.

त्याच असं झालं. शरद जोशी हे बाबासाहेबांचे शालेय मित्र होते. आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे, माझ्या बहिणीची कमलची, जवळची बालमैत्रिण. शरद जोशींची एकसष्टी होती. आणि त्या कार्यक्रमाला बाबासाहेब आले होते. बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीनें, सुस्वभावाने लोकांची मने जिंकून किर्तीचं शिखर गांठलं होत. आणि जनसागरांत मानाच पान पटकावल होत. त्यांना इतका मान होता की, त्यांचा प्रवेश झाला. आणि श्री. बाबासाहेब आले, असं नुसतं म्हणाल्यावरही लोकं जागेवरून उठून उभे राहयचे. तर सुप्रसिद्ध इतिहासकार असे हे माननीय, श्री शरद जोशींच्या ६१ ला आले. त्यांच्या उत्साही चपळ कणखर व्यक्तिमत्वानें, आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली. माझी बहिण पण या कार्यक्रमाला हजर होती. सौ. जोशींनी माझ्या बहिणीशी ओळख करून देतांना बाबासाहेबांना सांगितले,

” बरं का बाबासाहेब, ही कमल, माझी बाल मैत्रिण. म्हणजे तुमच्या श्री. माजगांवकर सरांची मुलगी आहे”. हे ऐकताक्षणी, बाबासाहेबांनी काय करावं! ते ताड्कन उठले. आणि कमलच्या समोर आले. तिच्यासमोर उभे राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहिण गोंधळून गेली. कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहूणे आश्चर्य चकित होऊन बघायलाच लागले. अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले, “तुमचे वडिल माजगांवकर सर म्हणजे माझे सन्मानीय, आदरणीय गुरु आहेत. दुदैवाने ते आता नाहीत. हा मानाचा मुजरा, सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय. पण हा त्रिवार मुजरा माझ्या सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल. “

– – केवढी ही नम्रता. आणि केवढी ही गुरुभक्ती! ती बघून कमलचे डोळे वडिलांच्या आठवणीने भरून आले.

तर मंडळी असे होते हे गुरुशिष्याचे अलौकिक अढळ नाते. बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येत नव्हता. म्हणून वाईट वाटत होते. आणि अचानक=अचानक

तो योग जुळून आला. मला कम्मालीचा आनंद झाला. खूप दिवसापासूनची माझी मनांतली इच्छा पूर्ण झाली. फोनवर, “बाबासाहेब, मी माजगावकर सरांची मुलगी बोलतेय ” अशी ओळख सांगून भेटण्याची इच्छा दर्शवली. माजगांवकर सरांच नांव ऐकून, श्री बाबासाहेबांनाही खूपच आनंद झाला. माझे जावई श्री. सुजित सु·जोशी खूप उत्साही आहेत. त्यांच्या ओळखीने हा सुवर्ण योग जुळून आला- ते आम्हांला बाबासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांच्याबरोबर आमचा फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही सापडणार नाही, अशी मोडी लिपीतली, बाबासाहेबांची वळणदार, सुरेख सही आम्हांला मिळाली. मी अगदी भारावून गेले होते. सारखा मनात विचार येत होता. बाबासाहेबांची ऐतिहासिक वास्तू, त्यांची कर्तबगारी, त्यांचा लोकसंग्रह आणि समाजांत मिळवलेला मोठ्ठा मानसन्मान बघायला या पट्टशिष्याचें गुरु ति. माजगांवकर सर माझे वडील आज हवे होते,. आज हवे होते.. हया गुरु शिष्याच्या नात्याचा शोध माझा भाचा सतीशमुळे लागला होता. आज तोही हयात नाही. शेवटी हात जोडून मी मनांत म्हणालें “कालाय तस्मै नमः”

निघतांना बाबासाहेब मला म्हणालें ” सरांचा शालेय जीवनातला फोटो असेल ना तुमच्याकडे? मला तो हवा आहे. मी माझे आत्मवृत्त लिहीतोय. त्याच्या मुखपृष्टावर मला माननीय सरांचा फोटो लावायचा आहे. सुदैवाने कोट टोपी धोतर असा ति. नानांचा फोटो भाच्याकडून चि. हेमंतकडून मला मिळाला. तो बघितल्यावर बाबासाहेब प्रसन्न हसले. सतीश माझा भाचा.. त्याच्यामुळे हया गुरु शिष्य नात्यांचा शोध लागला. आणि चि. सुजित जोशींमुळे मला श्री. बाबासाहेब प्रत्यक्ष भेटले. माझ्याशी प्रेमाने बोलले. तो आनंद, तो क्षण माझ्या आठवणीतल्या शिदोरीतला, अत्यंत मोलाचा,.. अत्यंत मोलाचा.. असा क्षण आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो असे होते हे गुरुशिष्याचे महान, आदर्श आणि वाखाणण्यासारखं नातं, धन्य ते माझे वडील आणि धन्य ती गुरुभक्ती. श्री. बाबासाहेब तुम्हाला माझा मानाचा, त्रिवार मुजरा.

जय शिवाजी, जय भवानी ||

– क्रमशः भाग ३०

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे सिंचन… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

अल्प परिचय 

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापिका.
  • गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे सन्मित्र मंडळाच्या बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका.
  • महापौर पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
  • सध्या बोरिवली (मुंबई) व पुणे येथे वास्तव्य.

? मनमंजुषेतून ?

 ☆ प्रेमाचे सिंचन☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

विक्रांत मोरे (नाव बदललेले) काल माझ्याजवळ आला, अगदी शेजारी येऊन उभा राहिला. मी शिकवण्यात दंग होते. हळूच तो माझा पदर खेचत होता.

“काय रे? काही सांगायचंय का? ” असं विचारल्यावर अगदी अस्पष्ट आवाजात म्हणाला, “बाई, मला बक्षीस मिळालं. ” 

मी हसून मोठ्याने म्हणाले, “अरे वा, छान! कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं? ” माझ्या वाक्यासरशी सगळा वर्ग त्याच्याकडे बघू लागला, बाईंनी दखल घेतली याचा त्याला खूप आनंद झालेला दिसला.

विक्रांत दोन बहिणीच्या पाठीवरचा. तो अगदी लहान असतानाच आई गेली. घरची अगदी गरिबी. वडील कुठेतरी वॉचमन. मोठी बहीण १४-१५ वर्षांची, तीही नोकरी करत होती. दुसरी बहीण असेल दहा-बारा वर्षांची, परिस्थितीने अकाली गृहिणी केलं होतं बिचारीला.

वर्गात अगदी पहिलीपासून “तो अभ्यास करत नाही” अशी बाईंची तक्रार आणि घरी अभ्यास न करता बहिणींना मारतो ही बहिणींची तक्रार. मला मात्र तो कधीच आगाऊ किंवा आक्रमक वाटला नाही. काही विचारलं की खाली मान घालून जमिनीकडे बघायचा.

गेल्या वर्षी नऊ मुलं चौथीच्या वर्गात नापास झाली होती, त्यात हाही होता. सगळेच एककाच्या मार्कांचे धनी. मी हा वर्ग घ्यायचा म्हणजे ७०चा पट होणार, पण पालकांनी खूप आग्रह केला आणि यावर्षी मी चौथीचा वर्ग घेतला. सर्वप्रथम मी नापास झालेल्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. रोज मनापासून अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास व्हाल या आत्मविश्वासाचं बीज त्यांच्याते पेरलं. मला जमेल तसं त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले आणि खरं सांगू, मुलांनीही मला निराश केलं नाही. एक ऋजुता सोडता (नाव बदललेलं) सर्व मुलं अत्यंत चांगल्या मार्कांनी पास झाली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना एवढे छान मार्क मिळाले होते सगळ्यांना.

विक्रांतही खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि तेव्हापासून अबोल असणारा विक्रांत माझ्याजवळ बोलू लागला. घाबरत घाबरत बोलणाऱ्या विक्रांतच्या मनावर, आपल्यात काही चांगले नाही आपले कोणी कौतुक करणार नाही हे दडपण असावे हे माझ्या शिक्षकी नजरेने लगेच हेरले आणि मी त्याच्या छोट्या गोष्टींची खूप आत्मीयताने दखल घेऊ लागले.

“अरे वा, विक्रांत, अक्षर छान काढले आहे, ” असं म्हटल्याबरोबर त्याच्या लहान चेहऱ्यावर हास्याचे गुलाब फुलंत. कालच्या प्रसंगाने त्याला खूप आनंद झालेला दिसला.

आज कामाच्या डोंगरात मी बुडून गेले होते. १२:१५ ला ऑफिसच्या दाराशी कोण घुटमळते म्हणून पाहिलं तर विक्रांत. म्हटलं “आत ये रे. ” तो आला. त्याच्या हातात घड्याळाचा खोका होता.

“बाई, हे बघा ते बक्षीस. ” असं म्हणून त्याने खोका माझ्या हातात ठेवला. मी सर्व काम बाजूला सारून त्याचं घड्याळ सर्व शिक्षिकांना दाखवलं, म्हटलं, “बघा ग, माझ्या विक्रांतला बक्षीस मिळालं. छान आहे ना घड्याळ! ” घड्याळ सगळ्यांना दाखवून मी पुन्हा व्यवस्थित त्याच्याकडे दिलं. त्यावेळेचा त्याचा आनंदाने उजळून निघालेला चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतोय.

माझ्या या दोन वाक्यांनी त्याला दिला प्रचंड आत्मविश्वास. त्याच्यातील नकारात्मक भूमिका जाऊन सकारात्मक रोपांची वाढ सुरू झालेली दिसली. नकळत अत्यानंदाने दोन अश्रू बाहेर टपकलेच. खूप खूप आनंद झाला मला. आज माझं रोप सुकत चालले होते परंतु प्रेमाच्या खताने ते पुन्हा मूळ धरू लागले होते, चांगले तरारून वाढीला लागले होते. एका शिक्षिकेला (शिक्षिका कमी पण आईच जास्त) यापेक्षा दुसरं काय हवं?

दिवसभर हा प्रसंग माझ्याभोवती पिंगा घालत होता. आजच्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे ती प्रेमाची पण त्याचाच इतका तुटवडा आहे की विचारू नका. म्हणूनच आम्हा शिक्षकांचे काम जरा वाढलं आहे. शिकवण्याबरोबर थोडे प्रेमाचे खतही या रोपांना आवश्यक आहे, तरच ही रोपं निरोगी आणि टवटवीत होतील.

(हे प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा याची गरज आपल्या घरातील सदस्यांना देखील खूप असते. आपण आपल्या कामात मग्न असतो, गर्क असतो, खरंच वेळ नसतो. पण या नात्यांना जगवायचं, फुलवायचं, तर मनापासून घेतलेली दखल आणि प्रेमाच्या शब्दांचं सिंचन या दोन गोष्टींची नितांत गरज आहे.)

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …बकुळ फुले… लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ …बकुळ फुले… लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

* बकुळ फुले *

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात मुल्हेर म्हणून छोटेसे गाव आहे. तेथे उद्धव महाराजांची समाधी आहे. उद्धव महाराजांच्या निर्वाणीच्या वेळेस सुमारे तीन साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्यांनी तिथे बकुळीचे झाड लावले. अजूनही त्या झाडाला फुले येतात व त्यातून साखरे सारखा पदार्थ निघतो. जणू काही उद्धव महाराजांचा प्रसादच!

मी बागलाण तालुक्यातच राहत असल्यामुळे मुल्हेरला वारंवार जाणे येणे व्हायचे. तेव्हा तो समाधीपुढे उभा असलेला प्रचंड मोठा बकुळीचा वृक्ष माझ्या नेहमी पाहण्यात यायचा. बकुळीच्या फुलांचा मंद सुगंध त्याचे औषधी उपयोग आणि माझे झाडांवरचे प्रेम, त्यामुळे बकुळीचे झाड आपण लावायचे असे मी वारंवार ठरवत होते. कितीतरी वेळा मी त्याच्या बिया गोळा करून आणल्या. हम्पीला गेले होते तेथून देखील बकुळीच्या झाडाच्या बिया आणल्या होत्या. घरी रोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमले नाही.

नर्सरीतूनही बकुळीचे रोप काही आणले गेले नाही आणि बकुळीचे झाड लावायचा माझा मानस मनातच राहून गेला.

मी नव वसाहतीत रहायला आल्यावर रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत म्हणून एक बहाव्याचे झाड व एक गुलमोहाराचे झाड असे लावायचे ठरवले. त्याप्रमाणे रोपे आणून लावली देखील. रोपांची झाडे झाली. परंतु बहाव्याची म्हणून आणलेली रोपे बहाव्याची नव्हती. दुसऱ्या झाडाची निघाली. ती कोणती झाडे आहेत हे मला ओळखू आले नाही. त्यामुळे मन अगदी खट्टू झाले. परंतु आता झाडे वाढली आहेत तर राहू दे ना असं म्हणून ती तशीच वाढू दिली. गुलमोहाराची लावलेली झाडे व्यवस्थित वाढली होती. पण त्याचा पालापाचोळा खूप पडतो म्हणून कॉलनीतल्या लोकांनी ती काढून टाकली आणि वसंत ऋतूत लाल पिवळ्या रंगाची उधळण आकाशात व्हावी ही माझी इच्छा अर्धवटच राहून गेली.

दोन-तीन दिवसांपूर्वी अचानकच सकाळी सकाळी कॉलनीतून चालत बाहेर गेले. जाताना घाई होती, पण येताना रेंगाळत आले आणि थबकलेच…. माझ्याकडून बहावा म्हणून लावल्या गेलेल्या परंतु मला ओळखू न आलेल्या झाडाखाली बकुळीच्या फुलांचा सडा पडला होता.

बकुळीची फुलं पाहिली आणि मन अगदी पिसे पिसे झाले. अहो आश्चर्यम्, जे बकुळीचे झाड मला लावायचे होते ते मी लावले नव्हते. परंतु माझ्या मनातले झाड मात्र माझ्याही अपरोक्ष परमेश्वराने माझ्या हातूनच माझ्या घराजवळ लावून घेतले होते आणि त्या झाडाने मी कितीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी आज माझ्यापुढे त्याच्या फुलांचा नजराणा माझ्या ओंजळीत टाकला होता.

पटपट खाली वाकून बकुळीची फुले वेचली. घरी येऊन गजरा केला आणि केसात माळूनही घेतला. मला इतका आनंद झाला होता की ती बकुळीची फुले आणि गजरा मी वारंवार हातात घेऊन वास घेऊन त्याचा सुगंध तन मनात भरून घेत होते.

अजूनही बकुळीच्या फुलांचा हंगाम सुरू आहे. झाडाखाली बकुळीची फुले पडतातच आहेत. त्यामुळे लहान मुलासारखी मी त्या झाडाखाली जाते आणि मनाशी,

‘या बाई या 

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया ‘

असे म्हणत ती नाजूक सुंदर सुवासिक फुले वेचत राहते अन् मनाशीच म्हणत राहते,

‘गोड गोडूले,

मोतीयाचे दाणे कुणी खाली पाडले? ‘

 *** इति ***

लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… ओळख भाग – ४५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… ओळख – भाग – ४५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ओळख

सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भटांची “केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” ही गझल मला फार आवडते. सुरुवातीला मला ही एक प्रणयभावनेची गझल वाटायची पण आयुष्याच्या एकेका टप्प्यावर जेव्हा जेव्हा मी ही गझल वाचत गेले तस तसे त्यातले खोल दडलेले अर्थ जाणवू लागले. हे प्रणयगीत नसून आयुष्यातली स्थित्यंतरे, एक पार केलेला टप्पा, उलटून गेलेला एक काळ याविषयी फार सुंदर भाष्य कवी सुरेश भट यांनी या गझलेत केलेलं आहे याची जाणीव झाली.

“केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली”

समजलंच नाही बालपण कधी संपलं! अचानक मिटलेले डोळे उघडावेत आणि नवी पहाट उगवलेली असावी तशी बाल्य संपल्याची, नवी वाट सुरू झाल्याची चटकन जाणीव झाली. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत होती.. अगदी तसेच झाले आणि लक्षात आले की माझ्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा टप्पा आता पार झालेला आहे. तत्पूर्वी अनेक बदल जीवनात घडले. आमचं धोबी गल्लीतलं वास्तव्य संपलं. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर आणि राम मारुती रोडच्या सुरुवातीलाच असलेल्या आधुनिक, ऐसपैस, सर्वांसाठी वेगळ्या बेडरूम्स असलेला मागे पुढे बागेचं स्वप्न पूर्ण करणारी मोकळी जागा, चोवीस तास पाणी (हे फार महत्वाचं) वगैरे अनेक सुविधांचा “केदार” नावाचा बंगला पपांनी बांधला. खरं म्हणजे हा बंगला माझ्या आजोबांनी माझ्या आईला प्रेमाची भेट म्हणून दिला. “मालुने (म्हणजेच माझ्या आईने) एका चांगल्या ऐसपैस, सुख सोयी असलेल्या घरात राहावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कसं असतं ना! माझे पप्पा हे एक सेल्फमेड व्यक्तिमत्त्व होतं पण त्यांनी स्वाभिमानाचा दुराग्रह न बाळगता बापलेकी मधला एक प्रेमाचा धागा सांभाळला आणि मनापासून घर बांधणीच्या प्रक्रियेत भाग घेतला. वास्तविक बंगल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांनी एकही पैसा आजोबांकडून घेतला नाही नंतर पूर्ण रकमेचा चेक आजोबांनी पप्पांना दिला आणि तो मात्र त्यांनी प्रेमादर भावनेने स्वीकारला.

अर्थात इतक्या सुंदर घरात आमचं वास्तव्य असणार आहे यापुढे, ही कल्पना आम्हा सर्वांसाठी आनंदाची नक्कीच होती पण धोबी गल्लीचा निरोप घेताना मात्र फार म्हणजे फार जड गेले. हृदयाचा एक कप्पाच बंद झाल्यासारखे वाटले. ज्या वास्तूने, ज्या गल्लीने आम्हाला जन्मापासून घडवलं त्या सर्वांचा निरोप घेणं हे मुळीच सोपं नव्हतं याची जाणीव वास्तूचा उंबरठा ओलांडल्यानंतर पिळवटून गेली. काही जुनं सामान आम्ही त्याच घरात सोडून दिलं होतं पण एक दिवस जीजी एकटीच त्या घरी गेली आणि एका हातगाडीवरून ते सारं सोडलेलं सामान घेऊन आली. खरंच तेव्हा कळलं! ” महत्त्वाचं सामान नसतं, महत्त्वाच्या असतात त्या आठवणी! ”

आजही जीजी, हातगाडी आणि ते जुने सामान माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येतं.

एकच नव्हे तर पुढील आयुष्यात अनेक घरात मी राहिले. लग्नानंतरचे, सासरचे वाडा स्वरूप घर, त्यानंतर व्यवसायासाठी आम्ही दोघं जळगावला आलो तिथलं भाड्याचं वन बीएचके घर, नंतरचे आम्ही स्वतः बांधलेलं घर, मुलींची परदेशातील विदेशी धाटणीची प्रशस्त घरे आणि आता उतार वयातलं सह्याद्रीच्या कुशीतलं पुण्यातलं घर…… , इतकी सारी घरं असताना सुद्धा अगदी आज पर्यंत माझ्या स्वप्नात जर कुठलं घर येत असेल तर ते फक्त आणि फक्त धोबी गल्लीतलंच घर. तो जिना, तो उंबरठा, तो पायरीवरचा नळ, मागच्या गॅलरीत वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांचा वास आणि कितीतरी…

लिहिता लिहिता थोडी भरकटले कारण आज डोक्यात एक निराळाच विषय घेऊन लिहायला बसले होते.

तर आयुष्याचा एक टप्पा पूर्णपणे ओलांडला होता शिक्षण ही संपलं होतं. पुढे काय करायचं याचा निर्णय व्हायचा होता. सुरुवातीपासूनच आमच्या घरात, “तुम्ही तुमचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यावेत” हाच जीवनाचा कन्सेप्ट होता. त्याप्रमाणे अजून पुढचे शिक्षण किंवा विवाह यामधला एक पर्याय मी निवडला तो म्हणजे नोकरी करणे.

त्या वेळी टक्केवारीनुसार अधिकतर स्त्रिया गृहिणी होत्या. नोकरी करणार्‍या स्रियांची संख्या खूप जास्त नव्हती.

पण कसे कोण जाणे मला लहानपणापासूनच वाटायचे आपण नोकरी करायची. पैसे कमवायचे.

म्हणजे आर्थिक सक्षमता वगैरे विचार नव्हते त्यामागे पण आपण कमावलेले पैसे, ते मनासारखे खर्च करायचे,

त्याचा कुणी हिशोब वगैरे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. या काही भावना मला सुखद वाटायच्या.

शाळेत असताना “खरी कमाई”अंतर्गत मी अक्षरश: कुणाचे अंगण झाडून दिले. कुणाचे तांदुळ निवडून दिले. कुणाच्या झाडांना पाणी घातलं आणि त्यांतून हातात पडणार्‍या काही नाण्यांची गंमत वाटायची. अर्थात ते पैसे शाळेकडे जमा व्हायचे अन् नंतर धर्मादाय. पण मेहनतीने पैसे कमावण्याचे समाधान वाटायचे.

मी वयाच्या अठराव्या वर्षापासून लहान मोठे समर जाॅब्स् केले. महाविद्यालये, बोर्डाच्या परिक्षांच्यावेळी पर्यवेक्षक

म्हणूनही काम केले. एका तासाला दहा रुपये मिळायचे. त्यावेळी दहा रुपयाला किंमत होती.

तुम्हाला गंमत सांगते, आम्ही लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत भाड्याची सायकल फिरवायला दोन आणे लागत. वडीलांशी करार असायचा, “अडीचकं” हा पाढा त्यांना बिनचूक, एका दमात म्हणून दाखवायचा मग ते मला दोन आणे द्यायचे. not a penny less not a penny more.!! खूप मोट्ठी कमाई वाटायची ती मला!!

पण ही सगळी किरकोळ कमाई. मजेची पण स्वत: पैसे मिळवण्याची मानसिकता इथूनच तयार झाली.

मी बी एस्सी झाले आणि घरात जाहीर केले “मी नोकरी करणार. “

बरीच उमेदवारी करावी लागली. अर्ज भरा, लेखी परीक्षा द्या, मुलाखतींना जा. पूर्व अनुभव नाही म्हणून नकारही पचवले. सुरवातीला मी रसायनशास्त्रातील पदवीधर म्हणून केमीकल इंडस्ट्रीत केमीस्ट म्हणून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. “हेक्स्ट” या विदेशी, औषधांच्या कंपनीत माझी उत्कृष्ट मुलाखतही झाली होती पण एक स्त्री म्हणून मला तो जॉब नाकारण्यात आला आणि माझ्याबरोबर शेवटपर्यंत असलेल्या एका मुलाला नेमणूक पत्र मिळाले. माझा प्रचंड पराभव होता तो! त्याहीपेक्षा मानसिक त्रास टोकाचा झाला. अजूनही वाटतं तेव्हा मला “सुधा मूर्ती”सारखे का होता आले नाही? माझ्यातली मुळातली बंडखोरी अशी लुळीपांगळी का झाली?

आतासारखे रेझ्युमे, सीव्ही, प्रोफाईल वगैरे लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या संस्था नव्हत्या. माझे आजोबा 

बँक आॅफ इंडीयात खूप वरच्या पदावर होते. (Chief Accountant) जरी तेव्हां ते निवृत्त असले तरी त्यांचा दबदबा होता. मी त्यांना सांगितलं, “मला तुमच्या बँकेत नोकरी मिळवून द्या!! “

त्यांनी नुसता नकारच दिला नाही तर ते म्हणाले, ” तू वाणीज्य शाखेची पदवीधर नसल्यामुळे तुला हा जाॅब मिळूच शकणार नाही. ”

पण बँकेच्या नोकरभरती च्या जाहिरातीत अशी कुठलीही अट नव्हती. ” “कुठल्याही शाखेत पदवीधर “एव्हढेच होते पण वशीलेबाजी हा प्रकार तेव्हा नव्हता इतका. त्यातून आजोबांची कठोर आणि कणखर तत्वे पण मीही त्यांचीच नात. त्यांना म्हटले, “तुमच्याच बँकेत मी नोकरी मिळवूनच दाखवेन तुम्हाला. “

अतिशय मेहनत, खटपट, प्रतीक्षा

पण अखेर नोकरी मिळाली. स्वीकारलेल्या आव्हानात यशस्वी झाले!!!

हो! पण त्यातही एक अनपेक्षित अडचण उभी राहिली होती. अंतीम नेमणूकीपूर्वी वैद्यकीय तपासणी होती. आणि त्यात मी चक्क नापास झाले. कुणाला खरंतरी का वाटाव? मी इतकी सुदृढ निरोगी असताना?

पण मला असा शेरा मिळाला. Less vision at left eye so medically unfit. Doctors certificate required.

आभाळ कोसळणं म्हणजे नक्की काय हे अनुभवले पण यावेळी मात्र आजोबा मदतीस धावले. त्यावेळी नेत्रचिकित्सक म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेले डॉ. चिटणीस आजोबांचे मित्र होते. त्यांनी नेत्रतपासणी केल्यानंतर सांगितले, ”काहीच मोठा प्राँब्लेम नाही. ही एक टेन्डन्सी आहे. ही मुलगी एकाच डोळ्याने पहाते, वाचते म्हणून हिचा दुसरा डोळा झोपून गेला. “अशी गंमतीदार कोटी करून मला सहजपणे त्यांनी फिटनेस सर्टीफिकेट दिले आणि हातातोंंडाशी आलेला निसटता घास पुन्हा मुखी गेला. गंगेत घोडं नहालं आणि मला नोकरी मिळाली. मात्र एक आणखी पदवीही मिळाली “एकाक्षी”

(हल्ली लहानपणापासून मुलांची नेत्रतपासणी, दंत तपासणी होते.. ही जागरुकता किती प्रशंसनीय आहे)

असो.

पण काय सांगू तुम्हाला जेव्हा माझा पहिला पगार झाला तेव्हाचा आनंद!!

मी आणि माझे वडील व्ही. टी. ते फ्लोरा फाउंटन बसने एकत्र जायचो. दहा पैसे तिकीट होतं. त्यादिवशी वडील म्हणाले, “आज तुझं तिकीट तूच काढायचंस..!”

मी म्हणाले “आज तुमचंही तिकीट मीच काढेन.”

पुढची चाळीस वर्षे मी आर्थिक स्वातंत्र्य उपभोगले….

पैशाची गरज म्हणून मी नोकरी नाही केली.

माझ्या अस्तित्वाची ती गरज होती…..!!

हाती पडलेल्या पहिल्या पगाराने मला माझी भक्कम ओळख मिळाली आणि या ओळखीने मला नेहमीच आत्मविश्वास दिला. जगताना जी निर्भयता लागते ती मला मिळाली हे मात्र निर्विवाद!!

– क्रमशः भाग ४५.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वो दिन भी क्या दिन थे… लेखक : डॉ. संदीप खारकांडे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆

सुश्री नीलाम्बरी शिर्के

? मनमंजुषेतून ?

☆ वो दिन भी क्या दिन थे… लेखक : डॉ. संदीप खारकांडे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆

(Yadon ke purane album mein chhupa ke rakhe hain humne woh din…) 

फुल पँटचचं  माझं दरवर्षीच स्वप्नं दोन हाफ पँट्स मध्ये दुभंगलं जायचं (जे दहावी नंतर पुर्ण झालं) म्हणजे आमच्या पप्पांचा तसा शिरस्ता असायचा, एका फुल पँटच्या कपड्यात दोन हाफ पँट्स होतात, हाफ बाह्यांचा शर्ट अर्धा मीटर कापड वाचवतो, तेवढाच शिलाईचा खर्च पण वाचतो.दोघा भावाभावांना एकाच तागयातले कापड, त्यामुळे शर्ट पँट शेम शेम,राम बलराम    

शिसपेन्सिली  .. त्या पण अर्ध्या अर्ध्या कापून वापरायच्या .. उद्देश एवढाच की महाशयांनी हरवली तर अर्धीच जावी , त्या नवीन पेन्सिली कापलेल्या पाहिल्या की उगीचच वाईट वाटायचं,असो ..

असं सगळं काटकसरीचं बालपण होतं ..

तसा मी ७-८ वी ला असल्यापासून मला बच्चनच्या खुप गोष्टींचं आकर्षण  होतं सिनेमे खूप नाही बघितले तरी पण … 

त्याचे costumes .. दीवार मधलं त्याचं जॅकेट ..  त्याच्या त्या फुटभर bottoms असणार्‍या पँट्स .. brittles नावाचा त्याचा कपाळाच्या मधून पडलेला भांग, घोड्याच्या डोळ्याला लावलेली झापडं तसे झाकलेले दोन्हीही कान असा त्याचा तो hair cut .. तरी पण आवडायचा,सिलसिला मधले high neck चे t shirts इत्यादि इत्यादि .. अशा एक ना अनेक गोष्टीच आकर्षण .. एकदा तरी तशी बच्चनस्टाइल करावी ..तसं जॅकेट .. तशी bellbottom घालावी नी कुठेतरी मिरवून यावं.. 

sholay मधला जय, शराबी मधला विकी, दीवार मधला विजय आणिक काय काय .. यातलं एक तरी नाव आई वडीलांनी का ठेवलं नाही आपलं, इथपर्यंत सुद्धा  पतंग उडायचे .. 

सगळी स्वप्नवत दुनिया .. लहानपणीची perceptions काही औरच असतात,कुणाला काहीही वाटो ‘दुनिया गयी भाड मे’ .. ‘मला काही फरक पडत नाही अशी’ 

पण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच बरं का.. 

यापुढची बच्चनची कोणतीच ‘रेखा’ मी पार केली नाही.  

लेखक : डॉ. संदीप खारकांडे 

प्रस्तुती : सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

(आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय.”) इथून पुढे — 

आई जितकी कडक आणि कठोर शिस्तीची होती तितकीच गंमतीदारही होती. तिला नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच बघायला मनापासून आवडायचे. त्यात ती इतकी रमायची, इतकी गुंतायची की पडद्यावर जे काय घडत आहे ते काल्पनिक आहे, अभिनय आहे हेही ती विसरून जायची.

एकदा आम्ही सारे मणीरत्नम् चा एक चित्रपट पाहायला गेलो होतो. बहुतेक “बॉम्बे” हाच असावा. त्यात एक मुसळधार पावसाचा सीन होता. तो कोसळणारा पाऊस पाहून आई चटकन उठली आणि म्हणाली “अगंबाई गच्चीत वाल वाळत घातलेत की.. ” तेव्हा माझी धाकटी बहीण आईला हसत म्हणाली, “अगं आई हा चित्रपटातला पाऊस आहे. खरा नव्हे. तुझे वाल नाही भिजणार या पावसाने. ”

खेळात तिला नेहमी जिंकायलाच हवं असायचं. हरलेलं तिला चालायचंच नाही. क्रिकेटची मॅच बघताना सुद्धा कोणाचं शतक हुकलं, कोण शून्यावर आऊट झाला, तिच्यामते कोणी धाव घेऊ शकत होता आणि तरीही त्याने ती घेतली नाही तर तिची हळहळ प्रचंड असायची. तिच्या शेजारी बसून मॅच बघताना आम्हाला खूपच गंमत यायची. तिच्या कमेंट्स ऐकायला मजा वाटायची. टेलिव्हिजन तर खूप नंतर आला पण रेडिओवर पण ती त्याच आत्मियतेने क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकत बसायची आणि भारताची हार होत आहे असं वाटलं की रेडिओ धाडकन बंद करायची.

तिला स्वतःलाही खेळायला खूप आवडायचं.

एकदा माथेरानला सहलीला गेलो असताना तिने तिथल्या कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्त्री पुरुष संयुक्तपणे आणि एकेरी खेळत होते. त्यात आईने दोन्ही विभागात विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हा तिला झालेला आनंद माझ्या आजही लक्षात आहे. एक लहान मुल तिच्यात कुठेतरी दडलेलं असावं.

आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे जायचो तेव्हा सगळे मिळून आम्ही पत्त्यातला “झब्बू” हा खेळ आवडीने खेळायचो. एका डावात आईला सतत “झब्बू” मिळत होता आणि तिच्या हातातली पानं वाढत होती. ती हरणार हे निश्चित होतं. त्यावेळी तिने चिडून हातातले पत्ते टाकून दिले आणि रागात म्हणाली, ” तुम्ही खेळा. मला नाही खेळायचं. ” 

त्या दिवशी मात्र आईने खेळात फार रडी खाल्ली होती पण आयुष्याच्या खऱ्या खेळात मात्र तिने कधीच रडी खाल्ली नाही. ती नेटाने लढत राहिली. जिंकेपर्यंत हरत राहिली पण तिने तिचा आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आमच्या घराच्या मागच्या जागेत एका नवीन वास्तूचे बांधकाम चालू होते. ज्याच्या भरवशावर पप्पा ते बांधकाम करत होते त्यानेच पप्पांना फसवले. घुसखोरी करून त्याने त्या वस्तूत मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली. अनेक वर्ष कोर्टात केस चालली. तारखांवर तारखा पडत होत्या पण विजयाची माळ काही गळ्यात पडत नव्हती. त्याच दरम्यान पप्पांचं निधन झालं आणि ध्यानीमनी नसताना आईवर फार मोठी जबाबदारी पडली पण आम्हा सर्वांच्या लक्षात राहील इतका कणखरपणा आणि खंबीरपणा आईने त्यावेळी दाखवला. तोपर्यंत तिचेही वय झाले होते आणि सतत जिजी आणि पप्पांच्या अदृश्य संरक्षक कवचातच ती राहिली होती पण यावेळेस ती आत्मविश्वासाने बाहेर पडली. कोर्टाची एक एक पायरी नेटाने चढत राहिली. त्यानंतरही कितीतरी वर्ष ही केस चालली पण अखेर ती जिंकली. त्या दिवशीचा तिचा आनंद अवर्णनीय होता. तिने हात उंचावून तो व्यक्तही केला. जणू काय तिने विश्व करंडकच जिंकला होता.

जिजी गेल्यानंतर आधारवृक्ष कोसळलेल्या वेलीसारखीच तिची अवस्था झाली असावी. शेवटच्या श्वासापर्यंत जिजीचा जीव आईच्यातच गुंतलेला होता. शेवटच्या क्षणी जिजी जे म्हणाली ते मात्र काहीसं गूढ होतं पण आईच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली होती, ” मालू सांभाळून, जपून राहा, माझ्यामागे तुला अकरा वर्ष जगायचं आहे. ”

ती अकरा वर्षं आईच्या आयुष्यातली खूप महत्त्वपूर्ण होती. त्याकाळात ती महिला मंडळात जात असे. तिथे होणाऱ्या कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये, सोहळ्यांमध्ये मनापासून भाग घेत असे. अनेक बक्षीसंही तिने मिळवली. तिच्या या गुणांचे दर्शन तसं आम्हाला खूप उशिरा घडलं कारण आम्ही नेहमी पप्पांच्याच कर्तुत्ववानतेला सलाम केला. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात तसंच काहीसं आईच्या बाबतीत झालं असेल.

याठिकाणी मला आईची एक आठवण सांगावीशी वाटते.

पपांकडे झोटींग नावाचा एक विद्यार्थी गणित शिकायला यायचा. हा झोटींग अतिशय “ढ” होता. त्याला साध्या बेरजा वजाबाक्या जमत नसत. पपा एक दिवस त्याला चिडून म्हणाले, ” अरे बाबा! तुला टांगासुद्धा हाकलता येणार नाही. ”आईला पपांचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही. झोटींग गेल्यावर आई पपांना ठामपणे म्हणाली, ”अहो सगळीच मुलं हुशार नसतात. हुशार मुलांना कुणीही शिकवेल पण झोटींगसारख्या मुलाला आत्मविश्वास मिळवून देणं ही तुमचीही कसोटी होती. त्यात तुम्ही सपशेल नापास! ”

पपा पूर्णपणे निरुत्तर होते.

नंतरच्या काळात मी एक दिवस आईला सहज विचारलं, ”आई तू हे सगळं सुरुवातीपासून का नाही केलंस? आमच्यासाठी तू फक्त खमंग कुरकुरीत चकल्या करणारी, चवदार भाजणीची ढीगभर थालीपीठं थापणारी, तेलावरच्या पातळ, मुऊसूत पुरणपोळ्या आणि तत्सम बरंच काही करणारीच का राहिलीस? आयुष्याच्या उत्तरार्धात तू तुझ्याठायी असलेल्या गुणांचं, छंदांचं जतन करतेस हेच आधी केलं असतंस तर?”

तेव्हा आई चटकन म्हणाली, ”बाळांनो! तेव्हा माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या, मला तुम्हाला घडवायचं होतं. तुमची जडणघडण तुमची भविष्यं ही महत्त्वाची नव्हती का? माझ्यासाठी तेच महत्त्वाचं होतं आणि बाकी सारं दुय्यम होतं.”

आज जेव्हा मी आजच्या काळातल्या स्त्रीचा आणि त्या काळातल्या स्त्रीचा विचार करते तेव्हा कुणाचं पारडं जड, कुणाचं हलकं याचं मोजमाप करता येत नाही पण आई म्हणजे नक्की काय याचं आकलन मात्र कुठलेही अवजड, अलंकारिक, नित्य नियमाचे, घासलेले शब्द न वापरताही मला होते.

जे तेव्हा कळलं नाही ते आता कळतं. ”हा रंग गडद आहे. हा नाही शोभणार तुला. हे फिक्या रंगाचंच कापड घे. ”

तयार होउन बाहेर पडताना ती हमखास मला हटकायची. ”हे काय केस नाही नीट विंचरलेस? नुसती झिपरट दिसतेस. जा कंगवा घेउन ये. ” तेव्हा आईचा मला प्रचंड राग यायचा. पण आता त्यापाठीमागची आईची मायेची भावना जाणवते. आपलं हे सावळं, सौंदर्यात काहीसं डावच असलेलं लेकरुही चारचौघात सुंदर दिसावं एव्हढाच तिचा भोळा भाव होता. कारण “ती आई होती म्हणोनि.. ”

अखेरच्या काळात कुठलाही गीताभ्यास न केलेली माझी आई संपूर्ण विरक्त, तटस्थ झालेली होती. ज्या वास्तूत ती राहत होती ती तिच्या वडिलांनी तिला दिलेली अनमोल भेट होती पण तोही पसारा पेलवण्याची शक्ती न उरल्यामुळे आणि आपल्याच मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि आपल्या मागे कुठल्याही प्रकारचे कलह होऊ नयेत या भावनेने आम्हा लेकी- जावयांवर विश्वास ठेवून तिने तिची अनमोल वास्तू विकण्याचाही निर्णय घेतला आणि बजावलाही. तेव्हा म्हणाली मात्र, ”आता मला घर नाही. ”थोडी गहिवरली. पण आम्ही तिला लगेच म्हणालो,” आता तुला पाच हक्काची घरं आहेत.” 

जेव्हा ती गेली तेव्हा तिने आम्हा पाचीजणींना जवळ घेतले. आमचे मुके घेतले. म्हणाली, ”मी भाग्यवान आहे. मी तृप्त आहे. माझ्या परिपूर्ण आणि सुखी जीवनासाठी मी ईश्वराची आभारी आहे. आता तुमचा निरोप घेते. सुखी रहा. एकमेकींवरची माया कायम ठेवा. आनंदाने जगा.” 

त्रिभुवनातली सारी संपत्ती जरी एकत्र केली तरी त्याची किंमत तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या दोन थेंबांच्या किंमतीपेक्षा कमीच राहील कारण ते एका मातेचे, आशीर्वाद देणारे अनमोल अश्रू होते. त्यात संस्कारांची अजोड ठेव होती. ती गेली पण आमच्या अंगणात आनंदी जीवनाचं झाड लावून गेली.

एक गूढ मागे राहिलं. ३१ डीसेंबर २००५ साली तिचं निधन झालं. जिजीच्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी.

पपा गेले, जिजी गेली, आई गेली आणि आमचं बालपण काळाच्या ओघात वाहून गेलं.

 – क्रमश: भाग ४४ / २  – भाग ४४ समाप्त..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले. मातृत्व या शब्दाची, या व्याख्येची, भावनेची खरी व्याप्ती आणि जाणीव तेव्हाच झाली जेव्हा मी स्वतः आई झाले. तेव्हा कळलं “माता अनंताची” म्हणजे नक्की काय? मुलांना जन्म दिला की आई ही पदवी जरूर मिळते पण आईपण म्हणजे केवळ मुलाला जन्म देण्यापुरतंच नसून ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक संगोपनात, जडणघडणीत, त्यास सुविचारी, संस्कारी करण्यात सामावलेलं असतं आणि ही आयुष्यभराची अखंड विस्तृत प्रणाली आहे. असं आईपण निभावताना जेव्हा जेव्हा माझी दमछाक झाली तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात हेच उद्गार घुमले, ” आई! तू कसं केलंस गं? मला तर दोनच मुली आहेत. तू आम्हा पाचही बहिणींचं काटेकोरपणे संगोपन कसं केलस? आमची आजारपणं, रात्रीची जागरणं, आमच्या आवडीनिवडी, खाणंपिणं, वेण्याफण्या सतत आमच्यासाठी.. अगदी अंतर्वस्त्रांपासून ते सुंदर डिझायनर्स पोशाख शिवणे प्राथमिक वर्गातला अभ्यास घेणे, शाळेत जाताना आमचं दप्तर भरणं, मधल्या सुट्टीतला डबा देणं, त्यानंतरही आमच्या उमलत्या वयातले मूडस, शैक्षणिक टप्पे, प्रेमप्रकरणं, लग्नं, बाळंतपणं एक ना अनेक. तुझ्या या अफाट कार्याची यादी सुद्धा करणे मला जमणार नाही. प्रत्येक वयाचे टप्पे ओलांडताना तू आमच्याबरोबर खंबीरपणे असायचीस, डोळसपणे, जाणीवपूर्वक असायचीस म्हणूनच आमच्या जीवनातील अनेक वेगवेगळी वळणं आम्ही सहजपणे पार करू शकलो. तेव्हा मी तुला केवळ गृहीत धरले. आईपणा व्यतिरिक्त तुझ्यात असलेलं एक निराळं व्यक्तिमत्व आम्हाला तेव्हा ना कळलं ना कळून घेण्याची आम्हाला गरज वाटली. एक व्यक्ती म्हणून आयुष्याबद्दल तुझी काही निराळी कल्पना, विचार होते का हा कधी विचारही आम्ही केला नाही.”

आता उपकृत भावनेने जेव्हा मी आईचा विचार करते तेव्हा ती वेगवेगळ्या अनेक रूपात उलगडत जाते.

खरं म्हणजे विसाव्या शतकातला पूर्वार्ध म्हणजे १९२०/२१ चा काळ एकंदरच खूप वेगळा होता. विशेषतः स्त्रियांसाठी. त्या काळात आई ग्रँटरोडच्या “सेंट कोलंबस” या कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी होती. तिला मराठी सोबत इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. शिवाय मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नगरीत तिचे बालपण गेले. आजोबांची शिस्त, टापटीप आणि काहीसं पाश्चात्त्य पद्धतीचं वळण तिच्या नसानसात भिनलेलं होतं त्या तुलनेत, आईचं पप्पांशी लग्न झाल्यानंतरचं वातावरण खूप वेगळं होतं. ठाण्याच्या धोबी गल्लीतल्या, फारशा सुविधा नसलेल्या एकमजली घरात आणि ज्या घरात माझ्या आजीचा प्रभाव होता तिथे तिने स्वतःला कसे सामावून घेतले असेल? सुरुवातीला तर त्या घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती, स्वयंपाकासाठी चूल होती, शेगडी होती. माझ्या आठवणीत चुलीवर गरमागरम भाकऱ्या करणारी आई अजूनही आहे. ज्या बोटांनी आईने अनेक सुंदर पेंटिंग्स केली होती, कित्येक विणकामं, भरतकामं केली होती त्याच हाताने चुलीतली लाकडं पेटवून अथवा सांजवेळी रात्र होण्याच्या आत कंदीलाच्या काचा पुसून घासलेट भरून वाती पेटवताना तिला कधी वैषम्य वाटले असेल का? की त्यावेळी आजूबाजूच्या बहुतांश स्त्रियांचे आयुष्य असेच होते…? “रांधा वाढा उष्टी काढा” याच समूहातले मग आपल्या आईने वेगळा सूर का लावला नाही हा विचार बालपणीतरी आमच्या मनात येण्याचा संभवच नव्हता आणि तिने जर वेगळा सूर लावला असता तर आमच्या आयुष्याचं काय झालं असतं या विचाराने आता माझ्या अंगावर काटा सरसरतो तेव्हा मातृत्वाची खरी व्याख्याही कळते.

वास्तविक त्या काळातही ती रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करत होती. जात्याच ती खूप हुशार आणि मेहनती होतीच. मनात आणलं असतं तर तिने तिथे विशेष कामगिरी करून उच्चपदी पोहोचून स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, ओळख आणि अस्तित्व मिळवलं असतं पण आमच्या जडणघडणीचं एक महत्त्वाचं “जूं” जणू तिच्या मानेवर तिनं पेललं आणि या सर्व स्वकेंद्रित जाणिवांतून ती सहजपणे बाहेर पडली.

“आई! खूप वेळा आणि या क्षणी मला एक अपराधी भावना स्पर्शून जाते. आमच्या संपूर्ण जडणघडणीवर पप्पांच्या विद्वत्तेचा, शिकवणीचा, त्यांच्या नाना प्रकारच्या आवडी आणि रसिकतेचा पगडा निश्चितच आहे. तसेच जिजी म्हणजे आमची आजी.. जिच्या मायेच्या अखंड प्रवाहाची शीतलता आम्ही आयुष्यभर अनुभवली आणि नकळत का होईना आमच्या मनी सतत जिजी आणि पप्पांच्याच आठवणी सहजपणे येत असतात पण खरं म्हणजे जिजी आणि पप्पा आमच्यासाठी संरक्षक भिंती होत्या तर तू आमचं छत होतीस.”

आईला जेव्हा मी निराळेपणाने पाहते तेव्हा जाणवते ती आईची मुळातली सौंदर्यदृष्टी. जिजी आणि पप्पांच्या मधली आई एक व्यक्ती म्हणून फार वेगळी होती. त्याचं कारण तिच्या जडणघडणीची पार्श्वभूमीच निराळी होती. तरीही तिने कधीही कसलाही अहंकार बाळगला नाही. सासू म्हणून तिने जिजीला आणि पती म्हणून पप्पांचा तिने सतत मान राखला आणि समांतरपणे तिने तिची शिस्त, टापटीप, स्वच्छता, घर अडचणीचं असलं तरी कसं सुंदर राखावं याचे धडे नकळत आम्हाला गिरवायला लावले.

“आई रागवेल, आई ओरडेल आईला हे आवडणार नाही” हे भय आम्हाला अनेकदा जिजीच्या कुशीत शिरायला लावायचं पण आईच्या धाकदपटशाने आमच्या आत, कुठेतरी सैरावैरा मोकाट वाढलेलं गवत माळ्याने कात्रून छान आकार द्यावा तसा आकार आम्हाला नक्कीच मिळवून दिला. आईच्या प्रेमाची आणि जिजीच्या मायेची जातच वेगळी होती आणि आज मी या दोघांचं महत्त्व जाणते कारण मी एक आई आणि एक आजी याचा भिन्नपणे या दोन्ही भूमिका जगताना विचार करू शकते. आई आईच असते आणि आजी आजीच असते. दोघीही फक्त प्रेमच करतात पण दोघींच्या प्रेमाचे रंग वेगळे असतात.

सुट्टीच्या दिवसात आई आम्हाला विणकाम, भरतकाम, पेंटिंग्स करायला शिकवायची. एकदा मी विणलेली एक कलाकृती पाहून ती मला म्हणाली, ” हे काय असं विणून ठेवलेस? किती सैल आहे ते? सुईवरचे टाके घट्ट टाकले की वीणही घट्ट होते. मग टाके असे सुटत नाहीत. सारं उसवून पुन्हा विणायला घे. ” आईचं हे सहजपणे उच्चारलेलं वाक्य माझ्यासाठी कायम ब्रह्मवाक्य ठरलं. आयुष्यातली अनेक नाती जपताना माझी जेव्हा जेव्हा होरपळ झाली तेव्हा आईचे हे शब्द नेहमीच कानी राहिले. नात्यांची वीण कशी घट्ट ठेवावी याची महान शिकवण आईने आम्हाला वेळोवेळी दिली ती तिच्या वागण्यातूनही. तिने सासरची माहेरची सगळी नाती प्रेमपूर्वक आणि कर्तव्य बुद्धीने सुद्धा जपली.

आईच्या आणि जिजीच्या नात्यातला घट्टपणा आणि ठिसूळपणा दोन्हीही गंमतीदार होता. जिजीने आईवर आणि आईने जिजीवर मनापासून प्रेमच केलं. दोघींच्यात मतभेद होत, खटके उडत पण आईला कधी कुठून घरी परतायला उशीर झाला तर जिजी लगेच देव पाण्यात ठेवायची. ” का गं? मालू रस्ता तर चुकली नसेल ना? ” असं सतत आम्हाला विचारत राहायची. आईच्या बाबतीत ते खरंही होतं. आईला कधी कधी पटकन रस्ते समजायचे नाहीत. एकदा तर ती “ढग्यांचं घर कुठे आहे? ”… तेव्हा आम्ही नुकतेच नवीन घरात राहायला गेलो होतो.. असं विचारत घरी पोहचली होती. हा विनोदाचा भाग वगळला तरी जिजीला आई विषयी वाटणारी काळजी विलक्षण होती. आईला ही जिजीचं कितीही पटलं नाही तरी तिने जिजीच्या मनाविरुद्ध किंवा तिला विचारल्याशिवाय कधीही काहीही केले नाही. या पाठीमागे आईच्या मनात जिजीविषयी एक कृतज्ञतेचा भाव नक्कीच होता. वयाच्या सोळाव्या वर्षी वैधव्य आलेल्या या स्त्रीने एक तपस्विनीची भूमिका अंगीकारून चार महिन्याच्या तिच्या मुलाला एक परिपूर्ण जीवन बहाल केले होते आणि आज जे काही आम्ही सारे आहोत ते केवळ तिच्यामुळेच ही भावना आईच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. नकळत आईने एक प्रकारचा सगळ्यांना जोडून राहण्याचा, समजून घेण्याचा संस्कार आम्हाला दिला. पप्पांची सगळी जीवाभावाची नाती तिने त्याच आंतरिक भावनेने जपली. आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय. ”

– क्रमशः भाग ४४ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच भेडसावत असतो. टू व्हीलर वाले / फोर व्हीलर वाले जॅममधून सुटका करून घेण्याकरता नवनवीन पर्याय शोधत असतात. आणि बरोबरच आहे – म्हणतातच ‘necessity is the mother of invention’. सिग्नल तोडणे, उलटीकडून जाणे, स्पीड लिमिट न पाळणे, लेन तोडणे, या पर्यायांची संध्या चांगलीच चलती आहे. सगळ्यांच्या समोर एकच ध्येय असतं – मी कसा पुढे जाईन? इतरांशी या “मी” ला काहीही देणे घेणे नसते.

मध्यंतरी एक पर्याय पुढे आला आणि तो म्हणजे, फुटपाथवरून टू व्हीलर नेणे. थोडासा जरी ट्रॅफिक अडला, की, लगेच बाईकवाले भराभर बाजूच्या फुटपाथवर गाड्या चढवतात आणि वाटेल तेव्हा पुन्हा रोडवर येतात. फुटपाथवर ‘keep left’ किंवा ‘speed limit’ ही बंधने नसतात, त्यामुळे सगळेच आबादी – आबाद असते.

शहरांमध्ये आता बहुतेक रस्त्यांवर छान फुटपाथ केलेले आहेत. पण त्यावर चालणाऱ्यांपेक्षा, इतर लोकांचेच राज्य असते. त्यामुळे चालणारे फुटपाथवरून मार्ग शोधत शोधत पुढे जात असतात. चालणाऱ्यांना रस्ता क्रॉस करणे अशक्य झाले आहे, रस्त्यावर चालणे अशक्य आहेच, आणि फुटपाथवर पण चालायला जागा नाही, म्हणून म्हणतात, रस्त्यावरचा सगळ्यात बिचारा प्राणी म्हणजे चालणारी मंडळी.

आणि आता बाईकवाले फुटपाथवर आल्यामुळे, पायी चालणाऱ्यांची बिचारेपणाची लेव्हल अजूनच खालावली आहे. बिचारी मंडळी नेहेमीच वर बघतात आणि देवाकडे मदतीची अपेक्षा करतात. आणि झालं असचं – चालणाऱ्यांची याचना वर पोहोचली – देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथ पर चलना भी नसीब नही! देवाला अडचण समजली आणि सगळ्या फुटपाथवर दोन्ही बाजूला, अधे – मधे, स्टीलचे चकचकीत खांब बसले. चालणारे खुश झाले. खांबामधून गाडी घालता येत नाही, म्हणून टू व्हीलर वाले नाराज झाले आणि पुन्हा रस्त्यावर आले.

कॉम्प्युटर वर व्हायरस – अँटी व्हायरस जसे सुरूच असते, तसेच देवाकडे ऋषी- मुनी पण साकडे घालत असतात आणि दानव पण. आता टू व्हीलर वाल्यांनी वर बघून याचना केली – ‘देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथपर बाईक चलाना भी नसीब नही’. वरच्याला सगळ्यांचीच काळजी असते, कारण सगळी त्याचीच लेकरे. देवांनी तथास्तु म्हटले आणि टू व्हीलरकरता पर्याय पुढे आला —

आम्ही मेन रोडनी मार्केट कडे चालत निघालो होतो. फुटपाथ वर खांबांमुळे टू व्हीलरची वर्दळ नव्हती, त्यामुळे बिन्धास चालत होतो. पुढच्या चौकात, डावीकडच्या रस्त्यावर बरीच गर्दी दिसली. काय आहे? हे, बघायला म्हणून आम्ही डावीकडे वळलो. थोडं पुढे छोटं ग्राउंड आहे. तिथे एका परदेशी कंपनीने तयार केलेल्या फूटपाथ – फ्रेंडली बाईकचा डेमो दाखवणार होते. नावावरून काहीच अर्थ बोध होत नव्हता. बघितल्याशिवाय उत्सुकता संपणार नव्हती. मी आणि काही पर्याय नसल्यामुळे बायको, गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. कुणिही प्रेमात पडेल, अशी एक नवी कोरी दणकट बाईक समोरच दिमाखात उभी होती.

तिथले मार्केटिंग मॅनेजर (महेश) जाहिरातपर भाषण करत होते. टू व्हीलरवाल्यांकरता खुशखबर – खुशखबर. फुटपाथवर बाईक चालवा. एका भाग्यवान व्यक्तीला पहिली फ्री ट्रायल मिळणार! नंतर काही जणांना मिळणार, पेड ट्रायल. कोण आहे तो भाग्यवान? हीच वाक्ये पुन्हा पुन्हा ऐकवणे सुरु होते. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर, ‘मीच तो भाग्यवान’ असे भाव दिसत होते. बायको म्हणाली, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्हाला ती गाडी पेलवणार नाही. ‘कौन है वो भाग्यशाली’, ‘कौन है वो भाग्यशाली’, अशा गर्जना सुरु होत्या. मी गाडीकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. गाडीचे वजन माझ्या वजनाच्या तिप्पट तरी नक्कीच असणार. नेहेमी म्हणजे इतरवेळेला, मी कितीही भाग्यशाली असलो, तरी, आज, ‘तो मी नव्हेच’ हे पक्के होते.

“वो कौन है”… “वो कौन है”…., किसको ट्रायल दी जाय, असं म्हणत म्हणत, महेश चौफेर नजर टाकत होते. माझ्यावर त्याची नजर स्थिर झाली, आणि, “यही तो है वो” अशी जाणीव महेशला आतून झाली असावी. लगेचच त्यांनी हात माझ्याकडे करून, “सर, आप आगे आईये” अशी घोषणा केली. महेश नक्की कुणाला सर म्हणतोय हे समजण्याकरता मी आजूबाजूला बघायला लागलो. बाजूचा मुलगा म्हणाला, “काका यु आर लकी”, तुम्हालाच बोलावलं आहे. हे काम आपलं नव्हे, हे मला चांगलं समजतं होतं, पण आलेली संधी वाया का घालवायची! हा पण विचार मनात आला. द्विधा मनस्थिती असली, की, मी नेहेमी अंतर मनाचा सल्ला घेतो.

मी (मनात डोकावून) : काय करू?

आतून : जा बिन्धास, मी आहे.

मी : ती बाईक पेलणं मुश्किल आहे.

आतून : भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज तर तुझ्या मागे बसणार आहे.

माझं आतल्या मनाशी बोलणं बायकोच्या लक्षात आलं असावं. तिनी मला बेस्ट लक दिलं आणि मी लगीच पुढे गेलो. महेशनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या.

ग्राउंडमध्ये फुटपाथसारखा लांबपर्यंत भाग आखून तयार केला होता. त्यावर, फुटपाथवर लावले आहेत, तसे स्टीलचे खांब लावलेले होते. महेशनी त्या फुटपाथवर बाईक आणली. मला डेमो समजावून सांगितला आणि बाईकवर बसायला सांगितले. गाडी स्टॅन्ड वरुन काढून, पलीकडे पाय टाकतांना, माझा थोडा तोल गेल्यासारखे जाणवले, पण तेवढ्यापुरतेच, कारण लगेच जाणवलं, की, मागे कुणीतरी बसले आहे. मागे आहे, याची खात्री करायला, मी दोन्ही पाय थोडे वर उचलले, पण गाडी स्थिर होती. मी बिन्धास झालो.

मी बाईक सुरु केली आणि २०-२५ फुटावर असलेल्या स्टीलच्या खांबांपर्यंत नेली आणि थांबवली. तिथे महेशचा सहकारी उभा होता. सीटच्या खाली असलेलं एक बटन त्यांनी दाबलं. बटन दाबताच हँडलचे दोन्ही भाग आतल्या बाजूला फोल्ड झाले. मी हळूहळू बाईक खांबातून थोडी पुढे नेली, आणि सीट खालचे बटन दाबले. हॅण्डल पुन्हा अनफोल्ड झाले. गाडी सुरु करून मी पुढे निघालो. एन्ड पॉइंटला पोहोचलो आणि गाडी मागे वळवली. खांबांपर्यंत आलो, गाडी थांबवली, बटन दाबून हॅण्डल फोल्ड केले, गाडी पुढे घेऊन हॅन्डल अनफोल्ड करून गाडी पुढे सुरु केली आणि महेशपर्यंत पोहोचलो. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवून गाडीचं आणि माझं कौतुक केलं. मी खाली वाकून टाळ्या आणि कौतुक माझ्या मागे बसलेल्या मनातल्या व्यक्तीकडे पास केल्या.

महेशच्या टीममधल्या एका सुंदरीनी मला मोठा बुके दिला आणि बाईकवर माझ्या मागे बसून सेल्फी काढला. महेशनी मला एक गिफ्ट बॉक्स दिला. मी सगळ्या टीमचे आभार मानले.

महेश : सर, ही गाडी लवकरच मार्केटला येईल. तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल या फॉर्ममध्ये भरून द्या. तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिल्या जाईल. तुम्ही स्वतः गाडी घ्या किंवा ऑफर कुणाला पास करा.

मी फॉर्म भरून दिला, मला बुके देणाऱ्या मॅडमला थँक्स म्हणालो. आणि महेशला आणि सगळ्या उपस्थितांना हात घालून बाय-बाय केले, आणि आम्ही निघालो.

परत जात असताना डोक्यामध्ये सहज विचार आला – अशा सुधारणांमुळे टू व्हीलरवाल्यांची जरी सोय होणार असेल, तरी अशा पळवाटा कुणाच्याही अंतर-मनाला नक्कीच पटणार नाहीत. स्वतःच्या सोयीकरता नियमातून पळवाट कशी काढता येईल, हीच आपण काळाची गरज तयार केली आहे आणि आम जनतेच्या काय गरजा आहेत, हे लक्षात घेऊनच शोध लावणारे त्यावर काम करत असतात. आणि म्हणूनच फुटपाथ फ्रेंडली बाईक तयार होतात. पळवाटांमुळे माझा थोडा वेळ वाचतही असेल, पण अपघात वाढतात हे नक्की. या अपघातात, आज कदाचित मी नसेन, पण उद्याच्या अपघाताचे काय? परवाचे काय? तेव्हाच्या अपघातात आपण असू शकतो, आपली बायको / मुले / आईवडील / जिवलग असू शकतात, हा विचार जर मनात रुजला, तर सगळेच चित्र बदलू शकते. जर प्रत्येकानेच ठरवले, की, मी वाहतुकीचे सर्व नियम पाळणार, तर बदल्यात मिळणार काय आहे? मिळणार आहे, अपघात शून्य वाहतूक.

आणि त्याकरता आपण प्रत्येकानी म्हणजे प्र – त्ये – का – नी काय करायचे आहे, तर अगदी सोपे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. काय आहेत ते नियम? तर, सिग्नल पाळणे / नो एंट्रीत न जाणे / स्पीड लिमिट पाळणे / आणि अर्थात फुटपाथवर गाडी न घालणे.

या सगळ्यामुळे आपला जाण्याचा वेळ थोडा वाढेल, थोडे लवकर निघावे लागेल. हा बदल स्वीकारून जर आपण वर बघून जर प्रार्थना केली : देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान – ट्रॅफिक के सभी नियम फॉलो तो कर रहे है, लेकिन ट्रॅव्हल का टाईम बहुत बढ गया है.

आपली प्रार्थना ऐकून देव नक्कीच तथास्तु म्हणेल. आणि योग्य असा छान पर्याय बाहेर येईल. आपल्या सगळ्यांच्या या अशा मानसिक बदलाकरता सगळ्यांना शुभेच्छा आणि..

फुटपाथ फ्रेंडली बाईकला – बाय बाय.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट ☆

डॉ. स्वाती बापट

अल्प परिचय 

डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

  • मूळ गाव सोलापूर येथेच प्राथमिक, माध्यमिक व वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण.
  • पतीच्या सैनिकी सेवेनिमित्त भारतात ठिकठिकाणी तात्पुरते वास्तव्य.
  • गेल्या तीस वर्षांपासून आजतागायत पुण्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय.
  • एकंदर जीवनातील, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारलेले विपुल स्फुटलेखन स्वतःच्या ५ ब्लॉग्सवर प्रकाशित.

??

☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट

आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदीजींनी काही काळापूर्वी ही घोषणा केली आणि त्याचे देशभरामध्ये बरेच पडसाद उमटले. राजकारणामध्ये कोणता नेता काय घोषणाबाजी करतो आणि त्या घोषणा प्रत्यक्षात किती पाळल्या जातात, याबाबत आपण कोणीच न बोललेले बरे. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” ही घोषणा मात्र माझ्या मनाला भावली होती.

माझ्या मते, वरकमाई करणे ही एक वृत्ती किंवा स्थायीभाव असतो. ज्याच्यामध्ये तो असतो, तो कुठे ना कुठेतरी उफाळून येतोच. यावरून लहानपणी ऐकलेली एक गंमतशीर गोष्ट आठवली. एका राजाच्या दरबारामध्ये एक खाबूनंदन, लाचखोर कर्मचारी होता. त्याला कुठल्याही खात्यात नेमले तरी तो वरकमाई करत असल्याच्या तक्रारी राजाकडे यायच्याच. पण त्या चतुर माणसाला कधीही रंगेहाथ पकडता आलेले नसल्याने राजाला त्याला कामावरून काढूनही टाकता येत नव्हते. शेवटी राजाने त्याला समुद्रकिनारी बसायला सांगितले आणि प्रत्येक दिवसभरामध्ये समुद्रात उठणाऱ्या लाटा मोजण्याचे काम दिले. थोड्याच दिवसांत पुन्हा या महाशयाविरुद्ध राजाकडे तक्रारी यायला सुरुवात झाली. समुद्राच्या काठी बसून हा कुणाकडून आणि कशी लाच खात असेल? या बद्दल राजाला भलतेच कुतूहल वाटले. “राजाने मला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिलेले आहे. तुमच्या जहाजाच्या हालचालीमुळे, या सरकारी कामात व्यत्यय येत आहे’ अशी सबब सांगून हा महाभाग किनाऱ्यावर आलेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाकडून पैसे खात होता! त्यामुळे पैसे खाण्याची वृत्ती असलेला मनुष्य कुठल्या तरी मार्गाने पैसे खाणार हे निश्चित.

आनंदने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, २६ वर्षे सेनाधिकारी म्हणून नोकरी केली, आणि कर्नल पदावर असताना, त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सैन्याच्या नोकरीमधे वरकमाई करण्याचे प्रसंग तसे कमीच येतात. त्यातून सैन्याच्या शिस्तीमधे असे काही करताना पकडले गेल्यास कडक कारवाई होण्याची जबरदस्त भीती असतेच. तरीदेखील, ‘लाचखोरी’ हा स्थायीभाव असलेल्या, सैन्यातल्याही काही लोकांबाबत, लाच खाणे, लाच देणे किंवा इतरही गैरप्रकार क्वचितप्रसंगी कानावर येतातच. आनंदने चार वर्षे, अलाहाबाद येथील सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB), म्हणजेच सेनाधिकारी निवड समितीवर काम केले. तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमधील तो एक सदस्य असे. त्याकाळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर काही भुरट्या एजंट लोकांचा सुळसुळाट होता. सेनाधिकारी होण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अलाहाबाद स्टेशनवर उतरल्या-उतरल्या हे एजंट लोक गाठत असत. “आम्ही तुमची निवड करून देण्यासाठी मदत करू. परंतु, त्यासाठी निवड समितीतील अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात. सेनाधिकारी म्हणून तुमची निवड न झाल्यास, तुमच्याकडून घेतलेली अर्धी रक्कम तुम्हाला परत मिळेल” असे आमिष दाखवून अनेक उमेदवाराकडून ते एजंट पैसे घेत असत. प्रत्यक्षात, सेनाधिकारी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्षपणे होईल याची दक्षता घेतलेली असते. त्यासाठी निवडसमितीवरील अधिकाऱ्यांवर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरीच बंधनेही घातलेली असत. परंतु, सेनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये सरसकट लाचखोरी चालत असल्याचा गैरसमज उमेदवारांमधे पसरवून, मधल्यामधे ते लबाड एजंटस भरपूर कमाई करत असत. कधी-कधी निवडसमितीच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नही व्हायचा. त्या काळात आनंदलाही एक-दोन वेळा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या सक्त विरोधात असल्यामुळे, आनंद त्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही.

वैयक्तिक पातळीवर ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा! ‘ हे तत्व काटेकोरपणे पाळणे आपल्या देशामधे तसे अवघडच आहे. या घोषणेचा पहिला भाग, म्हणजे लाच न खाणे, एकवेळ शक्य आहे. कारण त्या गोष्टीवर बऱ्याच अंशी स्वतःचे नियंत्रण असू शकते. पण काही ‘मलईदार’ सरकारी खात्यांमधे, लाच न खाणारा कर्मचारी इतरांना नकोसा असतो. कधी-कधी अशा कर्मचाऱ्याला वरचेवर बदली, सहकाऱ्यांकडून होणारी कुचेष्टा, वरिष्ठाकडून अपमानास्पद वागणूक, अशा अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आजही कित्येक सरकारी कामांमधे, लाच दिल्याशिवाय योग्यप्रकारे आणि वेळच्यावेळी काम होत नाही हे आपण ऐकतो. म्हणूनच, सामान्य माणूस, ‘ना खाने दूंगा’ हे तत्व सहजी पाळू शकत नाही. किंबहुना, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला लायसेन्स काढण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, सर्व कामे, थोडीफार लाच देऊन करून घेण्यामध्ये फारसे काही गैर वाटत नाही. परंतु दुर्दैवाने, लाच देऊनसुध्दा एखादे काम व्यवस्थित होईलच याची खात्री नसते. १५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधे वास्तव्यास असलेल्या एका अमराठी सेनाधिकाऱ्याला येथील रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) हवे होते. अनेक वेळा विहित नमुन्याचा अर्ज आणि योग्य शुल्क भरूनही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला त्याला काही केल्या मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने एका एजंटला गाठले व ६००० रुपये देऊन आपले काम करून घेतले. पण प्रत्यक्षांत जेंव्हा त्याच्या हातात दाखला आला तेंव्हा त्यावर ‘भारत देशाचा रहिवासी’ इतकेच लिहून आले होते! झालेल्या चुकीबाबत चौकशी केली असता त्या एजंटने हात वर केले. त्यानंतर त्या एजंटने पुन्हा ६००० रुपये उकळले आणि मगच त्या अधिकाऱ्याला दाखला मिळाला!

आमच्यापुरते बोलायचे तर, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा ‘ या तत्वाचे पालन करण्यासाठी मी आणि आनंद, कसोशीने प्रयत्न करतो. लाचखोरीच्या संदर्भातील ही घोषणा आठवण्यासाठी एक कारण नुकतेच घडले. काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमधे, सुमारे ऐंशी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आमच्या मुलाचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाले. लग्नाचे मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या रात्री, आम्ही एक कॉकटेल पार्टी ठेवलेली होती. त्या रिसॉर्टकडे मद्यविक्रीचा कायमस्वरूपी परवाना नसल्यामुळे आमच्या पार्टीसाठी एका दिवसाचा परवाना काढणे आवश्यक होते. एक्साईज खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून आणि ३८०० रुपये शुल्क भरून तो परवाना मिळवता येतो, ही खात्रीशीर माहिती आनंदला मिळालेली होती. परंतु, रिसॉर्टवाल्यानी तो परवाना काढून देण्यासाठी १५००० रुपये मागितले. अर्जासोबत लागणाऱ्या विहित शुल्काव्यतिरिक्त वरचे पैसे ‘एक्साईज’ खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय परवाना मंजूर होतच नाही’ अशी माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने पुरवली. अर्थात लाच घेणे-लाच देणे, हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने आम्ही योग्य मार्गानेच परवाना काढायचे ठरवले.

कार्यक्रमाच्या बरेच दिवस आधी आनंदने त्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. ते करतानाही बऱ्याच बारीक-सारीक अडचणी आल्या. त्या साईटवर अपलोड करावी लागणारी कागदपत्रे व फोटो अमुक इतक्या आकाराचेच आणि तमुक फॉरमॅटमधेच असणे अनिवार्य होते. ती कागदपत्रे योग्य आकार व फॉरमॅटमधे बसवून साईटवर अपलोड करेपर्यंत, तो सर्व्हर डाऊन होई. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत-करत शेवटी एकदाचा तो अर्ज त्या वेबसाईटवर अपलोड झाला. त्यानंतर परवाना शुल्क भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याच दुसऱ्या एका वेबसाईटवर जाणे आले. त्यामध्येही अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर ते शुल्क भरले गेले. एक-दोन दिवसातच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला फोन आला, “साहेब, तुम्ही परवान्यासाठी आमच्या रिसॉर्टच्या नावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इथल्या एक्साईज ऑफिसातून मला असे सांगण्यात आले आहे की गावातल्या काही संघटना ओल्या पार्ट्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे परवाना मिळायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण कार्यालयात येऊन भेटावे असे तिथल्या कर्मचाऱ्याने मला सांगितले आहे. ” मात्र आनंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर ऑनलाईन परवाना मंजूर झाला व आनंदने घरीच त्याचा प्रिंटाऊटही काढून घेतला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला पुन्हा फोन आला, “साहेब, एक्साईज डिपार्टमेंटच्या क्लार्क बाईंनी सांगितले आहे की ऑफिसात पैसे भरून परवान्याची प्रत घेऊन जा. त्यासाठी मला पाच-दहा हजार रुपये सोबत घेऊन जावे लागेल. तर कसे करायचे? ” आनंदने त्या व्यवस्थापकाला सांगितले, “त्या ऑफिसमधील क्लार्क बाईंना ठणकावून सांगा की योग्य शुल्क भरून मंजूर झालेल्या परवान्याची प्रत माझ्याकडे आहे. तरीही वर काही पैसे हवे असल्यास त्या बाईंनी तसे लेखी द्यावे किंवा मला मेसेज करावा. ” त्यानंतर मात्र आनंदला कुणाचाही फोन आला नाही, आणि सर्व नियमांचे पालन करून आम्ही आयोजित केलेली कॉकटेल पार्टीही निर्विघ्नपणे पार पडली.

लग्नाच्या निमित्ताने ठरवलेले सर्व कार्यक्रम आनंदात पार पडावे, अशी आमची इच्छा होती. “देऊन टाका ना वरचे पाच-दहा हजार रुपये. परवाना मिळवण्याची कटकट तरी वाचेल. ” असा सल्ला देणारे लोकही आम्हाला भेटले. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” या तत्वाला मुरड घालायला आम्ही तयार नव्हतो. आमचा बराच वेळ आणि श्रम खर्ची पडले असले तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून खूप मोठा होता.

लाच देणे-घेणे हे अनेक देशवासीयांच्या रक्तात भिनले आहे हे पदोपदी जाणवते. आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी अधिक धडपड करून, जर “ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हा मंत्र जपला तरच काहीतरी फरक पडेल असे वाटते.

© डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares