मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास  गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

अल्प-परिचय

जन्म – ६ जून १९६८

शिक्षण – बी कॉम, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी,

विशेष – वाचनाची व लेखनाची आवड, काही लेख प्रसिद्ध, -चांदोबा ते कैवल्याच्या चांदण्याला ह्या लेखाचे कोल्हापूर आकाशवाणी वर वाचन, सोशल मीडियावर अनेक लेख प्रसिद्ध.

? विविधा ?

☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

“अरे मुडद्या तिकडं उन्हात का मरालायस इकडे सावलीत येउन मरकी की काय मरायचं तेे.. आँ..ss!”

उन्हात खेळणाऱ्या चार वर्षाच्या बंड्यावर चंपा ओरडली… पोरगं धाकाने उठून जवळ आलं. तसा आईच्या काळजाचा धपाटा चंपानं त्याच्या पाठीत घातला.. बंड्याच्या पाठीला काय पण फरक पडला नाही.. अर्धा खाल्लेला उष्टा रव्याचा लाडू बंड्यानं निरागस हसून आईसमोर धरला.. अन हसून चंपानं त्याला जवळ धरले…चिमणीच्या दाताने लाडू चा तुकडा मोडून चंपानं प्रेमानं छोट्या बंड्याचा मुका घेतला.. एक मिनिट मिनिटापूर्वी आलेला राग कुणाचं काय पण बिघडू शकला नाही…

 सुन्या आणि अन्याच्यात काय तरी कारणानं जोरदार भांडण जुंपले बोलणारा सुनील अनिलवर सक्त नाराज होऊन ओरडला

 “आयुष्यात परत लक्षात ठेवा  अनिलराव परत तुमच्या नादाला लागणार नाही”

सुनील च्या त्या वाक्याने अनिल चा काळजाचा तुकडाच निघाला… नेहमीच्या आपुलकीचा एकेरी पणा आज आपण कुठेतरी हरवून बसलो याची मनापासून जाणीव होताच अनिल च्या आवाज बंद झाला… अन्यावरून डायरेक्ट “अनिलराव” हे सुनीलचे हाक मारणे अनिलच्या काळजावर वार करून गेलं. दोन मिनिटे शांततेत गेली अनिल चा स्वरच पालटला

“असं काय करतोस सुन्या मर्दा ऐक की माझं जरा!’  अशी समजूतची भाषा अनिलनं काढली  अन भांडणाचा नूरच पालटला… आणि पुढच्या पंधरा-वीस मिनिटात सगळा “मॅटर क्लिअर” झाला… भाषा बदलली… नूर बदलला… गैरसमज संपले… तासाभरानं चहाच्या टपरीवर एक पेशल “च्या” दोघात संपला..

“संजुबाळ ss धीरेssधीरेss” शाळेत उशीर होत असलेल्या संजीव ची आई संजुवर चिडली होती. आईचे हे “गोड” कुत्सित बोलणे ऐकले अन आता आपली काय खैर नाही याची जाणीव संजूला झाली.. आता गोड आवाजाचा अर्थ काय होणार हे त्याला अनुभवाने माहिती होते कसं बसं पटापटा आटोपून संजीव मात्र दप्तर घेऊन शाळेच्या वाटेला पळत सुटला…

थंडीने काकडणारा राजू झोपेतुन उठून तसाच मोरीत पळाला. तोंड धुतले, आईने गरम पाणी बादली भरून दिले. गुडघ्यावर बसून राजू डोक्यावर तांब्याने पाणी ओतू लागला. निम्मी बादली संपली… बाबा आले राजूला उभे केले… त्यांच्या लक्षात आले की गुडघ्याची मागची बाजू कोरडीच आहे… आळशी राजू चा बाबांना राग आला दोन रट्टे पिंढरीवर मारुन रडणाऱ्या राजुला बाबांनी चांगली घासुन आंघोळ घातली… ‘काही न बोलता’..! बाबांची शिस्त मात्र राजूने आयुष्यभर लक्षात ठेवली…

आनंदरावांचा ड्रेस शिवायला घेतलेल्या शामभाऊ टेलरकडे आनंदरावांच्या एव्हाना दहा चकरा झाल्या होत्या. प्रत्येक वेळा आनंदराव गोड बोलून विचारायचे, श्यामभाऊ मात्र रोज वेगळे कारण सांगायचा… मुदत मागायचा. आज मात्र आनंदराव चिडले. श्याम भाऊ टेलरची चांगली खरडपट्टी काढली. मोठा आवाज काढून भांडणाऱ्या आनंदरावांच्या व शामभाऊ च्या भोवती चांगली दहा पंधरा माणसे गोळा झाली…  संध्याकाळ पर्यंत शर्ट शिवून दे नाही तर माझ्याशी गाठ आहे असे म्हणून आनंदराव परतले… श्यामभाऊ चांगलाच हादरला होता… सायंकाळी पूर्ण काम करूनच श्यामभाऊने आनंदरावांच्या शर्ट घरपोच केला होता…

तिळगुळ घ्या गोड बोला सांगणारा हा संक्रांत सण पण कधीकधी गोड बोलून कामे होत नाहीत तेव्हा मात्र असं आनंदरावांसारखे तिखट बोलता आलं पाहिजे.

गोड या शब्दाचा असा प्रत्येकासाठी वेगळा वेगळा अर्थ लागतो. आपण सगळेच जण विचार करू तर एका निष्कर्षापर्यंत जरूर पोहोचू की गोड ही कल्पना वेगवेगळ्या संदर्भाने येऊ शकते.. कोणी असे म्हणेल की आमच्या ‘हिच्या’ हातच्या स्वयंपाकाची गोडी जगात कशालाच नाही.

याचा अर्थ जे काही ‘ही’ करते ते उत्कृष्ट असते. मग लसूण मिरच्या घालून केलेला चमचमीत खर्डा पण गोड होऊन जातो.

आपल्या मनात प्रेम असेल तर एखाद्या व्यक्तीच्या शिव्या पण गोड वाटतात. कारण ते देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचा ‘बंध’ मनापासून असतो. मग कुणी आदरार्थी बोलले तरी दूर करणारे ठरते. आणि कोणी एकेरी बोलले तरी दूर ढकलल्यासारखे वाटते…

हे मनातले अंतर मोठे विचित्र आहे. मग हजारो किलोमीटर असलेला पण ऱ्हदया जवळ राहतो आणि रोज घरात राहणारा मात्र टप्प्यात येत नाही.

गोड बोलणे किती तिखटजाळ होते तेव्हा ते बोलण्यामागे असलेला ‘भाव’ कुत्सितपणाचा असतो.

मग आईने घातलेल्या शिव्या पण ‘लागत’ नाहीत पण गोड बोलणे ‘लागते’… त्यामुळे हा ‘भाव’ फार महत्त्वाचा … तो प्रेमाचा असेल तर मग वरकरणी कसेही बोला जीवनात ‘गोडीच’ राहील…

पुराणकथेत शनि विचारतो की तुझ्या शरीरात मला बसण्यासाठी जागा दे तेव्हा त्याला उत्तर दिले जाते की माझी जीभ सोडून कुठेही बस… शनी हताश होतो म्हणतो तू जर माझी गादीच काढून घेतलीस.. आता मी तुझ्या शरीरात कुठे बसू शकत नाही… शनि पार पळून जातो..

दिवस कसेही असो शनीला जिभेवर स्थान न देणे शहाणपणाचे.

गुरुचरित्रात एक कथा येते की कली देवाच्या दरबारात प्रवेश करतो तो एका हातात वासना आणि एका हातात जीभ घेऊनच… त्याला विचारले जाते की “असे का रे..?” तेव्हा कली उद्गारतो. माझ्या या युगात मी या दोनच गोष्टी मध्ये वाईट रूपाने असेन. जो कोणी आपल्या जीभेवर आणि वासनांवर ताबा मिळवेल त्यांचे मी काहीही बिघडवू शकणार नाही .

मनात उमटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी मानवाने भाषेचा आधार घेतला. अनेक भावभावनांना , पदार्थांना काही विशिष्ट उच्चार मिळाले आणि भाषा प्रगत झाली. भाषांनी मानवाचे जगणे सुलभ केले. संदेशवहन सोपे झाले. जन्मापासून आपल्याला या भाषेची मोहिनी घातली जाते. आपल्याला काय वाटते ती प्रत्येक गोष्ट एक बाळ आपल्या उच्चाराने आईला, समाजाला कळवते. त्याच्या गरजा पूर्ण होतात. भाषेची थोरवी खूप मोठी… निशब्द शांत बसलेले असताना पण आपण आपल्याशी असा मातृभाषेतून संवाद साधत असतो… आपल्या विचारांना सुव्यवस्थित मांडत असतो… म्हणजेच निशब्दातही आपले शब्द शांत राहात नाहीत… प्रकट होत राहतात… हे प्रकट होणे खरंतर चमत्कारापेक्षा कमी नाही… अचानक काही विचार मनात उमटतो… खरंतर तो कोठून येतो हे कळतच नाही… निसर्गच ते पुरवत असतो… हा पलीकडून बोलणारा कोण? याचा शोध अनेक संतांनी घेतला… कोsहम् कोsहम् विचारत राहिले… सोsहम सोsहम म्हणत राहिले… तोच ओंकार… आणि तोच आदी… तोच अंत…

 संक्रांतीचा गोड बोला संदेश इतक्या अमृतवाणी रूपाने आपण स्वीकारला तर जीवन धन्य होईल.

वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत

 वैखरी: जी आपण व्यवहारात बोलतो ती मुखात जन्मते,

मध्यमा: तिच्या मागे सामुदायिक कल्याण अपेक्षित असते अशी वाणी ऱ्हदयात उत्पन्न होते,

पश्चंती: ज्याच्या मध्ये आशीर्वाद किंवा सिद्धी असतात उत्पत्तिस्थान पोट असते आणि

 सर्वात उच्च वाणी – जिला परा म्हणतात… ती देववाणी मानली जातेे… तिथे ओंकार येतो… वेदवाणी येते…श्लोक, स्तोत्रे किंवा ईश्वरापर्यंत नेणारे शब्द हे या वाणीत येतात.. हि नाभित उमटते…

या अमृतवाणी साधनेची सुरुवात मात्र गोड बोलण्याने होते. प्रेमाने बोलण्याने होते…

म्हणून हे मकर संक्रमण महत्त्वाचे, आपणा सर्वांना या अमृतमय प्रवासास मनापासून शुभेच्छा…

बोला । अमृत बोला ।

शुभसमयाला, गोड गोड ॥

*

दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।

ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य…

रचना : मो. ग. रांगणेकर

 प्रेम आहे ते वृद्धिंगत व्हावे!

©  श्री श्रीनिवास गोडसे

(गोड Say परीवार)

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.

जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.

मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.

काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.

हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.

पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी ” काळजी घे ” म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.

त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.

कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या ” काळजी घ्या ” ची सर कशाला नाही.

आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.

हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.

बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.

तिळगुळ घ्या गोड बोला

संवाद असू द्या स्नेह असू द्या !! ……

लेखक : अज्ञात

प्रस्तुती.. सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतील संक्रांत… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

आठवणीतील संक्रांत… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

कार्तिक महिन्यातील दिवाळीला सुरू झालेली थंडी पौष महिन्यात अजूनच वाढायची.

ठिकठिकाणी पहाटे पहाटे शेकोट्या पेटायच्या.पावट्यांच्या मोहराचा अन शेंगांचा घमघमाट सगळ्या रानातून दरवळत असायचा.करड्याची लुसलूस रोपे टच्च भरलेल्या हरभऱ्याच्या डहाळ्याना सोबत करायचे.दाट धुक्यात शेते शिवारे गुडूप व्हायची,गव्हाची शेते हिरव्यागार ओंब्या डोक्यावर घेऊन आनंदात डोलायची,शाळूची हिरवीगार ताटे एका पानावर येऊन टपोरी कणसे प्रसवायच्या तयारीत असायची,आंब्याचे मोहोर मधमाशांना न् कीटकांना धुंद करायचे आणि या निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात हळूच संक्रांत सामील व्हायची.

संक्रांतीला पंधरा तीन आठवडे  राहिले असताना कोकणपट्ट्यातून (बहुतेक)संक्रातीच्या(नव्या मडक्याच्या)बैलगाड्या भिलवडी नाक्यातून गावात प्रवेश करायच्या.भिलवडी नाक्यातच आमची शाळा असल्याने आम्हाला त्या येताना दिसायच्या आणि संक्रांत जवळ आल्याची जाणीव व्हायची. खूप खूप आनंद व्हायचा.

तीन -चार गाड्या शिगोशिग भरून त्यावर भाताचे काड आणि जाळी लावून हळू हळू चालत चालत त्या इतक्या लांब प्रवास करत.गाडीच्या उभ्या दांडीवर गाडीवान बसायचे,त्याच दांडीखाली कापडाची किंवा पोत्याची मोठी खोळ ,त्यात चार स्वैपाकाची भांडी असायची .बाजूला एक कंदील लटकवलेला असायचा आणि कधी पुढं तर कधी बरोबर  त्यांचे पाळीव कुत्रेही इतक्या लांबून चालत चालत यायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगरू संथ चालीत खूळ खूळ नाद करत वाजायची. एक गाडी नाक्यातच मोकळ्या मैदानात उतरायची,एक आमच्या घरामागच्या मोकळ्या मैदानात आणि दोन गावात कुठेतरी थांबत असत.आम्ही लहान असल्याने त्यांचे नेमके ठिकाण माहीत नाही.वर्षानुवर्षे या गाड्या त्याच ठराविक ठिकाणी थांबायच्या; किती वर्षांपासून त्या येत होत्या माहीत नाही पण कळत्या वयापासून आम्ही त्या पहात होतो.

