मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद :

आ व॒ इंद्रं॒ क्रिविं॑ यथा वाज॒यन्तः॑ श॒तक्र॑तुम् । मंहि॑ष्ठं सिञ्च॒ इन्दु॑भिः ॥ १ ॥

 देवेंद्राचे सामर्थ्य असे शतधेने चंड

सकलांना अति प्रीय जीवाला शचीवल्लभ इंद्र

ऋत्विजांनो हरवून जाता इंद्रस्तुती करिता

बावेसम त्या तुडुंब भरुनी सोमरसा पाजू त्या ||१||

श॒तं वा॒ यः शुची॑नां स॒हस्रं॑ वा॒ समा॑शिराम् । एदु॑ नि॒म्नं न री॑यते ॥ २ ॥

क्षीरासह ते सहस्र वा शत शुद्ध सोम चमस

स्वीकारून घेई प्रेमाने प्रियबहु इंद्रास

 सरितेच्या पाण्याला जैशी ओढ उताराची

शचीपतीला मनापासुनी  आवड सोमरसाची ||२||

सं यन्मदा॑य शु॒ष्मिण॑ ए॒ना ह्यस्यो॒दरे॑ । स॒मु॒द्रो न व्यचो॑ द॒धे ॥ ३ ॥

चंडप्रतापी इंद्राला मोद सोमरसाने

प्रसन्न होई देवराज अति त्याच्या प्राशनाने

तुडुंब भरते त्याचे उदर सोमसेवनाने

प्रसन्न होई आम्हावरती इंद्र सोमरसाने ||३||

अ॒यमु॑ ते॒ सम॑तसि क॒पोत॑ इव गर्भ॒धिम् । वच॒स्तच्चि॑न्न ओहसे ॥ ४ ॥

खग कपोत वेगाने जाई अपुल्या पिल्लांकडे

तसाच येई प्रेमाने सोमाच्या चमसाकडे

तुमच्यासाठी सिद्ध केला सोम भक्तिभावाने

तयासवे स्वीकारावे अमुचे स्तवन प्रेमाने ||४||

स्तो॒त्रं रा॑धानां पते॒ गिर्वा॑हो वीर॒ यस्य॑ ते । विभू॑तिरस्तु सू॒नृता॑ ॥ ५ ॥

अभिष्टस्वामी हे देवेंद्रा स्तुतीप्रीय असशी

आळविता स्तोत्रांना झणी तू धावूनिया येशी

पराक्रमी वीरा  तव स्तोत्रांना आम्ही गातो

अखंड वैभव प्रसन्न होवुनी आम्हाला तू देतो ||५||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

 https://youtu.be/xG5GMiMGTks

Attachments area

Preview YouTube video Rugved Mndal 1 Sukta 30 Rucha 1 to 5

Rugved Mndal 1 Sukta 30 Rucha 1 to 5

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आज २७ जुलै – आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.  

… “यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश कधीही माझ्या आड येणार नाही” – असा आत्मविश्वास बाळगणारे आणि तो खरा करून दाखवणारे कलामसर, म्हणजे ही मोलाची शिकवण जणू संपूर्ण देशालाच देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तत्कालीन मद्रास इलाख्यातील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन होते, जे  एक नावाडी असून इमाम म्हणून देखील ते काम बघत. त्यांच्या आईचे नाव आशीअम्मा होते. त्या एक गृहिणी होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होते. सर्व भावंडांमध्ये कलाम हे शेंडेफळ होते.

कलामांचे पूर्वज श्रीमंत व्यापारी होते, पण कालौघात त्या कुटुंबावर कठीण परिस्थिती आली होती. अब्दुल कलाम लहानपणी वृत्तपत्रे विकून कुटुंबाच्या माफक उत्पन्नात भर घालायचे हे आवर्जून सांगण्यासारखे आहे. 

कलाम यांनी रामनाथपुरम् येथे शालेय शिक्षण घेतले आणि सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५५ मध्ये ते एरोस्पेस अभियांत्रिकी करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पात्रता फेरीत अगदी काही गुणांनी भंग पावले. ते नवव्या क्रमांकावर होते. पण आय.ए.एफ. कडे फक्त आठ जागाच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम केले. 

१९६९ मध्ये कलाम यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो मध्ये करण्यात आली. इस्रोमध्ये ते एस.एल.व्ही. या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक होते. एस एल व्ही प्रक्षेपकाने १९८० मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला. एस एल व्ही हा भारताचा पहिला प्रक्षेपक होता. कलाम यांनी ध्रुवीय प्रक्षेपण वाहन (PSLV) विकसित करण्यासाठीही काम केले. एसएलव्ही तंत्रज्ञानातून बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठीच्या प्रोजेक्ट व्हॅलीअंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल या दोन प्रकल्पांचे ते संचालक देखील होते. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना प्रगत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे संचालकपद मिळाले. आर्. वेंकटरमन संरक्षण मंत्री असताना कलाम यांची क्षेपणास्त्रांचा ताफा विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘ बेलास्टिक ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, तेव्हापासूनच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ  लागले होते.

१९९२ ते १९९९ पर्यंत कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव होते. पोखरण-२ चाचण्यांदरम्यान कलाम हे मुख्य प्रकल्प समन्वयक होते. याच काळात कलाम भारतातील  आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.

२००२ मध्ये अब्दुल कलाम यांची भारताची ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारताचे राष्ट्रपती बनणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. २००७ पर्यंतचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला. लोकांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये ते फार लोकप्रिय ठरले, इतके की त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या. त्यांची भाषणे, त्यात असणाऱ्या प्रेरणादायी विचारांमुळे लोकप्रिय ठरली. राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून लोकांचा दबाव  असतांनाही त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतीपदानंतर कलाम आय.आय.एम.- अहमदाबाद, आय.आय.एम.-शिलॉंग, आय.आय.एम.- इंदूर,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अण्णा विद्यापीठ, आदींमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर बनले.

२७ जुलै २०१५ रोजी आय.आय.एम.- शिलॉंग येथे व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी, रामेश्वरम् येथे पूर्ण शासकीय इतमामाने आणि अतिशय सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम हे त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही पुस्तके व लॅपटॉप व्यतिरिक्त कोणतीही वैयक्तिक संपत्ती मागे सोडली नाही. ते विविध धर्माच्या शिकवणुकींचे जाणकार होते, आणि आंतरधर्मीय संवादाचे प्रतीक होते हे आवर्जून नमूद करायलाच हवे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात:

  • India-2020:A vision for the new  Millennium
  • Wings of fire
  • Ignited minds- Unleashing the power within India
  • A manifesto for change: A sequel to India 2020
  • Transcendence: My spiritual experiences with Pramukh swamiji

  — आदि पुस्तकांचा समावेश होतो.

तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये :

  • पद्मभूषण -१९८१
  • पद्मविभुषण – १९९०
  • भारतरत्न – १९९७
  • वीर सावरकर पुरस्कार – १९९८
  • रॉयल सोसायटी, इंग्लंड यांचेकडून दिला जाणारा किंग चार्ल्सII पदक – २००७
  • इडिनबर्ग युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेकडून डॉक्टर ऑफ सायन्स – २०१४

  —– आदि पुरस्कारांचा समावेश होतो.

आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अतिशय आदरपूर्वक प्रणाम. 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

एवढा धो धो पाऊस पडतोय. अशा वेळेस दोनच गोष्टींची निवड करणे शक्य असते – एक म्हणजे पुस्तक-वाचन आणि दुसरी म्हणजे अपेयपान !    

अशा पावसात अस्सल दर्दी माणसाला व्हिस्की, बीअर, व्होडका, वाईन यातील कुठलेच पेय लागत नाही. या अस्सल दर्दी माणसाची पसंती असते एकाच पेयाला – ते म्हणजे – रम ! हा परिचित ब्रँड तुमच्या जमान्यातला असेल, पण ही ‘रम’ ब्रिटिश जमान्यात मुंबईत बनत होती, हे तुम्हाला माहीत नसेल.  आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. 

१८५३ साली पहिली आगगाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवरून निघाली. तेव्हा पुढचं स्टेशन होतं – भायखळा. दादर नव्हतं, कुर्ला नव्हतं, मुलुंड नव्हतं, पण एक स्टेशन होतं, ते म्हणजे भांडुप ! आश्चर्याचा धक्का बसेल, पण बाकी कुठलंही स्टेशन नव्हतं. 

आता भांडुप स्टेशन असण्याचं कारण काय?  कारण फार गंमतीदार आहे. भांडुपला गाडी थांबली, तर बरेचसे गोरे भांडुपला उतरले आणि तिथे गावात जाऊन चार-पाच पेग रम मारली आणि परत गाडीत येऊन बसले.  तेव्हा भांडुपची लोकसंख्या असून असून किती असणार? तर तीनशे, चारशे… कारण १८८१ साली जेव्हा जनगणना झाली, तेव्हा भांडुपची लोकसंख्या होती – जेमतेम पाचशे चव्वेचाळीस ! आता एवढ्या छोट्या गावात तेव्हा रम कशी बनवली जायची? …. 

त्याचं झालं असं – मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली, तेव्हा त्यांनी ल्यूक ॲशबर्नर नावाच्या माणसाला भांडुप हे गाव नाममात्र भाड्याने दिले. हा ल्यूक ॲशबर्नर ‘ बॉम्बे कुरियर ‘ नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्याला सांगितलं गेलं की, ‘ तू वर्तमानपत्र पण सांभाळायचं आणि इथे रम पण बनवायची.’ तो काय करणार बिचारा? तो अग्रलेख लिहिणार की रम बनवणार? मग त्याने एक युक्ती केली. त्याचा कावसजी नावाचा मॅनेजर होता. त्यानं त्याच्या हाती कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की, ‘ रम बनवणे तुझं काम आहे.’                                                        

तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या काळी साडेचार लाख लिटर रम बनवली जायची आणि आख्ख्या भारतभर ब्रिटिश सैनिकांना पुरवली जायची. त्याच्यानंतर गंमत काय झाली की, मॉरिशसला स्वस्त रम तयार व्हायला लागली आणि मग भांडुपचा ‘रम’चा धंदा बंद करावा  लागला .  ‘बॉम्बे गॅझेटियर’च्या चव्वेचाळीसाव्या पानावर ल्यूक ॲशबर्नरच्या नावासकट ही माहिती उपलब्ध आहे.  

आता ही सगळी माहिती आम्हाला कुठून मिळाली? तर आमचे एक मित्र आहेत – श्री. माधव शिरवळकर. त्यांनी ” मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…” या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात अशा अनेक गंमतीजमती आम्हाला वाचायला मिळाल्या. तेव्हा आज आपल्याला माधव शिरवळकरांचेही आभार मानलेच पाहिजेत. त्यांचे हे पुस्तक आपण जरूर वाचा.

तोवर ….. “ चीअर्स ! “   

लेखक : अज्ञात. 

(https://www.instagram.com/p/Cuej5u-NBh-/) – या सूत्रधाग्यावरून (link) साभार.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर  घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर  घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे. 

    एको ब्रह्म द्वितीयो नास्ति 

◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन     आहेत. 

◆ 3:00 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत. 

     सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण. 

◆ 4:00 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार आहेत. 

    ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। 

◆ 5:00 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत. 

     अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान. 

◆ 6:00 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत. 

     मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय. 

◆ 7:00 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत. 

     कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ. 

◆ 8:00 वाजण्याच्या स्थानावर अष्ट सिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि आठ प्रकारच्या आहेत. 

     अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व. 

◆ 9:00 वाजण्याच्या स्थानावर नव द्रव्यणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की 9 प्रकारच्या निधी आहेत. 

     पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व. 

◆ 10:00 वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा 10 आहेत. 

     पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण, आग्नेय , वायव्य, नैऋत्य, इशान्य, उर्ध्व आणि अध 

◆ 11:00 वाजण्याच्या स्थानावर रुद्रा: लिहिले आहे, तात्पर्य हे की रुद्र 11 आहेत.

     कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव. 

◆ 12:00 वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य 12 आहेत. 

     अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्याकडे देव माझा पाहतो आहे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. 

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”  “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस.  तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली. एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. 

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर  आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे… 

“बस् मी जिथं असेंन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. 

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्या बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे.  पण त्या दिवशी तसे काहीं न बोलता काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो,

“भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. 

घरी पोचलो. 

रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली,” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला.  माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले,”आज तुला झोप येण्यासाठी, संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.”  

खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की,  ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर रखमाबाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

डॉक्टर रखमाबाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे .दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई जोशी भारतात परतल्यावर  आजारी पडल्या व मृत्यू पावल्या .भारतातील पहिली व्यावसायिक स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाईंची इतिहासात नोंद आहे.

रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. रखमाबाईंच्या जन्मानंतर अल्पावधीतच  त्यांचे वडील जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला . रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी हे बांधकाम कंत्राटदार होते.  आधुनिक विचारांचे असल्यामुळे, समाजविरोधात जाऊन त्यांनी रखमाबाईंच्या आईचा म्हणजे जयंतीबाईंचा पुनर्विवाह केला. सापत्य विधवेचा विधुरासोबत पुनर्विवाह हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता. जयंतीबाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम अर्जुन हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते.  बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते.   त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या रखमाबाईंनी डॉक्टर सखाराम अर्जुन या आपल्या दुसऱ्या पित्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

जयंतीबाईंच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी दादाजी नावाच्या एका नात्यातील मुलाशी करून दिला. विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहून शिकत होत्या. त्यांचे विचार प्रगल्भ होत होते.

दादाजींनी सन १८८४ मध्ये, रखमाबाई या लग्न होऊनही नांदायला येत नाहीत यासाठी बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर कायदेशीर फिर्याद दाखल केली होती. सुशिक्षित, सुसंस्कृत, तडफदार रखमाबाईंनी न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर स्पष्ट निवेदन केले .त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे. अशिक्षीत ,सतत आजारी असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला, मामावर अवलंबून असलेला असा हा पती माझे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीक वाटत नाही. नवरा म्हणून त्याला स्वीकारणे मला मान्य नाही.’

सर्व बाजूंनी सारासार विचार करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी रखमाबाईंच्या बाजूने निर्णय दिला. ‘बालवयात लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल असे मला वाटते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

या निकालामुळे रखमाबाई आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली. हा निकाल आमच्या हिंदू धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. समाजजीवनास घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना स्त्रियांची संमती आवश्यक नाही. अशी जहरी टीका स्वतःला समाज सुधारक म्हणविणाऱ्या अनेकांनी केली. खटल्याचा निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागल्याने  अस्वस्थ झालेल्या दादाजींनी या निकालाच्या फेर सुनावणीसाठी अपील केले. त्यांना धर्ममार्तंडांची साथ होती. शिवाय दादाजींना रखमाबाईंच्या नावे असलेल्या पंचवीस हजार रुपयांचा लोभ होता.

रखमाबाईंना साथ देण्यासाठी पंडिता रमाबाई  व इतर अनेक विचारवंत, समाजसुधारक यांच्या पुढाकाराने ‘हिंदू लेडी संरक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘हिंदू लेडी’ या नावाने  पत्रे लिहून  हिंदू धर्मातील अमानुष चालीरीतींवर घणाघात केला. बालविवाह, सतीची पद्धत, स्त्रियांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यावर लेख लिहिले. पती मेल्यानंतर स्त्रीने सती जावे असे म्हणणारा समाज, पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवत  नाही? असे त्यांनी लिहिले. हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला .मृत्यू पावलेल्या पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना वेगळा न्याय असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कोणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. हा शंभर वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व लक्षात येते.

इंग्रजांना येथील धर्म, कायदे यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी, व्यापारीवृत्तीचे होते. त्यांनी राजकीय स्वार्थ साधला. अपिलीय खटल्यात  न्यायमूर्ती फॅरन यांनी,  ‘रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत पतीच्या घरी नांदायला जावे नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी’ असा रखमाबाईंच्या विरोधात निकाल दिला. रखमाबाईंनी या अन्यायकारक निकालाला निक्षून नकार दिला आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखविली.

दादाजी व त्यांचे मामा यांच्या उलट तपासणीत, दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे कोर्टाच्या लक्षात आले. तेव्हा दादाजींनी रखमाबाईंना तडजोड करण्याची विनंती केली. दादाजींनी रखमाबाईंवरचा हक्क सोडावा आणि रखमाबाईंनी दादाजींना दोन हजार रुपये द्यावेत  अशी तडजोड झाली. तसेही दादाजींना रखमाबाईंच्या संपत्तीमध्येच स्वारस्य होते. तडजोडीनंतर दादाजींनी लगेच दुसरे लग्न केले. हा खटला १८८७ मध्ये संपुष्टात आला.

नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरील खटल्याच्या वेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन  पिची यांनी रखमाबाईंना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ १८८३ मध्ये मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या त्या सहकारी होत्या. त्यांचे पती फिप्सन स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते .या पती-पत्नींच्या प्रयत्नामुळे डफरीन फंडातून रखमाबाईंना आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाईंना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी मॅक्लेरन दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई १८८९ मध्ये वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या.१८९४ मध्ये प्रसूती शास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत ऑनर्स पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतल्या.

काही दिवस कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केल्यावर त्या सुरत इथे गेल्या. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती सुधारण्यासाठी, बाळंतपणात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रखमाबाईंनी खूप प्रयत्न केले .स्त्री शिक्षणासाठी ‘वनिता आश्रम’ ची स्थापना केली. १९१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. आजन्म अविवाहित राहिल्या. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली.

रखमाबाईंच्या सुरत सेवेबद्दल शासनाने ‘कैसर ए हिंद ‘अशी पदवी त्यांना दिली. रेड क्रॉस सोसायटीने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या.२५ डिसेंबर १९५५ रोजी त्या देवत्वात विलीन झाल्या.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस म्हणून स्वतःचे अधिकार मिळविण्यासाठी  कसा संघर्ष करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज २१ व्या शतकातही स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेत. समाज रुढी म्हणून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याकडे अजूनही बालविवाह होतातच. शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या  त्या कठीण काळात, नको असलेल्या बालविवाहाचे संकट रखमाबाईंनी निग्रहाने परतवून लावले .रखमाबाईंचा एकाकी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. त्यांना विनम्र प्रणाम.👏 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…” ☆ श्री संभाजी बबन गायके 

जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…

…अर्थात एका भारतीय जवानाचा पराक्रम ! 

सोळा जूनच्या दुपारच्या तीनचा सुमार. पंजाबातील भाक्रा-नांगल CANALच्या पाटातून अतिशय वेगाने पाणी वाहात होते. या पाटाच्या दोन्ही बाजुंनी लोकांची, वाहनांची ये जा सुरू होती. 

पतियाला येथील सैन्य रुग्णालयाची एक मोटार आवश्यक अन्नधान्य घेउन शहरातून रुग्णालयाकडे येत होती. या मोटारीत नवनीत कृष्णा नावाचे सैनिकी जवान मागील आसनावर बसलेले होते.

नवनीत यांना या पाटाच्या कडेला शेकडो लोकांचा जमाव उभा राहून आरडाओरडा करताना दिसला. नवनीत यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि ते खाली उतरले. 

एक तरुणी पाण्यात वाहून चाललेली आहे हे वाक्य कानावर पडताच नवनीत यांच्यातील भारतीय सैनिक कर्तव्यासाठी पुढे सरसावला. कारण बघ्यांच्या गर्दीतून कुणीही पुढे होत नव्हते, काहीजण मोबाईल चित्रीकरण करण्यात दंग होते. पाण्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी आकांत करीत होती.

नवनीत यांनी पाटाच्या कडेने वेगाने धावायला सुरुवात केली. पाण्याचा वेग त्या तरूणीला पुढे पुढे घेउन जात होता. नवनीत यांनी वेगाने धावत सुमारे शंभर मीटर्स अंतर कापले आणि अंगावरील पूर्ण गणवेशासह त्या पाण्यात सूर मारला.

पाण्यात बुडत असलेली व्यक्ती वाचवायाला आलेल्याला माणसाला जीवाच्या भीतीने मिठी मारण्याची शक्यता अधिक असते. या प्रयत्नात बुडणारा आणि वाचवणारा असे दोघेही बुडण्याची दाट शक्यता असते.

नवनीत यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून तिचे केस पकडले… तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून, एका हाताने पाणी कापत कापत पाटाचा जवळचा किनारा गाठला. 

बघ्यांची गर्दी आता मात्र मदत करण्याच्या भानावर आली होती. कुणी तरी एक मोठा दोरखंड पाण्यात फेकला. त्यामुळे नवनीत यांचे काम काहीसे सोपे झाले. काठावर पोहोचताच लोकांनी त्या तरूणीला वर ओढून घेतले…नवनीत मागाहून वर आले. 

नाकातोंडात पाणी गेल्याने त्या तरूणीचा जीव धोक्यात होता. जवान नवनीत यांनी त्यांना भारतीय सैन्य सेवेत मिळालेले प्रशिक्षण उपयोगात आणले. त्या तरूणीला सीपीआर Cardio Pulmonary Resucitation दिला. त्यामुळे तिच्या जीवावरचे संकट टाळले. 

नवनीत थोडेसे सावरले, कपडे चिंब भिजलेले. त्यांनी त्या तरुणीचे नावही विचारले नाही, त्याची काही गरजही नव्हती. The mission was over and successful!

काम झाल्यावर सैनिक पुन्हा बराकीकडे निघतात …जणू काही झालेच नाही अशा सहज आविर्भावात नवनीत आपल्या वाहनात बसून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी फिल्ड हॉस्पिटल मध्ये परतले. 

ऐनवेळी एका सैनिकाने स्वतःच्या हिंमतीवर हाती घेतलेल्या Rescue Operation च्या अगदी शेवटच्या काही क्षणांचे कुणीतरी चित्रीकरण करण्यात यश मिळवले होते. हे चित्रीकरण अल्पावधीत viral झाले. तेंव्हा कुठे नवनीत यांचा पराक्रम सर्वांना माहीत झाला. 

अर्थात भारतात सर्वांनाच अशा गोष्टी समजतात, असे नाही. यथावकाश भारतीय सैन्यास ही माहिती मिळाली आणि सैन्याच्या महान परंपरेनुसार भारताच्या लष्कर प्रमुख साहेबांनी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल पांडे साहेबांनी या शूर शिपायास आपल्या कार्यालयात सन्मानपूर्वक बोलावून घेतले. गौरव चिन्ह देऊन त्याचा यथोचित गौरव केला. 

नवनीत कृष्णा यांचे शौर्य, नि;स्वार्थ सेवा हे गुण कदर करण्यासारखेच आहेत. सेनेच्या सर्व विभागाच्या सर्व सैनिकांना आणि कर्मचाऱ्यांनाही आवश्यक ते सैनिकी प्रशिक्षण दिले जातेच. 

सैनिक फक्त सीमेवरच नव्हे तर देशात जिथे जिथे गरज पडेल तिथे पराक्रम गाजवण्यास, प्रसंगी प्राणांची बाजीही लावण्यास सज्ज  असतात…. संधी मिळताच सैनिक आपले कर्तव्य बजावून अलगद बाजूला होतात…. A soldier is never off-duty  असे म्हणतात ते खरेच आहे. 

नवनीत कृष्णा यांच्या पालकांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नवनीत यांना शिकवले आणि सैन्यात प्रवेश करण्याच्या योग्यतेचे बनवले. नवनीत याबद्दल आपल्या पालकांविषयी अत्यंत कृतज्ञ आहेत.

नवनीत हे अत्यंत चपळ, धाडसी, काटक, आज्ञाधारक सैनिक असून अत्यंत उत्तम वाहनचालकही आहेत असे त्यांचे अधिकारी मोठ्या कौतुकाने सांगतात.  

नवनीत हे मूळचे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. आपणा सर्वांना अशा या धाडसी जवानाचे कौतुक आहेच व रहायलाही हवे. 

🇮🇳 जयहिंद. जय भारत. 🇮🇳

जय हिंद की सेना.

(माहिती आणि छायाचित्र इंटरनेटच्या सौजन्याने ! पाकिस्तानला शरण आणणाऱ्या भारतीय सैन्याचे छायाचित्र या सत्कार प्रसंगी घेतलेल्या छायाचित्रात मागे दिसते आहे. असे पराक्रम करणाऱ्या सैन्याचा सामान्य सैनिक हा भक्कम कणा असतात. त्यांचे यथोचित कौतुक व्हावे !) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #177 ☆ एक बुंदेली पूर्णिका – “जोन खों समझो हमने अपनों…” ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है आपकी एक बुंदेली पूर्णिका – “जोन खों समझो हमने अपनों…. आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 177 ☆

 ☆ एक बुंदेली पूर्णिका – “जोन खों समझो हमने अपनों…☆ श्री संतोष नेमा ☆

तुमने   झूठी       दई    दुहाई

लुटिआ  प्रेम की  खूब  डुबाई

तुम   कांटों की  बात करो मत

चोट   फूल    की  हमने  खाई 

धोखा   बहुतई  खा  लये हमने

देब   तुमहि   ने   कोई    बुराई

जोन  खों समझो  हमने अपनों

हो    गई    देखो   वोई    पराई

खूब   करो   विस्वास  सबई  पै

दुनियादारी   समझ    ने    पाई

झूठ-कपट   को   ओढ़   लबादा

तुमने     ऐसी     नीत     निभाई

भोलो  सो   “संतोष”   तुम्हे   जा

बात   समझ   में   देर   सें   आई

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त) – ऋचा ५ ते ७ 

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणतिसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी इंद्र देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पाच ते सात या  ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद :

समि॑न्द्र गर्द॒भं मृ॑ण नु॒वन्तं॑ पा॒पया॑मु॒या ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ५ ॥

कुत्सित बोलत अमुच्याविषयी अभद्र जे भाषा  

अशा रासभा निर्दालुनिया जागृत ठेवी आशा 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||५||

पताति कुण्डृणाच्या दूरं वातः वनात् अधि ।

आ तु नः इंद्र शंसय गोषु अश्वेषु शुभ्रिषु सहस्रेषु तुवीऽमघ ॥ ६ ॥

वावटळीसी कोसो कोसो दूर घेऊनि जाई 

काननाचिया पार नेऊनि पतन करोनी टाकी

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||६||

सर्वं॑ परिक्रो॒शं ज॑हि ज॒म्भया॑ कृकदा॒श्वम् ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ७ ॥

समस्त दुःखांचा शोकांचा करुनी परिहार

अमुचा वैरी नाश करी त्याचा करी संहार 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||७||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu. be/ZBdJ2NoTlrA

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7

Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

“वैदिक जीवन”   

गायत्री मंत्र हा ऋग्वेदाचा साक्षात आत्मा अथवा कणा असल्याने तो आत्मसाक्षात्कार, आत्मशोध, स्व अनुभूती यांना परमेश्वराहूनही अधिक प्राधान्य देतो. डोळे उघडून प्रश्न विचारण्यास बाध्य करतो. यमनियमात बांधत नाही तर विचार करण्यास मुक्त करतो. हा निव्वळ धर्म नाही तर एक संयुक्तिक जीवनपद्धती व योग्यायोग्यतेची अचूक कारणमीमांसा आहे. स्वतःला जाणण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सखोल अशा आत्मचिंतनावर ऋग्वेदाचा अधिक भर आहे. बाह्य जगताचा अभ्यास हा दुय्यम आहे. वैदिक शास्त्रांमध्ये; मग ते गणित असो वा विज्ञान, आतून बाहेर असा तत्त्वज्ञानाचाही प्रवास झाला आहे व अभ्यासाला उपासनेचे महत्त्व आले आहे. या अर्थाने ऋग्वेद हा तेजस्वी कर्मयोगी आहे. “आत्मा हा सचेतन जीवित तत्व आहे. तो शरीर धारण करतो व कालांतराने शरीर सोडून निघून जातो”, ही संकल्पना मूलतः ऋग्वेदाची आहे. ‘दशयंत्र’ या सूक्तात ‘यंत्र’ हा शब्दप्रयोग ‘इंद्रिय’ या अर्थाने केला आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये म्हणजे ‘दशयंत्र’ होय. 

ऋग्वेद हा जगातील सर्वप्राचीन ग्रंथराज इतक्या विस्तृत काळात लिहिला गेला की सुक्तांची भाषा, संस्कृतिक व धार्मिक परिस्थिती, वैदिक जीवन ते आताच्या हिंदू धर्मापर्यंतचा प्रवास यातून मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या पायऱ्या अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. अत्यंत कृतज्ञतेने प्रेरित होऊन झालेला सश्रद्ध प्रवास प्रश्न व शंकांवर येऊन थांबतो; ते अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त, ऋग्वेदाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्मीयतेने स्वीकारलं जातं. नेम भार्गव ऋषी  सुरवातीला सर्वेसर्वा असणाऱ्या इंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह करतात. ते म्हणतात, “असाक्षात्कारी अशा इंद्राची आम्ही का म्हणून स्तुती करावी? कोण हा इन्द्र, कशावरून तो सत्य आहे?” यावर सखोलपणे विचार होऊ लागला आणि आपण बघतो की वेदकालातच इंद्र ही देवता संपुष्टात आली. “हे असंच का आहे व हे सारं कुणी निर्माण केलं?”  यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकटी इंद्र ही देवता होऊ शकत नाही, हे लक्षात आलं. मग “इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ तरी का करावा, यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ आहे का नाही? ” अशीही शंका उत्पन्न होऊ लागली. ‘कण्व’ हे ऋग्वेदात गुप्त अग्नीचे प्रतीक मानले जातात. वास्तविक यज्ञयाग हा ऋग्वेदाचा गाभा..! ईशपूजा, एकत्रीकरण व दान ही समाजाभिमुख जगण्याची कला म्हणजे यज्ञ. त्या काळाची धार्मिक व सामाजिक संस्था म्हणजेच यज्ञसंस्था. यज्ञसंस्थेचा परिघ असा विस्तारला असल्याकारणाने ती काळानुसार टिकली. कालांतराने विचारात किती बदल होतात आणि वैदिक संस्कृती किती वैचारिक स्वातंत्र्य व समृद्धी प्रदान करू शकते याचे हे कळस उदाहरण आहे. 

जेव्हा सगुणत्व सुटत नाही, तेव्हा “सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराने केली की इतर कारणांमुळे ती झाली असावी, ” असा संशय व्यक्त झाला आहे. “अनेकत्व सर्व मिथ्या आहे विविध देवता या निव्वळ कल्पना असून एकाच उत्पादकतत्वाच्या विकृती आहेत.” ही काहीशी  निरिश्वरवादाकडे व नास्तिकवादाकडे झुकणारी वृत्ती अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्तात प्रकट केली आहे. (कदाचित म्हणूनच जैन धर्म हा नास्तिकवादावर आधारित असून सुद्धा त्यात उच्च कोटीची भूतदया व विश्वाप्रती संवेदनशीलता आपल्याला दिसते.) त्यातून निर्माण झालेली नासदीय सूक्तासारखी विचारांना चालना देणारी सुंदर अशी अभिव्यक्ती. आपल्यालाही उमगत जातं की, “मी कोण? माझ्या असण्याचा उद्देश काय?” इथपासून ते “हे विश्व कुणी निर्माण केलं?” मग ईश्वर म्हणा, वा निसर्गातील एकतत्व; या संकल्पनेला एका निर्गुण निराकार अशा तत्त्वात आकारणं, हा सारा आपल्या व्यक्तिगत व सामाजिक विकासाचा टप्पा बनत जातो. आपली आकलनकक्षा विस्तारत जाते, तसतसा आपल्याबरोबर आपला धर्म देखील विस्तारत जातो. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे असे संचित असते त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा ध्येय व मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही निराळा असतोच. 

(एकप्रकारे हा व्यक्तित्ववादाचा पायंडा आहे.) साहजिकपणे कुणाबद्दल कुठलेही सरधोपट विधान करणे हे मूलतः चुकीचे आहे, याचा विचार या प्राचीन ग्रंथांतही केला आहे. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या स्थान व परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तो कुठल्याही चौकटीत बांधता येत नाही, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने उमगत जातं. सुरुवातीला आपण धर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत गेलो असलो तरी नंतर मात्र तोच आपल्याला चिंतनास प्रवृत्त करत जातो. आपल्यातील स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांचा तो आदर करतो. आणि कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीचे मूलाधार असलेले ग्रंथ, वेद हे अपौरुषेय मानले आहेत. ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हे. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेद हे एका सिद्ध जीवन पद्धतीचे प्रतिबिंब बनत गेले व लोकमान्य परंपरा म्हणून स्थिरावले. वैदिक धर्म अद्वैतापासून ते नास्तिकवादापर्यंत प्रत्येकाच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्यात सहजतेने  सामावून घेतो. आपल्या आकलनाच्या कित्येक पुढे जाऊन तो आपल्याला असीम ज्ञान, उद्देश्य व सकारात्मकता प्रदान करत जातो. आपल्या चार पावलं पुढे राहून आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास व प्रगती करत जाणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच तो कालासमवेत टिकणारा आहे. Change is the only permanence.. हे आपल्या कित्येक आधी ह्याला ठाऊक आहे. आनंदाची, सुख समाधानाची व्याख्या व्यापक करणारा आहे. मला नाही वाटत की जगातील इतर कुठलाही धर्म स्वतःवर, धर्माचा जो आधारभूत त्या ईश्वरावर, यम नियम, त्यातल्या परंपरांवर, त्यावरील विश्वासावर, वर्षानुवर्षे निरीक्षणाने, लोकमताने सिद्ध झालेल्या विश्लेषणांवर, त्यावरच्या न दिसणाऱ्या श्रद्धांवर इतके प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत असेल. याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येकाला मुळातून विचार करण्यास बाध्य करावे असे या धर्माला वाटत असेल. मानवाने ईश्वराला शोधून काढून त्याच्यावर सर्वतोपरी आपला भार टाकण्यापेक्षा त्याने आत्मशोध घेणे महत्त्वाचे वाटत असेल. स्वतःत रमणाऱ्या, आत्मचिंतन करणाऱ्या माणसाला इतर काही शिकवण्याची क्वचितच गरज भासत असेल. वेद हे अपौरुषेय आहेत, हे ही त्या मागचं एक कारण असू शकतं. याही अर्थाने ईश्वर हा मानवी मनाचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हेच. 

 निरनिराळ्या देवता – मान्यता – श्रद्धा या सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या एकखांबी तंबूखाली येऊन विसावतात. त्याची सश्रद्ध अनुभूती आपल्याला अक्षर पुरुषसूक्तात येते. 

 गणपती ही देवता ऋग्वेदकालात होती की नव्हती याबद्दलही बरेच वाद आहेत. ऋग्वेदातील आठव्या मंडळातील ८१ व्या सूक्तात गणपतीच्या बाह्यरुपाचे  वर्णन आहे. सुरुवातीला इंद्र हे सर्वनाम (श्रेष्ठ) या अर्थाने आढळते. यात म्हटले आहे की रिद्धी – सिद्धी आणि बुद्धी यांचा अधिपती तो गणपती. इंद्राचा डावा – उजवा हात ही गणपतीची डावी किंवा उजवी सोंड असा निर्देश आहे. 

 सुभाषितं ही आपल्याला ऋग्वेदाची अमूल्य अशी देण आहे. प्रथम ओळीत एखादे मूल्य अथवा सत्य मांडणे व दुसऱ्या ओळीत त्याचे उदाहरण देणे,अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. सुभाषितं ही व्यवहारी शहाणपणा व ज्ञानाचा आदर्श परिपाठ आहेत. संस्कृत भाषेतील सुभाषितं ही प्राचीन साहित्याचा मनोरंजक व मार्गदर्शक विभाग आहे

 आत्मानुभव सूक्त हे देखील असीम शांतता मिळवून देणारे आहे. स्वतःला जाणणे म्हणजेच आत्मानुभव. प्रत्येक सजीव व निर्जीवात एक जागृत असे आत्मतत्त्व असते. त्या अमर आत्मतत्त्वाचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मानुभव. सृष्टीची उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि सामर्थ्य, सृष्टीचे मूल, आत्मा, चैतन्य आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्वांचे विवेचन या सूक्तात आढळते. 

 महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीन दिवस उपवास करून दुधात भिजवलेल्या भाताच्या शताहुती शिवास वाहतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असून याला रुद्रमंत्र व मृत संजीवनी मंत्र असेही म्हणतात. त्र्यंबकम मंत्र हा शिवाचे त्रिनेत्र दर्शवतो. महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. 

 दानव, असुर, पिशाच,यक्ष, राक्षस या सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक काळात मानला जात होता. वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द आलेला असून त्यापासून राक्षस हा शब्द आला. राक्षस ही मायावी, अद्भुत, कपटी, मांसभक्षक, जादूटोणा करणारी, ज्ञानी लोकांचा व यज्ञयागांचा द्वेष करणारी जमात म्हणून ओळखली जाते. राक्षस हे दिवसा निष्क्रिय तर रात्री क्रियाशील असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने भूतलावरील जलाच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले अशा कथाही आहेत. कश्यपानंतर ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षस वंश प्रवर्तित झाला असे म्हटले आहे. पुढे आर्य व राक्षस या दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे निदर्शनास येते. आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यात साम्य तसेच भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे. पळवून आणलेल्या स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरून मनुस्मृतीत राक्षस विवाहाचा संदर्भ आला असावा. त्यांचे विवाह अग्नीच्या साक्षीनेच होत. कदाचित राक्षस ही आर्यांचीच एक शाखा असावी जी कालांतराने दक्षिण भारतात स्थिरावली व तिने आपले वैभवशाली राज्य व संस्कृती निर्माण केली. (रावण व त्याची लंका) निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशी राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंथी देवालयांसाठी ज्या अतिप्रचंड शीलांचा वापर होतो त्यावरून हे काम राक्षसांनी केले असावे, अशी समजूत होती. ऋग्वेदात मृत्यू देवता निऋऀत्ती ही राक्षस मानली जाते. ऋग्वेदातही तंत्रविद्या, भानामती,जारणमारण यासंबंधी अभिचार सूक्ते आहेत. ह्या  वाममार्गालाच अभिचार योग असेही म्हणतात. (याचाही प्रभाव बुद्ध धर्मावर प्रकटपणे दिसून येतो.) ऋग्वेदकाल ते आजपर्यंतच्या काळात राक्षस जमात देखील किती उत्क्रांत होत गेली ते आपण बघतोच आहे. मुख्य म्हणजे त्यात जात-पात, वंश-वर्णभेद असा कसलाही दावा नाही. 

सत्व रज तम हे गुण व त्यांची प्रतिकात्मक रूपं ही आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येही दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. त्या गुणांचे नियमन व त्यांना  व्यक्तिगत व जीवनोपयोगी तत्त्वांत परावर्तित कसे करावे, हे ही भगवद्गीतेसारखे महान ग्रंथ सांगतात. उपनिषदांसारखे ग्रंथ जीवन मृत्यु विषयक संकल्पना, गुंतागुंतीची उकल सोप्या शब्दात सांगतात. वैदिक कालापासून चालत आलेलं हे चिंतन एखाद्या सावलीसारखं इतकं आपल्या मागोमाग, अन हातात हात घालून चालत आलेलं असतं, की आज नाही तर एक दिवस आपण अपूर्णातून पूर्ण व शून्यातून शून्य हे ध्येय गाठू शकू, इतपत आपणही धडपडत राहतो, सश्रद्ध होऊन जातो. 

आपल्यालाही उमगत जातं की, One that had granted us the Bliss of Ignorance, also acquires the Power to grant us the Strength to bear the Complete Knowledge…making us humble enough to believe that, “I know, that I do not know anything; yet not Insignificant in any way..”

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। 

लेखिका : सुश्री केतकी कानिटकर 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares