मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शंख ☆ सुश्री नीरजा

? कवितेचा उत्सव ?

☆ शंख ☆ सुश्री नीरजा ☆ 

लहानपणी भातुकली खेळताना

रागाने पहिला डाव मोडून

मी दुसरा डाव मांडला,

तेव्हा तो म्हणाला,

‘तसं कोणाचंच कोणावाचून अडत नाही,

फक्त चालताना पाऊल अडखळलं

तर मागं वळता येत नाही.

चालता चालता आपणच रस्ते पुसून टाकलेले असतात.’

तेव्हा मी म्हटलं,

‘ तोल सावरला की,

पदरात पडलेले शंखही

सुरात फुंकता येतात.’

 

© नीरजा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 77 – मन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 77 – मन ☆

नको नको रे तू मना

मना असा उगा धावू।

धावुनिया विचारांना

विचारांची वाण लावू।

 

लावी न्याय, निती थोडी

थोडी कष्टाप्रती गोडी।

गोडी अवीट सत्याची

सत्यासंगे धर्म जोडी।

 

जोडी मनांची शृंखला

शृंखलेत गुंफी  मोती।

मोती विचारांचे लाखो

लाखो पेटतील ज्योती।

 

ज्योतीच्या या प्रकाशाने

प्रकाशित  अंतरंग ।

अंतरंग शुद्ध ठेवी।

ठेवी दूर ते असंग।

 

असंगाचे मृगजळ

मृगजळ भासमान।

भासमान दिवा स्वप्नी

वास्तवाचे ठेवी भान

 

भान हरपूनी काम

कामामधे शोधी राम।

राम भेटता जीवनी

जीवनच चारी धाम।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाते जुळले मनाशी मनाचे ! ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ नाते जुळले मनाशी मनाचे ! ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही दिवसांपूर्वी पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे साहित्य पुन्हा एकवार चाळले गेले. “व्यक्ती आणि वल्ली” पुन्हा वाचताना ‛ते चौकोनी कुटुंब’ हातात आले. शिष्टाचाराच्या सर्व चौकटी असोशीने पाळणारे ते कुटुंब! खाणे- पिणे- हसणे- मनोरंजन या सर्वांच्याच चौकटी ठरलेल्या! ‛अगदी हसतानासुद्धा ओठ किती फाकवायचे?’ याचाही नियम ठरला असावा असे हे कुटुंब! पुलंच्या शैलीत हे सर्व वाचताना हास्याच्या उकळ्या फुटल्या नाहीत तर नवलच!

पण ते वाचतानाच माझ्या मनात विचार आला की प्रत्येक घरालाही स्वतःचा असा एक स्वभाव असतो. आणि त्यावरुन मग मला एक प्रसंग आठवला.मध्ये एकदा माझ्या एका मैत्रिणीकडे एक वस्तू अर्जंट द्यायला मी भर दुपारी गेले. माझ्या दुर्दैवाने नेमकी ती घरी नव्हती. मग ती वस्तू शेजारी ठेवून जावी म्हणून मी शेजारच्या घराची बेल दाबली. दोन मिनिटांनी त्या दाराची एक फट हळूच उघडली गेली व एक तिरसट स्वर कानी आला,“ काय्ये?” मी भीतभीतच माझे काम सांगितले. त्यावर, “दुसऱ्याच्या वस्तू आमच्या घरात ठेवायला हे काय गोडावून आहे काय?” असा प्रतिप्रश्न करुन दार धाड्कन लावून घेतले गेले. त्याचवेळी समोरच्या घरातील एक आज्जी हा प्रसंग पहात होत्या. माझा उतरलेला चेहरा बघून त्यांनी मला हाक मारली व घरात बोलावले. त्यांनी माझी चौकशी केली व माझ्याकडील वस्तू घेऊन ती मैत्रिणीला दयायचे आश्वासन दिले. शिवाय माझ्याशी थोड्या गप्पा मारुन सरबतही प्यायला दिले. मला एकदम प्रसन्न वाटले. चौकोनी कुटुंब डोक्यात असल्याने मी पहिल्या कुटुंबाला ‛ संकुचित कुटुंब’ असे नाव दिले तर आज्जीच्या वागण्याने त्या घराला घरपण देणाऱ्या कुटुंबाला मी ‛अतिथ्यशील कुटुंब’ असे नाव दिले.

काही कुटुंब इतकी ‛अघळपघळ’ असतात की यांच्या स्वभावापासून घरापर्यंत सर्व काही अघळपघळ असते. यांच्या घरात जागोजागी पसारा तर  असतोच पण यांच्या अतिथ्याचा पसाराही इतका अस्ताव्यस्त असतो की काही वेळा समोरची व्यक्ती त्या आदरातिथ्यानेच गुदमरुन जाते.

हे जसे कुटुंबाच्या स्वभावाचे झाले , तसे काही कुटुंबांना स्वतःचा गुणधर्म, वारसा असतो.वीणा देव, अरुणा ढेरे, प्रकाश संत या लेखक मंडळींच्या घरी भिंतीसुद्धा पुस्तकांच्या असाव्यात. म्हणूनच ही ‛ पुस्तकांची कुटुंबे’! तर मंगेशकर, शाहीर साबळे, आनंद – मिलिंद शिंदे यांच्या कुटुंबाला सुरांचे वरदान मिळाले आहे. म्हणून ही ‛गाणारी कुटुंबे’! आमट्यांच्या कुटुंबात सेवाभाव पिढीजात मुरलेला! म्हणूनच हे ‛समाजसेवी कुटुंब’! कपूर घराण्याला अभिनयाचा वारसा आहे. म्हणून ते ‛अभिनेत्यांचे’ कुटुंब!

पण यालाही काही अपवाद असतातच.घरात कसलेही शिक्षणाचे वातावरण नसताना ‛डॉ. आनंद यादव’, ‛नरेंद्र जाधव’, ‛ अब्दुल कलाम’ यासारख्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात उंच भरारी मारताना दिसतात.तर विद्वानांचे कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‛गोवारीकर’ कुटुंबात ‛वसंत गोवरीकरांसारखे’ शास्त्रज्ञ व ‛आशुतोष गोवारीकर’ सारखा अभिनेता – दिग्दर्शकही निर्माण होतात.

याउलट सध्या अशीही अनेक कुटुंब आहेत की त्यातील अनेक मुले- मुली कोणतीही पार्श्वभूमी नसताना सोशल मीडियावर आपला प्रभाव दाखवत आहेत. कलर्स मराठीवरील लोकप्रिय झालेला ‛मॉनिटर’ हर्षद नायबळ त्याचेच एक उदाहरण आहे. अशा अनेक वाहिन्यांवर अनेक हर्षद, अनेक लता-आशा, अनेक  शाहरुख-सलमान खान आजकाल बघायला मिळत आहेत.पण त्यातील ‛काळी बाजू’ पण लक्षात घेतली पाहिजे. काहीवेळा या प्रसिद्धीमुळे मुलांपेक्षा  पालकांचीच महत्वाकांक्षा वाढीस लागते आणि या कोवळ्या कळ्यांचे बालपणच हरवून जाते. आयुष्यात त्यांची झालेली एखादी हार त्यांचे पालकच सहन करु शकत नाहीत आणि मग असे कुटुंब ठरते  ‛अतिमहत्वाकांक्षी’! श्रीदेवी, मधुबाला याना लहानपणी हे भोगावे लागले आहे.

हल्लीच पालकांच्या अपेक्षा पूर्ण करु न शकल्याने एका तरुणीने आत्मदहन केले.मुंबईतील एका डॉक्टरच्या मुलीने आत्महत्या केली. आय.ए. एस. ऑफिसर असणाऱ्या एका जोडप्याच्या मुलाने इंटरनेटवरील गेमच्या आहारी जात स्वतःची जीवनयात्रा संपवली.दहावी- बारावीचे निकाल जवळ आल्यावर तर अशा अनेक घटना कानावर पडतात. मग प्रश्न पडतो “मुलांच्या या नकारात्मकतेला जबाबदार कोण? पालक, समाज की बदलती नीतिमूल्ये?” म्हणूनच आपल्यालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

घराला घरपण देतात ती माणसेच! कुटुंब परिपूर्ण, परिपक्व बनते ते त्यांच्यातील स्नेहाच्या बंधाने! रोज पायाशी घुटमळणारे मांजर, खिडकीत येणारे चिऊ-काऊ, दारात फुलणारी अबोली किंवा जाई-जुईसुद्धा या प्रेमाच्या धाग्याने फुलतात , बहरतात. मग घरातील माणसांमधील नातीसुद्धा या धाग्यातच गुंफली गेली तर कुटुंबातील व्यक्ती केंद्राभोवती  फिरणाऱ्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे कुटुंबातूनच ऊर्जा घेऊन उंच भरारी मारतील, पण त्याचवेळी एका धाग्याने घराशीही जोडले जातील. जिथे सुसंवाद असेल अशा अनेक कुटुंबांनी बनलेल्या समाजामध्ये आत्ताच्या काळात भेडसावणारी एकाकी पडणाऱ्या वृद्धांची समस्या, नकारत्मकतेकडे झुकणाऱ्या  युवा वर्गाच्या समस्या आणि या दोन पिढ्यांच्या कात्रीत सापडलेली मध्यमवयीन पिढीच्या समस्या आपण बऱ्याच अंशी सोडवू शकू.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

(चेरीने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेली सीमा चेरीने पाठवलेले पत्र टेबलावर भिरकावून देते. ज्यात तिने आपला जीवनपट मांडला आहे. पण त्याचे आता दूसरे वाचन चालू आहे……आता पुढे)

एके दिवशी आईनं सांगितलं ,”चेरी बेटा तुझं लग्न ठरवतोय. मुलगा देखणा आहे. तुमची जोडी फार शोभून दिसेल. शिवाय तो सी.ए.आहे. त्या फॅमिलीचे खूप बिजनेस आहेत… वेगवेगळ्या क्षेत्रातले …त्या सर्वांची मॅनेजमेंट त्याच्याच हातात आहे. घराणं आपल्यापेक्षा धनाढ्य आहे. जॉइंट फॅमिली आहे. लोक फार चांगले आणि शिकले-सवरलेले पण आहेत. एकदा तुझं लग्न झालं की तुझ्या भैयाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याबरोबर मलाही साउथ आफ्रिकेत शिफ्ट व्हावे लागेल .तुझं माहेरी येणं…. आपली पुन्हा भेट होणं…. कितपत शक्य होईल? काहीच माहित नाही. या सगळ्या  विचारांनीच माझा जीव तिळतिळ तुटतोय …माझी रात्रीची झोप पण उडून गेलीय. पण काय करणार?निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य मला कुठे आहे?…. पण आर्थिक बाबतीत म्हणशील तर तुझ्या नावावर दोन फ्लॅट, एक बंगला, बँकेत भरपूर पैसा- ज्वेलरी असं सगळं तुझ्या बाबांनीआधीच करून ठेवलंय.”

मोठ्या दणक्यात माझं लग्न झालं… आणि एका छोट्या कैदेतून मोठ्या कैदेत माझी विदाई झाली. इथे कशात काही कमी नाही, पण खूप काही कमी आहे, हे मला इथं राहिल्यावर कळलं.

लग्नाच्या दुसऱ्या दिवसा पासूनच माझ्या दुर्दैवाला सुरुवात झाली .माझी ‘मुँह दिखाईकी’ रस्म चालू होती. त्याच वेळी माझ्या नणदेचे पती चक्कर येऊन पडले…. अन् पाच मिनिटातच त्यांचं हार्टफेलनं देहावसान झालं. घरात दुःखाचा सागर उमडला. त्यातून बाहेर यायला दोन तीन महिने लागले. नंतर आमच्या नणंदबाई आपला बंगला भाड्याने देऊन मुलीसह आमच्याकडेच राहायला आल्या. त्यात गैर काहीच नव्हतं. पण तेव्हापासून माताजी आणि आणि वन्सबाई या दोघींनी मला तू पांढऱ्या पायाची आहेस .अवदसा आहेस .तुझी नजर फार वाईट आहे. तू सगळ्यांना खाऊन बसणार आहेस. अशा तऱ्हेचे व अर्थाचे टोमणे मारायला सुरुवात केली. हे सगळं कमी होतं म्हणून की काय …लग्नानंतर सहा महिन्यातच आई वारली. इथेच! साउथ आफ्रिकेत जायच्या आधीच.अन् मायेच्या सावलीला मी मुकले.आता जगात माझं असं कोणीच नाही .नवरा सुद्धा!

घरातल्या लोकांची वागणूक जरा विचित्र आहे हा माझा संशय हळूहळू दृढ होत गेला.अमावस्या,पौर्णिमा ,प्रदोष, शनिवार अशा दिवशी नेहमी नाही ,पण कधी कधी घरात रात्री बारा वाजल्यापासून विशेष पूजा चालायची. पूजा बाबूजी करायचे. ह्यांना कपाळभर गुलाल लावला जायचा .थोड्या वेळातच हे अंगात येऊन घुमू लागायचे .यांना पूजेच्या मधेच प्रश्न विचारले जायचे. आणखी सुबत्ता…. आणखी धन…. व्यापारात जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा पाडाव….. प्रश्न मुख्यतः या बाबतचेच असायचे. मला हे सगळे थोतांड वाटायचे.

“अलकनंदे, कपाळावर आठ्या नकोत. नीट लक्ष देऊन पूजा पहा.” माताजी माझ्यावर गुरगुरायच्या.

पण पूजा साहित्यातल्या लिंबं, गुलाल ,सुया, काळ्या बाहूल्या …यासारख्या वस्तू पाहून माझ्या अंगावर काटा यायचा. पशुबळी पण कधी कधी दिला जायचा. कधी कवट्या मांडून पूजा चालायची. मला पूजेच्या ठिकाणी बसावंच लागायचं .

सकाळी उठून पहावं तर सगळ्यांचं वागणं नार्मल! चहाच्या टेबलावर सगळ्यांच्या गप्पा ,थट्टामस्करी, हसणं सगळंअगदी नेहमीप्रमाणं! माताजी-बाबूजींच्या बोलण्यात मी यांचा उल्लेख कधीतरी एकदा’ बीच का बच्चू,असा ऐकला होता… म्हणजे लहानपणापासून ह्यांचा उपयोग ते माध्यम म्हणून करून घेत असावेत ….किंवा यांना हिप्नोटाईज करत असावेत… नाहीतर यांची दुभंगलेली पर्सनॅलिटी असावी…. असा माझा संशय होता. एकीकडे कुटुंबवत्सल, शांत, हुशार असा नॉर्मल माणूस ..आणि दुसरीकडे तो अंगात येऊन घुमणारा विचित्र ‘बीच का बच्चू’!

लग्नानंतरची दहा वर्षे मी हाच प्रकार झेलत आलेय. आत्तापर्यंत नणंदेची मुलगी, जावेची मुलगी, मुलगा सगळीच मोठी आणि कळती झालीत. पण लहानपणापासून ती या कर्मकांडात आनंदाने सामील होत आलीत .शिक्षणाने पण त्यांच्या विचारात काहीच फरक पडलेला नाही. कारण त्यांचा माईंड- सेटच तसा ॲबनार्मल  झाला आहे. हेच त्यांचे संस्कार आहेत. या घरात मी एकटीच मूर्ख आणि नास्तिक! तशी तर घरातली मोठी माणसे पण खूप शिकलेली आहेत. आपले उद्योग धंदे उत्तम प्रकारे चालवताहेत. अडाणी थोडीच आहेत !पण या विचित्र पूजांबाबत अबालवृद्ध सगळेच पूर्ण अंधश्रद्धा आहेत… आणि सगळ्यांचाच एक अलिखित नियम म्हणजे त्यातला कोणीही याबाबत घराबाहेर काही सांगत नाही.

मला मूलबाळ झालं नाही. होणार तरी कसं? पती-पत्नीला एकत्र येऊच दिलं नाही तर ! हे लहानपणापासूनच ‘बीच का बच्चू!..व्रत,उपास-तापास, अनुष्ठानं यामुळं त्यांना स्त्रीसंग बरेचदा वर्जच असतो. कधी कधी मला त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात माझ्या बद्दल प्रेम भाव दिसतो… पण अचानक ‘तो बच्चू’ त्यांच्यावर हावी होतो. अन् केविलवाणा चेहरा करून ते माझ्या जवळून दूर निघून जातात …पण माझ्या मनाला मी कसं समजावू? सासरी प्रवेश केल्यापासूनच दांपत्य जीवनाबद्दलची माझी सुंदर स्वप्नं, माझ्या सोनेरी आशा, माझी उमेद,अपार उत्साह… सगळ्याचा चुराडा चुराडा झालाय. माझं मन नेहमी ठणकत असतं. आतल्या आत रडत असतं आणि एकाकीपणा अनुभवत ‘वांझ ‘हे विशेषण खाली मान घालून ऐकत मी जगत राहते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

स्त्रियांच्या  स्थितीत बदल होऊन आपण खूप पुढे आलो आहोत.तरी देखील  अजून स्त्रियांचे प्रश्न सुटले आहेत असे म्हणता येत नाही. नवनवीन समस्या आपल्यासमोर येतच आहेत. अशावेळी आजच्या  स्त्रीची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणे याची गरज भासते.

समाज हे एका अर्थी टायटॅनिक सारखे अवाढव्य आकाराचे जहाजच. त्याची दिशा बदलायची तर बाहेरून  खूप मोठी शक्ती(external force ) लावायला हवी. मात्र ज्यावेळी टायटॅनिकच्याच प्रत्येक कणाला आपली दिशा बदलावी असे वाटते व ते सर्व मिळून प्रयत्न करतात तेव्हा कुठल्याही बाह्यशक्ती विनाही हे सहज शक्य होऊ शकतं.

असाच एक प्रयोग महिलांसंबंधीच्या अध्ययनाबाबत झाला . ‘भारतातील महिलांची स्थिती ‘ हे  भारतातील महिलांच्या स्थितीचा वेध घेणारे  देशव्यापी अध्ययन नुकतेच महिलांच्या संबंधी कार्य करणा-या ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ द्वारा करण्यात आले.  

भारत हा सर्वदृष्टीने विविधतेने नटलेला देश. संस्कृती, भाषा, शैक्षणिक -सामाजिक -आर्थिक स्थिती, समस्या या सगळ्यांच्या वेगवेगळया. अशा वेळी महिलांच्या स्थितीचे आकलन करावयाचे म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्थितीतील महिलांपर्यंत पोहोचणे व त्यांची स्थिती जाणून घेणे गरजेचे होते. शिवाय अशाप्रकारचे अध्ययन  खूप काळ सुरू राहिले तर ते कालबाह्य किंवा असंगत होऊ शकते .त्यामुळे कमीत कमी वेळात एवढे प्रचंड मोठे सर्वेक्षण करावयाचे तर त्यासाठी तेवढेच मनुष्यबळही गरजेचे. आज भारतातील विविध संघटनांमध्ये कार्यरत  महिला कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. या कार्यकर्त्यांनी निर्णय केला की आपण हे काम करावे. यापैकी अनेक संघटनांचे कार्य देशव्यापी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून महिलांची स्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होते.

शिवाय कार्यकर्त्यांच्या द्वारे सर्वेक्षण होणार म्हटल्याने त्या क्षेत्राची त्यांना नीट माहिती होती. स्थानिक कार्यकर्ते असल्याने भाषेचा अडसर नव्हता. या सगळ्यांनी हा अध्ययनाचा ‘द्रोणागिरी पर्वत’ उचलून धरला.

अध्ययनाचे केंद्र नागपूर ठरले.वेगवेगळया प्रकारच्या समित्या ठरल्या. प्रकल्प संचालक म्हणून डॉ.मनीषा कोठेकर वर जबाबदारी दिल्या गेली. एक तज्ञांची एक केंद्रीय समिती स्थापण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले.

देशभरात सर्व २९ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेश व ६४%  जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले.यात आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जिल्हे देखील मोठ्या प्रमाणात होते.  साधारण ६००० महिला कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. ८०,०००हजाराच्या जवळपास महिलांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्या गेले.

२०१६ मधे अध्ययनासंबंधी निर्णय झाला व १७ मधे कामाची पूर्ण आखणी होउन १८ मधे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.त्यानंतर डाटाएन्ट्री , त्याचे विश्लेषण ,रिपोर्ट लिहिणे व छपाई हे संपूर्ण काम नागपूरातून झाले.२४ सप्टेंबर २०१९ला दिल्लीला प.पू.सरसंघचालक मा.मोहनजी भागवत,मा.निर्मला सितारामन व मा.शांताक्काजींच्या प्रमुख उपस्थितीत या अध्ययनाचे दोन खंड,executive summery व महिलांच्या  विशिष्ट स्थितीवरील अध्ययनावरील २६ पुस्तकांचे विमोचन झाले.

महिलांना जेव्हा आपली स्थिती बदलावी असं स्वत: वाटतं व त्या एकसुराने आणि  एकदिलाने काम करायचे ठरवतात तेव्हा स्थिती बदलण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले ते दमदार पाऊल असतं अन् मग त्यांना त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी कुणीही थांबवू शकत नाही .

ले. : मनीषा कोठेकर

संग्राहक : सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर

? वाचताना वेचलेले ?

 ☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆ 

#प्रिय_आईस,

वर्ष झाले ना …. मी घरापासून लांब राहतोय …

खरं सांगायचं तर मला सुरुवातीला सगळं समजून घ्यायला म्हणजे कॉलेज, हॉस्टेल ,नवीन शहर ,नवे सोबती…. वेळ लागला…. त्यामुळे घरची आठवण येत नव्हती असं काही नाही. पण बाकीच्या उठाठेवीच खूप होत्या. 

खरंच खूप चांगले आहे इथे.. अभ्यास आहे… वातावरण छान आहे मित्रांच्या पण अजून जवळून ओळखी होतात. 

तू मला नक्कीच खूप मिस करत असशील ना…. आणि बाबा पण…. 

तू कशी आहेस?  मलाच हसू येतंय…. की मी हा प्रश्न विचारतोय !  तुझ्यावर हसणारा.. काहीवेळा ओरडणारा … चिडणारा… 

पण आज खरंच मनापासून वाटलं म्हणून विचारलं गं…. बरी आहेस ना तू…. 

परवा काय झालं अगं….  रूमवरच्या मित्राला जरा बरं वाटतं नव्हतं… म्हणून त्याला इंडक्शनवर मस्त गरम पाण्यात आलं उकळून लिंबू मीठ घालून गरमच प्यायला सांगितले….त्याच्यापुरती थोडी तुपावर डाळतांदुळाची खिचडी केली… त्याला खूप बरं वाटलं…. तरतरीत झाला तो.. 

सगळ्या नव्या मित्रांच्यामध्ये मी एकदम हिट झालो….. तेव्हा माझी कॉलर टाईट…. तेव्हा तू हवी होतीस….मला घरी तू सगळं करायला शिकवायचीस…. कधी कंटाळा करत तर कधी उत्साहात मी पण शिकलो.  पण त्याचा असा कोणाला कधी उपयोग होईल वाटलंच नव्हतं… केलेलं कधी वाया जात नाही, तू म्हणतेस ना…. पटलंच एकदम… 

कामावी तो सामावी असं तू म्हणतेस ना…. सगळ्या मित्रांना मदत पण करतो …… 

घरी किती ओरडायची गं मला …. पण त्याचा उपयोग इथे होतो…. कसा माहीतेय…… माझं लवकर आवरून होतं…. कपाट नीट असतं….  अगदी वापरलेले सॉक्सपण रात्रीच भिजवून सकाळी आंघोळ करताना धुवून टाकतो…..  बाकीचे मित्र म्हणतात … अरे आम्हाला पण आठवण करत जा ना….. तेव्हा तू आठवतेस…… 

मी चिडायचो तुझ्यावर सारखी भुणभुण करते म्हणून.  पण तू म्हणायचीस….. बाहेरच्यांनी कोणी तुला  बोललेलं  मला चालणार नाही…… अगदी त्या श्यामची आई पुस्तकातल्या प्रमाणे….  

फोनवर इतकं बोलता आलं नसतं गं… ..म्हणून आज हे पत्र….. 

आज पासून घरून आणलेले पांघरुण मी वापरणार आहे…. इतके दिवस बाकीचे हसतील , मला कमकुवत समजतील म्हणून वापरत नव्हतो…. पण आता नाही… परिक्षा संपली की येईनच…. तू आतापासून तयारीला लागू नको काय….. मी परत फोन करेन….

अभ्यास करतोच आहे….. 

आता घरी आल्यावर इथल्यासारखं वागायचा प्रयत्न करीन….. पण मग तुझा ओरडायचा कोटा पूर्ण कसा होणार….. ?  

ओरडण्याचा आवाजच तर मला परत येताना साठवून ठेवायचा आहे …. कानात, मनात, ह्रदयात….. 

बाबांना सांग….. 

दोघे भांडू नका…..

मी आल्यावर काय करशील खायला?……

त्याची लिस्ट व्हाट्सअप करतो?

ए आई, आणि व्हिडिओ कॉल लावू नको गं….. 

चल बाय– खूपच सेंटी होतोय मी…… 

काळजी करु नकोस….. 

 

फक्त तुझाच

(अजून तरी??)

ले.: नेहा बोरकर देशपांडे 

(नव्याने बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा. आईला तर  वाटणारचं…. पण आज मुलाची बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे. ) 

…. कशी वाटली जरूर सांगा….

संग्राहक : संजय जोगळेकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श  (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श  (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक             — कृष्णस्पर्श  (कथासंग्रह) 

लेखिका…….      उज्ज्वला केळकर

प्रकाशक …..      अजब पब्लिकेशन्स   (कोल्हापूर)

पृष्ठे                        १९२

किंमत                   १९०/—

कृष्णस्पर्श “ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या या सर्वच कथा वाचनीय आहेत. त्या जितक्या मनोरंजक आहेत तितक्याच वेगळ्या जाणीवांची ओळख करुन देणार्‍या आहेत..उज्ज्वलाताईंच्या लेखनाची मी तर चाहतीच आहे. त्यांची भाषाशैली खूप प्रभावी आहे. घडणार्‍या साध्या घटनांचा कथांमधून मागोवा घेत असताना त्यांच्या निरीक्षणात्मक

बारकाव्यांचा अनुभव तर येतोच, शिवाय त्यांचा वैचारिक स्तर किती उंच आहे हेही जाणवते. कथेतल्या पात्रांचा मनोवेध त्या अचूक घेतात. शिवाय प्रसंगाकडे अथवा कॅरॅक्टरकडे जसंआहे तसंच बघण्याची एक तटस्थ वृत्ती त्यांच्या लेखनात जाणवते. कशाचंही उदात्तीकरण नाही,

समर्थन नाही किंवा अपारंपारीक  म्हणून विरोधही नाही. वाचकासमोर जसं आहे तसं मांडलं जातं, म्हणून या कथा अत्यंत परिणामकारक ठरतात, वास्तविक वाटतात. काही कथा धक्के देतात. काही कथा बधीर करतात. परीक्षणांत ,कथेतल्या कथानकांविषयी सांगणे म्हणजे वाचकाच्या स्वमग्न वाचनातील आनंद ,गोडवा कमी करणे असे वाटल्यामुळे, काही कथांविषयीच लिहीते.

पहिलीच शीर्षक कथा, कृष्णस्पर्श.” –या कथेत माई आणि  कुसुम नावाच्या कुरुप ओंगळ ,

आत्मविश्वास हरवलेल्या मुलीची गोष्ट आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासुन माई कीर्तन करत. अत्यंत सुरेल गायन, सुस्पष्ट निरुपण आणि प्रभावी वक्तृत्वामुळे.,श्रोते भारावून जातात. माईंच्या विस्कटलेल्या वैवाहिक जीवनामुळे कीर्तन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनते. कालांतराने त्यांच्या आयुष्यात कुसुम नावाचं गबाळं ध्यान आश्रित म्हणून येतं. सुरवातीला माईंच्या मनात तिच्याविषयी कुठल्याच ओल्या भावना नसतात.उलट रागच असतो. पण एक दिवस त्या तिला गाताना ऐकतात आणि तिच्यातल्या कलाकाराची त्यांना ओळख होते. मग कुसुम माईंना कीर्तनात साथ देउ लागते  गाणारी कुसुम वेगळी भासते. मात्र गाण्यातून बाहेर आलेल्या कुसुमचा पुन्हापुन्हा सुरवंटच होतो. मात्र एक दिवस, कृष्ण आणि कुब्जा भेटीचं गुणगान कीर्तनात गात असतांना कुसुम बेभान होते. ती गातच राहते आणि तेव्हां माईंना जाणवतो तो कृष्णस्पर्श—-माई ठरवतात, कुसुमला पूर्ण कीर्तन शिकवायचे. तिला स्वावलंबी,स्वयंपूर्ण बनवायचं….माईंच्या विचारांनाही कृष्णस्पर्शच होतो जणु—-

आंदोलन “ या कथेतलं कथानक काहीसं अतर्क्य आहे. लहानपणी एकत्र असलेल्या दोघांचं वडीलधार्‍यांच्या इच्छेनेच लग्र होतं.  दोघांची व्यक्तिमत्व भिन्न. विचार वेगळे. तो मातीत रुजलेला शेतकरी आणि ही एक उत्तम यशस्वी डाॅक्टर. त्याच्या पत्नीविषयीच्या पारंपारिक कल्पना, आणि 

हिचं व्यावसायिक जीवन यांची सांगड बसत नाही. दोन मुलंही होतात. पण सहजीवनातला अर्थ हरवलेलाच—-करीअरच्या पाठीमागे असणार्‍यांनी मूळातच लग्नबंधनात पडूच नये–या विषयावर बोचणारे वाद होतात–मात्र एक दिवस, ब्रेन हॅमरेजसारख्या घातक दुखण्यातून बाहेर पडल्यावर या यशस्वी व्यावसायिकतेतून ती बॅकआउट होते आणि एका सामान्य गृहिणीरुपात ती उतरते–

म्हणजे थोडक्यात त्याच्या कल्पनेतली–.पण या पद्धतीने–? नको.  हे बोचरंआहे—आता त्याला ते वेदनादायी वाटतं—ही सर्व मानसिक आंदोलनं उज्ज्वलाताईंनी इतकी सहज टिपली आहेत की कथेतल्या पात्रांच्या भावनांच्या अगदी  जवळ जाउन पोहचतो आपण—-

डेथ डे  ही कथा अंगावर दरदरुन काटा फुलवते. एका वेश्येच्या, एका विकृत राजकारण्याशी असलेल्या संबंधाची ही कथा आहे. पैसा, छानछोकी, ऐट, रुबाब याच्या बदल्यात

तिला जे करावं लागतं— त्यातलं ओंगळ कारुण्य वाचताना मन मातकटून जातं..

परक्याचं पोर—ही कथाही चटका लावणारी. एका जोडप्यांनं अनाथाश्रमातून एक मुलगा दत्तक घेतलेला. पुढे त्यांना त्यांचं स्वत:चं मुल होतं. इथून खरी कथा सुरु होते. वडीलांचं दत्तक मुलगा ,पिंटुशी बदललेलं वागणं.,नातेवाईक आणि सवंगड्याकडून पिंटुला उमजणारं ,त्याच्या आईवडीलांविषयी कळलेलं सत्य , हे सगळं त्याला गोंधळात टाकत असतं. त्याचं बालमन खचत जातं. मग त्याला शिक्षणासाठी अखेर वसतीगृहात ठेवण्याचा निर्णय होतो. आणि या सर्व  घटनांमुळे होरपळलेली, पिळवटून गेलेली आईची मनोवस्था वाचकालाही काळीज फाडणारी वाटते—-. 

चोरट्या वाटेनं, विवाहानंतरही  प्रियकराची मनात केलेली जपणूक एका कथेत आहे..

काही कथांमधे प्रेमाच्या त्रिकोणातून जन्मलेला आणि दुष्कर्म करणारा मत्सर आहे, समाजाने केलेली फसवणुक आहे, दुनियादारी आहे, बलात्कारासारखीही घटना आहे…

पण कथेची इमारत बांधतांना ती सतत ओळंब्यात असलेली जाणवते…उगीच विस्तारत नाही. पसरत नाही.

काही कथा मात्र चटकन् संपल्यासारख्या वाटतात—अजुन पुढे काय, असे वाटत असतानाच संपतात—पण तरीही त्या abrupt वाटत नाहीत….

थोडक्यात इतकंच म्हणेन, एक जाणीव देणारा, कधी सौम्य, कधी उग्र वाटणारा भावाविष्कार व्यक्त करणारा, कधी अतर्क्य वाटणारा, तर कधी वस्त्रहीन वास्तव समोर मांडणारा ,विविध घटनांचा,  विविध आशयांचा एक कथास्पर्श….”.कृष्णस्पर्श!! “ 

सुंदर वाचनीय.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 104 ☆ अहं, क्रोध, काम व लोभ ☆ डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय आलेख अहं, क्रोध, काम व लोभ। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 104 ☆

☆ अहं, क्रोध, काम व लोभ ☆

‘अहं त्याग देने से मनुष्य सबका प्रिय हो जाता है; क्रोध छोड़ देने पर वह शोक रहित हो जाता है; काम का त्याग कर देने पर धनवान हो जाता है और लोभ छोड़ देने पर सुखी हो जाता है’– युधिष्ठिर की यह उक्ति विचारणीय है। अहं मानव का सबसे बड़ा शत्रु है क्योंकि जब तक उसमें ‘मैं’ अथवा कर्त्ता का भाव रहेगा, तब तक उसके लिए उन्नति के सभी मार्ग बंद हो जाते हैं। जब तक उसमें यह भाव रहेगा कि मैंने ऐसा किया और इतने पुण्य कर्म किए हैं, तभी यह सब संभव हो सका है। ‘जब ‘मैं’ यानि अहंकार जाएगा, मानव स्वर्ग का अधिकारी बन पाएगा और उसे इच्छित लक्ष्य की प्राप्ति हो सकेगी’– प्रख्यात देवाचार्य महेंद्रनाथ का यह कथन अत्यंत सार्थक है। अहंनिष्ठ व्यक्ति किसी का प्रिय नहीं हो सकता और कोई भी उससे बात तक करना पसंद नहीं करता। वह अपने द्वीप में कैद होकर रह जाता है, क्योंकि सर्वश्रेष्ठता का भाव उसे सबसे दूर रहने पर विवश कर देता है।

वैसे तो किसी से उम्मीद रखना कारग़र नहीं है। ‘परंतु यदि आप किसी से उम्मीद रखते हैं, तो एक न एक दिन आपको दर्द ज़रूर होगा, क्योंकि उम्मीद एक न एक दिन अवश्य टूटेगी और जब यह टूटती है, तो बहुत दर्द होता है’– विलियम शेक्सपियर यह कथन अनुकरणीय है। जब मानव की इच्छाएं पूर्ण होती है, तो वह दूसरों से सहयोग की उम्मीद करता है, क्योंकि सीमित साधनों द्वारा असीमित इच्छाओं की पूर्ति संभव नहीं होती। उस स्थिति में जब हमें दूसरों से अपेक्षित सहयोग प्राप्त नहीं होता, तो मानव हैरान-परेशान हो जाता है और जब उम्मीद टूटती है तो बहुत दर्द होता है। सो! मानव को उम्मीद दूसरों से नहीं, ख़ुद से करनी चाहिए और अपने परिश्रम पर भरोसा रखना चाहिए… उसे सफलता अवश्य प्राप्त होती है। इसलिए मानव तो खुली आंखों से सपने देखने का संदेश दिया गया है और उसे तब तक चैन से नहीं बैठना चाहिए; जब तक वे साकार न हो जाएं–अब्दुल कलाम की यह सोच अत्यंत सार्थक है। यदि मानव दृढ़-प्रतिज्ञ व आत्म-विश्वासी है; कठिन परिश्रम करने में विश्वास करता है, तो वह भीषण पर्वतों से भी टकरा सकता है और अपनी मंज़िल पर पहुंच सकता है।

‘यदि तुम ख़ुद को कमज़ोर समझते हो, तो तुम कमज़ोर हो जाओगे; अगर ख़ुद को ताकतवर सोचते हो, तो तुम ताकतवर हो जाओगे’– विवेकानंद की यह उक्ति इस तथ्य पर प्रकाश डालती है कि मन में अलौकिक शक्तियाँ विद्यमान है। वह जैसा सोचता है, वैसा बन जाता है और वह सब कर सकता है, जिसकी कल्पना भी उसने कभी नहीं की होती। ‘मन के हारे हार है, मन के जीते जीत।’ दूसरे शब्दों में मानव स्वयं अपने भाग्य का निर्माता है। इसलिए कहा जाता है कि असंभव शब्द मूर्खों की शब्दकोश में होता है और बुद्धिमानों से उसका दूर का नाता भी नहीं होता। इसी संदर्भ में मैं इस तथ्य पर प्रकाश डालना चाहूंगी कि प्रतिभा जन्मजात होती है उसका जात-पात, धर्म आदि से कोई संबंध नहीं होता। वास्तव में प्रतिभा बहुत दुर्लभ होती है और प्रभु-प्रदत्त होती है। दूसरी और शास्त्र ज्ञान व अभ्यास इसके पूरक हो सकते हैं। ‘करत- करत अभ्यास के, जड़मति होत सुजान’ अर्थात् अभ्यास करने पर मूर्ख व्यक्ति भी बुद्धिमान हो सकता है। जिस प्रकार पत्थर पर अत्यधिक पानी पड़ने से वे अपना रूपाकार खो देते हैं, उसी प्रकार शास्त्राध्ययन द्वारा मर्ख अर्थात् अल्पज्ञ व्यक्ति भी बुद्धिमान हो सकता है। स्वामी रामतीर्थ जी के मतानुसार ‘जब चित्त में दुविधा नहीं होती, तब समस्त पदार्थ ज्ञान विश्राम पाता है और दिव्य ज्ञान की प्राप्ति होती है।’ सो! संशय की स्थिति मानव के लिए घातक होती है और ऐसा व्यक्ति सदैव ऊहापोह की स्थिति में रहने के कारण अपने मनचाहे लक्ष्य की प्राप्ति नहीं कर सकता।

इसी संदर्भ में मुझे स्मरण हो रहा है हज़रत इब्राहिम का प्रसंग, जिन्होंने एक गुलाम खरीदा तथा उससे उसका नाम पूछा। गुलाम ने उत्तर दिया – ‘आप जिस नाम से पुकारें, वही मेरा नाम होगा मालिक।’ उन्होंने खाने व कपड़ों की पसंद पूछी, तो भी उसने उत्तर दिया ‘जो आप चाहें।’ राजा के उसके कार्य व इच्छा पूछने पर उसने उत्तर दिया–’गुलाम की कोई इच्छा नहीं होती।’ यह सुनते ही राजा ने अपने तख्त से उठ खड़ा हुआ और उसने कहा–’आज से तुम मेरे उस्ताद हो। तुमने मुझे सिखा दिया कि सेवक को कैसा होना चाहिए।’ सो! जो मनुष्य स्वयं को प्रभु के चरणों में समर्पित कर देता है, उसे ही दिव्य ज्ञान की प्राप्ति होती है।

क्रोध छोड़ देने पर मनुष्य शोक रहित हो जाता है। क्रोध वह अग्नि है, जो कर्त्ता को जलाती है, उसके सुख-चैन में सेंध लगाती है और प्रतिपक्ष उससे तनिक भी प्रभावित नहीं होता। वैसे ही तुरंत प्रतिक्रिया देने से भी क्रोध द्विगुणित हो जाता है। इसलिए मानव को तुरंत प्रतिक्रिया नहीं देनी चाहिए, क्योंकि क्रोध एक अंतराल के पश्चात् शांत हो जाता है। यह तो दूध के उफ़ान की भांति होता है; जो पल भर में शांत हो जाता है। परंतु यह मानव के सुख, शांति व सुक़ून को मगर की भांति लील  जाता है। क्रोध का त्याग करने वाला व्यक्ति शांत रहता है और उसे कभी भी शोक अथवा दु:ख का सामना नहीं करना पड़ता। काम सभी बुराइयों की जड़ है। कामी व्यक्ति में सभी बुराइयां शराब, ड्रग्स, परस्त्री- गमन आदि बुराइयां स्वत: आ जाती हैं। उसका सारा धन परिवार के इतर इनमें नष्ट हो जाता है और वह अक्सर उपहास का पात्र बनता है। परंतु इन दुष्प्रवृत्तियों से मुक्त होने पर वह शरीर से हृष्ट-पुष्ट, मन से बलवान् व धनी हो जाता है। सब उससे प्रेम करने लगते हैं और वह सबकी श्रद्धा का पात्र बन जाता है।

आइए! हम चिन्तन करें– क्या लोभ का त्याग कर देने के पश्चात् मानव सुखी हो जाता है? वैसे तो प्रेम की भांति सुख बाज़ार से खरीदा ही नहीं  जा सकता। लोभी व्यक्ति आत्म-केंद्रित होता है और अपने इतर किसी के बारे में नहीं सोचता। वह हर इच्छित वस्तु को संचित कर लेना चाहता है, क्योंकि वह केवल लेने में विश्वास रखता है; देने में नहीं। उसकी आकांक्षाएं सुरसा के मुख की भांति बढ़ती चली जाती हैं, जिनका खरपतवार की भांति कोई अंत नहीं होता। वैसे भी आवश्यकताएं तो पूरी की जा सकती हैं, इच्छाएं नहीं। इसलिए उन पर अंकुश लगाना आवश्यक  है। लोभ व संचय की प्रवृत्ति का त्याग कर देने पर वह आत्म-संतोषी जीव हो जाता है। दूसरे शब्दों में वह प्रभु द्वारा प्रदत्त वस्तुओं से संतुष्ट रहता है।

अंत में मैं कहना चाहूंगी कि जो मनुष्य अहं, काम, क्रोध व लोभ पर विजय प्राप्त कर लेता है; वह सदैव सुखी रहता है। ज़माने भर की आपदाएं उसका रास्ता नहीं रोक सकतीं। वह सदैव प्रसन्न-चित्त रहता है। दु:ख, तनाव, चिंता, अवसाद आदि उसके निकट आने का साहस भी नहीं जुटा पाते। ख़लील ज़िब्रान के शब्दों में ‘प्यार के बिना जीवन फूल या फल के बिना पेड़ की तरह है।’ ‘प्यार बांटते चलो’ गीत भी इसी भाव को पुष्ट करता है। इसलिए जो कार्य- व्यवहार स्वयं को अच्छा न लगे; वैसा दूसरों के साथ न करना ही सर्वप्रिय मार्ग है–यह सिद्धांत चोर व सज्जन दोनों पर लागू होता है। महात्मा बुद्ध की भी यही सोच है। स्नेह, प्यार त्याग, समर्पण वे गुण हैं, जो मानव को सब का प्रिय बनाने की क्षमता रखते हैं।

 

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – स्वार्थ ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – स्वार्थ ?

 

दूर तक

लिख रहा हूँ

ख़ामोशी..!

सब पढ़ना,

सब गुनना,

अपना-अपना

अर्थ बुनना,

स्वार्थी हूँ,

हरेक का अर्थ

घटित होते

देखना चाहता हूँ,

अपनी कविता को

बहुआयामी

फलित होते

देखना चाहता हूँ..!

 

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ किसलय की कलम से # 55 ☆ रिश्तों में खटास ☆ डॉ विजय तिवारी ‘किसलय’

डॉ विजय तिवारी ‘किसलय’

(डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं।  आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक अत्यंत विचारणीय  एवं सार्थक आलेख  “रिश्तों में खटास”.)

☆ किसलय की कलम से # 55 ☆

☆ रिश्तों में खटास ☆

दुनिया का हर इन्सान रिश्तों में बँधा होता है। ये बन्धन आपसी सुख-दुख, त्याग-समर्पण व प्रेम-भाईचारे को मजबूती प्रदान करते हैं। खून के रिश्ते हों, प्रेम के रिश्ते हों अथवा वैवाहिक, व्यावसायिक, सामाजिक सरोकारों के हों, सभी में एकता और आदान-प्रदान का सकारात्मक ध्यान रखा जाता है। खून के रिश्ते सबसे सुदृढ होते हैं। इन रिश्तों में बँधे लोग एक-दूसरे का हर तरह से ध्यान रखते हैं। खून के रिश्तों के निर्वहन में लोग अपनी जान की बाजी तक लगा देते हैं। वैवाहिक रिश्ते भी दूध-शक्कर का मिला स्वरूप होते हैं। सामाजिक रिश्तों में भी वजन होता है। दोस्ती के रिश्तों की तो मिसालें दी जाती हैं।

दुनिया में रिश्तों की जहाँ अहमियत होती है वहीं रिश्तों में खटास के चर्चे भी कम नहीं होते। कभी वास्तविकता, कभी झूठ, कभी भ्रम अथवा अन्य कारणों से रिश्तों में खटास या दरारें पड़ जाती हैं। कभी कभी इनका अलगाव इतना अधिक बढ़ जाता है कि पुनः आजीवन जुड़ाव नहीं होता। रिश्तों में खटास के विविध कारण हो सकते हैं। इस खटास की वजह से लड़ाई, झगड़े यहाँ तक कि हत्यायें भी हो जाती हैं। कभी कभी अलगाव की अवधि इतनी लंबी होती है कि लोगों को बहुत बड़ी क्षति भी उठाना पड़ती है। इन सबके अतिरिक्त रिश्तों के बीच ‘अहम’  भी इन अलगाव में अपनी  विशिष्ट भूमिका का निर्वहन करता है।

रिश्तों की खटास उभय पक्षों के लिए हानिकारक होती है। ये हानि व्यवहारिक, आर्थिक, व्यावसायिक होने के साथ-साथ मानसिक भी होती है। ये हानि कभी कभी तो आदमी का जीवन तक तबाह कर देती है। कुछ अप्रत्याशित हानि भी लोगों का संतुलन बिगाड़ती है। दुनिया में खून के रिश्ते एक बार ही जन्म लेते हैं। इन रिश्तों की टूटन बेहद पीड़ादायक होती है। दोनों पक्ष कभी कभी अहम के वशीभूत हो झुकना ही नहीं चाहते और सारी जिंदगी पीड़ा भोगते रहते हैं। ये ऐसी पीड़ा होती है जो आदमी की आखरी साँस तक साथ नहीं छोड़ती।

इंसान में बुद्धि व विवेक दोनों होते हैं लेकिन पता नहीं क्यों परिस्थितिजन्य खटास या अलगाव समाप्त करने की बात पर प्रायः उसका सदुपयोग नहीं करते। शायद इसके आड़े उनका अहम अथवा स्वार्थ ही आता होगा। कुछ भी हो एक इंसान को इसका निराकरण समय रहते अवश्य कर लेना चाहिए अन्यथा उसे इसकी पीड़ा जीवन भर भोगना पड़ सकती है।

हम इंसान हैं। ईश्वर की असीम कृपा से हमारा इस जग में जन्म हुआ है। इंसानियत के नाते हमें धैर्य, धर्म, संतोष, परोपकार व भाईचारे की राह पर चलना चाहिए। हमारे न रहने पर भी लोग हमारे सत्कर्मों की चर्चा करें, हमें ऐसे कर्म और व्यवहार के मानदण्ड स्थापित करना होंगे। लोगों के दुराचरण उनको पतन और अमानवीयता के रास्ते पर ले जाते हैं और आपके सदाचरण आपको श्रेष्ठ बनाते हैं। आपकी श्रेष्ठता, आपके परिवार, समाज और व्यवहारिक जीवन को सार्थक बनाती है। इसलिये कभी भी रिश्तों में खटास न आये, हमे सदैव सजग रहना होगा।

© डॉ विजय तिवारी ‘किसलय’

पता : ‘विसुलोक‘ 2429, मधुवन कालोनी, उखरी रोड, विवेकानंद वार्ड, जबलपुर – 482002 मध्यप्रदेश, भारत

संपर्क : 9425325353

ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares