☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी की कहानियाँ ‘कलम की पूजा’ और ‘मोक्षदायिनी शिप्रा की कहानी’ पाठ्यक्रम में शामिल, अभिनंदन ☆
रतनगढ़/ नीमच (निप्र)। देश के प्रसिद्ध बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ की लेखनी ने एक बार फिर साहित्य जगत में नया कीर्तिमान स्थापित किया है। उनकी कालजयी गद्य रचनाएँ कलम की पूजा और शिप्रा की आत्मकथा अब देश भर के स्कूली बच्चों के पाठ्यक्रम का हिस्सा बनेंगी। न्यू सरस्वती हाउस प्राइवेट लिमिटेड की कक्षा-5 और कक्षा-8 की आगामी पाठ्यपुस्तक शृंखला में इन रचनाओं को शामिल किया गया है, जो देश और मध्य प्रदेश के लिए गर्व का क्षण है।
शिप्रा की आत्मकथा जो पवित्र नदी शिप्रा के आध्यात्मिक और सांस्कृतिक महत्व को दर्शाती है, बच्चों को न केवल साहित्यिक संवेदनशीलता से जोड़ेगी, बल्कि उन्हें भारतीय संस्कृति की गहराइयों से भी परिचित कराएगी। दूसरी ओर, कलम की पूजा लेखन की शक्ति और ज्ञान के प्रति श्रद्धा का संदेश देती है। ये दोनों रचनाएँ अपनी गहनता और प्रेरणादायक शैली के लिए जानी जाती हैं, और अब ये स्कूली बच्चों के लिए एक अमूल्य उपहार बनेंगी।
न्यू सरस्वती हाउस, जो शैक्षिक प्रकाशन में अपनी गुणवत्ता के लिए विख्यात है, ने श्री क्षत्रिय की रचनाओं को उनके मौलिक महत्व को पहचानते हुए चुना है। संपादक श्री शशि प्रकाश द्विवेदी ने अपने पत्र में स्पष्ट किया कि रचनाओं का कॉपीराइट श्री क्षत्रिय के पास ही रहेगा, और वे भविष्य में इनका उपयोग स्वतंत्र रूप से कर सकेंगे। प्रकाशन के बाद पाठ्यपुस्तक की प्रतियाँ लेखक को संस्थागत नियमों के अनुसार भेजी जाएँगी। यह पारदर्शी और सम्मानजनक दृष्टिकोण प्रकाशन जगत में एक मिसाल है।
श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ने इस सम्मान पर हर्ष व्यक्त करते हुए कहा, “मेरी रचनाएँ, विशेष रूप से शिप्रा की आत्मकथा, जो मेरे हृदय के करीब है, अब बच्चों के बीच जाएँगी। यह मेरे लिए साहित्यिक जीवन का सबसे बड़ा पुरस्कार है। मैं न्यू सरस्वती हाउस का आभारी हूँ कि उन्होंने मेरे शब्दों को इतना बड़ा मंच दिया।”
साहित्य जगत में इस खबर ने उत्साह की लहर दौड़ा दी है। प्रसिद्ध साहित्यकार एवं मध्य प्रदेश साहित्य अकादमी के निदेशक श्री विकास दवे ने कहा, “ओमप्रकाश जी की रचनाएँ हमारी सांस्कृतिक धरोहर का हिस्सा हैं। शिप्रा की आत्मकथा जैसी रचना बच्चों को अपनी जड़ों से जोड़ेगी और कलम की पूजा उन्हें ज्ञान का महत्व सिखाएगी। यह नीमच के लिए ऐतिहासिक उपलब्धि है।”
यह उपलब्धि न केवल श्री क्षत्रिय की साहित्यिक प्रतिभा को रेखांकित करती है, बल्कि छोटे शहरों के लेखकों के लिए एक प्रेरणा भी है। न्यू सरस्वती हाउस की यह पहल स्कूली शिक्षा में साहित्यिक और सांस्कृतिक मूल्यों को समृद्ध करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।
श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को इस अभूतपूर्व उपलब्धि के लिए ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से हार्दिक बधाई! मप्र का यह साहित्यिक रत्न निश्चित रूप से भविष्य में और अधिक ऊँचाइयाँ छूएगा।
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
दि. ४ मे रोजी ठाणे येथे “शब्दसाज साहित्यिक स्नेह-संमेलन 2025” आयोजित केले गेले होते. आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांना या संमेलनात “साहित्य भूषण” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणूनही त्यांना निमंत्रित केलेले होते.
तसेच या संमेलनात “साहित्य लेखन करतांना नवोदित लेखकांनी घ्यावयाची काळजी ” या विषयावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. या संमेलनात त्यांच्या हस्ते
(1) शब्दांचा डोह—प्रातिनिधिक कथासंग्रह (2) भाव स्पंदन—प्रातिनिधिक कवितासंग्रह.. या दोन पुस्तकांचे प्रकाशनही संपन्न झाले.
या गौरवास्पद पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे डॉ. शैलजा करोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या पुढील त्यांच्या अशाच सातत्यपूर्ण साहित्यसेवेसाठी असंख्य शुभेच्छा.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या समूहातील लेखिका सुश्री वीणा रारावीकर यांनी अनुवादित केलेले ‘यू हॅपिअर’ हे पुस्तक मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे द्वारा नुकतेच प्रकाशित केले गेले आहे. मूळ इंग्रजीत असलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
– – ‘ आनंद हे मेंदूचे कार्य आहे. जर मेंदू निरोगी असेल तर जीवन आनंदाने जगता येऊ शकते. त्यासाठी आपल्या मेंदूचा प्रकार ओळखा आणि मेंदूचे सर्वांगीण आरोग्य सुधारा ‘ असा महत्वाचा आणि मोलाचा संदेश देणारे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी न्यूरो सायन्समधील रहस्यांवर आधारित शास्त्रशुद्ध उपाय सांगणारे हे पुस्तक, आनंदाने जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल असे खात्रीने म्हणावेसे वाटते.
या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल आपल्या समूहातर्फे सुश्री वीणा रारावीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि असेच लोकोपयोगी काम यापुढेही त्यांच्या हातून व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
साहित्यरंग वाङ्मय मंडळ, वारजे आयोजित ‘कल्पनाविस्तार’ स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 🪻
पुरस्कार प्राप्त लेख ‘असेही पुनर्मिलन’ आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
विविधा
☆ “असेही पुनर्मिलन” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
“चला उतरा लास्ट स्टाॕप आला “कंडक्टर मोठ्याने ओरडला. त्यासरशी मी एकदम जागी झाले, तो झोपेत माझा स्टाॕप मागेच गेला होता अन् मी एका अपरिचित ठिकाणी उतरले. काय करावे काही सुचत नव्हते. बाकी पॕसेंजर भराभरा त्यांच्या मुक्कामी निघून गेले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. चहा घेऊन समोरच असलेल्या देवळात शिरले आणि समोर बघते तर……
सभामंडपाच्या पायऱ्या उतरून येणाऱ्या त्या बाईचा चेहरा अगदी ओळखीचा वाटला. मी जागेवरच थांबून पाहू लागले अन् आठवले ‘अरेच्चा ही तर आपली बालमैत्रीण प्रभा आहे’. तिला पाहून मला अतिशय आनंद झाला.
अचानक तिचेही माझ्याकडे लक्ष गेले. ती पण पहातच राहिली. एकदम ” नंदिनीऽऽ.. ??? नंदू ऽऽऽ “, अशा जोराने हाका मारत ती भराभर पायऱ्या उतरली आणि माझ्याजवळ येऊन तिने घट्ट मिठी मारली. ती आता ओक्साबोक्शी रडू लागली. ” अग, तुला भेटण्यासाठी मी किती तळमळत होते. आज देवालाच दया आली. त्याच्या दारातच तू पुन्हा भेटलीस. किती आनंद झालाय म्हणून सांगू ? कुठे होतीस ग इतके दिवस ?”
तिचं रडणं आणि बोलणं एकत्रच सुरू होतं. मी तिला शांत करीत खाली बसवलं, पाणी दिलं. ती खूप सावरली. मला जवळ घेत तोंडावरून हात फिरवत म्हणाली, ” नंदू, किती काळ लोटला ग आपल्या भेटीला. आता पुन्हा भेट होणारच नाही असं वाटत होतं. पण देवानंच आपली भेट घडवली. किती जीवाभावाच्या मैत्रिणी आपण, खूप आनंदात होतो. पण मला काय दुर्बुद्धी सुचली अन त्या खोटारड्या जयडीवर विश्वास ठेवला. तुझ्याशी अबोला धरला. नंतर मग खूप वाटलं तुझी माफी मागावी, पुन्हा एकत्र यावं, पण आपली भेटच झाली नाही. “
“प्रभा अगं जाऊ दे ना. विसर ते जुनं सगळं. ” हे ऐकून चिडलीच.
“कशी विसरू ? माझ्या चुकीनंच मी तुला गमावलं होतं ना? खरंच माझं तेव्हा खूप चुकलं होतं. मला माफ करशील ना ग नंदू ?” ती पुन्हा रडू लागली.
” हे बघ प्रभा, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना. मैत्रीत कसली माफी मागतेस ? आपली ती वेळच वाईट होती. मी तर केव्हाच सगळं विसरले आहे. तुला भेटून मात्र खूप खूप आनंद झाला. माझं उतरायचं गाव मागं गेल्यामुळं मी इथं आले हे फारच छान झालं. “
आता प्रभा पूर्ण सावरली. त्या गावातच तिचं घर होतं. आम्ही तिच्या घरी आलो. हसतखेळत रात्री जेवण झालं. मी आणि प्रभा झोपायला गेलो. झोप कुठली यायला ? इतक्या वर्षांच्या साचलेल्या गप्पा झाल्या. त्या भांडणाची उजळणी पण झाली.
आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी होतो. हे न बघवणाऱ्या मुली आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करायच्या. एकदा जयश्रीनं माझ्याबद्दल काहीतरी खोटंनाटं प्रभाच्या मनात भरवलं. प्रभा खूप चिडली. आमचं जोरात भांडण झालं. माझं म्हणणं ऐकून न घेताच ती निघून गेली. कायमचा अबोला धरला. पुढं बदलीमुळं ते परगावी गेले आणि आम्ही कायमच्या दुरावलो. कसलाच संपर्क झाला नाही. लग्नानंतर तर गावही दुरावला.
पण ही गोष्ट प्रभाच्या इतकी जिव्हारी लागलेली असेल याची कल्पनाच नव्हती. आत्ता भेटल्यावर सगळं मळभ दूर झालं. खूप आनंद झाला.
गप्पांमधे इतर मैत्रिणींच्या आठवणी निघाल्या. आमची मैत्रीण विजयाच्या मुलीच्या लग्नासाठी मी आधीच्या गावात उतरणार होते. मग दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर प्रभासुध्दा लग्नाला आली. तिथे आमच्या आणखी ३-४ मैत्रिणी आलेल्या होत्या. माझ्याबरोबर प्रभाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खूप आनंद झाला. आमच्या बालपणाच्या आठवणींचं कारंजं थुईथुई उडू लागलं. त्यात आम्ही चिंब झालो. पुन्हा एकदा लहान होऊन खूप हसलो खिदळलो. खूप मजा केली. भेटीचा पुरता आनंद घेतला. ही ‘पुनर्भेट’ आम्ही अतिशय मनापासून उपभोगली. आलं देवाजीच्या मना…. !
“युवा विवेक” या पुणेस्थित संस्थेतर्फे “म्हणींच्या गोष्टी” या नावाने आयोजित केलेल्या एका वेगळ्याच प्रकारच्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री शीला पतकी यांच्या “बैल गेला नि झोपा केला” या कथेला सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे सुश्री शीला पतकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य-प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..💐
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
🌸 जीवनरंग 🌸
☆ बैल गेला नि झोपा केला… ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
शेवटचा पेपर संपून संध्याकाळी सगळी मुले नाना आजोबांकडे आली त्यावेळेस सगळेजण समीरला चिडवत होते तो बिचारा अगदी रडकुंडीला आलेला. नानानी विचारलं, “काय रे काय झालं ?”समीर खाली मान घालून उभा” नाना आजोबा माझा पेपर बुडाला म्हणजे आज शेवटचा दिवस होता ना म्हणून सकाळी पेपर ठेवला होता आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे दुपारी आहे मी दुपारी गेलो माझ्या लक्षात नव्हते आणि त्यामुळे आता माझा पेपर बुडाला पेपर झाल्यावर मी शाळेत गेलो”. त्यावर नाना म्हणाले” अरेरे! म्हणजे तुझं असं झालं… पेपर गेला आणि समीर आला..! तुझ्यावरून आता ही नवीन म्हण पडेल “.. म्हण म्हणजे काय हो आजोबा? सगळ्या मुलांनी एक सुरात विचारले. नाना म्हणाले “अरे एखादी घटना अगदी थोडक्यात सांगण्याचे साधन म्हणजे म्हण! अशा म्हणी आम्ही खूप वापरत असू तुमच्या पिढीला हे माहिती नाही. ” पण म्हण म्हणजे काय? नाना म्हणाले म्हण म्हणजे.. नाचता येईना अंगण वाकडे… नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.. अंथरून पाहून पाय पसरावे.. इकडे आड तिकडे विहीर याला सगळ्याला म्हणी असे म्हणतात. अशाच एखाद्या गोष्टीवरून ती म्हण पडलेली असते. गोष्टीवरून म्हणल्याबरोबर मुले जोराने म्हणाली “मग आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना” आजोबा म्हणाले” हो सांगतो ना बसा बसा सगळे बसा.. पेपर कसे गेले सगळ्यांना?” छान गेले आजोबा”. तोपर्यंत आतून आजी म्हणाल्या पोरांनो तुमच्या आजोबांची गोष्ट होईपर्यंत मी मस्त भेळ तयार करते मग भेळ खाऊन जारे…! पोरं तर आनंदाने उड्याच भरायला लागले. सगळ्यांनी एकच गल्ला केला. सांगा ना आजोबा सांगा ना आजोबा अरे हो सांगतो. आजोबा सांगू लागले..
खवणी नावाचे एक गाव होते. त्या तिथे जीवाजी नावाचा शेतकरी राहत होता. भरपूर शेती होती मळा होता जिवाजी खूप कष्ट करणारा शेतकरी आपला मळा त्याने सुंदर केला होता. त्याच्याकडे सोन्या आणि तान्या अशी दोन बैलं होती त्याच्यावर जिवाजीचा फार जीव होता जिवाजी म्हातारा झाला आणि मुलगा शेती करायला लागला मुलाचं नाव होतं तानाजी तानाजीला ही शेतीतलं ज्ञान चांगलं होतं. पण थोडासा आळशी होता तेथे काम वेळेवर करावे ही पहिल्या पिढीतली शिकवण तानाजी कडे नव्हतीच त्यामुळे जिवाजीला थोडा राग पण यायचा. अरे शेतीत कामे वेळेवर केली पाहिजेत बाबा. पण तो म्हणायचा करतोय ना त्यापुढे जिवाजी काहीच बोलत नसे. जीवाजीचे दोन बैल ज्या झापेत बांधायचे तो झापा पडला होता आणि जिवाजी रोज तानाजीच्या मागे लागायचा अरे झापा नीट करून घे नवा बांध तो म्हणायचा सध्या खूप काम आहे. दुपारी तो बैलांना झाडाखाली बांधायचा आणि रात्री घराच्या पुढे आलेल्या पत्रात जवळपास वर्षभर हे चालले होते पावसाळ्यात बैलांना पाऊस लागे चिखलात उभं राहावं लागलं उन्हाळ्यात वरून ऊन मारत होतं आणि थंडीत थंडी वाजली. बैल कंटाळले होते पण तानाजीला वेळ नव्हता बैल एकदा असेच झाडाखाली एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले आपला मालक जीवाजी आपल्यावर किती प्रेम करत होता आणि हा मुलगा आपल्याला एक डोक्यावर छप्फर बांधून देत नाही किती दिवस आपण चिखलात मातीत पाण्यात उभे राहायचं बरं ?.. आपण येथून पळून जाऊ. दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही बैल दावं तोडून पळून गेले जिवाजी सकाळी पाहतो तर झाडाखाली बैलं नाहीत शेतातही कुठे दिसेना बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा आवाज सकाळी ऐकल्याशिवाय जिवाजीला चैन पडत नसे. त्याने सगळ्यांना बैल हुडकायला चारी दिशांना पिटाळलं. संध्याकाळपर्यंत बैल कोणालाही सापडले नाहीत. जिवाजींन तानाजीला सांगितलं तानाजी अरे बैलांची सुद्धा काळजी घ्यावी लागते घरातल्या माणसाप्रमाणे तू त्यांची वर्षभर अबदा केलीस.. किती सोसणार मुक जनावर बिचारे… जिवाजी खूप रागावला. तानाजीला खूप वाईट वाटलं खरंच आपण चुकलो त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून मोठे डाम रोऊन घेतले होते भोवताली पट्ट्या लावून तुराट्या बांधून घेतल्या चिखला न लिंपून घेतल्या. गवताच्या पेंढ्या लावून वरच्या बाजूला छप्पर केल जमिनीपासून वर एक फुटावर घेतल्यामुळे ते छान दिसत होत. त्यांन जिवाजीला बोलवून दाखवलं बाबा कसा गोठा चांगला झालाय बघ. बा म्हणाला, पण आता त्याचा उपयोग काय बैल गेला अन झापा केला अशी तुझी गत झाली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिवाजीच्या ओढीन बैल घराकडे परतले. त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकून जीवाची खुश झाला. जिवाजीच्या बायकोन रकमाना त्या बैलांना ओवाळलं. पाणी पाजलं. गुळ अन भाकरी खाऊ घातली आणि बैल नव्या झाप्यात जाऊन उभे राहिले. तानाजीने त्यांना बांधलं. चारा टाकला. पाण्याच्या बादल्या ठेवल्या आणि त्यांन त्या दोन्ही बैलांना अक्षरशः गळ्याला लावले त्यांच्या अंगावर हात फिरवत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नका बाचा जेवढा जीव आहे तेवढाच माझा बी जीव आहे तुमच्यावर… जिवाजी हे लांबून पाहत होता जिवाजीचे गडी तानाजीला म्हणाले मालक आता बैल गेला आणि झापा केला असं करू नका बरं आपल्या बाच जरा ऐकत चला. हो रे बाबांनो चूक झाली माझ्याकडून आता पुन्यांदा अशी चूक होणार नाही.
– – आणि या प्रसंगातून एक म्हण तयार झाली ” बैल गेला अन झापा केला. ” आता आपल्या समीरला पण एक म्हण तयार होईल ना नाना! कोणती रे? तीच ती मगाशीच तुम्ही म्हणालात ना ” पेपर झाला आणि समीर गेला “.. सगळे मोठ्यांना हसायला लागले. तोच आजीने हाक दिली ‘ चला रे भेळ खायला या आत मध्ये ‘ मुले उड्या मारत स्वयंपाक घरात गेली.. भेळेवर ताव मारायला.
ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार, मा. ए. के. शेख व मा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐
☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ के ‘शब्दों की चाय संग जासूसी’ के मराठी अनुवाद ‘छोटा जासूस’ का महाराष्ट्र में होगा वितरण ☆
प्रसिद्ध बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ के नवाचारी शैक्षणिक हिंदी उपन्यास ‘शब्दों की चाय संग जासूसी’ का मराठी अनुवाद ‘छोटा जासूस’ के रूप में प्रकाशित हो चुका है। यह उपन्यास वर्तनी सुधार और भाषा शिक्षण को एक रोमांचक जासूसी कहानी के माध्यम से प्रस्तुत करता है, जो पाठकों को शिक्षित और मनोरंजित करती है। इसी विशेषता को दृष्टिगत रखते हुए इस उपन्यास का मराठी में अनुवाद किया गया है।
इस उपन्यास का अनुवाद मराठी भाषा की प्रसिद्ध अनुवादक सुश्री रेवती पाटिल द्वारा किया गया है। जिसे महाराष्ट्र की जानी-मानी प्रकाशक सुश्री सुनीता मनोहर पाटिल द्वारा संचालित रश्मि बुक एजेंसी, कोल्हापुर ने प्रकाशित किया है। ‘छोटा जासूस’ को महाराष्ट्र के 1000 विद्यालय और पुस्तकालयों में वितरित करने की योजना है, ताकि यह छात्रों और शिक्षकों के लिए आसानी से उपलब्ध हो सके।
यह उपन्यास हिंदी भाषा के उपन्यास की तरह मराठी भाषाभाषी पाठकों को भाषा के नवाचार, भाषा के प्रति रुचि जगाने और शैक्षणिक नवाचार को बढ़ावा देने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। जिसके बारे में प्रख्यात बाल साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ का कहना है, “‘छोटा जासूस’ के माध्यम से शिक्षा को रोचक बनाने का मेरा जो सपना था लगता है वह अब साकार होने लगा है।” अनुवादक सुश्री पाटिल का कहना है, “मराठी में इस उपन्यास को अनुवादित करना एक सुखद और रचनात्मक अनुभव रहा है। जिसका लाभ महाराष्ट्र के पाठकों को प्राप्त होगा”
इस उपन्यास के प्रकाशन पर आपको साहित्यकार साथियों, ईष्टमित्रों, परिवार जनों और पत्रकार साथियों ने हार्दिक बधाई दी हैं। आपने मध्य प्रदेश का नाम महाराष्ट्र में रोशन किया।
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
शिवाजी विद्यापीठस्तरीय “स्पंदन २०२५” या सांस्कृतिक युवा महोत्सवात, आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक, कथा नाट्य लेखक श्री अरविंद लिमये यांच्या. *पत्रास कारण की एकांकिकेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक नाटकांना व एकांकीकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री. अरविंद लिमये यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “दुर्वांची जुडी “ या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन दि. ०६/०४/२०२५ रोजी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे करण्यात आले. वीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. ममता सकपाळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. (प्रकाशक:अमित प्रकाशन)
या नव्या कथासंग्रहाबद्दल आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच अखंड साहित्य सेवेसाठी असंख्य शुभेच्छा.
आजच्या आणि उद्याच्या अंकात वाचूया या नव्या संग्रहातली एक कथा चैत्रपालवी – दोन भागात.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
जीवनरंग
☆ चैत्रपालवी… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पहात होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं. एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्या सारखं. भासत होतं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, “आपलंही आयुष्य असंच आहे. भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं.
आजूबाजूला अनंत गोंधळ होते. वाहनांची वर्दळ होती. हॉर्न चे आवाज होते. समोरच्या मैदानात मुले खेळत होती. कोणाचे मोठ्याने बोलण्याचे ही आवाज होते. हसणे, ओरडणे, सारं काही होतं. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते. हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा, या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व, त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंत:प्रवाहात एक लांबलचक कोरडा उसासा फिसकारला.
ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्रे होती. दोघांची. ती आणि श्रीरंग. दोन हसरे, आनंदी चेहरे. घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले. जणू एक गाढ भावनेचा प्रवाहच त्या भिंतीवर या स्वरूपात दृश्यमान होता. फोटोतला नदीचा किनारा, फेसाळलेल्या लाटा, पौर्णिमेचा चंद्र, नारळाची गर्द झाडी, पाण्याने वेढलेल्या खडकावर बसलेल्या तिचा निवांत चेहरा. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते.
एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं! नंदा आणि श्रीरंग सारखं जोडपंच नसेल कुठे? सौंदर्य, आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं. कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना, कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळतच आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते.
“काय नंदा? संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस दोघे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदुड. “
कधी तिची आईच म्हणायची,
” लवकर विचार करा बाबा! आता आमचीही वय होत चालली आहेत. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं! आणि हे बघ प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं बरं का! आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. “
कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणा जाणून लागला होता.
त्यादिवशी बागेतल्या कुंड्यांना पाणी घालत असताना तिला जाणवलं, ही सदाफुली फुलली आहे, मोगऱ्यालाही वेळेवर फुले येतात, गुलाब उमलतात, घाणेरी सुद्धा सदाबहार असते, पण ही जास्वंदी? हिरवीगार, टवटवीत, भरपूर पान असूनही आजपर्यंत हिला एकदाही एकही फुल आलं नाही. असं का? मग तिने ठरवलं, आता विशेष लक्ष देऊन या झाडाला खत पाणी घालायचं. पण या विचारा बरोबरच एक उदासीनता तिच्या मनाला घट्ट पकडून राहिली.
या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही, कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दामहून हा विषय टाळत असावीत. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन वापरत नसताना ते का घडू नये?
सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये मध्ये असतात. आशावादी असतात. ‘होईल की. एवढी काय घाई आहे?’ याही विचारात असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्याशक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो. माणसाला खडबडून जागा करतो. आणि गडद अंधारातही ढकलतो.
श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा. पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचा ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल? तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? श्रीरंग नक्की कसा रिऍक्ट होईल? समजून घेईल की दुरावेल?या अपूर्णतेचा तो कसा स्विकार करेल? प्रेमाचं सहजीवन यांत्रिक होईल की आणखी भलतंच काही सोसावं लागेल? या विचारांनी नंदा पार विस्कटून जायची. आणि समजा, दोष श्रीरंग मध्ये निघाला आणि तो डिप्रेशन मध्ये गेला तर? सगळंच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणार होतं.
श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा “नको इतका विचार करूस. काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं! मुल झालंच पाहिजे या विचारापासूनच थोडी दूर जा की. जीवनात इतर आनंद नसतात का?”
असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर, नाना प्रकारच्या टेस्ट्स दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही कधी कधी मन खचायचं.
पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघाले नाही. डॉक्टर म्हणाले, ” व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर दोघांतही नाहीत. तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. “
” मग?”
त्यानंतर डॉक्टर म्हणाले,
” काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताण-तणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी नसते. आजकालच्या पीढीची ही समस्याच आहे. पण निराश होऊ नका. शास्त्र खूप पुढे गेले आहे आता. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो. म्हणजे इन्सेमिनेशन, आयव्हीएफ, यु आय आय वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. “
खरोखरच हे सगळं मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं. अवघडवून टाकणार होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतातच. शक्याशक्यताही असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंग ने ठरवलं.
आशावाद नव्हता असंच नाही. पण एक डोंगराएवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना ती खचवून टाकणारी असते. सुखाची पानगळच असते ती.
यामधला एकच, अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं! ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होत होती. श्रीरंगला तेही जाणवत होतं.
त्यादिवशी प्रधानांच्या आजी बोलता बोलता नंदाला सहज म्हणाल्या,
” का ग? तुमच्या पत्रिकांमध्ये एकनाड योग आहे का?”
“म्हणजे?” नंदाने विचारले.
” म्हणजे पत्रिकेत दोघांचीही अंत्यनाड असेल तर मुलं होण्यास बाधा येऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी मुल होत नाही, असं म्हणतात. “
नंदाने जेव्हा श्रीरंगला हे सांगितले तेव्हा तो उसळलाच. आणि ठामपणे म्हणाला,
” या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “