मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे ? ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे ? ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

परीक्षा केंद्रात पाऊल टाकेपर्यंत, अगदी स्कूलबसमध्ये बसल्यावरही त्यांची अभ्यासाची उजळणी चालूच होती. तसे ते चौघेही हुशार,आणि वर्गमित्रांच्या मदतीला धावून जाणारे असल्यामुळे  सगळ्यांचे लाडके होते. ड्रायव्हर काकांची गाडी भरधाव धावत होती .अचानक  स्कूल बसला हादरा बसला आणि सगळेच एकमेकांच्या अंगावर कोसळले. राकेश ओरडला,” काका प्लीज गाडी हळू घ्या ना जरा त्या आजींच्या जवळून गाडी गेली हो ” ड्रायव्हर काका नेहमी चिडलेलेच असायचे. राकेशच्या सूचनेवर ते कावले, ” अरे हळू घेऊन कसं चालेल ? परीक्षा आहे ना तुमची ? उशिर झाला तर  मला मेमो मिळेल. पण मी म्हणतो ही म्हातारी माणसं घरी बसायच सोडून बाहेर भटकतातच कशाला “?

“अहो पण काका..” राकेश  काही बोलणार होता, तोच  भरधाव धावणाऱ्या स्कूलबसच्या वेगाला  घाबरून  धक्का लागल्यामुळे  एक आजोबा चक्कर येऊन खाली पडले. राकेश ओरडला,  “ड्रायव्हर काका गाडी थांबवा आजोबांना भोवळ आलीय अहो ते पडलेत. प्लीज तुम्ही गाडी थांबवा. ” पण काकांनी गाडी थांबवलीच नाही उलट वेग वाढवत ते म्हणाले,    ” चुकी माझी नाही,तो म्हाताराच मधे आलाय .तोल सांवरता येत नाही तर कशाला बाहेर पडाव ह्या म्हाताऱड्यांनी ? त्यांच्याकडे बघतील बाकीची माणसं तुम्ही नका  त्यांच्या मधे पडू . तुम्ही तुमच्या परीक्षेचे बघा. ती महत्त्वाची आहे,आणि तुम्हाला वेळेवर पोहोचवलं नाही तर तुमचे आईबाप आणि शाळेचे मुख्याध्यापक माझी हजेरी घेतील.  तुमचही वर्ष वाया जाऊन नुकसान होईल, ते काय हा म्हातारा भरून देणार आहे का ?” वर्ष वाया जाईल या भीतीने बाकीची मुलही ओरडली, ” राकेश बरोबर आहे ड्रायव्हर काकांच  आपली परीक्षा महत्त्वाची आहे .पण काय रे ? तुझे कोण लागतात तेआजोबा ? तुला का एवढा पुळका आलाय त्यांचा” ? राकेशनी पाहयल वर्ग मित्रांशी वाद घालण्याची ही वेळ नाही .आजोबा रस्त्याच्या कडेला एकटे पडले होते  जवळून वाहने वेगाने पळत होती थांबायला कुणालाच वेळ नव्हता कारण माणसातली माणुसकीच नष्ट झाली होती. राकेश आणि त्याचे तिघं मित्र ओरडले, ” ड्रायव्हर काका प्लीज गाडी थांबवा. आम्हाला उतरु द्या ” असं म्हणून त्यांनी जबरदस्तीने स्कूल बस थांबायला लावली.गाडीला रागारागाने कचकन ब्रेक दाबले गेले. ती चौकडी खाली उतरून आजोबांकडे वेगाने धावली.तितक्याच वेगाने बस मुलांना परीक्षेला वेळेवर पोहोचवण्यासाठी पुढे निघाली. टवाळखोर मित्र म्हणाले, ” स्वतःला फार शहाणे समजतात हे चौघजण. महत्वाची परीक्षा बोंबलली यांची. आता बसा  घरच्यांचा मार खात “. 

पण हे ऐकायला राकेश आणि त्याचे  मित्र तिथे होतेच कुठे ! ते आजोबांजवळ पोहोचले.  एकाने पाणी मारून आजोबांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने त्यांच्या खिशातून मोबाईल काढला. हे काय ? आजोबांना मानल पाहिजे हं ! त्यांच्या खिशात छोटीशी डायरी त्यात महत्वाचे नंबर आणि घरचा पत्ता पण होता. पटकन मुलांनी फोन लावला तोपर्यंत रिक्षा आली.रिक्षांत आजोबांना बसवून जवळच्या हॉस्पिटलचा पत्ता,राकेशनी  मित्राला आजोबांच्या  घरच्यांना कळवायला सांगितला. पुढच्या घटना वेगाने घडल्या  घरचे आले आजोबांना ऍडमिट केल. डॉक्टर म्हणाले,” वेळेवर आणलंत तुम्ही.  पेशंटला मेंदूला थोडा मुका मार, धक्का लागला आहे.  उशीर झाला असता तर केस कोमात गेली असती, पण काही हरकत नाही आम्ही ताबडतोब उपचार सुरू करू.  काळजी करण्याचं  कारण नाही. आजोबा लवकर बरे होतील. “

हे ऐकल्यावर त्या चौघा मित्रांच्या चेहऱ्यावर सार्थकतेच हंसू ऊमटल. आजोबांच्या मोठ्या मुलाला राकेश म्हणाला, ” दादा आम्ही निघू कां आता ? आमचा महत्त्वाचा पेपर आहे.” दादा आश्चर्याने ओरडले, “अरे बापरे ! म्हणजे महत्त्वाची परीक्षा बुडवून तुम्ही माझ्या बाबांच्या मदतीला धावून आलात ? आमच्यामुळे तुमची वर्षभराची मेहनत वाया गेली. पण बाळांनो हेही तितकच खरं की वयाने लहान असून तुम्ही मोठ्या माणसांसारखे भराभर निर्णय घेऊन धावत पळत बाबांना  ॲडमिट  केलंत म्हणून तर पुढचं संकट टळल.  तुमच्या उपकाराची परतफेड मी कशी करू”? चौघजणं एकदम म्हणाले, ” नाही हो दादा आमचं कर्तव्यच होत ते”. त्यावर मुलांची पाठ थोपटत दादा म्हणाले, “बरं मला एक सांगा तुमची  नांव काय ?  शाळा कुठली? आणि हो मुख्याध्यापकांचे नाव काय ? दहावीचेच विद्यार्थी आहात ना तुम्ही ? कुठल्या तुकडीत आहात ?उत्तरं देताना, त्या चौकडीच्या ध्यानात आलं ..  बाप रे !परीक्षेची वेळ संपत आलीय.कडक  शिस्तीचे, नियमांचे काटेकोर, शिस्तप्रिय असलेले मुख्याध्यापक आपल्याला वर्गात काय परीक्षा केंद्रातही शिरू देणार नाहीत या भीतीने ते पळत सुटले. 

आता त्यांच्यापुढे संकट उभं  राहिलं होत ,परीक्षकांना आणि घरच्यांना काय उत्तर द्यायचं ? परीक्षेतल्या प्रश्नापेक्षाही मोठा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता.सगळेजण त्यांना मूर्ख, महत्त्वाच्या परीक्षेच्या बाबतीत बेजबाबदार, आणि नसते उपद् व्याप  करणारे असेच लेबल लावणार होते.कारण परीक्षेची वेळ संपली होती त्यांचा पेपर बुडाला, आणि त्यांना परीक्षकांनी घरी पाठवलं होतं.चौघ जण हताश झाले.आजोबांना मदत करायला धावलो ते बरोबर की चूक हेच मुलांना कळेना.राकेश म्हणाला “आता आपल्याला दोष देणारेच भेटतील. मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष द्याल तर अजून निराश व्हाल.आपण वाईट  काम तर केलं नाही ना,मग मन शांत ठेवून  पुढच्या उद्याच्या पेपराचा विचार करूया.कालचा पेपर गमावल्याचं दुःख सोडून आपण आता पुढच्या पेपरात यश नक्की मिळवूया कारण कालची गेलेली वेळ आता परत येणार नाही.  आणि मग दुसऱ्या दिवशी कसंबसं एकमेकांना सावरत ते परीक्षा केंद्राजवळ आले. 

आज जरा लवकरच आले होते ते . इतक्यात त्यांना सूचना मिळाली मुख्याध्यापकांनी ऑफिसमध्ये बोलावलय. चौघेही गांगरले.परीक्षेबद्दलच असणार,सरांना वाटलं असेल पोरांनी बाहेर उपदव्याप करून बेमुर्वतपणे पेपर टाळला आहे .पुढे रामायण काय महाभारत घडणार, ह्या भीतीने ती मुल खालच्या मानेनी आत शिरली. मुख्याध्यापकांपुढे त्यांचं काहीही चालणार नव्हतं. कितीही कशीही आपली बाजू मांडली तरीही कुणी ऐकून घेणार नव्हतं . इतक्यात मुलांच्या कानावर आवाज आला, “हो सर हीच ती मुलं   यांच्यामुळेच  आमचे बाबा वाचले.” चमकून चौघांच्या खालच्या माना वर झाल्या.अरेच्चा ! हे तर कालच्या आजोबांचे चिरंजीव. हे कसे काय इथे ? मुख्याध्यापकांकडे मुलांनी घाबरून बघितलं तर–अहो आश्चर्यंम! ते गालांतल्या गालांत हसत होते  नेहमीच्या करड्या नजरेत आता कौतुक होत. मुख्याध्यापक म्हणाले, ” घाबरू नका, तुम्ही उनाड  आहात अशी तुमच्या हितशत्रूंनी माझ्याजवळ तक्रार केली होती. म्हणून मी तुमच्यावर  नेहमी आग पाखडत होतो. पण माझ्या लक्षात आलं आहे ..  कान आणि डोळ्यांच्या मध्ये एक विताच अंतर असतं .तुम्हाला उनाड म्हणून पदवी मिळाली असली तरी तुमचा कालचा उपक्रम कौतुकास्पदच आहे. या आजोबांच्या चिरंजीवांनी सगळी हकीकत मला सांगितली. तुमच्यामुळे त्यांच्या बाबांवरच मोठ्ठ संकट टळलं.अडचणीत असलेल्या आजोबांच्या मदतीला तुम्ही धावलात खूप मोठी कामगिरी केलीत.डॉक्टरांनी पण तुमच खूप कौतुक केलय . उद्याचे आदर्श नागरिक आहात तुम्ही. असे कर्तव्यनिष्ठ  विद्यार्थी माझ्या शाळेत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटला.”.

या कौतुकाने मुलं संकोचली पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली उमटली, कालचा पेपर बुडाल्याच दुःख होत त्यांच्या मनात.आता ते दादा पुढे झाले आणि म्हणाले,” बाळांनो परीक्षा फक्त शाळेतच द्यायची असते असं नाही,जसे तुम्ही वयाने मोठे व्हाल तशी अनुभवाची परीक्षाही तुम्हाला भावी आयुष्यात द्यावी लागेल. जगाच्या पाठशाळेतील पहिली परीक्षा माझ्या बाबांचा जीव वाचवून तुम्ही पार पाडलीत,पण तितकीच शालेय परीक्षाही महत्त्वाची आहे हे मी जाणतो.  पण आमच्यामुळे तुमचा कालचा महत्त्वाचा पेपर बुडला  मला खंत वाटली तुमच्या महत्त्वाच्या वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी आज मुद्दाम तुमच्या मुख्याध्यापकांना कालची परिस्थिती निवेदन केली आहे, तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी द्यावी अशी विनंती करायला मी आलो होतो, आणि मुख्य म्हणजे  सरांनी ती मान्यही केली आहे. 

मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन सर म्हणाले, ” हो या साहेबांच्या तोंडून मी कालचा प्रकार ऐकला आणि मलाही अभिमान वाटला तुमचा. अभ्यासाची तुमची मेहनत वाया जाणार नाही.  परीक्षा देण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल अशी मला खात्री आहे. पण आता आजचा पेपर द्या आणि यशस्वी व्हा. पळा आता ! ती चौकडी पळायच्या आवेशात  होती तर दादांचा आवाज त्यांच्या कानावर पडला  “तुम्हाला  best -luck रे बाळांनो, पास झाल्यावर आजोबांना पेढे द्यायला विसरू नका हं! राकेश पळता पळता ओरडला,” हो नक्की काका, आजोबांचे आशिर्वाद आम्हाला हवे आहेतच.” 

मुलांनी पुढचं पाऊल टाकल.  आता त्यांचं पाऊल पुढे आणि पुढेच पडणार होतं. प्रगतीपथावर, मोठ्यांच्या आशीर्वादावर, आणि यशाच्या मार्गावर ते उत्साहाने धावणार होते.                  

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जत्रेतील नाटक…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जत्रेतील नाटक —” ☆ सुश्री शीला पतकी 

माझ्या गावी हन्नूर अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी अक्षतृतीयानंतर गावची जत्रा भरत असे आमच्या या छोट्या गावाचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर त्या शिवाय गावात मुस्लिम वसाहत भरपूर त्यामुळे त्यांचा देव लगीनशा वली तसेच गावात भुताळसिद्धाचे आणि पांडुरंगाचे देऊळ नदीच्या उतारावरून जाण्यापूर्वी चावडीच्या शेजारी दोन पीर…. ही साधारणपणे माथा टेकण्याची देवळे… 1974 सालापासून सिद्धेश्वर आणि लगीनशा वली यांची जत्रा अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या गुरुवारी भरते ती साधारणपणे तीन दिवस असते गुरुवार शुक्रवार शनिवार जत्रेसाठी बरीच मंडळी एकत्र येतात. नातेवाईक येतात आसपासच्या गावचे लोक येतात ..एकूण वातावरण सणाप्रमाणे असते. गावांमध्ये त्यावेळी असलेल्या तरुण मुलांमध्ये आत्ताचे तडफदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याण शेट्टी हे गावाच्या विकासासाठी धडपडत असत त्यांनी जत्रेमध्ये नाटक बसवण्याची कल्पना मांडली ती सर्वांनी उचलून धरली त्या काळात नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नसत खेडेगावातन तर नाहीच ! मग पुरुष पार्टीतीलच काही लोकांना स्त्री पार्टी बनवले जायचे

तिसऱ्या दिवशी हा नाटकाचा कार्यक्रम असे. हिंदू मुस्लिम सर्वच जत्रेमध्ये आनंदाने सहभागी  होत असत पांडुरंगाच्या सप्त्याला बाशा मुल्ला सरपंच पुढे होऊन सर्व कार्य पार पाडीत तर कित्येक हिंदू घरामधून पिराला नैवेद्य जाई असे हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर गाव… दीड दोन हजार लोकसंख्या.. गावाला सुंदर देखणी स्वच्छ हरणा नदी वाहत असे …गाव सुखात होत! माणसाचे नाते सुखाशी असले की मग ती रसिक होतात आणि कलांकडे वळतात तसं या गावातल्या मंडळींनी नाट्यकलेकडे आपला मोर्चा वळवला .गावातील हौशी कलावंतांनी यात भाग घेतला होता नाटकाचे नाव होते भगवा झेंडा योगायोगाने मी सेवासदन येथे नुकतीच शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आपल्या गावची मुलगी शिक्षिका झाली याचा अभिमान होता त्यांनी मला अध्यक्ष म्हणून बोलवले आमचे घरच तेथे होते त्यामुळे काही प्रश्नच नव्हता माझे काका श्री रामचंद्र पत्की हे तेथे वास्तव्याला होते मोठा वाडा होता शेती होती त्यामुळे आमचे हन्नूर ला येणे जाणे भरपूर होते मी तात्काळ निमंत्रण स्वीकारले सकाळी गावाला पोहोचले काकू ने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला स्टेज आमच्या घराच्या जवळच होते स्टेजच्या पाठीमागे रंगपट होता तिथेच मेकअप वगैरे कपडे बदलणे अशा सोयी होत्या आमच्या घरातून हे सगळं दिसत होतं साधारणपणे तीन चार वाजताच रंगपटाची पूजा होऊन आत मध्ये स्त्री पार्टी जे आहेत त्या पुरुषांचे केस कमी करणे दाढीकटिंग मिशा काढण्यासाठी न्हावी हजर झाला ..तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण कसे दिसतोय ते वारंवार आरशात पाहत होते… त्यानंतर तोंड रंगवणे हो हो अगदी रंगवणेच असते भुवया कोळशाने कोरून काळ्या  करणे ओठाला लाल करण्यासाठी हिंगूळ लावणे त्याचेच पावडरमध्ये मिश्रण करून गालावर लाली आणणे आता काळ्या रंगाला गोरं करून त्यावर लाली  म्हणजे मेकअप मनचे  कौशल्य होते… त्यानंतर नाटक ऐतिहासिक असल्यामुळे त्या प्रकारची ड्रेपरी परिधान करणे शिवाजी महाराजांची दाढी.. मिशा ..टोप अंगरखा तलवारी मावळे हे सगळे तयार झाले… इथं पर्यंत  सात वाजले सात नंतर स्टेजची पूजा माननीय सरपंच यांच्या हस्ते झाली स्टेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांना एकीकडे भगवा झेंडा तर दुसरीकडे हिरवा झेंडा लावलेला होता खऱ्या अर्थाने सद्भावना होती ती राष्ट्रीय एकात्मतेची …!त्यानंतर बत्त्यांची सोय झाली बत्त्या अडकवण्यात आल्या समोरच्या मैदानावर पाली टाकल्या गेल्या मधल्या वयाची तरणी पोर मेकअपच्या पाली असलेल्या खोलीला भोकं पाडून पाडून आत डोकावत होती स्त्री पार्टी कशा दिसतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती नाटकासाठी संगीत म्हणून एक पाय पेटी शेजारी असलेल्या वागदरी या गावांमधून डोक्यावरून चालत उचलून आणावी लागायची ती तशी आणली कारण एसटीमध्ये आणली तर तिच्या पट्ट्या निखळण्याची शक्यता असते ही पायपीट सुद्धा अनेक तरुण करतात ती पेटी आणि डग्गे आणि तबला झांज यावर सर्व म्युझिक अवलंबून होते…

तयारी जय्यत झाली नाटकाची अनाऊन्समेंट झाली नावे घोषित झाली प्रत्येक नावाला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि नंतर नाटकाचा पडदा उघडला मागे दरबाराचा सीन बागेचा सीन दऱ्याखोऱ्याचा सीन असे पडदे होते ते वरून सोडण्याची व्यवस्था होती नाटकाच्या कथानका प्रमाणे सिन पुढे जात होते स्त्री पार्टीचे आगमन झाले की लोकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या….. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले की…. जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा असे पिटातल्या नाटकासारखे लोक नाटक एन्जॉय करत होते…. युद्धाचा प्रसंग चालू झाला की मागे पायपेटी आणि तबला डग्गा याच्यावरती सगळे आवाज काढले जायचे घोड्याचे टापाचे आवाज डग्यावर वाजवले जायचे एखादा शिवाजी महाराजांचा सरदार मुस्लिम सरदाराच्या छाताडावर वर पाय रोवून तलवारीने त्याची मान उडवतो अशी एक्शन करी त्या वेळेला झांज वगैरे जोरात वाजायची…. प्रेक्षकांमध्ये टाळ्या शिट्ट्या आणि घोषणा …वाद्याचे आवाज दुपटीने वाढायचे आणि तो सीन तिथे थांबायचा.  प्रेक्षकांमधून त्या प्रसंगाला वन्स मोअर यायचा आणि वेगवेगळ्या नावाने बक्षीस पुकारले जायचे  बक्षीस साधारणपणे एक रुपयापासून पाच रुपये पर्यंत असे हा कार्यक्रम साधारणपणे दर पंधरा मिनिटांनी होत होता बक्षीस देणारा माणूस प्रत्यक्ष स्टेजवर येऊन बक्षीस देत असे मागे पुन्हा वाद्य आणि समोर टाळ्या साधारण नाटक एक तासभर पुढे गेलं की ते थांबत असे आणि स्त्री  पार्टी करणाऱ्या पात्राला त्याच्या सासुरवाडीकडून पूर्ण आहेर व्हायचा म्हणजे त्याच्या ओरिजिनल बायकोला शेजारी बसवायचे, स्टेजवर पाट टाकले जायचे, मग सासूरवाडीची मंडळी नवरा बायकोला आहेर करायचे गंमत म्हणजे स्टेजवर पाटावर बसलेली दोन्ही मंडळी साडी या वेषातच असे. टॉवेल टोपी धोतर सदरा, त्याच्या बायकोला उत्तम लुगडे म्हणजे साडीचोळी असा आहेर व्हायचा काही हौशी अर्ध्या तोळ्याची अंगठी सुद्धा घालत असत जावयाला कारण त्याने नाटकात स्त्री पार्ट केला आहे म्हणून.  अशा पद्धतीने आहेर बक्षीसे आणि वन्स मोअर असे नाटक पहाटपर्यंत चाले माझ्या काकांनी… माझ्या मुलीला उद्या कामाला जायचे तिचे भाषण आटोपून घ्या असे सांगितल्यामुळे मला स्टेजवर बोलवण्यात आले माझे भाषण झाले माझ्या हस्ते काही बक्षीस वाटण्यात आली ती बक्षीसे वाटत असताना मध्येच एक फेटेवाले गृहस्थ उठले आणि त्याने अध्यक्षरू  छलो भाषण माडिदरू अद्रसलवागे ऐद  रुपये बक्षीsssस …..आणि टाळ्यांचा कडकडाट म्हणजे अध्यक्षांनी उत्तम भाषण केल्याबद्दल पाच रुपये बक्षीस मी कपाळावर हात मारून घेतला आज तागायत कुठल्याही अध्यक्षाला  प्रेक्षकाकडून असे पाच रुपयाचे बक्षीस आले नसेल पण मला ते मिळाले आणि गावात ते नाकारता येत नसते तो त्यांचा अपमान होतो त्यामुळे मी मुकाट्याने ते घेतले अशा पद्धतीने नाटक रात्रभर चालायचे शिवाजी महाराज लढाई जिंकायचे तेव्हा अख्खा गाव जल्लोष करायचा त्यावेळेला हिंदू मुसलमान हे त्यांच्या डोक्यात येत नव्हतं आज मात्र हे सार दुर्दैवाने बदलले आहे

…नाटकाच्या मध्ये विश्रांती काळात रंगपटात चहा जायचा तिथे अध्यक्षाला ही चहा घ्यायला बोलवायचे पुरुष पात्र आपल्या झुपकेदार मिशा संभाळत चहा प्यायची तर तलफ आलेली स्त्री पार्टी थोडसं तोंड वळवून मस्त बिडीचा झुरका घेत बसलेले असायचे मला या सगळ्या दृश्याचे आजही हसू येते ….पण खर सांगू खेडेगावातल्या नाटकांनी आपली नाट्यकला जिवंत ठेवली तिचा आनंद उपभोगला आज सर्वत्र भव्य स्टेज भपकेबाज लाइटिंग विविध तंत्रज्ञानाचा उपयोग एसी थिएटर या सगळ्या सोयी मध्ये पाचशे रुपयाचे तिकीट काढून लोक नाटक पाहतात पण ही मजा नाही हा सर्व गावरान बाज माणसाला निखळ आनंद देऊन जात असे नाटक पहाटे संपायचं त्यावेळेला लहान लहान पोरं पालीवर कुठेतरी झोपलेली म्हातारी माणसं आडवी झालेली बाया बापड्या घराकडे परतलेल्या कार्यकर्ते मंडळी स्टेजच्या विझू पाहणाऱ्या बत्त्या मेंटल गेलं का रॉकेल संपलं याचा शोध घेत हिंडायचे मग स्टेज आवरलं की तिथेच मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर मंडळी झोपून जायचे आणि मग या नाटकाचे पडसाद आणि गुणगान आसपासच्या गावागावातून कितीतरी दिवस चालायचे एखाद्या जत्रेतल्या फोटोग्राफरला बोलवून काढलेला फोटो त्यांच्या घराघरातून खांबाला लटकवलेले असायचे आणि त्या घराला वाटायचे की आपल्या घरात जणू नटसम्राट आहे घरातली माणसं फार भक्ती भावाने आणि अभिमानाने त्या फोटोकडे पाहत राहायचे आणि आल्या गेलेल्यांना त्या नाटकाची वर्णन सांगायची…. मंडळी खेड्यातलं असलं भन्नाट नाटक अनुभवायचे दिवस संपले. ज्यांनी ते अनुभवलं ते समृद्ध झाले या नाटकाची …त्याच्या तयारीची हजामत करणाऱ्या पासून सुरू झालेली त्याची तयारी ..ती बक्षिसे ते आहेर ती वाद्य …रंगपटात ओढल्या गेलेल्या  बिड्या.. मिशी सांभाळत प्यालेला चहा ..ऐनवेळी म्यानातून न निघालेल्या त्यांच्या गंजक्या तलवारी सगळं काही अफलातून …..! याची मजा ज्यानी घेतली ते धन्य …!! हे सगळं आठवलं की आज म्हणावसं वाटतं ….असं असतं  नाटक राजा … देखण  सुरेख निरागस आणि सुंदर निखळ मनोरंजन करणार…….!!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे  ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे  ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

कृष्णा…कसलंही वलय नसलेली नदी..गंगेइतकं तिला आध्यात्मिक महत्त्व नाही, साधुसंन्याशांना तिची ओढ नाही.यमुनेसारखी रासलीलेची अद्भुत कहाणी तिच्या काठावर नाही,की जगातलं कुठलंही आश्चर्य पाहायला लोक तिच्या काठी येत नाहीत.नर्मदेसारखी कुणी तिची परिक्रमा करीत नाही….या कृष्णेच्या काठावरची सांगलीही तशीच.साधीसुधी…खरं म्हणजे किती मोठी माणसं तिच्या अंगाखांद्यावर खेळली आहेत.पण तिला त्यांच्याबद्दल प्रेम आहे.गर्व नाही.

सांगली..नाट्यपंढरी ! पहिलं मराठी नाटक विष्णूदास भावेंनी सांगलीत सादर केलं.आजही त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या कारकीर्दीत मानाचा क्षण असतो.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल यासारखे नाटककार सांगलीचे.

खाडिलकर हे नाव संगीतासाठीही प्रसिद्ध! महान गायिका इंदिराबाई खाडिलकर, आशा खाडिलकर इथल्या. आज त्यांची नात वर्षा खाडिलकर (भावे) गायकगायिकांची नव्या पिढ्या  घडवतेय आणि त्यांना जुन्या सांगीतिक वारशाशी बांधून ठेवतेय. 

बालगंधर्व मुळात सांगलीच्या नागठाण्याचे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, श्री.दा. पानवलकर, कवि सुधांशू, श्रीनिवास जोशी यासारखे अनेक साहित्यिक सांगलीने दिले. नाटककार वसंत कानेटकरांचे वडील कवि गिरीश सांगलीत होते. गरवारेंसारखे उद्योजक सांगलीतच जन्मले आणि पार लंडनला गेले. पारतंत्र्याच्या काळात त्यांनी ब्रिटिश नोकर म्हणून ठेवले. आणि चितळेंची दूध उत्पादने सांगलीत भिलवडीलाच होतात. सराफ बाजारातील अत्यंत विश्वासू नाव पु. ना. गाडगीळ सांगलीचे.त्यांच्या पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील दुकानातही सांगलीच्या राजेसाहेबांचा आणि राणीसाहेबांचा फोटो आहे. 

संपूर्ण हिदुस्थानात प्रसिद्ध असलेली तंतूवाद्ये तयार होतात सांगलीच्या मिरजेत.

आजच्या काळातील क्रिकेटियर स्मृती मानधना सांगलीची.

पण खेळांची परंपरा सांगलीत पूर्वीपासून आहे.इथे मुली उत्तम मलखांब खेळतात. माधवनगरसारख्या सांगलीच्या छोट्या गावात मुलींनी कबड्डीमधे परदेशात नाव कमावलं होतं आणि त्यांचा कोच त्या काळीही एक तरूण मुलगा होता. त्याच्याबरोबर मुली अतिशय सुरक्षित होत्या. मुलींचं झाडावर चढणं,मैदानी खेळ खेळणं माधवनगरला नवं नाही.पण ते इतकं साहजिक होतं,की ‘मुलगी असूनसुध्दा ‘असं कधी कुणी म्हणायचंही नाही…सांगलीतल्या बुधगाव या छोट्या खेड्यात एक स्त्री शाहीर होत्या,ज्यांनी महाराष्ट्राबाहेरही आपल्या डफाची थाप वाजवली होती. यांच्यापैकी कुणीही स्त्री स्वातंत्र्याचा खास डंका मात्र वाजवला नाही. स्त्रीत्वाचे सगळे गुणधर्म, नियम मर्यादा पाळून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात बिनधास्त मुशाफिरी केली त्यांनी..कोणताही आव न आणता.अशा खूप गोष्टी सांगता  येतील. नावं घेता येतील.हळद, द्राक्षं यांच्या उत्पादनात सांगलीच आजही प्रथम क्रमांकावर आहे.

शहराच्या सोयी असलेलं हे छोट्या गावाचं फीलिंग देणारं शहर मला नेहमीच त्याच्या साधेपणानं मोहवतं. हा साधेपणा इथल्या माणसांमधेही मुरलाय. यांना स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आहे..गर्व नाही..किंबहुना..कसलाही आव नाही हेच यांचं वैशिष्ट्य! सांगलीकरांना आपल्या गावाबद्दल प्रेम आहे,पण इतर गावांबद्दलही आदर आहे.

माझ्या मुलाचं लग्न जमवताना एक सांगलीचं स्थळ आलं होतं.काही कारणानं आपला योग नाही हे सांगायला मी मुलीच्या आईला फोन केला आणि म्हटलं,”तुम्ही काळजी करू नका. हा योग नसला,तरी खूप छान जोडीदार मिळेल तिला. तिला खूप शुभेच्छा.”

त्या पटकन म्हणाल्या,”तुम्हीपण सांगलीच्या ना?” “हो.” मी म्हटलं.

त्यावर त्या म्हणाल्या,”सांगलीत आलात कधी तर आमच्याकडे जरूर या.माहेरवाशीण म्हणून या.” ज्या बाईशी आपला संबंध येणार नाहीये,तिला असं निमंत्रण सांगलीतून सहज मिळू शकतं……

…२००५ चा पाऊस! कधी नव्हे ते कृष्णेनं मर्यादा सोडली.एरवी पूर आला,तरी आततायी बाईसारखं थैमान घालणं हा तिचा स्वभाव नाही. तिच्या काठच्या लोकांना ती आईच वाटते.पण ते वर्ष वेगळं होतं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरात पाणी शिरू लागलं. साठवणीतलं सगळंच धान्य ती घेऊन जाणार हे दिसत असूनही तिनं पटकन दोन मुठी तांदूळ,एक खण, नारळ घेऊन कृष्णेची ओटी भरली.आम्हाला सहज साध्या श्रध्देनं नंतर हे सांगताना ती म्हणाली,”अगं,कृष्णामाई एवढी दारात आली,तसंच कसं पाठवायचं तिला?” तिच्या या भावनेत सांगली आहे.

माझ्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं.ती तेव्हा महिला मंडळाचा एकपात्री प्रयोग बसवत होती. तिनंच लिहिलेला.दोनतीन जणी दुपारी प्रॅक्टिसला येणार होत्या.मी आईच्या ऑपरेशनसाठी माहेरी होते. आईच्या मैत्रिणींसाठी काही करावं म्हणून मी उठले,तर एकजण म्हणाल्या,”हे बघ,मी लिंबू सरबताचं मिक्श्चर करून आणलंय.तू फक्त पाणी घालून दे.” ” तुम्ही कशाला आणलंत मावशी?” म्हटल्यावर त्या म्हणाल्या,”अगं,आमच्या सगळ्यांसाठीच तू माहेरवाशीण. आईची सेवा कर..पण आम्ही नको का मदत करायला?”या प्रेमात सांगली आहे.

माझी मैत्रिण नीता जोशी आकाशवाणीवर बरीच वर्षं काम करत होती.आताही एका एनजीओ ने चालवलेल्या रेडिओ स्टेशनची डायरेक्टर आहे.अंगात असंख्य कला असणारी ही …एका प्रोग्रामसाठी मुंबईत गेली.”आपलं खास वैशिष्ट्य दिसेल अशी वेषभूषा असूदे ..” हा आदेश होता.

ती जशी नेहमी राहते,तशीच गेली..साडी,लांबसडक एक वेणी,हातात बांगड्या,कुंकू…अर्थातच पहिल्यांदा माॅडर्न पोषाखातल्या लोकांनी लक्ष दिल नाही.तिचं प्रेझेंटेशन झालं आणि तिच्याभोवती गराडा पडला..आम्हाला माहितच नाही तुमचं टेक्निकल नाॅलेजही साॅलिड आहे हो…असं म्हणत.

तिचं म्हणणं,”मी ठरवलं होतं, माझा साधेपणा हेच माझं वैशिष्ट्य! वेगळा मेकओव्हर मी करणार नाही.” तिच्या या साधेपणात सांगली आहे.

मुंबईला तिच्या गतीचा अभिमान आहे,आर्थिक सत्तेचा झगमगाट,बाॅलिवूडचा लखलखाट आहे..

पुण्याला पुणं सोडून भारतातलं सारंच कमी दर्जाचं वाटतं..

विदर्भाला आपल्या वैदर्भीय संस्कृतीचा..खाद्य पदार्थांचाही गर्व आहे.

सांगलीचे वैशिष्ट्य एवढंच,की तिला कुठलीच गोष्ट म्हणजे आपलं वैशिष्ट्य वाटत नाही..तिला सगळ्याच गावांचं कौतुक आहे. तिच्या मते असतातच की माणसांमधे कमीजास्त गुण…आणि दोषसुध्दा. साधेपणा, सहजता हेच तिचं वैशिष्ट्य!

लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

पुणे

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “काकतालीय न्याय…” – लेखक : श्री उमेश करंबेळकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “काकतालीय न्याय…” – लेखक : श्री उमेश करंबेळकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही, केवळ योगायोगाने तसे घडलेले असते. त्यावरूनच तो वाक्प्रचार रूढ झाला. संस्कृतमध्ये त्याला काकतालीय न्याय असे म्हणतात.

काक म्हणजे कावळा, तर ताल म्हणजे ताड वृक्ष. ताल याचा फांदी असा अर्थ शब्दकोशात नाही. त्यामुळे काकतालीय न्यायाचा योग्य अर्थ कावळा बसायला आणि ताल वृक्ष कोसळायला एक वेळ येणे असा म्हणायला हवा. मात्र मराठीत ताडाऐवजी फांदी असा शब्दभेद झाला.

ताल या संस्कृत शब्दाचे टाळी, तळहात, तसेच ताल (ठेका) असेही अर्थ कोशात दिले आहेत. त्यामुळे काकतालीय न्यायाचा, टाळी वाजवावी आणि त्यात कावळा सापडावा असाही अर्थ होऊ शकतो. तशा अर्थाचा वापर ज्ञानेश्वरांनी केला आहे. ज्ञानेश्वरीतील सतराव्या अध्यायातील

‘विपाये घुणाक्षर पडे । टाळियां काऊळा सापडे ।

तैसा तामसा पर्व जोडे । तीर्थ देशी ॥१७.३०१’

ह्या ओवीत तो आढळतो.

त्या ओवीचा अर्थ मामासाहेब दांडेकर असा देतात, की ‘घुणा नावाच्या किड्याकडून लाकूड कोरताना नकळत अक्षरे कोरली जावीत अथवा टाळी वाजवताना तीमध्ये जसा क्वचित कावळा सापडावा, त्याप्रमाणे तमोगुण्याला पुण्यस्थळी पर्वकाळाची संधी क्वचित प्राप्त व्हावी.’

ती ओवी तामस दानासंदर्भात आहे. ओवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात घुणाक्षर आणि काकतालीय असे दोन्ही एकाच अर्थाचे न्याय दृष्टांत म्हणून दिले आहेत. दोन्हींचा अर्थ यदृच्छेने म्हणजेच योगायोगाने एखादी गोष्ट घडणे असा आहे. पैकी घुणाक्षर न्यायाचा उल्लेख स्पष्ट आहे, तर दुसरा ज्ञानेश्वरांनी वेगळ्या अर्थाने वापरलेला काकतालीय न्यायच आहे. ज्ञानेश्वरांनी हा वेगळा अर्थ योजण्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असावा असे मला वाटते. ज्ञानेश्वरांनी केलेली योजना अधिक अर्थपूर्ण आहे. ताल म्हणजे ठेका. संगीतात सुरांइतकेच तालालाही महत्त्व असते. आरतीसारख्या गायनातदेखील टाळी वाजवून ठेका धरला जातो. लेखन आणि संगीत ही दोन मानवाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. मानवाशिवाय इतर कोणताही प्राणी लेखन आणि संगीत निर्माण करू शकत नाही. त्या ओवीत तामसदानाचे वर्णन आहे. दान हादेखील मानवी गुणधर्म आहे. त्यामुळे त्यासंबंधीचे दृष्टांतदेखील मानवी जीवनाशी संबंधित असले पाहिजेत. कावळा बसला आणि फांदी तुटली काय किंवा ताड वृक्ष कोसळला काय, माणसाच्या जीवनात काय फरक पडतो? त्या उलट सहज टाळी वाजवावी आणि त्यात कावळ्यासारखा चाणाक्ष पक्षी सापडावा, ही माणसाच्या दृष्टीने योगायोगाने घडणारी गोष्ट ठरते. म्हणूनच, काकतालीय न्यायाचा ज्ञानदेवांचा अर्थ हा अधिक सूचक वाटतो. ज्ञानदेवांची अलौकिक प्रतिभा अशीच ठायी ठायी दिसून येते.

लेखक:श्री.उमेश करंबेळकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆“रामराज्य…” – लेखक : श्री संदीप सुंकले ☆ परिचय – श्री अविनाश सहस्त्रबुध्दे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रामराज्य…” – लेखक : श्री संदीप सुंकले ☆ परिचय – श्री अविनाश सहस्त्रबुध्दे ☆

पुस्तक – रामराज्य

लेखक- संदीप सुंकले,

सम्पर्क- 8380019676

प्रकाशक- संकल्प प्रकाशन, अलिबाग.

पृष्ठ –  ६४, 

मूल्य- ₹ १००

रामराज्याच्या दिशेने सम्यक पाऊल टाकण्यासाठी…

दैनंदिन जीवनात जगत असताना अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव आपल्याला येतो. एखादी वाईट घटना आपल्याला दिसली की घोर कलियुग असे म्हणत कलियुगाकडे बोट दाखवत आपण आपले नैराश्य अधिक वाढवतो. रामावर भरवसा असणारे आणि जे काही होते ते रामाच्या इच्छेने होते असे म्हणत त्या वाईट घटनेचा क्षण आपल्या मनःपटलावरुन हद्दपार करतात. पण चिंताक्रांत मंडळी रामराज्य कधी येणार, असा विचार करीत वर्तमानात जगण्याऐवजी रामराज्याची प्रतीक्षा करणेच पसंत करतात. पण रामराज्य म्हणजे काय, हे जाणून घेण्याचीदेखील आवश्यकता आहे.

श्री संदीप रामचंद्र सुंकले

आपल्या अंतरमनातील रामाला आपण कधीच स्मरत नाही, दुसऱ्या व्यक्तीतील ह्रदयस्थ रामालाही आपण धूडकावून लावतो. हे सगळे होऊ नये आणि रामराज्य नक्की काय होते, हे समजावे यासाठी एका रामभक्ताने रामराज्य या छोटेखानी पुस्तिकेचे लेखन केले आणि ते जनमानसात पोहचावे म्हणून त्या दासचैतन्याची धडपड सुरु आहे.

गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित असणारे दासचैतन्य म्हणजेच संदीप सुंकले यांची ओघवती, मृदु पण तेवढीच स्पष्ट असलेली भाषा रामराज्याची महती सांगते. लवकुशांनी सांगितलेल्या प्रभु रामचंद्रांच्या महतीबाबत आपण सर्वजण जाणतोच. त्या रामरायांचे रामराज्य कसे होते, हे श्री. सुंकले त्यांच्या सिद्धहस्त लेखणीद्वारे प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहचवतात.

शुद्ध आहार-विचार-आचार म्हणजे रामराज्य, शुद्ध आस-ध्यास-व्यास म्हणजे रामराज्य, शुद्ध जल-स्थल-बल म्हणजे रामराज्य, शुद्ध भावना-कल्पना-वासना म्हणजे रामराज्य, शुद्ध मन- तन-धन म्हणजे रामराज्य, शुद्ध वर्ण-कर्म-धर्म म्हणजे रामराज्य, शुद्ध जांबुवंत-हनुमंत- नलनील म्हणजे रामराज्य, शुद्ध राम-सीता-लक्ष्मण म्हणजे रामराज्य, शुद्ध कुटुंब-समाज-राष्ट्र म्हणजे रामराज्य असे नऊ लेख म्हणजे रघुकुळातील सात्विकतेची बीजे आहेत. केवळ दहाच लेख आणि प्रत्येक लेखातील ओजस्वी भाषा, ज्यातून रामराज्याची संकल्पना अधिक समृद्धतेने उलगडत जाते. शुद्धता, निर्मळपणा आणण्यासाठी जर काही आवश्यक असेल तर ते म्हणजे प्रयत्न. ज्या प्रयत्नांबद्दल समर्थ रामदासांनी दासबोधात अनेकदा सांगितले आहे. मूल्यधिष्ठित आचरण करणारे नागरिकांच्या सहाय्याने रामराज्य येऊ शकते. रामराज्य आणायचे असेल तर भौतिक सुखाच्या मागे धावणे सोडण्याची गरज आणि भोगांपुढे लोटांगण न घालणेच अधिक श्रेयस्कर असल्याचे लेखक सुचवतात.

बारामतीच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. रेवती राहुल संत यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रभु रामचंद्रानी  तुमच्याआमच्यातील अवगुणांवर केलेला शस्त्राघात आहे. सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीकडे पाहताना येणारे नैराश्य स्वाभाविकच आहे, पण ते नैराश्य, मरगळ झटकून  रामराज्य येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज लेखकाने अधोरेखीत केली आहे.

रामराज्यातील विचारांमधील सौम्यता आणि आधुनिक काळात परिस्थीतीत झालेला बदल यावर टोकदार भाष्य करताना श्री.सुंकले यांनी विज्ञानाची कास सोडलेली नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे. संस्कार, संस्कृती यांच्याबद्दलचा विचार करीत असतानाच विचार-भावना-वर्तन यावर मानसशास्त्रीय अंगाने केले जाणारे भाष्य करताना समर्थांच्या मनाच्या श्लोकाबद्दलही लेखक भाष्य करतात. रामराया म्हणले की समर्थांचे अनुषंगिकपणे तेथे येणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीतील प्रयत्नाबरोबरच, विवेक, वैराग्य, वृत्ती-बदल या बाबीही लेखक उद्धृत करतात. मनाचे श्लोक आणि मनापासून करण्याची सुधारणा त्यांनी वेळोवेळी या रामराज्य पुस्तकात मांडली आहे. 

प्रभु रामचंद्राबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल लिहित असताना लेखकाने त्यांच्या दासाचा म्हणजेच मारुतीरायांचा उल्लेख केला नसता तरच नवल. हनुमंताचा समर्पित भावदेखील या निमित्ताने त्यांनी मांडला आहे. हनुमंताप्रमाणेच लक्ष्मणाचे रामचंद्रांचे भाऊ म्हणून नाही, तर त्यांच्या दैदीप्यमान बंधूप्रेमाविषयी लिहिले नाही तर रामराज्य ही संकल्पना अर्धवटच राहिली असते, पण त्यांचा यथायोग्य उल्लेख यात आढळतो. रामतत्त्वांचे मूल्य जाणून घेतल्याने, त्यासाठी आवश्यक निश्चय आणि मार्गक्रमण केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही या विषयी लेखकाच्या मनात कोठेही किंतू जसा नाही, तसेच शुद्ध निश्चयाने मार्गक्रमण केल्यास लवकरच रामराज्य येऊ शकते. याबद्दल लेखकाला केवळ आशाच नाही, तर खात्री देखील आहे.

परिचय : श्री अविनाश सहस्त्रबुध्दे

इंदापूर , माणगाव .

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 55 – कद्रदां, कोई बुलाये न गये… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – कद्रदां, कोई बुलाये न गये।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 55 – कद्रदां, कोई बुलाये न गये… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

अपने हालात, दिखाये न गये 

दिल के जज्बात, बताये न गये

*

रोज लिखते हैं खत मुझे लेकिन

फाड़ देते हैं, पठाये न गये

*

दस्तकें देकर लौट आया हूँ 

आप सोते थे, जगाये न गये

*

होंठ तो, बंद कर लिए हमने 

अश्रु आँखों के, दबाये न गये

*

आज महफिल सजाई है उनने 

कद्रदां कोई बुलाये न गये

*

मेरे मरने का गम उन्हें कैसे 

जिनसे, दो अश्रु गिराये न गये

 

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 130 – कलयुग में न्यारी है यारी ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “कलयुग में न्यारी है यारी। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 130 – कलयुग में न्यारी है यारी… ☆

 

कलयुग में न्यारी है यारी।

अंदर से है चले कटारी।।

 *

त्रेतायुग के राम राज्य पर,

कलयुग की जनता बलिहारी।

 *

राजनीति में चोर-सिपाही,

खेलम-खेला बारी-बारी।

 *

विश्वासों पर घात लगाकर,

चला रहे यारी पर आरी।

 *

जनता ही राजा को चुनती,

नहीं समझती जुम्मेदारी।।

 *

मतदाता मतदान न करते,

जीतें-हारें, खद्दर-धारी।

 *

मतदानों का प्रतिशत गिरता,

यह विडंबना सब पर भारी ।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

15/5/24

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – वह ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  वह  ? ?

(21)

वह मथती है दही,

नवनीत निकालती है,

समुद्र मंथन का विचार

समाहित था

उसकी मथानी में!

 

(22)

वह पढ़ती है,

सुनते हैं पढ़ना

बाघिन का दूध पीना है,

उसका पढ़ना

खुद बाघिन का पढ़ना है!

 

(23)

वह होती है

दहलीज़ के भीतर

उसकी चर्चा होती है

दहलीज़ के बाहर,

भीतर-बाहर को निरखती है

वह खुद अपनी दहलीज़ बनती है!

 

(24)

वह जाना चाहती है

उसके काँधे

पर उससे आँच

नहीं लेती वह,

अखंड ज्योति

बनी रहती है वह!

 

(25)

वह जानती है

उससे कुछ ही

बेहतर जियेगी

उसकी बेटी,

फिर भी

बेटी जनती है वह,

सृष्टि को

टिकाये रखने की

ज़िम्मेदारी

नहीं भूलती वह!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 💥 श्री हनुमान साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी। 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 12 – संस्मरण # 6 – खूँटी ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार।आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  – संस्मरण –  खूँटी)

? मेरी डायरी के पन्ने से # 12 – संस्मरण # 6 – खूँटी ?

पुराने ज़माने में दीवारों पर या दरवाज़े के पीछे खूँटियाँ लगी होती थीं। इन खूटियों पर कचहरी के कोट, दादाजी की लाठी, चाचाजी का हैट, ताऊजी की छेत्री टँगी रहती थी।

समय के साथ – साथ आधुनिक काल में ये खूटियाँ गायब हो गईं पर जिंदगी तो न जाने समय -समय पर कितने ही प्रकार की खूँटियों से बँधी ही होती है। ये खूँटियाँ न दिखती हैं न कभी हमारा उनकी ओर ध्यान ही जाता है। मगर हम उससे बँधे अवश्य रहते हैं। हर उम्र में ये सुखद अनुभूति दे जाती हैं।

स्त्री हो या पुरुष सभी को अपने जीवन में इन मायाजाल की खूँटियों से बँधना ही पड़ता है।

शैशव  में अपनी मर्ज़ी के सब मालिक होते हैं। ज़िद करते ही इर्द-गिर्द उपस्थित सभी लोग व्यस्त से हो जाते हैं। यह जीवन का वह दौर होता है जब शिशु अपनी हर बात रोकर मनवा लेता है। वह घर के सभी सदस्यों के लिए मनोरंजन का केंद्र होता है। लाड़ -प्यार घर के हर कोने से उँडेलकर उसे दिया जाता है।

जब तक बालक -बालिका बन जाते हैं तो रोना कम हो जाता है और अपनी बात मनवाने का तरीका भी बदल लेते हैं। वे अब रूठने की कला सीख जाते हैं। वे अब भी घर के सदस्यों के लिए आकर्षण का केंद्र होते हैं।

किशोरावस्था के आते -आते किशोर -किशोरियों का घर में कम और बाहर अधिक समय व्यतीत होने लगता है। मित्रों और सखियों का एक समूह जुट जाता है। समय व्यतीत करने के लिए मित्र पर्याप्त होते हैं। उनके चर्चे के विषय, हँसी- ठिठोली सब कुछ अलग ही होती हैं। गपशप मारने के लिए सड़क का कट्टा या टपरी सबसे उत्तम स्थान बन जाता है। किसी को किसी के घर जाने की आवश्यकता ही नहीं होती।

हमारे ज़माने में हम साइकिल हाथ में थामे घंटों किसी पुलिया के पास एकत्रित हो जाते थे। आज दृश्य थोड़ा बदला है। किशोर अब मोटर साइकिल रोककर गपशप करते रहते हैं।

किशोरावस्था में घर मात्र भोजन और शयन का स्थान रह जाता है। माँ के साथ दिनचर्या पर थोड़ी बहुत बातचीत हो भी जाए पर कुछ घरों में पिता की व्यस्तता में अपनी संतानों से नियमित बैठकर बातचीत भी कई बार संभव  हो ही नहीं पाती है। पिता कॉलेज और ट्यूशन फीस जुटाने का कुछ हद तक ज़रिया मात्र रह जाता है। परिवार है तो घर है, घर है तो संबंध हैं और यही संबंध अदृश्य खूँटी से बँधा रिश्ता होता है। भले ही थोड़ा शिथिल – सा पड़ा होता हुआ दिखाई देता है पर फिर भी सभी बँधे रहते हैं।

अपने मित्रों के सौहार्द में रहनेवाला शायद इस बात का अहसास नहीं कर पाता पर मन के भीतर एक भूख सी अवश्य रह जाती है जिसका अहसास जीवन के चालीसवें पड़ाव तक आते -आते महसूस होने लगता है कि उसे पिता के साथ विशेष समय व्यतीत करने का अवसर न मिला। यह जो थोड़ी दूरी बन जाती है उसे पाटना कई बार कठिन भी  हो जाता है। पिता भी बच्चों से बनी दूरी को साठ के आते -आते अनुभव करने लगते हैं। हरेक का अपना व्यक्तित्व, विचारधारा और दृष्टिकोण अनुभव के आधार पर अलग ही होते हैं।

अब समय रफ्तार से दौड़ता है। घर के किशोर युवक बन जाते हैं। अधिकतर निर्णय न जाने कब से वे ही लेने लगते हैं। पिता के कुछ कहने पर यह कहकर चुप करा देते हैं कि

“आप नहीं समझेंगे पापा, आपका समय अलग था। ” यह एक वाक्य समझदार पिता के लिए पर्याप्त होता है और वे कलह, विवाद आदि से बचने के लिए अपने समय में सिमटने लगते हैं।

माता -पिता संतानों के जीवन में  हस्तक्षेप करना बंद कर देते हैं और अपने आनंद और वात्सल्य की क्षुधा को तृप्त करने वे नाती-पोते के साथ समय व्यतीत करते हैं।

यह संबंधों की नई खूँटी अवकाश प्राप्त माता -पिता के लिए अलग अनुभव होता है। वे अपने नाती-पोते के साथ एक सुखद सबंध कायम कर जीवन में एक अद्भुत आनंद के भागीदार होते हैं। इस खूँटी में कलह, विवाद मतभेद के लिए कोई स्थान नहीं होता है। उनकी अनंत जिज्ञासाएँ और प्रश्न जीवन के अंतिम पड़ाव में वृद्धजनों को अलौकिक सुख दे जाते हैं।

जीवन के अंत में यही खूँटी सबसे सशक्त और आनंददायी होती है। जीवन परिपूर्ण प्रतीत होने लगता है।

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani1556@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 285 ☆ कथा-कहानी – नवाचारी बिजनेस आइडिया ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक व्यंग्यात्मक लघुकथा – नवाचारी बिजनेस आइडिया। 

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 285 ☆

? लघुकथा – नवाचारी बिजनेस आइडिया ?

अपने ही सम्मान की सूचना अपनी ही रचना छपने की सूचना, अपनी पुस्तक की समीक्षा वगैरह स्वयं देनी पड़ती हैं, जिसे लोग अपना भोंपू बजाना या आत्म मुग्ध प्रवंचना कहते हैं।

इसलिए एक सशुल्क सेवा शुरू करने की सोचता हूं ।

हमे आप अपने अचीवमेंट भेज दें, हम पूरी गोपनीयता के साथ अलग अलग प्रोफाइल से, उसे मकड़जाल में फैला देंगे ।

ऐसा लगेगा कि आप बेहद लोकप्रिय हैं, और लोग आपकी रचनाएं, सम्मान आदि से प्रभावित होकर उन्हें जगह जगह चिपका रहे हैं।

तो जिन्हें भी गोपनीय मेंबरशिप लेनी हो इनबाक्स में स्वागत है। तब तक इधर हम भी कुछ और नामी गिरामी प्रोफाइल हैक कर लें, कुछ छद्म प्रोफाइल बना डालें, आपकी सेवा के लिए ।

* * * *

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares