मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “चैतन्याचे गमक…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “चैतन्याचे गमक” ☆ सौ राधिका भांडारकर 

(पादाकुलक वृत्त)

 फांदी वरती पक्षी गातो

मधुर स्वरांनी मना झुलवतो

रूप पाहुनी सुंदर त्याचे

चैतन्याचे गमक वाटतो ॥१॥

 *

धवल लाट ती येत किनारी

शुष्क वालुका ओली करते

स्पर्श तिचा तो पदास होता

आनंदाची लहर दाटते ॥२॥

 *

एकच तारा तो आभाळी

बेचैन मना धीर वाटतो

सांगावे की गुपित तयाला

अंतर्यामी दीप लागतो ॥३॥

 *

रानफूल ते गवतावरचे

स्वच्छंद कसे छानच झुलते

चिंता नसते त्या सुकण्याची

असेच जगणे ऊर्जित करते ॥४॥

 *

क्षितिजावरती भास्कर जातो

पहाट येण्या पुन्हा उद्याची

ऋतुचक्र असे हे सृष्टीचे

जाण मेख ही चैतन्याची.॥

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा☆ सौ शालिनी जोशी

संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्या समकालीन संत महदंबा. यांचा काळ इसवी सन १२४२ ते इ.स.१३१२. या चक्रधर स्वामींच्या शिष्या  होत्या. यादवांच्या शेवटच्या काळातील मराठी संत चक्रधर आद्य – क्रांतिकारक, समाजसुधारक होते. सर्व धर्मातील व पंथातील महत्त्वाच्या गोष्टी निवडून त्यांनी महानुभाव पंथाची उभारणी केली. समानतेला महत्त्व दिले. त्यामुळे शूद्र व स्त्रिया आकर्षित झाले.मासिक धर्म,सोयरसुतक, अस्पृश्यता याला त्यांनी विरोध केला.  लोकभाषेत पंथाचा प्रसार केला.

महदंबा या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसगाव येथील वायेनायके या दशग्रंथ ब्राह्मणाची मुलगी होत्या.वायेनायके हे प्रतिष्ठित व सुस्थितीतले होते. त्यांच्यामुळे महदंबा यांना परमार्थाची गोडी लागली. त्या प्रज्ञावंत विदूषी झाल्या. एका वादात परप्रांती विद्वानाना जिंकून त्यांनी  जैतपत्र मिळवले. तेव्हा राजाने त्याना पाच गावे इमान दिली होती. महदंबा बालविधवा असल्याने  माहेरीच राहत असत. प्रथम वडिलांच्या संमतीने त्यानी दारूस नावाच्या एका साधू पुरुषाचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे धर्माचे संस्कार अधिक बळकट झाले. संत चक्रधर हे दारूचे गुरु. त्यामुळे महदंबांची व चक्रधर स्वामी यांची ओळख झाली.

संत चक्रधरांचे विचार महदंबाना पटले. त्या अभ्यासू व बुद्धिमान होत्या. त्या काळात स्त्रियांची स्थिती पशुपेक्षा केविलवाणी, त्यात विधवेचे जीवन म्हणजे शापच. पण महानुभाव पंथातील स्त्रियांना मिळणारी माणूसपणाची वागणूक आणि पुरुषांच्या बरोबरीचे स्थान यांनी महादंबेचे मन जिंकले. त्यांनी चक्रधरांकडे घेऊन वडिलांच्या मनाविरुद्ध संन्यास घेतला. सर्व संत स्त्रियात संन्याशी या एकट्याच होत्या. हिंदू धर्मातील गोत्र,जात, कुल यांना तिलांजली देऊन हिंदू विरोधी मानला गेलेल्या पंथात त्या सामील झाल्या. वैराग्य आणि मनोनिग्रह यांच्या जोरावर वेगळी वाट यशस्वीपणे चोखाळली. पंथातील अनेक स्त्रियांना साधले नाही ते करून दाखवले. पंथाचे कडक आचारधर्म, मठाचे नियम, शिस्त, भिक्षा धर्म हे सगळं त्यानी स्वीकारलं. संन्यास वेश त्यांनी धारण केला. चक्रधर स्वामींच्या पट्ट्य शिष्या झाल्या.त्या आद्य कवियत्री ठरल्या.

लग्नप्रसंगी म्हणावयाची रसाळ अशी गाणी त्यांनी रचली. त्याला धवळे किंवा धवळगीत म्हणतात.

‘कासे पितांबर l कंठी कुंदमाळा l कांतु शोभे सावळा l रुक्मिणीचा l’

अशा या रचना. त्यानी रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. त्यांच्यासाठी गुरु आणि  देव कृष्ण एकरूप झालेले. दोघांचा उल्लेख त्यांच्या काव्यात येतो. अशा प्रकारे भक्तीने  ओथंबलेल्या पण  भाबडी अनुचर नव्हत्या . तर विचारी, जिज्ञासू आणि करारी होत्या .पंथाची धुरा वाहण्यास समर्थ होत्या.लीलाचरित्र हा महानुभावांचा श्रेष्ठ ग्रंथ. महदंबांच्या प्रश्नांना उत्तरे देता देताच या ग्रंथाचा बराचसा भाग तयार झाला. ७० व्या वर्षी गुरुस्मरणात त्यांनी देह सोडला.

चित्र साभार : संत महदंबा यांची संपूर्ण माहिती मराठी – sant sahitya – charitra mahiti abhang gatha granth rachana –

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोठा… भाग – २ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ मोठा… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.) – इथून पुढे 

पूर्वी आजोबा चालू शकायचे, तेव्हा ते रोज संध्याकाळी अखिलला बागेत घेऊन यायचे. तेव्हा अखिल स्वच्छंदपणे बागडत असे. आजोबा बाकावर बसून इतर आजोबांशी गप्पा मारायचे. अखिल इतर मुलांबरोबर पकडापकडी, लपाछपी, साखळी खेळायचा. शिवाय घसरगुंडी, चक्र, झोपाळे वगैरे होतेच. नंतर आजोबा आजारी पडले. त्यांना घरातल्या घरातपण एकट्याने चालता येत नाही आता. वॉकर घेऊन आजी त्यांना टॉयलेटला नेते. तेवढंच त्यांचं चालणं.

आज मात्र त्याची मनःस्थिती वेगळीच होती. ‘अधीरला कसं सांगायचं हे? त्याला कळेल; पण तो घाबरणार नाही, असं. ‘ 

दोन झोके घेतले मात्र, अधीरला आजीचं आठवलं. तो मग धावतच अखिलकडे गेला, ” दादा, दादा, सांग ना. आजी कुठे गेली?”

” आपण बसू या. मग सांगतो. “

बाक भरलेले होते. मग ते खाली हिरवळीवरच बसले.

“दादा, आता सांग ना. आजी…. “

“आपली आजी ना, अधीर, देवबाप्पाकडे गेली. “

“हो? मग परत कधी येणार?” 

” नाही. परत नाही येणार. ” 

” का पण?”

“देवबाप्पाकडे गेलेले परत येत नाहीत. तिथेच राहतात ते. “

“मग आपल्याला आजी कुठची?”

आता अधीरलाही रडायला येऊ लागलं. मग अखिलने त्याला जवळ घेतलं. थोडा वेळ रडल्यावर अखिलने स्वतःचे व अधीरचे डोळे पुसले.

“हे बघ, अधीर. बाबा ऑफिसात आणि आई शाळेत गेल्यावर आपल्यालाच आजोबांची काळजी घ्यावी लागणार. “

“पण आपल्याला तर चहा करायला येत नाही. “

“मी शिकेन चहा करायला. “

“मग मी तुला मदत करीन. आणि आजोबांना बाथरूममध्ये नेताना तू एका बाजूने धर, मी दुस-या बाजूने धरीन. ” 

दोघे घरी आले, तेव्हा आजी कुठेच दिसत नव्हती. आजोबा झोपले होते. कदाचित नुसतेच डोळे मिटून पडले असतील. घरात फक्त बायकाच होत्या. बाबा, काका, मामा…… कोणीच पुरुष घरात नव्हते. आत्याचे डोळे रडून रडून सुजले होते. काकी, मामी आणि इतर बायका गप्पच होत्या. कियानची आजी आणि शेजारच्या बिल्डिंगमधल्या एक बाई बोलत होत्या.

“आजी शेवटपर्यंत आजोबांचं व्यवस्थित करत होत्या. आता या नोकरीला जाणार, म्हटल्यावर पंचाईतच आहे. ते तसे बेडरिटन…. “

” रिटन नाय हो. रिडन. बेडरिडन. आता तसे वृद्धाश्रम झालेत, म्हणा. त्या पिंकीच्या आई सांगत होत्या. त्यांनी त्यांच्या सास-यांना ठेवलंय ना, त्या वृद्धाश्रमातला स्टाफ एकदम अ‍ॅरोगंट आहे. “

“मग घरी आणलं त्यांना? “

” छे हो. सहा महिन्यांचे पैसे आगाऊच भरले आहेत. ती मुदत संपल्यावर दुस-या वृद्धाश्रमात ठेवणार, म्हणाल्या. “

आंघोळ करून आलेल्या उमाच्या कानावर हे पडलं. न राहवून ती बोलली, ” हे बघा. वृद्धाश्रमाच्या गप्पा इथे नकोत. बाबांना आधीच धक्का बसलाय. त्यात हे कानावर पडलं, तर ते हाय खातील. आणि आम्ही आमच्या बाबांना घरीच ठेवणार. ” 

” नाही हो, अखिलची आई. मी आपलं सांगितलं. सोयी आहेत, म्हटल्यावर…. ” 

“हा विषय बंद. ” 

मघापासून काळजीत असलेल्या आत्याने सुटकेचा निश्वास सोडला.

काकी म्हणाली, ” अखिल, अधीर, तुम्ही आंघोळ करून घ्या. मी पाणी काढून देते आणि टॉवेल आणून देते. “

अखिलने अधीरला आंघोळ घातली. स्वतःही केली.

केस पुसताना अखिलला आठवलं, त्याने कितीही जोर लावून केस पुसले, तरी आजी केसांना हात लावून बघायची आणि कुठे ओलसर असतील, तर खसखसा पुसून द्यायची.

अधीर तर काय, आजी केस पुसायला लागली, की मोठमोठ्याने ओरडायला लागायचा. मग आजी शांतपणे त्याला समजवायची, ” डोक्यात पाणी मुरलं, तर सर्दी होते. केस पुसताना तुला दुखत असेल, तर आपण सरळ तुझं चकोट करून घेऊ या. वाटल्यास शेंडी ठेवू या. ” मग अधीर घाबरून गप्प बसायचा.

अखिलची मुंज झाली, तेव्हा आई, बाबा, आजोबा सगळे मागे लागले होते, “चकोट करू या. छान दिसेल मुंजा. ” पण अखिल अजिबात तयार नव्हता. मग आजीने फतवा काढला, ” मुंज अखिलची, केस अखिलचे, तर निर्णयही अखिलच घेणार. ” अखिल खूश झाला.

पण आजी एवढ्यावरच थांबली नाही. तिने बाबा, काका आणि इतरांचे मुंजीतले, काही छोट्या बाळांचे जावळाचे फोटो गोळा केले. एका मासिकातले मोठमोठ्या माणसांचेही फोटो दाखवले. “हल्ली, अरे, फॅशन आलीय चमनगोटा करायची. आणि समजा, तुझे केस कापलेच, तर महिन्या-दीड महिन्यात हा बगिचा पुन्हा वाढणार, ” त्याचे केस कुरवाळत आजी म्हणाली.

“नक्की?”

“नक्की. अगदी शंभर टक्के. “

“पण कापताना दुखणार?” 

“एवढं पण नाही. आता तुला मी त्या छोट्या बाळांचे फोटो दाखवले ना?जावळ काढतानाचे. “

“मुलं चिडवतील?”

“चिडवायला लागली, तर तूच उलट सांग त्यांना, ‘किती हलकं वाटतं!’ “

शेवटी अखिल हसतहसत तयार झाला होता.

शेजारच्या काकूंनी दारातूनच अखिलला हाक मारली आणि हातातला मोठा जेवणाचा डबा त्याच्याकडे दिला, ” स्वयंपाकघरात नेऊन ठेव. कोणाला जेवायची इच्छा नसणार. पण काहीतरी पोटात तर गेलं पाहिजे. आजोबांना औषधं घ्यायची असणार. तू आणि अधीर – तुमची आंघोळ झाली, तर आमच्याकडेच या जेवायला. आणि तिथेच अभ्यास वगैरे करत बसा. इथे कोणकोण येत राहणार…. ” 

आजी नेहमी सांगायची, काकू ओरडत असल्या, तरी स्वभावाने खूप चांगल्या आहेत. ते अखिलला आता पटलं.

अखिलला काकूंची खूप भीती वाटायची. खूप कडक होत्या त्या.

एकदा दुपारी अखिल आणि कियान जिन्यात कॅचकॅच खेळत होते. दोनदा बॉल काकूंच्या दारावर बसला. तेव्हा काकू बाहेर येऊन ओरडल्या, ” दुपारच्या वेळी घरात बसून बैठे खेळ खेळा. ” त्यामुळे तो काकूंच्या बाजूला फिरकत नसे. पण आज नाईलाज होता. म्हणून तो पटकन काकूंना बोलवायला गेला. त्याही चटकन आल्या. आणि केवढी मदत केली त्यांनी! 

त्याउलट कियानची आजी त्याला मस्त वाटायची. त्याच्याकडे कधी गेलं, की आजी तिच्या खोलीत टीव्ही बघत बसलेली असायची. भूक लागली, की कियान स्वतःच स्वयंपाकघरात जायचा आणि डबे उघडून यांच्यासाठी खायला आणायचा.

मग अखिलला डॉक्टरांची आठवण झाली. त्याला डॉक्टरांचा रागच आला होता. स्वतःहून सोडाच, पण आजोबांनी सांगितलं, तरी ते हॉस्पिटलला, अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करत नव्हते. नुसतेच गप्प बसून राहिले होते.

आता अखिलच्या लक्षात आलं, आजी गेल्याचं डॉक्टरांना कळलं, तरी आजोबांना धक्का बसेल, म्हणून ते तेव्हा काहीच न बोलता आई-बाबांची वाट बघत बसले होते. नंतरही त्यांनी आईकडे, आजोबांसाठी एक गोळी काढून दिली आणि सांगितलं, “यांना त्रास झाला, तर रात्री जेवल्यानंतर ही गोळी द्या. म्हणजे शांत झोप लागेल. “

अखिल तसा नेहमीच सगळ्यांशी बोलायचा. पण इतरांचं बोलणं, त्यामागचा अर्थ, बोलणा-याचा स्वभाव, प्रामाणिकपणा याची जाणीव आज झाली, तेवढी त्याला कधीच झाली नव्हती.

या पाच-सहा तासात आपण ख-या अर्थाने मोठे झालो आहोत, असं त्याला वाटलं.

– समाप्त –

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

मूळ हिन्दी कविता लिंक >> हिन्दी साहित्य – कविता ☆ ओ मेरे जनक… ☆ सुश्री वंदना श्रीवास्तव ☆

प्रिय बाबा,

तू पुन्हा मला 

चिमणी म्हणालास.

मला आठवण आहे,

जेव्हा मी छोटीशी चिमणी होते,

अंगणात नाचत, बागडत होते, तेव्हा

तू मला आपल्या मांडीवर बसवून

आकाशाकडे बोट दाखवत 

म्हणाला होतास,

तुला उडायचं आहे.

हे अनंत आकाश तुझं आहे. ,

अनंत उड्डाणासाठी.

तेव्हा माझे डोळे लकाकले होते.

माझे पंख उत्साहाने फडफडले होते

पण, तेव्हा मला कुठे माहीत होते 

की मी पंख पसरून उडण्याचा प्रयत्न करेन,

त्या अनंत आकाशात,

तेव्हा माझ्याभोवती तू कुंपण घालशील 

माझे पंख थोडेसे खुडशील 

शाळेत पोपटपंची केलेलं

मी फटाफटा बोलत होते 

शाळेत शिकवलेल्या कविता 

लचकत, मुरडत गात होते, तेव्हा,

तू मुग्ध होत होतास.

माझ्या विद्वत्तेवर आणि असामान्यत्वावर 

पण जेव्हा मी,

माझे स्वत:चे शब्द बोलण्याची इच्छा धरली,

त्या ठरीव परिभाषेला बाजूला सारून,

माझी वाक्ये बोलू लागले,

तेव्हा तू गुपचुप माझी जीभच कातरलीस 

माझ्या शब्दकोषातील किती पाने फाडून टाकलीस 

तो तूच होतास ना! माझ्यावर खूप खूश होतास आधी 

मग आपला ‘कोहिनूर’ मूल्यांकनासाठी 

दुसर्‍यांकडे का सोपवलास? 

ज्यांनी माझं मनोबल आतपर्यंत तोडलं.

आता जर ‘चिमणी’ म्हणून बोलवायचं असेल,

तर कान टोचण्याच्या वेळी,

हा मंत्रही कानात पुटपुट की 

चुकीचं ऐकून मी गप्प बसू नये.

डोळ्यात काजळाबरोबर 

स्वप्न बघण्याची हिंमतही भर.

कवटाळताना मला इतकं साहस दे की 

त्यांना पूर्ण करण्याची जिद्द मी दाखवू शकेन 

इतका आत्मसन्मान भर माझ्यात, की

जे आहे, जशी आहे, तशीच बनून राहू शकेन.

इतकं करू शकलास बाबा,

तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार.

तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार… 

—–

मूळ कविता – ओ मेरे जनक

मूळ कवयित्री – सुश्री वंदना श्रीवास्तव 

संपर्क – नवी मुंबई महाराष्ट्र; ई मेल- vandana [email protected]

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती, अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ? 

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. मी कोमेजलो नाहीच, निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य! 

… मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गेले गायचेच राहूनी ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“गेले गायचेच राहूनी !  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तो माझ्याएवढाच तेवीस चोवीस वर्षांचा. आम्हां दोघांनाही रायफल मस्त चालवता यायची… निशाणा एकदम अचूक आमचा. पण त्याला गिटार वाजवता यायची आणि तो गायचाही अतिशय सुरेख. एल्टन जॉनचं Sacrifice तर तो असा काही गायचा की बस्स! माझ्या आणि त्याच्या भेटीचा शेवट याच गाण्याने व्हायचा नेहमी… किंबहुना हे गाणं ऐकण्यासाठीच मी त्याच्याकडे जात असे. माझ्यासारखाच तोही इथं सैन्याधिकारी बनायला आला होता. त्याचे वडील बँकेत नोकरीला तर आई माझ्या आईसरखीच साधी गृहिणी होती. तो मेघालयातल्या शिलॉंग इथे जन्मलेला… शिलॉंग म्हणजे पृथ्वीवरील एक स्वर्गच जणू! इथेच मी एका शाळेत शिकलो. तो माझ्यापेक्षा केवळ शेहचाळीस दिवसांनी मोठा होता. इथल्याच एका प्रसिद्ध शाळेत शिकणारा हा गोरागोमटा गडी अंगापिंडाने मजबूत पण वागण्या-बोलण्यात एकदम मृदू. इथल्या तरुणाईच्या रमण्याच्या सगळ्या जागा आणि बागा आम्हांला ठाऊक होत्या. त्यावेळी त्याची आणि माझी अजिबात ओळख नव्हती… माझ्यासारखाच तो शहरात फिरत असेल, शाळा बुडवून सिनेमाला जात असेल… त्यालाही मित्र-मैत्रिणी असतील… त्याचीही स्वप्नं असतील माझ्यासारखीच… भारतीय सैन्याचा रुबाबदार गणवेश परिधान करावा… शौर्य गाजवावे! आणि योगायोगाने आम्ही दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेत एकाच वर्षी दाखल झालो. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नईची १९९६ची हिवाळी तुकडी. पण तो काही माझ्या कंपनी किंवा प्लाटूनमध्ये नव्हता. आमची ओळख झाली ती परेड ग्राउंडवर. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय थकवणा-या वेळापत्रकानंतर त्याला त्याच्या बराकीत भेटायला जायचं म्हणजे एक कामच होतं… पण मी ते आनंदाने करायचो.. कारण त्याला भेटल्यावर आणि विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यावर थकवा पळून जाई. आमच्या भेटीचा समारोप त्याच गाण्याने व्हायचा…. त्याने आधी कितीही वेळा ते गाणं गायलेलं असलं तरी मी त्याला एकदा.. एकदा… पुन्हा एकच वेळा… ते गाणं गा! असा त्याला आग्रह करायचो… आणि तो सुद्धा त्यादिवाशीचं त्याचं अखेरचं गाणं गाताना भान हरपून गायचा… त्याचं गाणं ऐकायला इतर बरेच प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित असायाचे. एकदा त्याने त्याच्या प्रेयासीचं नावही मला सांगून टाकले… आणि जेंव्हा जेंव्हा तिचा उल्लेख मी करयचो तेंव्हा तेंव्हा त्याचे गुबगुबीत गाल आणखी लाल व्हायचे… ते दोघं लग्न करणार होते स्थिरस्थावर झाल्यावर! त्याने त्याच्या आणि तिने तिच्या घरी अजून काही सांगितले नव्हते तसे! त्याच्या पाकिटात तिचा एक फोटो मात्र असे! दिवस पुढे सरकत होते… आमचे प्रशिक्षण जोमाने सुरु होते… आणि मी त्याचे गाणे ऐकायला जाणेही तसे रोजचेच होऊन गेले होते! 

ज्याच्यासाठी अट्टाहास केला होता तो दिवस अखेर उगवला… अंतिम पग नावाची पायरी पार करताना मनाला जे काही जाणवतं ते इतरांना कधीही समजणार नाही…. अभिमान, जबाबदारीची जाणीव, केलेल्या श्रमाचं फळ मिळाल्याची भावना… सारं कसं एकवटून येतं यावेळी. आम्ही दोघांनीही त्यादिवशी अंतिम पग पार केले आणि आम्ही भारतीय सेनेचे अधिकारी झालो! 

या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी त्याच्या बराकीत गेलो होतो… पण तो त्याच्या आई-बाबांना घ्यायला बाहेर गेला होता… त्याचा थोरला भाऊ सुद्धा यायचा होता पासिंग आऊट परेड बघायला! त्यामुळे त्यादिवशीची आमची भेट झालीच नाही. दुस-या दिवशी परेड कार्यक्रम पार पडल्यानंतरच्या गडबडीत मला तो भेटला नाही. सायंकाळी आम्हां सर्वांनाच अकादमीचा निरोप घ्यायचा होता. त्याच्या आधी काही मिनिटे मी त्याच्या बराकीत पोहोचलो… तोवर तो तिथून निघून गेला होता… आमची भेट नाही झाली! तो त्याच्या टेबलवर जिथे त्याची गिटार ठेवत असे त्या जागेकडे पाहत मी तिथून माझ्या बराकीत परतलो आणि माझ्या गावी निघालो.

जंटलमन कडेट क्लिफर्ड किशिंग नॉनगृम त्याचं पूर्ण नाव होतं. त्याला पहिलीच नेमणूक मिळाली ती रणभूमीची राणी म्हणवल्या जाणा-या 12 JAK LI (१२, जम्मू and काश्मीर लाईट इन्फंट्री) मध्ये. इथे सतत काहीतरी घडत असते! त्याला शेवटचे भेटून अठरा महिने उलटून गेले होते. त्याच दरम्यान पाकिस्तानी आपल्या हद्दीत लपून छपून घुसले आणि त्यांना तिथून हुसकावून लावणे हे एक मोठेच काम होऊन बसले. त्यावेळी मी पठाणकोट येथे नेमणुकीस होतो. आपल्या सैन्याने पाकिस्तानने बळकावलेल्या चौक्या एका मागून एक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मालिकाच सुरु केली होती… पण हे काम अतिशय जीवघेणे होते! ताज्या दमाचे अधिकारी आणि सैनिक या लढाईत अगदी पुढच्या फळीमध्ये होते…. रणभूमीला ताज्या रक्ताची तहान असते असं म्हणतात! युद्धात यश तर रोजच मिळत होते पण बलिदानाच्या काळीज पिळवटून टाकणा-या बातम्याही रोजच कानी पडत होत्या! अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्यासोबत हसणारा आपला सहकारी आज शवपेटीमध्ये पाहून दु:ख आणि शत्रूविषयी प्रचंड राग अशा संमिश्र भावना मनात दाटून यायच्या! 

त्यादिवशी मी माझ्या युनिटच्या रणगाडा दुरुस्तीच्या प्रशिक्षणात अगदी रात्री उशिरापर्यंत व्यग्र होतो. युनिटमध्ये माझ्यासाठी फोन आला… कुणी इन्फंट्री ऑफिसर माझ्याशी बोलू इच्छित होते. हात पाय ऑईल-धुळीने माखलेले अशा अवस्थेत मी धावत जाऊन तो कॉल घेतला… तर पलीकडून क्लीफी अर्थात क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब बोलत होते.. क्लीफी हे मी त्याला ठेवलेलं टोपणनाव. त्याचा आवाज अगदी नेहमीसारखा… उत्साही! कारगिल लढाईमध्ये निघालो आहे! त्याने अगदी अभिमानाने सांगितले… आवाजात कुठेही भीती, काळजी नव्हती. लढाईत शौर्य गाजवण्याची संधी मिळत असलेली पाहून एका सैनिकाच्या रक्ताने उसळ्या घ्यायला सुरुवात केली होती…. भेटू युद्ध जिंकून आल्यावर… भेटीत तुझ्या आवडीचं गाणं नक्की गाईन… तेच नेहमीचं Sacrifice.. त्यागाचं गाणं! विश्वासाचं गाणं! अकादमीमधून निघताना तुझी भेट होऊ शकली नाही.. मित्रा! माफ कर!… तो म्हणत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर तो साक्षात उभा राहिलेला होता! गिटार ऐवजी आता त्याच्या हातात मला रायफल दिसत होती! 

पर्वतांच्या माथ्यांवरून शत्रू आरामात निशाणा साधत होता. बर्फाने आच्छादलेल्या पहाडांवर चढून वर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवेत घेणे. ७० अंशाची चढण चढून जाणे आणि तेही युद्ध साहित्य पाठीवर घेऊन, वरून अचूक गोळीबार सुरु असताना…. कल्पनाच धडकी भरवणारी. एक गोळी म्हणजे एक यमदूत…. अंधारात, बर्फावरून पाय निसटला म्हणजे खाली हजारो फूट दरीत कायमची विश्रांती मिळणार याची शाश्वती. शत्रू पाहतो आहे… भारताचे सिंह पहाड चढण्याच्या प्रयत्नात आहेत… त्यांना ही कामगिरी शक्यच होणार नाही हे ते ओळखून आहेत. समोरून, वरून प्रचंड गोळीबार होत असताना या मरणाच्या पावसात कोण चालेल? त्यांनी विचार केला असावा. त्यांचा गोळीबार तर थांबणार नव्हताच… त्यांची तयारी प्रचंड होती! पहाड जिंकायचा म्हणजे शत्रूच्या नरडीला हात घालावाच लागणार होता…. आणि हे करताना त्या मरणवर्षावात चिंब भिजावेच लागणार होते… तुकडीतील किमान एकाला तरी. अशावेळी हा नक्की सर्वांच्या पुढे असणार हे तर ठरलेले होते. त्याला त्याच्या जीवाची पर्वा तरी कुठे होती… सोपवलेली कामगिरी पडेल ती किंमत मोजून फत्ते करायचीच हा त्याचा निर्धार होता… धोका पत्करणे भागच होते! 

सत्तर अंश उभी चढण तो लीलया चढला…. दहा तास लागले होते त्याला पहाडाच्या टोकापर्यंत पोहोचायला…. गोळीबाराच्या गदारोळात शत्रूवर चालून गेला… शत्रूला हे असे काही कुणी करेल याची कल्पनाच नव्हती… ते वरून आरामात त्यांच्या शस्त्रांचे ट्रिगर दाबत बसले होते.. त्यांच्या टप्प्यात येणा-या भारतीय सैनिकांवर गोळीबार करीत होते. खालून आपल्या बोफोर्स तोफा आग ओकत होत्याच… पण शत्रूने जागाच अशा निवडल्या होत्या की तिथे फक्त माणूस पोहोचू शकेल! आणि तिथे कुणी माणूस पोहोचू शकेल असे शत्रूने स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते! तो एखाद्या वादळवा-यासारखा शत्रूच्या बंकरसमोर पोहोचला… बंकरमध्ये हातगोळे फेकले आणि त्याच्या हातातल्या रायफलने दुश्मनाच्या मरणाचे गीत वाजवायला आरंभ केला… जणू तो काही गिटारच्या ताराच छेडतो आहे… अचूक सूर! सहा शत्रू सैनिक त्याने त्यांच्या अंतिम यात्रेला धाडून दिले! एक धिप्पाड शत्रू सैनिक त्याच्यावर झेपावला… हातातल्या रायफली एवढ्या जवळून एकमेकांवर झाडता येत नाहीत…. अशावेळी क्लिफर्डने शाळेत असाताना गिरवलेले बॉक्सिंगचे धडे कामी आले… पाहता पाहता ते धिप्पाड धूड कायमचे खाली कोसळले… क्लिफर्ड साहेबांनी त्याने जणू त्या पहाडाला मोठे भगदाडच पाडले होते…. आपल्या नेत्याचा हा भीमपराक्रम पाहून त्याच्या मागोमाग मग त्याचे सैनिक पुढे सरसावले आणि त्यांनीही प्रचंड वेगाने उर्वरीत कामगिरी पार पाडली…. Point 4812 आता भारताच्या ताब्यात आले होते! 

पण पावसात बाहेर पाऊल टाकले म्हणजे भिजणे आलेच… हा गडी तर खुल्या आभाळातून होणा-या वर्षावात पुढे सरसावला होता… रक्ताने भिजणे साहजिकच होते… शरीराची शत्रूने डागलेल्या गोळ्यांनी चाळण झालेली…. केवळ २४ वर्षांचा तो सुकुमार देह… आता फक्त एकाच रंगाची कहाणी सांगत होता…. I gave my today for your tomorrow! महावीर लेफ्टनंट क्लीशिंग क्लिफर्ड नांगृम साहेब धारातीर्थी पडले! हेच तर स्वप्न असतं प्रत्येक भारतीय सैनिकाचं.. ताठ मानेने मरणाला सामोरे जायचं… राष्ट्रध्वजात गुंडाळले जाऊन घरी परतायचं… इथं या मरणाला जीवनाच्या सार्थकतेची किनार असते! 

तो लवकरच सुट्टीवर घरी येणार होता म्हणून थोरल्या भावाने आपल्या विवाहाची तारीख पुढे ढकलली होती… बाकी सर्व तयारी झालेलीच होती.. फक्त त्याची सर्वजण वाट पहात होते…. तो आला पण फुलांनी शाकारलेल्या, तिरंगा लपेटलेल्या शवपेटीत! पीटर अंकल आणि सेली आंटीच्या दु:खाला कोणतेही परिमाण लावता येणार नाही. ते त्याच्या शवपेटीवर डोकं टेकवून त्याच्या आत्म्याच्या कल्याणाची प्रार्थना पुटपुटत आहेत! त्याच्या सन्मानार्थ हवेत झाडल्या गेलेल्या गोळीबाराच्या फैरी मेघालयाच्या आभाळातल्या मेघांना भेदून वर जात आहेत… ढगांच्या मनातही मोठी खळबळ माजली आहे… ते कोणत्याही क्षणी बरसू लागतील असं वाटतं आहे७… ७ मार्च, १९७५ रोजी जन्मलेले Captain Keishing Clifford Nongrum आता पन्नास वर्षांचे असते… तुमच्या आमच्या सारखे संसारात आनंदात असते… पण देश सुखात रहावा म्हणून त्यांनी आपले तारुण्य अर्पण केले! 

माझ्या टेबलवर मी एका सैनिकाचा पुतळा ठेवलेला असतो कायम… या पुतळ्याच्या हातात गिटार मात्र नाही… रायफल आहे! माझ्या जिवलग मित्राच्या तोंडून Sacrifice अर्थात त्यागाचं गाणं एकदा शेवटचं ऐकण्याचं राहून गेलं… देवाच्या घरी भेट होईल तेंव्हा मात्र मी त्याला आग्रहाने तेच गाणं गाण्याचा आग्रह मात्र निश्चित धरणार आहे! 

– – लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत 

(Captain Keishing Clifford Nongrum साहेबांचे मित्र लेफ्ट. कर्नल संदीप अहलावत साहेब यांनी एका फेसबुक लेखात इंग्रजी भाषेत वरील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे मी जमेल तसे मराठी भाषांतर आपल्यासाठी मला भावले त्या शैलीत केले आहे. यात काही कमीजास्त असू शकते. अहलावत साहेबांची परवानगी घेता नाही आली, क्षमस्व! सुधारणा असतील तर त्या निश्चित करेन!)

लहानपणी खेळ खेळताना हे छोटे Keishing Clifford साहेब स्वत: बनवलेली लाकडी रायफल हाती धरत. घरच्यांना अजिबात कळू न देता त्यांनी सैन्याधिकारी होण्यासाठीची परीक्षा दिली होती! अत्यंत कठीण प्रशिक्षण लीलया पूर्ण केले होते. सियाचीन ग्लेशियरवर नेमणुकीस असताना तिथे झालेल्या हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या बारा सैनिकांचे प्राण उणे ६० अंश तापमानात त्यांनी अथक प्रयत्न करून वाचवले होते. सुट्टीवर आल्यावर आपल्या शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात फिरून व्याखाने देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सैन्यात अधिकारी कसे व्हावे या विषयावर त्यांनी स्वहस्ताक्षरात सविस्तर माहिती लिहून ठेवली होती. ते देणार असलेले शेवटचे व्याख्यान त्या शाळेच्या परीक्षा सुरु असल्याने होऊ शकले नव्हते… त्यांचे मित्र संदीप अहलावत साहेबांनी नंतर त्याच शाळेत जाऊन दिले कारण हे व्याख्यान द्यायला Captain Keishing Clifford Nongrum हयात नव्हते! Captain Keishing Clifford Nongrum यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या भावाने गरीब मुलांसाठी एक फुटबॉल क्लब स्थापन केलाय. यासाठी लागणारा निधी हे विद्यार्थी स्वत: एक बेकरी चालवून त्यातून मिळणा-या पैशांतून भागवतात. साहेबांचे आई वडील कारगिलच्या त्या पहाडांवर स्वत: जाऊन आपला लाडका लेक जिथे धारातीर्थी पडला होता ती जागा बघून आले! साहेबांच्या स्मृती शिलांग मध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आपले लोक ही बलिदाने विसरून जातात याचा अनुभव साहेबांच्या कुटुंबीयांनी सुद्धा घेतला आहे… पण जेंव्हा एखादी महिला साहेबांच्या बाबतीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे दाखवायला येते, एखादा माणूस त्यांच्या दरवाजावर माथा टेकवून त्याने धरलेला उपवास सोडायला येतो… तेंव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. देशाचा दुस-या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार, ‘महावीर चक्र’ प्राप्त करणारा मेघालयातील हा पहिलाच तरुण आहे, ही बाबही त्यांना अभिमानाचे क्षण देऊन जाते! आज इतक्या वर्षांनतर साहेबांचे कोर्स मेट अर्थात OTA मधील सहाध्यायी त्यांच्या घराला भेट देतात, साहेबांना मानवंदना देतात, तेंव्हा आपण एकटे नाही आहोत… देश आपल्या मागे उभा अही, ही त्यांची भावना दुणावते. पूर्वोत्तर राज्यातही देशभक्तीची बीजे खोलवर रुजली आहेत, याचेच हे प्रत्यंतर असते. जय हिंद! 

– – – तुम भूल न जाओ इनको… इसलिये कही ये कहानी! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महिला मुक्ती… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ महिला मुक्ती… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

चिरायू होवो जागतिक महिला दिन !

पण खेदाने म्हणावे लागते

महिला मुक्तीचं शिखर अजून खूप दूर आहे.

त्याची वाट काटेरी व बिकट आहे

आजही संस्कृती रक्षकांच्या गराड्यात सापडलेली

धर्म, रुढी, परंपरेने ग्रासलेली

समाज बंधनात अडकलेली

गर्भलिंगचिकित्सेमध्ये मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास भ्रूणहत्येचा बळी ठरलेली ती

मुलगी झाली म्हणून जाचाला, त्रासाला सामोरी जाणारी अभागी माता ती

स्त्री म्हणून जन्मापासून दुय्यम स्थानाचा शाप लाभलेली ती

 

तारुण्यात पदार्पण करताच

चहू बाजूने तिच्यावर पडणारी

कामांधांची वखवखलेली नजर

त्यामुळे ओशाळं झालेलं तिचं मन, शरीर

दोन चिमुरड्यांवर शाळेत शिपायांकडून झालेले अमानुष अत्याचार

एस टी बसमध्ये नराधमाने केलेला बलात्कार

तिने आरडाओरडा केला नाही म्हणून तो सहमतीने केलेला संभोग होता,

असा वकिलाने कोर्टात केलेला उद्वेगजनक युक्तिवाद

मंत्र्याने त्याला केलेलं पूरक विधान

19 वर्षाच्या तरुणाने 35 वर्षाच्या महिलेवर केलेला अत्याचार

व चाकूने तिच्या शरीरावर केलेले अमानुष वार

रेल्वे स्थानकात, एकांतात केले जाणारे सामुहिक बलात्कार

म्हातारपणी पंधरा वर्षाच्या नातीचा सांभाळ करणे पुढे शक्य नाही म्हणून नात्यातील तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या व्यक्तीशी लावून दिलेलं लग्न व दोन लाखात केलेली तिची विक्री

कधी वडिलांच्या, आप्तेष्टांच्या वासनेची झालेली बळी

स्त्री म्हणून विविध स्तरांवर होणारी तिची मानसिक गळचेपी

यावर मलमपट्टी करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा महिलादिन !

म्हणून मनात आलेले हे विद्रोही विचार

या दिवशी तिला, दिल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्यांनादेखील काटे असल्याची भीती वाटते, दडलेला कामवासनेचा दुर्गंध येतो.

तिच्या अमानुष अंधाराचे जाळे लवकर नष्ट व्हावे व तिला निर्भयतेने व्यापलेले मोकळे आकाश मिळावे ही शुभेच्छा !

कवी: श्री. अनिल दाणी

प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ वेध अहिल्याबाईंचा – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वेध अहिल्याबाईंचा” – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ वेध अहिल्याबाईंचा “ 

लेखक : डॉ. देवीदास पोटे.

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स 

पृष्ठ : ५११ 

किंमत : रु. ९००/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती देश वर्षभर साजरा करत आहे. या वर्षात आपणही निश्चित कोठे न कोठे सहभागी होणार असू, काही कार्यक्रम स्वतः घेणार असू… अशा वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा “वेध अहिल्याबाईंचा” हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा. ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सर्व दृष्टीनं लिहिलेला ग्रंथ… ज्यात देवींच्या चरित्रापासून त्यांच्यावर लिहिलेल्या कवनापर्यंत… समग्र ! प्रत्येकाच्या घरी असावा असा हा ग्रंथ!

“अहिल्याबाईंची तुलना रशियाची साम्राज्ञी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी होते. ” असं लॉरेन्स म्हणतो….

अहिल्याबाईं होळकर विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आहे. ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राज्य योगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगीनी होती. प्रजाजनांची लोक माता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे. अहिल्याबाई हे समर्पित कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा अविष्कार या ग्रंथात आणि समर्थपणे मांडला आहे. अहिल्याबाईच्या कारकिर्दीतील इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे आणि लोककल्याणकारी कार्याचे पैलू पुन्हा पुन्हा वाचावे, अभ्यासावे, स्मरणात ठेवावे आणि अनुसरावे असे आहेत. हा ग्रंथ आपल्या सर्वांना एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असा विश्वास आहे. *

ग्रंथात एकूण १०९ प्रकरणे, शेकडो संदर्भ ग्रंथ आणि चित्रे आहेत.

त्यातील एक प्रकरण आहे, ‘ अहिल्याबाई :मान्यवरांच्या नजरेतून ! ‘ येथे संक्षेपाने उल्लेख करतोय. जगातील अनेक कीर्तिवंत, बुद्धिवंत, साहित्यिक, विद्वानांनी, राजांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बाबत काढलेले उद्गार या पुस्तकाच्या या एका प्रकरणात आहेत…

महादजी शिंदे म्हणतात, ‘अशा महान मातेच्या पोटी जन्म घ्यावा. ‘ तर प्रथम तुकोजी होळकरांची वाक्य आहेत, ” साक्षात मार्तंड येऊन बोलला तरी मातोश्रींच्या पायाशी अंतर होणार नाही. “

जदुनाथ सरकार लिहितात, “अहिल्याबाईबद्दल माझा आदर माहेश्वरातील त्यांच्याविषयीची कागदपत्रे पाहून अमर्याद वाढला. राज्यपदारुड असता, मालकीची धनदौलत असता साधेपणाने राहणारी, धार्मिक प्रवृत्तीची महिला म्हणजे साक्षात देवी आहे. तिने देवळे बांधली, घाट बांधली, दान धर्मात पुष्कळ पैसा खर्च केला. जमिनी, गावे इनाम दिली. महेश्वरातील त्यांच्या वास्तव्यामुळे महादजी शिंदे सारख्याचा पराक्रम गाजला. तिच्या सहकार्याशिवाय महादजीस राजकारणात महत्त्व मिळाले नसते. “

या प्रकरणात इतर अनेक मान्यवरांची आदरांजली आणि उद्गार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा समग्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा इतका सुंदर आहे.

ह्या ग्रंथाचे प्रकाशक कै. माधवराव जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांनी हे फार मोठे कार्य केलं आहे… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #270 ☆ पुरुष वर्चस्व और नारी… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख पुरुष वर्चस्व और नारी। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 270 ☆

☆ पुरुष वर्चस्व और नारी… ☆

पितृसत्तात्मक युग के पुराने क़ायदे-कानून आज भी धरोहर की भांति सुरक्षित हैं और उनका प्रचलन बदस्तूर जारी है। हमारे पूर्वजों ने पुरुष को सर्वश्रेष्ठ समझ समस्त अधिकार प्रदान किए और नारी के हिस्से में शेष बचे मात्र कर्त्तव्य, जिन्हें गले में पड़े ढोल की भांति उसे विवशतापूर्वक आज तक बजाना पड़ रहा है। तदोपरांत उसे घर की चारदीवारी में कैद कर लिया गया कि वह अब गृहस्थी के सारे दायित्वों का वहन करेगी…यथा प्रजनन से लेकर पूरे परिवारजनों की हर इच्छा, खुशी व मनोरथ को पूर्ण करेगी; उनके इशारों पर कठपुतली की भांति ता-उम्र नाचेगी; उनके हर आदेश की सहर्ष अनुपालना करेगी और पति के समक्ष सदैव नतमस्तक रहेगी…जहां उसकी इच्छा का कोई मूल्य नहीं होगा। नारी के लिए निर्मित आदर्श-संहिता में ‘क्यों’ शब्द नदारद है, क्योंकि उसके लिए तो हर हुक्म बजाना अपेक्षित है… दासी और गुलाम की भांति ‘जी हां ‘कहना उसकी मात्र नियति है। इस संदर्भ में सीता का उदाहरण हमारे समक्ष है। वह पतिव्रता नारी थी, जिसने पति के साथ वनवास झेला और लक्ष्मण- रेखा पार करने पर क्या हुआ उसका अंजाम …सीता-हरण और आगे की कथा से तो आप सब परिचित हैं। ज़रा स्मरण  कीजिए– शापित अहिल्या को, जिसे उसके पति त्रषि गौतम के श्राप-स्वरूप वर्षों तक शिला रूप में स्थित रहना पड़ा, क्योंकि इंद्र ने वेश बदल कर उसकी अस्मत पर हाथ डाला था। छल भी पुरुष द्वारा और उद्धारक भी पुरुष ही… इससे अंदाज़ लगा सकते हैं आप उसके दबदबे का, उसकी सर्वमान्य सर्वोच्च सत्ता का। महाभारत की पात्र द्रौपदी के इस वाक्य ‘अंधे की औलाद अंधी’ ने बवाल मचा दिया और उस रज:स्वला नारी को केशों से खींच कर भरी सभा में लाया गया, जहां उसका चीरहरण हुआ। प्रश्न उठता है, क्या किसी ने दुर्योधन व दु:शासन को दुष्कृत्य करने से रोका और उनकी निंदा की? शायद सब मर्यादा से बंधे थे और समर्पित थे राज्य के प्रति… सो! अंधा केवल धृतराष्ट्र नहीं, राजसभा में उपस्थित हर शख्स अंधा था, नपुंसक था, साहसहीन था। गुरू द्रौण, भीष्म व विदुर जैसे वरिष्ठजन भी अपनी पुत्रवधु की अस्मत लुटते हुए देखते रहे… आखिर क्यों? क्या उनका मौन रहना अक्षम्य अपराध नहीं था?

आइए! लौट चलते हैं सीता की ओर, जिसे रावण की अशोक-वाटिका में प्रवास झेलना पड़ा और लंका- दहन के पश्चात् अयोध्या लौटने पर सीता को एक धोबी के कहने पर विश्वामित्र के आश्रम में धोखे से छुड़वा दिया गया, जहां लव और कुश का जन्म हुआ। अश्वमेध यज्ञ के अवसर पर लव व कुश द्वारा राम का घोड़ा पकड़ने पर राम का वहां आकर वीर बालकों से उनका परिचय पूछना, सीता से भेंट होना तथा उसका अग्नि-परीक्षा देना और पति के साथ अयोध्या लौट जाना। तदोपरांत एक धोबी के कहने पर सीता को अपनी पवित्रता का प्रमाण देने के विरोध में राम को संतान सौंप  पुन: धरती में समा जाना–क्या संदेश देता है मानव समाज को? नारी को कटघरे में खड़ा कर इल्ज़ाम लगाने के पश्चात् उसे अपना पक्ष रखने का अधिकार न देना…क्या न्यायोचित है? यही सब हुआ था अहिल्या के साथ… गौतम ऋषि ने कहाँ हक़ीक़त जानने का प्रयास किया? उसे अकारण अपराधिनी समझ शिला बनने का श्राप दे डालना… क्या वह अनुचित नहीं था? इसमें आश्चर्य क्या है … आज भी यही प्रचलन जारी है। नारी पर इल्ज़ाम लगा उसे बे-वजह सज़ा दी जाती है, जबकि कोर्ट-कचहरी में भी मुज़रिम को अपना पक्ष रखने का अवसर प्रदान किया जाता है। परंतु नारी को जिरह करने का अधिकार कहां प्रदत्त है? वह हाड़-मांस की पुतली, जिसे भावहीन व संवेदनशून्य समझा जाता है; फिर उसमें बुद्धि होने का प्रश्न ही कहाँ उठता है? वह तो सदियों से दोयम दर्जे की प्राणी स्वीकारी जाती है, जिसे संविधान द्वारा प्रदत्त मौलिक अधिकारों की एवज़ में एक ही अधिकार प्राप्त है– ‘सहना’ और ‘कुछ नहीं कहना।’ यदि वह अपना पक्ष रखने का साहस जुटाती है, तो उसे ज़लील किया जाता है अर्थात् सबके सम्मुख प्रताड़ित कर कुलटा, कलंकिनी, कुलनाशिनी आदि विशेषणों द्वारा अलंकृत कर घर से बाहर का रास्ता दिखा दिया जाता है और उसके साथ ही समाज में पग-पग पर जाल बिछाए बैठे दरिंदे उसकी अस्मत लूट; किस प्रकार नरक में धकेल देते हैं…इससे तो आप सब परिचित हैं। वैसे जुर्म का बढ़ता ग्रॉफ़ भी इस तथ्य की पुष्टि करने के लिए काफी है। सो! आप अनुमान लगा सकते हैं कि उस पीड़िता को कितनी शारीरिक यंत्रणा व मानसिक प्रताड़ना से गुज़रना पड़ता होगा? उस मासूम, बेकसूर, निर्दोष, मासूम बच्ची अथवा महिला को कितने ज़ुल्म सहने पड़ते होंगे…कारण दहेज हो या पति के आदेशों की अवहेलना; पति के अधिकारों के विस्तृत दायरों व कारस्तानियों की कल्पना तो आप भली-भांति कर ही सकते हैं।

आइए! चर्चा करते हैं पुरुष-वर्चस्व की…जन्म लेने से पूर्व कन्या-भ्रूण को नष्ट करने के निमित्त ज़ोर-ज़बर्दस्ती करना; जन्म के पश्चात् नवजात बालिका का मुख न देखना; प्रसव पीड़ा का संज्ञान न लेते हुए पत्नी पर ज़ुल्म करना और दूसरे ही दिन प्रसूता को घर के कामों में झोंक देना या घर से बाहर का रास्ता दिखा देना तथा पत्नी के देहांत के पश्चात् दूसरे विवाह के स्वप्न संजोना…सामान्य-सी बात है; घर-घर की कहानी है। बेटे-बेटी में आज भी अंतर समझा जाता है तथा बेटे को कुल-दीपक समझ उसके सभी दोष-अपराध क्षम्य स्वीकारे जाते हैं और पुत्री की अवहेलना, पुत्र की उतरन व जूठन पर उसका पालन-पोषण; हर पल उस मासूम पर दोषारोपण; व्यंग्य-बाणों की बौछार व उसे दूसरे घर जाना है… न जाने किस जन्म का बदला लेने आई है; इसने तो आते ही हमारे हाथ में कटोरा थमा दिया… ऐसे हृदय-विदारक जुमलों का सामना; तो उस अभागिन को आजीवन करना पड़ता है।

विवाह के अवसर पर पाँव में पायल, पाँव की अंगुलियों में बिछुए, हाथ में कंगन, अंगुलियों में अंगूठियां, कमर पर करधनी, नाक में नथ, कानों में कुंडल, माथे पर बिंदिया, मांग में सिंदूर व टीका और सिर से पांव तक आभूषणों से लदी, सजी-धजी महिला को आप क्या कहेंगे…मात्र एक वस्तु, जिसे उसके पति की ख़िदमत में पेश किया जाना है। वह कहां समझ पाती है कि वे आभूषण उसे बिना हथकड़ी के उम्र-भर बांधने का प्रयोजन हैं। महिला को ‘सदा सुहागिन रहो,’ व ‘पुत्रवती भव’ आदि आशीष भी उस ब्याहता के लिए नहीं; उनके अपने पुत्र की चिरायु व वंश बढ़ाने के लिए होते हैं।

काश! वह पुरूष वर्चस्व के दायरे को समझ पाती कि विवाहोपरांत तो दुल्हन से उसकी पहचान भी छीन ली जाती है, क्योंकि उसे पति के नाम व जाति से पुकारा जाता है। वह वस्तु-मात्र रह जाती है, जिसका कोई अस्तित्व व मूल्य नहीं होता। सारे व्रत, उपवास, कठोर नियम व कानून तो स्त्री के लिए बनाए गए हैं–जैसे करवाचौथ, पति की लंबी आयु के लिए पत्नी को ही रखना पड़ता है; पति इसके लिए बाध्य नहीं है। प्रश्न उठता है…पति के लिए व्रत रखने का प्रावधान क्यों नहीं? शायद! उसके पति को पत्नी के साथ की दरक़ार अथवा आवश्यकता नहीं है। वैसे भी पत्नी की चिता ठंडी होने से पूर्व ही रिश्ते आने प्रारंभ हो जाते हैं। क्या ऐसे समाज में स्त्री को समानता का दर्जा मिल पाना मात्र कपोल-कल्पना नहीं है? नहीं …नहीं… नहीं… कभी नहीं मिल पाता उसे समानता का अधिकार…बल्कि उसे तो आजीवन उसी भ्रम में जीना पड़ता है कि भले ही वह पत्नी है या मां– उसकी कोई अहमियत नहीं; न परिवार में, न ही समाज में… वह तो माटी की गुड़िया है…स्पंदनहीन, चेतनहीन व अस्तित्वहीन…जिसे आजीवन दूसरों की करुणा-कृपा पर आश्रित रहना पड़ता है।

विवाह के पश्चात् उसका पति हर पल उस निरीह पर निशाना साधता है। वैसे भी हर अपराध के लिए अपराधिनी तो औरत ही समझी जाती है, भले ही वह अपराध उसने किया ही न हो, क्योंकि उसे तो विदाई की बेला में समझा दिया जाता है कि अब उसे अपने ससुराल में ही रहना है; कभी अकेले इस चौखट पर पाँव नहीं रखना है। दूसरे शब्दों में उस पराश्रिता को आजीवन एकपक्षीय समझौता करना है… बापू के तीन बंदरों के समान आंख, कान, मुंह बंद करके जीवन बसर करना है। इसलिए वह नादान सब ज़ुल्म सहन करती है तथा कभी भी कोई ग़िला-शिक़वा या शिक़ायत नहीं करती। अक्सर सभी हादसों का मूल कारण होता है, उस विवाहिता से मुक्ति पाने का उपक्रम… कभी गैस के खुला रह जाने पर उसका जल जाना; कभी नदी किनारे पाँव फिसल जाना; तो कभी बिजली की नंगी तारों को छू जाना।  मिट्टी के तेल, पेट्रोल या तेज़ाब से ज़िंदा जलने की यंत्रणा से कौन परिचित नहीं है? प्रश्न उठता है कि यह सब हादसे पुत्रवधु के साथ ही क्यों होते हैं? उस घर की बेटी उन हादसों का शिकार क्यों नहीं होती? यदि वह इन सबके चलते ज़िंदा बच निकलती है, तो उसे ज़िंदगी के अंतिम पड़ाव तक, पिता द्वारा निर्देशित राह पर चल कर समस्त दायित्वों का वहन करना अनिवार्य होता है और उसके पश्चात् बेटा निर्धारित परंपरा का वहन बखूबी करता है। केवल चेहरा बदल जाता है, क़िरदार नहीं और यह सिलसिला पीढ़ी-दर-पीढ़ी अनवरत चलता रहता है।

आधुनिक युग में नारी को प्रदत्त हैं समानाधिकार… हाँ! उसे स्वतंत्रता प्राप्त हुई है और उसे मनचाहा करने का अधिकार भी है। वह अपने ढंग से जीने को स्वतंत्र है तथा किसी ज़ुल्म व अनहोनी होने पर उसकी शिकायत भी दर्ज करवा सकती है। परंतु मन में यह प्रश्न कुलबुलाता है… ‘आखिर कहां हैं वे क़ायदे-कानून, जो महिलाओं के हित में बनाए गए हैं?’ शायद! वे फाइलों के नीचे दफ़न हैं। कल्पना कीजिए – ‘जब एक मासूम बच्ची के साथ दुष्कर्म होने के पश्चात् उसके माता-पिता रिपोर्ट दर्ज कराने जाते हैं…तो वहां कैसा व्यवहार होता है उनके साथ?’ जब संभाल नहीं सकते, तो पैदा क्यों करते हो? क्यों छोड़ देते हो उन्हें, किसी का निवाला बनने हित ? शक्ल देखी है इसकी… कौन इसका अपहरण कर दुष्कर्म करने को ले जायेगा इस बदसूरत को? कितना चाहिए… इससे कमाई करना चाहते हो न… ले जाओ! इस मनहूस को… अपने घर संभाल कर रखो ‘ और न जाने कैसे-कैसे घिनौने प्रश्न पूछे जाते हैं और इल्ज़ाम लगाए जाते हैं …पहले पुलिस- स्टेशन और उसके पश्चात् कचहरी में…वे ऊल-ज़लूल बातें सुन अचंभित रह जाते हैं; उनके पांव तले से ज़मीन खिसक जाती है और लंबे समय तक वे उस सदमे से उबर नहीं पाते। यह सब सुनकर कलेजा मुंह को आता है, जब उस मासूम के माता-पिता को बोलने का अवसर ही प्रदान नहीं किया जाता और वे मूक प्राणी की भांति लौट आते हैंक्षप्रायश्चित भाव के साथ… आखिर क्यों उन्होंने बेटी को जन्म दिया और वह हादसा होने पर उन्होंने पुलिस-स्टेशन का रुख क्यों किया? उम्र-भर वह मासूम कहाँ उबर पाती है उस सदमे से…वे दुष्कर्मी, सफ़ेदपोश बाशिंदे रात के अंधेरे में अपनी हवस शांत कर सूर्योदय से पूर्व लौट जाते हैं अपने घरों की ओर, ताकि दिन के उजाले में वे पाक़-साफ़ व दूध के धुले कहला सकें।

कार्यस्थल पर यौन हिंसा की शिकायत करने वाली महिलाओं को जो कुछ झेलना पड़ता है, कल्पनातीत है। सब उन्हें हेय दृष्टि से देखते हैं, कुलटा व कुलनाशिनी समझ उसकी निंदा व आलोचना करते हैं…यहां तक कि उसके लिए नौकरी करना ही नहीं; जीना भी दूभर हो जाता है। 15अक्टूबर 2019 के ट्रिब्यून को पढ़कर आप हक़ीक़त से रू-ब -रू हो सकते हैं। तमिलनाडु की महिला पुलिस अधीक्षक द्वारा महानिरीक्षक-स्तरीय अधिकारी पर कार्य-स्थल पर उत्पीड़न के आरोपों की जांच को उच्च न्यायालय द्वारा दूसरे राज्य में भेजने का मामला प्रश्नों के घेरे में है, जिनके उत्तर सुप्रीम कोर्ट तलाश रहा है। परंतु इससे क्या होने वाला है? उच्च न्यायालय अपनी अधीनस्थ अदालतों में लंबित किसी मामले या अपील की निष्पक्ष व स्वतंत्र जांच अथवा सुनवाई के लिए मुकदमे या प्रकरण को; धारा 407 के अंतर्गत अपने अधिकार-क्षेत्र में आने वाले किसी भी अन्य ज़िले में स्थानांतरित कर सकता है…और इसी बिनाह पर स्वतंत्र व निष्पक्ष जांच के लिए उसे तमिलनाडु से तेलंगाना स्थानांतरित कर दिया गया। अक्सर कार्य-स्थल पर यौन हिंसा के मामलों में महिला व उसके परिवार को हानि पहुंचाने की बातें कही जाती हैं; उन्हें ज़िंदगी से बेदखल करने के फरमॉन सुनाए जाते हैं तथा उस पीड़िता पर समझौता करने का दबाव बनाया जाता है। इतना ही नहीं, उसे तुरंत कार्यालय से बर्खास्त कर दिया जाता है तथा उसे बदनाम करने की हर संभव कोशिश की जाती है। क्या यह पुरुष वर्चस्व नहीं है, जो समाज में कुकुरमुत्तों की भांति सब पर तेज़ी से अपने वर्चस्व का दायरा बढ़ाता तथा अपनी पकड़ बनाता जा रहा है।

आइए! इसके दूसरे पक्ष पर भी दृष्टिपात करें। आजकल ‘लिव-इन’ व ‘मी-टू’ का बोलबाला है। चंद स्वतंत्र प्रकृति की उछृंखल महिलाएं सब बंधनों को तोड़; विवाह की पावन व्यवस्था को नकार, ‘लिव-इन’ को अपना रही हैं। अक्सर इसका ख़ामियाज़ा महिलाओं को ही भुगतना पड़ता है, क्योंकि कुछ समय के पश्चात् पुरुष साथी ही उसे यह कहकर छोड़ देता है…’तुम्हारा क्या भरोसा… जब तुम अपने माता-पिता की नहीं हुई; कल किसी ओर के साथ रहने लगोगी?’… इल्ज़ाम फिर उसी महिला के सर। वैसे भी चंद महीनों बाद महिला को दिन में तारे दिखाई देने लगते हैं और वह धरती पर लौट आती है। कोर्ट का ‘लिव-इन’ के साथ, पुरुष को ‘पर-स्त्री गमन’ अर्थात् दूसरी औरत से संबंध बनाने की स्वतंत्रता ने हंसते-खेलते परिवारों की खुशियों में सेंध लगा दी है। इसके साथ ही ‘मी-टू’ अर्थात् पच्चीस वर्ष में अपने साथ घटित किसी हादसे को उजागर कर पुरुष को जेल की सीखचों के पीछे पहुंचाने का उपक्रम अर्थात् औचित्य समझ से बाहर है। इसके परिणाम-स्वरूप हंसते- खेलते परिवार उजड़ रहे हैं। इतना ही नहीं, ऐसे हादसों से महिलाओं की  साख पर भी तो आँच आती ही है, परंतु वे ऐसा सोचती कहाँ हैं कि इसका अंजाम उन्हें भविष्य में अवश्य भुगतना पड़ेगा। परंतु पुरुष तो महिला पर सदैव पूर्णाधिकार चाहता है तथा अहं फुंफकारने की दशा में वह उसे घर-परिवार व ज़िन्दगी से निष्कासित करने में तनिक भी ग़ुरेज़ नहीं करता। अंततः मुझे यह कहने में तनिक भी संकोच नहीं कि ‘औरत पहले भी उपेक्षित थी, दलित थी, गुलाम थी और सदा रहेगी, क्योंकि पुरुष की सोच व दूषित मानसिकता में बदलाव आना सर्वथा असंभव है। सतयुग से चला आ रहा यह अनवरत सिलसिला कभी थमने वाला नहीं।’ परंतु अपवाद-स्वरूप चंद भले लोग समाज की रीढ़ होते हैं तथा उनकी सकारात्मक सोच, त्याग व परोपकार आदि शुभ कर्मों पर सृष्टि कायम है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार #43 – नवगीत – बावरे मंजुल नयन भी… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपका एक अप्रतिम नवगीत – बावरे मंजुल नयन भी

? रचना संसार # 43 – नवगीत – बावरे मंजुल नयन भी…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ? ?

शब्द कुंठित हैं सभी अब,

नैन आँसू से भरे।

काँपती काया बहुत ये,

शांत स्वर मेरे डरे।।

 

अब विकल विटपी -विटप भी

बोझ जीवन ढो रहे।

कंटकों से है भरा पथ,

बीज कैसे बो रहे।।

नित्य पलकें भीग जातीं,

अब विपद भी क्या कहें।

मृदु कली कहती गगन से,

क्यों जगत में विष बहे।।

पीर कानन क्या बताएं,

वृक्ष सूखे हैं हरे।

 

स्वर्ण मृग को ढूँढता हैं,

अब मनुज बौरा गया।

ये धरा करती रुदन है,

कर ठगी भौंरा गया।।

मुख चमक फीकी हुई है,

अस्थि -पंजर हो रहे।

मूक भी  कोयल हुई है,

और पंछी सो रहे।।

सब मुखौटे में खड़े हैं,

आदमी चारा चरे।

 

बावरे मंजुल नयन भी,

देखिए घबरा मिले।

मन कबीरा क्या लिखेगा,

मोंगरा कैसे खिले ।।

घोर छाया है तिमिर का

शाम सुख की है ढली।

चाल चलते हैं उजाले,

लक्ष्य भी भूला गली।।

आस की है डोर टूटी,

बोल हम कहते खरे।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- [email protected], [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares