मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेंकीचा सल्ला— भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ वेंकीचा सल्ला— भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

पत्र म्हणजे अलगद उलगडत जाणार्‍या एकाद्या रेशमी भावबंधाचा सांगावा असतो…. अशी पत्रे कधी नवी उमेद व अनामिक भावनिक बळ देऊन जातात तर कधी डोळ्यांतून अलगद  आसवं ओघळायला लावतात. कधी भूतकाळात डोकावयाला लावतात. कालमानाप्रमाणे त्यात विविध तरंग उमटलेले असतात. अशी बरीच हस्तलिखित पत्रे मी जपून ठेवलेली आहेत. फुरसतीच्या वेळेत ती पत्रं चाळताना कितीतरी वेळ निघून जातो.

गेल्या रविवारी असंच चाळताना वसंताचे पत्र आणि मी लिहिलेल्या उत्तराची छायांकित प्रत सापडली. त्या पत्राला तब्बल पस्तीस वर्षे झाली आहेत.   

नोकरीच्या निमित्ताने वसंताची पोस्टिंग सोलापूरला झाली होती. कामाव्यतिरिक्त ऑफिसात तो कुणाशी बोलायचा नाही. शांत व गंभीर प्रकृतीचा वसंता आणि मी समवयस्क असल्याने आमची लवकरच गट्टी जमली. नोकरीत कायम झाल्यावर वसंताला स्थळं सांगून येत होती. अखेर त्याच्याच नात्यातल्या एका मुलीशी त्याचं लग्न जमलं. त्यांची एकमेकांशी ओळख होती पण घनिष्ठ परिचय नव्हता. 

वाङनिश्चय झाल्यानंतर वसुधा वहिनींचे प्रेमाने ओथंबलेले एक पत्र त्याने मला दाखवले. दुसर्‍यांची प्रेमपत्रे वाचणे म्हणजे दुसर्‍यांच्या बेडरूममध्ये डोकावण्यासारखे आहे, असं म्हणत मी वाचायला नकार दिला. मी त्याला म्हटलं, “तू ही एक छानसे प्रेमपत्र लिही. कवितेतल्या काही सुंदर ओळी अधून मधून पेरून टाक. मध्येच कुणाची तरी एखादी चारोळी लिही आणि अत्तर शिंपडलेल्या एखाद्या गुलाबी पाकिटातून पाठवून दे.”

वसंता हिरमुसला चेहरा करून म्हणाला, “ते आपलं काम नाही गड्या. मला तसं लिहिता आलं असतं तर वसुधेचं पत्र तुला कशाला दाखवलं असतं? या पत्राचं उत्तर तू लिहावं, म्हणून मी तुला देतोय. तू कच्चं ड्राफ्ट लिहून दे, मी फेअर करून पाठवतो.” 

झालं, त्यानंतर मी वसंताच्या प्रेमपत्रांचा घोस्ट रायटर झालो. खरं तर, दुसर्‍याची मदत घेऊन प्रेमपत्रे लिहिणे आणि फुकटचा भाव मारावा हे वसंताच्या स्वभावाला अनुसरून नव्हतं. ‘हम भी कुछ कम नही’ असं वसुधा वहिनींना दाखवणं एवढाच माफक विचार त्याच्या पत्र लेखनामागे असायचा.

एकमेकांच्या मनाला भुरळ पाडणार्‍या, पुढच्या पत्रासाठी हुरहूर लावणार्‍या, उत्सुकता शिगेला नेणार्‍या या पत्रांच्या आधाराने ते दोघेही काही महिने काव्यात्मक स्वप्निल विश्वात तरंगत होते. आजच्या ईमेलच्या, टेक्स्टींगच्या जमान्यात हस्तलिखित पत्र लिहिणे म्हणजे वेडेपणा वाटेल. परंतु हा वेडेपणा चिरंतन आनंद देणारा असतो एवढं मात्र नक्की.   

एका शुभदिनी त्या दोघांचा या भूमंडली शुभमंगल विवाह संपन्न झाला. काव्यात्मक पत्रे लिहिणारा भावुक नवरा थोड्याच दिवसात सौ. वसुधा वहिनींना एकदम रूक्ष वाटू लागला. त्याकाळी शब्दागणिक पैसे लागायचे म्हणून टेलिग्रामचे मजकूर कमीत कमी शब्दांत लिहायचे. अगदी तसंच वसंताचे संभाषण त्रोटक असायचे. ‘चहा दे. जेवायला वाढ, पाणी दे, ऑफिसला निघालोय. किराणा माल शेजारच्या दुकानातून घे.’ या पलीकडे काही नाही. पत्रांतून रसिक वाटलेल्या वसंताचं असं वागणं वहिनींना अगदी अनपेक्षित होतं. 

वसंताच्या देखतच सौ. वहिनींनी एकदा ही व्यथा माझ्यासमोर निराळ्या पद्धतीने बोलून दाखवली. वसंताच्या अशा वागण्यामागे त्याचं स्वत:चं असं एक तत्वज्ञान होतं. ‘जास्त बोललो तर ती उगाच डोक्यावर बसायला नको!’ त्या तत्वज्ञानाला मी सुरूंग लावला. मी त्याला खूप सुनावलं. त्यानंतर थोडा अपेक्षित बदल झाला असावा. 

इथे असतांनाच त्यांना एक मुलगा झाला. वसंताच्या वागण्यावरून वहिनींचं लक्ष विकेंद्रित झालं. बाळाच्या नादात ते सुखी कुटुंब आनंदात होतं. एका वर्षानंतर त्यांची बदली नागपूरकडे झाली. त्यानंतर आमच्यात खूप मोठी कम्युनिकेशन गॅप राहिली. आणि अचानक एके दिवशी एखादा विद्ध पक्षी पुढ्यात येऊन पडावा तसं वसंताचं पत्र टाकून पोस्टमन निघून गेला. माझ्या संग्रहातले ते पत्र हेच, 

प्रिय वेंकी,         

आपण जवळचे मित्र म्हणवत होतो. दिवाळीच्या ग्रीटींग्जशिवाय आपण एकमेकांना कधी पत्र पाठवतच नाही. पत्र लिहिण्याविषयी माझा ‘उत्साह’ तुला माहीतच आहे. त्यातून मराठीतून लिहिणं तर जवळपास संपल्यातच जमा झाले आहे. असो. 

मध्यंतरी सुनील भेटला होता. त्यानं तुझ्याबद्दल सांगितलं. तू कुठल्यातरी क्लबचा चार्टर्ड प्रेसिंडेट झाला आहेस. एका शाळेच्या बक्षीस समारंभाला तू प्रमुख पाहुणा होतास म्हणे. हे ऐकून मला तुझा अभिमान वाटला. एकंदरीत तू ग्रेटच आहेस. असो. 

मला तुझ्याकडून एक बहुमोल ‘सल्ला’ हवा आहे. तू योग्य सल्ला देशील ह्याची मला खात्री आहे. 

हल्ली तुझ्या वहिनींचे आणि माझे बर्‍याच गोष्टींवर मतभेद होत असतात, त्यामुळे वारंवार खटके उडत असतात. साध्या साध्या गोष्टीवरून ती चिडचिड करते. मुलांनी उच्छाद मांडला आहे. अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. ऑफिसमधून येऊन ती मुलांचा तासभर अभ्यास घेते परंतु त्यांच्या प्रगतीत फरक नाही. 

माझा स्वभाव तुला माहीतच आहे. वादविवाद टाळण्यासाठी म्हणून मी मूग गिळून बसतो त्यामुळे तिचा त्रागा आणखीनच वाढतो. आम्ही दोघेही कमावतो पण घरात मात्र सुखशांती नाही. 

कृपा करून एक सविस्तर पत्र अवश्य लिही, जेणेकरून तुझ्या वहिनींचा नूर पालटेल व आमच्या संसाराचा गाडा सुरळीत चालेल… वगैरे. 

लगेच समोरचा पॅड घेऊन एक सुदीर्घ पत्र लिहिलं, त्यातील हा मजकूर: 

प्रिय वसंता,

एवढ्या काळानंतर तुझे अशा तर्‍हेचे पत्र येईल अशी अपेक्षा नव्हती. मला काही लिहिण्यासाठी माझ्याबद्दल खोट्या कौतुकाच्या प्रस्तावनेची आवश्यकता निश्चितच नव्हती. असो. 

कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुंडलीत देखील उच्चीचे ग्रह आले असतील. तालुक्यातल्या का असेना एका शाळेच्या बक्षिस समारंभाला प्रमुख पाहुणा होतो. एका वाटणीच्या संदर्भात एक पंच म्हणून गेलो होतो आणि भरीस भर म्हणून ह्याच दरम्यान माझा ‘सल्ला’ मागण्यासाठी तू हे पत्र लिहालंस. नाही तर अस्मादिकांस कोण विचारतो? असो.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर  तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .

वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .

वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .

सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .

एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख  रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ‘ स्थलकाल ‘ या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .

प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .

मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .

खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .

पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .

संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत .

एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .

आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे .  माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच  ‘ विकास ‘ करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .

– समाप्त – 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पालनकर्ता शंकर — ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ पालनकर्ता शंकर – ☆  श्री मकरंद पिंपुटकर

पालनकर्ता शंकर…

पौराणिक कथांमध्ये “शंकर” हा संहार करणारी देवता आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात असलेले  ८१ वर्षांचे शंकरबाबा मात्र पालनकर्ता देवतास्वरूप आहेत.

महाराष्ट्रातील ‘अमरावती’ जिल्हा हा तसा कोरडवाहूच. पण येथील ‘परतवाडा’ तालुक्यातल्या रूक्ष ओसाड रखरखाटात, ‘वझ्झर’ गावच्या टेकाडावर मात्र मायेचं हिरवंगार पांघरूण अंथरलेलं आहे. ही माया आहे शंकरबाबा पापळकर यांची. 

खरंतर शंकरबाबा इथे येण्यापूर्वी मुंबईत ‘देवकीनंदन गोपाळ’ नावाचं नियतकालिक चालवत होते. मुंबईतील कुंटणखान्यातील – वेश्या व्यवसायातील स्त्रियांची कुचंबणा त्यांना विद्ध करून गेली.  “त्याहूनही वाईट परिस्थिती होती शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलींची. गावोगावांतून अशा मुलींना या ना त्या बहाण्याने मुंबईत आणलं जायचं आणि वेश्या व्यवसायात ढकललं जायचं,” आपल्या कार्याची सुरुवात कशी झाली ते विषद करून सांगताना शंकरबाबा सांगतात.

“मला हे सहन झालं नाही, आणि या अशा व अन्य अनाथ मुलामुलींना सहारा देण्यासाठी वझ्झर येथे मी ‘अंबादासपंत वैद्य बालसदना’ची पायाभरणी केली. जसजशी कामाची माहिती लोकांना होत गेली, विश्वासार्हता वाढत गेली, तसतसे ठिकठिकाणाहून आई वडिलांनी – समाजाने टाकून दिलेल्या अपंग, मतीमंद लेकरांना माझ्याकडे पाठवलं गेलं. अनेकांना तर खुद्द पोलिसांनीच माझ्याकडे आणून सोडलं.”

१९९० ते १९९५ या काळात २५ मुलं आणि ९८ मुली अशी एकूण १२३ लेकरं शंकरबाबांच्या आश्रयाला आली. १९५७ साली पारित झालेल्या कायद्यानुसार, अशा अनाथ मुलांना त्यांच्या वयाच्या १८ वर्षांनंतर ते केंद्र – तो आश्रम सोडणे भाग असतं. 

“पण जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत अथवा मतीमंद आहेत, अशांचा हा आधार काढून घेणं सर्वथा अयोग्य आहे. वयाच्या १८ वर्षांनंतर पुन्हा उघड्यावर पडलेले असे हे तरुणतरुणी पुन्हा अनाथ होतात, आणि उदरनिर्वाहासाठी वाम मार्गाला तरी लागतात अथवा कोणी त्यांचा गैरफायदा घेतो,” बाबा कळवळून सांगतात. “म्हणूनच मी कोणतीही सरकारी मदत घेत नाही. त्यामुळे नियमानुसार या मुलांना बाहेर काढणं मला बंधनकारक नाही.”

आणि म्हणूनच मुलांची संख्या १२३ झाल्यावर बाबांनी त्यांचेच नीट लालनपालन करायचे ठरवले, आणखी मुलांना स्वीकारलं नाही. या मुलांना त्यांनी शिकवलं, आपल्या पायावर उभं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. 

बाबांना अनेक ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी बोलावले जाते. अशा कार्यक्रमांत मिळणारे मानधन, देणगी आणि समाजातील अन्य दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे हे व्रत चालू राहिले आहे. 

आपल्या आसऱ्याला आलेल्या या सर्वांना बाबांनी आपले नाव दिले. १९ मुलींची लग्नं लावून दिली, अगदी अंध विद्यार्थ्यांच्या देखील शिक्षणाची सोय केली, त्यातील एक अंध विद्यार्थिनी ‘माला शंकरबाबा पापळकर’ तर MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

“जी मुलं मतीमंद आहेत, अशांना मी वृक्षवल्लींची निगा राखायला शिकवलं. त्यांच्या मेहनतीनेच आज या बालसदनाच्या अवतीभवती ही वृक्षराजी उभी राहिली आहे.”

बालसदनातील मुलं – तरुण तरुणीच बाकीच्यांची काळजी घेतात. पोलियोग्रस्त रूपा सर्वांना जगातल्या घडामोडींचे updates देते. मूक बधिर ममता आणि पद्मा बाल सदनातील सगळ्यांच्या खानपानाची व्यवस्था बघतात. बेला सगळ्यांच्या दर महिन्याच्या आरोग्य तपासण्या, औषधं, दवाखान्याच्या वाऱ्या सांभाळते. प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलत असतो.

यंदाच्या वर्षीचा मानाचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाल्यावर शंकरबाबांची पहिली प्रतिक्रिया होती की “मी पंतप्रधानांची भेट मागणार आहे, १९५७ चा तो कायदा रद्द करणे कसं आवश्यक आहे हे मी त्यांना पटवून देणार आहे.”  

अशा आनंदाच्या क्षणीसुद्धा स्वतःच्या गौरवापेक्षा देशातील अंध, अपंग, मतीमंद अनाथांचे भले कसे होईल हाच विचार प्रथम आला. 

म्हणूनच सुरुवातीला म्हटलं, महाराष्ट्रातला शंकरबाबा पालनकर्ता देवता आहे. 

शंकरबाबांच्या मानवसेवेला साष्टांग दंडवत.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी शाळेत गेलो — त्यांनी माझी जात नोंदवून घेतली.

मग आम्ही सर्वांनी….

“सारे भारतीय माझे बांधव आहेत…!” – ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली..!

 

त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी पण मागितली…

तर ते म्हणाले, — “तो गरीब आहे.”

“मी पण गरीबच आहे.”

“तू गरीब आहेस मान्य, पण तुझी जात वेगळी आहे.”

 

…. दोन गरीबांची पण जात वेगवेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.

 

त्याला शासनाच्या…. फी माफी आणि अन्य सर्व सुविधा मिळत होत्या,

आणि …. माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती…!

 

आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली.

(इथे स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही का वाटत..?)

तो सिलेक्ट झाला…

मी नव्हतो झालो…!

 

मी मार्कलिस्ट बघितली तर…

त्याला 150 पैकी…. 108 मार्क होते

आणि मला 145…!

नंतर कळलं,

त्याने फॉर्मसोबत स्वतःचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.

स्पर्धेतही जातीची परीक्षा असते…… हे मला त्या दिवशी कळलं !

 

पुढे तो सेटल झाला… चांगला पैसा ही आला.

घर, गाडी सर्व आलं…. त्याचं आयुष्य मजेत चालू झालं…!

 

अधूनमधून कुठे कुठे व्याख्यानंही द्यायचा….

सामाजिक समानतेवर तो भरभरुन बोलायचा….!!

 

एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली….

आणि बघताच त्याला ती खूप आवडली…!

तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत,

तिच्यावर मात्र याची जडली होती प्रित…!

काहीही करुन हवी होती ती त्याला…

तिला मिळवण्याचा खटाटोप त्याने सुरु केला.

एके दिवशी मात्र तो गारच पडला,

तिची जात दुसरी…. हे माहीत झालं त्याला..!

प्रचंड संतापला ….. अन् पारा त्याचा चढ़ला,

जातीच्या ठेकेदारांवर …. जोराने ओरडला..!

….. हा जातिभेद काही मूर्खांनी तयार केला,

माणूस सर्व एकच असतो कोण सांगेल यांना…?

 

नंतर मग,

त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा….

‘ जात गाडून टाका ‘

भरसभेत सांगायचा…!

 

आत्तापर्यन्त साथ देणारी ” जात “च बाधक झाली होती….

त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती…!

 

काय करावे सुचेना त्याला…

आपली जात आडवी येतेय…

सर्व आहे पण एका गोष्टीमुळे मन बैचैन होतेय…!

 

एके दिवशी तो असाच… स्वतःची फाईल चाळत होता,

रागारागाने तो आपल्याच ” जात ” प्रमाणपत्राकडे पाहत होता !

 

त्याच्याकडे बघून … ते प्रमाणपत्र ही हसले….

” चुकतोयस बेटा तू,.. जरा विचार कर “ म्हणाले…!

 

ज्या जातीने जगवलं तिचाच तुला आता राग येतोय….

फायदा बघून स्वतःचा….. तूच आज स्वार्थी होतोयस…!

 

तो बघ… तुझ्या सोबतचा “तो” गुणी मुलगा,

खाजगी कंपनीत जातोय….माझ्यामुळे बेट्या,

तू मात्र…. सुखाची रोटी खातोयस…!

 

जातिभेद वाईट…. हे कुणीही मान्य करेल,

पण तुला तेव्हाच हे खटंकतय …. 

जेव्हा ते तुझ्या हिताआड येतंय…!!

 

याआधी तूही तुझी जात अभिमानाने मिरवायचास…

जातीमुळे मिळणारे सर्व फायदे…तोऱ्यात उचलायचास…!

 

हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला….

मनाशी काही विचार करता झाला….!

 

त्या दिवशी “तो” माझ्या लग्नात आगंतुक पाहुणा म्हणून आला….

“जिंकलास गड्या तूच…” .. मजपाशी येऊन म्हणाला…!

 

रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता….

त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात,

मी हार घातलेला होता…!

 

तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती,

कारण तिची न् माझी … जात एकच होती…!

 

कसं आहे ना भावा…

जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं…

कुठे न कुठे प्रत्येकाला नमतं घ्यावंच लागतं…!

 

तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मलाही…!!

कशाला तत्वज्ञान सांगतोयस भावा….

फायद्यासाठी काहीही..?

 

खरंच दूर करायचेत का जातिभेद?

चल मग दोघे मिळून करु…

जातीवर नको,

जो आर्थिक गरीब त्यालाच स्कॉलरशिप,सवलती मिळवून देऊ…!

 

जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची…

आपण फक्त भारतीय होऊ….

तू अन् मी एकच .. हीच शिकवण सर्वांना देऊ…!

 

ज्याच्यात असेल गुणवत्ता .. त्याचंच सिलेक्शन होईल…

त्या दिवशी माझा देश .. खऱ्या अर्थाने महान होईल….!

 

तू ही माणूस मी ही माणूस, मग कसला आपल्यात भेद?

जातीत विखुरला माणूस..  त्याचाच वाटतो खेद..!

 

जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो…

दरवेळी तुमचा उमेदवार इलेक्शन त्यावरच जिंकतो…!

 

तुझे अन् माझे लालच रक्त,

माणूस आपली जात…

स्वार्थ नको.. आणू थोडी उदात्तता हृदयात…!

 

माहीत मजला रुचणार नाही, हे कधीही सर्वांना अजिबात ….

कारण,

प्रत्येकाला हवीय येथे….आपल्या सोईची “जात”……!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “काव्यरेणू” (कविता संग्रह) – कवयित्री : रेणुका मार्डीकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “काव्यरेणू” (कविता संग्रह) – कवयित्री : रेणुका मार्डीकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

कवयित्री- सौ रेणुका धनंजय मार्डीकर

प्रकाशक : पंचक्रोशी प्रकाशन, बारामती

कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर यांच्या ‘ काव्यरेणू ‘ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच  धुळे येथे झालेल्या शुभंकरोती साहित्य परिवाराच्या प्रथम राज्यस्तरीय संमेलनात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

एकूण बासष्ट कवितांचा हा संग्रह! यातील एकेक कविता जसजशी वाचत गेले तेव्हा मनात आले वा! काय अफाट प्रतिभा आहे ही!  पुस्तकाची शीर्षक कविता काव्यरेणू जी अगदी शेवट आहे तीच मी प्रथम वाचली आणि केवळ चार कडव्यात संपूर्ण पुस्तकात काय आहे ते समजल्यावर पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली.

या संग्रहात सगळेच आहे हो ! यात बालमन आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहे, मानवता आहे, लोभस निसर्ग आहे, अध्यात्म आहे. रेणुका ताई म्हणतात,

 शब्द शारदा अंतरी येऊन

 काव्य बहरले माझ्यामधले

 काव्यरेणू हे सर्वांसाठी

 ओंजळ भरुनी अखंड दिधले=

तर अशी ही काव्याने भरलेली ओंजळ आहे.

त्यांच्या निसर्ग कविता वाचताना  लक्षात येते की अधिकतर कविता पावसावरील आहेत.  त्यांच्या कवितातून पावसाची विविध रूपे पहावयास मिळतात.

ओल्या मातीचा सुगंध ही वर्षा ऋतूचे वर्णन करणारी कविता. ऋतू गाभुळला बाई. गाभूळला अतिशय समर्पक शब्द.  या एका शब्दाने मेघांनी भरून आलेले आभाळ आणि निसर्गाचे ओलेतेपण तात्काळ नजरेसमोर उभे राहते.  या ओळी पहा- 

                   वारा जाऊनी कानात

                   सांगे लता वल्लरींच्या

                   धूळ झटका रे सारी

                    आल्या सरी मिरगाच्या

चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्य कसे जिवंत वाटते, निसर्ग टवटवीत दिसतो.

प्रभात समयी वरून येऊनी या कवितेत कवयित्रीने सुंदर पावसाच्या सकाळचे वर्णन केले आहे.

विरहाचा श्रावण ही कविता श्रावणातल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विरहाची व्यथा सांगते.

 आभास होतसे मजला

 मोगऱ्यात राणी दिसली

 तिज कवेत मी घेताना

 गंधाळून कळी ती हसली

…  किती सुंदर रूपक साधले आहे.

 शेतकऱ्याचे आणि पावसाचे फार जवळचे नाते काळजीची सल या कवितेत दिसून येते

 पाटाचं पाणी साऱ्या

 रानात फिरलं

 जोंधळ्याची रास लागून

 लक्ष्मी खेळलं

शेतकऱ्याच्या भाषेतील कविता असल्यामुळे अधिक जवळची वाटते.

ऋतू पावसाळी हे पावसावरील गीत आहे

 ऋतू पावसाळी धुंद धुंद झाला

 गिरी कंदरी ती फुले वनमाला

गीत असल्यामुळे लयबद्धता आली आहे

केळभ करतो सुंदर  नर्तन या पावसाच्या कवितेत छन छननन, दीड दा दीड दा,  थुई थुई या शब्दयोजनांनी पावसातील संगीत आणि नृत्य दृश्य झाले आहे.

सुगंधी झाल्या पहा पायवाटा ही पावसावरील कविता रेणुका ताईनी भुजंगप्रयात या वृत्तात लिहून त्यांनी छंद शास्त्राचाही अभ्यास केला आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

याव्यतिरिक्त .. त्या कोवळ्या सकाळी( सकाळचे वर्णन), ऋतुराज, वसंताचे वैभव वर्णन करणारी षडाक्षरी कविता, गुज सांगते ना झाड- वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारी अष्टाक्षरी कविता, वाट बाई वळणाची- गोव्याकडे जाणारा घाटातील वळणावळणाच्या रस्त्याचे ओवी अंगाने केलेले वर्णन, अशा अनेक निसर्गाच्या कवितांचा समावेश या पुस्तकात आहे.

रेणुकाताई त्यांच्या मनोगतात लिहितात की त्या निसर्गात आणि शेतीमातीत नेहमीच रमतात. निसर्ग पाहिला की त्यांना कविता स्फुरते. काव्यरेणूतील या निसर्गकविता वाचल्या की त्यांच्या मनोगतातील विधानाची सत्यता पटते.

कोणत्याही कवीचा प्रेम हा अगदी आवडीचा विषय नाही का? रेणुका ताईंच्या या संग्रहात प्रेम भावनेवर अनेक कविता आहेत. मग ते प्रेम प्रियकर~प्रेयसीचे असेल, पती-पत्नीचे असेल, वात्सल्य असेल, विरहातीलही प्रेमभावना असेल. या एकाच पुस्तकात सर्व भावना काव्यरूपात वाचताना मन आनंदून जाते.

 तुझी माझी रे जोडी ही शृंगार रसयुक्त प्रेम कविता! नवपरिणीतेचे मनोगत या कवितेत व्यक्त झाले आहे.

 सासरघरच्या उंबरठ्याशी नववधूच मी थरथरली

 मर्यादांचे कुंपण तरीही कळी पहा मोहरली.

…  या दोनच ओळीत एका नववधूची मानसिकता रेणुका ताई समर्थपणे दर्शवितात.

आणि शेवटी संसार परिपक्व होतो तेव्हा त्या लिहितात,

 फळ पिकल्यावर मधुर लागते

 तशीच आपली जोडी

 जीवन नौका तरुन जाईल

 अशीच त्यातील गोडी

.. .  शब्दयोजना कशी अगदी सहज आणि लयबद्ध आहे.

 चांदण्याच्या अंगणात

 चंद्र आणि चांदणीचा

 अनुराग गगनात

 चिंब ओलेत्या मनात या कवितेच्या या वरील ओळींतून कवयित्रीचे अनुरक्त मन व्यक्त होते.

नभी चांदवा येताना हे असेच एक प्रेम गीत!

 गोड गुलाबी चाहूल लागे नभी चांदवा येताना

 प्रीतीच्या त्या धुंद क्षणाला हळूच कवेत घेताना

….  ध्रुवपदच किती छान! हळुवार शब्दातून प्रीत भावना व्यक्त झाली आहे.

 चिंब चिंब जाहलो सख्या चांदण्यात या भिजताना

 सागर साक्षी होता तेव्हा श्वास नव्याने रुजताना

 कोजागिरीच्या चंद्रासंगे प्रेम गीत मग गाताना

 प्रीतीच्या त्या धुंद क्षणाला हळूच कवेत घेताना

…. हे शृंगारिक काव्य अगदी पुनवेच्या चंद्रासारखेच शितल आणि पवित्र वाटते. कुठेही उत्तान शृंगार नाही.

साथ तुझी देता मला या प्रेम कवितेतही कवीची लाडकी चंद्र,चांदणं, फुले ही खास प्रीती स्थानं आढळून येतात

 प्रीतीत मी मोहरलेली या प्रेम कवितेत रेणुका ताई म्हणतात,

 स्वर्ण आभा रवी किरणांची

  मुखचंद्रावर पडलेली

 गालावरची खळी सांगते

 प्रीतीत मी मोहरलेली

….  गुलाबी थंडीत प्रेमाला बहर येतो असे म्हणतात.

प्रेम रंगी रंगे थंडी ही अशीच एक प्रेम कविता .. अष्टाक्षरी या अक्षरछंदात लिहिलेली. शब्दयोजना किती समर्पक आहे पहा…

  थंडी गुलाबी गुलाबी

 इशारा केला ना गोड

 अनुराग रंगलेला

 सख्या साजणाची ओढ

स्त्री आणि तिला माहेरची आठवण येणार नाही, शक्य आहे? रेणुका ताईंच्या या संग्रहात मन गेले माहेरा ही माहेराची सय येणारी कविता.

 मन गेले ग माहेरा

 आमराई पिकलेली

 गंध आला आला आला

 मोहरून मीही गेली.

….  माहेरच्या वैभवाचा प्रत्येकच मुलीला अभिमान असतो. या कवितेत तो दिसून येतो.

भक्ती म्हटली की कवितेत प्रथम दिसतो तो कृष्ण. काव्यरेणूमध्येही गोकुळचा बासरीवाला आहे. भक्तीत तन्मय झालेल्या रेणुकाताईही कृष्णामध्ये एकरूप होतात. त्या म्हणतात,

 माझे मन धुंद होते

 सांजवेळी सायंकाळी

 अवचित वेणू वाजे

 वृंदावनी ये झळाळी

 क्षण पळभर एक

 कान्हामय सारे झाले

 एकरुप होऊन मी

 कृष्णा सवे पुन्हा आले

…. कधी मी बसावे अशा शांत वेळी ही कविता कृष्णभक्तीवरच आहे. सुमंदारमाला या वृत्तात ती

लिहिली आहे परंतु शब्दयोजना करताना कुठेही प्रयास पडल्यासारखे वाटत नाही. कंठ्यातील मोती सरसर सरकत जावेत तसे एक एक शब्द रेणुकाताईंच्या लेखणीतून उतरले आहेत.

राम लल्लाच्या चरणी घेऊया विश्राम हे भक्ती गीत त्यांनी लिहिले आहे.

पांडुरंगाच्या भेटीशिवाय भक्तीचे प्रदर्शन होणार नाही. आषाढीचा दिन या कवितेत पंढरपूरला जाणाऱ्या आणि जमलेल्या भक्तांची मनोवृत्ती रेणुकाताईनी चित्रित केली आहे.  त्या लिहितात,

 भगवी पताका फडके

 वारकरी मनात साठलं

 चिपळ्यांचा नाद बोले

 माऊली विठ्ठल भेटलं

 …. कविता वाचताना वाचकालाही कवयित्री पंढरपूरला घेऊन गेल्यासारखे वाटते.

रेणुका ताईंची आजीची पैठणी शांताबाईंच्या पैठणीची आठवण करून देते.

फडताळात एक गाठोडे आहे ..  त्याच्या तळाशी अगदी खाली  जिथे आहेत जुने कपडे कुंच्या  टोपी शेले शाली ..  त्यातच आहे जपून ठेवलेली एक पैठणी

पैठणीच्या घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले

 …. या शांताबाई शेळके यांच्या ओळी. आणि रेणुका ताई लिहितात,

 जुन्या काळ्यापेटीत वस्तू मौल्यवान

 आजीची पैठणी त्यात आनंदाचे दान

 आयुष्याचे सारे उन्हाळे पावसाळे

 पैठणीने पाहिले या सारे सुख सोहळे

 …. क्या बात है!

आयुष्याचा सातबारा – आयुष्यावरील फार सुरेख कविता. माणसाचा देह पंचमहाभूतांचा असतो यावर आधारित रेणुका ताई लिहितात,

चक्र अविरत चाले । ऊन वारा  माती पाणी

पंचतत्व संचारात । शरीराची ही कहाणी

जन्म आणि मृत्यू मध्ये । असे पोकळ गाभारा

त्यात असतो राखीव । आयुष्याचा सातबारा

…  किती प्रगल्भता आहे या विचारात!

माणसाकडे सर्व गोष्टी असूनही त्यात समाधान नसल्यामुळे तो कसा उपाशी सैरभैर फिरत राहतो याचे सार्थ वर्णन तुझा रिकामा झुला या आध्यात्मिक कवितेत रेणुकाताईने केले आहे.  त्या लिहितात,

अंतरात तो तुझ्याच आहे,  परि न दिसला तुला

सैरभैर हे मन फिरणारे,  तुझा रिकामा झुला

आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या रेणुकाताई त्यांच्या माय मराठीची कथा या अष्टाक्षरीत जात्यावरच्या ओव्या, अभंग, भारुड, लावणी, बखर, लोकगीते, कथा, कादंबऱ्या या सर्वच साहित्याने आपली मराठी भाषा कशी नटली आहे याचे वर्णन करतात.

आली दिवाळी माझ्या घरात, राखी पौर्णिमा नभांगणी, वसुबारस, चैत्रगौर अशा हिंदूंच्या पारंपारिक सणांविषयीच्याही कविता आहेत.

सर्वच बासष्ट कवितांचा परामर्श घेणे शक्य नाही, परंतु पूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर रेणुकाताईंचा अभ्यास, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, सकारात्मक मनोवृत्ती, आणि अत्यंत संवेदनशील मन  याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात ” कविता अंतरातून येते, ती तयार होत नाही.” काव्यरेणूतील सर्वच कविता अशा अंतरातून आलेल्या आहेत, म्हणूनच त्या वाचकांच्या थेट अंतकरणाला भिडतात.

त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्य म्हणजे, कविता वृत्तबद्ध असो वा नसो, प्रत्येकच कवितेत लय साधली आहे, जी कोणत्याही पद्यप्रकारासाठी आवश्यक आहे.

रेणुकाताई एक प्रतिभाशाली कवयित्री आहेतच पण त्याचबरोबर त्या एक उत्तम चित्रकार आहेत. काव्यरेणू या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी स्वतः तयार केले आहे. त्यांनी काढलेल्या विविध रांगोळ्यांचा कोलाज करून मुखपृष्ठ तयार झाले आहे.  त्यांच्या या कलेला नक्कीच दाद दिली पाहिजे.

काव्यसंग्रह संपूर्ण वाचल्यावर माझी जी प्रतिक्रिया झाली तीच प्रतिक्रिया या पुस्तकाचे प्रस्तावना लेखक श्री विलास एकतारे यांचीसुद्धा झाली आहे, हे प्रस्तावना वाचल्यावर माझ्या तात्काळ लक्षात आले.

पुढील येणाऱ्या काळात सौ रेणुका धनंजय मार्डीकर  यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित होवोत आणि त्यांना भरभरून यश प्राप्त होवो या माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 43 – एक सैलाब आज आया है… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – एक सैलाब आज आया है।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 43 – एक सैलाब आज आया है… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

प्यास, प्राणों की, बुझाते रहना 

जाम आँखों के, पिलाते रहना

*

गेसुओं की, घटाएँ घिरने दो

छाँव इनसे ही दिलाते रहना

*

गीत की लय, न टूटने पाये 

अपनी आवाज, मिलाते रहना

*

बाहुपाशों को, और कस लो तुम 

ताप चढ़ता है, चढ़ाते रहना

*

फैलने दो सुगंध, यौवन की 

फूल अधरों के, झराते रहना

*

आज झंकृत हुई है, तन-वीणा 

उँगलियाँ इसपे चलाते रहना

*

एक सैलाब आज आया है 

नाव मिलकर के बढ़ाते रहना

*

पार कश्ती को, कर ही लेंगे हम 

हौसला, आप बढ़ाते रहना

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 119 – नन्हीं चिड़िया… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना नन्हीं चिड़िया…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 119 – नन्हीं चिड़िया… ☆

मैं कुर्सी पर बैठकर, देख रहा परिदृश्य।

मन संवेदित हो गया, मुझे भा गया दृश्य।।

*

नन्हीं चिड़िया डोलती, शयन कक्ष में रोज।

चीं-चीं करती घूमती, कुछ करती थी खोज।।

*

चीं-चीं कर चूजे उन्हें,  नित देते संदेश।

मम्मी-पापा कुछ करो, क्यों सहते हो क्लेश।।

*

नीड़ बना था डाल पर, जहाँ न पत्ते फूल।

झुलसाती गर्मी रही, जैसे तीक्ष्ण त्रिशूल।।

*

वातायन से झाँककर, देखा कमरा कूल।

ठंडक उसको भा गयी, हल खोजा अनुकूल।।

*

कूलर से खस ले उड़ी, वह नन्हीं सी जान।

तेज तपन से थी विकल, वह अतिशय हैरान।।

*

पहुँच डाल उसने बुना, खस-तृण युक्त मकान।

ग्रीष्म ऋतु में मिल गया, लू से उसे निदान।।

*

सब में यह संवेदना, प्रभु ने भरी अथाह।

बोली भाषा अलग पर, सुख की सबको चाह।।

*

कौन कष्ट कब चाहता, जग में जीव जहान।

सुविधायें सब चाहते, पशु- पक्षी इन्सान।।  

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पाठशाला ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पाठशाला ? ?

पाठशाला के दिन अच्छे थे,

संगी-साथी गणित में कच्चे थे,

फिर क़िताबों को पढ़ना बंद हुआ,

आदमी को पढ़ने का सिलसिला हुआ,

हानि पहुँचाने के गणित में तब जो कच्चे थे,

अपना लाभ उठाने के गणित में अब पक्के हैं,

संबंधों को कंधा बनाने के मर्मज्ञ हैं,

मैं और मेरा के अनन्य विशेषज्ञ हैं,

नि:स्वार्थ भाव पढ़ाती थी पाठशाला,

पग-पग स्वार्थ का अब बोलबाला,

निष्कपट थे, सादे थे, सच्चे थे,

पाठशाला के दिन अच्छे थे..!

© संजय भारद्वाज  

(प्रात: 6:47 बजे, 5 मार्च 2024)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 301 ⇒ विचार विमर्श… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “विचार विमर्श ।)

?अभी अभी # 301 ⇒ विचार विमर्श ? श्री प्रदीप शर्मा  ?

बड़ा साधारण सा असाहित्यिक और घरेलू टाइप शब्द है यह विचार विमर्श। घर गृहस्थी, बच्चों के स्कूल, घर, मकान, दुकान, नौकरी दफ्तर और बड़ी हो रही बिटिया के ब्याह की चिंता के बारे में, अक्सर परिवार के सदस्यों और परिजनों के बीच विचार विमर्श चला ही करता है।

फुरसत के क्षणों में, यार दोस्तों के बीच और कॉफी हाउस में राजनीतिक और बौद्धिक चर्चाएं होना भी आम ही है लेकिन जब यह विमर्श साहित्य के क्षेत्र में प्रवेश करता है तो इसका स्वरूप कुछ निराला ही हो जाता है।।

बात निराला की वह तोड़ती पत्थर से शुरू होती है और नीर क्षीर विवेक के चिंतन से गुजरती हुई, राजेंद्र यादव के हंस में वह स्त्री विमर्श का रूप धारण कर लेती है। नारी अस्मिता और पश्चिम के विमेन्स लिब से शुरू होकर लिव इन रिलेशन पर भी वह रुकने का नाम नहीं लेती। कितनी चिंता है पुरुष को स्त्री के अधिकारों की, जिसके लिए वह स्त्री के कंधे से कंधा मिलाकर उसे एक नई पहचान दिलाना चाहता है। उसे अपने पांवों पर खड़ा होते देखना चाहता है।

विमर्श तो विमर्श है। अगर स्त्री विमर्श की चिंता पुरुष कर रहा है तो पुरुष विमर्श की चिंता कौन करे। नारी अगर कोमल है तो पुरुष कठोर। उसे मर्द कहो तो उसका सीना फूल जाता है और नामर्द कहो, तो चहरा उतर जाता है। मातृत्व अगर नारी की पहचान है तो पितृत्व पुरुष की अस्मिता। किसी भी महिला को बांझ अथवा डायन कहना उसकी अस्मिता पर चोट पहुंचाना है। इस पर कानून कितना सजग है, इस पर भी विमर्श जरूरी है।।

एक सनातन शब्द हमारे प्रयोग में अक्सर आता है जिसे पुरुषार्थ कहते हैं। अर्थ, धर्म, काम और मोक्ष को ही पुरुषार्थ कहा गया है। यहां पुरुषार्थ का अर्थ अथवा मतलब मानव मात्र के कर्तव्य से है। खूब लड़ी मर्दानी, जब हम कहते हैं तब भी उसकी तुलना मर्द से ही तो करते हैं। अंग्रेजी में आप चाहें तो उसे manly कह सकते हैं।

काश हम स्त्री विमर्श और पुरुष विमर्श से ऊपर उठकर सिर्फ विचार विमर्श करें। स्वस्थ संवाद हमें खेमेबाजी से बचाता है।

विचार विमर्श पत्नी बच्चों और बड़े बूढ़ों के साथ ही सार्थक होता है, जहां बदलते समय के साथ संस्कार और मान्यताओं में बदलाव भी लाया जा सकता है। गृहस्थी की गाड़ी भी दो पहियों पर ही चलती है। परिवार से ही समाज बनता है और समाज से ही देश। हमारा साहित्य आज भी समाज का ही दर्पण है इसे स्त्री और पुरुष के विमर्श से बचाकर रखें। आइए, विचार विमर्श करें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Heart, eyes, and tears… ☆ Hemant Bawankar ☆

Hemant Bawankar

 

☆ Heart, eyes, and tears… ☆ Hemant Bawankar ☆

These tears are surprising

which are very close to every heart.

 

There is a strange relationship

amongst heart, tears and eyes.

Even though,

staying away from the heart,

these are close to every heart.

 

By the way

Eyes cry many times in life.

Sometimes they cry in joy.

Sometimes they cry in sorrow.

Sometimes they cry when we are awake.

Sometimes they cry when we are asleep.

 

People Say –

the woman is so sensitive

having a source of tears in her eyes.

 

However,

I had seen him turning away,

and wiping his eyes

at the time of his wife’s adieu.

 

I had seen tears in his eyes

at adieu of

his sister

and daughter too.

 

I had seen tears in his eyes

even when, as a social responsibility

he brought one daughter from another home

with the feeling of adieu of

his sister

and daughter too.

 

I had still seen tears of joy in his eyes

when you had given presence

in your mother’s womb.

 

I had still seen tears of joy in his eyes

when he preached the good stories

when you were in the womb

so you may get lessons of life

to overcome the life’s trap.

 

I had seen tears of helplessness in his eyes

when he found himself constrained

to meet your urgent needs.

 

I had even seen tears in his eyes

when someone could not understand him

when someone could not honour

his feelings

his relationships.

 

I had still seen tears of joy in his eyes

when you moved ahead

to fight with life’s lessons

rejuvenating yourselves.

 

These tears are surprising

which are close to every heart.

 

There is a strange relationship

amongst heart, tears and eyes.

Even though,

staying away from the heart

these are close to every heart.

(This poem has been cited from my book The Variegated Life of Emotional Hearts”.)

© Hemant Bawankar

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM 

Please share your Post !

Shares