मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – ‘आपला… समीर… परत… आलाय… ‘ आरतीचा हा चार शब्दांचा निरोप निखळ समाधान देणारा असला तरीही हे आक्रीत घडलं असं यांची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. पंधरा वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ही उकल झाली आणि त्या क्षणीचा थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्या पुढे मी मनोमन नतमस्तक झालो.. !!)

तो थरार कधी विसरुच शकणार नाही असाच होता! समीर नवीन बाळाच्या रुपात परत आलाय याच्यावर ध्यानीमनी नसताना पंधरा वर्षांनंतर अचानक शिक्कामोर्तब व्हावं आणि तेही तोवर मला पूर्णत: अनोळखी असणाऱ्या एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून हे अतर्क्यच होतं माझ्यासाठी.. !

ते सगळं जसं घडलं तसं आजही जिवंत आहे माझ्या मनात.. !

नकळतच बाळाचं नाव ठेवलं गेलं ते ‘समीर’ची सावली वाटावी असंच. ‘सलिल’! सलिलचा जन्म ऑगस्ट १९८० चा. आणि पुढे बराच काळ उलटून गेल्यानंतर जुलै १९९४ मधे एका अगदीच वेगळ्या अशा अस्थिरतेत माझ्या मनाची ओढाताण चालू असताना ‘समीर’ आणि ‘सलिल’ या दोघांमधील एक अतिशय घट्ट असा रेशीमधागा स्पष्टपणे जाणवून देणारा तो प्रसंग अगदी सहज योगायोगाने घडावा तसाच घडत गेला होता. तो जन्म आणि मृत्यू यांच्यामधल्या परस्परसंबंधांची उकल करणारा जसा, तसाच समीर आणि सलिल या दोघांमधल्या अलौकिक संबंधांची प्रचिती देत सप्टे. १९७३ मधे आम्हाला सोडून गेलेल्या आमच्या बाबांनी आम्हा मुलांवर धरलेल्या मायेच्या सावलीचा शांतवणारा स्पर्श करणाराही!!

ही गोष्ट आहे जून-जुलै १९९४ दरम्यानची. सलिल तेव्हा १४ वर्षांचा होता. सांगली(मुख्य) शाखेत ब्रॅंच मॅनेजर म्हणून मी कार्यरत होतो. इथे माझी तीन वर्षे पूर्ण होताहोताच नेमकं पुढच्या प्रमोशनचं प्रोसेस सुरु झालं. माझा इंटरव्ह्यू झाला आणि हायर ग्रेड प्रमोशनसाठी मी सिलेक्टही झालो. सुखद स्वप्नच वाटावं असं हे सगळं अचानक फारफार तर महिन्याभरांत घडून गेलं आणि सगळं सुरळीत होतंय असं वाटेपर्यंत अचानक ठेच लागावी तसा तो सगळा आनंद एकदम मलूलच होऊन गेला!

 कारण पोस्टींग कुठे होईल ही उत्सुकता असली तरी माझ्या पौर्णिमेच्या नित्यनेमात अडसर येईल असं कांही घडणार नाही हा मनोमन विश्वास होता खरा, पण अनपेक्षितपणे तो विश्वास अनाठायीच ठरावा अशी कलाटणी मिळाली. प्रमोशनची आॅफर आली की ती आधी स्वीकारायची आणि तसं स्वीकारपत्र हेड ऑफिसला पाठवलं की मग पोस्टिंगची ऑर्डर यायची असंच प्रोसिजर असे. मला प्रमोशनचं ऑफर लेटर आलं आणि पाठोपाठ

‘ यावेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांचं ‘आऊट ऑफ स्टेट’ पोस्टिंग होणार ‘ अशी अनपेक्षित बातमीही. मेरीट लिस्ट मधे असणाऱ्यांची प्रमोशन पोस्टींग्ज प्रत्येकवेळी त्याच रिजनमधे आणि इतरांची मात्र ‘आऊट आॅफ स्टेट’ अशीच आजवरची प्रथा होती. त्याप्रमाणे आधीची माझी प्रमोशन पोस्टींग्ज सुदैवाने कोल्हापूर रिजनमधेच झालेली होती. पण यावेळी धोरणात्मक बदल होऊन सर्वच प्रमोशन पोस्टींग्ज ‘आऊट ऑफ स्टेट’ होतील असं ठरलं आणि त्यानुसार माझं पोस्टींग लखनौला होणार असल्याची बातमी आली!!

नोकरी म्हंटलं कीं आज ना उद्या असं होणारंच हे मनोमन स्वीकारण्याशिवाय पर्याय होताच कुठं? मी हे स्वीकारलं तरी माझे स्टाफ मेंबर्स मात्र ते स्वीकारु शकले नाहीत. मला आता प्रमोशन नाकारावे लागणार असं वाटून ते कांहीसे अस्वस्थ झाले.

तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी कस्टमर्सची गर्दी ओसरली तसे त्यातले कांहीजण माझ्या केबिनमधे आले. सर्वांच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. दर तीन वर्षांनी होणारी अधिकाऱ्यांची बदली हे खरंतर ठरुनच गेलेलं. पण निरोप देणाऱ्या न् घेणाऱ्या दोघांच्याही मनातलं दुःख हा आजवर अनेकदा घेतलेला अपरिहार्य अनुभव माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच असायचा. यावेळी तरी तो वेगळा कुठून असायला?

” साहेब,तुम्ही प्रमोशन अॅक्सेप्ट करणार नाहीये का?” एकानं विचारलं. वातावरणातलं गांभीर्य कमी करण्यासाठी मी हसलो.

” अॅक्सेप्ट करायला हवंच ना? नाकारायचं कशासाठी?” मी हसतंच विचारलं. पण त्या सर्वांना वेगळाच प्रश्न त्रास देत होता.

” पण तुम्ही लखनौला गेलात तर दर पौर्णिमेला नृ. वाडीला कसे येऊ शकणार?”

हा प्रश्न मलाच कसा नव्हता पडला? लखनौच्या पोस्टींगची बातमी आली न् पहिला विचार आला होता तो पुन्हा घरापासून इतक्या दूर जाण्याचाच‌‌. तोच विचार मनात ठाण मांडून बसलेला. आरतीच्याही मनाची आधीपासून तयारी व्हायला हवी म्हणून मी हे घरी फक्त तिलाच सांगितलं होतं. सलिलला आत्ताच नको सांगायला असंच आमचं ठरलं. पण मग त्यानंतर पुढचं सगळं नियोजन कसं करायचं यावरच आमचं बोलणं होतं राहिलं. जायचं हे जसं कांही आम्ही गृहितच धरलं होतं. खरंतर मी स्वीकारलेला नित्यनेम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा असं मलाही वाटायचंच कीं. असं असताना माझ्या सहकाऱ्यांना पडलेला हा प्रश्न माझ्या मनात कसा निर्माण झाला नाही? माझं एक मन या प्रश्नाचं शांतपणे उत्तर शोधत राहिलं. सारासार विचार केल्यानंतर त्याला गवसलेलं नेमकं उत्तर.. ‘जे होईल ते शांतपणे स्वीकारायचं!’.. हेच होतं!

मी त्या सर्वांना समोर बसवलं. मनात हळूहळू आकार घेऊ लागलेले विचार जमेल तसे त्यांच्यापर्यंत पोचवत राहिलो.

” मी प्रमोशन नाकारलं समजा, तरीही मॅनेजमेंट नियमानुसार आहे त्या

पोस्टवरही माझी ‘आऊट ऑफ स्टेट’ ट्रान्स्फर कधीही करू शकतेच की. जे व्हायचं तेच होणार असेल तर जे होईल ते नाकारुन कसं चालेल? मी नित्यनेमाचा संकल्प केला तेव्हा ‘आपली कुठेही,कधीही दूर बदली होऊ शकते हा विचार मनात माझ्या मनात आलाच नव्हता. तो नंतर आईने मला बोलून दाखवला, तेव्हा तिला मी जे सांगितलं होतं तेच आत्ताही सांगेन….

“माझा हा नित्यनेम म्हणजे मी केलेला नवस नाहीये. तो अतिशय श्रद्धेने केलेला एक संकल्प आहे. हातून सेवा घडावी एवढ्याच एका उद्देशाने केलेला एक संकल्प! माझ्याकडून दत्तमहाराजांना सेवा करून घ्यायची असेल तितकेच दिवस हा नित्यनेम निर्विघ्नपणे सुरू राहिल. त्यासाठी समजा मी प्रमोशन नाकारलं तरीही एखाद्या पौर्णिमेला आजारपणामुळे मी अंथरुणाला खिळून राहिलो किंवा इतरही कुठल्यातरी कारणाने अडसर येऊ शकतोच ना? त्यामुळे समोर येईल ते स्वीकारून पुढे जाणं हेच मला योग्य वाटतं. शेवटी ‘तो’ म्हणेल तसंच होईल हेच खरं!”

यात नाकारण्यासारखं कांही नव्हतं तरीही त्यापैकी कुणालाच ते स्वीकारताही येईना.

त्यांच्यापैकी अशोक जोशी न रहावून म्हणाले,

” साहेब, या रविवारी तुम्ही मिरजेला आमच्या घरी याल? “

” मी? येईन.. पण.. कां?कशाकरता?”

” साहेब, माझे काका पत्रिका बघतात. त्यांना मी आज घरी गेल्यावर सांगून ठेवतो. तुम्ही या नक्की.. “

मी विचारात पडलो. अशोक जोशींचा उद्देश प्रामाणिक असला तरी मला ते योग्य वाटेना.

” खरं सांगू कां जोशी? तुमच्या भावना मला समजतायत. पण यामुळे प्रश्न सुटणाराय कां? प्रमोशन आणि ट्रान्स्फर याबाबतची सेंट्रल ऑफिसची पॉलिसी माझ्या एकट्याच्या जन्मपत्रिकेवरुन ठरणार नाहीये ना? मग या वाटेने जायचंच कशाला? म्हणून नको. “

अशोक जोशी कांहीसे नाराज झाले.

” साहेब, माझे काका व्यवसाय म्हणून हे करत नाहीयेत. त्यांचा सखोल अभ्यास आहे. व्यासंगही. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रिटायर झालेत. तेही दत्तभक्त आहेत. ते गरजूंना योग्य तो मार्ग दाखवतात फक्त. सल्ला देतात. त्याबद्दल कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. तुम्हाला नाही पटलं, तर त्यांचं नका ऐकू. पण एकदा भेटायला काय हरकत आहे?”

जोशींच्या बोलण्यातली तळमळ मला जाणवली. त्यांना दुखवावंसं वाटेना.

” ठीक आहे. येईन मी. पण तुम्ही कशासाठी मला बोलवलंयत ते त्यांना सांगू मात्र नका. ते आपणहोऊन जे सांगायचं ते सांगू देत. ” मी म्हणालो. ऐकलं आणि जोशी कावरेबावरेच झाले. त्यांना काय बोलावं समजेचना.

” साहेब, मी.. त्यांना तुमची बदली लखनौला होणाराय हे आधीच सांगितलंय. पण म्हणून काय झालं? पत्रिका बघून त्यांचं ते ठरवू देत ना काय ते. ” जोशी म्हणाले.

मी जायचं ठरवलं. लखनौला होणाऱ्या बदलीपेक्षा अधिक धक्कादायक माझ्या पत्रिकेत दुसरं कांही नसणारंच आहे याबद्दल मला खात्री होतीच. पण…. ?

माझं तिथं जाणं हे ‘त्या’नंच ठरवून ठेवलेलं होतं हे मला लवकरच लख्खपणे जाणवणार होतं आणि मला तिथवर न्यायला अशोक जोशी हे फक्त एक निमित्त होते याचा प्रत्ययही येणार होता.. पण ते सगळं मी तिथे गेल्यानंतर.. ! तोवर मी स्वत:ही त्याबद्दल अनभिज्ञच होतो!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाल्गुन—- होळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

फाल्गुन—- होळी☆ सौ शालिनी जोशी

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. कांही ठिकाणी हा सण प्रत्येकाच्या घरी, तर काही ठिकाणी गावकरी मिळून साजरा करतात. एरंडाच्या रोपाभोवती लाकडे व गोऱ्या यांची मांडणी करतात. त्याभोवती रांगोळी घालतात व त्याचे दहन करतात. वैयक्तिक सण असेल तर दुपारी अंगणात होळी पेटवून तिची पूजा आरती करतात. प्रदक्षिणा घालतात व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सार्वजनिक होळी ही साधारणपणे संध्याकाळी पेटवितात. पूजा करून नारळ नैवेद्य अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी त्या राखेचे गोळे करून मुले खेळतात. खरे पाहता हे अग्निदेवतेचे पूजन आहे.

हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर राजा होऊन गेला. तो घमेंडी, ताकदवान व अहंकारी होता. त्याला देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्यात विष्णूचा तो जास्तच द्वेष करीत असे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. ही गोष्ट राजाला आवडत नव्हती. कितीही राजाने सांगितले तरी प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. तेव्हा राजाने प्रल्हाद याला दहन करून मारण्यासाठी आपली बहीण ‘होलिका’ हिच्या मांडीवर बसवले. कारण तिला ‘अग्नीपासून भय नाही’ असे वरदान होते. तिने प्रल्हादासह अग्निप्रवेश केला. पण वेगळेच घडले. विष्णू कृपेने होलिकेचे दहन झाले. आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशाप्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. तेव्हापासून होळी हा सण साजरा करतात. वाईट जाळून चांगले आत्मसात करावे हे सांगणारा हा सण. वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. होलिकेच्या दहनाचा दिवस म्हणून होलिकोत्सव.

कोकणातील हा मोठा सण. याला ‘शिमगा’ म्हणतात. हा शेतकऱ्यांचा निवांतपणाचा काळ. शेतीची भाजावळ झाल्यापासून पावसाची वाट बघण्याचा हा काळ. या दिवसात देवांच्या पालख्या गावभर मिरवतात. लोक रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करतात. नृत्य गाण्याचा आनंद घेतात. काही ठिकाणी गावकरी वेगवेगळी सोंगे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात. कधी पुरुष स्त्रीवेश धारण करतात. स्पर्धा होतात. मर्दानी खेळ खेळतात. कोळी लोक होडक्याची पूजा करून पारंपारिक नृत्य करतात. आदिवासीही सामुदायिक नृत्य करतात. गावानुसार प्रथा बदलते.

एकमेकातील वादविवाद, द्वेष, राग विसरून सर्व समाजाला एकत्रित आणणारा असा हा सण. भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या या आत्ताच्या काळातील होलिका आहेत. त्यांचा नाश करून सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश हा सण देतो. सर्व अशुद्ध भस्मसात करून शुद्ध वातावरण करणारा हा सण. म्हणून ही अग्नीची पूजा.

होळी म्हणजे वसंतऋतुच्या स्वागताचा उत्सव असेही म्हणायला हरकत नाही. जुने दुःख विसरून नवचैतन्याकडे वाटचालयाला शिकणे हाच होळीचा अर्थ.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ यंदा कर्तव्य आहे… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ यंदा कर्तव्य आहे…  ☆ डॉ. शैलजा करोडे

“अग सीमा, एखादी चांगली मुलगी असली तर सुचवशील आपल्या रोहितसाठी, यंदा कर्तव्य आहे ग. पण पाहिजे तसं स्थळ काही नजरेसमोर नाही. तुला तर माहित आहेच रोहित किती गुणी व कर्तबगार मुलगा आहे. ” ” मला माहित आहे ग प्रतिमा सगळं. पण आजकाल लग्नाच्या मुलींची वानवा भासतेय सगळीकडे. लग्नाची मुले जास्त व मुली कमी. मग या मुलीवालेही जणू सातव्या आसमानावर असतात. अपेक्षा खूप असतात यांची मुलगी जरी सुमार असली तरी. शिक्षण कमी, दिसायला यथातथा असलेल्या मुलींनाही गोरा, गोमटा, राजबिंडा मुलगा हवा. शहरात राहणारा हवा. खेड्यातला नको, डाॅक्टर, इंजिनियर, सरकारी नोकर हवा. , सासू सासरे, दीर नणंदेचा फापट पसारा नको. हवा फक्त राजाराणीचा संसार, हम दो हमारे दो. बाकी मंडळी जाऊ दे हवेत उडत, यांना काही घेणं देणं नसतं. “

” बरोबर आहे ग तुझं म्हणणं. पण माझा रोहितही एकुलता एकच आहे. चांगला M. Sc. Agri. डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरी पण मिळणार होती. पण आमची वडिलोपार्जित भरपूर शेती. ती कसायची सोडून नोकरी कसा करणार तो. सोन्यासारखी जमीन आमची. नोकरीतील उत्पन्नापेक्षा कितीतरी पट उत्पन्न देणारी, मग हातचं सोडून पळत्याच्या मागे काय लागायचं. राबणारी गडी माणसं, आपली देखरेख. शिवाय रोहित कृषी क्षेत्रातील विद्यानिष्णात, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बियांणाच्या विविध प्रजाती, खतांची जोड, ठिबक सिंचन, शेतीचं आधुनिकीकरण, मार्केटिंग, शेतीसाठी असणार्‍या विविध योजना, विम्याचं संरक्षण, शेतमाल साठविण्यासाठी आधुनिक सोयींनी सुसज्ज गोदामं, त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे.

” होय ग प्रतिमा, सगळं पटतंय मला. पुढच्या महिन्यात पुण्यात भव्य वधु वर मेळावा आहे. online अर्ज भरायचा आहे. नोंदणी करून ठेव. ” ” होय, मी घरी गेल्यावर आधी ते काम करते “

” अहो, रोहितच्या लग्नाचा काही विचार करता कि नाही. आता रोहितचं शिक्षणही संपलं, त्याने आपला शेती व्यवसायही सांभाळलाय. आता कसली अडचण. ” अडचण कसली ? आता रोहितनं मनावर घ्यावं ” ” रोहित व्यस्त आहे आपल्या कामात. शिवाय तो मूळातच अबोल, आपला आदर करणारा. तो काय मनावर घेणार, आणि आपलंही काही कर्तव्य आहे कि नाही ? ” ” कर्तव्य आहे ग, आपण कोठे नाकारतोय. पण त्याचंही मत घ्यायला हवं. शिवाय त्याच्या मनात कोणी आहे काय ? हे ही जाणून घ्यायला हवं, तू चिंता नको करूस. मी बोलतो रोहितशी. “

मृगाच्या सरी चांगल्याच कोसळल्या होत्या. तप्त धरतीची तृष्णा शमून ती जणू नवकांतीने उभारली होती. चोहीकडे पसरणारा मृदगंध वातावरणात आल्हाद निर्माण करत होता. दुकानांमध्ये बि बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडाली होती. रोहितनेही नवीन संकरीत बियाणे घेतली. ज्वारी बरोबरच, उडीद, मूग, चवळी या भरड धान्याबरोबरच तो कांदा व काही प्रमाणात विविध भाज्यांचीही लागवड करणार होता.

रात्री जेवतांना शांतारामरावांनी रोहितला म्हणाले, ” काय रोहित मृगसरी कोसळल्या. सर्वत्र मृदगंध दरवळतोय. आनंदी, आल्हाददायी वातावरण आहे. काळ्या आईच्या सेवेसाठी आपणही सज्ज आहोत. आणि ही काळी आई एका दाण्याच्या बदल्यात हजार दाणे देईल. पण बेटा तुझ्या ह्या आईची पण काही इच्छा आहे. तुझेही दोनाचे चार, पुढे चाराचे सहा व्हावे. ” ” बाबा, मी काय सांगणार ? ” ” अरे काय सांगणार म्हणजे ? तुलाच तर सांगावं लागेल ? कोणी आहे

काय तुझ्या पसंतीची ? असेल तर आमचं काम सोपं होईल. फक्त अक्षता टाकण्याचं काम आमचं. ” ” नाही बाबा, माझी कोणी पसंती नाही. आईलाच करू देत हे काम “” अहो ऐकलंत का ? तुम्ही लागा आता कामाला “. ‘ मी सुरू केलंय माझं काम. पुढच्या महिन्यात वधु वर मेळावा आहे. रोहितचं नाव नोंदवलंय मी. आपण जाऊ तिथे ‘.

दुपारचे जेवण झाले व सगळी मंडळी हाॅलमध्ये परतली. सकाळपासून सुरु झालेल्या वधु वर मेळाव्यात मान्यवरांची भाषणे, सन्मान, प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय यातच सकाळचं सत्र संपलं होतं. आता दुसर्‍या सत्रात वधु वर परिचय होणार होता. वधुपेक्षा वरांचीच संख्या भरपूर होती. एक एक उमेदवार मंचावर येऊन आपला परिचय देत होता, अपेक्षा सांगत होता. सांगलीची अलका लोणकर व अमरावतीची विद्या बनकर या दोन मुली मला (प्रतिमाला) रोहितसाठी योग्य वाटल्या. त्यांच्या पालकांशी मी तिथेच संपर्क साधला. गोरा, उंच, राजबिंडा दिसणार्‍या रोहितला कोण नाकारणार ? मी मनोमन खुश होते.

” रोहित चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, सधन स्थितीतील आहे, आम्हांला पसंत आहे, पण मुलाने खेड्यात राहून शेती करण्यापेक्षा शहरात नोकरी करावी एवढी आमची माफक अपेक्षा ” सांगलीच्या अलका लोणकरचे पालक बोलत होते.

‘ आपली गडगंज संपत्ती व शेती सोडून त्याने नोकरी म्हणजे दुसर्‍यांची चाकरी करायची ? ” ” आमची मुलगी शहरात राहणारी, पुढेही मुलांचे शिक्षण, इंग्रजी शाळा, विविध शैक्षणिक सुविधा शहरातच मिळणार. शिवाय आमची मुलगीही उच्च शिक्षित आहे, ती नोकरी करणारच, तिच्या ज्ञानाचा उपयोग करणार, खेडे गावात हे शक्य तरी होईल काय ?” 

आता माझं लक्ष अमरावतीच्या विद्या बनकर वर केंद्रित झालं. ” प्रतिमाताई तुमचा मुलगा चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, होतकरू आहे. आम्हांलाही असाच मुलगा हवा होता. विद्या आमची एकुलती एक कन्या, माझा बिझनेस, उद्योग व्यवसाय सांभाळायला मला रोहितसारखा मुलगा हवा होता. ” रोहितने तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळायचा आणि त्याचा स्वतःचा कोणी सांभाळायचा ? ” ” ताई शेतीकडे पाहायला तुम्ही दोघं आहात, शिवाय गडी माणसं आहेत. उद्योग व्यवसायात स्वतः लक्ष घालावं लागतं ” ” आम्ही थकलोत आता, पुढील पिढीने ही जवाबदारी सांभाळावी ही आमची अपेक्षा, पण तुम्हांला तर घरजावई हवा “. ते शक्य नाही. विद्याचं स्थळावर मी क्रास मार्क केला.

पुन्हा परिस्थिती जैसे थे वर येऊन ठेपली.

‘ प्रतिमा, नको चिंता करूस. मिळेल आपल्या रोहितलाही साजेशी मुलगी “

” कशी मिळणार, पाहिलंत ना वधुवर मेळाव्यातही किती कमी मुली होत्या. “

” होय, स्त्री भ्रूण हत्येचा मार्ग अनेकांनी चोखाळला व समाजातील स्त्री पुरूष समतोल ढासळला. हे परिणाम तर होणारच होते. तरी बघूया, रोहित आपला हुशार, होतकरू आहे. त्याला मुलगी मिळेल. नव्हे घरबसल्या सांगून येईल. “

लग्नाचा हा सिजन तर निघून गेला. माझे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.

” अरे रोहित आलास. मी केव्हाची वाट पाहात होते. आणि सोबत ही कोण ? ” आई ह्यांना घरात तर येऊ दे. या आहेत मीनाक्षी मॅडम, कृषी अधिकारी, कृषी मार्केटिंगसाठी मला बरीच मदत होते यांची. शेतीचं पोत, आणि इतर घटक लक्षात घेऊन विविध बियाणांचे वाण, खतांचं मागदर्शन करण्यासाठी या स्थानिक सर्व्हे सुद्धा करतात. आज आपल्या जमिनीचा सर्व्हे करुन, मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला देतील व आपल्याला त्यानुसार मार्गदर्शन करतील. ” ” होय काय, ठीक आहे. काय घेणार मॅडम, चहा, काॅफी कि थंड बनवू काही ” ” मला मॅडम नाही मीनाक्षी म्हणा आई, तुम्ही मला आईसारख्या आहात. “

किती चांगली मुलगी, मला आई म्हणाली, आंटी नाही, संस्कारी वाटते. रोहितला शोभेशी आहे.

मीनाक्षी आपले काम आटोपून निघून गेली, पण माझ्या मनात घर करून गेली.

‘ रोहित, मीनाक्षी कशी वाटते रे ? काही विचार केलास काय ? ‘ ‘ आई, काय बोलतेस हे ? तू असा विचार कसा करू शकतेस ? माझ्या मनात तसलं काहीही नाही आणि मीनाक्षी मॅडमच्या मनातही नसावं. तू रात्रंदिवस माझ्या लग्नाचा ध्यास घेतला आहेस. कोणत्याही मुलीमध्ये तू आपली सून शोधतेस. ” ” तसं नाही रे. मला मुलगी चांगली वाटली. गळ्यात सौभाग्य अलंकार नव्हते म्हणून लग्नाची वाटली. यात माझं काय चुकलं. ” ” नाही आई, तसं नव्हतं म्हणायच मला. “

मीनाक्षी कामानिमित्त गावात आली कि मलाहि भेटून जायची. हळूहळू परिचय वाढला. मीनाक्षीला एक धाकटा भाऊ व घरी आई वडील होते. वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर तर आई गृहिणी. निम्नमध्यम वर्गीय कुटुंब.

“मीनाक्षी लग्नाचा काही विचार केलास”. तशी मीनाक्षी निरूत्तर. ” अग, असं मौन राहून कसं चालेल. बरं, मीच घालते विषयाला हात. माझा रोहित कसा वाटतो तुला ? ही माझी, मेलीची इच्छा. तुझ्या मनात नसेल तर विसरुन जा हा माझा प्रश्न. ” ” मी नंतर कळवलं तर चालेल आई ” ” होय, तुला पाहिजे तेवढा वेळ घे “

मीनाक्षीने घरी आई बाबांना रोहितविषयी सांगितलं. ” तुला पसंत आहे ना. मग पुढील फाॅर्म्यालिटीज आम्ही करू. रोहितच्या आई बाबांना सांग आम्ही येतो भेटीला म्हणून “

नक्षत्रासारख्या सुनेचं स्वागत करतांना आज मन आनंदानं उचंबळून आलं होतं. ” ये सूनबाई, उंबरठ्यावरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं ये ” ” खूप छान आहे हो मुलगी, अगदी लक्ष्मी नारायणाची जोडी शोभतेय. लग्न घरातील सगळ्यांची हिच प्रतिक्रिया होती. यंदा कर्तव्य आहे म्हणत असतांना चार वर्ष भुरsss कन उडून गेली होती

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभू…संग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभूसंग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

काय मरण मरण – मला नाही त्याची भीती

होते सामोरी घेऊन – पंचप्राणाची आरती 

माझं मरण मरण – त्याने यावं अवचित 

त्याच्या शुभ्र पंखावरी – झेपावीन अंतरात 

दवओल्या पहाटेस – त्याचे पाऊल वाजावे

उषा लाजता हासता – प्राण विश्वरूप व्हावे.

माध्यान्हाच्या नीलनभा – जाई गरुड वेधून 

त्याच्यापरी प्राण जावे – सूर्यमंडळा भेदून 

किंवा गोरज क्षण यावा – क्षण यावा आर्त आर्त

जीवितास काचणारी – हुरहुर व्हावी शांत

शांत रजनी काळोखी – घन तिमिर निवांत 

शंकाकुल द्विधा मन – विरघळो सर्व त्यात 

वैशाखीच्या वणव्यात – एक जीव अग्नीकण 

शांतवेल होरपळ – जेव्हा वरील मरण 

जलधारांचा कोसळ – होता सृष्टीचे वसन 

जीव शिवाला भेटावा – बिंदू सिंधूचा होऊन

गारठली पानं सारी – हिमवार्‍याशी झोंबत 

देठी सहज तुटता – न्यावे मलाही सोबत 

नको चुडा मळवट – नको हिरे, मणी, मोती

नका सजवू देहाला – नाही आसुसली माती 

नको दहन दफन – नको पेटी वा पालखी 

मंत्र, दिवा, वृंदावन – मला सगळी पारखी 

नको रक्षा हिमालयी – गंगा अस्थी विसर्जन 

धुक्यात जावी काया – आसमंती झिरपून 

पंच भूतांनी बांधला – देह होता एक दिनी 

पंचतत्वी तो विरावा – नकळत जनांतूनी

खरे सांगू माझे निधन – झाले कार्तिक संपता 

आज त्याची जनापुढे – घडे निव्वळ सांगता 

जाता जाता एक ठेवा – उरी पोटी जो जपावा 

माझ्या कार्तिकची बट – फक्त हृदयाशी ठेवा.

त्याच क्षणी समस्तांची – स्मृती जावी निपटून 

मागे ऊरू नये माझी – भली बुरी आठवण 

स्मृतींची त्या ढिगातून – आठवांचे ढग येती 

डोळा इवला प्रकाश – वेडी आसवे गळती 

नको सोस आता त्यांचा – जीव सत्यरूप झाला 

कशासाठी कष्टी व्हावे – ओघ पुढती चालला.

दुवा मागल्या पिढीचा – पुढचीशी जुळवून 

माझे बळदले काम – सार्थ आता निखळून

असे अब्ज अब्ज दुवे – आजवर निखळले 

विस्मृतीच्या पंखाखाली – दुवे त्यांचेच जुळले 

 दुवे त्यांचेच जुळले… 

या कवितेच्या शेवटी कवयित्रीने लिहिलंय – 

‘सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मन:पूर्वक क्षमायाचना आता तुमची नसलेली, मीना.’ 

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. त्यांनी याद्वारे मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.

कै. मीना प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे मनोगत वरील कवितेतून व्यक्त करून ठेवले होते ही गोष्ट अचंबित करणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

संग्राहक – डॉ. शेखर कुलकर्णी 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

दुष्काळ पडायच्या आधीची  दोन वर्षे मजेत गेली. त्यावेळी फारतर आम्ही पाचवी सहावी इयत्तेत होतो.वरील    कालावधीत आमच्या गावात सिद्ध पुरुष आणि त्यांची टीम दाखल झालेली होती. आम्ही त्यावेळी खूप लहान  विद्यार्थी. आमचं कुतूहल कायम जागृत आमच्या गल्लीतील आम्ही बारा तेरा जण त्या सिद्ध पुरुषाच्या मागे. त्यांना काही मदत लागल्यास हजर. त्यांची राहण्याची सोय शिव मंदिरात. तस गाव दहा हजार लोकवस्ती असलेल्.

पटवर्धन संस्थांनाचं गाव कागवाड. गावात पोलीस पाटील, कुलकर्णी, खोत आणि इतर बारा बलुतेदार शेतकरी, कष्टकरी समाज. ते दिवस खूपच सुखाचे. वेळेवर चार महिने पाऊस आणि पावसावर कसलेली शेती अमाप धनधान्य समृद्धी देणारी. काहीजणाच्या शेतात विहिरी व मोट ह्यांची व्यवस्था पण असल्यामुळे तुरळक बागायतदार होतेच. 

आमची शाळा सकाळी आठ ते अकरा दुपारी दोन ते पाच. बऱ्याच वेळा जाग न आल्याने दुपारची शाळा तुडुंब भरत होती. कारण रोज दुपारी चार वाजता मधु गद्रे येऊन कांद्याचे उप्पीट करत असे. संध्याकाळी पाच नन्तर शाळेतचं वर्तमान पत्राच्या कागदावर उप्पीट वाढलं जात असे. शाळेच्या तुकडया बऱ्याच ठिकाणी विखूरलेल्या. कारण शाळेला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे खोताच्या वाड्यात, काटेच्या वाड्यात. तर काही मारुतीचे देऊळ, आणि तालमीत सुद्धा आमच्या तुकडया होत्या. दुपारी चार नन्तर उप्पीटचा वास चहूकडे पसरत असे. त्यामुळे आमचं मन तिकडेच. गुरुजी सुद्धा हे ओळखून होतेच.म्हणून ते पांढ्यांची उजळणी, कविता म्हणणे असा बदल तिथे करीत असत.  शाळेपेक्षा आमचा कल उडाणटप्पूपणा करण्यात गुंग. त्यात सिद्ध पुरुष आल्याने व त्यांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून आमची नियुक्ती! हे पथ्यावर पडलेलं.

हे सिद्ध पुरुष म्हणजेच गदग मठाचे “श्री स्वामी मल्लिकार्जुन ” त्यावेळचा काळ धनधान्य समृद्ध असलातरी पैसे कोणाकडे नव्हतेच. 

बाजारात किराणा सामान आणायला ज्वारी, किंवा कापूस,गहू घेऊन जायचे त्याबद्दल्यात वाण सामान भरायचे. भाजी बाजारात गेले तरी ज्वारी कापूस धान्य देऊन खरेदी करायची. असे ते दिवस. घरी भिक्षा मागायला आला तरी त्यांना सुपातून धान्य दिले जायचे. त्यासाठी घरातील पडवीत एक पोत ज्वारी ठेवली जायची. भिक्षा मागणारे पण ज्यास्त परगावचे असायचे. वेळप्रसंगी भाजी भाकरी दिली जायची. गावात एक मात्र चिंता होती ती म्हणजेच प्यायचं पाणी आणि खर्चाचे पाणी दिवस रात्र भरावे लागे.

अश्या परिस्थितीत श्री मल्लिकार्जुन स्वामी गावात आले आणि त्यांनी ठाण मांडले. रोज रात्री आठ ते दहा प्रवचन सोबत तबला आणि झान्ज वाजवणारे शिष्य. सकाळी त्यांचे आन्हीक कर्म आटोपून झाल्यावर त्यांची रोज प्रत्येकाच्या घरी पाद्य पूजा व भोजन होतं असे. सोबत त्यांचे शिष्यगणं पण असायचेच. 

एके दिवशी काय झाले त्यांनी मठाच्या नावावर जमीन मागितली. व लगेच गावच्या लोकांनी माळरानावर दोन एकर जमीन दिली. तेथून खरा खेळ चालू झाला. रोज पाद्य पूजा झाल्यावर हातात झोळी घेण्यासाठी आम्हा मुलांना बोलवले जायचे . व हातात भगव्या धोत्राचे टोक चार मुले धरून घरोघरी भिक्षा मागायला सांगितले जायचे . आमच्या पुढे टाळ आणि पखवाज वाजवणारा वाद्यवृंद पण होताच. जेणेकरून लोकांना कळावे की भिक्षा यात्रा चालू आहे. हे कार्य रोज वर्षभर तरी चालू झालेल होतं . झोळीत दोन, तीन, पाच पैसे, चार अणे आठ अणे क्वचित रुपया पडत असे. तो आम्ही स्वामीजींच्या कडे सुपूर्द करून दुपारी शाळेत हजेरी लावत होतो. शाळा पण बुडत नव्हती व संध्याकाळी उप्पीट पण चुकत नव्हतं.

रोज स्वामीजी प्रवचनात दान करण्यासाठी उद्युक्त करत होतेच. पैसे,धान्य इतर सामग्री पण गोळा होतं होती. गावातील रस्त्यावर पडलेले दगड, गटारातील दगड गोळा करण्याचे काम चालू झाले. व ते बैल गाडीतून माळावर पोहचवण्यात येतअसे बैलगाडी स्वखुशीने शेतकरी देत असतं . बऱ्याच दानशूर लोकांनी वाळू,दगड,किंवा रोख पैसे देत असतं.

आणि एक दिवशी शिवानंद महाविद्यालयाचे बांधकाम चालू झाले. चुना खडी वाळू रगडली जाऊ लागली. बांधकाम मजुरांनी पण आठवड्यातील एक दिवस स्वामी चरणी अर्पण करून पुण्य कामावले. इमारत वर वर येऊ लागली तसे पैसे कमी पडू लागले. त्यातून पण स्वामींनी शक्कल लढवत लॉटरीची योजना राबवली. लॉटरीत प्रपंचांची भांडी कुंडी, सायकल रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू ठेवल्या. व त्याचे प्रदर्शन पण मांडण्यात आले. लॉटरी तिकिटाची किम्मत होती एक रुपया. त्यावेळी एक रुपया म्हणजे भली मोठी रक्कमचं! 

स्वामीचे रोज प्रवचन चावडीत होतं असे. चावडी गावच्या वेशीत. हा हा म्हणता पंचक्रोशीतील भक्तगण मिळेल त्या वाहनातून येत . त्यावेळी बैलगाडी हेच मोठे वाहन होते. बरेच जण घोड्यावर किंवा सायकल वरुन पण येऊ लागले. श्रावणात तर जर सोमवारी भंडारा पण होऊ लागला. लॉटरीची तिकीट परत छापवी लागली. आणि बघता बघता आमच्या डोळ्यासमोर शिवांनंद महाविद्यालय उभे राहिले.

आम्ही तर रोज झोळी धरून फिरत होतोच. रोज संध्याकाळी परत इमारत कुठवर उंच झाली आहे,हे बघण्यासाठी आतुर असायचो. दिवस सरले .. कॉलेज प्रांगणातचं लॉटरीची सोडत पण झाली. त्यावेळी शिवानंद कला महाविद्यालय पूर्ण बांधून झाले होते.

त्या सिद्ध पुरुषाचे व महाविद्यालयाचे आम्ही पूर्ण साक्षीदार होतो, हे आमचे भाग्यच. 

ह्याच सिद्ध पुरुषांचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी विजापूर मठाचे प्रमुख पट्ट शिष्य होते. हे दोन्ही गुरु आमचे मार्गदर्शक ठरले, यात तिळमात्र शंका नाही. दिवस कसे सरत होते ते कळत नव्हतं. फक्त आम्ही दिलखुलास जीवन जगत होतो. बालपण म्हणजे काय हे देखील आम्हाला त्यावेळी माहित नव्हते. श्रावण महिना तर आमच्या साठी पर्वणी. सणांची रेलचेल. नागपंचमी ला तर घरोघरी झोपळा टांगलेला असायचा. त्यात एकेक पोत ज्वारीच्या लाह्या घरी तयार केलेलं असतं. फोडणीच्या लाह्या, लाह्याचे पीठ दूध गूळ, हे आमचे त्यावेळेस स्नॅक्स! शाळेत जाताना चड्डीच्या दोन्हीही खिश्यात लाह्या कोंबलेल्या असतं. त्यात शेंगदाणे पण मिसळलेलं. लाह्याचा सुशला. बघता बघता पंधरा ऑगस्ट पण जोडून येई. गावभर भारत माता की जय म्हणत, मिरवणूक होई. शेवटी ती गावाबाहेरच्या हायस्कुल मैदानात विसर्जित होई. तिथे भाषण विविध गुण दर्शन असा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होई.

झोपाळा पुढे महिना भर लटकत असे. गोकुळ अष्टमी आली की त्याची तयारी वेगळीच. विठ्ठल मंदिरात एका टेबलवर कृष्णाची मूर्ती सजवून ठेवलेली. प्रतिपदे पासून त्या मूर्ती समोर निरंतर पहारा चालू होई. पहारा म्हणजे प्रत्येकी एका जोडीने एक तास उभारून पारा करायचा. एकाच्या हातात वीणा तर दुसऱ्याच्या हातात टाळ. मुखाने नामस्मरण. जय जय राम कृष्ण हरी. प्रत्येकाला घड्याळ लावून दिवसा व रात्री पहारा करायला उभे केले जायचे. त्यात आमच्या गल्लीतील टीमचे सगळेच भिडू सामील. कारण शाळेला दांडी मारली तरी चालत असे.

माझ्या समोर पक्या असायचा त्याला झान्ज द्यायचो व वीणा मी घ्यायचो. कारण पक्या थोड्या वेळात पेंगत असे. एक दिवशी तो असच पेंगत होता. मुखाने जप चालू होता. मी मुद्दाम ग्यानबा तुकाराम तुमचं आमचं काय काम असं त्याला भारकटवल. तो तसाच म्हणायला नेमक त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. मी साळसूद होऊन जप केला. पक्याचे तुमचं आमचं काय काम चालू होतं. अध्यक्ष आले आणि त्याला खडकन थोबाडीत मारली. तस ते भेळकंडत खाली पडला. त्याला जाग आल्यावर घाबरलं. रडायला लागलं. लगेच माझा भिडू बदलला गेला. 

रोज दुपारी महाप्रसाद चालू होताच. रोज नवीन नैवेद्य असायचा. रोज बरेच लोक हजर असतं. शेवटच्या दिवशी आम्ही भलं मोठं मातीच गाडगे घेउन दोन तीन गल्ल्या फिरून दूध दही लोणी लाह्या लोणचं असे सगळे प्रसाद गोळा करून शेवटी ते गाडगे श्रीकृष्णाजवळच ठेवत, पहाऱ्याची सांगता होई. श्रावण कृष्ण नवमीला ते गाडगे उंच झाडावर टांगले जाई. संध्याकाळी आमचा गट बालचमू येऊन एकमेकांना खांद्यावर धरून तो बुरुज तयार करून ते गाडगे फोडलं जाई. त्यासाठी रोज आम्ही सराव पण करीत असू.

कोणत्याही खेळाची साधने उपलब्ध नसताना, बरेच गावठी खेळ खेळण्यात मजा येत होती व रंगत पण वाढत होतीच. मध्येच केव्हातरी आलावा उर्फ मोहरम सण येत असे. चार पाच ठिकाणी पीर बसवत असतं. आम्ही मुस्लिम मित्रांना घेउन तिथे पण धुमाकूळ घालण्यात मजा येई. आमच्या चावडी जवळच असलेल्या मसूदीत लहान आकाराचे अकरा पीर बसत. सगळेच पीर संध्याकाळी बाहेर पडत. आम्ही त्यांना घेण्यासाठी चढओढ पण लागतं असे. मुल्ला लोक ओळखीचे लगेच लहान पीर आमच्या खांद्यावर देत असतं.ते घेउन आम्ही पटांगणात नाचत असू. आमच्या अंगावर खोबरे खारीक अभिर पडत असे. अभिर कधी कधी डोळ्यात पण जाई त्यावेळी पिरांची खांदे पलटी होई. 

खाणे पिणे शाळेत जाणे, दंगा मस्ती करणे. परीक्षा पास होणे. असे करता करता सातवी पास कधी झालो ते कळलंच नाही. अधून मधून घरी पाहुणे येत, त्यांची बाड दस्त ठेवणे. त्यांना स्टॅण्डवर पोहचवणे. बस येईपर्यंत तेथेच राहणे, त्यांनी देऊ केलेले पैसे नको नको म्हणत, ते घेणे. घरातून जाताना त्यांचा आशीर्वाद घेणे. वाढ वडिलांची आज्ञा पाळत बालपण पुढे सरकत होते. बऱ्याच गोष्टी मिळत नव्हत्या. आहे त्यात समाधान असणे ही त्यावेळची संकल्पना होती.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर – लेखक :  श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर – लेखक :  श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.

या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…

‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो, ’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.

‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे, ’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.

मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.

आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.

गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहायमरने खेद व्यक्त केला होता.

आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!

इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.

‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.

याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.

आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.

‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.

‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?

परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.

‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४. ०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५. ०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.

प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.

यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.

‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५. ०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.

एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.

‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.

या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.

या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.

लेखक : श्री अच्युत गोडबोले

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग !!! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग !!! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज मीच मला चाॅकलेट दिलं,

एक घट्ट मिठी मारून “लव यू ” म्हटलं,

मीच केलय एक प्राॅमिस मला,

कायम खूश ठेवणार आहे मीच मला….

 

प्रायोरिटी लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,

ते आणिन आता थोडं तरी वरती,

सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,

मीच एक फूल दिलय आज मला….

 

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय 

तो सुपरवुमनचा किताब,

मन होऊन जाऊदे 

फुलपाखरू आज…

 

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,

आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,

येत नाही टाईम मैनेजमेंट मला,

काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्समधे मी “ढ” गोळा….

 

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,

माझ्यातला वैशाख,

कारण आज उतरवून ठेवलाय,

मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख….

 

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,

नको ती तुलना, नको ती इर्ष्या,

तोच स्त्रीयांचा खरा शाप…

आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप….

 

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,

आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,

ना कोणाची बायको, सुन, आई, मुलगी म्हणून… फक्त मला…

गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला…

 

का हवा मला नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार? 

मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार…

आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,

आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!

कवयित्री : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्न… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ सारे फक्त जगण्यासाठी… ☆ सुश्री त्रिशला शहा

कुटूंब कबिला चालविण्या

पोटासाठी हा धंदा डोंबाऱ्याचा

*

गाण्याच्या तालावरती

नाचनाचते दोरीवरती

*

अपेक्षा काही जास्त नाही

भुकेपुरती मिळावी भाकरी

*

एक दोन रुपये मिळविण्यासाठी

जीवघेणा खेळ खेळते मी

*

आज इथे तर उद्या तिथे

डोंबाऱ्याचे जगणे फिरतीचे

*

कष्ट उपसते जगण्यासाठी

बालपण मज माहित नाही

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #271 – कविता – ☆ होली की हुडदंग, मेरे देश में… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी होली पर्व पर एक भावप्रवण कविता होली की हुडदंग, मेरे देश में…” ।)

☆ तन्मय साहित्य  #271 ☆

☆ होली की हुडदंग, मेरे देश में… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

(अभिव्यक्ति परिवार के सभी भाई बहनों को रंगपर्व होली की शुभकामनाओं के साथ प्रस्तुत एक गीत)

बड़ी जोर से मची हुई है, होली की हुड़दंग

 मेरे देश में ।

 वैमनस्य, अलगाव, मज़हबी, राजनीति के रंग

 मेरे देश में।।

 

कोरोना के कहर से ज्यादा

राजनीति जहरीली

कुर्सी के कीड़े ने कर दी

सबकी पतलुन ढीली,

कभी इधर औ’ कभी उधर से

फूट रहे गुब्बारे

गुमसुम जनता मन ही मन में

हो रही काली-पीली

आवक-जावक खेल सियासी

खा कर भ्रम की भंङ्ग

मेरे देश में।।

 

 विविध रंग परिधानों में

 देखो प्रगति की बातें

 आश्वासनी पुलावों की है

 जनता को सौगातें,

 भाषण औ’आश्वासन सुन कर

 दूर करो गम अपने

 अलग अलग सुर में सब

 अपनी अपनी राग सुनाते,

 लोकतंत्र या शोकतंत्र के, कैसे-कैसे ढंग

 मेरे देश में

 भूख गरीबी वैमनस्य के भ्रष्टाचारी रंग

 मेरे देश में।

 

 रक्तचाप बढ़ गए,

 धरोहर मौन मीनारों के

 सिमट गई पावन गंगा,

 अपने ही किनारों से,

 झाँक रहे शिवलिंग,

 बिल्व फल फूल नहीं मिलते

 झुलस रहा आकाश

 फरेबी झूठे नारों से,

 बैठ कुर्सियों पर अगुआ, लड़ रहे परस्पर जंग

 मेरे देश में

 भूख गरीबी, वैमनस्य के भ्रष्टाचारी रंग

 मेरे देश में।

 

 ये भी वही और वे भी वही

 किस पर विश्वास करें

 होली पर कैसे, किससे

 क्योंकर परिहास करें,

 कहने को जनसेवक

 लेकिन मालिक ये बन बैठे

 इन सफेदपोशों पर

 कैसे हम विश्वास करें,

 मुँह खोलें या पर बंद रखें, पर पेट रहेगा तंग

 मेरे देश में

 भूख गरीबी वैमनस्य के भ्रष्टाचारी रंग

 मेरे देश में।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 95 ☆ गाँव से अपने… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “गाँव से अपने…”।

✍ जय प्रकाश के नवगीत # 95 ☆ गाँव से अपने… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

लौट आया हूँ शहर में

गाँव से अपने।

 

बिछ गए हैं जाल

यंत्रणा झेलती पीढ़ी

बंद पिंजरों में सिसकते

टूटी चढ़ें सीढ़ी

 

खो गए गहरे कुएँ में

आँख के सपने।

 

ख़बर बुनती रात

सहम जाती हर सुबह है

पराजय थक चुकी

जन्मती फिर-फिर कलह है

 

घोषणाओं में दबे हैं

भूख के टखने।

 

हार जाता युद्ध है

मौसम बदलता चाल

खेत की ख़ामोशियाँ

दब गये सारे सवाल

 

अब शिथिल से बाजुओं में

टूटते डैने।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares