मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

 इंद्रधनुष्य  ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ... ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ (Technicians)  पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या. पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची, "जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण." लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला  डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’  ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे. अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत.  त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोंड नसलेला गणपती… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे  इंद्रधनुष्य  ☆ सोंड नसलेला गणपती !…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆ जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते. गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी इथे हे मंदिर आहे.  आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे.  गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते. याला “ नरमुख विनायक “ असेही म्हटले जाते.  संग्रहिका : प्रभा हर्षे ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही विकृती आली कुठून?… लेखिका : डॉ. वृषाली राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे  इंद्रधनुष्य  ☆ ही विकृती आली कुठून?... लेखिका : डॉ. वृषाली राऊत ☆ प्रस्तुती - श्री सुनील देशपांडे ☆ जेव्हा Netflix चा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्व अधोरेखित होते. गेलेल दशक हे माध्यमांच होत, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं.  आपल्या मेंदू मध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरवात झाली. ह्या माहितीला process करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. Netflix भारतात २०१६ पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरवात केली जे मानवी मेंदू साठी प्रमाणाबाहेर होत. जस high calories वाल अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो तसेच अति प्रमाणात information calories खाऊन मेंदूवर चरबी चढते कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. Binge eating प्रमाणे binge watching ने शरीराची व मनाची वाट लावायला सुरवात केली. भारतीयांनी दिवस व रात्र स्क्रीन वर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री व झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा व आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले, ही व्यसन व...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके  इंद्रधनुष्य  ☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके ☆ (डावीकडील छायाचित्रात नायक बिष्णू श्रेष्ठ दिसत आहेत. दुसरे छायाचित्र गोरखा सैनिकाचे प्रातिनिधीक छायाचित्र आहे.) ...अर्थात Once a soldier, always a soldier! Saving dignity of a woman!  त्याने झटकन आपल्या पोटपाशी लटकावलेली खुखरी तिच्या म्यानातून उपसली आणि त्याच्यावर झेप घेतली! खुखरी एकदा का म्यानातून बाहेर काढली की तिला अजिबात तहानलेली ठेवायची नसते. त्याने सपकन आडवा वार केला आणि त्याचं नरडं कापलं. खुखरीच्या जिभेला शत्रूच्या गरम रक्ताचा स्पर्श झाला आणि तिची तहान आणखी वाढली....समोर आणखी एकोणचाळीस शत्रू होते...कुणाच्या नरडीचा घोट घ्यावा?  तो सकाळीच आपल्या सैनिक मित्रांचा निरोप घेऊन घरी निघाला होता आपल्या पलटणीतून. का कुणास ठाऊक, पण त्याला आता घरापासून दूर राहण्याचा कंटाळा आलेला होता. घरी जाऊन वडिलोपार्जित शेती करावी,मुला-बाळांत रमावं असं वाटू लागलं होतं. त्याने मुदतपूर्व सेवानिवृत्ती मागितली तेंव्हा वरिष्ठही चकित झाले होते. बरं, वयही फार नव्हतं. फक्त पस्तीशीचा तो शिपाईगडी. त्यादिवशी त्याने साहेबांना कडक सल्यूट बजावला. जय महाकाली...आयो गोरखाली हा त्याचा सैन्यनारा मनात आठवला आणि आपला लष्करी गणवेश उतरवला....खुखरी मात्र गळ्यात घातलेल्या...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहला – ( श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री   इंद्रधनुष्य  ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा - ( श्लोक ११ ते २०) - मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ संस्कृत श्लोक…  ☆ अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः। भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥ ☆ तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह: | सिंहनादं विनद्योच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान् ||१२|| ☆ तत: शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा: | सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् || १३|| ☆ तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ | माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतु: || १४|| ☆ पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जय: | पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदर: || १५|| ☆ अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: | नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ||१६|| ☆ काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ: |  धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित: ||१७|| ☆ द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते | सौभद्रश्च महाबाहु: शङ्खान्दध्मु: पृथक् पृथक् ||१८|| ☆ स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् | नभश्च पृथिवीं चैव तुमुलो नुनादयन् ||१९|| ☆ अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः। प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ৷৷२०৷৷ ☆ ☆ भावानुवाद  ☆ राखू अचल श्रेष्ठ मनोबल अपुल्या सैन्याचे समस्त आपण करू  संरक्षण  भीष्माचार्यांचे ॥११॥ ☆ शार्दूलासम गर्जोनी शंखा  फुंकित देवव्रत उत्साह करण्या वर्धिष्णु दुर्योधनाचा समरात ॥१२॥ ☆ अगणित शंख पणव आनक गोमुख आणि नौबती एकसमयावच्छेदे रणांगणी नाद करीत  गर्जती ॥१३॥ ☆ धवल अश्व रथास ज्यांच्या श्रीकृष्णार्जुनांनी युद्ध सिद्धता प्रकट केली शंखांसिया फुंकुनी ॥१४॥  ☆ पाञ्चजन्य केशवशंख देवदत्त धनञ्जयाचा महाध्वनीचा पौण्ड्रशंख वृकोदर भीमाचा ॥१५॥  ☆ कुंतीतनय युधिष्ठिराने  अनंतविजय फुंकला सुघोष नकुलाचा मणिपुष्पक  सहदेवाचा  निनादला...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा…” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर   इंद्रधनुष्य  ☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा...” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती - श्री मोहन निमोणकर ☆ आपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान! आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.  ग.दि. माडगूळकरांनी गीतरामायणात लिहिले आहे,  "मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा.  पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा." माणूस जे काही जगतो, तर्क लावतो, शोध लावतो ते मृत्युपाशी येऊन थांबतात. मृत्यूनंतर पुढे काय होतं, हे कोणालाही माहित नाही. कारण आपण पराधीन आहोत. तरीही आपले डोळे, त्वचा, किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस, आतडी, स्वादुपिंड, हात, पाय दुसऱ्याला देऊन आपण आपल्या मृत्यूनंतरही अवयवाद्वारे ह्या जगात राहू शकतो. आपला मृत्यू नैसर्गिकपणे मेंदू बंद होऊन (ब्रेन डेड) झाला असेल तर आपण एकूण ९ व्यक्तींना विविध अवयव देऊ शकतो. अवयवदान करून झाल्यानंतर मृत व्यक्तीचा देह त्याच्या नातलगांकडे सोपवला जातो. जेणेकरून ते अंत्यविधी करू शकतील. संपूर्ण शरीर दान केलं असेल तर मात्र मृतदेह...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर  इंद्रधनुष्य  ☆ विज्ञान विशारदा — डॉ. कमलाबाई सोहोनी… लेखिका – सुश्री वसुमती धुरू ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती. सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की,  शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.' लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगुस नवमी ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆

 इंद्रधनुष्य  ☆ मुंगूस नवमी .. ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆ श्रावणात अनेक सण असतात. काही रुढी परंपरा पिढ्यानपिढ्या जपल्या गेल्या आहेत. आम्ही मूळचे गुजराथी. वाळासिंदोर नजिकच्या मोडासा आणि वाडोसा गावच्या आमच्या पूर्वजांना शिवाजी महाराज त्यांनी सुरतेवर स्वारी केली होती तेव्हा आपल्याबरोबर रायगडावर घेऊन आले. रायगडाच्या पायथ्याशी महाड, बिरवाडी, पोलादपूर, खेड, दापोली या गावांत आमच्या पूर्वजांना बस्तान बसवून दिले. आपल्या मराठी लोकांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहाता यांच्याकडून दुकानदारी, व्यवहार शिकावे अशी महाराजांची इच्छा असावी. असो. तर आमचे पूर्वज काही शे वर्षापूर्वी महाराष्ट्रात आले आणि मराठीच झाले. तरीही काही विधी, सण पूर्वीच्या परंपरेनुसार होतात. त्यातलाच एक आहे मुंगूस नवमी. महाराष्ट्रात जशी नागपंचमी असते तशी आमच्या समाजात मुंगुसाची पूजा करतात. त्यामागे एक कथा आहे. मुंगूस एका माणसाच्या मुलाचे सापापासून रक्षण करतो आणि सापाशी केलेल्या झटापटीत जखमी होऊन त्याचे तोंड रक्ताने माखते. घरी परत आलेल्या माणसाला घराबाहेर रक्ताने माखलेला मुंगूस दिसतो. त्याला वाटते की मुंगुसाने त्याच्या बाळालाच काही इजा केली असावी. असे वाटून काहीही विचार न करता तो त्या मुंगुसाला ठार मारतो. त्या आवाजाने त्याची पत्नी...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी  इंद्रधनुष्य  ☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆ तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवीइतकाच मातीचा सुगंधही इथे महत्वाचा आहे. तसंच, हा पूर्णतः ‘तालमीचा राग’ आहे. यूट्यूब वर बघून हा येऊ शकत नाही. आई, आज्जी, आत्या अशा कुणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते. आपल्याकडे बाजारात उकडीचा मोदक बनवायचे ‘साचे’ मिळतात. ही ‘चीटिंग’ आहे. हे म्हणजे ऑटोट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवैयाला असा ‘ साचेबद्ध ’पणा रुचत नाही. मोदक हा व्हीआयपी पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल-खुर्चीवर बसून नाही, तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी-भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतः सुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर ‘निवग्री’ नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच. तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्यावर साजूक तुपाची धार पडते, आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता, त्या वेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संतसज्जनांनी ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ असं म्हणलेलं आहे. यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले...
Read More

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके  इंद्रधनुष्य  ☆ शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆ उधमपूर रेल्वे स्टेशन.. कश्मिर ! येथूनच तरणाबांड तुषार पुण्याला निघाला असताना त्याचे आई-बाबा, भाऊ त्याला निरोप द्यायला आले होते काहीच वर्षांपूर्वी! त्यांच्या विरोधाला न जुमानता पोरगं नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये सैन्य अधिकारी व्हायला निघालं होतं. बालहट्टापुढे काही चालतं का आईबापाचं? आणि आज त्याच स्टेशनवर ते त्याला घ्यायला आलेले आहेत... अखेरचे! तो आलाय... तिरंग्यात स्वत:ला गुंडाळून घेऊन... त्याचं स्वप्न साकार करून !  उधमपूर मध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचार्य देव राज यांचा हा धाकटा मुलगा. जन्म २० एप्रिल, १९८९ चा. थोरला मुलगा इंजिनिअर व्हायचं म्हणत होता. पण तुषार मात्र अगदी लहानपणापासून म्हणायचा... मला लष्करात जायचंय आणि अतिरेक्यांना ठार मारायचंय.... शाळेतल्या निबंधातही तुषार हेच लिहायचा ! त्याने कश्मिरातील अतिरेकी कारवाया आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. देशाच्या दुश्मनांना आपण यमसदनी पाठवावे, असे त्याला मनातून सतत वाटे.  भगवंताला अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताचे एक वैशिष्ट्य सांगताना माऊली ज्ञानोबारायांनी म्हणून ठेवलं आहे…” तैसा मी वाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं। मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें “ ॥ ३३६ ॥...
Read More
image_print