मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बिच्चारे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ बिच्चारे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

शुभमंगल… साSवSधाSन…

शेवटच्या ‘न’ बरोबरच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. ‘झालं बुवा एकदाचं…’ त्यावेळी प्रत्येक उपस्थिताच्या मनात आलेला हा विचारच जणू त्या कडकडाटातून घुमत होता. ‘‘चला, आता वधु-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घाला.”… आंतरपाट गोळा करत गुरूजींनी ऑर्डर सोडली… ‘‘हं, गोपाळराव, तुम्ही आधी घाला हार…”…. पण केव्हाचे हार धरून थांबलेले गोपाळरावांचे हात, नेमक्या त्या मोक्याच्या क्षणी मात्र त्यांचं ऐकायला तयार नव्हते… आणि त्याचं कारणही तसंच होतं… उपस्थित एका वेगळ्याच समाधानाने त्यांच्या डोक्यावर अक्षतांचा अक्षरश: मारा करत होते, आणि तो चुकवता चुकवता डोक्याबरोबरच, हार धरलेले हातही नुसतेच इकडे तिकडे हलत होते. खरंतर अशावेळी अक्षता डोक्याला इतक्या लागत नाहीत… केसात अडकतात… आणि गोपाळरावांचा नेमका हाच तर प्रॉब्लेम झाला होता…अक्षतांचा मारा थोपवायला त्यांच्या डोक्याच्या नेमक्या मध्यभागीच केस शिल्लक नव्हते. आणि तेही निसर्ग नियमानुसार योग्यच होतं. वयाला साठी पार करण्याची उत्सुकता लागली, की डोक्यावर ‘कुंडल-कासार’ तयार होणारच की…

आता ही गोष्ट आश्चर्यात पाडणारी आहे, यात शंकाच नाही. म्हणजे हातात वरमाला घेऊन चतुर्भुज होण्यासाठी अधीर झालेल्या एका वराची साठी जवळ आलेली असणं, ही ‘स्वाभाविक’ बाब कशी म्हणता येणार? ——-

खरंतर अगदी लग्नाच्या वयात आल्यापासूनच गोपाळरावांनी इतरांसारखी वधू-संशोधनाची मोहीम अगदी वाजत-गाजत, सर्व तयारीनिशी सज्ज होऊन सुरू केली होती… सर्व तयारी म्हणजे… चार वर्षात मिळू शकणारी पदवी, निवांतपणाने सहा वर्षात का होईना, पण मिळवली होती. जोडीला टायपिंगची ४० स्पीडची परिक्षाही नशीब बलवत्तर असल्याने ते लगेच पास झाले होते. त्याच नशिबाच्या जोरावर, फार महिने वाट पहात थांबावे न लागता, एका खाजगी कंपनीत ‘ टायपिस्ट-कम…साहेब सांगतील ते सगळं ‘… या पोस्टवर नोकरीही मिळाली होती. म्हणजे आता त्यांना ‘उपवर’ असायला काहीच हरकत नव्हती. ते लहान असतांनाच एका अपघातात त्यांच्या वडलांचे निधन झाले होते. एक मोठा भाऊ होता… पण कुठल्याच अर्थाने त्यांना न शोभणारा. अपघाताची नुकसान भरपाई म्हणून मिळालेले थोडेफार पैसे, आणि आईने नाईलाज म्हणून स्विकारलेली अनेक घरच्या स्वैंपाकाची कायमस्वरूपी नोकरी, या दोन चाकांवर तिने बिचारीने संसाराचा गाडा चालता ठेवला होता… अगदी गोपाळरावांना नोकरी लागेपर्यंत. दरम्यान मोठ्या भावाने ब-यापैकी नोकरी, आणि पाठोपाठ तिथलीच एक छोकरी पटकावून, स्वत:ची वेगळी चूल मांडली होती. हळुहळू शरिराबरोबरच, किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने, तो मनाने स्वत:ची आई आणि हा धाकटा भाऊ यांच्यापासून बराच लांब गेला होता. अतिकष्टाने आणि ‘गोपाळचे कसे होणार?’ या व्यर्थ चिंतेने केव्हापासूनच खचून गेलेली आई, गोपाळला नोकरी लागल्यानंतर, ‘आता इतिकर्तव्यता झाली’ असे समजून की काय, हे जग सोडून गेली. त्यावेळी भाऊ आला होता, पण त्यानंतर आजतागायत गोपाळला तो दिसलाही नव्हता… आणि आता आपल्याला एक मोठा भाऊ असल्याचं जणू तो विसरूनच गेला होता.

… आता अशा परिस्थितीत त्याच्यासाठी बायको शोधणार तरी कोण? नाही म्हणायला एक मावशी, आणि काही मित्र, जे त्याच्या गरीब स्वभावामुळे नकळत जोडले गेलेले होते, त्यांनी ४-५ वर्षं खटपट केली. पण मग मावशीही देवाघरी गेली, आणि मित्रही कंटाळले… तरी गोपाळ मात्र प्रयत्न करतच होता… पण कितीतरी मुलींचे पालक त्याच्या ‘सडाफटिंग’ या स्टेटस् मुळे साशंक व्हायचे आणि हे ‘स्थळ’ पहायचेच नाहीत. त्याच्या सर्वांगिण सामान्यपणामुळे काही ‘अतिशहाण्या’ (त्याच्या मतानुसार) मुली त्याला नकार द्यायच्या. काही मुली ‘चालेल’, असं नाईलाज झाल्यासारखं म्हणायच्या, आणि त्यांच्या चेहे-यावरचे ते भाव पाहून गोपाळचा ‘अहंकार’(?) डिवचला जायचा, आणि तोच त्यांना नकार द्यायचा. 

एकूण काय? तर ‘बाशिंग बळ’ कमी पडतंय्, असे शेरे ऐकू यायला लागले. त्या बिचा-याने स्वत:हून ‘अनुरूप वधू’ ही व्याख्या खूपच ढोबळ करून टाकली होती… कधीच… म्हणजे वयाने पस्तिशी ओलांडल्यावर… तसाही ‘त्याचं लग्न’ हा कुणासाठीच फारसा इंटरेस्टचा विषय कधी नव्हताच. पण तरीही जे मित्र थोडीफार मदत करत होते, तेही एव्हाना स्वत:च्या संसाराच्या व्यापात गुरफटून गेले होते. पण गोपाळची चिकाटी मात्र, इतर कुठल्याही बाबतीत नसेल, इतकी याबाबतीत दांडगी होती. आणि ते अगदीच स्वाभाविक होतं… नाईलाजाने अगदी एकटा पडलेला माणूस सोबतीसाठी आसावलेला असणारच. तरीही तो आनंदी-शांत रहाण्याचा प्रयत्न करत होता… निदान वरकरणी तसं दाखवत तरी होता. आता स्थळाकडूनच्या आधीच्या अपेक्षाही खूप बदलल्या होत्या…. कमी झाल्या होत्या. बघता बघता पन्नाशी उलटली होती त्याची. आता फक्त अशी बायको हवी होती, जी दोनवेळेला त्याला साधंच पण घरचं खाऊ घालेल, क्वचित् कधी दुखलं-खुपलं तर आस्थेने विचारेल.. जमेल तेव्हढी काळजी घेईल… बस्. स्वत:चं मूल आणि इतर समाधानाच्या अपेक्षा कधीच्याच बारगळल्या होत्या. आता फक्त सोबत हवीशी वाटत होती… रंग-रूप–उंची-जाडी, हीसुद्धा अगदी गौण बाब ठरली होती. 

… आणि अशातच आता अचानक एक मुलगी… म्हणजे बाई, त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती… आता लोक त्याला ‘गोपाळराव’ म्हणायला लागले होते… गोपाळराव अगदी खूष होते— कृतकृत्य झाल्यासारखे — आणि आज गोपाळराव चक्क बोहल्यावर चढलेही होते…

……  गुरूजींचे मंगलाष्टक संपले, अंतरपाट दूर झाला, गोपाळरावांच्या हातातला हार आणि समोरची ‘वधू’ही गळ्यात तो हार कधी घातला जातोय् याची वाट पहात ताटकळले होते. वधूच्या हातातला हारही त्याच्या गळ्यात पडायला उत्सुक होता… 

… पण डोक्यावर होणा-या अक्षतांच्या माराने गोपाळराव गांगरून गेले होते, त्यांचे फक्त हातच नाही, तर पायही हळुहळू लटपटायला लागले होते… आणि त्यांच्याही नकळत, बारीकशी चक्कर येऊन ते धाडकन् खाली पडले…… 

———लोखंडी सिंगल कॉटवर उशी छातीशी कवटाळून,… पाय पोटाशी घेऊन…. केविलवाण्या चेहे-याने गाढ झोपलेले गोपाळराव चक्क कॉटवरून खाली पडले …. …आणि त्यांना ते कळलंही नाही. त्यांनी शांतपणे फक्त कूस बदलली. 

——– आता छातीशी कवटाळलेली उशी दूर करूच नये इतकी सुखकारक असल्यासारखं वाटत होतं त्यांना—- आणि फरशी तर इतकी उबदार.. जाड आणि मऊमऊ ….खिडकीतून दिसणाऱ्या डोंगरामागून डोकावणारा पौर्णिमेचा चंद्र जणू फक्त त्यांच्याचकडे पहात खट्याळपणे हसत होता, आणि इतक्या वर्षांत- झोपेत का होईना – पहिल्यांदाच गोपाळराव अतिशय खूष होऊन चक्क गोड लाजत होते….. 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे. 

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद.

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया  देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली  मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे….!

असो….  !! ?⭐?

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

दिवाळी गोवत्स द्वादशी पासूनही साजरी करतात. गुरुद्वादशी असंही म्हटलं जातं. खेड्यात  गोधनाला खूप महत्त्व असल्याने पूर्वीपासून आताही गाय-वासराची किंवा त्याच्या फोटोची पूजा करतात. शिष्य गुरूंचे पूजन करायचे. मात्र आज ही प्रथा फारशी दिसत नाही.

धनत्रयोदशी दिवशी पूर्वी आणि आताही व्यापारी वह्या आणि तिजोर्यांची पूजा करतात. धन्वंतरी जयंती असल्याने वैद्य डॉक्टर त्याची पूजा करतात. पूर्वी आणि आताही. पूर्वीची आणखी एक प्रथा कणकेच्या तेलाचा दिवा घराबाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जायचा. आणि सर्वजण मिळून सूर्याला प्रार्थना करायचे मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह त्रयोदश्यां  दीपदानात सूर्यज प्रियतां मम . आज क्वचित ठिकाणी हे दिसते. पूर्व परंपरेनुसार   क्वचित  ठिकाणी ब्रह्मास्त्राच्या  प्रतिमेची , निर्जळी उपास  करून, पुरणाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. ही प्रथा आज फारशी माहित नाही पाण्याचे हांडे  घासूनपुसून तेही पूजले जायचे.आज गिझर आणि गॅस असल्याने हांडे कोठे दिसत नाहीत. नरक चतुर्दशी दिवशी चे अभ्यंगस्नान आजही आहे. पण पूर्वी इतका मसाज करणे होत नाही. पूर्वी तीळ, खसखस, वाटून ते उटणे अंगाला लावत. आज उटण्याची तयार पावडर मिळते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जायचे. आज कारिट कोणाला माहित असेल असे वाटत नाही. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णू आणि कुबेर आणि घरातील दागदागिने यांची पूजा केली जायची.तसेच अलक्ष्मीचा नाश व्हावा म्हणून घरातला कचरा काढणारी केरसुणीची पूजा करून दमडी आणि सुपे वाजवून बाहेर टाकला जायचा. आजही काही ठिकाणी हे चित्र दिसते. काही घरात, घरातली स्त्री समाधानी, आनंदी रहावी , म्हणून गृहलक्ष्मी  म्हणून तिची पूजा केली जाते. पूर्वीचे फटाके आणि आता चे फटाके यातही खूप फरक पडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री जागवत असत. पगडी पट मांडला जायचा .खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. आता नवीन पिढीला पगडी पट हा खेळ आणि ते नावही माहीत नसावे. पाडव्यादिवशी खेड्यात लव्हाळीची दिवटी करून त्याने गायी वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे . यादिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत करून, त्यावर दुर्वा फुले  खोचून , कृष्ण गाई वासरे यांची चित्रे त्यावर मांडून पूजा आणि मिरवणूक काढण्याची  प्रथा होती ही प्रथा आज फारशी दिसत नाही. पत्नी पतीला ओवाळण्याची पद्धत पुर्वापार आहे.फक्त देणे-घेणे वाढले आहे. भाऊबीज, या दिवशी भावाने घरी न जेवता बहिणीकडे जेवावे, आणि तिने भावा प्रति प्रार्थना करून कुशल चिंतावे.”हातजोडी ते उगवत्या नारायणा, जतन कर देवा ,माझा बंधूजी  राणा”. असे म्हणून ओवाळावे. ही प्रथा आज आहे . फक्त भेटवस्तू देण्यात फरक पडलाय.

दिवाळी हा सण नात्या नात्यांशी इतकंच काय पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीशी भाव बंधनांनी आणि आत्मीयतेने जवळीक आणणारा असा  हा सण !कालच्या दिवाळीतला आनंद, चैतन्य ,उत्साह, यात बदल होतच राहणार. काल आणि आज प्रमाणे उद्याच्या दिवाळीतही फरक पडणारच. लाईटच्या माळा, भडक सजावटी, मिठाया ही सगळी आनंदाची बाह्यरूप. खरी दिवाळी मनांकडून  मनाकडे. एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम जिव्हाळा आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची.

   “सर्वांना दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, शांतीची आणि आरोग्यदायी जावो”

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तीन शब्दांची कविता….स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ तीन शब्दांची कविता….स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

इंदिरा संतांची  वाक्यागणिक तीन शब्दांची  कविता…..???

अक्कु बक्कुची दिवाळी – ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा 

अक्कु बक्कुला पाठवा

आली जवळ दिवाळी   

दोघी येतील आजोळी

घरी मोटार आणेन      

घेऊन दोघींना जाईना

दोघी आनंदाने फुलल्या 

आईभोवती नाचल्या

दारी मोटार येणार         

मामा घेवुन जाणार

मामा आम्हांला नेणार  

आम्ही आजोळी जाणार

आई मुळीच बोलेना       

काम हातचं सोडेना

अक्कु सुजाण थांबली   

मिठी आईला घातली

का गं मुळी ना बोलशी   

सांग धाडते तुम्हाशी

घेवुन दोघींना जवळ      

आई बोलली प्रेमळ

तुम्ही दोघीही जाणार     

कशी तयारी होणार

बरे कपडे रोजला          

कोरे चांगले सणाला

खण रेशमी मामीला       

एक खेळणे बाळाला

नाही पगार अजुन         

कसे यावे हे जमुन

दोघी मुळी न रुसल्या     

दोघी निमुट उठल्या

काचा कवड्या खेळत    

दोघी क्षणात रंगल्या

उद्यापासुन दिवाळी        

घरी नाहीत चाहुली

नाही फटाके सामान       

नाही खमंग तळण

दोन पणत्या दारात         

दोन बहिणी घरात

बक्कु जराशी रुसली       

अक्कु निमुट राहिली

दोघी बसल्या दारात         

रस्ता उधळी दिवाळी

आली मामाची मोटार       

आली मामाची मोटार

अक्कु सांगते कानात        

बक्कु ऐकते शहाणी         

दोघी करिती स्वागत          

मामा बसले चहाला          

दोघी गळ्यात पडल्या        

आत्या उद्याला येणार        

आम्ही येथेच राहणार         

आम्ही येथेच राहणार        

नाही येणार येणार

शब्द ऐकोनी दोघींचे          

डोळे स्तिमित आईचे

किती किती ते सामान        

मामा आणती काढुन

खोकी दारुच्या कामाची     

खोकी परकर झग्याची

एक रेशमी पातळ              

दोन डब्यात फराळ

नाही येणार म्हणुनी              

आहे दिलेले मामीने

तुम्ही ताईच्या माळणी         

दोघी गुणाच्या गवळणी

तुमचे गुपीत कळाले           

डोळे मामाचे भरले

आला मामाला गहिवर         

घेता दोघींंना जवळ

मामा जाताच निघुन            

आली दिवाळी धावुन

नव्या झग्याच्या झोकात       

दारु शोभेची बरसात

नव्या झग्याच्या झोकात       

दारु शोभेची बरसात

सरसर कारंजे उडाली           

तारामंडळे फिरली

 

-इंदिरा संत

?????

अप्रतिम कविता, आपल्या पिढीतल्या अनेकांच्या घरातली कथा (की व्यथा), कितीही ओळखीची असली तरीही डोळे पाणावतातच

हो ना?

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

एखादं गर्भरेशमी वस्त्र ल्यायल्यानंतर त्याच्या तलम, मुलायम स्पर्शानं मन मोहवतं, सुखावतं, शांतावतं. नेमकी तशीच अनुभूती नावाप्रमाणे रसराज असणारे पं. जसराज ह्यांचा सूर आपल्याला देतो. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयात मी पं. जसराजांना ऐकलं. अगदी ऋषितुल्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ सूर ह्यांची ती एकत्रित अनुभूती एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्याऱ्या घटकांपैकी एक म्हणावी लागेल. एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तसंच अगदी लहागग्या वयातच त्यांच्या सुरानं माझ्या मनात घर केलं. अत्यंत तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली.

सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! मेवाती घराण्याच्या ह्या अध्वर्यूविषयी, त्यांच्या गायकीविषयी मी काही लिहिणं म्हणजे अगदीच मिणमिणत्या ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं आहे. परंतु आपापल्या परीनं प्रत्येकजण कलाकाराच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं शोधत असतो किंबहुना ती आपसूकच श्रोत्याच्या मनात उमटत जातात. त्यांच्या बाबतीत मला जे भावलं ते म्हणजे त्यांच्या सुरांतली मनाला स्पर्शणारी, मनात खोलवर झिरपत जाणारी भावगर्भता! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

नेमानं संगीताची साधना घडत असलेल्या घरात पं. जसराजजींचा जन्म झाला. त्यांचे पिता पं. मोतीराम जसराजजी अवघे चार वर्षांचे असताना निवर्तले मात्र त्यापूर्वी त्यांच्याकडून जसराजजींना संगीताची दीक्षा मिळाली होती. त्यानंतर त्यांचे सर्वात वडील बंधू पं. मणिराम ह्यांच्याकडून गायनाची व मधले बंधू पं. प्रताप नारायण ह्यांच्याकडून तबल्याची उत्तम तालीम त्यांना मिळाली. त्यानंतर मेवाती घराण्याचे दिग्गज महाराणा जयवंत सिंह वाघेला व आगऱ्याचे स्वामी वल्लभदास ह्यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. बाबा श्याम मनोहर गोस्वामी महाराजांच्या सानिध्यात हवेली संगीताचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी बऱ्याच नवीन बंदिशी बांधल्या. त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! मनोमन सदैव कृष्णभक्तीत रममाण असणाऱ्या जसराजजींनी अनेक भजनांतूनही आपल्या भक्तिरसानं रसिकांना चिंब न्हाऊ घातलं. ही सगळी किमया म्हणजे संगीतमार्तंड पं. जसराजांनी आपल्या दैवी देणगीला दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

आवाजाच्या नैसर्गिक धाटणीत असलेल्या फरकामुळं स्त्री व पुरुष गायक, दोघांनाही स्वत:च्या आवाजाच्या पोताशी तडजोड न करता, स्वरतंतूंवर ताण न देता एकत्र गाता येत नाही. सहगायन करायचं म्हटलं तर कुणा एकाला आपल्या आवाजाच्या नैसर्गीक पट्टीपेक्षा चढ्या किंवा खालच्या पट्टीत गाणं अपरिहार्य होऊन जातं. त्यामुळं गाणाऱ्याचं समाधानही होत नाही आणि गायनाचा म्हणावा तसा प्रभावही पडत नाही. बहुधा स्त्रीशिष्यांना स्वत:च्या पट्टीत तालीम देताना किंवा स्त्री व पुरुष शिष्यांना एकत्र तालीम देताना आवाजाच्या नैसर्गिक पट्टीतल्या फरकाच्या गोष्टीवर त्यांचं सातत्यानं चिंतन घडत राहिलं असावं आणि त्यातूनच त्यांनी एक अभिनव प्रयोग केला, जो प्रथम पुण्यात झाला आणि तिथल्या रसिकांना तो अत्यंत भावल्याने त्यांनी त्या प्रयोगाला जसराजजींच्या सन्मानार्थ प्रेमभावानं ‘जसरंगी जुगलबंदी’ हे नाव दिलं.

शास्रीय संगीतातील मूर्छना तत्वावर आधारित असलेला हा प्रयोग आहे. ह्या जुगलबंदीत एक स्त्री गायक तर एक पुरूष गायक असतो. दोघंही आपापल्याच पट्टीत गातात तरीही सोबत गाऊ शकतात. दोघांचे साथीदार वेगवेगळे असतात कारण त्यांच्या पट्ट्या वेगळ्या असतात. दोघांचे रागही भिन्न असतात, तरीही त्यातलं एकसंधपण टिकून राहातं कारण एका गायकाचा मध्यम दुसऱ्या गायकाचा षड्ज असतो आणि एकूण स्केलमधली स्वरांतरं बदलत नाहीत. फक्त षड्जाचं स्थान बदललं तर त्यानुसार रागाचं नाव बदलतं. ह्याच गोष्टीचा वापर करून हा प्रयोग केला गेला जो अतिशय लोकप्रिय झाला. अर्थातच ह्या प्रयोगाला काही मर्यादा नक्कीच आहेत ज्या अपरिहार्य आहेत. मात्र एक नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण गोष्ट म्हणून ही जुगलबंदी नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. 

आज विचार करता वाटतं, जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. फक्त संगीताशी निष्ठावंत असणाऱ्या ह्या कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व कायमच सोबत असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली अलौकिक रत्नप्रभा ही बऱ्याचदा जगण्याची ऊर्जा ठरते. ‘आत्मसुख देणारं ते हे संगीत’ अशी धारणा वर्षानुवर्षं मनात जपली गेली आहे ती केवळ त्यांच्या सच्च्या सुरानं दिलेल्या अद्भुत अनुभूतीमुळं! असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

इतकंच म्हणता येईल की, भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च ह्या कलाकारांना दिलेलं वरदान म्हणजे आपल्यासाठी निखळ आनंदाचा ठेवा, ऊर्जास्त्रोत व प्रेरणास्थान! ह्या स्वरसाधकांनी ‘साधलेल्या’ अलौकिक सुरांना सादर वंदन! ह्या चार सुरांना गुंफणारी शब्दमाला आज पूर्ण होतेय. अशा अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी झाल्याच्या आनंदात आपली रजा घेते. त्यापूर्वी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ??

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 106 ☆ सुक़ून की तलाश ☆ डॉ. मुक्ता

डॉ.  मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय आलेख सुक़ून की तलाश।  यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 106 ☆

☆ सुक़ून की तलाश ☆

‘चौराहे पर खड़ी ज़िंदगी/ नज़रें दौड़ाती है / कोई बोर्ड दिख जाए /जिस पर लिखा हो /सुक़ून… किलोमीटर।’ इंसान आजीवन दौड़ता रहता है ज़िंदगी में… सुक़ून की तलाश में, इधर-उधर भटकता रहता है और एक दिन खाली हाथ इस जहान से रुख़्सत हो जाता है। वास्तव में मानव की सोच ही ग़लत है और सोच ही जीने की दिशा निर्धारित करती है। ग़लत सोच, ग़लत राह, परिणाम- शून्य अर्थात् कभी न खत्म होने वाला सफ़र है, जिसकी मंज़िल नहीं है। वास्तव में मानव की दशा उस हिरण के समान है, जो कस्तूरी की गंध पाने के निमित्त, वन-वन की खाक़ छानता रहता है, जबकि कस्तूरी उसकी नाभि में स्थित होती है। उसी प्रकार बाबरा मनुष्य सृष्टि-नियंता को पाने के लिए पूरे संसार में चक्कर लगाता रहता है, जबकि वह उसके अंतर्मन में बसता है…और माया के कारण वह मन के भीतर नहीं झांकता। सो! वह आजीवन हैरान- परेशान रहता है और लख-चौरासी अर्थात् आवागमन के चक्कर से मुक्ति नहीं प्राप्त कर सकता। कबीरजी का दोहा ‘कस्तूरी कुंडली बसे/ मृग ढूंढे बन मांहि/ ऐसे घट-घट राम हैं/ दुनिया देखे नांही’  –सांसारिक मानव पर ख़रा उतरता है। अक्सर हम किसी वस्तु को संभाल कर रख देने के पश्चात् भूल जाते हैं कि वह कहां रखी है और उसकी तलाश इधर-उधर करते रहते हैं, जबकि वह हमारे आसपास ही रखी होती है। इसी प्रकार मानव भी सुक़ून की तलाश में भटकता रहता है, जबकि वह तो उसके भीतर निवास करता है। जब हमारा मन व चित्त एकाग्र हो जाता है; उस स्थिति में परमात्मा से हमारा तादात्म्य हो जाता है और हमें असीम शक्ति व शांति का अनुभव होता है। सारे दु:ख, चिंताएं व तनाव मिट जाते हैं और हम अलौकिक आनंद में विचरण करने लगते हैं… जहां ‘मैं और तुम’ का भाव शेष नहीं रहता और सुख-दु:ख समान प्रतीत होने लगते हैं। हम स्व-पर के बंधनों से भी मुक्त हो जाते हैं। यही है आत्मानंद अथवा हृदय का सुक़ून; जहां सभी नकारात्मक भावों का शमन हो जाता है और क्रोध,  ईर्ष्या आदि नकारात्मक भाव जाने कहां लुप्त जाते हैं।

हां ! इसके लिए आवश्यकता है…आत्मकेंद्रितता, आत्मचिंतन व आत्मावलोकन की…अर्थात् सृष्टि में जो कुछ हो रहा है, उसे निरपेक्ष भाव से देखने की। परंतु जब हम अपने अंतर्मन में झांकते हैं, तो हमें अच्छे-बुरे व शुभ-अशुभ का ज्ञान होता है और हम दुष्प्रवृत्तियों से मुक्ति पाने का भरसक प्रयास करते हैं। उस स्थिति में न हम दु:ख से विचलित होते हैं; न ही सुख की स्थिति में फूले समाते हैं; अपितु राग-द्वेष से भी कोसों दूर रहते हैं। यह है अनहद नाद की स्थिति…जब हमारे कानों में केवल ‘ओंम’ अथवा ‘तू ही तू’ का अलौकिक स्वर सुनाई पड़ता है अर्थात् ब्रह्म ही सर्वस्व है… वह सत्य है, शिव है, सुंदर है और सबसे बड़ा हितैषी है। उस स्थिति में हम निष्काम कर्म करते हैं…निरपेक्ष भाव से जीते हैं और दु:ख, चिंता व अवसाद से मुक्त रहते हैं। यही है हृदय की मुक्तावस्था… जब हृदय में उठती भाव-लहरियां शांत हो जाती हैं… मन और चित्त स्थिर हो जाता है …उस स्थिति में हमें सुक़ून की तलाश में बाहर घूमना नहीं पड़ता। उस मनोदशा को प्राप्त करने के लिए हमें किसी भी बाह्य सहायता की आवश्यकता नहीं होती, क्योंकि आप स्वयं ही अपने सबसे बड़े संसाधन हैं। इसके लिए आपको केवल यह जानने की दरक़ार रहती है कि आप एकाग्रता से अपनी ज़िंदगी बसर कर रहे हैं या व्यर्थ की बातों अर्थात् समस्याओं में उलझे रहते हैं। सो! आपको अपनी क्षमता व योग्यताओं को बढ़ाने के निमित्त अधिकाधिक समय स्वाध्याय व चिंतन-मनन में लगाना होगा और अपना चित्त ब्रह्म के ध्यान में  एकाग्र करना होगा। यही है…आत्मोन्नति का सर्वश्रेष्ठ मार्ग। यदि आप शांत भाव से अपने चित्त को एकाग्र नहीं कर सकते, तो आपको अपनी वृत्तियों को बदलना होगा और यदि आप एकाग्र-चित्त होकर, शांत भाव से परिस्थितियों को बदलने का सामर्थ्य भी नहीं जुटा पाते, तो उस स्थिति में आपके लिए मन:स्थिति को बदलना ही श्रेयस्कर होगा। यदि आप दुनिया के लोगों की सोच नहीं बदल सकते, तो आपके लिए अपनी सोच को बदल लेना ही उचित, सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम होगा। राह में बिखरे कांटों को चुनने की अपेक्षा जूता पहन लेना आसान व सुविधाजनक होता है। जब आप यह समझ लेते हैं, तो विषम परिस्थितियों में भी आपकी सोच सकारात्मक हो जाती है, जो आपको पथ-विचलित नहीं होने देती। सो! जीवन से नकारात्मकता को निकाल बाहर फेंकने के पश्चात् पूरा संसार सत्यम् शिवम्, सुंदरम् से आप्लावित दिखाई पड़ता है।

सो! सदैव अच्छे लोगों की संगति में रहिए, क्योंकि बुरी संगति के लोगों के साथ रहने से बेहतर है… एकांत में रहना। ज्ञानी, संतजन व सकारात्मक सोच के लोगों के लिए एकांत स्वर्ग तथा मूर्खों के लिए क़ैद-खाना है। अज्ञानी व मूर्ख लोग आत्मकेंद्रित व कूपमंडूक होते हैं तथा अपनी दुनिया में रहना पसंद करते हैं। ऐसे अहंनिष्ठ लोग पद-प्रतिष्ठा देखकर, ‘हैलो-हाय’ करने व संबंध स्थापित करने में विश्वास रखते हैं। इसलिए हमें ऐसे लोगों को कोटिश: शत्रुओं सम त्याग देना चाहिए…तुलसीदास जी की यह सोच अत्यंत सार्थक है।

मानव अपने अंतर्मन में असंख्य अद्भुत, विलक्षण शक्तियां समेटे है। परमात्मा ने हमें देखने, सुनने, सूंघने, हंसने, प्रेम करने व महसूसने आदि की शक्तियां प्रदान की हैं। इसलिए मानव को परमात्मा की सर्वश्रेष्ठ कृति स्वीकारा गया है। सो! हमें इनका उपभोग नहीं, उपयोग करना चाहिए… सदुपयोग अथवा नि:स्वार्थ भाव से उनका प्रयोग करना चाहिए। यह हमें परिग्रह अर्थात् संग्रह-दोष से मुक्त रखता है, क्योंकि हमारे शब्द व मधुर वाणी, हमें पल भर में सबका प्रिय बना सकती है और शत्रु भी। इसलिए सोच-समझकर मधुर व कर्णप्रिय शब्दों का प्रयोग कीजिए,  क्योंकि शब्द हमारे व्यक्तित्व का आईना होते हैं। सो! हमें दूसरों के दु:ख की अनुभूति कर, उनके प्रति करुणा-भाव प्रदर्शित करना चाहिए। समय सबसे अनमोल धन है; उससे बढ़कर तोहफ़ा दुनिया में हो ही नहीं सकता… जो आप किसी को दे सकते हैं। धन-संपदा देने से अच्छा है कि आप उस के दु:ख को अनुभव कर, उसके प्रति सहानुभूति प्रकट करें तथा प्राणी-मात्र के प्रति स्नेह-सौहार्द भाव बनाए रखें।

स्वयं को पढ़ना दुनिया का सबसे कठिन कार्य है… प्रयास अवश्य कीजिए। यह शांत मन से ही संभव है। खामोशियां बहुत कुछ कहती हैं। कान लगाकर सुनिए, क्योंकि भाषाओं का अनुवाद तो हो सकता है, भावनाओं का नहीं…हमें इन्हें समझना, सहेजना व संभालना होता है। मौन हमारी सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम भाषा है, जिसका लाभ दोनों पक्षों को होता है। यदि हमें स्वयं को समझना है, तो हमें खामोशियों को पढ़ना व सीखना होगा। शब्द खामोशी की भाषा का अनुवाद तो नहीं कर सकते। सो! आपको खामोशी के कारणों की तह तक जाना होगा। वैसे भी मानव को यही सीख दी जाती है कि ‘जब आपके शब्द मौन से बेहतर हों, तभी मुंह खोलना चाहिए।’  मानव की खामोशी अथवा एकांत में ही हमारे शास्त्रों की रचना हुई है। इसीलिए कहा जाता है कि अंतर्मुखी व्यक्ति जब बोलता है, तो उसका प्रभाव लंबे समय तक रहता है… क्योंकि उसकी वाणी सार्थक होती है। परंतु जो व्यक्ति अधिक बोलता है, व्यर्थ की हांकता है तथा आत्म-प्रशंसा करता है… उसकी वाणी अथवा वचनों की ओर कोई ध्यान नहीं देता…उसकी न घर में अहमियत होती है, न ही बाहर के लोग उसकी ओर तवज्जो देते हैं। इसलिए अवसरानुकूल, कम से कम शब्दों में अपनी बात कहने की दरक़ार होती है, क्योंकि जब आप सोच-समझ कर बोलेंगे, तो आपके शब्दों का अर्थ व सार्थकता अवश्य होगी। लोग आपकी महत्ता को स्वीकारेंगे, सराहना करेंगे और आपको चौराहे पर खड़े होकर सुक़ून की तलाश …कि• मी• के बोर्ड की तलाश नहीं करनी पड़ेगी, बल्कि आप स्वयं तो सुक़ून से रहेंगे ही; आपके सानिध्य में रहने वालों को भी सुक़ून की प्राप्ति होगी।

वैसे भी क़ुदरत ने तो हमें केवल आनंद ही आनंद दिया है, दु:ख तो हमारे मस्तिष्क की उपज है। हम जीवन-मूल्यों का तिरस्कार कर,  प्रकृति से खिलवाड़ व उसका अतिरिक्त दोहन कर, स्वार्थांध होकर दु:खों को अपना जीवन-साथी बना लेते हैं और अपशब्दों व कटु वाणी द्वारा उन्हें अपना शत्रु बना लेते हैं। हम जिस सुख व शांति की तलाश संसार में करते हैं, वह तो हमारे अंतर्मन में व्याप्त है। हम मरुस्थल में मृग-तृष्णाओं के पीछे दौड़ते-दौड़ते, हिरण की भांति अपने प्राण तक गंवा देते हैं और अंत में हमारी स्थिति ‘माया मिली न राम’ जैसी हो जाती है। हम दूसरों के अस्तित्व को नकारते हुए, संसार में उपहास का पात्र बन जाते हैं;  जिसका दुष्प्रभाव दूसरों पर ही नहीं, हम पर ही पड़ता है। सो! संस्कृति को, संस्कारों की जननी स्वीकार, जीवन-मूल्यों को अनमोल जानकर जीवन में धारण कीजिए, क्योंकि लोग तो दूसरों की उन्नति करते देख, उनकी टांग खींच, नीचा दिखाने में ही विश्वास रखते हैं। उनकी अपनी ज़िंदगी में तो सुक़ून होता ही नहीं और वे दूसरों को भी सुक़ून से नहीं जीने देते हैं। अंत में, मैं महात्मा बुद्ध का उदाहरण देकर अपनी लेखनी को विराम देना चाहूंगी। एक बार उनसे किसी ने प्रश्न किया ‘खुशी चाहिए।’ उनका उत्तर था पहले ‘मैं’ का त्याग करो, क्योंकि इसमें ‘अहं’ है। फिर ‘चाहना’ अर्थात् ‘चाहता हूं’ को हटा दो, यह ‘डिज़ायर’ है, इच्छा है। उसके पश्चात् शेष बचती है, ‘खुशी’…वह  तुम्हें मिल जाएगी। अहं का त्याग व इच्छाओं पर अंकुश लगाकर ही मानव खुशी को प्राप्त कर सकता है, जो क्षणिक सुख ही प्रदान नहीं करती, बल्कि शाश्वत सुखों की जननी है।’ हां! एक अन्य तथ्य की ओर मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहूंगी कि ‘इच्छा से परिवर्तन नहीं होता; निर्णय से कुछ होता है तथा निश्चय से सब कुछ बदल जाता है और मानव अपनी मनचाही मंज़िल अथवा मुक़ाम पर पहुंच जाता है।’ इसलिए दृढ़-निश्चय व आत्मविश्वास को संजोकर रखिए; अहं का त्याग कर मन पर अंकुश लगाइए; सबके प्रति स्नेह व सौहार्द रखिए तथा मौन के महत्व को समझते हुए, समय व स्थान का ध्यान रखते हुए अवसरानुकूल सार्थक वाणी बोलिए अर्थात् आप तभी बोलिए, जब आपके शब्द मौन से बेहतर हों…क्योंकि यही है–सुक़ून पाने का सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम मार्ग, जिसकी तलाश में मानव युग-युगांतर से भटक रहा है।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अंतर्प्रवाह ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – अंतर्प्रवाह? ?

हलाहल निरखता हूँ

अचर हो जाता हूँ,

अमृत देखता हूँ

प्रवाह बन जाता हूँ,

जगत में विचरती देह,

देह की असीम अभीप्सा,

जीवन-मरण, भय-मोह से

मुक्त जिज्ञासु अनिच्छा,

दृश्य और अदृश्य का

विपरीतगामी अंतर्प्रवाह हूँ,

स्थूल और सूक्ष्म के बीच

सोचता हूँ मैं कहाँ हूँ..!

गोवर्धन पूजा की हार्दिक शुभकामनाएँ

©  संजय भारद्वाज

20.9.2017, प्रातः 7:06 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ किसलय की कलम से # 57 ☆ पर्वों पर सांप्रदायिक सद्भावना ☆ डॉ विजय तिवारी ‘किसलय’

डॉ विजय तिवारी ‘किसलय’

(डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं।  आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक अत्यंत विचारणीय  एवं सार्थक आलेख “पर्वों पर सांप्रदायिक सद्भावना।)

☆ किसलय की कलम से # 57 ☆

☆ पर्वों पर सांप्रदायिक सद्भावना ☆

पर्वों की सार्थकता तभी है जब उन्हें आपसी सद्भाव, प्रेम-भाईचारे और हँसी-खुशी से मनाया जाए। अपनी संस्कृति, प्रथाओं व परंपराओं की विरासत को अक्षुण्ण रखने के साथ-साथ अगली पीढ़ी के अनुकरणार्थ हम पर्वों को मनाते हैं। ये पर्व धार्मिक, सामाजिक अथवा राष्ट्रीय क्यों न हों, हर पर्व का अपना इतिहास और सकारात्मक उद्देश्य होता है। पर्व कभी भी विद्वेष अथवा अप्रियता हेतु नहीं मनाये जाते। पर्वों के उद्देश्य को ध्यान में रखते हुए परंपरानुसार उन्हें मनाने की रीति चली आ रही है। पहले हमारे भारतवर्ष में हिंदु धर्म के अतिरिक्त अन्य कोई धर्मावलंबी नहीं थे, तब आज जैसी परिस्थितियाँ कभी निर्मित ही नहीं हुईं। आज जब विभिन्न धर्मावलंबी हमारे देश में निवास करते हैं, तब धर्म हर धर्म के लोग अपनी अपनी रीति रिवाज के अनुसार अपने पर्व सामाजिक स्तर पर मनाते हैं और होना भी यही चाहिए। मानवीय संस्कार सभी को अपने-अपने धर्मानुसार पर्व मनाने की सहज स्वीकृति देते हैं।

कहते हैं कि जहाँ चार बर्तन होते हैं उनका खनकना आम बात है। ठीक इसी प्रकार जब हमारे देश में विभिन्न धर्मावलंबी एक साथ, एक ही सामाजिक व्यवस्थानुसार रहते हैं तो यदा-कदा कुछेक अप्रिय स्थितियों का निर्मित होना स्वाभाविक है। विवाद तब होता है जब मानवीयता से परे, स्वार्थवश, संकीर्णतावश, विद्वेष भावना के चलते कभी अप्रिय स्थितियाँ निर्मित हो जाती हैं। ऐसी परिस्थितियों के लिए मुख्य रूप से कट्टरपंथियों की अहम भूमिका होती है। ये विशेष स्वार्थ के चलते फिजा में जहर घोलकर अपना वर्चस्व व प्रभाव स्थापित करना चाहते हैं। तथाकथित धर्मगुरुओं एवं विघ्नसंतोषियों के बरगलाने पर भोली जनता इनके प्रभाव अथवा दबाव में आकर इनका साथ देती है। ये वही लोग होते हैं जो धर्म स्थलों, धार्मिक जुलूसों अथवा पर्व मना रही भीड़ में घुसकर ऐसी अप्रिय स्थितियाँ निर्मित कर देते हैं, जिससे आम जनता न चाहते हुए भी आक्रोशित होकर इतरधर्मियों पर अपना गुस्सा निकालने लगती है। यही वे हालात होते हैं, जब धन-जन की क्षति के साथ-साथ सद्भावना पर भी विपरीत असर पड़ता है। ये हालात समय के साथ-साथ सामान्य तो हो जाते हैं लेकिन इनका दूरगामी दुष्प्रभाव भी पड़ता है। नवयुवकों में इतरधर्मों के प्रति नफरत का बीजारोपण होता है। ये दिग्भ्रमित नवयुवक भविष्य में समाज विरोधी गतिविधियों में लिप्त हो जाते हैं। ऐसे लोग देश और समाज के लिए बेहद खतरनाक साबित हो सकते हैं।

आज जब विश्व में शैक्षिक स्तर गुणोत्तर उठ रहा है। भूमंडलीकरण के चलते सामाजिक, धार्मिक व व्यवसायिक दायरे विस्तृत होते जा रहे हैं। आज धर्म और देश की सीमा लाँघकर अंतरराष्ट्रीय विवाह होने लगे हैं। लोग अपने देश को छोड़कर विभिन्न देशों में उसी देश के प्रति वफादार और समर्पण की मानसिकता से वहीं की नागरिकता ग्रहण कर रहे हैं, बावजूद इसके हम आज भी वहीं अटके हुए हैं और उन्हीं चिरपरिचित स्वार्थी लोगों का समर्थन कर देश को हानि पहुँचाने में एक सहयोगी जैसी भूमिका का निर्वहन करते हैं।

आज हमें बुद्धि एवं विवेक से वर्तमान की परिस्थितियों पर पुनर्विचार करना पड़ेगा। हमें स्वयं व अपने देश के विकास पर ध्यान केंद्रित करना होगा। मानव की प्रकृति होती है कि वह सबसे पहले अपना और स्वजनों का भला करें, जिसे पूर्ण करने में लोगों का जीवन भी कम पड़ जाता है। तब आज किसके पास इतना समय है कि वह समाज, धर्म, देश व आपसी विद्वेष के बारे में सोचे। ऐसे कुछ ही प्रतिशत लोग हैं जिन्हें न अपनी, और न ही देश की चिंता रहती है। पराई रोटी के टुकड़ों पर पलने वाले और तथाकथित आकाओं-संगठनों के पैसों से ऐशोआराम करने वाले ही आज समाज के विरोध में खड़े दिखाई देते हैं।

आप स्वयं चिंतन-मनन कर पाएँगे कि वर्तमान की परिस्थितियाँ सामाजिक विघटन तथा अलगाव की बिल्कुल भी अनुमति नहीं देती। आज की दिनचर्या भी इतनी व्यस्त और एकाकी होती जा रही है कि मानव को दीगर बातें सोचने का अवसर ही नहीं मिलता। तब जाकर यह बात सामने आती है कि आखिर इन परिस्थितियों का निराकरण कैसे किया जाये।

एक साधारण इंसान भी यदि निर्विकार होकर सोचे तो उसे भी इसका समाधान मिल सकता है। हमें बस कुछ बातों का ध्यान रखना होगा। हम एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र के नागरिक हैं। यहाँ सबको अपने धर्म और मजहब के अनुसार जीने का हक है। जब तक इतरधर्मी शांतिपूर्ण ढंग से, अपनी परंपरानुसार पर्व मनाते हैं, हमें उनके प्रति आदर तथा सद्भाव बनाये रखना है। पर्वों के चलते जानबूझकर नफरत फैलाने का प्रयास कदापि नहीं करना है। इतरधर्मियों, इतर धार्मिक पूजाघरों के समक्ष जोश, उत्तेजना व अहंकारी बातों से बचना होगा। सभी धर्मों के लोग भी इन परिस्थितियों में सद्भाव बनाए रखें तथा सहयोग देने से न कतरायें। धर्म का हवाला देकर दूरी बनाना किसी भी धर्म में नहीं लिखा है। यह सब धर्मगुरुओं के नियम-कानून और स्वार्थ हो सकते हैं। ईश्वर ने सबको जन्म दिया है, वह सब का भला चाहता है। तब उसके व्यवहार में अंतर कैसे हो सकता है। शासन-प्रशासन, धर्म-गुरु और सामान्य लोग सभी मिलजुल कर सारे समाज का स्वरूप बदलने में सक्षम हैं। बस सकारात्मक और अच्छे नजरिए की जरूरत है। यह सकारात्मक नजरिया लोगों में कब देखने मिलेगा हमें इंतजार रहेगा। बात बहुत बड़ी है, लेकिन कहा जाता है कि आशा से आसमान टिका है तब हमें इस आशा को विश्वास में बदलने हेतु कुछ प्रयास आज से ही शुरु नहीं करना चाहिए? बस एक बार सोचिए तो सही। आप खुद ब खुद चल पड़ेंगे सद्भावना की डगर, जहां इंसानियत और सद्भावना का बोलबाला होगा।

© डॉ विजय तिवारी ‘किसलय’

पता : ‘विसुलोक‘ 2429, मधुवन कालोनी, उखरी रोड, विवेकानंद वार्ड, जबलपुर – 482002 मध्यप्रदेश, भारत

संपर्क : 9425325353

ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज # 105 ☆ भावना के दोहे ☆ डॉ. भावना शुक्ल

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं   “भावना के दोहे । ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 105 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे ☆

देखो कैसे साल भर,

रहता है उजियार।

दीपों की ये रोशनी,

दूर करे अंधियार।।

 

धानी चूनर ओढ़कर,

प्रकृति करे शृंगार।

धरा प्रफुल्लित हो रही,

हरा-भरा संसार।।

 

लज्जा का घूँघट करो,

धीमे बोलो बोल।

मिल-जुलकर सबसे रहो,

जीवन है अनमोल।।

 

प्रीति रखी है श्याम से,

जग के पालन हार।

जिनकी महिमा है अमित,

करते नैया पार।।

 

मन की गहरी वेदना,

नयन बहाते नीर।

नयनों की भाषा पढ़ो,

तब समझोगे पीर।।

 

नयन-तीर से कामिनी,

करती हृदय-शिकार।

मुझको भी होने लगा,

उससे सच्चा प्यार।।

 

© डॉ.भावना शुक्ल

सहसंपादक…प्राची

प्रतीक लॉरेल , C 904, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब  9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष # 94 ☆ कहाँ  चल दिये …. ☆ श्री संतोष नेमा “संतोष”

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.  “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  एक भावप्रवण रचना  “कहाँ  चल दिये ….। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 94 ☆

☆ कहाँ  चल दिये….  ☆

छोड़ कर आधी कहानी, कहाँ चल दिये

दे कर आँखों में पानी, कहाँ  चल दिये

 

हमको   था  फकत  आसरा  आपका

तोड़ कर ये  ज़िंदगानी,कहाँ  चल  दिये

 

सबक   वफ़ा   का  सीखा ना आपने

खूब करी खुद मनमानी,कहाँ  चल दिये

 

वादा    निभाया    ना   आपने    कभी

छीन कर अब ये जवानी,कहाँ चल दिये

 

तोड़   के  रिश्ते   पल   भर  में  सारे

नींद चुरा कर मस्तानी,कहाँ चल दिये

 

मिलता  न “संतोष”  कभी  आसां  से

भूल कर सभी नादानी,कहाँ चल दिये

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares