मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच  स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते!

  पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे.

श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो.

    काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः  करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना  खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर  सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!

                      क्रमशः ….

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रूप्या…भाग 3 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ रूप्या…भाग 3 ☆ मेहबूब जमादार ☆

हे ऐकुन तात्या म्हणाला,

“मला माझ्या रूप्याला ईकायचं नव्हतं वो आण्णा”

रामरावआण्णांनी चार गोष्टी तात्याला समजावून सांगितल्या. त्याचा परिणाम असा झाला की तात्या त्या दिवशी जेवला. नेहमी परमानं तात्या गोट्यात जात हूता. पण रूप्या सोडून गोटा हे गणितचं तात्याच्या डोक्यात बसत नव्हतं.

आज तात्यानं सारं आवरलं. तो न जेवताच रामोसवाडीवर गेला. त्याला हे माहित होतं कि कापायला न्यायची बैलं जगू रामोशी खरेदी करायचा. आठ-दहा बैलं झालीं की तो ट्रकातनं बाहेर पाटवायचा. तात्या रामोसवाडीत शिरला. थोडं आत जाताच त्येला बैलांची दावण दिसली.

तात्याला पहाताच रूप्या ऊटून हंबराय लागला. तात्या रूप्याजवळ गेला. त्याला रडू आवरेना. त्यानं पाहिलं,रूप्यानं टाकलेल्या गवताच्या काडीला हात लावला नव्हता. तात्यानं रूप्याच्या तोंडावरंन हात फिरवला. तात्यानं शेजारी ठेवलेल्या ब्यरलमधलं पाणी पाजलं. तीन चार कळशा तो पाणी प्याला.

तोवर घेणारा मालक जगू तिथं आला. त्यानं ओळखलं. त्यानं लांबूनच रामराम केला. तात्यानं रामराम केला.

“काय राव आणल्यापस्न बैलानं वैरणीला तोंड लावलं नाय की त्यो पाणीसुध्दा प्याला नाय”

“आवं त्याची मायाचं हाय माझ्यावर तशी”

“ह्ये बघा आता बैलांच् वय झालंय. तुंम्ही सांभाळून तरी काय करणार?”

“हे तुमचं झालं. भावाला मी सांगितलवतं बैल दावणीला मरू दे. पण ईकू नका. आवं त्यो मी टाकल्याशिवाय वैरण खाणार नाय की पाणी पिणार नाय हे मला माहीती हूतं”

अशीच कांहीशी बोलाचाली झाली. शेवटी जातानां तात्यानं रूप्याला पाणी पाजलं. थोडी वैरण टाकली. तो भरल्या डोळ्यानीं वाडीत आला.

दोन दिवस कसंतरीं गेलं. तात्याला रूप्याशिवाय करमत नव्हतं. परत तिस-या दिवशी रूप्याला बघायला तात्या रामोशी वाडीवर गेला. दावण तशीच होती. तात्याला पाहताच रूप्यानं हंबरायला चालू केलं. कान टवकारलं. तात्यानं मायेनं तोंडावर अन अंगावर रूप्याच्या हात फिरवला. तात्यानं पाणी पाजलं. वैरण टाकली. रूप्या वैरण खायला लागला. तात्या तिथं थोडावेळ थांबला. मग शेजारच्या रानांतील आंब्याच्या झाडाखाली जावून बसला. असाच थोडावेळ गेला. कांहीवेळात जगू दावणीकडं आला. त्याला रूप्या वैरण खातूय म्हणल्यावर आश्चर्य‌ वाटलं. गेले तीन चार दिवस तो वैरण टाकत हूता. पण रूप्यानं तोंड लावलं नव्हतं. उलट रागानं तो त्याच्याकडं पहायचा.

त्यानं पाहिलं. तात्या आंब्याखाली तंबाखू मळत बसलावता. तो तडक झाडाखाली आला. त्यानं तात्याच्या डोळ्यांतलं पाणी पाहिलं. आज त्याच्याही काळजात कालवाकालव  झाली. त्यानं ह्यो पहिलाच मालक पाहीलावता जो आपला बैल ईकल्यावर बैलांकडं येत हूता,वैरण टाकत हूता,पाणी पाजत हूता.

सांजचा वकूत झाला तरी तात्या झाडाखालनं हालला नव्हता. ते पाहून शेवटी जगू म्हणाला,

“तात्या तूझी माया अजब हाय बाबा!असा मालक अन असा बैल मी माझ्या धंद्यात कवा बघितला नाय बघ. “

जगू ऊटला. त्यो दावणीकडं गेला. त्यानं रूप्याचं दावं सोडलं. रूप्या तात्याकडं जावून थांबला. तात्यानं परत रूप्याच्या तोंडावर अन अंगावर हात फिरवला.

जगूनं खाली पडल्यालं दांवं तात्याच्या हातात दिलं अन तो म्हणाला,

“तात्या घेवून जा त्येला”

“दादा ईकल्याला बैल मी परत कसा नेवू. बरं नेला असता त्यात आमचा कारभारी बसलाय पैका घेवून. मला काय पैसं लवकर माघारी देता येणार नायत”

त्यावर जगू म्हणाला,

“तात्या तूझा बैल घेवून जा बाबा! ऊगा शाप नको माझ्या ऊरावर. अन हे बघ, तूला जमलं तसं पैसं दे. अन नायचं जमलं तर दिवू नक. पण तूझा बैल तेवढा घेवून जा”

हे ऐकताच तात्यानं जगूच्या गळ्याला मिठी मारली. तो हमसाहमसी रडू लागला. त्यानं तात्याचं डोळं पुसलं. बैलाचं दोन्ही दावं परत त्याच्या हातात दिलं.

“जा बिनघोरी जा! कारभारी काय बोललां तर सांग,बैल तूझ्या मायेपोटी परत पाटवलाय म्हणांव”

तात्यानं जगूला हात जोडून रामराम केला. अन तो निघाला. रूप्या तात्याच्या पुढं चालत हूता. ही अजब माया जगू डोळ्यात साठवत हूता. तात्या नजरंआड होईपातूर तो त्यांच्याकडं एकटक पहात उभा हूता……बराचवेळ…..!

समाप्त

  – मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मध्यस्थ… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ मध्यस्थ… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

समिधा माझ्या मुलीची मैत्रीण.

थोडी पुढच्या वर्गात होती समिधा अगदी  निम्न मध्यम  वर्गातलीच म्हणा ना.

समिधा फार हुशार परिस्थितिची जाणीव असलेली आणि समजूतदार होती.

दिसायला तर ती छान होतीच,पण खूप हुशारही होती समिधा.

 समिधाला लहान भाऊही होता, अगदी पाठोपाठचा तोही हुशार होता.

समिधाच्या आईने आम्हाला एकदा हळदीकुंकवाला बोलावले होते.

अगदी साधेसुधे, 3 खोल्यांचे पण नीटनेटके ठेवलेले घर.

त्या स्वत:ही शिकलेल्या होत्या पण घरीच असायच्या.

 समिधा बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये  झळकली. .समिधाला खूप बक्षिसेमिळाली.

तिचे आईवडील पेढे घेऊन आले आमच्या घरी.

समिधा ला इंजिनिअर व्हायचे होते.

बारावीला तिने कसून अभ्यास केला.

तिला सुंदरच मार्क मिळाले आणि  तिला चांगल्या कॉलेज मध्ये सहज मिळाली ऍडमिशन.

लागोपाठ ,तिचा भाऊ समीर ही  होताच.

तिच्या वडिलांची, ओढाताण होत होती दोन्ही मुलांच्या फी, पुस्तके,क्लास ची फी भरताना. पण मुले हुशार होतीच.

समिधा च्या  पाठोपाठ समीरही इंजिनीरिंग ला गेला.

समिधाच्या अंगावर अगदी  साधे तेच तेच ड्रेस असत. पण तिने कधीही तक्रार नाही केली. ज्या कॉलेज मध्ये मुली नुसत्या फुलपाखरा सारखे स्वच्छंदी जीवन  जगतात, मौजमजा करतात, त्याच ठिकाणी समिधा अतिशय  साधी कोणत्याही मोहाला बळी न पडणारी होती.

मला फार कौतुक वाटायचे त्या कुटुंबाचे बघता बघता समिधा इंजिनिअर झाली तिला  कॅम्पस interview होऊन लगेचच जॉब ही मिळाला.

किती आनंदात पेढे घेऊन आली समिधा.

त्या कुटुंबाची मी फॅमिली डॉक्टरही होते.

समिधा जॉईन झाली कंपनीत.

खूप चांगले पॅकेज मिळाले तिला.

पण ती होती तशीच साधी राहिली.

पण हळूहळू,तिच्यात चांगला बदल झालेला दिसू लागला.

छान कपडे,थोडा मेकअप तिचे रूप खुलवू लागला. 

पूर्वी जरा  गंभीरच असलेली समिधा आता हसरी खेळकर दिसू लागली.

मला तिच्या आजीला बरे नव्हते म्हणून घरी visit ला बोलावले होते मी घरात पाउल ठेवले मात्र.

मला घरात लक्षणीय बदल जाणवला घर तेच होते, पण आता उत्तम महाग रंग लावलेला,  ज्या घरात फ्रीझही नव्हता तिथे मोठा फ्रीज,भारी सोफासेट.

घर खूप सुंदर आकर्षक दिसत होते.

भारी कपबशीत मला समिधाच्या आईने चहा दिला पूर्वीचा,जाड कपबशीतला, चहा आठवलाच मला.

लक्षात येण्यासारखे घर बदलले होते।छानच वाटले मला.

पण ही किमया घरात येणाऱ्या समिधाच्या पगाराची होती,हे  माझ्या चाणाक्ष नजरेला समजलेच.

समिधाच्या आईला मीम्हटले, आता छानसा जावई आणा.

हसत हसत हो म्हणेल हिला कोणीही.

कायग, जमवलं आहेस का कुठे नाही हो काकू.  मी सध्या ऑफिस झाले की क्लास लावलाय जावा चा.

बाबा म्हणाले,मग तुला प्रमोशन मिळेल.

मला हे कुठेतरी खटकलेच.

बाबा बेरकी पणे,माझ्याकडे बघत होते.

मी घरी आले पण समिधा चा विचार जाईना मनातून.

तिच्या पेक्षा थोडीच लहान असलेली माझी इंजिनीअर मुलगी, किती मस्त मजेत होती.

तिच्या मित्र मैत्रिणींचा घोळका घरी येतअ सायचा. तिलाही खूप पगार होताच पण  आम्ही कधीही तिला विचारले नाही तीच सांगायची,आई,मी अमुकअमुक इन्व्हेस्टमेंट्स केल्यात  समिधा मला या ना त्या कारणाने भेटत राहिली.

माझा जनसम्पर्क तर खूपच असतो समिधा आली होती, त्याचदिवशी एक बाई औषधासाठी आल्या होत्या छान आहे हो  मुलगी डॉक्टर.

करतेय  का लग्न.

माझा भाचा आहे लग्नाचा. बघा, त्यांनी त्या मुलाची माहिती,पत्ता  मला दिला.

मी उत्साहाने समिधाच्या आईला ती माहिती दिली.

मग बरेच दिवस काही समजले नाही म्हणून मीच  त्या बाईना विचारले त्या म्हणाल्या,अहो,त्या समिधाच्या आईकडून काहीच नाही  आले उत्तर  मला आश्चर्य वाटले.

नेमक्या समिधाच्या आईच दवाखान्यात त्या दिवशी आल्या मी त्यांना विचारले,तरमाझी नजर चुकवत म्हणाल्या,हं हं,ते होय.

अहो पत्रिका नव्हती जमत,  मग नाही गेले बाई मी.

 एक दिवस समिधा एका मुलाला घेऊन माझ्या दवाखान्यात आली.

काकू,हा माझा टीम लीडर आहे, संदीप याला तुम्ही मेडिकल certificate द्याल का .

मुलगा छानच होता .मी लगेच त्याला हवे ते  certificateदिले दुसऱ्यादिवशी समिधा आली थँक्स हं काकू.

मी  म्हटले,ते जाऊं दे ग,

 छान  आहे  की ग  मुलगा.

नुसताच मित्र आहे का आणखी काही.

समिधा हसली, म्हणाली काकू कित्ती चांगला मित्र आहे  माझा तो.

त्याला कशाला नवऱ्यात  बदलायचे.

 काल गेला चीन ला, आता 3 महिने नाही येणार  मी म्हटले,समिधा, चांगला मित्र, चांगला नवराही होऊ शकतो.बघ.

सगळ्या दृष्टीने मला आवडला हा तुझा मित्र.

असेच दिवस पुढे जात होते अचानक एक दिवस,संदीप दवाखान्यात आला म्हणाला,काकू ,थोडे बोलू का. अरे बोल की म्हणाला,मी चीन ला गेलो,तो पर्यंत मला समिधा बद्दल तसे काहीही वाटत नव्हते पण मला समजले की मी तिला खूपच मिस करतोय काकू,मला लग्न करायचंय तिच्याशी 

तुम्ही बोलाल का तिच्याशी

अरे, मी कशाला, तू तिला जा घेऊन तुमच्या ccd मध्ये आणि बिनधास्त विचार

ती नाही म्हणणार नाही बघ

तो म्हणाला, करू असं मी?

अरे करच. ती नक्की हो म्हणेल

 दुसऱ्याच दिवशी दोघेही हसत हसत आले दवाखान्यात.

काय रे मुलांनो, काय म्हणता

समिधा लाजली आणि म्हणाली

काकू, तुम्ही कित्ती बरोबर ओळखलंत

मलाही चैन पडेना, हा 3 महिने नव्हता तेव्हा .

आम्ही लग्न करायचे ठरवलेय.

ती म्हणाली, आई बाबांना आवडले नाही

मी परस्पर लग्न ठरवलेले.

म्हणाली इतकी घाई का करतेस

याहूनही चांगला मुलगा मिळेल की तुला

काकू,मी इतकी अडाणी राहिले नाहीये हो

मलाही माहीत आहे, खूप मुले आईने

माझ्या पर्यंत येऊच दिली नाहीत

पण मी तिला दोष नाही देणार

पण मी आता 27 वर्षाची आहे,

यापुढे

कधी मी लग्न करणार .

मला खात्री आहे, आम्ही या लग्नाने सुखी होऊ

समिधाच्या लग्नाला अर्थातच मी हजर होते

संदीप च्या आईने मला सुंदर साडी दिली

म्हणाली,  तुमच्या मुळे छान सून मिळाली हो आम्हाला

सगळे सांगितलंय आम्हाला संदीप ने

वधुवेशातली सुंदर समिधा आणि तिला शोभणारा जोडीदार बघून मला अतिशय समाधान वाटले.

 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

काल आणि आजही जगात सगळीकडेच महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन, मेजवान्या, कौतुकाचा वर्षाव, सुभाषिते, कविता, सुंदर लेख, भाषणे, नृत्य-गायन व लघुनाटीकांचे आयोजन होत आहे. सजून सवरून महिला ही या सर्वांचा आनंद लुटत आनंदी होत आहेत. पण हा उत्सव फक्त या एक दोन दिवसांचा नसावा. तर त्यांचे महत्व सदोदित जाणून तसे त्यांचेशी वर्तन असावे व त्यांनीही आपला मुळ‌ प्रेमळ‌ काळजीवाहू स्वभाव टिकवून ठेवत कौतुकास्पद होऊन रहावे.

अशाच एक कर्तबगार महिला, सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे या समुपदेशक असून त्यांना महिलांशी संबंधित व नातेसंबंधातील इतरही प्रश्न हाताळत असतांना निरनिराळे अनुभव व स्वभावछटा जाणवत असतात. विविध वृत्तपत्रांत त्यांचे मार्गदर्शक लेख ही येत असतात. या आधिही त्यांचे लेख सामायिक केलेले आहेतच.  आलेल्या अनुभवांवरून त्यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा.

 – मेघःशाम सोनवणे

                       – 🌼 –

महिला दिनाचा संकल्प करूयात,

घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात !!!!

आठ मार्च, जागतिक महिला दिन !!! विविध स्वरूपात कार्य, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवलं जाईल, त्यांचा आदर,  सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्री ला देवी चे रुप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्री ला बहाल करुन तिच्या शिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाच्या उत्कंठ भावना दाटून येतील यात शंकाच नाही !

महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करुन घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही.

पण खरंच प्रत्येक महिलेला, जिला समाजात नावाजलं जातं, तिच्या कार्य क्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जातं, जिच्या कार्याची, कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्या साठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिक पणे आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर “नाही !!!!” असंच येईल, आणि येते आहे.

समुपदेशनाला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील असे स्थान नाहीये.

आपल्याला अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणी नुसार स्त्री ही घरची लक्ष्मी आहे !! घरातील माता, पत्नी, सून ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं, हे पातक आहे !!

घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी, समाधानी हवी ! असं असलं की  संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अश्या घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात, हिच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.

आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारतांना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.

समुपदेशन मधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करुन करुन प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उध्वस्त झालेली आहे, मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थिती शी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं देणं नाहीये !

तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.

हिच घरा घरातील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले?  माझे आईबाबा कुठे चुकले?  माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केलं?  मी कोणाशी वाईट वागले? मी च का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना???  कधी महत्व कळेल यांना माझं? 

अश्या असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहाते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहाते.

समुपदेशनला आलेल्या अनेक महिला, ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत, त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण तणाव, दररोज चे वाद विवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवेदावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी???  अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय?? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृह लक्ष्मी का?? ही आपली पौराणिक, अध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही…… आणि कधीही नव्हती !!

सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून थटून, भरजरी साडया नेसून, नट्टा पट्टा करुन,  दाग दागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय?? यावर विचार होणे आवश्यक आहे.

या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणीतरी समजावून घ्यावं ऐकून घ्यावं म्हणून!!!

या महिला दिनाला एकच करूयात. इथून पुढे घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात…  जी आपल्या घरात लग्न लावून आली, तिला शेवटच्या श्वासापर्यंत न्याय देऊयात !!! तिला समजूयात, तिला सामावून घेऊयात, तिला स्वीकारुयात आणि तिला नाही तर तिच्या अंतःकरणाला हसताना, तिच्या मनाला मोहरताना पाहुयात. ज्याला हे जमलं त्यानं जग जिंकलं… ज्यानं हे केल त्यानं सर्व काही कमावलं!

©️ सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे

काउन्सीलर. 9766863443

(हा लघुलेख आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.  -मेघःशाम सोनवणे. दररोज अशा सकारात्मक कथा व लेखांसाठी 9325927222 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा.)

स्वतः लेखिका सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे यांच्या सौजन्याने.

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ब्रह्मवादिनी सुलभा☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ब्रह्मवादिनी सुलभा ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : ब्रह्मवादिनी सुलभा

वदिक काळात स्त्रियांना खूप मान होता. मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण पण त्यांना मिळत असे. त्यांचे उपनयन सुद्धा होत असे.  ब्रह्मवादिनी स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळत. विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करत. सुलभा कुमारी संन्यासिनी होती. ती अत्यंत चतुर विद्वान आणि बुद्धिमान होती. प्रधान नावाच्या राजाची ती कन्या. तिने आजन्म ब्रह्मचारी राहून वेद विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास व स्वतंत्र लेखनही केलं. ब्रम्हा यज्ञाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तर्प णात गार्गी ,मैत्रेयी, वाचक्नवी यांच्याबरोबरच सुलभा चे नाव घेतले जाते. ती आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तपअर्जिता, ओजस्वी आणि तेजस्वी स्त्री होती. तिने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक स्वतंत्र आश्रम उभे केले. परकायाप्रवेश याचे ज्ञान तिने मिळवले होते. त्याआधारे ती राजा जनकाच्या शरीरात प्रवेश करून विद्वानांच्या बरोबर शास्त्रशुद्ध चर्चा करत असे. ती सतत प्रवास करून धर्माचा उपदेश आणि प्रसार करत असे. तिला तिच्या योग्यतेचा वर मिळाला नाही म्हणून तिने लग्न केले नाही.

महाभारताच्या शांतिपर्वामध्ये जनक राजा आणि सुलभा यांचा संवाद विस्तारपूर्वक वाचायला मिळतो. तिने आपल्या वाणीचे आठ गुण आणि आठ दोष यावर विशेष अभ्यास केलेला आहे.

तिला एकदा कळले की राजा जनक‌ अहंकारी झाला आहे. तिने त्याला भेट देण्याचे ठरवले. त्याला भेटण्यासाठी  तिने आपल्या योगाच्या बळावर मूळ शरीर टाकून देऊन सुंदर रूप धारण केले. आणि मिथिला  नगरीत आली. भिक्षा मागण्याचा बहाणा करून राजा जनकाच्या समोर आली. राजा जनक तिच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाला त्याने तिचे स्वागत केले. पाय धुवून यथोचित पूजा करून उत्तम जेवण दिले. जनक राजाने विचारले.,”तू ब्राम्हणी संन्यासिनी आहेस का?”सुलभ उत्तरली” मी क्षत्रिय कन्या .योग्य पती न मिळाल्यामुळे   मी लग्न केले नाही. व्रतस्थ  राहते”. राजाने विचारले

“खरे शहाणे कोण?” सुलभा उत्तरली “ज्ञानी माणूस कधीही स्वतःची स्तुती करत नाही तो कमी बोलतो आणि मौनात राहतो.मग तो राजा असो ,ग्रहस्थ असो अथवा संन्यासी असो.” जनक राजाला आपली चूक समजली. तो म्हणाला ,,”सुलभा ,तू माझे डोळे उघडलेस. तू खरी ज्ञानी आहेस. मी तुझे बोलणे लक्षात ठेवून यापुढे वाणीवर संयम ठेवीन.”

अशाप्रकारे महाज्ञानी जनकराजाला वठणीवर आणणारी ब्रह्मवादिनी सुलभा. तिला कोटी कोटी प्रणाम.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#123 ☆ अंतरराष्ट्रीय महिला दिवस विशेष – “दोहे ” ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है अंतरराष्ट्रीय महिला दिवस पर कुछ “दोहे ”)

☆  तन्मय साहित्य  #123 ☆

☆ अंतरराष्ट्रीय महिला दिवस विशेष – “दोहे ” ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

मात-पिता की लाड़ली, बच्चों का है प्यार।

संबल है पति की सखी, सुखी करे संसार।।

 

लक्ष्मी बन  घर में भरे, मंदिर जैसे  रंग।

होता है श्री हीन नर, बिन नारी के संग।।

 

इम्तिहान हर डगर पर, मातृशक्ति के नाम।

विनत भाव सेवा करे,  हो करके निष्काम।।

 

घर में गृहणी बन रहे,  बाहर है  तलवार।

जब जैसी बहती हवा, वैसी उसकी धार।।

 

नारी को समझें नहीं, कोई भी कमजोर।

नारी  के ही  हाथ में, पूरे  जग  की डोर।।

 

जीवन के  हर  क्षेत्र  में, है  विशिष्ट  अवदान।

मातृशक्ति नित गढ़ रही, नित नूतन प्रतिमान।।

 

करुणा  ममता  प्रेम का, मधुरिम सा  संचार।

निर्मल जल कल-कल बहे, बहता ऐसा प्यार।।

 

पर्वोत्सव व्रत-धर्म का,  पारम्परिक प्रवाह।

नारी के बल पर टिकी, ये सत्पथ की राह।।

 

सहनशक्ति धरती सदृश, ममतामय आकाश।

चंदा   सी   शीतलमना,   सूर्योदयी   प्रकाश।।

 

दीपक ने आश्रय दिया, खुश है बाती – तेल।

मेल-जोल  सद्भाव का,  उज्वलतम यह मेल।।

 

संस्कृति की संवाहिका, संस्कारों की खान।

प्रवहमान  गंगा  सदृश, फूलों  सी  मुस्कान।।

 

लछमी  जैसी  चंचला, शारद  सी  गंभीर।

दुर्गा सी तेजस्विनी, शीतल जल की झीर।।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – गिरहकट ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – लघुकथा – गिरहकट  ??

पत्रिका पलटते हुए आज फिर एक पृष्ठ पर वह ठिठक गया। यह तो उसकी रचना थी जो कुछ उलजलूल काँट-छाँट और भद्दे पैबंदों के साथ उसके एक परिचित के नाम से छपी थी। यह पहली बार नहीं था। वह इस ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी थेफ्ट’ का आदी हो चला था। वैसे इससे उसकी साख पर कोई असर कभी न पड़ना था, न पड़ा। उन उठाईगीरों की साख तो थी ही नहीं, जो कुछ भी थी, उसमें इन हथकंडों से कभी बढ़ोत्तरी भी नहीं हुई।

आज उसने अपनी नई रचना लिखी। पत्रिका के संपादक को भेजते हुए उसे उठाईगीरे याद आए और उसका मन, उनके प्रति चिढ़ के बजाय दया से भर उठा। अपनी रचना में कुछ काँट-छाँट कर और अपेक्षाकृत कम भद्दे पैबंद लगाकर उसने एक और रचना तैयार की। साथ ही संपादक को लिखा कि उठाईगीरों को परिश्रम न करना पड़े, अतः ओरिजिनल के साथ डुप्लीकेट भी संलग्न हैं। दोनों के शीर्षक भी भिन्न हैं ताकि बेचारों को नाहक परेशानी न झेलना पड़े।

संपादक ने देखा, मूल रचना का शीर्षक था, ‘गिरह‘ और डुप्लीकेट पर लिखा था- ‘गिरहकट।’

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी # 99 ☆ बुंदेलखंड की कहानियाँ # 10 – मनुस बली नहीं होत है… ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.

श्री अरुण डनायक जी ने बुंदेलखंड की पृष्ठभूमि पर कई कहानियों की रचना की हैं। इन कहानियों में आप बुंदेलखंड की कहावतें और लोकोक्तियों की झलक ही नहीं अपितु, वहां के रहन-सहन से भी रूबरू हो सकेंगे। आप प्रत्येक सप्ताह बुधवार को साप्ताहिक स्तम्भ बुंदेलखंड की कहानियाँ आत्मसात कर सकेंगे।)

बुंदेलखंड कृषि प्रधान क्षेत्र रहा है। यहां के निवासियों का प्रमुख व्यवसाय कृषि कार्य ही रहा है। यह कृषि वर्षा आधारित रही है। पथरीली जमीन, सिंचाई के न्यूनतम साधन, फसल की बुवाई से लेकर उसके पकनें तक प्रकृति की मेहरबानी का आश्रय ऊबड़ खाबड़ वन प्रांतर, जंगली जानवरों व पशु-पक्षियों से फसल को बचाना बहुत मेहनत के काम रहे हैं। और इन्ही कठिनाइयों से उपजी बुन्देली कहावतें और लोकोक्तियाँ। भले चाहे कृषि के मशीनीकरण और रासायनिक खाद के प्रचुर प्रयोग ने कृषि के सदियों पुराने स्वरूप में कुछ बदलाव किए हैं पर आज भी अनुभव-जन्य बुन्देली कृषि कहावतें उपयोगी हैं और कृषकों को खेती किसानी करते रहने की प्रेरणा देती रहती हैं। तो ऐसी ही कुछ कृषि आधारित कहावतों और लोकोक्तियों का एक सुंदर गुलदस्ता है यह कहानी, आप भी आनंद लीजिए।

☆ कथा-कहानी # 99 – बुंदेलखंड की कहानियाँ – 10 – मनुस बली नहीं होत है… ☆ श्री अरुण कुमार डनायक

मनुस बली नहीं होत है, समय होत बलवान।

भीलन लूटी गोपिका , बेई अर्जुन बेई वान॥

शाब्दिक अर्थ :- मनुष्य बलवान नहीं होता, समय बलवान होता है। एक समय ऐसा था कि वीर अर्जुन के समक्ष कोई भी बड़ा से बड़ा धनुर्धर नहीं तिक पाता था। अब समय ऐसा आया कि भीलों ने गोपियों को लूट लिया और वही धनुर्धर अर्जुन चुपचाप देखते रहे।

बीरा,जहाँ मैंने यह कहावत पहली बार सुनी, पन्ना जिले की अजयगढ़ तहसील का एक पिछड़ा व दूरस्थ  गाँव है,  जिसके एक ओर केन नदी बहती तो दूसरी ओर ब्रिटिश काल में निर्मित भापतपुर बांध से निकली नालानूमा विशाल नहर। यह उत्तरप्रदेश के बांदा जिले से लगा हुआ, मध्य प्रदेश का सीमांत गाँव है। चित्रकूट, बुंदेलखंड क्षेत्र का एक  प्रसिद्ध तीर्थ स्थल,  जहाँ अयोध्या से निर्वासित भगवान राम ने वनवास के 12 वर्ष बिताए थे, बीरा से ज्यादा दूर नहीं है। बीरा से अजयगढ़ के रास्ते, पिस्टा गाँव के निकट  एक  हरी भरी पहाड़ी है, नाम  है देव पर्वत,  कहते हैं भगवान राम ने विपत्ति भरे अपने वनवास के समय कुछेक रातें इस देव पर्वत पर भी बिताई थी। तुलसी दास भी लिख गए हैं “जा पर विपदा पडत है वह आवत यही देश”(देश मतलब हमारा गर्वीला, पथरीला, दर्पीला बुंदेलखंड)।  राजशाही के जमाने में अनेक ब्राह्मण व उनके चेले चपाटी यादव बांदा और उत्तर  प्रदेश के अन्य भागों से बीरा और उसके आसपास के गांवों में आकर बस गये और राज दरबार में अपने ब्राह्मणत्व का उपयोग कर जमींदारियाँ हासिल कर ली। गुरु ब्राह्मण के पास पोथिओं व पुराणों का ज्ञान था तो चेले यादव के पास शारीरिक बल और हाथ में लट्ठ। गुरु-चेले की इस जुगल जोड़ी ने बीरा जैसे पिछड़े गांवों में अपनी धाक जमा ली और उनका खेती किसानी, दुग्ध उत्पादन के साथ साथ पंडिताई का व्यवसाय फलने फूलने लगा। खेतिहर मजदूर पंडित जी की ज्ञान वाणी सुनते और उनके बहुत से काम बेगारी में ही हँसते मुस्कुराते कर देते। समय बदला देश स्वतंत्र हुआ शिक्षा फैली और समाजवादी नारे मध्यप्रदेश के इस दूर दराज स्थित क्षेत्र में भी सुनाई देने लगे। अब दलित मजदूर पंडित जी के पोथी पत्रा या यादव के बलिष्ठ शरीर  देखकर  प्रभावित न होते और बेगार के लिए तो आसानी से  न मानते। वे ना तो  चेले  के लट्ठ से विचलित होते और न ही बरम बाबा के श्राप से घबराते।

ऐसे ही संक्रमण काल में मेरी पदस्थापना वहाँ हुयी और मैं भारतीय स्टेट बैंक की बीरा शाखा में जनवरी 1990 से मई 1993 तक शाखा प्रबंधक के पद पर कार्यरत रहा। मैं गाँव  में ही रहता और समय बिताने पड़ोसी शुक्लजी (मास साब), उनके पुत्र रमेश व अन्य ग्रामीणों की पौड़ (बारामदा या दहलान) में बैठा करता। ऐसी ही एक सुबह माससाब  ने अपनी पौड़  में बैठे बैठे सामने से पायंलागी कर निकलते हुये एक अधेढ, कलुआ  कोरी,  को आवाज लगाई। कलुआ कोरी आशीर्वाद की लालच में माससाब के सामने आ खड़ा हुआ। माससाब ने उसे ‘खुसी रहा’ का आशीर्वाद दिया और घर के पीछे खलिहान में रखे गेहूँ को बंडा व खौड़ा में संग्रहित करने में मदद करने को कहा। कलुआ ताड़  गया की दो तीन घंटे से भी ज्यादा  का काम है और मजदूरी तो मिलने से रही अत: उसने कोई अन्य काम का बहाना बना इस गमरदंदोर में न फसने की सोची।

उसकी  यह आनाकानी  माससाब को क्रोधित करने के लिए पर्याप्त थी  और कलुआ का बुन्देली गालियों से “पानी उतारबौं” (बेज्जती करना)  चालू हो गया। माससाब ने तो उसे पनमेसुर के पूरे (कपटी व्यक्ति),   ‘मूतत के ना माड़ पसाउत के” (निकम्मा और अकर्मण्य) आदि न जाने क्या क्या कह दिया पर  कलुआ टस से मस न हुआ। वह उनकी बातें सुनता, कुछ प्रतिकार करता, बार बार बक्स देने को कहता  पर बेगारी के लिए तैयार न होता। अंतत: माससाब ने अपना ब्रह्मास्त्र चलाया और यह कहावत कलुआ पर जड़ दी “मनुस बली नहीं होत है, समय होत बलवान।भीलन लूटी गोपिका , बेई अर्जुन बेई वान॥ “ कोरी ने जैसे ही गोपिका और अर्जुन का नाम सुना उसे भगवान कृष्ण की भागवत याद आ गई और वह बोल पड़ा महराज जा  तो भागवत पुराण की बात है हमे भी ईखी की कथा सुना देओ तो जीवन तर जाए। माससाब समझ गए की मछली पटने वाली है और कलुआ अब भौंतेरे में बिदबई वारो है( जाल में फस जाना) लेकिन गला फाड़ चिल्ला चौंट से माससाब थक गए थे अत: उन्होने अपने पुत्र रमेश को कथा सुनाने का दायित्व दे ‘सुट्ट हो जाना’ (शांत रहना)  उपयुक्त समझा। फिर क्या रमेश की पंडिताई चालू हो गई और कथा ऐसे आगे बढ़ी; ‘का भओ कलुआ कै की तैं तो महाभारत की कथा जानत है, पांडवन खों राज दै कै भगवान द्वारका वापस आ गए अब आगे सुन’। एक दिन महर्षि विश्वामित्र, कण्व और नारद जी आदि ऋषि द्वारिका में पधारे। कलुआ ये सब ऋषि मुनि बड़े सिद्ध ब्राह्मण थे। उन्हे देखकर यादवों की अक्कल चरने चली गई और  सारण आदि यादव,  साम्ब को लुगाई (स्त्री) के वेश में सजा सवांर कर ब्राह्मण मुनियों के पास ले गए और बोले कि हे ब्राह्मण देवता यह महा तेजस्वी वभ्रु की पत्नी ‘पेट से हैं’ (गर्भवती है)। बताइए इसके गर्भ से क्या पैदा होगा। ब्राह्मण देवता रूपी मुनि उड़त चिरईया परखबे में माहिर हते,  वे समझ गए कि यादव लोग उनका मजाक उड़ा रहे हैं। वे क्रोध में बोले कि मूर्खो यह कृष्ण का पुत्र साम्ब स्त्री वेश में है, इसके पेट में मूसल छिपा है जिससे तुम सभी यादवों का नाश हो जाएगा। फिर क्या था, ब्राह्मण देवताओं का श्राप सुनकर  सारे यादव घबरा गए और महाराजा उग्रसेन (कृष्ण भगवान के नाना) के पास पहुँचे। उन्होने मूसल का चूरण बनाकर समुद्र में फिकवा दिया, ताकि मूसल से कोई नुकसान न होने पाये। कुछ दिनों बाद  इसी चूरण से जो काँस (एक प्रकार की घाँस) ऊगी उसे उखाड़ उखाड़ कर सारे यादव अहीर आपस में लड़ मरे। भगवान कृष्ण इससे  बड़े दुखी हो गए और उन्होने भी अपनी लीला ख़त्म करने की सोचते हुये अर्जुन को द्वारका  बुलाया और सभी सोलह हज़ार गोपियों को अपने साथ ले जाने को कहा। अर्जुन ने भगवान का कहना मानते हुये सभी को साथ लेकर  अपनी राजधानी इंद्रप्रस्थ की ओर चल पड़ा। रास्ते में जब अर्जुन ने अपना पड़ाव पंचनद क्षेत्र में  डाला तो वहाँ के लूटेरों ने आक्रमण कर सारा माल आसबाब और गोपियों को लूट लिया। अर्जुन जिसके पास गाँडीव जैसा धनुष था और जो उस समय का सबसे बडा वीर पुरुष था कुछ न कर सका, चुपचाप गोपियों को लुटता पिटता देखता रह गया क्योंकि अब भगवान उसके साथ नहीं थे और उसका समय खराब था। कहानी आगे बढ़ती कि कलुआ बीच में बोल पड़ा वाह महराज वाह भगवान को का भओ जा ओर बता देते तो मोरी आत्मा तर जाती। मासाब समझ गए कि लोहा गरम हो चुका है वे बोले ‘कलुआ पूरी भागवत एकई दिना में नई बाँची जात बाकी किस्सा और कोनऊ दिना आके सुन लईओ अबे तो तुम कलेवा कर लेओ और अपनी गैल पकड़ो।‘

©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से # 16 ☆ गीत – चुनाव की छांव में ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल 

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।  

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है। 

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक गीत  “चुनाव की छांव में”। 

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 16 ✒️

?  गीत – चुनाव की छांव में —  डॉ. सलमा जमाल ?

झूठ फरेब का खेल रचें ,

चुनाव की छांव में ।

लुटेरे आए हैं ,आए हैं ,

मेरे गांव में ।।

 

जहां-जहां चुनाव है ,

वहां नहीं है करोना ,

घड़ियाली आंसू है ,

झूठ का ओढ़ना बिछौना ,

एक – एक रैली में हज़ार की,

भीड़ लगी है दांव में ।

लुटेरे ———————–।।

 

धरती पुत्रों के प्राण निछावर,

हुए अम्बर तले ,

टस से मस सरकार हुई ना ,

कितनों के घर जले ,

अभिव्यक्ति पर ताले वरना ,

जेल की छांव में ।

लुटेरे ———————–।।

 

संपत्ति बेचें जो देश की ,

कोई ना रोकने वाला ,

मंदिर – मस्जिद – गुरुद्वारा ,

लगा है चर्च पे ताला ,

राजनीति भवसागर जनता ,

काग़ज़ की छांव में ।

लुटेरे ———————–।।

 

ऊपरवाला कैसे करें ,

कलयुग में रखवाली ,

स्वयं की बगिया को उजाड़े ,

जब बाग़ का माली ,

कर्मों का फ़ल मिलेगा ,

“सलमा” फंसेंगे बलाओं में ।

लुटेरे ———————–।।

 

© डा. सलमा जमाल 

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी #22 – परम संतोषी भाग – 8 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव 

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे।  उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आपने ‘असहमत’ के किस्से तो पढ़े ही हैं। अब उनके एक और पात्र ‘परम संतोषी’ के किस्सों का भी आनंद लीजिये। आप प्रत्येक बुधवार साप्ताहिक स्तम्भ – परम संतोषी   के किस्से आत्मसात कर सकेंगे।)   

☆ कथा – कहानी # 22 – परम संतोषी भाग – 8 ☆ श्री अरुण श्रीवास्तव 

असहमत फिर से, क्या करते हैं आप आज असहमत का कार्यक्रम सुबह फिर जलेबी-पोहा खाने का बना. सबेरे यही किया जाता है, ब्रेकफास्ट और कड़क चाय के बाद ही लोग सोशल मीडिया पर सक्रिय होते हैं. तो घर से बाहर निकलकर, सीधे सीधे सत्तर कदम चलने के बाद नुक्कड़ पर असहमत के कदम थम गये. दो रास्ते थे, राईट जाता तो मंदिर पहुंचता और लेफ्ट जाता तो गरमागरम जलेबियाँ खाता. असहमत, स्वतंत्र विचारों की रचना थी, गरमागरम जलेबी खाने का फैसला अटल था तो राइट नहीं लेफ्ट ही जाना था. पर नुक्कड़ पर चौबे जी खड़े थे. दोनों एक दूसरे को नज़र अंदाज़ कर सकते थे पर जब असहमत ने चौबे जी से “हैलो अंकल” कहा तो बात से बात निकलने का सिलसिला शुरु हो गया. चौबे जी तो श्राद्ध पक्ष से ही असहमत से खार खाये बैठे थे तो मौके का भरपूर प्रयोग किया. “अरे प्रणाम पंडित जी कहो, अंगरेज चले गये औलाद छोड़ गये. “

असहमत : अरे पंडित जी औलाद नहीं अंगरेजी है, अंग्रेजी छोड़ गये.

चौबे जी: तुम्हारे जैसे अंग्रेजों के गुलाम ही हिंदू धर्म को कमजोर कर रहे हैं तुम नकली हिंदुओं के कारण ही हिंदू एक नहीं हो पाते.

असहमत: अरे चोबे जी, ऐसा तो मत कहो, मैं मंदिर जाता हूँ जब मेरा मन अशांत होता है. “इस्लाम खतरे में है ” बोलबोलकर उन्होंने सरहद पार आतंकवादियों की फसल तैयार कर दी, अब आप हमको क्या सिखाना चाहते हो. भक्त और भगवान का तो सीधा लिंक है फिर ये एकता वाली चुनावी बातें किसलिए.

चौबे जी : हमको ज्ञान मत बांटो, तुम्हारे जैसे दो टके के लोग वाट्सएप पढ़ पढ़ कर ज्ञानी बने घूमते हैं. चलो हमारे साथ, राईट टर्न लो जहाँ मंदिर है.

असहमत : मैं अभी तो लेफ्ट ही लूंगा क्योंकि गरमागरम जलेबी और पोहा मेरा इंतजार कर रहे हैं, डिलीवरी ऑन पेमेंट. चलना है तो आप चलो मेरे साथ. चौबे जी का मन तो था पर बिना मंदिर गये वो कुछ ग्रहण नहीं करते थे.

तो चौबे जी ने अगला तीर छोड़ा ” हिंदू धर्म मानते हो तुम, मुझे तो नहीं लगता.

असहमत : अरे पंडित जी, ऐसी दुश्मनी मत निकालो, बजरंगबली का भक्त हूं मैं, थ्रू प्रापर चैनल पहुंचना है राम के पास. मेरे धर्म में मंदिर हैं, दर्शन की कतारें हैं, पूजा है, आरती है, जुलूस हैं, भंडारे हैं, ऊंचे पर्वतों पर माता रानी बैठी हैं और गुफाओं में शिव, बजरंगबली के दर्शन कभी कभी मंगलवार को कर लेता हूं पर जब यन अशांत होता है तो जरूर मंदिर जाता हूं, बहुत शांति और ऊर्जा मिलती है मुझे.

असहमत के जवाबों और अंदर की आस्था ने, धर्म के ब्रांड एम्बेसडर को हिला दिया. तर्क का स्थान असभ्यता और अनर्गल आरोपों ने ले लिया.

चौबे जी : चल झूठे, दोगला है तू, साले देशद्रोही है.

अब पानी शायद असहमत के सर से ऊपर जा रहा था या फिर गरमागरम जलेबी ठंडी होने की आशंका बलवती हो रही थी पर देशद्रोही होने का आरोप सब पर भारी पड़ा. जलेबी और पोहे को भूलकर, असहमत ने चौबेजी से कहा: अब ये तो आपने वो बात कह दी जिसे कहने का हक आपको देश के संविधान ने दिया ही नहीं. आप मुझे नकली हिंदू कहते रहते हैं मुझे बुरा नहीं लगता पर देशद्रोही, कैसे

  1. मैं तिरंगे का अपमान नहीं करता
  2. जब राष्ट्र गीत बजता है तो मैं चुइंगम नहीं खाता.
  3. मैं रिश्वत नहीं खाता, चंदा नहीं खाता
  4. आपत्तिजनक नारे नहीं लगाता
  5. सेना में भर्ती होना चाहता था पर उनके मानदंडों पर पास नहीं हो पाया.
  6. न मैं देशविरोधी हूँ और ना तो मैं सोचता हूँ न ही मेरी औकात है
  7. मैं कोई अपराध भी नहीं हूँ, बेरोजगारी मुझे कभी कभी गुस्सा दिलाती है तो मैं जिम्मेदार लोगों की आलोचना करने लगता हूँ. मैं अपना वर्तमान सुधारने में लगा हूँ और वो इतिहास सुधारने में. अरे भाई लोगों मेरी चिंता करो, मुझे मेरे वोट का प्रतिदान चाहिये, मेरी समस्याओं का समाधान चाहिये, आपके वादों के परिणाम चाहिए. और आप हैं लगे हुये अगली वोटों की फसल उगाने में. एक फसल जाती है फिर दूसरी आती है और हमारे जैसे लोग हर गली हर नुक्कड़ पर इंतजार करते हैं वादों और सपनों के साकार होने का.

बात चौबे जी के लेवल की नहीं थी, उनके बस की भी नहीं तो उन्होंने इस मुलाकात का दार्शनिक अंत किया, वही संभव भी था और मंदिर की ओर बढ़ गये.

 “होइ हे वही जो राम रचि राखा, को करि तर्क बढावे साखा”

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares