(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “एक दिन की दास्तान…“।)
अभी अभी # 459 ⇒ एक दिन की दास्तान… श्री प्रदीप शर्मा
हर दिन एक नया दिन होता है। अपने साथ एक नई दास्तान लेकर आता है। दुनिया भविष्य के गर्त में छुपी होती है, घटनाएँ अंजाम लेती रहती हैं। दिन परवान चढ़ता रहता है।
अभी सुबह नहीं हुई ! सूरज नहीं उगा। तारीख़ ने दस्तक देना शुरू कर दिया। कैलेंडर ने एक दिन आगे खसका दिया। आज किसी की शादी है, किसी की शादी की वर्षगाँठ है और किसी का जन्मदिन है। सबके लिए यह आज का दिन खुशियाँ लाया है। कितना अच्छा दिन है। ।
अभी आज का अखबार आपके हाथों में नहीं आया। फिर भी आप निश्चिंत हैं। सोशल मीडिया पर आज के शुभ संदेश प्रसारित होने शुरू हो गए हैं। सुविचार और मंगलकामनाएं दिन को शुभ ही बनाए रखेंगी।
आज किसी के घर शहनाई बजेगी। किसी के घर किसी बच्चे ने जन्म लिया होगा। किसी के मन की मुराद पूरी हुई होगी। किसी की नौकरी का शायद आज पहला दिन हो, कोई शायद आज अपना सेवाकाल समाप्त कर रहा हो। यह सब आज के दिन ही तो होना है। रोज यही तो होता है। यही तो इस एक दिन की दास्तान है। ।
दिन किसी के अच्छे लिए अच्छे होते हैं, तो किसी के लिए बुरे भी। बुरे दिन इतिहास में काले दिन के रूप में दर्ज़ किये जाते हैं।
9/11, 26/11 अभी गुज़रे ही हैं। दिन को सब बर्दाश्त करना पड़ता है। दिन कभी अपना चेहरा नहीं छुपाता। वह जानता है स्वर्णिम इतिहास भी वही दिन बनाता है।
आज के दिन की दास्तान अभी लिखी जाना बाकी है। हमारे चेहरे की खुशी, हमारी आशा और विश्वास आज के दिन को एक विश्वसनीय दिन बनाने में कोई कसर नहीं छोड़ेंगे। आज के दिन की दास्तान यादगार हो। एक अच्छे दिन की शुभकामना।
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.“साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है दो मुक्तक… पर्यटन। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
एक आश्रमात शिकला, महाशक्तींना आव्हाने देत समर्थ झाला, दुसरा शिकण्यासाठी वणवण भटकला, महाभागांकडून झालेले अपमान सोसूनही शांत राहिला.
एक विविध स्त्री रूपांना मोहवणारा मुरारी, दुसरा बालब्रह्मचारी.
राजकारण ते रण, दानव ते मानव, गीत ते नृत्य, मुरली ते सुदर्शन असा एक विश्वी विस्तारलेला, दुसरा आळंदीच्या पैसाच्या खांबाशी लेखणीत सामावलेला.
एकाने धर्माची स्थापना-अधर्माचा विच्छेद यासाठी युध्द केले, दुसऱ्याने खलाचे खलत्व संपवण्याचे पसायदान मागितले.
एक एकशेवीस वर्षे जगला, प्रचंड उलथापालथी घडवून, वृक्षाच्या तळाशी प्राणांतिक विध्द झाला.
दुसरा अवघ्या एकवीस वर्षात कार्य आटोपून वृक्षाच्या मुळाशी समाधीत बद्ध झाला.
अशी जीवनकथेत भिन्नता, पण वृत्तीची मात्र एकरूपता. बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण हे ठरवणे अवघड. एक योगेश्वर एक ज्ञानेश्वर. आधी एकाचे विस्तारणे आणि नंतर दुसऱ्याचे मूळ होऊन येणे, की आधी एकाने ज्ञानाचे मूळ लावून दुसऱ्याने त्याचा अर्थविस्तार करणे? जणू एकाने सर्व शक्तीनिशी समुद्र मंथन केले आणि दुसऱ्याने त्यातले अमृत आपल्या मुखी आणून घातले.
किंवा पहिल्याने स्वभावतः, सहजपणे जे केले ते दुसऱ्याने हळुवारपणे उलगडून दाखवले.
गीतेला मऱ्हाठीचा साज चढवताना ज्ञानदेवांनी जो अर्थविस्तार केला, तो अद्भुत आहे. गीतेचे मर्म सांगताना ते स्वतः विविध भूमिका जगले आहेत. ते अर्जुन होतात तेव्हा आपल्याच मनातल्या शंका स-विस्तार विचारतात. स्वतःकडे अडाणीपण घेतात. ते संजय होतात तेव्हा त्यांनाच रोमांच अनावर होतात.
ते भाष्यकाराच्या भूमिकेत जातात तेव्हा स्वतःकडे सानपण घेतात.
गुरूच्या कृपेला, व्यासांच्या प्रतिभेला अन श्रोत्यांच्या जाणतेपणाला श्रेय देऊन मोकळे होतात.
ते कृष्ण होतात तेव्हा मात्र त्याला कुरुक्षेत्रावर जे करता आले नाही ते करतात. ते अर्जुनाला खेंव देतात, त्याच्या चित्ताच्या आरशात कृष्णाला स्वतःला पाहू देतात. होरपळलेल्या अर्जुनाच्या चित्तावर उदार कृष्णमेघ होऊन बरसतात. त्याचा निर्मोही निळा शेला अर्जुनाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेत गुंतू देतात. ते कृष्ण होतात तेव्हा त्याच्या अमानवी, दैवी वाटाव्या अशा कृतीमागचे मानवीपण आपल्याला उलगडून दाखवतात.
त्यांच्या कोवळ्या शब्दांत केवढे समंजस पौरुष दडले आहे!स्त्रीत्वाचा सन्मान, तिचे दुःख, त्यावरचा उतारा, सारं त्या बालयोग्याला किती नीट कळलं आहे!
अचाट पराक्रमाच्या गाथा, उत्कट प्रीतीच्या कथा आणि रणभूमीवरची गीता यातले कृष्ण जणू वेगवेगळेच असतात आपल्यासाठी.
आपल्यासाठी कालियामर्दन म्हणजे केवळ त्याचा अजून एक पराक्रम.
यमुनेच्या डोहात ठाण मांडून बसलेला कालियासर्प गोकुळवासियांचा काळ ठरत होता. यमुनेचे पाणी दूषित झाले होते.. कृष्ण कुठेही नेऊ शकला असता गोकुळाला!किंवा करू शकला असता तह कालियाशी.
पण त्याच्यासाठी यमुना निव्वळ नदी नाही. त्याच्या गोपालांना, त्याच्या गोधनाला पोसणारी त्यांची ती माता आहे. प्रत्यक्ष कृष्णाची तर ती सखी-सहचरी आहे.
कालिया तिच्या जलदेहाला तर विटाळतो आहेच, तिच्या पवित्रतेला नासवतो आहे. तिच्यासाठी हे अपमानजनक आहे. गोकुळाच्या लोकांसाठी तिचं पाणी म्हणजे अमृत होतं. तेच आता विषमय झालं होतं.
त्यामुळे गायी वासरं, मुलं लेकरं तिच्या तीरावर येईनात. पक्षीही तिच्यावरून उडेनात. मग कालियाचा नाश, विषाचे निर्मूलन आणि पुन्हा यमुनेने नांदते होणे. बालरूपातील कृष्णाचा अचाट पराक्रम.. इतके आपल्याला कळते.
पण ज्ञानेश्वर याच्याही पुढे जातात..
काळी सावळी कालिंदी. जीवनाने भरभरून वहाणारी, तिच्या जळांत उत्कट इच्छांची कमळे आणि तिच्या पात्रावरून मुक्त विहरणारे तिच्या स्वप्नांचे पक्षी. त्यांना तिच्यात जणू ‘कृष्णा’ दिसते. मुक्त, आत्मनिर्भर, सतत पुढे जात राहणारी मनस्वी युवती.
तिच्या मुक्ततेला बांध बसलाय कालियाचा, त्याच्या दुष्ट वासनांनी विळखा घालून तिला जखडलं आहे एका जागी. तिच्या वस्त्राला हात घातलाय इतकंच नव्हे, तर तिच्या
स्वाभिमानाला, तिच्या सन्मानाला डंख आहे हा. तिच्या मनात शल्य आहे या अवहेलनेचे. तिला दुःख आहे तिच्या अपमानाचे.
कृष्ण मानवापेक्षा संवेदनशील आहे. सहृदय आहे. त्याला तिची वेदना कळते. शरीराचीच नाही, मनाचीही.
तिच्या उरात काय सलते आहे हे त्यालाच कळते आहे फक्त.
‘हे असंच चालायचं’ म्हणून पाहत बसलेलं गोकुळ, ‘या क्रूर विषारी सर्पाला मारायला कोण धजावेल’ म्हणून मूकपणाने ती वाटच टाळणारे गोकुळ.. या भरल्या गोकुळात तो एकटाच आहे, ज्याला हे जाणवलं.
म्हणून कालिया मर्दनाचं वर्णन ज्ञानेश्वर केवळ पराक्रमाच्या अंगाने करत नाहीत. पराक्रम आणि पराभव या इतकंच महत्वाचं आहे ते प्रयोजन.
कृष्णाने पराक्रम करून कालियाचा पराभव केला त्यामागचा त्याचा हेतू गोकुळाचा पाण्याचा स्रोत शुद्ध करणं इतका मर्यादित असू शकत नाही, हे ज्ञानदेवांना जाणवलं. कालिंदीला दुःखमुक्त करणं, तिच्या हृदयातला सल काढून टाकणं हे कृष्णाचं प्रयोजन आहे.
म्हणूनच असा कृष्ण कृष्णेला तिचा सखा वाटतो. कारण त्यालाच हे समजतं..
तिला वाहू देणं, तिला निर्धास्तपणे उचंबळता येणं हे त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे!
गोकुळाला निर्धास्तपणे पाणी-धुणी करता येणं यापेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं !
त्यामुळेच ज्ञानेश्वर लिहितात,
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें ।
जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।
वासरुवांसाठी लाविलें ।
विरंचीस पिसे ।।
समस्त स्त्री जातीचं ऋण फेडणं सुचवतात ज्ञानेश्वर. तिचं दुःख संपवणं हे तिला मुक्त करणं नाही, तर तिचं ऋण फेडून आपण मुक्त होतो आहोत हे ज्ञानदेवांचा कृष्ण दाखवून देतो.
स्त्रियांबाबत अशी संवेदनशीलता ही आमची परंपरा आहे, ही प्रवाहित व्हायला हवी. असे कान्होबा-ज्ञानोबा जर पावलोपावली उभे रहातील तर हे शल्य मुळापासून उपसून टाकणं अशक्य नाही!
लेखिका : सुश्री विनीता तेलंग
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(काही चुकीचं तर होत नाहीये ना, मांजर पण का बरं अशी मला सोडून जाते! असो, पण कोणीतरी घरात आहे हा विचारच तिला काहीतरी करण्यासाठी उत्साह देत असे.) – इथून पुढे —
एक दिवस सकाळचा नाश्ता ताटलीत होता, पण खायची इच्छाच नव्हती तिला. केरात टाकण्यापेक्षा बाहेर टाकले तर कोणी प्राणी तरी खाऊन जाईल, म्हणून तिने ते ब्रेडचे तुकडे बाहेर टाकले. वळून दोन पावलंच टाकली असतील, नसतील तोवर कसला तरी आवाज आला, म्हणून वळून बघते तर एक चपळ खार त्या ब्रेडच्या तुकड्यांकडे धावत पळत येताना दिसली. कुमुडीचा चेहरा प्रसन्न हसण्याने भरून गेला. हा असा आनंद होता, की तिच्या आतपर्यंत त्या खारीचा आवाज गुंजत होता. ती खार आपल्या छोट्याशा तोंडात मावतील तितके तुकडे भरून घेऊन पळून गेली. परत आली आणि परत तोंडात काही तुकडे घेऊन पळाली. ती परत येईपर्यंत एक रॅकूनचं पिल्लू घाबरत, घाबरत तिथे आलं. मोठे रॅकून माणसांना घाबरवतात, स्वतः घाबरत नाहीत. दुसऱ्यांना घाबरवायची कला अजून हे पिल्लू शिकलं नव्हतं. कुमुडीने घरात येऊन फ्रीजमधून भात काढला आणि एका प्लॅस्टिकच्या वाटीत घेऊन त्याच्या समोर ठेवला. कठड्यावर बसून त्याने तो खाल्लं आणि निघून गेला.
दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळी ते दोघेही हजर झाले. कुमुडीला वाटलं, की दिवसातून एक वेळच त्यांना खायला देणं काही बरोबर नाही. आता जेंव्हा जेंव्हा ती काही खात असेल, तेंव्हा तेंव्हा ती त्यांच्या जागेवर ते खाणं ठेऊन यायची. ते खाणं ठेवल्याबरोबर ते दोघेही कुठून तरी लगेचच प्रगट होत असत, जसं काही तिनं दार उघडून बाहेर येण्याचीच वाट बघत असत. हे असं दिवसातून तीन वेळा न चुकता होत असे. आता तिच्याकडून खाणं मिळण्याची आशा लाऊन बसणारे तीन प्राणी होते, जे प्रेमाने तिच्याकडे बघत असत. असे यायचे, की जणू आमंत्रित पाहुणेच होते, आणि खाऊन झालं की उड्या मारत निघून जात असत. ती त्यांना खायला द्यायच्या वेळी मांजरीला आपल्या बरोबर घेऊन यायची आणि त्यांच्याशी खेळायचा प्रयत्न करायची. त्यांच्याशी बोलायची, त्यांच्या खाण्याकडे एवढं लक्ष द्यायची, की जणू त्यांची दुसरी आईच बनून जायची! हे दोन दिवस तिला अगदी शांत झोप लागली. तिसऱ्या दिवशी तिला आपल्या खिडकीतून डोकावून बघणारं कुत्र्याचं एक गोड पिल्लू दिसलं. बहुधा आपल्या घरातून भटकत वाट चुकून तिच्या घराच्या मागच्या बाजूनं आत आलं होतं.
तिनं त्याच्याकडे काही वेळ दुर्लक्ष केलं. पण तो काही तिथून हलला नाही, भुकेला होता ना!
“ तू जा बघू, मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत, तुझ्या घरचे लोक तुला न्यायला आले, की तू निघून जाशील!”
पण तो एखाद्या अडेलतट्टू सारखा तिथेच बसून राहिला, हललाच नाही.
“वचन दे, की तू जाणार नाहीस, सही करून देणार असशील तर ये. ”
खरोखरच कुमुडीनं दरवाजा उघडून त्याच्या समोर एक कोरा कागद ठेवला. तो घाईने आत आला आणि त्यानं त्या कागदावर आपला पाय ठेवला. ती खुश झाली, जणू कोणीतरी तिची आपुलकी स्वीकारली होती! हे पिल्लू तिचं घर सोडून जाऊ इच्छित नव्हतं. बहुतेक तो जे घर सोडून आला होता, ते असंच दिसत असावं. मांजरीला काही त्याचं येणं आवडलं नव्हतं. ती पाळत पाळत येऊन सारखी कुमुडीला चिकटत होती. पण कुमुडी तिला समजावत राहिली—“ तू त्याच्या बरोबर खेळायचंस, मग तो तुझा मित्र होईल. ” तिने चेंडू फेकला, की ते पिल्लू धावत जाऊन तो घेऊन यायचं. हळू हळू मांजरी पण त्या खेळात सामील झाली.
आता कुमुडी होती आणि हे चार प्राणी होते. खार दिवसातून तीन वेळा बरोबर ठराविक वेळेला हजर होत असे. पाहिली वेळ तीच होती, जेंव्हा पहिल्यांदा कुमुडीने ब्रेडचे तुकडे टाकले होते आणि भटकत भटकत येऊन तिने ते खाल्ले होते. कशी ती वेळ त्या एवढ्याशा मेंदूत पक्की बसलेली होती, कोणजाणे! रॅकून तर एरवी कचऱ्यात पडलेलं खाणंच खायचा, पण तोही बरोबर त्याच वेळी कुमुडीकडे यायचा, जेंव्हा तिने पहिल्यांदाच वाटीत भात आणून दिला होता. त्यांना ना घड्याळाच्या काट्याची जाणीव होती, ना वेळेची पण खायला देणाऱ्याची ओळख, पारख त्यांना बरोबर होती! माणसापेक्षा प्राणी जास्त निष्ठावान असतात, हे ऐकलेलं होतं, पण आता या चार प्राण्यांच्या आपलेपणाने ते सिद्ध झालेलं होतं.
ते आपापल्या वेळी यायचे, तिच्याकडे बघायचे, आपलं खाणं घ्यायचे आणि काहीतरी आवाज काढत निघून जायचे, जसे काही तिला आशीर्वाद देत असत. निदान, कृतघ्न तर नक्कीच नव्हते ते. तिच्या मनात विचार यायचा, जेंव्हा तिचा मृत्यू होईल, तेंव्हा किमान या चार जणांचे अश्रू तरी नक्कीच तिला खांदा देतील! मांजरी, खार, रॅकून आणि कुत्र्याचं पिल्लू या सर्वांचं मिळून तिचं एक कुटुंब तयार झालेलं होतं. दोघे घरात रहात असत आणि दोघे पाहुण्यांसारखे येत आणि निघून जात.
आता न्यूझीलंडला जाणं बंद झालेलं होतं. पेन्शनच्या पैशांवर निर्वाह तर होतंच होता, शिवाय बचतही भरपूर होत होती. तिच्या मनात आता या कुटुंबाची चिंता होती, की माझ्यानंतर यांचं काय होईल? तिला मृत्युपत्र तयार करायचं होतं, की ती गेल्यानंतर तिने मिळवलेला पैसा, तिचं एवढं मोठं घर, गाडी सगळं काही यांच्या पालन पोषणासाठी वापरलं जावं. आपल्या भावा-बहिणींना जसं तिने घर दिलेलं होतं, तसंच यांच्यासाठीही एक घर द्यायचं होतं तिला. निदान या चार जणांना तरी तिची अनुपस्थिती जाणवली, तरी तिचं जीवन सफल झाल्याचं समाधान तिला लाभणार होतं. या सगळ्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेमच प्रेम होतं. कुमुडीच्या डोळ्यात त्या मुक्या प्राण्यांसाठी आणि त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यात कुमुडीसाठी!
प्रथम जेंव्हा पशु-पक्षी विहाराची सुरुवात झाली, तेंव्हा त्यामागची ही कथा ऐकून खूप देणग्या मिळायला लागल्या. आज “कुमुडी” या नावाने असे अनेक पशु-पक्षी विहार स्थापले गेले आहेत, ज्यांमध्ये असंख्य मुक्या प्राण्यांना आसरा मिळालेला आहे. या आपल्यांशी बोलणारी कुमुडी आता मुकी झालेली आहे. फोटोंमधेच आता तिचं अस्तित्व कैद झालेलं आहे. पण आजही ती त्या मुक्या प्राण्यांशी त्यांच्याच भाषेत बोलते. तिचं स्वतःचं शून्याचं वर्तुळ आता खूप मोठं झालेलं आहे. ते सांगत आहे, की शून्याचं वर्तुळ नेहमीच शून्य नसतं, आतून पसरत गेलं तर त्यात एक नवं जग वस्तीला येतं.
कथा संपताच माझ्या आत कसली तरी चुळबुळ जाणवू लागली मला. माझे हात आपोआप समोरच्या देणगीच्या खोक्याकडे वळले. माझ्या मित्राचाही ऑडिओ ऐकून झाला होता आणि त्याचे हातही त्याच्या पैशांच्या पाकिटाकडे गेले होते!
☆ सरणावर टाकलेलं चारित्र्य… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
सोमवार संध्याकाळची वेळ होती. पुण्यात पाऊस अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याचं कर्तव्य बजावत होता. एक पालक भेटायला येणार होते, पण अजून पोचले नव्हते. मी टेबलाशी बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचं “अरे संस्कार संस्कार” वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिनं तिच्या स्मार्टफोन वर एक व्हिडिओ मला दाखवला. तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात बांगलादेश चा राष्ट्रध्वज आणि दोन्हीं हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी वीरासारखी तो नाचवत होता.. !
तो व्हिडिओ मेंदूऐवजी आधी मनातच घुसला. काही क्षण तर आपण नेमकं काय पाहतो आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी आठ दहा वेळा वारंवार पाहत राहिलो. जल्लोष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो.
साधारण पंचविशीचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ७६ वर्षं वयाच्या आपल्या देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचं कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रं काढून घेऊन ती अत्यंत उन्मादानं कॅमेऱ्यासमोर नाचवतो.. ! तो व्हिडिओ पाहताना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होतं अन् दुसऱ्या बाजूला विलक्षण संताप होत होता.
त्याच लिंकवर आणखी फोटो दिसायला लागले. काही तरुण अत्यंत आनंदानं पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचें ब्लाऊजेस दाखवत होते.. ! विशेष म्हणजे, यात बांगलादेशी तरुणीदेखील सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना ह्या कृत्याची किंचितही लाज वाटली नाही आणि त्यात काही गैर आहे असंही वाटलं नाही.. !
बांगलादेशातली राजकीय धुमश्चक्री मीही इंटरनेटवरुन पाहत होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेशचं निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होतं. बांगलादेशातली उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार आणि बांगलादेशातले अल्पसंख्य नागरिक त्यांचं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरं काखोटीला मारुन जगभर निर्वासित म्हणून फिरणार, हे सगळं कळत होतं. बांगलादेशातले एक कोटी हिंदू रहिवासी नागरिक आता काय करतील, हा प्रश्न गेल्या काही दिवसांत हजारदा मनात येऊन गेला असेल.. !
पण हे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि जाणवलं की, या अल्पसंख्य हिंदूंमधल्या स्त्रिया अन् मुलींचं काय होईल ? “जीव वाचवायचा असेल तर शीलाला तिलांजली द्या” असा प्रकार सुरु झाला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथं नग्नसत्य बनून उभी आहे.. ! सच्चिदानंद शेवडे गुरुजींचं “रक्तलांच्छन” हे पुस्तक तरुणांनी तर वाचावंच, पण त्याहीपेक्षा पालकांनीच वाचणं अधिक गरजेचं झालं आहे.
राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कट-कारस्थानं असू शकतात, हे सगळं मान्य. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणं आणि तिथं धुडगूस घालणं, फर्निचर पळवून नेणं हे खरोखर चुकीचं असलं तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात “जनक्षोभ” असं गोड नाव दिलेलं असल्यामुळे त्यातला सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे.
पण देशातल्या तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बीभत्स विटंबना करणं, हे आता काहीतरी भलतंच सांगू पाहतंय.. ! ह्या तरुणांच्या आयांना, बहिणींना, आत्यांना, मावश्यांना, माम्यांना हे फोटो बघून काय वाटलं असेल हो ? धर्म कुठलाही असो, पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीनं जाहीर वासलात लावणं, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारं आहे ?
आपल्या देशात हे घडलं असतं आणि अशा तरुणांवर गुन्हा दाखल झाला असता तर काय झालं असतं ? सगळ्यात पहिलं म्हणजे, घटना घडल्यानंतर चार पाच दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना नराधम वगैरे म्हटलं असतं, दिवसरात्र महाचर्चांची गुऱ्हाळं चालवली गेली असती, शे दोनशे सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सह्यांची मोहीम केली असती आणि आठ दहा नामांकित वकिलांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून सनसनाटी घटना घडेपर्यंत मीडियाचा तोफखाना सुरु राहिला असता. पंधरा दिवसांनी समाजच हा विषय विसरुन गेला असता. आजवर हे असंच घडत आलेलं आहे. पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेतो आहे.. ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून सुरु झालेलं वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुध्दा पायदळी तुडवत सुटलं आहे.
“पद्धतशीर विसंवेदन” नावाचं एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसं केलं जातं, याचं हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून ते समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणलं जातं. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. “आता नैतिकता आणि चारित्र्यापेक्षा आमची भावना महत्त्वाची” याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रात तर याची सुरुवात केव्हाच झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ते आनंदानं स्वीकारलं आहे. मराठी “कॉमेडी शो” ने या प्रकरणाचा शुभारंभ केव्हांच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे हा तर उघड स्वैराचार चालला होता. “ह्याला विनोद म्हणा” असा आग्रह जर शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांच्यासमोर धरला असता तर ही माणसं झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्यानं सांगायला नको. पुरुष कर्मचाऱ्याने ऑफिसात परकर परिधान करून जाणे, स्त्री ला जाहीर मुलाखतीत “पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता” असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे “थंडीत तुझी कोळंबी होते” असं म्हणतो, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्याचा प्राजक्ता माळी आणि प्रसाद ओक वन्स मोअर देतात, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये अंकिता वालावलकर ” रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बॉयफ्रेंड अचानक कार थांबवून रस्त्यात उतरला आणि मूत्र विसर्जन करु लागला. “मी प्रकाशात पाहिलं तेव्हा कळलं की केवळ ह्याचा मेंदूच छोटा नाहीय” असं म्हणते, मराठी माणसांना तो विनोद वाटतो… !
आता ‘विनोद असेच असतात’ असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल तर ते स्वाभाविकच आहे. कारण, विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येतो आहे. समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे, हे आपणच लक्षात घेण्याची गरज आहे.
एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेधही करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून जास्त धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालतो आहोत, ह्याचा विचार कुणी करायचा?
“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे” असे समर्थांनी म्हटलेलं आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे? आणि कशासाठी?
आज बांगलादेशातल्या तरुण आंदोलकांनी चारित्र्याच्या बाबतीत जी नीच पातळी गाठली आहे, तिचं लोण जगभर पसरणार नाही, ह्याची कुणाला खात्री आहे? राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात, पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. केतकी चितळे ला महाराष्ट्रात ज्या भाषेत ट्रोल केलं गेेलं आहे, त्यात हे नैतिकतेचं पारडं पार गंजून खलास होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसलेलं आहे.
समाजातल्या तरुण वर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. त्या धगीचे चटके बसत असतानाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचं वारं आणखी भर घालत सुटलं आहे, हे काळजीचंच लक्षण आहे.
कुटुंबांचा आपल्या घरातल्या तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का, असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. आपली मुलं मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, हे सगळं खरं. पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचं काय, असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणासोबत फिरतात, कुणाच्या सहवासात असतात, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे, या सगळ्यांची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? आपली मुलं स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात, हे पालकांना माहित असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरं समाजानं सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तिला, ऊर्जेला नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणं ही केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज आहे. कुटुंबव्यवस्थेनं तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवलं नाही तर, आज बांगलादेशातले फोटो दिसतायत, उद्या आपलीही मुलं त्याच गोष्टी करताना दिसली तर, त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल…!
आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक- सांस्कृतिक- नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणं, भावनांवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थाचा बळी होऊ न देणं ही कौशल्यं केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुण पिढीला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर या सगळ्याचे फार भीषण परिणाम सगळ्यांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल असं वाटत नाही.. !