☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
काल मी कृष्णा काकांकडं गेले होते. काका काकू बाहेर जाण्याची तयारी करत होते. त्यांची लगबग बघून मी न राहवून चौकशी केलीच. काका काकू चिनूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथाश्रमात मुलांना लाडू वाटायला चालले होते.
नोकरी च्या निमित्तानं परदेशी राहणाऱ्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच किती अभिनव आहे, नाही का ? आमच्या काका काकूंनी मुलगा जवळ नसताना सुद्धा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर तो परावर्तित झालेला बघितला!
पुण्यातील एक सद्गृहस्थ आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख विसरून अनेक अनाथ मुलांना आपलं घर देतात, त्यांना आश्रय देतात. अशी माणसं मला सामान्य असूनही असामान्य वाटतात. या देवदूतांना प्रसिध्दी नको असते. हारतुरे नको असतात. पेपर मध्ये फोटो किंवा बातमी नको असते. त्यांना फक्त आनंद वाटायचा असतो. समाधान पेरायचं असते. स्वतः बरोबर आजूबाजूला सुख पसरवायचं असतं. प्रसिध्दी, पैसा, अहंकार मोठेपणा त्यांच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. या सगळ्या पलिकडं ते पोचलेले असतात. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे दिसतात.
असामान्य होण्यासाठी मोठं कार्यच करायला पाहिजे असं नसतं हं. मोठेपण अंगी बाणवायला यातना ही सोसाव्या लागतात. ती असामान्य व्यक्तिमत्वं लाभलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी असूनही वेगळी असतात.ते सगळ्यांना शक्य नसतं. परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कुणालातरी मदत करु शकतो. कुणाला तरी हसवू शकतो, उदास मनाला आनंद देऊ शकतो. बघा हं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या बहुतेकांच्या घरी खूपसा खाऊ असतो, नको असलेले जास्तीचे कपडे असतात. हेल्थ कॉन्शस असलेले आपण इतका खाऊ संपवू शकत नाही. काकूंच्या प्रमाणं मुद्दाम करुन नाही जमणार कदाचित, पण असा जास्तीचा खाऊ ; ताजा, चांगला असतानाच गरजूंना का वाटू नये बरं? जसं खाण्याच्या पदार्थांचं, तसंच कपड्यांचं! आजकाल कपाटात मावत नाहीत एवढे कपडे असतात नं बहुतेकांच्या जवळ! ते जुने होण्यापूर्वी, फाटण्यापूर्वी दिले गरजूंना तर? अगदी सुधा मूर्तीं इतका साधेपणा नाही जमला तरी , त्यांचं थोडंसं अनुकरण करायला काय हरकत आहे? बघा बरं, अशा वागण्यानं कसं समाधान मिळतं ते. आनंद, समाधान, या भावना संसर्गजन्य आहेत. त्या परावर्तीत होतात. आणि त्या परावर्तनाचा एक सूक्ष्मसा किरण आपल्याला होता आलं पाहिजे.
आनंदाचे डोही आनंद तरंग. अंतर्मनात जेंव्हा असा आनंद भरलेला असतो, मनाचा डोह आनंद गान गात असतो तेंव्हा अगदी सहजपणं आनंद तरंग उठत असतात. त्यांचा भवताल ही आनंदानं डोलत राहतो.
निर्व्याज समाधान मिळवण्यासाठी पैसे खर्च लागत नाहीत. असं सिद्ध करणारे अनेक सामान्य लोक या जगात आहेत. एक भांडी घासणाऱ्या बाई आपल्या झोपडीवजा घरात दहा बारा अनाथ मुलांच संगोपन करतात. त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. त्यांना एकवेळेला पोटभर खाऊपिऊ घालतात.मग ती साधी चटणी भाकरी का असेना. एवढा उदात्तपणा राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांच्या कडंही नसतो.अशी अनेक उदाहरणे आहेत जी सहजपणे समाजकार्य करतात. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळूही न देता अविरतपणे घेतला वसा सुरू ठेवतात. या सर्वांना माझे दंडवत. साने गुरूजींच्या या धर्माचे आचरण करण्याचा निदान एक लहानसा का होईना प्रयत्न अवश्य करुया. . . . . .
☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
दुपारी २.३० वाजता दारावरची बेल वाजली. रामूकाकानी दरवाजा उघडला. रवीने तिला आत बोलाविले. सोफ्यावर बसवले. रामूकाकानी पाण्याचा ग्लास भरून आणून तिच्या हातात न देता पुढे असलेल्या टेबलावर ठेवला. रवीच्या निदर्शनात ते आले तसे रवीने पुढे होऊन तो पाण्याचा ग्लास पुन्हा उचलला आणि तिच्या हातात दिला. तिच्या चेहऱ्यावर जराशी स्मितरेषा झळकली. तिच्या समोरच्या सोफ्यावर रवी बसला. ती आजूबाजूला बघून घर निरखत होती.
“बोला साहेब काय विचारायचे आहे ? ” तिनेच बोलायला सुरवात केली. रवीने तिला पहिले तिचे नाव विचारले. ती काही न बोलता काही वेळ रवीकडे बघत राहिली.
रवीने परत विचारले, ” काय झाले ? ” तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिने एक आवंढा गिळून बोलायला सुरवात केली. ” साहेब मी आता काहीच दिवस माझे वडील आजारी आहेत म्हणून कचरा न्यायला येते पण माझे वडील गेले पंचवीस वर्षे ह्या भागातला कचरा गोळा करतात पण त्यांनाही आज पर्यंत कोणी त्यांचे नाव विचारले नाही. आम्हा लोकांना जे कचरा गोळा करतात त्यांना कचरेवाला किंवा कचरेवाली हीच नाव असतात. कितीही पाऊस असला किंवा आणखी काही असले तरी आम्ही काम करतोच. आम्हाला सुटी नाहीच. कुठलाही सण असला तरी तो घरी साजरा करायच्या आधी आम्ही दुसऱ्यांच्या घरचा कचरा गोळा करत असतो॰ तरीही कोणीही आम्हांला नावाने ओळखत नाहीत. तुम्ही पहिले आहात, माझे काम माहिती असूनही माझे नाव विचारले. तर माझे नाव चिन्नू मुन्ना वाल्मिकी. आमची पूर्ण जमात ह्याच कामामध्ये आहे. आमच्या आधीच्या पिढ्यांनीही हेच काम केले आहे. कोणीतरी हे काम केलेच पाहिजे ते काम आमची जमात करत असते आणि ते ही अविरत पिढ्यान पिढ्या.” रवीला तिच्या बोलण्यातले तथ्य जानावाले.
पुढचा अर्धा तास रवी आणि तिचे बोलणे चालले होते. तिच्या बोलण्यातून तिचा स्वतः वरचा आत्मविश्वास दिसत होता. लहानपणापासून रात्री झोपतांना मोकळे आकाश बघत आलेल्या चिन्नूला आकाशाचे विलक्षण आकर्षण होते आणि त्यामुळेच कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चिन्नूला अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. पुढच्या वर्षीपासून तिला कचरा व्यवस्थापन डिप्लोमा कोर्स ही चालू करायचा आहे. रवी तर सगळे चिन्नूचे विचार आणि तिची बोलायची पद्धत ऐकून खुश झाला होता. त्याने रामुकाकांना सांगून चिन्नूसाठी जेवायला वाढायला सांगितले पण चिन्नूने त्याला नकार देऊन म्हंटले, ” साहेब नका वागू असे. नंतर तुमच्या घरच्यांना कळले की एक कचरेवाली तुमच्या घरात येऊन जेऊन गेली तर खूप अनर्थ होईल. माझ्या वडिलांचे नुसते तुमच्या घरचे नाही तर तुमच्या संपूर्ण सोसायटीचे काम जाईल. तेंव्हा प्लिज असे काही करू नका. आम्ही तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब आहोत ते बरे आहोत. कृपया आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका. मला आणि तुम्हांला, आपल्या दोघांनाही त्याचा खूप त्रास होईल.”
चिन्नू जे सांगत होती ते बरोबर होते. रवीच्या मगाशीच निदर्शनात आले होते की चिन्नूला घरात घेतली तेंव्हा रामूकाकांना ते आवडले नव्हते. रवीने काहीतरी वेगळे केले अशा नजरेने त्यांनी बघितले होते. रवीने पुढची काही मिनिट्स तिला स्वतःची ओळख करून देऊन त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आणि तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला स्वतःचा मोबाइल नंबर दिला.
पुढे एक आठवडा त्यांचे दिवसातून चार ते पाच वेळेला फोनवरून बोलणे होत होते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती रवीला आवडायला लागली होती. तिच्या ध्येयपूर्ती करण्यासाठी चाललेल्या वाटचालीत रवीला तिला मदत कराविशी वाटत होती आणि खूप विचारांती एकदा रवीने तिला भेटून एका कॉफी रेस्टारंट मध्ये कॉफी प्यायला नेले. प्रथम कॉफीला नकार देणारी चिन्नू रवीच्या अती आग्रहामुळे तयार झाली. हॉटेल मध्ये बसल्यावर चिन्नूनेच सुरवात केली, “साहेब, काय झाले, माझ्या प्रेमात वगैरे पडला नाहीत ना! तसे असेल तर स्वतःला सावरा.” तिच्या ह्या बोलण्याने रवीने डायरेक्ट विषयाला हात घातला, ” चिन्नू, खूप विचार करून मी तुला विचारतोय, तुला प्रपोज करतोय, मला तू पहिल्यावेळी बघितल्या क्षणीच आवडली होतीस आणि गेले काही दिवस तुझ्याशी बोलून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्याशी लग्न करशील का ? “
रवीचे बोलणे ऐकून चिन्नू जरा जास्तच सिरिअस झाली. एकटक रवीकडे बघून तिने संथ लयीत बोलायला सुरवात केली, “साहेब जरा स्वतःला सावरा. तुम्ही नुकतेच अमेरिकेत शिकून आला आहात. तुमच्या समोर तुमचा तयार फॅमिली बिझनेस आहे. तुमच्या घरचे तुमची तुम्ही त्यांच्या बिझनेसला सामील होण्याची वाट बघत आहेत आणि तुम्हाला हे विपरीत काय सुचतंय. साहेब आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही जिला आत्ता प्रपोज करत आहात, तीची ओळख सगळ्यांसाठी कचरेवाल्याची मुलगी अशी आहे. त्यामुळे उगाच नको त्या भानगडीत पडू नका. चक्रव्यूह भेदायला शिरायच्या आधीच जरा स्वतःला आवरा. स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नका. मी काही तुमच्या प्रेमाचा स्विकार करू शकत नाही.
मी – का ग, आज गप्पगप्पशी आहेस आणि जरा गंभीर दिसतियस.
उज्ज्वला – मी? नाही बाई!
मी – खरं म्हणजे तू खुशीत असायला हवस. नुकतीच तुझी २ पुस्तके प्रकाशित झालीत. ‘कृष्णस्पर्श ‘ रिप्रिंट झालय आणि एवढ्यातच आणखीही २ पुस्तके येणार आहेत.
उज्ज्वला – तशी खुशीतच आहे मी. पाचा उत्तराची कहाणी हे माझ्या स्वत:च्या कथांचं पुस्तक आलय. आनुवादीत नव्हे. दुसरं मात्र अनुवादीत आहे. प्रातींनिधिक पंजाबी लघुकथा. अरिहंत प्रकाशनाने ही छापलीत.
मी –आणि येणार्याल पुस्तकात तुझ्या टोरॅंटोच्या मैत्रिणीचा पुस्तक आहे. तू पण खूश. ती पण खूश.
उज्ज्वला- होय. हंसा दीप तिचं नाव. या चार-पाच वर्षातलीच तिची नि माझी ओळख. तीही ई-मेल, फोनद्वारेच आणि मुख्य म्हणजे लेखनातून पण ती माझी अगदी सख्खी मैत्रीण झालीय. तिच्या कथांचा अनुवाद ‘आणि शेवटी तात्पर्य’ म्हणून येतोय. छान, खुसखुशीत आणि वास्तववादी कथा आहेत तिच्या. माझ्यापेक्षा तीच जास्त उत्सुक आणि अधीर झाली आहे पुस्तक बघायला.
मी – मला वाटतं , नवदुर्गा काढतेय हे पुस्तक.
उज्ज्वला- बरोबर आहे. याबरोबरच गौतम राजऋषी यांच्या कथांचा ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ हेही पुस्तक येतय. अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे हे. लेखक स्वत: मिल्ट्रीमध्ये कर्नल आहेत. युद्धाचा अनुभव घेतलेले आहेत. त्यांचं पोस्टिंग बव्हंशी काश्मीर घाटी, पीरपंजालची पहाडी, संरक्षण रेषेच्या जवळपासची ठाणी इ. ठिकाणी झालय. तिथलं वातावरण, तिथल्या सैनिकांचं आणि लोकांचं जीवन आणि मानसिकताही, या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या कथा आहेत. अगदी वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या पुस्तकाचं खूप चांगलं स्वागत होईल असं मला वाटतं.
मी –मग असं असताना तू इतकी गंभीर का?
उज्ज्वला – सहज मनात येतय, आपल्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावा. खरं म्हणजे लेखिका व्हायचं मी काही लहानपणापासून ठरवलं नव्हतं.
मी – पण मला वाटतं, तू लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून कविता करतेस. उज्ज्वला- हो. पण माझी पहिली कविता मात्र फुकटच गेली. म्हणजे गंमतच झाली तिच्याबाबतीत.
मी – काय झालं ग?
उज्ज्वला – अग, मी ८ वीत होते तेव्हा गोवा मुक्तिसंग्रामाचा लढा जोरात चालू होता. त्यातले एक मुख्य सेनानी हेमंत सोमण. एकदा शाळेत बातमी आली, हेमंत सोमणांनी तिरंगा फडकावला आणि पोर्तुगीजांनी त्यांना गोळी मारली. त्यांचा बळी गेला. बातमी ऐकली आणि मी उत्स्फूर्तपणे लिहिलं,
‘हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला
तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘
इथून मग त्यांच्या बलिदानाशी कविता येऊन थांबली. दुसर्याी दिवशी बातमी आली, की हेमंत सोमणांना गोळी नाही मारली. पकडून तुरुंगात टाकलं. मग माझ्या कवितेला काहीच अर्थ उरला नाही. अर्थात माझी कविता फुकट गेली याचं मात्र मला मुळीच वाईट वाटलं नाही. हेमंत सोमण वाचले, हे महत्वाचं.
मी- आणखीही काही कविता तू लिहिल्या होत्यास ना शाळेत?
उज्ज्वला – चार-पाच वेळा काही तरी चाल मनात सुचली, ती गुणगुणताना त्यावर शब्द सुचत गेले.
मी- आठवते तुला त्यातलं काही?
उज्ज्वला- दोन ओळीच आठवताहेत. एक चाल गुणगुणताना लिहिलं होतं,
‘ संध्यारजनी आली आली
गाई – वासरे घरा परतली.’ बाकी काही आठवत नाही. म्हणजे ते सगळं तितकं महत्वाचं नव्हतंच.
मी – कॉलेजला गेल्यावर तुझ्या कविता लेखनाला बहार आला होता, नाही का?
उज्ज्वला- बहार वगैरे असा नाही पण कविता करणार्याा आणि मुख्य म्हणजे कवितेवर प्रेम करणार्या– मैत्रिणी मिळाल्या. हिने काल कविता लिहिली, आपण का नाही? आशा इरिशिरीने कविता लिहिल्या तेव्हा. त्यात हौसेचा, अनुकरणाचा भाग जास्त होता. मौलिकता कमीच. तो काळ रोमॅंटिक होता. प्रेम या कल्पनेवरच प्रेम होतं तेव्हा. त्यामुळे प्रेमावर त्याहीपेक्षा वियोगावर कविता जास्त लिहिल्या गेल्या. काव्यबहरातला बराचसा बहर या स्वरूपाचा होता. त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो.
☆ संगीताचा विकास – भाग-१ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
संगीत म्हणजे नेमके काय?
त्याचे उत्तर असे की निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना.राग,स्वर
आणि शब्द कोणत्या एका तालात बद्ध करून त्या तालाच्या खंडाप्रमाणे सम,इतर टाळ्या,काल किंवा खाली या आवर्तनात स्वररचना किंवा गीत रचना चपखलपणे बसविणे म्हणजे संगीत.
पाण्याची खळखळ,वार्याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकिळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एकप्रकारचा नाद,ताल,लय आहे,निबद्धता आहे.
भारतीय संगीताची परंपरा फार मोठी आणि प्राचीन आहे.नादयुक्त हुंकार ते सप्तस्वर असा संगीतातील स्वरांचाः विकासक्रम आहे.त्यामागे दीर्घ कालखंडाची परंपरा आहे जी चार कालखंडातून दिसून येते.
१) वैदिक काल~इसवी सन पूर्व ५ ते ६ हजार पासून १हजार पर्यंत.
पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची स्तुती व प्रार्थना करणार्या ऋचांचे गायन ऋषीमुनी करीत असत.ऋग्वेद,यजूर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांपैकी सामवेदाशी वेदकालीन संगीत संबंधीत आहे. सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे ऋचांचे स्वरबद्ध गेय स्वरूप.सामवेदात गायनाची एक निश्चित पद्धति तयार केली गेली आणि तीन स्वरांचे गायन सप्तसुरांपर्यंत विकसित झाले. यज्ञयागादि प्रसंगी जे गायन होत असे तेच तत्कालीन संगीत होते,ज्याला गंधर्वगान असे म्हटले जात होते.
२) प्राचीन काल~ ईसवी सन पूर्व १००० ते ई.स.८०० पर्यंत. ह्याला जातिगायनाचा कालखंड असेही समजतात.धृवा गायनही प्रचलीत होते.पुढे त्याचेच परिवर्तीत स्वरूप धृवपद किंवा धृपद गीत गायन अशी ओळख झाली.हा प्रकार भरतपूर्व काळापासून प्रचारात होता.जातिगायनाचे बदललेले स्वरूप हेच रागगायन होय.भरतमुनींच्या नाट्यशास्त्रांत ह्या जातिगायनाचा किंवा राग गायनाचा उल्लेख सांपडतो.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे – शिमला संदर्भ ।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 79 – दोहे – शिमला संदर्भ
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “द्वार के बाहर उँकेरी स्वस्तिका …”।)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये।
संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 23
नौचंदी मेला- मेरठ में प्रतिवर्ष लगने वाला नौचंदी मेला हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक है। नवचंडी का अपभ्रंश कालांतर में नौचंदी हो गया। नौचंदी देवी एवं हजरत बाले मियाँ की दरगाह एक दूसरे के पास हैं। मंदिर में भजन और दरगाह पर कव्वाली का अद्भुत दृश्य इस मेले में देखने को मिलता है। घंटी और शंख के बीच अजान की आवाज़ और मंत्रों के उच्चारण का इंद्रधनुष इस मेले में खिलता है। नौचंदी मेला सामासिकता और एकात्मता का जीता जागता उदाहरण है। यह मेला चैत्र मास की नवरात्रि से एक सप्ताह पहले आरंभ होता है तथा एक माह तक चलता है।
शहीद मेला- 1942 के भारत छोड़ो आंदोलन के समय की घटना है। 14 अगस्त 1942 को मैनपुरी के बेवर नामक स्थान पर कुछ छात्रों ने ध्वज यात्रा निकाली। छात्रों और देशप्रेमी जनसमुदाय ने थाने पर कब्जा कर लिया। अतिरिक्त पुलिस बल बुलाकर इन्हें वहाँ से हटाया गया। अगले दिन 15 अगस्त 1942 को थाने पर भीड़ ने भारत का झंडा फहरा दिया। पुलिस ने गोलियां चलाईं। इस कांड में 14 वर्षीय कृष्ण कुमार, 42 वर्षीय जमुना प्रसाद त्रिपाठी, 40 वर्षीय सीताराम गुप्त शहीद हो गए।
शहीद अशफाकउल्ला का एक प्रसिद्ध शेर है,
शहीदों की मजारों पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा।
संभवत: ऐसी ही कोई भावना रही होगी कि इस बलिदान की स्मृति में 1972 में स्वर्गीय जगदीश नारायण त्रिपाठी ने ‘शहीद मेला’ आरंभ किया। स्वाधीनता के युद्ध में शहीद हुए लोगों के स्मृति में यह मेला 19 दिनों तक चलता है। यहाँ शहीद मंदिर भी है। शहीदों की फोटो प्रदर्शनी, शहीदों के परिजनों का सम्मान ,स्वतंत्रता सेनानी सम्मान, रक्तदान , राष्ट्रीय एकता सम्मेलन इसे विशिष्ट बनाते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है बैंकर्स के जीवन पर आधारित एक अतिसुन्दर संस्मरण “यादों में रानीताल”।)
☆ संस्मरण # 126 ☆ “यादों में रानीताल” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
कल जबलपुर के रानीताल की बात निकल आयी भत्तू की पान की दुकान पर ,,
ठंडी सुबह में दूर दूर तक फैला कोहरा… रानीताल के सौंदर्य को और निखार देता था । चारों तरफ पानी और बाजू से नेशनल हाईवे से कोहरे की धुन्ध में गुजरता हुआ कोई ट्रक ………
पर अब रानीताल में उग आए हैं सीमेंट के पहाड़नुमा भवन ……….।
परदेश में बैठे लोगों की यादों में अभी भी उमड़ जाता है रानीताल का सौंदर्य ……
पर इधर रानीताल चौक में आजकल लाल और हरे सिग्नल मचा रहे हैं धमाचौकड़ी ………।
यादों में अभी भी समायी है वो रानीताल चौक की सिंधी की चाय की दुकान जहाँ सुबह सुबह 15 पैसे में गरम गरम चाय मिलती थी ।
रात को आठ बजे सुनसान हो जाता था रानीताल चौक ……… रिक्शा के लिए घन्टे भर इन्तजार करना पड़ता था,अब ओला तुरन्त दौड़ लगाकर आ जाती है ।
संस्कारधानी ताल – तलैया की नगरी……
किस्सू कहता “ताल है अधारताल, बाकी हैं तलैयां ” फिर सवाल उठता है इतना बड़ा रानीताल ?
रानीताल चौक, रानीताल श्मशान, रानीताल बस्ती, रानीताल मस्जिद और रानीताल के चारों ओर के चौराहे……. पर अब सब चौराहे बहुत व्यस्त हो गए हैं चौराहे के पीपल के नीचे की चौपड़ की गोटी फेंकने वाले अब नहीं रहे पीपल के आसपास गोटी फिट करने वाले दिख जाते हैं……… कभी कभी।