‘आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगची धून’ हे गाणे ऐकले की आठवतात सोपानदेव चौधरी. अलौकिक प्रतिभेच्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे, सोपानदेव सुपुत्र. ते रवीकिरण मंडळाचे सभासद होते. यातील सारे सभासद कवी आपल्या कविता गाऊन सादर करत. सोपानदेव चौधरीही आपल्या कविता गाऊनच सादर करायचे. काव्यकेतकी, अनुपमा, छंद , लीलावती इ. त्यांचे कवितासंग्रह आहेत. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून ते गद्य लेखनाकडेही वळले.
एकदा नागपूर येथे कविसंमेलनासाठी त्यांना निमंत्रण होते. त्या प्रमाणे ते गेले. त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्या. श्रोत्यांनाही त्या खूप आवडल्या. पण रिपोर्टमध्ये त्यांचे नाव नव्हते. ते उदास झाले. घरी गेल्यावर बहिणाबाईंनी त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी संगितले. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, ‘कुणी प्राणी मारत होता. ते पाहून तिथून जाणार्या एका माणसाने त्याचा जीव वाचवला. ‘छापून येणार नाही, म्हणून त्याने तसे केले नसते तर ?’ पुढे त्यांचे उत्स्फूर्त उद्गार आहेत,
‘अरे, छापीसनी आलं ते मानसाले समजलं
छापीसनी राहिलं ते देवाला उमजलं’ किती हृद्य आहे त्यांचं हे समजावणं॰ त्या म्हणाल्या, ‘अरे, तुझी सेवा रुजू झाली ना? मग झालं तर!’
शब्दांवर कोटी करण्याचा त्यांचा छंद होता. ‘मी कोट्याधीश’ आहे असे ते म्हणायचे.पुढे पुढे यांना कॅन्सर झाला. त्या काळात हॉस्पिटलमध्ये पडून पडूनही त्यांनी १०-१५ कविता लिहिल्या. एकदा शंकर वैद्य त्यांना भेटायला गेले आणि त्यांच्या अस्थिपंजर देहाकडे पाहून म्हणाले, हे काय हे आप्पा!’ त्यावर ते म्हणाले, ‘आता मी हाडाचा कवी झालो.’अशा त्यांच्या काही आठवणी डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या लेखात सांगितल्या आहेत.
*ना. सं इनामदार (१९२३ ते २००२) नागनाथ संताराम ईनामदार हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या. इतिहासातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची ओळख आहे. संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, प्रसंगातील नाट्यमयता, चित्रदर्शी शैली त्यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या सगळ्या कादंबर्यांमध्ये राऊ, झेप, शाहेंशाह, मंत्रावेगळा इ. कादंबर्या लोकप्रीय ठरल्या भारतीय ज्ञानपीठाने त्यांच्या राऊ कादंबरीचा राऊ स्वामी या नावाने हिंदीतील अनुवाद प्रकाशित केलाय.
*गो. पु. देशपांडे (१९३८ – २०१३) गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी मराठीत नाटके, कविता आणि निबंधही लिहिले. दिल्लीच्या जवाहर विद्यापीठातून चीन हा विषय घेऊन त्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली व याच विषयावर हॉँगकॉँगयेथून पदविका मिळवली. पुढे दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.
त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून लेखन केले. त्यांनी वैचारिक, राजकीय, रंगभूमीविषयक, साहित्यविषयक, लेखन केले. प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात विचारनाट्याची धारा त्यांनी पहिल्यांदा निर्माण केली. राजकीय जाणीवा ही त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. अंधारयात्रा, उध्वस्त धर्मशाळा, चाणक्य विष्णुगुप्त, रस्ते, शेवटचा दिवस. सत्यशोधक इ. नाटके त्यांनी लिहिली. सत्यशोधक नाटकाचे हिंदीत रूपांतर झाले. याशिवात इत्यादी इत्यादी (कवितासंग्रह) ‘ चर्चक हे निबंधाचे पुस्तक २ भागात, राहिमतपूरकरांची निबंधमाला २ भागात, नाटकी निबंध हा लेखसंग्रह इ. लेखन त्यांनी केलेले आहे.
त्यांच्या साहित्याचे, इंग्रजी, कानडी, हिन्दी, तमीळ, अशाविविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्यावर ‘बहुआयामी गो.पु.’या लघुपटाची निर्मिती झालेली आहे. त्यांनी, शिवाजी, महात्मा फुले, चाणाक्य इ. दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी लेखन केले आहे. चित्रपटांसाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे.
गो. पु. देशपांडे यांना जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कार, संगीत नाटक अॅकॅडमीचा पुरस्कार व मरणोत्तर रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर पुरस्कार लाभले आहेत. (हा पुरस्कार श्रीराम लागूंनी आपल्या मुलाच्या तन्वीरच्या स्मरणार्थ ठेवला आहे.)
दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळताना हजारोंनी माणसं जमली होती. त्यामध्ये कितीतरी रावणच होते. एक दोघे राम होते पण हतबलतेने ते गप्प होते. लढवय्या राम मात्र एकही नव्हता. तो रामराज्यात फक्त सीतेच्या वाटेला आला होता.
जळताना रावणाने मोठयाने ओरडून सांगितले—-” बघा तुमच्याच आतमध्ये डोकावून आणि करा हिशोब स्वतःच्या चारित्र्याचा.”
हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच मर्यादेच्या सीमा नाही ओलांडल्या. कायम विचार केला तिच्या मानाचा.
तुम्हीतर दिवसाढवळ्या नुसत्या वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडता, वर दिमाखाने मिरवत, सभ्यपणाचा बुरखा लावून मलाच जाळता.
हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच विचार नाही केला तिच्या अत्याचाराचा.– निर्भयासारख्या कितीजणींना भक्ष्य केलय तू मानवा, कळस झाला आहे तुझ्या अविचाराचा.– विचार कर तुझ्यातल्या राक्षसाला जाळायचा.
हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला जबरदस्तीचा.
तुझ्यासारखा तूच नीच, जो जोर दाखवितो अबलांवरती आपल्या बळाचा. जरा तरी विचार कर त्यांच्या नाजूक मनाचा.
हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला आक्रमकतेचा.
तू तर मान नाही राखत कुठच्याच स्त्रीचा, मानवा कधीतरी तूच खून कर तुझ्यातल्या दानवाचा.
हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा—-पण कधीच नाही विचार केला तिच्या अपमानाचा.
अरे मला जाळण्याआधी मानवा जरा स्वतःला विचार, हुंड्याच्या मोहापायी तू किती सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात किती कळ्या मारल्या.
हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा— पण कधीच नाही विचार केला बीभत्सपणाचा.–
तुम्ही तर करता चुराडा, न उमललेल्या फुलांचा आणि त्यांच्या भावी स्वप्नांचा.
मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.
मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.—
कधी न कधी तुलाही भोगायला लागेल फळ आपल्या कर्माचे.
हो.. हो..शंभरदा सांगेन, हो.. हो.. हो. शंभरदा सांगेन,– केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा —-कारण मला रामाकडूनच पाहिजे होता मोक्ष मानाचा.
मानवा तूच प्रयत्न कर स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा, मला जाळताना विचार कर–
स्वतःतला मी जाळण्याचा.
स्वतःतला मी जाळण्याचा.
स्वतःतला मी जाळण्याचा.
रावणाच्या मनोगताला दिलेलेमानवाचे उत्तर
(दसऱ्याच्या दिवशी जळताना रावणाने मोठयाने ओरडून दिले स्पष्टीकरण आपल्या गुन्ह्याचे, आणि मानवाला विचार करायला लावत सांगितले-’ स्वतःतला मी जाळायला ‘-)
त्यावर मानवाचे उत्तर ——–
हो.. हो, आहेत रावणा आमच्यामध्ये, वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडणारे,—-
पण त्याहूनही जास्त जण आहेत आपल्या जरबी नजरेनेच, त्या समाजकंटकांना वठणीवर आणणारे.—-
हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही निर्भयासारख्याना भक्ष्य करणारे—-
पण त्याहूनही कितीतरी जण आहेत त्यांच्यासारख्या राक्षसांना लक्ष्य करणारे.—-
हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही जण अबलांवरती जबरदस्ती करणारे—–
पण अनेक जण आहेत स्वतःच्या बळावरती, त्यांना फाशी देऊन जमीनदोस्त करणारे—-
हो. हो, आहेत रावणा आमच्यात, काहीजण स्त्रीचा अपमान करणारे,—-
पण अनेक भारतपुत्र आहेत, सीमेवर आमच्याच माय लेकींची रक्षा करणारे—-
रावणा तू नको विचार करूस,
रावणा…… तू नको विचार करुस—-
आमच्यात राहून तुझ्या नातलगांनी हुंडयापायी किती सीता जाळल्या आणि गर्भात किती कळ्या मारल्या—–
त्याही पेक्षा जास्त आम्ही कितीतरी सीता वाचवल्या आणि उमलत्या कळ्यांना लक्ष्मी मानल्या.—-
रावणा,२६/११ च्या हल्ल्यात तुझ्यासारख्याच नराधमानी निरागसांचा नरसंहार केला—-
तेव्हा आमच्यातल्याच असंख्य रामांनी सामोरे जाऊन त्यांचाच खात्मा केला—–
रावणा लाज बाळग,
रावणा लाज बाळग—-
स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देऊन, वर गमज्या मारतोस—
सीतेच्या अपहरणाचा गुन्हा करून–
मोक्ष रामाकडून मानाचा मागतोस—-
तुझ्यासारख्या असंख्य रावणांना मारायला आता नाही गरज आमच्यातल्या रामाची,
☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र-वडील अतिशय प्रसन्न,शांतपणे गेले.जाताना ते आम्हाला पैशात मोजता न येणारं असं भरभरुन खूप कांहीं देऊन गेलेत.स़स्कारधन तर होतंच आणि जणूकाही स्वतःची सगळी पूर्वपुण्याईही ते आम्हा कुटुंबियांच्या नावे करुन गेलेत नक्कीच.त्यांनी मनोमन कांहीं स्वप्न म्हणून जपलं असेल तर ते फक्त आम्हा सर्वांच्या समाधानी सुखाचं…!)
या पार्श्वभूमीवरचा माझ्या कळत्या वयानंतरचा माझा जीवन प्रवास.हा प्रवास बाबांच्याइतका खडतर नव्हता तरीही खाचखळग्यांचा होताच. सरळ साधा नव्हताच. त्यामुळे रुढार्थाने कांहीएक स्वप्न उराशी बाळगावं आणि त्या दिशेने अथक प्रयत्न करून ते पूर्ण झाल्याचं समाधान मिळवावं एवढी उसंत आम्हा भावंडांपैकी कुणालाच मिळाली नव्हती. आम्ही दोघे पाठचे भाऊ पहिलीपासून एकाच वर्गात.मी त्याच्यापेक्षा सव्वा दोन वर्षांनी लहान,त्यामुळे लहानपणापासून त्याच्याशी खेळत आणि भांडतच मी लहानाचा मोठा होत होतो. तो सात वर्षाचा होताच पहिलीत जाऊ लागला तेव्हा त्याच्या बरोबर मीही.तो तिसरीत गेला तेव्हा मुख्याध्यापकांच्या अधिकारात माझी पहिली आणि दुसरीच्या परीक्षा घेऊन त्यांनी रीतसर मलाही तिसरीत प्रवेश दिला. तेव्हापासून अकरावीपर्यंत आम्ही दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात टाकून एकत्र शाळेत जायचो. एकाच बाकावर बसायचो. माझ्यापुरतं तरी वयातलं अंतर पुसूनच गेलं होतं. तो माझा फक्त भाऊच नाही तर माझा मित्रच झाला होता.ती मैत्री अजूनही तशीच आहे. तो माझ्यापेक्षा बुद्धीने अतिशय तल्लख. अभ्यासात खूप हुशार. त्याचे भाषा आणि सायन्स सर्वच विषयात चांगले स्कोअरिंग होत असे. पहिल्या पाच नंबरात तो असायचाच. आणि त्या पाचही नंबरात फक्त एखाद-दुसऱ्या मार्कांचेच अंतर असे. त्यांची पहिल्या नंबरासाठी सतत चुरस असे. अर्थात तेव्हा मैत्रीसारखी स्पर्धाही निकोप असायची. त्यांच्यापाठोपाठ माझा नंबर. अर्थात सहावा.पण पाचवा नंबर आणि मी यात दहा-बारा मार्कांचं अंतर असायचं. तरीही शाळेत आणि घरी ‘ लहान असून इतके मार्ग मिळवतो ‘ म्हणून कणभर का होईना जास्त माझंच कौतुक व्हायचं. माझ्या भावाला इंजिनीयर व्हायचं होतं. ते त्याचं जिवापाड जपलेलं स्वप्न होतं. मला अर्थातच भाषा विषय खूप आवडायचे. वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, अभिनय,निबंधलेखन अशा सगळ्या कलांमध्ये मला विशेष गती. शाळेतल्या सर्व वर्षांत या सगळ्या स्पर्धांमधे माझा पहिला नंबर ठरलेलाच असे. अर्थात जे आवडतं ते करीत त्यातून आनंद मिळवायचा एवढंच तेव्हा समजत असे.त्याचं छंदात, स्वप्नात रुपांतर, परिस्थिती अनुकूल असती तर कदाचित झालंही असतं. पण तसं व्हायचं नव्हतं. आम्ही दोघेही अकरावीत असताना अचानक वडिलांचं आजारपण उद्भवलं. त्यापुढची त्यांची नोकरी ते निभवत राहिले तरी अनिश्चिततेच्या भोवर्यातच सापडली. हक्काच्या रजा संपल्या नंतर जेव्हा बिनपगारी रजा होत तेव्हा ऑफिसमधे सर्वजण सांभाळून घेत असले तरी दर महिन्याला हातात येणारा पगार थोडा जरी कमी आला तरी घराचा आर्थिक डोलारा डळमळू लागे. मॅट्रिकचा रिझल्ट लागला. मला जेमतेम फर्स्ट-क्लास आणि भावाला डिस्टिंक्शन मिळाले होते. माझ्या आनंदाला उधाण आलेले पण भाऊ मात्र हिरमुसलेला. त्या काळी मॅट्रिक नंतरही चांगल्या नोकऱ्या मिळत. पण माझं वय खूप लहान आणि मोठ्या भावाचं मात्र नोकरीचं वय झालेलं. त्यामुळे त्याने मिळेल ती नोकरी करायची आणि माझं कॉलेज शिक्षण होईपर्यंत घरची जबाबदारी घ्यायची. आणि मला नोकरी मिळाली की मी ती जबाबदारी स्वतःकडे घ्यायची असा वडिलांशी चर्चा करुन आईने नाईलाजाने निर्णय घेतला आणि भावाची समजूत काढली. त्या रात्री डोक्यावर पांघरूण घेऊन तो घुसमटत रडत होता. का ते सगळं माझ्यापर्यंत पोचलेलंच नव्हतं.मी खोदून खोदून विचारलं तरी भाऊ ‘काही नाही’ म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी मी आईच्या खनपटीलाच बसलो तेव्हा आईने जे ठरवलं होतं ते माझ्या गळी उतरवलं. ऐकलं आणि कॉलेजला जायचा त्या वयात इतरांना होणारा आपसूक आनंद मी हरवूनच बसलो. भाऊ आधीच अबोल, आता तर घुमाच झाला. तो रोज लायब्ररीत जाई, पेपरमधल्या नोकरीच्या जाहिराती वाचून अर्ज करी. टेलिग्राफ ऑफिसमधे त्याला नोकरी मिळाली.गोव्याला पोस्टींग झालं.ट्रंक घेऊन तो सर्वांचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. या सगळ्या उलघालीत इंजिनीयर व्हायचं त्याचं स्वप्न उध्वस्त झालं होतं आणि ती बोच त्याच्याइतकीच माझ्याही मनात सलत राहीलेली.मग अर्थातच मी सुखद स्वप्न पहायचा माझा अधिकारही विसर्जित करून टाकला.त्यानंतर स्वप्न पाहिलं ते फक्त भावाचे हे उपकार कधीच न विसरण्याचं.तेव्हा गोव्यासारख्या महागाईच्या ठिकाणी दरमहा जेमतेम दोनशे रुपये त्याच्या हातात येत. त्यातल्या दीडशे रुपयांची तो न चुकता घरी मनिऑर्डर करी. राहिलेल्या पन्नास रुपयात पुढे स्टेट बँकेत नोकरी मिळेपर्यंतची दोन वर्ष त्यांनी कशी काढली होती ते खूप वर्षं उलटून गेल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर गप्पांच्या ओघात त्यांनी मला ओझरतंच सांगितलं,तेव्हा ते ऐकूनही माझ्याच अंगावर सरसरून काटा आला होता. अतिशय काटकसरीत का होईना पण आई-वडिलांच्या सहवासात सुरक्षित छपराखाली मी रहात असताना, माझ्यापेक्षा खूप हुशार असूनसुद्धा केवळ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा म्हणून त्याच्यावर पडलेलं जबाबदारीचं ओझं स्वतःचंच कर्तव्य म्हणून त्याने मनापासून पारही पाडलं होतं. माझ्या मनावरचं ओझं आणि जबाबदारीची जाणीव मला स्वस्थ बसू देत नव्हती.त्या मनोवस्थेत मी माझी कॉलेजची चार वर्षे एकाग्रतेने अभ्यास करीत एक एक दिवस मोजून काढलीत.हे करीत असताना मनातली अस्वस्थता कमी व्हावी म्हणून आणि त्याक्षणी ते मीच करायला हवं म्हणूनही, तेव्हा आठवड्यातले रिकामे मिळणारे शनिवार-रविवार हे दोन दिवस मी एका ठिकाणी अकाउंटस् लिहायची कामं घेऊन स्वतःला गुंतवून ठेवलेलं होतं. ते दोन पूर्ण दिवसभर खाली मान घालून काम करावं तेव्हा महिन्याला वीस रुपये मिळत. ते पैसे साठवून मी माझ्या लहान भावाचे युनिफॉर्मचे दोन जोड, त्याची वह्या पुस्तकं, माझे दोन शर्ट आणि पायजमे, आणि कॉलेजसाठीचा रेल्वेचा पास एवढे खर्च बाहेरच्या बाहेर करू शकायचो. हे प्रथम भावाच्या लक्षात आलं तेव्हा तो माझ्यावर खूप चिडला होता.’ हे सगळं करताना तू मला विश्वासात घेऊन बोलला का नाहीस ‘ या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. तो गोव्याहून एक्स्टर्नल ग्रॅज्युएशन च्या परीक्षेसाठी वर्षातून फक्त एकदा मिरज सेंटर घेऊन घरी येऊ शकायचा. तो स्वतःची इतकी ओढ करीत असताना त्याच्या जीवावर दोन वेळा बसून खाणं मला नको वाटायचं. त्या क्षणी मीच करायला हवं अशी ही एकच गोष्ट होती. हे सगळं या शब्दात त्याला सांगून मला त्याला दुखवायचं नव्हतं. अखेर आईने त्याची समजूत काढली तेव्हा ‘पैसे मिळविण्यापेक्षा ग्रॅज्युएशनला जास्तीत जास्त स्कोरिंग करायची तुझी जबाबदारी तू पार पाडणं महत्वाचं आहे ‘असं मला त्याने बजावून ठेवलं होतं. ते तर मी करणार होतोच पण त्याच्या सांगण्या-समजावण्यातली कळकळ पाहून कोणत्याही कारणाने मी कमी पडून उपयोगाचं नाही हे स्वतःला रोज नव्याने बजावत असायचो.त्या चार वर्षांत माझी स्वप्नं यश मिळवून आई-बाबांना न् भावाला कृतार्थतेचं समाधान द्यायचं याच परिघाभोवती फिरत असायची.
पुढे भावाला स्टेट बँकेत आणि दोन वर्षानंतर मला युनियन बँकेत जॉब मिळाला आणि नाही म्हटले तरी अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. त्यानंतर मी भावाला त्याच्या आर्थिक जबाबदारीतून मोकळं केलं, तरीही आम्हा दोन्ही लहान भावांना वेळोवेळी काय हवं नको याकडे त्याचं बारीक लक्ष असायचंच. पुढे आम्ही आमचे संसार सुरू करून अन्नाचा शेर असेल तिथे फिरत राहिलो. परस्परांना लिहिलेली पत्रे आणि कारणपरत्वे गरज निर्माण होईल तसं मदतीला आम्हा सगळ्या भावंडांकडे धाव घेणारी आई ही दोनच संपर्काची साधने. तरीही आम्ही मनाने सतत जवळच असायचो. दोघांच्याही सुरु झालेल्या बँकिंग क्षेत्रातील निसरड्या वाटांवरूनच्या वाटचाली पाय न घसरु देता उत्कर्षाच्या दिशेने चालू राहिल्या ते अर्थातच आई-बाबांनी वेळोवेळी केलेल्या संस्कारांमुळेच. या प्रवासातही यशासाठी हव्यासापायी कोणतीही अनाठाई तडजोड न करायचं बंधन आम्ही कोणी न सांगताच आमच्या स्वप्नांना घालून घेतलेले होतं. त्यामुळे वेळोवेळी मिळालेली प्रमोशन्स असोत,कधी सोयीची तर कधी गैरसोयीची पोस्टिंग्ज असोत,इतरांना अप्राप्य असं सतत मिळत रहाणारं ‘ जॉब सॅटिसफॅक्शन ‘ असो, सगळं आम्हाला मिळत गेलं. यातलं काहीच आम्ही अट्टाहासाने स्वप्न उराशी बाळगून, तडजोडी करून मिळवलं नाही.आणि ते सगळं आम्ही समाधानाने स्वीकारत गेलो. आज त्या समाधानाबरोबर कृतार्थताही आहे.
मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त कर्तव्यपूर्तीचं आणि कितीही यश आणि ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही न उतण्या-मातण्याचं. त्या स्वप्नाची पूर्तता हेच माझं जीवन ध्येय होतं आणि ते ध्येय साध्य झाल्याचं समाधान हीच माझ्या उर्वरित आयुष्याला पुरूनही उरुन राहील अशी कृतार्थता..!
मला मिळालेली ही स्वस्तात माझ्या मुलाला उत्तुंग स्वप्ने पहात उंच झेपावण्यासाठीचं विस्तिर्ण आकाश देऊ शकली.
☆ मनमंजुषेतून ☆ जावे त्यांच्या वंशा ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
गावाकडे घर केलं तेव्हाच घराशेजारी दोन गुंठे जागेत भाजीपाला करायचा असं ठरवलं. यावेळी शेतात मूग पेरला. कडेने पावटा, भेंडी, गवार, दोडका, गोसाळी, कारले यांच्या बिया टोकल्या. वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरच्या यांची रोपे लावली. शेपू, चाकवत, पालक, मेथी, कोथींबीरच्या बियांची चिमूट चिमूट लावली. सतत पाऊस पडत होता त्यामुळे पाणी द्यायची गरज पडली नाही. मूग चांगला आला. शेंगा काळ्या पडू लागल्या की तोडायच्या. पहिल्या दिवशी दोन बादल्या भरल्या. वाकून तोडाव्या लागत त्यामुळे कंबर दुखू लागली. तरी घरच्या शेतातला आणि खत, किटकनाशके न वापरता आलेला. त्यामुळे त्याचं समाधान जास्त. नंतर एक दोन दिवसांनी थोड्या निघत राहिल्या. यासाठी गौरी गणपती गावाकडेच बसवायचे ठरवले. त्यामुळे वरचेवर मुगाच्या शेंगा तोडता येतील. गौरी गणपती बसवताना सून, मुलगा आलेले. घरातली सगळी कामे झाल्यावर सुनबाई कुठेतरी फिरून येऊ म्हणाली. खेड्यात शेताशिवाय कुठे जाणार…
लांबच्या शेतात गेलो. हल्ली जास्त ऊसाचीच शेती केली जाते. आमच्या शेतात उंच वाढलेला ऊस होता. टॅक्टरने नांगरल्या मुळे बांध राहतच नाही. मग शेतातूनच वाट काढत जावं लागतं. शेजारच्या सोयाबीनच्या शेतातून निघालो. गुडघ्या एवढं पीक त्यात गवतही भरपूर. अनेक ठिकणी लाल मुंग्यांची वारुळे. साप असण्याची शक्यता. नीट बघूनच चालावे लागते. आम्ही दोघे, सूनबाई, सहा वर्षाचा नातू असे निघालो. मुलगा आदल्या दिवशीच जाऊन आल्यामुळे येणार नाही म्हणाला. त्याला अनुभव आलेला.
थोडे चालणं झाल्यावर ह्यांनी मागे वळून बघण्याच्या नादात वारुळावर पाय पडला. त्यांच्या पॅण्टवर सगळीकडे लाल मुंग्याच. पॅण्ट काढून मुंग्या झटकून मग पुन्हा घातली. थोड्याफार मुंग्या आम्हालाही चावल्या. शौर्य नाचायला लागला. सूनबाई म्हणाली, कशाला आलोय आपण इकडे? म्हटलं तुलाच हौस फिरायला जायची. माझ्या आणि शौर्यच्या कपड्यांना कुसळे भरपूर लागली. सोयाबीनचे शेत संपल्यावर ऊसाच्या शेतातून जावं लागलं. ऊसाचे काचोळे हाताला कापत होते. हाताने ऊस धरला तरी मागच्या येणाऱ्या च्या अंगावर पडत होता. शौर्य वैतागला. ऊसाच्या बाहेर आल्यावर शेजारच्या काकी मुलाला बघून म्हणाल्या, आमच्या शेतातून वाट होती की. इकडून यायचं नाही का? त्यांचा मूग काढल्यामुळे शेत मोकळं होतं. शेजारी हिरवंगार आल्याचे भरघोस पीक होते. पुन्हा एक ऊसाचे शेत ओलांडून उंबराच्या झाडाखाली आलो. तिथे कपड्यावरची कुसळे काढली. शौर्यने खाऊ खाल्ला. नुकतीच एका शेतात ऊसाची लागण केलेली. गेल्यावर्षी भुईमूग, हरभरा होता तेव्हा शेत छान वाटत होतं.
आता उंच वाढलेल्या ऊसामुळे जंगलात आल्यासारखे वाटत होते. थोडावेळ थांबून निघालो. येताना मात्र शेजारच्या आल्याच्या, मुगाच्या शेतातून आलो. तरी वर खाली बांध, पावसाने भरपूर तण वाढलेले आणि निसरडी जमीन. सापाची भिती. मुंग्यांची वारूळे चुकवत आलो. रस्त्यावर आल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. हे दोन तीन दिवसांनी शेतात चक्कर मारतात. त्यांना काही वाटले नाही. पण आम्हाला ट्रेकींगपेक्षा अवघड अनुभव आला. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव झाली. रोज किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळते.
☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामधील महत्वाचा फरक म्हणजे, शब्दांनी समृध्द मनुष्य शब्दांद्वारा आणि शब्दांशिवायही आपल्या भावना व्यक्त करु शकतो. अव्यक्त राहूनही परस्परांना समजून घेणारं नातं खूप छान फुलतं—शब्दांचे खतपाणी घालण्याची फार गरजच नसते.
पण सतत असं राहून चालणार नाही. काही विशिष्ट प्रसंगातच हे योग्य ठरतं.
एरवी वेळोवेळी व्यक्त होणं खूप आवश्यक—नाहीतर मग संवाद संपू शकतो. आणि कुठेतरी गैरसमजाचे बीज नकळतं रोवल्या जातं.
व्यक्त होणा-यांचे ही वेगवेगळे प्रकार असतात. कोणी स्वतःबद्दल काहीच सांगू इच्छीत नसतं—व्यक्तच होत नाही. तर कोणी सतत व्यक्त होत राहतं.—या दोन्ही परिस्थितीमध्ये हवा तसा संवाद शक्यच होत नाही.
संतुलीतपणे व्यक्त होणं ही एक कलाच आहे. कुठे केव्हा किती बोलावं, व्यक्त व्हावं, हे कळणं खूप आवश्यक—-
याचबरोबर व्यक्त कोणासमोर व्हायचं, हे देखील तितकंच महत्वाचं —समोरची व्यक्ती कुठलेही मत न लादणारी, पूर्वग्रह न ठेवता, निरपेक्षपणे ऐकणारी हवी. व्यक्त होणा-याबरोबरच ऐकणाराही प्रगल्भ हवा. तेव्हाच एखाद्या कठीण प्रश्नातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य मिळतं.
व्यक्त अव्यक्त दोहोंमधुन असावा संवाद—
प्रत्येक नात्यामधील मिटेल मग वाद—-
——वैशाली
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
हे पुस्तक कथा,कादंबरी किंवा चरित्र या कोणत्याच वाङ्मय प्रकारात मोडणारे नाही.
एका न्यायाधिशाने त्यांच्या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीत निकाला त काढलेल्या विविधरंगी खटल्यांचे व अनुभवांचे शब्दांकित रेखाटन असे या पुस्तकाविषयी थोडक्यात म्हणता येईल.
प्रस्तूत पुस्तकाचे लेखक श्री.रमेश माधव बापट, मुळचे कर्नाटकातले, वकीलीची पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर स्वतंत्रपणे वकीली करण्यासाठी पुण्यात स्थायीक झाले. बॅरिस्टर सी. बी अगरवाल आणि एडवोकेट सी.एन्.भालेराव ह्या प्रथितयश व अनुभवी वकिलांकडे ज्यूनियर वकील म्हणून काम करत करत कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त करून यश संपादन केले. सर्वसाधारणपणे असा समज आहे की वकिली म्हणजे लबाडी, पण “सचोटी, व्यासंग आणि चारित्र्य यांच्या बळावर कोणत्याही व्यवसायात यश व प्रतिष्ठा मिळू शकते” हे या लेखकाकडे पाहून समजते.
श्री.बापटांनी त्यांच्या या व्यवसायात,अर्थात आधी वकीली आणि नंतर न्यायदान सांभाळताना ज्ञानसाधना हा महत्वाचा घटक कटाक्षाने सांभाळला आहे. त्यामुळे कोर्टापुढील त्यांचे निवेदन अत्यंत प्रभावी, परिणामकारक व पटण्यासारखे होत असे. पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, नागपूर, परभणी, आंध्रप्रदेश अशा अनेक ठिकाणी रजिस्ट्रार,न्यायाधीश ही पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कोर्टापुढे जे विविध खटले गाजले व त्यांनी न्यायदान केले असे अनेक खटले या पुस्तकात उद्धृत केले आहेत. त्यावरून जस्टिस बापटांचा मानवतावाद हा त्यांच्या व्यक्तित्वाचा मोठा घटक आहे असे म्हणावे लागेल. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे गरीब व गुणी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सगळी हुषारी पणास लावली आहे, याच्या खुणा पुस्तकात जागोजागी सापडतात.
एका क्रिमिनल खटल्याविषयी ते लिहितात……
“खुनाची केस होती. दोन आरोपी होते. सेशन्स कोर्टात खुनाचा आरोप सिद्ध होऊन दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आरोपीने हायकोर्टात अपील केले, परंतु दुसर्याने आर्थिक परिस्थिति अनुकूल नसल्याने अपील केले नाही. अपील माझ्या बेंचसमोर आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद व पुरावे वाचून झाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झालेलाच नाही. याचाच अर्थ असा की ज्याने अपील केले नाही त्याच्यावरचाही गुन्हा सिद्ध होत नाही. केवळ आर्थिक स्थिति ठीक नाही म्हणून गुन्हा शाबीत झाला नसताना दुसर्या आरोपीने जन्मठेप भोगावी हे मनास पटेना. सरकारी मदत देऊन दुसर्या आरोपीस अपील करण्यास सांगावे अशी सूचना वकीलांनी मला दिली, परंतु अपिलाची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दोन एक महीने तरी लागतील, तेव्हा त्याने तेवढा वेळ तरी जेलमध्ये का काढावा? त्यापेक्षा पहिल्या आरोपीच्या अपील निकालात सर्व गोष्टी नमूद करून दोन्ही आरोपींच्या सुटकेचा एकत्र हुकूम काढतो.” अशाप्रकारे बापटसाहेबांनी दोघांनाही वाचविले.
न्यायमूर्ति बापटांचे मुंबईतील family कोर्टात पोस्टिंग झाले असता त्यांना तर्हतर्हेची विचित्र माणसे पहावयास मिळाली. या पुस्तकात घटस्फोटाच्या कित्येक नमुनेदार केसेस त्यांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत. न्यायदान करताना आठवीत शिकलेला एक शेर श्री.बापटांना कसा सहाय्यभूत ठरला त्याविषयी ते लिहितात….
” एका शिक्षिकेने घटस्फोटासाठी दावा दाखल केला.दोघेही तरूण, नवर्याला चांगली नोकरी–
काय भूत संचारले,अचानक नोकरी सोडून नवरा घरी बसला. रिकामटेकडा वेळ घालविण्यासाठी व्यसनाची संगत—स्वतःचे पैसे संपल्यावर बायकोकडे मागणी–तिने नकार दिल्यावर मारझोड….अखेर घटस्फोटाचा निर्णय.. पुढे बायकोकडे पोटगीची मागणी—
शिकलेला धडधाकट नवरा बायकोकडे पोटगी मागतो हे मला पटेना..त्याला सरळ करण्यासाठी मी एक गोष्ट लक्षात घेतली की प्रत्येक माणसाला ईगो असतो आणि प्रत्येकाचा काहीतरी विक पाॅइंट असतो– त्याचा ईगो न दुखावता मी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. “ तू स्वतः कमव आणि स्वकमाईचे खा “– असे म्हटल्यावर “ बायकोने कमवावे आणि नवर्याने घरी बसून खाऊ नये असा कुठे कायदा आहे का?“ असा प्रतिप्रश्न त्याने मला केला.
तेव्हा मी त्याला सांगितले “ ठीक आहे, मी पोटगीच्या अर्जावर सही करतो, पण एका अटीवर–उद्या येताना या लांब मिशा तू उतरवून ये. असे म्हणताच मला पाहिजे तो परिणाम झाला. त्याचा अहंकार दुखावला, त्याने पोटगीचा अर्ज मागे घेतला.”
*कर दिया कर्झन ने जन, मर्दों की सूरत देखिये,
आबरू चेहेरे की सब, फॅशन बनाकर पौंछ दी!* असा तो शेर होता—
लाॅर्ड कर्झन गव्हर्नर जनरल असताना हिंदुस्थानातील पुरूष मोठ्या मिशा ठेवीत असत, पण कर्झनने त्यांना बाई बनविले. मिशा उतरविणे म्हणजे अब्रू जाणे. फार मोठा अपमान समजला जातो.
कोर्टात केसच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदाराची साक्ष काढताना वादी आणि प्रतिवादीचे वकील जो युक्तिवाद करतात, त्याचेही बरेच नमूने ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.
श्री.बापट बॅरिस्टर अगरवालांच्या हाताखाली काम करत असतानाचा एक अनुभव त्यांनी नमूद केला आहे—बॅरिस्टरांचे एक तत्व होते. “go along with prosecution and then take diversion”
–केस होती ‘under essential commodity act.’ पुणे जिल्ह्यात कलेक्टरनी गव्हाच्या विक्रीची किंमत २ रुपये किलो ठरवली होती. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार आरोपीने गहू २॥ रूपये किलो भावाने विकला होता. कोर्टापुढे तसे साक्षी पुरावेही त्यांनी सादर केले. साक्षीदाराकडे अगोदरच नंबर लिहून, पंचनामा करून दहा रूपयांची नोट देऊन ठेवली होती. दुकान उघडताच एक बोगस गिर्हाईक नोट घेऊन दुकानात शिरला व त्याने चार किलो गहू मागितले.आरोपीने गहू वजन करून दिल्यावर पोलीस व अधिकारी दुकानात शिरले आणि साक्षीदाराची झडती घेतली. उरलेले दोन रुपये त्याच्याकडे सापडले नाहीत. याचा अर्थ आरोपीने २॥रुपये भावाने त्याला ४किलो गहू दिले. आरोपीचे वकील होते श्री.बापट. त्यांनी साक्षीदारास एकच प्रश्न विचारला..”जे गहू आरोपीने विकले त्याचे वजन करून पंचनामा केला होता का ?”
उत्तर नकारात्मक मिळाले. वकिलांच्या प्रश्नाचा रोख कोणालाही कळला नव्हता. वकिलांनी आरोपीला अशी जबानी देण्यास सांगितले की,सकाळची वेळ होती,गल्ल्यात सुटे पैसे नव्हते म्हणून ‘ ४ किलोऐवजी ५किलो गहू देतो असे सांगितले.’ त्यामुळे २ रुपये परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोजून ५ किलो गहू दिले, गहू २ रुपये भावानेच विकले. तेव्हा कोणताही गुन्हा केला नाही.
कोर्टाला हा बचाव मान्य करावाच लागला आणि आरोपी निर्दोष सुटला.
हे पुस्तक म्हणजे अशा मनोरंजक कहाण्यांची रेलचेल आणि त्यांतून घडणारे मानव जातीचे दर्शन!
कायद्याच्या कक्षेत राहून अक्कलहुषारीने न्यायदान करणे हे काम सोपे नाही.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का एक अत्यंत विचारणीय आलेख मौन : एक संजीवनी। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 103 ☆
☆ मौन : एक संजीवनी ☆
‘व्यर्थ न कर अपने अल्फाज़, हर किसी के लिए/ बस ख़ामोश रह कर देख, तुझे समझता कौन है’… ओशो का यह कथन महात्मा बुद्ध की भावनाओं को अभिव्यक्ति प्रदान कर शब्दबद्ध करता है, उजागर करता है कि हमारी समस्या का समाधान सिर्फ़ हमारे पास है; दूसरे के पास तो केवल सुझाव होते हैं। ओशो ने मानव से मौन रहने का आग्रह करते हुए कहा है कि किसी से संवाद व जिरह करने का औचित्य नहीं, क्योंकि सब आपकी भावनाओं को समझते नहीं। इसीलिए ऐ! मानव तू प्रतिक्रिया की प्रतीक्षा कर; ख़ामोश रहकर उनके व्यवहार को देख, तुम्हें सब समझ में आ जाएगा अर्थात् तू इस तथ्य से अवगत हो जाएगा कि कौन अपना व पराया कौन है? सो! दूसरों के बारे में सोचना व उनके बारे में टीका-टिप्पणी करना व्यर्थ है, निरर्थक है। वे लोग आपके बारे में अनर्गल चर्चा करेंगे, दोषारोपण करेंगे और आपको कहीं का नहीं छोड़ेंगे। इसलिए प्रतीक्षा करना सदैव बेहतर है तथा सभी समस्याओं का समाधान इनमें ही निहित है।
मुझे यह स्वीकारने में तनिक भी संकोच नहीं कि ख़ामोश रहने व प्रत्युत्तर न देने से समस्या जन्म ही नहीं लेती। सो! ‘न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी’ अर्थात् जब समस्या होगी ही नहीं, तो समाधान की अपेक्षा कहां रहेगी? इसके दूसरे पक्ष पर भी चर्चा करना यहां आवश्यक है…जब समस्या होगी ही नहीं, तो स्पष्टीकरण देने व अपना पक्ष रखने की ज़रूरत कहां महसूस होगी? वैसे भी सत्य का अनुसरण करने वाले को कभी भी स्पष्टीकरण नहीं देना चाहिए, क्योंकि वह आपको जहां दुर्बल बनाता है; वहीं आप पर अंगुलियां भी उठने लगती हैं। वह आपको पथ-विचलित करता है और आपका ध्यान स्वत: भटक जाता है। लक्ष्य-पूर्ति न होने की स्थिति में जहां आपका अवसाद की स्थिति में पदार्पण करना निश्चित हो जाता है; वहीं आपको सावन के अंधे की भांति, सब हरा ही हरा दिखाई पड़ने लगता है। फलत: मानव इस भंवर से चाहकर भी नहीं निकल पाता और वह उसके जीवन की प्रमुख त्रासदी बन जाती है।
प्रश्न उठता है, जब हमारी समस्या का समाधान हमारे पास है, तो उद्वेलन व भटकाव क्यों … दूसरों से सहानुभूति की अपेक्षा क्यों… प्रशंसा पाने की दरक़ार क्यों? दूसरे तो आपको सलाह-सुझाव दे सकते हैं; समस्या का हल नहीं, क्योंकि ‘जाके पैर न फूटी बिवाई, सो क्या जाने पीर पराई’ अर्थात् जूता पहनने वाला ही जानता है कि जूता कहां काटता है? जिसे कांटा लगता है, वही दर्द महसूसता है। जो पीड़ित, दु:खी व परेशान होता है, वह अनुभव करता है कि उसका मूल स्त्रोत अर्थात् कारण क्या है? विज्ञान भी कार्य-कारण संबंध पर प्रकाश डाल कर ही परिणाम पर पहुंचता है। सो! हमें कभी भी हैरान-परेशान नहीं होना चाहिए…. न ही किसी से व्यर्थ की उम्मीद करनी चाहिए। जब आप सक्षम हैं और अपनी समस्याओं का समाधान स्वयं खोज कर उसका निवारण करने में समर्थ हैं, तो विपत्ति काल में इधर-उधर झांकने व दूसरों से सहायता की भीख मांगने की दरक़ार क्यों?
यह सार्वभौमिक सत्य है कि विपदा के साथी होते हैं …विद्या, विनय, विवेक। सो! सबसे पहले ज़रूरत है, उसका उद्गम तलाशने की, क्योंकि जब हमें उसके मूल कारण के बारे में ज्ञान प्राप्त हो जाता है; समाधान स्वत: हमारे सम्मुख उपस्थित हो जाता है। इसलिए हमें किसी भी परिस्थिति में अपना आपा नहीं खोना चाहिए अर्थात् ‘विद्या ददाति विनयम्’– विद्या हमें विनम्रता सिखाती है। वह मानव की सबसे बड़ी पूंजी है, जिसके माध्यम से हम जीवन की हर आपदा का सामना कर सकते हैं। विनम्रता करुणा की जनक है। करुणाशील व्यक्ति में स्नेह, प्रेम, सौहार्द, सहानुभूति, सहनशीलता आदि गुण स्वत: प्रकट हो जाते हैं। विनम्र व्यक्ति कभी किसी का बुरा करने के बारे में सोच भी नहीं सकता। बड़े से बड़े क्रूर, निर्दयी व आततायी भी उसका अहित व अमंगल नहीं कर सकते, क्योंकि जब उन्हें प्रत्युत्तर अथवा प्रतिक्रिया प्राप्त नहीं होती, तो वे भी यही सोचने लगते हैं कि व्यर्थ में क्यों माथा फोड़ा जाए अर्थात् अपना समय नष्ट किया जाए? वे स्वयं उससे दरकिनार कर सुक़ून पाते हैं, क्योंकि उन्हें तो दूसरे को नीचा दिखा कर व प्रताड़ित करके ही आनंद की प्राप्ति होती है। परंतु जब तक विनम्र व्यक्ति शांत रहता है, निरुत्तर रहता है, तो उसे संघर्ष की सार्थकता ही अनुभव नहीं होती और समस्या का स्वत: अंत हो जाता है। विद्या से विवेक जाग्रत होता है, जिससे हमें मित्र-शत्रु, उचित-अनुचित, लाभ-हानि, उपयोगी-अनुपयोगी आदि के बारे में जानकारी प्राप्त होती है और हम सच्चाई के मार्ग पर चलते हुए अपने लक्ष्य की प्राप्ति कर सकते हैं। सत्य का मार्ग कल्याणकारी होता है; सुंदर होता है; सबका प्रिय होता है। इसलिए हम ख़ामोश रह कर ही अपने इच्छित लक्ष्य की प्राप्ति कर सकते हैं।
यदि हम प्रतिपक्ष का अवलोकन करें, तो वह हमारे पथ में अवरोधक होता है; राह में कांटे बिछाता है; निंदा कर हमें उलझाता है, ताकि हम अपनी मंज़िल पर न पहुंच सकें। सो! इन अप्रत्याशित परिस्थितियों में आवश्यकता होती है– विवेक से सोच-समझ कर कार्य को अंजाम देने की, ताकि हम अपनी मंज़िल पर पहुंच जाएं। विवेक हमें निंदा-स्तुति के व्यूह में नहीं उलझने देता। ज्ञानी व विवेकशील व्यक्ति सदैव समझौता करने विश्वास करता है.. मौन उसका आभूषण होता है और धैर्य सच्चा साथी; जिसका दामन वह कभी नहीं छोड़ता। आत्मकेंद्रितता व एकांत उसके लिए संजीवनी अर्थात् रामबाण होते हैं, जो उसकी तमाम कठिन व विकट समस्याओं का समाधान करते हैं। एकांत हमें आत्मावलोकन का अवसर प्रदान करता है, तथा उस पावन-सलिला में अवगाहन कर हम श्रेय-प्रेय रूपी अनमोल रत्नों को प्राप्त करने में सक्षम हो सकते हैं। सो! हमें शांत भाव से परिस्थितियों का अवलोकन करना चाहिए। इसी संदर्भ में इस विषय पर भी चर्चा करना अहम् है कि ‘सब्र और सच्चाई एक ऐसी सवारी है, जो अपने शह़सवार को कभी नहीं गिरने देती… न किसी के कदमों में, न किसी की नज़रों में’ अर्थात् सब्र, संतोष व संतुष्टि पर्यायवाची शब्द हैं। मझे याद आ रही है, रहीम जी के दोहे की वह पंक्ति ‘जे आवहिं संतोष धन, सब धन धूरि समान’ अर्थात् संतोष रूपी धन प्राप्त करने के पश्चात् जीवन में कोई तमन्ना शेष नहीं रह जाती। सांसारिक प्रलोभन व माया-मोह के बंधन मानव को उलझा नहीं सकते। सो! वह सदैव शांत भाव में रहता है, जहां केवल आनंद ही आनंद होता है। इसके लिए ज़रूरी है… सत्य की राह पर चलने की, क्योंकि सत्य सात परदों के पीछे से भी प्रकट होने की सामर्थ्य रखता है। सत्य का अनुयायी अकारण दूसरों की प्रशंसा व चाटुकारिता में विश्वास नहीं करता, क्योंकि उन्हें प्रसन्न करने के लिए व्यक्ति को तनाव, चिंता व अवसाद से गुज़रना पड़ता है।
यह कोटिशः सत्य है कि मन-चाहा न होने पर हम हताश-निराश व हैरान-परेशान रहते हैं और वह स्थिति तनाव की जनक व पोषक है। वह हमें गहन चिंता-रूपी सागर के अथाह जल में लाकर छोड़ देती है; जहां से निकल पाना मानव के लिए असंभव हो जाता है। अवसाद-ग्रस्त व्यक्ति आत्मविश्वास खो बैठता है और उसे समस्त संसार में अंधकार ही अंधकार दिखाई पड़ता है। ऐसा व्यक्ति सदैव किंकर्तव्यविमूढ़ स्थिति में रहता है; सब उसे शत्रु-सम भासते हैं, और वह स्वयं को असहाय, विवश व मजबूर अनुभव करता है। उस स्थिति से उबरने के लिए आवश्यकता होती है… मानव को नकारात्मक सोच को त्याग, सकारात्मक दृष्टिकोण अपनाने की …जो आस्था व विश्वास से उपजता है। परमात्मा में आस्था व अंतर्मन में निहित दैवीय शक्तियों पर विश्वास रखने से ही वह आगामी आपदाओं से लोहा ले सकता है।
छोटी सोच, शंका को जन्म देती है और बड़ी सोच समाधान को। ‘सुनना सीख लो, सहना स्वत: सीख जाओगे।’ इसके निमित्त हमें अपनी सोच को बड़ा बनाना होगा; उदार-हृदय बनना होगा, क्योंकि छोटी सोच का दायरा बहुत संकुचित होता है और व्यक्ति कूप-मंडूक बन उसी भंवर में गोते लगाता रहता है और प्रसन्न रहता है। उसके अतिरिक्त न वह कुछ जानता है, न ही जानने की इच्छा रखता है। वह इसी भ्रम में जीता है कि उससे अधिक बुद्धिमान कोई है ही नहीं। सो! वह कभी भी दूसरे की सुनना पसंद नहीं करता; अपनी-अपनी डफली बजाने व राग अलापने में सुक़ून का अनुभव करता है। दूसरे शब्दों में वह केवल अपनी-अपनी हांकता है और शेखी बघारता है। उसे न किसी से कोई संबंध होता है, न ही सरोकार। परंतु समझदार व सफल मानव दूसरे की सुनता अधिक है, अपनी कहता कम है। सो! डींगें हांकने वाला व्यक्ति सदैव मूर्ख कहलाता है। उसे अभिमान होता है, अपनी विद्वत्ता पर और वह स्वयं को सबसे अधिक बुद्धिमान प्राणी समझता है। वह सारा जीवन उसी भ्रम में व्यर्थ नष्ट कर देता है। जीवन के अंतिम क्षणों में वह लख चौरासी से भी मुक्ति प्राप्त नहीं कर सकता।
ग़ौरतलब है कि हर समस्या के केवल दो विकल्प नहीं होते…परंतु मूर्ख व्यक्ति इसी भ्रम में रहता है और तीसरे विकल्प की ओर उसका ध्यान कदापि नहीं जाता। यदि उसकी सोच का दायरा विशाल होगा, तो समस्या का समाधान अवश्य निकल जाएगा। उसे आंसू नहीं बहाने पड़ेंगे, क्योंकि संसार दु:खालय नहीं, बल्कि सुख और दु:ख तो हमारे अतिथि हैं; आते-जाते रहते हैं। एक के जाने के पश्चात् दूसरा स्वयमेव प्रकट हो जाता है। उनमें से कोई भी स्थायी नहीं है। इसलिए वे कभी इकट्ठे नहीं आते। मानव को दु:ख, आपदा व विपत्ति में कभी भी घबराना नहीं चाहिए और न ही सुख में फूलने का कोई औचित्य है। दोनों स्थितियां भयावह हैं और घातक सिद्ध हो सकती हैं। इसलिए इनमें समन्वय व सामंजस्य रखना आवश्यक है। जो इनसे ऊपर उठ जाता है; उसका जीवन सफल हो जाता है; अनुकरणीय हो जाता है और वह महान् विभूति की संज्ञा प्राप्त कर विश्व में गौरवान्वित अनुभव करता है। उसे भौतिक व सांसारिक सुख, प्रलोभन आदि आकर्षित नहीं कर सकते, क्योंकि वे उसे नश्वर भासते हैं। ऐसा नीर-क्षीर विवेकी मानव हर स्थिति में सम रहता है, क्योंकि वह सृष्टि के परिवर्तनशीलता के सिद्धांत से अवगत होता है। वह जानता व समझता है कि ‘जो जन्मता है, मृत्यु को अवश्य प्राप्त होता है। इसलिए उसका शोक क्यों?’ ऐसे व्यक्ति के मित्र व शत्रु नहीं होते। वह अजातशत्रु कहलाता है। वह सबके हित व मंगल की कामना करता है; किसी के प्रति ईर्ष्या व द्वेष भाव नहीं रखता और स्व-पर से बहुत ऊपर उठ जाता है। सब उसकी प्रशंसा करते हैं तथा उसका साथ पाने को आकुल-व्याकुल रहते हैं। सो! वह सबकी आंखों का तारा हो जाता है और सब उससे स्नेह करते हैं; उसकी वाणी सुनने को लालायित व व्यग्र रहते हैं तथा उसका सान्निध्य पाकर स्वयं को धन्य समझते हैं।
वह मौन को नव-निधि स्वीकारता है और इस तथ्य से अवगत रहता है कि नब्बे प्रतिशत समस्याओं का समाधान मौन रहने तथा तत्काल उत्तर देने व तुरंत प्रतिक्रिया व्यक्त न करने से हो जाता है। जीवन में समस्याओं से उसका दूर का नाता भी नहीं रहता। ‘एक चुप, सौ सुख’ बहुत पुरानी कहावत है, जो कल भी सत्य व सार्थक थी; आज भी है और कल भी रहेगी। इसलिए मानव को जो घटित हो रहा है; उसे साक्षी भाव से देखना चाहिए। उन परिस्थितियों में सहजता बनाए रखनी चाहिए तथा संबंधों की अहमियत स्वीकारनी चाहिए। रिश्ते हमारे जीवन को हर्ष, उल्लास, उमंग व उन्माद से आप्लावित व ऊर्जस्वित करते हैं तथा मौन में वह संजीवनी है, जिसमें सभी असाध्य रोगों का शमन करने की शक्ति है, क्षमता है, सामर्थ्य है। सो! एकांत व ख़ामोशी को अपना साथी समझ मौन को जीवन में धारण करना श्रेयस्कर है, क्योंकि यही अलौकिक आनंद व जीते जी मुक्ति पाने का उपादान है, सोपान है।