मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी मातृभाषा ☆ सौ. मुग्धा कानिटकर

☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मातृभाषा ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆ 

माझी मातृभाषा  आहे  थोर  मराठी

जीवलग वाटते मज  सदा मराठी

 

कानी अंगाई नादावे  मांडीवरी मराठी

मुखीअभंग ओव्या  आईच्या मराठी

हाती वृत्तपत्र पित्याच्या असे  मराठी

जगरहाटी शिकवे  घरी सोपी   मराठी

माझी मातृभाषा आहे थोर  मराठी

जीवलग वाटते मज सदा मराठी

 

चिऊ काऊच्या गोष्टी गोड शैशवी मराठी

भावरंगी रंगलो कथां मधून  कौमार्यी मराठी

व्यक्तीस खुलवे सौरभ यौवनी मराठी

जीवनी वाटे संगत  सोबती   मराठी

माझी मातृभाषा आहे  थोर  मराठी

जीवलग वाटते मज  सदा मराठी

 

भाऊरायाच्या छंदात डोकावते हळूच मराठी

बन्धुराजाच्या पत्रांतून करे हितगुज मराठी

परदेशीभावाशी संवादते मराठी

भगिनीस  साहित्य प्रेमी करे मराठी

माझी मातृभाषा आहे  थोर  मराठी

जीवलग वाटते मज सदा मराठी

 

सुसंस्कृत लाभले सुंदर माहेर मराठी

परप्रांतीय सासरचे सुद्धा बोलती मधाळ मराठी

गप्पांत भान हरपती मित्र-मैत्रिणी  मराठी

ऋणानुबंध जुळताना अडसर नसते मराठी

माझी मातृभाषा  आहे थोर  मराठी

जीवलग वाटते मज सदा मराठी

 

हाती असू देत अक्षरवाॾ.मय मराठी

गात राहू   सुरेल नवीजुनी गाणी मराठी

भावी पिढीला ज्ञानविज्ञान देईल मराठी

ठेवू अभिमान भाषेचा होऊन पाईक मराठी

माझी मातृभाषा आहे   थोर  मराठी

जीवलग वाटते मज  सदा मराठी

© सौ. मुग्धा कानिटकर

२७/०२/२०२१

सांगली

फोन 9403726078

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माय ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मराठी माय ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

चक्रधरांच्या लीळा

भावतरंग मनीचे

ज्ञानेशाच्या ओव्यात

तत्त्वज्ञान गीतेचे !

चांगदेवाची गुरु

होई मुक्ताई !

दासी नामदेेवाची

झाली जनाई !

नाथांचे भारुड

जनावरी गारुड

मनाचे ते अंगणी

भक्ती बापुडी !

तुकयाची गाथा

इंद्रायणीकडे

आवलीचे साकडे

काळ्या विठूला !

दासबोध दासांचा

कल्याण लेखक

मनाचे ते श्लोक

चिंतनाचा ओघ!

एका मराठी दिनी

सांगणे काय काय

जन्मभरी पुरे

मराठी माय !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॠण दुधाचे विसरू नका.. ☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’

☆ कवितेचा उत्सव ☆ ॠण दुधाचे विसरू नका..☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’ ☆

मराठमोळ्यांची पोशिंदी,

माझी मराठी मायबोली.

ज्ञानोबाची परंपरा,

अमृताने जोपासली.

गाठी शिवबाची शिबंदी

तिच्या वात्सल्यात वाढली.

परि  वाघिणीची दृष्ट,

मायेच्या दुधाला लागली.

नाती मातीची – भाषेची,

जगी ओळख लाभली.

ऋण दुधाचे विसरू नका,

विनवी मराठी माऊली.

 

© श्री रवीन्द्र देवघरे “शलभ’

नागपूर.

मो  9561117803.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मायबोली मराठी.. ☆ सुश्री सुषमा गोखले

☆ कवितेचा उत्सव ☆ मायबोली मराठी.. ☆ सुश्री सुषमा गोखले ☆ 

मायबोली मराठी बोलीन सहर्षे

सन्मान पालखीत मिरवीन कौतुके

ज्ञानदेवीची आण, गौरव तिचा राखीन

मेधा धृती मतीने रक्षेन प्राणपणाने

राज्यभाषा  मराठीचा येवो उत्कर्षकाल

जगद्वंद्य होऊनी राहो चिरंतर…

सर्वात्मक श्रीहरीचा कमलकर

राहो मस्तकी, मायमराठीवर !

सुषम.

© सुश्री सुषमा गोखले

शिवाजी पार्क – दादर

मो. 9619459896

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी… ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी… ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

 सदैव  माझ्या ओठी

माझी माय मराठी

 

लेई शब्द पैठणी  जरतार

त्यावरी घाले शब्दालंकार

 

सात्विक सालस नार

वेळी होई ती धारदार

 

मुकुट तिचा एकार,ओकार,

इकार कधीतरी रफार

 

पायी रुणझुणती उकार,

बिन्दी भाळी अनुस्वार

 

कधी अर्ध,कधी पूर्णविराम

कधी स्वल्प,कधी प्रश्न चिन्ह

 

कर्मणि,कर्तरी,प्रयोग, भावे

भूत, वर्तमान,भविष्य, काळासवे

 

ज्ञानेश्वर आद्य उपासक

समर्थ,तुका,नाथ पूजक

राजा शिवबा असे रक्षक

 

अभंग,भजन,प्रवचन

कीर्तन, चर्चा, भाषण

 

कथा, कादंबरी, कहाणी

लोकगीत, पोवाडा, लावणी

 

भारूड, नाटक, नाट्यछटा,

एकपात्री, विडिओ,सिनेमा

 

कित्येक पैलू आईचे या

वाणी तोकडी वर्णाया

 

लेकरे अमाप,क्षेत्रे तिची मोठी

वर्णू किती,मती माझी थिटी

 

माझ्या मराठीची अशीच ऐट

विचारू नका तिचा थाटमाट

 

दर बारा कोसी भिन्न हिचा अवतार

तरी एक असे ही माझी म्हराठ्ठी नार

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

 ☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

“अरेच्या! काय विचित्र मनाचा माणूस आहे हा! हि परप्रांतातील मुलगी आपलं आयुष्य याच्यावर उधळायला तयार आहे आणि याची याला काहीही किंमत नाही आणि फक्त या विक्षिप्त बरोबर आयुष्य काढायचं? कोणाशीही संपर्क ठेवायचा नाही? काय आहे काय याच्या मनात?”

“निलेश, कशासाठी ही अट? काय प्रयोग करणार आहेस का तिच्यावर?” मी विचारले.

“एक्झॅक्टली !त्यासाठीच मी तिची निवड केली.हे बघ,तिने मला हॉटेलवर उद्या जेवायला बोलावले, त्यावेळी तू ही ये. तुझ्या साक्षीनेच मी तिलाही घालणार आहे. एका दृष्टीने उद्याच्या दिवस माझ्या आणि तिच्याही आयुष्यातला महत्त्वाचा ठरणार आहे”.

“अरे पण मला का मध्ये घालतोय? तुमचं तुम्हीच ठरवा ना. मी आलेले तिला आवडणार नाही.”

“ठीक आहे. तू येऊ नको माझं मी बघून घेईन.”या विक्षिप्त मित्राने विक्षिप्तपणा पुन्हा एकदा सिद्ध करत मला गप्प केलं.

दुसऱ्या दिवशी मीच रात्री आठ पासून त्याची चातकासारखी वाट पहात रूमवर बसलो होतो.साडेनऊ झाले तरी याचा पत्ता नाही.शेवटी दहा साडेदहाला निलेश आला. माझ्याशी काहीही न बोलता डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपला ही ! मला वाटले,चंदाने बहुदा नकार दिलेला दिसतो. कोण्याच्या विचित्र पणाला आनंदाने होकार देईल?

दुसऱ्यादिवशी लायब्ररीत चंदा भेटली. ती मात्र अगदी खूश दिसत होती. लांबूनच हाय करून तिने मला थांबण्याची खूण केली.मला वाटले आता हि पुन्हा निलेश संबंधी, त्याच्या त्या अटी संबंधी माझं डोकं खाणार. पण झालं भलतंच. लगबगीने माझ्यापाशी येऊन चंदा म्हणाली “चला एका चांगल्या न्यूज बद्दल मी तुम्हाला कॉफी देणार आहे.”

“चांगली न्यूज?” मी आश्चर्य करीत तिच्याकडे बघत राहिलो. “तुम्हाला निलेशने काहीच सांगितले नाही ना? अहो त्याच्या प्रपोजलला मी होकार दिलाय.” “काय?” मी केवढ्यांदा किंचाळलोच. ” खरच, मी त्याच्या शिवाय जगू शकत नाही. शिवाय त्याच्या संशोधनात मी मदत करू शकते ना! काय पाहिजे मला?”

आणि खरच, परीक्षा झाल्या झाल्या निलेश च्या बागेतच, अगदी साधेपणानं थोड्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी विवाह  केला.

ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवसापासून आम्हा कोणालाच भेटली नाही. मी दोन-तीनदा बघितले त्यांच्या घरीही गेलो. पण चंदाचे नखही मला दिसले नाही. बरे निलेश ला विचारावे तर हा, “तुला काय करायचे? म्हणायलाही कमी करायचा नाही किंवा माझ्याकडे येऊ नको माझ्याशी बोलू नको असेही म्हणाय चा.” मी आपला गप्पच राहिलो.

त्यादिवशी त्यानेच आपण होऊन आपल्या धाडसी प्रयोगाची माहिती मला दिली. त्याच्यामते आपण मानव खाण्याच्या बाबतीत सर्वस्वी वनस्पतीवर अवलंबून आहोत. आपला मेंदू प्रगल्भ आहे. इतके नवनवीन शोध लावतो, पण आपले स्वतःचे अन्न आपण तयार करू शकत नाही, जे फक्त वनस्पती करतात. वनस्पतीमध्ये मुख्यत्वे क्लोरोफिल नावाचे हिरवे रंगद्रव्य असते. केवळ त्यामुळे ते आपले स्वतःचे अन्न,ग्लुकोज तयार करू शकतात.आपल्या शरीरात क्लोरोफिल नाही. मी काय करणार, क्लोरोफिल,, पाणी, झिंक, मॅग्नेशियम सलाईन मधून इंजेक्ट करणार आहे. त्यामुळे पेशींच्या रचनेत बदल घडवून वनस्पतींत प्रमाणे आपल्या ही पेशी अन्न तयार करू शकतील. हा माझा प्रयोग यशस्वी झाला तर या जगात पहिली मानव ठरेल कि जी खरीखुरी स्वयंसिद्ध असेल. तिच्यासाठी मी मुद्दाम  काथ्यांनी विणलेली कॉट तयार करून घेतली आहे.चार-पाच च्या अंगणात झकास ऊन येते.तिथं ही कॉट ठेवणार आहे.एक मोठा काचेचा गोल डोम तयार करून घेणार, कॉटच्या भोवती ठेवणार. कारण हा प्रयोग यशस्वी व्हायला किती महिने लागतील कोण जाणे? तिला पावसाचा, थंडी चा,उन्हाचा त्रास नको व्हायला”.

 एका दमात त्याने आपल्या प्रयोगाची रूपरेषा मला सांगितली. “अरे,तिला कायम झोपून ठेवणार तू? त्रास नाही का होणार?” मी काळजीने विचारले. “हे बघ, ती आपणहून तयार झाली आहे. मी काही मागे लागलो नव्हतो किंवा  तिला फोर्स केला नाही. आता सगळं ठरलं आम्ही दोघं लवकरच प्रयोग सुरू करणार आहोत.”

 “ठीक आहे. ऑल द बेस्ट! तुम्हा दोघांनाही. उद्या मी चाललोय बेंगलोरला. परत येईन तेव्हा भेटूच. गुड बाय!”

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

 ☆ विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

“भाषा” म्हणजे काय? त्याची उत्पत्ती, व्याख्या,ई ,क्लिष्ट चर्चेत न शिरता व्यावहारिक वापराचा विचार करुया.

भाषेची नाळ जोडली जाते ती “बोलणे” शी. बोलणे म्हणजे तरी काय? तर अभिव्यक्ती विचारांची आणि भावनांची मौखिक अभिव्यक्ती.

“देहबोली” हे पण अभिव्यक्तीचे माध्यम आहे, पण भाषाविरहित. मौखिक अभिव्यक्ती माणुस सोडुन ईतर प्राणिमात्रांमध्येही असते, कुत्र्यांचे भुंकणे, गाईम्हशींचे हंबरणे, वाघांची डरकाळी, भुंग्यांचा गुंजारव,पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे डराव डराव, पालीचे चुकचुकणे, थी त्यांची भाषा असते असे म्हणतात.

माणसाने भाषेचा वापर केंव्हा, कसा सुरू केला यासाठी यासाठी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास तर नक्कीच करावा लागेल. पण तूर्तास भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आहे, सर्वश्रेष्ठ वरदान आहे असे अनुभवाने सिध्द केले आहे.

आपला भारत बहुभाषिक देश,.तरीही भाषा म्हटले की आवर्जुन प्राधान्य दिले जाते ते मातृभाषेलाच, मायबोलीलाच.

आपली मायमराठी, महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी, समृध्द आणि संपन्न भाषा असे गर्वाने म्हणावेसे वाटते, तिच्या विविध रंगांचा, प्रत्येक रंगातील विभिन्न छटांवर  धावता दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न. उदाहरणे अनेक देता येतील पण शब्दसंख्येवरील मर्यादेमुळे तो मोह टाळावा आहे.

महाराष्ट्रातील मराठी म्हटले तरी वर्हाडी, कोल्हापुरी, सोलापुरी, खानदेशी, कोकणी, पुणेरी, मुंबईची, मराठवाड्याची असे अनेक रंग, आणि ढंग आढळतात. हिंदीची घुसखोरी, दुहेरी क्रियापदांमधे वापर अशी नागपुरी. फेटा घातलेली, थोडीशी रांगडी, कानडी शिडकावा म्हणजे कोल्हापुरी, वरुन काहीशी कडक वाटली तरी आतुन प्रेमळ, तिथल्या नारळासारखीच कोकणी, त्यातही मालवणी वेगळीच, वाक्यात किमान २, ४ शब्द ईंग्रजी किंवा हिंदी अगदी मस्त अशी मुंबईची, सोलापुरी तर न्यायची धाटणी, अन् सांस्कृतिक पगडी घातलेली पुणेरी, अनेक रंगातील अनेक छटा असल्या तरी प्रत्येकाचा बाज तेवढाच आकर्षक, तेवढाच रुबाबदार.

काळाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की बदलत्या काळाबरोबर शिक्षण,सांस्कृतिक जडणघडण, रीती रिवाज जसे बदलत गेले तसे भाषेचा पेहरावाही बदलणे स्वाभाविक होते, फार मागे जाऊया नको, २०व्या शतकात वापरले जाणारे अनेक शब्द आज कालबाह्य झाले आहेत. जसे, सदरा, पोलके, शेगडी, आणि ईतर अनेक, आजच्या आधुनिक मराठीत अनेक शब्द ईतर भाषेतून येऊन इतके रुळले आहेत कीअमराठी आहेत हे नविन पिढीला पटत नाही.

प्रत्येक व्यवसायाची पेशाची  भाषेची खासियत वेगवेगळी असते, वकील, डॉक्टर, शिक्षक, नोकरदार, कारखानदार,व्यापारी,.प्रत्येक पेशात परत बारीकसारीक फेरफार असतातच,व्यापारी म्हटला तरी_कपडे,सोनेचांदी, भांडी,किराणा,धान्य,ई प्रमाणे,भाषा बदल होतोच,

राजकारण,समाजकारण,यातील भाषा वेगळी,तर संरक्षणदल,पोलिस दल इथली वेगळीच.

नैसर्गिक भेद किंवा इतरही काही कारण असेल पण स्त्री पुरूष यांच्या भाषेचा पोतही खुप वेगळा असतो, भाषा ही केवळ मौखिक अभिव्यक्ती ची मक्तेदारी नाही, लिखीत अभिव्यक्ती साहित्य क्षेत्रात लेखनाच्या रणांगणावर भाषेची भूमिका सरसेनापती असते, लेखकाच्या लेखनाचे यशापयश भाषेवरच अवलंबून असते,

साहित्य मग ते कोणतेही, कोणाचेही, कशाशीही संबंधित असो, त्याप्रमाणे लेखकाला शब्दरूपी शस्त्र वापरावे लागते, संत साहित्यात टाळचिपळी, तर बालसाहित्यातील चेंडुफळी असते.

कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, अतिलघु, लघुत्तम,लघु,दीर्घ,रहस्य,ई कथा,ललित,सामाजिक,धार्मिक, अध्यात्मिक, ई लेख, प्रवासवर्णन, विविध काव्यप्रकार,अशा बहुविध साहित्य प्रकाराप्रमाणे, भाषेचा रंगढंग बदलत जातो,आणि आमची मराठी मायेच्या ममतेने  सर्वांना आकंठ दुग्धपान देते.

कुठेतरी वाचलेले आठवते, “भाषा सरस्वती त्यांच्यापुढे शब्द घेऊन ऊभी रहाते, आणि शब्दही माझा वापर केंव्हा करणार याची चातकासारखी वाट पहातात” धन्य ते साहित्यिक आणि त्यांच्या अजरामर कलाकृती, अशांपैकीच एक मान्यवर  कवि कुसुमाग्रज त्यांना कोटी कोटी प्रणाम,  शब्दरूप फुलांची ही माला सविनय,सादर अर्पण.

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

पुणे,

मो 9403862565,  9209301430

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार श्री भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

(27 फेब्रुवारी माघ पौर्णिमा निमित्ताने)

आपला भारत देश हा अनेक ऋषी, मुनिंच्या परंपरेने आणि ज्ञानाने समृद्ध झाला आहे. बहुतेक सर्व मुनिनी वेद, अध्यात्म, यज्ञ, याग, कर्मकांड, विज्ञान इ.अनेक विषयांवर विस्तृत विवेचन केले आहे.पण “नाट्यशास्त्र” या विषयावर सुबद्धविवेचन करणारे मुनि म्हणजे भरतमुनि होय.

भरतमुनि – कलर पेन्सिल पेंटींग – श्री मिलिंद महाबळ (साभार) 

भरतमुनिंचा कालखंड निश्र्चित नाही. साधारणपणे इ.स.पू. ४०० ते १०० असा मानला जातो. “दशरूपक विधान”  या ग्रंथाच्या १८ व १९ व्या अध्यायात नाट्यशास्त्र हा विषय आला आहे.संगीत हा विषय २८ व्या अध्यायात आहे. ६ व ७ या अध्यायात रससिद्धांत सांगितला आहे .शृंगार,वीर,करुणा,भय,हास्य,बिभत्स, अद्भुत, शांत आणि रौद्र हे ९ रस सांगितले आहेत.

त्यांच्या नाट्यशास्त्रातील ठळक मुद्दे :-

१)  नाटकाचा विषय प्रख्यात कथेवर असावा.(उदा.रामायण, महाभारत, कृष्णलीला इ.)

२) ५ ते १० अंक असावेत.

३)  दोन अंकाच्या मध्ये “विष्कंभक” (निवेदक)असावा

४)  आवश्यक तेवढीच पात्रे असावीत.कथेला पूरक तेवढीच.

५)  अभिनय ४ प्रकारचा सांगितला आहे-१)अंगिक(Body language) 2) वाचिक (oral) 3)  सात्त्विक (expressions) 4) आहार्य म्हणजे ( with essential property)

६) कथानक रंजक हवे, क्रौर्य नको, प्रवाही असावे, सुखान्त

७) पात्रांचे चित्रण व्यवस्थित समजेल असे असावे.

८) रंगमंच किती,कसा असावा हे सविस्तर सांगितले आहे.

९) सर्व ९ रस शक्यतो यावेत.

१०) नाटकाचा उद्देश- मनोरंजन,कलादर्शन, लोकांना आनंदी करणे, संदेश/ बोध देणे.

याशिवाय प्रेक्षागृह कसे असावे ? कोणी कोठे बसावे ?

अभिनेता, दिग्दर्शक, कपडेपटवाला इ.लोकानी कसे कष्ट घ्यावेत ?

या सर्वांचा सविस्तर विचार मांडला आहे. विषय खूप मोठा आहे, परंतु  त्या काळात मांडलेल्या सूचना आजही मानल्या जातात. भरतमुनिंची जयंती संस्कार भारती दरवर्षी  माघ पौर्णिमेस साजरी करते. त्यांना वंदन करून मी इथे थांबतो.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 88 ☆ व्यंग्य – भारतीय पतियों की खराब ग्रहदशा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपका एक  बेहद मजेदार व्यंग्य  ‘भारतीय पतियों की खराब ग्रहदशा‘। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 88 ☆

☆ व्यंग्य – भारतीय पतियों की खराब ग्रहदशा

यह दिन की तरह साफ है कि भारत में पतियों की ग्रहदशा गड़बड़ चल रही है। टीवी पर हर दूसरे दिन किसी न किसी पति की फजीहत पत्नी के हाथों हो रही है—वही पत्नी जिसके लिए पति ‘प्रान पियारे’ और ‘प्रान अधार’ हुआ करता था। अब प्रान अधार प्रान बचाते फिर रहे हैं और प्रानपियारी उन्हें पछया रही है। और इन टीवी वालों को भी कोई काम नहीं, कैमरा लटकाये पत्नियों की बगल में दौड़ रहे हैं। घोर कलियुग! महापातक! निश्चय ही ऐसी पत्नियों के साथ ये टीवी वाले भी नर्क के भागी बनेंगे। सबसे खराब बात यह है कि पतियों की पिटाई टीवी पर बार बार दिखायी जाती है, जैसे कि टीवी की सुई वहीं अटक गयी हो। सबेरे सबेरे टीवी खोलते ही कोई न कोई पति पिटता मिल जाता है। निश्चय ही यह स्थिति भारतीय पतियों के मनोबल के लिए घातक है।

एक पति की उनकी पत्नी ने कैमरे के सामने जी भर कर पिटाई की। एक और पति चौराहे पर पत्नी और उसके रिश्तेदारों द्वारा लात जूतों से सम्मानित हुए। एक पत्नी उस वक्त शादी के स्टेज पर पहुँच गयीं जब पतिदेव सज-सँवर कर दूसरी पत्नी के साथ वरमाला की तैयारी में थे। इस घटना में पति के साथ भावी सौत का भी पर्याप्त सम्मान हुआ। एक मोहतरमा अपने पति द्वारा छद्म नाम से की गयी शादी के बाद आयोजित दावत में पहुँच गयीं। वहाँ पतिदेव पर तो कुर्सियाँ फेंकी ही गयीं, वहाँ पधारे मेहमानों की भी अच्छी आवभगत हुई। इसी सिलसिले में एक ऐसे पतिदेव की भी हड्डियाँ टूटीं जो चार बच्चों के बाप होने के बावजूद चुपचाप दूसरी शादी रचा रहे थे।

दरअसल जब से टीवी आया है तब से भारतीय संस्कृति की चूलें हिलने लगी हैं। पहले पति सौत वौत ले आता था तो पत्नी बिलखती हुई गंगा जी का रुख़ करती थी, अब वह सबसे पहले टीवी वालों को ढूँढ़ती है। बेचारा पति बीवी से तो निपट लेता था, लेकिन इन टीवी वालों से कैसे निपटे? ये तो साधु-सन्तों को भी काले धन को सफेद करते दिखा रहे हैं। कोई वर दहेज माँगने पर जेल के सींखचों के पीछे पहुँच जाए तो वहाँ भी टीवी वाले फोटू उतारने पहुँच जाते हैं ताकि सनद रहे और वक्त ज़रूरत काम आवे, जबकि सर्वविदित है कि दहेज हमारी सदियों की पाली- पोसी परंपरा है। टीवी ऐसे ही चीरहरण करता रहा तो हमारी संस्कृति की महानता खतरे में पड़ सकती है।

हमारे देश में हमेशा से पति का दर्जा परमेश्वर का रहा है। पत्नियाँ तीजा और करवाचौथ के व्रत रखती रहीं ताकि पतिदेव स्वस्थ प्रसन्न रहें और पत्नी का सुहाग अजर अमर रहे। मैंने एक पत्रिका में पढ़ा था कि एक समय पत्नियाँ पति के पैर के अँगूठे को धोकर जो जल प्राप्त होता था उसी को पीती थीं,और यदि पतिदेव कुछ समय के लिए घर से बाहर जाते थे तो अँगूठा धो धो कर घड़े भर लेती थीं ताकि पतिदेव की अनुपस्थिति में अन्य जल न पीना पड़े। लेख में यह स्पष्ट नहीं किया गया था कि अँगूठा धुलवाने से पहले पतिदेव पाँव धोते थे या नहीं। फिल्मों में पत्नियाँ गाती थीं—‘कौन जाए मथुरा, कौन जाए काशी, इन तीर्थों से मुझे क्या काम है; मेरे घर में ही हैं भगवान मेरे, उनके चरणों में मेरे चारों धाम हैं।’

लेकिन अब पत्नियों ने पता नहीं कौन सा चश्मा पहन लिया है कि उन्हें पति में परमेश्वर के बजाय मामूली आदमी नज़र आने लगा है। अर्श से फर्श पर उतरने के बाद बेचारा पति परेशान है क्योंकि वह इस नयी हैसियत से तालमेल नहीं बैठा पा रहा है।

मेरी मति में पतियों की इस दुर्दशा का कारण स्त्री-शिक्षा का बढ़ना और स्त्री का स्वावलम्बी होना है। पहले स्त्री अल्पशिक्षित होती थी और इस कारण पूरी तरह से पति पर निर्भर होती थी। वह उतनी ही किताबें पढ़ती थी जो पति को परमेश्वर सिद्ध करती थीं और जो उसे सिर्फ चिट्ठी- पत्री के काबिल बनाती थीं। अब स्त्रियाँ दुनिया भर की ऊटपटाँग किताबें पढ़ने लगी हैं और बड़ी बड़ी कुर्सियों पर बैठने लगी हैं। उन्हें पता चल गया है कि संविधान और कानून ने उन्हें बहुत से अधिकार दिये हैं। इस मामले में स्त्रियों को बरगलाने में टीवी ने खूब विध्वंसकारी भूमिका निभायी है। अब कम पढ़ी-लिखी पत्नी भी जानती है कि पतिदेव की टाँग कैसे पकड़ी जा सकती है। नतीजा यह कि पति की हैसियत दो कौड़ी की हो गयी है।

फिर भी पत्नियों को पति के बहकने पर गुस्सा करने से पहले हमारे इतिहास पर विचार करना चाहिए। पुरुषों में दांपत्य के राजमार्ग से बहकने भटकने की प्रवृत्ति हमेशा रही है और स्त्री सदियों से इसे अपनी नियति मानकर सन्तोष करती रही है। एकनिष्ठ होने की अपेक्षा पत्नियों से ही रही है, पतियों से नहीं। धर्मग्रंथों में पतिव्रताओं की महिमा खूब गायी गयी, लेकिन जो पति एकनिष्ठ रहे उनका नाम कोई नहीं लेता। राजाओं नवाबों के रनिवास और हरम पत्नियों से इतने भरे रहे कि पतिदेव अपनी पत्नियों और सन्तानों को पहचान नहीं पाते थे, लेकिन पत्नी बहकी तो गयी काम से। ‘साहब बीवी गुलाम’ के बाबू लोग रोज़ गजरा लपेटकर कोठों की सैर करते थे, लेकिन छोटी बहू ने भूतनाथ से कुछ मन की बात कर ली तो तत्काल उसकी ज़िन्दगी का फैसला हो गया।

इसलिए भारत सरकार से मेरी दरख्वास्त है कि पतियों की पिटाई टीवी पर दिखाने पर तत्काल रोक लगायी जाए और इस संबंध में ज़रूरी कानून बनाया जाए ताकि पतियों की हैसियत और उनके मनोबल मेंं और गिरावट न हो। इसके साथ ही पतियों के खराब ग्रहों की शान्ति के लिए कुछ अनुष्ठान वगैरः भी कराया जाए।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 87 ☆ कालाय तस्मै नम: ! ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 87 ☆ कालाय तस्मै नम: ! ☆ 

संध्या समय प्राय: बालकनी में मालाजप या ध्यान के लिये बैठता हूँ। देखता हूँ कि एक बड़ी-सी छिपकली दीवार से चिपकी है। संभवत: उसे मनुष्य में काल दिखता है। मुझे देखते ही भाग खड़ी होती है। वह भागकर बालकनी के कोने में दीवार से टिकाकर रखी इस्त्री करने की पुरानी फोल्डिंग टेबल के पीछे छिप जाती है।

बालकनी यूँ तो घर में प्रकाश और हवा के लिए आरक्षित क्षेत्र है पर अधिकांश परिवारों की बालकनी का एक कोना पुराने सामान के लिये शनै:-शनै: आरक्षित हो जाता है। इसी कोने में रखी टेबल के पीछे छिपकर छिपकली को लगता होगा कि वह काल को मात दे आई है। काल अब उसे देख नहीं सकता।

यही भूल मनुष्य भी करता है। धन, मद, पद के पर्दे की ओट में स्वयं को सुरक्षित समझने की भूल। अपने कथित सुरक्षा क्षेत्र में काल को चकमा देकर जीने की भूल। काल की निगाहों में वह उतनी ही धूल झोंक सकता है जितना टेबल के पीछे छुपी छिपकली।

एक प्रसिद्ध मूर्तिकार अनन्य मूर्तियाँ बनाता था। ऐसी सजीव कि जिस किसीकी मूर्ति बनाये, वह भी मूर्ति के साथ खड़ा हो जाय तो मूल और मूर्ति में अंतर करना कठिन हो।  समय के साथ मूर्तिकार वृद्ध हो चला। ढलती साँसों ने काल को चकमा देने की युक्ति की। मूर्तिकार ने स्वयं की दर्जनों मूर्तियाँ गढ़ डाली। काल की आहट हुई कि स्वयं भी मूर्तियों के बीच खड़ा हो गया। मूल और मूर्ति के मिलाप से काल सचमुच चकरा गया। असली मूर्तिकार कौनसा है, यह जानना कठिन हो चला। अब युक्ति की बारी काल की थी। ऊँचे स्वर में कहा, ‘अद्भुत कलाकार है। ऐसी कलाकारी तो तीन लोक में देखने को नहीं मिलती। ऐसे प्रतिभाशाली कलाकार ने इतनी बड़ी भूल कैसे कर दी?” मूर्तिकार ने तुरंत बाहर निकल कर पूछा,” कौनसी भूल?”   काल हँसकर बोला,” स्वयं को कालजयी समझने की भूल।”

दाना चुगने से पहले चिड़िया अनेक बार चारों ओर देखती है कि किसी शिकारी की देह में काल तो नहीं आ धमका? …चिड़िया को भी काल का भान है, केवल मनुष्य बेभान है। सच तो यह है कि काल का कठफोड़वा तने में चोंच मारकर भीतर छिपे  कीटक का शिकार भी कर लेता है। अनेक प्राणी माटी खोदकर अंदर बसे कीड़े-मकोड़ों का भक्ष्ण कर लेते हैं। काल, हर काल में था, काल हर काल में है। काल हर हाल में रहा, काल हर हाल रहेगा।  काल से ही कालचक्र है,  काल ही कालातीत है। उससे बचा या भागा नहीं जा सकता।

थोड़े लिखे को अधिक बाँचना, बहुत अधिक गुनना।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares