मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी नातं पहिलीत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्यावर संध्याकाळी रोज मी तिला बाल रंजन केंद्रावर घेऊन जातं असे.

तिथे मुलांचे छोटे छोटे वयानुसार गट केले जातं असतं. अठरा एकोणीस वर्षाच्या मुली… म्हणजे

“ताई” या मुलांना खेळ शिकवतं असतं. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, व्यायाम, ग्राउंड ला चक्कर असे तिथे चालतं असे.

त्या दिवशी गेले तर तिथल्या प्रमुख बाईंनी आमच्या ग्रुपला सांगितले की..

“नेहमीची ताई एक महिना रजेवर आहे. तर ही नवीन गौरीताई मुलांना महिनाभर शिकवणार आहे. “.

पाच फुटाची, सावळी, एकदम हडकुळी पण तरतरीत अशी मुलगी समोर आली. तिने आम्हा सर्वांना नमस्कार केला. मुलांना म्हणाली,

“बच्चे कंपनी चलो”

मुलं तिच्यामागे गेली. आम्ही पालक नेहमीप्रमाणे कट्यावर जाऊन बसलो.

एक आजोबा म्हणाले,

“ही एवढीशी तर पोरगी आहे… ही काय शिकवणार मुलांना? “

“हो न… हिला पाहिल्यावर माझ्याही हेच मनात आलं” दुसरे एकजण म्हणाले.

झालं… लगेचच तिच्या दिसण्यावरून अजून एक दोघांनीही कुठल्या कुठल्या कॉमेंट्स केल्या….

एक जण तर स्पष्ट म्हणाली,

” आपण मॅडमना सांगु ही मुलगी आमच्या ग्रुपला ताई म्हणून नको “…

“लगेच आजचं सांगायच”

” कोणीतरी म्हटलं चार दिवस जाऊ दे मग बघू…. नंतर सांगू”

तिला बघितल्याबरोबर अशी सगळी चर्चा झाली.

जरा वेळाने बघितलं तर आज राऊंड घेताना मुलं वेगळीच पळत होती. हसण्याचा आवाज ऐकू येत होता.

मुलं आज नेहमीपेक्षा जास्त आनंदात होती.

गौरीताई काहीतरी सांगत होती मुलं शांतपणे ऐकत होती. मधेच मुलांचा एकदमच ओरडण्याचा आवाज ऐकू आला…. नंतर मात्र मुलं फार हसत होती. आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे काय चाललं आहे हे समजत नव्हते.

घरी निघताना मुलं गौरी ताईला अच्छा, टाटा, बाय-बाय करत होती. माझी नातं तर फार खुश होती. घरी जाताना रस्ताभर गौरीताईच कौतुक सुरू होत..

” गौरीताईंनी आज आम्हाला तुरुतुरु चालायला शिकवलं. इतकी मज्जा आली…. “

” तुरुतुरु ” हा शब्द तर तिला फारच आवडला होता.

” आजी गौरीताईंनी वाघाची गोष्ट सांगितली तिने वाघाचा आवाज काढला. आम्हाला तर भीतीच वाटली होती”

” म्हणून तुम्ही मगाशी ओरडत होता का”

” अग हो… ती म्हणाली मागे बघा खरंच वाघोबा आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मागे बघितलं तेव्हा ताई हसत होती. “

दुसरे दिवशी ग्राउंड वर जाताना नातं भलतीच उत्साहात होती. दरवाजातच माझा हात सोडून ती गौरीताई कडे पळाली.

गौरी मजा… मजा करत मुलांना शिकवत होती. आज दोन्ही हातांच्या मुठी हनुवटी खाली धरून तिने मुलांना पळायला सांगितले. मुले मस्त हसत होती…. गंमत करत होती… त्यांना हे वेगळं खेळणं आवडलं होतं. एकदा तिने मुलांना लुटुलुटू चालायला सांगितलं. खरंतर चालणं नेहमीच होतं पण लुटुलुटु शब्दाची मुलांना फार गंमत वाटत होती.

सगळ्यांना गोल उभ करून तिने हात पकडायला लावले. एक-दोन-तीन म्हटलं की सगळ्यांनी मध्यभागी जवळ यायचं चार-पाच सहा म्हटलं की लांब जायचं अशी खेळण्यात तिनी गंमत आणली होती.

गौरीला रोज नवीन काहीतरी सुचायचे. गोष्ट अगदी छोटीशीच असायची… पण त्यातल्या वेगळे पणाने मुलं त्यात रंगून जायची.. गुंगून जायची…

काही दिवसातच गौरीताई सगळ्यांची लाडकी झाली होती. बघता बघता महिना संपला. आज तिचा शेवटचा दिवस होता.

मुलांना वाईट वाटत होतं. ताई आता येणार नाही, परत भेटणार नाही म्हणून मुलांना खरोखरं रडू येत होतं.

तिचेही डोळे भरून आले होते. ती छोटीशी हडकुळी सावळी गौरी समोर होती…..

मुलं म्हणत होती,

” गौरीताई तुच आम्हाला शिकव ना “

“ताई किती छान आहे”

” ताई तु मला फार आवडतेस”

“ताई तु जाऊ नको ना”

ताई तुच आम्हाला हवी आहेस”

” ताई किती छान शिकवते”

मुलं अक्षरशः तिच्या ड्रेसला पकडून गोल उभी होती….

ती दोन्ही हातांनी मुलांना जवळ घेत होती. त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून, गालावरून… हात फिरवत होती…

सगळ्या मुलांचा निरोप घेऊन ती निघाली…

तिचेही डोळे वहात होते…

ती लांबवर जाईपर्यंत मुलं हात हलवत उभी होती…

मी बघत होते…

माझ्या मनात विचार आला..

या मुलीकडे बघून आम्ही कधी असं म्हणू का? तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर केलेल्या कॉमेंट्स मला आठवल्या.

या छोट्या मुलांना तिच्या रंग, रूपाचं, ऊंचीच काहीही देणघेणं नव्हतं…

ते तिच्या गुणाच्या प्रेमात पडले होते. तिच गुणगान करत होते… निखळं आणि निर्मळं मनाने… तिच्याकडे पाहत होते.

मुलं खरचं निरागस होती.. मनानी स्वच्छ होती..

त्या सात आठ वर्षाच्या मुलांकडे जे सात्विक निर्मळ मन होतं ते आमचा होतं का? तर खरचं नव्हते…

त्यांच वागणं बघुन मला आम्ही काय करायला हवे आहे हे समजले. त्यांच्याकडून काय शिकायला हवे हे पण समजले…

आम्ही अगदी वरवरचं बाह्यरूप बघतो आणि लगेच कोणालाही सहज प्रतिक्रिया देतो… ती ताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल याचा आम्ही कधी विचारही करत नाही.

” किती बारीक झाली आहे “

नाहीतर… ” किती जाड झाली आहे”

” केस किती गेले टक्कल पडायला लागले. “

“केस पांढरे झाले आहेत.. “

“डाय तरी करायचा “

“ही नीटच राहत नाही “

“कसले कपडे घातले आहेत”

” ईतक्यातच चष्मा लागला का? “

” पोट किती सुटलय… “

वगैरे वगैरे…..

तशी यादी खूपच मोठी आहे…

किती आणि काय लिहु… आणि तुम्हाला ती माहित आहे….

हे आठवले म्हणूनच आज आठवणींच्या पेटीतून गौरीताईला बाहेर काढलं…. त्या एक महिन्यात मी तिच्याकडूनही काही गोष्टी शिकले. म्हणूनच मी पण तिला गौरीताईच म्हणणार…

तिची गोष्ट तुम्हाला पण सांगावी म्हणून सांगितली…

नुसती गोष्टच तुम्हाला सांगायची होती का? ….

मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला आता कळलेलेच आहे…

तसे… तुम्ही सुज्ञ आहातच…. करा विचार…

सांगायला नकोच….

थांबते इथे….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

श्री. बजरंग निंबाळकर

भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!

मध्यरात्र उलटून गेली तरी आणखी बरंच रान भिजवायचं शिल्लक होतं. वीज जायच्या आधी सगळं वावर ओलं झालं तरच बरं. नाहीतर ह्या असल्या उन्हात ज्वारी काही तग धरणार नाही हे नक्की!

शिवारात स्मशान शांतता. माणूस नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच. झालंच तर भक्ष्य शोधायला बाहेर पडलेला एखादा सरपटणारा जीव जवळून जाईल तेव्हढाच. त्याच अंधारात काम करायचं.. पहाटेपर्यंत. गार हवा आणि डोईवर चांदण्याने भरलेलं आकाश. एरव्ही जमिनीकडे डोळे लावून बसणारे त्याचे डोळे मात्र आज वारंवार आभाळाकडे पहात होते. आज काही चतुर्थी नव्हती.. चंद्र पाहण्यासाठी! पण आकाश तसे निरभ्र होते. एखादा एकाकी, केस पांढरे झालेल्या म्हाता-यासारखा चुकार ढग चंद्रासमोरून जायचा, त्याच्याकडे एकदा बघून घ्यायचं.. त्याच्यात एखादा आकार शोधायचा! मोकळ्या रानात एकाकी असताना करायचं तरी काय? दूरवर कुणाच्या शेतातल्या विहिरीवरची मोटार तेव्हढी कानावर येत होती… ती बिचारी यांत्रिक. आपलं काम इमानेइतबारे करीत पाणी ओढत राहणे, हे तिला ठावे!

आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा… मोबाईल नावाचं, तळहातावर मावेल एवढं यंत्र, जगाच्याच नव्हे तर विश्वाच्या गोष्टी याचि देही… आणि डोळा दाखवत राहते.. त्याचा मोठा आधार आहे आजकाल. नाही तर पूर्वी रेडीओवर काम भागवावे लागे… त्याचीही बिचा-याची प्रसारण वेळ ठरलेली असायची!

त्याला त्याचे सीमेवरचे दिवस आठवले. शत्रूकडे नजर ठेवत तासान तास उभे राहायचे… अंधार, बर्फ, थंडी, उष्णता यांपैकी काहीच कामाच्या मध्ये येत नसे… मात्र एकाकीपणा जीवघेणा असायचा. डोळ्यासमोर घर आलं की आपण आता जिथे उभे आहोत तिथून घरापर्यंतचं अंतर दिसायचं.. आता निघालं तर किती वेळात पोहचू? असाही विचार यायचा. इथून घरी जाता तरी येईल का असाही विचार येऊन जायचाच… नोकरीच अशी की कशाचा भरवंसा देता येणार नाही.

त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली. सुदैवाने इंटरनेट जिवंत होते… बाकी गाव झोपी गेल्याने रेंजवर ताण कमी असावा…. अजून तसा अवकाश होता थेट प्रक्षेपण सुरु व्हायला… पण आपलं आधीच सुरु केलेलं बरं म्हणून त्याने चिखल माखल्या हातानेच मोबाईलवर गुगल सुरु केलं! ती तिथून निघाली आहे… सतरा तासांनी पोहोचेल… एक दीड तास शिल्लक होता ते सतरा तास खतम व्हायला! इंग्रजीत काहीबाही सांगत होते ते लोक… त्यात त्याला हवं ते नाव उच्चारलं गेलं की बरं वाटत होतं. त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्याला आणखी एक नाव सारखं सारखं आठवत होतं…. ती अशीच परत येताना जमिनीपर्यंत सदेह पोहचू शकली नव्हती… आज असं नाही ना होणार? शेवटी यंत्र आहे हे… दगा देऊ शकतंच!

शेतातल्या त्या अंधारात त्याच्या चेह-यावर मोबाईलचा उजेड जास्तच स्पष्ट होता आज. पण अधून मधून त्याची नजर आभाळाकडे जाई! सा-या जगाचं आभाळ एकच असलं तर इथून सगळं आभाळ काही नजरेस पडणार नव्हतं.. पण तरीही वाटेकडे डोळे लावणे म्हणतात ते असं प्रत्यक्षात होत होतं..!

थेट प्रक्षेपणात थोडा आवाज वाढला म्हणून त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर वरून अत्यंत वेगाने काहीतरी खाली येताना दिसू लागले… ताशी सत्तर हजार किलोमीटर्स एवढा वेग आहे, असं ऐकू आलं. पाहता पाहता ती वस्तू खाली आली आणि तिला दोन पंख फुटले… वेग कमालीचा कमी झाला.. थोड्यावेळाने आणखी दोन पंख उमलले!

अथांग, स्थिर निळा समुद्र. लाटा सुद्धा श्वास रोखून होत्या… आणि ती पाण्याला स्पर्श करती झाली… जमिनीला नाही पण जमिनीवरच्या पाण्याला तरी तिचा स्पर्श झाला होता! पहाटेची ४ वाजून २३ मिनिटे झाली होती…. ती सुखरूप बाहेर आल्याची वेळ त्याने आवर्जून पाहून ठेवली…. आपलं कुणीतरी खूप दिवसांनी, जीवावरच्या संकटातून वाचून परतल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर झळकत होता… शिवारातल्या वाफ्याताल्या पाण्यामध्ये चंद्रही चमकत होता आणि याचा चेहराही!

खूप दिवसांपूर्वी त्याने ऐकले, वाचले आणि पाहिले होते…. आपली एक महिला दूर अंतराळात अडकून पडली आहे. आपली म्हणजे भारतीय वंशाची.. आणि आता अमेरिकी झालेली अंतराळवीरांगना… सुनीता विल्यम्स. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही शूर महिला आज परतणार, उद्या परतणार म्हणून नऊ महिने तिथंच स्थानबद्ध झाल्यासारखी झालेली. तिला परत आणण्याचे प्रयत्न झाले पण त्यातले काही अयशस्वी ठरले. तिच्या परतण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यापासून हा गडी त्या बातमीकडे लक्ष ठेवून होता…. ती परत सुखरूप माघारी आल्यावर जणू तिच्याएवढाच आनंद त्यालाही झाला!

त्या रात्री त्या शिवारात ती बातमी कुणाला सांगावी तर तिथे कुणी नव्हतं.. त्याने आपल्या उजव्या हाताची मूठ बंद केली… तो हात उंचावला आणि कोपरापासून खाली खेचला… बहोत अच्छे… तो उद्गारला! आणि दुस-याच क्षणी त्याच्या मनात कल्पना चावलाची छबी तरळून गेली… ती सुद्धा अशीच परत यायला पाहिजे होती!

(भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या गेली नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडल्याच्या बातम्या सर्वच देशप्रेमी आणि सहृदय माणसांना तशा अस्वस्थच करत होत्या. त्या परत येण्याच्या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आमचे स्नेही आणि भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावून निवृत्त झाल्यानंतर लेखक, पत्रकार, प्राणिसेवक, समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे, सेनादलाची प्रतिमा उंचावल्याबद्दल सन्मानित झालेले श्री. बजरंग तुकाराम निंबाळकर अजूनही शेतात राबतात. त्यांनी शेतीला पाणी पाजता पाजता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास मोबाईलवर थेट अनुभवला. त्यावेळी त्यांच्या झालेली त्यांच्या मनाची अवस्था बरेच काही सांगून जाते… त्यात देशाबद्दलचे प्रेम तर प्रकर्षाने दिसते.. शेवटी एकदा सैनिक बनलेला माणूस अखेरपर्यंत सैनिकच असतो, हे खरे. जय हिंद, निंबाळकर साहेब!)

(फेसबुकवर आलेल्या पोस्टवर आधारित)

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे ‘चष्मा’ एक साधन. वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्या समोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात. चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो.

इतिहास

काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ. स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत. १२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो. पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला. काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली. चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७-३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणी सारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा १८४० पासून प्रचारात आला. प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श भिंगाचा संरक्षक व चष्म्या सारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले.

दृष्टिदोष

विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.

गोलीय भिंगे

नेत्र अनुकूलन सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात. एरवी त्या अस्पष्ट दिसतात. लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात.

चित्याकृती भिंगे

दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते.

लोलक बहुकोनी भिंगे

कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.

द्विकेंद्री भिंगे

लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते.

त्रिकेंद्री भिंगे

यात लांबचा, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.

विशेष प्रकार

उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त प्रारणा पासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार प्रारणा पासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.

प्रायोगिक अवस्थेतील चष्मे

१) अंधांसाठी चष्मा

विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगा ऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदू पर्यंत पोहोचते. अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.

२) अंतरानुसार बदलणारा चष्मा

द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटन मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.

संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण

(संदर्भ : मराठी विश्वकोश/गोखले, श्री. पु. टोळे )

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

“याला म्हणतात” – Positive Thinking 🤣 🤣

— जराशी गंमत

शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे…. मी हातावरील छडीची घाण पुसत असे.

मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो. 😎  

माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत, कारण ते काहीही direct मला सांगायला घाबरत असत… 🤣 🤣 🤣

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत… 😅

कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा. 😮

परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam. संपेपर्यंत उभे राहत असत. 😟 🤣

कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,

कारण बाकी मुलांना मी व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती 

माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत व मैदानाला 5 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

त्यावेळी बाकी मुलं मात्र वर्गात घाम पुसत असत व कोंडलेल्या वर्गात गुदमरून शिकत असत. 🤣

मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….

तू शाळेत का येतोस? … तुला ह्याची गरज नाहिये… 🤣

वाह!! काय ते सोनेरी दिवस होते! 😟

अजूनही आठवतात मला!! 😜

‌………. याला म्हणतात “positive thinking.” 😃😃

सरले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी……. 😇

लेखक : अज्ञात (म्हणजे …. एक अतिशय अभ्यासू, झुंजार, कर्मठ, विश्वासू आणि जागरूक विद्यार्थी) 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

झाडावर बसल्या चिमण्या

झाडास लगडल्या चिमण्या

झाड चिमण्यांचे होऊन गेले

फुलं, पान फळही झाल्या चिमण्या……

*
चिमण्यांच्या चिवचिवाटाने

जणू बोलू लागले झाड

चिमण्यांच्या बागडण्याने

सुखे डोलू लागले झाड…….

 सुखे डोलू लागले झाड…….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

(या निमित्ताने वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या तीन कविता.)

श्री आशिष बिवलकर

( १ ) 

दार बंद करून,

चिऊताई बसली |

कळत नाही,

का बर ती रुसली |

*

ओसरीवर रोज नाचणारी,

आता ती दिसेनाशी झाली |

पूर्वापार माणसाळलेली,

माणसांपासून दूर गेली |

*
एक घास चिऊचा, एक काऊचा

भरवत पिढ्यानपिढ्या वाढल्या |

चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,

लहानाच्या मोठ्या झाल्या |

*
काळ बदलत गेला,

फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |

तुझेच घरटे हिरावले आम्ही,

भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |

*
तुझा चिवचिवाट ऐकायला,

मनाची फुरसतच ती राहिली नाही |

चार दाणे तुला टाकायचे असतात,

सुचतच नाही आता मनाला काही |

*

असेल तिथे सुरक्षित रहा,

नामशेष मात्र नकोस होऊ |

चूकचूक करते पाल मनी,

चित्रात तरी उरशील का गं चिऊ?

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

श्री प्रमोद वामन वर्तक

(२) 

निघे शुचिर्भूत होण्या 

सात चिमण्यांची फौज,

लक्ष ठेवती त्यांच्यावर दोघी

रोखून आपली नजर तेज!

*

पंख चिमुकले बुडवून जलात 

घेती आनंद स्नानाचा मनमुराद,

अंग शहारता गार पाण्याने 

झटकून टाकती पाणी क्षणात!

*

उरे बोटावर मोजण्या इतकी 

यांची संख्या बघा आजकाल,

येत्या ग्रीष्मात पाण्यावाचून

आपण त्यांचे टाळूया हाल!

आपण त्यांचे टाळूया हाल!

© श्रीप्रमोद वामन वर्तक

मो 9892561086

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

(३)  

चिऊताई आली नाचत 

माझ्या दारी अंगणात 

या ग सा-या खेळायला

करू म्हणे गंमत जंमत 

*
छान आहे इथे सारे

हिरवी हिरवी झाडे 

पाना -पानातून लहरते

हवेहवेसे मंद वारे |

*

शांत सुंदर मंत्रांचा 

नाद कानी निनादतो

जगतांना माणसाला 

संदेश देऊया मैत्रीचा |

*

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी.

 मो. ९५९५५५७९०८/

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ इतिहास के पन्ने पलटते तीन दिन! ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ यात्रा संस्मरण – इतिहास के पन्ने पलटते तीन दिन! ☆ श्री कमलेश भारतीय ☆

जब भी कभी यात्रा का या कहीं घूमने का संयोग बनता है तब तब निर्मल वर्मा मेरे कान में कह रहे होते हैं – यात्रायें न केवल हमें बाहर ले जाती हैं बल्कि अपने मन के कोनों में झांकने का अवसर भी प्रदान करती हैं ! इस बार संयोग बना हिसार प्रेस क्लब के उन्नीस साथियों के साथ आगरा, फतेहपुर सीकरी, वृंदावन व सोहना (हरियाणा) में तीन दिन की यात्रा का ! पहले बैठक हुई, मित्रों की इच्छा जानी गयी और फिर तैयारियां शुरू हो गयीं -वीडियो कोच, आगरा व वृंदावन में कहां  रात्रि के समय ठहराव होगा और  दो महिलायें बिंदू और नव प्रीत भी साथ चलेंगीं तो उनके मान-सम्मान का पूरा ख्याल रखना होगा, आदि आदि । इधर बहुत बरसों से कभी अकेले कहीं यात्रा पर नहीं गया तो नीलम कुछ अनमनी सी थी और कह रही थी कि इस उम्र में तबीयत बिगड़ गयी तो कौन संभालेगा ? और यह उम्र राम राम करने की है तो मैंने भी मज़ाक में कहा कि वृंदावन में राधे राधे ही तो करने जा रहा हूं  ! ऊपर से बेटी रश्मि ने मां को समझाया कि पापा का शौक है यात्राओं का, जा लेने दीजिये ! इस तरह घर से हरी झंडी मिलते ही कुछ तैयारी की मैंने भी और  एक रात पहले ही अटैची तैयार कर लिया । एक कंधे पर लटकाने वाले थैले में रवींद्र कालिया की ‘गालिब छुटी शराब’ की प्रति और अपनी ‘यादों की धरोहर’ की दो प्रतियां भी रख लीं क्योंकि आगरा में सविता शर्मा का पुलिस पर आधारित ‘खाकीवर्दी’ संकलन आया है, जिसमें मेरी रचना भी शामिल है तो फोन पर बात हुई कि होटल में बेटा यह संकलन मुझे देने आ जायेगा तो मैं उसे खाली हाथ नहीं लौटाऊंगा बल्कि अपनी ‘यादों की धरोहर’ संस्मरणात्मक पुस्तक उपहार में दूंगा ! इस तरह मेरी तैयारी चलती रही ।

आखिर हम दूसरी सुबह 20 नवम्बर को  हिसार प्रेस क्लब के कार्यालय में सभी एक एक कर एकत्रित होते गये, सबका सामान पीछे डिक्की में एहतियात से ड्राइवर रखता गया । फिर एक एक कप चाय और बिस्किट लेने के बाद लगभग छस बजे यात्रा शुरू हुई ।  क्लब के अध्यक्ष राज पाराशर भाई ऐसे एक थैला गले में लटकाये हुए थे जैसे बारात चलने पर दूल्हे का पिता पैसों से भरा थैला लटकाये चलता है ! इंतज़ाम में इनका साथ दे रहे थे आकाशवाणी वाले सतबीर और इकबाल सिंह ! अभी कुछ लोगों को रास्ते में पिकअप करना था जैसे हिसार कैंट के पास, हांसी शहर के अंदर और फिर पलवल के पास, इस तरह बढ़ते बढ़ते काफिला बनता गया तब पता चला कि एक सीट कम पड़ रही है तो पलवल से पहले हरियाणवी मूढ़ा खरीद कर अतिरिक्त सीट की व्यवस्था की गयी ! हांसी व नारनौंद से शामिल होने वाले साथी लाल वीर लाली बहुत बढ़िया मिठाई के  तीन डिब्बे लेकर आये‌ और सबका मुंह मीठा करवाया ! सुबह से चले और केएमपी हाईवे पर पहुंचे और पलवल के निकट नाश्ता किया ! फोटोज का दौर भी चल पड़ा । एक वाट्सएप ग्रुप बना दिया आगरा टूर के नाम से कि सब फोटो इसमें पोस्ट करते जाइये ! वैसे मोबाइल ने सचमुच क्रांति ला दी है फोटोग्राफी की दुनिया में ! इधर खींचो, उधर देख लो ! जो पसंद आये वह रख लो, जो पसंद न आये वह डिलीट कर दो ! केएमपी हाइवे काफी व्यस्त हाइवे है जो कुंडली, मानेसर व पलवल कहलाता है और उत्तर प्रदेश के साथ झट मिला देता है ! हम भी इसी हाइवे की कृपा से दो बजे आगरा के लाल किले की पार्किंग में वीडियो कोच लगा चुके थे और हमारी यात्रा का पहला पड़ाव यहीं निर्धारित था । सबसे खुशी की बात जब टिकटें लेने लगे तब पढ़ा एक बोर्ड कि कल यानी 19 नवम्बर से विश्व धरोहर सप्ताह मनाया जा रहा है ! इस तरह हम विश्व की धरोहर देखने का सुअवसर पा गये थे ! लम्बी लम्बी लम्बी कतारें, देसी कम विदेशी ज्यादा ! जैसे जैसे हम लम्बी कतार को पार कर अंदर पहुंच ही गये !

वैसे इससे पहले मैं दो बार विदेश में बसीं नीलम की बहनों कांता व सरोज के साथ आगरा घूम चुका हूं पर वे सन् 1984 व 1986 की बातें हैं और इसी किले की जानकारी देने वाले रतन गाइड की बर्णन की भाषा के लहजे में एक कहानी ‘देश दर्शन’ भी लिखी थी, जो मेरे ‘महक से ऊपर’ कथा संग्रह में शामिल है। निश्चय ही वे विदेशी संबंधी भी याद आये एक बार तो ! लाल पत्थर से बने किले में बादशाह शाहजहां को बेटे औरंगजेब ने कैद कर रखा था और यहीं शाहजहां ने अंतिम सांस लेने से पहले बेटी जेबुनिस्सा को बता दी थी आखिरी इच्छा कि मुझे मुमताज के पास ही सुपुर्दे खाक किया जाये ! शाहजहां अंतिम दिनों वे एक झिल्ली में से ताजमहल को बड़ी हसरत से देखा करते थे, यह रतन गाइड की भाषा थी, जो आज तक याद है और यह अंदाज भी कि बादशाह यहां शतरंज खेला करते थे जबकि खूबसूरत बांदियां हर चाल पर नाचतीं आगे बढ़ती थीं ! हर बार बेगम जीतती थी क्योंकि बादशाह तो उसके मस्त नैनों में खोये रहते थे ! है न गाइड की कमाल की कल्पना ? तब मात्र पांच रुपये में गाइड हो गया था ! अब न तो कोई गाइड दिखा, न ही कोई फोटोग्राफर और न ही कोई छोटी छोटी पुस्तिकायें बेचने वाले दिखे कि किले के बारे में इतिहास जान सकें ! इस तरह मोबाइल ने इनकी रोज़ी छीन ली ।

बस, अपनी ही मस्ती में किले में घूमते रहे, फोटोज खींचते रहे, ग्रुप में शेयर करते रहे, जब थक गये तब पहले से निर्धारित तारा होटल पहुच गये्, जो ताज परिसर के पास ही है, यहां से ताजमहल का पैदल रास्ता है ! विदेशियों की लम्बी लम्बी कतारें दिख रही थीं !

