मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 108 ☆ भाजीवाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 108 ☆

☆ भाजीवाला ☆

आहे कोरोना हा आला

विश्वाला हे सांगण्याला

धंदा भाजीचा देखील

खूप असतो चांगला

 

होतो आयटीत मीही

घरामध्ये राजेशाही

गाडी बंगला कर्जाने

होता मीही घेतलेला

 

होती नोकरी सुटली

सारी प्रगती खुंटली

पोटासाठी विकला मी

गाडीमध्ये भाजीपाला

 

नशिबाची आहे खेळी

वेळ आली काय भाळी

भाजीवाला काय आहे

आज कळले हे मला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुखवटे – सुश्री शिल्पा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ?

मुखवटे – सुश्री शिल्पा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

जगाच्या कानाकोपर्‍यातून जमलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या गाठीभेटी. सिऍटलमधे नुकताच पार पडलेला पुतण्याचा मनोरम्य हृदयस्पर्शी  लग्नसोहळा. एकत्र आलेली दोन कुटुंबे आणि दोन् भिन्न संस्कृतींचा संगम. आणि आता  लग्नघरातून परतताना जडावलेली पावले. 

सिऍटलहून विमानप्रवास करुन आम्ही फिनीक्स स्कायहार्बरवर उतरतो. सामान गोळा करुन बाहेर येतो.  माझा नवरा उबर टॅक्सी बोलावतो. ती पाच मिनिटात येते. सामान ट्र्ंकमधे ठेवले जाते. मी माझ्या सासर्‍यांना हात धरुन पुढच्या सीटवर बसवते. पट्टा लावून देते. मागच्या सीटवर माझा नवरा, मुलगी आणि मी असे स्थानापन्न होतो. एकदम नवीन असलेल्या आलिशान लेक्ससमधून पोटातले पाणीही न हलता आम्ही निघतो. पोटातले पाणी स्थिर राहाते तसे डोक्यातले विचार मात्र कितीही सुखदायी गाडी असेल तरी स्थिर कुठे राहतात? माझ्या डोक्यात चक्रे सुरु होतात. 

आधी घरी गेल्या गेल्या काहीतरी गरम जेवण बनवायला हवे असते. कोणीच दुपारचे जेवलेले नसते. ब्याऐंशी वर्षांचे वृद्ध सासरेही थकलेभागलेले दिसत असतात.  मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी करु हे मनाशी ठरते. कपडे धुवायला लावायला हवे असतात. दुसर्‍या दिवशी सकाळी कामासाठी लगेच निघायचे असल्याने त्याचीही तयारी करायची असते. लॉसएंजेलिसला सकाळी लवकारची फ्लाईट असते. त्याचे चेकइन मी फोनवरून लगेच करून घेते. कामाच्या जागी देण्यासाठी काही डॉक्युमेंट्स बनवायची असतात. दोन आठवड्याने असलेल्या युजर कॉन्फरन्साठी तयारी करायची  असते. टॅक्सीत बसल्या बसल्या मनातल्या मनात माझे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवणे सुरु होते.  त्याच्या दुसऱ्या स्लाईड पर्यंत मी येते. 

“तुम्ही एअरफोर्समधे आहात?” माझा नवरा उबरवाल्याला विचारतो. त्याचे नाव शेन असते.  त्याने सामान ठेवताना तिथे एरफोर्सचा  युनिफॉर्म ट्रंक मधे बघितलेला असतो. शेन म्हणतो, “येस… मी फ्लोरिडा आणि टेक्ससमधल्या  एअरफोर्सबेसवर कॅडेट इन्सट्र्क्टर आहे.” तो इतर माहीतीही देतो. फिनिक्सपासून शंभर मैलावर त्याचे घर असते. तो फुटबॉल गेम बघायला आलेला असतो आणि आता जाता जाता काही उबर बिझिनेस मिळाला, तर तो करुन तो रात्रीचा घरी परतणार असतो. “या महागड्या गाडीची किंमत भरुन काढण्यासाठी उबर चालवण्याचा धंदाही तो करतो साईडला” हेही तो हसतहसत सांगतो. एअरफोर्स म्हटल्यावर माझ्या डोक्यातले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन थांबते. पाचव्या स्लाईडला मी बुकमार्क करते. संभाषणात मधेच पडून मी त्याला सांगते की त्याच्याशेजारी इंडिअन एअरफोर्समधला फेलो सर्व्हिसमन बसला आहे. माझे सासरे एकेकाळी इंडिअन एअरफोर्समधे रडार इंजिनिअर असतात. मग त्या योगायोगाबद्दल आश्यर्य व्यक्त केले जाते. दोघेही एकमेकांच्या कामाबद्दल चर्चा करतात. १९६२ साली ते कसे मिसिसिपीला आलेले असतात ह्याची देवाणघेवाण होते.  शेन अभिमानाने त्याची मुलगी एम्बरी रिडल युनिव्हर्सिटीत पायलट बनण्याचे शिक्षण घेत असल्याचे सांगतो. 

मी पाचव्या स्लाईडकडे परत वळते. इतक्यात पुढून परत एक प्रश्न येतो. मागच्या सीटच्या रोखाने. “So  what do you do?” माझ्याही नकळत मी उत्तरासाठी तोंड उघडते. पण तो प्रश्न हवेत असतानाच, बाउंड्रीवर बॉल पकडावा, तसा अलगद माझ्या नवऱ्याने केंव्हाच झेललेला असतो. तो त्याचे प्रोफेशन आणि सर्व काही विशद करून सांगू लागलेला असतो. माझे उत्तर देण्यासाठी उघडलेले तोंड बंद व्हायला वेळ लागतो. नवऱ्याचे उत्तर देऊन संपते. टॅक्सीत थोडावेळ शांतता पसरते. मग माझी मुलगी कुठल्या शाळेत आहे, हवामान कसे बदलते आहे याची चर्चा सुरु होते.  

माझ्या पॉवरपॉइन्टच्या स्लाईडचा बुकमार्कच हरवून जातो. जे काही क्षणाभरापूर्वी घडले ते माझ्या डोक्यात फेर धरू लागते. “तुम्ही काय करता”, हा प्रश्न किती सहजपणे फक्त मलाच विचारला असणार असे नवऱ्याला वाटलेले असते. उबरवाल्यानेही तो रिअर व्ह्यू आरशात बघत त्यालाच विचारला हा त्याचा दावा असतो. माझ्या नवऱ्याने उत्तर दिल्यावर मला काही विचारावे असे त्या उबरवाल्याला वाटलेलेही नसते की जास्त चौकशा नकोत म्हणून तो गप्प असतो? की बायका, त्यातूनही भारतीय, कदाचित काही करत नसाव्यात असे त्याला वाटले असावे. त्याने मला विचारले नाही ह्याचे शल्य असते असेही नाही. आणि असेही नसते की त्याने जाणूनबुजून हे केलेले असते. त्यातूनही त्याची स्वतःची मुलगी तर आता पायलट बनत असताना असे बुरसटलेले विचार कुणाचे असावेत हेही पटत नाही. मग हे नेमके असते तरी काय? की हि विचारसरणी कुणा एखाद दुसऱ्या माणसाची नसून हे समाजमनाचे प्रतिबिंब असते म्हणून मला जास्त खटकते? जागा-वेळ-काळ-देश बदलेले तरी त्या टॅक्सितल्या दोन पुरुषांनी किती प्रातिनिधिक स्वरूपात समाजमनाचे दर्शन दिले असे मला वाटून जाते. 

आमचे घर येते. माझ्या सासऱ्याना हात देऊन मी खाली उतरवते. ते उतरत असताना, शेन माझ्या सासऱ्याना म्हणतो, “Thank you for your service for the country, no matter what the country is.” मी त्याचे मनापासून आभार मानते आणि म्हणते, “Yes , but as for airforce, there is only one sky, and we all share it, no matter what country it is.” तोही मनापासून हसतो आणि संमतीदर्शक मान हलवतो. टॅक्सी निघून जाते. 

पुढे मला हेही म्हणायचे असते कि,  की याच आकाशात तुझी मुलगी पायलट होऊन उडणारे आणि याच आकाशाखाली कित्येक कर्तबगार स्त्रिया या जगाचे रहाटगाडगे नीट चालावे म्हणून कष्ट करत आहेत आणि यशस्वी होत आहेत. मात्र ते मनातल्यामनात राहून जाते. 

मी घरात येते. बॅगा ठेऊन हात धुऊन खिचडी फोडणीला टाकायला घेते. गौरी नुकत्याच होऊन गेलेल्या असतात. उभ्याच्या गौरींचे दोन मुखवटे असतात म्हणे.  त्यातला घर सांभाळणाऱ्या गृहिणीचा, या संध्याकाळसाठी मी तोंडावर चढवते. आणि दुसरा कोर्पोरेट एक्झिक्युटिव्हचा,  दुसऱ्या दिवसाच्या फ्लाईट साठी ठेऊन देते. 

देवघरात ठेवलेल्या आदिमाया-शक्तीची साग्रसंगीत पूजा, उपास-तापास नवरात्रीचे दिवस असल्याने घराघरात सुरु असतात.  

आणि एकीकडे खिचडीच्या फोडणीसोबत माझ्या पॉवरपॉईंट स्लाईड्स खमंग बनू लागतात. 

ले.: सुश्री शिल्पा कुलकर्णी 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मांडवावरची वेल ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मांडवावरची वेल ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

आमच्या घरी सरुबाई  खूप वर्षे काम करतात. अतिशय गरीब, प्रामाणिक, आणि कष्टाळू. त्या दिवशी खूप अस्वस्थ होत्या.  सकाळी चहा पण नको म्हणाल्या.

“ काय झालय सरुबाई.” 

“ काय न्हाय व रोजचे तमाशे.. जीव नुसता नको झालाय. रोज रोज कटकटी, भांडणतंटे.

मुलं मोठी झाली तरी अक्कल येईना या नवऱ्याला,.दारू तरी किती ढोसावी–आता  ही पोरं शिकून मार्गी लागली तरच आशा– कसलं व हे  जिणं. बघा ना, तुमच्या ताई एवढंच असेल माझं थोरलं. ताई आपल्या किती अब्यास करत असतात ते बघतेय ना मी. आणि आमचं दिवटं–

अक्खा दिवस वस्तीत फिरत असत्यय शाळा बुडवून. आमची वस्ती ही अशी. बाई वेळ नाही व लागत बिगडायला. न्हाय म्हणायला,पोरगी मात्र आहे हुशार  पण किती व काम लागतं तिला बी घरात.” 

सरुबाईची समजूत घालून, खायला देऊन, पाठवले खरे,पण मन मात्र अस्वस्थच होते.

दिवस पळत होते. माझ्याच आयष्याची लढाई लढताना, मी तरी कुठे कोणाकोणाला पुरणार होते? —

दरम्यान,माझ्या हॉस्पिटलने चांगलाच जीव धरला। खूप छान चालायला लागले। मला दिवसाचे 24 तास पुरेनासे झाले आता मी सरुबाईना पगार वाढवला. माझ्या हॉस्पिटलच्या पेशंटचे जेवणखाण त्या करू लागल्या. मला ती काळजीच उरली नाही. मध्ये मध्ये समजायचे, मुलगी छान मार्क मिळवतेय, पण मुलगा काहीही करत नाही. नुसता अड्ड्यावर बसून जुगार खेळतो.

 –आम्ही बघण्या खेरीज काहीच करू शकत नव्हतो.

सरूबाईंची  मुलगी खूप वेळा यायची आईला मदत करायला. मोठी गोड मुलगी. वेळ मिळाला, की अभ्यासाचे पुस्तक उघडून बसायची. मला मोठे कौतुक वाटायचे तिचे..काही अडले,तर माझ्या मुलीला विचारायची—

त्या दिवशी मला तिने प्रगती पुस्तक दाखवले. कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकणाऱ्या या पोरीला आठवीत  ९0 टक्के मार्क्स होते, पाच तुकड्यात ती पहिली आली होती.

आम्हाला अत्यंत आनंद झाला.आणि कौतुक वाटले. मी तिला मोठे बक्षीस दिले.  माझ्या मुलींनीही  तिला सांगितले, “ हे बघ,राधा,आता मागे वळून बघू नको. खूप हुषार आहेस तू.

आत्ता वाटेल तेवढे कष्ट कर, पण या परिस्थितीतून तू स्वतःला बाहेर  काढ. अग, हेही दिवस जातीलच. आम्ही आहोत ना–कोणतीही मदत लागेल ती माग.” 

राधाला दहावीला 92 टक्के मार्क मिळाले. मला विचारायला आली—

“ बाई, यापुढे मी काय करू? आई तर माझं लग्न करायला निघालीय, पण बाई,मला शिकायचंय  हो। मला तुमच्यासारखे मोठे व्हायचंय. मला डॉक्टर तर होता येणार नाही, पण निदान  काहीतरी करून दाखवायचं आहे. ”

तिची तळमळ अगदी काळजाला भिडली. सरुबाईना बोलावले आणि म्हटले,

“ लग्न  करताय हो राधाचे? वाटतंय का जीवाला काही ?  द्या असाच दारुडा बघून, की सुटलात. 

जरा धीर धरा सरुबाई. ही मुलगी खरंच पुढे जाईल, पांग फेडील तुमचे. मी भरते तिची सगळी फी यापुढे.. “ 

“ अव, फी मस भराल बाई, पण लोक काय म्हणतील ? आणि हिला शिकलेला नवरा कुठून आणू मग.? “

मी चिडून म्हणाले,” गप बसा. आणेल  तिचा ती शोधून. जा ग राधा, मी घेईन सगळी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी.” 

राधा 12  वी झाली. इतके सुरेख मार्क होते, की  तिला कुठेही सहज प्रवेश मिळू शकत होता.

पुन्हा राधा माझ्याकडे आली.‘ आता काय? ‘हा प्रश्न होताच कायम. माझी बहीण डि. एड.  कॉलेजची प्रिंसिपल होती।

आधी राधाला विचारले, “ तुला शिक्षक  व्हायला आवडेल का? बघ–तू  2 वर्षात डी एड होशील, आणि लगेच नोकरीही लागेल. मग बाहेरून कर बी. एड. नाही तर तुला नर्सिंगचाही पर्याय आहे–सहज मिळेल तुला ऍडमिशन दोन्हीकडे. “ 

राधा म्हणाली, “ बाई,मी जर नर्सिंग केले, तर मला सगळे फ्री होईल ना? हॉस्टेल, स्टायपेंड? “ 

” अर्थात राधा.  तुला काहीही खर्च नाही पडणार.” 

राधाने बी. एस्सी. नर्सिंगला  ऍडमिशन घेतली. तिची जिद्द कायम होती. राधा आता एकदम स्मार्ट झाली.  दिसायला  छान होतीच, पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज दिसू लागले.

राधा बी. एस्सी. ला डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. लगेच तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला. फुल युनिफॉर्ममधली राधा माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले.  किती सुंदर दिसत होती राधा.

तीनच वर्षात राधा चीफ स्टाफ झाली. ‘ ऑपरेशन थिएटर सिस्टर ’ अशी मोठी जबाबदारीची पोस्ट  तिला मिळाली.

एक दिवस ती माझ्या घरी एका मुलाला घेऊन आली—” बाई,आता हाही प्रश्न  तुम्हीच सोडवायचा– नेहमी सारखा. “ 

राधाच्या चेहऱ्यावर लाजरे हसू होते. 

“ बाई हा सतीश. माझ्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. एम.कॉम. आहे, आणि हॉस्पिटल ऍडमीनमध्ये आहे.  मला लग्न करायचंय याच्याशी. “ 

मी सतीशची माहिती विचारली. छानच होता मुलगा. स्वतःचा छोटा फ्लॅट होता. आईवडील गावी असायचे. पगारही चांगला  होता. पण सरुबाई —“ बाई ,जातीचा न्हाय आमच्या हा. “ 

“ सरुबाई, बास झाले. काय केलेत हो आजपर्यंत या लेकरासाठी तुम्ही? लग्नासाठी  एक पैसाही न मागणारा असा उमदा जावई आपणहून दारात येऊन उभा राहिलाय. आणि मुले मोठी आहेत आता. मुकाट्याने परवानगी द्या. नाही तर ती लग्न करूनच येतील.” 

सरुबाईना पटले– साधेसुधे लग्न झाले. किती सुंदर दिसत होती जोडी. मला वाकून नमस्कार करताना राधा म्हणाली, “ बाई तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्या दोन, तशीच तिसरी  मुलगी मानलीत मला .” राधाने  मला मिठी मारली. मला  खूप समाधान मिळाले. 

केव्हाही पायदळी तुडवली जाईल अशी ही वेल,  माझ्या हातून मांडवावर चढवली गेली.

आता ती फुलेल फळेल—- आणि समाधान मला मिळेल. 

देवानेच हे काम करून घेतले होते माझ्याकडून. 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बोधकथा – कर्माची परतफेड ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ बोधकथा – कर्माची परतफेड ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

एकदा एका राजाने आपल्या तीन मंत्र्यांना,  “ तुम्ही जंगलात जाऊन एक एक पोते भरून फळे घेऊन या “, असा आदेश दिला. 

पहिल्या मंत्र्याने विचार केला की, प्रत्यक्ष राजानेच आपल्याला फळे आणायला सांगितली आहेत, म्हणून आपण चांगल्या प्रतीचीच फळे घेऊन गेले पाहिजे. त्याप्रमाणे त्याने चांगली फळे शोधून घेतली.

दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजाने सांगितले आहे तर खरे, पण राजा तर इतर कामात इतका व्यस्त असतो की, तो कशाला एक एक फळ तपासून पाहणार आहे? म्हणून त्याने मिळतील ती चांगली वाईट फळे आणली.

तिसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजा कशाला पोते उघडून पाहणार आहे की, त्यात फळे आहेत की आणखी काही ? तो तर बाहेरून फक्त पोत्याचा आकार पाहील, म्हणून त्याने जंगलात न जाताच पाला पाचोळा आणि फळांच्या आकाराचे दगड धोंडे भरून आणले.

दुसऱ्या दिवशी तिघेही मंत्री आप आपली पोती घेऊन दरबारात हजर झाले. फळे काय आणि किती आणलीत हेही न पाहता राजाने प्रधानजींना आदेश दिला की, या तिघांनाही राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना स्थानबद्ध करण्यात यावे आणि त्यांनी जमा करून आणलेल्या फळां व्यतिरिक्त इतर आहार त्यांना देण्यात येऊ नये.

पहिल्या मंत्र्याने चांगली फळे जमा केली होती, त्यामुळे त्याने चांगली फळे खात खात एक महिना मजेत घालवला.

दुसऱ्या मंत्र्याने जी काही चांगली फळे जमा केली होती त्यावर थोडे दिवस चांगले घालवले पण पुढे कच्ची आणि सडलेली फळे खावी लागल्यामुळे तो आजारी पडला.

तिसऱ्या मंत्र्याने दगडधोंडेच जमा करून ठेवल्यामुळे त्याची तर पहिल्या दिवसापासूनच उपासमार झाली.

तात्पर्य :~

चांगल्या वाईट कर्माचे फळ योग्य वेळ येताच त्याच्या त्याच्या कर्त्याला न चुकता शोधून काढते.

 

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या नक्षत्रांचे लक्ष दिवें…

निळ्या नभावर रांगोळीसम उडती चंचल पक्षि-थवें…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

वेलींवरती फुलें उमलती रोज लेउनी रंग नवे…

वृक्ष बहरती, फळें लगडती गंध घेउनी नवे नवे…

हरिततृणांच्या गालीच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

डोळयांमधली जाग देतसे नव-दिवसाचे भान नवे..

अमृतभरल्या जीवनातले मनी उगवती भाव नवे…

प्रसन्न होउन निद्रादेवी स्वप्न रंगवी नवे नवे …

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

कोण आप्त तर कोणी परका उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे, नाम तयाचे नित ध्यावे…

नको अपेक्षा, नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

जय गजानन, गण गण गणात बोते,

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की#60 – दोहे ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  लेखनी सुमित्र की #60 –  दोहे 

 

आंसू बहते रात दिन, चिथड़ा हुआ नसीब ।

कोई धनी धोरी नहीं, कितना सही गरीब।।

 

आंसू बहते हैं मगर के, पहचानेगा कौन।

 नेता आंसू बाज हैं, तुरत बदलते ‘टोन’।।

 

आंसू को मोती कहें, और आंख को सीप।

उसकी उतनी अहमियत, जितना रहे समीप।।

 

गर्व गरूरी को लगे, तृण भी तीर समान ।

इसीलिए तो कर रहे, आंसू का अपमान।।

 

कोहिनूर है आंख का, आंसू है अनमोल ।

तीन लोक की संपदा, सके न इसको तोल।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 60 – कानपुर-  उन्नाव से ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “कानपुर-उन्नाव से । )

☆ साप्ताहिक स्तम्भ # 60 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || कानपुर-  उन्नाव से || ☆

 

एक ठोकर  भर बचा हूँ

बस तुम्हारे पाँव से |

क्यों करोगे याद  मुझको अब

भला गुड़गाँव से ||

 

धुल गया अहसास मीठा 

जल तरंगों का |

लौटआया स्नेह दिलकश 

धनक रंगों का |

 

बहुत धीमी बजी मादल

देह छत की छाँव से ||

 

आँख मेरी तभी से

कहती रही है क्या ?

गोमती जैसे अवध

बहती रही गोया |

 

थक गया है बहुत आँचल  

कानपुर- उन्नाव से ||

 

बिखरती जैसे रूई

बस थम गई है ना !

फिर पिघलती बर्फ की

चुप – चुप लगी मैना |

 

भर गई है नेह छागल 

अधूरे ठहराव  से ||

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

07-05-2019

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जाई ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – जाई ?

वह कहकर

दर्शाती रही

अपना नेह,

वह लिखकर

जताती रही

अपना स्नेह,

मैं बावरा

डूबा रहा

अनुभूति में ही,

माना कि

अभिव्यक्ति की

अपनी गहराई होती है,

पर सुनो,

अभिव्यक्ति,

अनुभूति की जाई होती है!

©  संजय भारद्वाज

(रात्रि 10.11 बजे, 25.9.19)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा कहानी # 106 ☆ वापिसी ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।आज प्रस्तुत है एक विचारणीय  कथा ‘वापिसी’).   

☆ व्यंग्य # 106 ☆ वापिसी ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

दस दस घरों के पांच टोले मिलाकर बना है कसवां गांव। गांव के एक टोले के खपरैल घर के अंदर गोबर से पुते चूल्हे के पास मुन्ना पैदा हुआ। पैदा होते ही खिसककर चूल्हे में घुस गया।  धीरे धीरे मुन्ना बड़ा हुआ।

मुन्नालाल गांव के सम्पन्न घरों के बड़े लड़कों को लोहे का रिंग दौड़ाते देखता तो उसका मन भी रिंग के साथ दौड़ने लगता। उसके घर में ऐसा कोई रिंग नहीं था जिससे वह अपनी ललक पूरी कर लेता। दिनों रात रिंग के जुगाड की ऊहापोह में वह परेशान रहता।एक रात मुन्ना ने सपना देखा, सपने में उसे कोयले की सिगड़ी दिखी जिसमें एक रिंग लगा दिखा। सपने की बात उसने जब मां को बताई तो मां ने कहा कि बहुत साल पहले जब उसके ताऊ जी शहर से नौकरी छोड़कर आये थे तो सामान के साथ पुरानी सिगड़ी भी थी जिसे गाय भैंस बांधने वाली सार के पीछे फेंक दिया गया था, फिर वह मिट्टी में दबती गई और उसका पता नहीं चला। सुबह उठते ही मुन्ना लाल ने सिगड़ी की तलाश करना चालू कर दिया, मिट्टी खोदने के बाद उसे सपने में देखी वही सिगड़ी मिल गई,मुन्नालाल की बांछें खिल गई। मुन्ना लाल ने सिगड़ी के सड़े-गले टीन को तोड़कर उसमें से एक सबूत छोटा सा रिंग निकाल लिया, उसे बड़ा सुकून मिला चूंकि अब वह भी गांव के अन्य लड़कों की तरह रिंग लेकर दौड़ सकता था।उसे लगा जैसे उसने दुनिया जीत ली। दिन दिन भर वह रिंग लेकर दौड़ लगाता रहता,खाना पीना भी भूल जाता। गांव के गरीब घर का बेटा लोहे का रिंग लिए खेले,यह बात कुछ लोगों को अच्छी नहीं लगती थी। जबकि मुन्ना लाल ने यह रिंग अपने बुद्धि कौशल से प्राप्त किया था।जब यह बात उसके बाबू को पता चली तो बाबू को लगा कि हमारा मुन्ना लाल होनहार लड़का है, अचानक बाबू के अंदर उम्मीदों का रेला बह गया, उसके बाबू तुरन्त उसके पढ़े-लिखे फूफा के पास मुन्ना लाल को ले गए और उनसे सारी बात बताई।

फूफा ने कहा- इसका मतलब लड़के के अंदर वैज्ञानिक सोच है, इसे अच्छे स्कूल में पढ़ाना चाहिए,यह बड़ा होकर बड़ा वैज्ञानिक बन सकता है। बाबू गरीब था, लड़के को अच्छे स्कूल में पढ़ाना सपने की बात थी। गांव के फटेहाल स्कूल में पढ़ाने के अलावा कोई चारा नहीं था, पर मुन्ना लाल के फूफा ने बाबू के अंदर अजीब तरह की उम्मीदें भर लीं थीं, उसके अंदर कुलबुलाहट होती रहती कि थोड़ा बड़ा होने के बाद शहर के अच्छे स्कूल में मुन्ना लाल का दाखिला करायेगा।

मुन्ना लाल उस सिगड़ी के रिंग को दौड़ाते दौड़ाते बड़ा हो गया,गांव के सम्पन्न घरों के लड़के उसके लिंग से चिढ़ते,उस पर हंसते। ऐसा भी नहीं था कि सम्पन्न परिवार के लड़कों के रिंग कोई सोने चांदी के बने थे या उनमें कोई अजूबा था,मात्र कुछ रुपए देकर गांव के लुहार से उनके रिंग बने थे, मुन्ना लाल का रिंग मुफ्त में धोखे से मिल गया था, मुन्ना लाल के बाबू गरीब थे उनके पास लुहार को देने के लिए पैसे नहीं थे।

मुन्ना लाल बड़ा होता गया, उसे शहर में उसके फूफा के पास पढ़ने को छोड़ दिया गया,वह पढ़ता गया, और बड़ा इंजीनियर हो गया। एक बड़े सरकारी संस्थान में महत्वपूर्ण पद मिल गया, विभाग वाले उसे अब एम एल साब कहने लगे। शादी हुई इंजीनियर लड़की से। दो बच्चे भी तीन साल में हो गये, फिर एक दिन सरकारी काम से मुन्ना लाल अमेरिका के लिए उड़ गए। गांव के उस छोटे से टोले के खपरैल घर की टूटी खटिया में लेटे लेटे बापू ने ये सब बातें खांसते खांसते सुनी, बापू को संतोष भी हुआ और मुन्ना लाल को देखने की ललक पैदा हुई,पर लम्बी बीमारी और बेहिसाब कमजोरी ने खाट से उठने नहीं दिया।

बीच बीच में सुनने में आया कि मुन्ना लाल कनेडियन लड़की के साथ रहने लगे हैं, फिर छै महीने बाद सुनने में आया कि कनेडियन लड़की से अलग होकर अब पाकिस्तानी लड़की के साथ घर बसा लिया है। बीच बीच में अपनी असली पत्नी पत्र भेज देते, थोड़ा पैसा भी भेज देते।जो लोग अमेरिका से छुट्टियों में इंडिया लौटते वे लोग मुन्ना लाल के बड़े रोचक कारनामे सुनाते। बात फैलते फैलते कसवां गांव तक जाती, गांव के लोग सुनकर दांतों तले उंगली दबाते। बीच में एक बार मुन्ना लाल की ओरिजनल पत्नी बच्चों के साथ अमेरिका गयी तो मुन्ना लाल के रंगरेलियां देख कर हताश होकर लौट आयी।

मुन्ना लाल के हर नये चरचे पर गांव के लोग शर्म से पानी पानी हो जाते, फूफा को गलियाते,बाबू अपनी गलती पर पछताते, मुन्ना लाल के बचपन के साथी गांव की चौपाल में हंसी उड़ाते।

एक नई ताज खबर चलते चलते इन दिनों कसवां गांव पहुंची है, मुन्ना लाल के हम उम्र दिलचस्प खबर सुनने बेताब हैं, सुना है कि मुन्ना लाल तीस पेंतीस साल बाद कसवां गांव आने वाले हैं।लोग कहते काहे को आ रहा है, मां बाप को बिलखता छोड़ खुद ऐश करता रहा,एक एक दाना को मां बाप तरसते तरसते मर गए। मां बाप के मरने पर भी नहीं आया,अब काहे को आ रहा है गांव।

एक दिन मुन्ना लाल अमेरिकी संस्कृति लिए गांव पहुंचे। गांव आकर पता चला कि उसके माता-पिता कठिन परिस्थितियों में रहते हुए भूखे प्यासे दुनिया छोड़ चुके थे। बहुत दिन बीत गए थे, उनकी आत्मा की शांति के लिए मुन्ना लाल गांव के गेवडे़ के पीपल के नीचे मिट्टी का दिया जलाकर आंखें मूंदे खड़े हो गए,उसी समय गांव के दो छोटे लड़के लोहे का रिंग लेकर दौड़ते हुए वहां से गुजरे… उसे अचानक याद आया… बचपन में इस लोहे के रिंग को लुहार से बनवाने के लिए उसके बाबू के पास पैसा नहीं था। उसे याद आया, टूटी-फूटी टीन की सिगड़ी को तोड़कर जब उसने रिंग बनायी थी और गांव के सम्पन्न घराने के लड़कों की सम्पन्नता को उस छोटे से रिंग से मात दी थी, फिर उसे याद आया कि वह शायद बचपन में टूटी सिगड़ी से बनाए गए रिंग को शायद वह अमेरिका ले गया था।नम आंखों से मुन्ना लाल ने तय किया कि वह तुरंत अमेरिका पहुंचकर बचपन में बनाये गये उस रिंग की तलाश करेगा और उस रिंग को बाबू की संगमरमर की विशाल प्रतिमा के हाथों में पकड़ा देगा। उसने तय किया कि उस विशाल प्रतिमा को गांव के बीच के चौराहे पर खड़ा करेगा और मूर्ति के उदघाटन के लिए पाकिस्तानी पत्नी ठीक रहेगी या पुरानी भारतीय पत्नी…. इसी उहापोह में मुन्ना लाल पीपल के नीचे खड़ा बहुत देर तक रिंग चलाते बच्चों को देखता रहा। उसने जैसे ही उन खेलते बच्चों को आवाज दी, हवा के झोंके से मिट्टी का दिया बुझ गया और पीपल के पत्ते खड़खड़ाकर आवाज करने लगे, उसे लगा चारों तरफ के पेड़ लड़खड़ाते हुए हंस रहे हैं और उसके नीचे की जमीन खिसक रही है।

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी #50 ☆ #  रामराज्य  # ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे 

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी नवरात्रि पर्व पर विशेष कविता “#  रामराज्य  #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 50 ☆

☆ #  रामराज्य  # ☆ 

हमने लोगों का अनुकरण किया

दशहरे के पर्व में साथ दिया

हर्ष और उल्लास से

दशानन का दहन किया

 

सोना बांटा, हाथ मिलाया

सबको अपने गले लगाया

चेहरे पर मुखौटा लगाए

कृत्रिम हंसी से दिल बहलाया

 

रात को सोये, सुबह को जागे

दौड़ में शामिल भागे भागे

भूल गये सब ज्ञान की बातें

“अर्थ” ही है सबसे आगे

 

जीवन में जरूरी है दाम

पद, प्रतिष्ठा, ऊंचा नाम

जीवन-मूल्य गौण हो गये

ना कोई रावण, ना कोई राम

 

सत्य-असत्य में द्वंद है

सत्य पिंजरे में बंद है

असत्य का है बोलबाला

सत्य के नाम पर पाखंड है

 

ना हम राम सा बन पायें

ना हम रावण को भूल पायें

दोनों हममे विद्यमान है

देश में,

फिर रामराज्य कैसे आये?

 

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares