(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं “भावना के दोहे”। )
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं एक भावप्रवण रचना “मोरी बिगड़ी बना दो श्याम….”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
स्त्रीया जेव्हा लिहू लागल्या, तेव्हा सुरुवातीच्या आघाडीच्या फळीतील लेखिका म्हणजे गिरिजाबाई केळकर. त्या पहिल्या स्त्री नाटककार. त्यांचा जन्म १८८६ चा. त्या पूर्वाश्रमीच्या द्रौपदी श्रीनिवास बर्वे. वडील गुजरातमध्ये स्थायिक असल्याने त्यांचे ५ वी पर्यंतचे शिक्षण गुजराथीत झाले. ६वीत बर्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत त्या गेल्या. लहानपणी शेजारच्या आजीबाईंना हरीविजय, रमविजय, पांडव प्रताप, या पोथ्या त्या वाचून दाखवत.
१५ व्या वर्षी लग्न झाल्यावर गिरिजाबाई पुण्यात आल्या. वाचनाच्या आवडीतून त्यांनी उत्तम भाषा अवगत केली. दर शुक्रवारी हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या आसपासच्या स्त्रियांना घरी बोलवत आणि वाचायला शिकवत. मासिके, वर्तमानपत्रे वाचून दाखवत. ‘केसरी’ त्या नियमित वाचत. नंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. एक लेख ‘ज्ञानप्रकाश’ला पाठवला. तो छापून आल्यावर त्यांनी नियमित लेखन केले. ‘‘ज्ञानप्रकाश’ आणि ‘आनंद’ मध्ये त्यांचे लेख छापून येत. ‘ज्ञानप्रकाश’ मधील लेखांचे ‘गृहिणी भूषण’ नावाचे पुस्तक पुढे प्रकाशित झाले. त्याला वा. गो. आपटे यांची प्रस्तावना आहे.
त्यांनी ‘पुरूषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले. खाडीलकरांनी लिहिलेल्या ‘बायकांचे बंड’ या नाटकाला सडेतोड उत्तर म्हणून त्यांनी हे नाटक लिहिले. य. ना. टिपणीस यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. १९१३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले.
गिरिजाबाई यांची प्रकाशित पुस्तके – १. मांदोदरी, २.राजकुंवर, ३.हीच मुलीची आई, ४.वरपरीक्षा, ५. सावित्री. ६. आयेषा ही सर्व नाटके आहेत. ‘गृहिणी भूषण’ हा २ भागातला लेखसंग्रह आहे. द्रौपदीची थाळी हे आत्मचरित्र, तर संसारसोपान हे वैचारिक पुस्तक आहे. तसेच स्त्रियांचा वर्ग हे अनुवादीत पुस्तक आहे. स्त्रियानु वर्ग या गुजराती पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
१९२८मधे मुंबईत भरलेल्या २३ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. आज त्यांचा स्मृतिदिन ( २५ फेब्रु. ८० ). त्यांच्या साहित्यिक – नाट्य विषयक कार्याला शतश: प्रणाम ?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संत वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)
गुरूंकडून संकेत मिळताच, वेणास्वामी कीर्तनासाठी उभ्या राहिल्या .समर्थांनी स्त्रियांपैकी, फक्त वेणास्वामींनाच, उभे राहून कीर्तन करण्याची आज्ञा दिली होती. वेणास्वामींनी आपल्या गुरुंना ,रामपंचायतन यांना वंदन केले .आणि आता झांजा वाजवायला सुरुवात केली. कीर्तनाचा पुर्वरंग सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. मैंने राम रतन धन पायो।। वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरू, करि करपा अपनायौ।। जनम जनमकी पूंजी पायी जगमे सबै खोवाऔ ।।
सद्गुरूंनी मला अमूल्य वस्तू दिली आहे. राम नाम रुपी रत्न हा जन्मजन्मांतरीचा ठेवा आहे. कीर्तन चालू असताना, समोर रामचंद्र आणि सद्गुरु दोघेही आहेत. सद्गुरूनी रामाची ओळख करून दिली ,त्यामुळे त्यांनी प्रथम गुरुदेवांना वंदन केले. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ।।गुरूचा महिमा असा की त्याच्यासारखा सख्खा सोयरा कोणी नाही. त्यांच्याच कृपेने, रामनामाची अपार संपत्ती मला मिळाली आहे. ती अखंड अक्षय कुंभा सारखी आहे. पुढे कीर्तनात वेणास्वामींनी एक गोष्ट सांगितली. एक साधू बाबा होते .दुःखी लोक त्याच्याकडे येत. तेव्हा ते कागदावर राम नाम लिहून देत. व तो कागद पाण्यात घोळवून, आजाऱ्याला द्यायला सांगत. एकदा साधू नसताना त्यांच्या शिष्याने त्याप्रमाणे उपाय केला. साधू परत आले .त्यांना ही गोष्ट कळली .आणि राग आला. त्या साधूने शिष्याला सांगितले की, कोपऱ्यातला रंगीत दगड घे.इ आणि बाजारात जाऊन किंमत कर. एका बाईने, दोन मेथीच्या जुड्या ,बनिया ने एक रुपया, सोनाराने एक हजार रुपये, एका जवाहिऱ्याने एक लाख रुपये, दुसऱ्याने पाच कोटी, आणि राजाचा रत्नपारख्याने सारे राज्य अशी किंमत केली. अखेर त्या दगडाने लोखंडाचे सोने व्हायला लागले. साधूने सांगितले, तो पारसमणि आहे .त्याची किंमत कशी करता येणार! तसेच रामाचे नाम हे भव रोगाला नष्ट करणारे आहे .राम नाम मणि दीप धरू,जीह देहरी द्वार । तुलसी भीतर–बाहरी जो चाहसी उजियार ।।रामनामाचा दीप जिभेवर ठेवला तर आत बाहेर सर्वत्र प्रकाश पसरेल, असे तुळशीदास म्हणतात .कीर्तनाचा पूर्वार्ध संपला. समर्थांनी स्वतः वेणास्वामींना बुक्का लावला. आणि हार घातला .श्रीराम जय राम जय जय राम.
त्यांनी स्वतः विपुल काव्य रचना केलेली आहे. त्यांनी चार पाच पदे हिंदीतही केलेली आहेत. उत्तर भारतात ,आपल्या यात्रेत, हिंदुस्थानी भाषेत कीर्तन करून, अगणित लोकांना राम भक्ती मध्ये दीक्षित केले होते .त्यांनी मराठीमध्ये सीतास्वयंवर सारखे खंडकाव्य लिहिले आहे. भारतीय भक्ती साहित्यामध्ये खंड काव्याची रचना करणाऱ्या त्या प्रथम स्त्री साहित्यिक होत. इतकच काय तर त्यांनी मंगल, संकेत ,लवकुश, सुंदर, शब्द व भाषा नावाची सात रामायणे लिहिलेली आहेत. त्यांनी गुहाख्यान व कौल अशी आख्या नात्मक काव्येही लिहिली आहेत. कौल ही राम कथेमधील नवीन कल्पना आहे. त्यामध्ये त्यांची अनन्य भक्ती ,अध्यात्मिक उंची, तत्वज्ञानातील हुषारी, आणि सुरू दयता दिसून येते. यांच्या कीर्तनाचा उत्तररंग सुरू झाला. उत्तर रंगात सीतास्वयंवराचे वर्णन केले आहे. विश्वामित्रांचा यज्ञ यशस्वी होण्यासाठी, राम लक्ष्मण यांना ते घेऊन जातात, येथून सुरुवात केली आहे. वाटेत त्राटिका वध, अहिल्येचा उद्धार, मिथिले चे वर्णन ,आणि जनकाच्या दरबारातील शिवधनुष्य उचलण्याचा रामाचा पराक्रम या सर्व गोष्टी वेणा स्वामींनी ओघवती काव्यात लिहिल्या आहेत. ते वर्णन वाचताना डोळ्यासमोर सर्व गोष्टी उभ्या राहतात. स्वयंवराचे वर्णन तर अप्रतिम केले आहे. मंगल वाद्ये, वधू-वरांचे हळदी लावून स्नान ,नाना प्रकारची पक्वान्ने, फळांचे रस, वेगवेगळ्या वस्त्रालंकारांनी नटून आलेली सभा मंडळी, देवी, देवता ,वराती सह श्रीराम रथावर होते हे सांगताना त्या म्हणतात, ते कनक मणीची मिथिलापुरी। शृंगारिलिसे बहुपरी । राम पहाया नरनारी । मंदिर मस्तकी दुभागी ।। (सी. स्व ९..६६ ). शुभ प्रसंगी विवाह झाला. अगदी प्रत्येक घटनेचे वर्णन वेणास्वामिनी अत्यंत सुंदर शब्दात केले आहे .तीन दिवसांच्या पाहुणचारा नंतर एकमेकांना मोठमोठे आहेर दिले गेले .जनक पत्नी सुमेधा हिने विरहाने अश्रू पुसत, सीतेला उपदेश केला. सर्वांचे रथ आयोध्ये ला आले. आयोध्या नगरीचे वर्णनही खूप छान केले आहे. वेणास्वामी संपूर्ण वर्णन करण्यात रममाण झाल्या. त्या अखेर म्हणाल्या, या रामकथेचा कर्ता रामच आहे, हे गुह्य मी स्वतःच जाणते.” हे बोलणे येथार्थ । कर्ता राम याचा समर्थ । कोणा सांगो हा गुह्मार्थ । माझा मीच जाणे। ( सी. स्व. १४..१४९ ) . हे राघवाची कथा । कर्ता मी नव्हे सर्वथा । सत्य आवडले समर्था । ग्रंथ प्रसिद्धी पावला ।। (सी. स्व.१४..१५० ).
वेडा स्वामींनी गर्जना केली, “जय जय रघुवीर समर्थ “आणि “श्रीराम जय राम जय जय राम” असा जप करत त्या तल्लीन होऊन नाचू लागल्या. डोळे मिटले. पखवाली च्या तालावर त्यांची गती वाढू लागली. राम नाम घुमू लागले. स्वतःला त्या विसरून गेल्या. थकून खाली कोसळल्या. त्या जागी समर्थांचे चरण होते. आपले प्राण गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने, आत्मा परमात्म्यात मिळून गेला. सीतास्वयंवराच्या अख्ख्यानाच्या कीर्तनाचा पूर्णविराम झाला. ( चैत्र वद्य १४ शालिवाहन शके १६०० इसवी सन १६७८ )श्री समर्थांनी वेणास्वामींच्या देहास अग्नी दिला.
समर्थांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.वास्तविक “समर्थ”हे विशेषण रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना दिले आहे.परंतु स्वामींचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना समर्थ ही उपाधि दिली.
शक्ती आणि भक्ती दोन्ही समर्थांच्या ठिकाणी होते. छत्रपति शिवाजी महाराज हे स्वामींचे समकालीन होते.त्या काळात रयतेवर,महिलांवर अन्याय होत होता.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजे आणि स्वामी दोघांचे कार्य समकक्ष होते.दिशा समांतर होत्या.राजे युद्ध, स्वारी,तह, राजकारण यात व्यस्त असत,पण त्यांनी ठिकठिकाणी योद्धे सिद्ध केले होते.समर्थांनी श्रीरामावर श्रद्धा ठेवून युवकांना बलोपासना शिकविली.अनेक मारूती मंदिरांची स्थापना शक्तिची देवता म्हणून स्थापन केली.समर्थ अनेक पातळ्यांवर एकाच वेळी यशस्वी होत होते.त्यांनी महाराष्ट्रभर रामदासी सिद्ध केले होते. समर्थ निर्भय, निर्भीड,स्पष्ट होते.ब्रम्हांडापलिकडे रामकथा गेली पाहिजे असे ते म्हणत.. ते सांस्कृतिक अधिकारी होते.. लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता होती… छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी समर्थांची राजकारणाबरोबर तत्वज्ञानावरही होत असे.दोघांचे मार्ग वेगळे पण लक्ष्य एकच…..
हिंदवी स्वराज्य स्थापन करणे !
दोघांनी एकमेकांच्या क्षमतेची जाण होती…आदर होता… विश्वास होता…”.रामदास स्वामी नावाचा कोणी साधू महाराष्ट्रात आहे,त्यांचा दरारा राज्यात आहे”असे पोर्तुगीज लेखक कास्पोर्दि गार्डा याने लिहिले आहे.
“संत” या कक्षात समर्थ बसणारे नव्हते.संत म्हणजे सहिष्णु,नम्र, क्षमाशील, सोशिक…..पण समर्थ तसे नव्हते ते जिथे आवश्यक तिथे शांत,पण तेवढेच आक्रमक होते:-
“सुभटासि व्हावे सुभट
ठकासि व्हावे महाठक”
असे त्यांनी सांगितले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि समर्थांमध्ये हे विलक्षण साम्य होते ईश्वरभक्तांनी उगीच मिळमिळीत राहू नये,नेटका प्रपंच करावा,संपन्न जीवन जगून ही भक्ती करता येते.असे त्यांचे मत होते.भक्तांनी लाचारी, गयावया का करावी ?, प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कसा असावा? सज्जन भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा बीमोड त्यांनी करून दाखविला: –
“सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे”
हा महान संदेश महाराष्ट्र संकटात असताना त्यांनी दिला.
समर्थांचा शिष्यगण आणि भक्तगण प्रचंड होता.मठ ऐश्वर्यवान होते..त्या ऐश्वर्याचा विनियोग त्यांनी स्वराज्यासाठी केला.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो,”समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी आणि राज्यकर्ता असा पूरक संयोग होता.
स्वामी एकांतप्रिय आणि अनेकांतप्रियही होते.म्हणून दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके हे लोकप्रिय झाले.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजेंना
लिहीलेल्या पत्रात समर्थ प्रारंभी लिहितात :-
“शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भू मंडळी…”
अशा अनेक उपदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना समर्थांनी धीर तर दिलाच,पण कर्तव्याची जाणीव करून दिली.
यापेक्षा मोठे कार्य काय असेल ?
लिहीण्यासारखे अनंत आहे पण लेखनसीमेचा आदर करून इथेच थांबतो.
त्याने लग्नाची मागणी घातली खरी. तो सर्व दृष्टीने उत्तम आहे, हेही खरे पण मग ‘मीच का?’ हा मोठा प्रश्न रजनीला झोप लागून देत नव्हता.
ठरल्याप्रमाणे गेला एक आठवडा ते रोज अर्ध्या तासासाठी भेटत होते. तो एकदाही लेट आला नव्हता. रजनी येण्याच्या आधी तो तेथे हजर असायचा. सुरवातीला साधे कपडे आणि तोंडाला हलकासा पावडरचा हात फिरवून कामाला जाणारी रजनी रोज काहीतरी ठेवणीतले कपडे घालून आणि तोंडाला जरा पॉण्डस क्रीम आणि ओठांवर पुसटशी लिपस्टिक फिरवायला लागली. तिच्यातला तो बदल तिच्या आईच्या लक्षात आला होता तसे आईने तिला त्याबद्दल विचारले. तिच्या आयुष्यात जे काही घडत होते त्याबद्दल तिने जसेच्या तसे सर्व तिच्या आईला सांगितले. प्रथम तिच्या आईलाही धक्का बसला आणि तिने त्या मंगेश पराडकरला घरी घेऊन ये असा सल्ला दिला. रजनीने आईची समजूत काढून, ती हे प्रकरण व्यवस्थित हाताळत आहे ह्याची तिला खात्री दिली आणि लवकरच जर तिच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर ती आधी मंगेशला तिला भेटायला घेऊन येईल ह्याची ग्वाही दिली.
पूर्ण आठवडा ते दोघे रोज भेटत होते. दोघेही आता एकमेकांशी मन मोकळे होऊन बोलत होते. रजनीने त्याच्या बद्दल काढलेल्या माहितीत काही वावगं असे तिला काहीच मिळाले नाही तर त्याच्या ऑफिसमधला त्याचा स्टाफ त्याला देवमाणूस मानत होते. आज तिला मंगेशला त्याने केलेल्या प्रपोजला उत्तर द्यायचे होते.
बरोबर २ वाजता मंगेशला भेटायला ती स्टारबक्समध्ये आली. मंगेशने आज खूपच आकर्षक सूट परिधान केला होता. तो नेहमी सारखाच हँडसम दिसत होता. ती जाऊन त्याच्या टेबलावर बसली. दोन मिनिट्स दोघेही काही न बोलता एकमेकांकडे बघत होते. आज रजनीनेही तिची केस रचना वेगळी केली होती. तिच्या गालांवर एक वेगळाच ग्लो दिसत होता. आज नेहमीपेक्षा ती खूपच आकर्षक दिसत होती. दोघांमधली शांतता मंगेशनीच मोडली. ” काही बोलणार आहेस का अशीच बसणार आहेस. तुझ्या परीक्षेत मी पास झालो की नाही. आज तू उत्तर देणार आहेस. मी खरंच तुझ्या उत्तरासाठी आतुर आहे. ” रजनी थोडी गंभीर झाली. जेंव्हा ती आली त्यावेळच्या आणि आत्ताच्या तिच्या चेहऱ्यात फरक पडला. थोडा दीर्घ पॉज घेऊन रजनीने बोलायला सुरवात केली. ” मंगेश तुझ्याबद्दल जी मी माहिती काढली त्यामध्ये तू खरंच एक उत्तम माणूस म्हणून पास झाला आहेस. तुझ्यात असे काहीच वाईट नाही की ज्यामुळे तुला मी नकार द्यावा तरीपण आज तुला होकार द्यायची माझी हिम्मत होत नाही आणि त्याला कारण एकच आहे ते म्हणजे तू केलेली माझी निवड. मीच का ? ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर तू मला आजपर्यँत दिलेले नाहीस आणि जोपर्यंत मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तिथपर्यंत माझ्या होकाराची अपेक्षा करू नकोस. जे काही असेल ते खरे सांग आज….. ह्या वेळे नंतर परत तुला कधीच तो चान्स मिळणार नाही. तू निवडलेली मुलगी मीच का ? “
मंगेशही गंभीर झाला. ” रजनी ते मी तुला सांगणारच आहे पण ते सांगण्याचे मी थोडे टाळत होतो पण तुझेही बरोबर आहे. तुझी माझी ओळख नसताना, तुला शोधून काढून, तुला तडक लग्नाची मागणी घालतो. का ? तुलाच का ? हा तुला पडलेला प्रश्न रास्त आहे. त्यासाठी तुला माझ्याबरोबर थोडे भूतकाळात यावे लागेल. गेले वर्षभर मी माझ्या हृदयाच्या दुखण्याने आजारी होतो. खूप स्पेशालिष्ट डॉक्टरांची फौज माझ्यावर उपचार करत होती आणि शेवटी माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण करणे हा एकच उपाय होता नाहीतर फक्त तीन महिन्यांचे माझे आयुष्य होते. थोड्याच वेळात नवीन हृदय मिळणे तेवढे सोप्पे नव्हते आणि माझ्या आयुष्यात चमत्कार झाला. एका देवीने तो चमत्कार केला. एक अल्पशा आजाराने देवाघरी गेलेल्या तिच्या वडिलांचे हृदय त्या मुलीच्या निर्णयामुळे हृदयदान केले गेले. त्या दानशूर माणसामुळे माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण झाले. आज जे काही माझे पुढचे आयुष्य माझ्या वाटेला आहे ते मला त्या मुलीच्या म्हणजेच तू… रजनी… तुझ्यासाठी जगायचे आहे. पहिल्या भेटीत मला तुझे फक्त आभार मानायचे होते पण तुला भेटल्यावर तुझा साधेपणा, तुझा खरेपणा, माझे व्हिजिटिंग कार्ड बघून सुद्धा तुला त्याचे काहीच न वाटणे ह्यामुळे मी तडक तुझ्याशी लग्न करायचाच विचार केला. त्या निमित्ताने जिच्यामुळे, जिच्या वडिलांमुळे मला माझे नवीन आयुष्य मिळाले ती कायम माझ्याबरोबर असणार आणि जिने आपल्या सर्वात प्रिय असलेल्या तिच्या वडिलांना गमावले तिला तिच्या वडिलांच्याच हृदयाजवळ रहायला मिळेल ह्या साठीच मी फक्त तुझीच निवड केली पण आता गेला आठवडा तुला रोज भेटून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. भले माझे आत्ताचे हृदय माझे असले तरी त्यावर पहिला हक्क तुझा आहे. माझ्या हृदयाचा आता तूच सांभाळ कर. कृपया माझा स्विकार कर.”
मंगेशच्या डोळयांत पाणी होते. रजनीला तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी घडलेले ते हॉस्पिटलमधले दृश्य डोळ्यासमोर आले. जेंव्हा डॉक्टरनी तिला तिचे वडील गेल्याचे सांगितले तेंव्हा त्यांनी तिला त्यांचे ह्रदयदान करण्याविषयी विचारणा केली आणि रजनीने त्याचे महत्व ओळखून त्यांनी दिलेल्या डोनेशन फॉर्मवर सही केली होती. रजनी बसलेल्या जागेवरून उठली आणि तिने मंगेशच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओझरत होते. मंगेशच्या उंचीमुळे तिचे डोके मंगेशच्या छातीवर टेकले गेले आणि तिला तिच्या वडिलांच्या हृदयाची स्पंदने ऐकू आली. तिने मान वर केली. वरून मंगेशच्या डोळ्यांतले अश्रू रजनीच्या गालावर पडून दोघांच्या अश्रुंचे मिलन झाले होते.
स्वतःचा स्वार्थ न बघता केलेले कोणते ही दान हे दान करणाऱ्याला काही ना काही चांगलेच देऊन जाते. हे आज परत सिद्ध झाले होते.
“गुड मॉर्निंग पंत ! आज मॉर्निंग वॉक लवकर झाला का तुमचा ?”
“लवकर वगैरे काही नाही, माझ्या सगळ्या गोष्टींच वेळापत्रक ठरलेलं असतं आणि मी माझ्या रोजच्याच वेळेला घरी आलो आहे आणि माझा चहा सुद्धा झाला आहे, त्यामुळे तुला चहा…. “
“असं काय पंत रोज तुमच्यकडेच चहा घेवून माझी सकाळ…. “
“सुरु व्हायची, आता ते विसर.”
“असं करू नका पंत, अहो ही अजून उठली नाही, ती उठणार कधी, चहा करणार कधी ?”
“मोऱ्या, ते सगळं खरं असलं तरी आजपासून तुझा चहाचा रतीब बंद म्हणजे बंद !”
“पंत, एव्हढे नका निष्ठुर होऊ, एक कप चहाचा तर प्रश्न आहे !”
“प्रश्न नुसत्या एक कप चहाचा नाही मोऱ्या, गॅसचा पण आहे आणि कालपासूनच गॅस आणखी महाग झाला आहे, माहित आहे ना? “
“हो पंत, मी पण वाचलं काल पेपरात. पण सरकार तरी काय करणार ना?”
“काय करणार म्हणजे, निवडणुका जवळ आल्यावर सगळी कशी स्वस्ताई होते ? मग आत्ताच काय…. “
“पंत निवडणूक आणि गॅसचे दर यांचा काहीच संबंध नाही ! जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कमी जास्त ….. “
“होण्यावर ते दर अवलंबून असतात हे ठाऊक आहे मला, तू नको अक्कल शिकवू ! तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे पहिले आहेत मी, हे विसरू नकोस !”
“हो ना, मग तुम्हीच सांगा त्यावरचा एखादा उपाय आता !”
“अरे माझ्याकडे यावर, निदान आपल्या दोन चाळींसाठी तरी पर्मनंट उपाय आहे, आता बोल !”
“मी काय बोलणार पंत ? तुम्ही उपाय सांगितलात, तर चाळीच्या भाडेकरू संघाचा अध्यक्ष या नात्याने तो लोकांना सांगून, लोकांना तो पटला तर त्याची अंमलबजावणी करीन एव्हढे मात्र नक्की !”
“हो ना, मग ऐक ! आपल्या दोन चाळी मिळून एकूण किती बिऱ्हाडे आहेत ?”
“काय पंत, तुम्ही सर्वात जुने भाडेकरू, तुमच्या ओळखीनेच तर आम्हाला इथे खोली मिळाली, अशी आठवण बाबा सांगायचे ते आठवतंय मला.”
“ते सगळे सोड, बिऱ्हाड किती ते सांग.”
“असं बघा, तळ मजला आणि चार मजले धरून साधारण एका चाळीत पंच्याहत्तर प्रमाणे दोन चाळीत दीडशे !”
“बरोब्बर आणि एका कुटुंबात साधारण नातेवाईक धरून, राहणाऱ्यांची संख्या सरासरी आठ धरली तर दोन चाळीत मिळून बाराशे लोक राहतात, पै पाहुणा सोडून, बरोबर ?”
“बरोबर, पण त्याचा गॅसशी….”
“सांगतो सांगतो, जरा धीर धरशील का नाही ?”
“पंत तुम्ही असा सस्पेन्स क्रिएट करताय की, तो उपाय मला कळला नाही तर मलाच गॅसवर ठेवायची वेळ येईल आता !”
“हां, तर आपल्या दोन चाळीतल्या बाराशे लोकांचं जे रोज सोनखत तयार होत, ते वापरून दोन चाळींच्या मधे एक बायोगॅसचा प्लँट उभा करायचा आणि पाईपने सगळ्यांना गॅस पुरवायचा, कशी आहे आयडिया माझी ?”
“फँटॅस्टिक आयडिया पंत, खरच मानलं तुम्हाला !”
“मानलं ना, मग आता लगेच भाडेकरू संघाची मिटिंग बोलाव आणि हा प्रस्ताव मांड बर त्यांच्या पुढे.”
“हो लगेच लागतो त्या कामाला, पण पंत यात मला एक प्रॉब्लेम दिसतोय !”
“कसला प्रॉब्लेम ते आत्ताच वेळेवर सांग, म्हणजे लगेच त्यावर उपाय पण सांगतो !”
“असं बघा पंत, बायोगँस प्लॅन्ट उभा करायचा तर सुरवातीला भरपूर खर्च येणार आणि आपले भाडेकरू तर सहा सहा महिने घराचे भाडे भरत नाहीत तर या प्लँट साठी कुठून पैसा…. “
“देणार, असच ना ? मग ऐक, त्यावर सुद्धा माझ्याकडे जालीम उपाय आहे मोऱ्या !”
“सांगा, सांगा पंत, म्हणजे मिटिंग मधे हा मुद्दा कोणी काढला, तर मी तसे उत्तर द्यायला मोकळा !”
“अरे पैशाची चिंता अजिबात करू नकोस तू मोऱ्या, आपल्या नॅशनलाईज बँका बसल्या आहेत ना कर्ज द्यायला !”
“पंत अहो त्या बँका भले कर्ज देतील, पण ते फेडणार कोण? आपले लोक सहा सहा महिने घरभाडे…… “
“देत नाहीत हे मला तू मगाशीच सांगितलंस आणि तेच तर त्यांचे क्वालिफिकेशन आहे !”
“असं कोड्यात नका बोलू पंत, नीट काय ते उलगडून सांगा बघू.”
“अरे असं बघ, बँकांची घेतलेली कर्ज ही परतफेडीसाठी नसतातच मुळी, ती बुडवण्यासाठीच घेतलेली असतात असाचं लोकांचा धृढ विश्वास आहे आणि लोक त्या प्रमाणे वागून तो अगदी सार्थ ठरवतात !”
“तुम्ही म्हणता ते कळतंय मला, पण उद्या बँक जर कोर्टात गेली तर… “
“तर काय ? आपण हात वर करायचे आणि आम्ही कंगाल आहोत हे कोर्टात जोरात ओरडून सांगायच, म्हणजे आपले पण कर्ज माफ होईल !”
“कसं शक्य आहे हे पंत, तुमच आपल काही तरीच असतं !”
“का, का शक्य नाही ? अरे अनिल अंबानी सारखा करोडपती उद्योगपती आपण कंगाल आहोत, हे भारतातल्या नाही, तर परदेशातल्या कोर्टात ओरडून ओरडून सांगतो, तर आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांनी तसे भारतातल्याच एखाद्या कोर्टात ओरडून सांगायला कसली आल्ये लाज ?”
“तुम्ही म्हणता ते खोटं नाही, पण मध्यमवर्ग मुळातच कर्ज काढायला घाबरतो आणि त्यात ते बुडवणे म्हणजे… “
“तू म्हणतोयस ते खरच आहे ! मग कसं करायचे ते तूच सांग आता.”
“पंत, माझ्या पण डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे !”
“बघ माझ्या संगतीचा परिणाम ! बर सांग तर खरी तुझी आयडिया मोऱ्या.”
“सांगतो ना ! आपण काय करू या, आपल्या प्लॅन्ट मधे जो जास्तीचा गॅस तयार होईल तो आपण आपल्या शेजारच्या चाळकऱ्यांना विकून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून, आपण बँकेचे कर्ज फेडू !”
“मस्त, ही खरी मध्यमवर्गीय मानसिकता ! एक रुपया सुद्धा कर्ज नको डोक्यावर त्याला ! मग कशी गोळया न घेता रोज शांत झोप लागते ! हे स्वर्गसुख त्या उद्योगपतींच्या नशिबात नाही, हेच खरे ! काय बरोबर ना मोऱ्या ?”