खैर, हम दो दो लोगों ने एक एक कमरे में डेरा जमाया जबकि मेरे साथी बने इकबाल, हम दोनो पंजाब के मूल‌ निवासी, जिनका अब हिसार में बरसों से डेरा है ! कुछ देर थकावट उतारने के बाद तीन चार ऑटो कर मीना बाज़ार देखने गये और वहीं शाम की चाय की चुस्कियां लीं ! लैदर मार्केट देखी । रंग बिरंगे पर्स और खूबसूरत जूते देखे और पंजाबी गाने की पंक्तियां याद आईं-आओ लोको हस्स के, मीना बाज़ार देक्खो नस्स के ! मीना बाज़ार से फिर होटल और रात का खाना ! इसी बीच होटल में सविता मिश्र का बेटा अमित ‘खाकीवर्दी’ लघुकथा संकलन देने आ पहुंचा और मैंने भी ‘यादों की धरोहर’ की प्रति उपहार में दी और बेटे को भी रात्रिभोज में प्यार भरे आग्रह से शामिल कर लिया । फिर उसे समय पर लौटने को कहा क्योंकि रात के साढ़े नौ बज गये थे और उसे अठारह किलोमीटर दूर जाना था । फिर सब थोड़ा थोड़ा टहलने निकले ! ताजमहल परिसर के चलते सड़क बहुत खूबसूरत बनी हुई है, खासतौर खूबसूरत गुलाबी टाइल्स लगी हैं ! सड़क के दोनों ओर खूबसूरत लाइट्स हैं । दिन जैसा लगता है ! बस, वहीं राह में एक प्याली चाय के बाद अपने अपने कमरों में लौटे और दिन भर की थकावट के चलते नींद ने अपनी बाहों में ले लिया ! इस तरह पहले दिन की यात्रा संपन्न हुई ।

दूसरे दिन सुबह नहा धोकर सभी नाश्ते पर इकट्ठे हुए और पूरी सब्ज़ी का लुत्फ उठाया, वैसे हल्का फुल्का पोहा भी था। सबने सामान वीडियो कोच में रखा और पैदल ही  ताजमहल की ओर बढ़ चले। विश्व धरोहर के तीसरे दिन हम सबसे बड़े प्रेम उपहार ताजमहल के अंदर थे ! बड़े बड़े हरे भरे बाग और खिली धूप ने हमारा स्वागत् किया ! सामने ताजमहल के दीदार हो रहे थे, लगातार फोटोज और   हंसी मज़ाक के बीच डेढ़ घंटा कब निकल गया पता ही नहीं चला !

फिर यात्रा शुरू हुई फतेहपुर सीकरी की ओर लेकिन रास्ते भर में कल से पढ़ रहे थे-पेठा और दालमोठ ! बस, एक दुकान पर कोच रोक कर सबने अपने अपने सामर्थ्य भर ये सौगातें खरीदीं परिवारजनों के लिए! यह भी पता चल गया कि दालमोठ, अंगूरी पेठा और लैदर का सामान यहां प्रमुख तोर पर बिकता है । पूरे देश में आगरा का पेठा ऐसे ही मशहूर‌ नहीं है ! कुछ बात तो है इसमें !

फिर पहुंचे फतेहपुर सीकरी, वहां सबने एक गाइड कर लेने पर सहमति जताई और गाइड मिला सौरभ ! एमबीए और टूरिज्म तक पढ़ा लिखा लेकिन गाइड बनना पसंद किया क्योंकि नित नये लोगो़ं से मिलना बहुत अच्छा लगता है सौरभ को ! उसने बताया कि जब अकबर के संतान नहीं हो रही थी तो वे अजमेर शरीफ गये चादर चढ़ाने तो किसी ने बताया कि फतेहपुर सीकरी में शेख सलीम चिश्ती के पास जाओ और अकबर आगरा से पैदल श्रद्धापूर्वक फतेहपुर सीकरी पहुंचा और शेख सलीम ने अकबर को संतान सुख का आशीर्वाद दिया तो बेटे का नाम भी अकबर ने ‘सलीम’ ही रखा, जो बाद में  बादशाह जहांगीर बना ! अकबर ने फतेहपुर सीकरी को ही राजधानी बना लिया और यहीं शेख सलीम की दरगाह भी बनवाई और जामा मस्जिद भी ! गुजरात की जीत के बाद गुजरात की ओर एक बुलंद दरवाजा बनवाया जिसकी साल के सप्ताह की तरह बावन सीढ़ियां हैं और ऊपर तेरह झरोखे क्योंकि अकबर ने तेरह साल की उम्र में राजकाज बैरम खा़ं की देखरेख में संभाला था और बेगम जोधाबाई का महल भी खूबसूरत है। कितनी फिल्मों की शूटिंग यहां होने की जानकारी दी सौरभ ने, जिनमें जोधा अकबर, परदेस व कुछ धारावाहिक भी शामिल हैं ! जोधाबाई राजपूत संतान थी । बाद में शेख सलीम के कहने पर अकबर ने फिर आगरा को राजधानी बनाया ! मैं कभी इतिहास का छात्र नहीं रहा, मैंने सिर्फ चार भाषाओं में ही ग्रेजुएशन की तो मेरा इतिहास का ज्ञान कम है, फिर भी पत्रकारिता के चलते रूचि बहुत है इतिहास में ।

फतेहपुर सीकरी असल में सिकरवार राजपूतों के कारण सीकरी कहलाता है और यहां पत्थर का काम ज्यादा होता है। हमारा गाइड सौरभ भी राजस्थान से है और राजपूत है पर सीकरी में परिवार बसा हुआ है ।  बुलंद दरवाजे की ऊंचाई पर खड़े होकर दूर सीकरी कस्बा भी दिखता है ! हमने पत्थर की बनी मालायें खरीदीं और फतेहपुर सीकरी की दरगाह में नंगे पांव ही जा सकते हैं क्योंकि यह एक पूजास्थल है और अंदर अनेक कब्रें बनी हुई हैं । यहां से दो घंटे बाद अगली यात्रा पर निकले -वृंदावन की ओर ! रास्ते में लंच का समय नहीं बच रहा था तो केले, अमरूद व आगरा का पेठा खिलाया गया !

 वृंदावन प्रसिद्ध रचनाकार श्रीमती ममता कालिया का मायका है और मैंने फोन कर यह बात उन्हें बताई कि आज आपके मायके जा रहा हू़ं, वे बहुत खिलखिलाते बोलीं कि क्या बात है !

हमारा वृंदावन में रहने का ठिकाना भी पहले से तय था-श्रीकृष्ण जन्माष्टमी आश्रम, जिसके ट्रस्टियों में से एक हैं हिसार के ही सुभाष डालमिया, जो सन् 2017 तक हिसार की राजगुरु मार्केट में ही बिजनेस करते थे फिर दिल्ली शिफ्ट हुए और वहां से वृंदावन आ गये ! बेटा साहिल जरूर दिल्ली में ही बिजनेस चला रहा है। इनसे सम्पर्क साधा तो उन्होंने सहर्ष व्यवस्था कर देने का विश्वास दिलाया और हम उनके आश्रम में पहुंच गये ! वे हिसार की मिट्टी के प्रेम के चलते हमें तुरंत मिलने आ पहुचे और बढ़िया खाना खिलाने के आदेश भी दिये मैस वालों को, फिर हमें अपनी कार में बांके बिहारी मंदिर के दर्शन करवाने चल‌ दिये, बाकी साथी ऑटो में पहुंच गये और सबको वीआईपी दर्शन करवाने के बाद प्रसाद के साथ साथ गर्मागर्म समोसे भी खिलाये ! बांके बिहारी मंदिर कुंज गलियों की याद दिलाता है और अंदर बहुत भीड़ उमड़ रही है, कोई कतार नहीं, कोई व्यवस्था नहीं । बस, एक दूसरे को धकेलते आगे या पीछे बढ़ते रहो । इसी धक्कमपेल में दर्शन किये बांके बिहारी के ! वैसे मैं चार साल पहले परिवार के साथ वृंदावन आया था, तब तीन दिन रहा था और सब मंदिर देख रखे थे । गोवर्धन परिक्रमा पहले लोग पैदल करते थे लेकिन अब ऑटो पर करते हैं। हमने भी की थी । वह तुलसी वन भी देखा, जहां कृष्ण रास रचाया करते थे और इसे रात में‌‌ कोई नहीं देख सकता, ऐसी मान्यता है। रात को यह बंद रहता है । इस्काॅन मंदिर की खिचड़ी के प्रसाद का दो दिन आनंद‌‌ लेते रहे !

बांके बिहारी मंदिर से फिर वापसी कुछ मित्रों की वही ऑटो पर हुई तो डालमिया हमें अपने साथ कार में घर ले गये !  वहां उनकी धर्मपत्नी ने स्वागत् किया और उन्होंने गौशाला से आये दूध के गिलास भर भर कर पिलाये, मेवे के साथ ! डालमिया ने पड़ोस में प्रसिद्ध भजन गायक स्वर्गीय विनोद अग्रवाल का अंतिम बसेरा भी दिखाया, जो अब उनको ही समर्पित है और अंदर हाल में उनका कटआउट भी लगा है। वहां उनके रिकार्डिड भजन सुनाये जाते हैं, वैसे यहां बाइस कमरे हैं लेकिन मैस की व्यवस्था नहीं है ! इसलिए हमारी रहने की व्यवस्था यहां नहीं की। यह डालमिया ने बताया  ।

इस तरह दूसरे दिन की यात्रा बांके बिहारी मंदिर के दर्शनों के साथ संपन्न हुई । अपने अपने कमरों में कुछ देर विश्राम के बाद मैस में खाना खाया, कुछ टहले और फिर वही सोने चल‌ दिये !

तीसरा दिन लौटने का दिन होने के साथ साथ अरावली की पहाड़ियों का दिन था । जैसे ट्रस्टी सुभाष शाम को मिलने आये थे, वैसे भी विदा करने भी आने वाले थे, उन्होंने वृंदावन के पेड़े बढ़िया जगह से मंगवा दिये पहले ही और हमने पैसे दे दिये । सब आश्रम के मुख्य द्वार पर उनका इंतजार कर रहे थे और वे आ पहुंचे ! हमारे बीच तीन तीन प्रोफैशनल फोटोग्राफर थे-प्रवीण सोनी, प्रेम और बलवान ! तीनों‌‌ ने अलग अलग एंगल से विदाई के फोटोज खींचे, जिसमें श्रीकृष्ण जन्माष्टमी आश्रम भी आ जाये ! जिस तरह सुभाष डालमिया का मिट्टी से नाता नहीं टूटा, उसी तरह उनका यह प्यार का नाता भी नहीं टूटेगा ! जब जब वतन से चिट्ठी आयेगी, वे ऐसे ही दौड़े चले आयेंगे ! यह आश्रम न्यू वृंदावन में मुख्य हाइवे पर ही स्थित है।

अब वीडियो कोच चली सोहना(मेवात) की ओर, जहां एक शिव मंदिर बताया गया, जिसमें गर्म पानी के दो कु़ड हैं, जो चर्मरोग के लिए बहुत गुणकारी बताये जाते हैं । मंदिर से पहले खूब भीड़भाड़ वाला बाज़ार है, जिसके चलते कोच वहां नहीं जा सकता था। इसलिए कहीं दूर इसको वटवृक्षों की छांव में खड़ी कर हम मंदिर की ओर बढ़ते गये । मंदिर बिल्कुल बाज़ार के अंत में स्थित है । सबने जूता घर में जूते चप्पलें जमा करवाईं और अंदर पहुंचे ! दो कुंड तो थे लेकिन पानी नहीं था । लोग टूटी के पानी से नहा जरूर रहे थे, जो गर्म पानी ही था ! इस तरह हमारे फोटोग्राफर मित्र अपनी कुशलता दिखाते रहे । इसके बाद बाहर ब्रेड पकोड़े की दुकान देखकर सबके मुंह में पानी आ गया तो अध्यक्ष राज पाराशर ने तुरंत गर्मागर्म पकोड़ों का ऑर्डर दे दिया । सबने मज़े से, स्वाद‌ व चटखारे लेकर ब्रेड पकौड़े खाये और फिर पहुंचे कोच में । वहां से रास्ते में दिखीं अरावली की पहाड़ियां पर अब चूंकि निकट आ पहुचे थे तो सब ओर से ‘चलो चलो’ की आवाजें आने लगीं तब कहीं रास्ते में एक सुखदेव नाम का ढाबा दिखा और चाय के लिए रुक गते, यह हमारी यात्रा का अंतिम पड़ाव रहा ।  फिर हांसी में बरवाला और हांसी वाले मित्रों को विदा कर हम सब सायं छह बजे हिसार प्रेस क्लब ऑफिस सुरक्षित और आनंद‌‌‌ में पहुंच गये ! सबके चेहरे दमक रहे थे और जल्द फिर मिलने का वादा कर विदा ली एक दूसरे से ! मैं सबका आभारी हूं कि उम्र और वरिष्ठता के नाते सबने मेरा सम्मान लगातार बनाये रखा! फिर कभी और यात्रा पर मिलेंगे दोस्तो! पर विदा पर हिसार प्रेस क्लब ने एक एक खूबसूरत अटैची गिफ्ट में भेंट किया, यादें समेटते हुए घर लौटे !

दिल ढूंढता है फिर वही

फुरसत के रात दिन !

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क : 1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ ऐसे न मुझको भेज री माई ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम और भावप्रवण कविता ऐसे न मुझको भेज री माई )

☆ कविता – ऐसे न मुझको भेज री माई ☆ श्री हरभगवान चावला ☆

ऐसे न मुझको भेज री माई

दे दे मुझे दहेज री माई

 *

उजली सी एक रात भी देना

तारों की बारात भी देना

और बादल की सेज री माई

 *

सपनों वाली आँख भी देना

उड़ने को फिर पाँख भी देना

और अंबर के भेद री माई

 *

प्रेम पगा ये गाँव भी देना

नीम की थोड़ी छाँव भी देना

और मिट्टी ज़रख़ेज़ री माई

 *

अपने हाथ की मठरी देना

यादों की एक गठरी देना

आँसू अपने सहेज री माई।

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – गौरैया दिवस विशेष – आदमकद ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – आदमकद ? ?

(20 मार्च – गौरैया दिवस पर विशेष )

ये उन दिनों की बात है

जब सचमुच आदमकद था आदमी,

केवल ऊँचाई से नहीं

मन से भी ऊँचा था आदमी,

ऊँची-ऊँची फसलें

उगाता था आदमी,

थोड़ा सा हिस्सा

नन्हीं गौरैया के लिए

रख छोड़ता था आदमी…,

 

गौरैया के मन में

आदमी का कद बहुत ऊँचा था,

शायद यही वज़ह थी

आदमकद था आदमी….

 

आंगन आदमी के घर का हो,

आंगन आदमी के मन का हो,

आंगन में जगह बहुत बड़ी थी

जिसमें गौरैया को घोंसला बनाने,

चुरुंगनों को उड़ने की अनुमति थी,

सच पूछें तो हिल मिलकर रहते थे

गौरैया और आदमी….

 

आदमी को गौरैया से खास नेह था,

मानो गौरैया का संरक्षक था आदमी,

चिरैया में अपनी बेटी को देखता,

बेटी में चिरैया निहारता था आदमी…

 

ये वे  दिन थे

जब धरती को

माँ कहता था आदमी,

फिर एकाएक आदमी का मन

सिकुड़ने लगा,

विधान का चक्र उल्टा फिरने लगा,

आदमी, धरती का सौदा करने लगा..,

 

गोरैया की इंच भर जगह

आदमी को खलने लगी,

इंच-इंच धरती

अब बिकने लगी,

आदमी की आँख में

दुर्योधन उतरने लगा,

 घर का हो या मन का

आदमी के आँगन से

गोरैया का निष्कासन होने लगा,

 

फिर आदमी ने काट डाले पेड़,

आदमी ने नोंच डाले घोंसले,

तिल-तिल मरने लगी चिड़िया..,

लालची आदमी ने

धरती की कोख में

उतार दिया हलाहल,

और फसलों पर

छिड़क दिया ज़हर,

तड़प-तड़प कर

मरने लगी गोरैया,

 

फिर आदमी ने

गोरैया के ताबूत में

ठोंक डाली आखिरी कील,

मोबाइल टावर खड़े कर

चिरैया की उत्पत्ति ही रोक डाली..,

 

अब आदमी के पास घर है,

अब आदमी के पास मन है,

पर घर का हो या मन का,

किसी आँगन में अब

फुदकती नहीं चिरैया…,

 

बगुला भगत निकला आदमी,

गोरैया को मिटाकर

गोरैया दिवस मनाने लगा आदमी..,

 

आदमजात में कोई-कोई कवि होता है,

कवि अपने समय की आँख होता है,

इस आँख में सपना पलता है,

प्रकृति अपना चक्र घुमायेगी,

बीते दिन फिर लौटा लायेगी,

साथ-साथ जिएँगे गोरैया और आदमी,

गोरैया का घर-आँगन

फिर महक उठेगा,

बौना आदमी,

गोरैया के मन में

एक दिन फिर आदमकद हो उठेगा..!

?

© संजय भारद्वाज  

7 मार्च 2022, रात्रि 2:38 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 15 मार्च से आपदां अपहर्तारं साधना आरम्भ हो चुकी है 💥  

🕉️ प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीराम स्तुति, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना कर साधना सम्पन्न करें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – संस्मरण ☆ दस्तावेज़ # 20 – मैहर में एक दिव्य संगीतमयी संध्या/A Night of Divine Music in Maihar – ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में  “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”

दस्तावेज़ में ऐसी ऐतिहासिक दास्तानों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है श्री जगत सिंह बिष्ट जी का एक ऐतिहासिक दस्तावेज़ मैहर में एक दिव्य संगीतमयी संध्या/A Night of Divine Music in Maihar।) 

☆  दस्तावेज़ # 20 – मैहर में एक दिव्य संगीतमयी संध्या/A Night of Divine Music in Maihar ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆ 

वह शाम किसी और शाम जैसी नहीं थी। वह एक ऐसी शाम थी जब समय ठहर गया था और संगीत ने सांसारिक सीमाओं को पार कर दिया था। आज भी, जब मैं अपनी आँखें बंद करता हूँ, तो सितार और सरोद की स्वरलहरियाँ मेरी स्मृतियों में गूंज उठती हैं, तबले की थापों के साथ, जो मैहर की पवित्र हवा में गूंज रही थीं।

यादगार यात्रा

यह मार्च 1983 की बात है, जब हम जबलपुर से मैहर के लिए निकले थे। यह एक छोटा सा तीर्थ नगर है, लेकिन हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत में इसकी विरासत अपार है। यही वह स्थान है, जहाँ महान उस्ताद अलाउद्दीन खान ने अपना जीवन संगीत को समर्पित किया और मैहर घराने को नई ऊँचाइयों तक पहुँचाया। इस यात्रा का उद्देश्य अलाउद्दीन खान संगीत समारोह में भाग लेना था, जो हर वर्ष उनकी स्मृति में आयोजित किया जाता है। यहाँ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत के महान कलाकार अपनी कला को गुरुदक्षिणा स्वरूप अर्पित करते हैं।

मेरे साथ मेरा बचपन का मित्र ओमेन थॉमस और मेरे सहकर्मी सरदार सरन सिंह सलूजा तथा तिजारे साहब थे। हम ट्रेन से मैहर पहुँचे, यह सोचकर कि यह एक और सुंदर संगीतमयी शाम होगी। लेकिन हमें क्या पता था कि हम जीवन की सबसे अविस्मरणीय संध्या में प्रवेश कर रहे थे।

संगीतमयी संध्या का शुभारंभ

कार्यक्रम की शुरुआत पंडित जितेंद्र अभिषेकी के भक्तिपूर्ण भजनों से हुई, जिनकी सुमधुर आवाज़ में गहरा आध्यात्मिक भाव था। हम मंत्रमुग्ध होकर उन्हें सुनते रहे। इसके बाद प्रसिद्ध कथक नृत्यांगना सितारा देवी का अभूतपूर्व प्रदर्शन हुआ। उनकी मोहक मुद्राएँ, तीव्र गति के कदम, और गहरी भावनाएँ हमें किसी और ही लोक में ले गईं।

लेकिन असली जादू तब शुरू हुआ जब चार महान संगीत सम्राट मंच पर उतरे—सितार पर पंडित रविशंकर, सरोद पर उस्ताद अली अकबर खान, और तबले पर पिता-पुत्र की जोड़ी—उस्ताद अल्ला रक्खा और उस्ताद ज़ाकिर हुसैन। उनके मंच पर आते ही पूरा सभा स्थल तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा।

एक स्वप्निल संगीत यात्रा

रात्रि का आरंभ राग यमन कल्याण से हुआ, जिसका विस्तृत आलाप और जटिल बंदिशें हमें एक अनोखी यात्रा पर ले गईं। यह प्रस्तुति एक घंटे से भी अधिक समय तक चली, और जब इसकी मधुर तान समाप्त हुई, तब रात आधी बीत चुकी थी।

इसके बाद राग मालकौंस की गहरी और आध्यात्मिक स्वर लहरियाँ बहने लगीं, फिर राग सोहिनी ने वातावरण को अलौकिक बना दिया। फिर जो हुआ, वह किसी जादू से कम नहीं था—

पहले पंडित रविशंकर और उस्ताद अली अकबर खान के बीच एक दिव्य जुगलबंदी हुई, जहाँ सितार और सरोद ने मानो एक संवाद छेड़ दिया। फिर सितार और तबले के बीच अद्भुत संगति हुई, उसके बाद सरोद और तबले की झंकार ने सबको रोमांचित कर दिया। लेकिन असली चमत्कार तब हुआ जब तबले की जुगलबंदी शुरू हुई—पिता-पुत्र उस्ताद अल्ला रक्खा और उस्ताद ज़ाकिर हुसैन के बीच।

जहाँ एक ओर पिता की परिपक्वता थी, वहीं पुत्र की युवा ऊर्जा। उनकी उंगलियों से निकलते स्वर जादू की तरह बहने लगे। एक लयबद्ध प्रतिस्पर्धा में उस्ताद ज़ाकिर हुसैन ने अपने पिता को चुनौती दी, और उस्ताद अल्ला रक्खा ने अपनी अनुभवी थापों से जवाब दिया। सभागार तालियों और वाह-वाह से गूंज उठा, और यह सिलसिला कुछ देर तक यूँ ही चलता रहा।

भैरवी के साथ सूर्योदय का स्वागत

जैसे-जैसे रात्रि समाप्ति की ओर बढ़ी, कलाकारों ने अंतिम प्रस्तुति दी—राग भैरवी। इसे सुबह की रागिनी कहा जाता है, और जब सितार, सरोद और तबले की मीठी स्वर लहरियाँ गूंजने लगीं, तो ऐसा लगा मानो यह पूरी रात की साधना की अंतिम आहुति हो।

हम सभी सम्मोहित थे, समय मानो ठहर गया था। और जब अंतिम सुर भी हवा में विलीन हुआ, तब एहसास हुआ कि हम एक अद्वितीय संगीतमयी यात्रा से गुज़र चुके थे। सूरज की पहली किरणें हम पर पड़ रही थीं जब हम मैहर रेलवे स्टेशन की ओर लौट रहे थे, अपने हृदयों में इस अनमोल रात की यादें संजोए हुए।

एक दुर्लभ सौभाग्य

मैंने अपने जीवन में अनगिनत संगीत समारोह देखे हैं, किंतु मैहर की वह रात सबसे अलग थी। शायद ऐसी घटनाएँ केवल भाग्य से ही मिलती हैं।

पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद अल्ला रक्खा और उस्ताद ज़ाकिर हुसैन—ये चारों एक साथ मंच पर हों, यह दृश्य ही अपने आप में दुर्लभ था। आज भी, जब मैं ओमेन थॉमस से मिलता हूँ, तो हम उस रात को याद कर मुस्कुरा उठते हैं। वह स्वर, वह लय, वह जादू—सबकुछ आज भी जीवंत लगता है।

ऐसी प्रस्तुतियाँ कभी-कभार ही होती हैं, और जब होती हैं, तो वे आत्मा पर एक अमिट छाप छोड़ जाती हैं। वह रात केवल एक संगीत सभा नहीं थी, वह एक दिव्य अर्पण थी—संगीत के माध्यम से ईश्वर की आराधना। और इस अनमोल अनुभव के लिए मैं सदैव आभारी रहूँगा।

☆ A Night of Divine Music in Maihar ☆

It was a night like no other, a night where time stood still, and music transcended the earthly plane. Even today, as I close my eyes, I can hear the notes of the sitar and sarod weaving a tapestry of celestial beauty, accompanied by the rhythmic beats of the tabla that echoed through the sacred air of Maihar.

A Journey to Remember

It was the month of March in 1983 when we set off from Jabalpur to Maihar, a small temple town with a towering legacy in Hindustani classical music. Maihar was the home of the legendary Ustad Allauddin Khan, a man who reshaped the Maihar Gharana and mentored some of the greatest musicians of our time. The occasion was the annual Allauddin Khan Sangeet Samaroh, a festival dedicated to his memory, where maestros of Indian classical music gathered to offer their art as a tribute.

Accompanied by my childhood friend, Oommen Thomas, and my colleagues Sardar Saran Singh Saluja and Tijare Sahab, we took the train to Maihar, eager to witness an unforgettable musical soiree. We had attended many concerts before, but little did we know that this night would be etched in our souls forever.

The Evening Unfolds

The concert began with the soulful bhajans of Pandit Jitendra Abhisheki, whose voice carried a devotional fervour that left us spellbound. This was followed by a breathtaking Kathak performance by the legendary Sitara Devi. Her footwork, her expressions, and the sheer grace with which she moved transported us to another realm.

But the true magic began when the four greatest stalwarts of Indian classical music stepped onto the stage—Pandit Ravi Shankar on the sitar, Ustad Ali Akbar Khan on the sarod, accompanied by the father-son duo, Ustad Alla Rakha and Ustad Zakir Hussain, on the tabla. The moment they appeared, the entire audience rose in a thunderous ovation.

A Night of Musical Enchantment

The performance began with Raga Yaman Kalyan, a majestic piece that stretched over an hour, drawing us into its hypnotic embrace. By the time the notes settled into silence, it was already midnight.

Then came Raga Malkauns, a deeply meditative raga, followed by Raga Sohini, which filled the air with an ethereal quality. What followed next was sheer brilliance—a jugalbandi (duet) between Pandit Ravi Shankar and Ustad Ali Akbar Khan, their instruments conversing in a divine dialogue. This was followed by an interplay between sitar and tabla, then sarod and tabla. Each transition was seamless, each note more mesmerizing than the last.

And then came the moment that left us all breathless—the jugalbandi between the father and son, Ustad Alla Rakha and Ustad Zakir Hussain. The seasoned mastery of the father met the youthful brilliance of the son in an electrifying exchange of rhythms. The beats rained down like a celestial symphony, leaving the audience in rapturous applause that refused to die down.

The Dawn of Bhairavi

As dawn began to break, the maestros offered their final piece—Raga Bhairavi, the queen of morning ragas. The melody was like a prayer, a soulful farewell that lingered in the cool morning air. We sat there, transfixed, unwilling to break the spell.

It was only when the final note dissolved into silence that we realized how deep a trance we had been in. The first light of the morning sun greeted us as we made our way to the railway station, our hearts full and our souls touched by something divine.

A Once-in-a-Lifetime Experience

I have attended countless classical music performances, but nothing has ever come close to that night in Maihar. Perhaps such experiences are not just a matter of chance but destiny. To witness Pandit Ravi Shankar, Ustad Ali Akbar Khan, Ustad Alla Rakha, and Ustad Zakir Hussain together on one stage was nothing short of a blessing. Even today, when I meet Oommen Thomas, we reminisce about that magical night, each note still alive in our memories.

Such renditions happen rarely, and when they do, they leave an imprint on the soul. That night in Maihar was more than just a concert—it was a divine offering, a moment in time where music touched eternity. And for that, I will forever be grateful.

♥♥♥♥

 #AllauddinKhanSangeetSamaroh  #Maihar

© जगत सिंह बिष्ट

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares