मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥ ☆ श्री संभाजी बबन गायके 

जीवनात राम असेतो जीवनात राम असतो, असे संत सांगून गेलेत. एकदा का राम असे नाम असलेला रस रसनेने चाखला की अखिल विश्वातला कोणताही रस रसनेला नको असतो असे जगदगुरू श्री संत तुकोबाराय सांगून गेले! 

परमार्थात सगुण भक्ती अतिसुंदर मानली जाते. पाषाणाची मूर्ती भक्तांच्या भावनेमुळे आणि प्रेमाच्या वर्षावाने सजीव साकार होते. आणि या संजीवन अस्तित्वाची अहर्निश सेवा ज्यांना लाभते ते अखंडित भाग्याचे स्वामी म्हणवले जातात. 

शरयू तीरावरची अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने तीर्थ झाली. रामायण घडले…प्रभूंनी शरयूत देहत्याग केला! 

रामराज्यानंतर भरतभूमी अनेक आक्रमणांची साक्षीदार बनली…आणि भक्ष्यसुद्धा!  

उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर मधील जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले एक युवक २० मे १९५५ रोजी दहा वर्षांचे झाले आणि त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवले आणि त्यांना अयोध्येने आकर्षून घेतले. त्याआधी बाल्यावस्थेत हे युवक कित्येकदा अयोध्येत येत असत आणि त्यांना हे स्थान परिचयाचे वाटत असे! अगणित वर्षांपूर्वी याच अयोध्येत महाराज दशरथ यांच्या राजप्रासादात पौरोहित्याची धुरा वाहिलेले ऋषीच पुन्हा अयोध्येत आले असावेत बहुदा. हे युवक हनुमान गढी मंदिराच्या सिद्ध पीठाचे महंत आणि आपल्या वडिलांचे गुरु बाबा अभिराम दास यांचे शिष्य बनले. आणि या कोवळ्या वयात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि त्यांचे मन राम रंगी रंगले. वयाच्या विसाव्या वर्षी हे युवक सत्येंद्र हे नाम धारण करून पुजारी बनले होते. संस्कृत व्याकरण विषयात पारंगत होऊन ते आचार्यपदी विराजमान झाले होते. पुढे त्यांना सत्य धाम गोपाल मंदिराची जबाबदारी सोपवली गेली.  

१९७५ मध्ये त्यांना रामकोट येथील त्रिदंडदेव संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. रामजन्मभूमी मुक्ती विषय ऐन भरात असताना सत्येंद्र दास यांनी प्रभू रामचंद्र यांची पूजा सेवा करण्यास आरंभ केला होता.

१९९२च्या आधी काही महिने सत्येंद्रनाथ यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानातील श्रीराम यांचे अधिकृत पुजारी म्हणून सेवा प्राप्त झाली. संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना मानधन घ्यावे लागेल असे सांगितले. महंत सत्येंद्र यांनी प्रभूंचा प्रसाद म्हणून केवळ रुपये शंभर द्यावेत,अशी विनंती केली. २५ मार्च २०२० रोजी प्रभू त्यांच्या मूळ स्थानापासून तात्पुरते दूर गेले…सत्येंद्रदास त्यांच्या सोबत गेले…आणि प्रभूंना घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा मूळस्थानी आले….जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे तू जेथे जातो तेथी मी तुझा सांगाती असे झाले होते…सत्येंद्र यांनी आपल्या ‘दास’पणात खंड पडू दिला नाही…..हा कालावधी जगाच्या भाषेत ३२ वर्षे,११ महिने आणि १ दिवसाचा भरला! आणि एकूण ७९ वर्षे ८ महिने आणि २३ दिवसांच्या जीवनाकालातील उणीपुरी ६० वर्षे ईश्वरसेवेत रमलेल्या या देहात रामचिन्हे प्रकट होतील,यात नवल ते काय? अयोध्येतील सर्वांना च ते प्रिय ठरले होते…हा  रामनामाचा आणि रामसेवेचा महिमा.

काल दिनांक १२ फेब्रुवारी,२०२५ रोजी माघ पौर्णिमेचा मोठा उत्सव होता अयोध्येत…याच दिवशी महंत सत्येंद्र दास यांनी जीवनाची सांगता केली. आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरयूच्या जलात समाधिस्त झाले! 

अशी रामसेवा घडलेले हे आयुष्य सर्वथा वंदनीय होते. प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या चरणाशी कायम स्थान देतील,यात शंका नाही…कारण प्रभूंच्या चरणी त्यांनी आपले अवघे जीवित व्यतीत केले होते….एवढे पुण्यफल तर प्राप्त होणारच! 

भावपूर्ण श्रद्धांजली…आचार्य महंत सत्येंद्र दासजी महाराज! जय श्री राम! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

hug day म्हणजे काय असतं

हे रावणाशी लढाई जिंकून झाल्यावर

हनुमानाला मिठीत घेतलेल्या श्रीरामाला विचारा 

की Hug Day म्हणजे काय?

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या अफझलखानाच्या थडग्याला जाऊन विचारा 

ते हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं!

*

Hug डे म्हणजे काय असतं

हे त्या पोह्याच्या पुरचुंडीला विचारा,

जिने कृष्ण सुदामाची मिठी पाहिलेली 

ती हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या झाडांना विचारून पहा

ज्यांच्या रक्षणासाठी “चिपको” आंदोलन करून

महिलांनी झाडांना मिठी मारलेली पाहिलीय 

ती झाडेही सांगतील की 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या रायगडाला विचारा 

ज्याने पश्चाताप झाल्यावर

माघारी आलेल्या शंभुराजांना

मिठीत घेणारे शिवाजी राजे पाहिलेत 

तो रायगडीचा महालही सांगेल 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या यज्ञातील उधाणलेल्या ज्वालाना विचारा 

ज्यांनी नेताजी पालकरला पुन्हा आपल्या धर्मांत घेऊन

मिठी मारणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत 

त्या ज्वालाही सांगतील 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय हे

त्या जेल मधील भिंतींना पण विचारा

जेव्हा मेरा रंग दे बसंती म्हणत

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू 

ह्यांनी एकमेकांना फासावर जाण्याआधी

एकदा घट्ट मिठी मारली असेल

*

Hug Day म्हणजे काय?

हे सीमेवर लढायला जाणाऱ्या त्या जवानांना सुद्धा विचारावं 

जो जाताना आपल्या आईला आलिंगन देऊन जातो.

आणि भारत मातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो.

*

असा असतो खरा Hug Day.. येड्याहो!

ते शिकूया, तशा मिठीचे संस्कार जपूया 

जय भवानी, जय शिवाजी…

*

लेखक : श्री डॉ. धनंजय देशपांडे (dd)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

कराया साजरा । होलिकेचा सण ।

मनाचे स्थान । निवडिले ।।

ऐसे ते स्थान । साधने सरावले ।

भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

*
त्या स्थानी खळगा । समर्पणाचा केला ।

त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे । लाकडे वासनांची ।

इंद्रियगोवऱ्याची । रास भली ।।

*
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।

अर्पिले तयात । ऐसे केले ।।

रेखिली भोवती । सत्कर्म रांगोळी ।

भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

*
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।

यज्ञरूप आले । झाली कृपा ।। 

दिधली तयाते । विषय पक्वान्नाहुती ।

आणिक पूर्णाहुति । षड्रिपू श्रीफळ ।।

*
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत । 

जाणावया तेथ । नुरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।

जेणे मुक्तीची दिवाळी । अखंडित ।। 

कवी – डॉ. प्रसाद वाळिंबे

सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पुणे 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तीन मनोरंजक लघुकथा…’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘तीन मनोरंजक लघुकथा… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

(ह्या तिन्ही कथांना सखोल अर्थ आहे. कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल.)

एक – गहन ☆  

मी एका लहान मुलाला आईस्क्रीम खाताना बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो,

‘आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील! ‘

तो मुलगा उत्तरला – 

‘माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली.’

मी विचारलं,

‘आईस्क्रीम खाल्ल्यामुळे? ‘

तो म्हणाला – ‘ नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसले नाही! ‘

किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात!

आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय – – –  

– – कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय!

********** 

☆ दोन –  थकलेला ☆

आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंटबद्दल बातम्या पाहात होतो – लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.

ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते. मी सुटकेचा निश्वास टाकला.

बापरे, माझ्या मनावरचा दड़लेला ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!

एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो.. कारण हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.

**********

☆ तीन – थांबा ☆

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तिनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, ‘ सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात. ’

त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागाने ओरडून म्हणाला, ‘ हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं? ’

त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीटपाशी उभी राहिली.

ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली,

‘सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात.. परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं.. ‘ 

तात्पर्य…

मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो.

फक्त ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.

😂😂😂

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गड्या आपला गाव बरा” – लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “गड्या आपला गाव बरा” – लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : गड्या आपला गाव बरा

लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित, मो. 9637730625

प्रकाशक :सरस्वती प्रकाशन

कोकळे

☆  गड्या आपला गाव बरा… बरा नव्हे उत्तमच! – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या विश्वासार्ह माहितीची भर घालून एक महत्वाचा दस्तावेज तयार करणे हे ही तितकेच अवघड व कौशल्यपूर्ण काम आहे. हे काम केले आहे ॲड. अजित पुरोहित यांनी. माता आणि माती म्हणजेच मातृभूमी या दोन्हीही आपल्यासाठी वंदनीय आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मातेविषयीच्या आठवणी भिन्न भिन्न असू शकतात. त्यांच्यातील कौटुंबिक नाते व त्यातून निर्माण होणारे मर्मबंध वेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. पण जी अनेकांची माता आहे त्या मातृभूमीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आपला दृष्टिकोन कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता अधिक व्यापक ठेवावा लागतो. एकाच मातीत रमलेलं एक खूप मोठं कुटुंब म्हणजे आपलं गाव. आयुष्याचा दीर्घ प्रवास झाल्यानंतर या गावाकडे वळून पाहताना, गावाविषयी, तेथील लोक व लोकजीवन याविषयी जे जे वाटलं, समजलं ते लिहून काढताना गावाचचं एक सुंदर ‘व्यक्तिचित्र ‘ रेखाटण्याचं काम ॲड. पुरोहित यांनी केलं आहे. त्यांनी लिहीलेले ‘ गड्या आपला गाव बरा ‘ हे पुस्तक नुकतेच वाचून झाले. कोणतं आहे हे गाव आणि काय लिहीले आहे त्याविषयी हे सांगण्याचा हा एक प्रयत्न.

सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे हे ॲड. पुरोहितांचे गाव. सांगलीच्या पूर्वेला, ६५ कि. मी. अंतरावर, सुमारे साडेचारहजार लोकवस्तीचे हे गाव. या गावाविषयी लिहीताना त्यांनी पुस्तकाची मांडणी अत्यंत नियोजनबद्ध केलेली आहे. सुरुवातीलाच या गावाचे भौगोलिक स्थान सांगून ते कर्नाटकच्या खूप जवळ असल्यामुळे, भाषा, संस्कृती, व्यक्तींची नावे अशा अनेक बाबतीत कन्नड छाप पडलेली आहे हे ते स्पष्ट करतात. पुढे पुस्तक वाचताना आपल्याला याचे प्रत्यंतर येते.

या पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत. या गावाची श्रद्धास्थानं, धार्मिक सप्ताह, यात्रा, सांस्कृतिक परंपरा, वाड्या-वस्त्या, शेती, शिक्षण, नाट्यपरंपरा, खेळ अशा विविध पैलूंचा विचार करण्यासाठी स्वतंत्र प्रकरणे आहेत. याशिवाय येथील कर्तृत्ववान व्यक्ती, जीवसृष्टी, गावचा ओढा, १९७२ चा दुष्काळ व त्याचे झालेले परिणाम आणि कोरोनाचे आलेले संकट या सर्वांविषयी त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात २१ दिवसांच्या लाॅकडाऊनच्या काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

गावाच्या श्रद्धास्थानांविषयी लिहिताना त्यांनी श्री हनुमान, बसवेश्वर, ग्रामदैवत यल्लम्मा म्हणजेच रेणुकादेवी, परशुराम, मायाक्का, लक्ष्मी, मरगुबाई, म्हसोबा, बालाजी यांबरोबरच यमनूर पीर, चिंध्यापीर, मिरासाहेब दर्गा यांविषयी माहिती देऊन गावातील धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. देव हा आयुष्यात संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असतो अशी श्रद्धा असणारे लोक आजही आहेत व म्हणून ही श्रद्धास्थाने आजही पहायला मिळतात.

१९७२ पर्यंत जीवंत असलेल्या गावच्या ओढ्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे लिहीले आहे. ग्रामीण लोकजीवन हे ओढ्यातील पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांनी हे अत्यंत आत्मियतेने लिहीले आहे. ओढ्याची पूर्वीची स्थिती, गावठाणाची जागा, आजुबाजूची झाडे व वनस्पती, नंतर बांधलेले पूल, ७२ च्या दुष्काळानंतर झालेली अवस्था, अलिकडेच बांधलेले बंधारे अशा अनेक विषयांचा आढावा घेत ओढ्याच्या आजच्या अवस्थेविषयी ते हळहळ व्यक्त करतात.

गतकाळातील ‘सप्ता ‘ म्हणजेच सप्ताह कसा असायचा याचेही त्यांनी छान वर्णन केले आहे. बदलत्या काळात त्याचे स्वरुप बदलले, महत्व कमी झाले. तरीही परंपरा चालू ठेवणारे काही लोक अजूनही गावात आहेत.

मार्गशीर्ष महिन्यात भरणा-या गावच्या यात्रेनिमित्त ते म्हणतात की पूर्वीची यात्रा आणि आताची यात्रा यात फार बदल झाला आहे. म्हणूनच हे प्रकरण वाचण्यासारखे आहे. कारण त्याशिवाय पूर्वीची यात्रा कशी होती ते समजणार नाही. शिवाय जत्रेतील काही विशिष्ट कार्यक्रम किंवा विधी म्हणजे काय हे ही समजणार नाही. उदा. कीच, बोनी, वालगे, लिंब नेसणे, मुले उधळणे हे सर्व वाचल्याशिवाय कसे समजेल?

‘जगण्यासाठी सर्व काही ‘ या प्रकरणात लेखकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्रण केले आहे. बारा बलुतेदार, कुटीरोद्योग, लघुउद्योग हे सर्व मुख्य शेतीव्यवसायाशी कसे निगडीत व पूरक होते हे समजून घेण्यासारखे आहे. यातही स्थित्यंतरे होत गेली. त्याचीही नोंद लेखकाने घेतली आहे. कष्ट करण्याची फारशी तयारी नाही, कमी कष्टात कमी वेळेत भरपूर पैसा मिळावा आणि वाढत जाणारी स्पर्धा यामुळे पूर्वीचे चित्र बदलले आहे. पण सर्वांनी विचार केला तर गाव परिपूर्ण होईल अशीही त्यांना आशा आहे.

‘शेती’ या प्रकरणात सुरुवातीलाच ‘कोकळे ‘ हे गावाचे नाव कसे पडले असावे याचा अंदाज लेखकाने व्यक्त केला आहे. कोकळ्यातील हळद, केळ, ऊस, पानमळे, बागायती शेती, गु-हाळे,  भाजीपाला, फळबागा याविषयीचे लेखन वाचताना त्यांनी सगळ्या शेतातूनच फिरवून आणले आहे असे वाटते.

गावातील सांस्कृतिक परंपरांविषयी त्यांनी लिहिले आहे. गोकुळाष्टमी, नागपंचमी, खंडेनवमी यासारख्या सणातील पारंपारिक खेळ, गाणी, विधी यांचे वर्णन वाचायला मिळते. अलिकडच्या काळात महापुरुषांचे स्मरण करण्याच्या निमित्तानेही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. काही पारंपारिक गीतेही त्यांनी या प्रकरणात दिली आहेत.

सर्वसाधारणपणे खेडेगाव म्हटलं की मनोरंजनासाठी तमाशा हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण कोकळ्याचे रहिवासी नाट्यवेडे आहेत हे वाचून आश्चर्य वाटत. कोकळ्याला असलेली नाट्यपरंपरा, तिथले स्थानिक कलाकार, तिथे बसवलेली नाटके, कधी मशिदीच्या कट्ट्यावर तर कधी बॅरलचे केलेले स्टेज अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत कोकळ्याचा नाट्यसृष्टीपट लेखकाने आपल्या डोळ्यासमोर मांडला आहे. परगावाहून येणा-या स्त्री कलाकारांनीही कोकळेकरांचे कौतुक केले आहे हे रसिकतेला प्रमाणपत्रच मिळाल्यासारखे आहे.

कोकळ्यात प्राथमिक शाळा सुमारे ९० वर्षांपूर्वी सुरु झाली. त्यामुळे या गावाला शैक्षणिक परंपराही आहे. देवळात किंवा एखाद्या वाड्यात शाळा भरवली जायची. शिक्षक परगावाहून आले तरी गावातच सहकुटुंब रहायचे. पहिली ते चौथी एकच शिक्षक असायचे. शाळेची स्वच्छता, छोटेसे ऑफिस तेही एका वर्गातच, दर वारी म्हणायच्या प्रार्थना हे सर्व वाचताना त्या काळातील शाळेची कल्पना येते. शाळेच्या सहली, सेंटरच्या परीक्षा, त्या शिवाय चित्रकला, हिंदी, गणित अशा बाहेरच्या संस्थांच्या परीक्षाही होत असत. शैक्षणिक प्रगतीमुळे मुला मुलींच्या वेगवेगळ्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. महिला प्रौढ शिक्षण वर्ग ही सुरु झाले. शैक्षणिक वातावरण चांगले असल्यामुळेच या गावाने अनेक इंजिनिअर, डाॅक्टर, वकील, न्यायाधीश, सरकारी नोकर दिले आहेत.

शिक्षणाबरोबरच खेळाच्या क्षेत्रात काय परिस्थिती होती याविषयीही लेखकाने लिहीले आहे. पूर्वी तालमी असत. कुस्तीगिर परिषदेकडून सत्कार झालेले पहिलवान या गावाने दिले आहेत. सुरफाट्या, चिन्नीदांडू, लगोरी, भोवरा, गोट्या, लंगडी, काचाकवड्या यासारख्या बिनभांडवली खेळाबरोबरच व्हाॅलीबाॅल, बुद्धीबळ अशा खेळांनाही गावाने आपलेसे केले आहे.

काही कारणानी किंवा पोट भरण्याचा व्यवसाय म्हणून गावात काही मंडळी नियमितपणे यायची. त्यांना लेखकाने ‘ पाहुणे’ असे म्हटले आहे. हे पाहुणे म्हणजे गारुडी, दरवेशी, हेळवी, डोंबारी, माकडवाले, बहुरुपी, तांबट, पिंगळा, मोतीवाले, छत्रीवाले इत्यादी इत्यादी. हे आता दुर्मिळ होत चालल्यामुळे वाचनातूनच त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते.

विविध क्षेत्रात नाव कमावून गावचा झेंडा फडकवणा-या कर्तृत्ववान कोकळेकरांचा परिचयही लेखकाने करुन दिला आहे.

अशाप्रकारे आपल्या गावाविषयी लिहीताना लेखकाला काय लिहू आणि काय नको असे झाले आहे.. त्यांनी वाड्या, वस्त्यांविषयी लिहीले आहे. एवढेच नव्हे तर पशू, पक्षी, किटक, झाडे अशा जीवसृष्टीवरही लिहीले आहे.

आणि चुकून काही राहू नये म्हणून ‘उरलं सुरलं ‘ या प्रकरणात अनेक लहान सहान गोष्टी व त्यात होत गेलेले बदल यांवर लिहीले आहे.

कोरोना काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाल्यामुळे त्या कटू आठवणींचा उल्लेख करुन आपले गावाविषयीचे लेखन त्यांनी थांबवले आहे.

शेतात न जाता शेताच्या बांधावरून फिरताना शेताची साधारण कल्पना येते. पण संपूर्ण शेत नजरेसमोर येत नाही. पुस्तकाच्या या परिचयाचेही तसेच आहे. खूप सांगण्यासारखे आहे. पण शेवटी लेखन मर्यादा आहे. म्हणून पुस्तक वाचण्याला पर्याय नाही. ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणारे एक खेडे व त्याची माहिती म्हणून या पुस्तकाकडे पाहिले तर तर इंडिया नव्हे तर भारताविषयी कल्पना येऊ शकेल. ग्रामीण भागाशी संबंध असणा-यांना हे गाव आपले वाटेल आणि ग्रामीण भागाशी संबंध नसणा-यांना ‘गाव’ समजून घेता येईल.

” निशिदिनी नित्य जन्मुनी मरण सोसावे परी कोकळ्यातच पुन्हा जन्मा यावे “

– – – असे म्हणणाऱ्या ॲड. अजित पुरोहित यांचे हे पुस्तक अन्य ‘गावक-यांना’ स्वतःच्या गावाविषयी लिहायला उद्युक्त करो हीच सदिच्छा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – होली पर्व विशेष – रंगोत्सव ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – रंगोत्सव ??

होली अर्थात विभिन्न रंगों का साथ आना। साथ आना, एकात्म होना। रंग लगाना अर्थात अपने रंग या अपनी सोच अथवा विचार में किसी को रँगना। विभिन्न रंगों से रँगा व्यक्ति जानता है कि उसका विचार ही अंतिम नहीं है। रंग लगानेवाला स्वयं भी सामासिकता और एकात्मता के रंग में रँगता चला जाता है। रँगना भी ऐसा कि रँगा सियार भी हृदय परिवर्तन के लिए विवश हो जाए। अपनी एक कविता स्मरण हो आती है,

सारे विरोध उनके तिरोहित हुए,

भाव मेरे मन के पुरोहित हुए,

मतभेदों की समिधा,

संवाद के यज्ञ में,

सद्भाव के घृत से,

सत्य के पावक में होम हुई,

आर-पार अब

एक ही परिदृश्य बसता है,

मेरे मन के भावों का

उनके ह्रदय में,

उनके विचार का

मेरे मानसपटल पर

प्रतिबिंब दिखता है…!

होली या फाग हमारी सामासिकता का इंद्रधनुषी प्रतीक है। यही कारण है कि होली क्षमापना का भी पर्व है। क्षमापना अर्थात वर्षभर की ईर्ष्या मत्सर, शत्रुता को भूलकर सहयोग- समन्वय का नया पर्व आरंभ करना।

जाने-अनजाने विगत वर्षभर में किसी कृत्य से किसी का मन दुखा हो तो हृदय से क्षमायाचना। आइए, शेष जीवन में हिल-मिलकर अशेष रंगों का आनंद उठाएँ, होली मनाएँ।

? शुभ धूलिवंदन ?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️💥 श्री शिव महापुराण का पारायण सम्पन्न हुआ। अगले कुछ समय पटल पर छुट्टी रहेगी। जिन साधकों का पारायण पूरा नहीं हो सका है, उन्हें छुट्टी की अवधि में इसे पूरा करने का प्रयास करना चाहिए। 💥 🕉️ 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆होली पर्व विशेष – पानी की बारात  ☆ श्रीमती समीक्षा तैलंग ☆

श्रीमती समीक्षा तैलंग

 

☆ होली पर्व विशेष – पानी की बारात ☆ श्रीमती समीक्षा तैलंग  ☆

काकी कहिन – पानी की बारात

काकी इस बार खूब छककर होली खेलने के मूड में है। पिछले कई सालों की कसर जो निकालनी है। होली का हुड़दंग करने के लिए पूरी टोली तैयार है। होली के पहले ही शादी की नहीं ‘पानी की बारात’ निकालने के लिए सब मुस्तैद हैं। शहर के विधायक-सांसद-पार्षद-मेयर के अलावा गली-मुहल्ले के छुटभैये नेताओं को भी आमंत्रण पहुँच चुका है। दुलत्ती से नहीं ढोल-ताशे से सबका स्वागत करने के लिए आसपास के राज्यों से उम्दा नस्ल के गधों को भी आमंत्रित किया गया है। अलबत्ता ये गधे सच में चार पैर वाले हैं। बारात समय पर चल चुकी है। बारात की अगुवाई काकी कर रही है।

गधे ख़ाली बरतनों को ढोकर अपनी दुलत्ती से उन्हें सुरीले अंदाज में बजा रहे हैं। टोली में मौजूद लोग भी बजाने में उनका साथ दे रहे हैं। गोया वे सबकी बजा रहे हों। इस विशेष बारात को कवर करने के लिए पत्रकार अपने औजारों के साथ बड़ी तादाद में जुटे हैं। ट्रक पर ड्रम लदे हुए हैं। किसी पद संचलन की तरह ये बारात भी बढ़ रही है।

गीत बज रहे हैं- “तुमने पुकारा और हम चले आए, वोट की आस में आए रे,,,”। “ये देश है गुगली वालों का, लोफर और मस्तानों का, इस देश का यारों क्या कहना, ये देश है झूठों का गहना,,,”। “जनता की दुआँए लेता जा, जा तुझको कुरसी का प्यार मिले, महलों में कभी न याद आए, प्यादों से इतना प्यार मिले,,,”।

इन गीतों को सुन पत्रकार काकी से-

“मैंने अभी देखा कि बारात में बड़े नेता आमंत्रित हैं। उनके सामने उनके खिलाफ गीत?”

“तो क्या करें! हम पीठ पीछे और, और सामने कुछ और नहीं बोल सकते। आप हिम्मत नहीं करेंगे तो हमें तो करनी ही होगी”।

“आपकी ये बारात किस खुशी में है? क्या आप सूखी होली खेलने के पक्ष में हैं?”

“ये बारात पानी की विदाई की है। पानी अब केवल इन नेताओं के घरों में होता है। हमारे यहाँ से पिछले एक महीने से विदा हो चुका है। आज उसे ऑफिशियली विदा कर रहे हैं। इस उत्तर के बाद दूसरे प्रश्न कोई औचित्य नहीं”।

“ये बरतन ख़ाली हैं। क्या ट्रक पर रखे ड्रम भरे हैं?”

“जी हाँ वो भरे हैं। खोलकर देखना चाहेंगे?”

वो पत्रकार अपने साथियों के साथ भरे ड्रम की फ़ोटो लेने चढ़ता है। सारे ड्रम खोल दिए जाते हैं। कुछ ही समय में वातावरण बदल जाता है। जिसे देखो वह पेट पकड़कर हँसता हुआ पाया जाता है।

पत्रकार हँसते हुए काकी से-

“क्या आपने इसमें लाफिंग गैस भरी थी?”

काकी भी हँसते हुए- “हाँ जी। ये नेता लोग चाहते हैं कि त्योहारों में आम आदमी रोये और इनके पैरों पर गिड़गिड़ाए। इसलिए हम अपने दुख को इस गैस के द्वारा भूलकर हँस रहे हैं”।

“कैसा दुख?”

“अरे भाई बिन पानी सब सून। होली तो बाद की बात है यहाँ तो पीने और वापरने के पानी की किल्लत है। पानी पर राजनीति करने वालों के घर पानी से भरे हैं। जहाँ से टैंकर भरे जाते हैं वहाँ भी पानी भरा हुआ है। मगर हमारे लिए टैक्स देने के बाद भी ठन-ठन गोपाल। अब तुम कहो कि सूखी होली पसंद है तो भैया अब तो होली ही पसंद नहीं। क्योंकि सूखा रंग लगाने के बाद भी उसे धोना पड़ता है। यहाँ तो पानी के बगैर जीवन ही बदरंग हो चुका है। सुबह उठते ही किच-किच शुरू”।

उधर नेतागण माइक पर सूचित करते हैं कि इस अनोखी बारात का आयोजन अब प्रतिवर्ष किया जाएगा। काकी को समझ नहीं आता कि अब वे उनसे क्या कहें! अगले ही पल वे पानी की किल्लत को दूर करने का आश्वासन देते हैं।

तब काकी उनके हाथ से माइक छीनकर बोल पड़ती है-

“फिर से आश्वासन!!”

(स्वदेश – साप्ताहिक सप्तक – 9 मार्च 2025)

© श्रीमती समीक्षा तैलंग 

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 235 ☆ फागुन मास सुहावन लागे… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “फागुन मास सुहावन लागे। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 235 ☆ फागुन मास सुहावन लागे

रंगों की बौछार में भींगते हुए लोग सकारात्मकता के साथ श्यामल हो जाना चाहते हैं। बरसाना, नंद गाँव, वृंदावन की बात ही क्या, यहाँ फगुआ गाते हुए भक्त लठ्ठमार होली का आनन्द भी उठाते हैं। रंगभरी ग्यारस से जो गुलाल उड़ना शुरू होता है, वो रंग पंचमी पर जाकर पूर्ण होता है …

ग्वालवाले झूम जाते, मास फागुन रंग में।

कृष्ण राधामय हुए अब, होलिका हुड़दंग  में।।

 धड़कनों को  थाम रखते, ले  गुलालन  हाथ में।

रूप वृन्दावन सुहावन, गोप ग्वाले साथ में।।

संस्कारों को जीवित रखने का प्रबल माध्यम हमारे त्यौहार होते हैं जो न केवल मिलजुलकर रहना सिखाते वरन एक दूसरे का सम्मान, बड़ों का आदर, छोटों को स्नेह करना सिखाते हैं। प्राकृतिक रंगों के साथ जुड़कर अपने घरों में हरी धनिया, बथुआ,पालक, चुकंदर, गाजर, टेसू के फूल के द्वारा रंग बनाइए और उससे खेलें। आजकल तो व्यवस्थित कालोनियों में एक साथ मिलकर ,तय समय में ऐसे ही रंगो का प्रयोग हो रहा है। घर के बनें पकवान विशेषकर गुझिया, दही बड़ा, काँजी बड़ा, शक्कर पारा, सलोनी , पापड़ी, खाजा व कचौड़ियों का स्वाद  इसमें चार चाँद लगा देता है।

आप सभी को होलिकोत्सव की हार्दिक शुभकामनाएँ। रंगोत्सव में सारे भेदभाव मिटाकर एक दूसरे के अपना बनाइए तभी सच्चे मायनों में वसुधैव कुटुंबकम सार्थक होगा।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 341 ☆ आलेख – “मुगल भारत में इसलिए स्थाई हुए क्योंकि उन्होंने भारतीय पर्वों की परवाह की…” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 341 ☆

?  आलेख – मुगल भारत में इसलिए स्थाई हुए क्योंकि उन्होंने भारतीय पर्वों की परवाह की…  ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

विवेक रंजन श्रीवास्तव
भोपाल
होली रंगों का त्योहार है। रंग खुशी के प्रतीक होते हैं। दुखद है कि आज गंगा जमनी तहजीब की बात तो होती है पर जो लोग अपने हित साधन के लिए यह बात करते हैं वे ही उस पर अमल नहीं करते। इतिहास के पन्नों में देखें तो भारत में मुसलमान केवल इसलिए यहां के निवासी बन सके क्योंकि उन्होंने हिंदुस्तान की संस्कृति को अपनाया । मुगल बादशाहों के समय में होली के त्योहार का खूब जिक्र मिलता है। इतिहास के जानकार बताते हैं कि मुगल शासन में बादशाहों को रंग से कोई परहेज नहीं था । मुगल शासन काल में मवेशी के सींगो के खोल में रंग भरकर पिचकारी के रूप में इस्तेमाल कर रंग फेंका जाता था। बादशाह जहांगीर के समय में बांस की पिचकारी बनाकर उसमें रंग भरकर वह अपने महल के दरबारी और राज्यों के साथ होली खेलते थे। यह उल्लेख साहित्य में वर्णित है। बादशाह मोहम्मद शाह के होली खेलने का जिक्र इतिहास में दर्ज है। जहांगीर काल में जहांगीर द्वारा होली खेलने की कई पेंटिंग्स आज भी मौजूद हैं। प्लास्टिक का आविष्कार मुगल शासन काल में तो नहीं हुआ था। तब बांस की पिचकारी बनाकर , या धातु की पिचकारी का उपयोग किया जाता था। ग़ुलाल और वनस्पतियों, खास कर टेसू के फूलों के रंगों को पानी में घोलकर पिचकारी में भरा जाता था। जिससे होली खेली जाती थी। यह प्रथा भारत की संस्कृति का हिस्सा है।आज भी कई ऐसे मुस्लिम परिवार हैं जो होली का त्योहार गर्व से खेलते हैं। होली को ईद e गुलाबी कहा जाता था । अकबर का जोधाबाई के साथ और जहांगीर का नूरजहां के साथ होली खेलने का वर्णन है. पत्थर के बड़े हौद में रंग बनाया जाता था। अतः आज रंग का विरोध परम्परा या सांस्कृतिक न होकर राजनैतिक अधिक दिखता है।

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 242 ☆ बाल कविता – होली का त्योहार… ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक कुल 148 मौलिक  कृतियाँ प्रकाशित। प्रमुख  मौलिक कृतियाँ 132 (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित। कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मानबाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्यकर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंतउत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

 आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 242 ☆ 

☆ बाल कविता – होली का त्योहार…  ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

 होली का त्योहार

बने हैं चाट पकौड़ी

आलू टिक्की, पापड़, सेमें

स्वाद मूँग मंगौड़ी।।

 *

गरम – गरम आलू हैं छोले

बढ़िया उर्द कचौड़ी

बेसन के भी सेव खा रहे

मौड़ा सब ही मौड़ी।।

 *

रंग गुलाल उड़े हैं केसर

मस्ती ही मस्ती है

जमकर खेलें, हुरियारे सब

रँगी गली बस्ती है।।

 *

जमकर खाएँ चाट पकौड़ी

सी – सी कर हुरियारे

खूब मना त्योहार होलिका

जोकर से मुँह कारे।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares