मराठी साहित्य – विविधा ☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? विविधा ? 

☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

सातवीत असतांना मी फटाक्याचा उद्योग सुरू केला. एवढासा मुलगा आणि एकदम लिस्ट वगैरे बनवून ‘श्री इंडस्ट्रीज’ या नावाने एकदम प्रोफेशनल पध्दतीने फटाक्यांचा व्यवसाय करतोय म्हटल्यावर ओळखीच्या लोकांनी माझ्याकडून फटाके घेऊन मला या व्यवसायात घट्ट उभं केलं. आज या फेसबूकवरही हे जाणणारे व मला मदत करणारे उपस्थित आहेत. माझा वैयक्तिक पातळीवरील हा पहिला “उद्योग-व्यवसाय”. याच व्यवसायाने मला खरतंर उद्योजक बनवलं.

सन १९९२ ते सन २००४ असं एक तप मी हा व्यवसाय केला. फटाक्याच्या या व्यवसायात पहिल्या वर्षी मला १८९२/- रूपये निव्वळ फायदा व उरलेले फटाके असा भरपूर फायदा झाला होता. सन २००४ साली शेवटच्या वर्षी याच धंद्यात मी ९, २०, ०००/- रूपयांचा निव्वळ नफा कमावला होता. झटपट फायदा मिळवून देणारा हा सिझनल धंदा खुप भारी वाटायचा. घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे या फायद्यातील एकही रूपया कधीही आईबाबांनी घेतला नाही. करतोय धंदा तर करू दे फक्त हा विचार त्यांचा असायचा. त्यामुळे फटाका व्यवसाय याबाबत सर्व अधिकार माझेच होते.

सुरवातीला डंकन रोड (मुंबई), उल्हासनगर व शहापूर (ठाणे जिल्हा) येथील होलसेल दुकानातून फटाके घेता घेता सन २००४ सालापर्यंत मी फटाक्यांची पंढरी असलेल्या शिवकाशीहून (तामिळनाडू राज्य) थेट आयात करू लागलो होतो. वय वर्षे बारा ते वय वर्षे चोवीस या बारा वर्षात या धंद्यात इतकी भलीमोठी प्रगती झाली होती. असे असतानाही मी सन २००४ साली हा धंदा कायमस्वरूपी बंद केला.

गल्ली ते थेट तामिळनाडू राज्य असा प्रवास करत असताना व इतका फायदेशीर धंदा बंद करण्यामागचं कारण काय असावं?? काय घडलं असेल असं?? सर्वांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे.

फटाका इंडस्ट्री – दक्षिणेत गृह उद्योग ते मोठ्या कार्पोरेट लेव्हलवर फटाक्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडे जसे स्त्रिया दोन पैसे मिळवण्यासाठी पापड लाटतात त्याच धर्तीवर तिथे फटाके वळले जातात. आपल्या येथील स्त्रियांच्या सुदैवाने पापड व्यवसायात कोणताही ज्वालाग्रही – केमिकल वा विषारी धोका नाही. फटाक्यांच्या व्यवसायात नेमकं उलट आहे.

तांबे, कॅडीनियम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडीयम, सल्फर असे सर्वच विषारी घटक या उद्योगातील संबधित व्यक्तीला उघड्या हातांनी हाताळावे लागतात. त्याचे फार मोठे दुष्परिणाम होतात.

सगळ्यात भयानक बाब म्हणजे या उद्योगात ‘चाईल्ड ट्रॅफिकींग’ या गुन्हेगारी पध्दतीने देशभरातून लहान मुलं पळवून आणून जुंपली जातात. त्यांच्यावर काम करण्यासाठी अनन्वीत अत्याचार केले जातात. बहुतांश वेळा यातील मुली मोठ्या झाल्या की त्यांना वेश्याव्यवसायात विकले जाते. एकूणच फार मोठ्या प्रमाणावर चिमुकल्या जीवांचे आयुष्य बरबाद केले जाते.

हे झालं एक कारण..

दुसरं कारण म्हणजे या आधीच ज्वलनशील असलेल्या उद्योगाला मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव.. कोणत्याही प्रकारची ॲन्टी फायर सिस्टम संबधित उद्योगात वापरली जात नाही. मोठे उद्योग केवळ शो म्हणून व कायद्यास दाखविण्यासाठी फायर इक्विमेंट ठेवतात. एखादा उद्योजक वगळता सर्वत्र ही सत्य परिस्थिती आहे. दरवर्षी या फटाक्यांच्या कंपन्यांना लागलेल्या आगीत अनेक जीव जातात. . काही होरपळून निघतात.

हे झालं दृष्य.. अर्थात दिसणारं.. तर न दिसणारं म्हणजे वर उल्लेख केलेल्या विषारी धातू व केमिकल्स नी हजारोंना विविध भयंकर आजार जडले आहेत. दुर्दैवाने यात महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याची अधिकृत आकडेवारी कधीही उपलब्ध होत नाही. सगळा प्रकार सर्वसामान्य फटाक्यांचे समर्थन करणारा विचारही करू शकत नाही इतके भयानक आहे.

दोष समर्थन करणारे यांचा नाही कारण ही भयानक वस्तुस्थिती त्यांना ज्ञातच नाही. ज्या दिवशी ही बाब फटाके समर्थक प्रत्यक्षात पहातील, समजून घेतील त्या दिवशी ते फटाक्यांचे समर्थन बंद करतील हे निश्चित. कोणताही हिंदू कधीही मेलेल्याच्या वा मरणार्‍याच्या टाळूवरील लोणी गोड असतं असं म्हणू शकत नाही.

सन २००४ सालातील डिसेंबरात मी पुढील वर्षाची ऑर्डर देण्यासाठी शिवकाशीस गेलो होतो. तोपर्यंत पत्रकारीता करू लागल्याने दुनियादारी समजायला लागली होती. आतापर्यंत समोर असूनही न दिसणारे सामाजिक प्रश्न समोर दिसायला, कळायला लागले होते. शिवकाशीतल्या त्या चार दिवसांनी फटाका इंडस्ट्री च्या काळ्या बाजू बद्दल खुप काही दाखवलं – शिकवलं. सर्वच सहनशक्तीच्या पलिकडचं होतं.

“जे आपल्या मनाला पटत नाही ते कधीही करायचं नाही. . मग काय वाट्टेल ते होऊ दे” हे धोरण माझं पहिल्यापासून फिक्स आहे.

“कायद्याचं काय हो ठरवलं तर अनेक मार्ग कायदा न मोडता अगदी कायदेशीररित्या काढता येतात. ” पण करायचाच नाही हा प्रकार. . शक्यच नाही ते. . तर विचारच का करा??

हा सर्व फटाक्यांचा फाटका प्रकार पाहिल्यावर खरंतर ताबडतोब हा सर्व प्रकार बंद करावा असे वाटले. वय लहान होतं. तितकी समज नव्हती. काहीतरी करायला हवं याने भडकलो होतो. दोन चार लोकांना ‘हे बंद करा’ वगैरे उपदेश – धमकी – बिमकी देऊन अखेर ऑर्डर न देताच घरी परतलो.

घरी बाबांनी मला समजावल्यावर मग आपल्या पुरता मी निर्णय घेतला आणि फटाक्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद केला.

एकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं. तेच मी ही केलं.

जोवर सर्वंकष फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी येत नाही तोवर हे असेच चालणार. दिवाळी हा आनंदाचा मोठा सण आहे हे निश्चित परंतु तो आनंद कोणाच्या जीवावर उठणारा नसावा इतकेच..

फटाकाबंदीला केवळ ध्वनी वा वायू प्रदूषण या बाबीवर नक्कीच समर्थन नाही. कारण असे प्रदूषण करणारे इतरही अनेक उद्योग व प्रकार आहेत. फटाकाबंदीच स्वागत आहे ते केवळ निष्पाप लहानमोठ्या जीवांच्या अकाली कोमजणार्‍या आयुष्यासाठी. . . . .

लेखक – श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

दारावरची बेल वाजली. आत्ता दुपारी कोण आलं असेल म्हणून देवकी जरा वैतागूनच दार उघडायला गेली. . . दार उघडलं तर दारात बकुळ उभी.

जवळजवळ सात आठ वर्षांनी देवकी बकुळला बघत होती. पहिल्यांदा तर तिने बकुळला ओळखलंच नाही. केवढा बदल झाला होता बकुळ मध्ये ! छानसं पोनीटेल, एका हातात घड्याळ आणि गळ्यात सोन्याची चेन. अंगावर सुंदर साडी आणि प्रसन्न हसतमुख चेहरा !

कुठे पूर्वीची कामवाली बकुळ !  शेपटा वळलेला, मोठं कुंकू आणि  हातभर बांगड्या. बकुळ देवकीकडे दिवसभर कामाला होती. देवकी होती भूल देणारी डॉक्टर. चोवीस तास तिला केव्हाही कॉल यायचे. देवकीची मुलं लहान होती आणि देवकीला चोवीस तास रहाणाऱ्या बाईची अत्यंत गरज होती. तिचे सासू-सासरे होते म्हणा, पण देवकीच्या सासरचा गोतावळा खूप होता. सतत पाहुणे, माणसांचे येणे जाणे असायचं आणि मग सासूबाईंना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ व्हायचा नाही. देवकीचा नवरा होता डोळ्यांचा डॉक्टर ! तोही दिवसभर घरी नसायचा.

देवकीने हजार लोकांना बाईबद्दल सांगून ठेवले होते. अशात कोणीतरी ही बकुळ पाठवली. आली तेव्हा बकुळ असेल सोळा सतरा वर्षाचीच. पहाता क्षणीच देवकीला आवडली ही मुलगी. मोठे डोळे, पण विलक्षण चमकदार ! 

देवकी म्हणाली, “ काय ग नाव तुझं? किती शिकली आहेस? कोणी पाठवलं तुला? “ 

“ बाई, मी बकुळ ! तुमच्या मैत्रीण नाहीत का उषाताई, त्यांनी पाठवलं मला. मी काम करत होते त्या मावशी मुलाकडे गेल्या कायमच्या. मला राहून असलेलं काम हवंय म्हणून मला उषाताईंनी पाठवलं. मी दहावी शिकले बाई, पण पुढं नाही शिकता आलं. मला. आईवडील नाहीत, मामाने वाढवलं आणि आता मामी नको म्हणती मला रहायला. रोज रोज भांडण करण्यापेक्षा मीच मग चोवीस तासांचं काम बघतेय “. . एका दमात बकुळने आपली माहिती सांगितली.

देवकीला अत्यंत गरज होती अशा बाईची ! ती म्हणाली  “ मी बघते तुला ठेवून घेऊन महिनाभर ! आवडलं, आपलं पटलं तर मग बघूया. मी कधीही केव्हाही बाहेर जाते. आजी आहेत कुरकुऱ्या, तुला पटवून घ्यावे लागेल हं ! “ बकुळ हसली आणि म्हणाली, “ बाई, उद्यापासून येऊ ना? “ देवकीला फार आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बकुळ हजर झाली. नीट नेटकी साधी साडी, जाड केसांचा शेपटा, त्यावर गजरा !देवकीचा बंगला मोठा होता, त्यामुळे बकुळला ठेवून घेण्यात देवकीला अडचण नव्हती. आल्याआल्या पदर बांधून देवकी म्हणाली, “ बाई, घर दाखवा ना आपलं ! स्वयंपाकघरात गेल्यावर आजींना तिनं खाली वाकून नमस्कार केला. आजींनी प्रश्नार्थक मुद्रेने देवकीकडे बघितलं.

“ आजी, ही बकुळ. आपल्याकडे राहून काम करणार आहे. तुमच्या हाताखाली ही मदत करील तुम्हाला स्वयंपाक घरात ! “ 

आजी म्हणाल्या, “ हो का? आत्तापर्यंत सतरा जणी आल्या, आता हिचा काय उजेड पडतो बघूया. ”  देवकीने बकुळकडे पाहिलं. बोलू नकोस अशी खूण केली आणि तिला तिची खोली दाखवली. देवकीने तिला काम समजावून सांगितलं. मुलांची ओळख करून दिली. तेवढ्यात फोन वाजलाच ! डॉ मराठ्यांकडे तिला लगेचच कॉल होता.

देवकी म्हणाली, “ बकुळ मी जातेय ! जमेल तसं कर. आले की बाकीचे सांगेन मी !” त्या दिवशी देवकीला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. एक मिनिट फुरसत मिळाली नाही तिला. घरी आता काय काय झालं असेल म्हणतच देवकी घरी आली. हॉलमध्ये  देवकीची मुलं राही आणि रोहन बकुळ जवळ बसले होते आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती आणि आजी सुद्धा ऐकत होत्या, मन लावून ! देवकीने सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवात तरी चांगली झाली म्हणायची… देवकी हसून मनाशी म्हणाली. हळूहळू बकुळ घरी रुळायला लागली. देवकीच्या फोनजवळ डायरी असायची आणि त्यात सगळे तिचे कॉल्स वेळ, तारीख नोट केलेले असायचे. बकुळ हळूहळू हे करायला शिकली. आता देवकीला कोणताही फोन आला की बकुळ म्हणायची, “ एक मिनिट हं सर ! बाईंची डायरी बघून सांगते. मी ! उद्या आठ वाजता नाहीये कुठे कॉल. मी लिहून ठेवते तुमचा कॉल आणि बाई आल्या की मग करतीलच तुम्हाला कॉल. ! “ बाकीच्या डॉक्टरांना बकुळचे कौतुकच वाटायचे. ‘ देवकी, तुझ्या बकुळने फिक्स केलाय बरं कॉल ! मस्त तयार झाली ग तुझी ही असिस्टंट ! “ इतर डॉक्टरणी देवकीला हेव्याने म्हणायच्या. बकुळ हळूहळू उजवा हात झाली देवकीचा. घरात तर ती सगळ्यांची आवडती झालीच ! रोहन राहीला तर एक क्षण करमत नसे बकुळताई शिवाय, आणि आजीही खूष होत्या तिच्यावर ! देवकीला खूप लळा लागला बकुळचा. ती आता घरातलीच सदस्य नव्हती का झाली? मुलं मोठी व्हायला लागली. आता तर त्यांना सांभाळायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची तशी गरजही उरली नाही. देवकी एक दिवस लवकर घरी आली होती. बकुळचे सगळे काम संपले होते. देवकीने तिला विचारलं, “ बकुळ, खूप दिवस तुला विचारीन म्हणते, पण मी तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही चौकशी केली नाही ग ! तू अशी लोकांकडे कामं करत किती वर्षे रहाणार बाळा? किती गुणी आहेस तू. काय ठरवलं आहेस तुझ्या पुढच्या आयुष्याचं बेटा? “ 

बकुळच्या डोळ्यात पाणी आलं. “ बाई, काय सांगू तुम्हाला ! फार हाल काढलेत हो मी ! माझे आई वडील खूप लवकर गेले आणि मी एकटीच मुलगी त्यांना. मग मामा मामीनं थोडे दिवस संभाळलं. त्यांनाही त्यांची मुलंबाळं होतीच आणि गरीबीही होतीच की पाचवीला पुजलेली. नाईलाजानं त्यांनी मला अनाथाश्रमात ठेवलं. पण मामी नेहमी यायची मला भेटायला, थोडे पैसे द्यायची, कपडे घ्यायची. ती तरी आणखी काय करणार होती? मी होते त्या आश्रमात मुलं मुली दोन्ही होती. मी आश्रमाच्या शाळेतच जात होते. हे सुंदर रूप सगळीकडे आड यायला लागलं हो बाई. एका रात्री एका मुलानं बळजबरी केली माझ्यावर ! मी आरडाओरडा केला. पण काही दिवसांनी हे वारंवार घडत गेलं. कोणाकडे दाद मागणार मी? एक दिवस तर आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून….

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय लेकरा – भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ माझ्या प्रिय लेकरा — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

माझ्या प्रिय लेकरा,

(मुलांच्या मनाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था असतील तर पालकांनी तिन्ही अवस्थेत एकच प्रतिक्रिया देऊन कसे चालेल?) – इथून पुढे..

बाहेरच्या निष्ठुर जगात आई-बापाप्रमाणे मुलांला समजून घेणारे वा समजावून सांगणारे फारसे कुणी नसते. मुलांच्या चुकांना बाह्य जगात केवळ शिक्षा मिळतात. अशा शिक्षेनंतर मायेने फुंकर घालायलाही कुणी नसते. या शिक्षांमध्ये मायेचा ओलावा नसल्याने मुलांच्या मनात त्या प्रसंगांविषयी कायमस्वरूपीची कटुता निर्माण होते. पण हेच वय सर्वात जास्त संस्कारक्षम असल्याने याच वयात चांगल्या वाईटाचे धडे दिले गेलेच पाहिजेत. समाजाकडून मुलांना रुक्षपणे जगण्याचे धडे शिकायला मिळण्याऐवजी आई-बापाने कठोरपणावर मायेचा मुलामा देऊन ते मुलांना शिकवावेत. त्यामुळे मुलांच्या मनात कटुता निर्माण होत नाही. कधी चांगल्या कामाचे बक्षिस देवून, कधी समजावून सांगून आणि वेळप्रसंगी शामच्या आईसारखी मायेच्या ओलाव्याने शिक्षा करावी लागते.

श्याम म्हणजे साने गुरुजी. त्यांना लहानपणी पाण्याची फार भीती वाटे. पोहणे शिकणे का गरजेचे आहे हे आईने श्यामला समजावून सांगितले. पोहायला जायचे ठरल्यावर ऐनवेळी श्याम लपून बसला. समजावून सांगूनही शाम पोहायला जात नाही म्हटल्यावर श्यामच्या आईने त्याला फोकाने बडवून काढले. श्यामला मारताना श्यामसोबत आईच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होते. पुढे कधी चुकून लेकरू पाण्यात पडलं तर जीवाला मुकेल या धास्तीने तिने ते सर्व केले होते. तसेच पाण्याच्या भीतीने पोहायाला न शिकलेल्या आपल्या मुलाला समाजात कुणी भित्रा समजू नये म्हणून आईने अडून बसलेल्या श्यामला शिक्षा करून पोहायला धाडले. माराच्या भीतीने श्याम शेवटी पोहायला गेला. पोहून घरी आल्यावर पाठीवरील वळ दाखवत श्याम आईवर रुसून बसला. मुलाच्या पाठीवरील वळ पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. जेवत असलेली आई भरल्या ताटावरून उठली आणि हात धुवून त्याच्या पाठीवरील वळांना तेल लावू लागली. रडवेल्या स्वरात तिने श्यामला पोहण्याचे महत्व परत समजावून सांगितले. आपल्याला मारून स्वतः रडणा-या आईला पाहून श्यामलाही गहिवरून आले. आईचे आपल्याला मारणे हे आपल्या हिताचेच होते याची ठाम जाणीव श्यामला झाली. या प्रसंगामुळे श्यामच्या मनात कुणाविषयीही कटूता निर्माण झाली नाही. उलट या घटनेतून आईचे श्यामवर असलेले प्रेमच अधोरेखीत झाले. आई आणि श्यामचे नाते अजून घट्ट झाले. श्यामला शिक्षा झाली. पण श्यामच्या मनावर कटूपणाचा ओरखडाही ओढला गेला नाही. श्यामला आयुष्यभरासाठीचा एक धडा मिळाला. या घटनेला साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक घटना म्हणून लक्षात ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या आईच्या मायेमुळे शक्य झाले होते. आईच्या जागी बाहेरचे कोणी असते तर आपुलकीच्या आभावामुळे आणि भावनिक कोरडेपणामुळे हा प्रसंग साने गुरुजींच्या स्मृतीत दुःखदायक प्रसंग म्हणून नोंदला गेला असता.

पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय पालकांनी मुलांना शिक्षा करू नये. केवळ मुले कमजोर आहेत म्हणून त्यांना पालकांनी आपल्या आयुष्यातील फ्रस्ट्रेशन काढायची पंचींग बॕग करू नये. मुलांना शिक्षा केल्यावर पालकांना मुलांपेक्षा जास्त दुःख होत नसेल तर पालक त्या शिक्षेतून असुरी आनंद मिळवत आहेत असा अर्थ होतो. अशा पालकांना मानसिक समुपदेशनाची किंवा कदाचित मानसिक उपचारांची गरज आहे असे समजावे.

मुले पटकन मोठी होतात. मग ते ‘Teen’ या असुरक्षित वयात पोहचतात. आजवर अभ्यास, खेळ, कला इत्यादी क्षेत्रात त्यांनी काही ना काही यश मिळवलेले असते. आजवर केलेल्या कर्तुत्वाची एक ओळख मुलांच्या मनात निर्माण झालेली असते. मुलांच्या मनात स्वतःविषयीची प्रतिमा आकार घेत असते. मुलांच्या मनातील स्वतःच्या प्रतिमेच्या आकाराला अहं-आकार वा अहंकार असे म्हटले जाते. बारा-तेरा वर्षांपर्यंत मनात वेगवेगळे अहंकार तयार झालेले असतात. यशाच्या श्रेयावर पोसलेला अहंकार तसा मुलांसाठी आनंदाची जागा असतो. पण या अहंकाराचा एक प्रॉब्लेम असतो. अहंकारावर थोडीशी टीका झाली तरी अहंकार दुखावला जातो. एखाद्या चुकीसाठी बोल लागला वा  शिक्षा झाली तर त्या संदर्भातील अहंकार लगेच दुखावला जातो. अहंकार दुखावला की मनात राग उत्पन्न होतो. या त्रासदायक समस्येचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केले तर स्वतःचा गाढवपणा स्वीकारावा लागतो. मग आत्मटीकेचे वाढीव दुःख पदरी पडते. आधीच अहंकार दुखावल्याने दुःखी झालेले मन हे नवीन दुःख स्वीकारायला तयार होत नाही. त्याऐवजी असे दुखावलेले मन अप्रामाणिकपणा स्विकारते आणि स्वतःच्या चुकांचे खापर जगावर फोडून मोकळे होते. त्याने मनाला तात्पुरता आराम मिळाला तरी अप्रामाणिक आत्मपरीक्षणामुळे समस्येची खरी  कारणे कधीही समोर येत नाहीत. त्यामुळे अशी समस्या कधीच सुटत नाही. अहंकारी मन एकाच चौकात, त्याच दगडाला वारंवार ठेचा खात राहते आणि त्याबाबत जगाला दोष देत राहते. या समस्येला मानसशास्त्रात “टिन एज आयडेंटिटी इशू” असे म्हणतात. या वयातील मुलांचा स्वभाव रगेल आणि विद्रोही झालेला असतो.

अशा वयात असलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या वागण्यावर टीका करून त्यांचा अहंकार दुखावला तर मुलांच्या वागण्यावर त्याचा विपरीत आणि बहुतेक वेळा विरुद्ध परिणाम होतो. मुलांना क्रिटीसाईज केले वा कधी शिक्षा केल्यास मुले पालकांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याऐवजी हट्टाला पेटून पालकांच्या सांगण्याविरुद्ध वागतात. या वयातील मुलांच्या वागण्याला खरंच वळण द्यावयाचे असल्यास आई-बापाने आपला “पालक” हा अहंकार टाकून मुलांचे “मित्र” व्हावे. आपल्याकडे आजवरच्या अनुभवांनी जमा झालेले ज्ञान फक्त मुलांसमोर मांडून, त्यांना त्यांच्या समस्येचे आकलन करून घ्यायला मदत करावी. शेवटी केवळ मित्रत्वाचा सल्ला द्यावा. तसेही १२-१३ वर्षापुढील मुले त्यांच्या बुद्धीला पटेल तेच करतात. काही पालक मुलांचा अहंकार दुखवून त्यांना वाईट मार्गावर अजून दृढपणे चालण्यास भाग पाडतात. यात कुठलेही शहाणपण नाही.

मुली, तू आता सहाव्या वर्षात पाय ठेवला आहेस. परवा तू सतत हट्ट करत होतीस. तीन-चार वेळा मी तुला समजावून सांगितले. पण तू काही केल्या ऐकेनास. मग नाईलाजास्तव तुला शिक्षा करावी लागली. तुला शिक्षा करत असतांना आणि नंतर माझ्या मनाची काय अवस्था झाली हे केवळ मलाच ठावूक आहे. कोण कुणाला शिक्षा करत होते देव जाणे ! त्या दिवशी तू जितकी रडलीस ना त्याच्यापेक्षा जास्त माझे मन रडले. पण बापाला उघडपणे आसवे गाळायचीही मुभा नसते. परत अशी वागू नकोस गं. तुझा बाबू बापाच्या कर्तव्याने बांधला गेला आहे. कर्तव्य आणि त्याच्यासोबत येणारा मानसिक त्रास मला चुकवता येणार नाही. डंब सेल्फिशसारखी कधीच वागू नकोस ग पोरी. तसाही चाळीशी ओलांडलेला पुरूष रडताना बरा दिसत नाही.

तेव्हा कुठल्याही चुका न करता लवकर मोठी हो पोरी !

तुम्हाला शिक्षा केल्यावर आमच्याच काळजाला डागण्या लागतात गं ! लेकाच्या वेळी ते मी कसंतरी सहन केलं. पण तुझ्याबाबतीत ते सहन होईल असं वाटत नाही.

लवकर शहाणी आणि मोठी हो पोरी !

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..

. . . . तुझा गोपाल बाबू

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय दुसरा – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । 

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥ 

वीर क्षत्रिया त्यजी भया जाणूनिया स्वधर्मासी

युद्धाहुनी श्रेष्ठ भला दुजा नसे धर्म क्षत्रियासी ॥३१॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ । 

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ ३२ ॥ 

भाग्यवान क्षत्रियासी युद्धाने केवळ लाभते

आपोआप मुक्त स्वर्गद्वार होणे नशिबी प्राप्त ते ॥३२॥ 

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि । 

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३ ॥ 

यद्यपि विन्मुख होशी या धर्मयुद्धा 

गमावशील स्वधर्म तथा कीर्तिसुद्धा

संचय न होई  यत्किंचित पुण्याचा

होशील धनी तू केवळ  पापाचा ॥३३॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ । 

सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥ 

अपकीर्ति मग पसरेल तुझी पार्था या जगती

मरणापरीस अधिक दुःसह मनुष्यास ती दुष्कीर्ति ॥३४॥

भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः । 

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ ३५ ॥ 

आदर करिती तुझा आजवर महारथी जाणुनी

म्हणतील भ्याड फिरला मागे  भिउनी रणांगणी ॥३५॥ 

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । 

निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ ३६ ॥ 

निंदक वैरी तुझे निंदतिल अश्लाघ्य वचने

यापरी  दूजे काही नाही जीवनात दुखणे ॥३६॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ । 

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥ 

मृत्यू येता स्वर्गप्राप्ती  जिंकलास भोगी धरणी

उठि कौन्तेया निश्चय करुनी युद्धासी तू रणांगणी ॥३७॥ 

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । 

ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥ 

सुख-दुःख हानी-लाभ जित-जेता समान 

युद्ध करी रे नाही पाप रणांगणातील रण ॥३८॥

एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । 

बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९ ॥ 

ज्ञानयोगाचे हे ज्ञान कथिले पार्था मी तुजला

ऐक कर्मयोग नष्ट करण्या कर्मबंधनाला ॥३९॥ 

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । 

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ ४० ॥ 

बीजाचा  ना होतो नाश  नाही फलदोष यात

कर्मयोगाचा धर्म जननमरण भय रक्षण  करित ॥४०॥ 

बीजाचा  ना होतो नाश  नाही फलदोष यात

जननमरण भय रक्षण  कर्मयोग धर्म करित ॥४०॥ 

– क्रमशः भाग दुसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“करंजीच्या सारणात थोडी कणीक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. “पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही?” तर त्यावर “अग, गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. “

“मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न. तर त्यावर “अग, मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते”  – तितकेच शांत, पण तत्पर उत्तर.

अगदी सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या.

१. अंगी ओलावा असेल, तर गोष्टी मिळून येतात.

२. ओलावा कमी असेल, तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.

नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. आणि आता दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.

नात्यांचंही असंच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो. मग ते असे मित्र/ मैत्रीण असतील, जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात. कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.

आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factors दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात. काळजीही करतात.

अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत, म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे, अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.

मंडळी, आपण वयाने मोठे झालो, मिळवते झालो, चला तर – आता मिळवून आणणारे होऊ या.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “

“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा  चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज  प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी  छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू  माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना  ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या  माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत  पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय  कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन  असणारी.. मग ती माय कालची असो वा  आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला  कधीच कळत नसतं..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ ई-अभिव्यक्ति में तकनीकी संवर्धन ☆ दिनांक 17 नवंबर 2023 से पुनः प्रकाशनारंभ ☆

हेमन्त बावनकर 

☆ ई-अभिव्यक्ति में तकनीकी संवर्धन ☆ दिनांक 17 नवंबर 2023 से पुनः प्रकाशनारंभ☆

सम्माननीय लेखक एवं पाठक गण सादर अभिवादन,

हमारा प्रयास है कि हम समय-समय पर  सम्माननीय लेखकों एवं पाठकों के सुझावों पर अमल करने का प्रयास करें. जैसे आवश्यकता अविष्कार की जननी है वैसे ही सायबर युग में आवश्यकता तकनीकी संवर्धन की भी जननी होती है. आपकी अपनी प्रिय वैबसाइट www.e-abhivyakti.com को भी बदलते समय के स्वरूप के अनुसार तकनीकी संवर्धन की आवश्यकता थी । अतः दिनांक 25 अक्तूबर 2023 से www.e-abhivyakti.com में वैबसाइट के तकनीकी संवर्धन के कारण रचनाओं के प्रकाशन पर विराम था।

हमें प्रसन्नता है कि तकनीकी संवर्धन का कार्य अपनी पूर्णता की ओर है एवं हम दिनांक 17 नवंबर 2023 से पुनः प्रकाशनारंभ कर रहे हैं।  

मैं अभिभूत हूँ आपके अथाह प्रेम, स्नेह और ई-अभिव्यक्ति को इतना प्रतिसाद देने के लिए।आपसे सस्नेह विनम्र अनुरोध है कि आप ई-अभिव्यक्ति में प्रकाशित साहित्य को आत्मसात करें एवं अपने मित्रों से सोशल मीडिया पर साझा करें।  आपके विचारों एवं सुझावों की हमें प्रतीक्षा रहेगी।

ईश्वर की अनुकम्पा और आपका स्नेह ऐसा ही यथावत रहे। इसी कामना के साथ।

सस्नेह

हेमन्त बावनकर

पुणे (महाराष्ट्र)   

15 नवंबर 2023

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ई-अभिव्यक्ति – दीपावली अंक 2023 ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति ☆

ई-अभिव्यक्ति – दीपावली अंक – 2023

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय/कैप्टन प्रवीण रघुवंशी ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ई-अभिव्यक्ती (मराठी) – दिवाळी अंक २०२३ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

ई-अभिव्यक्ती (मराठी) – दिवाळी अंक – २०२३ 

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ विजयादशमी पर्व की हार्दिक शुभकामनायें ☆ ई-अभिव्यक्ति में तकनीकी संवर्धन ☆

हेमन्त बावनकर 

☆ विजयादशमी पर्व की हार्दिक शुभकामनायें ☆ ई-अभिव्यक्ति में तकनीकी संवर्धन ☆

सम्माननीय लेखक एवं पाठक गण सादर अभिवादन,

अक्टूबर माह ई-अभिव्यक्ति परिवार के लिए कई अर्थों में महत्वपूर्ण है।  इसी माह 15 अक्टूबर 2018 को हमने अपनी यात्रा प्रारम्भ की थी। मुझे यह साझा करते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि 5 वर्ष 9 दिनों के इस छोटे से सफर में आपकी अपनी वेबसाइट पर 5,30,000 से अधिक विजिटर्स विजिट कर चुके हैं। इन पंक्तियों के लिखे जाने तक 19,298 रचनाएँ प्रकाशित हो चुकी हैं। 

हमारा प्रयास है कि हम समय समय पर  सम्माननीय लेखकों एवं पाठकों के सुझावों पर अमल करने का प्रयास करें. जैसे आवश्यकता अविष्कार की जननी है वैसे ही सायबर युग में आवश्यकता तकनीकी संवर्धन की भी जननी होती है. आपकी अपनी प्रिय वैबसाइट www.e-abhivyakti.com को भी बदलते समय के स्वरूप के अनुसार तकनीकी संवर्धन की आवश्यकता है। अतः कल दिनांक 25 अक्तूबर 2023 से www.e-abhivyakti.com में एक सप्ताह के लिए वैबसाइट के तकनीकी संवर्धन हेतु रचनाओं के प्रकाशन पर विराम रहेगा। हम आपको पुनः प्रकाशनारंभ की सूचना से शीघ्र ही अवगत कराएंगे। 

आपसे सस्नेह विनम्र अनुरोध है कि आप ई-अभिव्यक्ति में प्रकाशित साहित्य को आत्मसात करें एवं अपने मित्रों से सोशल मीडिया पर साझा करें।  आपके विचारों एवं सुझावों की हमें प्रतीक्षा रहेगी।

मैं अभिभूत हूँ आपके अथाह प्रेम, स्नेह और ई-अभिव्यक्ति को इतना प्रतिसाद देने के लिए। ईश्वर की अनुकम्पा और आपका स्नेह ऐसा ही यथावत रहे। इसी कामना के साथ।

? विजयादशमी की हार्दिक शुभकामनाएं ? 

सस्नेह

हेमन्त बावनकर

पुणे (महाराष्ट्र)   

24 अक्टूबर 2023

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares