हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 70 ☆ # युद्ध की मानसिकता # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# युद्ध की मानसिकता  #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 70 ☆

☆ # युद्ध की मानसिकता # ☆ 

जब आसमानों में

फायटर प्लेन उड़ते हैं

विनाशकारी बम

उससे गिरते हैं

विध्वंसक मिसाइलें

दागी जाती है

निरपराध लोगों को

मौत आती है

चारो तरफ कोहराम

मच जाता है

जमीन पर प्रलय छा जाता है

प्रश्रय  के लिए

लोग कहाँ कहाँ  भटकते हैं

डर और तबाही देख

अपना सर पटकते है

विभत्स फैली हुई लाशें

तो कहीं रूकती हुई सांसें 

कितना वीभत्स  मंजर

होता है

मानवता के सीने में

चुभता हुआ खंजर होता है

चारों तरफ

रूदन और क्रंदन

बरसते हुए बम दनादन

 

सदियों से यही तो

होता आया है

शक्तिशाली ने

कमजोर को

हमेशा दबाया है

अपनी झूठी जीत पर

अट्टहास लगाते हैं

अपनी गुंडागर्दी पर

खुशियां मनाते हैं

 

विश्व हो या,

देश,

समाज

यही तो हो रहा है आज

युद्ध में दोनों पक्ष

एक दूसरे को

तबाह करते हैं

अपने उन्माद में

यह गुनाह करते हैं

 

क्या शोषण, उत्पीडन,

गुंडागर्दी और हिंसा

समाप्त हो पायेगी ?

क्या विश्वपटल पर

भाईचारा, सद्भभाव

समता और शांति आयेगी /

 

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 13 (36-40)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #13 (36 – 40) ॥ ☆

सर्गः-13

 

और है मुनी अगस्त का यह आश्रम-स्थान।

जिनने इंद्रपद से किया ‘नहुष’ को क्षण में म्लान।।36।।

 

उनके छवि के धूम को छू और पाके गन्ध।

लगता मुझको बढ़ रहा सतोगुण से सम्बंध।।37।।

 

सातकर्णि मुनिका वहाँ पम्पासर तालाब।

मेघ घिरे से चंद्र सम वह दिखते जहाँ आप।।38।।

 

कुश पर ही करते थे ऋषि, वन-मृग सँग निर्वाह।

तब बल से डर इन्द्र ने भेजी पाँच अपस्रायें।।39।।

 

मुनि के जल प्रासाद का वाद्य घोष औं गान।

से हो गया प्रभावित क्षण भर पुष्प विमान।।40।।

            

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २८ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

आज विज्ञान दिन. मानवी जीवन सुखी व्हावे म्हणून विविध सुविधा निर्माण करणारे शास्त्रज्ञ , वैज्ञानिक, संशोधक यांना शतश: प्रणाम.

गजमल माळी

आज गजमल माळी यांचा जन्म दिन. (३१ मार्च १९३४) मराठी भाषेतील लेखक, कवी , नाटककार आणि चिंतांनापर मानवतावाद या विषयावरील महत्वाचे लेखक म्हणजे गजमल माळी ते मराठवाडा साहित्य परिषदेचे त्याचप्रमाकणे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. शिक्षणतज्ज्ञ होते. तसेच मुद्रण व्यवसायातील आघाडीचे प्रणेते होते. सत्यशोधक समाजाचे ते खंदे कार्यकर्ते होते.

गजमल माळी. औरंगाबाद कॉलेजच्या स्थापनेपासून(१९७१)  कॉलेजचे प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राध्यापक साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची ३ काव्यसंग्रह, ५ संपादित पुस्तके, लोकसाहित्य शब्दकोशाचे संकलन व सत्यशोधक समाजावरील पुस्तके आहेत. ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक, राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित व समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दाखल घेतली. 

गजमल माळी यांची पुस्तके –

१.    कल्पद्रूमाची डहाळी – नाटक – मूळ कथालेखक फ्रांन्सिस दिब्रिटो

२.    कामायनी- कादंबरी

३.    गांधवेणा – कविता संग्रह

४.    ज्ञानोबा कृष्णाजी सासणे – चरित्र ग्रंथ

५.    नागफणा आणि सूर्य- खांडकाव्य

संपादित ग्रंथ –

१.    तुकारामाचे निवडक १०० अभंग

२.    म.फुले व चिपळूणकर ( वैचारिक)

३.    म.फुले निवडक विचार ( वैचारिक)

४.    राष्ट्रीय कोंग्रेस आणि सत्यशोधक समाज ( वैचारिक)

५.    वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले.  ( वैचारिक)

   गजमल माळी यांना मिळालेले पुरस्कार

१.    कल्पद्रूमाची डहाळी या नाटकास उत्कृष्ट नाट्यलेखनाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

२.    ज्ञानोबा कृष्णाजी सासणे या ग्रंथाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार

३.    नागफणा आणि सूर्य या पुस्तकाला नागपूऱथील डॉ. दुर्गेश पुरस्कार

४.    म.फुले आणि चिपळूणकर या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट समीक्षा लेखनाचा पुरस्कार

५.    वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले या ग्रंथाला मथुराबाई पिंगळे पुरस्कार . 

अशा या बहुआयामी लेखकाचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या लेखनकार्यास मानवंदना.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक मात्र मी तरंग…. ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक मात्र मी तरंग… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

गजबजलेला गाव इथे

मुखवट्यावर नाना रंग

खरा चेहरा शोधणारा

हा एक मात्र मी तरंग

 

माया मोहात गुंतलासे

अवतीभवतीचा संग

कोण माझा? भेटेल कधी?

रे, एक मात्र मी तरंग

 

आज इथे दिसतात की

वागण्याचे वेगळे ढंग

गर्दीत असा भांबावला

तो एक मात्र मी तरंग

 

कुणीतरी पाठीशी आहे

जाणून घेण्यात मी गुंग

हरलो नाही, ना थांबलो

जो एक मात्र मी तरंग

 

हलकेच परीघ  मोठा

करण्यात सतत दंग

तल्लीन कार्यातच मग्न

बा, एक मात्र मी तरंग

 

क्षणिक अस्तित्व इथले

अर्थपूर्ण जगतो भृंग

निसर्ग गुरुस्थानी असे

नी, एक मात्र मी तरंग

 

ज्ञानकण ते वेचताना

भले ते करण्याचा चंग

यत्न तो देव जाणाणारा

की एक मात्र मी तरंग

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 71 ☆किंमत अन्नाची…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 71 ? 

☆ किंमत अन्नाची…☆

कण कण अन्नाचा

किती आहे महत्वाचा

केव्हा कळेल याची किंमत

दिवस तो कधी उगावायचा…

 

श्रीमंती आहे म्हणून

पार्ट्या कुठे रंगतात

तिथे जेवणारे गर्विष्ठ

अन्न वाया घालवतात…

 

कधी कळेल मर्म अन्नाचे

समजेल कधी महत्व त्यांना

माज द्रव्याचा भिनला अंगी

घालतात ऐसा, हा धिंगाणा…

 

करावी किंमत अन्नाची

ती गरज, आहे नेहमीची

श्रीमंती नसतेच कायमची

सावली पहा, मध्यानाची…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मुलं अनुकरणप्रिय असतात. घरात आपले आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कपडे काय घालतात, नातेवाईकांशी कसे संबंध ठेवतात हे सर्व ते रोज बघत असतात. त्यांच्या सवयी काय आहेत ,कोणत्या आहेत? हे मनात साठवत असतात. मुली असतील तर त्या आईची नक्कल करतात,उदा. भातुकली च्या खेळात मुली आईची भूमिका नेहमी करत असतात. आजही. मुले वडिलांची नक्कल करतात. म्हणजे आई वडील या नात्याने आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले काही घडण्यासाठी ची आईवडिलांची जबाबदारी किती मोठी असते हे लक्षात येईल. घरात जसे वातावरण असेल तशी तशी मुलं घडत जातात. 

नरेंद्रही अशा वेगळ्या वातावरणात घडत होता. १८७७ मध्ये नरेंद्र विश्वनाथबाबूंच्या बरोबर रायपूर येथे राहत होता. तेथे शाळा नव्हती. त्यामुळे ते स्वत:च नरेंद्रला शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय इतिहास तत्वज्ञान, साहित्य विषय शिकवीत असत. शिवाय घरी अनेक विद्वान व्यक्तीं येत असत. त्यांच्या चर्चाही नरेंद्रला ऐकायल मिळत असत. त्याचं वाचन इतकं होतं कि, तो वादविवादात पण सहभागी होत असे. नरेंद्रची बुद्धी आणि प्रतिभा बघून ते वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणी मत मांडण्याची संधी नरेंद्रला देत असत.

नरेंद्रचही असच होत होतं. वडिलांचे गुण, दिलदारपणा, दुसर्‍याच्या दु:खाने द्रवून जाणं, संकटकाळी धीर न सोडता, उद्विग्न न होता, शांतपणे आपलं कर्तव्य बजावत राहणं अशी वैशिष्ठ्ये त्यानं आत्मसात केली होती. दुसर्‍यांची दुखे पाहू न शकल्याने दिलदार विश्वनाथांनी मुक्त हस्ताने आपली संपत्ती वाटून टाकली होती. तर ज्ञानसंपदा दोन्ही हातांनी मुलाला देऊन टाकली होती. एकदा कुणाच्या तरी सांगण्यावरून नरेंद्रनी आपल्या भविष्यकाळाबद्दल वडिलांना विचारले , “ बाबा तुम्ही आमच्या साठी  काय ठेवले आहे?”  हा प्रश्न ऐकताच विश्वनाथबाबूंनी भिंतीवरच्या टांगलेल्या मोठ्या आरशाकडे बोट दाखवून म्हटलं, “ जा, त्या आरशात एकदा आपला चेहरा बघून घे, म्हणजे कळेल तुला, मी तुला काय दिले आहे”.  बुद्धीमान नरेंद्र काय समजायचं ते समजून गेला. मुलांना शिकविताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून विश्वनाथबाबू त्यांना कधीही झिडकारत नसत, की त्यांना कधी शिव्याशाप ही देत नसत.

आपल्या घरी येणार्‍या आणि तळ ठोकणार्‍या ऐदी आणि व्यसनी लोकांना वडील विनाकारण, फाजील आश्रय देतात म्हणून नरेंद्रला आवडत नसे. तो तक्रार करे. त्यावर नरेंद्रला जवळ घेऊन वडील म्हणत, “ आयुष्य किती दुखाचे आहे हे तुला नाही समजणार आत्ता, मोठा झाला की कळेल. हृदय पिळवटून टाकणार्‍या दु:खाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, जीवनातला भकासपणा थोडा वेळ का होईना विसरण्यासाठी हे लोक नशा करत असतात. हे सारे तुला जेंव्हा कळेल, तेंव्हा तू पण माझ्यासारखाच त्यांच्यावर दया केल्याखेरीज राहणार नाहीस”. 

समोरच्याचा दु:खाचा विचार करणार्‍या वडिलांबद्दल गाढ श्रद्धा नरेंद्रच्या मनात निर्माण झाली होती. मित्रांमध्ये तो मोठ्या अभिमानाने वडिलांचे भूषण सांगत असे. त्यामुळे, उद्धटपणा नाही, अहंकार नाही, उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असा भाव कधीच त्याच्या मनात नसायचा. वडीलधार्‍या माणसांचा अवमान करणे नरेंद्रला आवडत नसे. अशा प्रकारे नरेंद्रला घरात वळण लागलं होतं.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ? 

☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ? (गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो……..

ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.

जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे……

ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.

अ. कापूर जाळणे — दृष्टी

ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे… स्पर्श

क. मुर्तीवर फुले वाहणे…फुलांच्या अरोमामुळे वास.

क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.

हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

ड. घंटानाद व मंत्रोच्चरण….ऐकणे.

अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.

मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..

पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..?

मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 2 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 2☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

पौषाचे काही दिवस आणि माघाचे काही दिवस घेऊन येतो फेब्रुवारी महिना. इंग्रजी कालगणनेतील वर्षाचा दुसरा महिना. बारा महिन्यांतील आकाराने सर्वात छोटा महिना. छोटा असला तरी एक मोठ काम त्याच्याकडे दिलं आहे. ते म्हणजे कालगणनेत सुसूत्रता आणण्याचे. दर तीन वर्षांनी येणारे ‘लीप इयर’ या महिन्यामुळेच साजरे होऊ शकते .

तीस आणि एकतीस तारीख बघण्याचे भाग्य फेब्रुवारीला लाभत नाही पण दर तीन वर्षांनी एकोणतीस तारीख या महिन्याला दर्शन देते आणि या दिवशी जन्मलेल्याना आपला खराखुरा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लाभते.

अशा या फेब्रुवारी महिन्यात अनेक थोर व्यक्तींचा जन्म दिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो.  याच महिन्यात असते गणेश जयंती. हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवरायांची जयंती याच महिन्यात असते. तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, संत रोहिदास, संत गाडगेबाबा, शेगावचे संत गजानन महाराज या सर्वांच्या जयंती समारोहांमुळे त्यांचे विचार, शिकवण यांचा विचार केला जातो. काही चांगले उपक्रम राबवले जातात. संत वाड्मयाचे वाचन होते.

माघ कृष्ण नवमी या दिवशी समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हा दिवस दास नवमीचा. याच महिन्यात असते स्वा. सावरकर आणि वासुदेव बळवंत फडके या दोन क्रांतीकारकांची पुण्यतिथी. इतिहासातील क्रांतीकारक घटनांचे त्यानिमीत्ताने स्मरण होते. संतांची शिकवण आणि क्रांतिकारकांचे विचार आपल्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात.      

माघ शुद्ध सप्तमी हा दिवस  रथसप्तमीचा.  भारतीय परंपरेप्रमाणे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस मानला जातो. सूर्यनमस्काराचे महत्व लक्षात घेऊन  जागतिक सूर्यनमस्कार दिन याच दिवशी साजरा होतो.  या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात.   पारंपारिक उत्सवांबरोबर अशा उपक्रमांमुळे आधुनिक, विज्ञानवादी विचारांना  चालना मिळते.

माघ शुक्ल पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. सृष्टीत वसंताचे वैभव फुलू लागलेले असते. या वसंताचे स्वागत करण्यासाठी वसंत पंचमी किंवा ऋषी पंचमी साजरी होते. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे.

मराठीतील ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त,  कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारीला असतो. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या चळवळीला अधिक बळ प्राप्त होते.          

जोहान्स गटेनबर्ग या जर्मन लोहव्यावसायिकाने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली. चोवीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस.  त्यामुळे हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणूनसाजरा केला जातो.

थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन् यांनी 28/02/1928  ला लावलेला शोध ‘रामन इफेक्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. समाजात विज्ञानरूची वाढावी व विज्ञानजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

असा हा फेब्रुवारी महिना. धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक अशा सर्वच घटनांनी गजबजलेला महिना खूप लवकर संपला असं वाटतं. काळ मात्र पुढे ‘मार्च’करत असतो. येणा-या मार्च महिन्याच्या दिशेने !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दुसर्याल दिवशी रवी सकाळी लवकर उठून तयार होऊन बसला. नेहमीप्रमाणे सगळे आपापल्या कामाला बाहेर पडले तसे त्याने रामूकाकांना काहीतरी आणायला बाहेर पाठविले आणि ती कचरेवाली यायची वाट बघत बसला. ठराविक वेळेला घरच्या बेलचा आवाज आला. त्याने लगेच दरवाजा उघडला. तीच होती. तिचे निखळ सौंदर्य कालच्यापेक्षा आज जास्तच उठून दिसत होते. पिवळा पंजाबी ड्रेस आणि त्याच कलरची ओढणी तिने तिच्या डोक्यावरून घेतला होता. कपाळावर बारीक  पिवळ्या रंगाची टिकली लावल्यामुळे शालीनता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कालच्यासारखेच तिने, ” साहेब कचरा” असे म्हंटले. रवीने कचरा आणून दिला आणि तिला विचारले, ” जरा तुझ्याशी बोलायचे होते. तुझे नाव काय आहे?” रवीने बोलायला सुरवात केली.

तिने एकच क्षण रवीकडे बघितले आणि गालातल्या गालात हसत म्हणाली, ” साहेब मला बोलायला वेळ नाही. साडे दहा वाजेपर्यंत मला सगळ्यांचा कचरा जमा करायचा असतो. ती कचऱ्याची मोठी गाडी एकदा येऊन गेली तर माझी पंचाईत होईल.” रवी थोडा हिरमुसला पण लगेच त्याने तिला सांगितले, ” तू मोकळी झाली की येशील का ? तुझ्याविषयी मला खूप जाणून घ्यायचे आहे. तुझ्या बद्दलचे खूप प्रश्न माझ्या मनात आहेत. तू तुझी सगळी कामे आटपून येऊ शकशील का ? ” भराभर बोलत रवीने तिला सांगितले तिनेही लगेच उत्तर दिले, ” आज तरी नाही जमणार साहेब. नंतर मला कॉलेजला जायचे आहे. रविवारी वेळ  काढता येईल. तेंव्हा बघू. ” आणि ती तिचे नावही न सांगता  तशीच गेली.

रामूकाका बाहेरून आल्यानंतर रवीने त्यांच्याकडे कचरेवाल्याचा विषय काढला. तो कुठे राहतो, त्याच्याघरी कोण कोण आहेत ह्याची माहिती काढण्याचा रवीने प्रयत्न  केला पण रामूकाकानाही कचरेवाल्याबद्दल काहीच माहित नव्हते. तो रोज सकाळी येतो आणि काही न बोलता दिलेला कचरा त्याच्या डब्यातून  घेऊन जातो. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीनशे रुपये घेऊन जातो. कधीही खाडा करत नाही.  एवढीच माहिती रवीला मिळाली.

दुसऱ्या दिवशी ती कचरा न्यायला आल्यावर रवीने तिला सांगितले, “आज तुझे कचरा गोळा करण्याचे काम झाल्यानंतर कॉलेजला जाताना मी तुझ्याबरोबर येऊ का ? तू कॉलेजला जातांना आपल्याला बोलता येईल.” तिने आज गालातल्या गालात हसत उत्तर न देता जरा खडसावूनच विचारले,” साहेब, एवढे काय काम काढलेत. अहो मी साधी कचरेवाली आहे. कचरेवाल्याची मुलगी. माझ्याकडे कसले तुमचं काम. साहेब आम्ही लहान जातीतले असलो तरी आम्हालाही इज्जत आहे. तुमच्या बरोबर मला कोणी बघितले तर लोक काहीतरी वेगळेच समजतील. तुमच्याही सोसायटी आणि समाजात तुमची नालस्ती होईल. तुम्हांला खरेच काही बोलायचं असेल तर दुपारी २ वाजता कॉलेज सुटल्यावर मी येथेच येते पण ते तुमच्याकडे काका आहेत त्यांना घरीच असू दे. मग आपण सविस्तर बोलू.”

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३६ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३६– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

[१६१]

आपली स्वत:चीच फुलं

भेट म्हणून

स्वीकारण्यासाठी

माणसाकडून

किती वाट पाहतो

ईश्वर

आतुर: उत्सुक

 

[१६२]

सूत कातता कातता

कुणी साधी भोळी स्त्री

गुणगुणत असावी

एखादं  प्राचीन लोकगीत

हरवलेल्या आवाजात

तशी आज ही धरती

गुणगुणते काही बाही

माझ्या कानाशी

 

[१६३]

आपआपल्या मंदिरात

आपलेच दिवे

ओवाळतात ते

आळवतात अहोरात्र

आपल्याच आरत्या

पण हे पक्षी

तुझ्याच प्रात:कालीन प्रकाशात

तुझ्याच प्रसन्न प्रार्थना

किती खुशीनं गातात. 

 

[१६४]

सर्व चुकांसाठी

आपले दरवाजे

जर

बंद ठेवलेस तू

तर

सत्यालाच प्रत्यक्ष

कोंडून ठेवशील तू

बाहेर…

 

[१६५]

कीर्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या

शेवटच्या टोकापर्यंत

जाऊन आल्यावर

सभोवार पसरलेली

ही पोकळ उदासी

आणि गुदमरणारे प्राण…

किती वांझ असतं शिखर

आणि किती निमुळतं

क्रूरपणे आसरा झिडकारणारं…

तूच आता दाखव वाट

हे प्रभो,

अद्याप धुगधुगत आहे

हा प्रकाश

तोवरच घेऊन चल मला

त्या दरीपर्यंत

खोल … खोल…

शांत… निवांत

आयुष्याचं मृदू फळ

पिकून तयार असेल तिथं

आणि

त्यावर तकाकत असेल

जाणिवेचा सोनेरी रंग

-समाप्त-

(या कवितांबरोबरच हे सदर इथे संपत आहे.)

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares