☆ सहज सुचलं म्हणून…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
मनुष्याच्या जडणघडणीत अनेक गोष्टी आपली महत्वाची भूमिका बजावत असतात. यातील अनेक गोष्टींचा प्रभाव मनुष्याच्या मनावर दीर्घकाळ राहू शकतो, त्याला प्रभावित करू शकतो, नव्हे करतोच करतो…
प्रत्येक मनुष्याचे आयुष्य, जीवन म्हणजे कंगोऱ्यांची वाटी म्हणता येईल. कंगोऱ्याची आत गेलेली बाजू जर दुःख मानली तर बाहेर आलेली बाजू सुख मानावी लागेल. प्रत्येकाच्या वाटीला असे कंगोरे कमीअधिक प्रमाणात असतात.
मनुष्याला प्रभावित करणारे अनेक पैलू आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा त्यातील एक महत्वाचा मानला जातो.
एक मनुष्य होता. त्याला दोन मुले होती. दोघेही दहावीला होते. एक मुलगा नापास झाला तर दुसरा शाळेत पहिला आला. पत्रकारांनी त्या दोघांची मुलाखत घेतली तेव्हा दोघांनी एकच उत्तर दिले की माझे बाबा वारले म्हणून माझा शाळेत पहिला क्रमांक आला आणि माझे बाबा वारले म्हणून मी नापास झालो. घटना एकच आहे पण दोघांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याचात्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव दर्शवित असतो….
एकाने असे ठरवले असेल की आता माझे बाबा नाहीत, मी चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून दाखवले तर माझ्या बाबांना आनंद होऊ शकेल, त्याने तसा प्रयत्न केला आणि भगवंताने त्याला त्यात यश दिले…..
आणि दुसऱ्याने…… ?
दृष्टी पेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. दृष्टी तर प्रत्येकाला असते पण जो मनुष्य विवेकाने आपला दृष्टिकोन बदलतो, तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते….. !
जगात अनेक घटना घडत असतात, कधी त्यातील एक घटना आपल्या आयुष्यात घडते, ती आपली परीक्षा असते…. ! परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा की घाबरून परीक्षा न देण्याचा निर्णय घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे ?
(पॅरॅलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. नंतरही कधी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची साधी चौकशीही केली नाही. विचार करा…) – इथून पुढे —
या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं?या सात वर्षात कधीही आपण टुरला नाही गेलो. अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही. या सात वर्षात अण्णा चार वेळा हाॅस्पिटलमध्ये ॲडमीट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की ‘शिरीष किती बिल झालं?आम्ही काही मदत करु का तुला?’अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का?अण्णांनी केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलं, मोठं केलंय मग त्यांची काही जबाबदारी नाही का?तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कोणती पध्दत?निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला. त्याचं मला वाईट वाटत नाही. पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा”
शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरुन जात होता. काय चुकीचं बोलत होती ती?आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषलाही ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला.
” तुझं म्हणणं बरोबर आहे गं, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे असायला हवं ना?जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा, गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खुप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा “
नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली
“तसं असू शकतं. पण मन मात्र मानत नाही हेच खरं “
रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बैचेन होत होता.
दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हां तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भुतकाळात जायचा. त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ होत होता. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसत होते. एकदा भावांकडे जाऊन जोरदार भांडणं करावं असंही त्याला वाटू लागायचं पण अण्णा गेल्यावर आणि त्यांनी केलेल्या मृत्युपत्रांनतर बोलण्यासारखं आता काहीही राहिलेलं नाही हे त्याच्या लक्षात यायचं.
आठदहा दिवसांनी रविवारी सकाळी तो नाश्ता करत असतांना रणदिवे वकीलांचा फोन आला
” शिरीष घरी आहेस का?यायचं होतं जरा बोलायला”
“हो या ना. का हो काका काही विशेष काम?”त्याने धास्तावून विचारलं
“अरे काही नाही जरा बोलायचं होतं. मी आलो की सांगतो सर्व”
“या या मी घरीच आहे”
शिरीषच्या पोटात खड्डा पडला. निर्मल आणि गुणवंतने वकीलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना?दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहित होतं.
अर्ध्या तासातच वकीलसाहेब घरी आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं
त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली. शिरीशचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं
” तुला माहितच असेल शिरीष की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत”
“हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खुप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता”
वकीलसाहेब हसले
“नाही. त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही”
“अच्छा!पण या सगळ्याचा आता काय संबंध?”
” तुला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअरब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली. तीन महिन्यांपुर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना सांगू नये आणि त्यांच्या मृत्युनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतील आणि नाही दिला तर कोर्टकचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत अशी त्यांना भिती वाटत होती”
“पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर अण्णांनी शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितलं?”नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं
वकीलसाहेब क्षणभर शांत बसले. मग आनंदाने ओरडून म्हणाले
” अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत”
“आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे” वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईल मधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले.
” ते ठिक आहे काका पण या शेअर्समुळे काही लिगल प्राॅब्लेम्स तर येणार नाहीत ना?अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर?”शिरीषने काळजीने विचारलं.
“तशी शक्यता फार कमी आहे. कारण तीन महिन्यापुर्वीच आणि शेवटचं मृत्युपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररीत्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते. आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपुर काही दिलं आहे. तरीसुध्दा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलेब्रेट. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली”
“कोणती?”
” अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राध्दाला व्रुध्दाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस”
” जरुर देईन काका”
वकीलसाहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येतायेता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला
” तू म्हणत होतीस ना नेहा की आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून?बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही” हे म्हणता म्हणता त्याच्या आणि नेहाच्या डोळ्यातून कधी अश्रू वाहू लागले हे दोघांनाही कळलं नाही.
‘तरीही मी मतदान केलेच ‘. अनेक अडचणी आल्यात तरी सांगायचं आहे मला,
‘तरीही मी मतदान केलेच’. खरंच ऐका आता माझ्या अडचणी.
मी पण या देशातच रहाते आणि इथे लोकशाहीच आहे. या लोकशाहीतच घडलेला माझा खराखुरा अनुभव मी मांडणार आहे. सगळे जण सारखं सांगताहेत सध्या ‘मतदान करा मतदान करा ‘ म्हणून ! माझाही एक अनुभव जरूर वाचा सख्यांनो.
आम्ही आमच्या सोसायटी साठी जागा विकत घेतली नियमाप्रमाणे ले आऊट पाडून मंजूर केले. नकाशा मंजूर केला व त्यावर घरे बांधलीत. सोसायटीने ६० फूट डेव्हलपमेंट रोड पण आपल्या जागेतून सोडला जो आजूबाजूच्या सोसायट्यांशी संलग्न आहे. सगळे बँकेत असल्याने आपपल्या बदलीच्या गांवी होते दरम्यान त्यावेळचा मनपा इंजिनियर, नगरसेवक व R L T सारख्या अकोल्यातील नामवंत कॉलेजमधील एक प्राध्यापक -बिल्डर यांनी संगनमताने ६० फूट डी पी. रोडवर घरे बांधायला सुरवात केली. इथे जे मोजके रहायला आले होते त्यांनी त्यांच्या बांधकामाची रेघ आखली तेव्हापासून विरोध केला व कोर्टात गेले. मनपाकडे तक्रार दिली तरी उपयोग झाला नाही. मनपाने त्यांच्या विरुद्ध नोटिसेस् काढल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. मनपाने कुठलीच कारवाई केली नाही. कारवाई केली नाही याचाच दुसरा अर्थ संरक्षण दिले असाच निघू शकतो. केस चालू असतानाही पूर्ण रस्ता बंद केला या नागरिकांनी. तरी मनपातर्फे कुठलीच कारवाई झाली नाही. माझ्या प्लॉट मधून सगळ्या नागरिकांना, मी विरोध केला तरी जबरदस्तीने रस्ता पाडून दिला. ३५ वर्षे झाले केस लढतोय. जिंकलो आहे. पण कारवाई केल्याच जात नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या पाठीशी आहेत.
आता तर इतक्या वर्षांपासून मंजूर असलेल्या लेआऊट मधील येवढा मोठा रस्ताच कॅन्सल करून पूर्ण डेव्हलपमेंट रोडचा प्लान बदलून टाकला असल्याचे कळले. पुणे टाऊन प्लॅनिंग मधून मंजूर केलाय असे सांगण्यात
आले. चोर चोर मौसेरे भाई झाले सगळे. इलेक्शन पूर्वी लगबगीने हे काम केल्या गेले. अवैध वस्त्यांची गठ्ठा मते मिळावीत म्हणून. ही लोकशाही आहे की ठोकशाही ! तुम्हीच सांगा सख्यांनो. न्यायालयाचं सूत्र आहे ‘ १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला फाशी कायला नको ‘ सुटलेत नं इथे १०० गुन्हेगार ! १०० गुन्हेगारांना तर सोडलंच पण एका निर्दोषाला फाशी पण झालीच आहे. व्यक्तिशः माझी व माझ्या सोसायटीतल्या लोकांची अवस्था कशी आहे सांगू का सध्या ? ” वाघाने शिकारीसाठी हरिणीची मान पकडलीय. ती शेवट पर्यंत सुटण्याची धडपड करतेय. पण शेवटी तिलाही कळलंय की आपण मरणारच आहोत “अशी आहे.
तुम्हीच सांगा आम्ही मतदान करायचे का?
तरी पण मी मतदान केले आहे. पण ठप्पा मारल्यावर खूप रडले आहे.
☆ आगळं वेगळं — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
एक आटपाट नगर होतं. तिथे एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता…
… चमकलात ना वाचून?
कारण आपण आत्तापर्यंत सर्व कथाकहाण्यांमध्ये “तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता” हेच शब्द ऐकत-वाचत आलो आहोत. त्यामुळे “श्रीमंत ब्राह्मण” हे विरोधाभासी शब्द कानांना देखिल नाही म्हटलं तरी खटकतातच !!
🤣🤣
“नावडतीचं मीठ अळणी” ही मराठीतील म्हण किंवा वाक्प्रचार आपण अनेक वेळा ऐकलाय. पण हीच म्हण खूप जुन्या मराठी गोष्टींमध्ये वेगळ्या प्रकारे वापरली गेलेली तुम्ही वाचली आहे कां?
आवडतीचं मीठ गोड आणि नावडतीचं मीठ अळणी
किंवा
आवडतीचं मीठ गोड आणि नावडतीची साखर खारट
🤣
एका डांसानं डांसीपासून डायव्होर्स घेतला, कारण ती अंगाला ओडोमस लावून झोपायची !!
😗
बहुतेक सर्व खेडेगावांचे दोन भाग पाडलेले असतात. “खुर्द आणि बुद्रुक”.
यातला बुद्रुक हा शब्द व्यवहारांत साधारणपणे दुय्यम दर्जाचा, किरकोळ, दुबळा, हडकुळा, मरतुकडा या अर्थी वापरला जातो, कारण त्याचा उच्चारही तसाच, म्हणजे काहीसा दळिद्रीच आहे! त्यामानाने खुर्द हा शब्द थोडा ठसकेबाज आहे.
पण प्रत्यक्षातले अर्थ मात्र पूर्णपणे उलटे आहेत! खुर्द म्हणजे खुर्दा, चिल्लर. आणि बुद्रुक म्हणजे महान, मोठा, महत्वाचा.
😗
चपल-अचपल हे शब्द सुद्धा असेच. चपल म्हणजे चटपटीत, गतिमान. अचपल म्हणजे संथ, स्थिर, स्थाणु. हे शब्द देखील कधी कधी उलट अर्थी वापरले जातात. समर्थांनी सुद्धा चपळ याअर्थी अचपळ हा शब्द वापरलेला दिसतो.
“अचपल मन माझे नावरे आवरीता”.
🤔
अडगुलं मडगुलं,
सोन्याचं कडगुलं,
रुप्याचा वाळा,
तान्ह्या बाळा
तीऽऽट लावू…
तान्ह्या बाळाच्या कपाळावर, गालावर काजळाची गोल तीट लावतांना त्याची आई नेहमी या ओळी गुणगुणते. ही तीट गोल कशी हवी? आडासारखी, माडासारखी, कड्यासारखी, वाळ्यासारखी. मूळच्या ओळींचा अपभभ्रंश होऊन वरच्या ओळी निर्माण झाल्या. मूळच्या ओळी अशा :-
आड (विहीर) गोल
माड (नारळाचं झाड) गोल
सोन्याचं कडं गोल
रुप्याचा (चांदीचा) वाळा (गोल)
तान्ह्या बाळा तीट लावू..
😗
पां, पै, बा, गा, भो, जी…
ही आणि अशी इतर काही निरर्थक एकाक्षरे आपल्याकडच्या संतांनी, कवींनी त्यांच्या ओवी, अभंग, काव्यांमध्ये वापरलेली दिसतात, ती केवळ मात्रा दोष सुधारण्यासाठी. अन्यथा त्या अक्षरांना काहीच अर्थ नसतो.
“भो” म्हणे “जी” आपणिकासी
नेत्री पाणियाच्या रासी
पृथ्वी दाहे करोनि जाळिली
तोडिली झाडली “पै” भूती
संकष्ट चतुर्थी व्रत सदा
न सोडी मी जाण “पां”
कां “गा” तुला माझा
न ये जिव्हाळा “बा”
🤔 🤔 🤔 🤔
शोधक, संग्राहक : सुहास सोहोनी
रत्नागिरी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान क्रूरकर्मा हिटलरने, त्याच्या एका वैयक्तिक अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून असंख्य ज्यू लोकांचा अनन्वित छळ सुरु केला होता. त्यामुळे अनेक ज्यूंना अत्यंत असुरक्षित अवस्थेत भूमिगत होऊन कित्येक महिने कसंबसं जगावं लागलं होतं. फ्रँक कुटुंब हे त्यातलेच एक दुर्दैवी कुटुंब आणि ॲन ही त्या कुटुंबातली सगळ्यात लहान मुलगी — जेमतेम १३ वर्षांची…. शाळा, मित्र-मैत्रिणी, खेळ, हिंडणेफिरणे या त्या वयातल्या सगळ्या आवश्यक गरजांना मुकावं लागलेली…. पण अशाच अवस्थेत रहावं लागलेल्या इतर समवयस्क मुलींपेक्षा खूपच वेगळी असणारी….. बोलण्याची अत्यंत आवड असणाऱ्या या मुलीने त्या अज्ञातवासात मग तिला १३व्या वर्षी वाढदिवसाला मिळालेल्या डायरीला आपली मैत्रीण.. तिच्या सुखदुःखाची साथीदार बनवले. आणि ती रोज डायरी लिहायला लागली – एखाद्या मैत्रिणीशी बोलावं अशा भाषेत…. नाझींच्या तावडीत सापडू नये म्हणून १९४२ साली गुप्त घरात लपून बसलेले फ्रॅन्क कुटुंब व आणखी चार मित्र असे आठ जण, युद्ध संपेल व पुन्हा आपले जीवन सुरळीत होईल या एकाच आशेने कसे रहात होते, याचे वर्णन त्या १३ वर्षाच्या मुलीच्या शब्दात या डायरीत वाचायला मिळते.
सौ. मंजुषा मुळे
ॲनाची डायरी तिच्या सात्विक, शुद्ध मनाची साक्ष आहे. आणि म्हणूनच तिने या डायरीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. एकाच वेळी तिच्यातली एक लहान निरागस मुलगी.. आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणारी….. तरीही सगळ्या परिस्थितीकडे आणि स्वतःकडेही तटस्थपणे पाहणारी ही एक वेगळीच मुलगी …. तिने केलेल्या काही नोंदी इथे सांगायलाच हव्यात अशा आहेत….. उदा.
“ आम्ही ज्यू आहोत. ज्यू लोकांवर अनेक कडक बंधने आहेत. तरी आमची आयुष्ये पुढे सरकत होती.
डॅडी म्हणाले, आपल्याला आता लपून रहावे लागेल. असे भूमिगत होताना नेमकं काय वाटतं ते मला अजून नीटसं कळत नाही. आपण स्वतःच्या घरात राहतोय असं वाटत नाही. आपण सुट्टीत रहायला आलोय असं वाटतंय. ही इमारत एका बाजूला कललेली, कोंदट, दमट आहे. तरी लपण्यासाठी सोयीची आहे. माझी बहिण मार्गारेटला खोकला झालाय. पण तिच्या खोकल्यावर बंदी म्हणून तिला कोडेइनच्या स्ट्रांग गोळ्या चघळायला दिल्यात. “
“ आम्ही इथे लपलो आहोत हे कुणाला कळले तर ते आम्हाला गोळी घालून ठार मारतील या विचारानेच थरकाप होतो. खालच्या गोदामातल्या लोकांना ऐकू जाईल या भीतीने दिवसासुद्धा आम्ही दबकत
कामे करतो. ” — इतका थरार, इतका त्रास, इतकी मानहानी अनुभवत असताना झालेली ॲनाची ही भावनांची अभिव्यक्ती चटका लावते.
ती लिहिते, ” डॅडी कुटुंबाचा इतिहास सांगतात. ते ऐकणं हा मनोरंजक अनुभव आहे. ’ इन झाॅमर झोथेइड ‘ हे विनोदी पुस्तक आठवून मला हसायला येते. ”
“ वॅनडाॅन आन्टीची सूपची प्लेट माझ्या हातून फुटली. त्या माझ्यावर इतक्या रागावल्या. मम्मीही माझ्यावर खूप रागावली. ”
“ मोठी माणसे क्षुल्लक कारणावरून का भांडतात ?. माझी कुठलीच गोष्ट बरोबर नाही असं त्यांना का वाटतं? मला त्यांचे कठोर बोलणे, ओरडणे शांतपणे सहन करावे लागते. माझे हे सगळे अपमान मी सहन करणार नाही. सहन करायची सवय करून घेणार नाही. मीच त्यांना शिकवायला सुरवात करणार.”
“ मम्मी अतिशय चिडखोर आहे. डॅडी आणि मम्मी मार्गारेटला कधीच ओरडत नाहीत. तिला कसला जाब विचारत नाहीत. माझ्यावर मात्र प्रत्येक गोष्टीत ओरडत असतात. “
या लिखाणातून तिची बालिश निरागसता, आणि तडफ मनाला भावते.
ती सांगते … “ इथे आल्यापासून आम्ही पावट्याच्या आणि फरसबीच्या इतक्या बिया खाल्ल्यात की आता मला त्या बिया नजरेसमोर ही नकोत असं झालंय. त्या बियांच्या नुसत्या विचारानेच मला आजारी वाटायला लागतं. संध्याकाळच्या जेवणात आम्हाला ब्रेड मिळत नाही. आता माझ्याकडे बूटांची एकही जोडी शिल्लक नाही. बर्फावर चालायचे बूट आहेत पण त्याचा घरात काय उययोग? “
“ पुढच्या महिन्यात आम्हाला आमचा रेडिओही द्यावा लागणार. ज्या घरात लोक लपून राहिलेत तिथे जाणूनबुजून अधिकाऱ्यांचे रेडिओमुळे लक्ष वेधून घेणे हे धाडस कुणी करू शकणार नाही. ”
“आणि आता रेडिओवरचा कार्यक्रम अगदी नकोसा, केविलवाणा वाटतो. एका जखमी सैनिकाचे संभाषण प्रसारित झाले. ते ऐकून त्या सैनिकाची इतकी दया वाटत होती. पण त्या सैनिकांना जखमांचा अभिमान वाटतो. एका सैनिकाला हिटलरशी हस्तांदोलन करायला मिळाले या गोष्टीने गहिवरून आले. (म्हणजे त्याचे हात शाबूत होते) काय म्हणायचं या सगळयांना.“
“जर्मनीवर भयंकर बाॅम्बहल्ले होत आहेत. मात्र वाॅनडाॅन अंकल यांना पुरेशा सिगरेटी मिळत नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत.”
– – अशा छोट्या छोट्या पण मन विचलित करणाऱ्या गोष्टींच्या नोंदी तिच्या डायरीत आहेत.
कधी तिच्या स्वप्नात तिची मैत्रिण लीस येते. तिचे मोठे डोळे तिला खूप आवडायचे. पण तिला लीसचा सुकलेला चेहरा आणि तिच्या डोळयातले दुःख दिसते. ‘ या नरकातून माझी सुटका कर ना ‘ असंच जणू ती सांगते….. ॲना तिला त्या डायरीतून सांगते, ” लीस, युद्ध संपेपर्यंत तू जगशील. मी पुन्हा तुझ्याशी मैत्री करीन. देवा तू तिच्या पाठीशी उभा रहा. तिचं रक्षण कर. “….
… आणि ती मनात म्हणते, ” खरं तर मलाच काही भविष्य नाही. “
ती स्वतःचेही परीक्षण करते…… “ १९४२ साली मी काही पूर्ण आनंदी नव्हते. पण शक्य झालं तेवढा आनंद मी उपभोगीत होते. एकटं पडल्यासारखं वाटायचं पण दिवसभर काही ना काही काम करत रहायचे. मला वाटणारी निरर्थकता दूर करण्यासाठी विनोद, खोड्या करत असे…. पण माझ्या आयुष्याची गंभीर बाजूही
आता सतत माझ्याबरोबर असते. रात्री अंथरुणावर पडते तेव्हा देवाला म्हणते, ” देवा, या जगात जे जे चांगलं आहे, सुंदर आहे त्या सर्वांसाठी मी तुझी आभारी आहे.”
… “मी फक्त दुःखाचा व हाल अपेष्टांचा विचार करत बसत नाही. याउलट सौंदर्य कुठे आणि कसं टिकून आहे याचा विचार करते…. कधीतरी हे भयंकर युद्ध संपेल. आम्ही पुन्हा सर्व सामान्य लोक असू…. फक्त ज्यू नाही… कुणी लादलं हे सर्व आमच्यावर. ? कुणी ठरवलं ज्यू इतरांपेक्षा वेगळे आहेत?”
“युद्ध संपल्यावर माझी पहिली इच्छा असेल की मी परत डच व्हावं. डच लोकांवर माझे प्रेम आहे. या देशावर मी खूप प्रेम करते. ही भाषा माझी आवडती आहे. जोपर्यंत माझे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. ”
“ मी एक स्री आहे याची मला जाणीव आहे….. अशी स्री जिच्याकडे कणखर मन आहे, भरपूर धैर्य आहे. जर देवाने मला जिवंत ठेवले तर मी प्राधान्याने धैर्य, आनंद, समाधान मिळवायला शिकले पाहिजे. “
या पुस्तकाबद्दल काय आणि किती लिहू ? यातले प्रत्येक पान झपाटून टाकते. या इतक्या छोट्या मुलीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबरोबरच त्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचंही सविस्तर वर्णन तिच्या वयाला अनुसरून केलेलं आहे. एखाद्या प्रौढ माणसाच्या बाबतीतही अशक्य ठरणारे विचार ही जेमतेम १३ वर्षांची मुलगी मांडते …. अतिशय तटस्थपणे स्वतःचंच परीक्षण करते …तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अत्यंत सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेली, वयाच्या मानाने खूपच विचारी, संवेदनशील आणि त्या काळात अपेक्षित नसणारा दुर्दम्य आशावाद बाळगणारी, पण अत्यंत दुर्दैवी आणि अल्पायुषी ठरलेली ॲना या डायरीतून समोर ठाकते आणि वाचकाच्या मनाला कायमचा चटका लावते.
जगातील ३१ भाषांमधे ह्या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. कारण ही अनुभूती आहे. यात काल्पनिक काहीच नाही. जे घडत होतं ते भयंकर, थरारक असूनसुद्धा एका १३ वर्षाच्या मुलीने साक्षीभावाने ते लिहिले आहे. यात तिचा निरागस निष्पापपणा आहे. तिच्या तारुण्यसुलभ भावनाही यात व्यक्त होतात.
त्याही परिस्थितीत आनंद शोधण्याची तिची वृत्ती दिसून येते.
‘ द फ्री नेदरलॅन्डस ‘ सारख्या संस्थांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून भूमिगतांना मदत केली.. त्यांच्याबद्दलची अपार कृतज्ञता तिला वाटते. तिच्या डॅडींच्या डोळयातील उदास, दुःखी भाव ती टिपते. देशासाठी मरायचीही तिची तयारी आहे. खरंच.. त्या कोवळ्या वयातही तिचे विचार खूप प्रगल्भ होते हे प्रकर्षाने जाणवते..
तिला स्वतःत झालेला बदल जाणवतो. ती म्हणते, ” स्वर्गात राहण्याचा आनंद घेणारी मी आणि या भिंतीत कोंडून शहाणी झालेली मी खूप वेगळी आहे. मी आधीच्या त्या मजेदार पण उथळ वाटणाऱ्या मुलीकडे बघते तेव्हा आताच्या ॲनाचा तिच्याशी काहीच संबंध नाही असं वाटतं. “.
ॲना, तिची आई, आणि मोठी बहीण या तिघींनाही हिटलरच्या सैनिकांनी पकडून नेले आणि नरकासमान असणाऱ्या एका छळछावणीत कोंडले.. तिघींचाही तिथेच मृत्यू झाला. पण वडील मात्र वाचले. युद्ध संपल्यावर त्यांची सुटका झाली. ते त्यांच्या त्या गुप्त घरी गेले … सामान आवरताना त्यांना ही डायरी सापडली….. आणि ती वाचल्यावर त्यातून दिसणारे तेव्हाचे दारुण वास्तव लोकांपर्यंत पोहोचवायलाच हवे या उद्देशाने त्यांनी ही डायरी प्रकाशित केली.
या पुस्तकाचा अनुवाद करताना, ही डायरी एका जेमतेम १३ वर्षांच्या मुलीने आपले मन मोकळे करण्यासाठी लिहिलेली आहे याचे भान मंजुषाताईंनी आवर्जून राखले आहे, आणि म्हणूनच बोजड शब्द न वापरता, कुठेही अलंकारिक, क्लिष्ट भाषा न वापरता त्यांनी हा अनुवाद केला आहे. त्यामुळे हा अनुवाद जितका सहज आणि संवेदनशील आहे, तितकाच मुक्त, तरल आहे. एखाद्या बालकलाकाराने चित्र काढताना सहज रेघोट्या ओढाव्यात तसे रोज मनात आलेले विचार या डायरीत उतरले आहेत. आणि मंजुषाताईंच्या अनुवाद करण्याच्या शैलीचे हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्या १३ वर्षाच्या मुलीचा निरागसपणा, चैतन्यमय, प्रकाशमय उमदेपणा, तिची सूक्ष्म निरीक्षणशक्त्ती आणि तिची संवेदनशीलता आणि वयाला न साजेशी अपवादात्मक विचारक्षमता हुबेहुब टिपली आहे.
या मुलीच्या भावना.. विचार.. आणि त्यातील परिपक्वता थेटपणे वाचकाच्या अंतर्मनाला भिडेल असाच त्यांनी हा मराठी अनुवाद केला आहे
… जोपर्यंत जगात युद्ध चालू असणार आहेत, जुलूम, अत्याचार होत राहणार आहेत, तोपर्यंत हे पुस्तक अमर आहे.
युद्ध आणि त्याचे माणसांवर होणारे सखोल परिणाम यावर नकळतपणे केले गेलेले हे भाष्य, मराठीत सहज-सोप्या भाषेत अनुवादित करून वाचकापर्यंत पोहोचवणारे हे पुस्तक आहे.
… हे पुस्तक आपण सर्वांनी जरुर वाचावे यासाठी ही तोंडओळख.
परीक्षण सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – रात को आफ़ताब मिल जाये)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 81 – रात को आफ़ताब मिल जाये… ☆ आचार्य भगवत दुबे
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
मनोज साहित्य # 154 – सजल – एक-एक कर बिछुड़े अपने ☆
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
संजय दृष्टि – सृजन
प्रश्न: चिंतित हूँ कि कुछ नया उपज नहीं रहा।
उत्तर: साधना के लिए अपनी सारी ऊर्जा को बीजरूप में केंद्रित करना होता है। केंद्र को धरती के गर्भ में प्रवेश करना होता है। अँधेरा सहना होता है। बाहर उजाला देने के लिए भीतर प्रज्ज्वलित होना होता है। तब जाकर प्रस्फुटित होती है अपने विखंडन और नई सृष्टि के गठन की प्रक्रिया।…हम बीज होना नहीं चाहते, हम अँधेरा सहना नहीं चाहते, खाद-पानी जुटाने का श्रम करना नहीं चाहते, हम केवल हरा होना चाहते हैं।…अपना सुख-चैन तजे बिना पूरी नहीं होती हरा होने और हरा बने रहने की प्रक्रिया।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
☆ आपदां अपहर्तारं ☆
मार्गशीर्ष साधना 16 नवम्बर से 15 दिसम्बर तक चलेगी। साथ ही आत्म-परिष्कार एवं ध्यान-साधना भी चलेंगी
इस माह के संदर्भ में गीता में स्वयं भगवान ने कहा है, मासानां मार्गशीर्षो अहम्! अर्थात मासों में मैं मार्गशीर्ष हूँ। इस साधना के लिए मंत्र होगा-
ॐ नमो भगवते वासुदेवाय
इस माह की शुक्ल पक्ष की एकादशी को गीता जयंती मनाई जाती है। मार्गशीर्ष पूर्णिमा को दत्त जयंती मनाई जाती है।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