आमची शाळा सकाळ सत्रात असायची .शाळा सुटून घरी आलो की दप्तर टाकून गाडीजवळ जायचो.भाताच्या काडात अलवार  शिगोशिग भरलेल्या गाडीवर जाळे लावून करकचून बांधलेलं असायचं जेणेकरून मडक्यांना तडा जाऊ नये.इतक्या लांबून बिचारे जपून गाडी हळुवार चालवत येत असणार कारण वर्षभराचे पोटाचे साधन होते त्यांचे.सहा-सात महिने खपून,गाळलेला घाम होता तो.गाडी सोडून, बैल बांधून कुंभार विश्रांती घेई.गाडीशेजारीच कुत्रे धापा टाकत बसून असे.कुंभारासोबत अजून एखादे नातेवाईक असे.क्वचितच एखादे ७-८वर्षाचे पोर असे पण स्त्रिया कधीच येत नसत.एका गाडीबरोबर दोन किंवा तीन पुरुष असत.हडकुळी शरीरयष्टी ,पांढरा ढगळा अंगरखा,गुडघ्यापर्यंत घातलेली खाकी ढगळ चड्डी आणि पांढरी टोपी इतकाच वेष असायचा त्यांचा.

उन्ह कलतीला लागली की गाडीवरील जाळी हळुवार काढून काड बाजूला सारत एक एक मडके बाजूला काढून गाडीजवळ मांडून ठेवत.पाच पाच छोट्या मोठ्या संक्रांतीचे(मडक्यांचे)गट,तांबड्या मातीच्या,काळ्या मातीच्या चुली,उभट -गोल करंड्या ,बिश्या(पैसे साठवण्यासाठी मातीची वस्तू) अशी कितीतरी आकाराची वेगवेगळी मातीची भांडी त्यांनी आणलेली असत.मडक्यांची काळी सोनेरी झाग सगळ्या हाताला लागायची.मला उत्सुकता असायची ती बोळकी,बिशी आणि छोट्या पाणी भरायच्या कळशीची.

मडकी मांडून झाली की मग शेजारीच ते तीन दगडांची चूल मांडत.चिपाड,चगाळ घालून चूल पेटवत.गाडीला केलेल्या खोळीतून जर्मनची पातेली, ताटल्या,बाजूला काढून घेत ;मग चुलीवर चहा ठेवत.चहा  पिऊन त्याच चुलीवर एका पातेल्यात भात शिजत घालत आणि आसपासच्या चार घरातून कालवण मागून आणत. भातात ते कालवण कालवून खात आणि शेजारच्याच गोठ्यात झोप न विश्रांती घेत.

गाडी आलेली माहिती झाली की बायका खण (५मडक्यांचा समूह)ठरवायला यायच्या.खणाव्यतिरिक्तही बरेच काही घ्यायच्या.बेटकं घालायला उभट बरणी,बी बेवळा राखेत घालायला मोठं गाडगं, चूल जुनी झाली असेल तर चूल. गरजेनुसार वस्तूंची बेरीज व्हायची मग सौदा व्हायचा.हा सौदा पैशावर नसायचा तर ज्वारीवर असायचा,अडशिरी पासून पायली,दीड पायली,दोन पायली.वस्तूच्या संख्या व आकारावर हा सौदा असे.

हे लोक कधीच पैसे घेऊन खण किंवा इतर वस्तू विकत नसत.चुकूनच ज्यांच्याकडे ज्वारी मिळणार नाही अशांकडून पैसे स्वीकारत.जसजशी संक्रात जवळ येई तसतशी बायकांची खरेदीला लगबग सुरू व्हायची.

आठ दिवसांवर संक्रांत आली म्हणजे कासारीण बांगड्या विकायला गल्लोगल्ली फिरायची.संक्रातीला नवीन बांगड्या मिळायच्याच हमखास! त्याआधी कुठल्या आवडल्यात त्या हेरून ठेवायच्या आणि मग तिला बोलावून त्या आवडीच्या बांगड्या घ्यायच्या.

ववसायला नवी काकण पायजेतच! म्हणून बायका हातभर बांगडया चढवायच्याच.अगोदरच्या नवीन असल्या तर मग दोन रेशमी का होईना पण नवीन बांगड्या संक्रातीला चढवायच्याच .

संक्रात आली की शाळेतल्या पोरी आपापल्या मैत्रिणींना संक्रात भेट द्यायच्या.गंधांची गोल बाटली,प्लास्टिक टिकल्या,रंगीत चाप ,डिस्को रबर.ही देवाणघेवाण फक्त आपल्याला कुणी भेट दिली तरच तिला द्यायची, नाही दिली तर आपली भेट मग परत मागून घ्यायची! किती मजेशीर  शाळकरी दिवस होते ते!

संक्रांत दोन दिवसांवर येऊन ठेपायची.दुकानातून चार आणे किंवा आठ अण्यांची मेंदी आणायची मग लिंबू ,काथ घालून मेंदी भिजत घालायची आणि रात्री डाव्या हाताने उजव्या आणि उजव्याने डाव्या तळहातावर गुलाच्या काडीने मेंदीचे गोल गोल ठिपके द्यायचे.सकाळी उठल्यावर त्यातली निम्मिअर्धी सुकून पडलेली असायची.उरलेल्या मेंदीवर खोबरेल तेलाचे थेंब टाकून दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून उरलेली मेंदी पण काढून टाकायची मग हात लालभडक दिसायचे.

भोगीच्या आदल्या दिवशी मग कुणाच्यात पावटा ,कुणाच्यातला हरभरा ,ऊस ,शेतातले तीळ,राळे,बोरे,गाजरे, कांदा-लसणाची पात एकमेकींना देवाणघेवाणवाण करायच्या.तिघी चौघी मिळून अंगणात गप्पा मारत पावटा ,हरभरा सोलत बसायच्या.शेतातून हरभऱ्याचे भारेच्या  भारे आणायचे आणि शेजारी पाजारी वाटायचे.आंबट गोड गोल गोल बोरे म्हणजे आमचे विक पॉईंट! बांधावरच्या बोरी सर्वांगावर बोरांचे भार वागवत झुकून जात.हिरवी -पिकली बोरे पाटीने असायची त्यातली पसा पसा बोरे आसपास सगळ्यांनाच मिळायची.शेतातल्या असल्या सगळ्या वस्तुंचीच देवाण घेवाण व्हायची.प्लास्टिक वस्तू आणि इतर गोष्टींचे वाण लुटायची पद्धत नैसर्गिक वस्तूंच्या  देवाणघेवाणीत कधी घुसली काय माहीत!

भोगी दिवशी मग पहाटे लवकर उठून सवाष्णी न्हाऊन एकमेकींच्या घरात जाऊन हळदी कुंकू लावून यायच्या आणि मग भोगीच्या कालवणाला चुलीवर फोडणी बसायची.बाजरीची भाकरी,भोगी आणि राळ्याचा भात खाऊन सुस्ती यायची.

ज्या दिवसाची वाट पहात असू तो संक्रांतीचा दिवस शेवटी यायचाच. पोळ्या करून,ठेवणीतली पातळ नेसून बायकांच्या झुंडीच्या झुंडी हातात एकावर एक मडकं घेऊन ववसायला गल्लीभर फिरायच्या .प्रत्तेकीच्या अंगणात  तुळशीपाशी जाऊन एकमेकींना ववसायच्या .तिळगुळाची देवाणघेवाण व्हायची .गुलालाने भांग भरून केस गुलाबी रंगात न्हाऊन निघायचे.

दिवसभर गल्लीत हिंडून संध्याकाळी खिशात तिळगुळाची डबी घेऊन सगळ्या बाई आणि गुरुजींची घरे पालथी घालून तिळगुळ देऊन मगच घरला यायचे.शाळेत मारणारे,ओरडणारे बाई -गुरुजी तिळगुळ द्यायला गेल्यावर मात्र गोड-मवाळ व्हायचे.

दुसऱ्या दिवशी वर्गातल्या मुलींना आणि उरल्यासुरल्या शिक्षकांना तिळगुळ देऊन राहिलेले तिळगुळ स्वाहा व्हायचे.सगळ्या वरांड्यात ,वर्गात इथंतिथं सांडलेले तिळगुळ संक्रात संपल्याची जाणीव करून देत.

संक्रांत झाली की मैदानात उतरलेली ती संक्रातीची गाडी आवराआवर करू लागायची.उरली सुरली,तडा गेलेली मडकी,जमा झालेली ज्वारीची पोती गाडीत घालून गाड्या परतीच्या प्रवासाला लागायच्या.

काळ बदलला.घरे आधुनिक झाली .चुली जाऊन गॅस आले.मडक्यांची उतरंड अडगळ होऊन हद्दपार झाली.पारंपरिक शेती संपली. चूल गेली ,राख नाही आणि मग उतरंडीतला राखेत ठेवलेला बी बेवळा पण इतिहास जमा झाला.

संक्रातीच्या गाड्या कधीपासून यायच्या बंद झाल्या काही कळलेच नाही.काकणांची दुकाने ठिकठिकाणी झाली,कासारणीकडून काकण घालून घ्यायची गरज उरली नाही.हातभर काकण भरायची पद्धत जुनी झाली आणि आपसूकच संक्रातीला नवीन बांगड्या भरायची पद्धतही जुनी झाली.

भोगीच्या वस्तूंचे बाजार भरू लागले,शेते आधुनिक झाली ,मने संकुचित झाली.शेजार पाजार आकसला. पावटा, हरभरा, ऊस ,बोरे,तीळ देवाण घेवाण बंद झाली. तीळ तर शेतात लावणेच बंद झाले !

प्लास्टिक वस्तू आणि तशीच छोटी स्टील भांडी वाण म्हणून दिली घेतली जाऊ लागली आणि संक्रातीच्या सणातला नैसर्गिक गुळाचा गोडवा जाऊन कृत्रिम साखरेच्या गोडीने प्रवेश केला.

” तिळगूळ घ्या ….गो ss ड बोला !”

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विरोध विरहित दिवस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

विरोध विरहित दिवस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

निसर्ग नियम १

विरोध विरहित दिवस

आपल्याला राग का येतो?

▪️ आपल्या मनाविरुद्ध काही घडले.

▪️ समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही.

▪️ आपल्या हातात नसलेल्या गोष्टी घडल्या.

▪️ गैरसमज झाले.

▪️ चुकीच्या गोष्टी घडल्या.

या सारखी बरीच कारणे असतात.

अशा वेळी आपल्याला राग येतो. मग त्या वरची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते.ती कशी असते?

राग, चिड, संताप, विरोध, नैराश्य याचे परिणाम काय होतात हे आपण अनुभवतो.काही वेळेस बदला घेण्याची भावना तीव्र होते.त्यात आपलीच मानसिकता बिघडते.

आपले हास्य मावळते.

विचार शक्ती कमी होते.कधी कधी नात्यात दुरावा निर्माण होतो.

आपली प्रचंड ऊर्जा खर्च होते.आपले अंतस्त्राव बदलतात.कधी कधी खरे कारण समोर आल्यावर आपला राग व्यर्थ होता हे लक्षात येते.पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.

हे सगळे थांबवणे आपल्याच हातात असते.आपण या गोष्टी निसर्गातून शिकू शकतो.राग,चिड,नैराश्य यावर दीर्घ श्वसन,पाणी पिणे,अंक मोजणे हे उपाय आहेतच.पण असे उपाय करण्याची वेळ येऊच नये म्हणून काही गोष्टी करु शकतो.काही निसर्ग नियम आचरणात आणू शकतो.

निसर्ग कधीही बदला घेत नाही. म्हणून तो नुकसान झाले तरी सर्व शक्तिनीशी पुन्हा बहरतो,फुलतो व आनंद देतो.

आपण पण आठवड्यातून एक दिवस  असा ठरवून घेऊ.तो म्हणजे विरोध विरहित दिवस या दिवशी काही छोट्या छोट्या कृती करु या.

या दिवशी पुढील वाक्ये मनाशी ठरवून घ्यायची व त्या प्रमाणे वागायचे.

१) मी विश्वाला व आजूबाजूच्या लोकांना स्वातंत्र्य प्रदान करते/करतो.

प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते.त्यांची मते पण त्यांच्या दृष्टीने योग्य असतात.थोडक्यात म्हणजे त्या दिवशी इतरांना न रागावता त्यांची बाजू समजून घ्यायची.

२) माझे मत मी व्यक्त करेन पण सिद्ध करणार नाही.

माझे मत व्यक्त करायचे पण तेच कसे बरोबर आहे हे इतरांना समजावत बसायचे नाही.किंवा त्यांनी त्या मताशी सहमत व्हावे असा आग्रह धरायचा नाही.

३) दुसऱ्याचे मत ऐकेन पण विरोध करणार नाही.

दुसऱ्याचे मत जरी चुकीचे असेल तरी ऐकून घ्यायचे.पण ते कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा किंवा सिद्ध करण्याचा हट्ट करायचा नाही. एखादी व्यक्ती २+२=८ म्हणाली तरी फक्त ऐकायचे.

थोडक्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायचा.

४) आजचा दिवस सर्वोत्तम होता.

५) आजच्या दिवसा साठी खूप खूप आभार.

यातील वरील पाच वाक्ये घोकायची.व मनापासून अमलात आणायची.आणि तो दिवस कसा गेला, त्या दिवसात काय काय घडले,मनस्थिती कशी झाली.हे सगळे अनुभव लिहून ठेवायचे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोष्टी तेल मालीशच्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

गोष्टी तेल मालीशच्या…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सहज टि व्ही सर्फिंग करताना एका चॅनेलवर जुनी गाणी लागलेली होती. जुनी गाणी आजही ऐकायला पहायला आवडतातच. म्हणून मानसी त्या चॅनेलवर थोडी रेंगाळली.

जॉनीवॉकरचे गाणे लागले होते. •••

मालीश करले मालीश

सर जो तेरा चकराए या दिल डुबा जाए

आजा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए

मानसी हे गाणे ऐकता ऐकता विचारातच गढून गेली. खरचं मालीश किती महत्वाचे आहे नाही?

जन्म झालेल्या बाळाला किमान ६ महिने तरी तेलाने चांगले मालीश करून टाळू वरती तेल घालून ती दाबून दाबून भरली जाते. मग भरपूर गरम पाण्याने आंघोळ घातली की बाळ चांगले २-३ तास तरी झोपते. बाळाची वाढ लवकर तर होतेच पण हाडे मजबूत होतात हे त्या मागचे शास्त्र.

मग हेच बाळ थोडे मोठे झाले की आठवड्यातून एकदाच बंबात पाणी तापवून चांगली चंपी करून आजी मुलगा किंवा मुलगी दोघांनाही आपल्या हाताने न्हाऊ माखू घालायची. ती तेलाची मालीश आणि शिकेकाई रिठे वापरून धुतलेले डोेके अंग••• किती छान होते ते दिवस नाही?

असे आठवड्यातून एकदा असले तरी चातुर्मासात आजी चार महिने काकड आरतीला जायची. तेव्हा स्वत: तेल उटणे लाउन अभ्यंग स्नान करायचीच पण आम्हा मुलांना पण ४ महिने लवकर उठायची शिक्षाच म्हणाना••• पण मालीश करून अभ्यंगस्नानाची पर्वणीच असायची.

मग हीच मुले मोठी झाली की लग्न ठरले की देवब्राह्मण हळद इतर कार्यक्रमासाठीही मालीश करून आंघोळ ही संस्कृती, परंपराच आहे.

मग लग्नानंतर पहिली  दिवाळी आणि त्यानंतरच्या सगळ्याच दिवाळीत पाडव्याला नवर्‍याला, वडिलांना मुलाला मालीश करून आंघोळ घालायला खूपच महत्व आहे. नर्क चतूर्दशीला सगळ्या पुरुषांना, भाऊबिजेला भावाला मालीश करणे ही सगळी आपली मोठी परंपरा चांगली संस्कृती आहे.

लग्नानंतर मात्र मुलगी किंवा सून बाळंतीण झाली की त्यांच्याही मालीशचा शेकण्याचा आंघोळीचा मोठा प्रोग्राम आजही असतो.

मधे अधे पाय मुरगळला हात मुरगळला पाठ कंबर अवघडली किंवा असेच काही त्रास झाले तर मालीश सारखा उपायच नाही. डॉक्टर  गोळ्या औषधे देतात पण ती फक्त पेन किलर असतात वेदना कमी करून बरे झाल्याचा आभास निर्माण करतात पण थंडी पडली आभाळ भरून आले की दुखणे डोके वर काढतेच. तेव्हा मग परत कोणीतरी मालीश करून देते.

सध्या पैसा देऊन अनेक गोष्टी विकत घेतात. मग या ट्रेंडमधे काहीजणांनी आपले हात धुवून नाही घेतले तरच नवल.

काही झाले की फिजिओथेरपी, फिजिओथेरपिस्ट काय करतो? तर बिन पाण्याने हजामत••• आय मीन बिन तेलाने मालीश.

ते कमी पडते म्हणून की काय मोठमोठी यंत्रे म्हणजे मसाजर•••  त्याने केलेला मसाज. आणि एवढे पैसे देऊनही काही फायदा झाला नाही असे कसे म्हणायचे म्हणून थोडा फरक पडलाय की म्हणायचे. नेहमी हे परवडण्याजोगे नसल्याने नेहमी यायला जमणार नाही सांगायचे आणि तेथून निसटायचे.

पण आजी आजही काही झाले तरी स्वत:ला जमले नाही तरी कोणाच्या तरी मागे लागून तेल लावूनच घेते. आजोबाही तसेच•••

मग या वयात म्हणजे ९०च्या घरात गेले तरी ते स्वत:ची कामे स्वत: करू शकतात. त्यांची हाडे दात एकदम मजबूत असल्याचे ते सांगत नाहीत ••• आपणच पहातो, अनुभवतो.

पण त्यांचे म्हणणे  तुम्ही मालीश करा, तेल लावा याकडे दुर्लक्ष करतो. वेळ येईल तेव्हा पाहू असे म्हणून मालीश करूनच घेत नाही. मग ६०तच म्हातारपण•••

आपण किती सुखी समाधानी आहोत हे दाखवण्यासाठी लाखो रुपये कमावणार्‍या मुलाच्या जीवावर फिजिओथेरपिस्ट  आणि मसाजकेंद्रांच्या वाटेवर पाऊल•••

मानसीची तंद्री भंग पावली. नाही असे व्हायला नको. आपण लवकरच मालीश करायला लागले पाहिजे असे वाटले.

टिव्हीवर पुन्हा सर जो तेरा चकराए ऐकू आले. पण यावेळेस जॉनीवॉकर नव्हता तर अमिताभ बच्चन हे गाणं म्हणत होता आणि नवरत्न तेलाची जाहिरात करत होता.

मानसी मनात म्हटली तेल नवरत्न असो वा नारळाचे, तिळाचे  पण तेलाने मालीश झालीच पाहिजे. हेच आपल्या आरोग्याचे आणि हो सौंदर्याचे पण रहस्य ठरणार आहे.

जय हो आयुर्वेद !!!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

याला जीवन ऐसे नाव गुलजार ह्यांच्या रचना वाचल्यावर त्या मनात घट्ट रुतून बसतात, भावतात आणि विचारात देखील पाडतात. परवा गुलजार ह्यांच्या खूप आवडतील अशा आशयपूर्ण चार ओळी मैत्रीणीने पाठविल्यात. त्या पुढीलप्रमाणे.

“इतनी सी जिंदगी है, पर ख्वाब बहुत है ।

जुर्म का पता नही, साहब मगर इल्जाम बहुत है।।

खरचं तसं बघितलं तर ह्या मानवजन्माला आलो आणि अवघी एकच इनिंग खेळायचं परमिट मिळालं.त्या अवघ्या पूर्ण हयातीत बालपण आणि म्हातारपण हे तसे बघितले तर जरा परस्वाधीनंच. फक्त जे काही तरुणपण शिल्लक उरतं त्यात आपलं कर्तृत्व दाखवावं लागतं.

हे आपलं कर्तृत्व दाखविण्यासाठी आपण आपल्या जिवाचा आटापिटा करतो जेणेकरून जनतेच्या,लोकांच्या नजरेसमोर आपली उर्जितावस्था आली पाहिजे. सध्याचं आपलं जगं हे खूप आभासी जगं तयार झालयं.ह्या आभासी जगाचा हिस्सा काही मूठभर मंडळी सोडली तर जवळपास सगळेजणं बनतात.

ह्या आभासी जगात वावरण्यासाठी मग “माझा सुखाचा सदरा “ह्याच प्रेझेंटेशन जगासमोर केल्या जातं.कित्येक भावंड सोशल मिडीयावर भाऊबीज, राखीपोर्णिमेचे फोटो धूमधडाक्यात व्हायरल करतांना प्रत्यक्षात मात्र वयस्कर पालकांची जबाबदारी घेतांना वा मालमत्तेची वाटणी करतांना एक वेगळचं चित्र आपल्यासमोर आणतात. तसेच एकमेकांच्या आचारविचारात साधर्म्य नसलेली जोडपी “मेड फाँर इच अदर”भासवतं अँनिव्हर्सरी केक कापतांनाचे फोटो अपलोड करतात.प्रत्यक्षात ही धडपड, द्राविडीप्राणायाम, आटापिटा कशासाठी केल्या जातो हे एक न उलगडलेले कोडेच.काही वेळा आपल्याला इतरांसाठी पण जगावं लागतं म्हणां. कदाचित त्यासाठी असावं.

ह्या आपल्या छोट्याशा आयुष्याच्या तरुणपणाच्या काळात माणूस मात्र स्वप्नं खूप विणतो आणि हे स्वप्नं विणणं अगदी स्वाभाविक असतं.जणू “करलो दुनिया मुठ्ठीमे”सारखीच अवस्था जवळपास प्रत्येकाच्या जीवनात येतेच.

खरचं ही स्वप्नं विणतांना पण खूप मजा येते.काही स्वप्नं ही नशीबाने आपोआपच आपलं काही कर्तृत्व खर्च न करताच पूर्ण होतात,काही स्वप्नं ही धडपड करुन, जिवाचा आटापिटा करुन माणूस पूर्ण करतो.ह्यात त्रास,दगदग, मनस्ताप हा होतोच पण स्वप्नपूर्ती नंतरचा आनंद पण खूप सुख देऊन जातो.काही स्वप्नं ही तशी आवाक्याबाहेरची असतात, आपल्याला कळतं ही अशक्यप्राय आहेत पण तरीपण कुठेतरी असंही वाटत असतं एखादा चमत्कार घडेल आणि कदाचित आपलं हे स्वप्नं पूर्णत्वास जाईल सुध्दा.

ही स्वप्नं उराशी बाळगतं बाळगतं एकीकडे आपण आपल्या जबाबदा-या पार पाडण्याचे काम पण लिलया करीत असतोच.जो घरातील सर्वात जास्त जबाबदार व्यक्ती असतो त्याच्या माथी वाईटपणा हा अटळंच.आपल्या जबाबदा-या पार पाडतांना त्याला कित्येक जणांच्या रोषाला कारणीभूत व्हावं लागतं तर कित्येकांच्या नाराजीचं कारण म्हणजे जबाबदा-यांच ओझं वाहणारी व्यक्ती असते.

जबाबदा-या उचलतांना प्रसंगी व्यक्तींना काही वेळ कठोर भूमिका पण नाईलाजाने घ्यावी लागते.हे सगळं करीत असतांना नशीबाने चांगुलपणा पदरी पडला तर आपण नशीबवान खरे.

ह्या सगळ्या जबाबदा-या स्विकारतांना, प्रमुख भूमिका बजावीत असतांना,ब-याच वेळा घडलेल्या घटनांचे पडसाद जर सकारात्मक उमटले तर काहीच प्रश्न नसतो पण चुकून जर का काही उन्नीस बीस झाले वा पडसाद नकारात्मक उमटले तर दोष हा जबाबदार व्यक्तीच्याच माथी येतो.कित्येकदा आपला स्वतः चा गुन्हा,अपराध नसतांनाही आळ,आरोप हा अंगावर येऊन पडतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार वाचकांनो!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्य साधण्यासाठी हा लेख आहेच! पण या वर्षाच्या नूतन लेखासाठी माझे आदर्श स्वामी विवेकानंदांविषयी लिहिण्याची संधी मिळणे यापेक्षा दुसरे औचित्य कांहीच असू शकत नाही. आपण ‘स्वामी’ या नावाचा उच्चार करताक्षणी आपल्या डोळ्यासमोर भगव्या वस्त्रांकित, एकाकी जंगलात किंवा गुहेत कठोर तपश्चर्या करणारे एखादे व्यक्तिमत्व उभे राहते! जाणून बुजून स्वीकारलेल्या अशा विजनवासाचे कारण असते, या नश्वर जगातील मायेच्या मोहपाशातून मुक्ती शोधत ईश्वर प्राप्तीचे! 

पण मंडळी याला एक अपवाद स्मरतो, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्माच्या समृद्ध संकल्पनेचे महान वैश्विक दूत! ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण वसुधा किंवा विश्व हे एका कुटुंबासारखे आहे, हा मौलिक आणि अमूल्य संदेश जगाला देणारे खरे खुरे जागतिक नेते! मैत्रांनो, आजच्या पवित्र दिनी अर्थात, १२ जानेवारीला या महान वैश्विक नेत्याची जयंती आहे. १८६३ साली या तारखेला कोलकाता येथे जन्मलेल्या, ‘ईश्वराबद्दल पूर्ण अविश्वासी’ अशा अत्यंत जिज्ञासू नरेंद्रनाथ दत्त (स्वामीजींचे पूर्वीचे नाव) हे अनेक ज्ञानी लोकांना आणि संतांना प्रश्न विचारायचे, “तुम्ही ईश्वर पाहिलाय कां?” दक्षिणेश्वर मंदिरातील ‘काली माँ’ चे प्रखर, अनन्य भक्त, महान संत, स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मात्र एकमेव ‘हो’ असे उत्तर आले आणि मग गुरू आणि शिष्याचा लौकिक अणि पारलौकिक असा ऐतिहासिक समांतर प्रवास सुरू झाला. यांत नरेंद्रला देवी माँ आणि त्याच्या परम गुरूंचे शुभाशीर्वाद आणि मोक्षप्राप्ती मिळती झाली.

स्वामीजी महान भारतीय संन्यासी आणि महान तत्वज्ञानी होते. १९ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे जागतिक धर्माच्या संसदेत, विवेकानंदांचे सुप्रसिद्ध भाषण म्हणजे ‘हिंदू धर्म आणि आंतरधर्मीय संवादाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि प्रभावशाली क्षण’ होता हे स्पष्टपणे दिसून आले. जेव्हां इतर सर्व धार्मिक नेते अत्यंत औपचारिकपणे ‘सभ्य स्त्री पुरुषहो!’ म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते, तेव्हां ब्रिटिश भारताच्या या युवा आणि तेजस्वी प्रतिनिधीने उपस्थित ७००० हून अधिक प्रतिष्ठित सभाजनांना ‘माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ असे प्रेमभराने संबोधित केले. धर्म, वंश, जात अन पंथ ही सर्व बंधने झुगारून या अलौकिक बुद्धिमत्तेच्या स्वयंप्रकाशित तरुणाने मानवतेच्या समान धाग्याने सभागृहातील प्रत्येक व्यक्तीशी अनवट नातं जोडलं. त्यानंतर तीन मिनिटांहून अधिक काळ हे सर्वस्वी परके लोक त्याला टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद देते झाले यात नवल ते काय? म्हणून त्याला भाषणासाठी दिलेला अल्पावधी मोठ्या आनंदाने वाढवला गेला.या प्रथम दिव्य भाषणाचे अनोखे प्रतीक म्हणून ‘दि आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ मध्ये आजही हे ‘४७३ प्रकाशमय शब्द’ अभिमानाने प्रदर्शित केला जात आहेत. या एका भाषणाने जणू या तेजस्वी भारतपुत्राने अखिल जग पादाक्रांत केले आणि नंतर जगभरातील अनेक ठिकाणी त्याला अति सन्मानाने मार्गदर्शन वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले.

अतीव आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या पहिल्या भाषणात स्वामीजी म्हणाले होते, ‘धर्म हा भारताचा अग्रक्रम नाही, तर गरिबी आहे!’ आपल्या गरीब भारतीय बंधुबांधवांची हर तऱ्हेने उन्नती व्हावी हे त्यांचे मूलभूत लक्ष्य होते. याच सामाजिक कारणासाठी ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना करण्यात आली. हे मिशन जगातील २६५ केंद्रांद्वारे (२०२२ च्या आकडेवारीनुसार भारतात अशी १९८ केंद्रे आहेत) गरजू लोकांना सेवा पुरवते. धार्मिक प्रवचनांच्या पलीकडे जाऊन या संस्था बरेच कांही करतात. हे मिशन स्वामीजींचे स्वप्न पुढे नेण्यासाठी, तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असते. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यांच्या विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याद्वारे या उद्दिष्टांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मिशनद्वारे चालवण्यात येणारी धर्मादाय रुग्णालये, फिरते दवाखाने आणि प्रसूतीकेंद्रे भारतभर विखुरलेली आहेत. तसेच मिशनची परिचारिकांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम देखील आहेत. हे सामाजिक कार्य ग्रामीण आणि आदिवासी कल्याण कार्यासोबत समन्वय साधीत अव्याहतपणे सुरु आहे. शाळांमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, अल्पाहार आणि पुस्तके दिली जातात.

मानवतेची मूर्तिमंत प्रतिमा, निस्वार्थी सामाजिक नेते आणि हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी असलेल्या स्वामीजींनी प्रत्येक भारतीयात देव पाहिला. त्यांनी संपूर्ण देशाचा पायी प्रवास केला. जनतेशी जवळीक साधत त्यांनी भारतीयांचे प्रश्न समजावून घेतले, आत्मसात केले अन त्यांच्या या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे दिव्य प्रतिभासंपन्न गुरु परमहंस यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा संपूर्ण भारत-प्रवास केला. परमहंसांनी स्वामीजींना बहुमोल सल्ला दिला होता, “हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान करीत केवळ स्वतःची मुक्ती साधण्यापेक्षा भारतातील सकल गरीब लोकांची सेवा कर.” आपल्या गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानीत प्रकृती अस्वास्थ्य असतानाही विवेकानंदांचे हे सेवाव्रत सुरूच होते. स्वामीजी ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या जेमतेम ३९ व्या वर्षी बेलूर मठ, हावडा येथे महा-समाधीत लीन झाले. 

मैत्रांनो, स्वामीजींच्या प्रेरणादायी उद्धरणांची वारंवार आवर्तने होता असतात. त्यांपैकीच माझ्या आवडीची त्यांची काही अनमोल वचने उद्धृत करते:

*परमेश्वराची लेकरे असल्याचा आत्मविश्वास

“तू सर्वशक्तिमान आहेस. तू कांहीही आणि सर्व काही करू शकतोस”

*आत्मचिंतन

“दिवसातून किमान एकदा स्वत:शी बोला, नाहीतर तुम्ही या जगातील एका बुद्धिमान व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल”

*अडथळे आणि प्रगती

“ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या भेडसावत नाही, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात”

प्रिय वाचकांनो, आजच्या या विशेष दिनी भारताचे महान सुपुत्र, प्रभावशाली तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि संपूर्ण जगाला वंदनीय असलेले वेदांताचे विश्व प्रचारक अशा स्वामी विवेकानंदांच्या स्मृती-चरणी विनम्र प्रणाम करून त्यांचे प्रेरणादायी तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या!

धन्यवाद🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक-१२ जानेवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा नुकताच वाचनात आला. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील एका सभागृहात किशोरीताईंचे गाणे सुरु होते. कार्यक्रम नुकताच सुरु झाला होता आणि साऊंड सिस्टीम बिघडली. संयोजकांनी बरेच प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. ताई स्टेजवरून उठून गेल्या. श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली. आता काय होईल ? दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. कोणी म्हणाले ताईंचा स्वभाव विचित्र आहे. कोणी म्हणाले त्या स्वतःला फार ग्रेट समजतात. ज्याला जे वाटले ते तो बोलू लागला. शेवटी कोणी तरी बराच प्रयत्न करून साऊंड सिस्टीम सुरु केली. ताई आतमध्ये होत्या. कोणीतरी भीतभीतच त्यांना सांगितले की साऊंड सिस्टीम सुरु झाली आहे.

ताई आल्या. त्यांनी गायला सुरुवात केली. हळूहळू मैफलीत रंग भरू लागला. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक गहिरी होत गेली. ताईंचा स्वर सप्तकातून सहज विहार करू लागला. जणू आपल्या गायनातून त्यांनी अनंताचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची गानसमाधी लागली. त्यांच्याबरोबर श्रोते देखील स्वरांच्या पावसात चिंब झाले होते. ताईंच्या सुरात भक्तीभाव होता, बेहोशी होती, माधुर्य होते. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारे आणखी काहीतरी होते. अनंताची आराधना होती. सुरांच्या माध्यमातूनच त्या अनंताचा शोध घेत होत्या. त्यामागे त्यांची खडतर तपश्चर्या होती. आणि अशी खडतर साधना करणाऱ्या साधकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की ज्या क्षणी त्याचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मी आणि तू वेगळे नाहीतच. माझ्यातच तू आहेस आणि तुझ्यातच मी आहे असा साक्षात्कार साधकाला होतो. तशी ताईंची गानसमाधी लागली होती. पण आपल्यासवे त्या श्रोत्यांना देखील त्यांनी त्यात सामील करून घेतले होते.  त्यांचा ‘ स्व ‘ विश्वव्यापक झाला होता. हळूहळू त्या समेवर आल्या. श्रोते सुरसागरात डुंबत होते. पाच मिनिटांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशी ही गानसरस्वतीची गानसमाधी. मला त्यांचा हेवा वाटला. आणि माझेही मन नकळत त्यांच्या तपश्चर्येपुढे लीन झाले. मी त्यांना मनोमन प्रणाम केला. आपण जो काही जीवनमार्ग निवडला आहे त्याच्याप्रती केवढे हे उच्च प्रतीचे समर्पण ! पुन्हा त्यामध्ये स्वार्थाची भावना नाही, हाव नाही, कुठलीही अपेक्षा नाही. ताई कोणासाठी गात होत्या ? म्हटले तर सर्वांसाठी आणि म्हटले तर कोणासाठीच नाही ! त्या गात होत्या आनंदासाठी. आणि हा आनंद श्रोत्यांनाही त्यांनी भरभरून वाटला. त्या आनंदाचे झाड झाल्या. सुरांच्या कल्पवृक्षाला आनंदाची फळे लागली. वृक्ष फळभाराने झुकला. सप्तसुरांची मधुर फळे त्या वृक्षाला लागली. ज्याला हवे त्याने यावे आणि मधुर फळांची गोडी चाखावी.

गीतरामायणातले ग.दि.मांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर नकळत कानात घुमू लागले.

          सात स्वरांच्या स्वर्गामधुनी

          नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी

          यज्ञ मंडपी आल्या उतरुनी

          संगमी श्रोतेजन नाहती.

असेच नाही का ताईंच्या मैफलीबद्दल म्हणता येणार ?

आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात असेच समर्पण आपल्याला करता आले तर …! आपले जीवन ही सुद्धा एक साधना होईल, एक तपश्चर्या होईल. आपल्या कामाचे समाधान, आपल्या कामाचा आनंद आपल्याला तर मिळेलच पण दुसऱ्यांनाही हा आनंदाचा ठेवा आपल्याला वाटता येईल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रवासी भारतीय दिन” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “प्रवासी भारतीय दिन” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्याच्या युगात परदेशी प्रवास ही एक सहजासहजी शक्यप्राय गोष्ट झाली आहे.पूर्वी दळणवळणाच्या साधनांची कमतरता आणि आर्थिक दुर्बलता ह्यामुळे पंचक्रोशी ओलांडणे सुध्दा जिकीरीचे होते.हल्ली मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या उन्नतीसाठी विदेशी शिक्षणाची गरज भासू लागली.सरकारी नोक-यांमध्ये मिळणारे एल.टी.सी. आणि सेवानिवृत्ती नंतर हाती आलेल्या एकरकमी पैशामुळे विदेशात हौशीखातर फिरणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली.

9 जानेवारी,”प्रवासी भारतीय दिन”. 

ह्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या देशात परत आलेत. ह्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी 2003 सालापासून हा दिवस “प्रवासी भारतीय दिन”म्हणून साजरा करायला सुरवात केली.पहिला प्रवासी दिन भारताची राजधानी दिल्ली ला साजरा केल्या गेला.

आपली जिवाभावाची, जवळची व्यक्ती तिच्या उन्नतीसाठी परदेशात गेली तरी ती व्यक्ती परत कायम आपल्याजवळ येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतो.आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षाकरिता आपण तिचा विरह ही सहन करतो.पण ती व्यक्ती कायमची आपल्याकडे परत येण्याचा दिवस हा आपल्यासाठी “सोनियाचा दिवस”असतो.बस ह्याच सोनियाच्या दिवसाचे औचित्य साधून साजरा करण्यासाठी मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या कडून ह्याचा श्रीगणेशा झाला.

2019 मध्ये हा सोहळा वाराणशीला तीन दिवसाच्या समारंभात साजरा झाला.मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय संबंधित व्यक्ती ह्या सोहळ्यास आवर्जून हजर होते.ह्या सोहळ्यामुळे आपले जवळपास 110 देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतात ही दूरदृष्टी मा.अटलजींची होती.देशाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी असे उपक्रम राबवून घेणे हे सच्च्या देशप्रेमीचेच लक्षण होय.

प्रवासावरून वीणा वर्ल्ड वाल्या वीणाताई आठवल्या. परवाच त्यांचा सिंप्लीफाय ॲप्लीफाय हा खुप छान लेख वाचनात आला. आइनस्टाइन कायम एकाच रंगाचा आणि त्याच प्रकारचा ड्रेस परिधान करायचे. दुसऱ्या वेशात त्यांना कधी कुणी बघितले नाही असं म्हणतात. त्याचं म्हणणं हया अशा गोष्टींवर आपला वेळ, पैसा आणि मेंदूला होणारा शिण हे टाळून आपण आपला फायदा, प्रगती करू शकतो. अर्थात अगदीं साधी राहणी, साधं जीवन जगणं, संग्रह न करणं ह्या गोष्टी आचरणात आणण्यास खूपच कठीण पण कायम लक्षात ठेवल्या तर कधीतरी अमलात आणण्याची पण शक्यता वाढते.

तर अशा ह्या प्रवासी जागतिक दिनाच्या आपल्या भारतवासियांना शुभेच्छा,.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रभातफेरी” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “प्रभातफेरी” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नुकतीच नववर्षाची सुरवात झाली. नवीन वर्ष तसं काळजीत,संकटाच्या भितीखाली, निराशेचं, गेलं.नवीन वर्ष आले तसे सगळेजणं मनावरील मळभं झटकून नवी आव्हाने स्विकारायला सज्ज झालेत. नवीन योजलेल्या संकल्पांना सुरवात केल्या गेली. मोठ्या हुरुपाने योजलेले संकल्प निदान काही दिवस तरी सुरळीत बिनबोभाट पार पडावेत ही मनोमन ईच्छा बाळगून त्या नुसार आपल्या ईच्छित कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक जण आखायला लागले.

माझा ह्या वर्षीचा संकल्प म्हणजे पहाटेची भटकंती .प्रभातफेरी मारायचा अगदी ठाम निश्चय झाला होता.पहाटे फिरण्याचे फायदे डाँक्टरांनी तसेच नियमीत फिरायला जाणा-यांनी वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगितले होते.त्यामुळे रात्रीच व्यवस्थित दोनदोनदा गजर लावलेला तपासून घेतला.पुलंनी रोजनिशीत लिहील्या प्रमाणे झोपेतच गजर बंद करुन परत झोपणे,उशिरा जागे झाल्यावर लौकर जाग आली नाही ह्या सबबीखाली परत झोपणे असे काहीही करायचे नाही,असे मनाला वारंवार झोपतांना बजावले.रात्रीच फिरायला जायचे शूज,स्वेटर,शाल स्कार्फ  काढून ठेवले .

गजर गजरात वाजला आणि आजपासून रात्र खूपच लहान झाली की काय असा प्रश्न पडला.झोप नीट मनासारखी न झाल्याचं फील आलं.तरीही मनाचा हिय्या करुन उठले.भराभर आपलं आवरून फिरायला जायला बाहेर पडले.

नियमीत फिरायला येणा-या बायका तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या नजरेने बघताहेत असं उगाचच वाटून गेलं.फिरायला येणाऱ्या मंडळींची बरीच गर्दी रस्त्याने होती.तेव्हा नियमित फिरायला येणाऱ्या काकूंनी ,ही गर्दी पंधरा जानेवारी नंतर आपोआप कमी होईल ही दाव्याने खात्री दिली.ज्या रस्त्याने फिरायला जायचे त्या रस्त्याने रागात,लाडात येणारी कुत्री नाहीत नं ह्याची आधीच खातरजमा करुन घेतली होती.

पहाटेपहाटे मस्त फिरतांना फुललेली फुले,हवेने डोलणारी झाडे,निवांत रवंथ करणारे प्राणी, मंजुळ कलरव करणारे पक्षी बघत बघत सैर करण्यात खूप जम्मत असते हे फक्त ऐकून होते. ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी ख-या नसतात ह्याची परत एकदा खात्री पटली.माणसांइतकीच कुत्र्यांनाही माणसांच्या संगतीत प्रभातफेरीची गरज असते हे नव्यानेच उमगले.

फिरुन आल्यावर खूप उत्साह वाटतो हे त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे ठोकून सांगितलेला ऐकीव दाव्याचा अनुभव तसा आला नाही हे पण नक्की. मग हळूहळू सवय झाल्यानंतर ते फील येत हे नव्याने कळलं.

फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या हिरव्या रंगाची द्रव्ये बाटल्यांमध्ये भरलेली दिसली.उगीचच कडक चहाची आठवण आली आणि त्या रसांकडे बघून ढवळायला लागलं.

अशात-हेने वेगळे अनुभव घेत का होईना प्रभातफेरी सुरू तर केली.काही कालांतराने आवडायला लागेल ह्या अनुभवी महिलांच्या सांगण्यावर विश्वास असल्याने सध्यातरी साखरझोप आठवत आठवतं प्रभातफेरी सुरू ठेवलीय. पण जोक अपार्ट साखरझोेतप कितीही चांगली वाटतं असली तरी पहाटे फिरणं हेच तंदुरुस्त तब्येतीसाठी अत्यावश्यक बिनखर्चिक औषधं आहे हेच खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print